2 0 204६-70: त. 1] डो कणे, 2.८८ कव भट भाषांतरमाला क्र, २७ दुठरूपक-विधान भरतमुनींच्या “ नाय्यशास्त्रा /तील अध्याय १८ १ १९ यांचे “ अभिनवभारती ” टोकेसह सटीप मराठी भाषांतर भाषांतरकार प्रा. र. पं. कंगले | महाराष्ट्र राळ्य. महाराष्ट्‌ राज्य साहित्य- संस्कृति मंडळ मुंबई, प्रथमावृत्ती : १९७४ (हाके १८९५) प्रकाशक ! सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ; सचिवालय, मुंबई ४०० ०२२. (8 भाषांतरित आवृत्तीचे सर्व हक्क प्रकाशकाधीन मुद्रक : श्री. केशव चोधरी, निदेशक, | आंतर भारती मुद्रणालय, ४२ आंबेकर मार्ग, बडाळा इंडस्ट्रीअळ एरीया; बडाळा, मुंबई ३१. किंमत २३ रुपये 6६ नवढन मराठी भाषेला व साहित्याला आधुनिक. ज्ञानविज्ञानाच्या व आधुनिक सांस्कृतिक मूल्यांच्या आविष्काराचे सामथ्ये प्राप्त व्हावे; आधुनिक शास्त्रे, ज्ञानविज्ञाने, तंत्र आणि अभियांत्रिकी त्याचप्रमाणे भारतीय प्राचीन संस्कृति, इतिहास, कळा इत्यादी विषयांत मराठी भाषेला विद्यापीठाच्या स्तरावर ज्ञानदान करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे; विविध विद्या व कलांबाबत उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती करून मराठी भाषेळा जागतिक उच्च स्थान मिळवून द्यावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाने बहुविध वाड्मयीन कार्यक्रम आखला असून तो व्यवस्थितपणे कार्यवाहीत आणण्याकरिता विश्वकोश समिती, ळलित कला समिती, इतिहास समिती, भाषांतर समिती, मराठी वाड्मयकोश समिती, प्रकाशन समिती आदी समित्या स्थापन केल्या आहेत. २. ललित कळा समितीच्या कायेक्रमामध्ये मंडळाच्या बहुविध वाड्मयीन कार्यक्रमास अधिक संस्कृतीप्रवण करण्यासाठी लळितकलांविषयक नाट्य, नृत्य, वाद्य, चित्र, मूर्ती व गायन या विषयांचे संशोधन, विवरण व इतिहास यांचा अंतर्भाव आहे. या संवर्धित कार्य- क्रमात कळा व कलासंबद्ध विषयांवर मूळभूत संशोधन करून लिहिलेले ग्रंथ, संगीत व संगीतशाद्य, नाटक व नाट्यशास्ञ, नृत्य व शिल्प इत्यादींवरीळ प्रमाणभूत जुन्या ग्रंथांची भाषांतरे, विविध कलांचा इतिहास, कलाकारांची चरित्रे इत्यादी वाड्याच्या प्रकारना- बरोबरच संस्कृत व मराठीतर अन्य भारतीय भाषांतील तसेच पश्चिमी व अन्य परदेशी भाषांतील ळलितकळाविषयक अभिजात वाडय्मय मराठीत भाषांतरित करून प्रकाशित करण्याचा कार्यक्रम अंतभूत आहे. या कलांचा वाडूमयाच्या द्वारे मराठी वाचकांस संक्षेपाने व विस्ताराने परिचय करून देणे असा मंडळाचा महत्त्वाचा उद्देश आहे. ३. या योजनेखाली मंडळाने श्री. के. नारायण काळे यांनी अनुवादित केलेले स्तानिस्ठावस्कीचे “अभिनय साधना”, श्री. श्री. ह. देशवांडे यांनी अनुवादित केलेले कॉपळँंडचे “संगीत ब कल्पकता” आणि डॉ. श्री. ना. रातंजनकर यांनी लिहिलेले “पं. विष्णु नारायण भातखंडे” ही पुस्तके प्रकाशित केळी आहेत. भरतमुनींचे “नाट्यशास्र” (रस- सिद्धान्तविषयक अध्याय ६ व ७, नाट्यविषयक अध्याय १८ व १९, ब संगीतविषयक अध्याय २८), शाद्वेदेवाचे “संगीतरत्नाकर”, नंदिकेश्वराचे ““अमिनयदर्पण”, भामहाचे “काव्यालंकार”, आनंदवधनाचे “ध्वन्याळोक', दण्डीचे “काव्यादररी”?, वबिशाखदत्ता'चे “मुद्राराक्षस”, कवी हाला'ची “गाथासप्तशती”, कवी बिह्वारीची “सतसई'”, जयदेव कवीचे “गीतगोविन्दम”, स्तानिस्लाव्स्कीचे *9८1॥॥८ ८2 €ण८०८४थ-”, स्ट्राविन्सकीचे “००८४८७ ५24712” भरत के अय्यर यांचे “कथाकळी'”, डॉ. बी. सी. देव यांचा “भारतीय वाद्यांचा कोरा” 6 श्री. वा. ह. देशपांडे यांचे “वादाचा टका 10 हवाट” इत्यादी ग्रंथांची भाषांतरे मंडळा'च्या वतीने क्रमाने प्रकारित व्हावयाची आहेत. याशिवाय श्री. २ पावेतीकुमार संपादित “तंजावरची नुत्यसाधना?, डॉ, भा. कू. आपटे संपादित '"वाचायठ पवळा ०वण॥25”, डॉ. सौ. श्यामला बनारसे लिखित “सांगीतिक मानसशास्राची मूलतत्त्वे”, डॉ. एस्‌. व्ही. गोखले यांचे “हिंदुस्थानी संगीतातीळ लय आणि ताल विचार”, डॉ. शं. अ. टेंकरी यांचे “रागवर्गीकरण'” इत्यादी ग्रंथही लवकरच मंडळाच्या वतीने प्रकाशित होणार आहेत. ४. मंडळाने ललितकळाविषयक स्वतः प्रकारित केलेल्या किंवा करावयाच्या प्रंथां- खेरीज तक्ञ लेखक/कळाकार व कलासंस्था यांना कलाविषयक संशोधनासाठी किंवा प्रका- शनासाठी अनुदानेही दिली आहेत. श्री. ह. वि. दाते यांची “गायनी कळा”, श्री. निखिल घोष यांचे “रागतालाची मूलतत्वे” व “अभिनव स्वरळेखन पद्धती”, प्रा. अशोक रानडे यांचे “संगीताचे सौंद्येशात्र”, पं. बाळकृष्ण कपिलेश्वरी यांचे “श्रृतिस्वरदरीन” व “स्वरप्रकार'”, डॉ. ना. ग. जोशी यांचे “मराठी छंदोरचनेचा विकास'”, श्री. बा. र, देवघर यांनी लिहिलेले “कै, विष्णु दिगंबर पळुस्कर यांचे चरित्र” व “थोर संगीतकार” इत्यादी ग्रंथांच्या प्रकाराना- करिता मंडळाने भरपूर अनुदान दिले आहे. गांधर्व संगीत विद्यालयाच्या “संगीत कळा विहार” या मासिकाळाही गेळी अनेक वर्षे मंडळाचे अनुदान दिले जात आहे. "५. संगीत विषयातीळ संशोधनाच्या संदर्भात, रुपारेळ महाविद्यालय, मुंबई येथील भौतिकी विभागामध्ये मंडळाच्या अनुदानाने संगीत-ध्वनी-विज्ञानाचे मोळिक सशोधन झाले आहे. त्यामधून व्यावहारिक उपयोगाच्या दृष्टीने लक्षणीय अशी माहिती किंबा वाद्य मिळू न राकल्यामुळे ते काये आता स्थगित केले आहे. तानसेन म्युझिक अँकेडेमी, मुंबई या संस्थेळ| स्वयंचलित 'सूरमंडळ' तयार करण्यास मंडळाने अनुदान दिले आहे. श्री. बा. दा. मोहिते सांगळी याना ४८ श्रुतींवर आधारलेल्या सप्तकाची बाजाची पेटी तयार करण्या- साठीही अनुदान दिले आहे. डॉ. ह. वि. मोडक, वास्तव विभाग, वाडिया महाविद्यालय, पुणे यांना दक्षिण भारतातील देवळांतीळ स्तंभांमघून निघणाऱ्या संगीतसूरांच्या संशोधना- करिताही अनुदान दिले असून त्यांची ध्वनिमुद्रिते तयार झाळी आहेत. दण्डतारारहित तंबोरा तयार करण्याचा प्रयत्न के. डॉ. बी. बी. निंभोरकर, अमरावती यांनी काही वर्षे केळा, त्याकरिताही मंडळाने अनुदान दिठे आहे. एकंदरीत संशोधनाच्या प्रयत्नांतून प्रायोगिक उपयुक्ततेच्या दृष्टीने लक्षणीय यरा प्राप्त झालेले नाही हे येथे नमूद केले पाहिजे. पर, संशोधनाचे प्रयत्न सतत चाळले पाहिजेत व त्याकरिता उत्तेजनह्ी दिले गेले पाहिजे म्हणून मंडळ सतत प्रयत्नशील आहे. जे. ग्रिफिथ्स्‌ या इंग्लिश संशोधक कळावेत्त्याने अजिंठा येथील चित्रांचा समग्र संग्रह काही वर्भांपूर्वी प्रसिद्ध केळा होता. अजिंठा येथीळ चित्रकळा ही भारतातील प्राचीन चित्रकळेचा एक वैभवशाली भाग आहे. या चित्रसंग्रहाचे पुनर्मुद्रण करून ते प्रकाशित करण्याची कार्यवाही मंडळातर्फे चाळू आहे. र ६. भरतमुनींच्या “नाठ्यशास््र” या अभिजात संस्कृत ग्रंथातील नाटक व नाट्य- शास्नविषयक अध्याय १८ व १९ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवगुप्ताच्या “अमिनवभारती'" टीकेसह प्रा. र. पं. कंगळे, मुंबई यांनी मंडळास करून दिले आहे. नाठ्याचे प्रकार, व्याख्या व रचना यासंबंधीचे विवेचन भरतमुनींनी नाठ्यशास्रात केळे आहे. “दशख्प- निरूपणम?' नामक अध्याय १८ मध्ये नाटक, प्रकरण वगैरे रूपकाच्या दहा प्रकारांचे वर्णन केले आहे. “इतिवृत्त” नामक अध्याय १९ मध्ये कथानकाचा विचार केला आहे. कथानकाच्या अवस्था, अर्थप्रकृती, सन्धी, संध्यंगे, संध्यंतरे, पताकास्थान इत्यादींचे विवेचन केळे असून शेवटी नाटकात सर्वप्रकारच्या लोकस्वभावाचे दर्शन घडवावे असे सांगून नाटकाच्या रचनेविषयीं काही सूचना केल्या आहेत. ७, प्रा. कंगले यांनी प्रस्तुत भाषांतर राब्दराः व “अभमिनवभारती'”' टीकेच्या अनु- रोधाने केळे असून शब्ददाः केळेळे भाषांतर ज्या ठिकाणी दुर्बोध वाटण्याचा संभव आहे त्या ठिकाणी अर्थ विशद करण्यासाठी टीपांचा भरपूर उपयोग केळा आहे. प्रस्तुत्त भाषांतर “दूऱारूपक-विधान'' नावाने प्रकाशित करण्यास मंडळास आनंद होत आहे. भाषांतर आणि . टीपा यांच्या साहाय्याने भरतमुनी व अमिनवगुप्त यांचे नाटक व नाटबरास्त्रविषयीचे विचार समजून घेणे वाचकांस सुलभ होईल अशी आशा आहे. १ फाल्गून १८९५ महाशिवरात्री लक्ष्मणशास्त्री जोशी २० फेब्रुवारी, १९७४ अध्यक्ष, सचिवालय, | महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्क्ते मंडळ. मुंबई - ४०० ०२२. विषयानुक्रम उपोद्धात १-७९. रूपक, त्याची उत्पत्ती आणि प्रकार १, कथानकाची मांडणी १५, पात्रांचे स्वभावं २२, भाषा २३, नाठ्यमंडप २५, पूर्व- रंग २६, नान्दी २७, धरुवागान २९, अभिनय ३१, नाख्- प्रयोग २५, संस्कृत नाटकाची उत्पत्ती ३८, वेद ४०, कर्मकांड ४३, महाभाष्य ४७, छायानाटय ४८, लोकनाट्य ५१, कृष्णभक्ति "५२, मंत्रतंत्र ५१७, इतिहास ६०, बौद्ध नाटक ६२, प्राकत नाटक ६३४, शक राजवटी ६४, प्रीक नाट्य ६६, यवनिका ६८, सीताबेंगा ब जोगिमारा गुहा ६९, ग्रीक व संस्कृत नाट्यातील मिन्रता ७४, झछोकांचे पाठ ७६, अमभिनव- भारती ७७, अध्याय १८ | १-१४५९ विषयाचा उपन्यास १, दहा रूपकप्रकार &, वृत्तींपासून रूपकांची उत्पत्ती ८, नाटकाचे लक्षण २०, अंकव त्याचे स्वरूप ३१, प्रवेशाकाचे लक्षण ४९, नाटकात दाखविण्यास अयोग्य प्रसंग ६३, प्रकरण ७२, विष्कम्भक ८१, नाटिका ८४, समवकार ९०, इहामृग १०२, डिम १०६, ब्यायोग ११०, उत्सृष्टिकाडू ११२, प्रहसन ११६, भाण १२१, वीथी १२९, वीथीची तेरा अंगे १३०. अध्याय १९ १५१-२२२ नाट्यातील इतिव्रत्त १५१, आधिकारिक आणि प्रासद्विक इतिवृत्त १५४, पाच अवस्था १६२, पाच अर्थप्रकृती १७७, बीज १७९, बिन्दु १८१, पताका १८३, प्रकरी १८४, कार्य १८५, पताकास्थानक १९२३, पाच संधी २०४, मुखसंधि २०६, प्रतिमुखसंधि २०७, गर्भसंधि २१०, अवमशीसंधि २१२, निवै- हृणसंधि २१८, संध्यंगांची प्रयोजने २२५, चौसष्ट संध्यंगे आणि त्यांची लक्षणे २२९, संघ्यंगांची योजना २७६, एकवीस संध्यन्तरे २८१, दहा ठास्यांगे २८४, नाठककारास सूचना २१७. पुरवणी टीपा ३२३-३२४ उपोद्धात रूपक भरता'च्या नाटबशास्त्रात ज्या अनेक विषयांचे विवेचन आहे त्यांपैकी नाटक, प्रकरण आदी रूपकांचे प्राधान्य निर्विवाद आहे. कारण नटांच्या द्वारा रंगभूमीवर प्रस्तुत केळे जाणारे जे नाट्य ते मुख्यत्वेकरून ह्या रूपकांच्या प्रयोगाशीच संबद्ध आहे. इतर बहुतेक विष्रय ह्या नाटयप्रयोगाच्या संदर्भात अनुषंगाने आळे आहेत. तेव्हा ख्यकांच्या विवेचनाला ह्या ग्रेथात महत्त्वाचे स्थान असावे यात आश्चर्य नाही. रूपकाच्या नाटक, प्रकरण इत्यादी दहा प्रकारांचे विवेचन नाटथदास्त्राच्या अठराव्या अध्यायात केळे असून एकोणविसाव्या अध्यायात त्याच्या कथानकाची घडण व मांडणी यासंबंधी विचार केळा आहे. रूपक दाब्दाची व्याख्या नाटबशास्त्रात कोठे केली नाही. किंबहुना, ज्या काव्याच्या गुण, अलंकार, लक्षण आदी विदोषांचे विवरण अगोदरच्या अध्यायांत केळे आहे ते काव्य म्हणजेच ख्पक हे नाटबरास्त्रात गृहीत धरले आहे. अभिनेय म्हणजे अभिनयद्वारा व्यक्त होऊ शकणारे रूपकाच्या स्वरूपाचे काव्य अणि अनभिनेय असे इतर काव्य यांमध्ये नाटयाशास्त्रावरीळ टीकाकारांनी केलेला भेद भरताने उपेक्षिळा आहे. दहा रूपकांची उत्पत्ती वृत्तींपासून झाली हे स्पष्ट करताना त्याने असे म्हटळे आहे की वृत्ती सर्वच काव्याच्या मातृस्थानी आहेत (१८.४). पण काव्य म्हणजे नाटकादी खूपकप्रकार असेंच त्याला सर्वत्र अभिग्रेत आहे. यासंबंधात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 'रूपक' असा राब्दप्रयोग नाटयशास्त्रात आढळत नाही. त्यात सर्वत्र 'ख्स! ह्या शब्दाचाच उपयोग केळा आहे; उदाहरणाथ, १७.२६,१४९,१५०; १८.१,४,९,११६; १९.४५,१३० या ठिकाणी आणि अटराव्या अध्यायाच्या शेवटी 'दठारूपनिरूपण' या त्याच्या नामामिधानात. असे म्हणण्यास हरकत नाही की नाटबस्वरूप काव्याला प्रारंभी 'रूप' अशीच संज्ञा होती आणि 'ख्सक' हीं संज्ञा नंतरच्या काली प्रचारात आली. अभिनेय स्वख्पाच्या काव्याला म्हणजे नाटयाला “रूप' अशी संज्ञा देण्याचे कारण नाटय दृश्य असते असे उत्तरकालीन ग्रंथकारांनी दिळे आहे. 'अवस्थानुकृतिर्नाटयं रूपं दृश्यतयोच्यते' असे दररूपकार धनंजयाने 4 नाट्यशास्त्र 3) 0. म्हटले आहे ( द. रू. १.७ ). चक्षुरिन्द्रियाचा विषय रूप हे प्रसिद्ध आहे. रूप म्हणजे पहाणे ह्या धातूपासून हा शब्द निष्पंन्न झाळा असल्याचे यात अभिप्रेत आहे. तथापि हे खुद्ठा लक्षात ठेवले पाहिजे की विद्यमान संस्कृत नाटकांत काही ठिकाणी 'नाटयति! ऐवजी 'रूपयातिः अशा तऱ्हेच्या नाट्यसूचचना आढळतात. म्हणजे रूप धातू 'अभिनयाने व्यक्त करणे” या अर्थी वापरळेळा दिसून येतो. 'रूप' शब्द त्यातीळ धातूच्या ह्या अर्थाशीही संबद्ध असण्याची शक्‍यता आहे. नाठ्यशास्रात रूप' शब्दाचा उपयोग दहा नाट्यप्रकारांच्या संदर्भातच केळा आहे. एरूही ह्या वाड्मयप्रकाराचा निर्देश काव्य शब्दाने केळा आहे. कवीने निर्मिलेल्या नाठ्यात्म कृतीळा 'काव्यबन्ध' असे काही ठिकाणी म्हटले आहे; उदाहरणार्थ १८.५,६ ९ ३७,६१९; १९.१२९ इत्यादी ठिकाणी. रचनेच्या दृष्टीने ज्याला काव्यबन्ध म्हटले आहे त्याचाच प्रयोगाच्या दृष्टीने रूप शब्दाने निर्देश होतो. दशरूप प्रयोगासाठी वृत्तींपासून निर्माण झाळे असे भरताने सांगितलेच आहे (१८.४). प्रयोगासंबंधींचा विचार नाट्य- शासत्रात इतर अनेक अध्यायांत मिळून विस्ताराने केळा आहे. प्रस्तुत अठराव्या व एकोणबिसाव्या अध्यायांत निरनिराळ्या रूपकप्रकारांचे विवेचन काव्यबन्ध म्हणून म्हणजे त्यांच्या रचनेच्या दृष्टीनेच मुख्यतः केळे आहे. वृत्ती | ज्या वृत्तींपासून दहा ख्पकांची निष्पत्ती झाल्याचे म्हटले आहे त्या वृत्तींचे निरूपण नाठ्यशात्राच्या विसाव्या अध्यायात केले आहे. सृष्टिसंहारानंतर भगवान विष्णु शेषावर शयन करीत असता मधु आणि कैटभ हे दोन असुर उन्मत्त होऊन त्याच्याशी नियुद्ध करण्यास प्रवृत्त झाले, त्याप्रसंगी त्यांचा वघ करण्याच्या निमित्ताने जे व्यापार घडून आले त्यांना भारती, सातत्वती, कैशिकी आणि आरभटी ह्या चार वृत्तींचे स्वरूप प्राप्त झाले असे तेथे म्हटले आहे. भारती वृत्ती वाक्‍प्रधान म्हणजे मुख्यतः वाचिक अभिनयाने युक्त असून प्ररोचना (पूवरज्ञाचे एक अंग), आमुख (म्हणजे प्रस्तावना ), वीथी आणि प्रहसन (दहा ख्पकप्रकारांपैकी दोन) ही तिची चार अंगे होत. सात्त्वती वृत्ती वाचिक आणि आडगिक भभिनयांनी युक्त व मुख्यतः वीररीद्रादी रसांचा आविष्कार करणारी असून उत्थापक, परिवतक, सल्लापक आणि संघात्य ही तिची चार अंगे होत. कैशिकी वृत्तीत श्रियांचे प्राधान्य असून वृत्त आणि गीत मोठ्या प्रमाणात असतात. नर्म, नर्मस्फुज्ज, नर्मस्फोट आणि नर्मगभ अशी तिच्या चार अंगांची नावे आहेत. चौथ्या आरभटी वृत्तीत कपट, वश्चना, अनृतवचन इत्यादी गोष्टी असतात आणि संक्षिप्तत, अवपात, वस्तूत्यापन व संफेट ही तिची चार अंगे होत. अभिनवगुप्ताने एका छहोकावरील व्याख्येत असे म्हटले आहे की भारती वृत्ती पाठ्यप्रधान असते, सात्त्वती अभिनयप्रधान, आरभटी उपोद्धात | ३ रसप्रधान आणि केशिकी गीतवाद्योपरजकप्रधान (२०.२२ वरीळ टीका), यावरून असा निष्कषे निघतो की वृत्ती नाट्यप्रयोगाच्या अभिनयादी विविध अंगांशी संबद्ध आहेत. आणि म्हणून'च वृत्तींपासून दहा रूपकांची निर्मिती झाळी असे म्हटले आहेसे दिसते. नाट्यशास्त्रात केलेल्या वृत्तींच्या विवेचनावरून त्यांच्या स्वरूपाची निश्चित कल्पना करणे कठीण आहे. भारती वृत्ती स्त्रीबर्जित असल्याचे आणि संस्क्रत पाठ्याने युक्त असल्याचे म्हटले आहे. मग स्त्रियांच्या प्राकृत पाठ्याचा कोणत्या वृत्तीन निर्देश करता येइळ£ ह्या वृत्तीत नट आपापल्या नावाने'च प्रयोगात काम करतात ( स्वनामघेयेभरते: प्रयुक्ता) असे म्हटळे आहे. ही गोष्ट फक्त प्रस्तावनेत होते. मग संप्रणी नाटकातील पाट्याचा भारती वृत्तीशी संबंध प्रस्थापित होणे कसे रक्य आहे सात्वती आणि आरभटी ह्या दोन्ही वृत्तींच्या वणनात रौद्र रसाचा निर्देश अभिग्रेत आहे. तेव्हा त्यांच्यातील भिन्नता स्पष्टपणे प्रतीत होत नाही. अध्यायाच्या शेवटी कैशिकी हास्य व शुड्गार हे रस प्रधान असलेळी, सात्त्वती वीर आणि अद्भुत रस असलेली, आरभटी रौद्र आणि भयानक रसांनी युक्त आणि भारती बीभत्स व करुण रसांनी युक्त अशा प्रकारे ह्या चार वृत्तींचा रसांशी संबंध जोडळा आहे (२०.७३-७१ ). परंतु मुळात वृत्ती रसनिरपेक्ष असण्याचाच अधिक संभव आहे. ह्या वृत्तींच्या संबंधात अभिनवगुप्ताने इतरत्र असे म्हटले आहे की मानवी व्यापार म्हणजे मनुष्याचे चेष्टित तीन प्रकारचे असते - वाक्‌, मनस्‌ आणि काय यांच्या द्वारा होणारे. ही तीन प्रकारची चेष्टिते म्हणजे अनुक्रमे भारती, सात्त्व्ती आणि आरभटी ह्या तीन वृत्ती होत. आणि त्या तीनही चेष्टितांत सौन्दर्योपयोगी असा जो व्यापार ती कैशिकी वृत्ती (१.४१ छोकावरील टीका). वृत्तींच्या स्वरूपासंबंधीची ही उपपत्ती मान्य होण्या- सारखी आहे. तथापि, हे उघड आहे की ही उपपत्ती आणि विसाव्या अध्यायातील वृत्तींचे वर्णण यात काही अंशी भिन्नता आहे. किंबहुना, अमिनवगुप्ताच्या दोन्ही ठिकाणच्या विधानातही एकवाक्यता नाही. पहिल्या अध्यायात त्याने सारवतीचा मनोव्या- पाराशी आणि आरभटीचा शारीरिक चेष्टिताशी संबंध जोडला आहे तर बरिसाव्या अध्यायात सात्त्वतती अभिनयप्रधान म्हणजे मुख्यत: आंगिक व्यापाराशी संबद्ध आणि आरभटी अनुभावांच्या आवेशामुळे मुख्यतः रसपरिपोषास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यासबंधात एक विचार मांडता येण्यासारखा आहे. श्री वासुदेवरारण अग्रबाळ यांनी आपल्या पाणिनीवरीळ ग्रंथात असे सुचविले आहे की आरभटी हा दाब्द वायब्ये- कडीळ आरभट ह्या प्रदेशाविशोषावरून बनळा आहे. ग्रीक इतिहासकारांनी ह्या प्रदेशाचा निदेंश आराबिते (474७५ ) या शब्दात केळा आहे.$ आरभटी रब्दाचे हे निर्वचन १ ४. $. $टाव्फ 8, वदावे ळा ८०% ४0 "ढण्य, (.पटता०७%, 1953 )/ 0.450. -1 | नाट्यशास्त्र संभाव्य मानले तर इतर वृत्तींच्या नावांच्या संबंधातही तशाःच स्वरूपाची व्युत्पत्ती सुचञिता येण्यासारखी आहे. भरत हे एका प्रख्यात प्राचीन वंशाचे नाव सर्वश्रुत आहे. सात्वत हे यादवांपैकी एका गणाचे नावही प्रसिद्ध आहे. अन्यत्र काही ठिकाणी निर्देशिलेल्या क्रथकेरिक जनपदाशी कैरिक नावा'चा संबंध जोडता येण्यासारखा आहे. तेव्हा भारती, सात्तत्ती आणि केशिकी ही वृत्तींची नावे सुद्धा विशिष्ट जनपद अथवा तेथील लोकांच्या नावांपासून सिद्ध झाळी आहेत असे सूचित करता येईल. यावरून अशी कल्पना करता येईळ की निरनिराळ्या प्रदेशांत. प्रामुख्याने प्रचलित असलेल्या नाठ्य- प्रयोगाच्या विविध शेलींवरून ही वृत्तींची नावे मुळात प्रचारात आली. उत्तरकालीन आलंकारिकांनी काव्याच्या विविध शेलींना दिलेली वैदर्भा, गौडी, पाज्ञयाळी इत्यादी नावे प्रदेशाविदोषांवरून पडळी आहेत हे प्रसिद्ध आहे. काव्याच्या रीतीप्रमाणेच नाठ्य- प्रयोगातील वृत्तीही मूलतः निरनिराळ्या प्रदेशांत आढळून येणाऱ्या मिन्नतेवर आधारित आहेत असे म्हटले तर ते सर्वथा असंभाव्य वाटू नये. रूपकशकार अठराव्या अध्यायात दहा रूपकप्रकारांच्या वैशिष्ट्यांचे विवेचन विस्तृतपणे केले आहे, दहा ख्पकांव्यतिरिक्त आणखीही एका प्रकाराचे - नाटिकेचे - वणन ५२-५५ या आर्यात केळेळे आढळते. परंतु नाटयाशास्त्रातील हा भाग मूळ भरतकृत नसून मागाहून त्यात घातला आहे हे उघड आहे. भरताला जर खरोखरच नाटिकेचे वणन करावया'चे असते तर रूपकप्रकारांचा नावनिर्देश करणाऱ्या प्रारंभीच्या उद्देशाच्या २ ब ३ ह्या छोकांत तिचा निर्देश अवशय केळा असता. प्रथम उद्देद आणि नंतर लक्षण ही पद्धती त्याने सर्वत्र अवलंबिली आहे. तिचा या ठिकाणी त्याग केळा असल्याची शक्‍यता नाही. भरतानंतर झालेल्या कोहलप्रभूती नाट्यशास्त्रावरीळ ग्रंथकारांनी दहाव्यतिरिक्त इतरही काही रूपक- प्रकारांना मान्यता दिली होती. त्यांच्या मता'चा अनुवाद करणारे काही अंश भरताच्या नाटयशास्त्रातही प्रक्षिप्त करण्यात आळे आहेत. नाटिकाविषयक प्रस्तुत अंश हा त्यांपैकीच एक. पण हा प्रक्षेप अमिनवरगुप्ताच्या बरीच वर्षे अगोदर करण्यात आळा होता यात शांका नाही. कारण ह्या भागावर त्याच्याही अगोदरच्या टीकाकारांनी टीका लिहिल्या होत्या हे अभिनवभारतीवरून स्पष्ट आहे. अमिनवयुप्ताने नाटिकेसंबंधीचचा भाग प्रमाणभूत मानला यात काही आश्चर्य नाही. त्याच्या समोर कोहळादींचे ग्रंथ होते. आणि त्या ग्रंथांच्या प्रभावामुळेच त्याने असे प्रतिपादन केळे आहे की रूपकांचे दहाच प्रकार भरताळा अभिप्रेत आहेत असे नसून कोहळादींनी निर्देशिळेळे तोटक, सड्ट्क, रासक इत्यादि प्रकारांचा समावेश त्याला अभिप्रेत आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्याने पहिल्या शछहोकातीळ 'प्रयोगतः' शब्दाचा उपोद्धात प्‌ स्वाभाविक अर्थ न स्वीकारता निर्दिष्ट केलेल्या रूपकप्रकारांच्या उचित अशा संमिश्रणाने उत्पन्न होणाऱ्या नवीन प्रकारांच्या अनुरोधाने' अश्या त-हेचा केळा आहे. त्याचप्रमाणे थ्या छोकावरीळ टोकेत त्याने असा युक्तिवाद केला आहे की कोणताही रूपकप्रकार निर्मळ नसतो. प्रत्येक रूपकप्रकारात इतर प्रकाराचेही अंरा विद्यमान असतात. उदाहरणाथ . वीथीची अंगे सर्वे प्रकारांत असतात. तसेच आकाराभाषिता'च्या रूपात भाणही इतर प्रकारांत असतो. फक्त ज्या प्रकाराचे विशेष प्राधान्येकरून ज्यात विद्यमान असतात त्या प्रकारांचे नाव त्या खूपकाला दिले जाते. यावरून असा निष्कषे निघतो की दशरूय राब्दातील दहा ही संख्या “एवढेच प्रकार होत' अशा त-हेचे नियमन करणारी नाही याचा अर्थ असा की प्रत्यक्ष जरी दहाच प्रकारांचा निर्देश केलेला असला तरी त्याव्यति- . रिक्त इतरही प्रकारांचे अस्तित्व मान्य करणे आवश्‍यक आहे. 002 "१२ दरशख्पकार धनंजयाने दहा रूपकांगिवाय नाटिकेचाही विचार केला आहे. पण त्याने कोहळादींनी स्वीकारलेल्या अन्य प्रकारांची सर्वेस्वी उपेक्षा केळी आहे, त्याने केलेले नाटिकेचे वणेन (द. रू. ३.४२-४८) नाटथदास्त्रातीळ वर्णनाहन बऱ्याच अंशी भिन्न आहे. नाटिकेत अंकांची संख्या एक, दोन किंवा तीन अशीही अस शकते आणि तिच्यातील पात्रे विविध स्वरूपाची असू शकतात असे त्याने म्हटले आहे. साहित्यदर्पण- कार विश्वनाथाने नाटिका, त्रोटक, गोष्ठी, सड्टक, नाटयरासक, प्रस्थान, उछ्लाप्य, काव्य प्रडूखण, रासक, संळापक, श्रीगदित, शिल्पक, विळासिका, दुर्मछिका, प्रकरणिका, हछीश आणि भाणिका ह्या अठरा प्रकारच्या उपरूपकांचा निर्देश केळा असून (सा. द. ६.४ -प) त्याच्या व्याख्या व उदाहरणे दिली आहेत. यांतील काही प्रकारांत नत्य-गीत व शडूगाररस यांना प्राधान्य असलेले दिसन येते, तर काही प्रकार वाडमयदृष्ट्या अधिक महत्त्व पावळे होते. या सर्वांची उपरूपक म्हणून गणना उत्तरकाळी होऊ ळागळी. पण भरता'च्या काळी यांतील काही प्रकार अस्तित्वात असले तरी त्याने त्यांची सर्वथा उपेक्षा केळी आहे यात शंका नाही. नाटक नाटयशाद्लात असे म्हटले आहे की नाटक आणि प्रकरण हे दोनच ख्पकप्रकार चारही वृत्तींनी युक्त असतात आणि इतर सर्व प्रकारांत कैशिकी वृत्तीचा अभाव असतो. (१८. ६-९ ). त्याचप्रमाणे कथानकाचा विकास निर्दाडीत करणारे पाचही संधी फक्त नाटक व प्रकरण या दोन प्रकारांतच असतात. डिम ब समवकार यांत अमवदी संधी नसतो, व्यायोग आणि इईहामृग यांत गर्भ व अमवशश हे दोन संधी नसतात. तर प्रह- . सन, वीथी, उत्सृष्टिकाड आणि भाण या इतर प्रकारांत तीन संधींचा अभाव असून फक्त क सुख आणि निवेहण हें दोन संधीच विद्यमान असतात. (१९.४२-४४). याचा अर्थ द नाट्यशास्त्र कथानकाच्या विकासाचे महत्त्व या प्रकारांत क्रमराः कमी कमी होते. परिणामतः या इतर आठ प्रकारांत पताका व प्रकरी या दोन अर्थप्रकृतींची योजनाही अनावव्यक ठरते. तेव्हा परिपूर्ण स्वरूपाचे रूपकप्रकार दोनच - नाटक आणि प्रकरण, नाटक आणि प्रकरण हे दोन्हीही परिपूर्ण स्वरूपाचे असले तरी त्यांपैकी नाटक ह्या रूपकप्रकाराचे श्रेष्ठत्व निरपवादपणे मान्य झाळे आहे. नाटबशास्त्रात सर्वप्रथम नाट- काचा विचार केळा आहे, त्यानंतर इतर प्रकारांचा. इतकेच नाही, तर नाटक हा शब्द रूपक शाब्दाचा पर्याय म्हणूनही वापरळा आहे. जेव्ह्या कोणत्या एका विशिष्ट रूपक- प्रकाराचा निर्देश करावयाचा नसून सर्वसाधारण खूपकांचा निर्देश अभिप्रेत असतो तेव्हा रूप अथवा रूपक शब्दाऐवजी नाटक शब्दाचा उपयोग अनेक ठिकाणी केला आहे. नाटकाचे कथानक प्रख्यात असावे असे म्हटले आहे. या'चा अर्थ ते रामायण महा- भारतादी ग्रंथांवरून घेतलेळे असावे. त्याचा नायक प्रसिद्ध असा राजा असणे आवऱ्यक आहे. राजाव्यतिरिक्त इतर कोणीही नाटकाचा नायक असू शकत नाही. नाटकात देव नायक असत नाहीत याचे कारण अमिनवयुप्ताने असे दिळे आहे की नाटकात विविध भावांचा व रसांचा आविष्कार आवश्यक असतो. पण देवांच्या संबंधात विप्रलम्मशड्गार, करुण, भयानक आदि रसांची व तत्संबद्ध भावांची योजना नसेळ तर नाटकाच्या रंजक- तेत वैचित्र्य येणार नाही, व त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हृदयसंवाद उत्पन्न न झाल्याकारणाने रसास्वाद असंभव होईल. शिवाय, देव दुःखापासून मुक्त असतात. तेव्हा त्यांच्या चरि- तात दु:खमय प्रसंगांच्या निवारणाचे उपाय दिसून येत नसल्यामुळे प्रेक्षकांना तशा नाट- कापासून काही बोधही घेता येणार नाही. इतर काही रूपकप्रकारांत देव नायक अस राकतात, पण नाटकात नाही. उत्तरकालीन साहित्यदपणात मात्र नाटकात सुद्धा ळिब्य नायक असू शकतो असे म्हटले आहे. (सा. द. ६.९). नाटयशास्राच्या चोबिसाव्या अध्यायात धीरोद्भधत, धीरठलित, धीरोदात्त आणि धीर- प्रशान्त अशा चार प्रकारच्या नायकांचा निर्देश केळा असून देव धीरोद्धत असतात, राजे धीरळलित, सेनापति आणि अमात्य धीरोदात्त आणि ब्राह्मण व वणिक धीरप्रशान्त असतात असे पुढे म्हटले आहे (१२४.१७-१९), त्यावरून असा निष्कर्ष निघण्याचा संभव आहे की . नाटकाचे नायक जे राजे ते सवेत्र ललित प्रकृतीचेच दाखविणे आवश्यक आहे. परंतु हा निष्कषे मान्य होण्यासारखा नाही हे उघड आहे. नाटकाच्या वणेनात नायक उदात्त असावा असेच म्हटले आहे. यासंबंधात अभिनवगुप्ताने असे स्पष्टीकरण केळे आहे की ललित प्रकती कोणा नायकाच्या ठिकाणी दाखवावयाची असेळ तर ती फक्त राजाच्याच ठिकाणी दाखवावी, इतर कोणाच्या नाही. उपोद्धात | ७ नाटकाच्या वर्णनात नायकाव्यतिरिक्त इतर पात्रांचा साक्षात उल्लेख केलेला नाही. उदाहरणार्थ, नायिका कोण असावी ते सांगितलेले नाही. तथापि, पुढे चोविसाव्या अध्यायात नायकांप्रमाणेच नायिका सुद्धा चार प्रकारच्या असल्याचे म्हटळे आहे. दिव्यश्नी, नृपपत्नी, कुलाडूना आणि गणिका अशा चार प्रकारच्या नायिकांचा तेथे निदेश केला असून त्यांची प्रकृती धीर, ललित, उदात्त आणि शान्त या प्रकारांची असते असे सांगितळे आहे. गणि- केची प्रकृती ळळित व उदात्त, कुलख्रींची उदात्त व शान्त आणि दिव्यस्त्री व नृपपत्नी यांची चारही प्रकारची असू शकते असा भरताच्या म्हणण्याचा आशय दिसतो (२४.२३-२६). यांपैकी गणिका आणि कुलस्त्री यांना नाटकात नायिकेचे स्थान प्राप्त होण्यासारखे नाही. त्यांना तसे स्थान प्रकरणात मिळू शकते. नाटकात फक्त दिव्यस्त्री किंवा नृपपत्नीच नायिका असू शकते. राजा नायक असताही दिव्याडुना नायिका असते याचे प्रसिद्ध उदाहरण विक्रमोर्वशीय आहे, त्याचा निदेश अभिनवगुप्ताने केलाच आहे. अठरव्या अध्यायात नाटक व प्रकरण दोहोंच्या संबंधात असे म्हटले आहे की त्यांत पुष्कळ मनुष्यांची गर्दी नसावी, कार्यपुरुष म्हणजे कार्यसिद्धीला उपयोगी होणारी माणसे चार किंवा पाच असावीत (१८.३६). नाटकातील अंकाचे वर्णन करताना नायक, देवी, गुरुजन, पुरोहित, अमात्य आणि सार्थवाह यांच्या द्वारा रसांचा अविष्कार होतो असे म्हटले आहे (१८.१७). हेच कार्यपुरुष म्हणून अभिप्रेत असावेत. नाटकाच्या वर्णनात ते सुख आणि दु:ख यांच्या उतत्तीने युक्‍त असून त्यात विविध रसांचा आणि भावांचा आविष्कार करणारी चेष्टिते असावीत असे म्हटले आहे (१८.१२). पुढे एकोणविसाव्या अध्यायाच्या शेवटी नाटकाची महती वणेन करताना लोकांच्या सुख- दु:खात्मक विविध अवस्थांचे चित्रण त्यात असल्याचे सांगून त्यात सवे रस, सवे भाव, सर्व प्रकारच्या कमेप्रवृत्ती यांचे दर्शन होत असल्याचे म्हटले आहे (१९.११९,१२४). उत्तर- कालीन ग्रंथकारांनी नाटकात प्रधान रस म्हणून गुड्शार अथवा वीर रसाची योजना कराव- यास सांगितळे आहे (सा. द. ६.१०) ते भरताळा मान्य होण्यासारखे आहे असे रसा- ध्यायातीळ विवेचनावरून म्हणता येते. प्रस्तुत ठिकाणी रसविषयक एवढा'च उल्लेख आहे की निवेहण संधीत अद्भूत रसाची अवश्य योजना करावी (१८.३८). याचा अर्थ असा होतो की नाटकातीळ कथानकाचा शेवट आश्चर्यकारक घटनांनी होत असल्याचे दाखविणे आवशयक आहे. अंक आणि प्रवेदाक नाटक अंक आणि प्रवेशक यांनी समृद्ध असावा असे म्हटले आहे (१८.११). या दोहोंचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी अनेक आर्या (१३-३४) खर्ची घातल्या आहेत. यांतील टॅ | नाट्यशास्त्र १५ व्या आर्येची व्याख्या करताना अभिनवगुप्ताने तिच्यात चूलिका, अज्लञावतार व अडुः- मुख या तीन अर्थोपक्षेपकांचा निर्देश अभिप्रेत असून अंकाचे हे तीन निरनिराळे प्रकार होत असा त्या आर्येचा निष्कषे असल्याचे म्हटले आहे. पण ही त्याची व्याख्या मान्य होण्यासारखी नाही. भरताला हे तीन अर्थापक्षक अवगत नाहीत. किंबहुना, अर्थोपक्षेपक शाब्दाचाही त्याने कोठे उपयोग केळेळा नाही. एकोणविसाव्या अध्यायात १०१ व्या शोका- नंतर पाच अर्थापक्षेपकांचे वणन करणारे सात छोक आढळतात हे खरे आहे. पण हे शोक प्रक्षिप्त आहेत यात शांका नाही. नाटथशास्ञात फक्त प्रवेशाक आणि विष्कम्मक यांचेच विवेचन आहे. इतर तीन अर्थोपक्षेपकांचा निर्देश कोहलप्रश्वती नंतरच्या शाखत्कारांनी केला आहे असे अभिंनवगुप्तानेच म्हटले आहे. यासंबंधात दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नाटयशास्त्रात नाटकाच्या वर्ण- नात फक्त प्रवेशकाचा'च निर्देश केळा आहे. विष्कम्मकाःचे वर्णन प्रकरणाचे निरूपण करताना केळे आहे, आणि तसे करताना विष्कम्भकाची योजना प्रवेशकाप्रमाणे करावी असे म्हटले आहे (१८.४९). यावरून असे दिसते की नाटकात प्रवेशकांची योजना तर प्रकरणात विष्कम्भकांची अशीच व्यवस्था भरताला मुख्यतया अभिप्रेत होती. अर्थात प्रकरणात प्रवेशा- कांची योजना सुद्धा त्याने पंभान्य मानली आहे. त्याने असे म्हटले आहे की नाटक आणि प्रकरण यांत पाच ते दह्या अंक असावेत आणि जितके अंक तितक्‍याच प्रवेशाकांची त्यांत योजना करावी (१८.२५). यावरून असा निष्कर्ष निघतो की नाटकात प्रस्तावनेनंतर पहिल्या अंकाच्या पूर्वीही प्रवेशकाची योजना करावी असे भरताचे मत होते, अभिनव- गुप्ताने उद्धृत केलेल्या कोहळाच्या मतानुसार विष्कम्मकाची योजना फक्त मुखसंधीतच म्हणजे पहिल्या अंकाच्या पूर्वी किंवा पहिळा अंक ब दुसरा अंक यांच्यामध्ये या ठिका- णीच करावी. अभिनवगुप्ताने स्वतः हे मत अग्राह्य ठरवून विष्कम्भकांची योजना नंतरही करावयास हरकत नाही असा युक्तिवाद केळा आहे. तथापि, नाटकातही विष्कम्भक असू शकतात हे नाट्यशास्त्रात व्यक्त न झालेले मत त्याला मान्यच होते. प्रवेशक आणि शुद्ध व संकीर्ण असे दोन प्रकारचे विष्कम्मक यांचे वर्णन १८.२९ आणि १८.४९-५० या ठिकाणी केले आहे, त्यावरून त्यांच्यामधील भेद स्पष्ट होतात अंकाच्या स्वरूपाची चर्चा करताना भरताने त्यात कोणत्या गोष्टी दाखबाव्यात आणि कोणत्या दाखवू नयेत याचा निर्देश केळा आहे. न दाखवावयाच्या गोष्टींमध्ये युद्ध आणि मृत्यू ह्या प्रधान होत. त्यांचा निर्देश प्रवेशकांच्या द्वारा करावयास सांगि- तळे आहे (१८.३३), एका अंकातीळ वृत्त एका दिवसातच घडून येणारे असावे आणि दोन अंकांच्या मध्ये व्यतीत होणारा काळ एका वर्षाहून केव्हाही अधिक असता कामा नये असे भरताने म्हटले आहे. ( १८.१९,२६ ). या संबंधात अमिनव- उपोद्धात ९ गुप्ताने असा युक्तिवाद केला आहे की किती काळ ळोटळा याचा विचार. करताना ज्या वर्षी काही वृत्त घडले असेळ तेच किचारात घेतले पाहिजे, सुनी गेळेळी इतर वर्षे नाही, म्हणून रामाच्या वनवासाचचा काळ जरी चौदा वर्षांचा असला तरी त्यांपैकी फक्त दोन तीन वर्षींच काही घटना घडल्या. त्यामुळे नाटकाच्या प्रारंभी वनवास- गमन दाखवून शेबटी रामाळा अयोध्येत होणारा अभिषेक दाखविण्यास काही हरकत नाही. अंकाच्या वणनात भरताने असे म्हटले आहे की त्यात नायक संनिहित असावा (१८.२४). याचा अर्थ नाटकाच्या प्रत्येक अंकात नायकाची उपस्थिती आवश्‍यक मानळी आहे. कथानकाच्या विकसित होणाऱ्या प्रत्येक अवस्थेशी फलस्वाम्याचा अधिकारी म्ह्णून नायकाचा संबंध अनिवार्य असतो यास्तव हे विधान केले आहे हे उघड आहें. पण अनेक विद्यमान नाटकांत या नियमाचे पालन झाळेळे दिसत नाही. नाटकात काय दाखवू नये याचे विवेचन करताना भरताने म्हटले आहे की नाटक आणि प्रकरण या दोन प्रकारांत नायकाचा वध झाळेळा अंकामध्ये दाखविता कामा नये किंबा प्रवेशकातही निदर्शित करू नये. नायकावर मोठे संकट गुजरलेळे. दाखवावया'चे असेळ तर त्याने आपल्या राज्यातून पळायन केलेळे दाखवावे किंवा अधिकात अधिक म्हणजे त्याळा बंदिवास झाळेळा दाखवावा (९८.२४-२५). नाटकाच्या शेवटी प्राप्त होणारे फळ नायकाठाच मिळावयाचे असल्यामुळे मध्येच त्याचा वध झालेला दाखविल्यास कथान- कात विसंगती उत्पन्न होईल हें उघड आहे. भरकरण नाटकानंतर प्रकरण ह्या दुसऱ्या रूपकप्रकाराचा विचार केळा आहे. मुख्यत: दोन गोष्टींच्या बाबतीत प्रकरण नाटकाहून भिन्न असते, एक त्यातीळ कथानकाचा विषय आणि दुसरी त्याचे नायक आणि नायिका. प्रकरणाचे कथानक सवेथा कविकल्यित असते, रामायणमह्ाभारतादीतीळ एखाद्या प्रसिद्ध प्रसंगावर त्याची उभारणी झाळेळी नसते (१८.४० 3. नाठ्यशास्त्रात असाही विचार मांडला आहे की कोणा अगोदरच्या कवीने कलिलेल्या कथेच्या आधारानेही प्रकरणाच्या कथानकाची रचना करावयास हरकत नाही ( १८.४१), वृहत्कथेसारख्या ग्रेथावरून कथानक घेता येते असा याचा अमिनवगुप्ताने खुलासा केला आहे. कथाविषय प्रसिद्ध नसावा या गोष्टीवर जोर दिला आहे. पण याहून अधिक मह- त्वाची गोष्ट म्हणजे नायक व नायिका यांच्या संबंधात प्रकरणाची भिन्नता. प्रकरणाचा नायक ब्राह्मण, वणिक, सचिव, पुरोहित, अमात्य आणि सा्थवाह ह्यांपेकी कोणीतरी असावा आणि नायिका कुलस्त्री किंवा वेश्या असावी असे म्हटले आहे. त्याचा नायक उदात्त नसावा आणि त्यात राजाच्या अथवा देवतेच्या चरिताचे दर्शन नसावे असे स्पष्ट म्हटले आहे (१८.४३-४४). नायिकेच्या संबंधात भरताच्या म्हणण्याचा आशय असा दिसतो की १० नाट्यशास्त्र सामान्यतः जर नायिका कुलस्त्री असेळ तर त्या प्रकरणात वेश्येंची योजना करू नयें आणि जर वेश्या नायिका असेळ तर त्यात कुलस्त्रीचा संपक आणू नये; तथापि कारण- परत्वे दोघींचीही योजना करावयास हरकत नाही (१८.४६-४८). अमभिनवगुप्ताच्या म्हणण्याप्रमाणे जेथे केवळ कुलस्त्री अथवा केवळ वेऱ्या असेल ते झुद्ध प्रकरण आणि ज्यात दोघीही विद्यमान असतील ते संकीर्ण प्रकरण. आुद्ध प्रकरणातील नायक श्रेष्ठी, सचिव आदींपेकी असावा आणि संकीण प्रकरणात विट वगैरे नायक असावा असेही त्याने पुढे म्हटळे आहे. अभिनवगुप्ताने केलेळे प्रकरणाचे हे भेद समजण्यासारखे आहेत, पण प्रकर- णाचे एकंदर एकवीस प्रकार होतात असे जे त्याने म्हटले आहे ते कसे काय हे स्पष्ट नाही. फक्त नाट्यदर्पणात त्याचा हिशोब मिन्न प्रकारे करून दाखविला आहे. भरताच्या मताप्रमाणे नाटकात फक्त प्रवेशकांचीच योजना होते, तर प्रकरणात विष्कम्भका'ची सुद्धा योजना होऊ शकते याचा वर निर्देश केला आहे. हा भेद होण्याचे मूळ कारण असे दिसते की नाटकातील घटना राजघराण्यातील व्यक्तींशी संबद्ध असतात; त्यांपेकी ज्या प्रत्यक्ष दाखवावयाच्या नसतील त्यांचे सूचन दास, दासी प्रभ्रती कनिष्ठ दर्जाच्या पात्रांकडून केळे जाणे अधिक संभाव्य होते, म्हणून त्यात मुख्यतः प्रवेशकाची योजना. याउलट प्रकरणातीळ प्रधान पात्रेच समाजातील ब्राह्मण, श्रेष्ठी, विट आदी मिन्न . स्तरांतेन आलेली असल्यामुळे त्यांच्या संबंधात घडलेल्या घटनांचे सूचन त्यांच्या समव्यवसायी अथवा मित्रवत असलेल्या समान दर्जाच्या पात्रांकडूनही होण्याची शक्‍यता होती. आणि ही पात्रे मध्यमप्रकृति असल्यामुळे हे प्रवेशा विष्कम्मक ठरतात. ते काहीही असले तरी नाटक आणि प्रकरण हे समाजातील दोन भिन्न मिन्न घटकांचे दर्रान घडवि- तात आणि हे सुद्धा त्या दोहोंमधीळ भेदाचे एक गमक मानता येईल असे म्हणावयास हरकत नाही. नाटिका प्रकरणाच्या वणेनानंतर नाट्यशात्रात नाटिकेचे वर्णन करणाऱ्या आर्या आहेत. त्या मूळ भरतकृत नाहीत हे वर सुचविलळेच आहे. नाटिकेच्या येथील वर्णनावरून तिचे सहा, आठ किंवा सोळा प्रकार होऊ शकतात या अगोदरच्या टीकाकारांच्या मतांचा उल्लेख अभिनवगुप्ताने केला आहे. नाटिकेचे येथीळ वर्णन रत्नावलीप्रभृती नाटिकांना पूर्णतया लागू पडण्यासारखे आहे हे उघड आहे. समवकार यानंतर ५७ ते ६८ या आर्यांत समवकार नावाच्या तिसऱ्या रूपकप्रकाराचे विस्तृ- तपणे वर्णन केले आहे. ह्या वर्णनावरून असा ग्रह होतो की ते समवकाराच्या एका विशिष्ट उपोद्धात ११ उदाहरणावरूनच बनविले आहे. पहिल्या अंकाचा प्रयोग बारा नाडिका (म्हणजे चार तास अज्लेचाळीस मिनिटे) चालावा, दुसऱ्या अंकाचा चार नाडिका (एक तास छत्तीस मिनिटे) आणि तिसऱ्या अंकाचा दोन नाडिका (अड्रेचाळीस मिनिटे) चाळावा अशा प्रकारचा कृत्रिम नियम किंवा त्यात तीन प्रकारच्या शूज्ञराचे, तीन प्रकारच्या कपटाचे आणि तीन प्रकारच्या विद्रवाचे दर्शन घडवावे अशासारखा नियम प्रत्येक समवकारामध्ये पाळला जावा अशी अपेक्षा करणे सयुक्तिक बाटत नाही. ही उपलब्ध असलेल्या संस्कृत नाटकांमध्ये समवकाराचे उदाहरण आढळत नाही. नाट्यशास्राच्या चौथ्या अध्यायात असे म्हटले आहे की नाठ्यवेंदाची निर्मिती करून तो भरता'च्या स्वाधीन केल्यावर आणि नाट्यमंडपाची निर्मिती झाल्यावर ब्रह्मदेवाने स्वत: रचलेल्या अमृतमन्थन नावाच्या समवकाराचा प्रयोग करण्याची त्याला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे भरताने त्या समबकारा'चा प्रयोग केळा (४.२-४). प्रस्तुत ठिकाणी केळेळे समवकाराचे वर्णन अमुंतमन्थनाच्या प्रसड्ठाला लागू पडण्यासारखे आहे. त्यात देव आणि असुर यांच्या कार्याशी संबद्ध अशा घटना आहेत, त्यात कपट आहे, विद्वव आहे आणि शुंगारही आहे. असा संभव आहे की ह्या प्रसं- गावर आधारलेली एक दीधे नाट्यकृती नाट्यशास्त्रकाराळा अवगत होती आणि तिच्या आधारानेच त्याने हे वणन केले आहे. उष्णिग्‌ , गायत्री बौरे छंदांचा उपयोग कवीने सम- वकारात करावा असे म्हटले आहे त्यावरून अश्या काव्यमय नाट्याच्या अस्तित्वाच्या कल्प- नेळा दुजोरा मिळतो. ईहामृग समब्रकारानंतर ७०-७४ आर्यामध्ये ईहामृग नावाच्या प्रकाराचे वर्णन आहे. याचेही उदाहूरण संस्कृत वाड्मयात आढळत नाही. या प्रकारात सुद्धा नायक आणि नायिका दिव्य असतात. पण याचे प्रधान वैशिष्टय हे की यात स्त्रियांच्या संबंधात पुरुषांमध्ये संघषे उत्पन्न होतो आणि परिणामत: अपहरण, विद्रव, युद्ध इत्यादी प्रसंग दाखविळे जातात. या ठिकाणी असे म्हटले आहे की युद्धात वध्य व्यक्तीचा वध समीप आला असता काही तरी निमित्त काढून ते युद्ध थांबवावे ( १८.७४ )> यावरून असे म्हणावयास हरकत नाही की ह्या प्रकारात रंगभूमीवर युद्ध चाललेले दाखविता येईल, पण त्या युद्धात कोणाचा मृत्यू झालेला प्रत्यक्ष दाखविणे उचित होणार नाही. असा संभव आहे की समवकाराप्रमाणेच ह्या प्रकाराचे वर्णनही एका उदाहरणावरूनच बनविजेळे आहे, साहित्यदपणात उदाहरण म्हणून कुसुमशेखरविजय नावाच्या इह्ामृगाचा निर्देश केला आहे. ती कृती नाट्यशास्त्रकाराला अवगत असण्याची ठाक्‍यता नाही. डिम यानंतरच्या डिम नावाच्या प्रकारात सुद्धा देव, राक्षस, यक्ष इत्यादींच्या चरिताचे चित्रण असते. त्यात एकंदर सोळा नायक असावेत असे म्हटले आहे. शुजा आणि १२ | नाट्यशास्त्र हास्य हे दोन रस यात वर्ज्य असून मुख्यतः दीप्त रसांचा म्हणजे वीर आणि रैद्र यांचा आविष्कार असतो, तसेच माया, इन्द्रजाळ, उल्कापात, चन्द्रसूर्यम्रहण आदी गोष्टींचेही वियुळ प्रमाणात दर्शन होते (१८.७६-८० '. असा संभव आहे की ह्या प्रकाराचेही फक्त एकच उदाहरण नाट्यशास्त्रकारासमोर होते. चौथ्या अध्यायात असे म्हटले आहे की भरताने हिमालयावर शंकरासमोर अमृतमन्थन नावाच्या समवकाराचा प्रयोग करून दाख- विल्यानंतर त्रिपुरदाह नावाच्या डिमा'चाही प्रयोग करून दाखविळा (४.१० ). त्रिपुर- दाहाच्या वृत्तान्तात सोळा नायक असण्याची शक्‍यता फार कमी वाटते. ज्या र्पकप्रकारांत नायक-नायिका दिव्य असतात, म्हणजे समवकार, ईहामृग आणि डिम, त्यांच्या संबंधात भरताने असे सांगिंतळे आहे की त्यांतील घटना भारतवर्षात घडलेल्या अशा'च दाखवाव्यात, याचे कारण असे दिळे आहे की पथ्बीबरीळ इतर वर्षांत सर्वत्र सर्वकाळ सुख, संभोग आणि आनंद यांचेच साम्राज्य असते, तेथे दुःख आणि शोक या गोष्टी असंभाव्य असतात. आणि ज्या ठिकाणी देवांचा वास असतो ती त्यांची भोंगभूमी; त्यांच्यासाठी सुद्धा कमभूमी म्हणून भारतवर्षच योग्य मानळे आहे (१८.८९-९२). सुखदु:खमिश्रित विविध अवस्थांचे दर्शन घडल्याशिवाय प्रयोगात रुची उत्पन्न होणार नाही अशी यामागची भूमिका आहे. परिणामतः या नाटयप्रकारांत देवदेवता मानवी विकारांच्या अधीन झालेले दिसून येणे स्वाभाविक होईल व्यायोग (0) 0) ७ बाकी राहिलेले पाच र्पकप्रकार सर्व एकअंकी आहेत. त्यांपैकी ञ्यायोग बर्‍याच बाबतीत समवकारासारखा असतो असे म्हटले आहे. फक्त त्यात एकच अंक असल्यामुळे त्याचा विस्तार प्मवकाराएवढा नसतो आणि त्यातील पात्रे दिव्य नसतात. त्याचा नायक राजा नसावा असा अभिनवयुप्ताने अथे लावळा आहे. पण त्या आर्येतील बचना'चा नायक राजा असावा असा अथ करणेही शक्‍य आहे. किंबहुना साहित्यदर्पणकाराने नायक राजर्षि अथवा दिव्य असावा असे म्हटले आहे. व्यायोगात युद्ध, नियुद्ध, संघष वगैरे गोष्टी मुख्य असेतात (१८.८४). भासा'च्या नावाने प्रसिद्द असलेल्या नाटकांत एक मध्यमव्यायोग नावाचे एकअंकी नाटक आहे. त्याळा भरताने केलेली व्यायोगाची व्याख्या लागू पडण्यासारखी आहे असे वाटत नाही. विश्वनाथाने सौगन्थिकाहरण नावाच्या व्यायोगा'चा निदेश केळा आहे. ्यायोगाची बरीच उदाहरणे हल्ली उपलब्ध झाली आहेत. उत्सृष्टिकाडू | उत्सृष्टिकाडू हा त्यानंतरचा रूपकप्रकार. त्याळा केवळ अडठः असेही म्हटले आहे. याचे वेशिष्टय असे की यात करुणरसाला प्राधान्य असते, त्यामुळे यात स्त्रियांचे विलाप, निर्वेदयुक्त उपोद्धात १३ वचने इत्यादी गोष्टीच प्रामुख्याने असतात (८६-८८). संस्कृत वाड्मयात एकअंकी रूपके अनेक आहेत. पण भरताने निर्देरिलेले वैशिष्ट्य त्यांत क्वचितच आढळते शहूसन प्रहसन दोन प्रकारचे असते, एक शुद्ध व दुसरे संकीर्ण. ज्यात साधू , तपस्वी ब्राह्मण इत्यादींचे खालच्या वर्गातील लोकांशी हास्यकारक संभाषण चालते ते शुद्ध. यात ज्याच्या त्याच्या स्वाभाविक आचारविचारांचे ब भाषांचे चित्रण असते. त्यांत दिसून येणारा विरोध हे हास्याचे कारण होते. संकीर्ण प्रहसनात वेश्या, विट, चेट, धूर्त, नपुंसक अशा प्रकारची पात्रे असून त्यांचे भडक वेष, उच्छुंखळ वागणे, उत्तान वचने इत्यादी गोष्टी हास्यास कारणीभूत होतात. हास्यरसाला या प्रकारात प्राधान्य असते हे त्याच्या नावावरू- नच स्पष्ट आहे. प्रहसनात जमण्यासारखे असेळ तेथे वीथी'च्या अंगांची योजना करावयास सांगितळे आहे. हास्यास्पद गोष्टी किंबा फसवणुकीचे प्रकार लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले असेच दाखवावेत असेही नाटबशास्त्रात सांगितले आहे (२४-९८), ळटकमेळक आणि धूतसमागम ही दोन प्रहसने प्रसिद्ध आहेत. ती अर्थातच भरतानंतर पुष्कळ शतकांनी लिहिलेली आहेत. भाण नववा रूपकप्रकार भाण. यात एकच पात्र असते - धूर्त अथवा विट. ते एकच पात्र आपला स्वतःचा वृत्तान्त तसेच इतरांची चेष्टिते यांचे वणन करते. आकाडाभाषिताचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग हे या प्रकाराचे प्रधान वैरिष्टय (९९-१०१). हा एक- अंकी असळा तरी अनेक प्रकारच्या अवस्थांचे आणि चेष्टितांचे यात वर्णन करता येते. संस्कृतात अनेक भाण प्रसिद्ध आहेत. ते सर्व अर्थात भरतानंतरचे आहेत. वीथी रोवटचा रूपकप्रकार वीथी. यात एकच अंक आणि एक अथवा दोनच पात्रे असतात. उत्तम, मध्यम आणि अधम अशा तीनही प्रकृतींनी वीथी युक्त असावी असे भरताने म्हटले आहे, त्याचे स्पष्टीकरण अभिनवगुप्ताने असे केलेळे दिसते की बीथीचा नायक ह्या तिहापैकी कोणत्याही प्रकृतीचा असू शकतो. पण वीथीचे सर्वाधिक वैशिष्ट्य म्हणजे तीत आवश्यक मानलेली तेरा अंगे (१०२-१०४). या तेराही अंगांच्या भरताने व्याख्या दिल्या असून अमिनवगुप्ताने त्यांची उदाहरणे दिळी आहेत (१०५-११५). ही बहुतेक उदाहरणे रत्नावली, वेणीसंहार इत्यादी इतर रूपकप्रकारांतून घेतलेली आहेत. वास्तविक कोणत्या तरी वीथीतूनच ही उदाहरणे उद्धृत करणे उचित झाले असते. वीथ्यड्ठांचा १४ | नाट्यशास्त्र इतर रूपकप्रकारांतही - उदाहरणार्थ प्रह्सनामध्ये - उपयोग करावयास भरताने सांगितले आहे हे खरे आहे. पण त्याने ज्याअर्थी ह्या अंगांचा वीथ्यडगे म्हणून निर्देश केला आहे त्याअर्थी त्याच्यासमोर ह्या अंगांनी युक्त अशा वीथींची एकदोन तरी उदाहरणे असली पाहिजेत हे निश्चित, वीथीची ती प्राचीन उदाहरणे अमिनवगुप्ताठा उपलब्ध नव्हती असे म्हणावयास हरकत नाही. सव्याही वीथीचे उदाहरण उपलब्ध नाही. बीथीच्या तेरा अंगांपैकी पहिली दोन उद्‌्घात्यक आणि अवलगित ही आहेत. पुढे विसाव्या अध्यायात आमुखाचे म्हणजे प्रस्तावनेचे पाच प्रकार सांगितले आहेत त्यांत ह्या दोहोंचा समावेश केळा असून कथोद्घात, प्रयोगातिशाय आणि प्रवृत्तक अशी इतर तीन प्रकारांची नावे दिळी आहेत (२०.२३). त्याशिवाय, तेथे असे म्हटले आहे की वीथी आणि प्रहसन हे दोन खूपकप्रकार, आमुख अथवा प्रस्तावना आणि प्ररोचना हे पूरवरंगाचे एक अंग ही चार भारती वृत्तीची अंगे होत (२०.२७). ह्या दोंन रूपकांचाच भारती वृत्तीशी संबंध का जोडला आहे ते स्पष्ट नाही. वस्तुतः उत्सृष्टिकाडुडात'च फक्त भारती वृत्तीचे दर्शन संभाव्य असते; त्याला भारती वृत्तीचे एक अंग मानणे अधिक उचित झाळे असते. भारती वृत्तीच्या वीथी ह्या एका अंगाची दोन अंगे (उद्‌घात्यक व अवलगित) आमुख ह्या दुसऱ्या अंगा'चीही अंगे होत हे थोडेसे गोंधळात टाकणारेच आहे. रूपका'च्या ह्या दहा प्रकारांच्या वर्णनावरून असे दिसून येते की त्यांच्यातील भेद मुख्यतः कथानक व त्यातीळ पात्रे यांच्या अनुरोधाने कल्पिले आहेत. देवदानवांच्या पुरातन कथांवर आधारलेळे समवकार, ईहामृग आणि डिम हे तीन प्रकार. ईह्वामरगाचे कथानक स्त्रीविषयक संघर्षावर आधारलेले, तर डिमाच्या कथानकातीळ संघषे इतर गोष्टींच्यामुळे उत्पन होणारा अशा तऱ्हेचा ह्या दोहोंतील भेद अभिप्रेत असावा. समवकारात युद्ध, नियुद्ध आदीमध्ये परिणत होणाऱ्या संघर्षाला प्राधान्य नाही असे त्याच्या मिन्नतेचचे वर्णन करता येईल. मानवी जीवनाचे चित्रण करणाऱ्या रूपकप्रकारांत. नाटक आणि प्रकरण हे दोन अर्थातच प्रधान होत. त्यांपैकी नाटक!त राजकुळ व त्याच्याशी संबद्ध असलेल्या व्यक्ती यांच्या जीवनाचे दशन मुख्यतया घडते, तर प्रकरणात ज्यांना सामान्यतः मध्यमवर्गीय म्हणता येईळ अशा व्यक्तींचे जीवन प्रतिबिंबित होते असाही त्या दोहोंमधील फरक प्रतीत होतो. समाजाच्या खालच्या थरातील लोकांचे जीवन-विशेषतः त्याच्या उच्छुंखल स्वरूपात -प्रहसन व भाण या दोन प्रकारांत चित्रित होते असे म्हणता येईळ, बाकीचे एकअंकी प्रकार-व्यायोग, उत्सृष्टिकाडइः आणि वीथी - एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या चित्रणासाठी उपयो- गात आणलेळे दिसतात. सवेसाधारणपणे असे म्हणावयास हरकत नाही की ख्पकाचे हे मेद मूलतः त्यातीळ विषयाच्या अनुरोधाने केळे आहेत. 'चार वृत्तींपासून दहा रूपकांची निष्पत्ती झाली असे म्हटले आहे. परंतु वृत्तीच्या मित्नतेच्या अनुरोधाने रूपकांचे भिन्न भिन्न प्रकार अस्तित्वात आले असे म्हणता उपोद्धात | १५ येण्यासारखे नांही. नाटक ब प्रकरण यांत चारही वृत्ती असतात आणि इतर प्रकारांत कैशिकी वृत्तीचा अभाव असतो ह्या निर्देशावरून हे स्पष्ट आहे की रूपकभेदाचे गमक वृत्तिमिद असे मानता येत नाही. त्यापेक्षा रसांच्या मिनतेच्या अनुरोधाने रूपकांच्या भेदांची उपपत्ती लावणे अधिक शक्‍य आहे. परंतु रसांचा आविष्कार काव्याच्या विषयाळा अनुसरूनच होत असल्यामुळे रूपकमेदाचे रसमेद हे स्वतंत्र गमक असे मानण्याची आवऱयकता नाही. कथानक एकोणविसाव्या अध्यायात कथानकाच्या घडणीचे विवेचन आहे. त्यात त्याचे अनेक दप्टोंनी विळषेषण केळे आहे. कथानक हे नाट्याचे शरीर होय असे प्रारंभी म्हटले आहे. स ह्या त्याचा आत्मा अशी अभिनवगुप्ताने त्या विधानाची पूर्ती केली आहे. कथानक आधिकारिक आणि प्रासंगिक असे दोन प्रकारचे असते. नाटकाच्या शेबटी फल्य़ाप्तीच्या स्वरूपाचे जे कार्य सिद्ध करावयाचे असते त्याच्याशी साक्षात संबद्ध असलेला कथाभाग म्हणजे आधिकारिक इतिवृत्त आणि त्याला सहायभूत होणारा कथाभाग म्हणजे प्रासंगिक अथवा आनुषंगिक इतिवृत्त. फलप्राप्ती ज्याला होते तो नायक. प्रासंगिक अंशा त्याच्या फलपराप्तीला अप्रत्यक्षपणे उपयोगी होतो ( १९.३-५ ), अवस्था कोणतेही कार्य सिद्धीस जावयाचे असता ते पाच अवस्थांमधून जाते. आरम्भ, प्रयत, प्राप्तिसेभव, नियत फलप्राप्ति आणि फळयोग या त्या पाच भवस्था. या सावैत्रिक नियमाला अनुसरून नाटकाच्या शेवटी सिद्ध होणारे कार्य सुद्धा या पाच अवस्थांतून गेळेळे असते. याचा अर्थ कथानकाच्या विकासाचे द्दीन क्रमश: ह्या अवस्थांच्या द्वारा होत जाते. तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थांत सिद्धीच्या मार्गात उत्पन्न होणाऱ्या विध्नांचे होणारे निराकरण अभिप्रेत आहे. भरताने या पाच अवस्थांच्या व्याख्या १९,.८-१२ ह्य छोकांत दिल्या आहेत. अथप्रकृती दुसऱ्या दृष्टीने कथानकाचे विश्वेषण करून भरताने बीज, बिन्दु, पताका, प्रकरी आणि कार्य ह्या पाच अर्थप्रकृतींचे वर्णन केळे आहे. प्रारंभीची मूळभूत घटना की जिच्या- पासून कथानकाला सुरुवात होते आणि शेवटी होणारी कार्यसिद्धी हे जिचे अंतिम फ्‌ळ ती घटना म्हणजे बीज (१९.२१), वृक्षाच्या संबंधात होणाऱ्या प्रक्रियेवरून ही कल्पना घेतळी आहे हे उघड 'आहे, बिन्दु ह्या दुसऱ्या अर्थम्रकृतीची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. कार्यसिद्धीशी संबद्ध असलेल्या कथानकाच्या अंशात दुसऱ्या एखाद्या गोष्टीने खंड पडळा १९६ नाट्यशास्त्र असता ज्या घटनेने अथवा उक्तीने मुख्य कथानकाचा सांधा पुन्हा जोडला जातो ती घटना अथवा उक्ती म्हणजे बिन्दु. असा बिन्दु काव्यबन्थ समात होईपर्यत असतो असे भरताने म्हटले आहे (१९.२२). पाण्याच्या पृष्ठभागावर पसरत जाणाऱ्या तेलनिन्दूप्रमाणे असल्या- मुळे याला बिन्दु म्हणतात असे स्पष्टीकरण अमिनवगुप्ताने केळे आहे. पण याने बिन्दूचे जे प्रधान कार्य - खंड पडळा असता सांधा जोडण्याचे - त्याची उपपत्ती समाधानकारक- पणे लागत नाही. नाटकलक्षणरत्नकोशकार सागरनन्दीने याची दुसर्‍या प्रकारे उपपत्ती सुचविली आहे. पाण्याची धार वरून शेबायेंबाने पडत असता दोन थेंबांमध्ये धारेत खंड पडलेला दिसतो, पण त्या थेंबांमुळेच धारेचे सातत्य प्रतीत होऊन सांधे जोडल्यासारखे दिसतात.* ही उपपत्ती अधिक पटण्याजोगी वाटते. डॉ. मनमोहन धोघ यांनी बिन्दु म्हणजे प्राण्याच्या वीर्याचा बिन्दु (५४ 07५) अशी कल्पना करून ह्या प्रक्रियेचे वीर्योत्स- र्गांशी साइऱ्य स्वीकारले आहे.) पण ती कल्पना सर्वस्वी अग्राह्य आहे. भरताने केलेल्या बिन्दूच्या व्याख्येशी ती कोणत्याही प्रकारे सुसंगत नाही. नंतरच्या दोन अर्थप्रकृती, पताका आणि प्रकरी, म्हणजे कथानका'चा प्रासंगिक अथवा आनुषंगिक अंश. त्या दोहोंतील फरक असा को पताका उल्म कथानकाच्या परिपोषाळा उपयुक्त असली तरी तिच्यात गौण असे एखादे कार्य स्वतन्त्र फल म्हणून सिद्ध होते, तर प्रकरीत असे कोणतेही कार्य सिद्ध होत नसून ती केवळ मुख्य कथानकाला उपकारक अशी एखादी घटना असते. रामाच्या कथेवर आधारलेल्या नाटकांत सुम्रीव- वाळीचा वृत्तान्त पताकेसारखा आणि जटायूचा प्रसंग प्रकरीसारखा (१९.२३-२४). पताका साहजिकच विस्तृत असून तिचाही विकास होत असलेला दिसून येतो. म्हणून ती काही अंशी प्रधान कथानकासारखी असून ति'च्यातही संधी असू शकतात. पत्ताकेतील संधींना अनुसंधि अशी संज्ञा आहे (१९.२७). पताकानायकाचे स्वतःचे कार्य मुख्य कथानकाच्या विमदी संधीच्या आतच सिद्ध झालेले दाखविणे आवश्यक आहे. दोवटच्या निवेहण संधीत सिद्ध होणाऱ्या प्रधान कार्याला ते पताका-कार्य उपकारक असल्यामुळे त्याची सिद्धी अगोद- सच झाळी असली पाहिजे हे उघड आहे (१९.२८). पताका आणि प्रकरी दोन्हीही प्रधान कार्याला उपकारक असणे आवश्यक मानले आहे. तेव्हा कोणत्याही प्रासंगिक क्थांशामुळे मुख्य कथानकाच्या एकसूत्रतेत व्यत्यय येणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे असेच भरताला अभिप्रेत आहे यात शंका नाही. २ बिन्दुरिव विच्छिसायामपि घारायां यथा जलबिन्दुः पटलपयन्तष्वन्तरान्तरा लब्धनिज- निपात: पयसां पतनममिव्यज्ञयति तथायमपि प्र योजनमित्यर्थ:। -ना. ल. र. को., पू. ७ ३ ॥॥४९ गदळ, चका, ल. 1 ७४ शिवाठपाशीच्यी (091 ((८१1०५१, 1967), 11110, 0. उणा. पका 00, ४०. 1, शात हतला (1967) र 0» 381, उपोद्धात 2७ पाचवी अथप्रक्षृति जे कार्य त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केळी आहे. मुख्य कथानकात जे अंतिम साध्य ठरविलेळे असेल त्याच्या सिद्धीसाठी होणारे जे जे उपाय त्या सर्वांना कार्थ अशी संज्ञा आहे (१९.२५). ह्या उपायांचा निर्देश करताना अभिनवगुप्ताने अर्थशास्त्रात वणेन केलेल्या प्रभु, मन्त्र, आणि उत्साह ह्या राज्याच्या तीन शक्तींचा, जनपद, दुर्ग, कोश ' आदि राज्याच्या प्रकृतींचा आणि साम, दान, भेद व दंड ह्या चार उपायांचा उललेख केला आहे. पताकास्थानक अथंप्रकृतींच्या वर्णनानंतर नाट्यशास्त्रात चार प्रकारच्या पताकास्थानकांच्या व्याख्या दिल्या आहेत. एखादी गोष्ट चाळू असता किंवा एखाद्या गोष्टींचा निर्देशा अभिप्रेत असता तिच्यासारखीच चिह्ले असळेळी दुसरी गोष्ट सूचित होते हे पताकास्थानका'चे सामान्य लक्षण (१९.२९). ही सूचित झालेली दुसरी गोष्ट प्रधान कार्याच्या सिद्धीला उपकारक असते अथवा त्या सिद्धीची सूचक असते. स्वतःचा कार्यमाग साधून दुसऱ्याच्या कार्याळा साहाय्यक होणे हे पताकेचे वैशिष्ट्य ह्या प्रकारात असते म्हणून ह्याला पताकास्थानक हे नाव दिळे आहें. अचानक घडून येणारी घटना, अतिशायोक्तियुक्त वचन, मूलतः मिनार्थ असलेल्या वचनांची एकत्र योजना आणि क्लेषयुक्त वचन या गोष्टींमुळे जेव्हा कथानकाशी संबद्ध अशा -प्रायः भावी स्वरूपाच्या - घटनेचे सूचन होते तेव्हा तेथे पताकास्थानका'चे चार प्रकार निष्पन्न होतात (१९. ३०-३३). ह्या पताकास्थानकांचे स्वरूप काहीसे ११1११० 11019 सारखे आहे. नाट्यशास्त्रात यानंतर असे म्हटले आहे की नाटकातील कार्य अधिकात अधिक चार पताकांनी युक्त असावे (१९.३४). या ठिकाणी पताका ह्या शब्दाने पताका- स्थानक अभिप्रेत आहे असे जे अभिनवगुप्ताने म्हटले आहे ते रास्तच आहे. प्रासंगिक कथांश ह्या अथा एकाहून अधिक पताका कोणत्याही नाटकात योजल्या तर ते मुख्य कथानकाला बाधक होईल हे उघड आहे दरख्यकाराने फक्त दोनच प्रकारच्या पताकास्थानकाचा निर्देश केळा आहे - घटना- साम्यामुळे होणारे भावी प्रसंगाचे सूचन आणि ह्िष्ट विशेषणामुळे होणारे भावी घटनेचे सूचन (द. रू. १. १४). त्यावरील अवलोक ह्या टीकेत धनिकाने हे दोन प्रकार म्हणजे अनुक्रमे अन्योक्ति आणि समासोक्ति अलंकार होत असे म्हटले आहे ते बरोबरच आहे भरताच्या चार प्रकारांत अन्योक्तिरूप पताकास्थानकाचा समावेश नाही संधी | कथानकाची नाटकाच्या स्वख्पात मांडणी करताना त्याच्या होणाऱ्या विभागांना संधि अशी संक्ञा आहे. मुख, प्रतिमुख, गर्भ, विमरी अथवा अवमशे आणि निर्वहण असे नाटकाच्या कथानकात पाच संधी असतात. मुखसंधीत कथानकाच्या बीजाची उपपत्ति होते, र्ट नाट्यशास्त्र प्रतिमुखसधीत त्या बीजाचे उद्घाटन कधी दृश्य तर कधी अदृश्य अशा स्ख्पात होते, गर्भसंधीत बीजाचा उद्भेद कधी प्राप्ती, कधी अप्रात्ती, तर कधी अन्वेषण या स्वरूपात होतो, विमशसंधीत विळोभन, क्रोध किंवा व्यसन यासुळे बीजाचे फल गर्भातून बाहेर येते आणि निवेहृणसंधीत बीजाशी संबद्ध शा अगोदर निर्दिष्ट झालेल्या सर्व गोष्टींचा उपसंहार होतो (१९, ३६-४०), यांपैकी काही संधींचे स्वरूप पूर्णपणे स्पष्ट नाही. प्रतिमुखसंधीतीळ उद्‌घाटन आणि गभसंधीतील उद्भेद यांतीळ फरक कथानकाच्या विकासाच्या मिन्न भिन्न टप्प्यांचा निदर्शक आहे असे समजता येईल. तसेच अभिनवगुप्ताने म्हटळे आहे त्याप्रमाणे प्रतिसुखसंधीतीळ दृष्ट व नष्ट ह्या अवस्था बीजाच्या संबंधात वापरल्या आहेत, तर गर्भ- तंधीतील प्राप्ति, अप्राप्ति ह्या गोष्टी फळाशी संबद्ध आहेत अश्या प्रकारचा फरकही मान्य करता येईल, तथापि, या दोन संधीत काही मूळभूत भेद आहेसे दिसत नाही. चोथ्या संधीळा विमशे आणि अवम्श अशी दोन्हीही नावे प्राचीन काळापासून स्वीकृत झालेली दिसतात. फल्पराप्तीच्या मार्गात विघ्न उत्पन्न झाल्यामुळे त्याच्या परिहाराचा विचार विमर्शत अभिप्रेत दिसतो. अवमशी शब्दातही तीच कल्पना अभिम्रेत असावी, पण काही टीकाकारांनी अवमशे म्हणजे विघ्न असाच अर्थ केला आहे. या संधीत विध्नाला प्राधान्य आहे. पण त्याचा परिहार याच संधीत अभिप्रेत आहे की पुढीळ निर्वहणसंधीत ते स्पष्ट नाही. ह्या पाच संधींचा पाच अवस्थांशी अनुक्रमे संबंध जोडला जावा हे स्वाभाविक होते. तदनुसार गर्भसंधीत प्राप्तिसंभव आणि अवमर्शसंधीत नियत फलप्राप्ति या अवस्थांचे अनुक्रमे दशन होते असे ठरते. ही गोष्ट विचारात घेऊन श्री कवि यांनी गर्भसंधीत अप्राप्तीळा प्राधान्य असते, तर अवमरशसंधीत प्राप्तीला या कारणास्तव अभिनवगप्ताच्या व्याख्येत काही दुरुस्ती सुचविळी आहे. ती अग्राह्य असल्याचे त्या ठिकाणी दाखवून दिले आहे. वस्तु- स्थिती अशी आहे की संधी आणि अवस्था यांच्यातील संबंध जरी स्वाभाविक असला तरी भरताने तसा स्पष्ट निदेश कोठे केळेळा नाही. तेव्हा एखाद्या अवस्थेची व्याप्ती तिच्याशी संळान म्हणून मानलेल्या संधीची मर्यादा ओलांडून जाऊ शकेल हा संभव नाकारता येणार नाही. तिसऱ्या संधीचे नाव गर्भसंघधी असे आहे आणि अवमशी संधीच्या वर्णनात गर्भनि- मिंन्नबीजाथः हे वचन वापरले आहे. यांच्या मुळाशी प्राण्यांमध्ये होणारी गर्भधारणा व नंत- रची प्रसूती या कल्पना आहेत असा प्रह् होऊन त्यामुळे डॉ. घोष यांनी केलेल्या बिन्दु म्हणजे वीर्यबिन्दु ह्या अर्थाळा दुजोरा मिळतो असे बाटण्याचा संभव आहे. पण ते बरोबर नाही. जी प्रक्रिया डॉ. थोष यांना अमिप्रेत आहे तिच्यात बिन्दु म्हणजे वी्यॉत्सर्ग प्रारम्मस्थानी असतो. त्यामुळे बीज आणि बिन्दु यांत काहीच भेद होत नाही. परंतु नाटयशास्त्राप्रमाणे बिन्दु प्रारंमस्थानी नसतो, तर बीजारोपण झाल्यानंतरच बिन्दु अस्तित्वात येतो, आणि तो ब्न्दु म्हणूनच नाटकात सवेत्र असतो. फार तर एवढेच म्हणता येईळ की गर्भाची कल्पना प्राणि- उपोद्धात १९ शास्त्राबरून घेती असून ती मूळच्या वृक्षारोपणाच्या कल्पनेशी संमिश्रित केली आहे. पाच संधींचा पाच अवस्थांशी क्रमश; संबंध प्रस्थापित होऊ शकतो. पण त्यांचा पाच अथप्रकृतींशी त्याच क्रमाने संबंध प्रस्थापित होण्यासारखा नाही. बीज आणि मुखसंधि यांच्यातील संबंधच फक्त मान्य करता येईल. बिन्दु केवळ प्रतिसुख संधीतच असतो असे नसून तो नाटकाच्या समाप्तीपयत (यावत्समाप्तिबेन्धस्य, १९.२२) असतो. पताका केवळ गर्भसंधीत*च असू शकते असे नसून प्रतिमुख आणि अवमडी ह्या सधीतही तिची व्याप्ती संभाव्य आहे हे “आगर्भादाविमर्शाद्दा (१९.२८ ) या शब्दप्रयोगावरून स्पष्ट आहे. आणि उपायाच्या स्वरूपाचे कार्य हे सुद्धा नाटकात सवत्र असते. दशख्यकाराने मात्र असे म्हटले आहे की पाच अथंप्रकृतींचा पाच अवस्थांशी क्रमशः संयोग झाळा म्हणजे क्रमाने मुखादी पाच संधी निष्पन्न होतात. पण हे मत नाट्यशास्त्रातील विवेचनाळा धरून नाही यात शंका नाही. हे पाचही संधी फक्त नाटक आणि प्रकरण ह्या दोन रूपकप्रकारांतच असतात. इतर प्रकारांत चार, तीन किंवा दोनच संधी असतात त्याचा वर निर्देश केला आहे. संध्यईे संधींच्या निरूपणानंतर नाटथशास्त्रात त्यांच्या अंगांचा म्हणजे संध्यड्ठांचा विचार केला आहे. प्रत्येक संधीत बारा ते चौदा याप्रमाणे पाच संधीत मिळून चौसष्ट संध्यंगे अस- तात असे म्हटले आहे. मुखसंधीत बारा, प्रतिमुखसंधीत तेरा, गर्भसंधीत तेरा, अवमर्शासंधीत तेरा आणि निर्वहणसंधीत चौदा याप्रमाणे वास्तविक पासष्ट संघ्यंगांचा नामनिर्देश करून त्या प्रत्येकाची व्याख्या दिली आहे, तथापि अंगांची संख्या चौसष्ट असेच नाटयशासत्रात म्हटळे आहे (१९.६३), हाच प्रकार नाटकलक्षणरत्नकोंद आणि साहित्यदर्पण ह्या ग्रंथांत आढळतो. या संबंधात काही प्राचीन टोकाकारांनी केलेल्या खुलाशाचा अभिनवगुप्ताने निदेश केळा आहे. निर्वहणसंधीतीळ शोंबटचे अंग जे प्रशस्ति ते कथानकाशी असंबद्ध अस- ल्यामुळे त्याची गणना करणे अन्याय्य म्हणून खरी संघ्यंगे चौसष्टच असा हा खुलासा आहे. रामचन्द्-गुणचन्द यांच्या नाटबदर्पणात हाच खुळासा केळेळा दिसून येतो. परंतु दरर्पकार धनंजयाने ग्भसंधीतीळ प्रार्थना नावाचे अंग वगळून त्या संधीत फक्त बाराच संध्यंगे स्वीकारठी आहेत आणि अशा रीतीने चौसष्ट संख्या बरोबर असल्याचे निर्धारित केळे आहे. संध्यंगांच्या योजनेच्या आवश्यकतेबद्दळ भरताने असे म्हटले आहे की काव्य किंतीही उदात्त असले तरी जर ते अंगविहीन असेल तर त्याच्या प्रयोगाने रसिकांना ४ अर्थेप्रकृतयः पक्च पज्चावस्थासमन्विता: | यथासंख्येन जायन्ते मुखाद्याः पश्च संधय: ॥द. रू. १.२१, २० | नाट्यशास्त्र आहाद होणार नाही; याउलट हीन अर्थ असलेल्या काव्याची सुद्धा शोभा अंगांच्या योजनेमुळे वाढते (१९.५०-५१). ह्या अंगांचा कथानकाच्या रचनेत सहा प्रकारे उपयोग होत असल्याचे त्याने म्हटले आहे (१९.४७-४८). असे दिसते की उद्भटप्रभृती नाटयशास्त्रावरीळ प्राचीन टीकाकारांनी असे मत मांडळे होते की ज्या संधीत ज्या अंगांचा निर्देश केळा आहे त्या संधीत'च त्या अंगांची योजना करणे आणि ती सुद्धा निर्दिष्ट केठेल्या क्रमानेच करणे आवश्यक आहे. अभिनव- गुप्ताने द्या मताचे जोरदार खंडन केळे आहे. भरताने जरी असे म्हटले आहे की ह्या अंगांची योजना 'यथासंधि' करावी (१९.९७) तरी त्याचा अर्ध ज्या संधीत जे योग्य असेळ तेच अंग योजावे असा त्याने केळा आहे. आणि यात शंकाच नाही की उडट- . प्रश्तींचे मत बरोबर नाही. वस्तुस्थिती अशी आहे की यांपैकी फारच थोड्या अंगांची त्या त्या विशिष्ट संधीत योजना करणे आव्यक असे मानता येइल. उपक्षेप म्हणजे बीजाचे समारोपण, परिकर म्हणजे बीजाचे बाहुल्य इत्यादी प्रारंभीची चार पाच अंगे मुखसंधीत'च आणि तीही निर्दिष्ट केळेल्या क्रमाने योंजणे योग्य होईल हे उघड आहे. तसेच काव्यसंहार आणि प्रशस्ति ही शेवटची दोन अंगे निर्वहणसंधीत त्याच ठिकाणी योजिळी जावीत हेही स्वाभाविक आहे. कथानकाच्या विकासाशी संबद्ध अशी काही अंगे आहेत; उदाहरणार्थ, प्रतिसुखसंधीतीळ परिसर्प, गर्भसंधीतीळ आक्षिप्ति, अवमदीसंधीतीळ आदान आणि प्ररोंचना, आणि निर्वहणसंधीतीळ निरोध आणि प्रथन. यांची त्या त्या संधीत योजना उचित मानता येईळ, परंतु बहुसंख्य अंगे अशी आहेत की त्यांचा कथानका'च्या परिपोषाशी साक्षात संबध नसून ती कोणत्याही कथेच्या ओघात स्वाभाविकपणेच आविभूंत होण्यासारखी आहेत. उदाहरणार्थ, विळास, नर्म, नर्मथ्युति, प्राथना, उद्देग, शंका, संफेट (रोषयुक्त वचन), खेद, छादन ८अपमानयुक्त वचन), आनन्द, प्रसाद, अनुमान, युक्ति इत्यादी अनेक अंगे कथेत स्वभावतःच अनुस्यूत होऊ शकतात. पण त्यांचा आविष्कार कथेत अमुक ठिकाणीच व अमुक क्रमानेच होणे आवश्यक आहे असे मानणे अयोग्य होईल. असे दिसते की ज्या नाटकांच्या आधारे भरताने नाटकाचे विवेचन केळे आहे त्यात ह्या अंगांचा आविर्भाव निदिष्ट संधीत आणि निर्दिष्ट क्रमानेच झाला होता, आणि त्याने हा असा निदेश केल्यामुळेच ह्या विवेचनाळा नियमाचे स्वरूप प्राप्त झाले. संध्यन्तरे संध्यंगांच्या विवेचनानंतर नाटबशास्त्राता एकवीस संध्यन्तरांचा निदेश केला आहे (१९.९९-१०१). त्यात सामादी चार उपायांबरोबर भय, लज्जा, क्रोध इत्यादी विकार, दूत, लेख, स्वप्न, चित्र इत्यादी प्रायः शृंगाराशी. संबद्ध अशा गोष्टींचाही समावेश केला आहे. नाटबदर्पणात म्हटल्याप्रमाणे यांपैकी काहींना तंध्यंगे म्हणणेच उचित होईल, मति, उपोद्धात न रर मद, चापळ आदी काही व्यमिचारिभावांत अन्तर्भूत आहेत, तर दूत, लेख यासारख्या गोष्टी कथानकाचा भाग होत. अभिनवगुप्ताच्या व्याख्येवरून असे दिसते की त्याने ह्या संध्यन्तरांचा संबंध संघींशी न जोडता संघ्यंगांशी जोडळा आहे. या संध्यन्तरांच्या निर्दे- शाची आवश्यकता होती असे दिसत नाही. दडारूप आणि साहित्यदर्पण यात त्यांची साहजिकच उपेक्षा केळी आहे ठास्याडः यानंतर एकोणविसाव्या अध्यायाच्या १० २ ते ११५ ह्या छोकांत दहा लास्याड्रां- तून नाटकाळा उपयोगी असा कोणकोणता भाग घेता येईल याचे विवेचन केले आहे. ळास्य हे सुकुमार नृत्तप्रकाराचे नाव आहे. ह्या तृत्ताला साथ करणारे गान शंंगाररसा'चा आविष्कार करते म्हणून त्यात लळित अंगह्मारांचा उपयोग होतो असे चौथ्या अध्यायात म्हटले आहे." दद्ा लास्यांगे म्हणजे शुंगाररसाधिष्ठित अशा नुत्ताचे दह्या प्रकार. त्यांचे विस्तृत वणन एकतिसाव्या अध्यायात २३० ते ३६७ ह्या छोकांत केळे आहे. आणि त्या ठिकाणी अभिनवयुप्ताने असे दाखवून दिले आहे की पूर्वरंगाच्या ज्या अनेक अंगांचे पाचव्या अध्यायात वर्णन केले आहे त्यांपैकी काही अंगांच्या प्रयोगाच्या वेळी ह्या लास्य- प्रकारांचा उपयोग करावयाचा असतो. अस्तुत ठिकाणी ह्या दहापैकी प्रत्येक लास्यांगात जो नाटकाळा उपयोगी अंश असेल त्याचीच त्यात योजना करावयास सांगितले आहे. अभिनवयुप्ताच्या म्हणण्याप्रमाणे हा घेतला जाणारा अंश अलौकिक स्वरूपाचा असतो. त्याने याचे स्पष्टीकरण केले आहे ते असे : गेयपदातून धुवागान आणि वाद्यवादन यातीळ अलौकिक अंश, स्थितपाठ्यातून पाठ्यातीळ अलोकिक स्वख्पाचे. रंजकत्व, आसीनपाठयातून स्रियांच्या कारुण्यपूर्ण गीतातील अलौकिकता, पुष्पगण्डिकेतून चृत्त, गीत आणि वाद्य यांच्या योजनेतीळ अलौकिक भाग, प्रच्छेदकातून काव्यात प्रसंगविशेषी दिसून येणारी कालाच्या वणेनातील अलीकिकता, त्रिमूढकातून काव्यात रसानुकूल गुण, अलंकार आदींच्या योजनेने येणारी अलौकिकता, सैन्धवकातून भाषेच्या योजनेतीळ अलौकिक अंश, ट्विमूढकातून पात्रांची गति अथवा परिक्मण यातीळ अलीकिकता, उत्तमोत्तमकातून रसपरिपोषक अशा विविध भावांची अभिव्यक्ती करणाऱ्या अभिनयातील अलौकिकता आणि उक्तप्रयुक्तातून गानाच्या द्वारा किंवा इतरही प्रकारे अभिव्यक्त होणारा रसाचा आवेशरूप अलौकिक अंश - याप्रमाणे ह्या दहा लास्यांगांतून उपयुक्त तेवढाच भाग नाटकात योजावयाचा असतो. यावरून असे म्हणता येईळ की लास्यांगे ही वीथीच्या अगांप्रमाणे स्वतंत्रपणे योजावयांची नसून नाटकाच्या प्रयोगात ज्या विविध गोष्टींचे दर्शन होते त्या ५ यत्र शुद्धारसंबद्धं गान स्त्रीपुरुषाश्रयम । देवीझतेरडनद्दारेलंटितेस्तत्‌ प्रयोजयेत्‌ 1 ४.३२३. २२ | नाट्यशास्त्र सर्वाचे अलौकिक स्वरूप. कोणत्या तरी लास्याच्या प्रकारापासून निष्पन्न झाळेळे आहे अशी केल्पना केली गेली आहे इतकेच. दरारूप आणि नाटयंदपेण या ग्रंथांत ठास्यांगांचा उछठख नाही यात काही आश्चयं नाही या अध्यायाच्या शेवटी भरताने नोटक लिहू इच्छिणाऱ्या कवीला समारोपादाखल काही सूचना केल्या आहेत (१९.११६-- १२९). त्यांत नाटकाच्या सर्वेसंग्राहकतेचा निर्देश असून ते लोकस्वभावाळा धरून असावे असे म्हटले आहे. नाटकात ककश शब्द- योजना टाळून ळोकांना अर्थ सहज समजेळ अशी रचना करावी, याचे कारण उत्तरोत्तर लोकांची बुद्धी कमी कमी तीक्ष्ण होत जाईल असे सांगितले आहे. पात्नांचे स्वभाव नाटकात विविध प्रकारच्या लोकांच्या स्वमावाचे दर्रान घडवावे असे नाख्यशास्रात म्हटले आहे. तदनुसार नाटकात संभाव्य असणाऱ्या विविध प्रकारच्या पात्रांच्या स्वभाव- विदेषांची माहिती चोविसाव्या अध्यायात दिळी आहे. पुरुष आणि क्रिया यांची प्रकृती उत्तम, मध्यम आणि अधम अशी तीन प्रकारची असू शकते हे सांगून चार प्रकारचे नायक आणि चार प्रकारच्या नायिका यांच्या मुख्य स्वभाववेशिष्ट्यांचा निर्देश केला आहे. त्यानंतर त्या अध्यायात राजा'च्या अन्तःपुरात नेहमी आढळून येणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यक्तींचे वणन केळे असून पुढे राजकुलाशी संबद्ध अशा पुरुषांचे स्वभावविशेष विस्ताराने सांगितळे आहेत. महादेवी, देवी, स्वामिनी, नाटकीया, नर्तकी, प्रतीहारी, कज्लुकीय प्रभ़्ती अन्तःपुराशी संबद्ध असलेली पात्रे, तसेच राजा, सेनापति, मन्त्री, पुरोहित वगैरे राजकुला- तीळ इतर व्यक्ती यांच्या स्वभावविशेषांचे विस्तृत बिवेचन येथे आढळते. नाटकाचा नायक राजा असणे आवऱ्यक मानल्यामुळे आणि रूपकप्रकारांत नाटक'च सर्वश्रेष्ट असल्यामुळे ह्या पात्रांचाच प्रधान्येकरून विचार केला जावा हे स्वाभाविक होते. ह्या सवे स्वभाववणेनावरून एक गोष्ट स्पष्ट होते. प्रत्येक पात्राच्या ठिकाणी त्याचे स्थान व हुद्दा यांना अनुरूप असे सवे गुण असणे आवश्यक मानले आहे. उदाहरणार्थ, राजा बुद्रिसंपन्न, शूर, दक्ष, अब्यसनी, अथशास्रवित्‌ इत्यादी प्रकारे अनेक गुणांनी मंडित असावा असे म्हटले आहे. नाटकाचा नायक प्रख्यात व उदात्त असावा असे म्हटले आहे त्याला पूरक असेच हे वर्णन आहे. त्याचप्रमाणे सेनापति, मंत्री यांच्या वर्णनातही त्यांच्या अधिकाराला आवश्यक अशा शौर्य, स्वामिभक्ती वगैरे सर्वे गुणसमुच्चयाचा निर्देश आहे. या नियमांचे पाळन केल्यास निरनिराळया नाटकांतील पात्रांच्या स्वभावात मूळभूत फरक पड- ण्याचा संभव नाही. शिवाय, सवेत्र पात्रांच्या स्वभावाचे चित्रण आदर्श स्वरूपातच होणार तथापि, भिन्न भिन्न नाटकांतील प्रसंगांची विविधता आणि त्या प्रसंगीं होणारी पात्रांची विविध स्वरूपाची वागणूक यांमुळे स्वमावास्वभावामधीळ भिन्नता अभिव्यक्त झाल्याशिवाय उपोद्धात २३ राहत नाही. आणि याच्याच अनुरोधाने सर्व गुण अंगी असलेल्या राजाच्या ललित, उद्धत, शान्त अशा मिन्न मित्न प्रकृती मानल्या आहेत. त्यामुळे नाटकातीळ पात्रे ठरीव साचेबंध स्वरूपाची होण्याचा संभव असला तरी भरताच्या नियमांच्या चोकटीतही पात्रांच्या स्वभावचित्रणात विविधता उत्पन्न करण्यास पुष्कळ अवकाश आहे असे म्हणावयास हरकत नाही. भाषा गाट्यात्म काव्याच्या संबंधात भरताने निर्दिष्ट केलेल्या दोन वैशिष्ट्यांचा उछ्ेख करणे उचित होईल. एक, नाटकातीळ संवादासाठी योजावयाच्या भाषांचे मिश्रण आणि दुसरे, गद्य आणि पद्य ह्या दोन्ही वाड्मयप्रकारांचा उपयोग. संस्कृत आणि प्राकृत अज्ञा दोन प्रका- रच्या पाठ्याचा निर्देश करून भरताने प्राकृत पाठ्य समानरशाब्द, विभ्र्ट आणि देशीगत भसे तीन प्रकारचे असते असे म्हटले आहे (१७.१-३). मागधी, अवन्तिजा, प्राच्या, शौर- सेनी, अर्धमागधी, बाहीका आणि दाक्षिणात्या या देशविरोषांत प्रचारात असलेल्या सात भाषा आणि शकार, आभीर, 'चण्डाळ, शबर, दरमिळ, आन्त्र आणि वनचर या जातिविदोषांत प्रचलित असलेल्या सात विभाषा यांचा निर्देश करून नाटकात त्या कोणाच्या तोंडी घाळा- व्यात याचे वर्णन केळे आहे. सामान्यपणे उत्तम आणि मध्यम प्रकृतीच्या पुरुष पात्रांची भाषा संस्कृत असावी आणि स्त्री पात्रांची व शकार आदी अनार्य जातींतील पात्रे खेरीज करून इतर पात्रांची भाषा शौरसेनी असावी असा नियम आहे. तथापि या नियमाळा अनेक अपवाद असल्याचे सांगितले आहे (१७.३२-६४). _ नाटकात आवश्यक मानलेल्या विविध भाषांच्या उपयोगाचे मूळ वास्तवाचे यथातथ्य भनुकरण करण्याच्या इच्छेत आहे हे उघड आहे. नाठ्य ज्यावेळेस प्रथम अस्तित्वात आले त्या वेळी सर्व लोकांच्या बोलण्यात एकच आुद्ध स्वख्पाची संस्कृत भाषा होती अशी प्रेस्थिती राहिली नव्हती. उच्च वणींय, विशेषतः सुशिक्षित लोक प्राय: शुद्ध संस्कृतात बोलत असत, परंतु इतर लोक, विशेषत: शिक्षणाचा संस्कार न झालेले ळोक अशुद्ध भाषेचा उपयोग करीत. ही अथ्नुद्ध संस्कृत भाषा म्हणजेच प्राकूत भाषा, संस्कृत आणि प्राकृत ही एकाच भाषेची झुद्ध आणि अपभ्रष्ट रूपे हे सामान्यतः मान्य होण्यासारखे आहे. आ्राकृताची देशपरत्वे शौरसेनी, मागधी इत्यादी मिन्न मित्न रूपे झाळी इतकेच. सामान्यपणे कोणत्याही समाजात. उच्च वर्गातील ब सुशिक्षित लोकांची शुद्ध भाषा आणि कनिष्ठ वर्गातील व अशिक्षित लोकांची अद्चुद्ध भाषा यांत जितका फरक असतो तितकाच फरक संस्कृत आणि प्राकृत यांमध्ये आहे. आणि ज्याप्रमाणे ही सुद्धा सुशिक्षित व अशिक्षित लोक भाषेच्या आपापल्या रूपांचा उपयोग करून परस्परांशी व्यवहार करू दाकतात त्याच- प्रमाणे संस्कृतमाषी आणि प्राकृुतभाषी आपापल्या भाषेचा व्यवहारात उपयोग करीत असावेत. 8.३: | नाट्यशास्त्र या'च तत्कालीन परिस्थितीचे प्रतिबिम्ब नाट्यात पडळे आहे असे समजण्यास हरकत नाही. स्रियांना सामान्यतः प्राक्ूतभाषी ठरविले आहे यावरून त्यांच्यापैकी फार थोड्या व्यक्तींवर शिक्षणाचे संस्कार होत असत असे अनुमान निघते. प्राकृत बोलींपैकी मुख्यतः शौरसेनीचा उपयोग करावयास सांगितले आहे. यावरून असा निष्कषे काढला की नाट्याची उत्पत्ती शूरसेन देशात झाळी तर चूक होणार नाही. ठूरसेन देशा म्हणजे मथुरा नगरी राजधानी असलेला प्रदेश, जेव्हा इतर प्रदेशांतील नाग- रिकांची अथवा रबर आदी अनाय व्यक्तींची नाटकात योजना करावयाची असेल तेव्हा त्यांना आपापल्या बोळीत बोळावयास लावावे असे अभिग्रेत आहे. ह्यात सुद्धा बास्तवाच्या अनुकरणाची'च इच्छा दिसून येते. गद्यवपद्य भरतवर्णित नाट्याची दुसरी विशेषता म्हणजे गद्य आणि पद्य यांचा मिश्र उपयोग. गद्याला भरताने चूर्णपद असे म्हटले असून पद्य म्हणजे निबद्ध पद (१४.४०-४१). ह्या दोहोंचा उपयोग केव्हा आणि कसा करावयाचा ते त्याने स्पष्ट केळेळे नाही. तथापि, भावनांच्या आविष्कारासाठी व वैरशिष्टययुक्त वणनासाठी पद्याचा उपयोग आणि इतरत्र संवादासाठी गद्याचा उपयोग व्हावा हे स्वाभाविक मानता येईल. हे लक्षात ठेवणे आवऱयक आहे की पद्याचा अन्तर्भाब पान्यातच होतो. याचा अर्थ नाटकातील छोकांचे पठन करा- वयाचे असते, ते गावयाचे नसतात. गाण्यासाठी भरताने बत्तिसाव्या अध्यायात धुवा नावा'च्या पद्यांचे प्रकार निर्दिष्ट केळे असून त्यांची अनेक उदाहरणे दिळी आहेत. ही सवे पद्ये प्राकृतात आहेत. यावरून गाण्याची भाषा प्राकृत हे ठरून गेळे होते असा निष्कषे निघतो. | कथानकाची मांडणी, पात्रे, भाषा इत्यादीसंबंधी भरताने केलेल्या विवेचनाळा अनु- सरून सध्या उपलब्ध असलेल्या प्रायः सर्व नाटकांची रचना झालेली दिसून येते. नाटक, प्रकरण, भाण, प्रहसन इत्यादी रूपकांचे प्रकार, अंकांमध्ये वस्तूची विभागणी, प्रवेशक आणि विष्कम्मक यांचा उपयोग, नाटकात योजावया'ची पात्रे, संस्कृत आणि प्राकृत भाषांचा मिश्र उपयोग, गद्य आणि पद्य दोन्ही वाड्मयप्रकारांचा उपयोग इत्यादी सर्वे बाबतींत प्रसिद्ध झालेली संस्कृत नाटके नाटयशास्रातीळ विवेचनाच्या आधारेच लिहिली गेली आहेत यात शांका नाही. क्षचित एखाद्या नाटयकृतीत भरता'ची एखादी सूःचना अमलात आणली गेली नाही असे दिसून येते. पण या गोष्टीला अवास्तव महत्त्व देऊन त्यावरून एखादे नाटक भरतपू्वेकाळीन आहे असे ठरविणे युक्तिसंगत वाटत नाही, कोणताही नाटककार भरताच्या बारीकसारीक नियमांचे सुद्धा उछंघन करण्यास प्रवृत्त होणे शक्‍य नाही असे मानण्याचे काही कारण नाही. अर्थात नाट्यशात्राच्या रचनेच्या पूर्वी अनेक उपोद्धात | २५१ संस्कृत नाटके विद्यमान होती यात शंका नाही. किंबहुना त्या नाटकांच्या परिशीलनाने'च ह्या शास्त्राची निर्मिती शक्‍य झाली हे उघड आहे. पण त्या भरतपूर्वेकाळीन नाटकांपैकी एखादे तरी आज उपलब्ध आहे असे निश्चितपणे म्हणता येण्यासारखे नाही. भरताच्या काळी संस्कृत नाटके विद्यमान होती इतकेच नव्हे तर त्यांचे प्रयोगही मोठया प्रमाणावर होत असत. नाटयशास्त्राचे कितीतरी अध्याय नाटयप्रयोगाच्या सविस्तर वर्णनाला वाहिलेळे आहेत. तत्कालीन प्रयोगाच्या स्वरूपाची साधारण कल्पना यावी म्हणून ह्या वणनांचा थोडक्यात परिचय करून घेणे अनुचित होणार नाही. नाट्यमंडप नाटयप्रयोगासाठी प्रथम आवश्यक आहे नाटयमंडप अथवा प्रेक्षागृह. ते कसे असावे याचे वणेन दुसऱ्या अध्यायात केले आहे. लम्बचौरस, चौरस आणि त्रिकोणी अश्या तीन प्रकारच्या मंडपांचा निर्देरा करून त्या प्रत्येकाचे ज्येष्ट, मध्यम आणि कनिष्ठ परिमाण असतात असे म्हटले आहे. सर्वसाधारण नाटकांना मध्यम परिमाणाचा लम्बचौरस मंडप उपयोगी असतो म्हणून त्याचे विस्ताराने वणन केळे आहे. हा मंडप ६४ हात लांब आणि ३२ हात रुंद (१ हात म्हणजे सुमारे १॥ फूट) असा मोजून त्याचे २३२ हात > ३२ हात असे दोन भाग करावेत. पश्चिमेकडील चौरस भागात नेपथ्यगृह् आणि रंगभूमी तर पूर्वे- कडील अर्ध्या भागात प्रेक्षकांची बसण्याची जागा असावी. प्रेक्षकांच्या जागेपेक्षा रंगभूमीचा भाग दीड हात अधिक उंच करावा. ह्या उंच भागातीळ पाठीमागचा अर्धा भाग म्हणजे नेपथ्यगृह आणि पुढचा अर्धा भाग म्हणजे रंगभूमी. या दोहोंच्या मध्ये एक भिंत उभी करून त्या भिंतीत उत्तर बाजूला आणि दक्षिण बाजूला पात्रांच्या प्रवेश-निष्क्रमणासाठी दोन दरवाजे असावेत. रंगभूमीचे सुद्धा दोन समान भाग करावेत, पाठीमागचा मिंती- जवळचा भाग तो रंगशीषे आणि पुढचा प्रेक्षकांच्या समीप असणारा भाग तो रंगपीठ. रंगपीठापेक्षा रंगशीर्षाचा भाग किंचित अधिक उंच करावा. रंगपीठाच्या दोन्ही बाजूस आठ हात चौरस असे दोन मत्तवारणी नावाचे व्हरांडे तयार करावेत. हे नाटबमंडपा'च्या बाहेरच्या बाजूस असावेत असे अमिनवगुप्ताचे मत असल्याचे आचार्य विश्वेश्वर यांनी प्रति- पादन केळे आहे ते पटण्यासारखे आहे. प्रेक्षकांसाठी बसण्याच्या जागा विटा किंवा लाकूड यांच्या साहाय्याने बनवाव्यात आणि ह्या आसनपंक्ती सोपानाकृति म्हणजे पाय- ऱ्यांच्या स्वरूपाच्या असाव्यात. प्रेक्षकांसाठी येण्याजाण्याचा दरवाजा आसनांच्या पाठीमागे पूर्वेकडीळ भिंतीत आणि नटांच्यासाठी आत येण्याचा दरवाजा नेपथ्यगृहाच्या पाठीमागे पश्चिमेकडील भिंतीत असावा. नाटयमंडपाच्या आश्नेय, नैक्रेत्य, वायव्य आणि ईशान्य ३ हिंदी अभिनवभारती, आचार्य विश्वेश्वरकृत (दिली विश्वविद्यालय, दिली, १९६०) पु. २१०-२२२. | २९६ नाट्यशास्त्र दिशांना असलेल्या चार कोपऱ्यांत उभे करावया'च्या चार खांबाना अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैऱ्य आणि शूद्र या संक्षा दिल्या असून मंडपात आधारासाठी अन्य चोवीस खांब आवरयकत असल्याचे म्हटले आहे असा अमिनवयुप्ताच्या व्याख्येचा आशय आहे. नाट्यशास्त्रात रंगभूमीवर असलेल्या पडद्यासाठी यवनिका हा शब्द वापरला आहे. पूर्वरंगाच्या वर्णनात असे म्हटले आहे की त्याच्या पहिल्या नऊ अंगांची योजना यव- निकेच्या आत असलेल्या गायक ब वादक कलाकारांनी करावयाची असून त्यानंतरच्या इतर अंगांचा प्रयोग यवनिका दूर केल्यानंतर त्यांनी करावयाचा आहे (५.११-१२). अभि- नवगुप्ताने म्हटले आहे की ह्या पडदा रंगपीठ आणि रंगशीर्ष यांच्या मध्ये असावा, आणि तेच बरोबर वाटते. रंगभूमीच्या अगदी पुढे दरानी पडदा अभिप्रेत असण्याची राक्‍यता वाटत नाही. पात्रांच्या रंगभूमीवर होणाऱ्या प्रवेशाचे आणि निष्क्रमणा'चे निर्देश आहेत. हे सर्व प्रवेश आणि निष्क्रमणे पडद्याच्या साहाय्यावाचूनच होत असावेत असे दिसते. पूर्वरंग | प्रत्येक नाट्यप्रयोगाचा प्रारंभ पूर्वरंगाने करावयास सांगितले आहे. पूर्वरंगाचे विस्तृत वर्णन पा'चव्या अध्यायात केळे आहे. त्याची एकंदर वीस अंगे निर्दिष्ट आहेत : (१) प्रत्याहार, यात वाद्य रंगभूमीवर आणली जातात आणि वादक कलाकार ठरलेल्या जागी स्थाना- पत्न होतात. (२) अवतरण, यात गायक स्थानापत्न होतात. (२) आरर्भ, यात गायक गीत- स्वरांचा आरम्भ करतात. (४) आश्रावणा, यात वाद्यवादनाला प्रारम्भ होतो. (५) वक्‍्त्रपाणि, यात बासरी व तत्सदृश वा्ये वाजविली जातात, (६) परिघट्टना, यात वीणा व तत्सदृश वाद्ये वा- जविली जातात. (७) संघोटना, यात पुष्कर आदी वाद्य वाजविली जातात. (८) सागांसारित, यात सर्वे प्रकारची वाचे एकत्र वाजविली जातात. (९) आसारिताक्रेया, यात नंतर म्हणा- . वयाचे असलेल्या गीतासाठी अनुरूप ताळ आणि लय यांचा उपक्षेप केला जातों. ही पहिली नऊ अंगे होत असता गायक व वादक यवनिकेचे आतच असतात. यानंतर यवनिका दूर केळी जाते व पुढील अंगांचा प्रयोग सुरू होतो. (१०) गीत, यात देवतांच्या स्तुतिपर असलेल्या एका गीताचे गायन होते. (११) वधमान, यात तांडव नृत्य केळे जाते. (१२) उत्थापन, यात इन्द्रथ्वजाचे आरोपण केळे जाते व त्यावेळेस उत्थापनी प्रवेचे गायन केले जाते. ह्या ध्वजारोपणासाठी दोन पारिपाश्नकांसह सूत्रधाराचा प्रवेश होतो. एका पारिपाश्व- काच्या हातात पाण्याचा कळश असतो व दुसऱ्याच्या हातात इन्द्रव्वज. फुळ अपण करून सूत्रधार इन्द्रभ्वज उभा करतो. (१३) परिवर्तन, यात सूत्रधार पारिपाश्वेकांसह रंगभूमीच्या चारही दिशांना जाऊन लोकपालांची स्तुती करतो आणि जजेरपूजा म्हणजे इन्द्रध्वजाची पूजा करतो. (१४) नान्दी, यात आशीवेचन आणि नमस्कार असतात. नान्दीचे पठन सूत्र- धार मध्यम स्वरात करतो. (१५) शुष्कावकृष्टा, ही एक प्रकारची धुवा आहे. हिचे गायन उपोद्ात २७ झाल्यावर सूत्रधार गंभीर स्वरात जर्जर*छोक म्हणतो, त्यात ज्या देवतेच्या यात्रेचा प्रसंग असतो त्या देवतेची अथवा राजाची स्तुती असते. (१६) रड्भुद्वार, यात आणखी एका £होकाचे पठन होऊन जर्जर अथवा इन्द्रभ्बज खाळी केला जातो. (१७) चारी; यात सूत्रधार पारिपार्शवकांसह विविध प्रकारचे पदविन्यास करून शुंगारिक अभिनय करतो. (१८) महा- चारी, यात सुद्धा पदविन्यासच असतात, पण यातीळ अभिनय रौद्र स्वख्पाचा असतो. (१९) त्रिगत, यात स॒त्रधार, बिदूषक आणि पारिपार्श्वक या तिघांत संभाषण चालते, त्यात विदूषक पुष्कळसे असंबद्द आणि अर्थहीन असे बोलतो. ह्या निर्देशावरून हे उघड आहे की स॒त्रधाराबरोबर येणाऱ्या दोन पारिपासकांपैकीच एक विदूषक नावाचा असतो. (२०) प्ररोचना, यात ज्या नाटकाचा प्रयोग व्हावयाचा असतो त्याचा निर्देश करून सूत्रधार ते पहाण्या'ची प्रेक्षकांना विनंती करतो. यानंतर सूत्रधार आणि पारिपाश्वंक यांचे निष्क्रमण होऊन पूर्वरंगाची समाप्ती होते. हे झाले 'चतुरख पूर्वरंगाचे वणन. त्र्य्न पूर्वरंगात यांतील . काही अंगांना काट देता येतो, तर चित्र पूर्वरंगात या अंगांत वृद्धी सुद्धा करता येते. ____ पूवैरंगाच्या ह्या वर्णनावरून हे उघड आहे की देवदेवतांना प्रसन्न करण्याचा हा एक प्रदीधे विधी आहे. प्रत्येक अंगाने कोणकोणत्या देवतेला, दैत्यांना, भूतगणांना; पितृगणांना वरे संतोष प्राप्त होतो त्याचा नाटयशास्त्रात निर्देश केळा आहे. प्रसन्न करण्याचे प्रमुख साधन, नृत्य, गीत आणि वाद्य, ह्यांचा पूर्वरंगविधीत मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. . त्याचबरोबर इन्द्रध्वजाची उभारणी व त्याची पूजा यांना ह्या विधीत महत्त्वाचे स्थान आहे. पूवैरंगाच्या ह्या विधीशी नाटककार अथवा त्याची नाट्यकृती यांचा काही संबंध नाही हे उघड आहे. शेवटच्या प्ररोचना नावाच्या अंगात नाटकांचा निर्देश असतो इतकेच. पूर्व- रंगाच्या प्रयोगात पुष्कळ वेळ जात असला पाहिजे. शिवाय त्यातील कलाकारांना आपापले कार्य लांबविण्याचा मोह होणेही स्वाभाविक आहे. म्हणून भरताने सांगितले आहे की नृत्य, गीत आदी गोष्टी फार लांबवू नयेत, कारण त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येण्याचा संभव आहे. काही नाटककारांनी सूत्रधाराच्या तोंडी घातळेळे 'अलमतिविस्तरेण' हे वचन पूवेरंगा'च्या विस्ताराला उद्देशून आहे. नान्दी नान्दी हे पूवरंगाचेच एक - चौदावे - अंग. त्यावरून हे आपोआपच सिद्ध होते की नान्दी ही नाटककाराची कृती नव्हे. भरताने नान्दी बारा पदांनी किंवा आठ पदांनी अलंकृत असावी असे म्हटले आहे. पण त्याने जे नान्दीचे उदाहरण दिले आहे त्यात हा नियम पाळलेला दिसत नाही. चार झोक मिळून बनलेल्या ह्या नान्दीत सर्व देवांना नम- स्कार असो, द्विजातींचे शुभ होवो, राजा अखिल. पृथ्वीवर राज्य करो, राज्या'ची बृद्धी होवो, रंग समृद्ध होवो, प्रेक्षकांचा धर्म वृद्धिंगत होवो, नाटककाराच्या यशात भर पडो अशा ऱ्ट नाट्यशास्त्र प्रकारच्या अनेक प्राथना आहेत (५.१०५-१०८). प्रत्येक वाक्य उच्चारल्यानंतर पारि- पार्वकांनी 'एवमस्तु' असे म्हणावयाचे असते. सांप्रतच्या संस्कृत नाटकांत प्रारंभी असलेल्या मंगळ-छोकांना भरतकृत नान्दीचे लक्षण लागू पडत नाही हे उघड आहे. साहित्यदर्पणकार विश्वनाथाने म्हटले आहे की हे छोक म्हणजे वस्तुतः पूर्वरंगाचे रंगद्वार हे अंग.० पण हे म्हणणे सुद्धा पटण्यासारखे नाही. रंगद्वारानंतर पूर्व_गात आणखी चार अंगे असतात. त्यांना सांप्रतच्या नाटकांत मुळीच स्थान नाही. या संबंधात एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे. दशख्पकार धनंजयाने पूर्वरंगाचा निर्देश केळा नाही, इतकेच नाही तर नान्दी- चाही कोठे उछ्लेख केळा नाही. उत्तरकाली पूर्वरंगाचा विधी प्रचारात राहिला नाही असे म्हणता येईल. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे की सांप्रतच्या नाटकांतील प्रारंभीचे रोक मूळत: नान्दी नाहीत तर त्यांच्या पूर्वी अथवा नंतर 'नान्यन्ते ततः प्रविशति सूत्रधार? अशा प्रकारची नाट्यसूचना आढळते ते कसे? या प्रश्नाचे उत्तर असे दिसते की कालान्तराने पूर्वरंगाचा संक्षेप होऊन त्यातीळ नान्दी हे प्रधान अंगच अवशिष्ट राहिले आणि तिचे पठन झाल्यावर नाटककाराच्या कृतीचा प्रारंभ होई. हा प्रारंभ सर्वेत्न आढळणाऱ्या मंगळ-छोकांनी होई. पुढे हे छोक म्हणजेच नान्दी असे समजले जाऊ लागले. प्रस्तावना भरताच्या वर्णनाप्रमाणे पूर्वरंगाची समाप्ती झाल्यावर पारिपाश्वंकांसह सूत्रधाराने निष्क्रमण करावे. त्यानंतर सूत्रधारासारखाच असणाऱ्या स्थापकाने प्रवेश करून रंगाचे प्रसादन करावे आणि नाटककार कवीचे नाव सांगून प्रस्तावना करावी. यावरून पूर्वे- रंगातीळ सूत्रधार आणि प्रस्तावनेतीळ स्थापक हे भिन्न आहेत हे उघड होते. म्हणजे पूर्वंग आणि नाटक हे जवळजवळ संपूर्णपणे स्वतंत्र असे प्रयोग होते. अगदी प्रारंभी अशीच व्यवस्था होती असे दिसते. परंतु पुढे सूत्रधार आणि स्थापक यांच्यातीळ भेद नष्ट झाला आणि पूर्वेंगाची योजना करणारा सूत्रधारच स्थापक बनून नाटकाची प्रस्तावना आयोजित करू लागला. हे स्वाभाविक असेच समजता येईल. अभिनवगुप्ताने सूत्रधार व स्थापक यांत भेद मानला नाही. स्थापकाने मधुर छोकानी रंगाचे प्रसादन करावे आणि कवीचे नाव सांगून प्रस्तावना करावी असे म्हटले आहे. हल्ली नाटकाच्या आरंभीचे हे छोक नान्दी म्हणून ओळखले जातात तैं मूळतः हे रंगप्रसादनपर शोक होत असे समजण्यास हरकत नाही. ७ एतन्नान्दीति कस्यचिन्मतानुसारेणोक्तम्‌ । वस्तुतस्तु पूर्वरड्रस्य रड्रद्वारामिधानमड्रमित्युच्यते । “सा. द. ६.२४-२५ वरील वृत्त. उपोद्धात २९ स्थापकाने विविध प्रकारच्या उपक्षेपांनी काव्य म्हणजे नाटक प्रस्तुत करावे असे सांगितले आहे. हीच नाटकाची प्रस्तावना. हिला आमुख असेही नाव असून सूत्रधाराचा अथवा स्थापकाचा नटी, निदूषक किंवा पारिपार्श्रक यांच्याबरोबर आपल्या स्त्तःच्या कार्याविषयी होंणारा संवाद आणि तद्द्ठारा नाटकाच्या प्रारंभीच्या प्रवेशाचे सृचन ही तिची वैरिष्ट्ये होत. आमुख भारती वृत्तीचा एक भाग मानला असुन उद्‌घात्यक, कथोद्घात, प्रयोगातिशय, प्रवर्तक आणि अवलळगित ही आमुखा'ची म्हणजे प्रस्तावनेची पाच अंगे होत असे म्हटले आहे (२०.३०-३७). ही अंगे म्हणजे नाटकाचा प्रारम्भ सूचित करण्याचे निरनिराळे प्रकार होत. यांपैकी उद्‌घात्यक आणि अवळगित यांचा वीथ्यंगांतही समावेश केला आहे (१८.१०५-१०६). अशा प्रकारची प्रस्तावना हे संस्कृत नाटकाचे वैशिष्ट्य आहे हे सर्वमान्य आहे. घुवागान पूर्वरंगात जे गायक आणि वादक कळाकार रंगशीर्षांवर स्थानापन्न झाळेळे असतात ते नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यावरही तेथेच बसून राहातात. नाटकातीळ विविध प्रसंगांत घुवांचे गायन करणे हे त्यांचे कार्य असे समजावयास हरकत नाही. कारण, धुवांच्या संत्रंवी अति विस्तृत विवेचन बत्तिसाव्या धुवाध्यायात केळे आहे. घुवा म्हणजे विविध प्रकारच्या वृत्तांमध्ये निबद्द झाळेळा अक्षरसमूह म्हणजेच पद्य. प्रत्येक पादात चार पासून बावीस अक्षरे असलेल्या अनेक धुवापद्यांची नामनिर्देशासह उदाहरणे दिली आहेत. ही सर्व पद्चे शौरसेनी प्राकृतात आहेत. धुवांची ही पद्चे पडन करावयाची नसून ती गावयाची असतात. नाटकात पाच प्रसंगी हे धरुवागान करावयास सांगितले आहे. रंगभूमीवर पात्राच्या प्रवेशाच्या प्रसंगी गायिळी जाते ती प्रावेशिकी घुवा, तसेच त्याच्या निष्कमणा'च्या समयी गातात ती नेष्क्रामिकी धुवा. एका रसाचा आक्षेप करून भिन्न लयातीळ रसाचा उपक्षेप करणारी ती आक्षेपिकी धुवा, पात्राच्या चित्तव्रत्तीचा आविष्कार करणारी ती प्रासादिकी बरुवा, आणि परिक्रमण, मूर्च्छा इत्यादींनी खंड पडळा असता म्हणावयाची ती आन्तरा घुवा. ह्या सर्वे घुबा अन्योक्तीच्या स्वरूपाच्या आहेत, म्हणजे पात्राला मेघ, सिंह, सारस इत्यादी कल्पून हे प्राकृत शोक रचलेले आहेत. ह्या सर्वे छ्वा गायिल्या जाव्यात हे अपे- क्षित आहे, इतकेच नव्हे तर निरनिराळया प्रसंगांना अनुसरून ताळ, लय, स्वर यांची विविध प्रकारे योजना कशी करावी हेही विस्ताराने सांगितळे आहे. हे गायन रंगशीर्षावर उपस्थित असलेले गायक करीत असले पाहिजेत. असा संभव आहे की घलुबागान मूळतः चृत्ताच्या समयी केळे जात असे. पण नाटबश्ाक्मावरून हे स्पष्ट आहे की नाटकाच्या प्रयोगातही त्याची योजना केली जात असे. आठव्या दात- कात लिहिलेल्या दामोदरगुप्ताच्या कुट्टनीमत ह्या ग्रंथात रत्नावळी नाटिकेच्या पहिल्या २० नाट्यशास्त्र अंकाच्या प्रयोगाचे वणन आहे, त्यात प्रावेशिकी आणि नैष्क्रामिकी या दोन धुवा म्हटल्या गेल्या असल्याचा निर्देश आहे.“ विक्रमोवश्ीय नाटकाच्या चौथ्या अंकाचे जे बंगाली संस्करण आहे त्यात पुरूरव्याची चित्तवृत्ती आणि अवस्था यांचे सूचन कर- णारी प्राकूुत आणि अपभ्रंश भाषांतील अनेक पद्य आहेत. ती सर्वे अन्योक्तीच्या स्वरूपाची असून त्यांना धुवा संबोधणेच उचित होईल. ह्या धुवा काठिदासकृतच आहेत हे जरी संशयातीत नसले तरी ह्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी भारतातील निदान काही प्रदेशांत घ्रुवागान करण्याची पद्धती चाळू होती यात शंका नाही. नाटकात गावयाच्या असलेल्या ह्या धुवांची रचना नाटककार कवीच करीत असे असे मानता येण्यासारखे आहे. भरताने उद्धृत केलेल्या अनेक ध्ुवांत श्रेष्ठ प्रतीचे काव्य आहे. नंतरच्या काळी ध्रुवागानाची पद्धती हळुहळू प्रचारातून गेळी अंसे दिसते. विक्रमो्ब- शीयाचा अपवाद वगळता अन्य नाटकांच्या प्रयोगासाठी स्चलेल्या घुवा उपलब्ध झालेल्या नाहीत. सूत्रधार व इतर नट पूवेरंगानंतर योजावयाच्या प्रस्तावनेत उपस्थित होणारे सूत्रधार, पारिपाश्वेक आदी नट म्हणून उपस्थित होतात, नाटकातीळ कोणत्याही भूमिकेत अवतीर्ण झालेले नसतात. सूत्रधार हा या नटवर्गातील मुख्य. त्याच्या अंगी कोणते गुण आवश्यक आहेत त्याच नाटथशास्त्रात निदेश केळा आहे. सूत्रधारालाच अन्यत्र नाट्याचाय अथवा नुसतेच आचार्य म्हटले आहे. गीत, नृत्त, वाद्य, प्रस्तार (ताळ), गमनक्रिया व रिष्यनिष्पादन हे आचार्य- गुण असे म्हटले असून ऊह, अपोह, मति, स्मृति व मेघा ह्या गोष्टी त्याला आवश्यक मानल्या आहेत (२६.२५-२६). सूत्रधाराशिवाय इतर नटांचे नाटयशास्त्रात वर्णन केले आहे. त्यांनी करावयाच्या कमीअधिक महत्त्वाच्या भूमिकांना अनुसरून त्यांना भरत, नट, नन्दी, नाटयकर, विदूषक अशा संज्ञा दिल्या आहेत. नाटकातील कोणती भूमिका कोणत्या नटाने करावी हे ठरविण्याचे काम नाट्याचार्याचे. ही निवड वय, अवस्था इत्यादी दृष्टींनी अनुरूप असावी, विरूप नसावी हे अर्थातच सांगितले आहे. स्त्रीची भूमिका पुरुषाने केली तर ती योजना रूपानुरूपा असे म्हटले आहे. (२६.१४), नाट्यप्रयोगाचे सुकुमार आणि आविद्ध असे दोन मिन्न प्रकार निर्दिष्ट केळे आहेत. नाटक, प्रकरण, भाण, वीथी आणि उत्सृष्टिकाडूः यांचे प्रयोग सुकुमार होत, तर समवकार, डिम, व्यायोग आणि इहामृग यांचे प्रयोग आविद्ध होत. आविद्ध प्रयोगासाठी पुरुष नटां- 'ची'च निवड करावी असे सांगितले आहे. सुकुमार प्रयोगांत स्त्रियांची योजना करावी, ८ प्रावेशिक्यबसाने द्विपदीग्रहणान्तरेविशत्सूत्री। - कुटटनीमत, ८८१. नेष्कामिक्या धुवया विनिर्ययौ नायको5पि सह सर्वे: । - कुट्टनीमत, ९२८. उपोद्धात ३१ विशेषतः शुंगाररसप्रधान अशा नाठ्यात सर्वच भूमिका स्त्रियांनी कराव्यात असे म्हटले आहे. याचे कारण असे दिले आहे की स्वर्गात होणाऱ्या नाट्यप्रयोगात रम्भा, उर्वशी भाद अप्सराच सर्वे भूमिका करतात. त्याला अनुसरून पृथ्वीवर सुद्धा - विशेषतः राजमहालात 7 स्त्रियांना भूमिका देणे योग्य होईल. तथापि, सवेसाधारणपणे अनुरूप अशीच योजना करणे भरताने प्रशस्त मानले आहे. देव, राक्षस, राजा, सेनापति, दास इत्यादी विविध भूमिकांसाठी नटांमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचेही भरताने विवेचन केळे आहे (पस्तिसावा अध्याय). भूमिका निश्चित झाल्यावर नटांनी करणे आवश्यक असलेल्या तालमीचा (योग्या) झद्रा नाट्यशास्त्रात निर्देश आहे. ही योग्या केल्याशिवाय भाव आणि रस यांच्या आविष्कारात सौष्टव येणार नाही असे भरताने म्हटले आहे (२६.३३). अभिनयद्वारा हा आविष्कार करण्याचे शिक्षण नटांना देण्याचे काम नाठ्याचार्याचे हे उघडच आहे. नाट्यशास्त्रात विविध प्रकारच्या अभिनयाचे निरूपण करणारे अनेक अध्याय समाविष्ट केळे आहेत, ते नाठ्याचार्याळा या कामी उपयोगी पडण्यासारखे आहेत. आह्विक अभिनय आंगिक, वाचिक, सात्विक आणि आहार्य अशा चार प्रकारच्या अभिनया'चे अति विस्तृत विवेचन नाट्यशास्त्रात आढळते. आठ ते तेरा ह्या सहा अध्यायात आंगिक अभिनयाऱचा परिपूर्ण विचार केला आहे. मस्तक, नंत्र, भुवया, नासिका, ओठ, चिबुक, ग्रीवा इत्यादींच्या विविध प्रकारच्या हालचालींनी निरनिराळे भाव कसे व्यक्त होतात याचे वणणन आठव्या अध्यायात आहे. नवव्या अध्यायात मुख्यतः हात आणि पाय यांच्या विविध प्रकारच्या चळनवळनाने होणाऱ्या अभिनयाचे विस्तृत वर्णन आहे. हस्ताभिनयाचे अनेक प्रकार -- ज्यांना मुद्रा असे म्हणता येण्यासारखे आहे - मुख्यतः नृत्ताला उपयोगी आहेत असे वाटते. तथापि, त्यांपैकी काहींचा नाटकाच्या प्रयोगातही उपयोग होत असावा यात शंका नाही. पुढील दोन अध्यायांत पायांच्या विशिष्ट हालचालींनी करावया'च्या चारी आणि त्यांच्या संयोगाने होणारी मंडले यांचे वर्णन आहे. हे वर्णनही मुख्यतः नृत्तासंबंधात केलेळे आहेसे दिसते. तथापि, काही चारींचा उपयोग नाटकातही होण्यासारखा आहे. बाराव्या अध्यायात विविध प्रकारच्या गतींचे वर्णन आहे. आणि तेराव्या अध्यायात कक्षा- विभागाचा म्हणजे रंगभूमीवर कल्पाबयाच्या भिन्न मित्न ठिकाणांचा निदेश असून शोवटी लोकघर्मी आणि नाठ्यधर्मी यांतील मेद स्पष्ट केला आहे. लोकधर्मी म्हणजे लोकव्यवहारात दिसून येणाऱ्या गोष्टी आणि नाव्यधर्मी म्हणजे नाटकात पाळले जाणारे मित्न असे संकेत, आकाराभाषित, ललित गती इत्यादी. ह्या सहा अध्यायांशिवाय चित्रामिनय नावाच्या पंचविसाव्या अध्यायात अभिनयाच्या द्वारा कहतू, वृक्ष, सागर, मेघ, चन्दरजोत्स्ना इत्यादी 84 नाट्यशास्त्र गोष्टी कशा सूचित कराव्यात, दुःख, आनन्द, भय, मद आदींची अभिव्यक्ती कशी करावी, वैर्य, शौर्य, गर्व इत्यादी स्वभावविशेष कसे व्यक्त करावेत याचे सूक्ष्म विवेचन केले आहे. या अध्यायाच्या शेवटी आक्ताराभाषित, अपवारित, जनान्तिक आणि स्वगत ह्या भाषण- प्रकारांचे वणन केले आहे. ह्या अध्यायात वर्णिलेले अमिनयाचे प्रकार सुद्धा मुख्यत: तृत्तांत उपयोगीं पडण्यासारखे आहेत. असा संभव आहे की आंगिक अभिनयाच्या सवे प्रकारांची उत्पत्ती नृत्ताच्या अनुषंगाने झाळी असावी. तथापि, हा अभिनय मूलतः नृत्ताशी संबद्ध होता असे मानळे तरी नाटकाच्या प्रयोगातही त्याचा अनुरूपतेप्रमाणे उपयोग केळा जात असणार यात शंका नाही. वचनविरह्दित अशा नृत्तातील अभिनय आणि वचनयुक्त अशा नाटकातील अभिनय असा भेद भरताने कोठे केळेळा नाही. अभिनय नाठ्यात करावयाचा असतो असे त्याने म्हटले आहे (८.८) आणि नाठ्यात प्रधानतया नाटकाचा अन्तर्भाव होतो. ह्या सर्वे अध्यायांतीळ वर्णनावरून ही गोष्ट स्पष्ट होते की आंगिक अभिनयाचे शास्र भरताच्या काळी अति परिणत स्वख्यात विद्यमान होते आणि नाटकाच्या प्रयोगाच्या समयी त्याच्या विविध स्वख्याचे दर्शन प्रेक्षकांना होत असे. वाचिक अभिनय दुसऱ्या वाचिक अभिनयाचा विचार चौदा ते सतरा या चार अध्यायांत केळा आहे. वाकू अथवा वाणी हे नाट्याचे शरीर होय असे प्रारंभी सांगून चौदाव्या अध्यायात संस्कृत भाषेतीळ वणे ब त्या भाषेचे व्याकरण यांची थोडक्यात माहिती दिली आहे. नंतर त्या अध्यायात व पुढील पंधराव्या अध्यायात पद्यासाठी वापरावया'च्या विविध वृत्तांच्या व्याख्या देऊन त्यांची उदाहरणेही दिळी आहेत. सोळाव्या अध्यायात काव्य ह्या दृष्टीने नाट्याचा विचार करून लक्षण, अलंकार, गुण आणि दोष यांचे विवेचन केळे आहे. सतराव्या अध्या- याच्या प्रारंभी प्राकृत भाषेच्या न्याकरणाचे नियम थोडक्यात दिळे आहेत आणि शेवटी पाठ्यात आवऱ्यक असलेल्या गुणांचे वणन केळे आहे. वस्तुतः वाचिक अभिनय म्हणजे नाटकातील पाठ्य म्हणावया'ची पद्धती इतकेच. बाकीचे सवे विवेचन फक्त नाटककारालाच उपयोगी पडणारे आहे. पाठ्यात अपेक्षित मुख्य गुण म्हणजे ते रस भाणि अर्थ यांना अनु- रूप असावे. यासाठी रसानुरूप षड्जादी स्वरांच्या उपयोगाचे ज्ञान आणि अर्थाप्रमाणे स्वरांत बदल करण्याची कळा अवगत असणे आव्यक असल्याचे म्हटले आहे. शब्दांचे शुद्ध उच्चारण आणि स्वराचे यथोचित नियमन ह्या गोष्टी वाचिक अमिनयाला मूलभूत होत. साकांक्ष आणि निराकांक्ष काकु, उच्च; दीप्त, मन्द्र इत्यादी अलंकार, विराम इत्यादींचा पाठयगुणांत समावेश केळा आहे. या सर्व विवेचनावरून हें स्पष्ट होते की वाचिक अभिनयाची म्हणजे पाठ्याची कला सुद्धा भरताच्या काळी परिणत अवस्थेला पोचली होती. हा अभिनय केवळ नाटकांच्या प्रयोगातच केळा जाण्याची शक्‍यता आहे हे उघड आहे. उपोद्धात | | ३३ सात्विक अभिनय तिसरा अभिनयाचा प्रकार सात्त्कि अभिनय. ह्याचा अवलंब सात्विक भावांच्या अभिव्यक्तीसाठी करावयाचा असतो. स्तम्भ, स्वेद, रोमाज्ञ, स्वरभेद, वेपथु, वैवर्ण्ये, अश्रु आणि प्रलय असे हे आठ सात्विक भाव होत. व्यमिचारिभावांपेक्षा यांचे वेरिष्ट्य असे को यांच्या अभिव्यक्तीसाठी नटाच्या ठिकाणी सत्त्व आवश्यक असते. सत्त्व म्हणजे ज्या पात्राची भूमिका करावयाची त्याचे स्वभाववैशिष्टय. पात्राचे सत्त नटाच्या ठिकाणी दिसून यावे यासाठी त्याचे मन समाहित होणे आवश्यक आहे, म्हणजेच मन एकाग्र करून तो त्या पात्राशी एकरूप झाळा पाहिजे. मनाची समाहितता नसेळ तर अश्रू, रोमांच त्यादांचा अभिनय नटाळा करता येणार नाही. नाटबात सुख आणि दुःख यांचे यथार्थ दर्शन घडवावयाचे असते. दुःखाचे दर्शीन घडविण्यासाठी रडून अश्रू ढाळणे आवश्यक होते, तसेच हरर्षाच्या प्रसंगी अंगावर रोमांच आलेले दाखवावे लागतात. पण नट स्वतः दुःखी अथवा सुखी नसता त्याला ह्या गोष्टी कशा साधणार? याचे उत्तर पात्राचे सत्त्व त्याच्या ठिकाणी उत्पन्न होऊन मनाच्या समाहित अवस्थेमुळे तो दुःखी किंवा सुखी असल्याचे दाखवू शकतो (७.९२ नंतरचे गद्य) असे आहे. भरताने अन्यत्र असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे जीव एका देहातीळ आपल्या स्वभावा'चा परित्याग करून दुसऱ्या देहात प्रवेश केल्यावर दुसरे भाव धारण करतो त्याप्रमाणे नटाने स्वतःच्या भावांचा त्याग करून पात्राच्या. ठिकाणचे भाव मी तोच आहे असे मनात आणून वाक्‌, चेष्टा आदींनी प्रकट करावेत. ' भूमिकेशी अशा प्रकारे तन्मय झाल्यावर उत्कट भावनांची आपोआप जी अभिव्यक्ती होते ती सात्विक अभिनयामुळे. आहाये अभिनय चौथ्या प्रकारचा जो आाहार्य अमिनय त्याचे विस्तृत वर्णन एकविसाव्या अध्यायात केळे आहे. आहार्य अभिनय म्हणजे नेपथ्यकर्म. पुस्त, सल्लीव, अलंकार आणि अंगरचना असे त्याचे चार प्रकार आहेत. पहिल्या दोहोंच्या साहाय्याने प्रयोगासाठी आवश्यक असलेल्या वस्तू तयार केल्या जातात, तर नंतरचे दोन प्रकार नटांच्या वेषभूषेसंबंधी आहेत. निर्जीव वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेळा पुस्त अशी संज्ञा आहे आणि सचेतन प्राण्यांची प्रतिकृती बनविण्याच्या क्रियेळा सज्जीव म्हटले आहे. निर्जीव वस्तू सुद्धा तीन ९ यथा जीवः स्वभावं स्व॑ परित्यज्यान्यदेहिकम । परभावं प्रकुरुते परदेहं समाश्रितः ।। एवं बुधः परं भावं तो5स्मीति मनसा स्मरन्‌ । वेषवागड्रलीलामिश्चेष्टामिश्च समाचरेत्‌ ॥ (२६.७-८, शुद्ध केलेला पाठ; तसेच २१,८९-९१). २ नाट्यशास्त्र प्रकारांनी करता येतात. बांबू , चामडे, वस्त्र इत्यादींनी वस्तू बनवितात त्याला सन्धिम पुस्त असे नाव दिले आहे. यंत्राने जेव्हा एखादी वस्तू बनविली जाते तेव्हा ते व्याजिम पुस्त होय. आणि वस्तू वस्त्राने वेष्टित केळेळी असली म्हणजे ते वेष्टिम पुस्त. पुस्ताच्या साहाय्याने पर्वत, वाहन, विमान, प्रासाद, मंदिर इत्यादी गोष्टी बनविता येतात. सज्जीव नेपथ्य याच प्रकारांनी तयार करता येते. वानर, हत्ती, घोडे इत्यादी प्राणी, तसेच राक्षस आदींचे अनेक हात, अनेक मुख वगैरे, बांबू , ताळपत्र, गवत इत्यादींच्या साहाय्याने योग्य आकाराचे सापळे तयार करून ते वस्त्राने वेष्टित करून वर रंग देऊन तयार करावयास सांगितळे आहे. पुस्त आणि सळीव ह्या दोन्ही प्रकारांत लाकूड, अभ्रक, लाख, मेण यांचाही उपयोग करता येतो, पात्रांनी वापरावयाच्या अलंकारांचे खूपच विस्ताराने वणन केळे आहे. कुण्डल वगैरे आवेव्य, हार वगैरे आरोप्य, अंगद, मेखला वगैरे बन्धनीय आणि नूपुर, वळ्य वगैरे प्रक्षेप अश्या चार प्रकारच्या आभरणांचा निर्देश करून अनेकविध अलंकारांची नावे दिली आहेत. ही सर्वे बनावट करावीत, तसेच ती वजनात हलकी असावीत असे सांगितले आहे. त्यात तांबे, अभ्रक, लाख इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग अपेक्षित आहे. आभरणे हळकी असावीत याचे कारण ती जड असल्यास नटाळा भार होऊन त्याला घाम, मूर्छा वगैरे येण्याचा संभव असतो असे सांगितले आहे. मुकुटांसंबंधी स्वतंत्र विचार केळा असून कोणत्या प्रकारचा सुकुट कोणत्या पात्राळा योग्य ते सांगितले आहे अंगरचना नावाच्या चौथ्या नेपथ्यकर्मात नटांच्या शरीराला द्यावयाचे रंग, त्यांनी करावयाच्या विविध केशरचना आणि त्यांनी परिधान करावया'ची वस्त्रे यांचे विवेचन केळे आहे. निरनिराळ्या देवता, राक्षस, मनुष्य यांच्या भूमिकांसाठो अंगाळा भिन्न भिन्न रंग ठावणे आवशयक आहे. तसेच ब्राह्मणक्षत्रियादी वणे, काशीकोसळादी देशविशेष, किरातबबेरादी जातिविदोष्र यांना अनुरूप असे रंग त्या त्या पात्रांना द्यावयास सांगून त्यांच्या निरनिराळ्या रंगांची माहिती दिळी आहे. पुरुष आणि स्त्रिया उभयतांच्या केश- रचनेच्या अनेक प्रकारांचे वणन केळे आहे. जातिपरत्वे आणि देदापरत्वे केशरचनेत मिन्नता निर्दिष्ट झाळेळी दिसन यंते. त्या'चप्रमाणे परिधान करावया'च्या वस्त्रांच्या बाबतीतील मिन्नतेचेही वणन केळे आहे. पात्राचा दर्जा, त्याचा देश, त्याची अवस्था इत्यादी गोष्टींच्या अनुरोधाने त्याची वेषभूषा करावयास सांगितले आहे. या अध्यायात ज्या जजेराची अथवा इन्द्रध्वजाची पूर्वरंगविधीत पूजा करावयाची असते तो जजर कसा तयार करावा याचे विस्तृत विवेचन केले आहे. नेपथ्यकर्माच्या ह्या विस्तृत वर्णनावरून हे स्पष्ट आहे की वास्तवतेचा शक्‍य तितका आभास रंगभूमीवर निर्माण केला जावा असे नाटबशास्त्रात अभिप्रेत आहे. तेव्हा भरताच्या काळी होत असलेल्या नाटथप्रयोगांत ह्या सुचनांनुसार वागण्याचे कमीअधिक उपोद्धात ३५ यरास्त्री प्रयत्न केळे जात असणार याविषयी संशय घेण्याचे कारण नाही. काही आधुनिक पंडितांच्या मते संस्कृत नाटकांच्या प्रयोगाच्या वेळी रंगभूमीवर कोठलीही साधनसामुग्री उपस्थित केळी जात नसे, केवळ पात्रांची वचने आणि अमिनय यांच्या साहाय्याने प्रेक्षक त्या त्या गोष्टींची कल्पना करीत असत. हे मत अग्राह्य ठरविणारा भरपूर पुरावा नाटथ शास्त्रात आहे हे उघड आहे. नाटयशास्त्राच्या पस्तिसाव्या अध्यायात विविध प्रकारच्या नटांचे वणन केल्यानंतर काही कारागिरांचा निर्देश केला आहे. विविध प्रकारचे कृत्रिम सुकुट बनविणारा मुकुटकार, विविध तऱ्हेचे बनावटी अलंकार घडविणारा आभरणकार, पाच प्रकारचे फुलांचे हार तयार करणारा माळाकार, निरनिराळ्या भूमिकांसाठी अनुरूप वेष तयार करणारा वेषकर, वस्त्रांना रंग देणारा रंजक, भिंती, खांब वगैरे चित्रांनी सुशोभित करणारा चित्रकार, आणि लाकूड; लाख, धातु इत्यादींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वस्तू बनविणारा कारुक हे कारागीर त्या ठिकाणी निर्दिष्ट केळे आहेत. त्यावरून असा निश्चित ग्रह होतो की नटसंघात ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे नट आणि गायक, वादक, नतक हे कळाकार विद्यमान असंत त्याचप्रमाणे आहार्य अमिनयाची सिद्धता करून देणारे हे कारागीरही त्यांच्या समवेत असले पाहिजेत. . तेव्हा नाटयप्रयोगात उपकरणांचा सर्वथा अभाव असे हे मत बरोबर मानणे शक्‍य नाही. | | नाट्यप्रयोग | पक्क्या स्थख्याचा उभारावयाचा असलेला नाटबमंडप आणि सर्वे साधनांनी संपन्न असा नटसंघ यांचे अस्तित्व नाटबशास्त्रात निर्दिष्ट झाले असल्यामुळे नाटकांचे प्रयोग वारंवार होत असत हे मान्य करण्यास हरकत नाही. पण पक्के नाटयगृह मोठ्या शहरींच उभारले जाणे संभाव्य होते. शिवाय, नाटबशास्त्रावरून असे दिसते कौ नाटकांचे प्रयोग एखाद्या देवतेच्या यात्रेच्या अथवा उत्सवाच्या प्रसंगी होत असत. अशा प्रसंगी प्राय: तात्पुरते नाटयगृह उभारले जाई ही शक्‍यताही नाकारण्याचे कारण नाही. यात्रेच्या अथम उत्सवाच्या निमित्ताने नाटकांचे प्रयोग होत असल्यामुळे नटसंघ एका ठिका- शाहून ढुसऱ्या ठिकाणी याप्रमाणे भ्रमण करीत असत असे समजावे लागते. भरताच्या म्हणण्याप्रमाणे निरनिराळ्या स्वरूपाच्या नाटयप्रयोगासाठी दिवसाच्या निरनिराळ्या वेळाच अनुरूप होत. सत्ताविसाव्या अध्यायात त्याने म्हटले आहे की ज्याचा प्रयोग कर्णमधुर असेळ आणि जे धार्मिक प्रवरत्ती जागृत करीळ असे नाटय पूर्वाहसमयी प्रयोगान्वित करावे. अपराहूकाळी करणे उचित असलेल्या प्रयोगाचे वर्णन . करणाऱ्या छझोकाचा अर्थ स्पष्ट नाहो. तो तत्तोत्यानगुणांनी युक्त व वाद्यभूयिष्ठ असावा असे म्हटले आहे. शुंगाररसप्रधान, नृत्य, गीत, वाद्य यांनी समृद्ध असलेला ३६ नाट्यशास्त्र प्रयोग प्रदोषसमयी करावा. नर्म व हास्य पुष्कळ असलेला, तसेच करुणरसयुक्त प्रयोग प्रभातकाली करावयास सांगितले आहे. मध्यरात्री, मध्याहसमयी किंवा संघ्या आणि भोजनाची वेळ असेल तेव्हा प्रयोग करू नये हे मुद्दाम सांगितले आहे. त्याच सत्ताविसाव्या अध्यायात सिद्धींचे आणि त्याचबरोबर घातांचे वर्णन केळे आहे. सिद्धी म्हणजे प्रेक्षकांनी प्रयोगाविषयी संतोष व्यक्त करण्याचे प्रकार. स्मित, हास्य, 'साध' 'ओहो' असे शब्द, रोमांचित होणे, चेळदान इत्यादी प्रकारे प्रयोंगाबद्दलची पसंती व्यक्त करता येते. घात म्हणजे प्रयोगात घडणाऱ्या चुका किंवा त्यात येणारी विध्ने, शब्दांचे उच्चार स्पष्ट न करणे, पाठ्यात चूक करणे, आभरणवल्ञादीतीळ चुका, रथ, घोडा इत्यादी यानावर 'चढण्याउतरण्यात अनमिज्ञता दिसून येणे इत्यादी घात प्रयोग करणारांच्या हातून घडतात. त्याचबरोबर रात्रूंनी प्रयोगात आणलेल्या विष्नां- चाही नाटयशास्रात निर्देश केळा आहे. निरनिराळ्या नटसंघांत स्पर्धा असल्यामुळे ही विघ्ने उप्तन होण्याचा संभव असल्याचे म्हटले आहे. किंबहुना विशिष्ट प्रसंगी प्रयोगांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असत असे नाटयशास्त्रावरून दिसते. त्यांत यशस्वी ठरणाऱ्या प्रयोगाळा राजाकडून पताकेचा मान मिळून अथेम्राप्तीही होत असे. प्रयोगाची गुणवत्ता ठरविण्यासाठी निवडक प्रेक्षकांच्या उपस्थितीत विविध शास्त्रांत पारंगत असे प्राश्चिक म्हणजे परीक्षक नेमावयास सांगितलें आहे. त्यांच्या मदतीळा दिलेल्या लेखक ब गणक यांनी सिद्धी व घात यांची नोद करावयाची असते. यांची गोळाबेरीज करून ज्या प्रयोगाला सर्वात अधिक गुण प्राप्त झाठे असतील तो विजयी असे ठरवून राजाने त्याळा पताका द्यावी, जर दोन प्रयोगांना समान गुण मिळाळे तर दोघांनाही पताका द्यावी असे म्हटले आहे. पताकेबरोबर अर्थप्राप्तीही होत असळी तरी पताकाप्राप्ती हेच यशाचे गमक ठरत असे यात शंका नाही, याच पताकाप्राप्तीला उद्देशून बाणभट्टाने भासाबद्दद '(नाटकै :) सपताकैयंशो लेभे' असे उद्गार काढले आहेत. स्पर्धेच्या वेळी नाटकाचे प्रथम प्रयोग होत आणि त्यावेळेस नाटकाशी समरस होणाऱ्या प्रेक्षकांसमोर त्याची गुणवत्ता ठरत असे. पण त्या नाटकाचे इतरत्र आणि इतर प्रसंगींही प्रयोग होत असत यात शंका नाही. या प्रयोगांना सर्वसाधारण लोक येत असत हे नाटयशास्त्रावरून स्पष्ट आहे. त्याच सत्ताविसाव्या अध्यायात म्हटले आहे की नाटदा- तील कामाच्या दशनाने तरुणांना आनंद ह्दोतो, धर्मपाळनाच्या दर्शनाने बिदग्ध मनुष्यांना संतोष होतो, अर्थप्राप्तीच्या दर्शनाने व्यवहारी ढोकांना आनंद होतो, मोक्षसिद्धी पाहून विरागी लोक संतुष्ट होतात, वीर आणि रौद्राच्या आाविष्काराने शूर लोक खूष होतात, वर्माल्याने, पुराणे यांची ओळख पटून वृद्ध माणसांना संतोष होतो, तत्त्वचिंतनाच्या आविष्काराने प्राज्ञ लोकांना समाधान वाटते, तर लहान मुले, मूर्ख माणसे आणि क्रिया हात्य आणि नेपथ्य यांनी खूष होतात. इतरत्र भरताने सांगितळे आहे की पित्रा, पुत्र, सुना, उपाद्वात | ३७ सासू असे सर्व एकत्र नाटक पहावयास येत असल्यामुळे लज्जा उत्पन्न करणाऱ्या गोष्टी रंगभूमीवर दाखवू नयेत (२२.२९८). यावरून नाटकाचे प्रयोंग सर्वसाधारण ळोकांसाठी होत असत हे उघड आहे. नाटकप्रयोगाचे प्रयोजन भरताच्या काळी विविध प्रकारच्या नाटकांचे प्रयोग होत असत आणि ते पहा- ण्यासाठी सर्वे प्रकारचे ळोक जात हे निविवाद आहे. लोक बहुतांशी मनोरंजन व्हावे या उद्देशाने नाटक बघावयाळा जात असे समजता येईल. दृश्य आणि श्रव्य असे क्रीड- नीयक लोकांना हवे होते म्हणूनच नाटयवेदाची निर्मिती झाळी असे पहिल्या अध्यायात आरंभीच म्हटले आहे. पण नाट्याच्या दर्शनाने मनोरंजनाबरोबर दुसरीही फलप़ाप्ती होत असल्याचे सांगितले आहे. नाटय हे हितोपदेशजनन आणि बुद्धिविवधेन आहे असे त्याचे त्या अध्यायाच्या शेबटी वर्णन केळे आहे. नाटकात धर्मे, क्रीडा, काम, शम, अर्थ, हास्य, उद्भ, वध इत्यादी जगातील सर्वे गोष्टींचे दर्डीन होऊन दुष्ट माणसांना झाळेळे शासन, सत्मदृत्तांना होणारा सुखाचा लाभ, झूरांचा उत्साह, विद्वान मनुष्यांचे वैदग्ध्य, संकटकाली दाखविलेले घेर्य इत्यादी अनेक गोष्टी प्रत्यक्ष होत असलेल्या दिसतात. तेव्हा मनोरंजन होत असता'च या गोष्टींचा संस्कारक्षम मजुप्याच्या मनावर परिणाम होऊन तो त्यापासून योग्य तो बोध घेऊ शकतो. मनोरंजन आणि बोध ह्यांना अनुक्रमे प्रीति आणि व्युत्पत्ति ह्या संक्षा देऊन नाटकाचे हे द्विविध प्रयोजन होय असे नाटबशास्त्राच्या टीकाकारांनी मानळे' आहे. अठराव्या व एकोणविसाव्या अध्यायांवरीळ व्याख्येत अभिनवगुप्ताने ठिकठिकाणी व्युत्यत्तीचा निर्देश केळा आहे. पण ही व्युपत्ती प्रीतीच्या द्वारा म्हणजे मनोरंजन होत असतानाच प्राप्त होते. ही गोष्ट एखाद्या व्याधिग्रस्त मनुष्याला कडू औषध देणे आवश्‍यक असता ते गोड पदार्थातून देतात त्यासारखी आहे असे त्याने एके ठिकाणी म्हटले आहे. परंतु नाटकाच्या दर्शनाने उत्पन्न होणाऱ्या प्रीतीचे स्वरूप सामान्य प्रकारच्या मनोरंजनासारखे नसून रसाची प्रतीती असे विशिष्ट प्रकारचे आहे. रसांचे विवेचन . करणाऱ्या सहाव्या अध्यायात भरताने म्हटले आहे की विभाव, अनुभाव आणि व्यभिनचारि- भाव यांच्या संयोगाने रसनिप्पत्ती होते. याचे स्पष्टीकरण त्याने असे केळे आहे की ज्याप्रमाणे गूळ आदी द्रव्य, व्यआ्जन आणि औषधी यांच्या संयोगाने षाडव आदी रस निष्पन्न होतात, त्याचप्रमाणे विभावादच्या संयोगाने स्थायिभाव रसस्वरूप! होतात. आणि ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यञ्जनांनी संस्कृत केलेल्या अन्नाचे भोजन करणारे त्यातील रसांचा आस्वाद घेऊन एक विशेष प्रकारचा आनन्द प्राप्त करतात त्याचप्रमाणे अभिनय- द्वारा विविध भावांच्या होणाऱ्या आविष्कारामुळे रसात परिणत झालेल्या स्थायिभावाचा ३८ नाट्यशास्त्र आस्वाद घेऊन प्रेक्षक. एक विशेष प्रकारचा आनंद अनुभवतात. रसनिष्पत्तीच्या प्रक्रिये- बद्दल नाऱ्यशास्त्राच्या टीकाकारांत मतभेद आहेत. पण अभिनवगुप्ताचे त्यासंबंधीचे मत प्राय: सर्वमान्य झाळे आहे. प्रेक्षकाचा स्थायिभाव उद्गुद्ध होऊन त्याची. रसात परिणती होते आणि ह्या रसाचा आस्वाद म्हणजे परमोच्च प्रकारच्या आनंदाचा लाभ असे त्याचे मत थोडक्यात मांडता येईल. खुद्द नाट्यशास्त्रात असे मत गृहीत धरलेले दिसते की रस काव्यात असून तो भावांच्या अभिनयाच्या द्वारा अभिव्यक्त होतो. अनेक रूपकप्रकारांच्या वर्णनात ते विशिष्ट र्सांनी युक्त असावेत असे म्हटले आहे. तथापि रसास्वाद हे नाट्याचे परमोच प्रयोजन असे नाटबशास्त्रात अभिप्रेत आहे यात संशय नाही. संस्कृत नाटकाची उत्पत्ती | नाटके आणि त्यांचे प्रयोग याविषयीचे भरताच्या नाटयरास्त्रातील हे सर्व विवेचन त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या नाटकांवर आणि त्यांच्या वारंार होत असलेल्या प्रयोगांवर आधारित आहे असे समजणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष उदाहरणे समोर असल्याशिवाय केवळ कल्पनेने ह्या शास्त्राची निर्मिती होण्याची शक्‍यता नव्हती. परतु भरताळा अवगत असलेल्या नाटकांपैकी आज एखादे उपलब्ध आहे असे निश्चितपणे म्हणता येण्यासारखे नाही. सध्या उपलब्ध असलेली संस्कृत नाटके प्रायः सवे उत्तरकालीन आहेत. भरताने उदाहरणादाखळ कोणत्याही नाटकाचा अथवा त्यातील एखाद्या प्रसंगाचा कोठे निर्देश केलेळा नाही. म्हणून ज्या नाटकांच्या आधारे त्याने हे विवेचन केळे आहे त्या पूवैकाळीन नाटकांची माहिती उपलब्ध होण्यासारखी नाही. तथापि, सध्या आपल्याला अवगत असलेली संस्कृत नाटके भरताच्या अगोदरच्या नाटकांहून कोणत्याही प्रकारे भिन्न नाहीत यात रांका नाही. नाटबरास्त्रातील नाटकांच्या स्वरूपाविषयीचे वर्णन जवळजवळ तंतोतंत हल्लीच्या नाटकांना लागू पडते, किंबहुना ह्या शास्त्रातीठ विवेचनाला अनुसरूनच ही नाटके लिहिली गेळी आहेत हे उघड आहे. तेव्हा संस्कृत नाटकाची परंपरा भरतपूर्वकाळीन आहे याविषयी संशय घेण्याचे कारण नाही. ही परंपरा कशी प्रस्थापित झाळी म्हणजेच संस्कृत नाटकाची उत्पत्ती केव्हा व कशी झाळी याचा विचार करणे उद्बोधक होईल. खुद्द नाटबशास्त्रातच यासंबंधीची एक कल्पना मांडली आहे. पहिल्या अध्यायात नाटयवेदाच्या निर्मितीचे वर्णन आहे. चार वेद फक्त त्रैवर्णिकांसाठीच आहेत. तेव्हा शूद्वांसह्ित सर्व वर्णांना उपयोगी होईल असा आणि जो दृश्य आणि श्रव्य असून मनोरंजन करीळ असा एक नवीन वेद ब्रह्मदेवानेच काही कषींच्या विनंतीवरून निर्माण केळा तोच हा नाटयवेद. त्याच्या निर्मितीच्या कामी चार वेदांचाच उपयोग झाला, छहग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गीत, यजुर्वेदातून अभिनय आणि अथवंवेंदातून रस याप्रमाणे त्या त्या वेदा- उपोद्धात | २३९ तीळ वेशिष्ट्ययुक्त अंश घेऊन व त्यांचे एकत्रीकरण करून ब्रह्मदेवाने नाटयवेद निर्माण केळा असे तेथे म्हटले आहे. त्याचा प्रयोग करण्याचे काम ब्रह्मदेवाने भरतावर सोपविले आणि त्याने तो आपल्या शंभर पुत्रांकरवी बसवून घेतळा. त्यात कैशिकी वृत्तीची सुद्धा योजना व्हावी या उद्देशाने ब्रह्मदेवाने अप्सरा निर्माण केल्या. तेव्हा इन्द्रभ्वज उत्सवाच्या असंगी भरताने प्रथम आशीर्वचनाने युक्त असा नान्दीचा प्रयोग केळा. आणि नंतर देवांनी दैत्यांवर मिळविळेल्या विजया'चा प्रसंग नाटबख्याने प्रस्तुत केला. त्याने क्षुब्ध झाळेल्या देत्यांची समजूत घाळून त्यांना नाटकाचे महत्त्व पटवून दिळे इत्यादी कथा पदह्दिल्या अध्यायात आहे. पुढे चौथ्या अध्यायात असे म्हटले आहे की नाटयमंडपाची उभारणी आणि रंगदैवतांचे पूजन झाल्यानंतर भरताने अग्तमन्थन नावाच्या ब्रह्मदेवरचित समवकाराचा प्रयोग केला. त्यानंतर हिमालयावर शंकराकडे जाऊन तेथे त्याच्यासमोर तो'च;प्रयोग करून शिवाय त्रिपुरदाह नावाच्या डिमाचा सुद्धा प्रयोग केला, त्या प्रसंगी शंकराने आपले नृत्य पूवरंगात उपयोजिण्यासाठी तण्डुकरवी भरताळा शिकविले. स्वर्गातून नाटय पृथ्वीवर कसे आळे याविषयीची कथा नाटबदास्त्राच्या दोवट'च्या दोन (३६व ३ ७) अध्यायांत आहे. स्वर्गात भरताचे पुत्र नाटयप्रयोग करीत असता एका प्रयोगात त्यांनी कषींची ग्राम्य कुचेष्टा केळी. त्यामुळे संतप्त झाळेल्या क्रषींनी त्यांना असा शाप दिळा की त्यांचे नाटयवेदाचे ज्ञान नादा पावेळ आणि ते आगि त्यांचे वंशज शूद्राचार होऊन नर्तक म्हणून दुसऱ्यांची सेवा करून जगतील. देवांनी मव्यस्थी करून नाटय- वेदाचा नाश होऊ दिला नाही आणि भरताच्या सांगण्यावरून त्याचे ज्ञान अप्सरांना देण्यात आळे. पुढे नहुषाळा इन्द्रपदाची प्राप्ती झाल्यावर स्वर्गात अप्सरांनी केलेले नाट्यप्रयोग पाहून त्याळा असे वाटू लागळे की अशा तऱ्हेचे प्रयोग प्रथ्वीवर त्याच्या प्रासादातही केळे जावेत. अप्सरा त्यासाठी पृथ्वीवर जाणे शक्य नसल्यामुळे नहुषाच्या सांगण्यावरून भरताने आपल्या शापित पुत्रांना असा आदेश दिला की त्यांनी परथ्वीवर जाऊन नाट्याचे प्रयोग करावेत, म्हणजे शापाचा अंत होऊन त्यांना हीन दशा प्राप्त होणार नाही. त्याप्रमाणे ते भरतपुत्र पुथ्वीवर अवतीर्ण होऊन येथील स्त्रियांच्या साहाय्याने नाट्या'चे प्रयोग करू लागले. | ही सर्वे दंतकथा आहे यात शंका नाही. तथापि तिच्यावरून काही निष्कष काढणे गेर होणार नाही. अमृतमन्थन आणि त्रिपुरदाह ह्या अगदी प्रारंभीच्या नाटकांच्या निदेशावरून असे म्हणता येईल की सुरुवातीचे नाटयप्रयोग देवादिकांच्या चरितांचे अथवा पराक्रमाचे दर्रोन घडविण्याच्या उद्देशाने केळे जात असत. भरताचे पुत्र अथवा वंशज शापित झाल्यामुळे हीन समजळे जाण्याचा संभव उत्पन्न झाळा यावरून नटांचे समाजातील स्थान प्राभभापासूनच कमी दर्जाचे मानठे जात होते असा निष्कर्ष निघतो. आणि नाट्याचा 3 थ्रयांग करण्यात अप्सरांचा म्हणजे देवगणिकांचचा महत्तवाचा भाग असे याचा अर्थ असा ७8० नाट्यशास्त्र होऊ शकतो की पृथ्वीवरील नाऱ्यही प्रारंभापासूनच गणिका अथवा वेह्या यांच्या साहाय्याने प्रस्तुत केळे जात असे. नाट्य आणि वेद ह्या दन्तकथेत नाट्याचा चार वेदांशी जो संबन्ध जोडला आहे त्यात काल्पनिकते- चाच भाग अधिक आहे. कहग्ेदातील अहःचांचे पठन होत असे आणि सामवेदातीळ मंत्र गायिळे जात यावरून नाट्यातील पाठ्य आणि गीत यांचे मूळ या दोन वेदांत आहे हे समजता येण्यासारखे आहे. पण अभिनयाचा यजुर्वेदाशी जोडलेला संबंध फारच क्षीण स्वरूपाचा आहे. यज्ञात अध्वयूच्या हातून घडणाऱ्या क्रियांपासून नाटचगतीलळ अभिनयाची उत्पत्ती झाली हे तितकेसे पटण्यासारखे नाही. नाट्यातील रस आणि अथर्ववेद यांच्यातीळ संबंधही अशाच प्रकारचा आहे. त्या वेदातीळ अभिचार, वशीकरण इत्यादिविषयक काही मंत्रांमध्ये चित्तवृत्तिरूप काही भावांचा आविष्कार झालेळा दिसून येतो इतकेच. सर्व शास्त्रांचे मूळ वेदात आहे ह्या भावनेतूनच नाट्याच्या प्रधान अंगांचे मूळ वेदांत शोधण्याची कल्पना उगम पावली असे म्हणावयास हरकत नाही. परंतु संस्कृत नाट्याचा वेदाशी अशा तऱ्हेने प्रस्थापित होणारा संबंध पटण्यासारखा नसला तरी दुसऱ्या दृष्टीने नाट्याचे मूळ क्रगवेदात शोधण्याचे प्रयत्न झाले आहेत. दोन किंवा भधिक व्यक्तींमध्ये संवाद असलेली अनेक सक्ते क््वेदात आहेत. उदाहरणार्थ. स॒क्त १०.१० यम-यमी संवाद, १०.२२ विश्वामित्र आणि विपाश-शुतुद्री नद्या यांच्यातील संवाद, १०.९५ उवेशी आणि पुरूरवस्‌ यांचा संवाद, १०.८६ इन्द्र, वृषाकपि आणि इन्द्राणी यांच्यातीळ संवाद, १०.१०८ सरमा आणि पणी यांचा संवाद, ४.१८ वामदेव, इन्द्र आणि अदिति यांचा संवाद, इत्यादी. ह्या सूक्तांना वैदिक कर्मकांडात स्वाभाविक असे स्थान नाही. कारण त्यांतील विषयांचा कोणत्याही धार्मिक विधीशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यांची रचना प्राय: काव्यात्मक आहे. त्यामुळे आणि विशेषतः त्यांच्यातील काही नाट्यपूर्ण . सवादासुळ ह्या सूक्तांचा नाट्याशी संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न व्हावेत हे स्वाभाविक होते क्रग्वेदातील १.१६५ या तूक्तात इन्द्र आणि मरुद्ठण यांच्यातील संवाद आहे _ त्याची व्याख्या करताना मॅक्स म्यूळर यांनी असे सचित केळे होते की याग चाळ असता काही क्रतिंग इन्द्र आणि मरुत यांच्या वेषात उपस्थित होऊन हा संवाद म्हणत असावेत.' ” ही सूचना मान्य करून लेव्हि यांनी संस्कृत नाटयावरीळ आपल्या ग्रंथात असे प्रतिपादन केळे आहे की ह्या संवादसूक्तांवरून त्या वेळी नाटकासारखे प्रयोग निश्चितपणे १० 7. १११: ॥॥ पल, उयडाश्व2 :. तपद्याडीळॉलित घ्यात ए४७ाव्या८त, ल. ग, आणण 70 विट हदवा (»०४४०॥, 1869), 0. 172-173. उपोद्धात ४९१ होत असत असे दिसून येते. नाटयप्रयोगांशी संबद्ध अशा सर्वे कळांचा बैदिक युगात बिकास झाळा होता हे त्यांनी दाखवून दिले आहे. गानकळा परिणत अवस्थेला पोचली होती हे सामवेदावरून स्पष्ट आहे. सुंदर वेष परिधान करून पुरुषांना आकषषित करणाऱ्या स्त्रियांचा क्रवेदात निदेश आहे, त्यावरून असे अनुमान निघते की त्यावेळी नृत्यकळा छद्रा खूप विकसित झाली होती, अथर्ववेदातील १२. १.४१ ह्या मंत्रावरून असे दिसते की वाद्यसंगीताच्या साथीने ळोक नृत्य आणि गायन करीत असत. यावरून असा निष्कर्ष निघतो की प्रेक्षकांसमोर नृत्य आणि गायन यांचे प्रयोग त्या काळी होत असत. तेव्हा ह्या सवादसूक्तांचेही नाटबस्वरूपात प्रयोग केळे जात असत असा संभव मान्य करावयास हरकत नाही असा लेव्हींच्या प्रतिपादना'चा आशय आहे.?) याच्याही पुढे जाऊन फॉन्‌ श्रोडर यांनी दीध परिश्रमाने असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की क्रग्वेदातीळ ही संवादसूक्ते वस्तुत: एका प्राचीन नाट्यप्रकाराचे अवशेषरूप आहेत. त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की सर्व मानवी समाजांच्या प्राथमिक अवस्थेत गायन, नृत्य आणि नाटय यांच्यात दृढ परस्परसंबंध असून ते सर्व कोणत्या तरी धार्मिक विधीशी निगडित असतात. नृत्यगीतात्मक धार्मिक नाटय (ज्याला १८०५४८५ ॥/&/ म्हणता येईळ असे) प्राथमिक अवस्थेत असलेल्या अनेक जमातींत -- उदाहरणार्थ, मेक्सिकोमध्ये - आजही पहा- वयास मिळते. अद्या'च तऱ्हेचे धार्मिक नाटय आर्य लोकांच्या प्राथमिक अवस्थेत म्हणजे इंडो- युरोपियन युगात अस्तित्वात होते असे फॉन्‌ श्रोडर यांचे म्हणणे आहे. त्हमेदात इन्द्र, उषसू, अश्विनो, मरुद्रण आदी देवतांचा नृत्य करणारे! असा निर्देश केला आहे, याची उपपत्ती हीच असू शकते की ढोक ह्या देवतांच्या भूमिकांत उपस्थित होणाऱ्या क्हत्विजांचे एत्य पहात असत. तेव्हा फॉन्‌ श्रोडरच्या मते तरज्वेदातीळ संवादसूक्तांत तसेच स्वगत भाषण असलेल्या इतर काही सूक्तांत ह्या प्राचीन नाटयप्रकाराचे अवशेष आहेत. प्राचीन धार्मिक नाट्यात /८/५/॥, /४८ म्हणजे प्रजननक्षमता साध्य व रप्याच्या विधीळा' फार महत्त्वाचे स्थान होते. त्या विधीचे काही प्रमाणात नाट्यरूप दशन १.१७९ अगस्त्य-छोपामुद्रा-संवाद सूक्त, १०.१० यम-यमी-संवाद सूक्त, १०.८ ६ शहषाकापि सूक्त इत्यादींमध्ये होते असा फॉन्‌ श्रोडरचा दाबा आहे. तथापि कमेदात ह्या धार्मिक नाट्याचे अवशेष दिसतात, ते त्याच्या प्राथमिक अवस्थेचे द्योतक नसून त्याची अखेरची अवस्था दिग्दर्शित करतात असे त्यांनी म्हटले आहे.१ २ परंतु ह्या पंडितांची ही विचारसरणी मान्य करणे कठीण आहे. यात संशय नाही की 4 कग्वेदातील अनेक घूक्तात नाट्यमथ प्रसंगांची कल्पना केली गेली आहे. तथापि, हे प्रसंग ११. $. ॥.७0, ॥८ एईळा2 दाथ (८०, 1 890), ७. 307--308. १२ 1... एणा ययावत, 4 7टधण प्णढे हवीय उक '्टाथ्दय ए.भर्‍टाश, 1908). | ४२ नाट्यशास्त्र यागाच्या समयी अथवा इतर वेळी प्रयोगबद्ध केळे जात असे मानण्यास काही आधार नाही. कत्विग लोकच इन्द्राचा अथवा मरुहरणाचा वेध धारण करीत आणि सूक्तातील संवाद नाटय- ख्याने प्रस्तुत करीत या मताचे सपर्थन करू शकेळ असा कोणताही पुरावा वैदिक वाडूम- यात नाही. तसेच वैदिक युगात नृत्य, गीत आणि वाद्य या कला परिणत अवस्थेळा पोचल्या होत्या याविषयीही संशय नाही. तथापि, त्रशववेदातीळ संवादाचा ह्या कलांशी संयोग घडून येऊन नाटय अस्तित्वात आले होते असे खात्रीपूर्वक म्हणता येण्यासारखे नाही. काही देव- तांचे 'नृत्य करणारे! असे वणन केळे आहे त्यावरून कत्विग लोक त्या देवतांच्या वेषात नृत्य करीत असा काढलेला निष्क म्राह्म वाटत नाही. नृत्याचे इतरत्र होणारे प्रयोग पाहू- नच देवतांविषयींची ही कल्पना कवींना सुचली असे मानणेच अधिक उचित होईल. ञ्त्विग स्वतःच इन्द्र, उषस्‌ इत्यादींच्या वेषात नाचत असे समजण्यास काही सुद्रा आधार | नाही. त्याचप्रमाणे यम व यमी, विश्वामित्र व नद्या, देवशुनी सरमा आणि पणी इत्यादींचे वेष धारण करूनच क्हत्विंग ह्या सूक्तांचे संवादात्मक पठन करीत असत असे मानण्यासही काही आधार नाही. फॉन्‌ श्रोडर यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे प्रारम्मिक अवस्थेतीळ समाजात धार्गिक विधीचा भाग म्हणून नृत्य, गीत आणि नाट्य विद्यमान असते हे सामान्यपणे मान्य करता येईल. तदनुसार असेही समजता येईळ की प्राचीन इंडो-युरोपिअन समाजात सुद्धा नुत्यगीतादींनी युक्त धार्मिक नाठ्य प्रचलित होते. तथापि, कग्वेदातीळ ही सूक्ते तशा प्रकारच्या धार्मिक नाट्याचे अवशेष होत हे मत मान्य करणे कठीण आहे. त्रवेदातील सृक्ते रचिळी गेळी त्यावेळेस धार्मिक विधीस यज्ञसंस्थेचे विकसित स्वरूप प्रात झाले होते. त्याच वेळी नृत्यगीतात्मक नाट्याच्या स्वरूपाचा धार्मिक बिधीही प्रचलित असावा हे संभाव्य वाटत नाही. शिवाय, ही सूक्ते प्राय: कछवेदकालाच्या शेवटी शेवटी रचिली गेली असे मानतात. तेव्हा त्यांत अति प्राचीन, प्राथमिक अवस्थेतील नाव्य अवशिष्ट राहिले आहे हे मान्य करणे सुद्धा कठीण आहे. जर फॉन श्रोडर समजतात त्या प्रकारचे धार्मिक नाटय वैदिक काळी खरोखरच अवशिष्ट असते तर ब्राह्मण आणि सूत्रग्रंथांत वर्णिलेल्या कर्मकाण्डात त्याचा कोठे ना कोठें निदेश झाळा असता. पण तसा तो कोठे आढळत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की ह्यांपैकी बहुतेक सूक्तांचा धार्मिक विधीत अन्तर्भाव होण्या- सारखा नाही. अगस्त्य-ळोपामुद्रा संवाद अथवा यम-यमी संवाद प्रजननविषयक धार्मिक विधीतीळ नाटयाचे अवरोष होत ही गोष्ट सुद्धा पटण्यासारखी नाही. आणि मुख्य गोष्ट अशी की कवेदकाळी एक प्रकारचे नाटय अस्तित्वात होते हे मान्य केळे तरी उत्तरकालीन संस्कृत नाटकांचा त्या नाटयाशी संबंध प्रस्थापित करणे अशक्‍य आहि. कवेदातील सूक्तांत संवाद आहेत, तसे ते संस्कृत नाटकांत आहेत; यापलीकडे त्या दोहोंत काही साम्य नाही. आणि त्रग्वेदकाळापासून नाटयाची परंपरा उपोद्ात 8३ अखंडित राहून तिच्यातूनच संस्कृत नाटक उदयास आले असे मानण्यास काही आधार नाही. एवढे मात्र मान्य होण्यासारखे आहे की बैदिक काळी अस्तित्वात असलेल्या नृत्य, गीत आणि वाद्य ह्या कलांचा विकास आणि वृद्धि ही अविच्छिनपणे पुढेही होत राहिली आणि त्यांचेच परंपरेने आलेले स्वरूप भरताने वर्णिलेल्या पूवरह्लात आणि धुवागानात प्रत्ययास येते. तथापि ह्या नृत्य आणि गीतांचा संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीशी काही विशेष संबंध असल्याचे दिसत नाही. नाट्य आणि सोमक्रयांवोधे त्र्वेदात संस्कृत नाटकाचे मूळ शोधण्याचे जसे प्रयत्न झाले तसेच प्रयत्न कर्म- काण्डाच्या संबेधातही केळे गेळे आहेत. त्यात वर्णन केलेल्या काही विधींत संस्कृत नाटकाचा प्रारम्म दृष्टीस पडतो असे एक मत आहे. सोमयागाच्या वर्णनात सोंम (वल्ली) विकत घेण्याच्या विधीचे वर्णन आहे. सोम विकणारा कोत्स किंवा अन्य ब्राह्मण किंवा अब्राह्म- णही असावा असे आपस्तम्बश्रीतसूत्रात म्हटले आहे. कात्यायनश्रौतसूत्रानुसार विक्रेता कौत्स अथवा शूद्र असतो. सोमाच्या किमतीबद्दळ अध्वर्य आणि विक्रेता यांच्यात बोळणे होऊन सोमक्रयणी गाय अशी त्याची किंमत ठरते. तथापि, विक्रेत्याला फक्त हिरण्य देऊन त्याच्या- पासन सोम घेतळा जातो. सोम घेत असता अध्वर्य स्वान, भ्राज' इत्यादी राब्दांनी युक्त मंत्र म्हणतो. विक्रेता जर सोम देऊ इच्छित नसला आणि तक्रार करू लागला तर त्याच्या- पासन सोम हिसकावून घेतळा जातो आणि चामड्याच्या पट्ट्याने अगर काठीने त्याला मारून हुसकावून लावण्यात येते.१* सोमक्रयाच्या ह्या विधीचे विवेचन करताना हिलेब्रांट यांनी असे प्रतिपादन केळे आहे क्री त्यात संस्कृत नाठ्याच्या प्रारंभाचे दर्शन होते तोमक्रयाचा हा विधी याच स्वरूपात पार पाडणे आवश्यक आहे. वास्तविक सोमाची खरेदी यज्ञमंडपाच्या बाहेरच होत असणार, तरीही ह्या विधीचा उपरिनिर्दिष्ट क्रम आवश्यक मानळा आहे. यावरून हिलेब्रांट यांनी असे अनुमान केळे आहे की हा विधि एका पुराणकथेवर आधारित आहे. या कथेप्रमाणे सोम प्रथम स्वर्गात होता आणि इन्द्रादी देव पथ्वीवर होते. देवांच्यासाठी गायत्री स्तोम स्वर्गातून प्रथ्वीवर घेऊन येत होती, परंतु वाटेत विश्वावसु गन्भर्वाने सोम तिच्यापासून हिसकावून घेतला होता. तेव्ह्या देवांनी गन घर्वाना पाहिजे असलेली वाग्देवता त्यांना दिळी आणि ति'च्या बदल्यात गन्घर्वांपासून सोमा'ची प्राप्ती करून घेतली. हिलेब्रांट यांच्या मते ह्या पुराणकथेला यागात विधीचे स्वरूप दिले आहे. सोमविक्रय करणारा सामान्य विक्रेता नसून तो गन्घर्वाचे प्रतिनिधित्व करतो. हा सोमक्रयाचा विधी लोकनाठ्याच्या स्वरूपाचा आहे, कारण त्यात मारपीट करून हुसकावून १३ आपस्तम्बश्रीतसत्र, १०.२०.१२ ते १०.२७,८; कात्यायनश्रौतसूत्र, ७.६.१ ते ७.८.२५. ४४ नाट्यशास्त्र लावण्याचा प्रकार आहे इत्यादी विवेचन त्यांनी केळे आहे. ** महात्रतावाधि त्याचप्रमाणे गवामयन सत्राच्या वर्णनात महात्रत नावाच्या विधींचे वर्णन आहे. _ सत्राच्या उपान्त्य दिवशी हा विधी करावयाचा असतो. त्या प्रसंगी अनेक प्रकारची वाद्ये सिद्ध केळी जातात आणि एक झोपाळा तयार केला जातो. तेव्हा एक पुंश्वळी आणि एक ब्रह्मचारी एकमेकाला टाकून बोलतात. त्यानंतर एक शूद्र आणि एक आर्य एक आुभ्र गोला- कती 'चामडे स्पर्धेने स्वतःकडे खेचण्या'चा प्रयत्न करतात; त्यात शेवटी आर्यांचा विजय होतो. नंतर मार्जाळीय वेदीच्या दक्षिणेस मैथुन होते.) महात्रताच्या ह्या विधीत पुरातन नाट्यमय धार्मिक विधींचे दर्रीन होते असे प्रतिपादन केले गेले आहे. पुंश्रलळी आणि ब्रह्म- चारी यांचे एकमेकाला गालिप्रदान आणि नंतर होणारे मैथुन यात एक प्रकारचा 7770 2 प्रजननक्षमता उत्पन्न करणारा विधी आहे, तसेच झुन्न गोलाकृती चम म्हणजे सूय, शुद्र म्हणजे अन्धकार, आर्य म्हणजे प्रकाश आणि त्या दोघांच्या स्पर्धेत आर्याचा होणारा विजय म्हणजे प्रकाशाची अन्धकारावर होणारी मात, या घटनेवर आधारलेले धार्मिक नाटयही ह्या विधीत अन्तर्भूत आहे असे प्रतिपादन कीथ यांनी केळे आहे. ' ' या व अशा प्रकारच्या धार्मिक नाठ्यातून'च संस्कृत नाटकांची उत्पत्ती झाली असे त्यांचे मत आहे. महात्रत विधीत निर्दिष्ट झालेला ब्रह्मचारी किंवा काही प्रमाणात सोमविक्रय करणारा शू हे संस्कृत नाट- कांतीळ विदूषकाचे मूळ होत असे म्हणून अर्वाच्य शिव्या देणाऱ्या ब्रह्मचाऱ्याशी सादृश्य दाखविण्यासाठी विदूषक शब्दाचा गालिप्रदान करणारा असा अर्थ त्यांनी केला आहे.“ परंतु वैदिक कर्मकाण्डातीळ काही विधींत उत्तरकालीन संस्कृत नाटकांचे मूळ शोध- ण्याचे हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत असे म्हणता येत नाही. सोमक्रयाच्या विधीत एक प्रकारचे नाट्य आहे हे मान्य करावयास हरकत नाही. आणि ' तो विधी एका पुराण- कथेवर आधारलेला आहे हेही शक्‍य मानता येईल. पण हिलेब्रांट यांनीच म्हटल्याप्रमाणे तो विधी लोकनाठ्याच्या स्वरूपाचा आहे. याचा अर्थ असा होतो की यज्ञयागातील विधीशी कोणत्याही प्रकारे संबद्ध नसळेळे असे एक प्रकारचे नाटय त्या वेळी सामान्य लोकांत प्रच- १४ ५. पाळता, रवव १४॥॥/०१०४72, ८2फल८ &प18४6, 1 3816 (725167, 1927), 0. 247-256. १५ पुंश्रटूब्रक्मचारिणावन्योन्यमाक्षिपतः । श्रद्रायौ चर्मणि परिमण्डले व्यायच्छेते । मार्जालीयं _ दक्षिणेन मिथुन संभवति । -कात्यायनश्रौतसत्र, ११.३.६-८. तसेच शाड्खायनश्रौत- सूत्र, १७,९.२. १६ $$. 8. रेला, 172 व ाककाड (07101, 1924), 0. 24-25. १७७ 707., 19- 39. न उपोद्ात ४" ठित होते, आणि त्यातीलच एका प्रसंगाच्या अनुकरणाने सोमक्रयाच्या विधीचे स्वरूप निश्चित करण्यात आले. पण तसे असेल तर नंतरच्या संस्कृत नाटकांचे मूळ कोणत्याही धार्मिक विधीत न शोधता ळोकनाट्यातच ते शोधणे अधिक सयुक्तिक होईल. सोमक्रया'च्या विधीप्रमाणेच महात्रताच्या विधीतही एक प्रकारचे नाट्य आहे. मैथुनाच्या निर्देशावरून असे दिसते की कीथ म्हणतात त्याप्रमाणे मुळात हा एक प्रकारचा /०८५॥॥७ 7८ असावा. परंतु त्यात जो नाठ्याचा अंश प्रतीत होतो त्याच्याशी संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीचा संबंध जोडणे योग्य वाटत नाही. संस्कृत नाटकांतील विदूषकाचे मूळ ठोकनाट्यात आहे हे हिले- ब्रांट यांचे मत कीथना अनावश्यक आणि अयोग्य वाटते, कारण लोकनाट्य त्यावेळी अस्ति- त्वात होते याला काही प्रमाण नाही असे त्यांचे मत आहे.१ परंतु त्यांनी जोडलेला विदू- घका'चा ब्रह्मचाऱ्याशी संबंध त्यापेक्षाही अधिक संशयास्पद आहे. विदूषक शब्दाचा गालि- प्रदान करणारा असा अर्थ मुळीच प्रसिद्ध नाही. आणि विदूषकाची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यांत गालिप्रदान करण्याच्या प्रवृत्तींचा समावेश नाही. जाह्मणांचे अतिरंजित स्वरू- पात विडंबन करणाऱ्या ह्या पात्राचे मूळ वैदिक कर्मकाण्डात असण्याचा संभव फार अल्प आहे. याउलट असे विडंबन मुळातच ळोकनाठ्यात केले गेळे असण्याचा दाट संभव आहे. तेव्हा ह्या वैदिक विधींपासून स्फूती मिळून संस्कृत नाटकांच्या निर्मितीस प्रारम्भ झाला असे समजण्यापेक्षा त्या वेळी प्रचळित असलेल्या लोकनाठ्याचा या विधींवर प्रभाव पडळा आहे असे समजणेच अधिक उचित होईल 'नट' शब्दाचा अर्थ वैदिक युगात लोकनाट्य प्रचलित होते याळा काही प्रमाण नाही असे कीथ यांनी म्हटले आहे त्याचे कारण वैदिक वाडूमयात नट किंवा नाट्य हे शब्द आढळत नाहीत. पण नट शब्द आढळत नसला तरी त्याच्याशी समानार्थक असलेला शेळूष शब्द तेथे आढळतो, यजुर्वेदातीळ पुरुषमेधाच्या वर्णनात इतर अनेक शिल्पी आणि कलाकार यांच्या समवेत रैळूषाचा निर्देश केळा आहे. !* शेळूष शब्द नटा'चा वाचक आहे. तैत्तिरीय ब्राह्मणावर भाष्य करताना सायणाचचारयांनी म्हटले आहे की शेळूष आपल्या स्त्रियांच्या अनाचाराने उपजीविका प्राप्त करतात. नटांना जायाजीव म्हणजे पत्नीवर जगणारे अशी संज्ञा दिली गेली आहे हे प्रसिद्ध आहे. तेव्हा वैदिक युगात शेळूष या नावाने नटांचे अस्तित्व मान्य करण्यास प्रत्यवाय असू नये. तथापि कीथ यांना शेळूष शब्दाचा ८८7०” म्हणजे पाठ्यासह्वित अभिनय करणारा नट हा अर्थ मान्य नाही. त्यांच्या मते त्या शब्दाचा १८ ॥ांब., 5. 50-51. १९ वाजसनेयिसंहिता, ३०.४; तैत्तिरीय ब्राह्मण, ३.४.२. द्द नाट्यशास्त्र वादक (८८यंवा2) किंवा नर्तक (बव्थ) एवढाच अर्थ समजणे पर्याप्त आहे. * परतु शौळूष शाब्दाचे हे अर्थ मुळीच प्रसिद्ध नाहीत. त्याचा नट असाच अर्थ प्रसिद्ध आहे. वैदिक युगात नटे नव्हते असे मानले तर त्यानंतर थोड्याच अवधीत लिहिलेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायीतील नट, त्यांची कळा आणि शास्र यांच्या निर्देशाची नीट उपपत्ती लागणार नाही. ठिळालिन्‌ आणि कृशास्र द्या आप्चार्यांनी लिहिलेल्या नटसूत्रांचे अध्ययन करणारांना अनुक्रमे होळाळिन्‌ आणि कृशाश्विन्‌ अशा संज्ञा असल्याचे तेथे म्हटले आहे." ह्या नटसूत्रांत नटांना त्यांच्या व्यवसायाचे शिक्षण देणारे शास्त्र प्रथित झाले होते असे मानणे आवर्यक आहे. नटाचा धर्म किंवा नटा'चा आम्नाय या अर्थी नाट्य शब्द नट शब्दाला *य' प्रत्यय लागून सिद्ध होतो असा नियम दिला आहे." तेव्हा पाणिनीच्या वेळी नेटांच्या कलेचे शास्र बनले होते, त्या शास्त्रावर काही आचार्यांनी सूत्रबद्ध ग्रंथ लिहिळे होते आणि त्या ग्रंथांचे अध्ययन होत असे याविषयी संशय घेता येण्यासारखा नाही. यावरून नट व त्यांची कला ही पाणिनीच्या बरी'च वर्षे अगोदर म्हणजे वैदिक युगाच्या उत्तरार्धात अस्तित्वात होती असे मान्य करणे आवश्यक ठरते. सामान्यपणे नट म्हणजे 70” पाठ्यासहित अभिनय करणारा असा अर्थ करावयास हरकत नाही. परंतु कीथ यांच्या मते अष्टाध्यायीत नट म्हणजे छकयालाय€ म्हणजे पाठ्यरहित मूक अभिनय कर" णारा एवढाच अर्थ अभिप्रेत आहे.** आश्चर्याची गोष्ट अशी की पतञ्जलीच्या महाभाष्यात नट म्हणजे ८८०” असा अर्थ आहे हे त्यांना मान्य आहे." यावरून पाणिनि आणि पतऊजळि यांच्या दरम्यानच्या काळात नटांच्या कलेच्या स्वरूपात महत्त्वाचा बदळ घडून आठा होता असा त्यांच्या मताचा निष्कर्ष निघतो. परंतु असे काही घडले असेळ असे मानण्यास काही आधार नाही. खरी गोष्ट अशी आहे की प्राचीन भारतात »८1०॥ए८ अथवा मूकामिनयाची कळा अस्तित्वात होती असे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. लोकनाठ्याच्या स्वरूपात सुद्धा नाव्याचे अस्तित्व मान्य न करण्याच्या आग्रही भूमिकेमुळे नट शब्दाचा असा अपरिचित अर्थ स्वीकारला गेळा आहे असे दिसते. . अष्टाध्यायीत नटाब्यतिरिक्त नर्तकाचाही निर्देश आहे. त्यावरून तृत्यकला ही नटाच्या कलेहून म्हणजे नाट्याहून मिन्न होती हे उघड होते. त्याचप्रमाणे त्या दोघांहून भिन्न अदा गायन नावाच्या कलाकाराचा निर्देश आहे. केवळ गीत गाणाऱ्या ह्या कलाकाराहून नट मिन्न आहे. तथापि, महाभाष्यातीळ एका निर्देशावरून असे दिसते की नट प्रसंगविशेषी २० ॥७ाब., 0. 25. २१ पाराशर्यशिलालिभ्यां मिक्षुनटसूञ्र्‍योः | ४.३.११० । कर्मन्दकशाश्धादिनिः । ४.३.१११. २२ छन्दोगौविथकयाशिकबहूवृचनटाऊञ्यः । ४.२.१२९, २३ या, 00. ९१., 0. 31. २४ 10६०., 0. 49. उपोद्धात ४७ गात सुद्धा असे. २.४.७७ ह्या पाणिनीच्या सूत्राबरीळ भाष्यात 'अगासीननट: (नटाने गीत गायिले) असे एक उदाहरण दिळे आहे. पण यावरून नट आणि गायन हे एकच होत असे समजणे बरोबर होणार नाही. कारण तसे असते तर नट आणि गायन अशा दोन भिन्न तज्ञांचा अष्टाव्यायीत निर्देश झाळा नसता. नटांच्या कळेचा आविष्कार रंग भूमीवर होत असे हे महाभाष्यावरून स्पष्ट आहे. अष्टाध्यायीतीळ १,४.२९ ह्या सूत्रावर भाष्य करताना पतञ्जळीने म्हटले आहे 'उपयोगे इति किमर्थम्‌ । नटस्य शुणोति ग्रन्थिकस्य शुणोति.... आतश्वोंपयोगो यदारम्मका रड गच्छन्ति नटस्य श्रोष्यामो ग्रन्थिकस्य श्र ष्याम इति ॥' नट आणि प्रन्थिक यांच्या श्रव्य कळेचे दर्शन रंगभूमीवर होत असे आणि ते ऐकण्या व पहाण्या- साठी लोकसमुदाय जात असे अशी महाभाष्याच्या काळची परिस्थिती नाकारता येणार नाहो. महाभाष्य व नाट्य प्रन्थिकांचा निर्देश महाभाष्यात दुसर्‍याही एके ठिकाणी केला आहे. प्रस्तुत संदर्भात महाभाष्यातील तेथीळ विवरणाचा अधिक विचार करणे आवद्यक आहे. अष्टाध्यायीतीळ २.१.२६ ह्या सूत्रावर भाष्य करताना वार्तसिकांच्या आधारे प्रयोजकाच्या रूपाचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी 'कंसं घातयति' म्हणजे 'कंसंवधमाचष्टे (कसवधा'चा वृत्तान्त सांगतो), 'बलिं बन्घर्याते' म्हणजे बळिबन्थनाचा वृत्तान्त सांगतो, 'उज्जयिन्या: प्रस्थितो माहिष्मत्यां सूर्यमुद्ठमयति' म्हणजे उळयिनीहून निघून माहिष्मतीला सूर्योदया'च्या वेळेस पोचतो (सूर्य- सुद्ठमरयांते म्हणजे सूर्योद्रमनं संभावयते) अशी उदाहरणे दिळी आहेत. त्यांतील क्रियापदांच्या वतैमानकाळी ख्पांबद्दळ पतञ्जलीने पुढीळय़रमाणे विवेचन केळे आहे- “भवेदिह वर्तमान- कालता.... सूर्यमुह्ठमयतीति तत्रस्थस्य हि तस्यादित्य उदेति । इह तु कथं व्तमानकालता कंसं पातर्याते बळिं बन्बयतीति चिरहते केसे चिरबद्धे च बलळौ। अत्नापि युक्ता । कथम्‌ । ये तावदेते शोभनिका नाम एते प्रत्यक्षं कंसं घातयन्ति प्रत्यक्षं | च बळिं बन्धयन्तीति | चित्रेषु कथम्‌ । चित्रेष्वप्युद्ीर्णा निपतिताश्व प्रहारा इब्यन्ते केसकषेण्यश्च । प्रन्थिकेषु कथं यत्र शब्दगडुमात्रं लक्ष्यते । ते$पि हि तेषासुत्पत्तिप्रभति आविनाशाद्द्रीरन्यांचक्षाणा: सतो बुद्धिविषयान्‌ प्रकाशयन्ति। आतश्व सतो व्यामिश्रा हि दृब्यन्ते । केचित्कंसभक्ता भवन्ति केचिद्टासुदेवभक्ता:। वर्णान्यत्वं खरवपि पुष्यन्ति । केचिद्रक्तमुखा भवन्ति केचित्कालमुखा:। ! स्यूडर्स यांनी ह्या उताऱ्याचा विशेष अभ्यास करून “2272 5०८७॥८८१७' नावाचा प्रबंध ठिहिळा. हा प्रबंध पहावयाळा मिळाळा नाही. परंतु कीथ आणि कोनोौ यांनीं आपल्या ग्रंथांत केलेल्या निर्देशानुसार असे दिसते की स्यूडसेच्या मते नट मूक अमिनयद्वारा अथवा पडदयावर पडणार्‍या त्यांच्या छायांच्या द्वारा कंस अथवा बळीची कथा प्रस्तुत करीत आणि शोभिक (किंवा शोभनिक) ती कथा प्रेक्षकांना समजावून सांगत. त्याचप्रमाणे चित्रकार आपल्या ४८ नाटयरास्त्र कंसवधविषयक अथवा बलिबन्धनविषयक चित्रांतील कथा प्रेक्षकांना समजावून सांगत. "* अशा प्रकारचा अर्थ करण्याचे कारण असे दिसते की मुळात पतञ्जलीने “घातयति' आणि 'बन्धयति' या शाब्दांचे अर्थ “वघमाचटटे', 'बन्धमा'चष्टे' असे केले होते, तेव्हा ह्या उताऱ्यातील व्या शब्दांचे तेच अर्थ स्वीकारणे आवश्‍यक मानले आहे. यास्तव शोभनिक आणि चित्रकार यांना कथन करणाराची भूमिका दिली आहे. परंतु हे मत प्राह्य वाटत नाही. प्तञ्जलीने “त्यक्षं घातयन्ति' अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला आहे. जर “घातयन्ति' चा * वधमा'चक्षते' असा अर्थ स्वीकारला तर प्रत्यक्षम' शब्दाच्या अर्थाचे काही महत्त्व उरणार नाही. ह्या क्रियापदांतीळ प्रयोजका'च्या ख्पामुळे वधादि क्रिया शोभनिक स्वतः न करता इतराकडून करवून घेत हे मान्य होण्यासारखे आहे. परंतु द्या क्रिया केवळ मूक अभिनयाच्या द्वारा अथवा पडद्यावरील छायांच्या द्वारा दाखविल्या जात असे समजण्याचे कारण दिसत नाही. शोभनिक हे सूत्रधारसडश होत असे समजता येईल. चित्रविषयक विवरणात पतञ्जळीने कंसा'चा वध होत असल्याच्या दृश्याचा निर्देश केला आहे. तेथे 'घातयति' यातीळ प्रयोजकाचा अर्थ सुद्धा लागू पडण्यासारखा नाही असे दिसते. तद्वतच शोभनिकांच्या संबंधातही प्रयोजकाचा अथे अभिप्रेत नाही असे समजले तर शोभनिक म्हणजे नटच असे मानता येईळ, चित्रकारांच्या बाबतीत तरी महाभाष्यातील शब्दांवरून ते स्वतः आपल्या चित्रांतील कथा प्रेक्षकांना समजावून सांगत असा निष्कर्ष निघत नाही. ग्रन्थिकांच्या वर्णनावरून असे दिसते की ते पुराणकथा सांगणाऱ्या पौराणिकांप्रमाणे असावेत. लिखित प्रन्यावर्न कथेचे वाचन करीत असल्यामुळे त्यांना प्रन्थिक हे नाव पडले असावे. परंतु त्यांच्यात काही कसभक्त असत व काही वासुदेवभक्त असत, काहींची तोंडे लाळ रंगविलेली असत तर काहींची काळी है निदेश बुचकळ्यात पाडणारे आहेत. एकाच वेळेस अनेक ग्रन्थिक रंगभूमीवर येत, त्यांपैकी काही कृष्णाची बाजू मांडीत तर इतर कंसाच्या पराक्रमाचे वणन करीत आणि हे दोन पक्ष स्पष्ट करण्यासाठी म्रन्थिक आपल्या मुखांना भिन्न भिन्न रंग लावून येत अशा प्रकारचे कथानिरूपण कधी काळी कोठे प्रचलित असल्याचे प्रसिद्ध नाही. नाव्यशास्त्रातीळ वर्णनाप्रमाणे नट भूमिकेला अनुरूप असा रंग अंगाळा लावतात. दोन मिन्न पक्षात विभागणी आणि मुखाला लावलेला रंग या गोष्टींमुळे ग्रन्यिक ऐौराणिकापेक्षा नटासारखे अधिक असल्यासारखे वाटतात. छायानाट्य त्यूडर्स यांच्या विवेचनाचा निष्कषे असा दिंसतो की पतञ्जलीच्या वेळी वाड्मय- रूपात संस्कृत नाटके लिहिण्यास प्रारम्म झाला होता असे म्हणता येण्यासारखे नाही. त्या वेळी नाट्य विद्यमान होते हे त्यांना मान्य आहे. पण हे नाठ्य फक्त मूकनाठ्या'च्या स्वरू. १५ हांगा, ०0७. हॉक. ७. 33-35; डॉल णार, 17) जवळा काय (छेडपय ६0 थाड, 1220 ) ३ 100. 44-45. उपोद्धात ४९ पाचे अथवा छायानाट्याच्या स्वरूपाचे होते असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु प्राचीन काळी भारतात बूकनाठ्य अथवा छायानाटय प्रचलित होते असे म्हणण्याळा काही आधार नाही. महाभाष्यातीळ “नटस्य शूणोति, नटस्य श्रोष्यामः! ह्या वच नावरून हे स्पष्ट आहे की नट केवळ मूक अमिनय करीत हे मत स्वीकारणे शक्‍य नाही. छायानाटयाची ल्यूडर्सनी केलेली सूचना अधिक संभाव्य मानून कोनौ यांनी ती उचळून धरण्याचा प्रयत्न केला आहे. पड- दावर पडणाऱ्या छायांच्या द्वारा प्रस्तुत केळे जाणारे नाऱ्य महाभारताळा परिचित आहे आणि थेरीगाथातीळ 'रुप्परूपक' शब्द छायानाठ्याचा निदर्शक आहे ह्या पिशेल यांच्या मताचा निर्देश करून कोनौ यांनी असे प्रतिपादन केले आहे की अशोकाच्या शिळाळेखा- तीळ 'रूप'दरशन वस्तुतः छायादर्शनच होय, तसेच कोटिळीय अर्थशास्त्रातील 'रूपाजीव' शब्दाचा छायानाठ्य प्रस्तुत करणारा असा अर्थ असावा. सीतानेंगा गुहेचा उपयोग छाया- नाव्यासाठी होत असे या मताचा पुरस्कार करून त्यांनी नेपथ्य शब्दाची एक निराळी व्यु- पत्ती सुचविली आहे. अष्टाध्यायी ३.३.६४ मध्ये निर्दिष्ट 'नेपठ' किंवा “निपाठ! शब्दापासून पाठ्य करण्याचे स्थान या अर्थी नैपाठ्य असा शब्द बनला, त्याचे णेवच्छ असे प्राकृत रूप होऊन त्या ख्पाच्या पुनःसंस्क्ृतीकरणाने नेपथ्य शब्द सिद्ध झाला असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते छायानाट्यातीळ पाठ्यसुद्धा नेपथ्यगृहात म्हणजे प्रडद्याच्या पाठीमागेच होत होते असे समजावे लागते. शेवटी पिशेळ यांनी रूप, रूपक हे शब्द छायानाटयाचे निद- शेक असल्याचे म्हटले होते ते ग्राह्य ठरवून कोनौ यांनी संस्कृत नाट्याच्या प्रकारांसाठी वापरलेली रूपक ही संज्ञा मुळात त्या शब्दांशी संबद्ध अथवा एकरूप असल्याचे म्हटले आहे.*६ परंतु हे सर्वे प्रतिपादन निर्मूळ आहे असे प्रतीत होते. थेरीगाथातीठ रुपरूपक शब्द किंवा अशोकाच्या शिळालेखातीळ रूप शब्द छायानाट्याशी संबद्ध आहे असे मानण्यास काहीही आधार नाही. कौटिलीय अर्थशास्त्रात रूपाजीवा असा स्त्रीलिंगी शाब्द असून त्याचा अर्थ वेश्या हा आहे. त्यातीळ रूप शब्दाचा कोणत्याही प्रकारच्या नाट्याशी संबंध नाही. सीताबेंगा गुहेसंबंधी विवेचन पुढे केळे आहे. येथे एवढे सांगितले तर पुरे को छायानाट्याचे प्रयोग त्या गुहेत होत असत अश्या तऱ्हेचे मत स्वीकारता येण्यासारखे नाहो. नेपथ्य शब्दाची सामान्यपणे केळी जाणारी व्युसत्ती (नि-- पथ पासून 'जेथून मार्ग खाली जातो ती जागा!) संदेहमुक्त नाही हे खरे आहे. तथापि त्या शब्दाची कोनो यांनी सुचविलेली व्युत्पत्ती त्यापेक्षाही अधिक अग्राह्य वाटते. नेपथ्यगृह्यचा उपयोग वेषभूषा परिधान करण्यासाठी करावयास सांगितळा आहे. त्याचा पाठ्यासाठी उपयोग करावयास कोठेही सांगितलेले नाही. आणि छायानाट्यात केवळ नटच पडद्याच्या आत असत असे २६ 58. इा०फ, 2८ काळट /)/.७८, 9. 45-46; 8150 9, 4. ७० | नाट्यशास्त्र क नाही तर पाठ्याने प्रेक्षकांना कथा समजावून सांगणारे निवेदक सुद्धा पडद्याच्या आत असत ही कल्पना कोणत्याही तऱ्हेने पटण्यासारखी नाही. शेवटी नाटकप्रकारांचा निर्देश करण्यासाठी वापरलेल्या ख्पक शब्दाचा छायानाट्याशी काही संबध आहे असे दाखविणारा कोणताही पुरावा नाही ही गोष्ट स्पष्ट केळी पाहिजे. नाट्यविषयक ग्रंथ मूकनाट्य किंवा छायानाठ्य यांचे अस्तित्व सिद्ध करण्याचे प्रयत्न सफळ झाले आहेत असे म्हणता येत नाही. परंतु ते सफळ झाळे आहेत असे मानळे तरी त्यामुळे पाठ्ययुक्त संस्कृत नाठ्याचे इतर स्वरूपात अस्तित्व नाकारणे आवरयक आहे असे समज- ण्याचे कारण नाही. पाणिनीने निर्दिष्ट केळेळी शिळालिन्‌ आणि कृश्याश्र या आचार्यांची नटसूत्रे आज उपलब्ध नाहीत. तथापि, त्यांतील विषयांची आणि विवेचनपद्धतीची काहीशी कल्पना भरताच्या नाट्यशास्त्रावरून येण्यासारखी आहे. हा ग्रंथ स्वतंत्र नाही, संकलनात्मक स्वरूपाचा आहे हे त्यात अनेक ठिकाणी उद्भुत केलेल्या आनुवंशिक किंबा परंपरेने आलेल्या व॒नटांनी करावयाच्या अभिनयाचे विवरण करणाऱ्या छोकांवरून स्पष्ट आहे. नटांचा अभिनय, पाठ्य इत्यादी जो विशिष्ट व्यापार त्यासंबंधीची परंपरा पाणिनिनिर्दिष्ट नटसत्रां- पासून सुरू झाली असे समजण्यास काहीही प्रत्यवाय नाही, तेव्हा त्या नटसूत्रांत अभिनय पाठ्य इत्यादीचे विवेचन प्राय: नाव्यशास्त्रातल्याप्रमाणेच केलेळे असणार असे म्हटले तर त चूक होणार नाही. त्याचप्रमाणे अभिनयादी नठव्यापाराचा ज्या पद्धतीचा आविष्कार "रंगमंचावर प्रेक्षकांच्या डोळ्यांदेखत - नाव्यशास्त्रात अभिप्रेत आहे त्याच पद्धतीचा तो प्राचीन नटसूत्रांतही अभिप्रेत होता असे समजण्यास काही हरकत दिसत नाही. वाडय़याचा प्रारस्भ या संबंधात आणखी एका गोष्टीचा निर्देश करणे आवश्यक आहे. पाणिनिपतञजलींच्या काळी विदग्ध संस्कृत वाड्मय निर्माण होऊ लागले होते. 'अधिकृत्य कृते प्रन्ये (४.३ ८७) ह्या पाणिनोच्या सूत्रावरीळ एका वात्तिकात कात्यायनाने आख्यायिका नावाच्या वाड्मयप्रकाराचा निदेश केला आहे. त्या प्रकाराची पतञ्जलीने वासवदत्ता सुमनोत्तरा आणि भैमरथी अशी तीन उदाहरणे दिली आहेत. त्यानंतरच्या सूत्रात पाणिनीने शिझुक्रन्दीय, यमसभीय इन्द्रजननीय इत्यादी ग्रंथांची नावे बनविण्याविषयीचा नियम दिला आहे. इतरत्र त्याने आख्यान नावाच्या कसाधरकाराचा आण शोक व गाथा यांत रचना करणाऱ्यांचा निर्देश केला आहे. यावरून असे म्हणता येते की कथात्मक स्वरूपाच्या विद्ग्ध संस्कृत वाड़मयाच्या निर्मितीला त्या काळी प्रारम्भ झाला हाता. परतु त्याचवेळी संस्कृत नाटके लिहिण्यासही प्रारम्भ झाळा होता असे मात्र म्हणता येण्यासारखे नाही. पाणिनीला रूपक, नाटक, प्रकरण इत्यादी शब्द अवगत नाहीत हे मान्य केलेच पाहिजे उपोद्घात "५१ ळोकनाट्य ग प्र्न असा उपस्थित होतो की पाणिनीने निर्दिष्ट केलेल्या नटसूत्रांचा उपयोग कोणत्या नाट्याच्या संदर्भात होत असावा? या संबंधात हिलेब्रांट यांच्या मताचा उष्लेख करणे उचित होईल, त्यांच्या मते धार्मिक विधीशी संबद्ध नसळेळे आणि सामान्य लोकांच्या मनोरंजनाचे साधन म्हणून असळेळे एक प्रकारचे नाठ्य भारतात प्राचीन काठापासून प्रच- ठित होते. याळा ळोकनाठ्य असे म्हणता येईल, कोनौ यांनी निर्दिष्ट केलेल्या हिलेब्रांट _ यांच्या मतानुसार उत्तरकालीन संस्क्रत नाटकांतीळ अनेक वैशिष्ट्यांचे मूळ ह्या ळोकनाट्यात आहे. प्रारंभीचा सूत्रधार आणि नटी किंवा सूत्रधार आणि पारिपाश्वक यांच्यातील संवाद, पात्रानुसार भाषेच्या झुद्ध आणि अथ्नुद्ध रूपांचा मिश्र उपयोग, गद्य आणि पद्य यांचे मिश्रण, विदूषक ह्या पात्राची योजना इत्यादी संस्कृत नाटकातीळ गोष्टी लोकनाठ्यातून आल्या आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. कोनौ यांना सुद्धा हे मत मान्य आहे.२५ हे जे नाट्य प्रचलित होते त्याच्या प्रवर्तकांना पाणिनिनिर्दिष्ट नटसूत्रांचा उपयोग होण्यासारखा होता असे म्हणा- बैयास काही हरकत दिसत नाही. अर्थात कोनो यांनी पुरती जोडली आहे त्याप्रमाणे हे लोकनाट्य म्हणजे संस्कृत नाटक नाही, आणि संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीस लोकनाट्या- प्रमाणेच इतरही काही गोष्टी साहाय्यभूत झाल्या आहेत. परंतु ही विचारसरणी कीथ यांना मान्य नाही. त्यांच्या मते लोकनाट्याचे अस्तित्व _सिद् करण्यास पुरेसा पुरावा नाही. निश्चित स्वरूपाचा असा याविषयीचा पुरावा उपलब्ध नाही हे खरे आहे. तथापे, हे लक्षात ठेवले पाहिजे की वैदिक साहित्यात सामान्य लोकांचे जीवन प्रतिबिंबित झालेले क्वचितच दिसते. त्यात मुख्यत: उच्चवर्णीय आर्य लोकांच्या याग- प्रवान धर्माचा आणि त्यांच्याच आचारविचारांचा आविष्कार झाला आहे. परंतु ह्या धर्माचे जाचरण आणि ह्या आचारविचारांचे पाठन समाजाच्या सर्वे थरांत प्रसृत झाले होते असे म्हणता येण्यासारखे नाही. किंबहुना, सामान्य लोकात प्रचळ्ति असलेल्या धर्माचे स्वरूप पागप्रधान धर्महून बहुतांशी मित्न होते असेच समजाजे ळागते. निरनिराळ्या देवतांची पूजा करणे, ठरलेल्या वेळी त्या देवतांचे उत्सव साजरे करणे व यात्रा भरविणे असे त्या धर्माचे स्थूळ स्वरूप होते असे म्हणावयास हरकत नाही. धर्माशी साक्षात संबंध नसलेल्या कौरि- ळीय अ्थशास्षासारख्या ग्रंथात देवतांची पूजा, त्यांच्या संबंधात होणाऱ्या यात्रा, उत्सव इत्यादींचे अनेक उल्लेख आहेत. २८ हे सर्वमान्य आहे की आर्य ढोक भारतात आले त्या वेळी दविड आणि इतर वंशांतील लोक येथे अगोदरपासूनच स्थायी झालेले होते. कालान्तराने २७ ॥यार्फ, ळू. ट्य., ए- 44. | २८ शिववैश्रवणाश्रिश्रीमदिरागह्माणि । - को. अ. २.४.१७; संकर्षेणदेवतीय: | - को. अ., १२३.२.५४; देवतेज्यायां यात्रायाम्‌ । - कौ. अ. १ २.५.१५ यात्रासमाजोत्सवप्रहवणानि | - कौ. अ., १.२१.२८: इत्यादी. क्ल नाट्यशास्त्र आर्य, द्रविड आदी सर्वांचा मिळून एक समाज बनल्यानंतर सुद्धा धर्माच्या बाबतीत एक- रूपता प्रस्थापित झाली नाही. चैदिक धर्माचे स्वरूपच असे होते की त्याचा सर्वसामान्य जनतेत प्रसार होणे असंभाव्य होते. तेव्हा बहुसंख्य आर्येतर जमातींचे धर्माच्या बाबतीतील आचारविनार पूर्वापार चाळत आले होते तसेच चाळू राहावेत हे स्वाभाविक होते. आणि जी गोष्ट धर्माची तीच लोकांच्या मनोरंजनाच्या प्रकारांची. विशेषतः देवतांच्या यात्रा, उत्सव _ आदी प्रसंगी होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम पूर्वापार चाळत आले असले पाहिजेत हे उघड आहे आणि ह्या मनोरंजनाच्या विविध प्रकारांत नाठ्याचा समावेश होत असावा असे सहज मानता येण्यासारखे आहे. या सर्व गोष्टींचा बैदिक ब तत्संबद्ध वाड्मयात साक्षात निदेश नाही. पण यावरून त्यांचे अस्तित्व नाकारणे सयुक्तिक होणार नाही. नाटय प्रस्तुत करणाऱ्या नटांचे संध यात्रा, उत्सव आदी प्रसंगी जमणाऱ्या लोकांच्या समुदायापुढे आपल्या कलेचे प्रदरीन करण्यासाठी एका गावाहून दुसर्‍या गावी याप्रमाणे फिरत असत असे एका जातककथेवरून दिसते. कणवेरजातकात सामा (श्यामा) नावा'ची गणिका आपल्या प्रियतमा'च्या शोधार्थ नटांच्या कडे जाते, कारण ते सगळीकडे हिंडत असतात, असे कोणतेही ठिकाण नाही की जेथे ते जात नाहीत. ते जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांनी प्रथम तिच्या प्रियकराला उद्देशून रचलेली एक गाथा म्हणावी अशी ती त्यांना विनंती करते. हे हिंडणाफिरणारे नट सामान्य लोकांच्या मनोरंजनासाठी जे नाटय प्रस्तुत करीत ते लोकनाट्याच्या स्वरूपाचे असण्याचाच संभव आहे. आणि ह्याच लोकनाट्याचा प्रमाब वैदिक कर्मकाण्डातीळ काही विधींवर पडला आहे असे जे हिलेब्रांट यांचे मत आहे तेचच अधिक सयुक्तिक वाटते. एखाद्या वस्तूच्या किमतीबद्दद झगडा उत्पन्न करून मारपीट करून विक्रेत्याला हुसकावून लावणे, नह्मचारी आणि वेश्या यांचे परस्परांना गालिप्रदान इत्यादी गोष्टी मूलतः लोकनाट्यातच प्रचलित असून तेथूनच त्यांचे वैदिक बिधींत संक्रमण केले गेळे आहे ही कल्पनाच अधिक प्राद्य वाटण्यासारखी आहे. बौद्ध वाड्मयात आढळणाऱ्या नाठ्यप्रयोगाविषयीच्या आणखी काही उल्लेखांचा पुढे निर्देश 'केळा आहे. त्यांत प्रयोग करणारे नटाचार्य व नटसंघ दक्षिण देशातून आलेले किंवा दक्षिणदेशीय सूत्रधार व नट होते असे म्हटले आहे. दक्षिण देशाचा निर्देश या संदर्भात सूचक समजता येईल. त्या प्रदेशात प्राधान्येकरून आर्येतर जमातींची वस्ती होती. तेव्हा तेथीळ नटसंध उत्तरेकडे जात यावरून असे अनुमान केले की नाठ्याची ही कला दक्षिणेत विकसित झाली होती व तिला सुरुवातीस आर्येतर लोकांचा २९ (सामा) नटे पक्कोपापेत्वा... 'तुम्हाणं अगमनट्टानं नाम न!त्थि, तुम्हे गामनिगमराज- घानियो गन्त्वा समज्जमंडळे पठमं एव इमं गाथं गायेय्याथा'ति। -४-« 7०॥५७/४॥, ॥॥2 गळाळाळा, एग. 3 (.०पतगा, 1883) , 00. 61-62. उपोद्धात "१३ आश्रय होता तर ते चूक ठरू नये. हे संभाव्य मानले तर ळोकनाऱ्याविषयीच्या उपयुक्त विधानांना बळकटी येण्यासारखी आहे. लोकनाट्याचे प्राचीन काळी अस्तित्व कीथ यांना मान्य नाही. तथापि, प्रहसन आणि भाण या नाट्यप्रकारांचा विचार करताना त्यांनी ते सामान्य लोकांत उद्भवळे असावेत असे म्हटळे आहे.) * त्याचप्रमाणे पूर्वरूझमबद्दळ त्यांनी असे उद्गार काढले आहेत की तो एक सामान्य लोकात प्रचलित असलेला धार्मिक विधि आहे.३१ यावरून त्यांनी लोकनाट्या'चे अस्तित्व अप्रत्यक्षपणे मान्य केळे आहे असे दिसते. मग त्यांनी हिलेब्रांट यांचे मत खोडून काढण्या'चा प्रयत्न का करावा ते सहज लक्षात येत नाही. पण त्याचे कारण असे दिसते की संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीसंबंधी कीथ यांनी एक विशेष सिद्धान्त मांडळा आहे आणित्या सिद्वान्ताशी लोकनाट्याच्या कल्पनेचा मेळ बसण्यासारखा नव्ह्ता. धार्मिक विधी व नाट्य | कीथ यांचे असे मत आहे की संस्कृत नाटकाचे मूळ धार्मिक विधीतच शोधणे आवश्यक आहे. सामान्यतः सर्वच प्राचीन समाजांत नाटय कोणत्या ना कोणत्या तरी धार्मिक विधीशीच संबद्ध असते. भारतात तर सर्वच जीवन धर्माशी निगडित आले आहे. तेव्हा येथे नाट्यासारखा मनोरंजनाचा प्रकार सुद्धा मुळात धर्भाशीच संबद्ध असावा म्हणजे त्याचा उगम एकाच धार्मिक विधीतून झाळा असावा असे मानणेच योग्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. आणि त्यांच्या मते नाट्योतयत्तीला अनुकूळ असलेले धार्मिक विधी मूळत: एकाद्या महत्त्वाच्या प्राकृतिक संघर्षावर आधारित असतात. मह्ात्रत विधीत झुभ्र गोठाकार 'चामड्याबद्दल शूद्र आणि आर्य यांच्यात होणारा संघष आणि त्यात शेवटी होणारा आर्यांचा विजय हा नाटयमय प्रसंग अंबकार व प्रकाश यांच्यातील दैनंदिन संघर्षात प्रकाशाच्या होणाऱ्या विजयावर आधारित आहे असे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या धार्मिक विधीतच संस्कृत नाटकाचे अंतिम मूळ आहे असा त्यांच्या म्हणण्याचा आशय आहे. कृष्णभक्ति व नाट्य परंतु कीथ यांच्या मते संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीशी साक्षात संबंध आहे तो कृष्ण- क॑स- संघर्षावर आधारित धार्मिक बिधीचा. हा संघर्षही मुळात प्राकृतिक संधर्षच असून तो महात्रतविधीतील संघर्षाचेच दुसरे रूप आहे. कृष्णकृत कंसवध ही मूलत: नवधान्योतपत्तीची ३० गणी दरि०७, ऐ॥35818, 01 8 पाहा 1816, 138 6एल'४ डट्टाा ली ण०१२पा२ वा णाश्राग क्यात. ४०2प७.? 09. दया., 0. 348. तसेच “॥6 ॥]1010102प6, 808518, 185 8180 31 000०३9 ७०७पाचा लावाल 900 लाठ्या.” ॥7014., 1. 348. २११ /७८., ७. 51. | - नाट्यशास्त्र कथा, कंस म्हणजे जीर्णशीण झालेल्या पुराणधान्यादी वनस्पतींचे सत्व (०८॥॥ण कॉ /९४०४८॥०॥) आणि कृष्ण म्हणजे त्याचा विनाश करून नवीन धान्यादी वनस्पतींची उत्पत्ती करणारे सत्त्व. पुराण सत्त्वाच्या दरवर्षी होणाऱ्या विनाशाला कंसवधरूप विधीचे स्वख्प दिळे आहे. पण पुराण व नव धान्यसत्त्वांमधीळ हा संघषें शिशिर आणि ग्रीष्म या दोन क्रतूतीळ संधर्षाच्या स्वरूपातही अभिव्यक्त होतो. महात्रत विधीत अंधकार-प्रकाश-संघर्षा बरोबरच शिरिर-प्रीष्म-सधर्षांचेही दर्शन होते. म्हणून ढृष्ण-कंस-संघणषे महात्रतविधीःचेच निराळे खूप आहे म्हणजेच धार्मिक विधिस्वरूप आहे असे मानता यइल. महाभाऱ्यात कृष्णभक्तांना रक्तमुख म्हटले आहे आणि कंसभक्तांना काळमुख याचे कारण कृष्ण हा प्रकाशाचा आणि ग्रीष्माचाही प्रतिनिधी आहे आणि कंस अंधकाराचा आणि शिशिरा'चा. याप्रमाणे विवेचन करून कीथ यांनी असे प्रतिपादन केळे आहे की शिशिरावर ग्रीष्माने मिळविलेल्या विजयावर आधारलेल्या नाट्यमय कृष्णभक्तिस्वरूप धार्मिक विधीपासूनच संस्कृत नाटकाची उपपत्ती झाली. हा धार्मिक विधी यूरोपातील ८७५१०१ ७1८” नावाच्या नाटयप्रकारासारखा होता असे म्हणून त्यांनी असे सांगितले आहे की प्राचीन प्रीसमध्ये शोकान्त नाटक (४८४९७७) अश्याच प्रकारच्या धार्मिक विधीपासून उत्पन झाले हाते परंतु भारतातील धार्मिक बिधीत होणारा मृत्यू अन्ततः सुखास कारणीभूत होतो, तर श्रीस- मधीळ नाठ्यात होणारा मुत्यू शोककारक असतो असा त्या दोहोत फरक आहे. संस्कृत नाटक नेहमी सुखान्त असते याचे मूळ त्याच्या उत्पत्तीस कारणीभूत झालेल्या प्राकृतिक संघर्षाच्या स्वरूपात आहे असे मत त्यांनीं प्रदार्रीत केळे आहे.) * संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीचा संबंध कृष्णभक्तिविषयक धार्मिक विधीशी प्रथम लेव्हि यांनी सचित केळा होता.33 महाभाष्यातीळ कंसवधाचा निर्देश आणि वेबर यांनी वैष्णव मंदिरातील कृष्णजन्माच्या सोहळ्याचे केळेळे वर्णन यांवर त्यांच्या विवेचनाचा भर होता. कीथ यांनी त्यात आणखी काही मुद्यांची भर घातली. संस्कृत नाटकांतील गद्याची प्रधान प्राकृत भाषा शोर- . सेनी आहे, यावरून असे अनुमान निघते की ज्या लोकांमध्ये संस्कृत नाटकाची उत्पत्ती झाली त्यांची नेहमीच्या व्यवहारातील भाषा शोरसेनी होती. आणि ती भाषा जेथे प्रचलित होती तो प्रदेश म्हणजे मथुरा राजधानी असलेला शूरसेन देश कृष्णभक्तीचे पहिळे आणि सर्वात महत्त्वाचे केन्द होते हे प्रसिद्ध आहे. वेबरकृत कृष्णजन्मा'च्या नाट्यमय उत्सवाच्या व्णनाचा निदेंश करून कीथ यांनी बंगालमधील यात्रारूप नाटया'चाही उल्लेख केला आहे. त्यांनी असे प्रतिपादन केळे आहे की संस्कृत नाटकाच्या अवनतीच्या काळातही यात्रांची लोकप्रियता अबाधित राहिली आहे आणि ह्या यात्राख्पी नाटयप्रकाराचे साहित्यिक रूप जयदेवा'्या ३२ ४६, ०७. लॉा., ॥ए. 37-38. ३३ 8. 1.७, ॥,९ रका काश, ?. 336. उपांद्धात "२ गीतगोविन्दात पहावयास मिळते. शेवटी भासा'च्या नावावर प्रसिद्ध झालेल्या बाळचरित नावाच्या नाटकाचा निर्देश करून कीथ यांनी असे म्हटले आहे की त्यात जे दानव आणि कैस यांच्या वधाचे दर्शन होते ते 2557०2 ०७) मधून नाटकाची उत्पत्ती झाळी याचे प्रमाण म्हणून मानता येईल. ४ परंतु संस्कृत नाटकाच्या उतपत्तीविषयीचे हे मत मान्य होण्यासारखे नाही. कृष्णकत केसवधाचे मूळ एखाद्या प्राकृत संघर्षात आहे ही कल्पना मुळीच पटण्यासारखी नाही. कंस जीण धान्यसत्त्वाचा अथवा शिशिरकाळीन अंधकाराचा प्रतिनिधी आहे आणि कृष्ण नव नान्यसप्याचा अथवा प्रीष्मकाळीन प्रकाशाचा असे सूचित करणारे कोणतेही प्रमाण नाही, मह्ाभाष्यात क्ृष्णभक्तांना रक्तमुख आणि कंसभक्तांना कालसुख म्हटळे आहे. परंतु यावरून कृष्ण व कस यांचा कोणत्याही प्राकृतिक घटनेशी संबंध जोडता येण्यासारखा नाही. वस्तुतः महाभाष्यातीळ वर्णन रंगभूमीवरील ग्रेथिकांच्या संबंधात केलेळे आहे. ते वर्णन नाटयशास्त्रा- तल्याप्रमाणे नटांच्या शरीरांना लावावयाच्या रंगाच्या संदर्भात केळे असण्याचा'च अधिक " संभव आहे. परंतु त्यांच्या भक्तांप्रमाणेच कृष्ण आणि कस हे अनुक्रमे रक्तमुख आणि कालमुख होते असे मानले तरी त्यामुळे त्यांचा नव धान्य आणि जीर्ण धान्य यांच्याशी संबंध कसा प्रस्थापित होतो ते समजणे कठीण आहे. तसेच रक्तवर्ण प्रीष्मक्रतूचचा सूचक आणि कालवर्ण शिशिराचा हेही पटण्यासारखे नाही. शिवाय, शिशिराची समाप्ती होऊन ग्रीष्माचे आगमन होते तो काळ जीर्ण धान्यसत्त्वाच्या विंनाशाचा आणि नव धान्यसत्तवाच्या विजयाचा अशी परिस्थिती भारतात कधी काळी होती हे संशयास्पद आहे. तशी परिस्थिती कदाचित इंडो- यूरोपिअन युगात असेळ. पण भारतात प्राचीन काळापासून नवघान्योत्पत्तीचा शरद्तूशी संबन्थ आहे. त्याच वेळेस आग्रयण इष्टी करण्याची प्रथा होती. दुसरी गोष्ट अशी की कृष्ण आणि कंस यांची कथा इतकी प्राचीन नाही की तिठा प्राकृतिक घटनेवर आधारलेली अशीं उराण कथा समजता येईल, छांदोग्य उपनिषदात (३.१७. ६) देवकीपुत्र कृष्णाचा निदेश आहे. यावरून उपनिषत्काळी कृष्ण एक ऐतिहासिक पुरुष समजळा जात होता हे उघड आहे. तत्पूर्वी कृष्णाचा कोठेही निदेश नाही. त्याचप्रमाणे सर्व प्राचीन वाडूमयात कंसाचे नाव अथवा कृष्णाने त्याचा वध केळा असल्याची कथा कोठे आढळत नाही. तेव्हा कीथ म्हणतात त्या प्रकारची पुराण कथा वैदिकयुगामध्ये कृष्ण व केस यांचा नावाशी संबद्ध होती हे मान्य करणे अशक्‍य आहे. म्हणून त्या कथेवर आधारलेल्या एका धार्मिक विधीतून संस्कृत नाठ्य उदयास आले हा विचार ग्राह्य मानता येत नाही. मह्ाभाष्यात केसवधाच्या घटनेवर आधारलेल्या प्रयोगाचा निर्देश आहे त्याचबरोबर बलिबंधनाच्या घटनेवर आधारलेल्या प्रयोगाचाही निर्देश आहे. वस्तुतः बलिबंधनाची ही २४ लगा, ७. ट्य., ७0. 40-41; 38... धं ४). नाट्यशास्त्र कथाच एका प्राकृतिक घटनेवर आधारलेली अशी पुराणकथा आहे असे म्हणता येईल, कारण विष्णु ही वैदिक देवता असून त्याच्या तीन पदक्रमणांचा वैदिक बाड्मयात निर्देश आहे. तंव्हा विष्णुकृत बळीच्या बंधनावर आधारलेला एक धार्मिक विधी प्रचलित होता असे म्हटले तर ते अधिक संभाव्य वाटण्यासारखे आहे. तथापि, ते संभाव्य मानळे तरी त्या विधीत संस्कृत नाटकाची उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न सफल होईल असे दिसत नाही. शिवाय; हे सुद्धा लक्षात ठेवळे पाहिजे की महाभाष्यात जसा वासुदेवभक्तांचा निर्देश आहे तसाच कंसभक्तांचाही आहे. यावरून त्या ग्रंथात अभिप्रेत असलेळे वासुदेवभक्तीचे स्वरूप उत्तरकालीन कृष्णभक्तीच्या स्वरूपासारखेच होते असे समजणे बरोबर नाही हे स्पष्ट होते. अन्यथा केसभक्ती सुद्धा त्याच स्वरूपाची होती असे मानावे लागेल. वेबर यांनी केळेळे कृष्णजन्माष्टमीच्या प्रसंगी होणाऱ्या समारंभाचे वर्णन वैष्णव मंदिरांत त्या वेळी होणाऱ्या उत्सवावर आधारित आहे. ह्या उत्सवाची परंपरा फार प्राचीन आहे असे समजण्याचे मुळीच कारण नाही. प्रायः वछभ-संप्रदायाच्या स्थापनेनंतर अशा तऱ्हेचे उत्सव मंदिरांत साजरे करण्याची प्रथा सुरू झाली याविषयी संशय नाही. आणि बंगालमध्ये प्रचलित असलेल्या यात्रांबद्दल तर असे निश्चितपणे म्हणता येईल की त्यांचे हे स्वरूप मध्ययुगा'्या पूर्वी विद्यमान नव्हते. चैतन्य आणि त्याचे शिष्य रूप आणि जीव गोस्वामी यांच्या प्रेरणेने कृष्णविषयक भक्तीळा बंगाळात जे स्वरूप प्राप्त झाले त्यातूनच . ह्या नाठ्यप्रकाराची उत्पत्ती झाळी. कीथ यांनी सूचित केळे आहे त्याप्रमाणे प्राचीन संस्कृत नाट्याचा त्याच्या अवनतीच्या काळातही टिकून राहिलेला अवशेष नसून तो नाट्याचा एक नूतन आविष्कार आहे. संस्कृत नाट्याचा त्याच्यावर साहजिकपणे प्रभाव पडला आहे इतके'च. जयदेबाचे गीतगोबिन्द यात्रांचे वाड्मयीन स्वरूपात दर्शन घडविते असे म्हणता येईल. त्यात नाट्यमय काही प्रसंग आहेत हे खरे आहे. परंतु त्यात सस्कृत नाटका'ची प्रारंभीची अवस्था प्रतिबिम्बित झाळी आहे असे मुळीच समजता येण्यासारखे नाही. आणि विशिष्ट रचना असलेल्या त्या कान्यातल्याप्रमाणे प्रारंभीच्या संस्कृत नाटकांचे बिषय कृष्णभक्तिपर होते असा निष्कर्ष कोणत्याही दृष्टीने समर्थन करता येण्यासारखा नाही. संस्कृत नाटकांत प्रधान प्राकृत भाषा शौरसेनी आहे हे खरे आहे. पण त्यावरून एवढेच म्हणता येईल की ती भाषा बोलली जात असे त्या प्रदेशात संस्कृत नाटके लिहि ण्यास प्रारंभ झाला. परंतु त्या भाषेचा कृष्णभक्तीच्या आविष्काराशी काही विरोष संबंध आहे असे सूचित करणारे कोणतेही प्रमाण दाखविता येण्यासारखे नाही. भासाच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या बालचरित नाटकात कृष्णचरिता'चे दशन होते. परंतु ते नाटक ८७७०८ ॥/८/ च्या स्वर्याचे आहे हे मत स्वीकारणे अशक्य आहे. प्राचीन प्रीसमधीळ टॅजेडीमध्ये ज्याला दुःख सहन करावे लागते किंवा ज्याचा वध होतो तो मुळात उदात्त व सठवृत्त असतो. युरोपमध्ये मध्ययुगात प्रचलित झालेल्या ००५७४०० 1८” मध्ये तर येशू खिस्ताळा मानवजातीच्या उद्भाराथ॑ सहन कराव्या लागणाऱ्या यातनांचे उपोद्धात ०७ आणि शेवटी त्याच्या होणाऱ्या वधाचे दर्शन होते. अशा तऱ्हेच्या ८७५7८७ ७७» शी बाळचरिताची तुलना कोणत्याही प्रकारे होऊ रकत नाही. त्यातीळ दानवांचा नाश आणि केसाचा वध ह्या गोष्टी दुष्टांच्या दमनाच्या स्वरूपाच्या आहेत. संस्कृत नाटक नेहमी सुखान्त असते या गोष्टीचे मूळ कृष्ण-कंस कथेळा आधारभूत असलेल्या प्राकतिक संघ- र्षात आहे हे कीथ यांचे मतही स्वीकारता येत नाही. कारण वर म्हटल्याप्रमाणे त्या कथेला एखाद्या प्राकृतिक संघर्षाचा आधार आहे अस्ते दाखविणारा कोणताही पुरावा नाही. शिबाय, हे बाळचरित नाटक संस्छृत नाटकाच्या प्रारंभिक अवस्थेचे प्रतिनिविरूप आहे असे मानणेही शक्‍य नाही. हे नाटक भासकृतच आहे असे मानले तरी हे लक्षात ठेवळे पाहिजे की कीथ यांनीच अश्वधोषाळा भासाच्या पूर्वेकाळीन ठरविळे आहे आणि अश्व- घोषाच्या नाटकांचे जे अंश उपलब्ध झाले आहेत त्यांत कृष्णभक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. भाणि बाळचरित हे एकच नाटक कृष्णभक्तिविषयक आहे. त्याच्या समवेत भासा'च्या नावानेच प्रसिद्ध झालेल्या इतर बारा नाटकांपेकी एकही त्या विषयाशी संबद्ध नाही. ही सर्वे नाटके समकाळीन मानळी आहेत. त्यांपैकी एकच प्रारंमिक अवस्थेचे द्योतक मानणे कितपत योग्य होईल ? इतर नाटकांवरून ह स्पष्ट आहे की कोणत्या तरी धार्मिक विंधीतून संस्कृत नाटकाची उत्पत्ती झाली असे सूचित करणारे काहीही चिन्ह त्यांत नाही तसेच भासपूर्वेकाळीन समजल्या गेलेल्या अश्वघोषाच्या नाट्यखंडातही अशा तऱ्हेचे काही चिन्ह नाही. वास्तविक संस्कृत नाट्याच्या उतत्तीशी जर कोणत्या एका देवतेचा संबंध प्रस्थापित करणे शक्‍य असेळ तर ती देवता शिव होय, कृष्ण नाही. नास्यशास्रात असे म्हटले आहे, की अग्रृतमन्थन नावाच्या समवकाराचा आणि त्रिपुरदाह नावाच्या डिमाचा प्रयोग हिमा- ळयावर शंकरापुढे करण्यात आला आणि त्यावेळेस प्रसन्न होऊन त्याने आपले नृत्य पूरवरंगात समावेश करण्यासाठी दिले कालिदासा'च्या मालविकाम्िमित्र नाटकात नाटय शिवाच्या अर्ध नारीख्वर रूपात विभक्त झाले असल्याचे म्हटले आहे. २" आणि शिवाला नटराज म्हणतात हे प्रसिद्ध आहे. तेव्हा नाट्याच्या उत्पत्तीचा शिवाशी संबंध आहे असे मानणेच अधिक योग्य होईल. तथापि, शिवभक्तिरूप एखाद्या विशिष्ट धार्मिक विधीत'च त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे असे वाटत नाही. मंत्रतंत्र आणि नाट्य संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीचे विवेचन करताना गोंडा यांनी असे प्रतिपादन केळे आहे की सर्वेत्र समाजाच्या प्राथमिक अवस्थेत मानवाच्या सवे कृती केवळ धार्मिक स्वरूपाच्याच ३५ स्द्रेणेदसुमाकृतव्यतिकरे स्वाज़े. विभक्त द्विधा । -माल. १.४. ०८ नाटयशास्त्र नसतात, तर त्यांचा जादूटोण्याशीही संबेध असती. त्यांच्या मते तृत्य, गीत, क्रीडा इत्याद सव प्रकारच्या क्रिया मंत्रतत्रात्मक घार्मिक विधींच्या स्वख्पाच्या (वडा००-/थाशा०१७ 25) असतात. ह्या सर्व विधींचा अवलंब पृथ्वीपासून धान्योतपःती व्हावी, क्रियांना गर्भधारणा व्हावी, युद्धात विजय प्राप्त व्हावा, अनि्टाचा परिहार व्हावा, शुभा'ची प्राप्ती व्हावी, इच्छा सफल व्हाव्यात इत्यादी विविध प्रयोजनांच्या सिद्धीसाठी केला जातो. नृत्य, गीत, प्राथना, पूजा, रथस्पर्धा, कंदुककीडा, द्यूत इत्यादी सव प्रकारच्या कृत्यांच्या द्वारा अशाच प्रकारच्या प्रयोजरांची सिद्धी अपेक्षित असते आणि त्या सवे कृत्यांत जादूच्या स्वरूपाचे तंत्र अवश्य विद्यमान असते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महात्रत आदी विधींत समाविष्ट केलेले प्रकार मूलतः सामान्य लोकांत प्रचलित होते आणि त्यांचा मूळ उद्देश मंत्रतंत्राच्या साहाय्याने इप्सितसिद्भी करून घेणे हा होता. तसेच धार्मिक विधी आणि धर्मनिरपेक्ष व्यवहार अशा तऱ्हेचा भेद त्या वेळी केला जात नसे. या विवेचनानंतर गोंडा यांनी असे प्रतिपादन केळे आहे को संस्कृत नाटकांची उत्पत्ती अशाच मंत्रतंत्राममक विधींपासून झाळी. याला प्रमाण म्हणून संस्कृत नाटकांचे प्रयोग यात्रा, उत्सव आदी प्रसंगी होत असत ह्या गोष्टींचा निर्देश केला आहे. त्याचप्रमाणे विद्यमान संस्कृत नाटकांत सुद्धा काही कृती मंत्रतंत्रातक अथवा जादूच्च्या स्वरूपाच्या आहेत असे त्यांना वाटते. उदाहरणार्थ, माळविकाभिमित्र नाटकात मालविकेने आपल्या कामनेच्या पूर्तीसाठी अशोकवृक्षाळा केलेला पादप्रहार; स्वप्नवासवदत्ता नाटकातील कंदुक्क्रौडा या गोष्टी त्यांना जादूच्या स्वख्साच्या वाटतात. इतकेच काय, संस्कृत नाटकांत सर्वत्र आढळणारी निसरगेवर्णने सुद्धा त्यांना मंत्रतंत्रातमक वाटतात. क गेंडा यांनी ज्या मंत्रतंत्रात्मक बिधींचा निर्देश केला आहे तसल्याच स्वख्पा'चे विधी समाजाच्या प्राथमिक अवस्थेत प्रचलित होते हे कदाचित मान्य करता येईळ. अथवंवेदात अका काही विधींचे दर्शन घडतेच. तसेच उत्तरकाळी सुद्धा मंत्रतंत्र, जादूटोणा वगैरे प्रचारातून नाहीसे झाले नाहीत असाही संभव आहे. तेव्हा जीवनाच्या काही भागावर मंत्रतंत्रादीची छाया पडळी आहे असे वाटळे तर ते अस्वाभाविक मानता येणार नाही. तथापि, ज्या समयी संस्कृत नाठ्याची उत्पत्ती झाली असे मानता येण्यासारखे आहे त्या प्राणिनि-पतञ्जलींच्या काळी नृत्य, गीत, पाठ्य, अभिनय इत्यादी नाटबोपयोगी सर्वे प्रकारांच्या जादूटोण्याशी कधी काळी असलेल्या संबंधाची स्मृती जागृत होती हे मत स्वीकारणे कठीण आहे. पूर्वरंगातीळ नृत्य व गीत ही रंगप्रसादनाची साधने किंवा नान्दीत केली जाणारी प्रार्थना यात जादूचा काही संबंध आहे हे पटण्यासारखे नाही. कामनापूतीसाठी केळी जाणारी प्रत्येक कृती मंत्रतंत्रात्मक स्वख्याचीच होती असे समजण्याचे कारण दिसत ३६ उ. ठणा08, '&पा 826 1300 तहा पाकापाषट्र पराते फला 085 015ली8) 1801850, टंट लाध्णाब्टाीळ ४०. 19, (1.68, 1943 ) , 00. 353-354. ३७ ॥ढ., ?0. 362, 384, 388, 393 ९ट- उपोद्धात "५९ नाही. अशोकाच्या पादप्रह्मारात कामनापूर्तीची अपेक्षा आहे हे खरे आहे. पण त्यात काही मंत्रतंत्रामक विधीचा अवरोष आहे असे मानणे कठीण आहे. ती एक कविकल्पना असण्याचाच संभव आहे. स्वप्नवासवदत्तेतीळ कन्दुकक्रीडेत तर कोणतीही कामनापूर्ती अभिप्रेत असलेली दिसत नाही. आणि संस्कृत नाटकांतील निसर्गवर्णनपर होक मंत्रतंत्रात्मक विधींठून निष्पन्न झाळे आहेत हे मत प्राह्य मानणे तर अत्यंत कठीण आहे. नाट्यशास्त्रात म्हटले आहे की नाटयवेदाची निर्मिती झाल्यावर नाट्याचा पहिला प्रयोग इन्दरव्वजाच्या समारोह्वाच्या प्रसंगी करण्यात आळा. त्या वेळी भरताने प्रथम नान्दीची योजना केळी आणि त्यानंतर देवांनी दैत्यांवर मिळविलेल्या विजयाचे दर्शन घडविणारी एक नाट्यकृती प्रस्तुत केळी. ह्या नान्दींचा पुढे पूर्वरह्डात समावेश झाळा आणि प्रत्येक नाटयप्रयोगाच्या पूर्वी पूर्वरज्ञाची योजना करणे आवऱ्यक झाले, नान्दीपठनाखेरीज पूर्वरंगातीळ मुख्य विधि म्हणजे इन्द्रश्वजाची उभारणी आणि नृत्य, गीत यांच्या साहाय्याने त्याची पूजा. हा विधी एक प्रकारे धार्मिक स्वरूपाचा आहे यात शांका नाही, पण मुळात तो सामान्य लोकांत'च प्रचलित होता असे दिसते. इन्द्रथ्वजपूजेची तुळना मे-पोळ (1/८1-7०12) आणि त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या ना'चगाण्याशी केळी गेळी आहे, २“ ती यथार्थ वाटते. तथापि, हा पूजाविधी नाट्यप्रयोगाच्या वेळी आवश्यक मानला गेला यावरून त्या विधीतून किंवा तसल्याच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या विधीतून संस्कृत नाटक उदयास आले असे समजण्याचे कारण नाही, कोणत्याही कार्याच्या प्रारंभी विघ्नांचे निवारण व्हावे या उद्देशाने मंगळ व्हावे अशी प्राथना करण्याची प्रथा फार प्राचीन आहे. मंगळाच्या ह्या अम्यर्भनेत धर्माचा-कदाचित जादूचाही-काही अंश आहे असे मान्य करता येईल. परंतु त्यावरून ज्या कार्यासाठी मंगठाची कामना केळी जाते ते कार्यही मुळात धार्मिक स्वरूपाचेच होते असे समजणे युक्तिसंगत वाटत नाही. नाटकाची उत्पत्ती | ह्या सर्व विवेचनावरून असा निष्कर्ष काढता येईळ की वैदिक युगाच्या उत्तरार्धात तंवादयुक्त नाट्य कोणत्या तरी स्वरूपात विद्यमान होते. हे नाट्य धार्मेक स्वरूपाचेच होते असे निश्चितपणे म्हणता येण्यासारखे नाही. उत्तरकालीन ग्रंथांवरून असे दिसते की उत्सव, यात्रा आदीच्या निमित्ताने ठिकठिकाणी हिंडणाऱ्या नटसंघांच्या द्वारा अश्ा नाट्याचे प्रयोग प्रस्तुत केळे जात असत. नाट्यप्रयोगाच्या प्रारंभी नृत्य आणि गान यांना प्राधान्य असलेला एक प्रकारचा पूजाविधी केळा जात असे. परंुद्या पूजाविधीचा नंतर प्रस्तुत होणाऱ्या नाट्याशी काही संबंध नसे. हया पूजाविधी वैदिक कर्मकाण्डात अन्तर्भूत नसून तो सामान्य लोकात'च प्रचलित होता. आणि त्या सामान्य लोकांच्या मनोरंजनासाठीच नंतरचे नाट्य टं 1॥५७॥, ०७. वॉ., ए. 41. ६० नाट्यशास्त्र प्रस्तुत केळे जात असे. हे नाट्य म्हणजे लोकनाट्य असे समजण्यास हरकत नाही. आणि ह्या ठोकनाट्यातूनच विदग्ध संस्कृत नाटक उदयास आले. पाणिनि-पतञ्जलींच्या काळी काव्यनिर्मितीस प्रारम्भ झाला होता. तेव्हा लोकनाट्याच्या दरानाने स्फूर्ती पावून काही कवींनी नाट्याला विदग्ध वाड्ययात स्थान दिळे आणि त्यांनी केळेली वाड्य़यीन रचना हीच संस्कृत नाटकाची उतत्ती असे म्हणता येईल. असे दिसते की हे लौकनाटय विविध प्रकारचे होते. त्यात देवदानवांच्या पुरातन कथांचे दहन होत असे, त्याचप्रमाणे सामान्य ढोकांच्या जीवनाचेही काही अंशी दरीन होत असे. देवदानवादींच्या कथांवर आधारळेळे नाटय समवकार, ईहागृग, डिम यांच्यासारखे होते, तर सामान्य माणसांच्या जीवनावरील नाटय प्रहसन, भाण यांच्यासारखे होते असे म्हणता येईल. संस्कृतातील निरनिराळ्या ख्पकप्रकारांची उत्पत्ती विविध स्वरूपाच्या लोक- नाठ्यातून झाळी हे सहज समजण्यासारखे आहे. जर कृष्णभक्तिरूप किंवा दुसऱ्या एखाद्या धार्मिक विधीतून सैस्कृत नाटकांची उतत्ती झाळी असे मानळे तर रूपकांचे हे भिन्न प्रकार कसे अस्तित्वात आले याची नीट उपपत्ती लागणार नाही. नाठयशास्राच्या आधारे असे म्हणता येईल की प्रारंभी लोकनाट्य देवादिकांच्या कथा प्रस्तुत करीत असे. अमृतमंथन आणि त्रिपुर- दाह यांचे दीन घडविणारे नाट्यप्रयोग प्रथम झाले असे तेथे म्हटले आहे. देवादिविषयक आणि सामान्यजनविषयक अशा लोकनाट्याच्या दोन स्त्ररूपांव्यतिरिक्त प्रतिद्द राजांच्या चरितावर आधारलेले असे नाट्य संस्कृत नाटकांत अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. किंबहुना नाटक हा जो प्रधान ख्सकप्रकार तो याच स्वख्पाचा असणे आवश्यक मानळे आहे. तसा प्रकार लोकनाट्यात होता की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु ज्यावेळेस संस्कृत नाटके लिहिण्यास प्रारंभ झाला त्यावेळी काव्यासाठी बिषय निवडताना इतिहासाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत होता असे दिसते. पतञ्जलीने निर्दिष्ट केलेल्या बाप्तवदत्ता, सुमनोत्तरा, मेमरथी द्या आख्यायिका इतिहासावर आधारित असण्याचा संभव आहे. आपण हल्ली समजतो त्या स्तररूपाचा इतिहास प्राचीन काळी ठिहिळा जात नसे हे खरे आहे. तथापि, अनेक ऐतिहासिक कथा मौखिक परंपरेने प्रसृत होत होत्या यात शांका नाही. त्यांपैकी बऱ्याचशा कथा महाभारतात समाविष्ट झाल्या आहेत. संस्कृत नाटकाच्या उतत्तीच्या वेळी प्रस्तुत स्बख्यात महाभारत विद्यमान नसले तरी त्यातीळ पुष्कळ कथा प्राचीन आहेत हे सर्वमान्य आहे. अशा कथांतून निवडलेल्या प्रसंगांना नाटकांत सर्वाधिक महत्त्व यावे हे अस्वाभाविक नाही. | इतिहास आणि नाटक 'छोकनाद्याप्रमाणेच इतिहास-पुराणांतीळ कथांचाही संस्कृत नाटकाच्या उतपत्तीत भाग आहे. या कथांचे प्राचीन काळी ळोकसमुदायाच्या उपस्थितीत पठन होत असे. दीध सत्राच्या उपोद्धात ६१ प्रसंगी देवादिकांच्या गोष्टी कथन करण्याची प्रथा होती. त्याच प्रमाण मंदिरांत पुराणांतील कथा लोकांना ऐकविण्याची प्रथाही बरीच जुनी आहे. तसेच सूत, मागध आदी राजांच्या चरिता'चा प्रायः पद्यामक असलेला भाग लोकांसमोर म्हणून दाखवीत हे सुद्धा मान्य होण्यासारखे आहे. भरत वंद्याचा इतिहास मूळ “भारत? ग्रंथात ग्रथित झाळा होता आणि त्याचाच विस्तार होऊन महाभारत बनले असे मानतात. महाभारताचे सुद्धा पठन होत असे या प्रकारचे निदेश आहेत. तेव्हा असा. विचार मांडला जाणे स्वाभाविक होते की संस्कृत नाटकात जे पाठ्य आहे त्याचा उगम ह्या इतिह्ासपुराणादींच्या पठनात आहे. लेव्हि यांनी असे मत प्रदर्शित केले होते की महाभारताचे पठन करणारी अशी एक भारत नावाची जमात होती आणि जेव्हा प्राचीन इतिहासापासून नाटय स्वतंत्र ख्पाने अस्तित्वात आले तेव्हा ते प्रस्तुत करणारे लोक सुद्धा त्याच भारत ह्या प्राचीन नावाने ओळखले जाऊ लागले.३१ नाटकातीळ पाठ्याचा संबंध इतिहासाच्या पठनाशी प्रस्थापित करताना कोथ यांनी सुद्धा भारत हे नाव इतिहास पठन करणारांचे होते हे मत स्वीकारून त्याचाच अपभ्रंश होऊन 'भाट' हे नाव अस्तित्वात आले असल्याचे म्हटले आहे." संस्क्रुत नाटक प्राचीन इतिहासादींचे कणी आहे यात शंका नाही. परंतु इतिहासाचे कण मुख्यत: त्यातून निवडलेल्या विषयांपुरतेच मर्यादित आहे असे म्हटले तर ते चूक होणार नाही. इतिहासपुराणांच्या पठनपद्धतीचा नाठ्यातील पाठ्यावर परिणाम झाळा असल्याचा फारसा संभव नाही. इतिहासाच्या पठनात एका मनुष्याने केलेल्या कथनाला प्राधान्य असते, तर नाटकातील पाठ्यात दोंन किंवा अधिक पात्रांमधीळ संवादाला प्राधान्य असते. आणि जर लोकनाठ्याचे प्राचीनत्व मान्य केळे तर पान्यासाठी दुसऱ्या कशाचा उपयोग झाला असे समजण्याची आवश्यकता उरणार नाही. दुसरी गोष्ट अशी की इतिहासाचे पठन करणारांना भारत अशी संज्ञा असल्याचे कोठेही म्हटलेले नाही. तसेच नटांना भरत अशी संक्षा आहे, भारत अशी नाही. तेव्हा इतिहासाचे पठन करणारे भारतःच पुढे नाटय करू लागले, म्हणून इतिहासापासून नाटयाची उत्पत्ती झाळी हे मत स्वीकारता येण्यासारखे नाही, आणि भारत आणि भाट या दोन शब्दांत काही संबंध आहे असे मुळीच दिसत नाही. हरिवंदा महाभारतात नटांचा निर्देश आहे, नाटकांचा नाही. परंतु हरिवशात नाटकांचा प्रयोग करणाऱ्यांचा स्पष्ट निदेश आहे. एका उत्सवाच्या प्रसंगी अप्सरांनी नृत्यगीतादिद्वारा यादवांचे मनोरंजन केले. त्यानंतर वेषभूषा केलेल्या प्रथुम्न, सांब आदी यादवांना बरोबर घेऊन मद्र नावाचा नट वज्रनाभ दैत्याच्या निवासस्थानी गेळा व त्याने रामायणाची कथा व २९ 5. [, 7.८ र्ट एकास, ७. 312. ४० $. 3. एल, 77४९ ७८० 2)7ळक 7. 30. ९ नार्टयरास्त्र क्रष्यशद्ध-शान्ताची कथा यांवर आधारलेल्या नाटकाचे प्रयोग करून दाखविले, त्यात प्रथुम्नाने नायकाची, सांबाने विदूषकाची, गदाने पारिपार््व्काची याप्रमाणे भूमिका केल्या. नंतर यादवांनी इतरही कथांवर आधारलेल्या नाटकांचे प्रयोग केळे असल्याचे म्हटले आहे. बौद्ध नाटक बौद्ध वाड्यात नाठकांचे निर्देश अनेक ठिकाणी आढळतात. अवदानदातकातीळ '७५ व्या कथेत असे सांगितले आहे की शोभावती नगरीच्या राजाच्या आक्ञेवरून दक्षिण देशातून आलेल्या नटाचाये आणि त्याचा नटसंध यांनी क्रकुच्छन्द बुद्धाच्या चरितावर आधारलेले एक 'बौद्ध नाटक' प्रस्तुत केळे. अवदानरातकाचा चिनी भाषेत अनुवाद इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात झाळा होता. तेव्हा ह्या ग्रंथाची रचना एकदोन शतके तरी अगोदर झाली असणार हे उघड आहे. यावरून असे अनुमान निघते की इसवी सनाच्या प्रारंभाच्या सुमारास बौद्ध नाटकांचे प्रयोग होऊ लागले होते. त्याचप्रमाणे केजूर नावाच्या तिबेटी ग्रंथात बोविम्राप्तीपर्यन्तच्या गौतम बुद्धाच्या चरित्राचे ददीन घडविणाऱ्या एका बोद्ध नाटकाच्या प्रयोगाचा निर्देश आहे. राजा बिम्बिसाराच्या समोर दक्षिणदेशीय सूत्रधार व नट यांनी तो प्रयोग केला होता असे तेथे म्हटले आहे." कालनिणेयाच्या दृष्टीने ह्या निर्देशाला महत्त्व नाही. परंतु काही वर्षांपूर्वी मव्य आशियातील तुर्फान प्रदेशात एका विहयारामध्ये काही बौद्ध नाटकांचे थोडे त्रुटित अंश हाती आले त्यांचे या दृष्टीने फार महत्त्व आहे. त्यांतील काही अंश प्रसिद्ध बौद्द कवी अश्वघोष याच्या शारिपुत्र नावाच्या नऊ अंकी प्रकरणातील आहेत. इतर त्रुटित अंशही त्याच्याच दुसर्‍या नाटकांतीळ असण्याचा संभव आहे." अश्वघोष कुशानवंशीय सम्राट कनिष्काच्या समकालीन होता आणि कनिष्काचा काळ इसवी सना'च्या पहिल्या शताब्दींचा उत्तराध॑ असे सामान्यपणे स्वीकृत झाळे आहे. म्हणजे मध्य आदियात उपलब्ध झालेळी ही नाटके इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात लिहिळी गेली होती हे मान्य करणे आवश्यक ठरते. ह्या अंशांच्या परिशीलनावरून हो गोष्ट स्पष्टपणे प्रतीत होते की ही नाटके लिहिळी गेली त्यावेळेस संस्कृत नाट्य आपल्या सर्व वैरिष्ट्यांसह परिपूर्ण स्वरूपात अस्तित्वात आले होते. नाटक व प्रकरण यांत विषय आणि पात्रे यांच्या योजनेच्या बाबतीतील मिन्नता, संकृूत आणि निरनिराळ्या प्राकृत भाषा यांचा पात्रानुसार ४१ हखिंद, २.८८; २.८९; २.९१. ४२ अबदानदातक, ९6. 0५ 3. 3. 5७१७, ४०. हा (8. 7?७७५00०पा ९८१८्ट, 1906), 100. 29-39. | ४३ ॥॥व, शज.य, ॥00., 0. १. उड एजाण्फ, ७2% पवाब्लार छाया, 0. 51- डप प. .पत्नड, छटळम८£2 एवकफ्ान्याश ॥कटणश्‍्य (तिका, 1911). उपाद्वात | ९३ _ मिश्र उपयोग, गद्य आणि पद्य यांचे मिश्रण, विदूषकाची योजना इत्यादी संकृत नाटकाची सवे वैशिष्ट्ये ह्या नुटित अंशांतही प्रत्ययास येतात. आता हे उघड आहे की संस्कृत नाटकाच्या उतत्तीचा अथवा प्रथमनिर्मितीचा मान बोद्वधरमीयांना देता येण्यासारखा नाही. कारण प्राचीन बौद्ध वाड्ययात पेक्खा (पेक्षा), नः्च (नृत्य) वगैरे पहाणे अथवा समज्ञजात (समाजात) जाणे मिक्षूंना निषिद्ध मानळे आहे. महायान पंथाच्या उदयानंतरच बौद्ध कवी संस्कृतात साहित्य निर्माण करू लागले. ही साहित्यनिर्मिती इतरांनी अगोदरच प्रसृत केलेल्या विविध साहित्य- प्रकारांच्या अनुकरणाच्या स्वरूपाची होती असे समजणेच उचित होईल, बौद्ध कबींनी काव्यनाटकादी साहित्यप्रकारांचा उपयोग आपल्या धार्मिक विचारांच्या प्रचारासाठी केळा. त्यांना त्या प्रकारांचे जनक मानणे योग्य होणार नाही. तेव्हा अश्वघोषाच्या बरीच वर्षे अगोदर म्हणजे इसत्री सनाच्या प्रारंभाच्या पूर्वी संस्कृत नाटय आपल्या सर्व वैशिष्ट्यांसह अवतीणं झाळे होते याविषयी शंका राहात नाही. पतज्ञळीच्या काळी ते अस्तित्वात होते असे मानले तर इसबीसनपूर्व दुसरे शतक हा संस्कृत नाटकाच्या उदयाचा काळ असे समजण्यास काही हरकत दिसत नाही. पाणिनीच्या वेळेस नाटय होते, पण ते सध्याच्या स्वरूपात होते असे निश्चितपणे म्हणता येत नाही. प्राकूत नाटक लेव्हि यांनी असे एक मत प्रदर्दीत केले आहे की प्रथम नाटके संपूर्णपणे प्राकृत भाषांतच लिहिली जात होती, तसेच भासकालिदासादीच्या पूर्वी संपूर्ण प्राकृत नाटके विद्यमान होती. याचे कारण नाटक अगोदर सामान्य लोकांतच प्रचलित होते म्हणून त्यात विदग्ध लोकांची भाषा जी संस्कृत तिचा उपयोग केला जाणे असंभाव्य होते. या मताचा ह्या स्वरूपात स्वीकार करणे शक्‍य नाही. सामान्य लोकांत प्रचलित असलेल्या लोकनाटयाचे प्राचीनत्व मान्य करणे आवश्यक असल्याचे वर निर्दिष्ट केळेच आहे. ह्या ळोकनाटयात प्रायः प्राकृतांचाच उपयोग होत असणार हेही मान्य होण्यासारखे आहे. परंतु ते लोकनाट्य साहित्याच्या रूपात लेखनिविष्ट होत असे याळा काही प्रमाण नाही. काही संस्कृत ग्रंथ मूळ प्राकृत भाषेत होते व पुढे त्यांचे संस्कृतीकरण झाले किंबा प्राकृत वाड्मया'ची निर्मिती अगोदर झाळी आणि त्याच्या अनुकरणाने संस्कृत वाडूमय निर्माण होऊ लागले यासारख्या मतांना काहीही आधार नाही. पाणिनीच्या वेळेस विदग्ध संस्कृत भाषेत ग्रंथरचना होत होती याचा निर्देश वर केळा आहे. त्याच्याही अगोदर प्राकृतात ग्रंथरचना होत होती असे समजणे अशक्य आहे. वस्तुतः प्राकृत भाषा म्हणजे संस्क्रताचीच अपभ्रष्ट रूपे होत. त्या दोहोंत फरक इतका'च की विदग्ध, सुसंस्कृत मनुष्यांच्या बोलण्यात शुद्ध, संस्कृत रूप येत असे, तर अशिक्षित लोकांच्या बोळण्यात त्याच भाषेची अपभ्रष्ट रूपे प्रचलित असत. बहुतेक भाषांच्या ४६ 953. 1.60, ॥९ (श्‍दा 2 'क्राश7, ॥७. 329 ॥. :-) नाट्यशास्त्र बाबतीत असाच प्रकार असल्याचे दिसून येते. आज सुशिक्षित लोकांच्या बोलण्यातील मराठी भाषा आणि अशिक्षित लोकांच्या बोलण्यातीळ गावंढळ मराठी यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक संस्कृत आणि प्राकृत यांच्यात आहे, त्याहून अधिक नाही. तेव्हा गावंढळ मराठीत प्रेथरचनेस प्रथम प्रारम्भ झाळा आणि नंतर आुद्ध मराठीत असे समजणे जितके अयोग्य होईल तितके'च संस्कृत-प्राकृत ग्रंथरचनेविषयीचे उपरि-निर्दिष्ट मत आहे. लेव्हि यांनी यासंबंधात असाही मुद्दा मांडला आहे की नाटबशास्त्रात अनेक पारिभाषिक शब्द आहेत त्यांपैकी पुष्कळसे संस्कृतोद्वव नसून देशी आहेत, त्यावरून हे शास्र संस्कृतशी संबंध नसलेल्या लोकांत उत्पन्न झाळे असा निष्कषे निघतो. नाटयशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची समाधानकारक संस्कृत व्युत्पत्ती देणे शक्‍य नाही हे खरे आहे. परंतु त्यांचे प्रमाण लेव्हि समजतात तितके जास्त नाही. आणि वर निर्दिष्ट केळे आहे त्याप्रमाणे नाटय प्रथम सामान्य लोकांतच प्रचलित होते आणि हे लोक बहुतांशी आर्येतर वंशांतील होते. तेव्हा शिष्ट समाजात नाट्याचा प्रसार होताना काही संस्कृताहून भिन्न शब्द स्वीकृत होणे स्वाभाविक मानता येईल. परंतु द्या शाज्ञाची निर्मिती संस्कृतज्ञ लोकांनीच केळी यात शंका नाही. पाणिनीने निर्दिष्ट केलेली नटसूत्रे संस्कृतमध्येच लिहिळेळी असणार. तेव्हा संस्कृत जाणणारे लोंकच ह्या शास्राचे अध्ययन करीत असणार हे उघड आहे. | शकांचा संबंध यासंबंधात लेव्हि यांनी असेही म्हटले आहे की संपूर्णपणे प्राकृतातच नाटके लिहि- ण्याची प्रथा बंद होऊन संस्कृत नाटके लिहिण्याळा प्रारम्भ शाक राजांच्या अमदानीत झाला. शक लोकांचे राज्य भारतात सुरू झाल्यावर संस्कृत भाषेचे पुनरुज्नीवन होऊ लागले होते. त्याच्या पूर्वी सातवाहनादींच्या राजबटीत प्राकुताचाच प्रचार जोरात होता. परंतु शकांनी संस्कृतठाच आश्रय दिला हे शक क्षत्रप रुद्रदामन्‌ याच्या शिलालेखावरून स्पष्ट आहे. दुसरे असे की नाटयशाक्षात राजाळा स्वामी आणि राजपुत्राला भतृदारक या संक्षा आहेत. त्यांचे मूळ शक लोकांत प्रचलित असलेल्या संज्ञांत आहे. शकांची राजधानी उञन्जयिनी होती आणि संस्कृत नाटकांत ज्या शौरसेनी, मागधी आणि माहाराष्ट्री भाषांचा उपयोग होतो त्यांचे संधिस्थान अथवा मिळनस्थान उञ्जयिनी येथेच होते. तेव्हा संस्क्रत नाटके लिहिण्यास प्रांभ इसवी सनाच्या पहिल्या शतकात उज्जयिनीच्या शतकांच्या काळी त्यांच्याच आश्रयाने झाला असा लेव्हि यांचा सिद्धांत आहे.*“ | लेव्हींच्या या सिद्घान्तात कोनौ यांनी एक दुरुस्ती आव्यक मानली आहे. ज्या शकांच्या कारकीदीत संस्कृत नाटकाची उत्पत्ती ज्ञाळी ते उज्जयिनीचे शक नसून मथुरा येथे ४७ “खया 1 ढायपा$ तीठणा ॥९७७०० ॥॥15001011018 ( लेव्हि यांच्या लेखाचा बर्गेस- कृत इंग्रजी अनुवाद), हवाय वायरांवृध्वा०, एग. 33, ७७. 163-174. उपोद्धात ६५५ राज्य करणारे शक होत असे त्यांचे म्हणणे आहे. याचे कारण असे की प्रारम्मीच्या संस्कृत नाटकांत माहाराष्ट्री प्राकृताचा उपयोग केळेला आढळत नाही आणि मुख्यत्वेकरून शौरसेनी प्राक्ृताचाच उपयोग केळा असून ती मथुरा राज्याची बोली होती. मथुरेत शकांचे राज्य इसवी सनाचा प्रारम्भ व पहिळी शताब्दी यावेळी होते. तेव्हा कोनौ यांच्या मतानुसार संस्कृत नाटके लिहिण्यास प्रारंभ मथुरेच्या राज्यात इसवी सनाचच्या पहिल्या शतकात झाळा हे अधिक संभवनीय आहे. लेव्हींच्या इतर युक्तीवादाळा पुष्टी देण्यासाठी त्यांनी असे प्रतिपादन केळे आहे की स्वामी ही संज्ञा संस्क्रतात अन्यत्र कोठे राजाला लावलेली नाही आणि हा 'स्वामी' शब्द शकांच्या अधिपतिवाचक 'मुरुण्ड' शब्दाचा केवळ संस्कृत अनुवाद आहे. भरताच्या नाटबशास्रात स्वामी राब्द निश्चितपणे आढळत नाही, कारण तद्विषयक लोक भ्रष्ट आहेत, तथापि दशरूपादी उत्तरकाळीन ग्रंथांत जो या शब्दाचा निर्देश आहे तो भरताच्या नाट्यशात्रावरूनच उद्धृत केलेळा असणार असे त्यांचे मत आहे. *< कोनौं यांच्या प्रतिपादनातीळ एक गोष्ट मान्य होण्यासारखी आहे. संस्कृत नाटकाची उतत्ती उज्जयिनीपेक्षा शूरसेन देशात झाळी असण्याचा अधिक संभव आहे. उज्जयिनीत माहाराष्ट्री, मागधी व शौरसेनी यांच्या सीमा एकमेकींना मिडल्या होत्या असे समजणे मुळीच रक्‍य नाही, मागथी फार पूर्वेकडे होती आणि माहाराष्ट्री फार दक्षिणेस. परु ह्या दोन्ही पंडितांनी संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीचा दाकांशी जो संबंध प्रस्थापित केला आहे तो पटण्या- सारखा नाही, अशोक आणि सातवाहन राजे यांच्या वेळेस प्राकृत भाषांना राजाश्रय मिळाला होता हे खरे आहे. परंतु त्यावरून सर्व ग्रंथरचना त्या वेळी केवळ प्राकृतातच होत असे, संस्कृतात मुळीच नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. पाणिनीच्या वेळेपासून पतञ्ज- लीच्या वेळेपर्यंत संस्कृतमध्ये आख्यान-आ। ख्यायिकादींची रचना होत असे यात मुळीच संशय नाही. प्राकृत भाषेला राजाश्रय मिळाल्याचा परिणाम फार तर एवढाच झाला असेल कौ त्या भाषेत लेखन करण्यास प्रोत्साहन मिळाले असेल, परंतु त्यामुळे संस्कृतमधीळ लेखनात खंड पडळा असेळ असे समजण्याचे कारण नाही. राजाश्रयारिवाय लेखन होतच नसे असे मानण्यास काही आधार नाही. राकांच्या राजवटीच्या पूर्वी राजाला स्वामी असे म्हणत नसत हेही खरे नाही. राज- नीतिशाक्लात राज्याच्या सात प्रकृतींविषयीचा एक प्रसिद्ध सिद्धान्त आहे. त्यात पहिळी आणि सर्वात महत्त्वाची प्रकृती राजा मानळी आहे आणि त्या प्रकृतीला स्वामी अशीच संज्ञा आहे. कोटिळीय अर्थशाक्लात याविषयीच्या अनेक प्राचीन आचार्यांच्या मतांचा निर्देश केला आहे. त्यांत सर्वत्र राजाचा निदेशक म्हणून स्वामी हाच शब्द वापरला आहे. मनुस्मृतिप्रभ्रती धर्म- शाक्षग्रंथांत सुद्धा पहिल्या प्रकृतीचा स्वामी असाच निदेश केळा आहे. सप्तप्रकृतिविषयक हा ड८ 1 खाठफ, ००. त्य... 170. 48-49. ६६ नाट्यशास्त्र सिद्धान्त शाकांची राजवट सुरू झाल्यानंतर प्रस्थापित झाला असे मुळीच समजता येण्यासारखे नाही. ठिवाय, शकांच्या एखाद्याच शब्दांचा संस्कृतमध्ये अनुवाद करण्याची आवश्यकता का उत्पन झाळी याची कल्पना करता येत नाही. आणि मुख्य गोष्ट अशी की नाटय- शाख्रात (१७.७६) स्वामी असे युवराजास संबोधावयास सांगितले आहे, राजास नाही. तेव्हा ठाकांच्या वेळेस व त्यांच्या प्रोत्साहनाने संस्कृत नाटक उदयास आले हे मत प्राह्म मानता येत नाही. ग्रीक नाट्याचा प्रभाव संस्कृत नाटकाच्या उदयाच्या वेळेस भारताचा प्रीस देशाशी संबंध आला होता. इसवीसनपूर्व चौथ्या रातकात अलेक्झांडर पंजाबपर्यंत दिगिजय प्राप्त करीत आला होता हे प्रसिद्ध आहे. त्याच्याही पूर्वी प्रीसवर आक्रमण करून जाणाऱ्या पर्शियन सम्राट झा्ससच्या सैन्यात भारतीय योद्धे असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे इसवीसनपूर्व दुसर्‍या रातकात बॅक्टियन ग्रीकांनी पंजाबात आपले राज्य प्रस्थापित केळे होते आणि ते बरीच वर्षे टिकले. ग्रीसमध्ये टॅजेडी आणि कॉमेडी ह्या दोन्ही नाव्यप्रकारांचा विकास अलेक्झांडरच्या पूर्वीच झाला होता. तेव्हा हे स्वाभाविक होते की काही पंडितांना संस्कृत नाटकाच्या उत्पत्तीवर ग्रीक नाट्याचा प्रभाव पडलेला दिसावा. असा संभव प्रथम वेबर यांनी निदिष्ट केला होता. त्यांच्या त्या मताचे विस्तृत समर्थन विंडिशा यांनी आन्तरराष्ट्रीय प्राच्यबिद्यापरिषदेच्या पाचव्या अधिवेशनात वाचलेल्या एका प्रबंधात केळे होते.** या प्रबन्धातील विवेचन जरी . अपुऱ्या माहितीवर आघारलेळे होते आणि जरी ते सर्वमान्य झाळेळे नाही तरी त्याचा विचार करणे उपयुक्त होईल, प्रथम ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की भारतात नाट्या'चे प्रयोग फार प्राचीन काळा- पासून होत असत आणि ते परकी नाट्यापासून स्फूती घेऊन अस्तित्वात आले नव्हते हे विंडिश यांना मान्य आहे. त्यांच्या मते ह्या प्राचीन नाट्याची उत्पत्ती अभिनया'चा महाभारत आदीच्या पठनाशी संयोग होऊन झाली, नृत्य-गीत यांच्याशी संयोग होऊन नाही. नटू, नट, नाटक हे सर्व शब्द प्राकृत आहेत, यावरून नाट्याची उत्त्ती सामान्य लोकांसाठी झाली होती व ती एक लोककला होती हे स्पष्ट होते. नाट्याला त्यावेळी वाड्ययीन स्वरूप प्राप्त झालेले नव्हते. परंतु नंतर म्रीक नाटयापासून स्फूती घेऊन संस्कृत नाटकाच्या ख्पाने नाटब वाड्मयीन स्वरूपात अवतीण झाले. ही संभाव्यता प्रस्थापित करण्यासाठी विंडिशा यांनी अनेक प्रमाणे सादर केळी आहेत. ४९ प. एातान्या, 009थ (आांच्लांध्या& फ्ा3ि085 पा पताव्लाला 10108”, कण्याटथा घावे पावडर वश अप्णीथा शऑथिदयायावाथा टाथांव- हढ्रशा--(0727255०5, टफ पळेी८ (छेश]1, 1882 ), ७0. 3-106. उपोद्धात | ९७ सवीसनपूर्वे चोथ्या शातकापासून पुढे भारतीयांचा ग्रीक नाट्याशी परिचय होणे संभाव्य होते. अलेक्झांडर पंजाबमध्ये काही महिने होता आणि त्याच्या बरोबर ग्रीक शास्त्रज्ञ पंडित यांखेरीज कळाकार सुद्धा होते. छुटाकने सांगितले आहे की पर्शिया, सूसा आणि गेड़रोसिया येथीळ युवक अलेक्झांडरसमोर युरिपिडीज आणि सोफोक्लीज यांच्या टॅंजेडी गाऊन दाखवीत. परंतु विंडिश यांना हे मान्य आहे की भारतीय नाटयाचे या टॅजेडींशी साम्य अत्यन्त प आहे. त्यांच्या मते संस्कृत नाटयाचे न्यू अटिक कॉमेडीशी खूपच साम्य आहे. तेव्हा द्याच कमेडीच्या प्रभावाने संस्कृत नाटकाच्या निर्मितीस प्रारंभ झाळा असावा. ह्या कॉमेडीचे सुवणयुग इसवीसनपूवे २४० ते २६० हा काळखंड होता. बॅक्टियन प्रीकांनी इसवीसनपूर्व दुसर्‍या शतकात पंजाबात आपले राज्य प्रस्थापित केले होते. त्या राजांच्या आश्रयाने ह्या ग्रीक कॉमेडीचे प्रयोग भारतात होत असावेत आणि ते भारतीयांच्या अवळोकनात थेत असण्याचा संभव आहे. याप्रमाणे ह्या ग्रीक नाट्याच्या प्रभावाने संस्कत नाटकाची उपपत्ती झाली असावी असे विंडिश यांनी प्रतिपादन केळे आहे प्रीक कॉमेडी आणि संस्कृत नाटक यांमध्ये विंडिश यांनी जी तुलना केली आहे तिच्यासंबंधी एकदोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी ज्यावेळेस आपळा प्रबंध ठिहिळा त्या वेळी न्यू अँटिक कॉमेडीचे काही त्रुटित अंशच उपलब्ध होते. एकही संपूण कॉमेडी तोपर्यंत उजेडात आली नव्हती म्हणून त्या ग्रीक कॉमेडीच्या अनुकरणाने ठॅटिन घेत टेरेन्स, प्लॉटस आदी नाटककारांनी ज्या कॉमेडी लिहिल्या त्यांच्याच आधारे विंडिश यांनी विवेचन केले भाहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांची अशी धारणा होती की मृच्छकटिक हे संस्कृत नाटकाच्या प्रारंभावस्थेचे निदशक आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या विवेचनाचा पाया कच्चा करणाऱ्या अशा आहेत. तथापि, त्यांनी प्रस्तुत केलेल्या मुद्यांची उपेक्षा करता येण्यासारखी नाही प्रीक कॉमेडी आणि संस्कृत नाटक यांमध्ये मुख्यत्वेकरून पुढीलप्रमाणे साम्य अस- ल्याचे विंडिशा यांनी म्हटळे आहे: (१) ग्रीक नाठ्यातीळ प्रोळॉग (77०1027/2) आणि संस्कृत नाटकांतील प्रस्तावना. (२) कथानकाची अंकांत विभागणी, तथापि, विंडिश यांना हे मान्य आहे की ग्रीक नाट्यात अंक नव्हते. ग्रीक भाषेत अंकाचा निदर्शक शब्द नाही तेव्हा हे साम्य यादच्छिक असण्याचा संभव ते मान्य करतात (३) प्रकाश, स्वगत, अपवा- रित इत्यादी रंगभूमीवरील भाषणप्रकारांविषयीचे संकेत. (४) कोणाची ओळख पटण्यासाठी अभिज्ञान-चिन्हांचा उपयोग, शाकुन्तलातील आंगठी, विक्रमोबशीयातीळ कुमार आयूचा बाण, रत्नावलीतील रत्नमाळा इत्यादी. (५) मृच्छकटिकाच्या कथानकाचे कॉमेडीच्या सर्व- साधारण कथानकाशी असलेळे साम्य. त्यातील विट म्हणजे रोमन केमिडीतीळ ०८००१८५ €व&>, राकार म्हणजे ॥॥77/९28_2९/०/70515 आणि विदूषक म्हणजे 6९01 टया2ण$. (६) नाट्यशा्लानुसार नटसंघात सूत्रवार, पारिपारश्वक, विदूषक, विट आणि शकार असे पाच दट नाट्यशास्त्र पुरुष नट असत. त्याचप्रमाणे प्रीक कॉमेडी करणाऱ्या नाटकमंडळीतही पाच पुरुष नटच असत. ह्या साम्यस्थलांपैकी काही अपुऱ्या माहितीवर आधारलेली आहेत, काही चुकी'च्या समजुतीवर आधारलेली आहेत, तर बाकीची निर्णायक स्वरूपाची नाहीत. काही वर्षांपूर्वी मिनान्द्र ह्या न्यू अँटिक कॉमेडीच्या प्रधान प्रवतकाने लिहिलेल्या तीन कोमेडींचे बहुतांश भाग उपलब्ध झाले. त्यावरून असे दिसते की अंकांत विभागणी न्यू कॅमेडीत नव्हती. टॅजेडी किंवा ओल्ड कॉमेडीप्रमाणेच कोरसच्या साहाय्याने कथानकाचे विभाजन दरशीविले जात असे. अंकांत विभागणी रोमन कॉमेडीतच आढळते. त्याचप्रमाणे मिनांदरच्या तिन्ही कॉमेडींतीळ पात्रे अथेन्समधीळ ख्ली-पुरुष नागरिक, दास, दासी, कृषक, गणिका अशा प्रकारची भिन्न स्वरूपाची आहेत. त्यांचे संस्कृत नाटकांतील पात्रांशी विशिष्ट असे साम्य नाही. मृच्छकटिकातीळ विटराकारादीशी साम्य असणारी पात्रे त्यात नाहीत. आणि मृच्छ- करिक हे संस्कृतातील प्रारंभीचे नाटक नसल्यामुळे त्याच्या आधारावर केलेला युक्तिवाद साहजिकच अग्राह्य ठरतो. तीच गोष्ट रोमन कॉमेडीच्या आधारे केलेल्या युक्तिवादा'ची. मिनांदरच्या कॉमेडींवरून हे स्पष्ट होते की अमिज्ञानचिन्हाच्या द्वारा एखाद्या व्यक्तीची ओळख पटणे ही न्यू कॉमेडी'च्या कथानकातील प्राणभूत घटना होती. प्राचीन अथेन्समध्ये नागरिकाला नको असलेले नवजात अभक टाकून दिले जात असे, पण तसे करताना रक्षाकरण्डक किंवा त्यासारखी वस्तू अर्भकाच्या शरीराशी संबद्ध ठेंवळी जात असे. ह्याच अभिज्ञानचिन्हाच्या साहाय्याने मोठेपणी त्या बालकाची ओळख पटते. संस्कृत नाटकांत अभि- ज्ञानचिन्हाचा असा उपयोग केळेळा दिसत नाही. शिवाय, ज्या नाटकांत अमिक्षानचिन्हाचा उपयोग केला आहे ती संस्क्रत नाट्याच्या प्रारंभीची असे म्हणता येण्यासारखे नाही. प्रीक नाट्यात प्रोलॉग असे, पण त्या'चे स्वरूप संस्कृत नाटकांतील प्रस्तावनेहून बहुतांशी भिन्न होते. त्यात प्रायः कवी आपल्या नाटकाबद्दळ किंवा त्यातील कथानकाबद्दल निवेदन करीत असे. त्यावरून प्रस्तावनेची कल्पना सुचली असे समजणे आवश्‍यक दिसत नाही. रंगभूमीवरीळ विविध प्रकारच्या भाषणांच्या संकेताबद्दळ असे म्हणता येईल की हे साम्य निर्णायक स्वरूपाचे नाही. स्वगत, अपवारित हे प्रकार प्रत्यक्ष जीवनात कधी कधी आढळून येणाऱ्या गोष्टींचे नाटयरूप आविष्कार होत. तेव्हा हे संकेत दोन्ही देशांत स्वतंत्रपणे उद्भूत झाळे असल्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. नाटबशास्त्रातील नटसंघात विंडिश यांनी निर्देरिळेल्या पाच पुरुष नटांब्यतिरिक्त इतर पुरुष नट असत आणि शिवाय नटीही असे. | यवानिका पडद्याळा नाटयशास्त्रात यवनिका असला शब्द आहे. भ्रीकांसाठी प्राचीन काळी वापरण्यात येणाऱ्या यवन शाब्दाशी त्या शब्दाचा संबंध जोडला जाणे स्वाभाविक होते. उपोद्धात ९९ विंडिश यांनी ग्रीक रंगभूमीवरीळ 5८८८४ अथवा भिंतीच्या अनुकरणा'चा निदर्शक असा हा शब्द असल्याचे म्हटले आहे. म्रीसमध्ये नट जेथे अभिनय करीत ती जागा आणि तिच्या पाठीमागची जागा यांमध्ये स्केने अभिधान असलेळी व एक दरवाजा असलेली भिंत असे. त्या दखाजातून पात्रे पाठीमागच्या 7०४/४८९/॥८५॥ मधून पुढील 77०५८९7८0१ मध्ये म्हणजे रंगभूमीवर प्रवेशनिष्कमणादी करीत. पाठीमागचा भाग नेपथ्यगृह्मासारखा हे उघड आहे. तेव्हा स्केनेशी जर कशा'चे सादृश्य असेळ तर नेपथ्यगृह आणि रंगभूमी यांच्यामधील दोन दरवाजे असलेल्या भिंतीचे, रंगशीषे आणि रंगपीठ यांच्या मध्ये असलेल्या यवनिकेचे नाही. वस्तुतः प्रीक रंगभूमीवर पडदा ही वस्तूच नव्हती. तेव्हा त्याच्या अनुकरणाने म्हणून संस्कृतात यवनिका शब्द आला असण्याचा संभव नाही. आणि कोनौ यांनी म्हटल्याप्रमाणे जर खरोखरीच ग्रीक नाट्याचा प्रभाव पडून संस्कृत नाटकाची उत्पत्ती झाली असती तरत्या गोष्टींची निदशक खूण ग्रीक रंगभूमीवर नसलेल्या पडद्याच्या रूपात न दाखविता नाट्याच्या एखाद्या महत्त्वाच्या भागाशी यवन शाब्दाचा संबंध जोडून प्रदाशित करणेच उच्चित झाले असते. ही अडचण लक्षात घेऊन लेव्हि यांनी असे सुचविळे आहे की यवनिकेमधीळ यवन शब्द प्रीक लोकांचा वाचक न समजता त्याने पा्शयन लोकांचा बोध होतो असे समजावे आणि यवनिका म्हणजे पर्दियातून आणलेला चित्राकृतियुक्त पट (थवा /७९५॥॥) असा अर्थ करावा." परंतु हा अर्थही पटण्यासारखा नाही. प्रीक आणि पर्शियन या दोघांनाही यवन शब्द लावीत हे मान्य केळे तरी रंगभूमीवरील पडद्यासाठी परियन टॅपेस्टरी आयात केली जात असे ही गोष्ट संभवनीय वाटत नाही. या संबंधात शक्यता अशी दिसते की ह्या शब्दाचे मूळ रूप यवनिका नसून जवनिका असे होते आणि त्यात कोणत्याही लोकांचा निदेश अभिप्रेत नाही. जवनिका शब्द पडदा ह्या अथी संस्कृत वाडूमयात अन्यत्रही आढ- ळतो. तो शब्द जू म्हणजे जोराने जाणे, वेगाने सरकणे ह्या धातूपासून. निष्पन्न झाळा असून मुळात तो 'पटी'चे बिशेबण असावा. जवनिका पटी म्हणजे वेंगाने इकडून तिकडे सरकणारा कपडा. नाट्यशास्त्रात एके ठिकाणी 'पटे चैवापकर्षिते (१२.३)' असे पडदा सरकविण्याच्या क्रियेचे निदर्शक वचन आहे, त्यावरून ह्या सूचनेला पुष्टी मिळते. सीताबेंगा व जोगिमारा गुहा ग्रीक नाट्याच्या संस्कृत नाठ्यावरीळ प्रभावाचे आणखी एक प्रमाण प्रस्तुत केले जाते. नाट्यशास्रात ज्या नाट्यमंडपांचे वर्णन आहे त्यांपैकी कोणत्याही प्रकाराचे ग्रीसमधील अर्धेगोलाकृति प्रेक्षागृहाशी (८०८॥/॥८८/८) काहीही साम्य नाही. तथापि, काही पंडि- तांच्या मते प्रीक अँफिथिएटरसारखे एक नाट्यगृह भारतात विद्यमान आहे.. छोटानागपूर- ७० $. उ.8९९1, ००. ८7४., 1. 348. 9७ नाटयदास्त्र _ मधील रामगढ जिल्ह्याच्या सराइकेला शहरापासून काही मैळ अंतरावर असलेल्या एका पहाडावर सीताबेंगा आणि जोगिमारा नावाच्या दोन गुहा आहेत. त्यांपैकी सीताबेंगा गुहेच्या बाहेर अर्थंगोळाकृती रचना आहे. यावरून ही गुहा ग्रीक अँफिथिएटरच्या अनु- करणाने नाट्यप्रयोगांसाठी तयार करण्यात आली असे या गुहांचे वर्णन करताना ब्लोश यांनी प्रतिपादन केळे आहे." या मताच्या समर्थनार्थ त्यांनी या दोन गुह्हांतील शिला- लेखांचा निर्देश केळा आहे. त्यांपैकी सीताबेंगा गुहेत प्राकृत भाषेत पुढीळ पंक्ती आहेत - “अदिपयंति हदयं सभावगरु कवयो एरातयं ... दुळे वसंतिया हासावानुभूते कुदस्फतं एवं अलंग (त) या पंक्तींचे सार पुढीलप्रमाणे सांगता येईल - “स्वभावतः श्रेष्ट असळेळे कवी लोकांचे हृदय उद्दीपित करतात --. वसंतक्तूतीळल दोळोत्सवात शुभ्र कुन्दमाळा परिधान करून लोक हास्य अनुभवतात.' जोगिमारा गुहेतील लेख पुढीळ प्रकारचा आहे - 'छहुतनुक नम देवदादिक्यि शुतनुक नम देवदर्गिक्यि त॑ क्मयिथ बलनरेये देवदिचक्षे नस ठूपदखे' (यात पहिल्या तीन शाब्दांची पुनरुक्ती झाली आहे). या लेखाचा अर्थ असा - 'वाराणसी'चा निवासी देवदत्त नावा'चा खूपद्रष्टा सुतनुका नावाच्या देवदासीवर प्रेम करतो.! ह्या लेखांच्या आधारे असे अनुमान करण्यात आले आहे की ह्या गुहांचा उपयोग नाट्यप्रयोगासाठी, कमीतकमी काव्यपठनासाठी होत होता. प्राचीन भारतात गुहांचा उपयोग मौज करण्यासाठी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा केला जात असे असे ल्यूडर्स यांनी प्रतिपादन केळे आहे."* कुमारसंभवातीळ हिमाल्याच्या वर्णनात दरीगृहात वनेचर सुरतक्रीडा करीत (१.१०) आणि त्या प्रसंगी दरीगृहाच्या द्वाराशी मेघांचा पडद्यातारखा उपयोग होत असे (१.१४), तसेच मेघदूतात नौचेर्गिरी पर्वेतावरीळ शिलावेश्माचचा याच क्रीडेसाठी उपयोग केला जात होता असे कालिदासाने म्हटले आहे, त्यावरून लेण्यांचा मनोरंजनाच्या कार्य- कमासाठी उपयोग होत होता याविषयी ल्यूड्स यांना शंका नाही. यासंबंधात त्यांनी मथुरा ५१ "0. छाल्या, “28४6 वात आाडलाठाड आ परेक्षणाडवाणी तात, 47८2०7०27०) 9५7०८५० ९/ शका, &प04 रिळूयॉ, 1903-1904, ७. 123-131. ५२ घत. फतकल, “पाताळ्याड प्ाह्या 98 »टा्ापे्टाणा४४$०10', 227//0, ४०1. 58 (1904), 0. 867-868. । उपाद्वात ७२१ येथीळ एका जैन शिलालेखातील 'लेणशोभिका' ह्या शब्दाचा निर्देश केळा आहे. कोणत्या तरी प्रकारच्या नाट्याचे प्रयोग शौभमिक करीत असे महाभाष्यावरून स्पष्ट आहे. तेव्हा ळणश[[भका म्हृणजे लेण्यात तसळे नाटय प्रस्तुत करणारी नटी असे त्यांचे मत आहे जोगिमारा शिळाळेखातील देवदासी शब्दाचा हाच अर्थ असावा असे ब्लोश यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ळूपदख म्हणजे रूपद्रष्टा हा शब्दही रूपके म्हणजे नाटके प्रस्तुत करणारा नट असे मानळे आहे. नाट्यप्रयोगासाठी गुहांचा उपयोग होत असे हे प्रतिपादन केल्यावर ब्लोदा यांनी सीताबेंगा गुहेच्या बाहेरच्या भागाचे वर्णन करून तेथीळ रचना प्रीक अँफिथिएटर'च्या अनुकरणाने करण्यात आली असे दाखविण्याचा प्रयत्न केळा आहे गुहा आतील बाजूस ४६ फूट लांब आणि २४ फूट रुंद अशी लंबचौरस असून तिन्ही भिंतींना ळागून दगडा- पेंच बाक तयार केळे आहेत. गुहेच्या बाहेरच्या बाजूस डावीकडे वर गुहेत चढून जाण्या- साठी बर्‍याच पायर्‍या दगडात खोदल्या आहेत. या पायऱ्यांच्या उजवीकडे गुहेच्या दर्शनी भागाळा समांतर असे पायरीपायरीने उतरत जाणारे दगडात खोदलेले बाक आहेत. हे चढण्याउतरण्यासाठी केळे असण्याचा संभव नसून त्यांचे अऑँफिथिएटरशी साम्य आहे असे ब्लोश यांचे म्हणणे आहे. शिवाय हे बाक जेथे संपतात त्या ठिकाणी समोर एक लहानसे पठार आहे, त्याचा नाट्यप्रयोग प्रस्तुत करण्यासाठी उपयोग केळा जाई. गुहेच्या आत जे बाक आहेत तेथून खाळ्चा प्रयोग दिसणे राक्‍्य नसल्यामुळे ब्लोश यांनी असे सुचविले आहे की ती प्रेक्षकांनी विश्रांती घेण्याची जागा असावी. तिन्ही बाकांवर मिळून एका वेळेस पन्नास माणसे विश्रांती घेऊ शकतीळ असा त्यांचा अंदाज आहे या गुहेत नाट्य कशा प्रकारे केळे जात असावे याविषयी कोनौ यांनी निराळेच मत प्रदशित केळे आहे. गुहेच्या दर्शनी भागी दोन्ही टोकांना दगडात खोळ भोके आहेत कोनौ यांच्या मते या भोकांत खांब पुरले जात असत आणि ह्या खांबांच्या आधारे दर्शनी भागावर एक पडदा लावला जाई. ह्या पडद्यावर छायांच्या साहाय्याने नाटय प्रस्तुत केळे जात असे असे त्यांचे मत आहे."२ नाटयशास्रातील कार्य: देल्गुहाकारो द्विभूमिर्नाटय- मंडप: । मन्दवातायनोपेतो निर्वातो धीरशब्दवान्‌ ॥ (२.८०-८१)' ह्या छोका'च्या आधारे शेंळगुहा नाटप्रयोगासाठी भरताळाही अभिप्रेत असावी असे त्यांनी सूचित केळे आहे. ह्या दोन गुहांच्या प्रयोजनाविषयीचे हे मत मुळीच प्राह्य मानता येण्यासारखे नाही. त्यात जे लेख आहेत ते नाटयप्रयोगाचे निदर्रीक आहेत असे समजणे शक्‍य नाही. सीता- बेंगा गुहेतीळ ठळेषात श्रेष्ठ कत्रींची स्तुती असन वसन्तक्रतूतीळ दोळोत्सबात होणाऱ्या मजेचा निर्देश आहे. त्यावरून ही गुहा नाटयप्रयोगासाठी किंवा काब्यपठनासाठी उप- ५२३ &खालळ्फ, ००. त्य., ७. 4. १99२ | नाट्यशास्त्र योगात आणळी जात असे असे मुळीच सूचित होत नाही. जोगिमारा गुहेतील ठेखात एका प्रेमिकाने देवदासीवरील आपल्या प्रेमाळा वाचा फोडली आहे इतकेच. नाटयप्रयोंग होत असल्याचे सूचित्त करण्यासारखे त्यात काहीही नाही. देवदासी मंदिरांत नुत्य करीत, त्यांना नटी समजणे बरोबर नाही. आणि ढपदख शब्द नटाचा बोधक आहे असे समजणे तर बिळकुळ शक्‍य नाही. विरोष म्हणजे जोगिमारा गुहेचा कोणत्याही प्रकारच्या नाटयप्रयांगा- साठी उपयोग होण्याची शक्‍यता सुद्रा नाही. ल्यूडर्स यांनी म्हटल्याप्रमाणे कालिदासाच्या वर्णनावरून पवेतावरीळ गुहांचा उपयोग सुरतक्रीडेसाठी होत असावा हे संभाव्य मानता येईल. जोगिमारा गुहेतील लेख अशा प्रसं- गाची साक्ष म्हणून कोरला गेळा असण्याची शक्‍यता आहे. परंतु ही किंवा अशाच प्रकारची चैन करण्यासाठी गुहांचा उपयोग केळा जात असे यावरून त्यांचा न ट्यप्रयोगासाठीही उपयोग होत होता असे समजणे कसे शक्‍य आहे? आणि शोभिका शब्दाचा नटी असा अथ मान्य केळा तरी गहेमध्ये नाटय प्रस्तुत करणाऱ्या विशिष्ट नट्या असत आणि त्यांना ठेण- शोभिका ही स्वतंत्र संज्ञा होती असे समजणे कितपत योग्य होईल? सीतानबेंगा गुहेच्या बाहेर जो अँफिथिएटरसारखा भाग आणि त्या पुढे पठार आहे तेथे नाठयप्रयोग होत असत असे समजणे सुद्धा कठीण आहे. ह्या पठारावर नाठ्य प्रस्तुत केळे जाई असे मानले तर नेपथ्यगृह्हाची काय व्यवस्था असावी असा प्रश्‍न उपस्थित होतो. ग्रीक नाट्यगृहात स्केने-भिंतीच्या पळीकडे 2०५7७८८२७7 नावाचा प्रेक्षकांना अद्र्य असा भाग असे. तशा प्रकारची काहीही व्यवस्था ह्या पठारावर केली गेळी असल्याची राक्‍यता नाही. तसेच गुहेच्या आतीळ भाग प्रेक्षकांना विश्रांती घेण्यासाठी राखून ठेवला असल्याची कल्पना विचित्र वाटते. विश्रांतीसाठी जागेची कोणाळा आवश्यकता असेळ तर ती नट-नटींना, प्रेक्ष- कांना नाही. ब्लोदा ह्यांनी सीताबेंगा गुहेच्या दोनी भागाचा जो फोटो सोबत जोडळा आहे तो पाहून त्याचे ग्रीक नाटयगृहाशी साम्य असल्याचे मुळीच प्रतीत होत नाही. कोनी यांनी येथे छायानाटच प्रस्तुत केळे जात असावे असे जे मत मांडळे आहे ते तर मुळीच स्वीकारता येण्यासारखे नाही. गुहेच्या दर्शनी भागावर पडदा असून त्यावर छाया पाडल्या जात असे मानळे तर छाया कोठून पाडल्या जात आणि प्रेक्षक कोठे बसत असा प्रश्‍न उपस्थित होतो. छाया गुहेच्या आतूनच पाडल्या जाण्याची शक्‍यता आहे. बाहेर उतार असल्यामुळे तेथून पाडता येण्याची मुळीच शक्‍यता नाही. पण छाया गुहेच्या आतून पाडल्या जात याचा अर्थ नट व नटी गुहेतच अभिनय करीत असत. मग हे छायानाट्य पहाणारे प्रेक्षक कोठे बसत बाहेरच्या अफिथिएटरसदश बाकांतर बसून ते पहात असे समजणे शक्‍य नाही. कारण हे बाक खांळी उतरत जाणाऱ्या पायऱ्यासारखे असल्यामुळे पडद्यावरील छाया सव प्रेक्षकांना सारख्याच दिसणे शकय नाही आणि मुख्य म्हणजे ह्या बाहेरच्या बाकांवर प्रेक्षक बसल्यास त्यांची पाठ पडद्याकडे वळळेळी असेल, तेव्हा त्यांना ते छायानाटय कसे दिसणार? उपोद्धात ७३ खरी गोष्ट अशी आहे की नाटयप्रयोगासाठी शहरापासून दूर असलेल्या डोंगरावरील गुहांचा उपयोग होत असे ही गोष्ट मुळातच अस्वाभाविक आहे. सामान्यतः नाटब- प्रयोग यात्रा, उत्सव यांसारख्या प्रसंगी केळे जात आणि त्यावेळी तात्पुरत्या उभारलेल्या नाटयमंडपावरच काम भागविळे जाई, कायमच्या स्वरूपाचे नाटयगृह बांधणे कोठे संभाव्य असेळ तर ते शहरातच किंवा त्याच्या परिसरात, शहरापासून दूर असलेल्या डोंगरावर नाही. श्रिया, मुळे, वृद्ध माणसे इत्यादी सुद्धा नाटके पहायळा जातात असे नाटय- शास्त्रात म्हटळे आहे. ही सर्वे मंडळी नाटक पहाण्यासाठी इतक्या दूर डोंगर चढून येत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यात पुन्हा अडचण अशी की ह्या दोन गुहांकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर एकशेऐशी फूट लांब व हत्ती सहज जाऊ दाकतील इतक्या उंचीचा एक मोठा बोगदा आहे. त्याला हाथीपोळ असे म्हणतात. दुपार उल्टून गेल्यावर नाटयप्रयोग पहाण्यासाठी लोक या बोगद्यातून जात आणि प्रयोग पाहिल्यावर त्यातून रात्रीच्या वेळी परतत ही गोष्ट असंभाव्य वाटते. कोनौ यांनी नाटयशास्त्रातीळ ज्या छोकाचा निर्देश केळा आहे त्यात नाटय- मंडपाचा आकार शेलगुहासारखा असावा एवढेच म्हटळे आहे. नटांचे शब्द आणि वाद्यांचे ध्वनी अनायासे सर्वत्र ऐकू यावेत हा या आकारामागीळ उद्देश आहे असे अभिनवगुप्ताने स्पष्टीकरण केळे आहे. ह्या छोकात आकाराचे गुहेशी साम्य असावे असे म्हटळे आहे. त्यावरून प्रत्यक्ष शौळगुहाच नाटयप्रयोगासाठी भरताळा अभिप्रेत होती असा निष्कषे निधत नाही. आणि ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे की नाट्याशी संबंध जोडणे शक्‍य झाळे आहे अशी ही एकच सीताबेंगा गुहा आहे. भारतात सर्वत्र असंख्य रौलगुहा आहेत. पण इतर कोठेही गुहेचा नाटयप्रयोगासाठी उपयोग होत असावा असे अंघुक सूचन करणेही शक्‍य झाळेळे नाही. जर गुहांचा तसा उपयोग नाटयशास्त्राला खरोखरच मान्य असता तर इतरत्रह्मी त्याची चिन्हे अवश्य निदशनास आली असती. सीताबेंगा गुहा नाटयप्रयोगासाठी उपयोगात आणली जात होती हे मत याप्रमाणे अस्वीका्ये असल्यामुळे तिच्या रचनेवर म्रीक अँफिथिएटरचा प्रभाव पडळा होता हे मतही निमूळ ठरते. वस्तुतः ग्रीक नाटयगृह आणि पर्वतावरील गुहा यांच्यात कोणत्याच प्रकारचा संबंध नाही. ग्रीक नाटयगृह नेहमी शहरातच किंवा त्यापासून अगदी जवळच बांधण्यात येत असे. तेव्हा त्याचे अनुकरण करावयाचे ठरविळे तर शहरापासून दूर डोंगराच्या वरीळ भागी असलेली गुहा त्यासाठी योग्य ठिकाण म्हणून निवडळे गेळे हे कसे संभाव्य मानता येईल 2 आणि अनुकरण केळे असल्याचे चिन्ह कोणते तर फक्त खाळी जाणाऱ्या किंचित अधेगोळाकृती दगडी पायऱ्या. ग्रीक नाट्यगृहात आवश्यक असलेली स्केने नावाची मिंत, त्यापुढीळ आणि मागील अशी झाळेली जागेची विभागणी याचे कोणतेही चिन्ह त्या ठिकाणी ७४ नाट्यशास्त्र नाही. आणि ही सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट होईल की प्रीक नाट्यगृह्याचा प्रभाव पंजाबपासून छोटा नागपूरपर्यंत अन्यत्र कोठेही दिसून येऊ नये आणि सहसा त्याचे दशन त्या प्रदेशा- तीळ एका निजेन टेकडीवर व्हावे. वास्तविक श्रीकांची सत्ता पंजाबमध्ये कित्येक वर्षे होती. जर ग्रीक नाट्यगह्दाचे अनुकरण होण्याचा कोठे संभव असल्याचे मानता येईल तर तो पंजाबमध्ये. पण त्या ठिकाणी त्याचे कसळेचच चिन्ह नाही. तेव्हा प्रीक नाठ्यगृह्वाचा भारता- तीळ नाटयमंडपनिर्मितीवर प्रभाव पडळा होता हेच संशयित असल्यामुळे ग्रीक नाट्यापासून स्फूती घेऊन संस्कृत नाटक उदयास आले या मताला त्याने पुष्टी मिळण्यासारखी नाही. ग्रीक व संस्कृत नाट्य वस्तुत: ग्रीक नाट्य व संस्कृत नाटय यांच्या मूळभूत प्रकृतींत पुष्कळच फरक आहे. प्रीक ट्रॅजेडी व संस्कृत नाटक यांच्यात विषयाच्या बाबतीत काही अंशी साम्य आहे. पुरा- तन कथांतील उदात्तप्रकृती व्यक्तींच्या चरिताचे दर्रीन दोहोंतही घडते. पण ते घडविण्याचा प्रकार आणि त्याचे प्रयोजन यांबाबतीत दोहोंत महत्त्वपूर्ण मिन्नता आहे. टॅजेडीमध्ये एकाच दिवशी एकाच ठिकाणी घडणाऱ्या परस्परांशी सव प्रकारे संबद्ध असणाऱ्या घटनांचा अनिवार्य परिणाम म्हणून दुःखकारक शेवट होतो. यात काळ, स्थल आणि घटना यांच्या बाबतीतील एकतेला (५०८/) महत्त्वाचे स्थान असून अति गतिमान असलेल्या कथानकाचा दुःखद अंत होणे आवश्यक होते. संस्कृत नाटकात स्थळकाळाऱचची एकता मुळीच आवश्यक मानलेली नाही. रामकथेवरीळ नाटकांत अयोध्या, पंचवटी, ठंका आदी एकमेकापासून दूर असलेली स्थळे आणि चौदा वर्षाइतका काळावधी यांची योजना सहज होऊ राकते. तसेच घटनांच्या एकतेवरही संस्कृत नाटकांत भर दिलेळा दिसत नाही. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की पताका, प्रकरी यांसारखे प्रासंगिक उपकथानक मुख्य कथानकाच्या परिपोषाळा उपयुक्त असले पाहिजे असे नाटबशास्त्रात म्हटले आहे. म्हणजे कथानकाची सुसूत्रता संस्कृत नाट्यात अपेक्षित आहेच. पण याहून महत्त्वाचा फरक कथानकाच्या आहायाऱच्या संबंधात दिसून येतो. ग्रीक टॅजेडीत नायकाला मुख्यतः दैवाने निर्माण केलेल्या परिस्थितीशी झगडणे आवश्यक होते आणि त्यात त्याळा अनंत यातना सहन कराव्या ठागून अन्ततः तो पराभूत होतो व प्रसंगी त्याचा मृत्यूही ओढवतो. परंतु या पराभवातचच त्याचे महानुभावत्व प्रकट होते, कारण दैवाशी झगडण्यातच पुरुषार्थ मानळा आहे. अश्शा तऱ्हेच्या कल्पनेला सस्क्रत नाटकात मुळीच अवकाश नाही. नाटकाचा जो नायक त्याला अंती फला'ची प्राप्ती झाळीच पाहिजे असा दंडक आहे. तेव्हा नायक पराभूत होऊन नाटका'चा शेवट दुःखात होणे शक्‍य नाही. ग्रीक टेजेडी आणि संस्कृत नाटक यांच्यातील ह्या भेदाचे मूळ प्राचीन ग्रीक व भारतीय या दोघांच्या स्वभावधर्माच्या मित्नतेत अथवा जगाकडे पहाण्याच्या दृष्टिकोणाच्या मिन्नतेत उपाद्वात | ७५ असण्याचा संभव आहे. पण ते काहीही असले तरी ह्या दोन प्रकारच्या नाटयांची प्रकृती बहुतांशी भिन्न असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आणि त्यामुळे एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडळा असल्याची राकयता वाटत नाही. | | प्रीक नाट्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात केला जाणारा कोरस'चा उपयोग. देजेडी आणि लुनी व नवी कॉमेडी यात सर्वत्र कोरसची योजना आहे, अंक हा प्रकार प्रीक नाट्याठा अवगत नाही. जर खरोखरच ग्रीक नाट्यापासून प्रेरणा घेऊन संस्कृत नाटक उत्पन्न झाळे असते तर संस्कृत नाट्यात कोरसचे दर्शन कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात झाळेच असते. परंतु त्याचे कोठेही काही चिन्ह नाही. ग्रीक नाटयप्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की ज्या पात्राची भूमिका करावयाची त्याला अनुरूप असा सुखवटा (७८८७६) धारण करूनच नट रंगभूमीवर येत. तसा काही प्रकार संस्कृत नाटय- प्रयोगात नव्हता. इतकेच नाही तर मुखावरीळ नेत्र, झुवयपा आदी विविध अवयवांनी करावयाच्या अभिनयाच्या विस्तृत वर्णनावरून हे स्पष्ट आहे की नटाने मुखवटा बारण करून रंगभूमीवर अवतीर्ण व्हावे ही केल्पना संस्कृत नाट्याळा माहीतही नव्हती. ग्रीक नाटयप्रयोगात स्त्रियांची कामे पुरुष नटच करीत. महा भाष्यात स्त्रीच्या वेषात असणाऱ्या पुरुषाला अूकुंस असे म्हटले आहे.५४ पण हे स्रीची भूमिका करणाऱ्या पुरुष नटाचे वर्णन आहे हे निश्चित नाही. त्यात हिजड्याचा निदेश असण्या-चाही संभव आहे. तथापि नाटबशास्त्रात पुरुष नटांनी करावया'च्या क्ीभूमिकांना उद्देशून रूपानुरूपा योजना असे म्हटळे आहे. पण त्याचबरोबर स्त्रियांनीही पुरुष पात्रांच्या भूमिका करण्यास हरकत नाही असे म्हटले आहे. तेव्हा या संबंधात ग्रीक नाट्यप्रयोगाचा संस्कृत नाट्य- प्रयोगाच्या पद्धतीवर प्रभाव पडळा असे म्हणता येण्यासारखे नाही. संस्कृत नाट्याची दोन प्रधान पैशिष्ट्ये आहेत. एक गद्य आणि पद्य ह्या दोहोंचाही एकाच कृतीत उपयोग आणि दुसरे संस्कृतबरोबर प्राकूत भाषांचाही उपयोग. अशा प्रकारची वैशिष्ट्ये ग्रीक नाट्यात आढळत नाहीत. ग्रीक नाट्याच्या प्रेरणेने संस्कृत नाट्याची उत्पत्ती झाळी असे मानल्यास ह वैशिष्ट्ये कोठून आली या प्रश्नाचे उत्तर त्यात सापडणार नाही. खरी गोष्ट अशी दिसते की संस्कृत नाटकाची उत्पत्ती दुसऱ्या कोणत्या तरी गाट्याच्या अनुकरणाने झाळी असावी असे समजण्याची मुळी सुद्धा आवश्यकता नाही. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री भारतातच विद्यमान होती. अनेक पंडितांनी ५४ 'स्तनकेशवती स्त्री स्याछ्लोमशः पुरुषः स्मृतः इति ल्झित्स्तीपुंसयोज्ञाने तति भ्रकुसे टापू प्राप्नोति । यद्धि लोके दृष्टेतदवसीयत इयं स्रीति अस्ति तदू भ्रूकुसे । (४.१.३ सूञ्तावरील महाभाष्य), ७६ | | नाट्यशास्त्र भारतातील ळोकनाट्याचे प्राचीनत्व मान्य केले आहे. ज्यांना हे मान्य नाही त्यांच्या मंते प्राचीन काळी धार्मिक नाट्य अस्तित्वात होते. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी स्वख्पात नाट्याची परंपरा भारतात फार प्राचीन काळापासून आहे हे सर्वमान्य आहे. नटांच्या कळेचे शास्त्र प्रस्थापित होऊन त्यावर पाणिनीच्या काळी संस्कृत भाषेत प्रंथ- रचना झाली होती. त्याच सुमारास आख्यान, आख्यायिका आदी स्वरूपाच्या संस्कृत विदग्ध वाड्मयाच्या निर्मितीस प्रारंभ झाळा होता. देवदेवतांच्या पुरातन कथा, प्राचीन इतिहास, लोककथा आदी नाट्यासाठी आवश्यक विषय प्राचीन का ळापासून उपलब्ध होते. ह्या सवे सामग्रीच्या संयोगाने विदग्ध संस्कृत नाटबाच्या निर्मितीस स्वतंत्रपणेच प्रारंभ झाला असावा असे समजण्यास काही हरकत दिसत नाही. ही गोष्ट पतज्ञलीच्या काळी किंवा किंचित मागेपुढे घडून आली असणे संभवनीय आहे. नाट्यशास्त्राचे पाठ प्रस्तुत भाषांतरासाठी नाठट्यशाक्ाचे जे पाठ स्वीकारळे आहेत ते मुख्यतेकरून बडोदे येथून गायकवाड्स्‌ ओरिएंठळू सीरीजमधे प्रकाशित झालेल्या प्रतीळा अनुसरून आहेत. त्याच प्रतीत अभिनवगुप्ताची टीका छापळेलळी असल्यामुळे असे होणे स्वाभाविक झाळे. तथापि त्या प्रतीत जे छछोक काही हस्तलिखितात आढळत नसल्यामुळे संपादकांना प्रक्षिप्त वाटले आणि ज्या छोकांवर अभिनवगुप्ताची टीका नाही असे *होकही मूळ प्रंथातच समाविष्ट केळे असून त्यांना चाळू क्रमांकच दिळे आहेत. हे प्रक्षिप्त वाटणारे &छोक कंसात दिळे आहेत हे खरे आहे. परंतु इतर छोकांबरोबर एकाच क्रमात छापळे असल्यामुळे हे होक भरतकृत नाहींत ही गोष्ट स्पष्ट होत नाही. प्रस्तुत भाषांतरात हे शोक मूळ नाटबशास्त्रात समाविष्ट न करता टीपांत उद्धृत केळे आहेत. त्यामुळे ह्या दोन अध्यायांतीळ छोकांची संख्या व त्यांचे क्रमांक यांच्या बाबतीत भिन्नता उत्पन्न झाळी आहे. बडोदे प्रतीत अठराव्या अध्यायात एकशे साडेसव्वीस आणि एकोणविसाव्या अध्यायात एकशे चोपन छोक क्रमवार दिळे आहेत, तर प्रस्तुत भाषांतरात अनुक्रमे एकशे सोळा आणि एकशे तीसच &ञोक स्वीकृत केलेळे दिसतील. छोकांतीळ पाठ मुख्यतः बडोदे प्रतीवरून'च घेंतळे आहेत. तथापि, काही थोड्या ठिकाणी त्या प्रतीतीळ पाठ न स्वीकारता अन्य प्रतींतील पाठ पसंत केळे आहेत. स्वीकृत न झालेळे निरनिराळ्या प्रतींतीळ पाठ तळटीपांत दिळे आहेत. तेथे निरनिराळ्या प्रतींचा निर्देश पुढीलप्रमाणे केला आहे- ब > बडोदे प्रत, नि > निर्णयसागर प्रत, का < काशी येथे प्रसिद्ध झालेळी प्रत आणि थो > मनोमोहन घोष यांनी प्रसिद्ध केळेळी प्रत. डॉ. घोष यांनी मुख्यतया काशी प्रतीचे अनुसरण केळे आहे. त्या प्रतीप्रमाणे प्रस्तुतचे १८ व १९ हे अब्याय अनुक्रमे २० ब २१ असे आहेत. त्याचे कारण तीत इतरांच्या उपांद्धात ७७ नवव्या अध्यायाचे ९ व १० असे आणि सतराव्या अध्यायाचे १८ व १९ असे दोन दोन अध्याय केळे आहेत. त्या प्रतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्यात लास्यांगांचे वणन एकविसाव्या अध्यायात न करता विसाव्या अध्यायात समाविष्ट केळे आहे. अगोदरचा अध्याय आर्यादृत्तात आणि नंतरचा अनुष्टुम छंदात आहे हे लक्षात घेतळे असता ठास्यांगांचे वर्णन करणारे भनुष्टुभ छोक नंतरच्या अध्यायातच सूळ असण्याचा अधिक संभव आहे. ोकांचे भाषांतर करताना त्यांचा जो स्वाभाविक अर्थ असावा असे वाटले तोच मुख्यत: विचारात घेतळा आहे, पण तो अर्थ अभिनवयुप्ताने केलेल्या व्याख्येशी सर्वत्र जुळता आहे असे नाही. किंबहुना, अनेक ठिकाणी असा प्रत्यय येतो की अभिनवगुप्ताने ढावळेळा अर्थ श्होकात अभिप्रेत असण्याची शक्‍यता नाही. १८.१५, १९.५, १९.१५, १९.२६, १९.२७ इत्यादी &छोकांची अभिनवगुप्तकृत व्याख्या पाहिल्यास हे स्पष्ट होते. तसेच पुष्कळ वेळा शब्दांचे स्वाभाविक अर्थ न स्वीकारता त्याने निराळेच अर्थ केले आहेत. उदाहरणार्थ, प्रयोगत: (१८.१), विषय (१८.१०), गुणैः (१८.१ १), सगुणाम्‌ (१९.११), प्राह्ञ: (१९. २५), दीप्त (१९.५१) इत्यादी. अशा ठिकाणी अभिनवयुप्ताने केळेळा अर्थ स्वीकारणे शक्‍य झाळे नाही, तरी सामान्यतः छोकाचा अर्थ ळावताना त्याच्या न्याख्येचा फार उपयोग झाला यात शंका नाही. अभिनवयुप्ताच्या पूर्वी नाटयशास्त्रावर अनेक पंडितांनी टीका लिहिल्या होत्या, त्यांपैकी उद्भट, ळोळूट आणि रक्षक यांच्या भिन्न मतांचा निर्देश त्याने प्रस्तुत दोन अध्यायांवरील टोकेत काही ठिकाणी केळा आहे. त्या शिवाय अनेक जागी नावनिर्देश न करता त्याने प्राचीन टीकाकारांचा निर्देश 'केचित्‌? किंवा 'अन्ये' अश्ना शब्दांनी केळा आहे. अगोदरच्या टीकाकारांच्या भिन भिन्न मतांच्या ह्या उल्लेखांवरून हे स्पष्ट होते की नाटबशास्रातील काही छोकांच्या अर्थाबद्दळ प्राचीन काळापासून भिन्न मते प्रचलित झाळी होती. ह्या प्राचीन टोकांपैकी सध्या कोणतीच उपलब्ध नाहे. त्यांच्याविषयी जी काय माहिती मिळते ती अभिनवयुप्ताच्या व्याख्येवरूनच. अभिनवभारती अमिनवभारतीचे भाषांतर करण्यासाठी प्रथम त्या व्याख्येतीळ पाठ आुद्ध करून घेणे आवश्यक होते. बडोदे येथीळ प्रतीत छापळेळी ह्या दोन अव्यायांवरील व्याख्या असमाधान- कारक आहे. अनेक जागी अर्थबोध होणे फार कठीण आहे. अमिनवभारतीची दोन हस्त- लिखिते उपलब्ध झाळी आहेत. दक्षिण भारतात तीनचार ठिकाणी मिळून प्राप्त झालेल्या एका हस्तलिखितावरून तयार केळेली प्रत मद्रास येथील गरव्हर्मन्ट ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्टस्‌ लायब्ररीत आहे. दुसरे हस्तलिखित त्रिवेंद्रम येथे केरळ युनिव्हसिटीच्या संग्रहात आहे. या १9८ | नाट्यशास्त्र दोहोंचा उपयोग करून श्री कवींनी अभिनवभारती छापळी आहे. तेव्हा मूळ हस्तलिखि- ताचा उपयोग झाळा तर पहावे म्हणून मद्रास येथीळ प्रतीची नक्कळ करून मागविली. तिचा प्रस्तुत कामी फार उपयोग झाला हे भाषांतरानंतरच्या टीपांवरून दिसून येईल, ही नक्कळ करून पाठविल्याबद्दळ मद्रास येथीळ लायब्ररीच्या अधिकाऱ्यांचे ब त्या कामी साह्य केल्याबद्दल पुण्याच्या भांडारकर इन्स्टिटबूटच्या क्युरेटरांचे आभार मानणे आवऱ्य आहे. | | त्रिवेंद्रम येथील हस्तठिखितावरून तयार केळेळी प्रत वाराणसी येथीळ सरस्वती भवन भंडारमध्ये आहे. वाराणसीतीळ ह्या प्रतीवरून तयार केळेली प्रत पुण्याच्या भांडारकर इन्टि- ट्वूमध्ये आहे. पाठ्युद्धीच्या कामी ह्या प्रतीचा उपयोग झाळा तर पहावा या हेतूने मळा मिळाळेल्या मद्रास प्रतीशी भांडारकर इन्स्टिट्ूटमधीळ प्रत ताडून पराहिळी. पण असे अट- ळून आळे की दोन्ही प्रतींत अशुद्ध पाठ आणि नुटि यांसंबंधात काहीच फरक नाही. मद्रातच्या प्रतीचे मूळ हस्तलिखित आणि ब्रिवेंद्रमचे हस्तलिखित ही मूळ एकाच हस्त- ठिखितावरून तयार केलेली आहेत यात शांका नाही. प्रस्तुत टीपांमध्ये 'हस्तलिखितः असा जो निर्देश आहे तो मद्रास येथील प्रतीचा. 'मुद्रित' असा निदेश अर्थात बडोदे येथून प्रसिद्द झालेल्या अभिनवभारतीचा. टीपांवरून असे दिसून येई की जागजागी मुळातीळ पाठांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. शुद्ध केळेळे बहुतेक पाठ स्वीकार्य ठरतील अशी आशा आहे. तथापि हे मान्य केळेच पाहिजे की काही थोड्या ठिकाणी सुचविलेली दुरुस्ती सर्वांना पटेलच असे नाही. किंबहुना, अशा काही ठिकाणी मळाच खात्री वाटत नाही. शिवाय, दोनचार ठिकाणी पाठ इतकें अशुद्ध आहेत की ते तसेच राहू देण्याशिवाय गत्यन्तर नव्हते. तीच गोष्ट क्चित आढळणाऱ्या तुटींची, असे ग्रंथ छापण्याची सामान्य पद्धत अशी आहे की अशुद्ध पाठ मुळात तसा'च ठेवून केळेळी अगर सुचविलेली दुरुस्ती त्याच्यापुढे कंसात छापा- वयाची. पण त्याने सामान्य वाचकाचा गोंधळ उडतो. यास्तव येथे टीका दुरुस्त पाठां- सहितच छापून मूळ अशुद्ध पाठांचे निदेशपूवे विवेचन टीपांमध्ये केळे आहे. यामुळे टीकेचा अर्थबोध सुलभतेने हीऊ शकेळ, आणि सूळ पाठही टीपांत पहावयास मिळतीलच. अभिनवभारतीच्या भाषांतराचे काम फारसे त्रासदायक नाही, कछोकांचे अथ समजा- वून सांगण्यासाठी अभिनवगुप्ताने सामान्यतः सोपीच भाषा वापरली आहे. आपल्या व्याख्येचे स्वरूप कशा प्रकास्चे असणार ते त्याने सुरुवातीसच पुढील शाब्दांत सांगितले आहे - उपादेयस्य संपाठस्तदन्यस्य प्रतीकनम्‌ । स्फुटन्याख्या विरोधानां परिहारः सुपू्णता ॥ ५ ॥ उपोद्घात ७९ लक्न्यानुसरणं ल्िष्टवक्तन्यांशविवेचनम्‌ | संगातेः पोनरुत्त्यानां समाधानसमाकुलळम ॥ ६ ॥ संग्रहय्ेत्ययं व्याख्याप्रकारोत्र समाश्रितः । प्रस्तुत दोन अध्यायांवरील अभिनवभारतीत ह्या गोष्टींचा सर्वत्र प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. पर उद्भृत केलेल्या व्याख्याप्रकारात उदाहरण देण्याच्या प्रकाराचा खास निदेश नाही. कदाचित 'लक्ष्यानुसरण' मध्ये तो अन्त भंत असावा. प्रस्तुत अध्यायांच्या व्याख्येत जागजागी उदाहरणे देणे आवश्यक होते. वीथ्यंगे, संधी, संध्यगे, पताकास्थानक इत्यादींचे स्वरूप स्पष्ट होण्यास उदाहरणे उपयुक्त ठरळी आहेत. अभिनवगुप्ताने दिळेळी उदाहरणे बहुतेक सध्या प्रासेद्र असलेल्या अशा नाटकातीळच आहेत. तथापि, कित्येक उदाहरणे कृत्यारावण, माया- उपक, पुष्पदूषितक, पाण्डवानन्द, देवीचन्दगुप्त यासारख्या सध्या अज्ञात असलेल्या नाटकांतून उद्धृत केळी आहेत. संध्यंगांच्या उदाहृरणांच्या बाबतीत असे दिसते की त्यासाठी वेणीसंहार नाटक (सुखसंधीच्या अंगांसाठी) आणि रत्नावली नाटिका (इतर चार संधींतील अंगांसाठी) यांचाच उपयोग केला आहे. ह्या नाट्यकृतींची रचनाच भरताचे नियम पुढे ठेवून केळेळी असण्याचा संभव आहे. यासंबंधात ही गोष्ट ब्यानात घेण्यासारखी आहे की दरार्पावरील अवळोक टीकेत धनिकाने तंध्यंगांची उदाहरणे मुख्यतः ह्याच दोन नाटय- कृतीतून उद्धत केळी आहेत, वर म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी अभिनवयुप्ताने नाटयश्शास्त्रातीळ &ोकांचा स्वाभा- विक अर्थ न देता शब्दांची व त्यांच्या अर्थाची ओढाताण करून अर्थ निष्पन्न केळा आहे. याचे एक कारण असे दिसते की भरतानंतर ज्या कोहलप्रश्‍ती आचार्यांनी नाटयशास्रावर ग्रंथ लिहिळे होते त्यांच्या मतांचाही निदेश प्रस्तुत नाठ्यशाक्षात आहे असे त्याला वाटत असावे. शास्न मुळातच संपूर्ण स्वरूपात अवतीर्ण होते, त्याचा विकास वौरे काही होत नाही असा विचार प्रसृत असल्यामुळे समन्वय करणे आवश्यक वाटून स्वाभाविक नसलेले अर्थ केळे गेळे असे म्हणता येईल. तथापि, हें लक्षात ठेवळे पाहिजे की एके ठिकाणी (१८.१०१ व्याख्येनंतरच्या अंशात) अभिनवयुप्ताने असे स्पष्ट म्हटछे आहे की कोहळाचे मत भरत- सुनीच्या मताशी विरुद्ध असल्यामुळे त्याची उपेक्षाच केली पाहिजे. हे असे स्वाभाविक नसलेले अर्थ 'ावण्यात अभिनवयुप्ताचे बुद्धिपाटव साहजिकच अभिव्यक्त होते. त्याशिवाय त्याच्या बुद्धीची चतुरस्रता सर्वत्रच प्रत्ययास येते. भभिनवभारतीसमेतं भरतमुनिप्रणीतम्‌ नाटचशास्त्रम्‌ अष्टादशो$ध्यायः बंतैथिष्याम्यह विप्रा दशरूपाविकल्पनम । नामतः कमंतश्वेव तथा चेव प्रयोगतः ॥ १॥ हे विप्रांनो, मी आता दहा रूपकप्रकारांचे विविध स्वरूप (त्यांची ) नावे, व्याख्या आणि त्याचप्रमाणे प्रयोग ह्यांचे द्वारा स्पष्ट करून दाखविणार आहे. रूपं यदेतहह्धा चकास्ति तयेन भावी भविता न जातु । तच्चक्षुरकोत्मकमीश्वरस्य वन्दे वपुस्तेजससारधासम्र: ॥ जे हे रूप अनेक प्रकारे प्रकारामान होत आहे, ज्याच्यामुळे पुढे होणारा प्राणी कधीही होणार नाही, त्या सूर्यस्वरूपी ईश्वराच्या नेत्राळा - तेजोमय साराचे निधान असलेल्या ( इंश्वराच्या) मूर्तीला -मी वंदन करतो. अमिनबभारतीत प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी मंगलर्छोक आहेत. हे सर्व छोक शिवस्तुतिपर असून त्यांत शिवाच्या एखाद्या विशिष्ट स्वरूपाला अथवा मूर्तीला वंदन केंठेले असते. सामान्यतः, अध्यायातील विषयाच्या सूचक अश्या शद्वांनी प्रारंभीच्या मंगल्श्ळोकात शिवस्वरूपाचा निदेश केलेला असतो. तदनुसार दहा रूपकांचे विवेचन करणाऱ्या प्रस्तुत अध्यायाच्या प्रारंभीच्या मंगलळन्छोकात “रूप? गाद्वाचा उपयोग केला आहे. शिवाच्या आठ तनूंपँकी अर्क म्हणजे सूर्य ही एक आहे हे प्रसिध्द आहे. तसेंच सूर्य हा ईश्वराचा नेत्र होय ही कल्पनाही सर्वच्या परिचयाची आहे. ह्या दोन्ही कल्पनांची प्रस्तुत शछोकात सांगड घातलेली दिसते. कारण, 'चक्षु; आणि 'बपुः हे दोन्ही राब्द भन्देः ह्या १ का विशो. २ नि कथयिष्यामहं. ४. य नाट्यशास्त्र क्रियापदाचे कर्म असल्यामुळे त्यांच्यात सामानाधिकरण्य मानणे आवश्यक आहे. एकाद्ृष्टीने जोनेत्रतो दुसऱ्या दृष्टीने शरीर अशी कल्पना अभिप्रेत असावी. पण ही कल्पना तितकीशी आकर्षक वाटत नाही. 'तेजससारधाम्न!? हे (ईश्वरस्य' चे विशेषण आहे. 'छोकाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ सर्वथा स्पष्ट नाही. सूर्यामुळे “भावी? केव्हाही अस्तित्वात येणार नाही याचा अथ सूर्याच्या प्रसादाने मनुष्याला मुक्ती मिळून त्याला कधीही पुनजन्म प्राप्त होत नाही अश्या तऱ्हेचा असावा असे वाटते. “भावी? हा शब्ट पुल्लिंगी असल्यामुळे त्याचे विशेष्य 'मनुष्यः?, 'जन्तुः?, “प्राणी, अश्यासारखेच एखादे मानणे आवश्यक आहे. जर तो शब्द नपुंसकलिंगी असता तर हे वाक्‍य तृष्टिसंह्याराविषयी आहे असे समजणे कदाचित शाक्य झाळे असते. पण ती कल्पना अभिप्रेत असेल्से वाटत नाही. संहार अस्तित्वात असलेल्या सुष्टीचा होतो. “भावी? शद्वाने तिचा निदेश अनुचित ठरला असता. सूर्योपासनेने मोक्ष मिळतो ही कल्पना अधिक ग्राह्य वाटते. पण विरोधालंकारासाठी योजलेल्या “भाबी न भविता? ह्या शाहूप्रयोगामुळे ती स्पष्ट होत नाही. दृशरूपकोपकारि काक्नादियाजनामोति तत्स्वरूपं वक्तव्यमिति संगतिरकतेव, तद्वतयिष्यामीति किमनेनोच्यते । तदस्य प्रयोजनं प्रदर्श्यते । काश्वेदेवमाश्धते 'रसा भावा? इत्यादिसूत्रसारसंग्रेह दररूपशब्दस्य नामापि न श्वुतम्‌ , तत्कथमक्त 'दशरूपविधाने पाठ्यम! इति । तं प्रत्याह वतीयेष्यामीति । रूप्यते प्रत्यक्षाफ्रियते यो$थंस्तद्वाचकत्वात्काव्याने रूपाणि । रूप्यन्त अभिनीयन्त इति वा काव्यान्यव रूपाणि । दशानां रूपाणां विभाग: कल्प्यते अस्मादिति ददरूपविकल्पने सूत्रम्‌ । तेनायं षष्ठीसमासः दशरूपमिति । बहुव्रीही दशरूपं काव्यमिति भेदान्तरापाकरणं स्यादित्याशड््य द्विगुः । पात्रादिभ्रक्षेपश्न यो व्याख्यातस्तत्मयासमात्रमेव । काकु आदींची योजना दहा रूपकांना उपकारक आहे, यास्तव त्या रूपकांचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले पाहिजे अशी (ह्या अध्यायाची ) संगती निर्दिष्ट झाळीच आहे; मग ' वतयिष्यामि ' इत्यादी ह्या श्होकात का म्हटळे आहे ? तेव्हा ह्या छोकाचे प्रयोजन दाखवून देतो. कोणी अशी शंका घेईल की 'रस, भाव? इत्यादी नाट्याच्या अंगांचा संग्रह करणाऱ्या सूत्रामध्ये दरारूप शाब्दाचा नामनिदेशाही नाही, मग 'दरारूपांच्या विधानात पाठ्य (योजावे) असे कसे म्हटले आहे? त्या शंकेखोराच्या समाधानासाठी “र्तयिष्यामि' इत्यादी म्हटले आहे. जो पदार्थ 'रूप्यते' म्हणजे प्रत्यक्ष दिसतो (तो ख्प आणि) त्याची वाचक असल्यामुळे काव्यांना रूप अशी संज्ञा आहे. किंवा 'रूप्यन्ते म्हणजे अभिनयाने व्यक्त केळी जातात म्हणून काव्यांना प्रत्यक्षच रूप अशी संज्ञा आहे. दहा ख्पांच्या विभागाची कल्पना ज्यामुळे केळी जाईल ते दशरूपबिकल्पन सूत्र. म्हणजे 'दडरूप' इत्यादी हा षष्ठी समास होय. दहा ख्पे ज्याची आहेत असे काव्य या अर्थी दरारूप हा बहुत्रीहि समास $-. २ मानल्यास (रूपकाच्या) इतर प्रकारांचा समावेश होणार नाही असा संभव असल्यामुळे हा समास हिंगु मानावा, आणि पात्रांच्या योजनेविषयी जी व्याख्या केळी आहे ती सर्व केवळ (निरथेक) मेहनत होय. कोणा प्राचीन टीकाकारानें ह्या अध्यायाची संगती लावण्यासाठी केलेली पहिल्या 'छोकातील दशरूप शाद्ठाची प्रदीधे मीमांसा प्रस्तुत परिच्छेदात उद्धुत केळी असून शेवटी अमिनवगुप्ताने ही मीमांता निरर्थक व अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रारंभी असा आक्षेप घेण्यात आला आहे की नास्यशास्त्रातील ह्या पहिल्या शछोकात केलेल्या प्रतिज्ञेची काहींच आवश्यकता नव्हती; कारण, मागील संतरान्या अध्यायात काकु, स्वर इत्यादी पाठ्याच्या गुणांचे विवेचन करताना हे पास्यगुण दशरूपकांना उपकारक होत असे म्हटले आहे, तेव्हा त्यानंतर दश रूपकांचे विवेचन क्रमप्राप्तच होते. ह्या अच्या- याची संगती अश्या रीतीने आपोआपच सिद्ध झाली असता ह्या श्लोकात “दहा सखूपकांचे स्वरूप मी स्पष्ट करणार आहे? अशी प्रतिज्ञा करण्याचे कारण काय ? ह्या आक्षेपाला त्या प्राचीन टीका- काराने उत्तर दिले आहे ते असे. सहाव्या अध्यायात रस, भाव, अभिनय इत्यादी नाट्याच्या सर्व अंगांचा परिपूर्ण निदेंश केला आहे. पण त्या ठिकाणी दशर्प हा शब्द कोठेही आढळत नाही. तेव्हा सतराव्या अध्यायात उपयोजिलेल्या दशरूप शब्दाला आक्षेप घेणे संभवनीय असल्यामुळे प्रस्तुत कळोकातील प्रतिज्ञा समर्थनीय ठरते. साकाड्क्ष आणि निराकाडूक्ष अश्या दोन प्रकारच्या कार्कूंचे वर्णन १७.१११ ह्या कोकात व त्यानंतरच्या गद्य भागात आहे. “रसा भावा ह्ममिनया धर्गी वृत्तिप्रवृत्तयः । सिद्धिः स्वरास्तथातोद्य गान रडश्व संग्रह: ॥|? हा संग्रहरछोक सहाव्या अध्या- यातील दहावा आहे. दडरूपविधाने तु पाठ्य योज्यं प्रयोक्तृमिः? असे १७,१४९ मध्ये म्हटले आहे. रूप्यते इ०? यात व्युत्पत्तीच्या आधारे रूप शब्दाचा काव्य अता अर्थ केला आहे. रूप्‌ म्हणजे प्रत्यक्ष दिसणे ह्या धातुपासून सिद्ध झालेल्या रूप शब्दाचा सूळ अर्थ प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट. त्या- पासून गौणार्थाने रूप म्हणजे गोष्ट प्रत्यक्ष दाखविणारे नाटकादी काव्य. - *ूप्यन्ते अमिनीयन्ते इ०? पात रूप धातूच्या अभिनय करणे ह्या भिन्न अर्थाच्या साहाय्याने रूप म्हणजे ज्याचा अभिनय केला जातो ते नाटकादी काव्य असा मुख्यार्थच सिद्ध केला आहे. हीं दुसरी व्युत्पत्ती सुचविणारे मुळातील वाक्‍य बडोदे येथील प्रतीत छापावयाचे राहून गेळे आहे. - 'दशानां रूपाणां इ०? यात. 'होकातील 'दुशरूपविकल्पनम? ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून दाखविला असून ह्या विशेषणाला 'सूचम्‌? हे विशेष्य पुरविळे आहे. “सूत्र बर्वयिष्यामि? यात सूत कातण्याची क्रिया ध्वनित होते. -- ' तेनायं षष्ठी- समासः? हे शब्द 'दररूपविकल्पनमू? ह्या समासाला उद्देशून आहेत. :दशरूपाणां विकल्पनम्‌? असा हा षष्ठी तत्पुरुष समास समजाबयाचा. 'दशरूपमिति? याऐवजी 'दडारूपविकल्पनमिति' अस्ता पाठ अपेक्षित आहे आणि तोच मूळ असण्याचा संभव आहे. 'दशरूपम्‌” हाच षष्ठीसमास असे म्हटले असण्याची शक्‍यता नाही, - 'बहुत्रीहौ इ०? यात 'ददारूप? हा समास बहुत्रीहि न समजता द्विगु समजावा असे प्रतिपादिले आहे. “दा रूपाणि अस्य तत्‌ (काव्यम्‌)? असा बहुत्रीहि समास समजल्यास दहाच नाही. 'बहुब्रीहौ'च्या पूर्वी मुळात तेन? हा अधिक राब्द आढळतो. तो निर्थक असल्यामुळे गाळला :] नाट्यशास्त्र आहे. ह्याच्या अगोट्रच्या वाक्याच्या प्रारंभी असलेल्या “तेन' शब्दाची येथे चुकीने पुनसूक्ती झालेली दिसते, - 'पात्रादिप्रक्षेपश्च इ०' ह्या वाक्याचा अर्थ स्पष्ट नाही. अव्यायतंगती सांगण्याच्या संदर्भात त्या टीकाकाराने रूपकप्रकारांत करावयाच्या पात्रयोजनेसंबंधी काही विधाने केली होती असे दिसते. परंतु, ह्या संदर्भात ती विधानें कशा स्वरूपाची असतील याची नीट कल्पना करता येण्यासारखी नाही. अमिनवगुप्ताला हा सर्वे खटाटोप व्यर्थ वाटतो, कारण ह्या अध्यायाची संगती त्याच्या मते पुढीलप्रमाणे सहज लावता येण्यासारखी आहे. तदयमर्थः । यतः सूत्रादू वाचिकराब्दे प्रकृतिप्रत्यया्थविभागः कलप्यते, तत्र वाग्भाग एवायं बितत्य वर्ण्यंते । तेन तदेव सूत्रं वर्णितं विवरणेन प्रपश्चिते भवतीति नानिदिंष्टं निरूप्यते किंचिदिति । तेव्हा पुढीलप्रमाणे अथ समजावा. ज्याप्रमाणे संग्रहसूत्रात निर्देरिळेल्या बाचिकाच्या अनुरोधाने शब्दांतील प्रक्रृति, प्रत्यय, अर्थ द्या भेदांचे विवरण केळे आहे, त्याप्रमाणे हा ( दरारूपविषयक ) वाचिकाचाच भाग विस्ताराने वणन केला जात आहे. म्हणून तेच सूत्र येथे बर्णिळे जात आहें म्हणजे त्याचाच विवरणात्मक विस्तार केळा जात आहे, तेव्हा पूवी ७ ज्याचा निर्देश नाही अशा कोणत्याही नवीन गोष्टीचे येथे निरूपण केलेले नाही. ह), 3 ७ अभिनवगुप्ताचे म्हणणे असे आहे की कछोकातील दरारूपांच्या विवेचनासबंधीच्या प्रतिज्ञेने एखाद्या नवीन विषयाचा उपन्यात केला आहे असे समजणे बरोबर नाही. कारण, सहाव्या अध्यायातील संग्रहसूतात ज्या वाचिकाचा निदेश केला आहे त्याचाच एक भाग म्हणून दशरूपकात्मक काव्याचे विवेचन केळे आहे. - 'यतः --- तत्र ही अव्यये 'यथा -.. तथा? या अर्थी समजल्यास वाक्याचा अर्थ लक्षात येण्यास मदत होते. - 'सूत्रात्‌' ह्या शाद्वानंतर मुळात “आक्चिको? हा शाद्र अधिक आहे. परंतु, आंगिक अभिनयाचा कोणत्याही प्रकारचा निदेश प्रस्तुत ठिकाणी अप्रस्तुत असल्यामुळे तो शद्द गाळणेच उचित मानले आहे. 'सूत्तातू' शब्दांचे पंचमीचे रूपही समर्पक वाटत नाही. असा संभव आहे की मुळात 'सूत्रादागते' यासारखा एखादा पाठ असावा व आश्षिक-वाचिक यांच्या नेहमीच्या साहचर्यामूळे 'सूत्रादाद्धिको' हा पाठ उत्पन्न झाला असाबा. “बाचिकशब्दे” म्हणजे वाचिक अभिनयात बापरावयाच्या शब्दांच्या संबंधात. - 'प्रकृतिप्रत्ययार्थ- विभागः हा विचार चौदान्या अध्यायाच्या प्रारंभी केला आहे. - तदेव सूत्रम्‌ः म्हणजे ज्या तंग्रह- सूत्रात वाचिकाचा निदेश आहे (६.२ ३) ते सूत्र | पहिल्या *होकातील प्रतिज्ञेसंबंधी हा विवा द उत्पन्न होण्याचे कारण असे की सहाव्या अध्यायात नाट्याच्या अंगांचा निर्देश करताना भरताने काव्याचा म्हणजे रूपकांचा मुळीच उल्लेख केला नाही. त्याने निदेंशिलेली सर्व अरे नाट्यप्रयोगाच्या प्रक्रियेशी तबंद्ध अशी आहेत. काव्यनिर्मिती त्याहून मिन्न स्वरूपाची. तिचा विचार प्रस्तुत अध्यायात आहे. हा विचार अमिनव- गुप्त म्हणतो त्याप्रमाणे वाचिक अभिनयाचाच एक भाग आहे असे मानणे समाधानकारक वाटत नाही. प्राचीन टीकाकाराने म्हटल्याप्रमाणे ही नवीनच प्रतिज्ञा आहे असे समजणे अधिक योग्य वाटते. 2८.2? प्ऱ् नामत इत्युद्देशेन, कमत इति लक्षणेन । क्रियते तेन विजातीयाद्याब्रत्तिरोत कमे लक्षणम्‌ । प्रकृष्ट डाघेतो योग: परस्परसंबन्धो यथा प्रकरणनाटकलक्षणयोगात्‌ नाटिकेति । वृत्तिविभागस्तु लक्षण एवानुभ्रविष्ट इति नासोौ प्रयोग: । तथा चेति तेनेव प्रयागप्रकारेणान्यो पि परस्परसंबन्धवेचित्र्यकृतो भेद उत्मेक्य इत्यर्थ: । प्रयोगाय प्रयोगत इति व्याख्याने प्रयोगत इति विफलंमव। उक्तव्याख्यांने तु कोहळादिलक्षिततोटकसट्टकरासकादिसंग्रह: फलम्‌ नाटिकाया उदाहरणत्वादिति । नामत: म्हणजे नावनिर्देश करून, कर्मतः म्हणजे व्याख्या करून. त्याच्यामुळे विजातीय पदार्थापासून भिन्नता प्रस्थापित केली जाते म्हणून कर्म शब्दाचा व्याख्या असा अर्थ होतो. प्रकृष्ट म्हणजे उचित असा योग म्हणजे परस्परसंबंध (असा प्रयोग शब्दाचा अर्थ), जसे प्रकरण व नाटक यांच्या लक्षणांच्या परस्परसंबंधापासून नाटिका ( निष्पन्न केळी आहे), वृत्तींची भिन्न मित्न योजना क्षणांतच अंतभूत असल्यामुळे प्रयोग शब्दाचा वृत्ति- विभाग असा अर्थ समजता येत नाही. “तथा च? म्हणजे त्याच प्रयोगप्रकाराने इतरही परस्पर- संबंधातील वैचित्र्यामुळे उत्पन्न होणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारांची कल्पना करावी असा अर्थ आहे. 'प्रयोगतः? याचा अर्थ प्रयोगासाठी असा केल्यास “प्रयोगत:? हा शब्द निर्थक ठरेल. वर केलेल्या अर्थाप्रमाणे कोहलप्रभृतींनी वर्णिलेल्या तोटक, सट्टक, रासक इत्यादी प्रकारांचाही समावेश होईल; कारण, नाटिकेचा निदेश केवळ उदाहरणासाठी केला आहे. या परिच्छेदात अभिनवगुप्ताने नाटबश्शास्त्राच्या लोकातील इाब्दांचे अर्थ स्पष्ट केळे आहेत. 'क्रियते इ० कम शब्दाचा लक्षण म्हणजे व्याख्या असा अर्थ सिद्ध करण्यासाठी त्या शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. मुळात व्यावृत्तिः” नंतर (इति? शाब्द नाही. पण अर्थ स्पष्ट होण्यासाठी तो आवश्यक आहे. - प्रकृष्ट इ०? श्लोकातील 'प्रयोगतः? यातील प्रयोग शब्दाचा योग्य असा परस्परसंबन्ध हा नवीनच अर्थ येथे केला आहे. तसे करण्याचे कारण पुढे सांगितले आहे. - 'यथा प्रकरण इ०” पुढे ५२ व्या आर्येत प्रकरण व नाटक यांच्या संबन्धातून निष्पन्न होणाऱ्या नवीन *पकप्रकाराचा निदेश असून त्यापुढील तीन आयोमध्ये नाटिकेचे टक्षण दिले आहे. प्रयोग शद्ाच्या केलेल्या अर्थाच्या स्पष्टीकरणार्थ उदाहरण म्हणून त्याचा येथे निदेश केला आहे. 'वुत्तिविभागस्तु इ०' प्रयोग शब्दाचा बृत्तिविभाग म्हणजे भारती, सात्त्वती, आरभटी व कैशिकी या चार वृत्तींपेकी कोणकोणत्या वृत्ती कोणत्या रूपकप्रकाराता आवद्यक याचे निदर्शन असाही अर्थ संभवतो. पण तो प्रस्तुत ठिकाणी ग्राह्य मानता येत नाही. कारण रूपका'चे लक्षण सांगताना त्याठा अनुरूप असलेल्या वृत्तींचा निर्देश त्यात अन्तभूत असतोच. - 'प्रयोगाय प्रयोगतः इ०?' नेहमी- प्रमाणे प्रयोग शब्दाचा नाट्यप्रयोग असा अर्थ करून 'प्रयोगतः? म्हणजे नाट्यप्रयोगाशाठी असे समजले तर ह्या शब्दाचा श्लोकात केलेला उपयोग निरथेक ठरेल. अभिनवयुप्ताच्या म्हणण्याचा अस आशय दिसतो की नाट्यप्रयोगासाठी म्हणून मी खूपकांचे विवरण करणार आहे असे भरताने म्हणण्यात काहीच स्वारस्य नाही, रूपक हे प्रयोगासाठीच आहेत हे ग्रहीत धरले पाहिजे; कारण, सवे प्रकारचे नाट्य प्रयोगावरच अधिष्ठित आहे. तेव्हा प्रयोग शब्दाचा नेहमीचा अर्श केला, तर त्या- द नाट्यशास्त्र पासून काही विशेष अर्थाचा लाभ होत नाही. - 'उक्तव्याख्याने' म्हणजे अभिनबरुप्ताने वर केलेल्या प्रयोग शब्दाच्या अर्थाप्रमाणे, - कोहलादि' कोहल हा भरतानंतर झालेला नास्यशास्त्रावरील ग्रेथकार, त्याचा ग्रंथ सध्या उपलब्ध नाही. - तोटक, सट्टक व रासक यांची लक्षणे उत्तरकालीन साहित्यदर्पण आदीं ग्रंथांत आढळतात. | नाटकं सप्रकरणमझ्ी व्यायोग एध च भाणः समवकारश्व बीथी प्रहसन डिमः ॥२॥ इहामृगश्नव विज्ञेयो दशमो नाट्यलक्षणे । एतषां लक्षणमह व्याख्यास्याम्यनुपूर्वशः ॥३॥ नाट्याच्या लक्षणात नाटक व प्रकरण, अडू त्याचप्रमाणे व्यायोग, भाण व समवकार, वीथी, प्रहसन, डिम आणि ईहामृग हे दहा प्रकार अन्तर्भूत आहेत असे जाणावे. आता मी ह्यांची लक्षणे क्रमवार स्पष्ट करून सांगतो. तत्रोदेशं तावदाह नाटकमित्यादि । सप्रकरणामिति सहशाब्दनाइईःप्रवेशकसं- ध्यादिसास्यं नाटकेन प्रकरणस्याह । नाम्नामर्था लक्षण एव व्याख्यास्यते। सत्यपिच पुराणादो उपदेदादार्थोने कर्मफलसंबन्धप्रदर्दाके तत्राश्चावचमनि- यतकाव्कन्थाप्रायम्‌ , इह तु किंचित्म्याज्यं किंचित्सूच्यं किंचिदूह्य किंचिदुपेक्ष्य- मिति वैचित्र्ययोंगः संध्यादिव्यवस्थेति दररूपं सप्रयोजनमिति । एतत्ञ॒ फल्गुप्रायं फलम्‌ । तत्पूवमेवोक्तं प्रत्यक्षतोंदितरसावेशजनितनिर्चतिसारत्वादस्येतिहासादेवि- रेष इति । ऊह्यसूच्यादिविभागस्त्वितिहासादावप्यस्त्येवेति । न च पाठफलं दशरूप- _ कमपि तु प्रयोगपर्यन्तमेतादैत्युक्तप्रायम । तत्र महासामान्यरूपं काव्यलक्षणे$ व्याये कृतामित्यवान्तरसामान्यलक्षणमुद्दे- शानन्तरं वक्तव्यामाति दरयाति । प्राक्‌ च सामान्यलक्षणं ततो विदेषलक्षणाने चोददेशक्रमेणेति चानुपूर्व्यार्थः । त्याते प्रथम “नाटकम्‌ इत्यादी छोकांत (रूपकांचा) नामनिर्देश करतात. 'सप्रकरणम्‌! यातील सह शब्दाने अंक, प्रवेशक, संधि इत्यादी बाबतींत प्रकरणाचे नाटकाशी साम्य आहे असे दाखवितात. (रूपकांच्या ह्या) नावांचे अर्थ लक्षण सांगताना स्पष्ट केळे जातील. हितकर उपदेश देणारे व कर्म आणि फल यांचा परस्परसंबन्ध दाखवून देणारे पुराण आदी ग्रंथ विद्यमान असले तरी त्यांत उत्कृष्ट-कनिष्ठ, कोणत्याही एकाच कवीची निर्मिती नसल्यामुळ प्रायः गोधडीवजा असे लिखाण असते. याउलट ह्या रूपकप्रकारांमध्ये काही रट.२--३ ७ अंश प्रयोग करण्यास योग्य असतो, काही सूचित केळा जातो, काहीचे अनुमान करावे लागते, तर काही'ची उपेक्षा करावी लागते. अश्या रीतीने वैचित्र्य उत्पन्न होते हे संधी आदींची व्यवस्था व प्रयोगसहित दशरूप यांच्या निर्देशावरून स्पष्ट आहे. परंतु (दशरूपकांचे) हे अगदी क्षु्छक फल होय. त्यांचे खरे फल प्रत्यक्षपणे उदित झालेल्या रसाच्या आवेशामुळे उत्पन होणारा आनंद हेच ह्या दशख्याचे तार होय, म्हणून तेच त्याची इतिहासादी ग्रंथांहून भिन्नता दाखविणारे वैशिष्टय होय असे पूवीच सांगितळे आहे. शिवाय अनुमान करावयाचा, सूचित होणारा अंश इत्यादी प्रकार इतिहासादी पग्रंथांतही असतातच. आणि दशख्पकाचे फळ केवळ पठन केल्याने प्राप्त होणारे असे नसून ते प्रयोगाच्या परिणामी उत्पन होते हे सांगितलेलेच आहे. त्यात (सर्वे काव्यांना लागू होणारे) सर्वसामान्य लक्षण काव्यलक्षण नावाच्या अध्यायात केले आहे, तेव्हा आता (रूपकांनाच लागू होणारे) परिमित सामान्य लक्षण नामनिर्देशानंतर सांगणे आवऱ्यक आहे हें दाखवितात. प्रथम सामान्यलक्षण आणि नंतर रूपकांची क्रमानुसार विशेष लक्षणे असा “अनुपूर्वशा:! ह्या शब्दाचा अर्थ आहे. 'सत्यपि इ०' या परिच्छेदात कोणा प्राचीन टौकाकाराने पुराणादी ग्रंथ व दशरूपक यांच्या- तील भेदाचे केलेले विवेचन उद्धत करून अमभिनबगुप्ताने तशा प्रकारचा भेद अग्राह्य ठरविला आहे व त्याबाबतीतील आपले स्वतःचे मत मांडले आहे. - “उच्चाबचम्‌ म्हणजे काही अंद रोचक तर काही रसहीन. - “अनियतकविकन्थाप्रायम? यावरून असे दिसते की ह्या टीकाकाराच्या मते पुराण कोणा एकाच कवीची रचना नसून अनेक कवींची कृती मिळून ती एक गोधडी बनली आहे. हे मत आधुनिक संशोधकांच्या मताशी जुळते असे आहे. - 'दशरूपं सप्रयोजनम? यातील प्रयोजन दाब्द प्रयोग ह्या अर्थी वापरला आहे असे दिसते. दोहोत एकच धातू आहे आणि पुढील (१८.४) श्लोकात 'दशरूपं प्रयोगतः? असेच म्हटले आहे. नेहमीच्या अर्थाने प्रयोजन शब्दाचा येथे उपयोग अस्थानी होय, - 'प्रत्यक्षतोदित- इ०' संमासाचा विग्रह 'प्रत्यक्षतया उदितः इ० अस आहे. रसनिष्पत्तीच्या प्रक्रियेचे ब त्यामुळे होणाऱ्या आनंदाचे प्रदीर्घ विवेचन सहाव्या रसाध्यायावरीलळ अभिनव. भारतीत केले आहे. - 'इति | ऊह्यसूच्यादि- ही मुळातील 'इत्यूह्मम्‌ सूच्यादि- ची दुरुस्ती आहे. ती उघडच आवद्यक आहे. - “अपि तु? यातील 'तु? मुळात नाही, पण तो अर्थासाठी आवबद््यक असल्यामुळे घातला आहे. - 'प्रयोगपर्यन्तम्‌? यातील 'पर्यन्त? चा शेवट असा शाब्ददाः अर्थ समजण्याचे कारण नाही. परिणाम असा अर्थ अधिक समर्पक वाटतो. 'काव्यलक्षणे5च्याये' सोळाव्या अध्यायाचे काव्यलक्षण असे नाव आहे व॒ त्यात सववसामान्य काव्याची लक्षणे, अलंकार, गुण, दोष इत्यादींचे विवेचन आहे. - 'अवान्तरसामान्य? म्हणजे काव्यान्तर्गत दशरूपक. - 'प्राकू च . .. आनुपूर्व्यार्थः' यात श्लोकातील 'अनुपूर्वशः? शब्दाला उद्देशून केलेले विधान आहे. टॅ नाट्यशास्त्र सर्वेषामेव काव्यानां मातृका वृत्तयः स्मृताः । आभ्यो विनिःसृ्त ह्येतददशरूपं प्रयोगतः ।॥।४॥ सर्वेच काव्यांचे उद्डमस्थान (चार) वृत्ती होत असे मानळे आहे; कारण हे दहा रूपक प्रकार प्रयोगाच्या उद्देशाने ह्यांच्यापासून निष्पन्न झाले. तत्र सामान्यठक्षणमाह सर्वेषामेव काव्यानां मातृका इति । तत्र केचिदाहू: वृत्तिप्रभवत्वं दरारूपकस्य सामान्यलक्षणम, वृत्तीनां तदडठानां चानभिनेयकाव्येष्व- संभवात्‌ । एतःचासत्‌ । आस्तां कान्याथः, सर्वो हि संसारों वृत्तिचतृष्केण व्याप्त इत्युक्तं पथम एवाध्याये5स्माभिः। यदि चा्मिनयविषय एव वात्तिव्यवहारः, तदा वृत्त्यध्याये यद्वत्तोनां समुत्थाननिरूपणं 'यां यां वात्तेषु संश्रिताम इत्यादि तत्सर्वम- सेंगतम्‌ । भगवतो हि नाभिनेतृता, किंतु स्वचेष्टावेशमात्रम्‌ । सर्वशब्दे च प्रकृत- नाटकादिविषये वण्यंमाने प्रथमं -छोकार्थ पुनरुक्तार्थमेव । यत्तु 'स्वनामधेयेभरते:' इति, 'बहुगीतनृत्तवाद्या' इति, 'वागडठगभिनयवती? इति च भरतव्यवहारो गीताभिन- ययोगश्व नानभिनेय इति तदप्याकिंचित्करम्‌ । तावाद्धे न वत्तीनां लक्षणम्‌ । 'या वाकप्रधाना' इत्येतावदेव भारत्या लक्षणम्‌, अन्यक्ष प्रयोगदर्शनांमिति तत्रैव व्याख्यास्यामः । वृत्त्यज्ञान्यपि सवकाव्येष सन्त्येव । त्या संबन्थात 'सर्वेषामेव काव्यानां मातृकाः' इत्यादी छछोकात सामान्य लक्षण सांगतात. याविषयी काही टीकाकारांचे म्हणणे आहे की वृत्तींपासून उत्पत्ती हे (फक्त) दररूपकाचेच सामान्य लक्षण आहे, कारण ज्यांचा अभिनय करता येण्यासारखा नाही अशा काव्यप्रकारांत वृत्ती आणि त्यांची अंगे संभवनीय नाहीत. पण हे म्हणणे बरोबर नाही, काव्याचा विषय तर राहूच द्या, पण संपूर्ण संसारच चार प्रकारच्या वृत्तींनी व्यापलेला आहे हे आम्ही पहिल्याच अध्यायात सांगितले आहे. आणि जर वृत्तींचा व्यवहार ऑंभनयास योग्य अशा काव्यांतच होतो असे मानले तर वृत्तिविषयक अध्यायातीळ “यां यां वृत्तिपु संश्रिताम्‌! रत्यादी वचनांत वृत्तींच्या ना्भेतीचा जो निर्देश आहे तो असंगत ठरेल कारण भगवान्‌ विष्णूची अभिनय करणाऱ्याची भूमिका नव्हती, तर तो केवळ त्याच्या स्वाभाविक चेष्टांचा आविष्कार होता. आणि 'सर्व' शब्दाने प्रस्तुत नाटकादी रूपकांचाच निर्देश अभिग्रेत असेळ तर छोकाचा पहिला अर्धा अंश पुनरुक्तच होईल. आणि (वृत्तींच्या वर्णनातील) :स्व- नामघेयेभरते?, 'बहुगीतनुत्तवाद्या' आणि 'वागड्वाभिनयवती' ह्या बचनांत निर्देशिळेळा नटांचा व्यापार आणि गीत व अभिनय यांचा उपयोग अमिनयास अयोग्य असलेल्या काव्यात नाही असे जे म्हटले आहे ते सुद्धा निरुपयोगी आहे. कारण, तेच काही वृत्तीचे लक्षण नाही. 'था १८2 र वाकप्रधाना' एवढेच भारती वृत्तीचे लक्षण होय, इतर गोष्टी प्रयोगाच्या सोयीसाठी सांगितल्या आहेत हे आम्ही त्या ठिकाणीच स्पष्ट करू. आणि वृत्तींची अंगे सुद्धा सर्व काव्यांमध्ये विद्यमान असतातच. 'केचिदाहुः' ह्या टीकाकारांच्या मते वृत्तींपासून उत्पत्ती फक्त रूपकांचीच होते, अमिनय करण्यास अयोग्य अशा इतर प्रकारांची नाही. हे मत अभिनवगुप्ताने विस्तृतपणे खोडून काढले आहे. - 'अनभिनेयकाव्येधु! हा दुरुस्त करून घेतलेला पाठ आहे. मुद्रित पाठ “अमिनये काव्येषु असा आहे, तर हस्तलिखितात 'अमिनयकाव्येषु' असा पाठ आहे. सर्व विवेचन लक्षात घेता केलेल्या दुरुस्तीच्या आवश्यकतेबद्दळ शंका राहात नाही. - 'उक्तं प्रथम एवाध्याये' पहिल्या अध्यायातील "भारती सात्त्वतीं चैव? इत्यादी ४१ व्या लोकाची व्याख्या करताना अमिनवगुप्ताने असे म्हटले आहे की पुरुषार्थचतुष्ट्याच्या सिद्धोसाठी वाचिक, मानसिक व शारीरिक व्यापार आवश्यक आहेत, आणि हे तीन प्रकारचे व्यापार म्हणजेच अनुक्रमे भारती, सात्त्वती आणि आरभटी ह्या तीन वृत्ती होत. हा व्यापार सोष्ठवयुकत ब सौन्दर्यमय झाला म्हणजे केशिकी वृत्ति निष्पन्न होते. याप्रमाणे सर्व संसार वृत्तींनी व्यात्त आहे ही गोष्ट अभिनवगुप्ताने त्या ठिकाणी स्पष्ट केली आहे. -'यां यां वृत्तिषु इ० संपूर्ण श्लोक असा आहे - यां यां देवः समाचष्टे क्रियां वृत्तिषू संस्थिताम्‌ । तां तदर्थाचुगेजप्येट्रुहिणः प्रत्यपूजयत्‌ ॥ (२०.१५). यात विष्णूच्या स्वाभाविक क्रियाच वृत्तिरूप होत्या असे म्हटळे आहे. या होकात मुद्रित पाठ संस्थिताम? असा आहे. अमिनवगयुप्ताने प्रस्तुत ठिकाणी 'संश्रिताम्‌* असा पाठ दिला आहे. - “प्रथम स्गोकार्थे' हा थोडा दुरुस्त केलेला पाठ आहे. मुळात 'प्रथमळोकार्थे? असा सामासिक पाठ आहे. दुरस्ती अर्थ स्पष्ट होण्यासाठी आवश्यक आहे हे उघड आहे. -'पुनरुक्तार्थमेव? कारण, द्वितीयार्धात दशरूपकांच्या उत्पत्तीचा निदेंश आहे; तेव्हा प्रथमार्धातील “सर्ब काव्ये' याचा 'दशरूपक' एवढाच अर्थ केला तर दोन्ही अर्धोत एकच अर्थ निष्पन्न होऊन पुनरुक्ती झाल्यासारखे होईल. :स्वनामभेयैः इ०? विसाव्या वृत्त्यव्यायात भारती वृत्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे -. या वाकप्रधाना पुरुषप्रयोज्या स्रीव्जिसा संस्छतपाठ्ययुक्ता । स्वनामघेयेभंरतेः प्रयुक्ता सा भारती नाम भवेचु व्रुत्तिः ॥ (२०.२६). भरत म्हणजे नट. ते ह्या वृत्तीचा उपयोग कैरतात यावरून ही भारती वृत्ति अमिनययोग्य काव्याशीच संबंड्ू आहे हे सिद्ध होते असा ह्या टीकाकारांचा युक्तिवाद आहे. - “बहुगीत- इ०' कैशिकी वृत्तीचे वर्णन असे आहे - | या स्लक्ष्णनेपथ्यविशेषचित्रा स्त्रीसंयुता या बडुनृत्तगीता । कामोपभोगप्रभवोपचारा तां केशिकीं वबृत्तिमुदाहरन्ति ॥ (२०.५३) १० नाट्यशास्त्र गीतांच्या निदेशावरून ही वृत्ति प्रयोगाशी संबद्ध आहे असे ह्या टीकाकारांचे म्हणणे आहे. ह्या क्कोकात “बहुनृत्तगीता' एवढेच आहे, पण अभिनवरुप्ताने या ठिकाणी “बहुगीतनृत्यवाद्याः अशा स्वरूपात ते वचन उद्धृत केळे आहे. बडोदे येथील प्रतीत वरील ोकानंतर ह्याच वृत्तीच्या वर्णनपर आणखी दोन छोक दिले आहेत, त्यांपैकी एकात 'बहुवाद्यनृत्तरीता' असे वचन आहे. पण ते दोन्ही छोक निःसंदाय प्रक्षित आहेत. त्यांच्यावर अभिनवगुस्ताची टीका नाही. तेव्हा त्याने हे अवतरण त्या €होकातून घेतळे असण्याची राक्यता नाही. - “वागडूनमिनयवती? सात्त्वती बृत्तीचे वर्णन पुढील आर्येत आहे - वागजञाभिनयवती सत्त्वोत्यानवचन्तप्रकरणेषु | सत्त्वाधिकारयुक्ता विज्ञेया सात्त्वती वृत्तिः॥ (२०.४२). ह्या वृत्तीचा तर अमिनयाशी साक्षात्‌ संबंध प्रस्थापित केला आहे. तेव्हा ह्या वृत्तीपासून अमिनेय काव्यच उत्पन्न होते असे हे टीकाकार म्हणतात, - “नानमिनेय? मुद्रित प्रतीतील 'नानामिनेय? हा मुद्रणदोष असावा. 'अनमिनेये? अस सप्तम्यन्त शब्द अमिंप्रेत आहे. “कव्ये” हे त्यांचे विशेष्य. - 'तावद्धि न इ०' यातील 'न' मुळात नाही; पण अर्थासाठी तो आवद्यक असल्यामुळे तो घातला आहे. अमिनवयुप्ताचे म्हणणे असे की वृत्तींच्या वर्णनांतून टीकाकारांनी उद्ध॒त केलेली वचने ही काही त्या वृत्तींच्या लक्षणांचा प्रधान भाग नाही. भारतीचे लक्षण 'वाक्प्रधानाः' या वचनातच समाविष्ट आहे, इतर सर्वे प्रयोगासाठी उपयुक्त अशी माहिती आहे. - 'घयोगदर्शनम? हा हस्त- लिखितातील पाठ आहे. छापील पाठ 'प्रयोगप्रदर्शनम? असा आहे. - 'बृत्त्यज्ञानि? प्रत्येक वृत्तीची चार चार अंगे आहेत. त्यांचे वर्णन विसाव्या अध्यायात आहे. नन्वेवं वृत्तिजत्वं कथं दशरूपकलक्षणम्‌ । उच्यते । प्रयोगत इत्येतदर्थकमेव । तद्यम्थंः - यद्यपि सर्वेषामभिंनयानभिंनयानां कान्यानां वृत्तयश्चेष्टा मातर इव, ताभ्यो5पि वाच्यरूपत्वेन कविहृदये व्यवस्थिताभ्यः काव्यमुत्पद्यते, तथापि प्रयोगं प्रयुज्यमानतां प्रयोगयोग्यत्वमाभिसंधाय वृत्तिभ्यो विनिःसृतमभिनेयं काव्यम्‌ । प्रत्यक्षभावनायोग्यवृत्तिचतुषयाभिघायकत्वं दररूपसामान्यलक्षणमित्यर्थः । यावर आक्षेप - असे असेळ तर वृत्तींपासून उत्पत्ती हे दररूपकाचे लक्षण असे कसे म्हणता येईल? कसे ते सांगतो. प्रयोगतः म्हणजे ह्या प्रयोगासाठीच ( हे लक्षण केले आहे ). तेव्हा याचा अर्थ असा - जरी अभिनयास योग्य व अभिनयास अयोग्य अश्या सर्व प्रकारच्या काव्यांना वृत्ती म्हणजे चेष्टा मात्सदूशा आहेत आणि वाच्य स्वरूपात कवीच्या हृदयात प्रस्थापित झालेल्या त्या वृत्तींपासून (सर्वे प्रकारचे) काव्य प्रसव पावते, तरी प्रयोग म्हणजे प्रयुज्यमानता अथवा प्रयोगयोग्यता ह्याच्या अनुरोधानेंच अभिनेय काव्य वृत्तींपासून उत्पन्न होते. एकूण अर्थ असा की प्रत्यक्ष भावित होण्यास योग्य असा चार वृत्तींचा आवि- ष्कार हे दररूपाचे सामान्य लक्षण होय, १८.४9 | | १९ “एवं” म्हणजे वृत्तींपासून सर्वच प्रकारचे काव्य उत्पन्न होते असे मानले तर. - वृत्तिजत्वं इ०' हे 'ोकाच्या द्वितीयार्धात सांगितले आहे. - 'प्रयोगम्‌ अमिसंधाय? ही *लोकातील “प्रयोगतः? गाब्दाची व्याख्या आहे आणि प्रयोग शब्दाचा प्रयुज्यमानता किंवा प्रयोगयोग्यता असा अथे केला आहे. मुद्रित पाठ 'प्रयुज्यमानत्वातः असा आहे. त्यापेक्षा हस्तलिखितातील 'प्रयुज्यमानतांर हा पाठच अधिक योग्य वाटतो. - 'प्रत्यक्षमावनायोग्य- इ०? ही भावना प्रयोग पहाणाऱ्या प्रेक्षकांना होते. दशानां नाटकादीनां रूपारमाते षष्ठीसमास:। अन्ये त्वाहुः । एकेकस्य रूपकस्य दश दशा रूपाणि संभवन्ति। तथा च वीथ्यड्ठानां सर्वत्र संभवः । परगतवचना- नुभाषणरूपभाणयोगश्च किं त्रवीषीत्याकादाभाषिते । एवमन्यद्पि। तेन ददा रूपाणि यस्थ तद्दशरूपं काव्यामेत्यर्थः । अत एव न सकल: प्रबन्धो नाटकस्‌, आपि तु प्रन्धस्य किंचिडूपम्‌ । तल्लक्षणांशबाहुल्यात्तु तव्य्यपदेशयोग: । अत एव न दरा- संख्या विभागाथां येन सट्श्‍कार्दीनां त्याग: स्यात्‌ । तत्रापि हि दशरूपलक्षणयोगो5 स्त्येव । एतज्च स्वावसंरेषु वितनिष्याम: । नाटक इत्यादी दहा प्रकारांचे रूप या अर्थी दशरूप हा पष्ठोतत्युरुष समास आहे. पण इतर टोकाकार म्हणतात - एकेका रूपकाची दहा दहा रूपे संभवतात. उदाहरणार्थ, वीथीची अंगे सर्वे प्रकारात संभवतात. तसेच, दुसर्‍याचे क्चन उद्धृत करून त्यावर वक्तव्य करण्याची भाणाची विशेषता (इतर प्रकारांतही) आकाशभाषितात आढळते. याचप्रमाणे रैतर प्रकारह्दी संभवतात. म्हणून दह्या रूपे आहेत ज्याची' ते ददारूप काव्य असा अथे आहे. म्हणूनच नाटक म्हणजे सर्व प्रबंध नव्हे, तर प्रबन्धाचा काही भागच. पण नाट- काच्या लक्षणातील बहुतांश त्यात असल्यामुळे ते नाव दिले जाते. म्हणूनच दहा ही संख्या विभाग दाखविणारी नाही की ज्यायोगे सट्ट्क आदी प्रकारांचा समावेश होणार नाही. कारण, त्यांनाही दशरूपाची लक्षणे लागू पडतात. आणि हे आम्ही योग्य वेळी स्पष्ट करून दाखवू. 'बृष्ठीसमासः? पहिल्या *्लोकावरील टीकेत दशरूप हा द्रिगु समास असल्याचे एका प्राचीन टीकाकाराचे मत उद्धुत केले आहे. ते अभिनवगुप्ताळा अमान्य होते असे निश्चित म्हणता येत नाही. दोन ठिकाणी दशरूप समासाचे दोन निरनिराळे विग्रह. त्याला अभिप्रेत असणे असंभाव्य नाही. - 'एकैकस्य इ०? या टीकाकारांचे म्हणणे असे की कोणताही रूपकप्रकार घेतला तरी त्यात दहाही रूपकप्रकारांचे अंश विद्यमान असतात. उदाहरणार्थ, नाटकात वीथ्यज्वे अत्ततात म्हणजे त्या स्वरूपात वीथी विद्यमान असते, आकाशभाषिताच्या रूपाने भाण विद्यमान असतो, इत्यादी, त्यांच्या मते दडरूप हा बहुत्रीहि तमास होय, -- 'न सकल; प्रबन्थो नाटकमू? ज्या काव्याला 'नाटक' संज्ञा दिली जाते, त्यात इतर नऊ रूपकप्रकारांचे अंशही विद्यमान असतात; म्हणून सर्वच्या सर्व काव्य “नाटक? नसते. केवळ त्यात नाटकाची लक्षणे मुख्यत्वेकरून अल्तात म्हृणून त्याला नाटक ही संज्ञा देतात. - 'दशसंख्या विभागार्था? हा हस्तलिखितातील १२ नाट्यशास्त्र पाठ आहे. मुद्रित प्रतीत 'दशसंख्याविभागार्थोः असा पाठ आहे. त्याने अर्थबोध होत नाही. त्याचप्रमाणे वर “-बचनानुरूपमाषणरूपभाण-' या मुद्रित पाठातील पहिला -रूप- शब्द हस्तलिखि- तात नाही. तो अनावश्यक असल्यामुळे हस्तलिखिताचाच पाठ स्वीकारला आहे. - ह्या टीकाकारांचे मत अमिनबगुप्ताला मान्य होते असे म्हणता येत नाही. दरारूप समासाचा त्याने भिन्न विग्रह करून दाखविला आहे. आणि प्रत्येक रूपकप्रकारात इतर नऊ प्रकारही विद्रमान असतात हे मत सामान्यपणे मान्य होण्यासारखे नाही. तथापि त्या टीकाकारांनी केलेले शेवटचे विधान की दहा ही संख्या परिमाण निश्चित करणारी नाही ते अमिनवयुप्ताळा मान्य होते, किंबहुना तसा त्याचा आग्रह आहे यात शंका नाही. १ €> च जातिभिः श्रतिभिश्वे स्वरा ग्रामत्वमागता: । यथा तथा बत्तिभेदेः काव्यवन्था भवान्त हि ॥५॥ ज्याप्रमाणे (संगीतात) जाती व श्रुती ह्यांच्या (मिन्नते) मुळे स्वरांना (भिन्न) प्रामत्व प्राप्त होते त्याप्रमाणे वृत्तींच्या भेदांमुळे (मिन्न भिन्न) काव्यबंध निर्माण होतात. ननु प्रयोगयोग्यचेष्टाप्रतिपादकत्व॑ चेत्सामान्यलक्षणं तहि चेषशातिरिक्तस्य कस्यचिदसंभाव्यत्वान्नास्त्येवे विशेषळक्षणमेषामित्याराडशमनं विशेषलक्षणा- वकार दर्शायितुमाह जातिभिः श्रतिमिश्चेत्यादि । दृष्टान्तेन प्रकृतं घटयन्‌ व्युत्पादनीयमापि व्युत्पादयतीति समानतन्त्रसिद्धमेव दृष्टान्तमदीरशत्‌ । स्वरेषु ग्रहादिदराकविभागानेयता जातिः । रक्तो5रक्तो वा ध्वनिध्वेनिस्थानं तदन्तराठं च श्रृतिः, कर्माधिकरणकरणव्युत्पत्त्याश्रयात्‌ । स्त्रियाः खलनार्विते हि नाहतं लक्ष्ये । तत्र षाडूजीप्रभूतयो जातयः सप्त, पञ्चमस्य चतसत्रः थ्रुतयो धेंवतस्य तिसत्र इति षडजग्रामः । गान्यायांद्या एकाददा जातयः, पळ्चमस्त्रिश्रुतिर्धेवतस्तु चतुःश्रतिरिति मध्यमग्रामः । प्रयोगाळा योग्य अशा चेष्टांचा आविष्कार हेच जर दशरूपकांचे सामान्यलक्ष्ण असेळ तर चेष्टांशिवाय इतर कोणतीही गोष्ट संभाव्य नसल्याकारणाने ह्यांचे विशेषलक्षण असूच दकत नाही या इंकेचे समाधान करून विदोषलक्षणाळा अवकाश आहे हे 'जातिभिः श्रुतिमिश्व' इत्यादी &छोकाने दाखवितात, विवेचनाचा विषय असलेल्या गोष्टीचा दष्टान्ताशी सांगड घालणारा (वक्ता) ज्याला बोध करावयाचा त्याला बोध सुद्धा करू राकतो म्हणून समान विषय असलेल्या शास्त्रातील दृष्टान्त देतात. स्वरांच्या संबंधात प्रह वरे दहा भेदांनी निश्चित झालेली ती जाति. रागयुक्त अथवा रागरहित असा ध्वनी, ध्वनीचे स्थान आणि त्या- मधीळ अवकाश म्हणजे श्रुति, - कर्म, अधिकरण आणि करण यांच्या द्वारा व्युत्पत्तीच! १ नि एतेषां चातिमि*चेव. | १८.'५ $$: आधार घेऊन. खूप सिद्ध करताना स्रिया: खटनौ? ह्या वार्तिकाकडे दुर्लक्ष केळे आहे. त्यांत षाडूजीप्रभ्रती सात जाती, प्चमाच्या चार श्रुती, घेवताच्या तीन असे षडजम्रामात असते. गान्धारीप्रभूती अकरा जाती, तीन श्रुती असळेला पब्चम, पण चार श्रुतींचा घेवत असे मध्यमम्रामात असते. 'नास्त्येव विशेष- इ०' वर म्हटल्याप्रमाणे प्रयोगक्षम वेष्टांचा आविष्कार हे दररूपकांचे सामान्य लक्षण ठरले तर प्रत्येक रूपकाच्या विशेषलक्षणाला काही अवकाश राहाणार नाही अशी शंका उद्भवण्याचे जे कारण दिले आहे - चेष्टा खेरीज करून दुसरी कोणतीही गोष्ट संभवत नाही म्हणून - ते तितकेसे समर्पक वाटत नाही. चेष्टांच्या भिन्न भिन्न स्वरूपामुळे निरनिराळे रूपकप्रकार उद्भवू शकतील असे सहज सुचण्यातारख आहे आणि 'छोकाबरील टीकेत अभिनवयुप्ताने हीच गोष्ट स्पष्ट करून दोकेचे निरसन केळे आहे. - 'दष्टान्तेन प्रकृतं घटयन्‌? म्हणंजे नो कोणी चर्चेचा विषय असलेल्या गोष्टीची दृष्टान्ताशी सांगड घालतो तो. 'व्युत्पादनीयम्‌ म्हणजे ज्याला व्युत्पत्ती म्हणजे बोध अथवा उपदेश करावयाचा आहे असा मनुष्य, - 'समानतन्त्र* संगीतशास्त्र हे नाटयशास्त्राच्या दृष्टीने समान विधय असलेले असे शास्त्र आहे. - 'ग्रहादिदरक? अद्डाविसाव्या अध्यायात जातींच्या ह्या दहा विभागांचा निर्देश आहे -- ग्रहांशो तारमन्द्रो च न्यासो5पन्यास एव च | अट्पत्धे च बहुत्वं च षाडवोडविते तथा ॥ (२८. ६९). जाति म्हणजे सामान्यपणे तंगीतातीळ राग, -'रक्तोडरक्तो इ०! या वाक्यात श्राते शब्दांचे तीन अर्थ दिले आहेत -- *वनी, *बनीचे स्थान आणि '्वनींमधील अंतर. ध्वनी दो« प्रकारचा असल्याचे म्हटले आहे ण रागयुक्त व रागरहित. '्वनिस्थानं' हा हस्तलिखितातील पाठ आवश्यक आहे. “व्वनिः स्थानं हा मुद्रित पाठ चुकीचा वाटतो. - 'कर्माधिकरण- इ०! यात श्रुति शब्दाचे हे तीन अर्थ तीन निरनिराळ्या व्युत्प्तींनी तंभवतात हे सांगितले आहे. श्रु धातूचे कम म्हणुन 'श्रूयते असो शरुतिः ह्या व्यत्पत्तीने व्वाने असा अर्थ निष्पन्न होतो. “श्रूयते अस्मिन्‌ इति श्रांतिः” यात अधिकरणार्थी सप्तमीने व्वनिस्थानाचा बोध होतो. आणि “श्रूयते अनेन इति श्रृतिः' यातील करणार्थी तृतीयेने अन्तरालाचा बोध होतो. - 'स्त्रियाः खलनो विप्रतिषेधेन' असे पाणिनींच्या २.२,.१२६ ह्या सूच्तावर वा्सतिक आहे. खल प्रत्यय लागल्यास पासून श्रव शब्द सिद्ध होईल आणि अन लागल्यास श्रवण शद्ध सिद्ध होईल. अभमिनवगुप्ताचे म्हणणे असे दिसते की ह्या रूपांचा उपयोग केला नाही याचा अर्थ ह्या वात्तिकाकडे दुर्लक्ष केले आहे. 7 लक्ष्य, म्हणजे श्रु घातूपासून बनवाबयाचे रूप, -- 'षाडूजीपरभ्ृतयः? षडूजग्रामातील सात जातींची नावे पुढीलप्रमाणे आहेत - षाड्जी, आर्धी, धैबती, निषादवती, षड्जोदीच्यवा, घड्जकेशिकी आणि षडूजमध्यमा (२८.४०-४१), - 'गान्धार्यायाः? मध्यमग्रामातील अकरा जातींची नावे गान्धारी, मध्यमा, गान्धारोदीच्यवा, पञ्चमी, रक्तगान्धारी, गान्धारपञ्चमी, मध्यमोदीच्यवा, नन्द्यन्ती, कर्मारवी, आन्धी आणि केशिकी अशी आहेत (२८.४२-४३). या सर्वाची विस्तृत माहिती अटठ्डाविसाव्या अभ्यायात दिली आहे. वस्तुतस्तु षडजसमुदायो ग्रामः । तत्र स्वरा इति श्र्तिपक्षे बहुवचने लक्ष्य- विदः समर्थयान्ते । मध्यमग्रामे पन्चमपरित्यक्तां क्षृतिं घेवत एवोपभुडनक्त इत्यत्र १2 नाट्यशास्त्र प्रमाणाभावात्सवे एव द्वित्रिश्रुतिकाः श्वत्युत्कृएतया समधिकश्वतयः क्रियन्ते, क कडन (१ क तिकृतं काकल्यन्तराभ्यां च चतुस्त्रश्वरतयो न्यूनश्चुतय इति सरवस्वराणां श्र॒ वेचित्र्यसस्तीति । एतच्च स्वावसरे वक्ष्याम इत्यास्ताम्‌ । खरे म्हणजे षड्ज आदी स्वरांच्या समुदायाला प्राम म्हणतात. त्यात श्रुतीच्या संबंधात स्वराः' यातीळ बहुवचनाचे समर्थन लक्ष्य जाणणारे पुढींठप्रमाणे करतात. मध्यम- प्रामात पंचमस्वराने त्याग केलेली श्रुति घैवतस्वरच स्वतःत अन्तर्भूत करतो याबद्दल काही प्रमाण नसल्यामुळे दोन किंवा तीन श्रुती असलेल्या सर्वच स्वरांत श्रुतीच्या उत्कर्षाने अधिक श्रुती उत्पन्न केल्या जातात आणि काकली व अन्तर यांच्या द्वारा चार किंवा तीन श्रती असलेले स्वर कमी श्रुतींनी युक्त होतात, तेव्हा सवेच स्वरांत श्रुतींच्या मुळे उत्पन झालेले वैचित्र्य असते. आणि हे आम्ही योग्य प्रसंगी स्पष्ट करू, तेव्हा तूर्त हे राहू द्या. स्वरा इते श्रतिपक्षे बहुवचनम्‌ इ०' याचा अर्थ असा असाबा - श्रृतींच्या बाबतीत विचार करता षड्जग्राम आणि मध्यमग्राम यांतील फरक फक्त पंचम व धैवत या दोन स्वरांपुरताच मर्यादित आहे _ घड्जम्रामात पंचम चतुःश्रृति व घेवत त्रिश्चूति तर मध्यमग्रामात पंचम त्रिश्नति ब घेवत चतुःश्रति असे असते. तेव्हा ह्या दोनच स्वरांचा थ्रुतींच्या संबंधात विचार आवदुयक असता छोकातील 'स्वराः? ह्या बहुवचनाची उपपत्ती कशी लावावयाची, 'स्वरौ? असे द्विवचन अपेक्षित आहे अशी शांका घेतली गेली असे दिसते. - 'लक्ष्यविदः? लक्ष्य म्हणजे ज्याचे लक्षण करावयाचे तो पदा र्थ, प्रस्तुत संदर्भात स्वर, क्षति इत्यादी. लक्ष्यविदः म्हणजे ह्यांचे स्वरूप जाणणारे विद्वान. - “पञ्चमपरित्यक्तां श्रतिं? मध्यमग्रामात पंचमात चार श्रुती ऐवजी तीनच श्रुती असतात, तेव्हा तो स्वर एका श्रुतीचा त्याग करतो असे म्हणता येईल. - धैवत एव इ०? मध्यमग्रामात घैवतात तीन ऐवजी चार श्रती असतात. पण ही अधिक आलेली श्रुति म्हणजे पंचमातून वगळलेली श्रृतिच होय असे मानण्याला आधार नाहीः ह्यावरून असे अनुमान काढले आहे की स्वरांतील श्रुती कमी अधिक होणे ही गोष्ट पंचम ब भेबत ह्या दोन स्वरांपुरतीच मर्यादित नाहीं. -:!द्वित्रिश्रृतिकाः श्रुत्युत्कृष्टतया? हा संपादकांनी दुरुस्त केलेला पाठ आहे व तो आवद्यक वाटतो. कारण, मुळातील 'द्वित्रिश्रृतिकास्तया” मधील “तया? चा काही अर्थ लागत नाही. शिवाय, अट्वाविसाव्या अध्यायात उत्कर्षामुळे स्वरातील श्रतींची संख्या बाढते आणि अपकर्ध्रांमुळे ती कमी होते असे म्हटले आहे. - 'काकल्यन्तराभ्याम' अट्डाबिसाव्या अध्यायातील विवेचनावरून असे दिसते की दोन श्रती असलेल्या निषाद व गान्धार या स्वरांतील श्रतींचा प्रकर्ष झाला म्हणजे निषादाला काकली संज्ञा प्राप्त होते व गान्धाराला अन्तर अशी संज्ञा - 'एवं निषाद काकलीसंश्ो गान्धारश्वान्तरसज्ञो भवति? (२८.३४ नंतरचे गद्य), पण प्रस्तुत .ठिकाणी असे बिधान केळेळे दिसते की चार ब तीन श्रुती असलेल्या स्वरांत श्रुतींचा अपक्ष होऊन दोनच श्रती अवशिष्ट राहातात तेव्हा ते स्वरही काकळी व अन्तर यांसारखे होतात. - 'सर्वस्वराणां इ०' याचा अर्थ असा को केवळ पंचम ब धेवत या दोन स्वरांतच श्रुतींतील बदलामुळे वैचित्र्य उत्पन्न होते अते नसून सवे स्वरांच्या बाबतीत ते उत्पन्न होऊ शकते. म्हणून 'स्वराः? ह्या शब्दातील बहुवचन समर्थनीय ठरते. | रट. ९: इह त्वनेन इृष्टान्तेनेतदुक्त॑ भवाते । स्वरसमुदायरूपत्वाविशेषे5पि खराणां पयांयतः प्राथम्यप्राधान्यार पत्वभूयस्त्वपूर्णत्वापूर्णत्वारोहावरोहान्त्यत्वमध्यत्वादिप्र- विभागभेदेर्यथान्यः षड्जग्रामो5न्यो मध्यमग्रामः, तथैव वृत्तीनां स्वरस्थानीयानां प्राथम्यप्राधान्यादेना दराकेन रूपकं रूपकान्तराद्विद्तते । यथा चतुःश्रुतिः पश्चमस्त्रिश्चातिथ्व भवन्‌ ग्रामान्यत्वं कराते, तथा सेव वात्तेः श्रुतिस्थानीयेरड़े: कचित्संपूर्णा क्वविदूनेत्येवमपि रूपकविभाग इत्येतत्‌॒ जाति: श्रुतिभिरिति डयन दारीतम । प्रस्तुत छोकात ह्या दृष्टान्ताने पुढीलप्रमाणे अर्थ सिद्ध केळा आहे. ज्याम्रमाणे (दोन्ही ग्रामांचे) खरांचा तमुदाय हे खरूप उभयतांना समान असले तरी कार्यबशात्‌ खरांच्या प्राथम्य, प्राधान्य, अत्पत्व, भूयस्त्व, पूर्णत्व, अपूर्णत्व, आरोह, अवरोह, अन्त्यत्व, मध्यत्व इत्याद] निरनिराळ्या प्रकारांच्या आविष्कारामुळे षड्जग्राम निराळा व मध्यमग्राम निराळा बनतो, त्याचप्रमाणे स्वस्थानी असलेल्या वृत्तींच्या प्राथम्य, प्राधान्य इत्यादी दहा प्रकारच्या आविष्कारामुळे रूपकरूपकांत भेद उत्पन्न होतात. आणि ज्याप्रमाणे चार शती असलेला पंचमस्वर तीन श्रुतींचा होऊन मिन्न ग्राम उत्पन्न करतो, त्याप्रमाणे एकच वृत्ति श्रृतिस्थानी असलेल्या अंगांनी क्चित संपूर्ण तर क्वचित न्यून होते; अशा रीतीनेही रूपकांचे भेद उत्पन्न होतात. हे 'जातिमिः' ब श्तिभिः' या दोन ठाब्दांनी दाखविले आहे. 'प्राथम्य” म्हणजे प्रथम कोणता स्वर योजावयाचा ते. -- 'आरोहावरोह? मुद्रित प्रतीत अवरोह? शब्दाचा मुद्रणदोबाने लोप झाला आहे. - 'अन्यः षड्जग्रामः इ०? येथे ग्राम शब्दाने त्याने उत्पन्न होणाऱ्या जाती समजावयास पाहिजे. ग्राम दोनच आहेत व त्यांमधील मिन्नता प्राथम्यादींनी उत्पन्न ' होणारी अशी नाही. ह्या गोष्टींमुळे अठरा प्रकारच्या भिन्न भिन्न जाती अस्तित्वात येतात. - 'ग्रामान्यत्वमर म्हणजे षड्जग्रामांचे मध्यम प्रामात रूपांतर, -- “जातिमिः इ०? एकूण अथ अत्ता की रूपकप्रकारांतील मेद जातींमधील भेदांप्रमाणे आहेत, तसेच ते श्रृतींच्या कमीअधिकपणामुळे स्वरसमूहांत उत्पन्न होणाऱ्या भदांप्रमाणे आहेत. वस्तुतः ग्राम दोनच असल्यामुळे श्लोकात काव्यबन्धाची प्रामाशी केलेली तुलना विशेष समर्पक नाही. म्हणूनच ग्राम रोब्दाचा व्यापक अर्थ करावा लागतो. ग्रामी पूर्णस्वरी हो तु यथा घे षडूजमध्यमो । सवेवृत्तिविनिष्पनौ कांव्यबन्धो तथा त्विमो ॥६॥ ज्षेयं प्रकरणं चेव तथा नाटकमेव च। सेववृत्तिविनिष्पत्न॑ नौनाबन्थसमाश्रवम्‌ ॥७॥ १ घो काव्यबन्धे. २ नि पूर्वेवत्त- ३ का नाटयावस्था-, घो नानावस्था-. १ नाट्यशास्त्र परंतु, ज्याप्रमाणे पूर्ण स्वर असलेले षड्ज व मध्यम हे दोनच प्राम आहेत त्याच- प्रमाणे सव वृत्तींनी निष्पन्न झालेले असे हे (पुढील) दोनच काब्यबंध होत. सर्व वत्तींपासून निष्पक्न झालळेळे व विविध प्रकारच्या रचनांनी युक्त असे प्रकरण आणि नाटक हें दोनच (रूपकप्रकार) होत असे जाणावे, अथ वृत्तिविभागं संक्षपतो 5 भिधत्ते ग्रामी पूर्णस्वराविति । जात्याश्रययो- जांतिद्वारेण षाडवोडविकांशकयोगे न्यूनस्वरताप्यस्तीते षडजग्रामरागो मध्यम- ग्रामराराश्चेह ग्रासशब्देन व्यपदिष्ट इति केचित्‌ । तदसत्‌ । इह हि ग्रामदाब्देन जातिसमुदायो 5 भिध्ीयते । तत्र यद्यप्यंशके न्यूनस्वरतापि भवति, तथापि समुदायस्थ पूर्णतायाः का हानिः। तस्मादयमत्रार्थः। यथा विचित्रसंनिवेशतालम्बन- सुन्दरतमसंपूर्णस्वरसमुदायरूपादू ग्रामडयाद्विभागकल्पनया जात्यंशकानां पूर्णा- पूर्णांदिसरभेदभाजां प्रसवः, एव नाटकप्रकरणाभ्यां पूर्णवृत्तिव्रत्त्यज्ञाभ्यां वृत्ति- न्यूनानां च रूपकभेदानां परिकल्पनम्‌ । आता 'ग्रामी पू्णस्वरौ' इत्यादी छोकात वृत्तींचा विभाग संक्षेपाने सांगतात. काही टीकाकारांच्या मते जातींचा आश्रय असलेल्या प्रामांत जातींच्या द्वारा पाडद वब ओडव यांच्या अंशकांचा योग होत असल्यामुळे स्वरांची संख्या कमी सुध्दा होते, म्हणून ग्राम दाब्दाने या ठिकाणी षड्जप्रामातील राग व मध्यमग्रामातीळ राग ह्यांचा निर्देश अभिप्रेत आहे. पण ते बरोबर नाही. या ठिकाणी प्राम शब्दाने जातिसमुदाय निर्दिष्ट आहे. त्यात जरी काही अंशकांमध्ये स्वर कमी असले तरी त्यामुळे समुदायाच्या पूर्णत्वाला काय हानी पोहोचते £ म्हणून या ठिकाणी अर्थ असा. ज्याप्रमाणे मनोरम अशा स्चनेचा अवलंब केल्यामुळे अत्यंत सुंदर ब संपूर्ण स्वरांचा समुदायरूप असलेल्या ढोन प्रामांपासून पूर्ण, अपूर्ण आदी स्वरांच्या भेदांनी युक्‍त जात्यंशकांची भिन्न भिन्न ख्यात उलत्ती होते, त्याप्रमाणे वृत्ती आणि वृत्त्यगे पूण स्वरूपात असलेल्या नाटक व प्रकरण ह्या दोन प्रकारांपासून कमी वृत्ती असलेल्या रूपकप्रकारांची कल्पना केळी आहे. 'जात्याश्रययोः” याचे विशेष्य 'ग्रामयोः' हे समजळे पाहिजे. - “षाडबोडविकांगाकयोगे? घाडव व औडव हे जातींचे दोन प्रकार आहेत (बर उद्धुत केलेला २८.६६ हा श्लोक पहा). षाडव म्हणजे सहा स्वंर असलेली जाति ब औडव म्हणजे पाचच स्वर असलेली. ह्या टीकाकारांचे म्हणणे असे की क्छोकात 'पूर्णस्वरो ग्रामी? असे शब्द असल्यामुळे ग्राम म्हणजे जातिसमुदाय असा अर्थ करणे योग्य होणार नाही, कारण जातीच्या काही अंशांत कमी स्वर असतात. -- 'घड्जग्रामरागः इ०?' सर्व सातही स्वर असलेल्या घडूज ब मध्यम ग्रामांतून निष्पन्न झाठेले राग असा अर्थ ह्या टीकाकारांनी स्वीकारला आहे. पण अमिनवगु्ताने हे मत चूक ठरवून ग्राम म्हणजे जातिससुदाय हाच अर्थ मान्य केला आहे. काही अंशात कमी स्वर असले १टॅ.८--९ १७ तर कोठे बिघडले असे त्याने विचारळे आहे. पण छोकातील 'पूर्णस्वरी' शब्दाची याने संगती लागत नाही असे म्हणता येण्यातारखे आहे. -- 'यथा विचित्र- इ०' अमिनवरुताने 'ोकाचा अर्थ केला आहे तो अस्ता -- ज्याप्रमाणे संपूर्ण स्वर असलेल्या प्रडूज व मध्यम ह्या दोन ग्रामांपासून कमीअधिक स्वर असलेल्या जात्यंशकांची उत्पत्ती होते त्याप्रमाणे वृत्ति व दृत्त्यगे यांनी पूर्ण अस- लेल्या नाटक व प्रकरण ह्या दोन रूपकप्रकारांपासून व्रृत्तींच्या न्यूनतेसुळे इतर रूपकप्रकार उत्पन्न होतात. पण नार्यश्ासत्रातील मूळ छोकांत अशा तऱ्हेचा काही निदेश नाही. ह्या दोन कोकांत एवढेच म्हटले आहे की नाटक व प्रकरण ह्या दोन रूपकप्रकारांत सर्वे म्हणजे चारही वृत्ती विद्य- मान असतात. “सर्व वृत्तींपासून नाटक व प्रकरण हे प्रकार निष्पन्न होतात? एंबढेच विधान आहे, इतर प्रकारांच्या निष्पत्तीचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. बीथी समवकारश्व तथेहामृग एव च उत्सृष्टिकाड्ले व्यायोगो भाणः प्रहसनं डिमः |॥८]। केशिकीवृत्तिहीनानि रूपाण्येतानि कारयेत्‌ । अत झऊध्ये प्रवक््यामि काव्यबन्धाविकल्पनम्‌ |।९॥ वीथी, समवकार, इंहामृग, उत्सृष्टिकाडूः, न्यायोग, भाण, प्रहसन आणि डिम हे रूपकप्रकार केशिकीवृत्तीने विरहित असे करावेत. यापुढे मी विविध काव्यप्रकारांच्या रचनेचे वणन करणार आहे. त्त व्रत्तिन्यूनानि रूपकाण्याह वीथीत्यादि । दोषाणि रूपाणीति वक्तव्ये प्रातिपदं नासग्रहणं ज्ञापयाति एतदनुक्तान्यपि रूपकाणि संभवन्ति । अत एव रूपकविदोषगणनम आभ्यो विनिःसतसमिति लक्षणस्योदाहरणमात्रम । तेन वृत्तीनां विनियोगसमुच्चयविकल्पेः वृत्त्यकझानां च बहवो रूपकभेदा भवन्ति । तेषां परं कोहळादिभिनांममात्रं प्रणीतम्‌ । लक्षणेन त्विह संग्रहीता एव ते । त्यांपैकी कमी वृत्ती असळेळे रूपकप्रकार “वीथी' इत्यादी छोकात सांगतात. इतर बाकीची रूपके असे म्हणावयाच्या ऐवजी त्या प्रत्येकाचा नावाने निर्देश केला आहे त्यावरून असे सूचित केळे आहे की येथे नामनिर्देशा न झाळेळे इतरही ख्सकप्रकार संभवतात. म्हणूनच विशिष्ट रूपकांचा नामनिर्देश केवळ 'ह्या वृत्तींपासून निष्पन्न झाले! या लक्षणाच्या उदाहरणादाखल होय. म्हणून वृत्तींच्या व वृत्त्यंगांच्या एकत्रित अथवा वैकल्पिक उपयोगामुळे पुष्कळ रूपकप्रकार उत्पन होतात. परंतु कोहलप्रभ्र्तींनी त्यांचा केवळ नामनिर्देश केळा आहे. पण या प्रेंथात लक्षणाच्या द्वारा त्यांचा समावेश केलाच आहे. र्ट नाट्यशास्त्र 'रूपकविशेषगणनम्‌? ही गणना वर *छोक २ व ३ यांत केली आहे. - 'आभ्यो विनिःसुतम्‌? हे रूपकाचे लक्षण वर कोक ४ मध्ये केळे आहे. - 'विनियोगसमुच्चयबिकल्पै:' यानंतर हस्तलिखितात 'समुच्चये हा अधिक शब्द आढळतो. तो लेखनदोष आहे.- 'वृत्त्यद्ञानां च' याचा सुद्धा अन्बय 'विनियोगसमुच्चयविकल्पे:' शी करावयाचा आहे. तत्र नाटकप्रकरणे एव सवंब्रत्तिपूर्ण इति नियमः, न तु विपर्ययः, मुद्रारा- क्षसस्थ केशिकीहीनस्य कृत्यारावणस्थ च नाटकस्य दर्शनात, वेणीसंहारे च सास्व- त्यारभटीमात्रं इश्यत इति केचित्‌ । अन्ये तु तत्राप्यवच्यं वृत््यन्तरानुपरवेशो5 स्ति यदि, परमितिवृत्ताव्यापकत्वान्न ठक्ष्यते । अपूणद्रात्तेत्वे;पि विरूपकतैव स्यात्‌ । काही टीकाकारांच्या मते नाटक व प्रकरण हे दोनच प्रकार सर्व वत्तींनी पूण असतात असा नियम आहे, पण याच्या उळट विधान बरोबर नाही ; कारण, केशिकी वृत्ति नसलेली मुद्राराक्षस व कृत्यारावण ही नाटके आहेत, आणि वेणीसंहार नाटकात केवळ सात्तती व आरमटी वृत्तींचे दर्शन होते. पण दुसरे टीकाकार म्हणतात की त्या नाटकांतही इतर वृत्तींचे अस्तित्व अक्य असते, पण सर्व कथानकाला व्यापून नसल्यामुळे ते लक्षात येत नाही. वृत्ती पूर्ण नसल्या तर नाटक विरूपकच होईल. 'विपर्यय म्हणजे ज्यात सर्व वृत्ती नाहीत त्याला नाटक किंवा प्रकरण ही संज्ञा देता येणार नाही. - यदि परमितिवृत्ताव्यापकत्वान्न लक्ष्यते' हा हस्तलिख्वितातील पाठ अ हे, मुद्रित पाठ 'यटि परिमितवृत्तिव्यापकत्वात्‌ लक्ष्यते असा आहे. तो बरोबर नाही हे उघड आहे. 'न लक्ष्यते! अर्थासाठी आवश्यक आहे, आणि मग 'परम्‌? आणि 'इतिवृत्त-अन्यापकत्वात्‌ः हे आवइयक ठरतात. परिमित- वृत्तीच्या व्यापकतेला काही अर्थ नाहो. - 'यटि? हे 'यद्यपि? या अर्थी बापरलेले दिसते. वस्तुत: ह्या अव्ययाची आवश्यकत नाही. - 'विरूपकता? यातील 'रूपक? शब्दात छेघ अभिप्रेत दिसतो. सकलाडपरक्रियापरिपूणत्वादेव नाटकं प्रकरणं च प्रधानम । तथाहि काश्चिद्रिनेयः प्रसिद्धिमनुरुध्यमानो दृष्ट इति सुप्रासिद्वेतिवृत्ते नाटके प्रसिद्ध वस्तुनि विनेयः । कश्चित्त विनेयो5भिनववस्तुब्रत्तकोतुकपरतन्त्र इति किमेतदपूवमिति समुत्पाद्यवस्तुना प्रकरणेन विनीयते । विनयश्वास्य घमांथंकामेबु सवपुरुषाथेष्वपवर्ग च तथा भर्वाते यादे सकलतदुपयोगिव्यापाराश्रयणम्‌ । सकलव्यापाराक्षिप्तं पूणवृत्तिकत्वमिति द्रिवत्तित्रिवृत्त्यादिकें न नाटकं भवति, रूपकान्तरमेव तु तदाभासं तत्सरवम्‌ । केशिकीविहीनत्वे;पे यथा शूडझररयोगः समवकारे तथा तहुक्षणं टे वणयिष्यामः । 2८.८--९ १९ सवे अंगांच्या प्रक्रियांनी परिपूर्ण असल्यामुळे नाटक व प्रकरण हे दोन प्रधान प्रकार होत, म्हणजे असे. ज्याळा उपदेश करावयाचा असा कोणी प्रसिद्ध गोष्टीचाच पाठपुरावा करीन असलेला दिसून येतो, म्हणून त्याला सुप्रसिद्द कथानक असलेल्या नाटकात प्रसिद्ध असलेल्या गोष्टीने उपदेश करता येतो. परंतु उपदेठापात्र असा दुसरा कोणी नवीन कथानकातीळ घटनांविषयी कुतूहलाने भारलेला असतो म्हणून हे काय नवीन असे भासविणाऱ्या कविकल्पित कथानक असलेल्या प्रकरणाच्या हारा त्याला उपदेश केळा जातो. आणि त्याळा धम, अर्थे व काम या पुरुषार्थांविषयी व मोक्षाविषयी उपदेश तरच केला जाईळ जर त्याळा उपयुक्त असलेल्या सगळ्या न्यापारांचा (रूपकात ) अन्तर्भाव असेळ तर. आणि सगळ्या व्यापारांचे निरूपण म्हणजे सर्व वृत्तींनी पूण असणे असे असल्यामुळे दोन वृत्ती असलेळे, तीन वृत्ती असळेळे इत्यादी प्रकार नाटक नसून ते सरव त्याच्यासारखे भासणारे दुसरेच रूपकप्रकार होत. केशिकी वूत्ती नसली तरी समवकारात शुंगाराचा योग कसा होतो ते आम्ही त्याच्या लक्षणाच्या व्याख्येत दाखवून देऊ. "नाटकं प्रकरणं च' मुद्रित पाठ “नाटकाळकरणं च? उघडच चुकीचा आहे. - 'तथाहि? नाटक व प्रकरण सवे वृत्तींनी परिपूर्ण का असावे याच्या आता होणाऱ्या कारणमीमांसेचा हा उपन्यास आहे. - 'कश्चिद्दिनेयः? मुळातील ' केश्चिट्‌ ची 'कश्चिद्‌ः अक्यी दुरुस्ती आवश्यक असल्यामुळे केळी आहे. विनेय म्हणजे ज्याला उपदेश करावयाचा असा मनुष्य, प्रस्तुत संदर्भात प्रेक्षक. काव्याचे व्युत्पत्ति म्हणजे उपदेश देणे हे सुद्धा एक प्रयोजन आहे. - पुढील 'कश्चिक्तु' व 'विनेयः? या दोन शब्दांच्या मव्ये मुळात ' किमेतदपूर्वमिति प्रसिद्धे बस्तुनि रूपकान्तरमेव तु तदाभासं तत्सर्ध इतक मजकूर अधिक आहे. हा येथे चुकीने पडला आहे. : किमेतदपूर्वमिति' हा अंश पुढील बाक्‍यात 'विनेयो? नंतर किंवा “-परतन्ञ्र इति? नंतर संभाव्य आहे. 'विनेयो? शब्दातील संधि लक्षात घेऊन तो अंशा “-परतन्त्र इति' नंतर घातला आहे. 'प्रसिश्दे वस्तुनि' हा अंद मागच्या वाक्यातच संभाव्य असल्यामुळे तेथे त्याला जागा करून दिली आहे. मात्र तेथे कथानक या अर्थी (इतिवृत्त? शब्द अगोदरच वापरलेला असल्यामुळे “वस्तु म्हणजे कथानक असे न समजता गोष्ट, बाब असे समजावे लागेल, नंतरचा 'रूपकान्तरमेब तु तदाभासं? हा अंश लेखनप्रमादामुळे द्विरुक्त झाला आहे. दोनतीन ओळींनंतर योग्य जागी हे शब्द पुन्हा आढळतात. तेव्हा या ठिकाणी ते गाळले पाहिजेत यात शंका नाही. शेवटचे 'तत्सर्वमूर हे शब्द इतरत्र कोठेही बसण्यासारखे नसून “तदाभासं' नंतर ते सार्थ होऊ शकतात म्हणून त्यांची पुढे योजना केली आहे. -- 'सकल- तदढुपयोगिब्या[पाराश्रयणम? मुळात 'सकलं? असा स्वतंत्र शब्द आहे. पण सकल हे व्यापारचे विशेषण असल्यामुळे त्याचा समासात अन्तर्भाव आवद्यक आहे. - या ठिकाणी केलेला युक्ति- वाद अता की सवे पुरुषार्थोविषयी उपदेश करावयाचा असेल तर सर्वे प्रकारच्या व्यापारांचे रूपकात टर्शन घडविणे आवश्यक आहे, आणि असे दर्शांन सर्व वृत्तींच्या उपयोगानेच घडविता येईल, म्हणूनच सर्व वृत्तींचा वापर करणारे नाटक व प्रकरण हे सरव रूपकांत श्रेष्ठ असे वर म्हटले आहे. २० नाट्यशास्त्र मुळात 'तत्केरिकी- इ०? असे आहे. त्यातील “तत्‌? हा वर निर्देशिळेल्या 'तत्सर्वमः चा ह्या ठिकाणी अवशिष्ट राहिलेला अंश. मागील बाक्‍्याच्या शेवटी “तत्सर्वम्‌! ची योजना केली आहे. प्रस्तुत वाक्यात कछोकातील 'कैशिकीवृत्तिहीनानि? या वचनामुळे उत्पन्न होणाऱ्या शंकेचा निदेश केला आहे. समवकार हा रूपकप्रकार केगिकीरहित असतो असे येथे म्हटले आहे. पण समवकारात गुंगार असतो असे त्याच्या लक्षणात म्हटले आहे आणि शुंगाराच्या आविष्कारासाठी केशिकी वृत्ति आवड्यक आहे. तेव्हा समवकारात शुंगार कसा शाक्य आहे? या शंकेचे समाधान अमिनवगयुप्ताने पुढे ६७ व्या 'छोकावरीलं व्याख्येत केले आहे. - मुद्रित प्रतीत 'शुद्डारयोगः' नंतर एक 'तथा' अधिक पडला आहे. तो गाळणे आवश्यक आहे. ननु पूर्णवृत्तिकत्वाविशेषे$पि नाटकप्रकरणयोः को भेदः कैशिकीहीनत्वे चाविशिष्टे वीथ्यादेर्मिथः को विशेष इत्याशडुलं वारयन. कर्मराब्दाक्षिप्तविशेष- लक्षणाथे दर्शायाते अत ऊध्वमित्यादिना । काव्यस्य बन्धनं परस्पराश्रयसंबन्धेनेव एकवाक्‍्यताकरणसंबन्थः, स विकल्प्यते येन तद्विशेषलक्षणं वक्ष्यामीति । सर्व वृत्तींनी पूण असणे हा समान धर्म असता नाटक व प्रकरण यांत भेद काय, तसेच केशिकीबृत्तिरहित असणे हे सामान्यलक्षण असणाऱ्या वीथी वगैरे प्रकारांत परस्पर भेद काय या शंकेचे समाधान करण्यासाठी कर्म शब्दाने निर्दिष्ट झालेळे विशेषलक्षण “अत ऊधध्वेम! इत्यादीने दाखवितात. काव्याचा बन्ध म्हणजे (विविध भागांच्या) परस्परांच्या आश्रयरूप संबन्थासुळेच (काव्यात) एकवाक्यतेच्या उत्पत्तीच्या स्वरूपाचा संबन्ध; त्या संबन्धाची कल्पना ज्याने केळी जाते ते (काव्यबन्धविकल्पन, म्हणजेच) विशेषलक्षण. ते मी सांगणार आहे. नवव्या कोकाच्या उत्तरार्धांची ही व्याख्या आहे. - 'कमशब्दाक्षिप्त- पहिल्या *होकात असेलल्या "कर्मतः? मधील कर्म शब्दाचा हा निर्देश आहे. - 'काव्यस्य बन्धने इ०? यात छोकातील 'काव्यबन्थविकल्पनमूर या समासाच्या अर्थाची फोड केली असून त्या शब्दाचा “बिशेषलक्षण? असा अर्थ सिद्ध केला आहे. प्रख्यातवस्तुविषयं प्रख्यातोदात्तनायकं चेव । राजपिंबंश्यचरितं तथेब दिव्याश्रयोपेतम्‌ ॥ १०॥ 22 3002200 देविठ देभिग ( शै र नानाविभातेभियुंतमाडवेविलासादभिगेणशरेव । अडूप्रवेशकाढ्यं भवति हि तत्नाटकं नाम ॥ ११॥ ज्यात प्रसिद्ध कथानक व विप्रय असतात, त्या'चप्रमाणे ज्याचा नायक प्रसिद्ध व उदात्त असतो, ज्यात एखाद्या राजषीच्या वंशात उत्पन्न झालेल्या राजाचे चरित असते, तसेच १ नि -विषये. २ नि -वंश-. ३ नि -भूतिसंयुत- ४.नि -काव्यं. | १८,१०-११ 34 ज्यात दिव्य व्यक्तींचा आश्रय घेतलेला असतो, जे विविध प्रकारच्या विभूतींनी आणि सम्रद्धी, विलास इत्यादी गुणांनी युक्‍त असते आणि जे अंक व प्रवेशक यांनी समृद्ध असते ते (काव्य) नाटक ह्या नावाने ओळखले जाते. नाटकं प्रकरणादपि प्रधानम्‌ । प्रसिद्धघुपजीविनी हि कल्पना वस्तुसंभावना अनुभवसूठत्वात्तस्याः । उत्पेक्षा अपि हि प्रसाणावगतेप्वेव वस्तुषु स्वातन्त्येण योजनामात्रेण व्याप्रियन्ते षड्दन्तो हस्ती खे धावतीति । तेनेतिहासादिप्रमाणसिद्ध- वस्तुप्रदर्शकं नाटकं तावलक्षयितुमाह प्रर्यातवस्तुविषयमित्यादि । नाटक हे प्रकरणापेक्षाही श्रेष्ठ, कारण, कल्पना अथवा वस्तूची संभावना ही प्रसिद्ध अशा गोष्टीवर अवलंबून असते, अनुभवातच तिचे मूळ असते म्हणून. कारण, उठलेक्षांचा वापर सुद्धा (अत्यक्षादी) प्रमाणांनी अवगत झालेल्या वस्तूंच्याच संबंधात केवळ स्वतंत्र योजना करून केला जातो; उदाहरणार्थ, सहा दात असलेला हत्ती आकाशात धावतो इत्यादी, म्हणून प्रथम इतिहास वगैरे प्रमाणांनी सिद्ध झाळेळी गोष्ट दाखविणाऱ्या नाटकाचे लक्षण 'प्रख्यातवस्तुविषयम्‌! इत्यादी शब्दांत करतात. 'प्रमाणावगतेघु' मुद्रित प्रतीतील 'प्रमाणागतेपु' ह्या पाठ नजरचुकीने आला असावा. - “षडदन्तो इ०? हे विधान सर्वथा उत्परेक्षित अथवा काल्पनिक आहे. पण यातील प्रत्येक अंशा - सहा, दात, हत्ती इत्यादी - प्रमाणांनी अवगत झालेला आहे. - ' -प्रमाणसिद्धवस्तु- मुळातील “-प्रमाणवस्तुसिद्ध- यांची हो दुरुस्ती आवश्यक आहे हे उघड आहे. प्रख्यात भारतादी यद्ठस्तु तद्‌ विषयो5स्य; तत्रापि किंचिदप्रसिद्धं भवाति तन्निराकरणाय प्रख्यातोदात्तेति श्रीशडडकः । एतत्तु प्रख्यातं वस्तु विषयो5स्येति इयता गतार्थमित्युपाध्याया इत्थमाहः । इह त्रिविधया प्रसिद्धया प्रासिद्धत्वं भर्वाते । अमुक एवंकारी असुत्र देशा इति तत्र प्रकर्षेण ख्यातं वस्तु तथा विषयो माळवपाश्वाळादिदेशो यस्मिन । चक्रवर्तिनो$पि हि वत्सराजस्य कौज्यास्बी- व्यतिरिक्ते विषये कार्यान्तरोपक्षेपेण विना यन्निरन्तर॑ निर्वर्णनं तदवैरस्याय भवति, तत्र प्रसिद्धिखण्डनन प्रतीतिविधातातु, का कथा रसचर्वणायाः । एवं द्वे प्रसिद्ध उक्ते, प्रख्यातोदात्तेत्यनेन तृतीया प्रसिद्धिरुक्ता । प्रख्यात अशा भारतादी प्रदेशात जी वस्तु ती विषय आहे ज्याचा असे (नाटक); तेथे सुद्धा एखादी गोष्ट अप्रसिद्ध असते तिचे निवारण करण्यासाठी प्रख्यातोदात्त असे म्हटले आहे अशी श्रीशक्ककाची व्याख्या. परंतु प्रख्यात वस्तु विषय आहे ञ्याचा ह्या विग्रह्माने केलेल्या अर्थात ही गोष्ट खुद्ठा समाविष्ट आहे म्हणून आमचे गुरुजी ग्र नाट्यशास्त्र का पुढीलप्रमाणे व्याख्या करतात. या जगात तीन प्रकारच्या प्रसिद्धीमुळे प्रसिद्धत्व प्राप्त होते. अमुक मनुष्य असे कार्य करणारा अमुक प्रदेशात आहे या विधानाच्या अनुरोधाने प्रकर्षाने ख्यात अशी वस्तु व विषय म्हणजे माळव, पांचाळ आदी देश ज्यात (असा विग्रह करावया'चा), कारण, चक्रवती असलेल्याही वत्सराजाचे कौशाम्बीब्यतिरिक्त इतर देशात एखाद्या कार्याचे निमित्त नसताना सतत वास्तव्याचे वर्णन जर केले तर त्याने विरस होईल, कारण त्यामुळे प्रसिद्धीचा भंग होऊन प्रतीतीतच विघ्न उत्पन्न होईल, मग रसास्वादाची कसली गोष्ट याप्रमाणे या दोन प्रसिद्धी सांगितल्या. तिसऱ्या प्रसिद्धीचा 'प्रख्यातोदात्त यात निर्देश आहे. | 'श्रीशाड्कुकः” ह्या प्राचीन टीकाकारा'चा निदेंडा अमिनवभारतीत अनेक जागी केला आहे. - एतत्‌? म्हणजे 'प्रख्यातोदात्त- ही गोष्ट. - 'उपाव्यायाः? म्हणजे नाट्यशास्त्रावरील अभिनवगु- पाचे गुरुजी भट्ट तोत. - 'प्रकर्षेण ख्यात इ०' यात छोकातील पहिल्या शब्दाचा निराळ्या अर्थी बिग्नह केला आहे. त्यात विषय म्हणजे देशा असा अर्थ केला आहे. पण तो मूळ नाट्यशास्त्र- काराला अभिप्रेत असेल्से वाटत नाही. - 'कार्यान्तरोपक्षेपं बिना? कार्याच्या निमित्ताने उदयन उज्जथि- नींत व मगधात होता, पण तो काही काळच, निरंतर नव्हे. - “प्रतीतिविधातात? ही मुळातील 'प्रतीतिविधानात्‌'ची तंपादकांनी केलेली दुरुस्ती आवश्‍यक आहे. काव्याच्या प्रतीतीच्या आड येणाऱ्या अनेंक प्रकारच्या विध्नांचा निर्देश सहाव्या अध्यायात रससूत्रावरीळ टीकेत केला आहे. त्यातील पहिल्या प्रकारात प्रस्तुत प्रसिद्धिभंगाचा समावेश होतो. उदात्त इति वीररसयोंग्य उक्तः । तेन धीरललितधीरप्रशान्तधीरोद्धत- धीरोदात्ताश्वत्वारो5पि गृह्मन्ते । राजषिंवंड्येत्यनेन प्रख्यातर्मापे यद्वस्तु क्रषि- तुल्यानां राज्ञा वंशे न साधु नोचितम्‌, तथा प्रख्यातत्वे$पि देवचरितं स्वप्नभावादि- बहुळतयोपदेशायायोग्यम, इति नेतद॒भयं निबन्धनीयाभाते फलतः प्रतिषेधो दर्शितः । राजान क्षय इवेत्युपमितसमासः, तद्ठंशे साध्य चरितं यस्मिन्निति बहुब्ीहिः । न च सर्वथा देवचरितं तथावर्णनीयम्‌, किंतु दिव्यानामाश्रयत्वेन प्रकरीपताकानायकादिरूपेण उपेतमुपगमो5ड्रीकरणं यत्न । तथाहि नागानन्दे भगवत्याः पूणकरुणानिर्भरायाः साक्षात्करणे व्युत्पत्तिजीयते - निरन्तरभक्तिभा- वितानामेवं नाम देवताः प्रसीदन्ति, तस्माद्देवताराधनपुरःसरमुपायानुष्ठानं कार्य- मिति । यदि तु मुख्यत्वेनेव देवचरितं वर्ण्यते तत्ताबंद्विप लम्भकरुणाद्धतभयानक- रसोचितं चेन्निबध्यते, तन्मानुषचरितमेव संपद्यते । प्रत्युत देवानामधियाधानं प्रसिद्धिविधातकम्‌, तत्र चोक्तो दोषः । विप्रलम्भाद्यभांवे तु का तत्र विचित्रता, *जनाया एतत्प्राणत्वात्‌ । अत एव हृदयसंवादो5पि देवचरिते दुलभः । न च तेषां दुःखमस्ति यत्मतीकारोपाये व्युत्पादनं स्यात्‌ । नायिका त॒ दिव्याप्यविरोधिनी १८.१०-१९ 4 यथोवशी, नायकचरितेनेव तदृत्तस्याक्षेपात्‌ । डिमादौ तु दिव्यानां नायकत्वेअमि- प्रायमावेदार्येष्याम डति । | उदात्त' ह्या शब्दाने वीररसाळा योग्य असा नायक अमिप्रेत आहे. म्हणून धीरळळित, धीरप्रशान्त, धीरोद्धत आणि धीरोदात्त या चारही प्रकारचे नायक समजावयाचे. 'राजषिंवंश्‍्य' या वचनाने - प्रख्यात असलेली सुद्धा जी गोष्ट क्रषितुल्य राजांच्या वंशात साधु नसणारी म्हणजे उचित नसणारी अशी असते. ती, तसेच प्रख्यात असले तरी देवांचे चरित, त्यांचे प्रभाव आदी विशेषच त्यात बहुतांशी असल्यामुळे, उपदेदा देण्यास असमर्थ म्हणून ते, या दोन्ही गोष्टींची नाटकात योजना करू नये - अज्शा निष्कर्षाच्या रूपात प्रतिषेथ दाखविळा आहे. 'राजान: क्रषयः इव' याप्रमाणे राजर्षि हा उपमितसमास आहे; त्यांच्या वंशात साधु म्हणजे चांगले (ते वंऱ्य) असे चरित ज्यात आहे ते (नाटक) असा बहुत्रीहि समास आहे. आणि देवांचे चरित कोणत्याही प्रकारे दाखवावयाचे नाही असे नाही, तर दिव्य पुरुषांचा आश्रयत्वाने म्हणजे प्रकरी किंवा पताका यांच्या नायक बरे रूपाने उपेत म्हणजे उपगम, स्वीकार ज्यात आहे ते (नाटक). उदाहरणार्थ, नागानन्द नाटकात करुणेने परिपूर्णे अशा गौरी देवीच्या साक्षात्कारामुळे (प्रेक्षकाला) असा बोध होतो की भक्तीने पूर्णपणे भारावलेल्यांना देवता अश्या रीतीने प्रसन्न होतात, तेव्हा देवताराधनप्रधान उपायांचे अनुष्ठान केळे पाहिजे. पण जर देवतांच्या चरिताचेच प्राधान्याने वर्णन केले तर ते विप्रलम्भ, करुण, अद्भुत व भयानक रसांना परिपोषक असे दाखविल्यास त्याला मानवांच्या चरिताचेच स्वरूप येईल. उलट, देवांना सर्वज्ञताविहीन दाखविल्यास ते प्रसिद्धीच्या विरुद्ध होईळ, त्यात वर सांगितलेला दोष उत्पन्न होईळ. परंतु विप्रलम्मादी नसल्यास त्यात वैचित्र्य कोठून येणार £? कारण हेच रंजकतेळा प्राणभूत होत. म्हणून देवचरिताशी प्रेक्षकाचा हृदयसंवाद होणे सुद्धा कळटीण आहे. आणि त्यांना दुःख होत नाही को, ज्यामुळे दुःख दूर करण्याच्या उपायांचा बोध होऊ शकेळ. तथापि, नायिका दिव्य असण्यास हरकत नाही, जशी उर्वशी आहे; कारण, नायकाच्या चरितात'च तिचा वृत्तान्त अन्तभूत असतो. परंतु, डिम आदी प्रकारांत दिव्य नायक असावेत याविषयीचा अभिप्राय आम्ही पुढे सांगू. “धीरललित- इ०? या चार प्रकारच्या नायकांचे वर्णन २४.१७-१९ या “छोकांत आहे. उदात्ततेचा गुण फक्त धीरोदात्त नायकातच असतो असे नाही. -- 'राजर्पिवंद्येत्यनेन इ०? वंद्य? याचा अर्थ 'वदो साधु' म्हणजे वंशाला उचित, अनुरूप असेल ते. नाटकात 'राजपिंवंदय? असावे यावरून असा निष्कष काढला आहे की जे त्या कुलाला अनुरूप नसेल ते प्रसिद्ध असले तरी त्याचा नाटकात अन्तर्भाव करू नये. 'स्वप्रभावादि- मुद्रित पाठ “वरप्रभावादि- असा आहे. तो विशेष समर्पक नाही. - 'उपदेश्यायायोग्य- म? म्हणणे त्यात प्रेक्षकांना उपदेश करण्यास उपयोगी असे काही नसते; मानवी जीवनापासून ते सर्वथा मित्न असते. - 'उपमितसमास? पाणिनीच्या २.१.५६ 'उपमितं व्याप्राटिमिः सामान्याप्रयोगे' ह्या ३) | नाट्यशास्त्र सूत्तानुसार, - कछोकातील 'दिव्याश्रयोपेतम्‌ या रब्दांची फोड जरा निराळ्या प्रकाराने केली आहे. उपेत हे उपगम अथवा स्वीकार ह्या अर्थी भाववाचक नाम मानले असून 'दिब्यानां आश्रयत्वेन उपेतं अड्भीकार: यस्मिन्‌ तत्‌ ( नाटकम्‌ )? असा बहुत्रीहि समासाचा विग्रह केला आहे. दिव्य पुरुषांचा उपयोग नाटकात आश्रयरूपाने म्हणजे कथानकाच्या प्रासद्विक अंदातच करावा, मुख्य भागात करू नये असा एकूण अर्थ. - 'प्रकरीपताका- ह्यांचे वर्णन पुढील एकोगविसाव्या अच्यायात केळे आहे. - 'व्युत्पत्तिः* म्हणजे काव्यापासून होणारा बोधे अथवा मिळणारी दिकवण, - 'देवानामधियाधानम? याचा अश स्पष्ट नाही, कारण, पाठ थुद्ध आहे असे निश्चित म्हणता येत नाही. “अधिया? हे “अधी? शाद्वाचे तृतीयेचे रूप मानता येईल ब अ-धी म्हणजे बुद्धीचा अमाब असा अर्थ करता येईल, पण तो तवथा असमाधानकारक आहे. बिप्रलम्मादीचा आवेश हे काही बुद्धीच्या अभावाचे लक्षण नाही. कदाचित्‌ अधीरताधानम? असा मूळ पाठ असावा, - 'उक्तो दोषः' म्हणजे प्रतीतीत बिध्न उत्पन्न होऊन रसचच- वेणा शक्‍य होणार नाही. -- “एतत्पाणत्वात्‌ः ही मुळातील 'एतत्प्रमाणत्वातर ची केलेली दुरुस्ती आहे. 'प्रमाण' ला प्रस्तुत संदर्भात काही अर्थ नाही. - 'व्युत्पादनम? म्हणजेही प्रेक्षकांना बोध. प्रसिद्धित्रययुक्तमापे वस्तु न सफलं व्युत्पत्तये भवतीत्यत आह नानाविभूति- भियुतं धमाथकाममोक्षविभवेः फलभूते्विचित्ररूपेर्युक्तम्‌ । तत्राप्यर्थकामी सर्व- जनामिलषणीयाविति तद्ठाइल्यं दर्शनीयमिति कथयति क्राद्धिविळासादिभिरिति । क्राद्वेरर्थस्य राज्यादिसम्राद्वेः । विळासेन कासो लक्ष्यते । आदिराब्दः प्रधानवाची, तत्मरधानाभिः फलसंपत्तिभि्युक्तमित्यर्थः । तेन राज्ञा सर्व राज्यं त्राह्मणेभ्यो दत्त्वा वानप्रस्थ ग्रृहीतन्यमित्येवंप्रायं फळं नोपनिबन्धनीयम्‌ । फलमपि हि दृष्टसुखाथे बाहल्येनेति तत्रास्य प्रतीतिर्विरसीभवेत्‌ । गुणैरित्यप्रधानभूतानि चेष्टिताने हेयानि प्रतिनायकगतानि अपायप्रधानानि तैर्युक्तम , तेषां पूवपक्षस्थानीयानां प्रतिक्षेपेण सिद्धान्तकल्पस्य नायकचरितस्य निर्वाहात्‌ । जनपदकोशादिसंपात्तेः समाद्वेः, कोमुदीमहोत्सवादयो विठासाः, संधिविग्रहादयो गुणा इति व्याख्यानं चाणक्य- परिचयवेदनमात्रफलं, वस्तुशब्देन राजर्षिवंश्यचारतशब्देन च सर्वस्यार्थराशेः सेग्रहात्‌ । अवान्तरवस्तुसमाझो विश्रान्तये ये विच्छेदा अड्डाः, ये च निमित्तबला- दभ्त्यक्षष्टानां चेष्टितानामांवेदकाः प्रवेशकाः, तैराढ्यं नाटकं नाम रूपकम्‌ । तीन प्रकारच्या प्रसिद्धींनी युक्‍त असलेले सुद्धा कथानक बोध देण्यात सफळ होणार नाही म्हणून म्हणतात 'नानाविभूतिमिर्युतम? म्हणजे फलस्वरूप असणाऱ्या धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या विविध रूपाच्या विभवांनी युक्त असलेले (नाटक). त्यातही अर्थ व काम यांची सर्वे लोकांना अभिलाषा असते म्हणून ते प्राधान्येकरून दाखवावेत असे 'क्रद्विविळासादिमिः' याने सांगतात. क्रद्धी अर्थाची म्हणजे राज्य आदीची समृद्धी. विलास शब्दाने कामाचा निर्देश होतो. आदि शब्दाचा प्रधान असा अर्थ आहे. (क्रि व विलास) हे दोन ज्यांत प्रधान आहेत अशा फलसंपत्तींनी युक्‍त असा एकूण अर्थ. म्हणून राजाने सर्वे राज्य ब्राह्मणांना १८.१२ २५५ अपेण करून वानप्रस्थ स्वीकारावा अशा आडायाचे फल ग्रथित करू नये. कारण, फल सुद्धा मुख्यत्वेकरून दुष्ट सुखासाठी (अपेक्षित) असते म्हणून तसल्या कथानकाने प्रेक्षकाला विरसता उसन्न होईल, 'गुणैः' म्हणजे गौण असलेली, त्याज्य असलेली, प्रतिनायकाच्या ठिकाणी असलेली व मुख्यतः अपायकारक अशी चेष्टिते, त्यांनी युक्त. पूर्वेपक्षसदुशा असलेल्या त्या गुणांच्या उच्छेदामुळे सिद्वान्तस्थानी असलेळे नायकाचे चरित्र संपादित होते म्हणून. समृद्धी म्हणजे जनपद, कोश इत्यादींची संपन्नता, विळास म्हणजे कीमुदीमहोत्सव इत्यादी आणि गुण म्हणजे संधी, विग्रह इत्यादी - ह्या व्याख्येचे फळ एवढेच की न्याख्याकाराचा चाणक्याशी परिचय असल्याचे ती दाखविते. कारण वस्तु ह्या शब्दाने व राजपिंवंश्यचरित ह्या शब्दाने अर्थाच्या सर्वे समूहाचा अन्तर्भाव केलाच आहे. अवान्तर कथानकाची समाप्ती झाल्यावर विश्रांतीसाठी नाटकाचे जे विभाग ते अंक आणि कारणपरत्वे प्रत्यक्ष न दिसणारी चेष्टिते निवेदन करणारे ते प्रवेशक, त्यांनी समृद्ध ते नाटक नावाचे रूपक. 'न सफल? ही मुळातील *न निष्फलंः ची केलेली दुरुस्ती आहे. केवळ प्रसिद्धींनी युक्त असे कथानक असले की त्यापासून बोध प्रातत होतोच असे नाही हा अर्थ अभिप्रेत असल्यामुळे ही दुरुस्ती आवद्यक आहे हे उघड आहे. - “बिथूति? शब्दाचा अर्थ पुरुषार्थरूप विभव असा केला आहे, आणि नाटकाचे तेच फल होय असे मानले आहे. -- "आदिराब्दः प्रथानवाची? आदि शब्दाचा हा निराळाच अर्थ केळा आहे. - 'फल्मापे हि दृष्टसुखार्थ बाहुल्येन? येथेही थोडी दुरुस्ती केली आहे. हस्तलिखितात “फल्मपि दष्टसुखार्थ हीति बाहुल्येन' असा पाठ आहे. मुद्रित पाठ 'तत्फलमापे दुष्टसुखार्थी हि लोको बाहुल्येन* असा आहे. त्यात "फलम्‌? चा अन्वय लागत नाही. 'दष्टसुख' म्हणजे या जगातच प्राप्त होणारे सुख. - 'तत्रः म्हणजे ज्यात राजानें वानप्रस्थ घेतल्याचे दाखविळे आहे त्या नाटकात. - 'गुणै चा 'गोण चेष्टितांनीर असा केलेला अर्थही नेहमीपेक्षा निराळा आहे. तो मूळ 'होकात अभिप्रेत असेल असे म्हणता येण्यासारखे नाहो. - 'निर्वाह्यात्‌? निर्वाह म्हणजे तडीस जाणे, सिद्ध होणे, यदास्वी होणे. -- “इति व्याख्यानम्‌? अशी व्याख्या श्रीशड्कुकाने केली असावी. कारण पुढील कोकावरील व्याख्येत श्रीशाडकुकाचे उध्ट्त केठेले मत अर्थशास्त्राला धरूनच आहे. - 'कौमुदीमहोत्तवादय:! यात मुद्राराक्षसाचे स्मरण असावे. "” चाणक्य? याने कोटिलीय अर्थशास्त्राचा निदेश अमिप्रेत आहे. - 'अवान्तर' म्हणजे मधले, दरम्यानचे. वे. 1: नृपतीनां यचरित नानारसभावचेष्टिते बहुधा । सुखदुःखोत्पात्तिकृतं भवति हि तत्नाटकं नाम ॥ १२॥ नाना प्रकारचे रस, भाव व चेष्टित असलेले, पुष्कळ प्रकारे सुख व दुःख यांच्या उलत्तींनी घडळेळे असे जे राजांचे चरित तेच नाटक होय. १ का -चेष्टितेर्‌, नि -संभूतं. न २८ नाट्यशास्त्र तस्मादस्य तन्नामेत्याह तृपतीनां यः्चरितामेति । यदू यस्मान्नुपतीनां संबन्धि व्युत्पाद्यानां सामर्थ्यानूपतीनामेव नाटकं नाम तच्ेष्ितं प्रहीभावदायकं भवति, तथा हृद्यानुभवेशरअनोछासनया हृद्यं शरीरं चोपायव्युत्पत्तिपरिघट्रितया चेष्ट्या नर्तयति । नट नतौ नृतौं इत्युभयथा हि स्मरन्ति । तदिति तस्माद्वेतोः नामास्य नाटकार्मोते । | म्हणून ह्यांचे ते (नाटक असे) नाव आहे हे 'नुपतीनां यः्चरितम? इत्यादी *होकात सांगतात. 'यत्‌' म्हणजे ज्याअर्थी राजांच्या संबंधी असळेळे नाटक नावाचे त्यांचे चेष्टित ज्यांना बोध द्यावयाचा अशांमध्ये - औचित्यामुळे राजांच्याच मध्ये - नम्रता उप्न करते, तसेच हृदयात प्रवेश करून रंजकतेचा विकास साधून तदद्वारा हृदयाळा व शरीराला उपायांच्या बोधाशी निगडित अशा चेष्टेने नाचायळा लावते. नटू धातू नति म्हणजे नम्र होणे व नृति म्हणजे नाचणे ह्या दोन्ही अर्थात दिळा आहे. तत्‌ म्हणजे त्याकारणाने ह्याचे नाव नाटक होय. 'व्युत्पाद्य* म्हणजे ज्यांना बोध करावयाचा असे प्रक्षक. - 'सामर्थ्यान्नुपंतीनामेव? प्रस्तुत ठिकाणी व्युत्पाद्य प्रेक्षक फक्त राजेलोकच असे मानले आहे. याचे कारण असे की 'नट्यति इति नाटकम्‌? या व्युत्पत्तीतील नटयति शब्दाचा एक अर्थ 'नम्न करते? असा केला आहे. नाटकात राजाचे चरित पाहून फलस्वरूप नम्रतेचा बोध होणे राजांच्याच बाबतीत संगाव्य आहे अश्शी ही कत्पना आहे. राजांच्या चरितापासून साक्षात्‌ बोध राजांनाच होऊ दाकतो हे सामान्यपणे मान्य होण्यासारखे आहे, 'सामर्थ्यात्‌' म्हणजे योग्यतेसुळे, उच्तितेसुळे. - 'उपायव्युत्पत्तिपरिघड्टितया' अमुक प्रकारच्या दुःख आदीवर असुक प्रकारचा उपाय अशा तऱ्हेचा होणारा बोध म्हणजे 'उपायव्युत्पात्ति, त्याच्याशी टुढपणे निगडित झालेली अशी चेष्टा. - 'नर्तयति? ही दुसरी प्रक्रिया सर्व प्रेक्षकांच्या बाबतीत घडून येते असे समजण्यास हरकत नाही, - 'नट नतो नृतौ? हा हस्तलिखितातील पाठच बरोबर आहे. मुद्रित पाठ 'नट नृती न॒त्ते? चुकीचा आहे; त्यात 'प्रहीभावदायकं भवति? या अगोदर निर्देशिलेल्या अर्थाचा समावेश नाही आणि नृति व उत्त ह्यांच्या अर्थात काही फरक नाही, - 'ततू? म्हणजे “नट्यति? म्हणून या प्रकाराला नाटक असे नाव आहे. "नम्र करते? व *नाचायला लावते? असे नट्यति शब्दाचे दोन अर्थ केले आहेत. ननु पुराणाझुपनिबद्धो5 पि तदर्थः कस्मान्नटनेनेदं भावयतीति आह नानेति । बहुप्रकारान्‌ रसान्‌ भावर्यान्त संपादयास्ते यानि चेप्टितानि नटव्यापारात्मानो5- भिनयाः, तैरेतत्महीभावदायकं हृद्यतमरसास्वादसूचीद्वारप्रवेशितं तत्कतंव्यसूत्रं हृदयरोाहणरूढशीर्यादिधमंरत्नग्रथनकारि भवतीति हुक्तमसकृत्‌ । पुराणादी ग्रंथांत ती गोष्ट मांडलेली असताही नटनाने हे भावित का करतात या आक्षेपाळा उत्तर म्हणून 'नाना-' इत्यादी म्हटले आहे. पुष्कळ प्रकारचे रस॒भावित करतात म्हणजे संपादित करतात ती चेष्टिते म्हणजे नटांच्या व्यापाराच्या स्वरूपाचे अभिनय, ९८२२ ी २७ त्यांच्यासुळे हे ( नाटक ) नम्रतादायक होते व अत्यंत हृदयंगम अशा रसास्वादख्यी सुईच्या दाराने आत ओवलेले प्रेक्षकाचे कर्तब्यरूपी सूत हृदयांत वाढलेल्या शोर्यादिधमेरूपी रत्नांचे ग्रथन करण्यास समर्थ होते असे आम्ही अनेक वेळा सांगितले. आहे. 'तदर्थः” म्हणजे राजाने नम्न असावे. इत्यादी उपदेश. -- 'कस्मान्नटनेनेंद' हस्तलिखितातील 'तस्मान्नतानेनेदंट या पाठावरून ही दुरुस्ती केली आहे. मुद्रित पाठ 'कस्माननटानेवेदंर असा आहे. यातील 'कस्मातः आवश्यक आहे; कारण “ननु? ने निदर्शित होणारा आक्षेप त्याशिवाय मांडला जात नाही. पण “नटान्‌? हे भावयति चे कर्म असमाव्य आहे. “नटन? ही नाळ शब्दाच्या वरील व्युत्पत्तीत अभिप्रेत असलेली क्रिया. मूळ “नटनेन* चा “नतानेन* असा भ्रष्ट पाठ झाला हे उघड आहे. आक्षेप घेतला आहे तो असा की पुराणांत वौरे अश्या तऱ्हेचा उप- देश असताना नाटकाच्या द्वारे तो देण्याची आव्यकता काय १ -- “बहुप्रकारान्‌ रसान्‌ भावयन्तिर मुद्रित पाठ “बहुप्रकारा अन्न संभावयन्तिः असा आहे, तो बरोबर नाही. प्रस्तुत ठिकाणी 'नानारसभावचेष्टितम? या वचनाची व्याख्या केली आहे ती अशी - 'नाना? म्हणजे पुष्कळ प्रकारच्या “सान? म्हणजे रसांना “मावयन्तीति भावानि' म्हणजे भावित करणारी 'चेष्टितानिः म्हणजे नटांचा अभिनय “यस्मिन्‌ तत्‌? म्हणजे ज्यात आहे अश्या प्रकारचे नाटक. येथे भाव शद्धाचा नेहमीचा अर्थ घेतला नसून त्याला “भावित करणारे” या अर्थी चेष्टितचे बिशेषण मानठे आहे. - 'हृद्वतम- इ०' रसास्वादाला सुईने केलेल्या प्रवेशद्वाराची उपमा दिली आहे, उपदेशद्वारा होणाऱ्या कर्तव्याच्या जाणिवेला सुईच्या द्वारा आत. प्रवेशा करणाऱ्या दोऱ्याची आणि बोध झालेल्या शोौर्यादी धर्मोना त्या दोज्यात ओवलेल्या रत्नांची. हे ग्रथनाचे कार्य प्रेक्षकाच्या हृदयात घडते. या सर्वाचा आशय असा की रसास्वाद घेत असता प्रेक्षकाला आपल्या कतेव्याचा बोध होऊन त्याच्या अंगी शौर्यादी आवश्यक गुण बाणतात. -- “असकुत्‌' मुख्यतः पहिल्या व सहाव्या अध्यायांबरील टीकेत. ननु नृपातेचरित एव किमित्ययमास्वादो न देवचरित इत्याह बहुघेति । बहुप्रकाराः उपायवैचित्र्याद्याः खुखदुःखोत्पत्तयस्तासां कृतं संपादनं यत्न । देवचरिते तु तन्नास्तीत्युक्तम अत एव प्रतीतिविघातस्य वैरस्यदायिनः संभवो यत्र तन्नाटके नोपनिबद्धव्यम्‌ । तेन वंतमानराजचारितं चावणंनीयमेव, तत्र विपरीतप्रसि्धि- बाधया अध्यारोपस्याकिंचित्करत्वात्‌ योगनन्दरावणादिविषयसच्वरिताध्यारोपवत्‌.। एतदर्थमेव प्रख्यातग्रहणं प्रकर्षथोतकं पुनः पुनरुपात्तम्‌ । अत एव वेदशास्त्रे न नाटकं, नियोगेन हि तत्र पुमान्प्रवर्त्यते, न फलोत्पत्त्या । फलप्राधान्यपक्षे$पि तत्र संदेहः । एवं पुराणादार्वापे । इह तु बाधोदयासरदिष्णुप्रत्यक्षायमाणाचिर- विलस्बितप्रतीतिसिद्धा सुखदुःखोत्पात्तिरिति । | __ राजांच्या चरितातच हा आस्वाद घेता येतो, देवांच्या चरितात नाही असेका ते 'बहुघा' इत्यादी शब्दांत सांगतात. पुष्कळ प्रकारच्या म्हणजे उपायांच्या घेचित्र्य आदींनी > नाट्यशास्त्र उक्त अशा सुख व दु:ख यांच्या उतत्ती, त्यांचे कृत म्हणजे संपादन ज्यात आहे ते नाटक. देवांच्या चरितात ते नसते हे सांगितलेच आहे. म्हणूनच ज्यामुळे प्रतीतीत विध्न उत्पन्न होऊन विरसता उत्पन्न होण्याचा संभव असेळ असे काही नाटकात योजू नये. आणि यास्तव वर्तमानकाळीन राजाचे चरित सुद्धा वर्णन करू नये, कारण त्यात विपरीत प्रसिद्धीचा बाध करून (सल्व्वत्तीचा) केलेळा अध्यारोप निरुपयोगी ठरतो, योगनन्द, रावण इत्यादींच्या भाबतीत केलेल्या स्चरिताच्या अव्यारोपाप्रमाणे. ह्याचसाठी प्रकर्ष दाखविणाऱ्या प्रख्यात शब्दाचा पुन्हा पुन्हा उपयोग केळा आहे. म्हणून वेदशाक्र काही नाटक नाही, कारण त्यात आज्ञा म्हणून मनुष्य प्रवृत्त केळा जातो, फळाच्या उतत्तीसाठी नाही. फळाला प्राधान्य तेथेही असते हा पक्ष मान्य केळा तरी त्याविषयी संदेह उत्पन्न होतोच. हीच गोष्ट पुराण आदोंची. परंतु येथे (ह्या नाटकाच्या संबंधात) बाधक गोष्टीचा प्रादुर्भाव सहन न करणाऱ्या, प्रत्यक्षवत्‌ होणाऱ्या व तात्काळ्कि अश्या प्रतीतीने सिद्ध होणारी अक्षी सुखदुःखांची उत्पत्ती असते. 'बहुधा? चा. संबंध उत्तरार्धातील 'सुखदुःखोत्पत्तिकतम? श्री जोडला आहे. -- 'उपाय- वैचित्र्याद्या हे 'वहुप्रकारा:? चे स्पष्टीकरण आहे, आणि ते 'सुखडुःखोत्पत्तयः? चे विशेषण मानले आहे. उपाय म्हणजे सुखदुःखादी उत्पन्न होण्याची कारणे. -- कृतं? चा अर्थ संपादन, सिद्ध करणे अस! केला असून 'सुखदु:खोतपत्तीनां कृतं यत्र तन्नारकम? असा बिग्रह केला आहे. - 'तन्नास्ति तत्‌ म्हणजे सुखटुःखोतत्तीचे संपाटन, -- 'बिपरीतप्रसिद्धि- इ० याचा अर्थ असा दिसतो की नाटकात राजाचे चरित चांगल्या स्वरूपात दाखविले जाईल ब प्रत्यक्षात ते तसे नसल्याचे माहीत असणार. तेव्हा त्या नाटकाचा बोधाच्या दृष्टीने काही उपयोग होण्यासारखा नाही. 'विपरीत' म्हणजे बिरुद्ध असलेली, बाईट. 'अध्यारोप? म्हणजे त्या राजावर नाटकात केला जाणारा चांगल्या वर्तणुकीचा आरोप. 'योगनन्द्रावण[दि- इ०' उदाहरणादाखल असे म्हटले आहे की योगनन्द, रावण वगैरे दुष्ट माणसांवर सच्वरिताचा आरोप केला तर त्याचा जसा काही उपयोग होणार नाही त्याप्रमाणे, योगनन्द म्हणजे मायावी, खोटा नन्द. कथासरित्सागरातील कथेत त्याचा निदेंश आहे. हस्तळिखितातील 'सच्चरित? च्या ऐवजी सुद्रितात “चरितः एवढेच आहे. पण अर्थ सुसंगत होण्यासाठी “सच्चरित? आवश्यक आहे. - '"नियोगेन? वेदांत 'यजेतः इत्यादी विधीच्या स्वरूपात आज्ञा असतात. - 'फल्प्राप्तिपक्षेडपि? म्हणजे वेदातील 'स्वर्गकामः यजेत? इत्यादी बिधिवाक्यात फल्प्राप्तीचा सुद्धा निर्देश असतो, तेव्हा त्यासाठी मनुष्य प्रवृत्त होतो असे म्हणता येईल. - “तत्र संदेहः? म्हणजे स्वर्गरूपी फलप्राप्ती होते की नाही हे संदिग्ध असते. ते फळ तात्काल (व या जन्मी ) मिळणारे नसते. याउलट नाटकाचे फल तात्काल प्रापत होते. - 'बाधोदया- इ०' यात 'प्रतीति? ची तीन बिशेषणे योजिली आहेत. अनेन वाक्‍येनेतदुक्त॑ भवति । यद्यपि सर्वरूपकाणामर्था हृदये प्रविष्ट विनेयांश्वावनतान्‌ करोति - तत एव नाटकदाब्द: सामान्यवचनो5पि 'कार्योत्पन्नानि नाटके' इत्यादिपु स्थानेषु दर्शितः - तथापि ये5वश्यव्युत्पाद्या राजानो - यदृव्युत्पात्ति- १८.१२ | २९ द्वारेण विश्वं व्युत्पन्नम्‌ - ते तदीयहृदयसंवादयोग्यनपतिचरितप्रदर्हनेन प्रधानतया प्रधानेः थे व्युत्पाद्यन्ते, अमात्यादयस्तदडत्वेनेव, प्रयोगस्य च यथोचितं समुद्रकस्थ- रागनवद्व्युपादकव्युत्पाद्यभावात्‌ । तेन प्रधानपुरुषार्थे प्रधानविनेयानामन्यत्रान्येषां वेदयतो5वनतिं व्युत्पत्ति ददाति, तत एव नाटकमुच्यते । ह्या वाक्याचा पुढीलप्रमाणे अर्थ अभिप्रेत आहे. जरी सर्व प्रकारच्या र्पकांचा अर्थ हृदयात प्रविष्ट होऊन बोध होण्यास योग्य मनुष्यांना नम्न करतो आणि म्हणूनच 'कार्यो- तपत्भानि नाटके? इत्यादी ठिकाणीं नाटक शाब्द सामान्यवाचक असल्याचेही दाखविळे आहे- तथापी ज्या राजेळोकांना प्रथम बोध करणे आवश्यक आहे - कारण त्यांच्या हारा अखिल विश्वाळा बोध होऊ शकतो - त्यांना हृदयसंबादास योग्य अद्य राजांचे चरित दाखवून मुख्यत्वेकरून त्यांना मुख्य गोष्टीविषयी बोध दिला जातो, अमात्य आदोाना केवळ त्याचे अंग म्हणून, व प्रयोगात उचिततेप्रमाणे पेटाऱ्यातीळ आकाशासारखे व्युप्तादकत्व व व्युप्ताद्यत्व असतात याकारणाने. तंव्हा मुख्य विनेयांना प्रधान पुरुषार्थाच्या संबंधात व इतरांना अन्य संबंधात संवेदन असणाऱ्याळा नम्रता व बोध देते म्हणूनच त्याला नाटक म्हणतात. 'बिनेयांश्चावनतान? यातील “च? चे प्रयोजन स्पष्ट नाही. “अवनतान? च्या जागी मुद्रित पाठ “विनीतान्‌! आहे. पण अवनतानू्‌ हाच पाठ ह्या संदर्भात योग्य आहे. - 'सामान्य- वचनः” म्हणजे सर्व रूपकप्रकारांचा वाचक, केवळ नाळ ह्या विशिष्ट प्रकाराचा नाही. - 'क[्योत्पन्नानि नाटके' असे वचन कोठे आढळत नाही, पण १७.४८ ह्या 'छोकात 'काव्यं भवति नाटके' असे आहे. - 'येषवश्य- मुद्रितात 'ह्यवश्‍्य असे आहे. - ते' ही मुळातील 'तेन' ची दुरुस्ती आहे. - 'प्रधानेषर्थे' म्हणजे राजाने कसे बागावे यासंबंधी. - “तदड्भत्वेन' यातील 'तत्‌? म्हणजे प्रधान अर्थ. - 'समुद्वकस्थगगनवत्‌ व्युत्पादकव्युत्पाद्यमावात्‌? प्रयोगच व्युत्पादक ब व्युत्पाद्य असतो असे येथे म्हटले आहे. म्हणजे प्रयोग बोध देणारा असतो व प्रयोगालाही बोध होण्यातारखा असतो. हे दुसरे कसे शक्य आहे ते स्पष्ट नाही. तसेच “"पेटाऱ्यात असलेल्या गगना- सारखा? ह्या तुलनेचे स्वरूपही स्पष्ट नाही. पेटीतील गगनाशी नाटबग्रहातीळ प्रयोगाची तुलना केली आहे. प्रयोगाचा बाह्य जगातील मनुष्यांवर परिणाम होतो ( व्युत्पादक ), त्याचबरोबर तो जगात घडणाऱ्या गोष्टींवर आधारित असतो (व्युत्पाच्य), अश्या प्रकारची कल्पना असावीसे वाटते. गगनाच्या सबधात पेटीतील गगन बाह्य आकाशाचे व्युत्पाद्य व व्युत्पादक आहे, म्हणजे बाहेरच्या आकाश्याने आतील आकाशाचा बोध होऊ शकतो व आतील आकाद्याने बाह्य आकाशाचा बोध होऊ शकतो, कारण दोन्हींचे स्वरूप एकच आहे, अशा प्रकारची कल्पना अमिंग्रत दिसते. - 'वेदयतः? ह्या शब्दाची ह्या स्वरूपात काही आवश्‍यकता दिसत नाही. कारण अगोदरच बहुवचनी षष्ठ्यन्त शब्द वापरलेले आहेत. तेव्हा ह्या एकवचनी षष्ठ्यन्त शब्दाचा उपयोग बरोबर वाटत नाही. कदाचित मूळ पाठ 'विदनतः” किंवा. संवेदनतः' असा असावा. शरशडूकस्तु व्याचष्टे विजिगीषुररिमध्यमोदासीनो मित्र मित्रमित्रामिति, एषां चरितं बहुवचनेन लभ्यते । अन्ये त्वाहः पूर्व राजिवंशप्रभवा नायका उक्ताः, ३० नाट्यशास्त्र अनया त्वायया चन्द्रगुप्तबिन्दुसारादयो5पि संगृह्मन्त इति । व्याख्यातमर्थद्रय- मेतत्पूर्वयाययेव संगृहीतमिति प्रथमव्याख्यात एव युक्तोः्थः । परंतु श्रीराह्ठुकाने अशी व्याख्या केळी आहे की राजे म्हणजे विजिगीधु, अरि, मध्यम, उदासीन, मित्र आणि मित्रमित्र; त्यांचे चरित असा अर्थ (नृपतीनां' यातील) बहुवचनाने प्राप्त होतो, इतर टीकाकार तर म्हणतात की पूर्वी राजरषींच्या वंशात उत्पन्न झालेल्या नायकांचा निदेश केळा आहे, पण प्रस्तुत आर्येने चन्दगुप्त, बिन्दुसार आदी राजांचाही समावेश केळा आहे. हे दोन केळेळे अर्थ पूर्वीच्या आर्येतच अन्तर्भूत आहेत, म्हणून प्रथम केलेला अर्थच योग्य होय. 'विजिगीषु- इ०' अर्थशास्त्रात बारा राजांच्या राजमंडलाचा निटेंगा आहे. त्यांपैकी प्रमुख म्हणून ह्या सहांचा येथे नि्देदा केठेला दिसतो. - 'पूर्वयाययैब संग्रहीतम? अभिनवगुप्ताचे म्हणणे असे दिसते की 'प्रख्यातोदात्तमायकम? मध्ये राळकुकनिर्दिष्ट राजांचा समावेश होतो, तसाच चन्द- गुप्तादींचाही होतो. यत्तु केश्चिदभिधीयते - देवा धीरोद्धता ज्ञेयाः स्युधींरळाठिता नपाः । भ्या € “८ > सेनापतिरमात्यश्व धीरोदात्ती प्रकीर्तितो धीरप्रशान्ता विज्ञेया त्राह्मणा वाणिजस्तथा । इति वचने पर्याळोच्यमाने देवादीनां नाटकनायकत्वानुपपत्तेधीरळलित एक एव नायक इति तदसत्‌ । न हि जनकप्रभृतीनां रामादीनामपि वा धीरलळित्वभ , यदाह 'धीरोदात्त॑ जयति चारितं रामनास्नश्व विष्णोः? इति । यत्तु पठितं तत्र धीरललितत्वं राज्ञ एव वर्णनीयं नान्यस्य, सेनापत्यमात्ययोधीरोदात्तत्वमेव, देवानां धीरोद्धतत्वमेव, द्विजादीनां धीरप्रशान्तत्वमेव, इत्येवंपरं द्रष्टव्यम्‌ । अत एव प्रख्यातोदात्तेत्यत्र चत्वारो5पि नायका: स्वीकृता इति व्याख्येयम्‌ । काही टोकाकार असे जे म्हणतात की 'देव धौरोद्धत होत असे समजावे, नृपती वीरढळित असावेत, सेनापती आणि अमात्य धीरोदात्त होत असे म्हटले आहे आणि ब्राह्मण व वणिक धीरप्रशान्त होत असे जाणावे' ह्या नाट्यशास्रातीळ वचनाचा विचार केल्यास देव आदी नाटकाचे नायक होऊ राकणार नाहीत म्हणून धीरठळित असा एकच नायक होऊ शकतो ते बरोबर नाही. कारण, जनकप्रभृूती किंवा राम आदी सुद्धा धीरळलित होते असे म्हणता येण्यासारखे नाही. 'राम नाव असलेल्या विष्णूचे धीरोदात्त चरित विजयी होते! “> असेच म्हटले आहे. पण नाट्यशास्त्रात जे वचन आहे त्याचा आराय असा समजावा की १८.१२ | २२ धीरळलितत्व हे राजाच्याच ठिकाणी असलेले दाखवावे, इतर कोणाच्या नाही, सेनापती व अमात्य यांच्या ठिकाणी धीरोदात्तत्वच दाखबावे, देवांच्या ठिकाणी धीरोद्धतत्वच दाखवावे आणि ब्राह्मण आदींच्या ठिकाणी धौरप्रशान्तत्वच दाखवावे, म्हणूनच 'प्रर्यातोदात्त' या वचनात चारही प्रकारचे नायक स्वीकृत झाले आहेत अशी व्याख्या केली पाहिजे. "देवा भीरोद्धता? इत्यादी कोक २४-१८- १९ येथे आढळतील. -- 'प्रख्यातोदात्तनायकम? असे बरींल दहाव्या *होकात आहे. | एवं नि्वचनमनयायंया दर्शितस्‌ । याप्रमाणे ह्या आर्येत नाटक शब्दाची व्युत्पत्ती दाखविली आहे. अस्यावस्थोपेत॑ कार्य प्रसमीक्ष्य बिन्दुविस्तारात्‌ । कतंव्योब्डकः सोडपि तु गणान्वितं नाव्यतत््वज्ः ॥ १ ३॥ द्या नाटकाचे अकस्थांनी युक्‍त असलेले कार्य नींट बिचारात घेऊन बिंदूऱच्या विस्ताराच्या अनुरोधाने नाट्याचे तत्व जाणणाऱ्यांनी अंक-- आणि तोही संख्येने युक्‍त असा -- रचावा. प्रख्यातवस्तुप्रभ्षतिरथो5न्यत्र सुप्रसिद्ध, अड्डपवेशको त्वभ्नासेद्धी इत्यडुऱस्व- रूपं तावाद्वितत्य कथयाति अस्यावस्थोपेतामाति । अस्य नाटकस्य यत्काये बिन्दु- कूृतया विस्तारणया विततीकरणरूपया अननुसंधानजननबळादेकावस्थानुरूप- माधिकारिकमितिवृत्त॑ संपाद्यभ्‌, तदवस्थया प्रारस्भादिकयोपेतं परिपूर्ण प्रकर्षेण संबन्यं प्रेक््य अडूः कतंव्यः । एतदुक्तम्‌ - इतिव्रत्तस्य बिन्दुसूत्रस्यूतस्य प्रारम्भा- यवस्थापन््चकचारिणो यदा प्रारम्भावस्था पूर्णत्वमेति तदाडू'च्छेदो बिन्दुद्वारा- सुसंधीयमानद्वितीयाडूनभिघेयरूपो विधेयः । एवं प्रयत्नाद्ववस्थाचतुष्ट्ये$पि वाच्य- मिति पश्च तावदडूग इति मुख्यः कल्पः । प्रख्यातवस्तु वगैरे गोष्टी इतरत्र सुप्रसिद्ध आहेत, पण अंक व प्रवेशक हे प्रसिद्ध ' नाहीत म्हणून प्रथम अंकाचे स्वरूप 'अस्यावस्थोपतम्‌! इत्यादी 'होकात विस्ताराने सांगतात. 'अस्य' म्हणजे ह्या नाटकाचे जे कार्य बिन्दूच्या प्रसारित करण्याच्या क्रियेच्या स्वरूपाच्या १ नि अड्जावस्थोपेतं कार्य प्रसमीक्ष्य बिन्दुविस्तारात्‌ । कतंव्यो5ड़स्तज्ज्ञे: स तु सम्यडू नाटके विधिवत्‌ ॥, का घो नानावस्थान्तरितो बिन्दो: संहार(घो संचार) मात्र- मधिकृत्य । कतंव्याड्के5 (घो व्योडओो) प्येवं स तु सम्यडू नाटके तज्ज्ञ: ॥. २र नाट्यशास्त्र विस्तारणाने अनुसंधान उत्पन्न न झाल्याकारणाने एकाच अवस्थेला अनुरूप असे जे साध्य करावयाचे असलेले प्रधान कथानक त्याच्या प्रारंभ आदी अवस्थेने उपेत म्हणजे परिपूर्ण असा प्रश्ृष्ट संबंध लक्षात घेऊन अंक रचावा. याचा अर्थ असा. बिन्दुरूप सूत्रात ओवलेल्या, प्रारंभप्रथती पाच अवस्थांतून जाणाऱ्या कथानकाची प्रारंभावस्था जेव्हा पूर्ण होते तेव्हा अंकाची विभागणी विन्दूच्या द्वारा अनुसंधानाने युक्‍त दुसरा अंक असे नाव असलेल्या स्वरूपाची करावी. असेच प्रयत्न आदी इतर चार अवस्थांच्या बाबतीत सुद्धा समजावे. याप्रमाणे नाटकात पाच अंक असावेत ही मुख्य व्यवस्था. 'अननुसंघान- इ०' बिन्द्चे नेहमीचे कार्य कथानकातील अनुसंधानाचे म्हणजे कथामक विकसित होत असता त्यात एकसूत्रता राखण्याचे. प्रस्तुत ठिकाणी असे म्हटले आहे की कथानकाची एक अवस्था संपली की अनुसंधानाचे सातत्य नाहीसे होते. म्हणून कछोकातील 'कार्य' राब्दाचा एका अवस्थेतच संपादित करावयाचे कार्य असा मर्यादित अर्थ केला आहे. - 'प्रकगरेण संबन्धे ग्रेक्ष्' ही छोकातील 'प्रसमीक्ष्य शब्दाची व्याख्या आहे. - 'पन्च ताबदझ्ञाः' प्रत्येक अव- स्थसाठी एक अंक ह्या हिशोबाने. व नन्वेवं न्यूनत्वे आधिक्ये वाडठानां कथं निर्बन्थ इत्याह नाट्यतत्वतेरन. येव दिशा सो5डूने5पिशब्दादन्यथापि कर्तव्य: । तुरविशेषं थातयति । यदा प्रारस्भा- वस्थाप्रधानं भवतीति तदा तस्या एवोपक्रमोपसंहारावस्थाद्दयापेक्षया द्वावड्ञी, अन्यासामेकेकाडुतेति यावत्‌ । सर्वासामवस्थाइययोगेन संपाटनसिति षडडुत्वात्‌ प्रभृति सत्तजातप्राधी दशाडुत्वम्‌, कांचिदवस्थां प्रधा्नाकृत्य यदावस्थान्तरेण मिश्रीकृत्य वध्नाति तदा. नाटिकाया न्यूनाडुत्वस इत्येतत्तुराद्वेन तत्त्वज्ञराब्देन च दुर्शितस । तत्रावस्थाः 'प्रारम्भश्चव प्रयत्नश्वः इत्यादिना वक्ष्यन्ते, 'प्रयोजनानां की यदविच्छेदकारणम्‌? इति बिन्दुर्वक्ष्यते, ' यदाधिकारिकं वस्तु सम्यग्‌ इति कायम । असे असेळ तर अंकांच्या कमी किंवा अधिक संख्येबद्दद आग्रह कशासाठी ह्याचे उत्तर म्हणून सांगतात की नाटयाचे तत्व जाणणाऱ्यांनी याच प्रकारे तो अंक - 'अपि' राब्दाच्या उपयोगामुळे दुसर्‍या प्रकारे सुद्धा - करावा. “तु? शब्दाने विशेष दाखविला जातो. ज्यावेळेस कथानकात प्रारंभावस्थेठा प्राधान्य असते तेव्हा त्या अवस्थेच्याच प्रारंभीची आणि अखेरची अशा दोन अवस्थांच्या अनुरोधाने दोन अंक व इतर अवस्थांचे प्रत्येकी एकेक अंक असे करावे. सर्वच अवस्थांची कार्ये दोन दोन अवस्थांत संपादित होणे शक्‍य असल्यामुळे तहा अंकांपासून सात, आठ, नऊ व दहा अंक, तसेच एखाद्या अवस्थेला प्राधान्य देऊन तिच्यात दुसऱ्या एखाद्या अवस्थेचा समावेश करून रचना करतात तेव्हा नाटिकेत संख्येने कमी अंक - हे तु' शब्दाने व 'तत्त्वजञ' शब्दाने दाखविले आहे. त्यांपैकी १८.१४ ३२३ अवस्थांचे वर्णन 'प्रारम्मश्चव प्रयत्नश्व' इत्यादी लोकात केळे जाईल, बिन्दूचे वर्णन 'प्रयोजनानां विच्छेदे यदविच्छेदकारणम? यात करण्यात येईल व 'यदावधिकारिकं वस्तु सम्यग्‌' यात कार्याचे वणन. नाटकात अंक किती असावेत यासंबंधी हे विवेचन मुळातील 'गणान्वित' या शब्दाच्या अनुरो- धाने उत्पन्न झाळे आहे असे दितते. त्यातील 'गण? शब्दाचा (अंकांची) “संख्या? असा अश केला असावा. (अंकांचा) समूह? हा अर्थही संभाव्य आहे. गणान्वितम्‌ हा अव्ययीभाव समास पसजावा. सूळचा पाठ “गणान्वितो' असा पुिंगी असण्याचा संभव आहे. - 'निरवन्ध' म्हणजे आग्रह. "7 प्रारम्भावस्थाप्रधानं? हस्तलिखितात 'प्रारम्मावस्थावरिशवप्रधाने? असा भ्रष्ट पाठ आहे. मुद्रितपाठ प्रारम्मावधिप्रधानंः ही त्याची केलेली दुरुस्ती असावी, पण मुळात “अवधि? पेक्षा "अवस्था? शब्द असण्याचाच अधिक संभव आहे हे प्रस्तुत संदर्भात स्पष्ट आहे. -“सप्तजातप्राप्तौ! ह्या वचना'चा काहीच अर्थ लागत नाही. अश्यी शक्‍यता आहे की 'सप्ताषटनवदशाहूत्वम? असा सूळ पाठ असावा, घडडूत्वात्मभृतिः ला अनुरूप . देशाहनत्वपर्यन्तम? असे वचन नसून केवळ 'दश्ाळूत्वम? एवढेच आहे, यावरून बरील सूचनेला पुष्टी मिळण्यासारखी आहे. ह्या सूचनेला अनुसरून भाषांतर केले आहे, 7 प्रारम्मश्च' इत्यादी शोक पुढे १९,७ येथे आहे. 'प्रयोजनानां' इत्यादी कोक १९ .२२ येथे आणि 'यदाधिकारिकं? इत्यादी १९.२५ येये. त्या ठिकाणी त्यांची व्याख्या पहावी. भडक इति रूढिशब्दो भावेश्र रसैश्व रोहयत्यर्थान्‌ । नानाविधानयुक्तो यस्मात्तस्मावेदडकः ॥ १४॥ अंक हा रूढी (बाढ) ह्या अर्थाचा राब्द आहे. ज्याअर्थी विविध घडामोडींनी युक्त होऊन रस आणि भाव ह्यांच्या साहाय्याने कार्याची वाढ करतो त्याअर्थी त्याळा अंक असे म्हणतात. | | | | अथ कस्मादडू इत्याह अडू: इति रूढिशन्द इति । भावे रसेश्च गूढ्छन्नो व्याप्तो$रथो5डूशाब्देन यादृच्छिकेनोच्यत इति. सटटळोछटाद्या गूढ इति पाठं व्याचक्षिरे । अन्ये रोहयत्यर्थानिति पठन्ति न्याचक्षते च रूढी रोहणं तेनोत्स- ड्रो5डूः उच्यते । यो नाटकांशः शूज्ञारादिरसोवेभावानुभावन्यभिचारिणो्थान तथा भावेविंभावाद्येयंथास्वं भावादीनथांन्‌ हृदयमारोपर्याते अर्थान्वहाते, नाना- प्रकारेश् वक्ष्यमाणेः “ये नायका निगदिता? इत्यादिभिविधानैरुपेतः » तस्मादुत्सडुव- दारोहणसंबन्धादडूः इत्युच्यते । एतत्पुष्कलमिव, . अंजांविना रुढेरचा्थ वृत्त्यदशंनात्‌ । ह. ' आता अंक असे का म्हणतात ते “अडू इति रूढिशब्द:/ यात सांगतात. भड्टलोछट प्रशरती टीकाकार यांनी 'गूढ? असा पाठ . घेऊन भाव व रस यांनी गूढ म्हणजे झाकलेला, -8-4 नाट्यशास्त्र व्यापलेला असा जो पदार्थ त्याला यदुच्छेने अंक म्हणतात अशी व्याख्या केली आहे. दुसरे टीकाकार 'रोहयत्यर्थान' असा पाठ घेऊन त्याचा पुढीलप्रमाणे अर्थ करतात. रूढि म्हणजे वर चढणे, त्यावरून मांडीला अंक म्हणतात. नाटकातीळ जो अंद शुंगारादी रसांच्या योगे विभाव, अनुभाव व व्यमिचारिभाव ह्या गोष्टी तसेच विभाव आदी भावांच्या योगे ज्याचे त्याचे योग्य असे भाव वरे गोष्टी हृदयात आरोपित करतो, ह्या गोष्टींचा भार वाहतो, आणि पुढे सांगितलेल्या 'ये नायका: निगदिता:' इत्यादी विविध प्रकारच्या विधानांनी युक्त असा असतो, म्हणून उत्सज्माप्रमाणे आरोहणाशी संबंध असल्यामुळे (तो अंश) अंक द्या नावाने ओळखला जातो. हे पुष्कळच झाले. कारण '----रिवाय रूढि शब्दाचे (उत्सड) ह्या अथी निर्वचन दिलेले नाही. 'याहृच्छिकेन' म्हणजे व्युत्पत्ती बगैरेनी सिद्ध न झालेला असा, योगायोगाने रूढ झालेला. - “गूढ इति पाठम्‌र वस्तुतः 'गूढशब्द इति पाठम्‌? असे पाहिजे. कारण, *गूढ:? असे स्वतंत्र पद मान: ल्यास आयेच्या पहिल्या चरणात तेरा मात्रा होतील, तसा पाठ कोणी स्वीकारला असल्याची शक्‍यता नाही. - रूढी रोहणं इ०' या टीकाकारांनी रूढि शब्दाच्या द्वारा अंक म्हणजे उत्संग किंवा मांडी असा अर्थ केला आहे. कारण त्यावर 'रोहृण? म्हणजे वर चढण्याची क्रिया होते. रारीरावयव असलेल्या अंकाच्या बाबतीतील हे व्याख्यान नाटकातील अंकाच्या बाबतीत या आर्येत “अर्थान्‌ रोहयति? ह्या शब्दांत ठायू करून दाखविठे आहे असे ह्या टीकाकारांचे म्हणणे आहे. - मुद्रित पाठात “अडडः' शब्द गाळला आहे. पण तो आवश्यक आहे. - 'रसैः इ०? रसांच्या द्वारा विभाव वगैरे हृदयात प्रवेश करतात हे विधान सहाव्या अध्यायातील रसनि- ष्पत्तीच्या वर्णनाशी विसंगत आहे. - 'यथास्वम्‌? म्हणजे अमुक विभावाचे अमुक व्यभिचारिभा- व इत्यादी, ही कल्पनाही नाट्यशाखानुसारी नाही. - 'अर्थान्‌ बहति? म्हणजे मांडी ह्या अर्थी अंक ज्याप्रमाणे पदार्थ आपल्यावर ठेवून घेतो, त्याप्रमाणे नाटकातील अंकही रसादींच्या द्वारा निरनिराळे अर्थ आपल्यात समाविष्ट करून घेतो. - ये नायका निगदिता;? इत्यादी ही पुढील सोळावी आर्या आहे. - 'एतत्पुष्कलमिव' याचा अर्थ असा दिसतो की ह्या प्रदीधे बिवेचनात काही तथ्य नाही. - 'अजाविना' या शब्दांचा काही अर्थ लागत नाही. शेवटच्या “विना? चा 'शिवाय? असा अर्थ असावा. परंतु, पहिली दोन अक्षरे म्हणजे कोणत्या मूळ शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहेत ते लक्षात येत नाही. - 'र्ढेरत्रार्थे वृत्त्यदशनात्‌? यात थोडी दुरुस्ती आहे. मुद्रित पाठ 'रूढैरतारथेवृतत्यदर्शनात? असा आहे, तर हस्तलिखितात 'स्देरतराथे वृत्तिदर्शनात्‌? असे आहे. अभिनवगुप्ताचे येथे असे म्हणणे दिसते की रूढि ह्या शब्दाचा उत्सद्धु असा जो अर्थ केला त्याला आधार नाही, म्हणून रूढि म्हणजे उत्सड़ः अथवा अड्लः हे मत ग्राह्य मानता येत नाही; आणि नाटकातील अंकाचे कार्य त्या अंकासारखेच आहे हेही खरे नाही. तस्मादयमत्राथः । अडू इत्ययं लक्षणे रूढः शब्दः । अन्यतो व्यवच्छेदकं लक्षणम्‌ । एतदपि च नाट्यरूपकस्य नानात्वमन्यतो भेदं विधत्ते$नभिनेयात्‌ । अभिनेये हि य एकदेशः स रसभावेरुपलक्षितानप्यर्थान्‌ रोहयति हृदयसंवाद. १८.१४ २५९ साधारणताकरणेन प्रत्यक्षभावनया रसाध्यायोक्तया । अभिरोहणं बीजस्येवाडूरा- कारतया रसाकारोदयभररोहो भवति । स चाभिनेयरूपकांशैरेव संपद्यत इत्यनभि- नेयात्‌ भेदमादधानो5भिनेयस्य रूपकस्य लक्षणं भवत्येव । म्हणून या ठिकाणी अथ असा. अडू; हा लक्षण या अर्थी रूढ शब्द आहे. लक्षण म्हणजे दुसऱ्या पदार्थांपासून मिन्भता दाखविते ते. आणि हे (अडूरूप लक्षण) सुद्धा नाट्यातमक रूपकाचा निराळेपणा, इतरापासून म्हणजे ज्याचा अमिनय करता येत नाही अशा काव्यप्रकारापासून मिन्नता प्रस्थापित करते. कारण, अभिनयास योग्य अशा काव्यात जो भाग असतो तो रस आणि भाव यांनी उपलक्षित झालेल्या गोष्टीही रसाध्यायात सांगितलेल्या हृदयसंवादाच्या साधारणीकरणाने प्रत्यक्ष होणाऱ्या भावनेने वाढीस लावतो. वाढीस लावणे म्हणजे ज्याप्रमाणे बीजाची अंकुराच्या स्वरूपात त्याप्रमाणे त्या गोष्टींची रसोदयाच्या स्वरूपात वाढ होणे. आणि हा प्ररोह अमिनयास योग्य अश्या रूपकाच्या भागांमुळेच सिद्ध होतो म्हणून (भागरूप अंक) अमिनयास अयोग्य अशा काव्यापासून मिन्नता दाखवितो तेव्हा तो अभिनेय रूपकाचे लक्षण ठरतोच. “लक्षणे रूढः शब्द: अमिनवगुप्ताने अडू शब्दाचा रूढ अर्थ लक्षण आहे असे जे म्हटले आहे त्याचे मूळ अडू: म्हणजे चिह्ृ, खूण या अर्थात असावेसे वाटते. - 'रसभांविरुप- लक्षितान, म्हणजे रस, भाव ब त्यांनी सूचित झालेल्या इतरही गोष्टी. - “परत्यक्षमावनया' हृदयसंवाद होऊन साधारणीकरण झाले म्हणजे रसोदय होतो व त्याची प्रत्यक्ष अनुभूति होते. ही अनुभूति म्हणजेच अर्थाचे रोहण. मुद्रित पाठ प्रत्यक्षीमावनया? असा आहे. च्वि-रूप अभिप्रेत असेल्से वाटत नाही. -- 'रसाकारोदय-' येथे “रसोदयाकार- हे अधिक सुगम झाले असते. -”- स चामिनेय- मुद्रित पाठ “स चानमिनेय- हा मुद्रणदोष असावा. - 'संपद्यते? मुद्रित पाठ “संपाद्यते' यातील प्रयोजका'चे रूप अनावश्यक आहे. प्रस्तुत आर्येनंतर बडोदे प्रतीत पुढील आर्या अधिक आढळते - अडूसमात्तिः कार्या काव्यच्छेदेन बीजसंहारः । वस्तुव्यापी बिन्दुः काव्यसमुत्थो5त्र नित्यं स्यात्‌ ॥ ही आर्या नाट्यशास्त्राच्या काही हस्तलिखितांत आढळत नाही, म्हणून श्री कबींनी ती कंसात दिली आहे. डॉ. घोष यांनी 'काव्यच्छेदे न' या पाठात ती स्वीकारली आहे. पण ती मूळ असेल्से वाटत नाही. अज्लांचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या पुढील आयचा ह्या आर्वेत केवळ अनुवाद आहे. ३६ | नाट्यशास्त्र यत्रार्थस्य समाप्िरयत्र चै बीजस्य भवति संहार! | किंचिदवलय़बिन्दुः सो5्ह्क इति सदावगन्तव्यः ॥ १५॥ ज्यामध्ये (एखाद्या) कार्याची समाप्ती होते आणि ज्यामध्ये बीजाचा (अंशतः) समारोप होतो व. ज्यात बिंदू थोडासा संबद्ध असतो तो अंक होय असे सदा जाणावे. _ _्केराष्दस्यान्वर्थो व्याख्यातः, स्वरूपं तु वक्तव्यम्‌ ; तद्दर्दयाति य॒त्रार्थस्य समापिरिति । मारस्माद्यवस्थालक्षणो5 थो यत्र समाप्यते सोडु: । असमाप्ताया- मापे वा अवस्थायां यदा बीजस्य संहरणं यथास्वं संधिभेदेनोचितं भवति तदाप्यडूच्छेदः । तत्रोत्पत्तिरुद्धाटनमुद्धेदो गर्भनिर्भेदः फळसमानयनामिति मुखा- दिषु यथाक्रमं बीजस्य दशाविशेषाः संहारशब्दवाच्या: । अडूविच्छेदे चार्थविच्छेदो मा. भूदित्यवलम़ः संबद्धा बिन्दुर्यच ताहशो5डूः कतंव्यः । यथा तापसवत्सराजे तृतीयाडू-समाप्ती - | कि । आदो मानपारिग्रहेण गुरुणा दूर समारोपितां पश्चात्तापभरेण तानवकूता नीतां परं लाघवमू । उत्सझञन्तरवतिनीमनुगमात्संपिण्डिताइपीमिमां | ___ सवाटरप्रणयप्रियामिव तरुःछायां समालम्बते ॥ (२.१७) इति राज्ञ उत्त्या पद्मावत्याः पॉरणयाभ्युपगमनुसंद्धत्या प्रापिसंभवाख्यतूर्तीया- वस्थापदाशाने भाविनि चतुर्थ बिन्दुर्योजितः । एवमडूस्वरूपमनेन निरूपितमिति चिरन्तनाः1 ह ही क क. याप्रमाणे अड्ठू शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगितळा आहे, पण त्याच्या स्वरूपाचे वर्णन केळे पाहिजे, ते आता 'त्रार्थस्य समाहति: इत्यादी वचनात करतात. प्रारम्भ वौरे अवस्थांच्या स्वरूपाची गोष्ट ज्यात समाप्त होते तो अडू. अथवा अवस्थेची समाप्ती झालेली नसताही जेव्हा बीजाचा संहार सधींच्या भिन्नतेप्रमाणे त्या त्या संधीत उचित असा होतो तेव्हा सुद्धा अंक तोडला जातो. त्यांत मुखप्रश्नती पाच संधीमध्ये अनुक्रमे उत्पत्ती, उद्धाटन, उद्भेद, गर्भनिर्भेद आणि फलसमानयन ह्या बीजाच्या ज्या विशिष्ट दशा त्या संहार शब्दाने निर्दिष्ट आहेत. आणि अंकाची समाप्ती होते. तेथे एकसूत्रतेचा भंग होऊ नये म्हणून सगळम म्हणजे संबद्ध आहे बिन्दु ज्यात अह्या तऱ्हेचा अंक करावा: उदाहरणार्थ, तापस- वत्सराज नाटकात तिसऱ्या अंकाच्या शेवटी सुरुवातीस मोठ्या. मानाचा अवलंब केल्यामुळे १ घो न. | १०.२ २७ दूर ठेवळी गेळेळी, नंतर क्ृशता उत्पन्न करणाऱ्या तापाच्या भाराने अगदी लहान झालेली, जवळ आल्यामुळे संकुचित अवयवांनी मांडीवर बसलेली अशी जी छाया तिला वृक्ष सर्वे गात्रांत प्रणय दाखविणाऱ्या प्रियेप्रमाणे आठिंगन देतो? ह्या पक्षावतीशी विवाहाच्या स्वीकाराचे अनुसंधान करणाऱ्या राजाच्या उक्तीने प्राप्तिसंभव नावाची तिसरी अवस्था दाखविणाऱ्या नंतरच्या चोथ्या अंकासाठी बिन्दूची योजना केळी आहे. याप्रमाणे ह्या आर्येत अंकाच्या स्वरूपाचे निरूपण केले आहे अशी प्राचीन टीकाकारांची व्याख्या आहे. ह्या परिच्छेदात प्रस्तुत आर्येची प्राचीन टीकाकारांनी केलेली व्याख्या विस्तृतपणे र केली आहे. ती अभिनबगुप्ताळा मान्य नसून पुढील परिच्छेदात त्याने स्वतःची निराळीच व्याख्या दिली आहे. - 'असमाप्तायाम? ही मुळातील 'अड्डूसमाप्तायाम? ची केलेली दुरस्ती आहे. व ती आवडयक आहे. प्रस्तुत संदर्भात “अवस्था अंकात समाप्त झाली असता सुद्धा' याला काहीच अर्थ नाही. येथे असे अभिप्रेत आहे की सामान्यतः एका अवस्थेचे चित्रण एका अंकात पूर्ण होते, पण कधी कभी एका अवस्थेचा आविष्कार एका अंकात समाप्त झालेला नसतो. त्यावेळी केथानकाच्या बीजाची विशिष्ट द्या समाप्त होईल तेथे अंक पुरा करावा असे येथे सांगितले आहे. - यथास्वं संधिभेदेन? सुख, प्रतिसुख, गर्भ, विमर्श आणि निर्वहण ह्या पाच संधींमध्ये बीज उत्तरोत्तर वाढत जाते ब प्रत्येक संधीत बीजाचे विशिष्ट स्वरूप दृष्टीस पडते. पण येथे अडचण अशी आहे कि पाच संधी हे पाच अवस्थांना अनुसरून असल्यामुळे अवस्थेची समाप्ती न झाली तर तिचे दर्शन घडविणाऱ्या संधीतील बीजाचा संहार सुद्धा अपूर्णच असणार. तेव्हा अड्जुच्छेदा - साठी निराळा प्रसंग उत्पन्न होण्याचा संभव आहे असे दिसत नाही. - 'अवलग्नः संबद्धो? यातील 'संबद्धोर ही मुळातील 'संबन्थो' ची केलेली दुरुस्ती आहे. 'अवल्ग्न*चा अर्थ सांगणारा हा राब्द धातुसाधित विशेषण असला पाहिजे हे उघड आहे. -- 'आदो मान- इ०? हा 'छोक मव्याह्नाचे वर्णन करणारा आहे. यात तरुच्छायेला प्रगयिनीची उपमा दिली असून अनेंक शब्द शिष्ट आहेत. मान” म्हणजे मोजमाप, प्रमाण आणि ताठरपणा, रुसवा. 'पश्चात्ताप” यांतील 'पश्चात? दाब्द स्वतंत्र असून “ताप? म्हणजे सूर्याची उष्णता असा प्रकतविषयक अथ आहे. प्रगयिनीच्या संबंधात पश्चाताप अता एक शब्द समजावयाचा. “तानव' म्हणजे कृराता. “संपिण्डित' म्हणजे गोळा झालेले, संकुचित झालेले. | त्वेतत्पुनरुक्तम्‌ । 'अस्यावस्थोपेतं कार्य प्रसमीक्ष्य' इत्येतेन हि कियन्नोक्तं यदनेन लक्षणेनाभिधायते । तस्मादिदमत्रार्थतत्त्वम । अडूस्वरूपं तावदू 'अस्या- वस्थोपेतम' इत्यनेनेवोक्तम । नामानिर्वचनं च ' अज्षू इति रूढिशब्दः इत्यनेन दशितम्‌ । अनया त्वार्यया अड़्ूस्य त्रेविध्यमुच्यते । तथा चोक्त॑ कोहळादौ -- | त्रिघाडूने$ड्ञावतारेण चूडयाडूमुखेन वा । _ अ्थापक्षेपणं चूडा बहर्येः सूतबार्सदाभिः । ' अड्ड्स्याज्ञान्तरे योगस्त्ववतारः प्रकीर्तितः ॥ विल्हिष्टं मुखमड्ठस्य स्त्रिया वा पुरुषेण वा । ' यदुपक्षिप्यते पूर्व तदडूमुखमिष्यते ॥ शट नाट्यशास्त्र अत्रार्थस्य कस्यचित्सम्यगन्यत एवानभिसंघानपूर्वेकाप्तिः प्राप्तिरिते चूडा दार्शिता । तद्यथा रत्नावल्यां वैतालिकपाठादू 'दशामुद्यनस्य' इत्यन्तः उपयोगी सम्यगर्थः प्राप्तः, तत्पत्याभैज्ञामूलत्वात्सागरिकानुरागस्य । तथा चाह “अअं सो राआ उद्‌्अणो? इत्यादि । तदर्थमेव च वसन्तक्रीडादि सर्वमुपक्षिप्तम्‌ । तदेव . च राजानुरागस्य शय्याफलकादिकूतस्य मूलमिति चूलिकेत्युक्तम्‌ । तेन प्रथम*चूलि- काडूः । यत्र त्वज्ले सर्वेषामड्ञानां यो5र्थो बीजलक्षणस्तस्य संहारः सामेलितत्वेन प्राप्तिभवाते सो5वताराडूः । यथा रत्नावल्यां द्वितीयो5डूः । तत्र हि 'ईस्सिस्स केण्णआाजणस्स ईस्सि एव्व वरे अहिलासेण होदव्व' इत्यादि प्रकृतमेव सव वर्ण्येते । यत्र त्वनुसंधानमात्रप्राणत्वेन तदुपयोगितया वृत्तान्त उच्यते तदुपाशशेष्ट- मडमुखम्‌ । स एवेह किंचिदवलय़बिन्डुरिति तूर्तीयो भेद उक्त: । यथा रत्नावल्यां तृतीये5ड्: ऐेन्दरजालबत्तान्तानेरूपणम्‌ । चूलिकातश्वास्य भेद्‌ः', चूलिकाडस्यापि तदभिसंधानाभावात्‌ । इह त्वभिसंघानं योगन्धरायणादीनामस्त्येव । पण ही व्याख्या म्हणजे पुनरुक्ती होय. 'अस्यावस्थोपेतम? इत्यादी वरीळ आर्येत असे काय सांगितलेले नाही की जे ह्या लक्षणात सांगितले आहे? म्हणून ह्या ठिकाणी खरा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. अंकाचे स्वरूप “अस्यावस्थोपेतम? या आर्येतच सांगितले आहे. आणि अंक ह्या नावाची व्युत्पत्ती 'अडुः इति रूढिगाब्द:' या आर्येत दाखविली आहे. आता ह्या आर्येत अंक तीन प्रकारचा असतो हे सांगतात. त्याप्रमाणे कोहळ आदींच्या ग्रंथांत म्हटले आहे - 'अंकावतार, चूडा अथवा अंकमुख असा तीन प्रकारचा अंक असतो. पुष्कळ अर्थ सूचित करणाऱ्या सूत, वैताळिक आदींनी केलेल्या अर्थाच्या उपक्षेपाला चूडा असे म्हणतात, एका अंकाच्या दुसऱ्या अंकाशी होणाऱ्या योगास अंकावतार म्हणतात. अंकाचा प्रारंभीचा अलग प्रवेश जेव्हा स्त्री द्वारा किंवा पुरुषद्दारा अगोदर उपक्षेपित केला जातो तेव्ह्य त्याला अंकमुख म्हणतात. प्रस्तुत ठिकाणी 'अर्थस्य' म्हणजे कोणत्या तरी अर्थाची “सम्यक्‌ आप्तिः' म्हणजे दुसरीकडूनच अभिसंधानाशिवाय होणारी प्राप्ती या शब्दांत चूडा प्रकाराचा निदेश आहे. उदाहरणार्थ, रतनावळी नाटिकेत बैतालिकाने म्हटलेल्या शहोकापासून 'दुशामुदयनस्य' या अंतिम वचनात उपयोगी असा सम्यक्‌ अर्थ प्राप्त होतो, कारण त्या ओळख पटण्यातच सागरिकेच्या अनुरागाचे मूळ आहे. त्यामुळे ती म्हणते 'हा तो राजा उदयन काय” आणि त्याचसाठी वसन्तक्रीडाप्रभृती सर्वे गोष्टींची योजना केली आहे. आणि हेच शयनीय, चित्रफटक आदोंनी उत्पन्न होणाऱ्या राजाच्या अनुरागाचे मूळ म्हणून त्याला 'चूलिका असे म्हटले आहे. त्यावरून रत्नावठीचा पहिठळा अंक चूल्िकाडूः असे ठरते. परंतु ज्या अंकामध्ये सर्व अंकांचा जो बीञस्वरूप अर्थ त्याचा संहार म्हणजे एकवटलेली प्राप्ती होते तो अंक अंकावतार होय. उदाहरणार्थ, रनावळीतीळ दुसरा अंक, १८.१५ | ३९ कारण त्यात “अशा सुंदर कन्यकेळा अशा सुयोग्य वराचीच अभिलाषा असणार' इत्यादी वचनांत सवे प्रकृत गोष्टींचेच वर्णन आहे. परंतु ज्या अंकात केवळ अनुसंधानच प्राणभूत असल्यामुळे त्याला उपयोगी असा वृत्तान्त कथन केला जातो तो निकटचा अंकमुख होय- ह्याच तिसर्‍या प्रकाराचा निर्देश प्रस्तुत आर्येत “किंचिदवलम़बिन्दुः! या शब्दांत केला आहे उदाहरणाथे, रत्नावलळीच्या तिसऱ्या अंकातील ऐन्दजालिकाच्या वृत्तान्ताचे वणन, आणि हा प्रकार चूलिकेहून भिन्न आहे. कारण चूलिकाडणार्‍च्या बाबतीत त्याच्या अभिसंधानाचा अभाव असतो, पण ह्या प्रकरणात यौगन्वरायण आदींचे अभिसंधान असतेच. कोहलादौ' कोहळ आदींचे ग्रंथ सध्या उपल्ब्ध नाहीत. ह्या ठिकाणी उद्धत केलेल्या कोहलादींच्या मताप्रमाणे 'चूलिका, अड्मावतार व अडूमुख ही तीन प्रकारच्या अंकांची नावे होत. पण सध्या उपलब्ध असलेल्या नाट्यक्यास्त्रावरीलळ उत्तरकालीन ग्रंथांत ह्या तीन गोष्टी आणि विष्कम्मक ब प्रवेदाक हे पाःच अर्थाोपक्षेक होत असे म्हटले आहे. नाट्यशास्त्राच्या काही हस्तलिखितांतही पुढींल अध्यायात ह्या पाच अर्थोपक्षपकांचे वर्णन आढळते. पण ते 'कौक त्या ठिकाणी असल्याचे .अमिनवगुप्तालळा अवगत नाही. तेव्हा ते मागाहून घातले असण्याचचाच संमब आहे. - 'विव्लिष्टं मुखम? हा हस्तलिखितातील पाठ 'विश्लिष्टमुखम? ह्या मुद्रित पाठापेक्षा अधिक योग्य आहे. विशिष्ट म्हणजे सुटे झालेले, अलग झालेले. ह्या शब्दाचा विरोष प्रकारे जोडलेला असाही अर्थ होऊ शकतो, अमिनवरुप्ताने तो अर्थ विचारात घेतलेला दिसतो. - 'सम्यग? इ०? मुळातील समाप्तिः शब्दाची सम्यग्‌ आप्तिः अशी फोड करून सम्यक शब्दाचा अनुसंधाना- शिवाय होणारी असा अर्थ केला आहे. - दकश्यामुदयनस्य' पहिल्या अंकाच्या शेवटी शेवटी वैतालिकांचा स्तुतिपाठ आहे, त्यात 'टशशां प्रीत्युत्क्षकृूतः तव उदयनस्य पादान्‌ आसेबितुम? त्यादी वचन आहे. - 'इत्यन्त:ः म्हणजे वरील शब्दांत झालेला वैतालिकांच्या वचनाचा शेवट. - 'राजानुरागस्य' राजाचा अनुराग दुसऱ्या अंकात उत्पन्न होतो. पण तो शय्या, चित्रफलक आदी सागरिकेच्या अनुरागाच्या निदर्ाक गोष्टींनी उत्पन्न होतो. तेव्हा तो सागरिकेच्या अनुरागा- तून म्हणजे पहिल्या अंकातील प्रसंगातूनच उत्पन्न होतो. म्हणून पहिला अंक ह्या सर्वाचे मूळ - 'मूलमिति चूलिकेत्युक्तम? वस्तुतः 'चूडा किंबा चूलिका याचा अर्थ शीषेस्थ केस, शोंडी असा आहे. अमिनबरुप्ताने त्याचा मूळ शब्दाच्या अर्थाशी संबंध जोडलेला दिसतो. - 'कण्ण- आजणस्स? रत्नावलीच्या उपलब्ध प्रतीतील पाठ 'कण्कआरअणस्स (कन्यकारत्नस्य)? असा आहे. - वृत्तान्त उच्यते' मुळात 'वृत्तान्तमुच्यते' असे आहे. वृत्तान्त शब्द पुक्लिगी आहे. - 'उपश्छि- घम? चिकटलेले असा शाब्दराः अर्थ, - 'तृतीये$ळे॑ इ०' रत्नावलीच्या सध्या उपलब्ध असलेल्या प्रतीत ऐन्द्रजालिकाचा वृत्तान्त तिसऱ्या अंकात नसून चौथ्या अंकात आहे. आणि चोथ्या अंकातच तो संभाव्य आहे. 'तृतीये' हे चुकीने पडलेले दिसते. - “चूलिका तस्याश्व मेद हा मुद्रित पाठ चुकीचा आहे. -- 'तदमितंधानाभावात? यातील 'तत्‌' म्हणजे प्रकृत वस्तु चूलिकेत त्याचे अभिसंघान नसते म्हणजे हेतुपूबक केलेला निर्देश नसतो, तर प्रकृताचा सहजगत्या झालेला उपक्षेप असतो. - 'यौगन्धरायणादीनाम? ऐन्द्रजालिकाचा वत्तान्त ही योगन्धरा- यणानेच योजिलेली एक क्ळ॒प्ती होती. म्हणून त्यात योगन्धरायणा*चे अमिसंधान म्हणजे हेतुपूर्वक योजना आहे ४८ | नाट्यशास्त्र तेनायं संक्षेपः । अट्ठे यद्दर्णनीयं वस्तु तत्तावदू द्विधा प्रधानं तदुपयोगे च, तदुपयोग्यपे किंचिद्देववशादपयोगं याति, किंचिद्भिसंधिबलादिति त्रिविधो5डरर्थः| स कदाचिदेकस्मिन्नईेक्‍ मिश्रभावेनापि निबध्यत इति । चूलिकाडूसुखयोरडुभेदयो: प्रधाना्थस्पर्शो नेवास्तीति । तेव्हा थोडक्यात अर्थ असा. अंकामध्ये वर्णने करावयाच्या गोष्टी दोन प्रकारच्या असतात -- एक मुख्य व दुसरी तिळा उपयोगी पडणारी अशी. उपयोगी पडणारी गोष्ट सुद्धा करचित देवयोगाने उपयोगी पडते, तर क्षचित अमिसंधीच्या बळावर. याप्रमाणे अंकातील अर्थ तीन प्रकारचा असतो. तो कदाचित रकाच अंकात मिश्रित स्वरूपात सुद्धा निबद्ध होतो. चूळिका अणि अडूमुख या दोन अंकप्रकारांत मुख्य गोष्टींचा स्पर्शी सुद्धा नसतो. 'किंचिद्देववशात? यात चूलिकेचा निळेंश अमिग्रेत आहे. - 'अमिसंि' म्हणजे हेतुपूर्वक योजना. यात अंकमुखाचा निदेश आहे. - “चूल्का- इ०? 'वूलिका आणि अंकमुख यांत मुख्य कथानकाशी काही संबंध नसतो असे येथे म्हटळे आहे. पण वर रत्नावलीच्या पहिल्या अंकाला चालकाझक म्हटले आहे आणि चोंथ्या अंकाला अकुडखाळ म्हणावे असे अमिप्रेत आहे. या दोन अंकांचा मुख्य कथानकाद्यी संबंध नाही असे कसे म्हणता येईल १ चूलिका म्हणजे फक्त वैतालिकाचा स्तुतिपाठ व अडुसुख म्हणजे केवळ ऐन्दजालिकाचा प्रसंग असे समजले तर त्यांचा मुख्य कथा- नकाशी साक्षात संबंध नाही असे मानता येईल. पण मग सबंध अंकांना हीं नावे देणे अनुचित ठरेळ, उत्तरकालीन शास्त्रकारांनी चूलिकादींना अथोपक्षेपक ठरविले आहे, अंकाचे प्रकार मानले नाही हे अधिक सुसंगत आहे. किंबहुना अमिनवगुप्ताने एस्तुत आययेंचा छावलेला अर्थ मान्य होण्यासारखा नसल्यामुळे तो नाट्यशास्रकाराळा अभिप्रेत असण्याची शक्‍यता नाही. प्राचीन टीका- कारांनी म्हटल्याप्रमाणे आर्येत एकाच प्रकारच्या अंकाचे निरूपण आहे. आणि मागच्याचीच येथे केबळ पुनरुक्ती आहे असे नाही. मूळ आरयेत डॉ. घोष यांनी “यत्र च? च्या जागी “यत्र न' अशी दुरुस्ती करून 'ज्यात बीजाची तंपूर्णपणे विल्हेवाट लावळी जात नाही? असा अर्थ केला आहे. पण तसे करण्याची आवश्यकता दिसत नाही. संहार शब्दाने तातुरता समारोप सुद्धा समजता येण्यासारबा आहे. ये नायका निगदितास्तेषां प्रत्यक्षचरितसंभोगः । नानावस्थापेतः कार्यस्त्वड्कोडविकृषश्ट्स्तु । १६॥ जे नायक म्हणून सांगितले आहेत त्यांचे चरित व त्यांचे उपभोग प्रत्यक्ष दाखविणारा व .विविध अवस्थांनी युक्त असा, परंतु फार लांबलचक नसलेला असा अंक रचावा. १ नि -संयोगः. २ नि -वस्थान्तरितः. २ नि विक्षष्टस्तु, का यथार्थरस:. १८.१६ | 34 तथा प्रवेशकट्टारेण सुख्यचरितमपि दर्शनीयमिति शड्डां वारयितुमाह ये नायकाः इति । धौरोदात्तादयो विजिगीपुतन्मित्रत्रभतयो वा ये नायकाः प्रति- नायकाश्व तेषां चरितमुपायानुष्ठानं तथा संभोगः प्रत्यक्ष: संनिहित: साक्षादूररय- मानो न तु सूच्यमानो यत्र ताहगडूः । नयति प्राप्नोतीतिवृत्त॑ फळं वेति नायकः । चरितप्रत्यक्षतया व्युत्पत्तिः प्रेक्षकाणाम्‌ । संभोगाप्रत्यक्षत्वे च तद्वेतकेवलक्लेदा- दर्शनात्केवलं वैरस्यं सामाजिकस्य स्यात्‌ किमनेन महता कशेनेति । तत एवोक्त 'न निःसुखः स्यादू' इति । नानाप्रकारावस्थाः प्रतिनायकगतो चारतसंभोगावनुपादे- यावविषये चेति हेयावस्थौ, नायकगतो तु तदवेपरीत्यादुपादेयावस्थाविति तुझाब्द- स्यार्थः । अविकृष्ट इत्यदीर्थः । दोर्घो हि प्रयोक्तृप्रेक्षकाणां खेदाय स्यात्‌ । त्याचप्रमाणे प्रवेशकाच्या द्वारा मुख्य पात्रांचे चरित सुद्धा दाखविता येईल या शंकेचे निवारण 'ये नायकाः' इत्यादी शब्दांत करतात. धीरोदात्तप्रशूती अथवा विजिगीषु, त्याचा मित्र इत्यादी जे नायक व प्रतिनायक असतात त्यांचे चरित म्हणजे त्यांनी योजळेळे उपाय आणि त्यांचा संभोग हे प्रत्यक्ष म्हणजे अगदी संनिध, साक्षात्‌ दिसणारे, केवळ सूचित केले जाणारे नव्हे असे ज्यात असतात तक्षा प्रकारचा अंक. नयति म्हणजे इतिवृत्त किंवा फळ आपल्याबरोबर नेतो तो नायक. चरित प्रत्यक्ष दिसल्यामुळे प्रेक्षकांना बोध प्राप होतो. आणि संभोग जर प्रत्यक्ष दिसला नाही तर त्यांच्या केवळ हेशाचेच दडीन झाल्यामुळे “ हे महान्‌ कष्ट कशासाठी ' अशा विचाराने प्रेक्षकांचा केवळ विरसच होईल. म्हणूनच म्हटले आहे की राजाने सुखाचा त्याग करू नये. नाना प्रकारची अवस्था म्हणजे प्रतिनायकाचे चरित व संभोग अस्वीकार्य व विषय होण्यास अयोग्य म्हणून त्याज्य अवस्थेचे, परंतु नायकाचे चरित व संभोग त्याच्या उलट स्वीकार्य भवस्थेचे हे “तु! शब्दाने दाखविले आहे. अविक्रष्ट म्हणजे दीध नसलळेळा. कारण, दीध अंकाने प्रयोग करणारांना व प्रेक्षकांना शीणच होईल. मुळात 'मुख्यचरितमपि' व “शाक्का' यांच्यामधील शब्द गहाळ झाला आहे. 'दर्शनीयमिति? किंवा 'वर्णनीयमिति या अर्थाचे वचन आवझ्यक आहे हे उघड आहे. :दर्शनीयमिति' हे शब्द घातळे आहेत. -- “"नयति इ०' यात नायक शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. -- व्युत्पत्ति? म्हणजे बोध, - केवलं वैरस्ये'? यातील "केवलं? शब्द मुद्रित प्रतीत नाही. पण तो असल्यास बरे. - “न निःसुलः स्यात्‌' हे वचन कौटिलीय अर्थशास्र (१.३.७) येथून उद्धुत केळे आहे. त्याच्या अगोदरचे शब्द आहेत 'धर्मार्थाविरोधेन कामं सेवेत!. -- 'नानामरकारावस्थाः' हस्तलिखितात “नानाप्र- कारावस्था असा एकवचनात पाठ आहे, तर मुद्रितात “-वस्थौ' असा द्रिवचनात आहे. बहुवचन अधिक योग्य, निर्दिष्ट केलेल्या चारही अवस्थांचा समावेदा होऊ शकतो. ७२ नाट्यशास्त्र नायकदेवीभुरुजनपुरोहितामात्यसार्थवाहानाम | नेकरसान्तरविहितो दळू: इति स वेदितव्यस्तु | १७॥ नायक, राण्या, युरुजन, पुरोहित, अमात्य आणि सार्थवाह ह्यांच्याशी संबद्ध व अनेक, विविध रसांनी सजविळेळा तो अंक होय असे समजावे. एवं प्रधानवर्णनीयस्य हेत्तसुक्तवा तदुपयोगिवृत्तस्य दिशं दर्शयितुमाह नायकदेवीत्यादि । नायका अमुख्या: पताकार्दानाम्‌ । देव्यो महादेवीभोगिनी- एवमन्यदुत्पेक्ष्यम्‌ । नायकानां देव्यादय इत्यन्ये । अडू इति अनेकरसाड्वितत्वादपि अडू: इति नामेत्यथः । याप्रमाणे मुख्यतया वर्णन करावयाच्या पात्रांचे वृत्त सांगितल्यानंतर त्याळा उपयोगी अशा वृत्ताचे दिग्दर्शन करण्यासाठी * नायकदेवी-' इत्यादी आर्या सांगतात. नायक म्हणजे मुख्य नसलेले, पताका आदींमध्ये असलेले. देवी म्हणजे महादेवी, भोगिनी इत्यादी. गुरुजन म्हणजे माता, पिता, भ्राता, आचार्य इत्यादी. सार्थवाह म्हणजे प्रस्तुत ठिकाणी सेनापती, किंवा कथानकाच्या अनुरोधाने वणिक असाच अभ. यांच्याशी संबद्र असलेला तो अंक, म्हणजे ह्या गोष्टींचे दर्शन घडविणारा. म्हणूनच “नेकेन! म्हणजे विबिध प्रकारच्या रसविशोषांनी युक्त असा. उदाहरणार्थ, देवीच्या संबंधात शुंगार, नायकाच्या संबंधात वीर. याप्रमाणे अन्य रसांची ही कल्पना करावी. दुसरे टीकाकार “नायकांच्या देवी इत्यादी ! असा अर्थ करतात. “अड्डः इति' याचा अर्थ अनेक रसांनी अड्चित झाल्यामुळेही त्याला अड्डु: असे नाव प्राप्त झाले. 'अमुख्याः पताकादीनाम? ही सुळातील 'मुख्याः पताकादयः? ची केलेली दुरुस्ती आहे. मुख्य नायक या ठिकाणी अभिप्रेत असण्याचा संभव नाही. कारण, प्रधान वत्ताला उपयोगी असे जे प्रासक्चिक वेत्त त्यासंबंधीचे विवेचन प्रस्तुत आर्थेत आहे असे सुरुवातीस म्हटले आहे. आणि 'पताका- दय: असा प्रथमान्त शब्द नायकांचे वर्णन करण्यास योजिला असण्याचा संभव कमी. - महादेवी, भोगिनी यांचे वर्णन पुढे चोविसाव्या अल्यायात 'खोक ३३-२८ व ४ यांत केले आहे. - 'सार्थबाहो 5 त्र सेनापति” याचे कारण नाटकात राजकुलाशी संबद्ध अश्या व्यक्तींचेच चित्रण अपेक्षित आहे. - 'अन्ये? हे दुसरे टीकाकार या ठिकाणी नायकांचा निर्देश आहे असे मानीत नाहीत, कारण मागील आर्येत त्यांचा स्वतत्रपणे निदेंश केला आहे. -- अडू: इति नाम? म्हणजे अक्क शब्दाची ((रसेः) अड्डितः इति अड: अशी व्युत्पत्ती समजावी. | १ नि -परिजन-. | १८.१८ ३ ह्या आर्येनंतर मुद्रित पुस्तकात पुढील आर्या अधिक आढळते - पश्वापरा दशपरा ह्य्ठाः स्युनांटके प्रकरणे च । निष्क्रामः सरवेषां यस्मिन्नडःकः स विज्ञेयः ॥ अमिनबगुप्ताढा ती अवगत नाही व अनेक हस्तलिखितांत ती आढळत नाही यावरून ती मूळची नाही. असे समजण्यास हरकत नाहीं. शिवाय पुढे २५ ब २१ ह्या आयोत हिच्यातील आरदाय अधिक सुसंगतपणे मांडला आहे. | क्रोधप्रसादशोकाः शापोत्सगोळ्ये विद्रवोद्ाही । अद्‌भुतसंभवदरशरनमज्ञ प्रत्यक्षजानि स्युः || १८॥ क्रोध, प्रसाद, शोक, शापाची समाप्ती, गडबड, विवाह, अद्धताचा संभव व त्याचे दशन - ह्या गोष्टी अंकामध्ये प्रत्यक्ष घडलेल्या असाव्यात. न केवलं चरितसंभोगावेव प्रत्यक्षी किं त्वन्यदापि यत्र रअनातिदायो५- स्तीति दर्शयन्नाह क्रोधप्रसादशोका इति । शापोत्सर्गः शापकृतस्यानथंस्य नाशः यथोक्तस्य दुरितस्याभावः । शड्डा भयत्रासकृतो विद्रव इति गर्भसंघो वक्ष्यते । उद्ठाही विवाह: । अद्सुतस्य संभवो5भ्युपगम उपक्रमो दशनं च निर्वाह इति । एतच्चान्यस्यापि रञकवर्गस्योपळक्षणम्‌ । अक्षजं ज्ञानं प्राते गतानीति भत्यक्षजाने । प्रत्यक्षराब्देन तदेकदेश उच्यते, तत्र जातानीत्यन्ये । इयतश्च वर्गस्य भत्यक्षता तावडूर्वाते, कदाचित्त्वप्रत्यक्षत्वसपि । केवळ चरित व संभोगच प्रत्यक्ष असावेत असे नाही तर इतरही ज्यात खूप रंजन व्करणाऱ्या गोष्टी असतात ते असावे हे क्रोधप्रसादशोका:' इत्यादी शब्दांत सांगतात. र्शापोत्सरग म्हणजे शापाने केलेल्या अनर्थाचा नाश, उच्चारलेल्या दुरिताचा अभाव. भय व नास उतलन्न करणार्‍या वस्तूविषयीची शंका म्हणजे विद्रव हे गर्भसंघीत सांगितले जाईल. उद्डाहृ म्हणजे विवाह. अद्‌भुताचा संभव म्हणजे त्याचा स्वीकार, प्रारंभ आणि दशन म्हणजे ते शोबटास नेणे. आणि ह्या गोष्टी इतरही रंजक गोष्टींचे उपलक्षण होत. अक्षज म्हणजे ज्ञान, याकडे गेलेल्या म्हणून 'प्रत्यक्षजानि' अशा गोष्टी, इतर टीकाकार म्हणतात की प्रत्यक्ष शाब्दाने त्याचा एक भाग अभिप्रेत आहे, तेथे उत्पन्न झालेल्या म्हणून 'प्रत्यक्षज! गोष्टी. एवढ्या गोष्टींचे प्रत्यक्ष दर्शन होते, पण कधी कधी त्या अप्रत्यक्षही असतात. १ नि -प्रमाद-- २ नि -5व-. ३ नि-संश्रय- ४ घो -मज्ूडप्रत्यक्ष-. ४४ -. नास्यशास्त्र 'यथोक्तस्य दुरितस्याभावः? हा सुचविलेला दुरुस्त पाठ आहे. हस्तलिखितात मागचा व पुढचा रट्ट मिळून “नाऱमयथोक्तस्य... ताभावस्थाशज्ञा- असा भ्रष्ट पाठ आहे. त्यात दोन अक्षरांची जागा मोकळी आहे. मुद्रित पाठ "नाश, यथोक्तस्यानर्थकाभावस्य शब्का- असा आहे. पण 'शाळ्क? पासून नबीन वाकय सुरू होते हे १९.८३ मध्ये दिलेल्या बिद्रवाच्या व्याख्येवरून स्पष्ट आहे. तेव्हा ह्या वाक्याच्या शेवटी 'अभावः? अत्ता प्रथमांत शब्द आवश्यक आहे हे उघड आहे. ह्स्तलिखितातील “...ता? बरून दुरित शब्द छचला. पण 'अनर्थस्याभावः' असाही मूळ पाठ असण्याची शक्‍यता आहे. - 'अक्षजम? अक्ष म्हणजे इन्द्िये, त्यांनी उत्पन्न होणारे ते अक्षज म्हणजे ज्ञान. अक्षजाप्रत म्हणजे शानाथत जाणाऱ्या गोष्टी त्या प्रत्यक्षज. ह्या शब्दाचा 'ज्यांचे शान होते अशा' असा अर्थ केला आहे. -- 'ग्रत्यक्षशान्देन तदेकदेशा उच्यते! याचा अर्थ असा दिसतो की प्रत्यक्ष म्हणजे सदासर्वकाळ समोर दिसणारे असा नसून फक्त काही काळच दिसणारे असा आहे. - (यतश्व वर्गस्य? याने क्रोध, प्रसाद इत्यादींच्या ससूहाचा बोध होतो. ते कधी प्रत्यक्ष दिसतात, तर कथी ते अप्रत्यक्षपणे दाखबिले जातात, म्हणून 'प्रत्यक्ष' शब्दाने तत्यक्षाचा एक भाग समजला पाहिजे, असे ह्या टीकाकारांचे म्हणणे असावेसे वाटते. 'इयतश््च' हा हस्तलिखितातील पाठ आहे. मुद्रितात 'जातानीत्यन्येन्द्रियवर्गस्यर असे आहे. तो पाठ असंभाव्य आहि. - 'अप्रत्यक्षत्वमापे? ही झळातील 'अम्रत्यक्षमांपे' ची दुरुस्ती आहे. भाववाचक नाम आवश्यक आहे. मूळ आरयेत डॉ. घोष यांनी “5प्रत्यक्षञानि? अशी दुरुस्ती केली आहे. पण ते बरोबर नाही. क्रोध, शोक वगैरे गोष्टी नाटकात प्रत्यक्षच दिसतात. एकदिवसप्रवृत्त॑ कार्यस्त्वड्नेडर्थब्रीजमधिकृत्य । आवर्यककार्याणामाविरोधेन प्रयोगेषु ।॥ १९॥ प्रयोगांमध्ये अवश्य करावयाच्या कार्यांना अडचण येणार नाही अशा रीतीने एक दिवसात घडणाऱ्या कार्यबीजावर आधारित असा अंक रचावा. अथाडूस्य प्रयोगकालपार्रमाणमियदिति दर्शयति एकादवसप्रवत्तामिति । ताह्शमवान्तरेणार्थेन प्रयोजनेन युक्त बीजमुपायानुष्ठानं वर्णनीयताया अधि- कृत्याडूः कतेन्यो यस्य प्रकृष्टं च यद्दर्तनं प्रयोगरूपं तदेकदिवसेनेति मुहूर्तप्वददश- केनेव । यतस्तावन्तं कालमावड्यकाने भोजनादीनि शक्‍यनिरोधनानि । ततः पर तु प्रयोगकालश्ेत्‌ तत्परेक्षकप्रयोक्तणां तदाप्याव्यकस्य संध्यावन्दनभोजना- देरविरोधेनोति । १ नि -पवृत्तः. २ नि -5थ बीजमाश्रित्य. १८.२० ७'५ आता अंकाच्या प्रयोगकाळाचा अवधी इतका असावा हे ' एकदिवसप्रवृत्तम्‌ इत्यादी राब्दात सागतात. त्याप्रकारच्या अवान्तर अर्थाने म्हणजे प्रयोजनाने युक्त अशा बीजाला म्हणजे जे वणन करावयाचे त्याच्या उपाययोजनेळा धरून अंक निर्माण कराबा, ज्याची प्रकृष्ट अशी प्रयोगस्वरूपाची स्थिती एक दिवसाची म्हणजे पंधरा मुहूर्ताचीच असावी कारण तितका वेळ- पर्यंत आवश्यक अशी भोजनादी कार्ये थांबवून धरणे शक्‍य होते. परंतु त्यानंतर जर प्रयोगाचा काढ वाढला तर तशा प्रसंगीही प्रेक्षकांच्या व तो प्रयोग करणार्‍यांच्या संध्योपासना भोजन आदी आवश्यक कार्याला अडथळा येणार नाही असा करावा. 'ताहशम्‌? म्हणजे ज्यात कोध. प्रसाद आदी प्रत्यक्ष दिसतात अश्या प्रकारचा वस्तुतः हे अंकाचे विशोषण असावे; पण येथे त्याचा घीजम्‌ शी अन्वय करांबा लागतो. -- अवान्तरेण म्हणजे निरनिराळ्या प्रयोजनांपैकी कोणत्या तरी एका प्रयोजनानें. - “बीज? ची व्याख्या 'उपाया- तुष्ठान अशी केली आहे. - 'प्रकृष्टं च यद्वर्तनम' ही आर्येतील भदत्तम' शब्दाची व्याख्या आहे. शोबटी त्याचा अर्थ प्रयोग असा केला आ] अभिनवगुप्ताने हा जो ह्या आयेंचा अर्थ लावला आहे. तो मोठा विलक्षण वाटतो. एकां. अंकाच्या प्रयोगाला बारा तासांचा अवधी लागला तर पाच अंक असलेल्या नाटकाच्या प्रयोगाला अडीच दिवसाहून अधिक वेळ लागेल ब दहा अंको नाटक तर सततं पाच दिवस चाळू राहील. तेव्हा एक दिवस हे अंकाच्या अवधीचे प्रमाण आहे हे अभिनवगुप्ताचे मत मान्य करणे कटीण आहे. आणि आवश्यक कार्ये म्हणजे प्रेक्षकांची व नटांची नेहमी करावयाची तंध्यावदन भोजन इत्यादी कार्ये हा अर्थही मान्य होण्यासारखा नाही. एक अंक चाळू असेपर्यंत म्हणजे बारा तास ही कार्ये रोखून धरता येतील हे सुद्धा खरे वाटत नाही. या आरयेचा तरळ अर्थ असा दिसतो की एका. अंकात ज्या घटना रास्ववावयाच्या त्या एकाच दिवसात घडलेल्या असाव्यात, आणि त्या घटना अश्या असाव्यात को प्रयोग करताना. जी कार्ये आवश्यक असतात त्याना बाध येळ नये, म्हणजे त्या प्रयोगक्षम अहाब्यात. --..ततः परं तु इ०? म्हणजे. अभिनवगुप्ताच्या म्हणण्याप्रमाणे एका अंकाचा प्रयोग भारा तासांहून अधिक काल्ही चालण्यास हरकत नाही; फक्त त्यामुळे तंध्यावंदनादी . नित्य कार्यात व्यत्यय येता कामा नये. हे कत्ते शाक्य आहे ते लक्षात येत नाही एकाळूः न कदाचिद्वहाने कायाणि योजयेद्धीमान । आवश्यकाविरोधेन तत्र कार्याणि कायाणि ॥२०॥ बुद्धिसंपनन कवीने कधी एका अंकात पुष्कळ कार्यांची योजना करू नयें. त्या. ठिकाणी काय .अवश्य करावयाच्या कार्यांत विघ्ने आणणार नाहीत अशा तऱ्हेने योजावीत. _ १ ब नि एकाळ्लकेन २ नि काव्यानि. ४६ नाट्यशास्त्र एवं कार्यानेकत्वमेकत्राहः निषिद्धम । क्रचित्त्वभ्युपगतमपि । अन्ये तु सर्वामेवार्या निषेधपरत्वेनाहुः । अन्ये त्वेकाडनोति तृतीयां मन्यमानाः सर्वेयमार्यी विधिपरेत्याहूः । याप्रमाणे एका अंकात अनेक कार्याच्या योजनेचा निघेध केळा आहे. परंतु क्षचित तिचा स्वीक्ारही केळा आहे. पण दुसरे टीकाकार सर्वच आर्या निभेधपर आहे असे म्हणतात. दुसरे कोणी “एकाझन' असे तृतीयेचे रूप मानून ही सर्व आर्या विधियर आहे असे म्हणतात. प्रस्तुत आर्येवरील अभिनवगुप्ताच्या टीकेचा प्रारंभीचा भाग गहाळ झाला आहे, नेहमी- प्रमाणे आर्येचे प्रयोजन सांगून प्रारंभीचे शब्द उद्धत करणारे वाक्य व दोन्ही अर्धाचा अर्थ स्पष्ट करणारी वाक्ये त्याने रचली असणार यात शांका नाही. ती नाहीशी झाली आहेत. फ्‌क्त उपसंहारात्मक वाक्य ब इतर टीकाकारांचा उल्लेख एवढाच भाग उपलब्ध आहे. - "निषिड्धम! अभिनवगुप्ताचा पाठ 'एकाळ्लें न' आहे. - 'कचित्त इ०? आयेंतील कदाचित्‌ मुळे हे विधान राक्य झाले आहे, व त्याला आर्येच्या द्रितीयाधीत आधार आहे असेही अभिनवगुप्ताचे मत दिसते. -- “एकाळून' असा तृतीयान्त पाठ बहुतेक मुद्रित प्रतींत आहे. - ।विधिपरा? म्हणजे एका अंकात अनेक कार्यांची योजना करावी असा ह्या आर्येचा अर्थ आहे. - ह्या आयेंतील “आवद्यक' शब्दाचा अर्थ भोजनादी कार्ये असाच केलेला असावा. कारण पुढील आर्येबरील टीकेच्या प्रारंभी त्यांचाच निदेश आहे. रई्ठ॑ तु ये प्रविष्टाः सर्वेषां भवति तत्र निष्काम: । बीजार्थयुक्तियुक्त॑ कृत्वा कार्य यथार्थरसम्‌ ॥ २१॥ रंगभूमीवर ज्यांचा प्रवेश झालेला असतो त्या सर्वांचे, बीजाच्या कार्याच्या योजनेने युक्त असे (व) समुचित रसांनी पूणे असे आचरण केल्यानंतर निष्क्रमण त्या प्रसंगी (अंकाच्या अंती) होते. _ यान्यवश्यंभावेन कायाणि भोजनादीनि तानि किं प्रत्यक्षेणेव दर्शनीयानीति यः शते तं प्रत्याह रद्ध त्विति । तत्रेत्यावश्यके कर्तव्ये । न चासमाप्तावुपक्षिप्ता- वान्तरकार्ये पात्रनिष्करमणमिति दर्शयाति बीजार्थेति । उपक्षेपात्मनो बीजस्य यत्मरयोजने तेन या युक्तेः संबन्धः तत्र युक्तमुपायभूतं कार्य प्रयोजनानुसारि विशिष्टरससंपदोपेतं विधाय तत्परिसमाप्ती यवनिकया तिरोधानरूपं निष्क्रमणं दर्शनीयम्‌ । बीजार्थयुक्तिरत्पत्त्युद्धाटनोद्धेदगर्भनिर्भदफलसमानयनात्मेत्यन्ये । १ नि ऱममुक्त. २ निकाव्यं. १८.२२ | ४७ अवश्य करावयाची अशी जी भोजनादी कार्ये ती काय प्रत्यक्षच दाखवावयाची अशी जो शांका घेईल त्याला उद्देशून 'रडुं तु' इत्यादी म्हणतात. 'तत्र' म्हणजे आवश्‍यक कार्य त्याच्या निमित्ताने. आणि ज्याचा उपक्षेप केला आहे असे अवान्तर कार्य समाप्त झाल्या- शिवाय पात्रांचे निष्क्रमण होऊ नये हे 'बीजार्थ-' इत्यादी शब्दांत सांगतात. उपक्षेपरूप जे बीज त्याचे जे प्रयोजन त्याच्याशी जी युक्ति म्हणजे संबन्ध त्याच्याशी युक्त म्हणजे उपायाच्या स्वरूपाचे असलेले कार्य प्रयोजनाळा अनुसरणारे व विशोष प्रकारच्या रसांच्या संपत्तीने युक्त असे रचून ते समाप्त झाल्यावर पडद्याच्या साहाय्याने अद्य होण्याच्या स्वख्पा'चे निष्क्रमण दाखवावे. दुसऱ्या टीकाकारांच्या मते बीजार्थयुक्ति म्हणजे बीजाची उत्पत्ती, उद्‌घाटन, उद्भेद, गर्भनिर्भेद व फलसमानयन यांची योजना. | इति यः राळुते' मागील आर्यातील “आवड्यक' शब्दाचा अमिनवगुप्ताने लावलेल्या अर्थामुळेच अशी शंका उपस्थित करणे शाक्य झाले आहे. - 'यत्परयोजनम? प्रयोजन ही मुळातील “अर्थ? शब्दाची व्याख्या आहे. - उत्पत्त्यु- इ०' बीजाच्या ह्या पाच स्थिती मुखादी पाच संधीत अनुक्रमे अमिव्यक्त होतात हे पुढील अध्यायात सांगितळे आहे. यानंतर बडोदे प्रतीत पुढील "कोक कंसात दिला आहे - न वहूनीह कार्याणि त्वेकाडओे विनियोजयेत्‌ । कढ ९. «५ आवदयकानां कायाणां विरोधो हि तथा भवेत्‌ ॥ हा नछोक प्रक्षिप्त आहे यात शांका नाही. मागच्या विसाव्या आर्येतल्या विधानाचीच यात पुनरुक्ती आहे. शिवाय या अध्यायातील इतर सर्व 'छोक आर्यावत्तात असता अनुष्टुम छंदातील हा क्होक मध्येच वापरला असण्याची शक्‍यता नाही. ह्या प्रक्षिप्त छोकाने मागच्या आयेतील “एका न' या पाठाला दुजोरा मिळतो. ज्ञात्वा दिवसावस्थां क्षणयाममुहूर्तलक्षणोपेताम्‌ । विभजेत्सवमशेषं पथक्प्रथक्‍्कार्यमड्ञेषु ॥ २२॥ क्षण, याम व मुहूत यांच्या विभागांनी युक्त अशी दिवसाची स्थिती लक्षात आणून (कवीने) संपूर्ण कार्याची निरनिराळ्या अंकांत निःरोष अशी विभागणी करावी. एवसितिव्रृत्तनियममक्षे प्रदर््य तदितिवृत्तकालनियमं दर्शयाति । क्षणयाम- मुहूतांनां यानि लक्षणानि कर्तव्यानि अस्मिन्‌ क्षणे संध्यानुष्टेयेत्यादीनि तैरुपेतां दिवसस्यावस्थां ज्ञात्वा सर्व कार्य प्रत्यडू सर्वात्मना पारिपूर्णरूपमत एवाशेषं विभ- जेत्‌ विभागेन दर्शयेत्‌, 'नाडिकाभिरष्ट्धा दिनं रात्रि च विभज्य छायाप्रमाणेन वा? इति । तेन एकदिवससंपादितमुपर्योगे चेष्टितमड्ठेः बध्नीयादिति तात्पर्यम्‌ । १ नि -क्काव्य-. ४८ नाट्यशास्त्र याप्रमाणे अंकामध्ये कथानकाचे नियमन दाखविल्यावर त्या कथानकाच्या कालाचे नियमन आता दाखवितात. क्षण, याम आणि मुहूर्त यांची जी लक्षणे म्हणजे कतेब्ये, या या क्षगाळा संध्योपासना केळी पाहिजे इत्यादी, त्यांनी युक्त अशी दिवसाची अवस्था लक्षात घेऊन सर्व कार्य म्हणजे प्रत्येक अंकात सर्वेतऱ्हेने परिपूणे अशा प्रकारे आणि म्हणूनच काही शेष राहाणार नाही अश्या तऱ्हेने विभक्त करावे म्हणजे त्याची विभागणी करून दाखवावी, 'नाडिकांच्या साहाय्याने दिवसाचे तसेच रात्रीचे आठ भाग करून अथबा छाये- च्या प्रमाणाने (ते करून” या वचनाळा अनुसरून. म्हणून तात्पर्य असे की अंकामध्ये एका दिवसात संपादित होणाऱ्या अशा उपयोगी चेष्टिताची रचना करावी. 'इतिवृत्तनियममडे* हे मागील एकविसाव्या आर्येत दाखविळे आहे. - 'लक्षणाने? लक्षण शब्दाचा कर्तव्य हा अर्थ अप्रसिद्ध आहे. - 'प्रत्यडू” ही मुळातील 'प्रत्येक' ची केलेली दुरुस्ती हे. 'प्रत्येकम? ने अर्थाचा बोध स्पष्टपणे होत नाही. - “नाडिकामिः इ०! हे बचन कौटिलीय अर्थशास्त्रावरू्न घेतले आहे. तेथे (१.१९.६) 'नाडिकामिरहरष्टधा रातिं च बिभजेत्‌ छाया प्रमाणेन बा? असा किंचित मिन्न पाठ आहे. राजाच्या दिनचयेंचे त्या ठिकाणी विस्तृत वणन आहे, दिवसावसानकार्य यद्य; नोपपद्यते सवम । अडून्च्छेद कृत्वा प्रवेशकेस्तद्विधातव्यम्‌ ॥ २३॥ (एका) दिवसात समाप्त होणारे कार्य जर अंकामध्ये संपूर्णपणे दाखविता येण्यासारखे नसेळ तर अंकसमाप्ती करून प्रवेशाकांच्या साहाय्याने ते दाखवावे. ननु तन्मध्ये यत्कायं मध्याह्वस्नानभोजनादि तददिवसमध्य एव वा यद्वत्तं दूरस्थ दशरथमरणादि तत्कथं वाच्यमित्याह दिवसावसानकायोमिति । दिवसे5- वसानं समाप्ति्यस्य तत्सर्वे कार्य यद्यज्थे प्रत्यक्षेण प्रदरशायितुं न युज्यते तदाडु- च्छेदं कृत्वा प्रवेशाकेः प्रदशोनीयम्‌ । अरष्टमप्यथं हृदि प्रवेशायन्तीति प्रवेशका चूलिकाडुगवताराड्वूमुखप्रवेशाकाविष्कम्भका इहाभिप्रेताः । तथा च कोहलो७्थोपक्ष पकपश्चकसुक्तवान्‌ । त्या दिवसामध्ये करावयाचे जे मध्याह्ीचे स्नान, भोजन वगैरे कार्य किंबा त्या दिवसामध्येच दूर ठिकाणची दशरथा'चा मृत्य इत्यादि जी घटना ती कशी दाखवाबया'ची या शंकेचे समाधान 'दिवसावसानकायम! या राब्दांत करतात. दिवसात अवसान म्हणजे समाप्ती ज्याची होते ते सव कार्य जर अंकात प्रत्यक्षपणे दाखविणे उचित होत नसेल तेव्हा अंकाचा शेवट करून प्रवेशकांच्या द्वारा ते दाखवावे. न दिसणारी गोष्ट सुद्धा हृदयात पोच- २८.२४ ४९, वितात म्हणून त्यांना प्रवेशाक म्हणतात. या ठिकाणी चूळिका, अद्भावतार, अड्भमुख, प्रवेशाक आणि विष्कम्भक हे अभिम्रेत आहेत. आणि त्याप्रमाणे कोहळाने हे पाच अर्थापक्षेपक सांगितले आहेत. 'अद्दुष्टमपे इ०' ही प्रवेशक शब्दाची व्युत्पत्ती आहे. - “चूलिका- इ०' मागे 'चूलिका, अज्ञावतार व अह्ठमुख ही तीन प्रकारच्या अंकांची नावे होत असे म्हटले होते व त्या मताला कोहलाचाच आधार दिला होता. प्रस्तुत ठिकाणी ह्यांना अर्थापक्षेपक मानले असून ते कोहल्मत- नुसारीच असल्याचे म्हटले आहे. वस्तुतः वर पंधराव्या आरयेवरील टीकेत कोहलाचे जे बचन च उद्धुत केले आहे त्यात अथोपक्षेपणाचाही निर्देश आहे. या आयेनंतर वडोदे प्रतीत पुढील ःहोक कंसात दिला आहे -- विप्रकृष्टं त॒ थो देशां गच्छेत्कायेबशशानुगः । पडुच ७ २ व... च ५» प्रवेदाके अड्ूच्छेंदे५थ संक्षेपान्निर्दिशेत्तं : ॥ या अर्थाचे बिधान पुढे अड्वाविसाव्या आर्येत केळे आहे. अनुष्ट्म छंदातील त्याची ही पुनरुक्ती प्रक्षिप्तच मानलीं पाहिजे हे उघड आहे. संनिहितनायको डू: कर्तव्यो नाटके प्रकरणे वा । परिजनकथानुबन्धः प्रवेशको नाम विज्ञेयः ॥ २४॥ नाटकामध्ये किंवा प्रकरणामध्ये नायक उपस्थित असलेला असा अंक रचाबा. परि- जनांमधील गोष्टींशी संबद्ध असळेळा तो प्रवेशाक होय असे जाणावे. एवमळूळक्षणं वितत्याभिहितमधेनोपसंहरन्नरधान्तरेणाडःसंधानरूपस्य प्रवेश- कस्य सामान्यलक्षणं दर्शयन्नायी पठति संनिहितनायक इत्यादि । नायकशाब्देन तच्चारेतसंभोगी तौ संनिहितो प्रत्यक्षी यत्र । एकाडटेपि रूपके5डुने नायकचरित- प्रत्यक्षताशून्यः कार्यः, किं पुनरन्यत्रेति प्रकरणे नाटके वेत्युक्तम्‌ । अन्ये त्वेत- दुत्तराधेन संबन्थयन्तो रूपकान्तराणे प्रवेशकशून्यांने भवन्तीत्याचक्षते । परि- जनेनानुबद्ध इति चतुर्णा लक्षणं सूतमागघादे*्चूलिकाडस्य स्त्रीपुरुषादेवांडुमुखो- पकरणस्य चेटीकड्चुक्यादेर्वा प्रवेशकविष्कम्भोपयोगिनः परिजनत्वात । कथयेव परस्परकछिष्टयानुबद्धो5डावतारः । यथोक्तम्‌ - अडूगन्तर एवाळधी निपतति यस्मिन्‌ प्रयोगमासाद्य । नाट्याथेकथायोगादू विज्ञेयो5ज्ावतारो5सौ ॥ इति । १ का घो वापि कतंव्यः. ५८ नाट्यशास्त्र याप्रमाणे विस्ताराने सांगितलेल्या अंकाच्या लक्षणाचा प्रथमार्घात समारोप करून द्वितीयार्धात अंकांचे संधानरूप अशा प्रवेशाकाचे सामान्य लक्षण दाखविणारी 'संनिहितनायक:' इत्यादी आर्या प्रस्तुत करतात. नायक राब्दाने त्यांचे चरित व संभोग ( अभिग्रेत आहेत, ) ते संनिहित म्हणजे प्रत्यक्ष ज्यात आहे असा. एक अंकी रूपकप्रकारात सुध्दा अंक नायकाचे चरित प्रत्यक्ष नसळेळा असा करू नये, मग इतर प्रकारांची काय गोष्ट हे दाखविण्यासाठी प्रकरणे नाटके वा? असे म्हटळे आहे. पण दुसरे टीकाकार ह्याचा उत्तराधाशी अन्वय लावून इतर ख्पकप्रकार प्रवेशकाशिवाय असतात असा अर्थ करतात. 'परिजनांनी जोड- लेळा' हे चार अर्थोपक्षेपकांचे लक्षण आहे. कारण चूलिकेचे अंग असलेळे सूत, मागध इत्यादी, अड्ूमुखाळा कारणीभूत होणारे स्री, पुरुष आदी, अथवबा प्रवेशक व विष्कम्भक यांत उपयोगी पडणारे चेटी, कंचुकी आदी हे परिजन होत. परस्परसंबद्ध अद्य कथेनेच जोडलेला. तो अंकावतार. म्हटलेळेच आहे- प्रयोगाच्या समयी नाट्यातील कथेच्या संयोगाने जेव्हा दुसऱ्या अंकात एक अंक समाविष्ट होतो तेव्हा त्याळा अड्जावतार म्हणावे.' “प्रत्यक्षताश्ून्यः याची फोड “प्रत्यक्षता 4. अश्ून्यः अशी केली पाहिजे, किंवा दुसरा पर्याय, “न नायक- इ०' असा पाठ स्वीकारला पाहिजे. हा पर्याय अधिक संभाव्य आहे. - परिजनेनानु- बद्धः” अभिनवगुप्ताचा मूळ आयेतील पाठ “परिजनकथानुबद्धः:' असा आहे असे दिसते. तो अधिक सुगम आहे. त्यानें त्या शब्दाची “परिजनानुबड्ध' व “'कथानुबद्ध' अश्ी फोड केली आहे. त्यापैकी पहिळे बचन चार अथौपक्षेपकांचे निदर्शक आहे व दुसरे अंकावताराचे असा त्याने अथ लावला आहे. “परिजनेंनानुबद्ध ह्या हस्तलिखितातील पाठाच्या जागी मुद्रित पाठ 'परिजनकथानुबन्धः' असा आहे, तो बरोबर नाही. कथेचा पुढे स्वतंत्र निदेश आहे. - अड्ठान्तरे इ०' ह्या आरयेतील वर्णनावरून असा ग्रह होतो की अंकावतार म्हणजे प्रवेशान्तर्गत प्रवेश अथवा नाटकांतर्गत नाटक (199 फश] 2 10199), असे प्रवेश प्रियदर्शिका नाटिकेत व उत्तररामचरितात आहेत. 'अड्डान्तरे अडूः निपतति” ह्याचा दुसरा काही अर्थ समाधानकारक होईलसे वाटत नाही. परंतु सर्व टीकाकारांनी व नंतरच्या ग्रंथकारांनी एका अंकाच्या शेवटचा प्रवेशच पुढील अंकाच्या प्रारंभी चाळू राहतो अशी योजना असा अज्कावतारचा अर्थ केला आहे. उदाहरणार्थ, मालविकाग्निमित्रातीलळ दुसरा अक, 01897 कापी 2 119४ ला नंतरच्या काळी गर्भाडूः अशी संज्ञा दिली गेली आहे. प्रकरणनाटकविषये पश्चाद्या द्शपरा भवन्त्यडूनः । अेडूनन्तरसंधिषु 'च प्रवेशकास्तेषु तावन्तः । २५ ॥ प्रकरण आणि नाटक ह्यांच्यामध्ये पाच ते दहापर्यंत अक असतात आणि अंकांमधील संधींमध्ये तेवढेच प्रवेशाक त्यांत असतात. १ नि -परास्तथा चेव. २ नि अडला: कतंव्याः स्युर्नानारसभावसंयुक्ताः. १८.२५५ "५१ तत्रायं प्रवेशको5डणर्थसंधानाय भवतीति पूर्वोपक्षिप्तमडुं संख्यानुवादद्वारेण . दर्शेयाति प्रकरणनाटकविषय इति । संध्यवस्थानपरिपूर्णोपानिबद्ध एवाडूण उपक्रमोप संहारवेतत्ये दश, कस्यचित्संक्षेपेण षडित्येवस्‌ । अतो न्यूनाधिकत्वसनुचित- मित्यथः । अडटुसध्येषु तु संघानाने विचित्राणि संपादयितु पश्चविधः प्रवेशकंः कार्य: । अद्भान्तरसांधिष्विति निसित्तात्‌ क्मसंयोगे सप्तमी । चो हेती । त्यांपैकी हा प्रवेशक अंकांच्या विषया'चा सांधा जोडण्यासाठी उपयोगी पडतो हे पूर्वी सांगितलेल्या अंकांच्या संख्येच्या निर्देशाने 'प्रकरणनाटकविषये' ह्या आर्येत सांगतात. संधींच्या स्थापनेने परिपूर्ण स्वरूपात रचलेल्या प्रारम्भ व दोवट ह्यांनी युक्त अशा अवस्थांचा विस्तार झाल्यासच अंक दहा होतात, कोणाचा संक्षेप झाल्यास सहा अशा प्रकारे समजावे. यापेक्षा कमीं अथवा अधिक अंक उच्ति नाहीत असा याचा अर्थ. परंतु अंकांच्या मध्ये निरनिराळया प्रकारची संघाने सिद्ध करण्यासाठी पाच प्रकारचे प्रवेशक योजावेत. 'अड्डफन्तर- संधिषु' यातीळ सप्तमी निमित्तद्वारा कर्माशी संयोग दाखविते. “च' दाब्द हेतू दाखवितो. “पर्वोपक्षिप्तमळूम? अर्थाताठी 'पूर्वोपक्षिप्तस्याडूस्य” अश्शी षष्ठी अपेक्षित आहे. - 'संध्य- बस्थानपरिपूर्णोपनिबद्धे) असे सप्तम्यन्त रूप असून ते “-वैतत्ये, चे विशेषण आहे. “अड्डा? हा राब्द त्या दोहोंच्या मध्ये न घालता “-वैतत्ये' नंतर घातला असता तर अधिक बरे झाले अतते. प्रत्येक अवस्थेच्या उपक्रम व उपसंहार अशा प्रकारच्या वाढीसाठी दोन दोन अंक आवश्यक होतात व पाच अवस्थांचे मिळून दहा अंक होतात असे अभिनवरुप्ताने वर म्हटलेच आहे, त्याचाच हा अनुबाद आहे. - 'कस्यचित्सक्षेपेण षट्‌? पाच अवस्थांपैकी एकेका अवस्थेची दोन अंकांत विभागणी आवदयक न झाल्यास अंकांची संख्या नऊ, आठ, सात, सहा व पाच होते असा अथ अमिप्रेत आहे. पण तो व्यक्त करण्यास हे विधान अपरे आहे. - “अन्यतो? हा मुळातील पाठ 'अतो? चा अपभ्रंश आहे हे उघड आहे. - 'संधानानि? ही “संधिः ची व्याख्या आहे. यानंतरचा शब्द हस्तलिखितात “बटू मित्राणि,, मुद्रितात 'घट्‌ चित्राणि? असा आहे. यातील “घटू असंभाव्य बाटतो. जर मुळातील 'तावन्तः'ची ही व्याख्या असेल तर 'पज्चप्रभति दरा? असे पाहिजे होते. पण 'तावन्तः प्रवेशाकाः'चा अर्थ अमिनवरगप्ताने पाच प्रकारचे प्रवेदाक असा केला आहे. म्हणून 'विचित्राणि? असा पाठ सुचविला आहे. चूलिकादी पाच प्रकारांनी निरनिराळ्या प्रका- रची संधाने सिद्ध होतात असे म्हणता येण्यासारखे आहे. - “अज्भान्तर- इ०? अंकांमध्ये संधान हे प्रवेशाकाच्या योजनेचे निमित्त, ते दाखविण्यासाठी सप्तमीचा उपयोग केला आहे. 'निमित्तात्कर्मसंयोगे? हे पाणिनीच्या “सप्तम्यघिकरणे (२.३.३१६)” ह्या सूत्रावरील कात्यायनाचे वात्तिक आहे. “चो देतो" हे पुढील आर्येबरील टीकेतून येथे घेतले आदे. ती टीका पहावी. | 3 ह्या आयेनंतर घडोदे प्रतीत पुढील आर्या अधिक आढळते - अनयोरन्वरविहित; प्रवेशाको $थेक्रियां समभिवीक्ष्य । संध्षेपा्थः संघिष्व्थानां संविधातव्यः ॥ ष््ऱ् नाट्यशास्त्र ही आर्या निर्णयसागर प्रतीतही आढळते. पण तिच्यावर अभिनवरुप्ताची टीका नाही, ब काही हस्तलिखितांतही ती आढळत नाही. त्यामुळे ती मूळ असण्याचा संभब कमी आहे. अडःच्छेदं कृत्वा मासकृतं घर्षसंचितं घापि । तत्सवे क्तेव्यं वर्षादूर्ध्वे न तु कदाचित्‌ ॥२६॥ अंकाची समाप्ती केल्यावर एका महिन्यात घडलेले किंवा फार तर एका वर्षात साचळेळे (जे असेल) ते सारे छवेशकाच्या द्वारे) दाखवावे; परंतु एका वर्षाहून अधिक (काळातील वृत्त) केव्हाही दाखवू नये. अपिदाब्देन प्रवेशकशब्दस्यावात्तेः सूच्यते । प्रवेशकराब्दश्व महासामान्य- वचनः पश्चसु वृत्तः, इह तु मध्यमसामान्ये प्रवेराकविष्कस्भकट्॒ये वर्तते । तदयमथंः । यस्मान्मासकृतं वर्षसंचितं वा यत्‌ तत्काये सामाजिकानां हृद्यगतम्‌, तस्मा- त्भवेशकविष्कस्भकी करतंब्यो । परिमितं तु यदनुसंघेयं तत्राइमुखम्‌, अल्पानु- संघेये चालिका, अल्पतमे5$ह्ञावतारः । तत्र केविद्‌ वनवासादयोथ्याप्रवेशान्तं रासमानुसंधानमांते संधानीयं मा भूदित्याशयेन व्याचक्षते मासेन मासाभ्यां मार्सेवर्षेंण वषांभ्यां वर्षेरेति । कदाचित्तु वर्षादूर्वंम्‌ । ये महाप्रभावाश्चिरातीत- मप्यनुसंदधते रामादयस्तेषां बहुतरो हि काल: प्रवेरकेंवर्णनीयः । ये तु पुरुषप्राया- स्तेषां वर्षादू्वमनुसंधानं नेवास्त, तथा च मार्गशीर्षी तेषीं चान्तरेण दी्घकाळयात्रा आवषारात्रान्मासाष्टकमुक्तेति संगिरन्ते ।. “अपि' राब्दाने प्रवेशाक राब्दाची पुनरावृत्ती सूचित होते. आणि प्रवेशक शब्द सामान्याचा वाचक म्हणून पाचही अर्थोपक्षेपकांचा निदर्शक, परंतु प्रस्तुत ठिकाणी तो मध्यम सामान्य जे प्रवेशक्र व विष्कंभक यांचा निदर्शक आहे. तेव्हा पुढीलप्रमाणे अर्थ आहे. ज्या- अर्थी एका महिन्यात घडलेले किंवा एका वर्षात जमा झालेले जे काये ते प्रेक्षकांच्या अंतः- करणात प्रवेश करू शकते त्या अर्थी तद्विभयक प्रवेशाक व विष्कम्मक रचावेत. परंतु अनु- संधान थोड्या गोष्टींचेच करावयाचे असेळ तेथे अडटूमुखाची योजना करावी, अल्पच अनुसंधान करावयाचे असेल तर चूलिका, अगदीच अल्प असेळ तर अड्कावतार. येथे काही टीकाकार वनवासाच्या प्रारम्मापासून अयोध्यानगरीतीळ प्रवेशापर्यंत रामाच्या अनुसंधानास अतिशय संधानाची आवश्यकता उत्पन होऊ नये अशा आहयाने 'एक महिन्यात, दोन महिन्यांत किंवा पुष्कळ महिन्यांत घडलेले, एका वर्षात, दोन वर्षांत किंबा पुष्कळ वर्षांत साचलेले' असा अथ करतात. कधी कधी एका वर्षाहून अधिक (या'चा अर्थ असा) - जे १ का कुर्यात. १८.२६ ऱ्डे रामप्रशती अति प्रभावी असून फार काळ लोटलेल्या गोष्टींचेही अनुसंधान करू शकतात त्यांच्या संबंधात फार मोठ्या कालावधीचे प्रवेशकांत वर्णन करावे. परंतु जे सामान्य पुरुष आहेत त्यांच्या बाबतीत एका वर्षाहून अधिक अनुसंधान असूच राकत नाही. तदनुसार मार्गशीर्ष पोर्णिमा व पौष पौर्णिमा यांच्या दरम्यानच्या काळात सुरू होणारी दीधेकालीन मोहीम वर्षा क्रतूच्या प्राम्मापर्यंत आठ महिन्यांची सांगितली आहे असे ते टीकाकार म्हणतात. या ठिकाणीही अभिनवभारतीचा प्रारंमीचा भाग गहाळ झाला आहे हे उघड आहे. कमीत कमी आर्येतील प्रारंभीच्या शब्दांचे अवतरण देणारे व तिचे प्रयोजन तांगाणरे वाक्‍य नेहमीप्रमाणे अपेक्षित आहे. - अपिशब्देन इ०? अभिनवगुप्ताचे म्हणणे असे की ह्या आयेंतील “अपि? शब्दामुळे मागच्या आर्येतील प्रवेशाक राब्द येथेही अध्याहूत आहे असे समजावे. “आवृत्ति म्हणजे अध्याहार. - मुळांत “आवृत्तिः सूच्यते ।' नंतर “चो देतो, असे वाक्य आहे. ते येथे चुकीने पडले आहे. ह्या आर्येत च' नाही. म्हणून ते बाक्य मागच्या आर्येबरील टीकेत घातले आहे. - (इह तु? म्हणजे अडु-च्छेद केळेला असतो तेव्हा. अंकसमाप्तीनंतर प्रवेशाक व विष्कम्मकच योजता येतात, इतर अर्थोपक्षेपक नाहो.- यत्‌? च्या जागी हस्तलिखितात 'यद्रत्‌ व मुद्रितात 'यब्चः असे पाठ आहेत. पण ते बरोबर बाटत नाहीत. “च? निर्थक आहे, व *यद्रत्‌ःला अनुरूप 'तद्वतः सारखा शाब्द पुढे नाही. म्हणून केवळ यतू असा पाठ स्वीकारला आहे. - “हृदयगतम? म्हणजे प्रेक्षकांच्या धारणाशक्तीच्या आवाक्यात असते अनेक वर्भात घडलेल्या गोष्टी एका प्रवेशकाद्रारे सूचित झाल्या तर त्यांचा बरोबर मेळ लावणे प्रेक्षकांना कठीण जाईल असा याचा अर्थ. - 'अयोध्याप्रवेद्ान्तः ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात '-प्रवेशान्तर॑ व मुद्रित पाठ “-पवेश्यानन्तर॑' असा आहे. पण अन्तर किंवा अनन्तर यांचे अर्थ येथे लागू पडण्यासारखे नाहीत. अन्त हेच संभाव्य आहे. - “अति तंधानीयं' हा हस्तलिखितातील पाठ आहे. छापलेला पाठ अनुसंधनीयं? आहे. पण अर्थासाठी “अति? आव्यक आहे. आणि अनुसंधान अनुसंधनीय होऊ नये म्हणून अश्या तऱ्हेचा अर्थ अभिप्रेत असण्याची दाकयता नाही. “संधानीय? म्हणजे जोडणी करणे आवश्यक असलेले, - 'वर्षादूर्थ्वम? यानंतर मुळात आणखी एक “तु? आहे, पण तो चुकीने पडलेला दिसतो. - 'रामादयः? ही मूळातील 'रामादेः? ची दुरुस्ती आहे. षष्टींचा काही अन्वय लावता येण्या- सारखा नाही, आणि 'महाप्रभावा!? ह्या विरोषणासाठी प्रथमान्त विशेष्य आवदयक आहे. ह्या टीका- कारांचे म्हणणे असे की राम वगेरेंच्या बाबतीत एका प्रवेशकात अनेक वर्षोत घडलेल्या गोष्टींची सचना करावयास हरकत नाही. कारण त्यांचा प्रभाव फार मोठा होता. सामान्य नायकांच्या बाबतीत मात्र एक वर्षाचा नियम मोडू नये. आर्येतील 'कदाचित्तु इ०' बचनाचा त्यांनी हा असा अर्थ लावला आहे. - 'मा्गशीर्षी इ०? : कौटिलीय अर्थ्यास्रातील (९.१.४०,५२) वचनांचा आधार घेऊन हे विधान केले आहे. राजाची मोहीम जास्तीत जास्त आठ महिने टिकते. यावरून असे अनुमान केले आहे की एक वर्षाहून अधिक काळातील घडामोडींची संगतवार जोडणी करता येण्यासारखी नाही. हे अनुमान अर्थातच बरोबर नाही . एत्चासत्‌ । मासवर्षादीनां स्वीकूतनियतपरिमाणानां द्विवचनबह्दवचनान्तत्वे वृत्त्ययोगस्य दाशितत्वात । ष्ट नाट्यशास्त्र सोयंके मासजाते च परिमाणं स्वभावतः । उपाधिभूतमाश्रित्य संख्याभेदेन वर्तते ॥ वयन्त्विते पारिच्छेदः क्रियते$पि न गस्यते । इष्टभेदाहते तत्र परिमाणमनर्थकम्‌ ॥ इत्यादि बहु च । वरषांदूर्थ्वेमिति च निबेधः फल्गुफळ एव स्यात । तस्मादेकवच- नान्तेनेव समासः । न च रामायणभारतादिचरितत्यागप्रसड्ठः । कार्यग्रहणं ह्यतद्थ सुनिना कृतं, यत्र हि यत्ननिष्पाद्यं सोवितं तदेव वर्ष गण्यते, वषांन्तराणि तु तत्र विद्यमानान्यापे अविद्यमानकल्पानि । रामचरिते हि चतुददावर्षाण्यरण्यादिवासो यद्यापे, कार्यवषाणि त्रिचतुराणि भवन्ति यत्र मारीचवधसुग्रीवराज्यदानाद्यवान्तर- कार्य संभवाति । तस्मादर्षादूर्थ्वमित्यनेन कार्यवर्षद्दयादि. निषिध्यत इति । एवं वर्षेसहस्त्रायुषो5पि वर्षशतान्तरालवूत्तचरितन्याख्याने$पि न किंचिदू दुष्यति । तेन पश्वाळले नाटके पश्च कार्यीदेनानीति संक्षेपः, दशाह्वे दशेति विस्तरः । परंतु, हे मत चूक आहे, कारण ज्यांचे निश्चित परिमाण सर्वमान्य झाले आहे अशा मास, वर्धे इत्यादींचा द्रिवचनान्त किंवा बहुवचनान्त ख्पात वत्तीशी संबंध नसतो असे दाखवून दिलेळे आहे - सूर्याच्या गतीने उत्पन्न झालेल्या मासाचे परिमाण स्वभावत:च निश्चित असते, उपाधीच्या स्वरूपात असणाऱ्या गोष्टींच्या आश्रयाने त्याच्या संख्येत भिन्नता येते. वयं तु असा परिच्छेद केला गेळा जातो, पण तो पटत नाही. इष्ट असलेल्या भेदावाचून परिणाम निर्थक होय! व*ैरे आणखी बरेच. शिवाय, भर्षादूरध्वम्‌! यात निदेंशिठेल्या निषेधाचे अत्यंत अल्प फल मिळेल. म्हणून एकवचनानेच समास सोडविला पाहिजे. आणि त्यामुळे रामायण, भारत आदोतील चरितांचा त्याग करण्याचा प्रसंग येईल असेही नाही. कारण, कार्यशब्दाचा वापर भरतमुनीने पुढील उद्देशाने केला आहे. ज्यात यत्नाने निष्पन्न होणाऱ्या गोष्टी घडतात त्याच वर्षांची गणना करतात, इतर वर्षे तेथे असली तरी नसल्यासारखीच. कारण रामचरितात जरी चोदा वर्षेपर्मत अरण्य आदीत निवास आहे, तरी कार्यवर्षे अशी तीनचारच आहेत की ज्यांत मारीचवध, सुम्रींवाळा राज्यदान इत्यादी अवा- न्तरकार्ये संभवतात. म्हणून 'वर्षादूर्ध्वम? इत्यादी वचनाने दोन कार्यवर्गे आदीचा निषेध केला आहे. याप्रमाणे हजार वर्षांचेही आयुष्य असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत शंभर वर्षांचा दर- म्यानचा काळ असलेल्या चरिताचे दर्शन घडविण्यात काही दोष नाही. म्हणजे अर्थ असा की पाच अंकी नाटकात पाच कार्यदिवस असा संक्षप आणि दहा अंकी नाटकात दहा असा विस्तार. 'द्रिवचन- इ०? दुसऱ्या टीकाकारांनी “मासेन कृतम? 7 मासाभ्यां कृतम्‌, 'मासैः कृतम्‌ इत्यादी विग्रह केळे होते, त्यांपैकी द्रिवचनाने व बहुवचनाने केलेले विग्रह अग्राह्य होत, कारण त्या स्वरूपात १ ट्‌ ब 4 $। | र्क पड त्या शब्दांचा वृत्तीशी योग होत नाही. वृत्ति म्हणजे प्रस्तुत ठिकाणी समासात योजना . असा अर्थ आहे. - 'दर्शितत्वातः कोणी दाखवून दिळे आहे म्हणजे पुढील अवतरण कोठून घेतले आहे ते सांगता येत नाही. - 'मासजात? याचे मातांचा समूह किंबा प्रत्येक मास असेही अर्थ होऊ शकतील. - 'उपाधिथूतम? उपाधि म्हणजे अशी गोष्ट की जिच्यामुळे मास दोन किंवा अधिक होतात. त्यावेळेत मास शब्द द्रिवचनान्त किंबा बहुवचनान्त समजता येईल असा अर्थ दिसतो. - वयं त्विते इ० हे कश[वित्र्‍रयी आहे ते सांगता येत नाही. - 'इष्टमेदादते! इृष्टभेद म्हणजे उपाधीमुळे उत्पन्न झालेला संख्य[भेद असा अर्थ असावा. - 'कार्यम्रहण? वस्तुत: प्रस्तुत आर्येत 'कार्य' शब्द वापरळेलाच नाही. 'मासकृतं बर्षसंचितम? यानंतर तो अध्याहृत धरावा लागतो. -- 'अरण्यादिवास:? यातील “'आरदि'ने किष्किन्था, लळा वगेरे तमजता येईल. मुद्रिताप्रमाणे 'अरण्यनिवासो? अद्या पाठाची आव्यकता नाही. - 'कार्यवर्षाणिः असा सामासिक शब्द ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितातील कार्ये) किंबा मुद्रितातील 'कार्यः या स्वतंत्र शब्दांचा अन्बय लावता येण्यासारखा नाही. आणि कार्यवर्ष म्हणजे काय हे यत्र मारीचवध- इत्यादी शब्दांत सांगितले आहे. -- 'पन्च कार्यदिनानि? वस्तुतः 'ार्यवर्षाणि? असे अपेक्षित आहे. कारण, प्रवेशकाचे बिवेचन आहे, प्रत्येक प्रवेशकात एक कार्यवर्षांचा वृत्तान्त ब जितके अंक तितके प्रवेशाक ह्या हिद्योबाने पाच कार्यवर्षे होतात. पण प्रवेद्षाक ज्या दिंवशी घडतो तो कार्यदेन असे समजता येण्यासारखे आहे. तथापि प्रत्यक्ष अंकांत एकेक कार्यदिन असाही अर्थ ' अभिप्रेत असण्याची राकयता आहे. यः कश्चित्कार्यवशादगच्छति. पुरुषः प्रकृश्मध्वानम । __ तत्राप्यड्ठूच्छेदः कतेव्यः पूर्ववत्तज्जेः । २७॥ _ जर कोणी मनुष्य कार्याच्या निमित्ताने दूरच्या प्रवासाला जात असेल तर त्या ठिकाणीही तज्ज्ञ कवींनी पूर्वीप्रमाणे अंकाची समाप्ती करावी. र अडडूच्छेदे निमित्तान्तरमप्याह यः कश्चित्कार्यवशादिति । कार्यवशात्का- यस्य तत्रायत्तत्वात्‌ यः पुरुषी नायक: सो नेकयोजनव्यवहितमध्वानं-यदा. गच्छति. तदा प्रतिदिन गमनं विश्रान्तिः शय्या इत्येवमादि कथं रद्धे प्रदश्‍योमिति तदन्ते- नाडूनच्छेदः कार्य: । डिमादिनायकस्य तु दिव्यस्याकाशयानकारडिना सर्व युज्यते । अनायकपुरुषस्त्वविच्छिन्न एवा: निष्करामति । ननु 'दिवसावसानकार्य यद्ध नोपपद्यते' इति, 'आवड्यकाविरोघेन! इत्यादिना यदुक्तं ततस्तिलमात्रेणाप्याधिकं वाच्यमस्य न लभ्यते वाक्यस्य । अत एवैतत्‌ भट्टलोहुटाचेर्न पठितमेव । उपाध्या- यास्त्वाह: ।नेदं निमित्तान्तरम अपि तु पूर्व तावत्कथितं 'यद्यड्ठ नोपपद्यते' इति, तस्येवोदाहरणमनयेवार्यया दर्गितस, यथा नायकस्य प्रकृष्टाध्वगमनमिति । पूर्व- वर्दिते. तद्हीमिति बातेः । पूवलक्षणार्हो5डूःच्छेदो5यामिति यावत्‌ । आपिदाब्द उदाहरणान्तरमपि सूचयति । | ८६ नाट्यशास्त्र अंकांची समाप्ती करण्यासाठी दुसरे निमित्त 'य: कश्चित्कार्यवशात? इत्यादी शब्दांत सांगतात. कार्यवशात्‌ म्हणजे कार्य त्यावर अवलंबून असल्यामुळे जो पुरुष म्हणजे नायक अनेक योजने दूर असलेल्या प्रवासाला जेव्हा जातो तेव्हा दररोजचा प्रवास, विश्रान्ती, शय्या इत्यादी गोष्टी रंगभूमीवर कशा दाखविता येणार म्हणून तेथेच अंकाची समाप्ती करावी. परंतु डिम आदी ख्पकप्रकारांच्या नायकांच्या संबंधात आकाशयान वगैरेंच्या मुळे सर्वे काही संभवते. जो नायक नाही असा पुरुष अंक संपलेला नसताही निष्क्रमण करू शकतो. यावर आक्षेप असा की 'दिवसावसानकार्यम्‌! इत्यादी व 'आव- रयकाविरोघेन? इत्यादी वरीळ आयांत जे सांगितळे आहे त्यापेक्षा तिळभरसुद्धा अधिक अथ ह्या वाक्‍यातून मिळत नाही. म्हणूनच भड्टळोछुटप्रभ्रतींनी ही आर्या गाळली आहे. परंतु आमचे युरुजी भट्ट तोत म्हणतात की हे दुसरे निमित्त सांगितलेले नसून पूर्वी 'य॒द्यड्ू' नोपपद्यते' यात जे सांगितले आहे त्याचेच उदाहरण ह्या आर्येत दिले आहे, उदाहरणार्थ नायकाचा दूरवरचा प्रवास. 'पूर्ववत्! यात वत प्रत्यय “त्याला लायक' अद्या अर्थी लावला आहे. पूर्वी केलेल्या लक्षणाळा धरून हा अंकच्छेद आहे असा अर्थ. 'अपि' शब्दाने दुसरी उदाहरणे सुद्धा सूचित होतात. यदा? नंतर “'गच्छति तदा' हे शब्द मुळात नाहीत. पण अर्थासारी आवद्यक म्हणून ते घातले आहेत. तसेच पुढे मुळातील 'प्रद्थःच्या जागी “प्रदर्येमितिः असा पाठ स्वीकारला आहे. त्यानेच अर्थतंगती लागते हे उघड आहे. - 'निष्कामति? म्हणजे दूरच्या प्रवासाला जाण्या- साठी म्हणून निष्कमण करंतो. - 'दिवतावसानकार्ये इ०' ही बरील तेवितावी आर्या आणि 'आवड्यकाविरोधेन इ०' ही बिताबी. मुळात 'यद्य्रे नोप-चा 'केनोप- असा भ्रष्ट पाठ झाला आहे. -- 'तदर्हमिति बतिः? च्या जागी 'तदर्हमिति भवति? असा मुद्रित पाठ आहे. त्याचा काही अर्थ लागण्यासारखा नाही. 'तदर्हम? हे पाणिनीचे सूत्र (५.१.११७) आहे. त्या सुत्राप्रमाणे एखाद्या गोष्टीला पात्र असल्याचे दाखविण्याकरिता त्या गोष्टीच्या वाचक शब्दाला “बतू? प्रत्यय लागतो. म्हणजे 'पूर्ववतः चा अर्थ 'पूर्वीप्रमाणे? एवढाच नसून 'मागे केलेल्या लक्षणाला अनु- सरून' असा समजावयाचा आणि म्हणून प्रस्तुत आर्येत अंकच्छेदाचे एखादे नवीन निमित्त सांगितठेळे नाही असे भट्ट तोताचे म्हणणे आहे. अड्ठन्तरानुसारी संक्षपार्थमधिकृत्य बिन्द्नाम । प्रकरणनाटकंबिषये प्रवेशकः संविधातव्यः ॥ २८ ॥ प्रकरण आणि नाटक ह्यांमध्ये (पूर्वीच्या) अंकातील घटनांच्या पश्चात होणाऱ्या (व) बिंदूंच्या संक्षिप्त प्रयोजनासंबंधी असलेल्या प्रवेशाकाची योजना करावी. १ घो -घिकारी. २ घो -पमयाधिकृत्य सन्धीनाम्‌. २ नि -विषयप्र- ४ का -को भवति काव्येपु. १८.२८ "५9 अड्टार्थसंधानप्रयोजनस्य प्रवेशकस्य स्थानं वाच्यं विषयं चाह अ्ठान्तरानु- सारीति । अडूमध्ये भवतीति यावत । अडुनन्तर॑ पूर्वाडान्तरमनुसरति तस्य पश्चाड्ठवतीत्य्थेः । प्रत्यक्ठान्तं यो बिन्दुः अनुसंधानाभिधायि वाक्यं तस्य यत्सं- क्षिप्तं प्रयोजनं तदथिकताकरणं विस्तारमुदिश्‍्य, इति वाच्यमुक्तम्‌ । प्रकरणे नाटके अवश्यं प्रवेशकः कार्यः । तस्यावऱ्यमुत्तमभप्रकृतिविषये उपदेशाय प्रवृत्ती पॉरोमेतेनोपायेन भूयस्तरावान्तरकार्ये प्रत्युत्पत्तिः । बहूनां चामात्यादीनामपि स्वकार्यानेरूपणाय प्रवेशकः । अन्यत्र रूपके परोमेतकार्योपदेशात्‌ न तथा प्रवेशकोपयोग इति वितनिष्यामः । अंकांच्या विषयाची जोडणी करणे हे प्रयोजन असणाऱ्या प्रवेशाकाचे स्थान आणि त्यात सांगावयाचा विषय हे 'अड्भान्तरानुसारी' इत्यादी आर्येत सांगतात. दोन अंकांच्या मध्ये प्रवेशक असतो हे तालर्य. अज्कान्तर म्हणजे अगोदरच्या अंकाचे अंतर, त्याळा अनुसरतो म्हणजे त्याच्या नंतर होतो तो असा अर्थ. प्रत्येक अंकाच्या शेवटी जो बिन्दु म्हणजे अनुसंधान व्यक्त करणारे वचन त्याचे जे संक्षिप्त प्रयोजन, त्याची वृद्धि, विस्तार, ह्यांच्याविषयी -- यात प्रवेशकाचा वाच्य विषय सांगितला आहे. प्रकरण आणि नाटक यांत प्रवेशक अवश्य योजावा. ते (नाटक व प्रकरण) उत्तम प्रकृतीच्या पुरुषांच्या विषयात उपदेश करण्यास प्रवृत्त झाले असता तो प्रवेशक थोडक्या उपायाने खूप मोठ्या अवान्तर- कार्याचे ज्ञान अवश्य देतो. आणिं अमात्यप्रश्रती पुष्कळ व्यक्तींनाही त्यांच्या स्वतःच्या कार्याच्या निरूपणासाठी प्रवेशक उपयोगी पडतात. इतर रूपकप्रकारांमध्ये फक्त परिमित कार्याचाच उपदेश असल्यामुळे प्रवेशकाचा तसा उपयोग नाही हे आम्ही विस्ताराने सांगणार आहोत. 'बाच्यं' हे 'विषयंश्चे विशोषण आहे. - 'अड्डुमव्ये इ०! या ठिकाणी बाक्‍्यांची उलटापालट झाली आहे असे दितते. प्रस्तुत वाक्‍य पुढील “अड्कान्तरं इ०' वाक्‍्यानंतरच उचित दिसेल. -- 'बाक्‍यं? ' नंतरचे तस्य मुळात नाही. पण आरयेतील 'बिन्दूनाम्‌ संक्षेपार्थमधिकृत्य? या शब्दांची येथे व्याख्या केली आहे. तेव्हा बिन्दु शब्दाचा अर्थ सांगितल्यावर त्या शब्दातील षष्ठीचा निदर्शक 'तस्य? हा शब्द आबइ्यक आहे. - 'प्रयोजनं' ही मुळातील, 'अर्थ' ची व्याख्या आहे. 'तदधिकताकरणं बिस्तारम्‌ उद्दिश्य? ह्या शब्दांत मुळातील 'अधिक्ृत्य*ची व्याख्या केली आहे. “तत्‌? म्हणजे प्रयोजन. - कार्यः हा दाग्दही मुळात नाही. पण आरयेतील 'संविधातव्यः'चा अर्थ व्यक्त करणारा एखादा शब्द आवश्यक आहे. त्याशिवाय वाक्य अपुरे राहाते. - “तस्यावर्यम? या दोन शब्दांचा अन्बय 'परिमितेन. - परत्युत्पत्तिः” याच्याशी लावाबयाचा. मधले 'उत्तमप्रकृति- -.प्रव्तो दे शब्द नाटक व प्रकरण यांच्या संबंधात बापरे आहेत. या दोन्हीमध्ये उपदेश करण्याची प्रवृत्ती असते. मुद्रितातील '5परिमितेन? बरोबर नाही. प्रवेशकात परिमितच उपाय असतात. - 'प्रत्युत्पत्तिः' असा स्वतंत्र शब्द आवइयक आहे. मुळातल्याप्रमाणे 'प्रत्युत्पत्तिबहूना' असा सामासिक शब्द असंभाव्य आहे. प्रत्युत्पत्ति ष्ट नाट्यशास्त्र म्हणजे ज्ञान, . बोध. - “बहूनां च इ०? या वाक्याचे प्रयोजन असे दिसते की नाटक व प्रकरण यांतील प्रवेश्यकांमध्ये अमात्यप्रभरती अनेक प्रकारच्या पात्रांचे चरित पहावयास मिळते, त्यापासू- नही बोध होऊ शकतो. नोत्तममध्यमपुरुषराचारितो नाप्युदात्तवचनकृतः । प्राकृतभाषाचारः प्रयोगमाश्रित्य कर्तव्य: || २९॥ उत्तम व मध्यम प्रकृतीच्या पुरुषांचे प्रवेश नसलेळा, तसेच उदात्त अशी क्‍्चने सुद्धा नसलेला (ब) भाषा आणि आचरण प्राकुत असलेला (असा प्रवेशाक) प्रयोगासाठी योजावा. अथ विष्कस्भकाद्धेदमस्य दर्शयन्‌ प्रवेशकशब्दो 5तिविशेषवारच्यापे भवतीति दर्शयति नोत्तममध्यमपुरुषैरिति । उत्तमादयो5पि भवन्ति परिजनास्तन्रिवृत्त्यथ- मेतत्‌ । उदात्त संस्कृतं वचनं तस्य निषेधः । अन्ये त्वाहः उदात्तं स्वात्मकायं- विश्रान्तं वचनं निषिध्यते । 'आणत्तामे भट्टिदारिआए' इत्यादिना हि स्वकृत्यं प्रधानोपयोग्येव दर्ड्यंते, न स्वतन्त्रम्‌ । प्राकृता भाषा आचारश्य व्यवहार: प्राकूत एव । प्रयोगमातश्रित्येति क्वचित्तु प्रयोगवशात्संस्कृतभाषाचारो विष्कम्भको५पि कर्तव्य इति दरशयाति । | | आता विष्कम्भकाहून ह्याची मित्नता दाखवून प्रवेशक शब्द एका विशिष्ट प्रकाराचा सुद्धा वाचक होतो हे 'नोत्तममध्यमपुरुषेः' ह्या आर्येत दाखवितात. उत्तम आदी पुरुष सुद्धा परिेजन असतात त्यांच्या निवारणासाठी हे विधान आहे. उदात्त म्हणजे संस्कृत वचन, त्याचा निषेध केळा आहे. पण दुसऱ्या टीकाकारांच्या मते उदात्त म्हणजे आपल्या स्वतःच्याच कार्याविषयी असळेळे वचन, त्याचा निषेध केळा आहे. 'राजकुमारीने मळा आज्ञा केळी आहे' इत्यादी चेटीच्या क्‍्चनात तिचे स्वतःचे कार्य मुख्यकार्याळा उपयोगी असे दाखविले आहे, स्वतंत्र असे नाही. प्राकूत भाषा आणि आचार म्हणजे व्यवहार सुद्धा प्राकतच. प्रयोगमाश्रित्य' याने कधी कधी प्रयोगाच्या निमित्ताने संस्कृत भाषा व आचार असलेल्या विष्कम्मकाची सुद्धा योजना करावी असे दाखविळे आहे. 'अतिविशेषबाच्यपि' मुळात “विशेष' नंतर “शब्द? शब्दाची पुनरावृत्ती आहे. ती लेखन- दोषामुळे झालेली दितते. शेवटचा शब्द हस्तलिखितात 'बाच्य' असा आहे. तो' बरोबर नाही. वाचक या अर्थाचे “बाची असे पुल्लिंगी रूप आवश्यक आहे. ह्या समासातील: “अति? शब्दाचे काही प्रयोजन दिसत नाही. - “'आणत्त म्हि इ०? हे नागानन्द नाटकाच्या पहिल्या अंकांच्या १ नि प्रवेशको नाम विज्ञयः, का प्रयोगमासाद्य कर्तव्य:. . १८.३० परर भू नंतरच्या प्रवेशकातील चेटीचे बचन आहे. - “न स्वतन्त्रमः ह्याचे अगोदर भुद्रितात 'तत्रः हा राब्द अधिक आढळतो. तो निरर्थक आहे. - 'प्राहता? मुळात 'प्राकृती' असे रूप आढळते. पण ते बरोबर नाही. - 'विष्कम्भको5पि वस्तुतः नाट्यशास्त्रात नाटकात विष्कम्मकाची योजना करावी असे म्हटलेळे नाही. कालोत्थानगतिरसौ व्याख्यासंरम्मकार्यनिषयाणाम्‌ । अर्थामिधानयुक्तः प्रवेशकः स्यादनेकाथः ॥३०॥ हा प्रवेशक कालाची उपस्थिती दाखविणारा, व्याख्या, संरंभ, कार्य आणि विषय ह्यांच्या अर्थाच्या निर्देशाने युक्त (व) अनेक प्रयोजने साध्य करणारा असा असावा. 'संक्षेपार्थमधिकृत्य' इति यदक्तं तदेव विभजति कालोत्थानगंतिरसाविति । काळोत्थानस्य गतिरवगमो यतः काळीदयसूचकः कश्चित्मवेशकः । यथा, “अज्ञ वसंतमहूसवे सबहुमाणमाहूय' इत्यादि । अर्थाभिधानेति प्रत्येकं संबध्यते, तेन व्याख्यादानां विषयान्ताणां चतुर्णा यो$्थस्तदभिधाने युक्तस्तदुद्देदोन प्रत्चत्त इति पश्चप्रकारः प्रवेशक इति यावत्‌ । व्याख्यायत इति व्याख्या । तथा हि केनचित्पंवे- शकेन गूढो$र्थो व्याख्यायत इत्यर्थः । यथा तापसवत्सराजे अमात्यप्रणिधिः 'भामिज्ञह असवासएहि हालाहलस्स पमादसॉकेदेहि' इत्यादि । अनेन हि नातिव्य- वधानोक्त पझ्ावतीग्रृहे . यद्वासवदत्तास्थापनं तस्य ग्रूढं प्रयोजनं व्याख्यातम । संरम्भः कार्यविशेषे अभिप्रायः तस्यार्थ उपायान्वेषणादि तदभिधानयुक्तः प्रवेशकः । यथा व्ृत्तचारे 'गति. . .उपस्थितमिदं तत्प्रयोजनम' इत्यादि । अनेन वासवदत्तामपह्ृत्य उज्ञायेनीतो निनीषोवंत्सेशस्य प्रयोजकत्वं प्राप्तानाममात्यानां संरम्भः शालडञायनेनोक्तः । कार्य तु 'यदाधिकारिकम? इत्यादि, तस्यार्थ: पश्चाडुस्यानुष्ठानम्‌ । तद्यथा - कमणामारम्भोपायः पुरुषद्रव्यसंपदू देदाकाल- विभागः विनिपातप्रतीकारः कार्यसिद्धिरिति । तथाभूताभिधानयुक्ताश्व प्रवेदाका बाहुल्येन तापसवत्सराज-प्रतिभाचाणक्य-मुद्राराक्षसादिषु । विषयस्तु भाविनो५- क्ञावतारस्येतिब्ृत्त॑ तस्यार्थो विशेषरूपः तदमिधानेन युक्तः प्रवेशकः । यथा नागानन्दे द्वितीये5ड्रे चेटिकादयेन मदनावस्थेतिवृत्तस्य विशेषकवर्णनं चन्दनलता- गृहादि दरशितम्‌ । अन्यान्यपि प्रवेशकस्य प्रयोजनानि सन्ति, नं त्वेतत्पारिगण- नमित्याह अनेकार्थ इति । | | १ घो कालार्थान्तर-- २ नि व्यत्यासारम्भ-. ३ नि -पूर्व:. ९० नाट्यशास्त्र “तक्षेपाथमधिकृत्य' असे जे वर म्हटळे आहे त्याचीच विभागणी 'कालोत्थानगतिरसी' इत्यादी शब्दांत करतात. कालाच्या उत्थानाची गति म्हणजे ज्ञान, ज्यामुळे एखादा प्रवेशक कालागमना'चा सूचक होतो. उदाहरणार्थ 'आज वसन्तमहोत्सवाच्या निमित्ताने बहुमानपूर्वक बोळावून' इत्यादी. 'अर्थामिधान'चा प्रत्येकाशी अन्वय होतो, म्हणून व्याख्येने प्रारम्भ होणाऱ्या व विषयाने शेवट होणाऱ्या चार गोष्टींचा जो अथे त्याचे अभिधान करण्यासाठी युक्त म्हणजे त्या उद्देशाने प्रवृत्त झालेला - अशा रीतीने पाच प्रकारचे प्रवेशक होत असा एकूण अर्थ, जिने काही स्पष्ट केले जाते ती व्याख्या. म्हणजे एखाद्या प्रवेशकाने गूढ गोष्ट स्पष्ट केली जाते. उदाहरणार्थ, तापसंवत्सराज नाटकात अमात्यप्रणिधि म्हणतो “हाळाहला'चा प्रमाद घडेळ अशी शांका असलेले सचिव त्याच्या जवळजवळच फिरतात' इत्यादी. यात अगदी थोडक्या'च वेळाने होणारा वासवदत्तेचा पद्मावतीच्या गृहात निक्षेप, त्याच्या गूढ प्रयोजनाची व्याख्या आहे. संरम्म म्हणजे एखादे विशिष्ट कार्य करण्याचा मानस, त्याचा अर्थ म्हणजे उपायांचा शोध इत्यादी ते सांगणारा प्रवेशक. उदाहरणार्थ, वृत्तचार नाटकात धाति.... .... ते हे प्रयोजन उपस्थित झाळे आहे' इत्यादी. यात वासवदत्तेचे हरण करून उज्जयिनीहून तिला घेऊन जाण्याची इच्छा करणाऱ्या वत्सराजाला प्रयोजक झालेल्या अमा- त्यांचा अभिप्राय शाळडूगयनाने बोळून दाखविला आहे. कार्य म्हणजे आधिकारिक वरे. त्याचा अर्थ म्हणजे पाच अंगांचे अनुष्ठान. ती अंगे अशी - कार्याच्या आरंभाचे उपाय, पुरुष व द्रव्य या साधनांची संपत्ती, देश व काळ यांची समुचित योजना, संकटनिवारण आणि कार्यसिध्दी. तशा स्वरूपाच्या अभिधानाने युक्त असे प्रवेशक तापसवत्सराज, प्रतिभा- चाणक्य, मुद्राराक्षक आदी नाटकांत पुष्कळ आहेत. विषय म्हणजे नंतर होणाऱ्या अंकातील वृत्तान्त, त्याचा विशेष स्वरूपाचा अर्थ, त्याच्या अभिधानाने युक्त असा प्रवेशक. उदाहरणाथ, नागानन्द नाटकातील दुसर्‍या अंकात मदनावस्थारूप घटनेचे दोन चेटींनी चन्दन, लतागृह इत्यादींनी विशेष दाखबिणारे वर्णन केले आहे. प्रवेशाकाची इतरही प्रयोजने असतात, येथे त्या सर्वाची यादी दिलेली नाही हे 'अनेकाथे:' या शाब्दाने सांगतात. 'कालोत्थानस्य गतिरवगमः' यात समास सोडवून 'गति' शब्दाचा अर्थ दिला आहे. म्हणून हस्तलिखितातील 'कालोत्थानगतिः' अता सामासिक शब्द किंबा मुद्रितातील “'कालोदयस्य गति: असा पाठ दोन्हीही बरोबर नाहीत. कालोद्य असा अर्थ नंतर दिला आहे. - 'अज्ज बसंत- इ०' हे रत्नावली नाटिकेत प्रस्तावनेतील सूत्रधाराचे बचन आहे. नाटिकेच्या प्रयोगाचा काळ त्यात निर्दिष्ट आहे. - 'गूढो' नंतर “अर्थ? शब्द आवद्यक आहे. मुळात तो नाही. - “तापसवत्सराजे' या नाटकातील चौथ्या अंकाच्या प्रारंभीच्या मिश्रबिष्कम्मकातील सिद्धार्थक नावाच्या अमात्यांच्या गुप्तचराचे (प्रणिधीचे) हे शब्द आहेत. या प्राकृत छोकातील पाठ भ्रष्ट आहे. पण त्याचा आशय असा आहे की उदयनाने आत्महत्येचा प्रयत्त करू नये यास्तब रूमण्बत आदी सचिब त्याच्या भोवतीभोवती असतात. - 'गूढे प्रयोजनं' म्हणजे बासबदत्तेने आत्महत्या करू नये हे. - 'वृत्तचारे' असे हस्तलिखितात आहे. मुद्रितात 'नुत्तपारे (पाठभेद नृत्तवारे)' १८.३१ | ६१ असे आहे. या नाटकाविषयी काही माहिती उपल्ब्ध नाही. -- 'उज्जयिनीत ही मुळातील 'ठज्जयिनीं, ची केळेली दुरुस्ती आहे. ती आवश्यक आहे हे उघड आहे. वातबदत्तेला पळवून कौशाम्बीला नेले, उज्जयिनीला नाही, - 'प्रयोजक' म्हणजे तसे करण्याम वत्सराजाला प्रवृत्त करणारे. अमात्य म्हणजे यौगन्धरायणप्रभती. -- शालड्लायन हे प्रद्नोताच्या मंत्र्याचे नाव, -- 'वदाविकारिकमू” म्हणजे नाटकांतील प्रधान कथानक. त्याचे वर्णन पुढे १९.३ ह्या 'छोकात केळे आहे. -- 'कर्मणामारम्मोपायः इ०' हे कौटिलीय अर्थशास्त्रावरून (१.१५.४२) घेतलेले वचन आहे. -- 'प्रतिभाचाणक्य? हे नाटक अज्ञात आहे. - विशेषकवर्णनम्‌? मुद्रितात “विशेषवर्णनम व असे आहे. पण विशेषता स्पष्ट करणारे या अर्थी विशेषक शब्द अधिक समुचित वाटतो. बह्वाश्रयमपि कार्य प्रवेशकेः संक्षिपेच संधिष बा । बहुचूर्णपदैर्युक्त॑ जनयति खेदं प्रयोगस्य ॥ ३१ ॥ आणि पुष्कळ घटनांशी संबद्ध असलेले कार्य सुद्धा प्रवेशाकांच्या द्वारा किंवा संधी- मध्ये संक्षितत रूपात दाखवावे; (कारण,) पुष्कळ गद्य वचनांनी युक्त असे नाट्य प्रयोगात कंटाळा उत्पन्न करते. नन्वेवंभूतो5र्थो यः प्रवेशके प्रदश्यत समासेन विस्तरेण वेत्याशट्डन्याह बहाश्रयमपीते । संधिष्विति अक्लार्थसंधाननिमित्तं ये प्रवेशकाः पक्चाप्युक्ताः चूलिकादयस्तेर्वा अड्भाश्रयं बहू वक्तव्यं विततमपि कार्य संक्षिपेत्‌ यावत्संघानो- प्योगे तावत्तत्र त्र्‍यात्‌ । यतो बहुभिर्गद्यगतैरसमस्तैः पदैरसंस्कृतप्राये: खेदो भवति । अनेन प्रवेशकादो उत्कलिकाप्रायं बहुतरसमाससंकीर्णमभिनयशाखाडु- चोटनकारित्वात समाससंशयेनार्थानिश्वायकत्वाच्च न कर्तव्यमिर्त्यापे दर्शरयाति । अशा प्रकारचा अर्थ जो प्रवेशकात दाखविला जातो तो थोडक्यात मांडावयाचा का विस्ताराने या शंकेचे समाधान “बह्वाश्रयमपि' इत्यादी शब्दांत करतात. 'संधिषु' म्हणजे अंकांतील अर्थाचे संघान करण्यासाठी म्हणून जे चूलिका आदी पाचही प्रवेशक सांगितले आहेत त्यांत अंकाच्या आश्रयाने असलेले सुष्कळ सांगण्यासारखे म्हणजे विस्तृत असलेले सुद्धा कार्य संक्षिप्त स्वरूपात दाखवावे, जेवढे संधानासाठी उपयुक्त असेळ तेवढेच त्यात सांगावे. कारण गद्यात असलेल्या, समासरहित आणि मुख्यत्वे संस्कृतात नसलेल्या शब्दांनी कंटाळा येतो. याने कठोर अक्षरांनी युक्त आणि पुष्कळ समासांनी व्याप्त अशी रचना रशाखारूप आह्विक अभिनयात खंड पाडते म्हणून आणि समासाविषयी संशय उत्पन्न याल्याकारणाने अर्थ अनिश्चित ठेविते म्हणून करू नये हे सुद्धा दाखवितात. १ नि च. २ नि -पुर्णपद्यवत्तं. ट्र नाट्यशास्त्र 'विस्तरेण बा? यानंतर 'दर्शयितव्यः” सारखा शब्द अपेक्षित आहे. - “संधिव्वितिः ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितातील “संधि डिममिति? हा उघडच भ्रष्ट पाठ आहे. मुद्रितातील “संध्थि चिकीधेब इतिः हा पाठही संभाव्य नाही. येथे आरयेतील 'संधिघु” हा झाब्द उद्धत केळा असणार यात शंका नाही. कारण पुढील शब्दात त्याचा अर्थ दिला आहे. - 'अमडार्थसंघान-? यातील 'संधान' ही 'संविधान' ची दुरुस्ती आहे. मुद्रितातील 'संनिवेश? प्रस्तुत संदर्भात अर्थहीन आहे. - 'गद्यगतेरसमस्तेः पदैः” ही आयेंतीक 'चूर्णपंदे” ची व्याख्या आहे. चूणपदाचे वर्णन चौदाव्या अध्यायात पुढीलप्रमाणे केळे आहे - अनिबद्धपदं छन्दस्तथा चानियताक्षरम्‌ । अथोपेक्ष्यक्षरस्यूतं क्षेयं चूर्णपदं वुघेः ॥ १४.७० समासरहित गद्याचे हे नामाभिधान आहे. - 'उत्कलिकाप्रायम? हे पुष्कळ समास असलेल्या च कठोर अक्षरे असलेल्या गद्यरचनेचे नाव आहे - 'भवेदुत्कलिकाप्रायं समासाढः्यं हढाक्षरमस” (छन्दो - मंजरी ५). येथे समासांचा स्वतंत्र निदेश असल्यामुळे ह्या शब्दाने केवळ कठोर अक्षरांचान्च निर्देश अभिप्रेत आहे. - “अमिनयशाखाडूट सर्व प्रकारच्या आह्विक अभिनयाला शाखा असे नाव आहे - “आद्जेकस्तु भवेच्छाखा? (८.१६). मोठमोठे समास असले म्हणजे आज्चिक अभिन- यात खंड पडण्याचा संभव असतो. यत्रारथस्य समापतिने भवत्यज्ले प्रयोगबाहुल्यात । वृत्तान्तस्बल्पकथेः प्रवेशकेः सोडमिधातव्यः ॥ ३२॥ व ७ ९ 3 > च गोंजलेब्य र्याची _ ज्या वेळेस प्रयोग फार दीधे होणार असल्यामुळे अंकामध्ये ल्या का समाप्ती होत नसेल तेव्हा घडलेल्या गोष्टींचे थोडक्यात निवेदन करणाऱ्या प्रवेशकांच्या द्वारा तो (कार्याचा अवशिष्ट भाग) सांगावा. _ “दिवसावसानकार्य यद्यडठेः नोपपद्यते सर्वम्‌ । अडु-च्छेदं कृत्वा भ्रवेशकेस्त- द्विधातव्यम|॥' इति यदुक्त तत्रानुपपात्तिबइप्रकारा भवतीति दर्दायितुमाह य॒त्रार्थस्य समापिरिति । यठ्मत्यक्षप्रयोज्यमपि प्रयोगवशादडे$समाप्त॑ भवति तत्प्रवेशकेन कर्तेव्यम्‌ । बइतरत्व प्रयोगस्य बहुमानास्पद्त्वम्‌ । तदयमत्रार्थः । यच दिवस- कार्याण्यनेकानि तत्र तन्मध्ये. यत्सुन्दरप्रयोगमुपदेशोपर्यागोे च तत्प्रत्यक्षेण दशनीयम्‌ , अन्यत्सर्व प्रवेशकेन । वृत्तान्तार्था तदवशिष्टेनेतिव्रत्तनिर्वाहफळा अल्पा संक्षिप्ता कथा यस्य प्रवेशकस्य । | १ का भवेदड्के. २ नि वृत्तान्त:; का बहुवत्तान्तो5ल्पकथ: प्रवेशकैः संविधातव्यः. १८.२३ ६३ एका दिवसात समाप्त होणारे कार्य जर अंकात संपूर्णपणे दाखविता येण्यासारखे नसेल तर अंकाची समाप्ती करून प्रवेशकांच्या द्वारा ते दाखबावे' असे जे वर म्हटले आहे त्यात निदेंशिलेली अनुपपत्ती पुष्कळ प्रकारची असते हे दाखविण्यासाठी 'यत्राथेस्य समापिः' ही आर्या सांगतात. प्रत्यक्ष दाखबिता येण्यासारखी अशी सुद्धा जी गोष्ट प्रयोगाच्या अडचणी- मुळे अंकात अपूण राहाते ती प्रवेशाकाने दाखवावी. प्रयोगाचा पुष्कळपणा म्हणजे बहुमान देण्यास योग्यता. तेव्हा या ठिकाणी अर्थ असा. जेव्हा दिवसात होणारी कार्ये अनेक्र असतात तेव्हा त्यांमध्ये ज्याचा प्रयोग सुंदर होईल व जे उपदेश देण्यास उपयोगी पडेल ते प्रत्यक्ष दाखवावे, इतर सर्वे प्रवेशाकद्रारा. वृत्तान्त प्रयोजन असलेली म्हणजे त्यात अवशिष्ट असलेल्या अंशाने कथानकाचा निर्वाह साध्य करणारी, अल्प म्हणजे संक्षिप्त अशी कथा ज्या प्रवेशकात आहे असा. “दिबसावसानकार्यम्‌ इ०' ही बरीळ तेबिसावी आर्या होय. - 'बहुतरत्वे इ०' आरयेतील “प्रयोगबाहुल्यातर या शब्दाचे विवरण करणाऱ्या ह्या वाक्याचा अर्थ असा दिसितो की ज्या गोष्टींना महत्त्व असते त्या प्रत्यक्ष दाखविणे उचित असते. परंतु जर अशा गोष्टी पुष्कळ असल्या तर त्या सर्वाचा अंकात समावेदा केल्यास प्रयोग लांबलचक होईल. “बहुमानास्पद' म्हणजे महत्त्वाची असणारी गोष्ट असा अर्थ अमिप्रेत असावा. - 'दृत्तान्तार्था इ० या वाक्यात आयेतीळ 'बृत्तान्तस्वल्पकयैः' चा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. वृत्तान्त हा अर्थ म्हणजे प्रयोजन जिने ती 'बृत्तान्तार्था” दे कथेचे विशेषण. - 'तदवशिष्टेन' तत्‌ नें प्रवेशाक अभिप्रेत असावे. 'अवरिष्टरेन' नंतर 'अंदोन? हे विशोष्य अध्याहृत समजावे. अंकात योजना झाल्यानंतर बाकी राहिळेला भाग. - '*निर्वाह? म्हणजे तडीस नेणे, प्रस्तुत ठिकाणी पुढे नेणे, परिपोष करणे इत्यादी. युट राज्यभ्रंशो मरणं नगरोपरोधनं चेव । प्रत्यक्षाणि तु नाज प्रवेशकेः संबिधेयानि ।।३३॥। युद्ध, राज्यापासून पदच्युती, मृत्यू , तसेच नगराला पडलेला वेढा - या गोष्टी अंका- मध्ये प्रत्यक्षपणे दाखवू नयेत, तर प्रवेशकांमभ्ये त्यांची योजना करावी. एवं प्रत्यक्षप्रयोज्ये प्रवेरकोपयोगो दर्दितः, अन्यत्रापि तं दशयति युद्धे राज्यभ्रंश इत्यादि । युद्धे शस्त्रसंपातस्य बाहुल्यं, राज्यभ्रंशे पतनमरणादेः, नगरसा- परोधे बलस्य यन्त्रसुरुठ्ठादिदानस्य । | इह केचिदाहः । मरणं द्विविधम्‌, किंचिदन्यसंबन्धिन्या क्रियया संपाद्यम्‌ यथा चक्रेण दैत्यस्य शिरउछेंदेन, किंचिदन्यसंबन्तिक्रियानरपेई्येणेच व्याध्यभि- घातादिप्रभवम्‌ । तत्राद्यस्येव निषेध: क्रियते । एतदर्थमेव कृतग्रहणम्‌ । तड्धि द नाट्यशास्त्र अन्यक्रियावाचकम्‌ । न च तद्युद्धेन संग्ृहीतम्‌, अयुद्धपूर्वकस्याप्यशद्रितशिरर्ठे- दस्य दर्शितत्वादिति । त एवं प्रष्टव्याः । इदं मरणं प्रयोज्यामिदमप्रयोज्यामिति न तावदत्र विषयविभागे निदानमुत्परयामः, मतस्य कथं निष्क्रमणं कथं वावस्था- नम्‌ । ततो नाट्योपयोगिसमस्तध्रुवागानादिप्राक्रियाविळोपः सामाजिकानां विर- सताप्रतिपत्तिरिति तु सर्वत्र मरणं ससानम्‌ । तस्मादरदरे मरणमप्रयोज्यमेव । याम्रमाणे प्रत्यक्ष प्रयोग करावयास योग्य अशा गोष्टींच्या संबंधात प्रवेशकाचा उप- योग दाखविला आहे. आता तो थुद्धं राज्यभ्रंशाः! इत्यादी शब्दांत इतरत्रही दाखवितात. युद्धामध्ये शक्नप्रहारांचे प्राचुर्य असते, राज्यभ्रंशात पतन, मरण आदींचे प्राचुर्य असते आणि नगराला दिलेल्या वेढ्यात सैन्याची व यन्त्र, सुरुंग लावणे इत्यादींची विपुळता असते. यासंबंधात काहींचे म्हणणे असे आहे. मरण दोन प्रकारचे आहे. एक, दुसऱ्याशी संबन्ध असणाऱ्या क्रियेमुळे घडून येणारे, जसे चक्राने दैत्याच्या शिरच्छेदाने होणारे, दुसरे, दुसऱ्याशी संबन्ध असणाऱ्या क्रियेची अपेक्षा नसतानाही व्याधी, मार इत्यादींनी घडून येणारे. त्यांपैकी फक्त पहिल्याच प्रकाराचा निषेध केला आहे. ह्याचसाठी कृत शब्द वापरळा आहे. कारण तो शब्द दुसऱ्याने केलेल्या क्रियेचा वाचक आहे. आणि ते मरण युद्धात अन्तभूत झाले आहे असे नाही. कारण युद्धपूर्वक नसताही अनपेक्षित असा शिरच्छेद झालेला दिसून येतो. ह्या टीकाकारांना असे विचारावयाळा पाहिजे की ह्या मरणाचा प्रयोग करावा, ह्याचा करू नये अशा प्रकारचा मेद करण्यास योग्य कारण आम्हाला काही दिसत नाही, तेव्हा मृत पात्राने निष्क्रमण कसे करावया'चे किंवा रंगभूमीवर कसे राहावयाचे ? त्यामुळे नाट्यालळा उपयोगी अशा धुवागान आदी समस्त प्रक्रियांचा लोप होईल आणि प्रेक्षकांना विरसतेची प्रतीती होईल; म्हणून सर्व प्रकारचे मरण सारखेच. तेव्हा रंगभूमीवर मरण दाख- वावया'चे नाहीच. “-प्रयोज्ये प्रवेशाकोपयोगः' ही थोडी दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “-प्रयोज्यविप्रवेशकोपयोग:? असा भ्रष्ट पाठ आहे. कदाचित मूळ पाठ 'प्रयोज्यविषये इ०' असेल. मुद्रित पाठ '-प्रयोज्य- प्रवेशकोपयोग:' असा समासघटित आहे. तो सुगम नाही. - :दानस्य' नंतर मुळात “च? असण्याचा संभव आहे. - मोठे सैन्य व नगर काबीज करण्यासाठी यन्त्रे, सुरुंग यांचा उप- योग रंगभूमीवर प्रत्यक्ष दाखविणे कठीण आहे म्हणून नगरोपरोधाचा निषेध. टर दिरदछेद “"शिरव्छेदेन' मुळात म' असे आहे. 'शिरकछेद? असे चालले असते. पण येथे “'मरणम? अध्याह्त घरावयाचे असल्यामुळे 'दिरछेदेन' असे तृतीयान्त रूप आवद्यक आहे. -- 'कृतग्रहणम' या आर्येत ह्या टीकाकारांना 'कृत? शब्द कोठे आढळला ते समजणे कठीण आहे. - 'अराड्िंतगिरवछेदस्य' याचा अर्थ ज्याची अगोदर कल्पनाही नव्हती असा एकाएकी झालेला शिरच्छेद असा दिसतो. -- “ततः? म्हणजे मृत्यू झालेले पात्र रंगभूमीवर असल्याकारणाने. | १८.२२ | (र ननु मरणानुभाववर्णनेनेदानीं किं कृत्यम, युद्धवीररौद्रादावप्येतदनुभाव- वर्णने किं प्रयोजनम्‌, तदनुभावापारिज्ञाने प्रवेशकैरपि कथं वर्णनं स्यादिति चेत्‌ मरणे5५पि समः समाधिः । किंच यत्र प्रत्यापत्तिशून्यं मरणं तत्परक्रियाविळो- पकत्वान्न प्रयोज्यम्‌ । यक्ष क्रचित्प्रत्यापात्तिः यथा जीमूतवाहनस्य तदेव क्षण- मात्रानिश्चितचेष्टात्मकं प्रयोज्यमेवेते । सोपे मरणानुभावसाक्षात्करणस्य विषयः । यद्विवादिनामपि साटोपपरिक्तमणं शस्त्रग्रहणादिप्रारस्भरूपं तत्प्रयोज्यम्‌ , अपि तु तत्निवांही न प्रदर्शानीयः । एतदेव कारणेन स्फुटीकृतम्‌ । युद्धमेव यान्नि- वाहपर्यन्तं यावन्मरणमेव । यदचिरप्रत्यापत्तिन भवति तन्न प्रत्यक्षेण प्रयोज्यम्‌ । प्रवेशकेरिति उपक्षेपपश्चकमध्यादन्यतमेनोपक्षेपेणेत्यर्थः । अन्ये त्वाहूः । व्याधिजमभिघातर्ज च मरणं रड्ठे प्रयोज्यम, अपुनजीनि- निष्करान्तिरहिता प्रकृतिविधेयेति । यावर आक्षेप घेतला की मरणाच्या अनुभावांच्या वणनाचा मग काय उपयोग, युद्ध- वीर, रौद्र आदी रसांमध्ये सुद्धा ह्याच्या अनुभावांच्या वर्णनाचे काय प्रयोजन आणि त्या अनु- भावांचे ज्ञान नसता प्रवेशकांमध्ये सुद्धा कसे वर्णन होऊ शकेल £ तर उत्तर असे की मरणा- मध्ये सुद्धा मनाची एकाग्रता सारखीच असते. शिवाय, ज्या मरणानंतर पुन्हा जिवंत होत नाही असे मरण प्रयोगाच्या प्रक्रियेचा लोप करणारे असल्यामुळे दाखवावयाचे नाही. परंतु . ज्या क्वचित प्रसंगी पुन्हा जीवितप्राप्ती होते - उदाहरणार्थ जीमूतवाहनाळा - तसलेच मरण, क्षणभर निश्चित चेष्टांनी विरहित अशा स्वरूपाचे अवशय दाखवावे. तोच मरणा'च्या अनुभा- वांच्या प्रदर्शनाचा विषय होय. भांडण करणारे जेव्हा उद्भतपणे परिक्रमण करतात तेव्हा शास्र घेणे इत्यादी प्रारंभीच्या स्वरूपात ते दाखवावे, परंतु त्याचे पर्यवसान मात्र दाखवावयाचे नाही. हीच गोष्ट कारण सांगून स्पष्ट केळी आहे. शेवटपर्यंत युद्ध म्हणजेच कोणाऱचा तरी मृत्यू होईपर्यंत. ज्यात जीवित लवकरच परत येत नाही असे मरण प्रत्यक्ष प्रयोगात दाखवावया'चे नाही. 'प्रवेशाके:' म्हणजे पाच उपक्षेपकांपैकी कोणत्या तरी एका उपक्षेपकाने असा अर्थ. _ परुंतु दुसरे टीकाकार म्हणतात की व्याधीने किंवा अमिघाताने आलेळे मरण रंगभू- मीवर दाखवावे, पुनरुज्जीवन व निष्कमण यांनी रहित अशी स्वाभाविक स्थिती दाखवावी. 'मरणानुभाव-' मरण हा एक व्यमिचारिमाव मानला असून सातव्या अव्यायात (कछोक ८६-९० व तत्संबद्ध गद्य) त्याच्या विभावांचे व अनुभावांचे वर्णन आहे. त्याचे अनुभाव म्हणजे अमिनयद्वारा व्यक्त केळे जाणारे त्याचे परिणाम, बिषण्ण गात्रे, निश्वेष्ट इन्द्रिये इत्यादी. आक्षेपकाचे म्हणणे असे की मरण जर रंगभूमीवर दाखवावयाचेच नाही तर त्याच्या अनुभावांचे वर्णन का केले आहे? - 'युद्धवीर' दानवीर, धर्मवीर आणि युद्धवीर अशा तींन प्रकारच्या बीररसाचा निर्देरा ६.७९ मव्ये केला आहे. - 'एतदनुभाव- वीर व द्द नाट्यशास्त्र रोद्र रसांच्या वर्णनात मरणाच्या अनुभावांचा समावेदा आहे असे येथे म्हटले आहे. पण सहाव्या अध्यायातील ह्या रसांच्या वर्णनात तसे आढळत नाही. दोहोत मृत्यूचा संभव आहे म्हणून असे म्हटलेळे दिसते. - 'मरणेडपि समः समाधिः? आक्षेपाला दिलेल्या ह्या उत्तराचा अथे स्पष्ट नाही. मरण जर दाखवावयाचे नाही तर मग अमिनयद्वारा व्यक्त करावयाच्या त्याच्या अनुभावांचे वर्णन भरताने का केळे आहे ह्या प्रभ्ाचे उत्तर प्रस्तुत वाक्यात सापडण्या- सारखे नाही. यापुढील विवेचनात ते सापडते. अभिनवगुण्ताने मरणाचे दोन प्रकार मानले आहेत ते असे -- एक क्षणिक टिकणारे ब दुसरे कायमचे. पहिल्या प्रकारात दैवी अनुग्रहाने जीवित पुन्हा प्राप्त होते. तसळे क्षणिक मरण रंगभूमीवर दाखविता येते ब त्याचा अभिनय कसा करावा हे दाखविण्यासाठी भरताने त्याच्या अनुभावांचे वर्णन केळे आहे असे अभिनब- गुप्ताचे आक्षेपालळा उत्तर आहे. पण तत्पूर्बी आलेले हे प्रस्तुत वाक्‍य त्या उत्तराशी संबद्ध आहे असे दिसत नाही. त्याचा सरळ अर्थ असा दिसतो की ज्याप्रमाणे इतर व्यमिचारि- भावांच्या अमिव्यक्तीसाठी नटाचे मन समाहित असावे लागते त्याप्रमाणे मरणाच्या अभिनया- साठीही मनःसमाथि आवश्‍यक आहे. पण हे काही आक्षेपाला उत्तर नाही हे उघड आहे. असा तंभव आहे की येथे टीकेतील पुढचामागचा काही भाग गहाळ झाला आहे. - 'जी- मूतवाहनस्य” नागानन्द नाटकात ह्याचा मृत्यू झाल्यावर गोरीच्या प्रसादाने त्याला पुन्हा जीवन प्राप्त होते. - 'यद्विवादिनाम' ही दुरुती आहे. हस्तलिखितात 'यद्वादीनाम” असे आहे. “वादिन? पेक्षा 'विवादिन? अधिक संभाव्य आहे. मुद्रित पाठ 'यद्राहिनीनाम* असा आहे. पण ' वाहिनी म्हणजे सैन्य येथे अमिप्रेत असण्याचा संभव नाही. -- 'शस्त्रग्रहणादि- ही सुद्धा 'शास्त्रवर्णनादि- ची दुरस्ती. विवादाचा प्रारम्भ रास्त्रप्रहणानें अधिक संभवनीय आहे. त्या समयी शास्त्रवर्णनाळा फारसे महत्त्व नसते. -- 'कारणेन' मुळात 'कारणे' अशी सप्तमी आहे. पण तृतीयेचे रूपच संभाव्य आहे. हे कारण पुढच्या वाक्यात निर्देशिळे आहे. “पुनर्जाने' म्हणजे पुन्हा जिवंत होणे. - 'प्रकृति? म्हणजे मरणकाल्ची स्वाभाविक अवस्था असा अर्थ दिसतो. अडे प्रवेशके च प्रकरणमाश्रित्य नाटके वापि । १ यं ख्या न वधः कतेव्य! स्थाद्यो5भ्युद्यी नायकः ख्यातः || ३४॥ अपसरणमेव काये ग्रहण बा संधिरेब वा योज्यः । काव्यश्हेपेबहभिर्यथारसं नाव्यतस्वज्ञेः । ३५ ॥ प्रकरणाच्या संबंधात किंवा नाटकामध्ये सुद्धा जो अभ्युदययुक्त प्रख्यात नायक असेल त्याचा वध झालेला अंकात तसेच प्रवेशाकातही दाखवू नये. नाठ्याचे तत्त्व जाणणाऱ्या कवींनी काव्याशी संश्िट्ट असे विविध प्रकार रसाळा अनुरूप अशा रीतीने योजावेत, उदा- १ नि स्याद्यस्तत्र स. २ नि अवतरण-. ३ नि वहुमिः कार्यविदोषेः प्रवेशके: सूचयेद्वापि, का तेस्तेः कार्यविशेषै: प्रवेशाकेः सूचके€चापि. १८.३४-३५ न हरणाथे त्याचे पलायन झाळेळेच दाखवावे किंवा तो बंदिवान झाळेला दाखवावा अथवा तहा- चीच योजना करावी. अथ सवंथा यद्वदिषयं मरणं नाख्येयं तद्दरायति अट्टेः प्रवेशके चेति । प्रकरणे नाटके वा नायकस्य प्रत्यक्षेण वा वर्णनया वा न मरणं वणंनीयम्‌ । अड्जू इति प्रत्यक्षेण प्रवेशक इति वर्णनया । ननु प्रत्यक्षेण ये न कस्यचिन्मरणं प्रयोज्य- मिच्छान्ति तन्मते अडु-ग्रहणं किमथंम, तत्राहुःः वधशब्देन न मरणमुच्यते अपि तु परक्ृतं घातदानादि । तत्रान्यघातदानाद्यपि प्रत्यक्षेण रड्ठे प्रदश्‍्येते, अचिर- प्रत्यापत्तो समाश्वासे । यस्तु नायकस्तस्य ख्यातस्य न घातदानादि प्रदर्रानीयम्‌ । न्ये तु ख्यातं नायकं पताकानायकादिकसिच्छन्ति । आता कोणत्याही प्रकारे ज्याच्या संबंधी'च्या मृत्यूची गोष्ट करावयाची नाही ते “अड्डे; प्रवेशके च' ह्या आर्येत दाखवितात. प्रकरणामध्ये किंवा नाटकामध्ये नायकाचे प्रत्यक्ष- पणे अगर वर्णन करून मरण दाखवावयाचे नाही. “अड्डे” म्हणजे प्रत्यक्षपणे, 'प्रवेराके' म्हणजे वर्णनाच्या द्वारे. जे कोणाचेह्दी मरण प्रत्यक्ष प्रयोगाने दाखवू नये अशा मताचे आहेत त्यांच्या दृष्टीने 'अडू” शब्दाच्या उपयोगा'चे काय प्रयोजन अशी शंका घेतल्यास त्यांचे म्हणणे असे की वध शाब्दाने मरण समजावयाचे नाही, तर दुसर्‍याने केलेला वार इत्यादी. त्यामुळे इतर पात्रांना झाळेळे वार इत्यादी सुद्धा रंगभूमीवर दाखवितात, जेव्ह्या थोड- क्‍्याच वेळात ते प्रत्युज्जीबित किंवा समाश्वासित होतात तेव्हा. परंतु जो प्रख्यात नायक असतो त्याच्यावर वार, हल्ला वगैरे झाळेळा दाखवावयाचा नाही. इतर टीकाकार ख्यात नायक म्हणजे पताकेचा नायक इत्यादी असे समजतात. “नाटके वा? यातील “बा? मुळात नाही. पण तो आवश्यक वाटतो. मूळ आर्येत तो आहे. - “घात? म्हणजे दास्त्र वगैरेने केळेला वार. - अचिर- इ०? याचा अर्थ अता की इतर पात्रांना मार दिळेळा जरी दाखवावयाचा असला तरी ते जीवित असलेले ब सूच्छित झाल्यास त्यातून शुद्धीवर आलेंळे असे दाखविळे पाहिजेत, - “अन्ये तु' हे टीकाकार प्रख्यात? व ख्यात? यांत फरक करतात असे दिसते. मुख्य नायक प्रख्यात असावा असे म्हटळे आहे, तेव्हा ख्यात नायक म्हणजे प्रासंगिक कथानकाचा नायक असे त्यांचे म्हणणे. अपसरणसिति. पळायनम्‌ । यथोक्तम 'अदाक्ये सर्वसुत्सृज्यापगच्छेदू, दृष्टा हि जीवतः पुनराव्रत्तिः इति । ग्रहणं वा काये सनिबन्थनवन्धनमिति, यथा वासवदत्तावृत्तसारे वत्सराजस्य । संविरिति संघानस्‌ । यथोक्तम्‌ - “प्रवत्तचक्रेणाक्रान्तो राज्ञा बलवताबळः । संघिनोपनमेत्‌ ' इति । ६८ नाट्यशास्त्र अपसरणबन्धनसंर्धीनां विषयविभागसूचनायाह - प्रधानरसानुसारेण यत्काव्यं यः काव्याथंस्तस्य 'छेषा बन्धनाद्युपपत्तयः तैरुपलक्षितमपसरणादि कार्योमेति यावत्‌ । कार्ये "हेषेरिति केषांचित्पाठः । अपसरण म्हणजे पलायन. म्हटलेच आहे - “अशक्‍य झाल्यास सर्व सोडून देऊन निघून जावे; कारण जो जिवंत राहातो तो पुन्हा परत येतो असे दिसून येते.' किंवा 'ग्रह्मण' करावे म्हणजे पकडून बन्धन, उदाहरणार्थ वासवदत्तावृत्तसार नाटकात वत्सराजाचे. संधि म्हणजे तह करणे. म्हटलेच आहे - सैन्याची जमवाजमव करून चाळ करणाऱ्या बलवान राजाने ज्याच्यावर आक्रमण केळे आहे अशा दुबेळ राजाने तह करून शरण जावे. अप- सरण, बन्धन आणि संधी यांचे भिन्न भिन्न प्रसंग सुचविण्यासाठी सांगतात - मुख्य रसाच्या अनुरोधाने जे काव्य म्हणजे काव्याचा जो अथ त्याचे छझेष म्हणजे बन्धन आदी उपपत्ती त्यांनी उपलक्षित झाळेळे असे अपसरण आदी दाखवातेत असा एकूण अथे. काद्दींचा 'कार्ये हेषेः' असा पाठ आहे. “अदाक्‍्ये इ०? तसेच नंतरचे 'प्रदृत्तचक्रेण इ०' ही वचने कोटिलीय अर्थशास्त्रातून (९,७. २५-३६ व ७.३.२२) उद्धत केळी आहेत. खखतःवर आक्रमण झाल्यास दुर्बळ राजाने प्रसंगा- नुरूष कसे वागावे हे त्यांत सांगितले आहे. - 'बासवदत्तावृत्तसारेः' मागे वृत्ततार नाटकाचा निदेंशा केळा आहे, तेच दे असावे. येथे मुद्रित पाठ “-नृत्तधारे (पारे??? असा आहे. - “-सूच- नायाह? यानंतर 'काव्यळेषेरिति' हा शब्द अपेक्षित आहे. तो गहाळ झाठेला दिसतो. - 'यः काव्यार्थः मुळात 'यत्काव्यार्थ आहे, ते बरोबर नाही. - 'उपलक्षितम? ्ेग्रेः मधील तृतीया उपलक्षणा्थी आहे असा अर्थ. - 'कार्ये ेषेः” मुद्रितात 'कार्यविशेषैः?' असे आहे. न महाजनपरिबारं कतंव्यं नाटकं प्रकरणं बा | ये) तत्र कार्यपुरुषाथरत्वारः पश्च घा ते स्युः ॥३६॥ नाटक किंवा प्रकरण पुष्कळ मनुष्यांचा घोळका असलेले असे करू नये. त्यात कार्याशी संबद्ध अशी माणसे असतीळ ते चार अथवा पांच असावेत. अथ यद्यदप्रयोज्यं प्रत्यक्षेण तस्य सामान्यद्वारकं संग्रहं द्शायेतुमाह न महाजनपरिवारामिति । महाजनः संख्यया तेन परिवारः परिवारणं यत्र वस्तुनि तद्युक्तं नाटकं प्रकरणस्‌ । वाग्रहणांदन्यदपि न कायम । एतदुक्त भवति । बइतर- पुरुषसाध्यं यात्किंचित--तथथा समुद्रे सेतुबन्भनमित्यादि-तत्सर्व प्रत्यक्षेण न १ नि यंनात्र १८.९६ «६९. प्रदर्शनीयम । तथा महतो जनस्य पितापुत्रश्वश्रूस्नुषागुरुशिष्यादेः पारता वरण व्रीडातळादियोगेन यत्र जायते वेरस्यं वा, महाजनस्य सभ्यस्य च यत्र पासवसण चित्तसंकोचः, तत्सर्व परिचुस्बनाद्यपि न प्रत्यक्षप्रयोज्यम्‌ । यदि च प्रत्यक्षप्रयोज्य तत्र पश्न कार्यपुरुषाः यदि वा चत्वारः प्रकरीपताकादिरूपाः तेषां च पारवारस्व- भावास्तावन्त एवेति यदि प्रकर्षस्तदा दशाष्टी वा र्ठे प्रविष्टा भवान्त । तता केषु त्वभिनयचतुष्टयं न सस्यग्विभावनीयं स्यात्‌, देवयात्रापरिद्श्यमानजन- समाजवत्‌ । ₹"-__.*९" आता जे जे प्रत्यक्ष प्रयोगात अयोग्य त्याचा सर्वसामान्य ख्यात निद्रा करण्यासाठी “न महाजनपरिवारम? इत्यादी सांगतात. मह्दाजन म्हणजे संख्यने पुष्कळ लाक, त्यांनी केलेला परिवार म्हणजे गर्दी ज्यात आहे असे कथानक त्याने युक्त असे नाटक किंवा प्रकरण 1:19 शब्दाचा उपयोग दुसरे सुद्धा करू नये हे दाखवितो. म्हणजे अथे असा. पुष्कळ पुरुषांच्या साह्याने जे काही साध्य होण्यासारखे असेळ -- उदाहरणार्थ, समुद्रात सतुबधन इत्यादी - ते सारे प्रत्यक्ष दाखवू नये. त्याचप्रमाणे पिता, पुत्र, सासू, सून, गुरू, शिष्य आदी पुष्कळ लोक ज्याचा लज्जा, मनस्ताप आदीच्या योगाने सर्वे प्रकारे परिहार करतात किंवा ज्याने त्यांना विरसंता उत्पन होते ते आणि महाजन म्हणजे सभ्य मनुष्याचा ज्यासुळ पारवरण म्हणज चित्ततंकोच होईळ असे परिचुंबन आदी सर्वे प्रत्यक्ष प्रयांगास अयोग्य. आणि जे प्रत्यक्ष दाखबावयाचे त्यात पाच कार्याला उपयोगी पुरुष किंवा चारच - प्रकरी, पताका आदीच्या स्वरूपाचे - आणि त्यांच्या परिवाराचे स्वरूप असलेळे आणखी तितकेच, याप्रमाण आधकात अधिक दहा किंबा आठ पात्रे रंगभूमीवर प्रवेशा केलेले असतात. परतु त्यापक्षा अधिक पात्रे असल्यास चार प्रकारचा अभिनय चांगल्या प्रकारे पहाता येणे राकय होणार नाही, देवतांच्या यात्रेत दृष्टीस पडणाऱ्या जनससमुदायाप्रमाणं. यत्र वस्तुनिः ह्या शाब्दांनंतर मुळात 'तन्नाटकमिति? ढे शब्द अधिक आहित. ते चुकीने पडले आहेत. पढील 'तद्यक्त? मधील तत्‌ ने वस्तु' चा बोध होतो, नाटकांचा संभाव्य नाही _ “महतो जनस्य इ०? मूळ आरयितील शब्दांचे आणखी दोन प्रकारे अर्थ लावळे आहेत. - पितापुत्र- इ०' वाविसान्या अध्यायात पुढील “कोक आहे - पितापुत्रस्नुषाश्वश्रृद्इ्यं यस्मात्तु नाटकम्‌ । तस्मादेतानि सर्वाणि वजेनीयानि यत्नतः ॥ २२.२९ “एतानि? म्हणजे चुंबन, आलिंगन इत्यादी, - 'वरण॑ म्हणजे वर्जन, परिहार. - 'प्रकरीपताकादि रूपाः? यावरून कार्यपुरुष म्हणजे गौण पात्रे असा अर्थ केठेला दिसतो. - तेषां पारखवार- ३० याला मूळ आरयेत काही आधार नाही. - अमिनयचतुष्ट्यम? आ”क्किक, वाचिक, सात्विक आणि आहाय अता चार प्रकारचा अभिनय वा नाट्यशास्त्र काव्यं गोपुच्छाग्रे कर्तव्यं कार्यवन्थमासाद्य । ये चोढात्ता भाषास्ते सवे पृष्ठतः कार्याः | ३७॥ कार्याच्या रचनेच्या अनुरोधाने काव्य गाईच्या शेपटीच्या टोकासारखे करावे; आणि जे उदात्त भाव असतील ते सर्व शेवटी दाखवावेत. 20-60”: एवमडूःपवेशकस्वरूपं वितत्याभिहितम्‌, अधुना तत्समुदायस्य नाटकस्य यारग्रूपे तदद्शरयाति काव्यं गोपुच्छाग्रामाति । क्रमसूक्ष्माडमाति केचित्‌ । अन्ये तु यथा गोपुच्छे केचिद्डाळा हस्वाः केचिद्दीर्चा एवं कानिचित्कार्याणि मुखसंधो परिसमाप्ताने, कानिचित्मतिमुखपर्यन्ताने, कानिचिदवमश्ांवसानानि, पराणि निवेहणपर्यवसार्यीने । तद्यथा रत्नावल्यां प्रमोदोत्सवो मुखसंधावेव निष्टितः, यावदू बाभ्रव्य्चत्तान्ती मुखोपक्षिप्तो निवहणे निष्टा प्राप्त: । साररूपाश्च पदार्थाः पयंन्ते कर्तेव्याः । याप्रमाणे अंक व प्रवेशक यांचे स्वरूप विस्तृतपणे सांगितळे आहे. आता त्यांनी मिळून बनलेल्या नाटकाचे स्वरूप कसे ते 'काव्यं गोपुच्छाग्रं' या शब्दांत सांगतात. 'क्रमाने स्‌क्ष्म होत जाणारे अवयव असलेले' असे काहींचे मत आहे. परंतु इतरांच्या मते ज्याप्रमाणे गाईच्या दोपटीत काही केस आखूड, काही लांब असतात, त्याप्रमाणे काही कार्ये मुखसंधीत समाप्त होतात, काही प्रतिमुखसंधीत समाप्त होतात, काहींचा अवमडीसंधीत शेवट होतो, तर इतरांचा शेवट निवेहणसंधीत होतो. उदाहरणार्थ, रतनावठळीत आनंदोत्सव मुखसंधीतच समाप्त होतो, तर मुखसंधीत निर्दिष्ट झालेल्या बाभ्रव्याच्या वृत्तान्ताचा शेवट निर्वहणसंधीत होतो. आणि सारस्वरूप असलेल्या गोष्टींची योजना शेवटी करावी. “अड्ूप्रवेशकस्वरूपं? मुळात “अद्ले) असा स्वतंत्र शब्द आहे. तो बरोबर नाही, - * -सूक्ष्मा- ड्रम नाटकाची अंगे क्रमाने सूक्ष्म होतात म्हणजे काय समजावयाचे ते स्पष्ट नाही. - 'निष्ठितः? _ या शाब्दानंतर मुळात (इत्यादि? शब्द अधिक आहे, तो निरर्थक असल्यामुळे गाळला आहे. - 'सारखूपा: पदार्था;' ही आरयेतील 'उदात्ता भावाः' ची व्याख्या आहे. सार म्हणजे नाटकाचे सार. सर्वेषां काव्यानां नानारसभावयुक्तियुक्तानाम्‌ । निवेहणे कतेव्यो नित्यं हि रसोड्द्ठतस्तज्हैः ॥। ३८॥ तज्ज्ञ कवींनी विविध रस व भाव यांच्या योजनेने युक्त असलेल्या सर्व काव्यांच्या निवेहणसंधीमध्ये नेहमी अद्भृतरसाची योजना करावी. १ नि कायं. २ नि काव्य-. १८.२८ ७१ अत्र हेतुमाह संवेषां काव्यानामिति । नाटकादीनां निवहणे5दूभुतो रसः कतंव्यः । एवं हि तानि काव्यानि रसभावानां य॒ुत्तया परस्परसंबद्धाने य॒क्तानि भवन्ति, नान्यथा । एकवाक्‍्यतां च विना कः प्रबन्वार्थः । तथा च दाहुपरवीर- रोद्रैः स्त्रीरत्नपृ॒थिवीलाभराचुक्षयाः करुणादिभिस्तन्नित्रत्तिरिते यथाक्रमेण लोको- त्तरासंभाव्यमनोरथप्राप्ती भवितव्यमदूभुतेन । साधारणळाभो हि यदि फलत्वेन कलप्यते$वड्यं क्रियायाः किंचिदस्त्येव फलमात्रामिति किं तत्रोपायव्युत्पादनायत्ने- नेति अदूभुतावसानत्वमकार्यकरम । तेन व्युत्पाद्यजनस्येवं बुद्धिजायते “अहो दुष्करमप्युपायक्रमेण सिध्यतीति उपायेन वतिंतव्यम? इति । ह्याचे कारण “सर्वेषां काब्यानाम्‌' इत्यादी शब्दांत सांगतात. नाटक आदींच्या निर्वहणसंधीमध्ये अद्‌भुत रसाची योजना करावी. कारण त्याचमुळे ती काव्ये रस आणि भाव यांच्या योजनेने युक्त म्हणजे सुसंबद्ध होतात, एरूही नाही. आणि सुसूत्रता नसेळ तर प्रबंधाचे काय प्रयोजन ? त्यामुळे शद्ठार, वीर आणि रौद्र यांच्या द्वारा अनुक्रमे सुंदर ख्लीचा लाभ, प्रथ्वीचा लाभ, आणि रात्रूंचा नाश, आणि करुण आदींच्या द्वारा त्यांचा लोप असे क्रमराः असता लोकोत्तर व असंभाव्य अशा मनोरथाच्या प्राप्तीसाठी अद्‌भुत असणे आवश्यक आहे. कारण, जर सामान्य लाभाचीच कल्पना केली तर क्रियेचे काही थोडेसे फळ अवश्य मिळतेच तेव्हा तसे असताना उपायांचा बोध देण्याचा प्रयत्न करण्याचे काय कारण म्हणून अद्‌भुताने होणाऱ्या शेवटाची योजना कार्यसिद्रिकर नसते. त्यामुळे ज्यांना बोध करावया'चा त्यांच्या मनात येते की दुःसाध्य अशी गोष्टही उपायांच्या योजनेमुळे सिद्ध होते, तेव्हा उपायांचा अवलंब केला पाहिजे. 'युक्तानि' शब्दाची व्याख्या 'परस्परसंबद्धाने' ही आहे. तंव्हा तो शाब्द व्याख्येच्या अगोदर वाचणे उचित होईल. - “यथाक्रमेण'* यातील क्रम निर्देशिळेल्या रसांचा नसून कथान- कातील घटनांचा आहे असे समजले पोहिजे. - “भबितव्यमद्धुतेन' येथे केठेला युक्तिवाद असा. विविध रसांचा आविर्भाव करणाऱ्या कथानकात शेवटी अलोकिक असे फल प्रास झालेले दाख- चावयाचे असेल तर त्यासाठी अद्भुताचीं योजना आवड्यक आहे. त्यानेंच इतर रसांच्या आवि- भावात एकसूत्रता उत्पन्न होते. - 'साधारणलामो? मुळात “'असाधारणलाभो' आहे. पण ह्या सबंध वाक्याचा आदाय लक्षात घेता सामान्य लाभच त्यात अमिंग्रेत आहे असे दिसते. नाळाच्या रोबटी लोकोचर फलाची प्राप्ती झाळेळी दाखविण्यास अद्भुत आवदयक्र आहे असे अगोदरच्या चाक्यात सांगितळे आहे. प्रस्तुत वाक्यात असे म्हणाबयाचे आहे की शोबटी प्राप्त [होणारे फल जर सामान्य स्वरूपाचे असेल तर त्यासाठी अद्सुताची योजना निरर्थक होईल. - 'क्रियाया:? ही क्रिया म्हणजे नेहमीची सामान्य क्रिया, जिच्यासुळे साधारण फळ सहजगत्या मिळते. - “उपायव्युत्पाट्नायत्नेन' व्युत्पादना म्हणजे प्रेक्षकांना बोध देण्याचे कार्य. हा बोध उपायांसंबंधी म्हणजे काय करावे, कसे वागावे यासंबेंबी असतो. “-यत्तेन' हा सुद्रणदोष असावा. - “अकार्य- र नाट्यशास्त्र करम ही मूळातील 'अकार्यम? ची दुरुस्ती आहे. अद्‌भुताच्या योजनेने कार्यसिद्धी होत नाही, कारण ती क्रियेनेच झालेली असते. - “तेन व्युत्पाब्र- इ०? हे वाक्य मागील वाक्याच्या अगोदर असते तर अधिक बरे झाले असते. नाटकलक्षणसेतन्मया समासेन की्तितं बिधिवत । प्रकरणमतःपरमहं लक्षणयुक्त्या प्रवक्ष्यामि । ३९ | नाटकाचे हे लक्षण मी नियमांना अनुसरून थोडक्यात सांगितले आहे. आता यानंतर मी लक्षणाच्या साहाय्याने प्रकरणाविषयी सांगणार आहे. पूर्वोक्तमुपसंहराते वक्तन्यान्तरं चाक्षिपाति नाटकलक्षणमेतदित्यादि । क्रचि- छब््यं प्रसिद्धम, इह तु लक्षणबलेन तस्येव यत्नप्रसाध्यत्वमिति दरायाति । लक्षण- युत्तया लक्षणद्वारण युक्त्या हृदयानुभरवेशनया हेतुभूतया संपाद्ययेत्यथः । अगोदरच्या विवेचन 'चा उपसंहार व दुसऱ्या वक्तव्याचा उपक्रम नाटकलक्षणमेततू! इत्यादी आर्येत करतात. क्वचित लक्ष्य प्रसिद्ध असते. परंतु प्रस्तुत विषयात लक्षणाच्या साहाय्यानेच त्याची प्रयत्नपूर्वक सिद्धी करावी लागते हे दाखवितात, : लक्षणयुक्त्या' म्हणजे लक्षणाच्या द्वारा युक्तीने म्हणजे हेतुस्वरूप व साध्य करावयाच्या अंत:करणातीळ प्रवेशाने असा अर्थ. 'लद्व्य' म्हणजे ज्याचे लक्षण करावयाचे तो पदार्थ, - 'युक्त्थाः मुळात 'युक्तिः आहे. परंतु पुढील तृतीयान्त शब्द ह्या शब्दाची व्याख्या करण्यासाठी योजिळे आहेत, तेव्हा हा शाब्द ही तृतीयेतच असला पाहिजे. “हेतुभूतया? आणि 'संपाद्यया? ही 'हृदयानुप्रवेशानया? ची बिशोषणे होत. युक्तिचा अर्थ हृदयात अनुप्रवेश असा केला आहे. हेतुथूत हे याचे विशेषण समर्पक वाटत नाहो. अश्णी शक्‍यता आहे की मूळ पाठ 'लक्षणद्वारेण युक्त्या हृदयानुप्रवेशनया, हेतुभूतेन तंपादयेत्यर्थ:” असा होता. हेतुभूत हे लक्षणाचे वर्णन समुचित होईल. यत्र कविरात्मशक्त्या वस्तु शरीरं च नायकं चेव । च _ ओत्पत्तिक प्रकुरुते प्रकरणमिति तहुधेज्ञेयम ॥ ४० ॥ जेव्हा कवी आपल्या प्रतिभेने कथानक, त्याची मांडणी तसेच नायक यांची स्वतंत्र अशा स्वरूपाची निर्मिती करतो तेव्हा ते प्रकरण होय असे सुक्ष माणसांनी जाणावे, १ नि नाटकं. १८.४१ ७३ तत्र प्रकरणस्य सभेदस्य लक्षणं नामनिवचनं चाह यत्र कविरात्मशक्तयेति । वस्त्वाते साध्यं फळम्‌, शरीरमितति तदुपायं वस्त्वधिकं काव्यामिधेयम्‌, आत्म- शत्तया प्रकुरुते यत्काव्येन तत्पकरणमितति बुधेज्ञयांमाति संबन्थः । त्यात भिन्न प्रकार असलेल्या प्रकरणाचे लक्षण व नावाची व्युत्पत्ती 'यत्र कविरात्म- राक्त्या' ह्या आर्येत सांगतात. वस्तु म्हणजे साध्य करावयाचे फल, शरीर म्हणजे त्याचा उपाय, वस्तूहून अधिक, ज्याला काव्य असे नांव आहे ते, - स्वतःच्या राक्तीने ज्या काव्याने उत्पन करतो ते प्रकरण असे सुज्ञ माणसांनी समजावे अंसा अन्वय. 'लक्षणं) मुळात 'सलक्षण'' आहे. पण ज्या अर्थी पुढे 'च' वापरला आहे त्या अर्थी लक्षण असाच मूळचा पाठ असणार हे उघड आहे. -- 'वस्त्बधिकं' मुद्रित पाठ 'वस्त्वादिकं? असा आहे. पुढील अध्यायाच्या पहिल्या छोकात इतिवृत्त म्हणजे कथानक हे नाऱ्याचे शरीर असे म्हटले आहे. तदनुरोधाने शरीर म्हणजे (फल ह्या अर्थी) वस्तु अधिक इतिवृत्ताचे इतर अंश असे येथे म्हटलेले असावे. - 'येन प्रकुरुते तत्मकरणम्‌? ही प्रकरण शब्दाची व्युपपत्ती, यदनार्षमथाहार्य काव्य प्रकरोत्यभूतगुणयुक्तम्‌ । उत्पन्नबीजबस्तु प्रकरणमिति तढपि विज्ञेयम्‌ ॥ ४१ ॥ जे काव्य इषींच्या ग्रंथावर आधारित नसून (दुसरीकडून) घेतलेले असते (व) कवी ज्याची पूर्वी त्यात नसलेल्या गुणांनी युक्त अशी रचना करतो ते (काव्य) सुद्धा, त्यातील बीज व॒ कथानक नवीन उत्पन्न झालेळे असल्यामुळे, प्रकरणच होय असे जाणावे. यत्र समुत्पाद्यं न भवति तत्र यो5नुत्पारद्यो5शः स कुत्रस्थो ग्राह्य इति दर्श- यितुमाह यदनार्षमित्यादि । अनार्षमिति पुराणादिव्यतिरिक्तव्ृहत्कथाद्युपनिबद्ध मूळदेवचारतादि । आहार्यामिति पूर्वकविकाव्याद्वाहरणीयं समुद्रदत्तचेष्टितादि । ननु तत्रांशे कविकृतत्वाभावात्कथं प्रकरणवाचोयुक्तिरित्याह-उत्पन्ने पूरवीसेद्धे बीजं वस्तु च यत्र ताहशमापि तत्‌, यदि अवस्तुभूतेः बहत्कथादो काव्यान्तरे वाप्रसिद्ै-. गुणेयुक्त प्रकरोति, तदिति तस्माद्धेतोरेतदापि प्रकरणम्‌ । तेन बहत्कथादिसेद्धस्य मूळदेवादेरधिकावापं कविशक्तियंदा विधत्ते तदा प्रकरणम्‌ । एवं पूर्वकविसमृत्ये- क्षितसमुद्रदत्तचेष्टितादिवर्णने;पि आधिकावापे विद्धत्कविः प्रकरणं कुर्यादिति तात्पर्यम्‌ । | | १ नि यदनर्थमपाहायं, का यंदनायकहार्यकार्य, घो यंदनार्षनायकहायं-. ' ७४ . भसाट्यशास्त्र जेथे कथानक स्वतंत्रपणे निर्मिलेळे नसते तेथे जो न निर्मिळेला भाग तो कोठून व्यावयाचा ते 'यदनार्धेम! इत्यादी आर्येत दाखवितात. अनार्ष म्हणजे पुराणादिव्यतिरिक्त अशा ब्रृह्तत्कथादी ग्रंथात सांगितलेले मूलदेवाचे चरित इत्यादी. आहार्य म्हणजे अगोद्रच्चा कवींच्या काव्यातून घेता येग्यासारखे समुद्रदत्ताचे चेष्टित इत्यादी. त्या अंशामध्ये कवीच्या स्वतंत्र निर्मितीचा अभाव असता त्याळा प्रकरण कसे म्हणता येईल या रंकेचे समाधान करतात - उत्पन्न म्हणजे अगोदरच तयार असलेले बीज आणि वस्तु ज्यात आहे अशा तऱ्हेचे असेळ तरी ते जर मूळ वस्तूत नसलेल्या म्हणजे बृहत्कथा वगैरेत किंवा दुसऱ्या काव्यात प्रसिद्ध नसलेल्या गुणांनी युक्त असे केले तर तत्‌ म्हणजे त्या कारणासाठी हे सुद्धा प्रकरण'च. तेव्हा वृह्त्कथादीत तयार असलेल्या मूलदेव वगैरेच्या चरितात कविशक्ति अधिक भर घालते तेव्हा प्रकरण होते. त्याचप्रमाणे पूर्वीच्या कवींनी कथ्पिलेल्या समुद्रदत्ताचे चेटित आदीच्या वर्णनात सुद्धा अधिक भर घाळून कवीने प्रकरण करावे असा तासर्यार्थ, स कुत्रस्थो) मुळात “स? ऐवजी “न' आहे. तो उघडच चूक आहे. - "ननु तत्रांशो मुळात 'ननु' नंतर “च' अधिक आहे. परंतु तो निरर्थक असल्याकारणाने गाळला आहे. - 'पूर्वसिद्धे' ही 'उतन्ने' ची व्याख्या आहे, हे दोन्ही शब्द नपुंसकलिंगी प्रथमेच्या ह्विवचनात आहेत. -- “यदि अवस्तुभूतै? ही मुळातील 'यदिति वस्तुभूतैः? ची दुरुस्ती आहे. आर्येतील 'अभूतगुणयुक्तम्‌' ची व्याख्या येथे असल्यामुळे नञजर्थवाचक “अ आव्यक आहे हे उघड आहे. - “आवाप? म्हणजे भर. ' यत्नाटके मर्याक्त वस्तु शरीरं च टात्तभेदाश्र । तत्मकरणेडपि योज्यं सलश्ष्ण सर्वसंधिषु तु ॥४२॥ नाटकाच्या संबधात कथानक व त्याची मांडणी आणि निरनिराळ्या वृत्तींची योजना ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या प्रकरणातही त्यांच्या वेशिष्ट्यांसह सर्व संधीमध्ये योजाव्यात. नेन्वस्येतिव्ृत्तस्य कथं योजनेत्याशडून्य पूर्वोक्तमेवातिदेदाद्वारेण स्मारयि- तुमाह यज्नाटके मयोक्तमिति । 'नानाविभूतियुक्तमृद्धिविळासादिभिः' इत्यादिनाय- केफटवत्त्वमुक्तम्‌ तद्ठस्तु, शरीरमिति “अडडुप्रवेशकाढयम!, वृत्तिभेदाश्व 'नाना- रसभावचेषितेबंइधा सुखदुःखोत्पत्तिकृतम' इति, सलक्षणमित्यडुप्रवेशकयोर्लक्षण- युक्तामेति । केचित्तु शरीरग्रहणेन गतार्थ तस्माहृक्षणमित्यक्षुपारमाणम्‌ अडुघन्तर- १ का रसाश्रयोपेतम्‌. २ नि कार्य केवलमुत्पाद्यवस्तु स्यात. १८.४२-४४ ७७१ संघानहेतुपु च प्रवेशकेषु यत्प्रयोज्यमुक्त॑ “दिवसावसानकार्य यद्यडडः नोपपद्यते? इत्यादि तत्सवे प्रकरणे$पि योज्यमित्याहूः । ह्या प्रकरणाच्या कथानकाची योजना कशी करावी अशी शंका घेऊन पूर्वी सांगितलेल्याचीच अतिदेशद्वारा आठवण करून देण्यासाठी 'यन्नाटके मयाक्तम? ही आर्या सांगतात. “नानाप्रकारच्या विभूतींनी व क्रद्वि, विळास आदींनी युक्त' इत्यादी वचनांत नायकाच्या फलपराप्तीचा निर्देश आहे तोच वस्तु, शरीर म्हणजे 'अडुः व प्रवेशाक यांनीं समृद्ध असलेले' ते, आणि वृत्तिभेद म्हणजे 'विविध प्रकारच्या रस व भाव यांच्याशी संलग्न चेष्टितांनी पुष्कळ प्रकारे सुख व दुःख उत्पन्न करणारे' याने निर्दिष्ट झालेले, सलक्षण म्हणजे अंक व प्रवेशक यांच्या लक्षणांनी युक्त असलेले. परंतु काही टीकाकारांचे म्हणणे आहे की शरीर शब्दाच्या अर्थातच याचा अन्तर्भाव झालेळा आहे, तेव्हा लक्षण म्हणजे अंकाचे परिमाण आणि अंकामध्ये संधान करणाऱ्या प्रवेशकांमध्ये योजावयास दिवसाच्या अखेरीस होणारे कार्य जर अंकामध्ये समाविष्ट होत नसेळ' इत्यादीमध्ये सांगितलेले सर्व काही प्रकरणामध्ये सुद्धा योजावे. 'नानाविभूति- इ०' व अड्ूप्रवेशाकाढ्यम' बर अकराव्या आर्येत आहेत, “'नानारस- इ० बाराव्या आर्येत. - 'तद्रस्तु' वस्तु स्हणजे नायकाला प्राप्त होणारे फळ असा अर्थ मागे सुद्धा केळा आहे. - अड्गूपरिमाणम्‌? म्हणजे अंकाच्या प्रयोगाला लागणारा काल अंकांची संख्या असा अर्थ करता येणार नाही. कारण संख्या सांगतानाच प्रकरणाचा सुद्धा निर्देश केला आहे (पंचवि- सावी आर्या). त्यासाठी अतिदेश आवद्यक नाही. - 'दिवसावसान- इ०? ही वरील तेविसावी आर्या. बिप्रवणिक्सच्चिवानां पुरोहितामात्यसाथंवाहानाम्‌ । चरितं यन्षेकविधं क्ञेयं तखकरणं नाम ॥४३॥ नोदात्तनायककृतं न दिव्यचरितं न राजेसंभोगम । बाह्यजनसंप्रयुक्त तज्ज्ञेय प्रकरणं तज्ज्ञेः ॥ ४४ ॥ ब्राहण, वणिक, सचिव, पुरोहित, अमात्य व साथेवाह यांचे चे अनेक प्रकारचे चरित ते प्रकरण ह्या नावाने ओळखावे. ज्यात उदात्त नायकाची योजना नाही, ज्यात देवांचे चरित नाही, ज्यात राजाचा संभोग नाही आणि जे बाह्य जनांनी प्रयुक्त केलेले असते ते प्रकरण होय असे तज्ज्ञांनी जाणावे १ नि यत्लेक-, का यदनेक-. २ नि -संभोग:. ३ नि ज्ञेय तत्म्रकरणं नाम. ७६ नाट्यशास्त्र आतेदेशायातमतिप्रसडठ॑ वारयत्यार्यादर्येन विप्रवणिगित्यादिना । सचिवो मन्त्री, अमात्योडधिकृतः, साथंवाहस्तावत्पण्यानामाहर्ता तदेशक्रयविक्रयक्कतो वणिजो5न्य एव । नैकविधमित्यनेकरसयुक्तामेत्यर्थः । 'नेकरसान्तरावोहितः' इति तदतिंदेशमात्रामिति सूचितम । प्रख्यातोदात्तेति प्रसक्त निषेधाति नोदात्तोते । तन्निषेधे चार्थान्नाटके वैपरि- त्यमायातम्‌ । नाटके च देवो नायकत्वेन निषिद्ध इति तत्मकरणे कतंव्यत्वेनापद्यत इत्याह न दिव्यचरितामिति । तथा *दिव्याश्रयम! इति यदतिदेशादू देवानां प्रयोज्यत्वं प्रसक्त॑ तढप्यनेन निषिद्धम । नाटके देवानामिव इहापि राज्ञः प्रवेश शट््यमाने निराकरोति न राजसंभोग इति । यदि वा औत्पत्तिकत्वेपि न राजो- चितसंभागोत्येक्षा विप्रादिषु करणीयेत्यनेन शिक्षयाते । अत एव राजानियम उचितो5न्तपुरजनः कज्चुकिप्रभृतिः तद्मतिरिक्तो बाह्यजनो5त्र चेटदासादिः प्रवेशकादी कार्य इत्यर्थः । अतिदेशामुळे होणाऱ्या अतिप्रप्तंगाचे 'विप्रवणिक! इत्यादी दोन आर्यांत निवारण करतात. सचिव म्हणजे मन्त्री, अमात्य म्हणजे अधिकारी, तर सार्थवाह म्हणजे बाहेरच्या देशांतून माळ आणणारा, देशातच खरेदीविक्री करणाऱ्या वणिजापेक्षा निराळा. नेकविध म्हणजे अनेक रसांनी युक्त असा अर्थ, 'नैकरसान्तरविहितः' याचा हा केवळ अतिदेश आहे असे सूचित होते. 'प्रर्यातोदात्तः याची अतिदेशाने होणारी प्राप्ती 'नोदात्त' इत्यादि वचनाने निषिद्ध ठरविली आहे. त्याचा निषेध केल्याने अर्थातच नाटकापासून विपरीतता सिद्ध होते. आणि नाटकात नायक म्हृणून देव निषिद्ध आहे तेव्हा प्रकरणात त्याची योंजना करण्याचा प्रसंग येईल म्हणून “न दिव्यचरितम? असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे “ढिव्याश्रयम! याच्या अति- देशामुळे प्राप्त होणारी जी देवांची योजना तिचा सुद्धा ह्याने निषेध झाला आहे. ज्याप्रमाणे नाटकात देवांचा प्रवेश त्याप्रमाणे येथे राजा'चा प्रवेश संभाव्य अशी शंका उत्पन्न झाल्यास तिचे निराकरण 'न राजसंभोगम्‌? या शब्दांत करतात. अथवा ह्या वचनाने काल्पनिक असले तरी कथानकात विप्र आदींच्या बाबतीत राजाळाच उचित अशा तंभोगाची कल्पना कराव- याची नाही असा नियम शिकवितात. म्हणूनच राजाच्या नियमाळा उचित असे कद्चुकिप्रभरती अन्त:पुरातील सेवक त्यांहून व्यतिरिक्त असे जे बाहेरचे सेवक, चेट, दास वगैरे त्यांची ह्या प्रकरणात प्रवेशक वगैरेमध्ये योजना करावी असा अर्थ. | “ नेकरसान्तरविहितः” हे वचन वरील सतराव्या आर्येत आठे आहे. १८.४५ ७७७ “नाटके वैपरीत्यम्‌ः म्हणजे नाटकाविषयी जे सांगितले आहे त्याच्या उळट प्रकरणात समजावयाचे. याची काही उदाहरणे पुढील वाक्यांत दिळी आहेत; त्याचबरोबर या नियमाचे काही अपवादही सांगितले आहेत. - 'प्रवेशो शड़ूयमाने? मुद्रितात "'शड्ूमाने' आहे. पण कमणि धातुसाधित विदोषण आव्यक आहे हे उघड आहे. हस्तलिखितात "प्रवेशो5डूःमानो? असा भ्रष्ट पाठ आहे. - “राजनियम उचितः' पहिला शब्द सप्तमी एकवचनात आहे. त्यातील नियम शब्द विशेष समर्पक नाही. प्रासाद अथवा परिवार या अर्थाचा दशाब्द अधिक समुचित झाला असता. दासविदस्रेष्ठियुतं वेशस्त्र्युपचारकारणोपेतम । मन्दकुलस्त्रीचरितं काव्यं कार्य प्रंकरणे तु ॥४५॥ परु, प्रकरणात दास, विट, श्रेष्ठी यांनी युक्त, वेश्यांच्या उपचारांच्या हेतूंनी युक्त (ब) कुल ल्रियांचे थोडेसेच चरित असलेले असे काव्य रचावे. एतदेव दर्शयाते दासविटश्रेष्ठियुतमिति । कज्चुकिस्थाने दासः, विदूषक- स्थाने विटः, अमात्यस्थाने भ्रेष्टीत्यर्थः । वेश्यावाटो वेशः तत्र या स्त्री तस्या य उपचारो वेशिके वक्ष्यते स कारणं यस्य शह्ठारस्य तेनोपेतम्‌ । कुलस्त्रीविषयं चोरे मन्दं यत्राति । उपाध्यायास्तु सन्दकुलानां स्त्रीणां चरितं यत्रेत्याहुः । तेन कुलाडु- नापि तत्र मन्दकुळेवेति दशितं भवति । एतदेवांभिमन्यमानेन पुष्पदूषितके अशोकदत्तादिशब्दाकर्णनेन समुद्रदत्तस्य शन योपानेबद्धा सा न दोषाय । निर्व- हणान्तोपयोगिनी हि नन्दयन्तीनिवासनं तस्याश्व ग्रहान्तरावस्थानस्‌ । इदमेव मुखसंधो मूलं परपुरुषसंभावनामूळत्वात्‌। एवसनस्युपगसे तु शवशुरेण वध्वा असंनि- हिते पु्रे निर्वासनं शबरसेनापतिगृहे$वस्थानमित्युत्तमप्रकृतीनामनुपपञ्ञमेव । तस्मात्स्ववर्गापेक्षयेदमुत्तमत्वम। अद्यतने राजोचितमुत्तमप्रक्वातित्व वाणिडय़ात्रे समा- रोप्य तद्दूषणं यत्कृतं न तेन त्रह्मयशःस्वामियरशः खण्डितम्‌, अपि तु स्वयश एव। ये हि परयशो मिथ्या कळड्टायितुमुद्यतास्तेषां स्वयश एंवेति अयशोमात्राव- रोषताम्‌ । न हि नायकशाब्दमात्रादेव दुर्योधनवदेव शक्काद्यनुचितम्‌ । प्रकरणे हि ताह्झ एव नायकः, केवळमन्यवणिगपेक्षया स उत्तमो5स्तु । व्युत्पायश्व त्ैवंविध एवेत्यलळमवान्तरेण । हेंच “ दासविटश्रेष्ठियुतम्‌' या आर्येत दाखवितात. कञ्ययुकीच्या स्थानी दास, विदूषकाच्या जागी विट, अमात्याच्या जागी श्रेष्ठी असा अर्थ. वेश म्हणजे वेश्यांचा मोहछा, १ नि करणो-. २ नि प्रयोगे तु. ग्र नाट्यशास्त्र तेथे जी खत्री तिचा उपचार, जो वैशिक प्रकरणात सांगितळा जाणार आहे, तो ज्या शुह्ठाराचे कारण त्याने युक्त. कुलख्रियासंबंधीचे चेष्टित ज्यात थोडे आहे असे. परंतु आमच्या गुरुजींच्या _ म्हणण्याप्रमाणे सामान्य कुलांतीळ स्त्रियांचे चरित ज्यात आहे असे. म्हणून त्यात कुलख्नी सुद्धा कमी दर्जाच्या कुळातील'च दाखविली जाते. हेच मत स्वीकरून पुष्षदूषितक प्रकरणात अशोकदत्त आदींचे शब्द ऐकल्यामुळे समुदरढः्ताच्या मनात जो संशय दाखविल्या आहे तो दोषास्पद नाही. कारण नन्दयन्तीचे निर्वासन व तिचा दुसऱ्या गृहात वास ही निवेहणसंधी'च्या शेवटी उपयुक्त होतात. हेच मुखसंधीतीळ मूळ, कारण परपुरुषाविषयीचा संशय हेच त्याचे सूळ आहे. असा अर्थ जर स्वीकारला नाही जर पुत्र उपस्थित नसताना सासऱ्याने सुनेला घराबाहेर धाळवून देणे व शबरसेनापतीच्या घरी तिचे राहाणे ह्या गोष्टी उत्तम प्रकृतीच्या व्यक्तींच्या बाबतींत उपपन्न नाहीत खास. म्हणून हे उत्तमत्व त्यांच्या स्वतःच्या वर्गाच्याच मानाने. राजाळा उचित अशा उत्तम प्रकृतीचा आजच्या केवळ वणिक असलेल्या नायका- . वर आरोप करून त्याला जे दोषास्पद ठरविले आहे त्याने ब्रह्मयशःस्वामीच्या यशाचा अपकर्ध होत नसून स्वतःचेच यश खंडित होते. कारण जे दुसऱ्यांचे यश खोटेच कलंकित करावयास उद्युक्त होतात त्यांचे स्वतःचेच यश केवळ . अकीतीरूपाने शिछुक राहाते. आणि | केवळ नायक शब्द लावला आहे म्हणून त्याला-दुर्योधनाप्रमाणेच--संशय बरे येणे अनुचित आहे असे मुळींच नाही. कारण प्रकरणात तसाच नायक असतो, केवळ इतर वणिजांच्या मानाने तो उत्तम असतो आणि त्यापासून बोध घेणाराही त्याच प्रकारचा असतो. हे विषयांतर आता पुरे. कर, | | 'उफ्चार? म्हणजे चाल्वळणूक, वागण्याची तहा. - 'वैशिके' हे तेविसाव्या अध्यायाचे नाव आहे. -- 'मन्दकुला' म्हणजे उच्चकुळातील नाही अशी. - 'पुष्पदूषितक?* हे प्रकरण सध्या उपलब्ध नाही. "निर्वहणान्तोपयोगिनी' हे नपुंसकलिंगी प्रथमेचे द्रिवचन आहे. आणि "निर्वासनं अवस्थानं च? या दोहोंच्या वर्णनात्मक आहे. याचसाठी मुळातील. 'गृहान्तरावस्था' च्या . ञञागी 'ग्रहान्तरावस्थानम” हा पाठ _ स्वीकारला पाहिजे. पुढेही अवस्थान असेच रूप वापरले _ आहे. - 'राजोचितमुत्तमप्रकृतित्वम? ही दुरुस्ती आहे. 'समारोप्य' ळा आवश्यक असलेले हे. | केम. मूळ पाठ “राजोचितानासुत्तमपकृतीनाम? असा आहे. _ त्यातील षष्ठींचा मुळीच अन्वय _ छावता येण्यासाखा नाही. - 'यद्दूषणम? ह्या टीकाकाराने पुष्पदूषितक प्रकरणात असा दोष दाखविला होता की त्याचा नायक उत्तम प्रकृतीचा असूनही त्यानें आपल्य[ पत्नीच्या चारिज्र्या- विषयी संशय घेतला; हे त्याच्या उत्तम प्रकृतीशी विसंगत आहे. -- 'ब्रह्मयश!स्वामिन? हे त्या _. प्रकरणकर्त्यांचे नांव. - 'परयशो मिथ्या? मुळात _'मिथ्यायशो मिथ्या' असा पाठ आहे. तो उघडच भ्रष्ट आहे. पुढील 'स्वयदाः” लक्षात घेता या ठिकाणी “परया: असण्याचाच संभव स्पष्ट _ होतो. - “स्वयशश एवैति अयशोमात्रावशेषताम? ही सुद्धा दुरुस्ती आहे. मुळात 'एवेति यश्ोमा- ___ मात्रावशेषता? असे आहे. त्यातीळ “इति? निर्थक आहे आणि शेवटच्या प्रथमेचा काहीच अन्वय लागण्यासारखा नाही. तसेच यदा केवळ यडारूपानें शिल्लक राहाते असे म्हटले असण्याची ______._. शक्‍यता नाही. मागच्याच वाक्यात ते खण्डित होते असे म्हटले आहे. - 'दुर्योधनबदेव? वल र १८,४६-४७ ७७९ वेणीसंहार नाटकाच्या दुसऱ्या अंकात दुयौधन आपल्या पत्नीच्या चारिञ्र्याविषयी साशंक होतो. ते जसे त्याच्या बाबतीत अनुचित नाही, तसे ते पुष्पदूषितकाच्या नायकाच्या बाबतीतही नाही असा भावार्थ. पुष्पदूधितक प्रकरणाच्या कथानकावर कोणा टीकाकाराने आक्षेप घेतला होता, त्या संबंधात अभिनवयुप्ताने त्याच्यावर कडक टीका करून कथानक निर्दोष असल्या'चे प्रतिपादन केळे आहे. त्या टीकाकाराचीही काही माहिती नाही. - 'एबंबिधः? म्हणजे अगदी उत्तम प्रकृतीचा नसलेला. सचिवश्रेष्टित्राह्मणपुरोहितामात्यसाथेबाहानाम । ग्रृहवाता यत्र भवेक्न तत्र वेश्याड्ूना काया ॥ ४६॥ यादे घेशयुवतियुक्त॑ न कुलस्त्री संगमोडपि तत्र स्यात्‌ अथ कुलजनप्रयुक्त॑ न वेशयुवतिभेवेत्तत्र ॥ ४७ ॥ ज्यामध्ये सचिव, श्रेष्ठी, ब्राह्मण, पुरोहित, अमात्य आणि सार्थवाह यांच्या घरांतीळ घडामोडी असतीळ त्यात वेश्येची योजना करू नये. जर (ते काव्य) वेश्येने युक्त असेल तर त्यात कुलख्लीचा समावेशही असू नये, आणि जर त्यात कुलख्लीची योजना केलेली असेल तर त्यात वेश्येचा समावेश असू नये. अथास्य सप्तविधस्यापि प्रकरणस्य प्रत्येकं भेदत्र्‍यं दर्शयितुमा्यातरयं . पठाते सचिंवेत्यादि । सचिवादीनां संबन्थिनी यत्र गाहस्थ्योचिता वार्ता पुरु- षार्थसाधकमितिवृत्तं, न तत्र वेश्याडुना नायिकात्वेन निबन्धनीया । विटादीनां तु नायकत्वेन कृतानां गाहंस्थ्याचिन्तायां सापि निबन्धनायेत्युत्त॑ भवति । यादे ग्रृहस्थाचिन्तावणेनं न भवति श्रेष्टिसार्थवाहादीनां च विप्रादिवदविरुद्धो वेश्यायोग इति सापि प्रदर्शनीयेति लब्धमर्थात्‌ । तत्र न तु कुलस्त्रीसंगमः कतंव्यः । तदाह यादि वा वेशयुवतीति अथ कुलजनप्रयुक्तमिति । एवं श्रेटि- सचिवार्दिविषयं शुद्ध भेदद्दयमुक्तम्‌ । आता ह्या सात प्रकारच्या प्रकरणाचे प्रत्येकी तीन भेद आहेत हे दाखविण्यासाठी 'सचिव-' इत्यादी तीन आर्या सांगतात. ज्यामध्ये सचिवप्रभृतींच्या विषयीची गृहस्थ- वर्माला अनुरूप अशी गोष्ट म्हणजे पुरुषार्थ साध्य करणारे कथानक असेळ त्यात वेश्येची नायिका म्हणून योजना करू नये. परंतु बिट आदौंची नायक म्हणून योजना केली असल्यास गृहस्थधर्माचा विचार अभिप्रेत असला तर वेश्येची सुद्धा योजना करावी असा अथे होतो. जर गृहस्थधर्माचे वर्णन नसेळ तर ब्राह्मण आदींच्या प्रमाणे १ नि - संगमर्हति ततः, का -संगमो भवेत्तत्र. ८० नास्यशास्त्र (2 हा र श्रेष्ठी, साथवाह आदोंचाही वेऱ्येशी समागम निषिद्ध नसल्यामुळे तिचीही योजना करावी असे अर्थात प्राप्त होते. परंतु त्या ठिकाणी कुलल्लीचा समावेश करू नये. हेच “यदि वेशयुवति' इत्यादी व 'अथ कुलजनप्रयुक्तम? इत्यादी ह्या वचनांत सांगितळे आहे. याप्रमाणे श्रेष्ठी, सचिव आदोंच्या संबंधात प्रकरणाचे दोन शुद्ध भेद सांगितले आहेत. 'सप्तविधस्य” वस्तुतः सात प्रकारच्या प्रकरणांचा आतापर्यंत कोठेच उललेख नाही. चाळिसाव्या आरथेंचा उपक्षेप करताना तीत भेदांचा निदेंश आहे असे म्हटळे आहे (प्रकरणस्य समेदस्य लक्षणम्‌ ). परंतु प्रत्यक्ष आयेंत त्यांच्या निर्देश नाही, इतकेच नव्हे तर तिच्याबरील टीकेतही तो नाही. असा संभव दिसतो की तेचाळिसाव्या आर्येत नि्देंशिलेळे विप्न आदी नायकांच्या अनुरोधाने हे मेद कल्पिळे आहेत. तथापि त्या ठिकाणी सहाच प्रकारच्या नायकांचा निर्देश आहे व प्रस्तुत आर्येतही त्या सहाच जणांचा उललेख केला आहे. येथील टीकेवरून असे दिसते की सातव्या प्रकारचा नायक विट हा मानला आहे. आणि ह्या सात प्रकारच्या नायकांमुळे प्रकरणाचे सात प्रकार होतात असे अमिनवगुप्ताचे मत दिसते. - ।विप्रादिवदविरुद्धः' याचा अर्थ असा दिसतो की विप्र आदींना वेश्या- गमन निषिद्ध आहे, तसे ते श्रेष्टी, सार्थवाह बगेरेंना नाही. बिप्रादींना ते निषिद्ध नाही त्याप्रमाणेच शरेष्ठीप्रमृतींनाही नाही असा अर्थ असंभवनीय आहे. यदि घा कारणयुक्त्या बेशकुलॅखरीकृतोप'चारः स्यात । अविकृतभाषाचारं तत्र तु पार्थ प्रयोक्तव्यम्‌ ।। ४८॥ अथवा जर कारणपरत्वे वेश्या व कुलश्ली यांची योजना केली असेळ तर त्या ठिकाणी शुद्ध भाषेचा उपयोग केलेल्या पाठ्याची योजना करावी. विटादिविषयस्तु संकीर्ण एव वेश्याकुळजाभ्यां भवति । तदाह यदि वा कारणयुस्त्येति । विटे वेदास्त्री प्रधानत्वात्पूवमुक्ता । कुलस्त्री तु तत्रापि पितृपिताम- हाद्यनुरोधादिति कारणगशाब्देनोक्तस्‌ । अविकृता भाषा कुलस्त्रियाः शोरसेनी, वेश्यायाः संस्कृता, आचारः कुलस्त्रियां विनयप्रधानः अन्यस्यां तद्विपरीतः । तथा च देवोचन्द्रगुपे वसन्तसेनामादिड्य साधवस्योक्तिः - आनन्दाश्र सितेतरोत्पळरुचोराबध्नता नेत्रयोः प्रत्यज्षेषु वरानने पुळाकिषु स्वेदं समातन्वता । कुर्वाणेन नितम्बयोरुपचयं संपूर्णयोरप्यसौ केनाप्यस्पृशाताप्यधोनिवसनग्रन्थिस्तवोच्छ्वासितः ॥ इति । अन्न हि व्युत्पाद्यस्तथाविध एव ताहञ्येव च बरन्तान्ते । एवमेत एकविरातिः प्रकरणे भेढाः । | १ नि प्रकरणयुक्‍्त्या. २ का -स्त्रीसंगमो न स्यात्‌, घो -स्त्रीसंगमो5थ वा स्यात्‌. 2८.४९, टश विट आदींच्या विषयीचे प्रकरण मात्र वेश्या व कुलल्ली यांच्यामुळे फक्त संमिश्रच होते. ते 'यदि वा कारणयुक्तया' या शब्दांत सांगतात, विटाच्या संबंधात वेश्या प्रधान असल्या- मुळे तिचा प्रथम निर्देश केला आहे. त्या ठिकाणी सुद्धा कुलख्री पिता, पितामह इत्यादींच्या अनुरोधाने असते हे कारण ह्या शब्दाने सांगितले आहे. विकृत नसलेली भाषा म्हणजे कुल- स्रीची शोरसेनी, वेश्येची संस्कृत. अविकृत आचार कुलख्तीचा विनयप्रधान, वेश्‍्येचा त्याउलट. उदाहरणाथ, देवीचन्द्रगुप्त नाटकात माधवाची वसन्तसेनेळा उद्देशून पुढीळ उक्ती - 'हे सुमुखि, नीलकमलांचे सौंदय असलेल्या तुझ्या नेत्रांत आनंदाश्रू आणणाऱ्या, पुळकित झालेल्या तुझ्या प्रत्येक अवयवात स्वेद उत्पन करणाऱ्या, परिपूर्ण असलेल्या नितंबातही वृद्धि करणाऱ्या कोणी तरी ही तुझ्या अधोवक्षाची गाठ स्पशी न करताही सोडली आहे. या ठिकाणी बोध घेणारा त्याच प्रकारचा आणि बोध तसल्याच वृत्तान्तापासून होतो. याप्रमाणे प्रकरणाचे हे एकवीस मेद होत. 'अविकूत? म्हणजे स्वाभाविक असा अर्थ केलेला दिसतो. - 'देवीचन्द्रगुप्तः ह्या निर्देशात काहीतरी गोंधळ असावासे वाटते. ह्या नावावरून हे स्पष्ट होते की ह्या रूपकाचा नायक चन्द्र- गुप्त म्हणजे एक राजा असणार. तेव्हा हा रूपकप्रकार नाटक होय, प्रकरण नव्हे. विशेषतः विट नायक असलेल्या प्रकरणाचा विचार चाळू असता ह्या नाटकातील उदाहरण अनुचितच ठरेल. पुढील वाक्यात माधव ब वसन्तसेना ही ह्या रूपकातील दोन पात्नांची नावे दिळी आहेत. ती बिट व वेद्या यांची असण्याची दक्यता आहे. तसे असल्यास हे उदाहरण एका प्रकरणातून घेतले आहे असे म्हणता येईल. पण त्याचे नाव देवीचन्द्रगुप्त असणे शकय नाही. त्या नाटकात बिट व वेड्या यांची योजना असण्याचाही संभव फारसा नाही. तेव्हा हे नाव येथे चुकीने पडळे आहेसे दिसते. - 'केनापिः यात अनुरागाचा अथवा प्रेमाचा निर्देश आहे. - 'बृत्तान्ते' मुळात वृत्ताडे' आहे. त्या- पासून काही अर्थबोध होत नाही. - “एकबिंद्यतिः' ही संख्या कशीं काय सिद्ध होते ते स्पष्ट नाही. विट धरून सात प्रकारचे नायक असलेले सात प्रकार मान्य केलें तरी त्या प्रत्येकाचे तीन तीन प्रकार होतात असे जे प्रारंभी विधान केळे आहे त्याला पुढील विवेचनात पुष्टी मिळत नाही. श्रेष्ठी, सचिव आदी नायक असलेल्या सहा प्रकारांचे दोन छद्ध भेद होतात - एक कुलस्त्री नायिका असलेले ब दुसरे वेव्या नायिका असलेले - असे म्हटळे आहे. म्हणजे हे वारा प्रकार मानता येतील. विट नायक असल्यास फक्त संकीर्ण म्हणजे एकच प्रकार संभवतो असे स्पष्ट म्हटळे आहे. म्हणजे एकूण तेराच भेद संभवतात, एकबीस नाही. नार्यदर्पपात नायक, फल आणि वस्तु हे तीन एकेकटे, दोनदोन किंवा तिन्ही काल्पनिक असता सात भेद व नंतर कुलजा, वेढ्या किंबा दोन्ही यांच्या त्या सात भेदांतील संभाव्य योजनेमुळे एकबीस प्रकार होत असल्याचे म्हटले आहे. अमिनवभारतीत ते अभिप्रेत नाहीत. मध्यमपुरुषेनित्य योज्यो विष्कम्मको5त्र तचचज्ञेः । संस्कृतवचनानुगतः 'संक्षेपार्थः प्रवेशकवत्‌ ॥ ४९ ॥ १ नि संक्षिप्ताथ:. टर नाट्यशास्त्र शुद्ध संकीर्णा वा द्विविधो विष्कम्भकोडपि कतेव्यः । मध्यमपात्रः श्ुद्धः संकीणा नीचमध्यकृतः ॥ ५०॥ अड्डनन्तरालविहितः प्रवेशकार्थक्रियां समभिबीक्ष्य । ऱ्ह स्‌स्षे ७ हू ३ क पात्संधीनामथानां चेव कतेव्यः ॥५१॥ (नाट्याचे) तत्त्व जाणणाऱ्यांनी ह्यामध्ये प्रवेशकाप्रमाणे संक्षेप करण्याचे प्रयोजन असलेला विष्कम्मक नेहमी मध्यम प्रकृतीच्या पात्रांच्या द्वारा व संस्कृत वचनांनी युक्त असा योजावा. विष्कम्मक सुद्धा श्युद्ध अथवा संकीण असा दोन प्रकारचा करावा. मध्यम पात्रे असलेला तो आुद्ध आणि मध्यम व नीच पात्रांनी केलेला तो संकीर्ण. प्रवेशकाने साध्य असलेले प्रयोजन नीट लक्षात घेऊन संधी आणि कार्ये यांचा संक्षेप करून अंकांच्या मध्ये योजना केळेळा (असा विष्कम्मक) रचावा. प्रकरणे नाटकापेक्षया प्रायशः उपयोगिनो5पि मध्यमा एव संभवन्तीति तत्र विष्कम्भकस्य बाहुल्येन संभावनमित्यादायेन प्रकरणे विष्कस्भकं लक्षयति मध्यमपुरुषेरिते । विष्कस्भयत्युपस्तस्भयतीति विष्कस्भकः । संस्कृतेन वचने- नानुगतश्व । संकौर्णो$प्यस्त्येवेति । प्रवेशकेन याथक्रिया कर्तव्या तामेव कर्तव्य- त्वेनाभिसंधाय विष्कम्भकः का्यः । तासेवार्थक्रियां स्पष्टयति संक्षेपात्संधीना- मर्थानां चेति । संधीनां यः संक्षेपो युद्धराज्यभ्रंशादीनां चार्थानां यः संक्षेप- स्तमभिसंधाय अड्डस्याडुयोरवान्तराळे मध्ये विष्कम्भको योज्यः । प्रकरणात नाटकाच्या मानाने बहुतकरून मध्यम पात्रेच उपयोगी असण्याचा संभव असतो म्हणून त्यात विष्कम्मकाची पुष्कळ प्रमाणात संभाव्यता असते हे लक्षात घेऊन 'मध्यमपुरुषै:' इत्यादी वचनात प्रकरणातील विष्कम्मकाचे लक्षण सांगतात. विष्कम्भयति म्हणजे आधार देतो तो विष्कम्मक. आणि संस्कृत भाषेने युक्त असलेळा. हा संमिश्र स्व- ख्पाचाही असतो. प्रवेशाकाने जी प्रयोजनसिद्धी करावयाची असते तीच करावयाची अशा उद्देशाने विष्कम्भकाची रचना करावी. तीच प्रयोजनसिद्धी 'संक्षेपात्संधीनामर्थानां च' इत्यादी शब्दांत स्पष्ट करून सांगतात. संधींचा जो संक्षेप आणि युद्ध, राज्यभ्रंश इत्यादी घटनांचा जो संक्षेप तो लक्षात घेऊन अंकाच्या किंवा दोन अंकांच्या 'अन्तराळे' म्हणजे मध्ये विष्कम्भकाची योजना करावी १ नि विज्ञेऱ'. २ नि -पात्रे:: २३ ब प्रवेशकोड्थ-. ४ का संक्षेपार्थः संधिष्वर्थानां संविधातव्य:. १८.४९-५१ <डे “"नाटकापेक्षया? मुळात 'नायकापेक्षयाः असे आहे. पण प्रकरणात नायकाच्या मानाने मध्यम पात्रे अधिक उपयोगी ह्या विधानाला काही अर्थ नाही. “नाटकाशी तुलना करता? असाच अर्थ अभिप्रेत असणार. - 'बचनेंनानुगतश्व* मुळात “-ग्त च' आहे. पण नपुंसकलिंगी वचन अनुपपन्न आहे. - 'यार्थक्रिया कर्तव्या तामेव' ही दुरुस्ती आहे. मुळातीळ 'वार्थक्रियाकर्तव्यतामेव हा पाठ भ्रष्ट आहे. ५१ व्या आरयेतीळ 'प्रवेशका्थक्रियां' ह्या शब्दाची ही फोड आहे. आरयेतील शब्दाचा हाच पाठ अमिनवगुप्ताला मान्य आहे, बडोदे प्रतीतील 'प्रवेशको्थक्रियां) हा नाही यात शांका नाही. आणि तेच बरोबर आहे. कारण येथे विष्कंमका'चे लक्षण आहे, प्रवेशकांचे नाही. - अडटूस्य मध्ये? याचा अर्थ पुढे प्रस्तावना व पहिला अंक यांच्या मध्ये असा केलेला दिसतो. ननु कोहळेन मुखाडूस्य चायमन्तराळे विहितः - मध्यमपुरुषानेयोज्यो नाटकमुखसंधिमात्रसंचारः । विष्कस्भको हि कार्ये नाटकयोगे प्रवेशाकवत्‌ ॥ इति । तत्कथमुक्तमडुनन्तरानुसारीति । उपलक्षणार्थमेतदित्यदोषः । तथा हि बीजं बिन्दुश्व प्रथममुपक्षिप्येते । तत्र च पृथग्जनस्यालब्धनिवेशत्वात्‌ सचिवादिगोचरत्वाचच तदुपक्षेपे विष्कस्भकस्येवावसर इति यदुच्यते तदडन्तरेष्वापे मन्त्रगुप्ततायां तुल्यमिति तत्राप्यनिवारितो विष्कम्भकप्रवेराः । पृथग्जनो5पि वा यत्र मन्त्रचिन्ता- यामनुभ्रवेश्यते तत्र प्रवेशको5पि प्रथमोपक्षेपे नायोग्य इति युक्त सामान्येनाडा- न्तरानुसारीते । अड्डूस्य मध्य इत्यनेन प्रस्तावनाडऱ्योमध्यवर्तिताप्युक्तेव । प्रवेशकविष्कम्भकविषये लिडुवचनयारतन्त्रत्वात्‌ स्त्रीणामप्यनुप्रवेशाः संख्या- धिक्यस्य च । यावर आक्षेप - कोहलाने ह्या विष्कम्मकाची योजना मुखसंधिविषयक अंकामध्ये करावयास सांगितले आहे - मध्यम प्रकृतीच्या पात्रांची योजना असलेला आणि नाटकाच्या मुखसंधीमध्येच फक्त वापर असळेळा विष्कम्मक नाटकाच्या संबंधात प्रवेशकाप्रमाणे स्चागा.' मग “अड्धाच्या नंतर येणारा' असे कसे म्हटले आहे? आक्षेपाळा उत्तर असे की हे उदाहरणादाखल असल्यामुळे त्यात काहीं दोष नाही. हे स्पष्ट करावयाचे म्हणजे असे-'बीज आणि बिन्दु यांचा प्रथम उपन्यास होतों. आणि त्यांमध्ये सामान्य माणसांना स्थान नसल्या- मुळे आणि सचिव वगैरेंच्या कार्यक्षेत्रात ते येत असल्यामुळे त्यांच्या उपन्यासास विष्कम्भ- काला'च अवकाश आहे! असे जे समर्थन केले जाते ते इतर अंकांमध्येही सछामसलतीच्या गुप्तेसाठी तितकेच लागू पडते म्हणून त्या ठिकाणीही विष्कम्भकाची योजना अस्वीकार्य मानता येणार नाही. आणि ज्या ठिकाणी सामान्य माणसांचा सुद्धा सलाामसळतीत समावेश केला जातो त्या ठिकाणी प्रथम उपन्यासासाठी प्रवेशक सुद्धा अनुचित नाही. म्हणून सामान्यपणे ' अंकाच्या नंतर येणारा' हे क्चन योग्यच आहे. “अंकाच्या मध्ये' याऱचा ६: नाट्यशास्त्र प्रस्तावना व अंक यांच्यामध्ये असा सुद्धा अथे होतो. प्रवेशक आणि विष्कम्भक यांच्या संबंधात ठिंग व वचन उद्दिष्ट नसल्यामुळे स्रीपात्रांचीही योजना संभवते व संख्येने अधिक पात्रांचीही. “चायमन्तराळे? मुद्रित पाठ “चायमन्तरे' आहे. तो समर्पक वाटत नाहीं. - “'अड्वान्तरा- नुसारीतिः वर २८ व्या आर्येत ह्या शब्दात प्रवेशका'चे वर्णन केळे आहे. पण विष्कम्मक प्रवेशकासारखाःच असतो असे म्हटळे असल्यामुळे हे वर्णन विष्कम्मकाला सुद्धा लागू होते. म्हणून हा आक्षेप घेतला आहे. - 'पृथग्जन” म्हणजे दात, दासी आदी कनिष्ठ दर्जाची पात्रे. - “इति यदुच्यते' विष्कम्मकाची योजना मुखसंधीतच करावी ह्या कोहलाच्या मताचे समथन “बीजं बिन्दुश्चव ... ... अवसरः? ह्या वाक्यांत उद्धत केळे आहे. अभिनवगुप्ताचे म्हणणे असे की नंतरच्या संधींमध्ये सुद्धा सचिवादी मध्यम पात्रांच्या द्वाराच दरम्यानच्या घडामोडींचा निर्देश आवद्यक ठरला तर प्रवेशकाच्या ऐवजी वबिष्कम्मकाची योजना करण्यास काही हरत नाही. कोहलाचे 'मुखसंधि- हे शब्द उपलक्षणार्थ आहेत. - “नायोग्यः' ही मुळातील “न योग्य? ची दुरुस्ती आहे. “न योग्य; नें वाक्याचा सुसंगत अर्थ लागत नाही. अभिनवगुप्तांचे असे स्पष्ट मत दिसते की अगदी प्रारंभी सुद्धा, प्रस्तावनेनंतर ताबडतोब प्रवेशकाची योजना करणे सुद्धा गैर नाही. - “लिड्रवचनयोरतन्त्रत्वात प्रस्तुत ठिकाणी ब वर २९ व्या आर्येत 'पुरुषै? असे म्हटले आहे. त्यातील लिडठः व वचन शब्दशः अभिप्रेत नाहीत. अनयोश्व बन्धयोगादन्यो भेढः प्रयोक्‍्तृभिः कार्ये! । प्रख्यातस्त्वितरो वा नाटकयोगे प्रकरणे बा ॥ ५२॥ (खूपकाच्या) ह्या दोन प्रकारांच्या रचनेपासून दुसरा मिन्न प्रकार प्रयोग करणारांनी करावा - नाटकाच्या योगाने अथवा प्रकरणाच्या योगाने (अनुक्रमे) प्रख्यात (नायक आदी) असलेला अथवा तसा नसलेला. ह्या आर्येवर अभिनवगरुपष्ताची टीका नाही. यावरून ती त्याच्यानंतर नाट्यशास्त्रात प्रक्षिप्त झाली असावी. ह्या आर्येचा अर्थ असा दिसतो की प्रख्यात नायक असलेल्या नाटकासारखा, परंतु काही अंशी त्याहून मित्न असठेला एक दुसरा रूपकप्रकार संभवतो आणि त्याचप्रमाणे प्रख्यांत नायक नसलेल्या प्रकरणासारखा, पण त्याहून थोडा मिन्न असता आणखी एक प्रकार संमवतो. हे दोन प्रकार म्हणजे नाटिका ब प्रकरणिका होत अश्शी शकयता आहे. काही टीकाकारांनी हे दोन भेद मान्य केळे होते असे अभिनवरुप्ताने पुढे म्हटले आहे. त्यांचे मत ह्या आर्येत प्रतिबिम्थित झालेले दिसते. १ नि नाटीसंज्ञाश्रिते काव्ये. १८.५२३-५" ८२ प्रकरणनाटकमेदादुत्पाद्यं वस्तु नायक नृपतिम्‌ । अन्तःपुरसंगीतककन्यामधिकृत्य कतंव्या ॥ ५३॥ स्रीप्राया चतुरडूण ललिताभिनयात्मिका सुविहिताड्वी । बहुनेत्तगीतपाठ्या रतिसंभोगात्मिका चेव ॥ ५४॥ राजोपःचारयुक्ता प्रसादनक्रोधदम्भसंयुक्ता । गायकदेबीदूर्तीसपरिजना नाटिका ज्ञेया ॥ ५५॥ प्रकरण आणि नाटक यांच्याहून भिन्न अशी नाटिका काल्पनिक कथानक, राजा नायक व अंतःपुरातीळ संगीतज्ञ कन्या यांच्या संबंधी रचावी. प्रायः स्त्रीपात्रेच असलेली, चार अंक असलेली, लळित अभिनयच प्राणभूत असलेली, उत्कृष्टपणे रचलेली अंगे असलेली, नृत्य, गीत व पाठ्य पुष्कळ असलेली, तसेच रति अणि उपभोग हेच जीवित असलेली, राजव्यवहाराने युक्त असलेली, प्रसादन, क्रोध व दंभ यांचे दर्शन घडविणारी (आणि) नायक, राणी, दूती व परिजन यांनी युक्त असळेळी ती नाटिका असे समजावे. एवं सकळपुरुषाथंविषया व्युत्पत्तिनांटकेन प्रधानस्य राजप्रायस्य क्रियते, प्रकरणेन च मध्यमप्रायस्यापूवकुतूहळवतः । तत्रापिे चैकविंदकस्याभिधानाच्चित्र- व्युत्पात्तेः । तत्र रूपकळक्षणसंकीणतया बहवो भेदाः सन्तीत्युक्त॑ सामान्यठक्षणे । तत्र प्रधानभूतयोः सर्वरूपकप्रसरणकारिणोनांटकप्रकरणयोलंक्षणसांकर्ये दशशिते सवरूपकाणां दरीनं तडूवतीत्यभिप्रायेण तदेव दर्नीयम्‌ । उद्देशक्रमानुसारेण तु तहुक्षणविस्तरणे पुनस्तछुक्षणपरामर्शे च गोौरवमित्यभिप्रायेणायांत्रयं पठति प्रकरणनाटकभेदारदित्यादि । याप्रमाणे सर्वे पुरुषार्थांसंबंधींचा बोध नाटकाच्या द्वारा मुख्य असे जे राजे त्यांना मुख्यत्ते केला जातो आणि प्रकरणाच्या द्वारा मुख्यत्वेकरून अपूर्व गोष्टींविषयी कुतूहल असणाऱ्या मध्यमवर्गीयांना केला जातो. त्यातही एकवीस प्रकार सांगितले असल्यामुळे विविध प्रकारे बोध होतो. त्या संबंधात ख्पकांच्या लक्षणांच्या मिश्रणासुळे पुष्कळ भिन्न प्रकार होतात हे सामान्य लक्षणाच्या विवेचनात सांगितले आहे. त्यांपैकी इतर सवे रूपकांचा विस्तार करणारे व प्रधानभूत असलेले जे नाटक व प्रकरण यांच्या लक्षणांचे मिश्रण दाखविले म्हणजे सर्वे रूपकांचे त्याने दर्शन होईळ अश्या आशयाने तेच दाखविणे योग्य होय. परंतु, १ इयमार्या नि-पुस्तके नोपलभ्यत. २ नि बहुगीतनृत्यवाद्यरति-. ३ का कामोपचार-. ४ नि नायकदूती चापि देवीसंबन्धी. ८९६ नाट्यशास्त्र उद्देशक्रमानुसार त्यांच्या लक्षणांचा बिस्तार करण्यात व पुन्हा त्या लक्षणांचे विवेचन करण्यात सुदीधता उत्पन्न होईल हे मनात आणून “प्रकरणनाटकमेदात्‌' इत्यादी तीन आर्या सांगतात. “रूपकलक्षणसंकीर्णतया? हस्तलिखितात “रूपकलक्षणसंधीनां संपूर्णतया' असा पाठ आहे. तो अर्थेबोधास साहाय्यक नाही. मुद्रितातील '-लक्षणस्य सकौर्णतया' पेक्षा समातघटित पाठ अधिक चांगला. - 'उक्तं तामान्यलक्षणे' वर चोथ्या आर्येवबरींल टीकेत प्रत्येक रूपकाचे दहा प्रकार संभवतात, कारण प्रत्येकात वीथी, भाण वगैरे असतात, अशा प्रकारचे एक मत उद्धत केले आहि. त्याचा प्रस्तुत ठिकाणी निदेंदय केलेला दिसतो. - “तजक्षणबिस्तरणे? मुद्रित पाठ “-विस्तरणं आहे. परंतु सप्तमी आवश्यक आहे हे उघड आहे. हस्तलिखितातील '“-बिस्मरणंः लेखनदोष होय. तत्‌ म्हणजे रूपकलक्षणांच्या संकराने उत्पन्न झालेले नवीन रूपकप्रकार. - 'गौरव? म्हणजे ग्रंथाचा बिस्तार. प्रकरणनाटकाभ्यां भेदात्‌ ठक्षणान्यत्वान्नाटिका ज्ञेयाति दूरेण संबन्धः । उत्पाद्यं वस्तु चारितं नायकं च नृपातिमन्तःपुरकन्यां संगीतशालाकन्यां वाधिकृत्य प्राप्यत्वेनाभिसंथाय कतव्या । स्त्रियः प्रायेण बाहुल्येन यत्र । चत्वारो5डूण यस्याः । कस्याश्विदवस्थायाः सरसे5वस्थान्तरे समावापः कार्य इति यावत्‌ । ललिताभिन- यात्मिकेति केशिकीसंबद्धेत्यर्थः । सुष्ठु पूर्णतया विहितानि चत्वार्यपि केशिक्यड्ठानि यत्र । अड्डुगात्रकण्ठेभ्य इत्यत्र स्वाडुविशषणाभावात्‌ डीषः प्रयोग: । एतदपि न मुनित्रयमतमित्यनाहत्यमिति त्वन्ये । रतिपुरःसरः संभोगो राज्यप्राप्त्यादिलक्षण आत्मा प्रधानभूतं फलं यस्याम्‌ । अत एवाह राजगतेरुपचारेर्यवहारेर्युक्ता । अन्यां चेदुद्दिश्य तत्र व्यवहारः तत्पूर्वनायिकागतैः क्रोधप्रसादनवश्वनैरवश्यं भाव्यमिति दर्शयति प्रसादनेति । आर्यानुरोधात्क्रोधस्य पश्चात्पाठः । ननु यस्याः क्रोधो भर्वाते सा न काचिदुक्तेत्याशडु्याह नायकेति । नायकस्य येयं देव्याद्या नायिका तथाभिलषितनायिकान्तरविषये दूतीकूतं सपरिजनं परिजनसमृद्धि- यंस्थाम्‌ । एतदुभयप्रधानं सर्वे तत्रेत्यर्थः । अन्यत्संध्यद्भादि सर्व पूर्ववदेव । प्रकरण व नाटक यांच्याहून भिन्नता असल्याकारणाने म्हणजे निराळे लक्षण असल्या- कारणाने-याचा अन्वय दूरच्या “नाटिका असे समजावे' ह्या शब्दांशी होतो. कविकल्पित वस्तु म्हणजे चरित आणि राजा नायक (ह्यांच्या संबंधी) तसेच अंतःपुरातील कन्या किंवा संगीतशाळेतीळ कन्या हिच्या संबंधी असलेली म्हणजे हिची प्राप्ती हे उदिष्ट असलेली अशी नाटिका रचावी. स्त्रिया पुष्कळ प्रमाणात जिच्यात आहेत अशी. जिच्यात चार अंक आहेत अशी. कोणत्या तरी अवस्थेचा दुसऱ्या सरस अवस्थेत समावेश करावा असा याचा अर्थ ळळित अभिनय प्राणभूत असळेली म्हणजे केशिकी वृत्तीने युक्त असा अर्थ. सुष्टु म्हणजे पूर्णपणे योजना केली आहे कैशिकी वृत्तीच्या चारही अंगांची जिच्यात अशी. 'अड्गगात्र- १८.५२-५१५ ८७ कण्ठेभ्यः' यातील स्वतःच्या अंगाचे विशेषण नसल्यामुळे डीष-प्रत्ययाचा उपयोग केला आहे. परंतु दुसरे असे म्हणतात की हे तिन्ही मुनींचे मत नसल्यामुळे ते विचारात घेऊ नये. रति ज्यात प्रथम स्थानी आहे असा राज्यप्राप्ती वौरेच्या स्वरूपाचा संभोग, तो आत्मा म्हणजे मुख्य फळ आहे जिच्यात अशी. म्हणूनच म्हणतात राजा'च्या ठांयी असलेल्या उपचारांनी म्हणजे व्यवहारांनी युक्त अशी. जर त्यात दुसऱ्या स्त्रीला उद्देशून व्यवहार असेळ तर अगोदरच्या नायिकेच्या संबंधात क्रोध, प्रसादन आणि वंचना या गोष्टी अवश्य असणार हे “प्रसादन ' इत्यादी शब्दाने दाखवितात. आर्यावृत्ताच्या अनुरोधाने समासात क्रोध शब्द नंतर वापरला आहे. जिला क्रोध येईल तिचा काही निर्देश केळा नाही कसा अशी शंका घेऊन : नायक इत्यादी शब्दात तिचे निराकरण करतात. नायकाची जी ही देवी इत्यादी प्रकारची नायिका आणि जिचा अमिलाष केला आहे त्या दुसर्‍या नायिकेच्या संबंधात दूतींनी केलेले सपरिजन म्हणजे परिजनांची सग्रृद्धी जिच्यात आहे अशी. त्या नाटिकेत सर्वे काही ह्या दोन गोष्टी मुख्य असळेळे असे असते असा याचा अर्थ. इतर सर्व संधींची अंगे इत्यादी पूर्वीप्रमाणेच. _ 'दूरेण संबन्थः? वस्तुतः ५२ व्या आर्येत वाक्य पूर्ण झाळे आहे. तेव्हा त्यातील एका गाब्दाचा ५५ व्या आर्येतील शब्दाशी संबंध सामान्यपणे जोडता येण्यासारखा नाही. -- “चरित मुळात या शब्दानंतर “'च' अधिक आहे. पण चरित दाब्द आर्येतील वस्तु शाब्दाचा अर्थ सांगण्यासाठी वापरला अहि. वस्तूहून निराळे असे चरित मानण्यास आर्येत आधार नाही. म्हणून 'च' गाळला आहे. - 'सरसे5वस्थान्तरे समावापः' ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “सरसेडवस्थासमाचापः' असे आहे. मुद्रित पाठ “सरसोडवस्थासमावाप: याप्रमाणे आहे. समावाप म्हणजे भर घालणे, समावेश करणे. पाच अवस्थांची चार अंकांत सोय कशी करावयाची याचे येथे असे समाधान केळे आहे की एका अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेत समावेश केला जातो. ही दुसरी अवस्था निर्दिष्ट करण्यासाठी “'अवस्थान्तर' शब्द आवद्यक आहे हे उघड आहे. आणि तो शब्द सप्तम्यन्त ठेवावयाचा असल्यामुळे सरस शब्दही सप्तम्यन्तच पाहिजे. सरस हे अवस्थेचे बिशेषण मानता येईल, समावापाचे नाही. - 'केरिक्यज्ञानि' नर्म, नगस्फुच्ज, नर्मस्फोट ब नर्मगर्भ ह्या केशिकीवृत्तीच्या चार अंगांचे वर्णन २०.५६-६१ येथे केळे आहे. - 'अड्ड्गात्र- इ०? 'स्वाज्ञा- च्चोपसर्जनादसंयोगोपधात्‌? ह्या पाणिनीच्या सूत्राप्रमाणे (४.१.५४) प्राण्यंगवाचक शब्द बहुत्रीहीचे उत्तरपद्‌ असले तर विकल्पाने डीघ्‌ प्रत्यय लागतो. “अद्भगात्रकण्ठेभ्य इति वक्तव्यम? हे ४.१.५४ वर वात्तिक आहे. म्हणजे बहुम्रीहि समासाच्या शेवटी अड; गात्र, कण्ठ हे शब्द असल्यास स्त्रीलिंगात डीष्‌ म्हणजे ई प्रत्यय बिकल्पाने लागतो जसे ललिताड्ी, चारुगात्री इत्यादी. अमिनवगुप्ताचे म्हणणे असे दिसते की 'सुविहिताड्वी' यातील अशक्धे: प्राण्यड्ठे नसल्यामुळे डीष्‌ प्रत्यय अवश्य म्हणून लावला आहे. - 'डीषः प्रयोगः? मुद्रित पाठ 'डीष्‌ प्रयोगः” असा आहे. कदाचित मूळचा पाठ 'डीघू प्रत्ययः' असा असाबा. - 'मुनित्रय' म्हणजे पाणिनि, कात्यायन आणि पत5जलि. पाणिनीच्या वरील सूत्रावर कात्यायनाने एका वात्तिकात आक्षिप घेऊन असे म्हटळे आहे की त्यातील उपसर्जन शब्द निरर्थक आहे - 'उपसर्जनग्रहणमनर्थकं वबहुत्रीह्मधिकारात्?, पतःंजलीनें पूर्वपद स्वाड्धबाचक नसेळ तर दोबटी स्वाड्ठवाचक शब्दाने होणाऱ्या बहुत्रीहीस हे ट्ट नाट्यशास्त्र सूत्र लागू केळे आहे. - “आर्यानुरोधात? वास्तवात क्रोध अगोदर व प्रसादन त्यानंतर अशी स्थिती असते. पण आर्येत प्रसादन शब्द अगोदर व क्रोध शब्द नंतर आहे. आर्यावृत्ताच्या रचनेसाठी तसे केळे आहे. - 'देव्याद्या' म्हणजे महादेवी, देवी, स्वामिनी इत्यादी चोबिताव्या अध्यायात वर्णिलेल्या प्रकारची. - 'परिजनसमृद्धिः?” ही मुळातील 'सपरिजन? ची व्याख्या आहि. पुष्कळ परिजन असा त्याचा अर्थ. -- 'एतदुभय- म्हणजे देबी आदी नायिका आणि अमिलष्रित नायिका. - 'पूबंवदेव' म्हणजे नाटक व प्रकरणाप्रमाणे. €”)_*-_ तत्रेका नाटिका तावद्याख्याता भवति । षंडिधेयं नाटिकेति संग्रहानुसारिणो भट्टलोलहटाद्याः । श्रीशडुः'कस्त्वयुक्तमेतदित्यमिधाय अष्टधेति व्याचष्टे । तथा हि देवी कन्या च ख्याताख्याताभेदेन चतुधां, कन्या त्वन्तःपुरसंगीतकभेदेन द्विघेति । घण्टकादयस्त्वाहुः नायको नृपतिरेतावन्मात्र नाटकादुपजीवितं न तु प्रख्यातत्वमपि तडवेदड्यादन्ये$ष्टाविते षोडरा भेदाः । नायको नपतिरिति ये प्रथमां पठन्ति तेस्तत्रेत्यध्याहायंम्‌, एकवाक्यतायां तूभयस्य कायंत्वम्‌ । अन्ये प्रथममार्याध पृथगेव वाक्यं योजयान्त - प्रकरणभेदात्प्रकरणलक्षणांशादुत्पाद्यं वस्तु नाटकल- क्षणांशाच्च नृपतिनायकः स्थिते यत्रेत्याभिप्रायेण नाटिकेवंभूतेति । अन्ये तु प्रकरण- नाटकभेदात्‌ नाटिका मिद्यते, नाटकराब्देनाभिनेयं रूपकमात्रम्‌, तस्य सोकुमार्य प्रदरशानाय स्त्रीत्वेन निदेराः, इति प्रकरणिकापि सार्थवाहादिनायकयोगेन कोशिकी- प्रधाना लभ्यत इत्याहूः । यात एका नाटिंकेचे स्वरूप स्पष्ट केळे आहे. संम्रहकाराचा अनुवाद करणारे भट्ट- ळोछुट प्रभ्रती टीकाकार ही नाटिका सहा प्रकारची आहे असे मानतात. परंतु श्रीशंडक हे अयोग्य आहे असे म्हणून ती आठ प्रकारची आहे अशी व्याख्या करतात. ते असे- देवी आणि कन्या यांच्या प्रसिद्ध व अप्रसिद्ध या भेदांमुळे चार प्रकार होतात, परंतु कन्या अंतःपुर व संगीतशाळा यांतील भेदामुळे आणखी दोन प्रकारची. पण घण्टकप्रभरती टीकाकार म्हणतात की राजा नायक एवढेच केवळ. नाटकापासून उसने आलेले आहे, त्याचे प्रख्यातत्व सुद्धा नाही; ह्या दोन भेदांमुळे आणखी आठ प्रकार, याप्रमाणे एकंदर सोळा प्रकार होतात. जे ' नायकः नृपतिः' असा प्रथमान्त पाठ स्वीकारतात त्यांना 'तत्र' म्हणजे त्या नाटिकेत असे अध्याहृत धरावे लांगते, परंतु जर एकवाक्यता मानलीं तर दोन्ही गोष्टींचे कार्यत्व अध्याहृत घरावे लागते. दुसरे कोणी आर्येच्या पूर्वार्धाचा स्वतंत्र वाक्य मानूनच अन्वय लावतात - ' प्रकरणभेदात्‌? म्हणजे प्रकरणाच्या लक्षणाच्या एका अंशातून काल्पनिक कथानक आणि नाटकाच्या लक्षणाच्या एका अंशातून राजा नायक जिच्यात आहे अशा आडयाने नाटिका अशा प्रकारची असते. इतर टीकाकार तर असे म्हणतात की प्रकरण व नाटक यांच्या भेदापासून नाटिका भिन्न होते या विधानात नाटक शब्दाने केवळ अमिनयास योग्य १८.५२३-५५५ ट्र असे रूपक समजावयाचे, त्याची सुकुमारता दाखविण्यासाठी नाटिका असा स्त्रीलिंगी निदेश आहे, म्हणून सार्थबाह ब*मैरे नायक असलेली व कैरिकीवृत्ति मुख्य असलेली अशी प्रकर- णिका सुद्धा निष्पन्न होते. ____ "एका नाटिका? मुळात 'एका नायिका' असे आहे. पण पुढीळ विवेचन नाटिकांच्या भेदांसंबंधी आहे. ते जरी मुख्यतः नायिकांच्या भेदांबर आधारित असले तरी अंततः नाटिकांचेच मेद अमिंग्रेत आहेत. आणि ह्या तीन आर्योत मिळून नाटिकेची न्याख्या केली आहे, तिच्यातील नायिकेची नाही. म्हणून ही दुरुस्ती आंबइ्यक वाटते. - 'षडिघेय” ही मुळातील 'षट्पदेथं ची दुरुस्ती आहे. “'षट्पदा नाटिका? यापासून काही अर्थबोध होत नाही. संग्रह? नाट्यशास्त्रा- तील विषयांचे व्याख्यात्मक विवरण करणारा संग्रह? नावाचा ग्रंथ कोणीतरी प्राचीनकाळी लिहिला असावा. तो अर्थातच सध्या उपल्ब्ध नाही. - भड्टलोछट व श्रीशक्कक यांचे निर्देश मागे आले आहित. - 'अष्टधा' दोन प्रकारच्या देवी व चार प्रकारच्या कन्या होत. एकाच नाटिकेत देवी आणि कन्या दोघीही असल्यामुळे नाटिकेचे आठ प्रकार संभवतात असा हा हिशोब आहे. भट्टलोछटा'चा सहाचा हिशोब दोघींची एकाच नाटिकेत उपस्थिती ग्रहीत न धरता केलेला दिसतो. - “नाटकादु- पजीवितंः ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “नाटकादाबुपजीवितं' असे आहे व मुद्रितपाठ “नाखकादावु- पजीवितः' असा आहे. पण अमुक गोष्ट घेतली असा अर्थ अमित्रेत असल्यामुळे तो शब्द पंचमी विभक्तीत आवश्यक आहे. शिवाय या ठिकाणी 'आदि' निरर्थक आहे. - तैस्तत्रेत्यच्याहार्यम? ही व पुढे 'कार्यत्वम' अश्या दुरुस्त्या केल्या आहेत. हस्तलिखितात 'तत्रेत्यच्याहूत्य” ब “कार्या' असे पाठ आहेत, तर मुद्रित पाठ 'तेयंत्रेत्यध्याह्वत्य” व 'कार्यम' असे आहेत. या ठिकाणी असलेल्या 'तु' ने असे निदहीत होते की 'एकबाक्यतायाम? पासून नवीन वाक्‍य सुरू होते. तेव्हा अगोदरच्या वाक्याच्या पूर्णतेताठी 'अध्याहार्यंम' सारखे रूप आवश्यक आहे. 'उमयस्य' म्हणजे वस्तु ब नायक या दोहोंचे. 'कार्यत्वम' नंतर 'अध्याहार्यम? समजावयाचे. एकूण अर्थ असा की आर्येचा पूर्वार्ध स्वतंत्र मानला तर 'तत्र' म्हणजे नाटिकेत असतात हे अध्याहृत धरावे लागते. पण दोन्ही अर्धाची एकवाक्यता मानावयाची असेल तर उत्तरार्धात असठेला 'क्तव्य शाब्द पूर्वार्धात अध्याहृत घरावा लागतो - 'वस्तु कर्तव्यम्‌ , नायकः कर्तव्यः' अश्या प्रकारे. कर्तव्याच्या समानार्थी कार्य शब्द वापरून त्याचे भाववाचक नाम केले आहे. नुसते 'कार्यम्‌? म्हटल्याने अर्थ स्पष्ट होत नाही. - 'स्थिते यत्रेत्यमिप्रायेण नाटिकैवंभूता? या शब्दांची योजना सुगम नाही. मुळातील “अभिप्राये'च्या जागी 'अमि- प्रायेण' असा पाठ अधिक योग्य म्हणून स्वीकारला आहे. बाकीचे मुद्रितातल्याप्रमाणे आहे. हस्त- लिखितात 'स्थितेत्य्रे- असे आहे. 'स्थिते! ह्या शब्दाचा नीट अन्वय लागत नाही. 'घेितळे आहेत? अश्शा अर्थाचा शब्द अपेक्षित होता. पुढील आर्येबरीळ टीकेत प्रारंभीच्या बाकयात 'तथां स्थिते तत्रेत्यभिप्रायेण' असे शब्द आहेत. अशी शक्‍यता आहे की यातील शब्द प्रस्तुत जागी चुकीने पुन्हा लिहिले गेले आहेत. येथे ते अर्थबोधास बाध आणतात. - 'नाटिकेवंथूता? ही सुद्धा नंतर आलेल्या 'नाटिकेवमुक्ताः ची द्विरुक्ती असावी. - 'नाटकशब्देन' नाटिका शब्दाचे पुल्लिंगी रूप जे नाटक त्याचा हा नि्देंशा आहे. - 'तस्य' ही मुळातीळ तस्या? चीं दुरुस्ती आहे. तस्य” म्हणजे त्या नाटकाचा, - 'प्रकरणिका' नाटिका दाब्दाचाच व्यापक अर्थ करून तिच्या निर्देशाने प्रकरणिकेचाही बोध होतो असे ह्या टीकाकारांचे म्हणणे आहे. ९० नाट्यशास्त्र नाटिकेच्या वर्णनपर ह्या आर्या सूळ भरतकृत नसाव्यात असा ग्रह्ह होतो. त्याला जर हा रूपकप्रकार अभिप्रेत असता तर त्याने त्याचा प्रारंभीच उद्देशक्रमात समावेश केला असता. डॉ. घोष ह्या आर्या प्रक्षिप्त मानतात ते बरोबर वाटते. तथापि हा प्रक्षेप अभिनवगुप्ताच्या फार अगोदर झाला असला पाहिजे. त्याच्यावर संग्रह्वकार, भट्टलोछट, श्रीशंकुक, घण्टक आदींनी त्यापूर्वीच टीका लिहिली असल्याचा निदेश आहे. यानंतर बडोदे प्रतीत पुढील छोक अधिक आढळतो - अन्त्भावगता ह्येषा भावयोरुभयोयंतः । €«<< को अत एव ददोतानि रूपाण्युदितानि वे ॥ हा छोक उघडच प्रक्षिप्त. आहे. दहाच रूपकप्रकार असता ह्या निराळ्या प्रकाराच्या विवरणाचे समर्थन करण्याचा त्यात प्रयत्न केला आहे. प्रकरणनाटकलक्षणमुक्त विप्रा मया समासेन । बक्ष्याम्यतःपरमहं लक्षणयुक्‍त्या समवकारम्‌ ॥ ५६॥ हे विप्रांनो, प्रकरण आणि नाटक ह्यांचे लक्षण मी थोडक्यात सांगितले आहे. आता यानंतर मी समवकाराचे लक्षणाच्या साहाय्याने वणन करणार आहे. यद्यपि च नाटिकेवमुक्ता तथापि प्रकरणनाटकलक्षणे एव तथा ख्थिते तत्रेत्य- भिप्रायेणोपसंहराते प्रकरणनाटकलक्षणामिति । अन्यदासूत्रयाते वक्त्याम्यतःपर- मिति । ननूदेशक्रमत्यागे किं फलम्‌ । इदम्‌ । उंद्देशस्तावदत्र न परिगणनार्थ इत्युक्तम्‌ , तेन नास्य प्राधान्यम्‌। नाटिकया च विच्छिन्नो$सावुद्देशाक्मः । यथा च नाटकप्रकरणयोव्युत्पाद्यभूयस्त्वे तथा समवकारे$पि, तत्र त्रिवर्गोपायप्रद्दांनात्‌ । केवलं तत्तद्देवताभक्तानां तचरितपुरःसरतया तस्य तस्योपायस्यादरणीयत्वं भवती- त्यनेनाभिप्रायेण दिव्यो5त्र नायकत्वेन निबध्यते । तदीयं च न भूयस्तर॑ वितत- वृत्तमनुक्रियया प्रदरयेते, येन तन्मध्यपतितानां भवति निर्वेदादीनामभावे प्रयोग- स्यारअकत्व॑ नाटकगताडूकदेशवत्‌ । नाटकादोौ तु भूयस्तर॑ चरितमनेकाडुरअकव- र्गेण विना न रञकमेवेति नाटकादी दिव्यनायकनिषेध उक्तः । तत्र हि राजप्रभ्नतयो बहुतरफलानुसार्थोने महति फले बहुसंप्रयाससाध्ये व्युत्पाद्यन्ते । न तथेह किन्तु त्रिवर्गोपायसात्रम्‌ । अन्यरूपकाणां त त्रिवगोपायत्व नास्ति एकाडूत्वात्‌ । डिमस्तु चतुरडूे5पि पश्चानिर्दिष्ट इत्यत्र तछुक्षणे कारणं वक्ष्यामः । तस्मात्‌ त्रिवर्गव्युत्पाद- कत्वादनेकाडूत्वाच ताहशरूपकानन्तरमेवाभिधानं युक्तमित्यळ॑ बहुना । १ नि -नाटकनाटीलक्षणमुक्तं मया. १८.५६ ९२ जरी नाटिकेचे याप्रमाणे वर्णन केळे आहे तरी तिच्यात प्रकरण आणि नाटक यांचीच लक्षणे तशा ख्पात विद्यमान आहेत हा आशय विचारात घेऊन ' प्रकरणनाटकलक्षणम्‌ इत्यादी शब्दांत समारोप करतात. आणि ' बक्ष्याम्यतःपरम्‌' इत्यादी शब्दांत दुसऱ्या गोष्टीचा उपन्यास करतात. येथे आक्षेप असा की उद्देशात निर्दिष्ट झालेल्या क्रमाचा त्याग करण्यापासून काय फलप्राप्ती होते 2 पुढीलप्रमाणे असे याचे उत्तर. उद्देश हा गणना कपण्याच्या हेतूने निर्दिष्ट केळा नाही हे माशे सांगितले आहे; म्हणून त्याला प्राधान्य नाही. आणि नाटिकेने उद्देशातीळ क्रमाचा भंग केळेलाच आहे. आणि ज्याप्रमाणे नाटक व प्रकरण यांच्यापासून बोध घेणारे संख्येने पुष्कळ असतात, त्याप्रमाणे समवकारा- पासून सुद्धा. कारण त्यात धर्म, अर्थ व काम ह्या तिह्ींच्या साधनांचे दर्शन होते. फक्त इतकेच की त्या त्या विशिष्ट देवतांच्या भक्तांना त्याच देवतांच्या चरिताळा प्राधान्य असल्यामुळे त्या त्या विशिष्ट साधनाबद्दद आदर वाटत असतो हा अभिप्राय लक्षात धेऊन ह्या समवकारात नायक म्हणून देवतांची योजना केलेली असते. तथापि त्यांचे फार मोठे, विस्तृत असे चरित अनुकरणाने दाखविळे जात नाही की ज्यायोगे त्यात समाविष्ट झालेल्या पात्रांना निर्वेद आदी विकारांचा अभाव असल्याकारणाने प्रयोगात रंजकता उत्पन्न होणार नाही, नाटकातीळ एखाद्या अंकाच्या काही भागात ती ज्याप्रमाणे उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे. परंतु नाटक आदींमध्ये फार मोठे चरित अनेक प्रकारच्या रंजन करणाऱ्या गोष्टी असल्यावा'चून रंजक होत नाही म्हणून नाटक वगैरेमध्ये दिव्य नायका'चा निषेध केला आहे. कारण त्यात राजेप्रशूती लोकांना फार मोठ्या फळाशी संलग्न व पुष्कळ प्रयासाने साध्य अशा मोठ्या फळाच्या बाबतीत बोध दिळा जातो. तसे ह्या समवकारात नाही, त्यात केवळ त्रिवर्गसिद्धीचे उपाय दाखविळे जातात. पण इतर रूपकप्रकारांत हे त्रिवर्गाचे उपाय दाखविळे जात नाहीत. कारण त्यांत अंक एकच असतो. परंतु डिमात चार अंक असूनही त्याचा मागाहूत निर्देशा केळा याचे कारण आम्ही त्याच्या लक्षणाची न्याख्या करताना सांगू, म्हणून त्रिवर्गाविषयी बोध देणारा व अनेक अंक असलेला म्हणून हे विशेष असलेल्या ख्यकप्रकारांनंतरच समवकाराचे वणन योग्य होय. हे इतके पुरे, अधिक काही आवर्यक नाही. “-लक्षणे...स्थिते! ही नपुंसकलिंगी प्रथमेची द्विवचनाची रूपे आहेत. 'तथा? म्हणजे नाटि- केच्या रूपात. - 'उद्देशक्रम” हा क्रम आर्या २ व ३ यांत आहे. तेथे प्रकरणानंतर अडू, व्यायोग, भाण, समवकार असा क्रम आहे. - 'इदम? हस्तलिखितातील ढे वचन मुद्रितात नाही. आक्षेपाच्या समाधानासाठी ते असणे चांगले. - “तेन नास्य प्राधान्यम? ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'तेनास्या प्राधान्यम्‌? व मुद्रितात 'तेनास्य प्राधान्यात? असे पाठ आहेत. ते दोन्ही अथुद्ध आहेत. 'अस्य? म्हणजे ह्या उद्देशक्रमाचे. - 'निबध्यते' मुद्रितातील “निषिध्यते' हा पाठ विरुद्ध अर्थ दाखबीत असल्यामुळे चूक आहे. - “न भूयस्तर' ह्याच्या अगोदर हस्त- ९२ नाट्यशास्त्र लिखिंतात “थूयस्तरं च' याची व सुद्रितात “भूयस्तरं' ची चुकीने पुनरावृत्ती झाली आहे. - “तन्मच्यपतितानाम? म्हणजे समवकारात योजिलेल्या दिव्य पात्रांना. - “नाटकगताक्लैकदेशवत? ह्या उपमेवरून असे सूवित होते की नाटकात निर्वेदादी व्यमिचा रिभावांचे कचित ज्या ठिकाणी दर्शन होत नाही तेथे रंजकता उत्पन्न होत नाही. तमवकारात त्या विकारांच्या आविष्कारास अवकादा नसतो, म्हणून त्यातही एखाद्या देवाचे लांबलचक चरित्र दाखवू नये असे तात्पर्य, - 'अन्यरूपकाणाम? हस्तलिखितात 'प्रख्यातनायकानाम? असा पाठ आहे. तो अर्थात असंभान्य आहे. 'अप्रख्यात- अश्ी दुरुस्तीही चालण्यातारखी नाही. प्रकरण अप्रख्यातनायक असले तरी ते एकांकी नसते. देवासुरबीजकृतः प्रख्यातोढात्तनायकश्वेब । ञ्यई्ूस्तथा त्रिकपटस्त्रिविद्रवः स्यात्रिशज्धारः ।। ५७॥ हाढशनायकबहुलो ह्य्टादशनाडिकाप्रमाणश्र । वक्ष्याम्यस्याडूनवि्धि यावत्यो नाडिका यत्र ॥ ५८॥ (समवकार) देव आणि असुर ह्यांच्या कृत्यांवव आधारित, तसेच प्रख्यात व उदात्त नायक असलेला, त्याचप्रमाणे तीन अंक, तीन प्रकारचे कपट, तीन प्रकारचे विद्रव व तीन प्रकारचा शृंगार असलेला, बारा नायकांनी गजबजलेला आणि अठरा घटका प्रयोग 'चाल- णारा असा अतावा. ह्याच्या अंकांची रचना आणि कोणत्या अंकात किती घटका ते मी आता सांगतो. देवासुरस्य यद्ठीजं फलळसंपादनोपायस्तेन कृतो विराचितः । देवासुरा अपि चाप्रख्याता वृहत्कथादो श्रयन्ते स्वयं वा केनचिदूह्यन्त इति तन्निरासाथे प्रख्यात- पदम्‌ । यद्यपि देवाः पुरुषापेक्षयोद्धतास्तथापि स्वापेक्षया गास्भीयंप्रधानतयोदात्ता उच्यन्ते भगवत्रिपुररिपुप्रभ्नूतयः, प्रशान्ता त्रह्मादयः', उद्धता नासिंहादयः । अत्र तावतैव समापन्न त्यडुः इत्युक्तम्‌ । अर्थत्रयं च कपटविद्रवशूज्मराः प्रत्येक त्रिविधाः । तत्र प्रत्यडठ॑ विद्रवादयस्त्रयः । तथा हि कपट उपायांशे विद्रवो व्यापत्तिसंभावनांशे शूद्ठारः फलांशे । एवं द्वितीये5डठः तृतीये च । द्वादरानायक- बहुळ इति प्रत्यडुःमिति केचित्‌ । अन्ये तु प्रत्यईुं नायकप्रतिनायकी तत्सहायो चेति चतुर आहुः, समुदायापेक्षया हि द्वादशेति । देव व असुर यांचे जे बीज म्हणजे फल प्राप्त करून घेण्याचा उपाय त्याने केलेला म्हणजे त्याची रचना असलेला असा समवकार. ब्रृहत्कथा वगैरे ग्रंथांत देव आणि असुर सुद्धा अप्रख्यात असे आढळतात किंवा कोणी कवी स्वतः अप्रख्यात देवासुरांची कल्पना करतो, त्यांचे निरसन करण्याकरिता प्रख्यांत शब्द वापरळा आहे. जरी पुरुषांपेक्षा देव उद्भत अस- १८.५९-६० ९३ तात तरी त्यांच्या आपसातीळ तुलनेने भगवान त्रिपुरारिप्रभ्रती काही देव मुख्यतः गंभीर प्रकृतीचे असल्यामुळे उदात्त होत, त्रह्मदेवप्रभरती प्रशान्त होत आणि नृसिंह आदी उद्धत होत. यात तेवढ्यानेच प्राप्त झाल्यामुळे तीन अंक असलेळा असे म्हटले आहे. तीन गोष्टी, कपट, विद्रव आणि श्रृंगार, प्रत्येकी तीन प्रकारच्या. त्यांपैकी प्रत्येक अंकात विद्रव वगैरे तिन्ही गोष्टी असतात. याचे स्पष्टीकरण असे की उपायस्वरूप भागात कपट, विना- शार्‍चा संभव असलेल्या भागात विद्रव आणि फळात्मक भागात शुंगार. तसेंच दुसऱ्या अंकात आणि तिसऱ्या अंकात. बारा नायकांनी समृद्ध हे वर्णन प्रत्येक अंकाचे असे काहींचे मत आहे. परंतु दुसरे असे म्हणतात की प्रत्येक अंकात नायक व प्रतिनायक आणि त्यांचे एकेक साहाय्यक मिळून चार असतात; त्यांच्या तीन अंकांतील समुदायाला अनुलक्षून बारा असे म्हटले आहे. "देवा उद्धताः? देव धीरोद्धत असतात असे पुढे नाट्यशास्त्र, २४.१८ मध्ये म्हटले आहे. - “अत्र ताबतैव समापन्नम' मुळातील या ठिकाणचा पाठ भ्रष्ट असून तो दुसस्त करता येण्यासारबाही नाही. हस्तलिखितात “अत्र यस्य तावत्येव समापत्नम' वब मुद्रितात “अत्र यत्र तावत्येव समापन्नम' असे आहे. यातील “तावती' असा स्त्रीलेंगी शब्द असंभाव्य आहे. आणि 'यस्य' किंबा 'यत्रे) दोन्ही असंबद्ध आहेत. प्रस्तुत ठिकाणी “अत्र म्हणजे या समवकारात उदात्त देवच असावेत हे आर्येत अमिप्रेत आहे अद्या आहायाचे वाक्‍य अपेक्षित आहे. ते लप्त होऊन त्यातील फक्त “अत्र शब्द शिललूक उरला आहे अशी शक्‍यता आहे. इतर शब्दांचा अर्थ स्पष्ट नाही. - 'चतुर आहुः” मुळात “चवुराहुः” असे आहे. द्रिवार संधि केला असे त्याचे स्पष्टीकरण करता येण्यासारखे आहे. “चत्वार इत्याहुः हे अधिक योग्य झाले असते. अड्भनस्तु सप्रहसनः सविद्रवः सकपटः संबीथीकः । द्वादशनाडीविहितः प्रथमः का्येः क्रियोपेतः ॥। ५९ ॥ कायेस्तथा द्वितीयः समाश्रितो नाडिकाश्वतसरस्तु । वेस्तुसमापनविहितो द्विनाडिकः स्यात्तृतीयस्तु ॥। ६० || पहिला अंक प्रहसन, विद्रव, कपट आणि वीथी यांनी युक्त, (विविध) क्रियांनी संपन्न व बारा घटकांच्या प्रयोगासाठी रचळेळा असा करावा; त्याचप्रमाणे चार घटकांचा अवधी असलेला असा दुसरा अंक करावा; आणि दोन घटका असलेला तिसरा अंक कथानकाची समाप्ती करणारा असावा. १.का सवीथ्यद्वधः. २ का वस्तुप्रमाण-- ३२ नि -्यश्च. ये नाट्यशास्त्र सप्रहसन इति वचनात्‌ प्रथमे5ड्ले कामशूडुगरः प्रयोज्य इत्याह, तत्रैव हास्य- स्यागमनात्‌ । स्त्रियोपेत इति कामशूड्डारात्मकं द्वादशाघटिकामध्यसंपाद्येः कपट- विद्रवप्रहसनलक्षणेरुपायेः प्राप्त प्रथमाडूः निबध्नीयादिति तात्पर्यम्‌ । द्वितीये त्वडेः घटिकाचतुष्टयगामिभिः कपटादिभिरुपायेः । तृतीये त्वडे: सर्वे वस्तु समाप्यते दविघटिकान्तरसंपाचैरुपायैः । यद्यपि प्रत्यडुः वस्तुपरिसमामिरस्ति तथापि तृतीये वस्तुसमाप्तिग्रहणेनेदमाह - बीजे तावदड्डूत्रयार्थ उपक्षेप्तव्यः, तदनन्तरमड़द्धये$- वान्तरवाक्यार्थसमाप्तिरन्योन्यविश्‍्छिऐेव विधेया, तृतीये त्वड्रे5वान्तरवाक्‍याथ- स्तृतीयस्ताभ्यां प्रतिसंबद्धः । एवं महावाक्यार्थनिर्वाहहेतुसंबद्धतेव सर्वस्य जायते । एवं हि सानुसंधाना विततहशो$पि च्रिवर्गसिद्धयुपायव्युत्पत्त्यनुग्रहीता भवन्ति, निरनुसंधाना अपि तावत्तावत्परिसमाप्त्या तावत्युपाये निजहृद्यसंवादबलादिति । 'सप्रह्सनः' ह्या वचनाने पहिल्या अंकात कामशुंगाराची योजना करावी असे सांगतात, कारण त्याच प्रसंगी हास्याचे आगमन होते. क्लीने युक्त याचे तासर्य असे की पहिल्या अंकात कामशुंगारात्मक आणि बारा घटकांमध्ये निष्पन्न होणाऱ्या कपट, विद्ठव आणि हास्य या स्वरूपाच्या उपायांनी युक्त अशी रचना करावी. दुसऱ्या अंकात चार घटकांमध्ये होणाऱ्या कपट आदी उपायांनी युक्त अशी रचना करावी. परंतु तिसऱ्या अंकात दोन घटकांमध्ये होणाऱ्या उपायांनी सर्व कथानंकाची समाप्ती केळी जाते. जरी प्रत्येक अंकात वस्तूची परिसमाप्ती होते, तरी तिसऱ्या अंकात वस्तूची समाप्ती होते असे म्हण- ण्याचा उद्देश असा - बीजामध्ये तिन्ही अंकांच्या विषयाचा उपन्यास करावा, त्यानंतर दोन अंकांत अवांतर वाक्यांच्या अर्थाची समाप्ती परस्पराटून स्वतंत्र अशीच करावी, परंतु तिसऱ्या अंकात तिसऱ्या अवांतर वाक्याचा अर्थ त्या दोहोंशी संबद्ध असा करावा. याप्रमाणे सर्वे काही मह्ावाक्या'च्या विषयाचा निर्वाह करणाऱ्या कारणांश्ी संबद्ध होते. आणि याप्रमाणे जे अनुसंधान बाळगणारे व विद्याल दृष्टीचे असतात त्यांच्यावर सुद्धा त्रिवगसिद्धीच्या उपायां- विषयी बोधाचा अनुग्रह होतो आणि ज्यांना अनुसंधान राहात नाही त्यांच्यावर सुद्धा जितके जितके समाप्त होते त्याने तितक्‍या तितक्‍या उपायांविषयी त्यांच्या हृदयसंवादाच्या बळावर बोधाचा अनुग्रह होतो. 'स्त्रियोपेतः' मूळ आरयेंतील 'क्रियोपेतः? ऐवजी अभिनवगुप्ताचा 'स्त्रियोपेतः' असा पाठ आहे. “स्त्रिया उपेतः? यावरून एकाच स्त्रीच्या उपस्थितीचा बोध होतो. नायक बारा असता अधिक स्त्रियांची उपस्थिती संभाव्य वाटते. - 'प्राप्त? मुळात 'प्राप्ते? आहे. पण ते बरोबर नाहीं. 'निबध्नीयात्‌? ह्या क्रियापदाचे 'प्राप्तम? हे कर्म आवश्यक आहे. - 'कपटादिमिरुपायेः' यानंतर 'प्राप्तं निबध्नीयात? हे अव्याहत समजावे. - 'अडद्धये' म्हणजे पहिल्या व दुसऱ्या अंकात. - “अन्य़ोन्य- बिश्छिष्टा' मुद्रित पाठ “अन्योन्यविशिष्टा? मुद्रणदोष असण्याचा संभव आहे, विश्‍्छिष्ट म्हणजे सुटा झालेला, असंबद्ध. पहिल्या ब दुसञ्या अंकातील विषय परस्पराशी संबद्ध नसावेत, स्वतंत्र असावेत १८.६९ ९" असा अर्थ आहे. - 'ताभ्याम? म्हणजे पहिल्या दोन अंकांतील बित्रयांशी. - 'सानुसंधानाः' प्रेक्षकांपैकी काही पुढीलमागील संबंध लक्षात ठेवून सर्वे समवकाराचा साकल्याने रसग्रहण करण्यास समर्थ असतात. त्यांना सानुसंधान व विततहृशू ही विशेषणे लावळी आहेत. ज्यांना असे सामर्थ्य नसते ते निरनुसंधान. -- भिवन्तिः सुद्रितात “मवति' आहे. पण बहुवचन आव्यक आहे. -- 'निरनुसंधाना आपि' मुद्रित पाठ "निरनुसंधानापि' आहे. तो बरोबर नाही. पुल्लिंगी प्रथमेचे बहुवचन आवश्यक आहे. यानंतर पुढील दोन आर्या बडोदे प्रतीत अधिक आहेत - नाडीसंज्ञा क्षेया मानं कालस्य यन्मुहतांघेम । तन्नाडिकाप्रमाणं यथोक्तमडकेष॒ संयोज्यम्‌ ॥ या नाडिकेति संज्ञा कालविभागे क्रियाभिसंपन्ना । कार्या च सा प्रयत्नाद्यथाक्रसेणेव शास्त्राक्ता ॥ या दोन्ही आर्या अभिनबगुत्ताळा अवगत नाहीत. त्यानंतरच्या कालात त्या प्रश्षित्त झाल्या असाव्यात. दुसरी आर्या सर्वथा अनावश्यक आहे आणि ती फक्त थोड्याच हस्तलिखितांत आढळते. पहिली बहुतेक हस्तलिखितांत आहे. परंतु तिचीही आवश्यकता नाही. नाडिका म्हणजे मुहूर्ताचा अर्धा माग एवढेच कालमान सांगण्याचे काही विशेष प्रयोजन नाही. अडरूनेब्डूस्त्वन्याथेः कतेव्यः काव्यबन्धमासाद्य । थै €*.__ ७ €-_ $ १ आड अथे हि समवकारे ह्मप्रतिसंबद्धमिच्छन्ति ॥६१॥ परंतु, काव्याच्या रचनेच्या अनुरोधाने प्रत्येक अंक भिन्न भिन्न प्रयोजनाने युक्त असा करावा. कारण, समवकारात कार्य दृढ संबद्ध नसावे असे मानतात. अत एव संबद्धो$वकीणंश्व यत्रार्थ' स समवकारः, तदाह अडडे5डूः इति । तुन्यातिरके । अडुत्रयसंबन्थो भवति, न त्वडुने$डु: परस्परमित्यथः । काव्यबन्ध- मिति सवे वस्तु काव्यबन्धे चलछिष्टमित्यथः । अन्यथा हि समवकार एकं कार्यामितिं केयं भणितिः । एतदेव निर्वचनेनाह अर्थ हि समवकार इति । समवकार इत्य- स्मिन्‌ शब्दे$थे वाच्यमप्रतिसंबद्धामिति नातिसंबद्ध॑ किंचित्संबद्धं वस्त्विच्छन्ति संशब्दबलादवराब्दबलाच्च । प्रतिदब्देनातिशय उक्तः स निषिद्धः । म्हणूनच ज्यात विषय संबद्ध आणि सुटा असा असतो तो समवकार, ते 'अज्लोडडः:' यात सांगतात. 'तु' फरक दाखवितो. तीन अंकांचा संबंध असतो, परंतु प्रत्येक अंकाचा दुसर्‍या अंकाशी परस्पर संबंध नसतो असा अर्थ. काव्यबन्ध म्हणजे सर्व कथानक काव्य- १ ब -संबन्ध-, नि -संघातन-. “द नाट्यशास्त्र बन्धात संकष्ट होते असा अर्थ. नाही तर समवकारात एक कार्य असते या उक्तीचा काय अर्थ 2 हेच व्युत्पत्तिद्वारा 'अर्थ हि समवकारे' ह्या शब्दांत सांगतात. समवकार ह्या शब्दामध्ये अर्थ म्हणजे सांगावयाचा असलेला विषय अप्रतिसंबद्ध म्हणजे फार दढ संबद्ध नसलेल्या, थोडासा संबंध असलेल्या अशा कथानकाच्या ख्यात असावा असे इच्छितात, ते 'सम( गाब्दाच्या अर्थामुळे आणि 'अव'ः राब्दाच्या अर्थामुळे. 'प्रातिः शब्दाचा अतिराय असा अथ होतो, त्याचा निषेध केला आहे. | “संबद्धोडवकीर्णश्व' यावरून सम्‌ न- अव--कु॒या घातुपासून समवकार राब्दाची व्युत्पत्ती सिद्ध केली आहे हे स्पष्ट होते. - 'व्यतिरेक' म्हणजे मिन्नता. - 'काव्यबन्थे श्िष्टम मुद्रित पाठ 'काव्यबन्थोपश्लिष्टम? आहे. अर्थात्‌ फरक पडत नाही. - “भणितिः? मुळात “फणितिः असे आहे. पण तो शब्द असिप्रेत असण्याची शक्‍यता फार कमी आहे. 'समवकारे एकं कार्यम' असे विधान नाट्यशास्त्रात कोठे केळे असल्याचे दिसत नाही. - 'संशब्द- इ०' सम्‌ आणि अब ह्या दोन उपसगोचा अर्थ एकत्र विचारात घेतला तर “अतिहय नसलेला, थोडा? असा अर्थ निप्पन्न होतो. 'अ-- प्रतिः चा असा अर्थ होतो हे दाखविले आहे. युद्धजल्सभवो धा बास्वभिगजेन्द्रसंभ्रमकृतो वा । नगरोपरोधजो वा विज्ञेयो विद्रवस्त्रिविधः ॥ ६२॥ युद्ध व पूर यांमुळे उडालेला हाहाःकार अथवा वारा, आग, हत्ती यांच्यामुळे झालेला संभ्नम किंवा नगराळा वेढा पडल्यामुळे आलेले संकट -- असा तीन प्रकारचा विद्रव जाणावा. त्रिविद्रव इत्युक्ते तत्नयं वक्तन्यम्‌ । चेतनक्ूतमन्यकूतमुभयकृतं वा यद- नर्थात्मकं वस्तु, यतो विद्रवन्ति जनाः स विद्रव इति त्रिविधः । तत्राचेतनकूत- मुदाहर्तु जलवाय्वादिग्रहणम्‌ । चेतनकूृते गजेन्दर उदाहरणम्‌ । दरयकृते नगरोप- रोधः, तस्य युद्धाभ्निदानादिसंपाद्यत्वात्‌ । समवकारात तीन विद्रव असतात असे म्हटळे आहे, ते तीन सांगितळे पाहिजेत. सचेतन प्राण्याने केलेली, अचेतन पदार्थाने झालेली किंवा दोहोंच्यामुळे घडून आलेली अनथे- रूप गोष्ट, जिच्यापासून लोक भयग्रस्त होऊन पळून जातात तो विद्रव याप्रमाणे तीन प्रकारचा. त्यांपैकी अचेतनाने केलेल्याचे उदाहरण देण्यासाठी जल, वायु आदींचा निर्देश केला आहे. सचेतनाने केलेल्याचे गजेन्द्र हे उदाहरण. दोहोंनी केलेल्याचे नगराला वेढा हे उदाहरण, कारण त्यात युद्धाच्या अनुषंगांने आगी लावणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. १ नि -जलेन्द्रसंभवो वापि. १८.६२ ९५७ अमिनवगुप्ताने मानठेळे तीन प्रकार नाट्यशास्त्रकाराला अमिंप्रेत असतील असे निश्चित पणे म्हणता येगार नाही. असा संभव आहे की त्याचे प्रकार आर्येतील तीन सामासिक शब्दांत अभिव्यक्त झाळे आहेत. वेस्तुगतक्रमविहितो देवषशाद्वा परप्रयुक्तो बा । सुखदुःखोत्पत्तिकृतस्रिविधः कॅपटो$त़र बिज्ञेयः ॥ ६३॥ वस्तूच्या ठिकाणी असलेल्या बिदोषामुळे उत्पन्न झाळेळे, किंवा दैवयोगाने प्राप्त झाळेळे अथवा दुसऱ्याने केळेळे, असे तीन प्रकारचे कपट - सुख अथवा दुःख उत्पन्न करणारे - या समवकारात असते असे जाणावे. कपटो वश्चना तस्याश्रयणमड्ठीकरणं त्रिधा । तत्र वश्वकबुद्धयेैव कदाचि- त्केवळया कपटो भर्वाते । स हि वस्तुगतक्रमविहितः, वस्तु फळं तत्माप्तो वस्तु- गतः फठसाधक:ः कर्ता तस्य यः क्रम उपायचिन्तनादिः तेन विहितः । यत्रानपराद्ध एव वश्चकेन वश््यते स एवमुक्तः। यत्र तु वश्वनीयो5पि सापराधः स परप्रयुक्त कपटः । तदपराधे तु वश्चवकस्य वश्चनेच्छा नास्तीति नायं भेदः संभर्वाते, वश्व- नेच्छाभावे वश्वनायाः संपत्त्ययोगात्‌ । यत्र तु द॒योरापे न कश्चिदभिसंधिदोषः काकतालठीयेन तुल्यफळाभिसंधानवतोरप्येक उपचयेनापरस्त्वपचयेन युज्यते तत्र वचना सा दैवकूता वश्चना । स च कस्याचित्सुखमन्यस्य दुःखसुत्पाद्यतीति तदाह सुखदुःखोत्पत्तीति । कपट म्हणजे फसवणूक, त्याचा आश्रय म्हणजे स्वीकार तीन प्रकारचा. त्यांपैकी कधीकधी केवळ फसवणाऱ्याच्या बुद्धीमुळेच कपट होते. हें कपट वस्तुगतक्रमविहित होय - स्तु म्हणजे फल, त्याच्या प्राप्तीसाठी वस्तुगत म्हणजे फळ साध्य करणारा कर्ता, त्याचा जो उपायचिंतनादी क्रम, त्याने केळेळे कपट. ज्यात निरपराधी अशाच मनुष्याची फसवणूक केली जाते त्या कपटाचा हा निर्देश आहे. परंतु ज्यात फसवणूक होणाराच अपराधी असतो ते कपट दुसऱ्याने केलेले. त्याचा अपराध असल्यामुळे वंचकाची फसवण्याची इच्छा नसते म्हणून हा प्रकार होतो असे नाही, कारण फसवण्याची इच्छा असल्याशिवाय फसवणूक सिद्धच होणार नाही. परंतु जिच्यात उभयतांच्याही इच्छेच्या स्वरूपाचा काही दोष नसतो व उभयतांचा समान फल प्राप्त करण्याचा उद्देगे असतानाही 'काकताळीय न्यायाने एकाला समृद्धी प्राप्त होते व दुसर्‍याचा हास होतो ती फसवणूक दैवाने केलेळी फसवणूक होय. आणि हे कपट एकाळा सुख व दुसऱ्याला दुःख उत्पन्न करते हे 'सुखदुःखोतत्ति' या शब्दात सांगतात. १ नि यस्तु गति-. २ नि कपटाश्रयो ज्ञेयः, ९८ नाट्यशास्त्र “बञ्वकबुद्धवेव? मुद्रितात॑ “वञ्चना, बुद्धवेव' असे आहे. ते अर्थात बरोबर नाही. - 'वस्तु- गतः? च्या ऐवजी फक्त 'गतः' मूळ असण्याचा संभव आहे. - 'तदपराधे इ०' या वाक्यात दुसऱ्या कोण्या टीकाकारांचे मत अग्राह्य ठरविले आहे. त्यांचे असे मत होते की एकाचा अप- राध असल्यामुळे दुसऱ्याने केलेली त्याची फसवणूक ही फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेली नसते तर अपराधाबद्दळ शासन करण्याच्या हेतूने. अमिनवगुप्ताने म्हटले आहे की फसवणुकीचा उद्देश नसेळ तर ती फत्तवणूकच होणार नाही. - 'अमिसंधि? म्हणजे बेत, इरादा. - स च? ही मुळातींल 'न च? ची केलेली दुरुस्ती आहे. “न? ने अमिम्रेत अर्थाच्या उलट अर्थ होतो. “त? हे "कृपट:? बद्दळ वापरळे आहे. शेवटी असलेले 'तदाह सुखदुःखोत्पत्तीतिः हे शब्द फक्त हस्तलि- खितात आहेत, सुद्रितात नाहीत. ते आवशयक वाटतात, त्यामुळे आर्येतील हे वचन स्पष्टपणे 3 ७ ७ तिन्ही प्रकारच्या कपटाळा लागू केलेले दिसून येते, केवळ दैवकुत कपटालाच नाही. त्रिबिधश्रात्र बिधिज्ञेः पृथक्पथक्‍्कार्ययोगविहिताथेः । शुद्धारः कतेव्यो धर्मे चार्थे च कामे च ॥६४॥ आणि (नाट्याचे) नियम जाणणारांनीं धम, अर्थ आणि काम यांच्याशी संबद्ध निरनिराळी कार्यांची प्रयोजने साध्य करणारा असा तीन प्रकारचा शुंगार दाखवावा. धर्मे अर्थे कामे इति सप्तम्या कार्यत्वं कारणत्वं चोच्यते । तेन धर्मा यत्र हेतुर्वा साध्यो वा नायिकाळाभे स धर्मशक्ञारः । एवमर्थकामयोवांच्यम्‌ । “घुर्म?, 'अर्थे' आणि 'कामे' या शाब्दांतीळ सप्तमीने काय आणि कारण ह्या दोन्ही गोष्टींचा बोध होतो. म्हणून ज्यात नायिकेच्या प्राप्तीला धम कारणीभूत होतो अथवा ज्यात नायिकेच्या प्राप्तीमुळे धम सिद्ध होतो तो धर्मशूज्ञर. या'चप्रमाणे अर्थ ब काम यांच्या संबंधात समजावे. ' एवम्‌” म्हणजे अर्थामुळे स्त्रीची प्राप्ती ब स्त्रीमुळे अर्थप्राप्ती, तसेच कामामुळे स्त्रीलाभ व स्त्रीमुळे कामोहीपन. यस्मिन्‌ धमेप्रापकमात्माहितं भवति साधनं बहुधा । ्रतनियमतपोयुक्तो ज्ञया5्सौ धमेशूज्ठारः ॥ ६५ ॥ ज्यामध्ये धर्माची प्राप्ती करून देणारे व आत्म्याचे हित साधणारे अनेक प्रकारचे साधन असते व जो व्रत, नियम व तप यांनी युक्त असतो तो धर्मशुज्ठार जाणावा. , १ का लिविधाकृतिद्युद्ञारो ज्ञयो धर्मार्थिकामकृत;. २ नि यत्न तु धमेसमापक-, का यत्न तु धर्मे प्राथित-- ३ का प्रतिनियमतपोयुक्तं. १८.६६ पा यत्र शूर इति तद्विषयः प्रमदा व्यपदिश्यते वतादियुक्त्या प्राप्यः, यत्र च प्रांपे धमंप्राथनारूपमात्महितं यज्ञादि पत्नीसंयोगकृतं सिध्यतीति संबन्धः । ज्यात शुद्ठार - म्हणजे त्याचा विषय असलेली प्रमदा निर्दिष्ट होते -त्रत आदी उपायांनी प्राप्त होतो आणि ज्यात तो प्राप्त झाल्यावर धर्मसाधनरूप यक्ष आदी स्वतःस हितकर अशा गोष्टी पत्नीच्या साहचर्यामुळे सिद्ध होतात तो धर्मशूज्डार असा अन्वय. “इति तद्विषय: प्रमदा व्यपदिव्यते' हे शब्द कंसात आहेत असे समजावे. - “धर्मप्रार्थना? यातील “प्रार्थना? शब्द विशेष तमर्पक नाही. साधन ह्या अर्थाचा शब्द अपेक्षित आहे. अर्थस्येच्छायोगादवहुधा चेवाथतोब्थेदाडगरः । स्रीसंप्रयोगविषयेष्वेथार्था बा रतियेत्र ॥ ६६॥ अर्थाची पुष्कळ प्रकारची इच्छा असते तेव्हा अर्थासाठी होणारा तो अर्थशूद्टार, किंवा क्लीच्या मीलनाच्या संबंधात अर्थाच्या प्राप्तीच्या उद्देशाने केळेली रती (म्हणजे अथेशुह्लार). अनेकथोति राज्यभूमिगोसुवणांदिभेदेनेत्यर्थः । रतिबेहुमानो5्थाथोमिति योषितां पुरुषाणां च । ननु च देवेष॒ कथमर्थार्थत्वम्‌ । गन्धर्वयक्षादिपु संभव- त्येवेति केचित्‌ । यदर्थनीयं तद्थः, देवेष्वांपे चेैतत्संभवठीत्यन्ये । उपाध्याया- स्त्वाहु: तत्र नायकनायिकयोरनुभ्राधिरप्यन्यगतेव, यथा भगवतो भवानीपते- गिरिराजपुत्रीसंगमर्नमिन्द्रादीनां तारकाक्रान्तानेजराज्यसमुन्मोचनाय भवतीति । :अनेकधा' म्हणजे राज्य, भूमी, गाई, सोने इत्यादी प्रकारांनी असा अथे. रति म्हणजे बहुमान अर्थासाठी म्हणजे ख्रियांचा आणि पुरुषांचा. येथे आक्षेप असा की देवांना अर्थाची इच्छा कशी असणार ? गंधर्व, यक्ष आदींमध्ये तशी इच्छा संभवतेच असे काहींचे म्हणणे आहे. दुसरे म्हणतात की जे इच्छिण्यासारखे असते तो अथे आणि ही गोष्ट देवांच्या बाबतीतही संभवते. परंतु आमच्या गुरुजींचे म्हणणे असे की नायक व नायिका यांच्या समागमाने होणारी अर्थप्राप्ती इतरांनाच होते; उदाहरणार्थ, भगवान शंकराचा पर्वैतराज हिमालया'च्या कन्येशी झालेला समागम इन्द्र आदींच्या तारकासुराने पादाक्रांत केलेल्या राज्यांच्या विमोचनाळा कारणीभूत होतो. १ नि -ष्वयथार्थमपीष्यते हि रतिः (का -5मिरतिः). > क्य १.० 5 कान र ज्या १०० नाट्यशास्त्र “अनेंकधेति' सूळ आरयेत 'बहुधा? शब्द आहे, 'अनेंकधा' नाही. आणि 'अनेकधाः शब्द आर्येत बसण्यासारखाही नाही. टीकेत तो चुकीने आलेला दिसितो. - 'अर्थाथमिति' आयेंतीळ 'अर्थार्था? च्या जागी अमिनवगुप्ताचा 'अर्थार्थ' असा पाठ होता असे दिसते. दोन्ही पाठ चालण्यासारखे आहेत. - 'यदर्थनीयं तदर्थः? यात 'सोड्थः' असे पाहिजे. - “एतत्‌? म्हणजे एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छा, ह्या टीकाकारांचे म्हणणे असे की केवळ गन्धर्व आदींनाच इच्छा होते असे नाही, तर सर्वच देवांना होऊ शकते. - 'उपाध्याया:? भट्ट तोत. - “नायकनायिकयोः?” मुळात 'नायकयोः? असा पाठ आहे. पण तो असंमाव्य वाटल्यामुळे 'नायकनायिकयोः' अशी दुरूस्ती सुचविली आहे. - “अनुप्राप्तिः हा शब्द सुद्धा समर्पक वाटत नाही. “अथेप्राप्रिः? अपेक्षित आहे, पण त्याच्या पूर्वी 'समागमाने सिद्ध होणारी? अश्शा अर्थाचे वचन अर्थ स्पष्ट करण्यास साहाय्यक झाले असते. - “भगवत: इ०? कालिदा- साच्या कुमारसंभवात ह्या कथेचा विस्तार आहे हे सर्वश्वुत आहे. कन्याबिलोभनकृतं प्राप्ती ख्रीपुंसयोस्तु रम्य घा । निभतं सावेगं बा यः स भवेत्कामश्रुज्ठारः ।। ६७॥ कन्येच्या विलोभनाने सिद्ध झालेळा किंबा क्ली ब पुरुष यांच्या मीलनाने होणारा रम्य (असा शंगार) -मग गुप्तपणे असो की आवेगाने असो - तो कामशुंगार होय. कन्यायां विळोभो नायकस्य तस्याश्व तस्मिन्षिति परस्परानुरागकूत (> ९ प्तौ $ इत्यथेः । स्त्रीपुंसयोरुद्यानस्थानादि प्राप्ती निभ्रत इति प्रच्छादनपूवकम्‌, यदि वासावेवास्मीति प्रकटं कृत्वा यः शुह्कारः स कामप्रयुक्त एव । स्त्री पुनरत्र परस्त्री विवक्षिता, यथा शक्रस्याहल्या । कन्येच्याबद्दद आकधेण नायकाळा आणि तिला त्याच्याबद्दल याप्रमाणे परस्परावरील प्रेमाने उत्पन झालेला असा अर्थ. स्री आणि पुरुष उद्यान आदीसारख्या ठिकाणी आले असता त्यांचा निभृत म्हणजे गुप्तपणे चाललेला किंवा मीच तो आहे असे प्रकट करून होणारा जो शह्जर तो कामानेच प्रेरित झालेला शुद्ठार होय. यासंबंधात क्षी मात्र परख्री विवक्षित आहे, जशी इन्द्राची अहल्या. मूळ आर्येतील “विलोभनकृतः हा पाठ बरोबर बाटत नाही. '-कृतः' असे अपेक्षित आहे. अमिनवगुप्ताच्या टीकेवरून त्याचा असा पुह्लिंगीच पाठ असावा असे दिसते. तसेच, 'प्राप्तो' शब्दाचा अन्वय लावणे कठीण आहे. अमिनवगुप्ताने रम्य? ची व्याख्या 'उद्यानस्थानादि? या शब्दात केली असून त्याचा 'प्राप्तो' शी कर्म म्हणून संबंध जोडला आहे. पण त्यासाठी ((रम्यं) प्राप्तयोः (औरत असे रूप अपेक्षित आहे. - 'यदि वासौै' ही मुळातील १ का -भनं वा प्राप्त. २ का जानीयात्कामशुज्ञारमु, ब यस्य भवेत्कामशुज्ञारः, नि यस्य भवेद्ा कामशुद्कारः. १८.९७ १०१ यदि चासो? ची दुरुस्ती आहे. आरयेतीळ “वा? चा अनुबादच अपेक्षित आहे, “च चा नाही.- “य: स' आर्येत हाच पाठ अमिनवगुप्ताला अभिप्रेत आहे हे उघड आहे. बडोदे प्रतीतील “यस्य ह्या पाठाचा अन्बय लागण्यासारखा नाही. नन्वेवं शादधवरयोगे कथं केशिकीहीनता । केशिक्यां वृत्तो हीनानीति तत्र समासः, तेन नसांद्ठचतुष्कतद्‌परअकगीतनृत्यवाद्याद्यमावात्‌ कैशिकी हीनात्र भर्वाते । उपाध्यायास्त्वाहः न काससड्धावमात्रादेव केशिकीसंभवः, रोद्रप्रकृतीनां तदभावात्‌ । विलासप्रधानं यदू्प सा केशिकी । न च चरिते तद्रपानुप्रवेशे$पि तद्यवहारः । प्राधान्यक्ृती ह्यसावित्युक्तम्‌ । तेन तत्र विषये भारत्यादिवृत्त्यन्तरा- भिधानसेव युक्तामिति । येथे आक्षेप असा की याप्रमाणे शू्धराची योजना असताना समवकारात कैशिकीचा अभाव कसा समजत येईळ ? याला उत्तर असे की त्या ठिकाणी “ कैशिकी वृत्तीमध्ये कमी ' असा समास समजावा, त्यायोगे नर्म आदी तिची चार अंगे व तिळा रोचक करणाऱ्या गीत, नृत्य, वाद्य आदींचा अभाव असल्यामुळे कैशिकी ह्या खू्पकात न्यून होते. परंतु. आमचे गुरुजी म्हणतात की केवळ कामा'चे अस्तित्व असल्यानेच कैरिकी वृत्ति संभवते असे नाही; कारण रौद्र प्रकृतीच्या मनुष्यांत तिचा अभाव असतो. विलासाला प्रधान्य असलेले जेख्प ते कैरिकी. आणि 'चरितात त्या ख्पाचा प्रवेश झाला तरी त्या शब्दाचा व्यवहार होत नाही. कारण प्राधान्य असेळ तरच तो व्यवहार होतो असे म्हटले आहे. म्हणून त्या विषयासंबंधात भारती आदी इतर वृत्तींचा निर्देश करणेच योग्य होय. च रिकी 'केशिकोहीनता” मागे नवव्या आर्येत नाटक व प्रकरण खेरीज करून इतर आठ सख्पके “"केशिकीवृत्तिहीनानिः असाबीत असे ग्हटले आहे, त्याला अनुलक्षून हा निर्देश आहे. - 'हीना- नीतिः मुद्रित पाठ “हीनामिति? बरोबर नाही हे वरील निर्देशावरून उघड आहे. - 'केशिकी हीनात्र भवति? यातील 'केशिकी' ही मुळातील 'केशिक्या? ची दुरुस्ती आहे. 'हीना? ह्या स्रीलिंगी बिरोष- णाला 'केशिकी? असे प्रथमान्त विशोष्य आवश्‍यक आहे. आणि त्याने अर्थही व्यवस्थित लाग- तो. - 'उपाध्यायास्त्वाहुः? अगोदर मांडलेले मत दुसऱ्या कोणाचे असे म्हटलेले नाही. यावरून अमिनवगुष्ताला ते अमान्य नाही असे म्हणता येण्यासारके आहे. आणि याबाबतीत त्याला आपल्या गुरूंचे मत सर्वस्वी ग्राह्य बाटत नव्हते असाही तर्क करता येईल. - “तदभावात्‌? यातील “तत? म्हणजे केशिकी वृत्ती, - 'रूपम? हा शब्द घटना, प्रसंग या अर्थी बापरठेला दिसतो. -“न च चरिते इ०' मुळात 'चरितं' आहे, पण त्यातील प्रथमेचा योग्य अन्वय लावणे कठीण आहे. येथे युक्तिवाद असा आहे की एखाद्या वरितात कधी विलाताचा प्रसंग घडला तरी त्या सबंध चरिताला केशिकी वृत्तीने युक्त असे म्हणणे योग्य होणार माही. कारण त्यात त्या प्रसंगाला प्राथान्य नसून इतर गोष्टींना प्राधान्य असते. वृत्तीचा निर्देश चरितातील प्रधान गोष्टीच्या अनुरोधानेच करणे योग्य होय. समवकारात शुद्धार असला तरी त्याला प्राधान्य नाही. म्हणून त्याला केशिकीदृत्तिहीन म्हणण्यास हरकत नाही. १०२ नाट्यशास्त्र उष्णिग्गायत्र्याद्यान्यन्यानि च यानि बन्धकुटिलानि । वृत्तानि समवकारे कविभिस्तानि प्रयोज्यानि ॥ ६८॥ उष्णिकू, गायत्री आदी आणि दुसरे जे विषमरचनेचे छंद आहेत त्यांची कवींनी समवकारामध्ये योजना करावी. उष्णिक्‌ सप्तभिगांयत्री पाडे: । बन्धकरटिळाने विषमार्धसमानि तान्यत्र समवकारे सस्यग्योज्यानीति । नेव योज्यानीत्युद्धटः पठति । स्त्रग्धरादीन्येव प्रयोज्याने नाल्पाक्षराणीति स व्याचष्टे । उष्णिकू सात अक्षरांचा पाद असलेला छंद आणि गायत्री सहा अक्षरांचा. बन्धकुटिळ म्हणजे विषम आणि अधेसम छंद, ते ह्या समवकारामध्ये योग्य रीतीने योजावेत. उद्भटाचा ' नेव योज्यानि! असा पाठ आहे. स्रग्धवरा आदी छंदांचीच योजना करावी, कमी अक्षरे असलेल्या छंदांची नाही अशी त्याने व्याख्या केळी आहे. 'उष्णिक्सप्तमिः इ०? प्रत्येक छंदात चार पाद असतात या नियमास अनुसरून येथे प्रत्येक पादातील अक्षरसंख्येचा निर्देश केला आहे. नाट्यशास्त्र, १४.४२ व ४७ यांत हे स्पष्टपणे सांगितळे आहे. - 'विषमार्धतमाने? विषम म्हणजे चारही पाद सारखे नसलेला छंद आणि अर्धसतम म्हणजे पहिला व तिसरा आणि दुसरा व चौथा असे सारखे पाद असलेला छंद असे १४.४३ वरील टीकेत अमिनवरुप्ताने म्हटले आहे. - 'उद्गटः? हा एक प्राचीन टीकाकार. एवं कायेस्तज्ज्ञैनांनारससंश्रयः समवकारः । वक्ष्याम्यतःपरमह॑ठक्षणमीहामृगस्यापि ।। ६९ ॥ याप्रमाणे तज्ज्ञ कवींनी विविध रसांच्या आधाराने समवकाराची रचना करावी. आता यानंतर मी ईहामृगाचेही लक्षण सांगतो. एवं श्रद्धालवो देवाताभक्ताः तद्देवयात्रादावनेन प्रयोगेणानुगृह्यन्ते, निर- नुसंधानहृदया स्त्रीबालमूखांत्व विद्रवादना हतहृदयाः क्रियन्त . इत्युक्तः समवकारः । १ नि -तवी वा वृत्ताने, का -ती वा यानि तथान्यानि, घो :-त्र्याद्यादन्यानि. २ नि तान्यत्र. ३ नि -मिः सम्यक, का -मिनेंव. ४ नि सुखदुःखसमाश्रयः. १८.७०-७२ | १०३ याप्रमाणे जे श्रद्धाळू आणि देवभक्त असतात त्यांच्यावर त्या देवाची जत्रा व*रे सारख्या प्रसंगी याच्या प्रयोगाने अनुग्रह होतो आणि ज्यांची बुद्धी अनुसंधान राखण्यास असमर्थ असते त्यांचे तसेच स्री, बाळ व मूर्ख यांचे विद्रव आदी गोष्टींनी मनोरंजन केले जाते म्हणून समवकाराचे वणेन केळे आहे. “निरनुसंधान' शब्द वर ६० व्या आर्येबरील टीकेत आला आहे. दिव्यपुरुषाश्रयकृतो दिव्यसत्रीकारणोपगतयुद्धः । सुबिहितवस्तुनिबद्धो विप्रत्ययकारकशेव ॥ ७० ॥ उद्धतपुरुषप्रायः खत्रीरोषग्रथितकाव्यबन्धश्व । संक्षोभाषिद्रवकृतः संफेटकृतस्तथा 'चेब ॥ ७१ ॥ खीभेदनापहरणावमदनप्राप्तवस्तुशुज्ञार! । ईह्वामृगस्तु कार्यः सुंसमाहितकाव्यबन्धश्न ॥ ७२॥ दिव्य पुरुषांच्या आधाराने रवलेळा, दिव्य स्रीच्या निमित्ताने युद्धाचे प्रसंग असलेला, उत्कृष्ट मांडणी असलेल्या कथानकाने युक्त, तसेच विदोष प्रत्ययकारी असलेला, बहुतांशी उद्धत पुरुषपात्रे असलेला, स्त्रीच्या रोषाविषयी काव्यरचना असलेला, क्षोभ, विद्रव, त्याच- प्रमाणे संफेट यांनी युक्त असलेला, स्त्रीच्या निमित्ताने भेदन, अपहरण व अवमर्दन यांच्या द्वारा कथानकात शुंगाराची प्राप्ती दाखविणारा आणि काव्यरचना अगदी व्यवस्थित केली असलेला असा इंहामृग निर्माण करावा. अथेहामृगमाह दिव्येति । दिव्यानां पुरुषाणामाश्रयणं नायकतया, तेन कृतः । दिव्यस्त्रीनिमित्तमुपगतं युद्धं यत्न । दिव्यानुप्रवेशात्समवकारवत असं- बद्धार्थता मा प्रसांक्षीदित्याह सुविहितेन संन्छिष्टेन वस्तुना निबद्धः । विगतानि प्रत्ययकारणाने विश्वासहेतवो यत्र । मध्ये च तत्रादिव्यानामपि प्रवेशो भव- तीति दर्दायति उद्धतपुरुषाति । स्त्रीनिमित्तको रोषः । संक्षाभ आविगः । स्त्रीनि- मित्त॑ यानि भेदनापहरणावमर्दनानि - यथायोर्ग स्त्रीविषयाणि अन्यविषयाणि - तैः प्राप्त वस्तु आधिष्ठानं प्रमदाळक्षणं यस्य ताहशः दाडुगरः यस्मिन्‌ । अवमदंनं दण्डः । सुसमाहितः काव्यबन्ध इत्यनेन वीथ्यड्ठान्यत्र योज्यानीति दर्शयति । १ नि चतुरड्ूूविभूषितश्रेव. १०४ नाट्यशास्त्र आता '*दिव्य' इत्यादी शब्दांत ईहामगार्‍चे वणन करतात. दिव्य पुरुषांचा आधार नायक म्हणून, त्याने स्चलेळा. दिंग्य स्त्रीच्या निमित्ताने ज्यात युद्धाचा प्रसंग येतो असा. दिव्य पात्रांचा समावेश असल्यासुळे समवकाराप्रमाणे विषयामध्ये तुटकपणा'चा प्रसंग येऊ नये म्हणून म्हणतात ' सुविहितेन' म्हणजे सुसंहत अशा कथानकाने सुघटित केलेला. ज्यात प्रत्ययकारण म्हणजे विश्वसनीयता विद्यमान नाही असा. आणि त्यात मध्ये दिव्य नसलेंल्यांचाही समावेश होतो हे 'उद्भतपुरुष' या शब्दाने दाखवितात. स्त्रीच्या निमित्ताने रोष. संक्षोभ म्हणजे आवेग. स्त्रीच्या निमित्ताने जे भेदन, अपहरण आणि अवमर्दन- औचित्यानुसार स्त्रीच्या संबंधात किंवा इतरांच्या संबंधात -त्यांच्यामुळे प्राप्त झालेली वस्तु म्हणजे प्रमदारूपी अधिष्ठान असलेला शांगार ज्यात आहे असा. अवमर्दैन म्हणजे शासन. उत्कृष्ट रचनेच्या काव्यबन्धाच्या निर्देशाने वीथीच्या अंगांची यात योजना करावी असें दाखवितात. असंबद्धार्थताः/ समवकारांत तीन अंकांतील विषयांचा परस्पराशी संबंध नसतो हे वर ६१ व्या आरयेत सांगितळे आहे. - “विगतांने इ०? आरयेतील 'विप्रत्यय' शब्दाचा अमिनवगुप्ताने विश्वासाचा अभाव असा अर्थ केला आहे. यावरून जर असा निष्क निघत असेल की ईहा- मृगाच्या कथानकातील घटना विश्वसनीय स्वरूपाच्या नसतात तर तो एकदम पटण्यासारखा नाही. विशेषतः इंहामृगाचे वर्णन “सुविहितवस्तुनिबद्धः” आणि 'सुसमाहितकाव्यबन्धः? या शब्दांत केलेले असल्यामुळे तो अविश्वसनीय कसा होऊ शकेल? त्यामुळे उलट त्यांचे कथानक अधिक विश्वासार्ह होण्याचाच जास्त संभव आहे. अमिनवगुप्ताच्या या व्याख्येचा असाही अर्थ शक्‍य आहे की इहामृगातील पात्रांचा परस्परावरीलळ विश्वास नाहीसा झालेळा असतो. पण असा अर्थही विशेष पटण्यासारचा नाही. - तत्रादिव्यानामपिः ही दुरुस्ती आहे. मुळात 'तत्र, दिव्यानामपिः असे आहे. पण दिव्य पात्रे नायक असल्याचे वर म्हटले असताना त्यांच्याच समावेश्याचा पुन्हा निदेश अस्वाभाविक होईल. आणि 'आपि? ने दिव्यांहून इतर पात्रांचाच समावेश सुचित होतो. 'स्त्रीनिमित्तको रोष.? स्त्रीचा रोष असा अर्थ कराबयाचा नाही हे दाखविण्यासाठी ही व्याख्या. - “यथायोगम? उदाहरणार्थ अपहरण स्त्रीचे, अवमर्दन व भेदन हे त्याला विरोध करणारांचे. - 'वीथ्यज्जानि' बीथीच्या तेरा अंगांचे वर्णन ह्या अध्यायाच्या शेबटी केळे आहे. “संफेट' म्हणजे 'रोषग्रथितवाक्य” असे पुढे १९.८४ मध्ये सांगितले आहे. यब्मायोगे कार्य ये पुरुषा वृत्तयो रसाश्रैव । * ८ च. २ “> च ईह्वामृगे5पि ते* स्युः केवलमेमरस्रिया योगः ॥ ७३॥ व्यायोगात ज्या प्रकारचे कार्य, ज्या प्रकारचे पुरुष, ज्या प्रकारच्या वृत्ती आणि ज्या प्रकारचे रस असतात त्या सवे गोष्टी इंहामृगात सुद्धा तशाःच असाव्यात. फक्त त्यात दिव्य स्त्रीची योजना असावी १ नि तत्स्यातू. २ नि -मत्र स्विया योगः, का -ममरस्त्रियो ह्यस्मिन. १८.७४ १०" ४0% क अडुपरिमाणं नायकसंख्यां वृत्तिरसविभागं च व्यायोगातिदेदोनाह यद्या- योग इति । कायंशब्देनाडुः उच्यते, तेनेक एवाडुः । नायकास्तु द्वादश, ससवकारा- तिदेशेन व्यायोगे तहाभात्‌ । अन्न तु समवकारातिंदेशेन सवेसंपत्तेगोरवं स्यात्‌ । 'य॒द्यायोगे' या शब्दांत ब्यायोगा'च्या अतिदेशाने इंहागृगाच्या अंकांचे परिमाण; नायकांची संख्या आणि वृत्ती व रस यांची योजना ह्या गोष्टी सांगतात, 'कार्य' शब्दाचा अंक असा अर्थ आहे, म्हणून यात एकच अंक. परंतु नायक बारा असतात, कारण व्यायो- गात समवकारा'चा अतिदेश केल्यामुळे ती संख्या प्राप्त होते. जर ह्या ठिकाणीच समवकारा'चा अतिदेश केळा असता तर सवे गोष्टी सिद्ध होऊन अधिक भार झाला असता. “यायोगे तल्लाभात्‌ः व्यायोगात समबकाराचा अतिदेदा पुढे ८३ व्या आर्येत आहे, - 'सर्वसंपत्तेगौरबं स्यात याचा अर्थ असा दिसतो की समवकारातील त्रिकपट इत्यादी गोष्टी सुद्धा हेहामृगात प्राप्त झाल्या असत्या व त्यायोगे अभिप्रेत अर्थापेक्षा अधिक अर्थ निष्पन्न झाळा असता. | यत्र तु धधेप्सितानां बधो हयदग्रो भवेद्धि पुरुषाणाम । किंचिब्याजं कृत्वा तेषां युद्ध शमयितव्यम्‌ ।॥। ७४ ॥ परंतु, ज्या ठिकाणी वध्य ठरलेल्या पुरुषांचा घोर वध होण्याचा संभव असेल त्या ठिकाणी काही तरी निमित्त काढून त्यांचे युद्ध थांबविण्यात यावे. | ननु युद्धमवमदंनं चेत्युक्त॑ तत्रास्य प्रत्यक्षप्रयोज्यता मा भूदिति दर्शयाति यत्र त्विति । वधेप्सितानां वध्यानाम्‌ । भर्वोदोति संभाव्यत इत्यथेः । तत्रेति _ येषामिति चाध्याहायेम्‌ । व्याजामोति पलायनादि । इंहा चेष्टा मगस्येव स्त्रीमा- त्राथा यत्न स इहामरगः । यात युद्ध व अवमदन असतात असे म्हटले आहे, तेव्हा यांचा प्रत्यक्ष प्रयोग केला जाऊ नये हे 'यत्र तु' इत्यादी राब्दांत दाखवितात. “वघेप्सितानाम! म्हणजे वध्य असलेल्यां- चा. “भवेत्‌? म्हणजे संभव असेळ असा अर्थ. 'तत्र' आणि 'येषाम? हे दोन शब्द अध्याह्ूत ' धरावयाचे. व्याज म्हणजे पलायन वगैरे. इंहा म्हणजे चेष्टा मृगाप्रमाणे केवळ स्त्रीसाठी ज्यात आहे तों इहामग कक आका चाध्याहार्यम्‌ ही दुरुस्ती आहे. मुळातील “चार्धमाहायंस्‌॑ः अर्थहीन व म्हणून भ्रष्ट पाठ आहे हे उघड आहे | १ घो -5प्यदग्रो १०९ र नाट्यशास्त्र ईहामृगस्य लक्षणभुक्त विप्राः समासयोगेन । डिमलक्षणं तु भूयो लक्षणयुक्त्या प्रवक्ष्यामि ॥ ७५॥ प्रख्यातवस्तुविषयः प्रख्यातोढात्तनायकश्चेव । षड्सलक्षणयुक्तश्वतुरडूने घे डिमः कार्यः ॥॥ ७६॥ गुज्ञारददास्यवं्ज शेषेः सवे रसेः समायुक्तः । दीप्तरसकाव्ययोनिर्नानाभाबोपसंपन्नः ।॥। ७७॥ "निर्घातोल्कापातेरुपरागेणेन्ुसूर्ययो्युक्तः । युद्धनियुद्धाधषणसंफेटकृतश्च कर्तव्यः ॥ ७८॥ मायेन्द्रजालबहुलो बंडुपुस्तोत्थानयोगयुक्तत्र । देवेभुजगेन्द्रराक्षसयक्षपिद्याचावकीर्णश्र ॥७९॥ षोडशनायकबहुलः सात्तत्यारभटिवृत्तिसंपन्नः । कार्या डिमः प्रयत्नान्नानाश्रयभावसंपन्नः || ८०॥ हे विप्रहो, ईहागृगाचे लक्षण मी थोडक्यात सांगितले. आता यापुढे लक्षणाच्या साहाय्याने डिमाचे वर्णन करणार आहे. प्रसिद्ध कथानकाचा विषय असलेला, तसेच प्रसिद्ध असे उदात्त नायक असलेढा, सहा रसांच्या आविष्काराने युक्त व चार अंक असलेला असा डिम स्चावा. शुंगार व हास्य हे दोन खेरीज करून इतर सर्व रसांनी युक्त असलेला, आवेशायुक्त रसांचे काव्य असलेळा, विविध प्रकारच्या भावांनी संपन्न असलेला, भूकंप, उल्कापात, आणि चंद्र वसूय यांची ग्रहणे यांनी युक्त, युद्ध, दन्द्युद्ध, आह्यान, संफेट यांनी युक्त असा करावा. तसेच माया, इंद्रजाळ या गोष्टी मोठ्या प्रमाणात असलेला, पुष्कळ प्रकारच्या कृत्रिम वस्तूंच्या निर्मितीने युक्त असलेला, देव, नागराज, राक्षस, यक्ष, पिशाच्च हे समाविष्ट असलेला, एकूण सोळा नायक असलेला, सात्त्ती आणि आरभटी या वृत्तींनी संपन्न असलेला आणि विविध प्रसंगांतून उद्भवणाऱ्या भावांनी संपन्न असा डिम प्रयत्नपूर्वक रचावा. १ नि षट्ल्रिगाल्लक्षणयुकू २ ब का -वर्जः:. ३ का निर्धातचन्द्रसूर्योपरागसोल्कावपात- संयुक्त. ४ नि -नियुध्दप्रहूरण-. ५ नि बहुपुरुषो- ६ का देवासुरराक्षसभूतयक्षना- गा*च पुरुषा: स्यु:: ७ का तज्ज्ञेर्नानाश्रयविदोषेण (घो -विशेष:). १८.७'१-८८ १०७ अथ डिममाह प्रख्यातवस्तुविषय इति । नाटकतुल्यं सर्वमन्यत्‌, केवलं संधीनां रसानां चासमग्रता । शुद्ठरहास्यवजे षडूसत्वे पयांयेण शान्तस्य प्रयोग: स्यादित्याह दीप्तरसेति । कान्ययोनिः काव्यवस्तु । देवादयो बाहुल्ये- नात्र । सात्त्वत्यारभटीति जातिरप्राणिनामिति केचित्‌ । सात्त्वत्यारभटीव्रात्ते- संपन्नं वृत्ति्यं यत्र । वृत्तिसमूहे वा वृत्तिशब्दः । सात्त्वत्यारभटीठक्षणव्या- वृत्त्या संपन्नः । डिमो डिस्बो विद्रव इति पयायाः, तद्योगादयं डिमः । अन्ये तु डयन्त इति डियः उद्धतनायकाः, तेषां माने वृत्तियत्रेति । इका हस्वो5ड्यो गालवस्येति हस्व: । नानाश्रयभावसंपन्न इत्यनेन सर्वभावयुक्तत्वादितिव्रत्तवैचि- ञ्यमाह । आता 'प्रख्यातवस्तुविषय:' इत्यादीत डिमाचे वर्णन करतात. नाटकाप्रमाणेच इतर सर्वे, केवळ संधि आणि रस हे सर्वेच्या सवे नसतात. शुंगार आणि हास्य खेरीज करून सहा रसांच्या योंजनेचा निर्देश असल्याने कदाचित्‌ पर्यायाने शान्त रसाचा प्रयोग होईल म्हणून ' दीप्तरस! असे म्हटले आहे. काव्ययोनि म्हणजे काव्याचे कथानक, यात देव आदी मोठ्या संख्येने असतात. सात्त्वत्यारभटी यात ' जातिरप्राणिनाम्‌' या सुत्रातील नियम ळावळा आहे असे काहींचे मत आहे. सात्त्ती आणि आरभटी वृत्तींनी संपनन अशा दोन वृत्ती ज्यात आहेत असा. अथवा वृत्ति शब्द वृत्तींच्या समूहाचा वाचक तमजावा. सात्वती आणि आरभटी यांच्या लक्षणाचा निरास करून संपन्न झालेला. डिम, डिम्ब आणि विद्रव हे तिन्ही शब्द (दंगळ ह्या) एका'च अर्थाचे आहेत. त्याच्या संयोगामुळे रूपकाचे नाव डिम. इतरांच्या मते 'डयन्ते' म्हणजे उड्या मारतात ते 'डी' म्हणजे उद्धत पुरुष; त्यांचे मान म्हणजे अस्तित्व ज्यात आहे तो डिम. इको हस्वो$ड्यो गालवस्य' ह्या सूत्राप्रमाणे हुस्व झाळे आहे. 'नाना- श्रयभावसंपन्न:' याने सवे भावांनी युक्त असल्यामुळे कथानका'चे वैचित्र्य निदशित करतात. _ “चासमग्रता? यानंतर मुळात आणखी एक “च? आहे. त्याचे काहीच प्रयोजन नसल्यामुळे तो गाळला आहे. डिमात संधि समग्र नसतात, कारण पुढे १९.४२ मध्ये म्हटल्याप्रमाणे त्यात अवमर्शसंधीचा अभाव असतो. - 'शान्तस्य प्रयोगः स्यात्‌ सहाव्या रसाध्यायावरील टीकेच्या रोवटी अमिनवयुत्ताने शान्तरसाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी डिमाच्या येथील वर्णनाचा उपयोग केला आहे. प्रस्तुत ठिकाणी षड्सात शान्तरसाच्या अन्तर्भावाची संभावना निर्दिष्ट केली आहे. - दीप्तरस? म्हणजे रौद्र आणि बीर. - 'देवादयः' म्हणजे ७९व्या आर्येतील देव, भुजगेन्द्र, राक्षत इत्यादी. - “जातिरप्राणिनाम' हे पाणिनीचे सत्र (२.४.६) आहे. त्या सत्राप्रमाणे जाति- वाचक शब्दांचा इन्रसमास नपुंसकलिंगी एकबचनात होतो, जसे ट्रमऔौळम्‌. येथे अश्या मताचा निदेंश दिसतो की 'सात्त्वत्यारमटी' हा अशा तऱ्हेचा इन्द्र आहे... हुस्व “टि ची उपपत्ती लावण्याचा येथे अद्या मताचा हा प्रयत्न असावा. पण सात्त्वती व आरभटी हे जातिवाचक शब्द नाहीत. -- 'तात्त्वत्यारमटीवृत्तितंपन्नं वृत्तिद्र्य' याचा असा अर्थ होतो की ह्या दोन वृत्तींनी संपन्न १०८ | नाट्यशास्त्र झालेल्या इतर दोन वृत्ती; म्हणजे डिमात भारती व केंशिकी या वृत्तींनाही अवकाद आहे . असा निष्कर्ष निघतो. पण तो संभाव्य वाटत नाही. 'सात्त्वत्यारभटीवृत्तिद्रयसंपन्न' असे वचन अपेक्षित आहे. -- ल्क्षणव्यावृत्त्या संपन्न” या दुसऱ्या व्याख्येत तर सात्त्वती व आरभटी यांच्या लक्षणाची डिमात व्यावृत्ति म्हणजे अनुपस्थितीच निर्दिष्ट केलेली दिसते. येथे टीकेत काही गोंधळ झालेला नसेळ तर ही व्याख्या आर्येतीळ वचनाचा विपर्यास करणारी ठरेल, टीकेतील गाब्दांतून त्या वचनाचा पोषक असा अर्थ निघू शकेल्से बाटत नाही. - "तेषां मानं मुद्रित पाठ 'तेघामात्मनाम? आहे, तो अर्थहीन आहे. डिमतील म? हा मा ह्या घातूपासून आला आहे असे म्हणावयाचे आहे. - 'इको हस्वो इ० हे पाणिनींचे सूत्र (६.३.६१) आहे. तदनुसार समासातीळ पहिले पद ईंकारान्त असता ई बिकल्पानें हृस्व होतो, फक्त तो ई प्रत्ययस्बरूप नसावा. 'डी' ह्या प्रथम पदातील ईं प्रत्ययरूप नाही, म्हणून डी -- म पासून डीम असे रूप अपेक्षित असता डिम झाले. असे हे स्पष्टीकरण आहे. नाटकादनन्तर॑ डिमलक्षणं यद्यप्युचितं तथापि तटूतप्रवेशकादिसंभवनिरा- करणार्थ तत्प्रकरणादपकृष्यास्याभिघानम्‌ । तेन दिनचतुष्टयद्वत्तमेवात्र प्रयोज्यम्‌ । अक्कावतार एव चात्र भवति । चूलिकाड्मुखयोस्त्वत्रापे युद्धा- दिवर्णने समुपयोगोस्त्येव । ततश्चव वस्तुतः प्रंवेशकाद्यनिषिद्धमेव । प्रवेशकस्य ह्मसंभव एव रसस्येतिवृत्तवशाद्वा अद्ठेष्वन्योन्यासंबन्धात, यथा समवकारे बह्ठे$पि । तस्मात्परकरणादपकर्षो$स्य तस्यावसराभावात्‌ । तत्र हि नाटका- नन्तरमस्याभिधाने प्रकरणस्य तत्स्पधित्वमुक्त॑ भवेत । तदनन्तराभिधाने नाटिकार्दिभेदः$ कथं ख्याप्यः । नाटिकायां च स्त्रीप्रधानत्वात्‌ शुज्कारसमवकारा- भिघानमेव ततः परं न्याय्यम्‌ । तत्मसद्ठेन च दिव्यपुरुषसंबन्धादीहामूग उक्तः । तदनन्तर॑ च दिव्यपुरुषाधिकारेण न रूपकाणीति पूर्वमनेकरसयुक्तत्वेन विततेतिवरत्तत्वादयमभिधातु युक्तमित्यळ॑ बहुना । नाटकाच्या नंतर डिमाचे लक्षण देणे जरी उचित होते तरी त्यातील प्रवेशक आदींच्या संभवाचे निराकरण करण्यासाठी प्रकरणापासून दूर ठेवून त्याचा निर्देश केला आहे. म्हणून यात चार दिवसांच्या घडामोडींचीच योजना करावयाची असते. आणि यात अड्भावताराचाच उपयोग होतो. परंतु युद्ध आदीच्या वनात चूलिका व अड्डूमुख यांचा सुद्धा यात उपयोग होतोच. आणि म्हणून खरोखर पहाता प्रवेशक आदींचा निषेध असा केलेळाच नाही. कारण प्रवेशकाचा यात संभवच नसतो, रसामुळे किंवा कथानकाच्या अनुरोधाने यातील अंकांमध्ये परस्पराशी संबंध नसतो म्हणून, ज्याप्रमाणे समवकारात पुष्कळ अंक असले तरी त्यांचा परस्पराशी संबंध नसतो त्याप्रमाणे, म्हणून प्रकरणापासून याला दूर ठेवले आहे, कारण यात त्या प्रवेशकाळा अवकाशच नाही, असे असता नाटका- नंतर जर याचे वणेन केळे असते तर प्रकरणा'ची याच्याशी स्पर्धा असलेली निर्दिष्ट झाली १८.७५-८० १०९ असती. प्रकरणानंतर याचे वणन केले असते तर नाटिका आदींचा भेद कसा सांगता आला असता ? आणि नाटिकेत स्त्रियांचे प्राधान्य असल्यामुळे त्यानंतर शुंगाराचा समावेश असलेल्या समवकाराचेच वर्णन न्यायाला धरून झाळे. आणि व्या प्रसंगाने दिव्य पुरुषांचा संबंध असल्याकारणाने ईहामृगाचे वर्णन केळे आहे. आणि त्यानंतर दिव्य पुरुष प्रधान असलेली ख्पके नाहीत, म्हणून अनेक रसांनी युक्त असल्यामुळे व विस्तृत असे कथानक असल्यामुळे प्रथम या डिमाचे वणन करणे उचित होय. तेव्हा आता हा विस्तार पुरे. या परिच्छेदात डिमाचा क्रम अगोदर अपेक्षित असता इतक्या उशिरा का लावला आहे याचे बिवेचन केळे आहे. - 'नाटकादनन्तरं' कारण यात बहुतेक गोष्टी नाटकातल्याप्रमाणेच असतात असे वर म्हटळे आहे. - “तत? याने डिमलक्षणाचा निर्देश होतो असे समजणे शक्य आहे. तथापि पुढे 'अस्य' असल्यामुळे ह्या शब्दाची आव्यकता नाही. - “अपकृष्य? म्हणजे दुसऱ्या काही गोष्टींचे मध्यंतरी विवेचन केल्यावर. - 'प्रवेशकस्य ह्यसंभव एव? येथे युक्तिवाद असा केला आहे की जे संभाव्य असेल त्याचाच निषेध करणे उचित होय; जे संमाव्यच नसेल त्याचा निषेध करण्याचे प्रयोजन नाही. डिमात प्रवेशकाचा संभवच नाही, म्हणून त्याचा प्रत्यक्ष निषेध केला नाही. - 'रसस्येतिवत्तवशाद्रार हा हस्तलिखितातील पाठ आहे. मुद्रितात “सरसेतिवृत्तवशाद्वाः/ असे आहि. दोन्ही पाठ समाधानकारक नाहीत. 'बा? मुळे दोन गोष्टींचा निदेश अपेक्षित आहे. रस आणि इतिवृत्त ह्या त्या दोन गोष्टी. त्यामुळे “सरस? असे इतिवृत्ता'चे विशेषण करणे बरोबर दिसत नाही. तसेच “रसस्य' ह्या पाठात रसाचा स्वतंत्र निर्देश असला तरी त्यातील षष्ठीचा अन्वय नीट लागत नाही. कदाचित त्यानंतर “वशातू” अध्याहूत धरता येईल. - “अजु च्या पूर्वी मुळात “यथा” आहि. पण नंतर आलिल्या “यथा? शब्दाची येथे चुकीने पुनरावृत्ती झालीसे दिसते. - 'प्रकरणापदकर्षो' ही मुळातील 'प्रकरणोत्कर्षा' ची दुरूस्ती आहे. 'प्रकरणादुत्कर्षः? असा पाठ संभवनीय आहे. पण पर्च्छिदाच्या प्रारंमी 'प्रकरणादपकृष्य' हे शब्द असल्यामुळे सुचविलेली दुरुस्ती अधिक संमाव्य वाटते. - 'तस्याबसराभाबात? मुळात “अवसरभावातर आहे. पण 'तस्य* ने प्रवेशका'चाच निर्देरा अभिप्रेत असण्याचा संभव अस- ल्यामुळे अवसराच्या अभावाचाच उललेख उचित होईल. - “नाटकानन्तरं' मुळातील “नाटकान्तरं? हा पाठ बरोबर नाही. -'तत्स्प्धित्वमः मुळात ह्या शब्दाच्या पूर्वी 'न' अधिक आहे. पण तो चुक्रीनें आठेला दिसतो. नाटकानंतर डिमाचे विवरण करावयाचे ठरविले असते तर प्रकर- णाला अन्याय होऊन त्या दोहोत स्पर्धा उत्पन्न झाली असती असे येथे म्हणावयाचे आहे- -- “शुद्धारसमवकारा-' मुद्रित पाठ 'त्रिश्युज्ार” आहे. त्याने समासाचा विग्रह सुल्भ होतो. तथापि हस्तलिखितातील समासही विग्रह्मास कठीण नाही. -- 'दिव्यपुरुषाधिकारेण न' यातील “न मुळात नाही. पण तो आवद्यक वाटतो. इतर रूपकप्रकारांत दिव्य पुरुषांचा अधिकार असतो म्हणजे त्यांना प्राधान्य असते अश्या अर्थाच्या विधानाची शक्‍यता नाही. डिमलक्षणसित्युक्त मया समासेन लक्षणानुगतम्‌ । व्यायोगस्य तु लक्षणमतःपरं संप्रवक्ष्यामि ॥८१॥। ११० नाट्यशास्त्र व्यायोगस्तु विधिज्ञेः कार्य प्रख्यातनायकशरीरः । अल्पस्त्रीजनयुक्तस्त्वेकाहकृतस्तथा चेव ॥ ८२॥। बहूवश्व तत्र पुरुषा व्यायच्छन्ते यथा समवकारे । न च ततमाणयुक्तः कार्यस्त्वेकाडू' एवायम्‌ ।। ८३ ॥ न च ढिव्यनायककूतः कार्या राजपिनायकनिबड्धः । युद्धनियुद्वाधषणसंघषेकृतश्व कतव्यः ॥ ८४॥ ए्वंविधस्तु कार्यो व्यायोगो दीप्तकाव्यरसयोनिः । वक्ष्याम्यतःपरमह॑ लक्षणमुत्सृष्टिकाडूस्य ॥ ८५ ।। याप्रमाणे मी डिमाचे वर्णन लक्षणांनी युक्त असे केळे आहे. आता यानंतर मी व्यायोगाचे लक्षण सांगतो. (नाटयाचे) नियम जाणणाऱ्यांनी' प्रसिद्ध नायक व कथानक असलेला, थोड्याच स्त्रिया असळेळा, तसेच एका दिवसातीळ वृत्तान्त असलेला, अशा प्रकारे ब्यायोगाची रचना करावी. समवकाराप्रमाणेच त्यात पुष्कळ पुरुषांचे चेष्टित असते; परंतु त्याचा विस्तार समवकाराइतका नसतो. फक्त एकच अंक असलेला असा हा व्यायोग करावा. त्यात दिव्य नायक नसावेत, तर राजरबी नायक असलेला असा व्यायोग करावा आणि युद्ध, इन्हयुद्ध, आह्ान, संघर्ष यांनी युक्त असलेला असा करावा. अशा प्रकारे आवेश्युक्त रसांचे काव्य असलेल्या व्यायोगाची रचना करावी. आता यानंतर मी उत्पृष्टि- काड्माचे लक्षण सांगतो. व्यायोगस्तु डिमस्येव शोषभूतो दिव्यनायकाभावात्‌, केवलमत्रोदात्तसय राजादेः न नायकता आपि त्वमात्यसेनापतिप्रभ्रतेदीप्रसस्य । अत एवाह प्रख्यातनायकेति । उदात्तग्रहणमपाकतंव्यमित्यथः । यथा समवकार इति द्वादरोत्यथः । तावदडुपॉरिमाणशडुडमतिदेशात्‌ प्रत्यासत्त्या प्रसक्तां वारयितुमाह ' एकाडू' एवेति । एवकारेणेकाहचरितविषयत्वाज्न्यायभाप्तमेवाचेकाडुत्वामित्याह । ननु प्रख्यातनायकशाब्देन किमत्र गृहीतमित्यतिप्रसड शामयति न चेति । चो भिन्नक्रमः । दिव्येंदेवेः नपेः क्रषिभिश्व नायकेने निबद्धो5्यं भवतीत्यथ ननु कस्मादयं व्यायोंग इत्याह युद्धनियुद्धेति । व्यायामे युद्धप्राये नियुज्यन्ते पुरुषा यत्रेति व्यायोग इत्यथः । नियुद्धं बाहयुद्धम्‌ । संघर्षः शोर्यविद्याकुल- १ नि कविमिः कार्या यथा. २ का -संघर्षंश्वापि. १८.८१-८५ ११२१ रूपादिकृता स्पर्धा । दीप्तं काव्यमाजागुणयुक्तम, दीप्तरसा वीररोद्राद्याः तदुभयं योनिः कारणमस्य । व्यायोग तर दिव्यनायकांचा अभाव असल्यामुळे डिमाच्याच अवदेबासारखा आहे, केवळ यात राजाप्रभ्रती उदात्त पात्रे नायक नसतात, तर दीप्त रस असलेळे अमात्य सेनापती वगैरे नायक असतात. म्हणूनच 'प्रख्यातनायक' असे म्हटले आहे. 'उदात्त शब्दाचा समावेश करावयाचा नाही असा याचा अर्थ. “समवकाराप्रमाणे' म्हणजे बारा असा अर्थ. ह्या अतिदेशामुळे जवळच असलेली तितकीच अंकांची संख्या सुद्धा प्राप्त होईल अशी शंका दूर करण्याकरिता “एकाडुः एव' असे म्हणतात. 'एव' शाब्दाच्या उपयोगाने एका दिवसाचे वृत्तच व्यायोगाचा विषय असल्यामुळे एक अंक असणे न्यायानेंच प्राप्त होते असे दाखवितात. 'प्रख्यातनायक' ह्या शब्दाने काय समजावयाचे याचे उत्तर म्हणून 'न च! इत्यादी राब्दांत अतिप्रसंगाचे निराकरण करतात. 'च' ने मिन्न कम दाखविला आहे. ढिव्य म्हणजे देव, तसेच राजे आणि क्रषी अशा नायकांनी न रचलेला असा अर्थ. याला व्यायोग का म्हणतात ते 'युद्धनियुद्ध* इत्यादी शब्दांत सांगतात. युद्धप्राय अशा व्यायामात पुरुषांची ज्यात योजना केळी जाते तो व्यायोग असा अर्थ. नियुद्ध म्हणजे बाहुयुद्ध. संघष म्हणजे शौय, विद्या, कुळ, खूप इत्यादिसंबंधात स्पर्धा. दीप्त काब्य म्हणजे ओजस गुणाने युक्त काव्य, दीप्त रस म्हणजे वीर, रौद्र आदी; ते दोन्ही योनि म्हणजे कारण आहेत ज्याचे असा. 'राजादेन॑ नायकता?' यातील “न? मुळात नाही. पण तो आवद्यक आहे. कारण व्यायो- गात राजा नायक नाही असे अमिनवगुप्ताने पुढे स्पष्ट म्हटले आहे. शिवाय येथे 'न' असल्या- शिवाय पुढील “आपि तु? ची संगती लागत नाही. - 'उदात्तम्रहणम्‌ इ०?' नाटकाच्या वर्णनात 'प्रर्यातोदात्तनायक:” असे बचन आहें. त्यातील 'उदात्त' शब्द प्रस्तुत संबंधात वगळून फक्त 'प्र्यातनायक-' असे म्हटले आहे. त्यावरून राजा वगैरे उदात्त नायक यात अभिप्रेत नाहीत, फक्त प्रख्यात अभिप्रेत आहेत असा निष्कर्षे निघतो. - 'तावदडू- म्हणजे तीन अंक. - “अतिप्रसड्धम? म्हणजे अभिप्रेत असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक व्यापक समावेश्याचा प्रसंग. - ८४ व्या आरयेंतील पूर्वार्धाचा अर्थ लावताना अमिनवरुप्ताने 'न' चा संबंध 'राजर्षिनायकंनिबद्धः? शी सुद्धा जोडला आहे. पण तो नास्यशास्त्रकाराला अभिप्रेत असेल्से निश्चितपणे म्हणता येणार नाही. कार्य? वरून असेच वाटते की राजर्षि नायक असावेत असा त्याचा आ- दाय आहे. आणि टीकेत निर्दिष्ट झाले आद्दे त्याप्रमाणे राजे व कषी असे दोन मिन्न प्रकारचे नायक समजण्याचे काहीच कारण दितत नाही. - “न निबद्धो' हस्तलिखितातील “न निषिडो? चुकीने आठेळे दिसते. - 'नियुज्यन्ते' मुद्रित पाठ *नियुव्यन्तेः असा आहे. तो संभव- नीय नाही, 'व्यायोग? ह्या शब्दाची व्युत्पत्ती व्या4 युज पासून साधली असून “व्या? चे मूळ 'व्यायाम' मध्ये शोधले आहे आणि 'योग' चा अर्थ विदाद करण्यासाटी *नियुज्यन्ते यत्र हे शब्द वापरळे आहेत. तेथे “नियुध्यन्तेः वापरळे असण्याची शक्‍यता नाही. - 'दीप्तरसा? ११२ नाट्यशास्त्र सुळात 'दीप्तरसाद्या' असे आहे. पण त्यातील “आद्य? निर्थक आहे. पुढील शब्दातून तो येथे चुकीनें पुनरुक्त झाला आहे. येथील पहिली ८१ वी आर्या नास्यशास्त्राच्या काही हस्तलिखितांत आढळत नाही. म्हणून बडोदे प्रतीत ती कंसात घातली आहे. ती प्रक्षिप्त असण्याचा बराच ठंभवब आहे; तर्थापे हे लक्षात ठेवळे पाहिजे की अश्या तऱ्हेने एका विषयाचा समारोप व दुसऱ्याचा उपन्यास करावयाचा ही नाट्यशास्त्रकाराची पद्धती प्रायः सर्वत्र निदर्शनास येते. 60 _ प्रख्यातवस्तुविषयस्त्वप्रख्यातः कदाचिदेव स्यात्‌ । दिव्यपुरुषबियुक्तः शेषेयुक्तो भवेत्पुंभिः ॥ ८६॥ करुणरसप्रायकृतो निवृत्तयुद्धोद्धतप्रहारश्व । खीपरिदेवितबहुलो निर्वेदितभाषितश्वैव | ८७॥ नानाव्याकुलचेष्टः साच्वत्यारभटिकेशिकीहीनः । कार्यः काव्यविधिज्ञैः सततं द्युत्सृष्टिकाडःस्तु ॥ ८८ ॥ उत्सृष्टिकाडड प्रसिद्ध असे कथानक असलेळा अथवा क्वचित प्रसिद् नसलेले सुद्धा कथानक असलेला असावा; तो दिव्यपुरुषविरहिंत व इतर प्रकारच्या पुरुषांनी युक्त असावा. काव्याचे नियम जाणणारांनी उत्सृष्टिकाडू नेहमी बहुतांशी करुण रसाने युक्त, युद्ध, उद्धृत प्रह्मार यांनी विरहित, स्रियांच्या विळापांनी भरलेळा व निर्वेदपूर्ण क्‍चनांनी युक्त, विविध प्रकारच्या न्याकुल चेष्टांनी युक्त आणि सात्त्ती, आरभटी व कैशिकी ह्या वृत्तींनी विरहित असा करावा. आ रोद्राद्यनन्तरं 'रौद्रस्य चैव यत्कर्म स ज्ञेयः करुण? इत्युक्तत्वात्तत्प्रधानमु- त्सा्टकाडूमेतदनन्तरमाह प्रख्यातवस्तुविषय इति । प्रख्यांते भारतादियुद्धे विषये निमित्ते सति यत्करुणबहलं चेशिं वर्ण्यते तत्ख्यातं स्त्रीपर्वव्रत्तान्तवत्‌ मा भूदित्यप्ररूयातग्रहणेनोक्तम॒। तेनोभयोपादानस्य परस्परविरुद्धार्थत्वाद- किंचित्करत्व नाशद्षर्नायम । निवृत्तयुद्धा उद्धतप्रहाराः पुरुषा यस्मिन । परिदेवितं देवोपालम्भात्मानन्दारूपमनुशोचन यत्र । निर्वेदितानि येष॒ निवेंदो जायते तादुंशि भाषितानि यत्र । व्याकुळा चेष्टा भूमिनिपातविवातेताद्याः । सात्त्वत्यारभा्ट्किणिकीहीन इति समाहारडन्ददगर्भडन्दान्तरगर्भस्तृतीयासमासः । उत्क्रमणीया सृष्टिजींवितं प्राणा यासां ता उत्सृष्टिकाः शोचन्त्यः स्त्रियः तामि- १ का -परिदेवन- २ का कतंव्योःभ्युदयान्तस्तज्जञेरत्स- १८.८६-८८ १९२३ रक्षित इते तथोक्तः । व्रत्तिमिसत्सृष्टत्वादित्यन्ये, तदा हित्व चाद्य....म! उद्देशे त्वेकदेशेनायमडूः इति निदिंष्टो बृत्तानुरोधात्‌ । इह च करुणरसबाहुल्या- दवेवेवियोगः । रोंद्रबीभत्सभयानकसंबधने दिव्ययोगे भवत्यपि, न तु करुणयोारः । “आणि रौद्राचे जे कम तो करुण रस असे समजावे' असे मागे म्हटले असल्यामुळे रौद्रादीच्या नंतर करुणरसप्रधान उत्सृष्टिकाड्काचे ह्या व्यायोगानंतर '्रख्यातवस्तुविषय:' इत्यादी शब्दांत वणन करतात. प्रख्यात असे भारतादी युद्ध विषय म्हणजे निमित्त झाले असता जे करुणरसपूर्ण चेष्टित वार्गिले जाते ते स्त्रीपर्वातील वृत्तान्तासारखे ख्यात होऊ नये हे अप्रख्यात' शब्दाच्या उपयोगाने दाखविले आहे. म्हणून दोन्ही शब्दांचा उपयोग ते परस्परविरुद्ध अर्थाचे असल्यामुळे निरुपयोगी आहे अशी शांका घेण्याचे कारण नाही. युद्धापासून निवृत्त झाळेले, उद्धत प्रहार करणारे पुरुष ज्यात आहे असा. परिंदेवित म्हणजें दैवाळा दोष, स्वतःची निन्दा या स्वरूपाचा विलाप. निर्वेदित म्हणजे ज्यांमध्ये निर्वेद उत्पन्न होतो अश्या तऱ्हेची वचने ज्यात आहेत असा. व्याकुळ चेष्टा म्हणजे जमिनीवर पडणे, ळोळणे इत्यादी. 'सात्त्वत्यारभटिकैरिकीहीनः' यात प्रथम समाहारददन्द्द असून त्याच्यासह दुसरा दन्द आहे व शेबटी तृतीयातत्पुरुष समास आहे. सृष्टि म्हणजे जीवित अर्थात प्राण ते उत्क्रमणीय म्हणजे बाहेर जाण्याच्या बेतात आहेत ज्यांच्या त्या उत्सृष्टिका म्हणजे शोक करणाऱ्या स्त्रिया, त्यांनी चिह्ित झालेला म्हणून उत्सृष्टिकाडू, हे नाव प्राप्त झालेला, दुसऱ्यांच्या मते वृत्तींनी उत्सृष्ट म्हणजे टाकलेला म्हणून हे नाव पडले आहे. तेव्हा ह्वित्व .... पण उद्देशात एका भागावरून वृत्ताच्या सोयीसाठी याचा अक्कः' असा निर्देश केळा आहे. आणि यात करुणरसाचे बाहुल्य असल्यामुळे देवांचा समावेश नाही. रौद्र, बीभत्स व भयानक ह्या रसांचा संबन्थ देव समाविष्ट असतानाही होतो, परंतु करुणरसाचा नाही. 'तेद्रस्य चैव इ०' हा सहाव्या रसाव्यायातीळ (६.४०) करुणरसाच्या उत्पत्तीसंबंधीचा नि. देंश आहे. रोद्र रसाच्या आविर्भावानंतर त्यातील बध वगेरेमुळे करुणरसाळा अवकाश प्राप्त होतो. - यत्करुणबहुलं' हस्तलिखितात “यतू'च्या जागी 'तत्‌' आहे आणि मुद्रितात 'यत्ततू,, - मा भूत? येथे काही तरी अंद गहाळ झाला असावा असे वाटते. आहेत या राब्दांतून असा अर्थ निष्पन्न होऊ शकतो की स्त्रीपर्वातील वृत्तान्त जसा ख्यात म्हणजे प्रसिद्ध आहे तशी प्रसिद्धी उत्सृष्टि- काडूतील करुण चेष्टिताळा नसावी. पण मूळ आर्येत तशी प्रसिद्धी नसली तरी चाळेल असा अर्थ अभिप्रेत आहे. आणि तिच्यात परस्परविरोध आहे अशी शंका उत्पन्न होण्यासारखी नाही. -7 येघु निर्वेदो जायते' मुद्रित पाठ 'येषु श्रतेषु निवेंदो जायते! असा आहे. पण तो बरोबर वाटत नाही. 'निर्वेदित' शब्द व्याकरणाच्या “तद्स्य संजातं इ०' नियमानुसार “इतःचर प्रत्यय लागून ब- नला आहे असे येथे दाखबिळे आहे. आणि निर्वेद होतो तो शोक करणारालाच, विलाप ऐक- णाराला नाही. - 'तात्त्वत्यारमटिं इ०' ह्या समासाचा विग्रह पुढीलप्रमाणे केला आहे --सात्त्व- त्यारमटि' हा समाहारदन्द. म्हणून नपुंसकलिंगी एकवचन 'जातिरपाणिनामर ह्या सूत्राप्रमाणे. हुस्व ११४ नाट्यशास्त्र :_टि? ची उपपत्ती लावण्यासाठी हा खटाटोप. पुढे हा शब्द व केशिकी मिळून दुसरा इन्द्र होतो आणि शोेबटी 'हीन? लागताना तृतीयातत्पुर्ष समास होतो. - 'तदा द्वित्वे चाद्य...म' अता खं- डित पाठ हस्तलिखितात आहे. त्याने काही अर्थबोध होत नाही. मुद्रित पाठ 'द्वित्वं च त्रित्व- म आहे. तोही अर्थबोधास उपयुक्त ठरत नाही. - 'उद्देशे त्वेकदेशेन' ही दुरुस्ती आहे. उद्देदा म्हणजे वर दुसऱ्या व तिसऱ्या आरयेत केळेळा दहा रूपकांचा नामनिर्देश. त्या ठिकाणी उत्सुष्टि- काडूः शब्द न वापरता केवळ “अडू” असा त्याचा उल्ठेख केला आहे. तो त्या संपूर्ण नावाच्या एका अंद्याच्या अनुरोधाने केला आहे असे येथे म्हणावयाचे आहे. तेव्हा 'उद्देशे तु एकदेशेन? असा पाठ आवदयक आहे. हस्तलिखितात त्याचे 'उद्देशतेकदेशेन' असे भ्रष्ट रूप झाले, मुद्रित री पाठ 'उद्देरास्येकदेशोन” अर्थहीन आहे. - “देवे: मुळात 'देवदेवेः आहे. त्यात देव शब्दाची चुकीने पुनरावृत्ती झाली आहे. यदिव्यनायककृतं काव्यं संग्रामबन्धवधयुक्तम्‌ । तज्ठारते तु वर्ष करतेव्यं काव्यबन्धेषु ।॥ ८९ ॥ कस्माद्वारतमिष्टं वर्षेष्वन्येषु देवंविहितेषु । हृद्या सर्वा भूमिः शुभगन्धा काश्वनी यस्मात्‌ ॥ ९०॥ उपवनगमनक्रोडाविहारनारीरतिप्रमोदाः स्युः । तेषु हि वर्षे सदा न तत्र दुःखं न घा शोकः ॥९१॥ २. च - क्‌ ये तेषामधिवासाः पुराणवादेपु पवताः प्रोक्ताः । संभोगस्तेषु भवेत्कमारम्भो भवेदस्मिन्‌ ॥९२॥ परंतु, ज्या काव्याचे नायक दिव्य असून ज्यात युद्ध, बंधन व बघ ह्या गोष्टी अस- तात त्याची रचना करताना ते भारतवर्षात धडते असे ढाखवावे. भारतवषेच यासाठी का इष्ट मानायचे ! कारण, देवांसाठी म्हणून ठरवून दिलेल्या दुसर्‍या वर्षांमध्ये सवे भूमी मनात्ठा आहद देणारी, शुभ गंध असलेली आणि सुवणमय अशी आहे; त्या वर्षांमध्ये उद्यानात जाणे, क्रीडा, विहार, क्लीबरोबर रती व आनंद या गोष्टी नेहमी असून तेथे दुःख किंबा शोक यांचे अस्तित्व नसते. पुराणांतील वणेनांत त्या देवांचे बास असणारे म्हणून जे परवेत सांगितले आहेत त्यांवर त्यांचा उगभोग चाळू असतो, ह्या भारतवर्षात त्यांच्या कर्माचचा आरंभ असावा. १ का तस्मात. २ का नित्यकालं हि. का ३ पवेता गदिता:. १८.८९-९२ १ १ज नन्वेवं देवानां युद्धाथप्यनुचितमित्याराडुःय प्रसज्ात्समवकारादी देशविरोषो- पयोगं दर्दयाति दिव्यनायककूतामेति । तेषां भारतवषांवतीणांनां यद्धादिकं प्रदर्शायदित्यर्थः । अन्न त्वज्ञः पच्छाते कस्माद्वारतमिष्टमिति । अन्न प्रयोगे प्रतिवाक्ति वर्षेष्वन्योष्वाति । देशत्वेन भोगभूमित्वेन विहितेष्वपीत्यथः । उपवनं गत्वा क्रीडा जलक्रीडादिकाः । विहरणमुपवन एव संचरणम्‌ । नार्या सह रतिः संभोगः । प्रमोदो दिव्यपानादिकूतम्‌ । नन्वेद्मिलाव्रतकुरुप्रश्षूतिषु वर्षष॒ मा तेषां देवानां वृत्त व्याख्यायि, तथापि स्वनिवासेषु व्यावर्ण्यतासित्यत आह ये तेषामपि वासा ईत । वसन्ति तेष्विते वासाः । पर्वता इति केळासादयः । संभोग इति सा हि तेषां भूसि: भोगस्थानम्‌ । अस्मित्निति भारतवर्ष कमारस्भः । आरस्भग्रहणेनेदमाह न तेषां दुःखं पूर्ण कदाचिद्धंवति । दुःखपूर्णतायां देवत्वस्येव विधातान्नवस्थानप्राप्त्या स्वरूपळोप इति युक्तमुक्तम्‌ । करुणरसबाहुल्यादुत्सृष्टिकाडः दिव्येविंयोग एव तेषां सुखबाहल्यात्‌, तत्सनेधाने अन्यस्यापि शोकावसरपराकृतेरिति । गाढदुःखाभि- भूता एवंभूतप्रयोगदशने सति 'दुःखी दुःखाधिकान्‌ पश्येत्‌' इति नीत्या प्रतनूभूत- दुःखभाराः सुखेन विनेया भवान्ति, यथोक्तं प्राक्‌ स्थैय दुःखार्दितस्य च' इति । असे असेल तर देवांच्या संबंधात युद्ध वौरे गोष्टी सुद्धा अनुचित होत अशी शांका उपस्थित करून प्रसंगवशात समवकार आदी प्रकारांत विशिष्ट देशाचा करावयाचा उपयोग “दिव्यनायककृतम्‌! इत्यादी राब्दांत दाखवितात. भारतवर्षात ते अवतीणे झाले म्हणजे त्यांचे युद्ध गौरे दाखवावे असा याचा अर्थ. येथे अज्ञ मनुष्य विचारतो की कोणत्या कारणामुळे भारतवषेच इष्ट आहे? यासंबंधात प्रयोगाच्या दृष्टीने ' वर्षेष्वन्येषु' इत्यादी शब्दांत उत्तर देतात. देश म्हणून म्हणजे भोगभूमी म्हणून नियोजित झालेल्या वर्षांमध्ये सुद्दा असा अथ. उपवनात जाऊन क्रीडा म्हणजे जलक्रीडा व*ौरे. विहरण म्हणजे उपवनातःच फिरणे. स्रीबरोबर रति म्हणजे संभोग. प्रमोद दिव्य पान व*ैरेमुळे होणारा. येथे आक्षेप असा की इलावृत, कुरु इत्यादी वर्षांमध्ये देवांचे वृत्त याप्रमाणे वर्णन करू नये हे ठौक आहे, परंतु त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी त्याचे वर्णन करता येईल. त्याचे समाधान ये तेषामपि वासाः' या राब्दांत करतात. त्यांत राहातात म्हणून ते त्यांचे वास. पर्वत म्हणजे केळासप्रभ्रती, संभोग म्हणजे ही भूमी त्यांचे भोगस्थान होय. ह्या म्हणजे भारतवर्षात त्यांच्या कर्माचा प्रारंभ होतो. 'आरम्भ! शब्द वापरून असे दाखवितात की त्यांचे दुःख कधीही पूर्ण होत नाही. त्यांना पूर्णपणे दुःख झाल्यास देवपणाचाच नाश होऊन नवीन स्थिती प्राप्त झाल्याने त्यांच्या स्वरूपाचा लोप होईल म्हणून योग्य तेच सांगितले आहे. उत्पृष्टिकाड्मामध्ये करुणरसाचे प्राधान्य असल्याकारणाने देवांची अनुपस्थितीच असते, कारण त्यांच्यात सुखा'चे प्राबल्य असते, आणि ते उपस्थित असता इतरांच्याही शोक्ाला अवसर प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या प्रयोगाचे दर्रीन झाळे असता गाढ दुःखाने पीडित झालेले प्रेक्षक “दुःखी ११६ | नाट्यशास्त्र मनुष्याने आपल्याहून अधिक दुःखी मनुष्यांना बघावे' ह्या न्यायाने दुःखाचा भार हलका झाल्यामुळे सहजगत्या बोध घेण्यास योग्य होतात. 'दुःखाने त्रासलेल्याला स्थैर्य प्राप्त होते' असे पूर्वी सांगितलेलेच आहे. 'युद्धाद्यापे' ही मुळातील ।युद्धान्यापे' ची दुरुस्ती आहे. 'अनुचितम्‌ः शी 'थुद्धानि समानाधिकरण असणे शाक्य नाही. -'त्व्तः” असे मुळातील 'राझः” च्या जागी सुचविले आहे. राजाचा येथे काही संबंध नाही. आणि षष्टीचे रूपही संभवनीय बाटत नाही. ।पृच्छ- ति, ला “अज्ञ” सारखे कर्तुपद आवदयक आहे. 'प्राज्ञः? पेक्षा 'अश्ः” अधिक संभाव्य आहे. - 'प्रयोगे प्रतिवक्तिर यातील 'प्रयोगे' शब्द विशेष समर्पे वाटत नाही. - 'देशव्बेन इ० यावरून हे स्पष्ट आहे की अमिनवयुप्ताचा आर्येतील पाठ :देशविहितेष असा होता, 'देवविहितेषुः असा नाही. -- 'ये तेषामापे वासा? असाच अमिनवगुप्ताचा आर्ये- तील पाठ होता हे उघड आहे. त्याने “वास शब्दाचा अर्थ दिला आहे, 'अधिवास? शब्दाचा नाही. आणि त्याचाच पाठ अधिक ससुचित वाटतो. “अपि? शब्दाने मागीळ आययोत निर्दिष्ट झालेल्या पृथ्वीवरील वर्षाहून मिन्न अश्या स्थानाच्या निदेंशयाचे आवद्यक सूचन केले जाते. -अस्मिन्षितिः मुळात 'तस्मन्निति' आहे. ते बरोबर नाही. - 'विघातान्नवस्थानप्राप्त्याः असा हस्तलिखितात पाठ आहे. मद्रितात 'विधातानव- असे आहे. “विघातात? असे पंचमीचे रूप आवश्यक आहे. पण 'नवस्थान' हे समर्पक वाटत नाही. स्थिती या अर्थी “स्थान? राब्द वापरठेला असावा. मुद्रितातीळ 'अनवस्थान? संभाव्य नाही. - 'उत्सष्टिकाडे' हौ मुळातील 'उत्सृष्टिकाळः” ची दुरुस्ती आहे. सप्तमीचे एकवचनच अपेक्षित आहे, तृतीयेचे बहुबचन नाही. पुढील 'दिव्ये; मधील विभत्तीचा ह्या शब्दाबर परिणाम झालेला दिसितो. -'दु;खी दुःखाधिकान्‌ पश्येत्‌ः आपल्यापेक्षा अधिक दुःख असलेला मनुष्य पाहिल्यावर स्वतःचे दुःख सहन करणे शक्य होऊन त्याचा भार हलका होतो असा अनुभव आहे. -स्थेथे दुःखार्दि- तस्य' पहिल्या अध्यायाच्या शेवटी नाट्याची महती गाताना त्याच्या दर्शनाने होणाऱ्या विविध प्रकारच्या लाभाचा निदेश केला आहे, त्यात हा एक लाभ सांगितला आहे (१,१११), पहसनमापे वित्वयं द्रिविधं शुद्ध तथा च संकीर्णम्‌ । वक्ष्यामे तयोर्युक्त्या पूथक्‍्पृथग्लक्षणेविशेषम्‌ ॥ ९३॥ भगवत्तापसविमेरन्येरांपे हास्यवादसंबद्धम । कापुरुषसंप्रयुक्त॑ पारेहासाभाषणपायम्‌ ॥९४॥ अविकृतभाषाचारं विशेषभावोपपत्नचरितपदम । नियतगतिवस्तुविषयं शुद्ध ज्ञेय पृहसनं तु ॥९५॥ वेश्‍्याचेटनपुसकविटधूर्ता बन्थकी च यत्र स्युः । अनिश्तवेषपरिच्छदचोश्‍ितिकरणेस्तु संकीणम्‌ ॥ ९६॥ _ १ का तस्य व्याख्यास्येडहं. २ का -विदोषान्‌. ३ का नीचजन-. ४ का- करणात्तू. १८.९३-९६ ११७ प्रहसन सुद्धा शुद्ध व संकीण असे दोन प्रकारचे आहे असे समजावे. त्यांची निरनिराळी विशेष लक्षणे योग्य प्रकारे सांगतो. साधु, तपस्वी, ब्राह्मण तसेच इतर ही मनुष्यांच्या हास्यास्पद वादाशी संबद्ध, हीन पुरुषांनी योजलेले, मुख्यतः परि- हासरूप संवाद असलेले, भाषा व आचार विकृत नसळेळ, विदोष भावांनी संपन्न असे चरित असलेळे आणि ज्यातीळ कथानकाची गती ठरलेली असते ते प्रहसन शुद्ध होय असे समजावे. परंतु, ज्यात वेश्या, चेट, नपुंसक, बिट, धूर्त आणि छिनाल श्री असतात ते प्रहसन अविनीत वेष, रूप आणि चेष्टा यांच्यामुळे संकीर्ण होते. उत्सु्टिकाडूप्रयोग एवं रञ्ञनप्रधानेन करुणेन युक्त रूपकमभिधाय रजना- प्रधानं हास्यप्रायं प्रहसन लक्षयाते विभागमुखेन प्रहसनर्मापे विज्ञेयमिति । द्विविधमिते विभागः शुद्ध संकीणे चापीति । आअपिदाब्दो$तिक्रमः । तथेति सामान्यठक्षणम्‌ । तदयसथंः दिविधमपे तथा प्रहसनरूपं हास्यरसप्रधान- मित्यथः । लक्षणाविशेषं विशेषलक्षणम्‌ । भगवत्तापसविप्रा यतिवानप्रस्थगृहस्थाः । अन्ये शाक्‍यादयः, तैरुपठक्षितम्‌ । हास्यप्रधानवचनसंबद्धम्‌ । शीलनादिना कुत्सित: पुरुषेरत एव प्रहस्यमाने सामथ्यात्तिरेव भगवदादिमियुक्तम्‌ । तथापि च भाषा- चारौं यत्र न विकृतावसत्या-छीळरूपी । तथा विदोषेण भावेव्येभिचारिभिरुप- पन्नानि पदानि कथाखण्डानि यस्मिन्‌ । नियतगति एकप्रचारं यद्स्तु तद्विषयः प्रहसनीयठक्षणः यत्र तच्छुद्धं प्रहसनम्‌ । अत्र निर्वचनं यतः परिहासप्रधानान्या- भाषणान्यत्र बाहुल्येन भवन्ति तेन य॒त्रेकस्येव कस्यवित्वरितं दृष्टत्वात्पाधान्येन प्रहस्यंते तच्छुद्धमित्यथः । यत्र तु वेश्यादिभिर्योगो5त्युल्बणं चाकल्पादि तदेक- द्वारेणानेकवेडयादिचचरितेन हसनीयेन संकीणंत्वात्‌ संकीणंम्‌ । अन्ये त्वाहुः येषां स्वभावत एव चरितं शिष्टमध्ये सभ्येतरतमत्वेन प्रहसनाहे तदविशुद्धत्वात्संकीणम्‌, तद्योगाच्च रूपकम्‌ । ये तु स्वभावतो न गर्हिता भगवत्तापसादिचेष्टाविदेषास्तेषां प्राकृतपुरुषसंक्रान्तिदोरात्म्योदितावद्यसंबन्धदूष्यमाणतया प्रेहसनीयतां यातास्ते स्वभावशुद्धाः, तद्योगादूपकं शुद्धार्माति । याप्रमाणे उत्सृष्टिकाडडञाच्या प्रयोगाच्या संबंधात रञ्जनप्रधान अशा करुण रसाने युक्त असलेल्या ख्सकाचे वर्णन केल्यावर मुख्यतः हास्यरस :'असलेल्या रज्ननाप्रधान प्रहसनाचे लक्षण 'प्रहसनमपि विक्ञेयम' इत्यादी शब्दांत भेदांच्या निर्देशा'च्या द्वारे करतात. द्विविध म्हणजे झुद्ध आणि संकीण असे विभाग असलेले सुद्धा. '“अपि' शब्द क्रमबाह्य होय. तथा म्हणजे सामान्य लक्षण, म्हणून अर्थ असा - दोन्हीही प्रकार तसे प्रहसनाच्या रूपा'चे म्हणजे हास्यरसप्रधान असतात हा तातलर्यार्थे. लक्षणविशेष म्हणजे विशेष लक्षण. “ भगवत्तापसविप्रा:! म्हणजे अनुक्रमे संन्यासी, वानप्रस्थ आणि गृहस्थ. दुसरे म्हणजे बौद्ध ११८ | नाट्यशास्त्र इत्यादी, त्यांनी उपलक्षित झालेले असे. हास्यप्रधान अश्या वचनांशी संबद्ध असलेले. आचार विचार आदींत हीन असलेल्या व म्हणूनच हास्यास्पद असलेल्या पुरुषांनी - संदर्भा- च्या सामर्थ्यामुळे त्याच संन्यासी आदींनी युक्त असे. आणि तरीही ज्यात भाषा व आचार विकूत म्हणजे असत्य व अश्लील स्वख्याचे नाहीत असे. तसेच विशेषेकरून व्यभिचारि- भावांनी युक्त अश्ली पदे म्हणजे कथेचे अंश ज्यात आहेत असे नियतगति म्हणजे एका'च स्वरूपाचा प्रचार असलेले जे कथानक त्याचा हास्यकारक स्वरूपाचा विषय ज्यात असतो ते शुद्ध प्रहसन. ह्या बाबतीत व्युत्पत्ती अशी-ज्याअर्थी यात परिह्वासप्रधान वक्तव्ये प्राचुर्या असतात त्याअर्थी जेथे मुख्यलेकरून एकाच्याच कोणाच्या तरी चरिताळा ते दूषित असल्यामुळे लोक हसतात ते शुद्ध प्रहसन होय असा अर्थ. परंतु जेथे वेश्या आदींचा संबंध असतो व जे अति भडक व उच्छुह्ठळ वगैरे असते ते एका प्रसंगात अनेक वेश्या आदींची हास्यकर चरिते संमिश्रित झाल्यामुळे संकीर्ण प्रहसन. परंतु इतर टीकाकार म्हणतात की ज्यांचे चरित स्वभावतःच अतिराय असभ्य असल्यामुळे शिष्ट लोकांत हास्या- स्पद होते ते त्यांचे चरित अविशुद्ध म्हणून संकीर्ण, आणि त्याच्या संयोगाने रूपक संकॉौर्ण. परंतु स्वभावतः: निन््य नाहीत अशा ज्या संन्यासी, तापस आदींच्य़ा विशिष्ट चेष्टा त्यांच्या सामान्य मनुष्यात होणाऱ्या संक्रमणाच्या दृष्परवृत्तीने उत्पन्न झालेल्या निंद्य संबंधाच्या दूषणीयतेमुळे हास्यकारक होतात त्या चेष्टा स्वभावतः झुद्ध आणि त्यांच्या संयोगाने ख्पयक अझुद्ध उत्सप्टिकाडूःप्रयोगे' यातील “प्रयोग शब्दाची काही आवश्यकता दिसत नाही बडोदे प्रतीत प्रयोग?” असा पाठ स्वीकारला असून ह्या शब्दाचा समावेश अगोदरच्या वाक्याच्या अंती स्थैर्य दुःखार्दितस्य च इव्युत्पृष्टिकाडूप्रयोग:? याप्रमाणे केला आहे. तसा पाठ संमवनीय दिसत नाही. - 'रश्ञनप्रधानेन” जे रस पुरुषार्थाला साहाय्यक नाहीत ते रज्भनप्रधान अशी कल्पना आहे आणि तदनुसार पुढे करुण, हास्य ब भयानक यांना रज्ञकरस म्हटले आहे. - 'रज्ञना' आंणि “र्ज्ञन? यांत फरक नाही. - 'अपिशाब्दोडतिक्रमः ह्या वचनाचा अर्थ स्पष्ट नाही. पुढील विवरणा- बरून असे दिसते की “अपि? शब्दाचे आर्येत “प्रहसनम? नंतर जे स्थान आहे ते बदलून 'द्विवि _ धम! नंतर तो शाब्द समजावयाचा. “आर्येतील शब्दांचा क्रम ओलांडून, असा अतिक्रम? शब्दाचा अर्थ असावा तथा प्रहसनरूपम? तथा म्हणजे सामान्यटक्षण असे म्हटलें असल्या- मुळे आर्येतील “प्रहसनम? शब्दात लक्षण दिले असून त्याचा हास्यरसप्रधान असा अर्थ आहे | अश्शी अमिनबगरुप्तकृत व्याख्या आहे हे उघड आहे. आर्येत प्रहसनाचे लक्षण नसून त्याच्या दोन प्रकारांचेच सामान्य लक्षण दिळे आहे. असे त्याचे म्हणणे दिसिते संबद्धम” मुळात संबन्धः' असे रूप असून तो शब्द पुढील 'शीलनादिंनाः शी समासाने जोडला आहे. ते बरोबर नाही. - 'शीलन? म्हणजे मनन, बिचार, तसेच आचार, कृती इत्यादी. - 'पदानि कथाखण्डानि? आयेंतीळ 'चरित? शब्दाची व्याख्येत आवृत्ती अपेक्षित आहे. मूळ पाठ “चरितपदानि' असा! _ असावा. 'कथाखण्डानि? च्या जागी हस्तलिस्वितात 'कथाद्यन्ता' असा पाठ आहे. आदि आणि ०० िल्कलसल्ल ल्ल मक र्ट २9-९८ ११९ अन्त ह्यांचाच निर्देश समुचित ठरणार नाही. -- :दुष्ट्लात' म्हणजे दोषयुक्त असल्यामुळे. - अकल्प' म्हणजे नियंत्रण नसलेले, उच्छुंखळ, अभिनवगुप्ताच्या मते दोन प्रकारांतील फरक असा की शुद्ध प्रहसनात फक्त एकाचेच हास्यास्पद चरित प्रर्दारीत होते तर तंकीर्ण प्रहसनात अनेक हास्यकारक पात्रे असतात; शिवाय शुद्ध प्रकारात पात्राच्या दोषयुक्त चरिताने हास्य उत्पन होते, तर संकीर्णात पात्रांच्या अनिंबेध वागणुकीमुळे ते उत्पन होते. अर्थात झुद्धात भगवच्तापसविप्र अश्या तऱ्हेचे पात्र आणि संकीर्णात वेश्या, विट अशी पात्रे हा मुळातील भेद आहेच. - 'सभ्येतर' म्हणजे असभ्य, - 'तेषाम? म्हणजे त्या चेष्टाबिशोषांचा. - “-दोरात्म्योदितावद्यसंबन्ध-' यातील “- तावद्य-' च्या जागी मुद्रित पाठ '-तामन्य- असा आहे, पण तो बरोबर नाही. “अवद्य' म्हणजे गर्हणीय, निंद्य. या टीकाकारांना असे म्हणावयाचे आहे की संन्यासी प्रभ्रतींचे जे स्वाभाविक वेष्टित असते ते एखाद्या सामान्य मनुष्याच्या ठिकाणी संक्रांत झालेले दिसून आले तर ते उपहास करण्याच्या दुष्ट हेतूने केलेले असल्यामुळे पात्र आणि त्याचे चेष्टित यांत निंद्र असा संबंध प्रस्थापित होतो ब तो तंबेध दूषणीय असल्यामुळे त्याचे चेष्टित हास्यकारक होते. म्हणजे ह्या टीकाकारांच्या मते चेष्टित सूल्तः शुद्ध असेळ तर त्याचे विडंबन करणारे प्रहसन शुद्ध व चेष्टित जर मूलतःच असभ्य असेल तर त्याचे दर्शन घडविणारे प्रहसन संकीर्ण. - “याताः अुद्धा? ही 'चेष्टाविशेषाः? ची विदोषणे. बडोदे प्रतीत ९३ व्या आर्येचा पूर्वाध व उत्तराधे यांच्या मध्ये पुढील आर्या छापली आहे - अड््कस्य लक्षणमिदं व्याख्यातमशेषयोगमाञरगतम्‌ ॥ प्रहसनमतःपरमहं सलक्षणं संप्रवध्ष्यामि । काही थोड्याच हस्तलिस्वितांत उपलब्ध झाल्यामुळे प्रक्षिप्त म्हणून ती कंसात छापली आहि ते ठीक आहे. पण दुसऱ्या आर्यची त्यासाठी विभागणी का केलीं आहे ते तमजत नाही. लोकोपचारयुक्ता या वाता यश्न दम्भसंयोगः । स प्रहसने पयोज्यो धृतैमाविवादसंपन्नः ।। ९७ ॥ वीथ्यज्ठे। संयुक्त कर्तव्यं पइसनं यथायोगम्‌ । भाणस्यापि तु लक्षणमतःपरं संप्रवक्ष्यामे ॥ ९८॥ _ लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या आचाराने युक्त असलेली जी गोष्ट असेळ आणि धूर्त | लोकांच्या संभाषणातून निष्पन्न होणारे ढोंगाचे जे दर्शन असेल त्यांची प्रहसनात योजना करावी, उपयोग करता येईल त्याप्रमाणे वीथीच्या अंगांनी युक्त अशी प्रहसनाची रचना करावी. आता यानंतर मी भाणाचे सुद्धा लक्षण सांगतो. १ नि तत्महसनेषु योज्यं धूर्तोक्तविवादसंयुक्तम्‌, का तत्प्रहसने प्रयोज्यं धूतविट- विवादसंपन्नमू. २ का उद्धात्यकादिमिरिदं वीथ्यद्धेर्मिश्चितं भवेन्मिश्रम्‌. ____ हस्तलिखितात उत्पन्न झाले आहें _ _ धिकरणमः म्हणंजे १२० नाट्यशास्त्र ____ उभयसाधारणीमपि कवेः शिक्षामाह ळलोकोपचारेति । वार्ता प्रासाद्विः यदि सा ठोकन्यवहारसिद्धा भवाते यथा शाक्‍यानां स्त्रीसंपर्कः प्रहसनीयो भवति, न चौर्यम्‌ । एवं दम्भो5पि प्रासेद्ध एवोपहसनीयः । अत्राधिकरणं स्वयमेवाह धूर्तप्रविवादेति । धूर्ताः क्वात्रिमतापसादयो विटाद्यश्च, तद्विषये यः प्रकृष्टी विवादो विरुद्धतयावभासस्तेन फलभूतेन संपाद्यतया यदुक्तं प्रहस्यमानम्‌ । तथाभूतर्चारि तावळोकनेन हि असंस्करृतामिति व्युत्पाद्यो न भ्ूयस्तान्वश्वकानुपसपंतीति वीथ्यज्ञषैरिति वक्ष्यमाणेः । यथायोगमिति तेबां संप्रयोगे संख्यायाः क्रमस्य तु न कश्चित्षियम इति दर्शयाति । प्रहसनस्याडुनियमानभिधानात्‌ शुद्धमेकाडूं संकीणे त्वनेकाईु वेश्यादिचरितसंख्याबलादिति केचित्‌ । अन्ये त्वेकाळूप्रकरणमध्यपाति त्वादेकाडुडमिति मन्यन्ते प्रथमसंख्यातिक्रमे भेदाभावपारेत्यागे च प्रमाणाभावात । दोन्ही प्रकारांना समान असे नियम कवींसाठी “लोकोपचार' इत्यादी शब्दांत सांगतात. वार्ता म्हणजे प्रसिद्धी, जर ती लोकांच्या व्यवहाराला धरून असेल तर; उदाहरणार्थ, बौद्धांच्या बाबतीत स्त्रीसंपर्क हास्यास्पद होय, चोरी नाही. या'चप्रमाणे ढोंग सुद्धा प्रसिद्ध असेळ तरच हास्यास्पद होते. याच्या संबंधात आश्रय कोठे असतो ते स्वतःच 'धूर्तप्रविवाद' या शब्दात सांगतात. धूत म्हणजे ढोंगी तपस्वी वगैरे आणि विट वगैरे, त्यांच्याविषयी जो प्रकृष्ट विवाद म्हणजे विरुद्ध स्वरूपात आभास, तो फलळख्यपाने संपादित करण्यासाठी जे हास्यकर वचन ते. कारण तशा प्रकारच्या चरिताच्या अवलोकनाने व्युत्पाद्य प्रेक्षक “हे सुसंस्कृत नाही' असे जाणून पुन्हा त्या ढोंग्यांच्या जवळ जात नाही. 'वीथ्यज्ञैः' म्हणजे पुढे सांगितली जाणारी त्यांनी. 'यथायोगम्‌! म्हणजे त्यांच्या उपयोगात संख्या व क्रम यांचा काही नियम पाळावया'चा नाही हे दांखवितात. प्रहसनाच्या संबंधात अंकांच्या संख्येविषयी नियम सांगितळा नसल्यामुळे काहींच्या मते शुद्ध प्रहसन एकांकी आणि संकीणे अनेकांकी, कारण त्यात वेश्या आदींच्या चरितांची संख्या अधिक असते. पण इतरांचे मत असे आहे की ' एकांकी ख्पकांच्या मध्ये याचा समावेश असल्यामुळे हे एकांकीच होय; कारण पहिली संख्या ओलांडण्यास आणि मिन्नतेच्या अभावाचा त्याग करण्यास काही प्रमाण नाही ____._. “लोकव्यवहारसिद्धा' यावरून असे दिसते की हास्यास्पद गोष्टी कोणत्या याबद्दलचे काही _.. संकेत ठरलेले असतात. एखाद्याच्या स्वभांवेसिद्ध वागणुकीशी विसंगत अशी गोष्ट त्याने केली | स्यॉस्पद ठरते. बौद्ध मिक्‍्खूंच्या बाबतीत स्त्रीहंपक हास्यास्पद होय असा सर्वमान्य सं- __ केत होता ही गोष्ट सहज समजण्यासारखी, आहे, - “एवं दग्मो 5 पिर. ही सुळातील “एव भावि? _ ह्या भ्रष्ट पाठाची केलेली दुरुस्ती आहे. दुरूस्त पाठच आवद्यक आहे व त्याचेच भ्रष्ट रूप “ह उघंड आहे. - 'अत्न* म्हणजे ह्या दमाच्या बाबंतीत,. - 'अ- दैम ज्यांच्या ठिंकाणी' आढळतो अशी पात्रे. - “कृत्रिम- इ०' शुद्ध प्रहसनात ८.९ ९-९०८९ ९२ आणि “बिटादयः? संकीर्ण प्रहसनात. - 'विरुद्धतया इ०' आयेंतीळ 'प्रविवाद्संपन्नः” याचा अथ लावला आहे तो असा - ज्या वचनांनी (बाद) पात्रांच्या संबंधात अतिराय (प्र) विरुद्ध अथवा बिसंगत (वि) असा आभास उत्पन्न होईल अश्या हास्यकारक वबचनांनी युक्त. हे 'दंभसंयोगः चे वर्णन आहे. - 'असंस्कृतमितिः ही मुळातील 'संस्कृतमितिः ची सुचविलेली दुरुस्ती आहे. व्युत्पाद्य म्हणजे ज्याला बोध करावयाचा असा प्रेक्षक, त्याला जर रंगभूमीवरील इद्य असंस्कृत वाटले तरच तो प्रत्यक्षात तसल्या धूर्त माणसांपासून दूर राहील, ते हृद्य संस्कृत वाटल्यास त्याच्यावर ठलटाचच परिणाम होण्याचा संभब आहे. - 'एकाडूप्रकरण- यातील प्रकरण शब्द सवेसामान्य रूपकासाठी वापरला आहे. - 'प्रथमसंख्यातिक्रमे' मुळात “प्रथमतंख्ययातिक्रमे) असे अहि. पण ते बरोबर नाही. प्रथम संख्या म्हणजे एक ही संख्या, तिचे अतिक्रमण अभिप्रेत आहे, तिच्याकडून होणारे नाही. - 'मेदाभावपरित्यागे? आुद्ध ब तंकीर्ण प्रहसनात अंकांच्या संख्येच्या बाबतीत मिन्नतेचा अभाव नाटयशास्त्रावर्न गृहीत धरावा लागतो. त्याचा त्याग करून निरनिराळ्या अंकसंख्या मानण्यास काही आघार नाही, असा हा युक्तिवाद आहे. आत्मानुभूतशंसी परसंश्रयवणेनाविशेषस्तु । *विविधाश्रयो हि भाणो विक्षयस्त्वेकहायश्व ॥ ९९ ।। परवचनमात्मसंस्थ पतिवचनेरुत्तरोत्तरग्रथितेः । श>च्फ €>___ च न आकाशपुरुषकथितेरज्षविकारेराभेनयेत्तत्‌ ॥ १०० ॥ धूर्तविटसंभयोज्यो नानावस्थान्तरात्मकश्वेव । एकाडूने बहुचेष्टः सततं कार्यो बुघेरभाणः ॥ १०१॥ . स्वतःचा अनुभव कथन करणारा व दुसऱ्यांसंबंधी विशेष वर्णन करणारा विविध चेष्टितांसंबंधीचा एका'च पात्राच्या हारा केळा जाणारा तो भाण होय असे समजावे. दुसर्‍याची वचने स्वतः उच्चारून आकाराभाषिताच्या साहाय्याने प्रश्न व त्यांची उत्तरे यांच्या ग्रथनाच्या द्वारा, तसेच अंगविक्षेपाच्या द्वारा त्याचा अभिनय करावा. विद्वान कवींनी नेहमी धूर्त व विट यांची योजना असलेला, तसेच विविध अवस्थांनी परिपूणे असलेला, एका अंकात रचलेला व पुष्कळ चेष्टितांनी युक्त असा भाण निर्माण करावा. अथ हास्यरसोचितविटयूतांद्यनुप्रवेशेन समानयोगक्षेमं भाण टक्षयितुमाह आत्मानुभूतरांसीति । एकेन पात्नेण हरणीयः सामाजिकहृदयं प्रापायितव्यो५्थो यत्र स भाणः । एकमुखेनेव भाण्यन्ते डाक्तेमन्तः क्रियन्ते अप्रविष्टा आपि पात्रविदोषा यत्रेते भाणः । तत्र स प्रविष्टः पात्रविशेषः आत्मानुभूतं वा १ नि हिविधाश्रयो. २ नि ब -रमिनयेश्रैव. १२२ | नाट्यशास्त्र शांसति परगतं वा वर्णयति । तत्र च प्रयोगप्रयुक्तिमाह परवचनामेति । पर- संबन्थि वचनं स्वयमड्ठविकारेरभिनयेत्‌ । ननु तत्परवचनमनुक्ते कथमभिनयेत्‌ । आहे आकाशे शून्ये यानि पुरुषकाथेतानि दृष्टानि यत्र शून्ये तेन वण्यंन्ते वा कंचित्पश्यत्याकर्णयति च, तत्र च तद्ठचनं स एवानुवदन्‌ सामाजिकान बोध- यति । यथा “भो वाडव, अरे किं त्रवीषिः इत्यादी न केवळ परवचनमभिनयेत किन्तु प्रतिवचनेः स्वाक्ते' सह । अत एवोत्तरोत्तरग्रथितेः योजनाभिरुपटक्षितैः । ननु यो5सावेको5त्र प्राविशातिे स क इत्याह धूर्तविटोते । नानाप्रकारावस्थाविदो- षात्‌ लोकोपयोगिव्यवहारात्मक आत्मा वाच्यं यस्य अत एव बहृचेष्टः । सततं कार्य इते सकलसामान्यप्रथग्जनोपयोग्यस्तु ठोकव्यवहारो वेश्याविटादिवृत्ता- न्तात्मा निरूप्यत इति बाहुल्येन प्रथग्जनव्युत्पत्तियोने रूपकमिदम, राजपुत्रा- दीनामपि शस्भलीवृत्तान्ता ज्ञेय एवावश्वना्थमिति स प्रयोज्य इत्यर्थः । . आता हास्यरसाला योग्य असे विट, धूर्त आदी समाविष्ट असल्याकारणाने समान योगक्षेम असलेल्या भाणाचे लक्षण 'आत्मानुभूतरंसी! इत्यादी शब्दांत करतात. एका पात्राने ह्रणीय म्हणजे प्रेक्षकांच्या हृदयाप्रत पोचवावयाची गोष्ट ज्यात असते तो भाण. एकाच्याच मुखाने रंगभूमीवर प्रवेश न केलेली सुद्धा काही पात्रे ' भाण्यन्ते' म्हणजे बोलावयास लावली जातात म्हणून त्याळा भाण म्हणतात, त्यात ते प्रवेश केलेले पात्र स्वतःच्या अनुभवा'चे कथन करते अथवा दुसऱ्याविषयी वर्णन करते. तत्संबंधी प्रयोगाची योजना 'परघचनम्‌! इत्यादी शब्दांत सांगतात. दुसऱ्याच्या संबंधीचे वचन स्वतः आंगविक्षेपांनी अभिनीत करावे. ते दुसऱ्याचे वचन त्याने बोळलेळे नसता अभिनीत कसे करावयाचे या आक्षेपाचे समाधान करतात -'आकादो' म्हणजे शून्य स्थानी जी मनुष्यांची भाषणे दृष्टोत्पत्तीस येंतात अथवा शून्य स्थानी तो वर्णन करतो आणि कोणाला तरी पह्मातो आणि ऐकतो तेथे ते दुसऱ्याचे क्चेन तोच पुन्हा उच्चारून प्रेक्षकांना रेकवितो. उदाहरणार्थ, “हे वाडवा, अरे तू काय म्हणतोस?! इत्यादीमध्ये केवळ दुसऱ्यांच्याच वचनाचा अभिनय करावा असे नाही तर आपल्या स्वतःच्याही उक्तींसह. म्हणूनच उत्तरोत्तर प्रथित केलेल्या, योजनांनी उपलक्षित झालेल्या प्रतिव्चनांनी असे म्हटले आहे. जो एकटा येथे प्रवेश करतो तो कोण या प्रश्नाचे उत्तर 'धूर्तविट' यात देतात. विविध प्रकारच्या विशिष्ट अवस्थांमुळे लोकोपयोगी व्यवहाराच्या स्वरूपाचा आत्मा म्हणजे कथन करावयाची गोष्ट ज्यात आहे असा भाण, म्हणूनच पुष्कळ चेष्टिते असलेला. “ सततं कार्य: म्हणजे वेश्‍या, विट आदींच्या वृत्तान्ताच्या स्वरूपाचा सवे सामान्य लोकांना उपयोगी असा लोकव्यवहार यात दाखविला जातो, यावरून हे रूपक मुख्यतः सामान्य माणसांना बोध देण्यास उपयुक्त होते, आणि राजपुत्र आदींना सुद्धा फसवणूक होऊ नये म्हणून कुट्टिनीच्या वृत्तान्ताचे ज्ञान आवश्यक आहे म्हणून ह्या भाणाचा प्रयोग करावा असा अर्थ. १८.९९-१०१ १२३ योगक्षेम” हा शब्द येथे स्वरूप या अर्थी वापरलेला दिवतो. - 'परसंबन्थि वचनं? ही मुळातील “परसन्धिवचनं' ची दुरुस्ती आहे. प्रस्तुत ठिकाणी “सन्थि' शब्दाने अर्थबोध होण्यासारखा नाही. - 'कंचित्पश्यत्याकर्णयति च' यातील 'कंचित्र ही मुळातील 'कश्चित्ः ची दुरूस्ती आहे. रंगभूमीवरील पात्राचा 'कश्न्वितः म्हणजे कोणीतरी असा निर्देश केला असण्याचा संभव नाही. - “उत्तरोत्तर” म्हणजे उक्ति - प्रत्युक्ते असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. - “व्यबहारात्मक आत्मा? मुळात “व्यवहारात्मकात्माः असे आहे. पण आरयेतील “आत्मन? शब्दाचा टीकेत 'बाच्य' असा अथे केला आहे. तेव्हा 'आत्मा' शब्द समासाच्या बाहेर स्वतंत्र असणे आवश्यक आहे. - “-पृथग्जनोप-' मुळात “-पुथग्गतोप- आहे. पण “पृथग्गत! येथे अर्थहीन आहे. आणि पुढे 'पृथग्जन' हाच शब्द बापरळा आहे. “सामान्य” शब्द असताना 'पुथक्‌' आवद्यक नाही हे खरे आहे. तथापि अर्थ- स्पष्टतेसाठी समानार्थी दोन राब्दांचा उपयोग अस्वाभाविक मानता येणार नाही. - 'शम्मली? म्हणजे कुंटीण. - “स प्रयोज्यः' सुद्रितात 'संप्रयोज्यः” आहे. तो पाठ मूळ नाही. इद्‌्मिह मीमांस्यभ्‌ । य एते उत्सृष्टिकाडनदयो रूपकभेदाः ते तावदेकरसा एव । यद्यपि नाटकादयो5प्येवमेव तथापि सवरसयोग्यतायामपि नाटके प्रकरणे च धर्माथादिवीर एव प्रधान परमाथंतः, सर्वेषु नायकभेदेषु वीरत्वानुगमदशेनात्‌ । समवकारे तु यद्यपि शूह्लारादित्वमुक्त॑ तथापि वीर एव प्रधानं रौद्रो वा । डिमन्या- योगयोरप्येवम्‌ । ईहामगे5 पि रोद्रप्राधान्यमेव । नाटिकायां तु हार एव प्रधानम्‌ । एवं तावदू वीररोद्रशद्ञारा यथास्वं पुम्थंत्रयप्राणभूतत्वेन वतमाना एतेषु प्रयोगेषु । शान्तबीभत्सरसो तु चरमपुमरथोपयोगात्‌, तत्र च सवंस्य नाधिकारः अपि कस्यचिद्पाश्विमजन्मनो$धिकारात्‌, नाटके यद्यपि तत्फलप्रधानतया प्राधान्यम- वलम्बेयाताम्‌, तथापि नासी प्रचुरप्रयोग इति तयोः पुरुषाथंप्रवरप्राणितयोरापि वीरादिरसान्तराध्यावांपेनावस्थापनम्‌ । एवं तावत्पुमथरसविषयो रूपकरसविषय एव परमार्थतः, तथापि त्वितिव्रत्तवेतत्याद्रसान्तरप्रयोगो5पि तदडुतया तत्र भवति । एवं तत्परधानचेष्टायोगाद्रत्तिवेचिञ्यमत्रोचितमेव । येथे पुढीळ विचार केला पाहिजे. हे जे उत्सृष्टिकाडः आदी ख्पकाचे प्रकार आहेत त्यांच्यात एकाच रसाचा आविष्कार असतो. जरी नाटक आदींमध्ये सुद्धा अशीच स्थिती असते, तथापि नाटक आणि प्रकरण सर्व रसांच्या आविष्कारास योग्य असतानाही त्यांत धर्माध आदी स्वरूपाचा वीररसच खरोखर मुख्य असतो, कारण सर्व प्रकारच्या नायकांत वीरत्व विद्यमान असलेले दिसून येते. समवकारामध्ये जरी शृंगार आदींचा निर्देश केला आहे तरी त्यात वीररसच मुख्य असतो किंवा रौद्र. हीच गोष्ट डिम आणि व्यायोग यांची. ईहामृगात सुद्धा रौद्रालाच प्राधान्य असते. नाटिकेत तर शुज्लाररस प्रधान असतो. याप्रमाणे ह्या रूपकांच्या प्रयोगात वीर, रौद्र आणि शूद्ठार आपापल्या रूपकात तीन पुरुषार्थांचे प्राणभूत झाळेळे असतात. परंतु शान्त आणि बीभत्सरस शेवटच्या पुरुषार्थाला उपयोगी १२४ | नाट्यशास्त्र असल्यामुळे -आणि त्याचा सर्वांनाच अधिकार नसतो, कारण क्वचित एखाद्या नंतर जन्म नसलेल्यासच त्याचा अधिकार असतो - जरी नाटकात त्यांचे फळ मुख्य असल्यामुळे प्राधान्य प्राप्त करू शकतील, तरी त्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात होत नाही म्हणून सर्वश्रेष्ठ पुरुषार्थाचे प्राणभूत असले तरी त्या दोन रसांची वीर आदी इतर रसांत अन्तर्भाव करून स्थापना केली जाते. याप्रमाणे पुरुषार्थांच्या रसांचा विषय म्हणजे खरोखर ख्पकांच्या*च रसांचा विधय होय, तरीही कथानकाच्या विस्तृतपणामुळे इतर रसांचा सुद्धा प्रयोग त्यांत त्यांचे अंगभूत म्हणून होतो. याप्रमाणे त्यांना ज्यात प्राधान्य आहे अशा चेष्टांच्या योजनेमुळे वृत्तींची विविधता या रूपकांत उचितच होय. या ठिकाणी अमिनवगुप्ताने निरनिराळ्या रसांचे विविध रूपकप्रकारांत स्थान काय याचा प्रथम बिचार केला आहे. त्यात रसांचा चार पुर्षार्थीशी असलेला संबेध दिग्दार्हात केला आहे. तदनुषंगानं नाटक, प्रकरण, समवकार, डिम, व्यायोग, इेहामग आणि नाटिका यांतच पुरुषा- ्थाशी संबद्ध रस असतात असा विचार प्रकट केला आहे. - 'उत्सष्टिकाडादयो? मुळात 'उत्स- छ्िकादयो? आहे. तो लेखनदोष आहे. - 'तथापि? मुळातील 'तथाहि? ची ही दुरुस्ती आहे “तथाहि' निर्थक आहे. - 'र्मार्थादिवीरः' रसाव्यायात ६.७९ मध्ये धर्मवीर, दानवीर आणि युद्धवीर अश्या तीन प्रकारच्या बीररसाचा निर्देश आहे. येथे धर्मार्थबीर म्हणजे धर्मवीर असे अभिप्रेत दिसते. त्या अध्यायातील पंधराव्या रहोकावरील टीकेत वीररस धर्मप्रधान आहे असे म्हटले आहे; रोद्ररस अर्थप्रचान आणि शृद्ञारस कामप्रधान - याप्रमाणे ह्या तीन रसांचा तीन पुर्षाथोशी संबंध जोडला आहे. - “चरमसमर्थ' म्हणजे मोक्ष, “अपश्च्मजन्मन? म्ह णजे ज्या- ला पुढील जन्म येणार नसतो, वर्तमान जन्मानंतर जो सुक्त होणार असतो असा मनुष्य "7 तत्फल-' शान्तबीभत्सांचे फळ मोक्ष. - 'असो' म्हणजेही मोक्ष. - “-रसान्तराध्याबापेनाव- स्थापनम्‌ हा सुद्रितानुतारी पाठ आहे. हस्तलिखितातीळ पाठ “-रसान्तराच्यायाये अर्थे ना- वस्थापनमूर असा आहे. तो दुरूस्त होण्यासारवा वाटत नाही. पण येथील अभिप्रेत अर्थ स्पष्ट आहे. - 'पुमर्थरसवियब्रो, मुद्रितात 'पुमर्थविषयो? एवढेच आहे. पण रस शब्द आवश्यक आहे. पुरुषार्थांचे विवेचन स्वतंत्रपणे केळेले नसून ते रसांच्या अनुषंगाने केळे आहे. - तदद्धतया' म्हणजे मुख्य रसाचे अंगभूत म्हणून, - 'तत्मंधान- यातील 'तत' म्हणजे मुख्य तसेच गौण रस. त्या सर्वोना प्राधान्य देणाऱ्या विविध प्रकारच्या वेष्टांमुळे निरनिराळ्या वृत्ती अस्तित्वात येणे स्वाभाविक आहे उत्स टिकाडूपहसनभाणास्तु करुणहास्यविस्मयप्रधानत्वाद रअकरसप्रधा- ना: । तत एव तत्र स्त्रीबालठमूखादिरधिकारी । न च विततमंत्रेतिवत्तमिति वात्तिवेचित्र्यमापे नास्ति । तथाहि उत्सृष्टिकाडे वत्तित्रयं तावद्ठचसा निषिड्धम । भारती चात्र कथं वृत्तिः । चेष्टा हि करुणेःप्रधानं तदुपकरणं तु परिदेविता- त्मिका भारती । तस्मात्फलसंवित्त्याख्या वात्ते वाकृचेष्टयोः फलानुभव इति यस्या लक्षण, साभ्युपगन्तव्या । अवश्यं चेतत्‌ । अन्यथा मूडीमरणादी वाक॒- १८.९९-१०१ १२१९ चेष्टयोरभावे निवृत्तिकतेव स्यात्‌ । [किं च यदि तावत्पुमर्थकामोद्देशेन कौाशि- . क्याभिधयिते घमंमर्थ चोहिऱ्य वृत्तिट्रयं वक्तव्यम्‌ । तस्माचेष्टात्मिका न्याय- वृत्तिरन्यायवृत्तिवोग्रूपा तत्फळरूपा फलसंवित्तिरिति वृत्तित्रयमेव युक्तामिति भट्टो- डुटो मन्यते । यदाह - आदे वाकूचेष्टाभ्यां पुरुषार्थचतुष्टयेन चाष्टविधे । षोडराधा फलवृत्तिस्तदूद्रयतो नेकधा तु रसभेदात्‌ ॥ इति । परंतु उत्सृष्टिकाडू, प्रहसन व भाण यांच्यात अनुक्रमे करुण, हास्य व विस्मय यांना प्राधान्य असल्यामुळे त्यांच्यात रंजन करणारे रस प्रधान असतात. म्हणूनच श्री, बाल, मूर्ख इत्यादींना त्यांत गोडी वाटते. आणि त्यांत कथानक विस्तृत असत नाही म्हणून वृत्तींची विविधता सुद्धा नसते. तदनुसार उत्सृष्टिकाडनमध्ये तीन वृत्तींचा साक्षात निषेधच केला आहे. आणि यात भारती वृत्ती तरी कशी आहे? कारण करुणात चेष्टिताळा प्राधान्य नसते, आणि विलापाच्या खरूपाची भारती वृत्ती त्याचे साधन म्हणून असते. यावरून फलसंबित्ति नावाची वृत्ती, जिचे लक्षण फळाची अनुभूति असे आहे ती स्वीकारली पाहिजे. आणि हे आवश्‍यक आहे. एरव्ही मूर्छा, मरण इत्यादीमध्ये वाणी आणि वेष्टित यांचा अभाव असल्या- मुळे वृत्तिहीनता निष्पन्न होईल. शिवाय जर काम ह्या पुरुषार्थाच्या उद्देशाने केशिकी वृत्ती निर्दिष्ट केळी जाते तर धर्म व अर्थ ह्यांच्यासाठीही दोन वृत्ती निर्दिष्ट करणे आवश्यक आहे. म्हणून चेष्टिताच्या खरूपाची न्यायवृत्ति, वाणीच्या स्वरूपाची अन्यायवृत्ति आणि त्यांच्या फलाच्या स्वरूपाची फलपंवित्ति ह्या तीन वृत्तीच योग्य होत असे भट्ट उद्धटाचे मत आहे. त्याने म्हटले आहे - वाणी आणि चेष्टित यांच्या द्वारा पहिल्या दोन वृत्ती, चार पुरुषार्थांच्या संयोगाने त्या आठ प्रकारच्या होतात. त्या दोहोंच्यामुळे फलवृत्ती सोळा प्रकारची होते आणि रसांच्या भेदांमुळे ती अनेक प्रकारची होते. या परिच्छेदात मागे सांगितलेल्या नाटकादी खूपकप्रकारांहून उत्सुष्टिकाडू, प्रहसन व भाण यांची मिन्नता स्पष्ट केळी आहे. आणि तदनुषंगाने भट्ट उद्धटाचे वृत्तींतंबंधीचे मिन्न मत उद्धृत केळे आहे. - “रञ्जकरसप्रधानाः' म्हणजे यांच्यातील रत पुरुषार्थ साध्य करणारे नसून केवळ मनोरंजन करणारे असतात. हा नाटक वगैरे व हे तीन प्रकार यांच्यातील एक फरक, - 'वृत्तिविचित्यमपि नास्ति? हा त्या दोहोंमधील दुसरा फरक. मुळात 'बृत्तवैचित्र्यम? असा पाठ आहे. पण तो चूक आहे दे पुढील वाक्‍्यांवरून स्पष्ट आहे. - “भारती चात्र इ० हा प्रश्न भट्ट उद्धटाने उपस्थित केलेला असून पुढील वाक्यात त्याने त्याचे उत्तर दिळे आहे. - करुणे5परधानं' हस्तलि- खितात अवग्रह नाही. पण तो आवश्यक आहे. या ठिकाणी उद्धटाने असा युक्तिवाद केला १२६ नाट्यशास्त्र आहे की करुणात चेष्टिताला प्राधान्य नसते म्हणजे त्याच्या आधाराने असलेली दृत्ती नसते आणि भारती वृत्ती -जी शब्दाधिष्ठित असते - ती केवळ साधनथूत असते. म्हणजे सामान्यतः स्वीकृत झालेल्या दृत्ती पैकी कोणतीही दृत्ती करुणात नसते. पण वृत्तिरहित काव्य असूच शकणार नाही. म्हणून ह्या ठिकाणी एका नवीनच फल्संवित्ति नावाच्या वृत्तीचे अस्तित्व मान्य करणे आवड्यक आहे. शब्दांच्या किंवा चेष्टिताच्या योजनेने जो फलस्बरूप परिणाम होतो त्याची अनु- भूती असे ह्या फल्संवित्ति वृत्तीचे स्वरूप आहे. मूर्छा ब मरण या अवस्थांत वाकू व चेष्टा यांवर आधारलेल्या वृत्ती असंभाव्य असल्यामुळे तेथे एका निराळ्याच वृत्तीचे अस्तित्व मानठे पाहिजे. नाही तर तेथे काव्य वृत्तिहीन होईल, - “धर्ममर्थ चोहिऱ्य' म्हणजे प्रत्येक पुरुषार्थासाठी एकेक वृत्ती अशी अपेक्षा येथे व्यक्त केली आहे. कामासाठी वृत्ती आहे, पण धर्म व अर्थ यांसाठी नाही म्हणून नेहमीच्या चार वृत्ती अशास्त्रीय अत एव अग्राह्य ठरविल्या आहेत, - 'चेष्टातमिका इ० चेष्टित आणि शब्द यांवर आधारलेल्या दोन मूल्यूत वृत्तींना उद्धटाने अनुक्रमे न्यायदृत्ति व अन्यायवृत्ति अशी नावे दिली आहेत. या नावांची उपपत्ती स्पष्ट नाही. चेष्टितावर आधारित हीच खरी न्यायतः प्राप्त वृत्ती, दुसरी तक्ी नाही असा अर्थ संभाव्य आहे. 'घोडशधा फल्वृत्तिस्तद्द्रयतः' वस्तुतः चार चेष्टावृत्ती, चार वागृत्ती आणि त्यांपैकी प्रत्येकीची एकेक फलवृत्ती मिळून आठ फल्वृत्ती असे एकंदर सोळा प्रकार होतात. केवळ फल्वृत्तीचे सोळा प्रकार संभाव्य दिसत नाहीत. | तदत्र केचिदाहुः । सात्त्वत्यां यद्यपि केशिकी शक्‍यान्तर्भावा तथापि रअक- त्वातिशयात्पृथगुपात्ता । स्वरवन्मुखजाभिनयश्व न चान्यायवृत्तो, पुमर्थंचतुष्क- योगोपपत्तिविप्रतिषेधात्‌ । फलबृत्तो च बृत्तिसामान्यलक्षणं व्यापाररूपत्व॑ यदि नास्त तत्कथं वृत्तित्वस्‌ । आस्ति चेत्‌, वाकचेष्टातिरिक्तो मानसो न्यापारो न कश्वित्‌ ळोकसिद्ध इति सूक्ष्मो वाकूचेष्टागत एवोपेत्यः । ततश्च मूर्छा- दारवापे प्राणात्मकायीयन्यापारसंभव एव ळयतालगानादि प्रवर्तते । संवेदनर्मापे च मूछांदी नास्तीति शक्यं वक्तुमिति फलद्रृत्तिरपि तत्र कथम्‌ । तस्मात्तत्र सात्त्व- त्येव वृत्तिः । यदि बाहुल्यापेक्षया द्रत्तिमयं काव्यमिति व्यवहारो रूपकसमुदाया- पेक्षया खण्डस्यावृत्तिकत्वेडपि समुदितस्य रूपकस्य वृत्तिमयत्वम्‌ । यच्छकठी- गर्भमतानुसारिणो मूछांदावात्मसंवित्तिलक्षणां पश्नमी वृत्ति सकलकार्यनिवृत्त्यनुमेयां मूछादिनाकमित्वानुभवेन च॒फलेनावच्छिन्नामात्मव्यापारूपां मन्यन्ते न च परिस्पन्द एवेको व्यापार इति मनसिकृत्य, तन्मत॑ं भावानां बाह्यग्रहणस्वभाव- त्वमुपपादयद्धिभटडलोलछटप्रभ्ातिमिः पराकूतमिति न फलवृत्तिर्वा काचिदिति चतस्त्र एव वूत्तय इति । ___. यासंबंधात काहींचे म्हणजे असे. सात्त्वतीमव्ये जरी कैरिकीचा अन्तर्भाव रक्‍य आहे तरीही तिच्यात रंजकतेची विपुलता असल्यामुळे ती स्वतंत्र मानली आहे. आणि स्वरांनी युक्त अशा मुखाने होणाऱ्या अभिनयाचा अन्यायवृत्तीमध्ये अन्तर्भाव शक्‍य नाही, १८.९९-१०१ १२७ कारण त्याच्या चार पुरुषार्थांशी संयोगाच्या उपपन्नतेचा निषेध केला आहे. आणि वृत्तींचे सामान्य लक्षण जो व्यापार तोच जर फलवृत्तीमध्ये नाही तर ती वृत्ती कशी होईल? जर तीत व्यापार आहे असे म्हटळे तर वाणी आणि चेष्टित यांहून स्वतंत्र असा काही मानस व्यापार लोकांमध्ये प्रसिद्ध नाही म्हणून तो वाणी आणि चेष्टित यांमध्येच सूक्ष्म स्वरूपात विद्यमान असलेला व्यापार आहे हे स्वीकारावे लागेळ. आणि त्यामुळे मूर्छा इत्यादीमध्ये सुद्धा प्राणात्मक शारीरिक व्यापाराचा संभव असतो तेव्हाच ळय, ताळ, गान आदी प्रवृत्त होतात. आणि मूर्छा आदीमध्ये संवेदना सुद्धा नसते असे म्हणणे शक्य असल्यामुळे तेथे फलवृत्ती सुद्धा कशी असेल ? म्हणून त्या प्रसंगी सात्तवतीच वृत्ती. जर विपुळ प्रमाणात वृत्तींच्या विद्यमानतेमुळे काव्य वृत्तिमय असा व्यवहार होतो तर संपूर्ण रूपकाच्या दृष्टीने एखादा अंश वृत्तिरहित असला तरी सर्व रूपक मिळून वृत्तिमय काव्य असे ठरते. शकलीगर्भाच्या मताचे अनुयायी हाळलचाळ हाच फक्त एकच व्यापार नाही असा विचार करून मूर्छा आदीमध्ये आत्मसंवित्तीच्या स्वरूपाची पा'चवी वृत्ती - सर्व क्रियांच्या निवृत्तीमुळे जिचे अस्तित्व अनुमानाने ज्ञात होते आणि मूर्छा वौरेमुळे जी अकतेत्वाच्या अनुभवस्वरू्य फळाने संलक्षित होते अशी -आम्म्याच्या व्यापाराच्या स्वरूपाची मानतात; ते त्यांचे मत भट्ट ळोछट प्रशवतींनी बाह्य स्वरूपात उपलब्धी होणे हा भावांचा स्वमाव असल्याचे प्रतिपादन करून खोडून काढळे आहे. म्हणून फलवूत्ती नावाची कोणतीही वृत्ती नाही. तेव्हा चारच वृत्ती होत. | या परिच्छेदात इतर टीकाकारांनी केलेले उद्भधटाच्या मता'चे खंडन व वृत्तिविषयक पारंपरिक मताचा पुरस्कार उद्धत केला आहे. 'तात्त्वत्यां इ०' या वाक्यातील विधानाचे प्रयोजन वृत्ती पुरुषार्थाशी निगडित नाहीत, व्यापाराशी संबद्ध आहेत असे दाखविणे हे होय. भारती, आर- भटी आणि सात्त्वती यांत अनुक्रमे बाकू, देह आणि मन यांचे व्यापार प्रणनतया असतात. केशिकीला तसा स्वतंत्र व्यापार नसल्यामुळे तिचा सात्त्वतीत अन्तर्भाव करणे शक्‍य होते. तसे केळे असते म्हणजे तीन प्रकारच्या व्यापारांच्या अनुरोधाने तीनच वृत्ती प्रस्थापित झाल्या अस- त्या व वृत्तींचा पुरुषार्थांशी काही तंबंध नाही हे स्पष्ट झाळे असते. उद्धटाने काम पुरुषार्था- साठी केशिकी तशा धर्मे ब अर्थ यांसाठी कोणत्या वृत्ती असे विचारळे आहे त्याला हे उत्तर. - “अन्यायवृत्ती) यानंतर 'शकक्‍यान्तर्मावः” हे पद अध्याहूत धरल्यास थोडा अर्थबोध होऊ शकतो. . हस्तलिखितातीळ “-मिनयश्व' आणि “-वृत्ती) हेच पाठ स्वीकारणे योग्य. सुद्रितातील “-मिनयतश्वः हा पाठ आणि '-बृत्तित्व' अशी दुरुस्ती दोन्हीही अर्थबोधास साहाय्यक नाहीत. उद्धटाने वाग्रूप वृत्तीला अन्यायव्रत्ति म्हटले आहे. त्याला अनुलक्षून येथे असे विधान केळेळे दिसते की केवळ सरांनी युक्त असा मुखाने केलेला अभिनय वाग्रूप नसल्यामुळे त्याचा अन्य़ायवृत्तीत समावेश होणार नाहो. असा संभब आहे की मूळ पाठ 'न न्यायवृत्ती न चान्यायदृत्तो' असा होता. याने दुसऱ्या “च' ची उपपत्ती लागते. स्वर आणि अमिनय म्हणजे बाकू आणि चेष्टा एकत्र असल्या- मुळे या प्रसंगी न्यायवृत्ती व अन्यायवृत्ती दोन्ही लागू होत नाहीत आणि त्यामुळे हे वर्गीकरण बरोबर नाही अद्शा तऱ्हेचा अर्थ अमिप्रेत असण्याची शक्‍यता आहे. “स्वरबत्‌र यात शब्द समा- १२८ _ नाट्यशास्त्र विष्ट आंहेत की नाही हे स्पष्ट नाही. - 'पुमथचतुष्क- इ०? अमिनय पुरुषार्थाला उपयुक्त नाहीत म्हणून त्यांचा कृत्तीत अन्तर्भाव नाही, यावरून उद्भटाच्या मते कती पुरुषाथोशी संबद्ध आहेत असे येथे ग्हीत धरळेळे दिसते. - 'मूर्छादी* मुळात 'मरणमूर्छादी) आहे. पण मरणाचा निदेश प्रस्तुत वाक्यात असंभाव्य आहे. त्यात प्राणात्मक व्यापाराचा उल्लेख आहे. 'प्राणात्मकायीय- हा सुद्रितातील पाठ आहे. हस्तलितितात 'प्राणात्मकायाय-? आहे. 'कायीय? म्हणजे शारीरिक. " ल्यताल्गानादि प्रवरतते' हे कसे शक्‍य आहे ते स्पष्ट नाही. कदाचित मूर्छावस्थेत या गोष्टींचा आत्म्यावर परिणाम होतो व मूळेतून सुक्त झाल्यावर त्या प्रकट होतात अश्या तऱ्हेची कल्पना असण्याची शक्‍यता आहे. - “वृत्तिमयत्वम? मुळात 'वृत्तिमयत्वात्‌ः आहे. पण त्या हेतुनिददीक पदाचा कोठे अन्वय लागण्यासारखा नाही. - “शकलीगर्म संपादक श्री कवींनी शाकलेय म्हणजे उद्धट अशी टीप दिली आहे. - 'सूर्छादिनाकर्मित्वानुमवेन” ही सुद्धा सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'मूर्छादनाकर्मिणानुभवेन? असा पाठ आहे, तो भ्रष्ट आहे. मुद्रितात 'मूर्छाकर्मानुभावेन' असे आहे, पण त्याने अर्थबोध होण्यास मदत होत नाही. सूछेंमुळे आत्म्याला स्वतःच्या अकर्मित्वाचा म्हणजे अकतृत्वाचा अनुभव येतो, आणि असे हे फल प्राप्त होते तोच आलत्म्याचा व्यापार आणि त्यालाच आत्मसंवित्ति वृत्ती म्हणावे असे ह्या अनुयायांचे म्हणणे आहे. -- 'बाह्मग्रहण- इ०? आत्म्याचा व्यापार आत असतो. तो बाहेर प्रकट झाल्याशिवाय त्याची कल्पना प्रेक्षकांना कशी येणार व तेथे आत्मसंवित्ति नावाची वृत्ती आहे हे त्यांना कसे कळणार असा हा युक्तिवाद आहे. वर्य तु बूमः । को$यमस्थानसंत्रासः । यात्किचिदिह नाट्ये समरस्ति तचेद्वत्तिष्वन्तरभाव्यं तदा भवेदेतत्‌ । न चैतत्‌ । रड्ठो हि नाम का वृत्तिः । मृदडु- पणववंशाद्या का वृत्तिरपि हि भवेत्‌ । तस्मादू व्यापारः पुमथंसाधको व्रात्तेः । स च सर्वत्रेव वण्यते इत्यतो वृत्तयः काव्यस्य मातृका हते न किंचिद्यापारशून्यं वर्णनीयमास्त, मदमूर्च्छादिवर्णनायारमापे मनोन्यापारस्य सात्त्वत्याख्यस्य संभवात्‌। करुणादावपे च मनोदेहब्यापारासंभवे5पि बाहुल्येन वाग्व्यापारसंभवादू भारती दत्तिरुच्यते । वृत्त्यन्तरनिषेधस्तु तद्धानामपरिपूर्णत्वात । न च कायवाडय़नसव्या- पारं तद्दैचित्र्यं वान्तरेणान्यः कश्चिद्‌ व्यापार: संभवतीत्यसकृदुक्तम्‌ । तस्मात्‌ करुणप्रधाने भारती वृत्तिः परिदोषितबाहुल्यात्‌ । यत 'शूहुमरहास्यकरुणेरिह केशिकी स्यात? इते कोहलेनोत्त तन्मुनिमतविरोधादुपेक्ष्यमेव । तस्य तु यत्र यत्नानुल्बणा चित्तद्रत्तिः सा सा कौशिकीत्याशयः । एवं प्रहसनभाणयोररापे वार्यापारप्राधान्यादेव भारती वृत्तिः । मूळांदौ तु व्यापाराभावे वृत्त्यभाव एव । न हि सवे नाट्यं वृत्तित्रतया समथंनीयमित्यळमतिप्रसत्तया । आम्ही तर म्हणतो की काय हा भलत्याच बाबतीत मनस्ताप. जे जे काही नाठ्या- मध्ये समाविष्ट आहे त्या सर्वांचा वृत्तींमध्ये अन्तर्भाव करावयाचा असेळ तरच हे होऊ शकेल. _ १८.१०२ | | | १२९ पण तशी गोष्ट नाही. रंगभूमी म्हणजे कोणती दृत्ती म्हणता येईल १ मृदज्व, पणव, वंशा इत्यादींनी कोणती वृत्ती होऊ रकेळ ? म्हणून पुरुषा्थसाधक व्यापार म्हणजेच वृत्ती. आणि त्या व्यापाराचे सर्वत्र वर्णन केळे जाते यास्तव वृत्तींना काव्याचे उद्गमस्थान मानले आहे; म्हणून व्यापारशून्य अशी कोणतीही गोष्ट वर्णन करण्यासारखी नसते, कारण मद, मूर्छा आदींच्या वणनातही सात्त्वती नावाच्या मनोब्यापाराचा संभव असतो. करुण आदी रसांम सुद्धा मन आणि शारीर यांचा व्यापार संभवत नसळा तरी वाग्यापार प्रचुर प्रमाणात संभवत असल्यामुळे भारती वृत्ती असते असे म्हणतात. इतर वृत्तींचा निषेध केळा आहे तो त्यांची अंगे परिपूणे नसतात म्हणून. आणि देह, वाणी आणि मन यांचचा व्यापार अथवा त्याची विविधता यांच्याशिवाय दुसरा कोणताही व्यापार संभवत नाही हे अनेक वेळा सांगितले आहे. म्हणून करुणप्रधान रूपकात भारती वृत्ती असते, कारण त्यात विलाप मोठ्या प्रमाणात असतात. 'शुद्ठा, हास्य आणि करुण यांच्या योगाने कैशिकी वृत्ती होते' असे जे कोहलाने म्हटले आहे ते भरतमुनीच्या मताच्या विरुद्ध आहे म्हणून त्याची उपेक्षाच केळी पाहिजे, जेथे जेथे भडक चित्तवृत्ती नाही तेथे तेथे कैशिकी वृत्ती असा त्याचा आराय आहे. याचप्रमाणे प्रहसन आणि भाण यांमध्ये सुद्धा वाख्यापाराला प्राधान्य असल्यामुळेच भारती वृत्ती असते. मूर्छा आदींमध्ये तर ब्यापाराचाच अभाव असल्यामुळे वृत्तींचा अभाव असतो. कारण सर्वेच नाठ्य वृत्तित्र्ममय आहे असे समर्थन करणे आवश्यक नाही. तेव्हा हा अतिप्रसंग आता पुरे मुनिमतविरोधात्‌ः बिसाव्या अध्यायात भरतसुनीने “हास्यशुज्ञारबहुला केशिकी परिचक्षिताः (२०. ७३) असे म्हटछे आहे. त्यात करुणाचा समावेश नाही बडोदे प्रतीत यानंतर पुढील आर्या कंसात दिली आहे - भाणस्यापि हि नि्िलं लक्षणमुक्त तथागमानुगतम । _ वीथ्याः संप्रति निखिल कथयामि यथाक्रमं विप्नाः ।॥ सवेरसल्क्षणाव्या युक्ता ह्य्वेस्तथा तयोदश्याभेः ।_. बीथी स्यादेकाडून तंथेकहाया टद्रिहाया वा । १०२॥ सव रसांच्या लक्षणांनी समरुद्ध, तसेच तेरा अंगांनी युक्त आणि एक अंक असलेली तसेच एका पात्राने अभिनीत करावयाची किंवा दोन पात्रांनी अभिनीत करावयाची अशा प्रकारची वीथींची रचना असावी | ___ १ ब हाजस्त्रयोदशभिः. रं का 'द्विपातहार्या तंथेकहार्या वा. १३० नाट्यशास्त्र अथ सर्वान्ते सर्वरसमयत्वादविततस्वभावत्वाचच संक्षेपेण हकयव्युत्पत्तिदा- यि्नीत्वेन प्रधानभूतत्वात्‌ तदज्ञांनां च नाटकादिभाणान्तसमस्तरूप कोपजीव्यत्वादू वीथी लक्षयाते । एकहार्येत्याकादपुरुषभाषितैरित्यर्थः । दिहार्येति उत्तिप्रत्युक्ति- वेचित्र्येणेत्यर्थः । आता सर्वा'च्या शेवटी सगळ्या रसांनी पूर्ण असल्यामुळे आणि विस्तृत स्वरूपाची नसल्यामुळे थोडक्यात बोध देण्यास समर्थ म्हणून तिला प्राधान्य आल्याकारणाने आणि तिची अंगे नाटकापासून भाणापर्यंतच्या सर्व रूपकप्रकारांत उपयोगी असल्याकारणाने वीथीचे लक्षण सांगतात. एकहार्या म्हणजे आकाशापुरुषभाषितांनी सिद्ध केळेली असा अर्थ. द्विहार्या म्हणजे उक्ती व प्रयुक्ती यांच्या वैचित्र्याने सिद्ध झालेली असा अर्थ. 'नाटकादि-” ही मुळातील “नाटिकादि-' ची दुरुस्ती आहे. वीथ्यड्ठांचा उपयोग नाटक व प्रकरण यांत होत नाही असा जो ह्या पाठाचा अर्थ होतो तो अस्वीकार्य आहे. अनेक वीथ्यज्मांची उदाहरणे अभिनवगुप्तानें वेणीसंहार नाटकातील दिळी आहेत. आणि 'समस्तरूपक* या शब्दाने 'नाटकादि- असाच पाठ बरोबर ठरतो. - 'एकहार्येत्या- ही सुद्धा मुळातील “एक- हार्येरेत्या- ची दुरुस्ती आहे. आर्येत “एकहार्या? असा प्रथमा एकवचनी पाठ आहे आणि तोच बरोबर आहे. तेव्हा तृतीया बहुवचनात तो शब्द उद्धृत केला असल्याची शक्‍यता नाही. पुढील “-माषितेः” मुळे हा लेखनदोष उत्पन्न झालेला दिसतो. न बडोदे प्रतीत आयेच्या दुसऱ्या चरणात “तथा? शब्द नाही. पण त्यामुळे त्या चरणात पंथराच मात्रा उरतात आणि आयेंचा पूर्वार्ध उत्तरार्धासारखा होतो. असा वृत्तदोष असंभाव्य आहे. आणि काही हस्तलिखितांत 'तथा? शब्द आढळतोच. प्रस्तुत आयेनंतर बडोदे प्रतीत एका आर्येचे पुढील दोन चरण अधिक आढळतात - 'अधमोत्तममध्याभियुक्ता स्यात्परकृति- भिस्तिस्रभिः।? यापैकी दुसऱ्या चरणात पंधरा मात्रा आहेत, त्यावरून हा कोणत्या तरी आरयेंचा उत्तरार्ध ठरतो. तिचा पूर्वार्ध कोठे आढळत नसल्यामुळे हा उत्तरार्ध अधांतरी असल्यासारखा दिसतो. शिवाय वीथ्यज्भांच्या बिवरणाच्या शेवटी अमिनबगुप्तांने तीन प्रकृतींच्या योजनेसंबंधात कोहूलाचे मत उद्धृत केळे आहे. तेथे आर्येच्या ह्या उत्तरार्धातील शब्दच अनुष्टरथ्‌ छंदात परिवतित झालेले आढळतात. यावरून असे अनुमान निघते की कोहलानंतर हा आर्याधे नास्य- शास्त्रात प्रक्षित झाला असावा. आश्चर्याची गोष्ट अशी की संपादकांनी हा उत्तराधे पूर्वाथ मानून पुढील आर्येचा पूर्वार्ध तो उत्तरार्ध करून आर्या बनविली आहे. आणि अशी प्रक्रिया पुढे चाळू ठेवली आहे. त्यामुळे एके ठिकाणी आर्येचा उत्तरार्ध व अनुष्टभ॒ छंदाचे दोन चरण मिळून . एक टोक आणि दुसऱ्या ठिकाणी अनुष्डुमाचे दोन चरण व आयेंचा पूर्वा मिळून एक 'होक असे झालेले दिसून येतात. हे सर्व विल्क्षण वाटते. उद्घात्यकावलगितावस्पन्दितनाल्यसतमलापाश्र । वाक्केल्यथ भपश्वो मृदवाधिबले छलं त्रिगतम्‌ ॥ १०३ ॥ १८.१०३-१०५ | १३९ व्याहारो गण्डय़ त्रयोदश्याज्ञान्युदाहतान्यस्याः । अथ बीथी संपोक्ता लक्षणमेषां प्रव्ष्यामि ॥ १०४॥ उद्घात्यक, अवलगित, अवस्पन्दित, नाली, असत्मलाप, वाक्केळी, प्रपक्च, मृदव; अधिबल, छल, त्रिगत, व्याहार आणि गण्ड ही ह्या वीथीची तेरा अंगे सांगितली आहेत. वीथीचे वर्णन केळे आहे. आता ह्या अंगांचे लक्षण सांगतो. अड्डान्याहिशिति- उद्धात्यकावळगितावस्पान्दितनाल्यसत्पळापाश्थ । वाक्केल्यथ प्रपश्ची मदवाधिबलळे छळं तिगतम्‌ ॥ व्याहारो गण्डश्व त्रयोदशाडान्युदाहृताने । इति । इत्युदाहरणमात्रमेतरदिति यावत्‌ । त अंगांचा निर्देश करतात - उद्‌घात्यक, अवलगित, अचवस्पन्दित, नाळी, असललाप; वाक्केळी, प्रयब्च, मृदव, अधिबळ, छळ, त्रिगत, व्याहार आणि गण्ड ही तेरा अंगे सांगितली आहेत. ' उदाहृतानि' म्हणजे ही केवळ उदाहरणे म्हणून सांगितली आहेत. 'उदाहरणमात्रमेततः याचा असा अर्थ होतो की बीथीची याहूनही अधिक अंगे असू शकतात. पण तसे इतरत्र कोठे सूचन नाही. पुढील आर्येबरील टीकेत 'उदाह्ृत' म्हणजे प्रतिव्चन असा अर्थ केला आहे. 'उदाहरण' शब्दाचा येथे तोच अर्थ अभिप्रेत असण्याचा संभव आहे. काशी प्रतीत आणि तदनुसार डॉ. घोष यांच्या आवृत्तीत बीथ्यंगांची ही नावे अनुष्टम्‌ छंदातील छोकांत दिली आहेत. पदानि त्वगताथाने यन्नराः पुनरादरात्‌ । योजयन्ति पदेरन्ये स्तदुद्धात्यकमुच्यते ॥१०५॥ ज्यात अर्थ स्पष्ट नसलेल्या शब्दांचा मनुष्य आदराने दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडतात त्याला उद्‌घात्यक असे म्हणतात. एतानि क्रमेण लक्षयति पदानि त्वगताथांनीति । १ ब ये नराः, का यैनरा:. १२२ नाट्यशास्त्र नन्वेषामुत्तिवेचित्र्यरूपत्वं चेछक्षणाळडारादिभश्यः को भेदः, इतिवरृत्तोपक- रणरूपत्वे तु संध्यज्षेथ्यः कथमन्यता । रसोपकरणतायां वृत्त्यद्रेष्वन्तर्भावः । न चैतब्यतिरिक्तमेषां सामान्यलक्षणमास्त । तत्र केचिदुक्तठक्षणादिविदोषरूपत्वमे- वेषां प्रतिपन्नाः । विवेचकास्तु तद्यतिरिक्तान्येवेतानीत्याहः । तथाहि प्रश्नप्रतिवचन- योरन्याभिप्रायरूपेण योगेन यद्दैचित्र्यं तद्दीश्यडरम॒ । अत एवोंदाह्तानीत्येषां सामान्यलक्षणम्‌ । उदाहृताने प्रतिवचनानीत्य्थः । तानि च सरवाणे प्रतिवचन- शून्यस्य काव्यस्याभावात्‌ तेन विचित्राणीति लभ्यन्ते । अत एव वीथी पाडूःर- न्योत्तरासहिष्णुत्वादू विचित्रोक्तिप्रत्युक्तिगर्भत्वात्‌ । लक्षणालड्ठारादीनां तु नोक्ति- नियतं रूपमिति विदोषः । तत्र यदा विवक्षितमुत्तरं दातुं शक्तो5यं स्यादिति, यन्मम मनसि वर्गते तदेव वक्ति न वेत्येवमादिना निमित्तेन यदा प्रश्‍ेच प्रतिवचनगतं वैचित्र्यमभि- संधाय पृच्छाते प्रतिवक्युचितमभिधत्ते तदा तदुत्तरमुद्धात्यकम । प्रश्नात्मके उद्घाते साध्विति यत्‌, तत्राज्ञातार्थे कः । पदान्यर्थगतानि प्रश्नरूपाण्यादरात्कृताने पर्यायेः पदान्तरेरत्तररूपेः नराः सुघियो योजयाम्त तदुत्तरपदस मूहात्मकमुद्धा- त्यकम्‌ । यथा पाण्डवानन्दे - का भरूषा बलिनां क्षमा परिभवः को यः सकुल्येः कृतः किं दुःखं परसंश्रयो जगति कः छाघ्यो य आश्रीयते । को मृत्युन्यसनं शुचं जहाति के येनिर्जिताः शात्रवः केविज्ञातमिदं विराटनगरच्छन्नस्थितैः पाण्डे: ॥ 'पदानि त्वगतार्थानि! इत्यादीत ह्या अंगांची क्रमाने लक्षणे सांगतात. येथे आक्षेप -उक्तीचे वैचित्र्य हेच जर ह्या अंगांचे स्वरूप असेळ तर लक्षण, अलंकार इत्यादोंहून यांची भिता कोणती ? इतिवृत्ताचे साधन असे यांचे स्वरूप असेळ तर संध्यद्ांहून यांची भिन्नता कशी? रसांचे साधन म्हणून असतील तर त्यांचा वृत्त्यज्ठांत समावेश होईल. आणि ह्याव्यतिरिक्त यांचे सामान्यळ्क्षण असे काही नाही. या संबंधात काही टोकाकार ही अंगे निर्दिष्ट केलेल्या लक्षण आदींचीच विशेष रूपे होत असे मान्य करतात. परंतु जे वित्रेचक आहेत ते ही त्यांहून निराळीच आहेत असे म्हणतात. याचे स्प्टीकरण असे - प्रश्न आणि उत्तर यांचा निराळ्याच अभिप्रायाने संयोग झाळा असता जे वैचित्र्य येते ते वीथीचे अंग. म्हणूनच “उदाहृतानि? हे यांचे सामान्य लक्षण, उदाहृत म्हणजे प्रतिवचन असा अर्थ. आणि प्रतिवचनरहित काव्य नसल्याकारणाने ती सर्व अंगे १८.१०५ | १३३ त्या प्रतिवचनामुळे वैचित्र्ययुक्त अशी बनतात. म्हणूनच वीथी म्हणजे पंक्ती होय, कारण तिच्यात दुसरे उत्तर सहन केळे जात नाही आणि वैचित्र्ययुक्त उक्ती व प्रत्युकक्‍्ती तिच्यात अन्तर्भत असतात. परंतु लक्षण, अलंकार आदींच्या बाबतीत असे उक्तींनी निश्चित कर आळ केलेले रूप नसते हा फरक. त्यांपैकी जेव्हा ' विवक्षित उत्तर देण्यास हा समर्थ असेळ काय?' “माझ्या मनात जे आहे तेच उत्तर हा देईल की नाही ?' इत्यादी कारणांमुळे प्रश्न विचारणारा'च प्रतिवचना- तील वैचित्र्य लक्षात घेऊन विचारतो आणि उत्तर देणाऱ्याला उचित असे शब्द बोलतो तेव्हा ते त्याचे उत्तर म्हणजे उद्‌घात्यक होय. प्रश्न असा अर्थ असलेल्या उद्घात शब्दाला साधु ह्या अर्थाचा यत्‌ प्रत्यय आणि नंतर अज्ञात ह्या अर्था क प्रत्यय लावला आहें. अथयुक्त पदे म्हणजे प्रश्नस्वरूप राब्द आदराने वापरले असता दुसऱ्या उत्तराच्या स्वरूपाचे राब्द नर म्हणजे हुशार मनुष्य योजतात तेव्हा तो उत्तररूप शाब्दांचा समूह म्हणजे उद्‌घात्यक. उदाहरणाथ, पाण्डवानन्द नाटकात - 'बलिष्ठ मनुष्यांचे भूषण कोणते १ क्षमा. परिभव कोणता? जो आपल्याच कुलातील माणसांनी केलेला असतो तो. दुःख कोणते £ दुसऱ्या'चा आश्रय घेणे. जगात झछाघनीय कोण ? ज्याचा इतर आश्रय घेतात तो. ग्रृत्यू कोणता ? व्यसन. शोकापासून कोण मुक्त होतात? ज्यांनी शत्र जिंकळे आहेत ते. हे सर्वे कोणाळा समजले आहे? विराटा'च्या नगरीत गुप्तपणे राहिलेल्या पांडवांना.' "लक्षणालड्लारादिभ्यः? काव्याची छत्तीस लक्षणे आणि चार अलंकार ह्यांचे वणन नाटयशास्त्राच्या सोळाव्या अध्यायात आहे- - 'कथमन्यता' मुळात 'कथमन्यतो? आहे. पण 'अन्यतः' चा काही अर्थ लागण्यासारखा नाही. - 'प्रश्प्रतिवचनयोः इ०? म्हणजे वीथ्यज्ञाचे व्यवच्छेदक लक्षण प्रश्न आणि त्या'चे उत्तर यातील वैचित्र्य; हे वैच्तिय त्यांच्या अनपेक्षितपणामुळे उत्पन्न होते. - 'उदाह्तानि प्रतिवचनानी- त्यर्थः? या ठिकाणी 'उदाहूत? शब्दाचा प्रतिवचन असा अर्थ केला आहे. -'तानि' यात वीथ्यज्धांचा निर्देश आहे. -- तेन? म्हणजे प्रतिबचनाने. - “अन्योत्तर म्हणजे नेंहमीचे साधे सरळ उत्तर. “प्रतिबचनगतं? मुद्रितात 'प्रतिबचन? एवढेच आहे. पण 'वैच्तियम' चे बिशोषण म्हणून हस्तलिखितातीलळ पाठ आवद्यक आहे. -'प्रतिवक्‍्त्रचितम? मुळात 'प्रतिवक्तोचितमः असे आहे. पण प्रतिवक्ता असे प्रथमान्त रूप संभाव्य नाही. वाक्यात 'प्रष्टा हा कर्ता अगोदरच निर्दिष्ट झाला आहे. आणि प्रतिवक्त आणि उचित यांचा समास येथे आवद्यक आहे. - “साध्विति यतः पा- णिनीच्या 'तत्र साधु? (४.४.९८) ह्या सूत्राप्रमाणे “यत? म्हणजे य प्रत्यय लागून “उद्‌घाते साघुः या अर्थी उद्‌घात्यः असे रूप बनठे. - 'अज्ञातार्थे कः पाणिनीच्या 'अज्ञाते? (५.३.७२) ह्या. सूत्ताप्र- माणे 'क? प्रत्यय लागून 'अज्ञातः उद्‌धात्यः उद्‌घात्यकः' असे रूप बनले आहे. मुळात 'कन? आहे. पण अज्ञातार्थी प्रत्यय 'क' आहे, 'कन्‌? नाही. - 'अर्थगतानि? याबरून असे दिसते की अमिनवयुत्ताने आर्येत “पदानि तु गतार्थानि? असा पाठ स्वीकारला होता. नाय्यशास्त्राच्या काही हस्तलिखितांत तसा पाठ आढळतो. तो पाठ मूळ असणे असंभाव्य नाही. काही शब्द स्वतंत्रपणे अपूर्ण असले तरी १२४ नाट्यशास्त्र चमत्कृती उत्पन्न करण्यासाठी त्यांच्याबरोबर इतर आणखी शब्दांची योजना केली म्हणजे ते उद्घा- त्यक असा अर्थ होऊ शकेळ. अमिनवगयुस्ताने अर्थातच गतार्थ पद म्हणजे प्र्न आणि पदान्तर म्हणजे प्रतिबचन असे अथे केळे आहेत. 'अगतार्थानि' या पाठानें असा अच होतो कीं काही शब्दांचा अर्थ स्पष्ट नसल्यामुळे जेव्हा वक्ता किंबा इतर कोणी दुसरे शब्द जोडून काही एक अर्थ सिद्ध करतात तेव्हा ते उद्‌घात्यक होय. मूळ आर्येत पुढे 'ये नराः” असा पाठ बहुतेक हस्तलिखितांत आहे. पण ये? ला अनुरूप असे संबेधदर्शक सर्वनाम मुख्य वाक्यात उपयोग करण्यासारखे नाही. म्हणून “यत्‌? पाठ स्वीका- रला आहे. उद्‌धात्यक, अवलगित आणि अवस्पन्दित ह्या तिहींच्या व्याख्या अनुष्टुभ्‌ छंदात आहेत. बाकीचा सर्व अव्याय आर्या वृत्तात आहे. बीथीची पहिली दोन अंगे आमुखाची म्हण- जे प्रस्तावनेचीही अंगे आहेत असे पुढे २०.३३ मध्ये म्हटले आहे. इतर आमुखांगांची तेथे दिलेली लक्षणे अनुष्ट्म्‌ छंदातच आहेत. तेव्हा ही दोन अंगे मूळ आमुखाची असून तेथील त्यांच्या व्याख्या येथे तशाच उद्धृत केल्या आहेत असे दिसते. 'को य: आणि “-नगरच्छन्न” हे हस्तलिखितातीलळ पाठ आहेत. मुद्रितात 'कोड्यं! आणि “-नगरेच्छन्न” असे पाठ आहेत. यत्रान्यस्मिन्समावेळ्य कार्यमन्यठसाध्यते । ४" २) $ क्ताभि तच्चावलगितं नाम विज्ञेयं नाख्ययोक्तमिः ॥ १०६ ॥ ज्यात एका कायोत समावेश करून दुसरे कार्य सिद्ध केळे जाते ते अवलगित होय असे नाट्याची योजना करणारांनी जाणावे. यत्नान्यस्मित्निति । यत्रोत्तरे दीयमाने अन्यानुसंधानपूर्वके5प्यन्यत्कार्य सिध्याते तदन्यकायीवळगनादवलगितम्‌ । यथा “अवि सुहाआदि दे लोअणा- णां' इति विदूषकेण पृष्टे 'सुखयतीति किमुच्यते, कूृच्छेणोरुयुगम? इत्या द्युत्तरं वसन्तकभत्यायनोद्दिरोन प्रद्रत्तमपे सागरिकागतमास्थाबन्धजीवितं सुख्यं शुढ्ठा- राख्यं काये साधयतीति । ह “यत्रान्यस्मिनू' इत्यादी. जेथे एका गोष्टीचे अनुसंधान करून उत्तर दिळे जात असतानाही दुसरी गोष्ट सिद्ध होते तेथे ते दुसरे कार्य चिकटल्यामुळे अवलगित असे म्हणतात. उदाहरणाथ, रत्नावलीच्या दुसऱ्या अंकात 'याने तुझ्या नेत्रांना सुख होते काय £' असे विदूषकाने विचारळे असता राजाचे “सुख होते म्हणून काय सांगावयाचे ? कष्टाने १ का प्रशास्यते. १८,१०७ | १३५ ऊरुयुगळ' इत्यादी उत्तराचे वचन वसन्तकाची खात्री पटविण्याच्या उद्देशाने उच्चारलेले असले तरी सागरिकाविषयीचे प्रेम प्राणभूत असलेले जे मुख्य शुंगाररूपी कार्य ते साध्य करते. “तदन्य- मुद्रितात 'तदान्य> आहे. - 'कृच्छेणोर्युगं इ०' संपूर्ण छोक असा - कुच्छादूर्युगं व्यतीत्य सुचिरं भ्रान्त्वा नितस्बस्थले मध्ये5स्यास्त्रिवलीतरकृविषमे , निष्पन्द्तामागता । मद्डष्टिस्त्षितेव संप्रति शनेरारुदह्य तुझी स्तनो | साका&६क्षं मुदुरीक्षते जळलवप्रस्यन्दिनी लोचन्ने ॥ (रत्नावली, २.१०). आध्षिप्ेथ्थे तु कस्मिश्रिच्छुभाशुभसमुत्थिते । कोशलादुच्यते5न्यो्थस्तदबस्पन्दितं भवेत्‌ ॥ १०७॥ कोणता तरी आ्ुभसूचक किंवा अश्युभसूचक अर्थ निर्दिष्ट झाळा असता खुबीने त्याचा दुसरा अर्थ सांगितला जातो तेव्हा ते अवस्पन्दित होते. आक्षिस्ते त्विति । शुभाझुभं देवं तेनाबुद्धिपूर्वक कुत्रचिदर्थे आक्षिप्ते5- पि कौरालात्तत्म्रच्छादनेच्छया यत्नात्तरे$न्यो5थ उच्यते तदवस्पन्दितम, चश्षुः- स्पन्दनादिवद्न्तगंतसूचनीयसंभवात्‌ । यथा - सत्पक्षा मधुरगिरः प्रसाथेताशा मदोद्धतारस्भाः । निपतन्ति धातराष्ट्राः काळवशान्मेदिनीपृष्ठे ॥ (वेणीसंहार, १.९). अन्न दैववशादयम्थ आयातः - सत्पक्षे अमधुरा गीर्येषां ते, तथा प्रकर्षेण साधिताः आधिसहिताः येर्दिशाः कृताः चतराष्ट्रात्मजाः पतन्तीति । तत्रोत्तरं “प्रतिहतममडठुलम! । पुनः सूत्रधारः “ननु शरत्समयवर्णनया हंसान्‌ धातराष्ट्रा इति व्यपदिद्यांमि” इत्यादि अवस्पन्दितमेव सूचयति “न खळु न जाने, किन्त्व- मड्ठुलत्वादाशाद्षतमेंव मे हृदयम? इति । “आक्षिप्ते तु' इत्यादी. शुभ आणि अशुभ म्हणजे दैव. त्याने बुद्धिपुरःसर नसलेला असा कोणता तरी अर्थ निघत असताही कौशल्याने तो गुप्त ठेवण्याच्या इच्छेने उत्तरात जेथे दुसरा अर्थ सांगितला जातो ते अवस्पन्दित, नेत्रस्फुरणाप्रमाणे आतील गोष्टीच्या सूचनेचा त्यात संभव असतो म्हणून. उदाहरणाथ, वेणीसंहारा'्या प्रस्तावनेत “चांगले १ का आक्षिप्य कंचिदर्थ तु शुभाशुभसमुत्थितम्‌ । यत्सुजेदूद्धिवेशद्यात्‌ १२६ | | | नाट्यशास्त्र पंख असलेले, गोड आवाज असलेले, दिशा सुशोभित करणारे आणि मदामुळे उद्भत अशी क्रीडा करणारे हंस कतुमानानुसार पृथ्वीतलावर अवतीणे होतात! हे सूत्रधाराचे वचन. यात दैवयोगाने पुढीळ अर्थ निघतो - सञ्जनोंच्या पक्षासंबंधी ञ्यांची वाणी कटु असते, तसेच प्रकर्षाने साधित म्हणजे आधिसहित अशा दिशा ज्यांनी केल्या आहेत ते घुतराष्ट्रा'चे पुत्र जमिनीवर पडतात. त्यावर पारिपार््वकाचे उत्तर “अमंगळ दूर होबो' असे आहे. तेव्हा सूत्रधार पुन्हा “मी तर शरद्तूच्या वर्णनात हंसांचा धातराष्ट्र म्हणून निर्देश केला आहे” इत्यादी शब्दांत अवस्पन्दितच सूचिंत करतो. तेव्हा पारिपाश्वक म्हणतो “ते मळा माहीत नाही असे नाही. तथापि अमंगलाच्या सूचनामुळे हृदय भीतिग्रस्त होते'च.' आक्षिस्ते त्वितिः -आर्येतील “ब्थे? ळेखनदोषामुळे उद्धत झाले नाही. - 'उत्तेरेडन्यो5थ: मुद्रितात 'उत्तरो' आहे. पण सप्तमी आवद्यक आहे. अमिनवगुप्ताने बीथ्यक्ले मुख्यतः प्रश्‍नोत्तर स्वरूपाची मानळी आहेत आणि त्यांपैकी जे उत्तर किंवा प्रतिबचन ते बीथ्यद्भः असे त्यानें म्हटले आहे. - सूचित अर्थासाठी 'सतक्षामधुरगिरः असा एक: समास मानला आहे तत्नोत्तरं इ०' म्हणजे पायिाश्वंकाचे हे उद्गार आक्षिप्त अर्थ लक्षात आणून दिलेल्या उत्तराच्या स्वरूपाचे आहेत. - 'हंसान? हस्तलिखितात 'हंसानि' आहे. ते अर्थात बरोबर नाही. म॒द्रितात हंसानभस्तल॑॑' असे आहे. तेही बरोबर नाही. अवतरणात नभस्तळ अनावश्यक आहे आणि द्वितीयेत त्याचा निर्देश असंभाव्य आहे. - 'न खलु न जानें इ०' पारिपाश्ववाचे हे वचन सुद्धा उद्धत करण्याचे काही प्रयोजन आहे असे दिसत नाही. - वेणीसंहाराच्या सच्या उपल्ब्ध असलेल्या प्रतींत व अमिनवगुप्ताने दिलेल्या अवतरणात थोडी पाठमिन्नता आढळते. हास्येनोपगतार्था प्रहोलिका नालिकेति बिज्ञेया । एकद्विप्रतिषचना बाकेली स्यात्रयोगे5स्मिन्‌ ॥ १०८ ॥ हास्य उत्पन्न करणारा अर्थ असलेली जी कूट उक्ती ती नाळिका असे समजावे. या नाठ्याच्या प्रयोगात दोन प्रश्नांचे एक प्रतिब्चन असलेली ती वाक्‍्केली होय हास्येनोपगतार्थाते । प्रहेळिका परावेतारणकारि यदुत्तरे अत एव हास्य- युक्ता सा नालिका प्रणालिकाव्याजेत्यर्थः । प्रकर्षेण हेलिका नमादिक्रीडारूपं _ यस्याः सा प्रहेळिका । यथा, सुसंगता - जस्स किदे तुमं आअदा सो एत्थ एव्व चिट्ट्दि । सागरिका - सहि, कस्स किदे । सुसंगता - (सहासम्‌) अइ - 'ण॑ चित्तफलअस्स । अनया भड्या आच्छादितं च गर्भगतं द. 2 हो. का तह कट । प > , भत 1) . टर... १८.१०८ १२७ एकटद्विप्रातेवचनांते । एकं डइयोः प्रतिवचनमस्याम्‌ । द्विग्रहणमनेकापलक्ष- णम्‌ । तदमुना सवंप्रश्नोत्तरवर्गः रस्वाकूतः । यथा - नदांनां मेघविगमे का शोभा प्रतिभासते । बाह्यान्तरा विजेतव्याः के नाम कृतिनो5रयः ॥ : हास्येनोपगतार्था' इत्यादी. प्रहेलिका म्हणजे दुसऱ्याला फसविणारे असे उत्तर म्हणूनच हास्ययुक्त, तीच नालिका, प्रणाळिकेच्या रूपात असा अशथे. प्रकर्षाने हेलिका थट्रामस्करीच्या स्वरूयाची जिच्यात असते ती प्रहेळिका. उदाहरणाथ, रत्नावळीच्या दुसऱ्या अंकात सुसंगता म्हणते “ज्याच्यासाठी तू आलीस तो येथेच आहे.' सागरिका विचारते “मी कोणासाठी आले आहे त्यावर सुसंगता हसून उत्तर देते, 'अग भलती शंका घेणारी, ह्या चित्रफळकासाठी.! ह्या उत्तिवैचित्र्यामुळे गोष्ट झाकलेळी आणि आतल्या आत राहाते. : एकद्विप्रतिवचना' इत्यादी. दोन प्रश्‍नांचे एकच उत्तर जिच्यात असते ती वाक्‍्केली. दोन हा शब्द अनेकाचे उपलक्षण आहे. म्हणून ह्याने सर्व प्रश्‍नोत्तरांचा समूह निदर्शित होतो. उदाहरणार्थ, 'मेघ निघून गेल्यावर नद्यांत कोणती शोभा भासमान होते? कृतकृत्य मनुष्याने बाह्य आणि आभ्यन्तर अशा कोणावर विजय मिळविला पाहिजे? उत्तर रयः म्हणजे वेग आणि 5रयः म्हणजे रात्रू.' 'वितारण' हा शब्द 'प्रतारण? या अर्थी वापरला आहे, पण किंचित तोग्य अर्थाने. - “प्रणालिकाव्याजा? प्रणालिका म्हणजे पन्हळ, तिची प्रस्तुत संदर्भात समर्पकता स्पष्ट नाही. - “आच्छादित च गर्मगतं च? ह्या दोहोंच्या अर्थात विशेष फरक नाही. शोवटच्या “रय: मध्ये दोन्ही प्रश्‍नांचे उत्तर आहि. प्रस्तुत आर्या नि्णयसागर प्रतीत अशीच व काशी प्रतीत किंचित फरकाने आढळते. पण बडोदे प्रतीत तिच्या दोन अर्ध्या भागांच्या मध्ये पुढील १०९ बी आर्या घातलेली दिसून येते. अमिनवगुप्ताच्या टीकेत बडोदे प्रतीचाच क्रम अनुसरठेला आढळतो. आणि तो क्रम वीथ्यद्भां- च्या उद्देशात दिलेल्या अनुक्रमानुसार आहे हे खरे आहे. पण तो क्रम स्वीकारणे अदक्‍्य आहि. प्रस्तुत आर्येचा पूर्वा धे व पुढील आर्येचा उत्तराधे दोन्हींत बारा अधिक अठरा मात्रा असल्यामुळे त्यांची मिळून एक आर्या बनणे शक्‍य नाही. तसेच पुढील आर्येचा उत्तराध व प्रस्तुत आर्येचा उत्तराध॑ मिळूनही एक आर्या होणे शक्‍य नाही. आणि नार्यक्शास्रकाराने चुकी- च्या आर्या रचल्या होत्या असे मानणे अशक्य आहे. उदेशातील अनुक्रमाच्या अनुरोधाने कोणीतरी मागाहून हीं उळटापाळट केलेली आहे हे उघड आहे. अमिनवराुप्ताच्या अगोदर ही उलटापालट झाली असण्याची शक्‍यता आहे. पण वृत्तमंग झालेल्या आर्या त्याला स्वीकाये झाल्या असतील हे असंभाव्य वाटते. असे अधिक शक्‍य आहे की त्याच्या टीकेची प्रत १३८ नाट्यशास्त्र करणाऱ्या कोणा लेखकाने उद्देशातील अनुक्रम लक्षात घेऊन ह्या आर्थेवरीळ त्याची टीका अलग करून उत्तरार्धावरील टीका १०९ व्या आयेंबरील टीकेनंतर घातली आहे. प्रस्तुत आर्या नाट्यशास्त्राच्या अनेक हस्तलिखितांत अ्याच स्वरूपात आढळते. तेव्हा ती तक्लीच स्वीकारून तिच्या दोन भागांवरील अमिनवगुप्ताची टीका एकत्र आणली आहे. बडोदे प्रतीत आर्या निश्चित करताना दृत्ताकडे मुळीच लक्ष दिळे नाही. दोन ठिकाणी तर आर्या व अनुष्टुथ एकत्र आणून कोक बनविले आहेत. मूखजनसंनिकर्षे हितमपि यत्र प्रभाषते विठ्ठान । न च ग्र॒द्मते$स्य घचनं विज्ञेयो5सत्मठापोञ्सौ ॥ १०९ ॥ ज्यामध्ये विद्वान मनुष्य मूर्ख लोकांच्या समोर हितकर असे वचन बोलतो आणि त्याच्या त्या वचनाचा अर्थ समजला जात नाही तेव्हा तो असखळाप होय असे समजावे. मूखेजनसंनिकर्ष इति । यदुत्तरं मूर्ख प्रति वस्तुतो हितमपि शब्दच्छ- लाद्यथा प्रियं, ताहशं च मूर्खेः प्रियांशोन ग्रह्मते न तु हितांशेन । तथाभूत- भज्ञीभूतद्दयाश्रयणं च विद्वत्त्वात्करोति । एवं हि तात्कालिकः कोपो5पि रक्षितो भर्वाते प्रियाभेधायित्वात्‌, काळान्तरसंभाव्यश्व यथार्थामिधायित्वात्‌ । यथा व्यसानेना राजपुत्रेण मन्त्रिपुत्रेण किं सुखमिति प्ेनोत्तर॑ दीयते - सर्वथा यो5क्षविजयी सुरासेवनतत्परः । ९ « , ७ $ ५२ तस्याथांना सुखानां च समराद्विः करगामिनी ॥ इति । असतो5साधुभूतस्य वस्तुनः प्रहपनमस्मित्नित्यसत्प्रलापः । “मूखजनसंनिकर्षे' इत्यादी. जे उत्तर मूर्खाळा उद्देशून वास्तविक हितकर असले तरी राब्द-छ्ेषामुळे प्रीतिकर असल्यासारखे वाटते, आणि ते तसले उत्तर मूख लोक त्यातील रुचकर अंशाने घेतात, हितकर अंशाने नाही ते उत्तर असखळाप. तक्गा तऱ्हेच्या द्यर्थी राब्दरचनेचा आश्रय विद्त्तेमुळे घेतो. कारण त्यामुळे रुचकर बोळले असल्यामुळे तात्कालिक कोपापासून रक्षण होते आणि सत्य तेच सांगितले असल्यामुळे कालान्तराने होणाऱ्या संभाव्य कोपापासूनही. उदाहरणार्थ, व्यसनी राजपुत्राने सुख कशात आहे?' असे विचारल्यावर मन्त्रिपुत्र उत्तर देतो - “जो सर्वप्रकारे द्यूतात विजयी होतो (पक्षी, इन्द्रियांवर जय मिळवितो) आणि मद्याचे सेवन करण्यात (पक्षी, देवांची सेवा करण्यात) तत्पर असतो त्याच्या हाती अर्थाची आणि सुखाची समृद्धी आपोआप चाळून येते.' असत्‌ म्हणजे जी चांगळी गोष्ट नाहो तिचे प्रतपन यात असते म्हणून असत्मलाप म्हटले आहे. | १८.११० १३९ 'विद्वत्त्वातः मुद्रित पाठ 'सिद्धत्वातः आहे. पण आर्येतील 'विद्वान' शब्द लक्षात घेता हस्तलिखितातीळ पाठच बरोबर आहे यात संशय नाही. - 'मन्त्रिपुत्रेण' हा शब्द हस्तलिखितात आहि. मुद्रितात नाही. मूळ पाठ 'मन्त्रिगाः' असाच असण्याचा दाट संभव आहे. मंत्र्याला असा प्रश्न विचारण्याचा अधिक संभव आहे, मंत्रिपुत्राला नाही. “राजपुत्रेण”' शब्दातील 'पुत्रण* शाब्दा- ची पुढील शब्दात चुकीने द्विरुक्ती झालेली दिसते. - 'पृष्टेन' च्या ऐवजो मुद्रितात 'पृष्टे तेन असे आहे. पण 'तेन? म्हणजे कोणी याचा त्यात उल्गडा होण्यासारखा नाही. येथे शब्द पुढेमागे झालेले दिसतात. 'राजपुत्रेण किं सुखमिति पृष्टेन मन्त्रिणोत्तरं दीयते! असाच सूळ पाठ असावा. यदसड्धूतं वचनं संस्तवयुक्त इयोः परस्परतः । एकस्य चार्थहेतोः स हास्यजननः प्रपश्वः स्यात्‌ ॥ ११०॥ ज्यात दोघांमध्ये खरी नसलेली, स्तुतीने युक्त व एकाचे प्रयोजन सिद्ध करण्यासाठी परस्परांत वचने उच्चारली जातात तो हास्य उत्पन्न करणारा प्रपंच होय. यद्सद्भूतामेति । यथा रत्नावल्याम्‌ 'सुसंगते, कथमहमिहस्थो भवत्या ज्ञात” इति राजन्युक्तवति सुसंगतयोच्यते 'ण केवळं भट्टा, चित्तफलहेण, ता देवीए णिवेदइस्संः इत्यादौ आभरणदानपयंन्ते प्रपश्चवः । तथा हि दृयोः सागरिकासुसडठःतयोः सागरिकानायकयोः राजसुसंगतयोः राजविदूषकयोः पर- स्परसंबन्धमाश्रित्यासद्धूतमसत्यं देव्ये निवेदयामीत्युक्तस॒ । संस्तवश्ध तत्रास्ति 'भट्रिणो पसादेण कीळिदं मए' इति । हास्यमपि परिहासरूपं विद्यते । एकस्य च राज्ञो$र्थे प्रयोजने सागारकासंगमे हेतुभवत्येवेते अन्यथाभिघानात्प्रपश्चः । 'यदसद्भूतम्‌” इत्यादी. उदाहरणाथ, रत्नावलीमध्ये 'सुसंगते, मी येथे आहे हे तुम्हाला कळले का?' असे राजाने विचारल्यावर सुसंगता म्हणते, ' केवळ राजेसाहेब आहेत एवढेच कळले नाही, तर चित्रफलकाची गोष्टही कळळी आहे. तर आता मी जाऊन राणीसाहेबांना सांगते' येथपासून तिळा अलंकाराचे दान करीपर्यंतचा भाग प्रपंच होय. कारण, तेथे दोघांच्या म्हणजे सागरिका आणि सुसंगता, सागरिका आणि नायक, राजा आणि सुसंगता, राजा आणि विदूषक यांच्या परस्परसंबंधाळा अनुलक्षूण असद्भूत म्हणजे असत्य “मी राणीसाहेबांना सांगते' हे वचन आहे. आणि “राजेसाहेबांच्या कृपाप्रसादाने मी थट्टा केळी आहे! या वचनात तेथे स्तुती सुद्धा आहे. आणि परिहासाच्या स्वरूपा'चे हास्य सुद्धा तेथे आहे. एकाच्या म्हणजे राजाच्या अर्थाचा म्हणजे सागरिकेशी मिलनरूप प्रयोजनाचा हेतू असतोच म्हणून दुसऱ्या प्रकारे सांगितले असल्यामुळे प्रपंच असे नाव आहे. १ ब परस्परं यत्तू, नि परस्परं यत्‌. १४० . नाट्यशास्त्र दवयोः' याच्या स्पष्टीकरणार्थ हस्तलिखितात चार जोड्यांचा निदेश आहे. त्यांपैकी 'साग- रिकानायकयोः' आणि 'राजसुसंगतयोः ह्या दोन जोड्या मुद्रितात नाहींत. पण प्रस्तुत संदर्भात याच दोन जोड्यांतील अन्तर्गत परस्परसंबंधाला महत्त्व आहे. म्हणून त्या अत्यंत आवद्यक आहेत. एक वेळ इतर दोन जोड्या बगळल्या तरी चालेल, पण ह्या वगळता येण्यासाख्या नाहीत. - कीळिदं' मुळातीळ 'किमिदंर हा पाठ भ्रष्ट आहे. - 'अन्यथामिधा नात्परपव्धः' याव- रून 'प्रपञ्च' शब्दाचा 'दुसऱ्या प्रकारे कथन' असा अर्थ केठेला दिसतो. प्रस्तुत आर्थेच्या दुसऱ्या चरणाच्या शेवटी बडोदे प्रतीत 'परस्पर॑ यत्तु' असा पाठ आहे. पण त्यामुळे त्या चरणात एकबीस मात्रा होऊन वृत्तमंग होतो. काशी प्रतीचाच पाठ योग्य थात शंका नाही. च. हळ यत्कारणाहुणानां दोषीकरणं भवेद्रिवादकृतम । €-__. ५ दोषगुणीकरणं वा तन्मृदवं नाम विज्षेयम्‌ ॥ १११॥ ज्याच्यामुळे विवादाच्या प्रसंगाने गुणांना दोषांचे स्वरूप दिळे जाते अथवा दोषांना गुणांचे स्वरूप ते मृदव होय असे समजावे. यत्कारणादिति । गुणानां दोषत्वं दोषानां वा गुणत्वं यत्र क्रियते तन्मू- दवम्‌ । विवादकृतमित्यनेन लक्षणाद्विशाषमाह । इदं वृत्तान्तरस्वभावमित्यर्थः । यथा, 'शिरः श्वा काको वा दुपदतनयो वा परिमृशेत? इत्यत्र दोषस्य गुणीकरणं विवादाकर्णनेन सह । 'यदि शस्त्रमाञ्झितमदास्त्रपाणयः' इत्यत्र क्णवचनेन प्रति- ज्ञातपरिपालनस्य गुणस्यापि दोषीकरणं विवादकृतमेव । मृदवामिति मदन मृदू, परपक्षमर्दनेन स्वपक्षमवति रक्षतीति । “यत्कारणातू' इत्यादी. गुणांना दोष म्हणून आणि दोषांना गुण म्हणून ज्यात दाखविले जाते ते मदव. ' विवादकूतम्‌' याने सामान्य लक्षणाहून ह्या अंगाची विशेषता स्पष्ट करतात. याचे स्वरूप दुसऱ्या वृत्तासारखे आहे असा याचा अर्थ, उदाहरणाथ, वेणीसंहारात 'मस्तकाळा कुत्रा अथवा कावळा अथवा द्रुपदाचा पुत्र कोणीही स्पर्श करील' या अश्वत्थाम्याच्या वचनात दोष गुण म्हणून निदर्शित केळा तो विवाद ऐकल्याबरोबर. “ जरी शख्राचा त्याग केला असला तरी ज्यांच्या हातात शास्र नाहीत ते! ह्या कर्णाच्या वचनात प्रतिज्ञापाठनरूपी गुणाचे दोषात रूपांतर केले आहे ते विवादामुळेच. मृदव शब्दाची व्युत्पत्ती अशी - 'मृद्‌' म्हणजे मर्दन, परपक्षाच्या मर्दनाने जे स्वपक्षाठा ' अवति' म्हणजे रक्षण देते ते मृदव. १८.१११-११२ | १४२ “लक्षणातः म्हणजे बर जे वीथ्यज्ञाचे प्रतिबचनवेचित्य असे सामान्य लक्षणे केले आहे त्याहून थोडे वैशिष्ट्यपूर्ण असे हे अंग आहे. इतर अंगांत नसलेला विवाद अथवा केलह॒ ह्याच अंगात असतो. - 'वृत्तान्तरस्वभावम्‌' ही सुचविठेली दुरुस्ती आहे. मुळात 'वृत्त्य- न्तरं स्वमावम” असे आहे. या ठिकाणी वृत्तींचा काही संबंध दिसत नाही. वृत्त म्हणजे घटना. विवाद ही इतर अंगात आढळणाऱ्या घटनांहून निराळ्या स्वरूपाची घटना आहे असे येथे म्हणावयाचे आहे. त्यासाठी सर्व मिळून एकच समास असणे आवश्यक आहे हे उघड आहि. - 'विवादाकर्णनेन सह? “विवाद? म्हणजे ह्या ठिकाणी नेपथ्यातून अश्वत्थाम्याने ऐकलेला द्रोणवधाचा वृत्तांत. तो ऐकल्यानंतत असा '“आकर्णनेंन सह' चा अर्थ आहे. दुर्योधन व कर्ण यांच्या प्रवेद्याच्या अगोदरचे हे अश्वत्थाम्याचे उद्गार आहेत. म्हणून विवाद म्हणजे कलह हा अर्थ ह्या उदाहरणात लागू नाही. वेणीसंहारातीळ हे दोन झोक असे - परित्यक्ते देहे रणशिरसि शोकान्धमनसा शिरः इवबा काको वा रपदतनयो वा परिमुदेत्‌ । स्फुरदिव्यास्त्रोघद्रविणमदमत्तस्य च रिपो- मेमेवायं पादः शिरसि निहितस्तस्य न करः॥ ३.२२. यदि रास्त्रमुज्झितमशास्त्रपाणयो न निवारयन्ति किमरीनुदायुधान । यदतेन मोलिदलने5प्युदासितं सुचिर॑ स्त्रियिव नृपचक्रसंनिधो॥ २३.११. -' मुदब शब्दाची ब्युत्पत्ती मुद्‌ -- अव अशी केली आहे. ४ परवचनमात्मनश्रोत्तरोत्तरसमुद्धवं डयोयत्त । अन्योन्यारथविशेषकमधिबलमिति तद्वुधेज्ञेयम्‌ । ११२॥ ज्यात दोन पात्रांमधीळ स्वतःची व दुसऱ्याची उत्तरोत्तर होत जाणारी वचने परस्परांच्या अर्थात विशेषता उत्पन्न करतात ते अधिबळ होय असे सुज्ञ मनुष्यांनी समजावे. परवचनमात्मनश्वेति । परस्य वचनमात्मनश्व वचनं परस्परमथंविशेष- लाभो यत्र भवति इत्युत्तरोत्तरस्याधिकाधिकस्याथेस्य समुद्धवो यत्न तदधिब- ठम्‌ । एतदुक्तं भवति । यकत्नीक्तिप्रत्याक्तक्रमे क्रियमाणे परस्परप्रज्ञानोपजीवन- बलात्‌ स्वपक्षसुघटितता, तह्ठलसंबन्धादघधिबळम्‌ । यथा नागानन्दे 'रागस्या- १ नि -यंत्र. १४२ कि | नाट्यशास्त्र स्पदामेत्यवोमि” इत्यादेत आर्य विदूषकेण सहोक्तिक्रमेण स्वपक्षी द्रढिमान- मानीतो यावदाह “ननु शरीरतः प्रभृति सर्वमेव मया पेरां्थ पीरपाल्यते' इति । : प्रवचनमात्मनश्व' इत्यादी. दुसऱ्याचे वचन आणि स्वतःचे वचन यांच्या परस्पर संबंधाने विशेष अर्थाचा ज्यात लाभ होतो आणि म्हणून ज्यात उत्तरोत्तर म्हणचे अधिकाधिक अर्थाची निष्पत्ती होते ते अधिबळ. याचा आशय असा - जेथे उक्ती आणि प्रव्युक्ती ह्या क्रमाने उच्चार्या जात असता परस्परांना विदोष ज्ञान देण्याची प्रक्रिया बलवान्‌ होऊन त्यामुळे स्वतःचा पक्ष सुधटित होतो; त्या बळाच्या संबंधामुळे अधिबल हे नाव दिले आहे. उदाहरणार्थ, नागानन्द नाटकात जीमूतवाहनाच्या “अनुरागाचे स्थान आहे हे मी जाणतो ! द्या उक्तीपासून सुरुवात होऊन विदूषकाबरोबरच्या संवादाच्या क्रमाने त्याची स्वतःची बाजू दृढ केली जाते जेव्हा तो अखेर म्हणतो “खरोखर, देहापासून सर्वे काही मी दुसऱ्यांसाठी बाळगीत आहे.' “सुघटितता तहूल-” हा हस्तलिखितातील पाठ आहे. मुद्रित पाठ “-सुघटितादधिबल-? असा आहे. स्वपक्षाला सुघधटितता येते म्हणजे त्या पक्षाला बळकटी येते, तो हढ होतो; आणि तो असा बलवान होतो म्हणून ह्या प्रक्रियेचे नाव अधिबळ असे अमिनवगुप्ताला म्हणावया'चे आहे. त्यासाठी हस्तलिखिताचा पाठ अधिक समपैक आहे. अधिबल्संबन्ध सुघटित होतो असे म्हटले असण्याची रकक्‍यता कमी, - नागानन्दात पहिल्या अंकाच्या प्रारंभीच हा प्रसंग आहे-- नायकः - सखे आत्रेय, रागस्यास्पदमित्यवेसि न हि मे ध्वंसीति न प्रत्ययः . कृत्याझृत्यविचारणास्य विमुखं को वा न वेत्ति क्षितो । एवं निन्ययरमपीदमीप्सितफलप्राप्त्ये भवेद्यावनं _ भक्त्त्या याति बदीत्थमेव पितरो शश्रूषमाणस्य मे ॥५॥ नायकः - किं मतडूगो राज्यं हरिष्यतीति शडसे । विदूषकः-अध इं । _ नायकः- येव ततः कि स्यात्‌ । ननु स्वशरीरात्मभृति सवे पराथमेव मय॥ परिकलट्प्यते (पाठभेद - परिपाल्यते) । अन्यार्थमेब वाक्यं छमभिसंधानहास्यरोषकरम्‌ । प्रत्यक्षवृत्तिरुक्तो व्याहारो हास्यलेशा्थः || ११३॥ १८,११३ १४२३ दुसऱ्याच अर्थाने वापरलेले वाक्‍य संबंधानुसार हास्यकर किंवा रोषकर होते तो छळ होय. प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टीविषयीचा थोडासा हास्यकारक अर्थ तो व्याहार असे म्हणतात. अन्यार्थमेव वाक्यंमिति । यद्दाक्यं प्रयोजनान्तरमुद्दिऱिय वचनसुच्यमानं कस्यचिद्दचनमन्यस्य हास्यमपरस्य रोष जनयति तच्छळम्‌ । यथा - कस्स व ण होइ रोसो दटूण पिआए सव्वणं अहरस्‌ । सब्भमरपदुमधाइरि वारिअवासे सहसु एण्हिम्‌ । एतट्चनं सखीसंबन्थि भतेप्रत्यायनं प्रयोजनमुद्दिश्य प्रयुक्त॑ तस्य पत्न्या अपि संवन्थिनां छलं विदग्धजनस्य हास्यं सपत्न्या रोषं जनयाते । __ भत्यक्षवृत्तिरिति । प्रत्यक्षरब्देन भावी प्रत्यक्ष उच्यते । तदयमर्थः । भाविनि प्रत्यक्षे$्थे देववशादू वृत्तियस्य स व्याहारः, विविधो५्थो5भिनीयते येन । यथा 'उद्दामोत्कलिकाम्‌' इत्यादि । ' अन्यार्थमेव बाक्यम्‌' इत्यादी. जे वाक्‍य दुसऱ्या प्रयोजनाच्या सिद्धीसाठी उच्चारले असता कोणाळा सरळ वचन म्हणून वाटते, दुसऱ्याला हास्यकर वाटते आणि आणखी कोणाला क्रोध उत्पन करते ते छळ. उदाहरणाथ, “आपल्या प्रियेच्या अधरावर ब्रण झालेला पाहून कोणाला बरे राग येणार नाही £ नको म्हणत असताही हृद्टी बनून आत भ्रमर असलेल्या कमळाचा वास घेणारी तू, आता पतीचा रोष सहन कर.' सखीसंबंधीचे हे वचन पतीचा संशय दूर करण्याच्या उद्देशाने योजिळेळे असता त्या'च्या पत्नीच्या इतर नातेवाइकां- ची सुद्धा फसवणूक करते, तसेच विदग्ध मनुष्याळा हास्य आणि तिच्या सवतीळा रोष उत्पन्न करते. __ प्रत्यक्षवृत्ति? इत्यादी. प्रत्यक्ष शब्दाने नंतर होणारे प्रत्यक्ष अभिप्रेत आहे. म्हणून याचा अर्थ असा - नंतर प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टीसंबंधी दैवयोगाने ज्यात अगोदर निदर्शन असते तो व्याहार, ज्याने विविध अर्थाचा अभिनय केला जातो तो. उदाहरणाथ, “खूप कळ्या आलेली (पक्षी, गाढ उत्कण्ठा असलेली)' इत्यादी. "कस्यचिद्दचनम? यातील “बचन? शब्द सरळ, वाच्याथीनेच घेतलेली उक्ती या अर्थी वापरला आहे. आर्येतील “अभिंसंधान? शब्दाची व्याख्या करण्यासाठी हा शब्द योजिला आहे. जे उक्ती वाच्या- र्थाने घेतात त्यांचाच छल म्हणजे फसवणूक होते. - 'सब्ममर- इ०' आणि 'वारिअवामे? ही संबोधने आहेत. - 'अपि संबन्धिनाम यातील “अपि? शब्द 'संबन्धिनाम? नंतर समजावा. - 'सपल्ल्या” नंतर मुळात “'बचने! अधिक आहे. पण या ठिकाणीं ह्या शब्दाची चुकीने पुनरुक्ती झालेली दिसते. १४४ नाट्यशास्त्र 'देववशातू? हे मुख्यतः शब्द-छेषाने घडून येते. - 'व्याहारः ह्या शब्दाची "व्युत्पत्ती विन-आहू : पासून केली असून 'वि? चा विविध असा अर्थ आणि 'आहू? चा अभिनय करणे असा अर्थ केला आहे. -- 'उद्दामोत्कलिकाम्‌? रत्नावलीतील संपूर्ण झोक असा - उद्दामोत्कलिकां विपाण्डुररूचं प्रारम्मजुम्मां क्षणा- दायासं श्वसनोद्वमेरविरतेरातन्वतीमात्मनः । अद्योद्यानलतामिमां समदनां नारीमिवान्यां धरवं पश्यन्कोपविपारल्युति मुखं देव्याः करिष्याम्यहम्‌॥ २.४. प्रस्तुत आर्या आणि तिच्यावरील अमिनवगुप्ताची टीका दोन अलग झालेले भाग एकत्र आणून तयार केल्या आहेत. मुळात आयेंच्या दोन अधोच्या मध्ये पुढील १९४ बी आर्या आढळते. परंतु तश्या तऱ्हेची रचना सूळ नाटयशासत्रकाराने केली असण्याची शक्‍यता नाही. कारण त्यामुळे दोन पूर्वार्ध मिळून एक आर्या ब दोन उत्तराध॑ मिळून दुसरी आर्या असा बनाव दिसून येतो. अशा तर्‍हेच्या आर्या ह्या ग्रंथकाराने रचल्या असणे अशक्य आहे. असे दिसते की वीथ्यज्भांच्या नावनिर्देशातील क्रमाच्या अनुरोधाने आयेंचे दोन अर्ध कोणीतरी विभक्त केळे आहेत. छल आणि व्याहार यांच्या व्याख्या अर्ध्या आर्येतच संपत असल्यामुळे असे करणे शक्‍य झाले. काशी प्रतीत आणि डॉ. घोघ यांच्या आवृत्तीत छलाची व्याख्या एका संपूर्ण आर्येत दिळी असून व्याहाराची व्याख्या एका पूर्ण अनुष्टुभ्‌ कछोकात दिली आहे. अनुष्ट्भ्‌ छंद मूळ असण्याचा संभव कमी. प्रस्तुत ठिकाणी स्वीकारलेल्या आर्येच्या स्वरूपाला हस्तलिखितांत आधार नतावासे वाटते. तथापि वृत्ताच्या अनुरोधाने हेच रूप स्वीकारणे आवह्यक आहे. यात शंका नाही. १०८ व्या आयेच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे हे वर आलेच आहे. श्रृतिसारूप्याद्यास्मन्‌ बहवोरर्था युक्तिभिनिंयुज्यन्ते । यद्ास्यमहास्यं वा तत्रिगतं नाम विज्ञेयम्‌ ॥ ११४॥ ज्यामध्ये शब्दसादृश्यामुळे एका वचनात पुष्कळ अर्थ युक्‍्तिपूवेक ग्रथित केले जातात --मग ते हास्यकर असोत अथवा नसोत--ते त्रिगत होय असे समजावे, श्रतिसारूप्यादिति शब्दसारूप्यात्‌ बहव इति प्रश्नप्तिवचनस्वभावा यत्र नियुज्यन्ते युक्तिमिरिते काक्कादीनाम्‌ तथेवोपपासीभिः । त्रिशन्दी$नेकोपलक्षणम्‌ अनेकम्थे गतमिति त्रिगतम्‌ । वाक्केल्यामुत्तरमनेकप्रश्षसाधारणम्‌ , इह तु य एव प्रश्नस्तदेव प्रातेवचनमिति विदोषः । यथा - १ नि -प्यार्थात्मनि. १८.११५ | १४५ सर्वक्षितिभरतां नाथ दृष्टा सवांडरुसुन्दरी । रामा रस्ये वनान्ते$स्मिन्‌ त्वया विराहिता मया ॥ (विक्रमो०, ४.५१) अन्रेतदेवोत्तरम्‌॒ । साकाडक्षकाकुप्रयोगे5पि प्रतिबिस्बे वामदक्षिणवेपरीत्यवन्निरा- काहूक्षा काकुः संवूत्ता यत एतद्धास्यम्‌ । एवमहास्य उदाहायंम्‌ । श्रुतिसारूप्यात्‌ म्हणजे शाब्दांच्या एकसारखेपणामुळे, पुष्कळ म्हणजे प्रश्‍न ब प्रतिवचन यांच्या स्वख्पाचे, ज्यात योजिळे जातात, काकु आदींच्या युक्‍तींनी तसेच उपपत्तींच्या साहाय्याने, ते त्रिगत. “त्रि! शब्द अनेकांचे उपलक्षण आहे. अनेक अर्थाप्रत गेळेळे ते त्रिगत. वाक्केळीमध्ये एकच उत्तर अनेक प्रश्नांना समान असते, परंतु यात जो प्रश्न तेच उत्तर असा ह्या दोहोत फरक. उदाहरणार्थ, विक्रमोवैशीयात सुरूरवा “हे सवे पर्वतांच्या अधिपते, ह्या रम्य वनपरिसरात सर्वांगसुंदर रमणी माझ्या शिवाय असलेली तू पाहिली आहेस काय?! या ठिकाणी हेच उत्तर आहे. साकाड्श्त काकूचा उपयोग केला असताही ज्याप्रमाणे प्रतिबिम्बात डाव्या आणि उजव्या बाजूंची अदळाबदल होते त्याप्रमाणे ती निराकाडक्ष काकू बनळी आहे, म्हणून हे हास्यकारक आहे. त्याचप्रमाणे हास्यकारक नसलेल्या त्रिगताचे उदाहरण द्यावे, “-वचनस्वभावा' मुळात “-वचनस्य स्वभावा” आहे. पण समासघटित रूपच अधिक - समुचित. - 'उपपत्तिमिः' म्हणचे ते अर्थ उपपन्न अहित याचे ध्यान ठेवून. - 'ाक्केल्यामुत्तरम_ मुद्रितात “वाक्ये मुख्यमुत्तरम' असा सर्वथा असंभाव्य पाठ आहे. - 'क्षितिभत? म्हणजे पवत, तसेच राजा. - 'साकाडूक्षकाकु-' सतराव्या अध्यायात (१७.१११) साकाड्क्ष व निराकाडूक्ष अशा दोन प्रकारच्या काकूंचे वर्णण आहे. काकु म्हणजे वाक्य उच्चारताना आबाज चढवीत जाण्याची किंबा उतरवीत जाण्याची क्रिया. साकाडूक्ष काकूत वक्त्यालळा त्याच्या विधानाचे उत्तर पाहिजे असते; सामान्यतः तो प्रश्नात्मक स्वरूपाचा असतो. त्याची तारस्वरात सुरुवात होऊन मन्द्रस्वरात अंत होतो; याच्या विपरीत निराकाडु काकु असतो असे नाट्यक्ास्त्रात म्हटले आहे. - 'अहास्ये उदाहायम? याचे उदाहरण अभिनवगुप्तानेच दिळे अतते तर बरे झाळे असते. संरम्भसंभ्रमयुत विवादयुक्त तथापवादकृतम्‌ । बहुबचनाक्षेपकृतं गण्डं प्रवदून्ति तच्वज्ञाः ॥ ११५ ॥ .- गडबड व गोंधळ यांनी युक्त, विवाद असलेले तसेच निंदेने युक्त, पुष्कळ वचनांचा आक्षेप करणारे जे वचन त्याला नाट्यतत्त्व जाणणारे गंड असे म्हणतात. संरस्भसंभ्रमयुतारमाते । संरस्भेण कृतिविशेषेण यः संभ्रम आवेग तद्युक्ते, यद्विरुद्धवस्तुवदनेन कृतं पूर्वोक्तवस्त्वपवदनमेव च, तदधचनं दृष्टार्थगर्भत्वादू गण्ड _______._. संमब फार कमी. कृती म्हणजे घटना या अर्थाने वेणीसंहाराच्या दुसऱ्या अंकातील ____._.. . बिशेषाचा निदेश अभिनबगुप्ताला अभिप्रेत आहे असे म्हणता येण्यासारखे आहे. - 'विरुद्धवस्तुवदनेन > --ऱ्ही 1. आयत 'विवाद? छब्दाची ण र व्युत्पति पतिनिदर्शेक व्याख्य हे. म्हणून सु; तात १४६ नाट्यशास्त्र इव गण्डः । ईषदसमापतं वचनं बहुवचनं तत्कृतेनाक्षेपेण कृतं स्वयं प्रतिवचनतां पूर्ववचनस्य गतमित्यर्थः । तथा च कोहलः - वचसां संबद्धानामन्ते यस्मात्पदं त्वसंबद्धम्‌ । संबद्धामिवाभाति हि तहूण्डो नाम वीथ्यज्ञुम्‌ ॥ अनेनेषदसमासिरेव दाशिता । यथा दुर्योधनेन भानुमतीं प्रत्युच्यते - अध्यासितुं तव चिराज्मघनस्थलस्य __. पयाप्तमेव करभोरु ममोस्युग्मम्‌॒ । इति । (वेणी. २.२३) तत्र प्रविड्य कञ्चुकी भग्न भीमेन मरुता भवतो रथकेतनम्‌ । इति । (वेणी. २.२४) तत्रोर्युग्ममिति पूवेविश्रान्तर्मापे भम्नामित्यत्त संबन्धयोग्यं जातम्‌ । _ “संरम्मसंभ्रमयुतम्‌! इत्यादी. संरम्भाने म्हणजे एखाद्या विशेष घटनेमुळे जो संभ्रम म्हणजे आवेग त्याने युक्त, जे विरुद्ध वस्तूच्या उच्चारणामुळे बनळेळे आणि अगोदर निर्दिष्ट केलेल्या वस्तूचा अपळापच करणारे ते वचन निदर्शित झालेला अर्थ त्याच्या गर्भात असल्यामुळे फोडासारखे म्हणून गण्ड. किंचित अपूर्ण असलेले वचन ते बहुवचन त्याच्या केलेल्या आक्षेपाने सिद्ध झालळेळे म्हणजे आपोआप पूर्वीच्या उक्तीला प्रतिवचना'च्या स्वरूपाचे झालेळे असा अर्थ. कोहळलाने तसेच म्हटले आहे. - “ परस्परांशी संबद्ध असलेल्या शब्दांच्या शेवटी ज्या अथी एक दुसरा शब्द असंबद्ध असताही संबद्ध असल्यासारखा भासतो त्या अर्थी ते गण्ड नावाचे वीथ्यह्ठू होते.' ह्या व्याख्येतही किंचित अपूर्णताच निदर्शित झाळी आहे. उदाहरणार्थ, वेणीसंह्ारात दुर्योधन भानुमतीळा म्हणतो --' हे संदारे, पुष्कळ कालानंतर माझ्या मांड्या तुझ्या जघनस्थळाला बसण्यासाठी पुरेशा आहेतच.' त्या क्षणी. कज्चुकी प्रवेश करून ___. म्हणतो - “भयंकर अशा वाऱ्याने आपल्या रथाचा ध्वज मोडला आहे.' त्या ठिकाणी ऊरुयुग्म* हा शब्द अगोदर अन्बित झालेला असताही “भग्न! शब्दाबरोबर संग्द्ध होण्यास योग्य बनला आहे संरम्मेण कृति- . मुळात 'संरम्मेणाकृति- आहे. पणं आकृति हा शब्द योजला असण्याचा झंझावात. ह्या कृति- 2८.११" १४७ “ऊर्युग्मं मग्नमूर हा विवाद म्हणजे विरुद्धवस्तुवदन. - 'पूर्वोक्तवस्तु' म्हणजे त्या उदाहरणात “ऊर्युग्मं पर्याप्तम?. - दृष्टार्थ' म्हणजे हाच अगोदरचा संकल्पित अर्थ. तो नवीन सूचित झालेल्या अर्थाने झाकला जातो. - 'बहुवचन? म्हणजे बहुतांशी अर्थ पूर्ण झालेले वचन असा अर्थ केला आहे. - 'यस्मात्पदं त्वसंबद्धम' ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात ८य॒स्मात्पटत्वनबन्भः” असा पाठ आहे आणि मुद्रितात 'यत्स्यात्सदे त्वसंबन्धः” असा. दोन्ही बरोबर नाहीत. पुढील “आभाति' ला 'पदं' अत्ता कर्ता आवद्यक आहे आणि पुढे ज्याअर्थी 'संबद्धमिव आभ्गातिः असे म्हटले आहे त्याअर्थी 'असंबद्धम? असेच त्याचे विशेषण वापरले असावे हे उघड आहे. - 'भानुमतीं' मुळात 'भानुमती? आहे. पण क्रियापद 'प्रत्युच्यतेर असे नसून 'उच्यतेः एवढेच आहे, आणि 'प्रतिः चा 'भानुमती? शी अन्बय अभिप्रेत आहे. एतैस्त्रयोदशभिरडयुक्ता वीथी । तस्याश्व सवरसत्वस्याभिधानात्‌ पर्यायेण रसानां प्राधान्यादुत्तमो मध्यमो5धमो वा नायको भवत्येव । तथा च कोहलः -- उत्तमाधममध्याभियुक्ता प्रकृतिभिस्तथा । र (* ९ | संक्षिता एकहायां द्विहायां वा सा वीथीत्याभि ॥ इति । अधमप्रकृतेस्तु न नायकत्वामाति व्रुवन्‌ प्रहसनकभाणकादोौ किं बरूयात्‌ । हास्यादि- रसप्रधानत्वे द्यॅघम एव नायकः । कथाशरीरफलेन प्रधानतया संबध्यमानो नायक उच्यते । अनायकत्वे$पि चास्याधमत्वेनोपादेयता स्यात्‌ । परिवारतया तस्यानुप्रवेशो हि अनिवारित एव सवेत्र । वीथी ह्या तेरा अंगांनी युक्त असते. आणि तिच्यात सर्वे रस विद्यमान असतात असे म्हटले असल्यामुळे पर्यायाने रसांना प्राधान्य येऊन नायक उत्तम, मध्यम अथवा कनिष्ठ दर्जाचा असतोच. कोहळाने तसेच म्हटले आहे- ' उत्तम, कनिष्ठ आणि मध्यम अद्या तीन प्रकृतींनी युक्त, आणि एका पात्राने अभिनीत केळेली अथवा दोन पात्रांनी अमिनीत केलेली, तिळा वीथी अशी संक्षा आहे.' परंतु कनिष्ठ प्रतीचे पात्र नायक होणार नाही असे ज्याचे म्हणणे आहे तो प्रहसन, भाण आदींच्या संबंधात काय म्हणणार? कारण, ज्यात हास्य आदी रस प्रधान असतात त्यात कनिष्ठ्च नायक असतो. कथारूप शारीराच्या फलाशी ज्याचा मुख्यत्वेकरून संबंध जुळून येतो तो नायक. आणि नायक नसला तरी कनिष्ठ पात्र म्हणून त्याची योजना होऊ शकेळ. कारण, परिजन म्हणून त्याच्या सवेत्र समावेशाला कोणताही प्रतिबंध नाही. १४८ नाट्यशास्त्र “जुुबन? ही मुळातील “ध्रुव? ची केलेली दुरुस्ती आहे. 'धुबम? नें काहीच अर्थ लागण्या- सारखा नाही. धवनने वाक्याचा व्यवस्थित अर्थ लागतो. - 'कथाशरीर-' कथा अथबा इतिवृत्त हे नाट्याचे शरीर असे पुढील अध्यायाच्या प्रारंभी (१९.१) सांगितले आहे. - अनायकत्वेडपिे चास्याधमत्वेनोपादेयता? हस्तलिखितात “5पि? नाही, मुद्रितात आहे. पुढे हस्त- ठिखितात “चास्याभमबदनुपादेयता' आहे, तर मुद्रित पाठ 'चास्याधमत्व॑ नानुपादेयं? असा आहे. हस्तलिखितातील 'अनुपादेयता' संभाव्य नाही, कारण ते पुढील बाक्‍याशी बिसंगत होईल त्या पाठात कमीत कमी बदळ करून दुरुस्ती सुचविली आहे. मुद्रित पाठाचा अर्थ अंततः सूवचित पाठासारखा आहे, तथापि त्यात निर्दिष्ट झाल्याप्रमाणे अधमत्व उपादेय आहे हे अभिप्रेत नसून अधम पात्र उपादेय आहे हे अमिप्रेत आहे इति दशरूपविधानं सवे प्रोक्तं मया हि लक्षणतः । र > 3 ४_९-_ /€_ €< ७ च पुनरस्य शरीरविधानसाधिविधिलक्षणं वक्ष्ये | ११६॥ इति भारतीये नाट्यशास्त्रे दरारूपनिरूपणं नामांध्यायो५ ष्टादराः समाप्तः । याप्रमाणे दहा रूपकांच्या रचनेचे सर्वे नियम मी लक्षणांच्या द्वारा सांगितले आहेत आता यापुढे मी कथानकाची रचना व संधींचे नियम यांची लक्षणे सांगणार आहे. येथे भरतमुनीने रचलेल्या नाट्यशाक्लातील दररूपनिरूपण नावा'चा अठरावा अध्याय समाप्त होतो. अध्यायाथंमुपसंहरन्‌ भाविनमर्थमनुसंधत्ते इति दररूपविधानमिति । लक्षणत इत्यनेनेदमाह दडोवेतानि लक्षणानि, उदाहरणानां तु का गणना । एतच्च पूर्वमेव दाशींतम्‌ । तत्रैषां पुमर्थापयोगो निजनिजलक्षणावसरे दार्शत एवोति पोनरुक्तयं नाश्रीयत इति शिवम्‌ । अध्यायातील विषयाचा उपसंहार करून पुढीळ विषयाचे अनुसंधान “इति दशरूप- विधानम्‌' या आर्येत करतात. “लक्षणत:' ह्या शब्दाने असे दाखवितात की लक्षणे अशी ही दहाच आहेत, पण उदाहरणांची संख्या काही नियमित नाही. आणि हे आम्ही मागेच दाखविले आहे. त्यात ह्यांचा पुरुषार्थासाठी संभाव्य उपयोग आम्ही त्या त्या लक्षणाच्या प्रसंगी दाखवून दिला आहे म्हणून आता त्याची पुनरुक्ती करीत नाही. इति शिवम्‌. १ नि मयाति-. २ नि इतिवृत्तद्रिविधानं, ब पुनरस्य शरीरगतं. ३ नि ब संधिविधो. ४ का -विधानं, नि -लक्षणं. ५ का विंशो5व्याय:. १८-११६ | १४९ 'लक्षणतः इ०' हे वाकय मिळालेल्या हस्तलिखिताच्या प्रतीत नाही. तो ळेखनदोष आहे. कारण हे वाक्‍य असल्याशिवाय पुढील वाक्याची संगती लागत नाही. - :ददैवैतानिः ही “दशैब तानि” ची दुरुस्ती आहे. “तानि? पेक्षा 'एतानिः' अधिक संभाव्य आहे. - उदा- हरण म्हणजे सट्टक, रासक आदी नाट्यशास्त्रात निर्दिष्ट नसंलेळे रूपकप्रकार. ह्या आर्येच्या द्वितीयार्धाचा पाठ पुढील अध्यायाच्या पहिल्या शछोकावरील अमिनव- गुप्ताच्या टीकेच्या अनुरोधाने स्वीकारला आहे. बडोदे प्रतीच्या संपादकांनी त्या ठिकाणी हा पाठ ग्राह्य मानला आहे. इति विमलशिशिरदीधितिकलितशिरोमण्डनाइश्रिदास्यचणः । अभिनवयुप्तो गुप्त दशस्वरूपं सतत्त्वकं व्यव्वणोत्‌ ॥ याप्रमाणे विमळ चन्द्राने ज्याचे शिरोभूषण बनळे आहे त्या भगवान शंकराच्या चरणांचे दास्य करण्याविषयी प्रसिद्ध असलेल्या अभिनवयुप्ताने दशरूपकांचे गूढ असलेले स्वरूप तत्त्वासहित स्पष्ट केळे आहे. “तेन वित्तश्चुज्युप्वणपौ (५.२.२६)? ह्या पाणिनीच्या सूत्राप्रमाणे “साठी प्रसिद्ध या अर्थी “चण? प्रत्यय लावला आहे. - हस्तलिखितात 'दररूपं' आहे. पण त्याने वृत्तहानि होते. हा गीति छन्द आहे. इति श्रीमहामाहेश्वराभिनवगुप्ताचायविरचितायां नाट्यवेदविव्वतावभिनव- भारत्यां ददरूपकविधानं नामाष्टादशो$ध्यायः । येथे महान महेश्वरभक्त श्री अभिनवगुप्ताचार्यांनी रचलेल्या नाट्यशाख्राच्या अभिनवभारती नावाच्या व्याख्येचा दराकरूपकविधान नावाचा अठरावा अध्याय समाप्त होतों. एकोनविंशो5ध्यायः इतिवृत्त तु नाट्यस्य शरीरं परिकीतितमू । पश्चमिः संधिभिस्तस्य * विभागः संप्रकल्पितः ॥ १॥ * कथानक हे नाट्याचे शरीर होय असे सांगितले आहें. पाच संधींच्या योगाने त्याचे विभाग कल्पिले आहेत. देहे ससंध्यड्ठुगणे समस्ते यत्स्थापनं स्पर्शनवूत्तिकारि । तदिन्द्रियं यस्य वपुनंमामि तमान्तरस्पशंमयं महेराम्‌ ॥ सांधे आणि अवयव यांच्या समूहाने युक्त अश्या संपूण देहामध्ये ज्या इंद्रियाची स्थापना स्पर्शज्ञान उत्पन करते ते स्पर्शेन्द्रिय ज्याचे शारीर आहे त्या आभ्यन्तर स्पशीमय महेश्वराळा मी नमन करतो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अध्यायाबरील टीकेच्या प्रारंमी मंगलळछोकात शिवाला वंदन केळे आहे. तसे करताना अध्यायाचा जो विषय - संघी आणि त्यांची अंगे - त्याचा 'ेषाने निर्देश अन्तर्थूत केला आहे. - 'तदिन्द्रियं' म्हणजे वस्तुतः त्बगिन्द्रिय. म्हणजे देहातील स्पर्शशान हा ईश्वराचा आविर्भाव आहे अशी कल्पना केली आहे. - 'आम्तरस्पशे' हा बाह्मस्पर्शाहून मिन्न. ईश्वर आन्तरस्प्शे स्वरूपाचा आणि बाह्मस्पश हा त्याचा बाह्य आविष्कार. म्हणून त्या बाह्यमस्पर्शाला शरीर म्हटले आहे. पुनरस्य शरीरविधानेत्यादिना शरीरमितिवृत्तात्मकं, विधानं च तस्य विधानरूपप्रकारात्मकं, संघयश्च मुखादयो, विधयश्च संघ्यद्ठुस्वभावा लक्षणीयत्वेन प्रतिज्ञाताः । तत्र शर्रीरमेवादी टक्षयितव्यामिति दर्शयति इतिवृत्त त्विति । . १ का एकविक्लो. २ का विभागा: परिकीतिता:. १५२ नाट्यशास्त्र तुशब्दी व्यतिरेके । काव्यमात्रस्यानाभिनेयस्य तावदू वृत्तमात्रं शररिभ, नट- नीयस्य त्वमिनेयरूपस्य इति एवंप्रकारतया यदुपस्कृतं वृत्तम्‌, अत एवेतिवृत्त- शब्दवाच्यं तट्टस्तु शरीरम्‌ । रसाः पुनरात्मा शररीराधर्भावकाः । अत प्वार्थ- निर्मापकत्वात अर्थतादात्म्यात्‌ अर्थरूपताध्यासात्‌ अर्थेकज्ञाननिंवेशितत्वात्‌ अर्थोपरञकत्वात्‌ अ्थानेमित्ताद्ा इतिवृत्तार्थेकयोगक्षेमत्व॑ वागात्मनां शब्दाना- मिति । तदाशयेन “वाचि यत्नस्तु कर्तन्यो नाट्यस्येषा तनुः स्मृता' इति पूवमुक्तम्‌, इह तु वृत्त शरीरमिति दार्शितमित्यावरोधः । “पुनरस्य ररीरविधान-' इत्यादी आर्येत शरीर इतिवृत्ताच्या स्वरूपाचे, आणि त्याचे विधान म्हणजे विधानाच्या स्वरूपाचे त्याचे प्रकार, संधी म्हणजे मुखसंधी आदी, आणि विधी संध्यद्वांच्या स्वरूपाचे, या सर्वांचे लक्षण करावयाचे आहे म्हणून प्रतिज्ञा केळी होती. त्यांपैकी प्रथम शरीराचेच लक्षण करावयाचे हे “इतिवृत्त तु' या शछोकात निदर्शित करतात. तु शब्द फरक दाखवितो. ज्याचा अभिनय करावयाचा नसतो असे जे केवळ काव्य असते त्याचे केवळ वृत्त हे झरीर होय, परंतु नटनीय म्हणजे अमिनेय स्वरूपाचे जे काव्य त्याचे इति म्हणजे अशा प्रकारे उपस्कृत झालेले जे वृत्त, म्हणूनच इतिवृत्त ह्या शब्दाने ज्याचा बोध होतो ते कथानक शरीर होय. परंतु रस त्याचा आत्मा, शरीराचा आविष्कार करणारा म्हणूनच अर्थाचे निर्माण करणारे असल्यामुळे, अथवा अर्थाशी तादात्म्य असल्यामुळे, अथवा अर्थस्वरूपाचा अध्यास झाल्यामुळे, अथवा केवळ अर्थाच्या बोधासाठीच उपयुक्त होत असल्यामुळे, अथवा अर्थाळा उज्ज्बळित करणारे असल्यामुळे अथवा अर्थाचे निमित्त असल्यामुळे वाग्रूपी शब्दांची इतिवृत्ताच्या अर्थाशी एकरूपता असते. ह्याच आशयाने पूवी “ शाब्दांसंबंधी प्रयत्न केळा पाहिजे, कारण ते नाठ्याचे शरीर समजले जातात' असे म्हटले होते आणि या ठिकाणी वृत्त शरीर होय हे दाखविले आहे, तेव्हा यात काही विरोध नाही. | 'पुनरस्य इ०' ही बरीक अठराव्या अध्यायातील शेवटची आर्या (१८.११६). अध्याय संगती तांगण्यासाठी हा निदेंश॒ केळा आहे. - “शरीरमेवादौ? हस्तलिखितात “आदौ” नाही, आणि मुद्रितात “एव? नाही. दोन्ही असल्यास चांगले. -- “नटनीयस्य' हा शब्द मूळ छोकातील 'नाट्यस्य' शाब्दाचा पर्याय आहे. - 'एवंप्रकारतया? म्हणजे संधी, संध्यंद्धे इत्यादींच्या साहाय्याने. - 'उपस्कृत? म्हणजे परिष्कृत, संपन्न ईत्यादी. -- “अ्थनिर्मापकत्वात्‌ इ०' या ठिकाणी शब्दाच्या अर्थाशी संबंधाविषयी संभाव्य असलेल्या सर्व प्रकारच्या मतांचा उल्लेख. केळा असून शेवटी कोठलेही मत स्वीकारले तरी शब्द आणि अर्थ यांची एकात्मकता सिद्ध होते असे प्रतिपादन केले आहे. - 'अथरैरूपता्यास? म्हणजे राब्दावर अर्थाचा आरोप होतो अशी वेदान्तसदुश कल्पना. - “एकयोगक्षेमत्वम म्हणून शब्द आणि अर्थ यांचा तंबेध अगदी घनिष्ठ असल्यामुळे ते एकरूप होतात. - “वाचि. यलनस्तु इ०' हे नाट्यशास्त्रात १४.२ १९.१ १५३ मध्ये विधान केळे आहे. - “अविरोध विरोधाचा संभव असा की त्या ठिकाणी शब्द हे नाट्याचे शरीर असे म्हटले आहे तर प्रस्तुत ठिकाणी कथानक म्हणजे त्याचा अर्थ हे नाट्याचे शरीर असे विधान आहे. पण शब्द आणि अर्थ एकरूपच असल्याकारणाने ह्या दोन विधानांत काही विरोध नाही असा हा युक्तिवाद आहे. स तु कथं प्रकारवेचित्र्य इत्याहड्क्याह पश्वमिः संधिभिरिति । एतदुक्त भवति । प्रकारवीचित्र्यकल्पनामया एव संघयः. । तत्र पारम्यपरतया पश्च संख्योंते । तेन हीनसंधित्वेडपि न कश्चिदचत विरोधः । अन्ये तु सर्वत्र प्चेव संघयः, अपूणाडठत्वासु कस्याचित्संघेहीनसंधित्वमुच्यत इत्याहः । एतव्च खस्थाने वितनिष्यामः । एवमितिवृत्तशब्दे इतिभागस्य योऊर्थः सो5प्रसिद्ध इति कृत्वा द्वितीयार्धेन पश्वभिरित्यादिना व्याख्यातः । न तु संधिनिरूपणमेतदुद्देशक्रमस्या- नेकविधत्वात्‌ । परंतु प्रकारांची विविधता असता तो विरोधाचा अभाव कसा असेळ अशी शांका घेऊन “पन्चमिः संघिभिः' यात तिचे निराकरण करतात. यार्‍चा अर्थ असा - प्रकारांच्या विविधतेच्या कल्पनेवर अधिष्ठित असेच संधी आहेत. त्यांत पा'च ही संख्या अधिकात अधिक अशी आहे. म्हणून कमी संधी असले तरी यात काही विरोध नाही. परु इतर टीकाकार म्हणतात की सरवेत्र पाचच संधी असतात; परंतु एखाद्या संधींची अंगे पूर्ण नसल्याकारणाने तेथे हीनसंधि असे म्हणतात. ह्याचे आम्ही योग्य स्थळी बिवरण करू. याप्रमाणे इतिवृत्त शब्दामधीळ इति हा अंश प्रसिद्ध नाही म्हणून “पञ्चमिः' इत्यादी उत्तरार्धाने त्याची व्याख्या केली आहे. परंतु येथे काही संधींचे निरूपण केलेळे नाही, कारण उद्देशा'चा क्रम अनेक प्रकारचा असू शकतो. 'स॒ तु इ०' येथे 'प्रकारवेचिञ्र्ये' असे सप्तमीचे रूप असल्यामुळे “सः' नें 'अविरोधः चा निर्देश समजाबा लागतो. शंकेचे स्वरूप याप्रमाणे अमिप्रे, असावे - कथानक विविध प्रकारचे असते तेव्हा निरनिराळ्या प्रकारांत आपसात विरोध असण्याचा संभव आहे. या शंकेत जेथे मिन्नरता असते तेथे विरोध उत्पन्न होतो असे ग्रहीत धरलेले दिसते. ते विशोष समाधानकारक नाही. शंकेला उत्तर दिलेले आहे ते असे - कथानकात संधी असतात म्हृणून निरनिराळ्या प्रकारांची कल्पना संभवते; एरव्ही कथानकाचा सर्वत्र एकच प्रकार दिसला असता. जास्तीत जास्त संधी पाच असतात, पण काही प्रकारांत त्याहून कमी असतात. परेतु त्या- मुळे काही विरोध उत्पन्न होतो असे नाही. - 'पारम्यपरतया? हा मुद्रित पाठ आहे. हस्तलिलि- तात 'पारम्पयेताः' असा पाठ आहे.. येथे परंपरेचा काही संबंध नसल्यामुळे तो पाठ बरोबर नाही. 'परम? पासून “पारम्य' हे भाववाचक नाम बनले आहे. - 'स्वस्थाने' म्हणजे पुढे १६ व॒१७ ह्या छोकांवरील व्याख्येत. - 'उद्देशक्रमस्यानेकविधत्वातः मुद्रितात 'उद्देशक्रमस्तस्या- असे आहे. पण त्यात 'उद्देशक्रमः? हा प्रथमान्त शब्द 'संधिनिरूपणमेतत्‌' याच्याशी समानाधिकरण १५४ | नाट्यशास्त्र आहे असे मानावे लागेल, ते संभवनीय नाही. अभमिनवगुप्ताचे येथे असे म्हणणे दिसते की 'पञ्चमिः” संधिमिः' यात तंधींचे निरूपण नाही. कारण कथानकाचे अवस्था, अर्थमप्रकृति, संधि असे जे विशेष आहेत त्यांचा उद्देश व तदनुसार निरूपण ही निरनिराळ्या क्रमाने करता येतात. प्रस्तुत ग्रंथात संधींचे विवरण नंतर केळे आहे, सर्वबोआधी या ठिकाणी नाही. इतिवृत्त द्विधा चेव बुधस्तु परिकट्पयेत्‌ । आधिकारिकमेक॑ स्यात्तासद्धिकमथापरम्‌ ॥२॥ आणि बुद्धिमान कवीने कथानकाची दोन प्रकारची रचना करावी. एक मुख्य असावे व दुसरे प्रासंगिक. एवं शर्रीरमभिधाय तस्य विधानरदाब्देनोद्दि्ट प्रकारवेचित्र्यं दर्शयाते इतिवृत्त द्विधा चैवेति । इतिवृत्त स्थित सत्‌ बुधो विवेचकः कवविद्दिधेव कल्प- येत । चकारात्मकरणादावितिवृत्त॑ च कल्पयेत्‌ । तत्च द्विधा । एकसपरमित्यने नेदमाह न निसर्गतः किंचिदाधिकारिकम्‌ अन्यद्वा, कविधिया यंदैकमाधिकारिकं कृतं तदापरस्य प्रासाद्रेकतास्तीति । द्विघधाराब्देन यत्मकारद्र्‍यं सूचितं तदेवेदं दार्शतम्‌ । “'अधिकरणविचाले च' इति धाप्रत्ययः, एकं राशि द्विधा कुर्विति यथा । तेनेकमेवेतिवृत्त॑ डिशाखमिति यावत्‌ । याप्रमाणे शरीराचे वर्णन केल्यावर विधान शब्दाने निर्दिष्ट झालेली त्याच्या प्रकारांची विविधता “ इतिवृत्त द्विधा चैव' या झोकात दाखवून देतात. इतिवृत्त निश्चित झाळे असता बुध म्हणजे विवेचक कवीने ते दोन प्रकारांनींच तयार करावे. “च' शब्दामुळे प्रकरण आदींमध्ये स्वकल्पित कथानक सुद्धा रचावे असा अर्थ निष्पन्न होतो. आणि ते कथानक दोन प्रकारचे. एक आणि अपर या राब्दांनी असे दाखवितात की निसर्गतःच एखादी गोष्ट आधिकारिक अथवा प्रासंगिक असते असे नाही तर कवीच्या बुद्ीने जेव्हा एक आधिकारिक केले जाते तेव्हा दुसऱ्याला प्रासंगिकता प्राप्त होते. द्विधा शब्दाने जे दोन प्रकार सूचित केले आहेत तेच हे दाखविले आहेत. 'अधिकरणविचाळे च' या पाणिनीच्या सूत्राप्रमाणे “धा! प्रत्यय लागला आहे, “एका राशीचे दोन भाग कर' या उदाहरणाप्रमाणे. म्हणून एकच असलेल्या कथानकाच्या ह्या दोन शाखा आहेत असा अर्थ आहे. '_ 'विधान' शब्द मागे १८.११६ मध्ये आला आहे. - 'यंदैकम? मुळात 'यदेतत्‌ः असे आहे. पुढे “तदा? असल्यामुळे अगोदर 'यदा' अपेक्षित आहे. आणि 'एतत्‌' पेक्षा “एकम अधिक १ नितु. १९,३-४ १५" संभाव्य आहे. कछोकातील “एकम? 'अपरम्‌' चा येथे अनुबाद केला आहे हे उघड आहे. - “य॒त्कारद्दय' हे शब्द सुद्रितात नाहीत, हस्तलिखितात आहेत. ते अर्थबोध सुगम करतात. - 'अधिकरणविचाले च? हे अष्टाथ्यायीतील ५.३.४३ सूत्र आहे. - 'कुर्विति' मुद्रितात 'कुर्वति असा असंभाव्य पाठ आहे. यत्कार्य हि फलप्राप्त्या सामथ्यात्परिकल्प्यते । तढदाधिकारिकं ज्ञेयमन्यत्मासक्चिक बिदुः ॥ ३॥ कारणात्फलयोगस्य वृत्त स्यादाधिकारिकम । तस्योपकरणार्थ तु कीत्यंते द्यानुषक्धिकम ।॥। ४॥ जे कार्य त्याच्या समर्थतेसुळे फलप्राप्तीने युक्त असे कल्पिळे जाते ते मुख्य असे समजावे; इतर कार्य प्रासंगिक असे मानावे. फलाशी योग झाल्याकारणाने वृत्त आधिकारिक होते, परंतु त्याला उपायभूत असलेले ते आनुषंगिक असे म्हणतात. तत्प्रकारद्दयं क्रमेण दर्शयति यत्का्य हीति । प्रधानत्वेन संपा्ये फले यो ज्ञानेच्छाप्रयत्नक्रियाळक्षण आरस्भः तत्कार्यमिति वक्ष्यते 'यदाधिकारिकं वस्तु? इति । तथाभूतो य आरम्भो मुख्यफलप्राप्त्या पारिकल्प्यते स आधिकारिकमिति- वृत्तम्‌ हि यस्मात्‌ तथैव ज्ञेयम्‌ । निरुक्तेनाधिकारः सर्वत्रानुयायित्व हृद्यानु- यायित्वं प्रयोजनमस्य । प्रासाठ्र्के$पिे तदन्तळीनमेव । आधिकारिके इंहाप्तेना- चिख्यासासाधनैषाफलजिहीर्षानिष्पत्ती यथा न शाक्तयन्तरव्यापारणं तद्वत्मासाद- के5पि सर्वत्र शक्तयन्तरन्यापाराभाव एव । शात्तयन्तरे हि पृथग्व्यापार्यमाणे तस्याप्याधिकारिकत्वमेव स्यात्‌ । प्रतिज्ञानिवेहणं जगत्कण्टकरावणोद्धरणं शरणा- गतविभीषणरक्षणमित्याद्यापे हि प्रधानफळे सीताप्रत्यानयनलक्षणे विवक्षिते न शक्‍त्यन्तरव्यापारसाध्यं, अपि तु तदुपयोगेसामाद्युपायचतुष्टयतद्द्विकत्रिकादि- भेदसंपादननान्तरीयकोपनीतम्‌ । एवं तापसवत्सराजे राज्यप्रत्यापत्तेः प्रधान- फललत्वे वासवदत्तासंगमपद्मावतीप्राप्त्यादी क्रियान्तरानुपयोग एव मन्तब्यः । यदि ह्स्य वासवदत्ताप्राप्त्युपायत्वे पद्मावतीपरिणयस्य नोच्येत न वत्सराजस्तत्र प्रवर्तेत, तदप्रत्रत्तो कुतः प्रधानफळम्‌ इति सवे प्रासाक्षिकमेकरूपमेव । भ्रसक्तिदि प्रसद्धः, तत आगतं प्रासद्धिकम्‌ । प्रसज्यते वा प्रधानफलनिष्पत्तये इति प्रसड्ठः, तत १ नि समथ. २ का परोपकरणाथं तु. १५६ नाट्यशास्त्र आगतमिति । तेन शक्त्यन्तरयोगायोगाभ्यां च यत्प्रासड्रिकस्यानेकविधत्वं टीका- कृद्धिरभ्यधाये न तदुपाध्यायाः संमन्यन्ते । 'यत्कार्य हि' इत्यादी शब्दांत ते दोन प्रकार क्रमाने दर्शवितात. मुख्य म्हणून एखाद्या फलाची प्राप्ती करावयाची असता जो क्ञान, इच्छा, प्रयत्न आणि क्रिया ह्या स्वरूपा'चा उद्योग असतो त्याला कार्य असे पुढे 'यदाधिकारिकं वस्तु' इत्यादी छहोकात निर्दिष्ट केळे जाईल. तशा प्रकारचा जो उद्योग मुख्यफलाच्या प्राप्तीच्या योगाने कल्पिळा जातो तो आधिकारिक इतिवृत्त ' हि' म्हणजे ज्याअर्थी आहे त्याअर्थी त्या संज्ञेनेच ओळखावा. व्युत्पत्तीप्रमाणे अधिकार म्हणजे सर्वत्र जाणे तसेच हृदयात प्रवेश करणे हे ज्याचे प्रयोजन आहे ते आधिकारिक. प्रासंगिकामध्ये सुद्धा ते प्रयोजन अन्तर्भूत असतेच. आधिकारिकात ज्याप्रमाणे अभिलाषा, आप्त मनुष्याला कथन करण्याची इच्छा, साधनांचा शोध, फल प्राप्त करण्याची इच्छा आणि फलाची प्राप्ती यांसाठी दुसऱ्या स्वतंत्र शक्तीचा वापर होत नाही त्याचप्रमाणे प्रासंगिकासाठी सुद्धा सर्वत्र इतर शक्तीच्या व्यापाराचा अभावच असतो. कारण, दुसऱ्या शक्‍तीचा तेथे स्वतंत्रपणे वापर झाळा तर ते सुद्धा आधिकारिकच होईल, सीतेला परत आणणे हे प्रथानफळ अभिप्रेत असता प्रतिज्ञापूती, जगाळा कंटकरूप झालेल्या रावणा'चा उच्छेद, शरण आलेल्या विभीषणाचे रक्षण इत्यादी गोष्टी सुद्धा दुसऱ्या कोणत्या शक्तीच्या व्यापाराने साध्य होणाऱ्या आहेत असे नाही, तर त्या प्रधानफळाच्या सिद्धीला उपयोगी असे जे साम आदी चार उपाय आणि त्यांचे दोन दोन, तीन तीन इत्यादी एकत्र योजनेने होणारे प्रकार त्यांच्यामुळे होणाऱ्या सिद्धीने सवथा अभिन्न अशा प्रकारे निष्प्न होतात. त्या'चप्रमाणे तापसवषत्सराज नाटकात राज्याची पुनःप्राप्ती हे प्रचान फळ असता वासवदत्तेशी मिळन, पद्मावतीची प्राप्ती इत्यादी संबंधात दुसऱ्या कोठल्याही क्रियेचा उपयोग नाही असेच मानले पाहिजे. कारण पद्मावतीशी ह्या विवाह म्हणजे वासवदत्तेच्या प्राप्तीचा उपाय असे जर नसेळ तर वत्सराज त्याला उद्युक्त होणार नाही आणि तो उद्युक्त झाळा नाही तर मुख्य फळ कोठून प्राप्त होणार? म्हणून सर्व प्रासंगिक एकरूपच असते. कारण प्रसद्ठ म्हणजे प्रसक्‍ती, त्यापासून आलेले ते प्रासंगिक. अथवा मुख्य फलाच्या निष्पत्तीला उपयुक्त होतो तो प्रसंग, त्यापासून आलेले, म्हणून इतर शक्‍तीचा संयोग आणि संयोगाचा अभाव यांच्यामुळे प्रासंगिकाचे अनेक प्रकार होतात असे जे टीकाकारांनी म्हटळे आहे त्याच्याशी आमचे गुरुजी सहमत नाहीत. 'यदाधिकारिक॑ इ०' हा पुढील २५ वा “छोक आहे. - “-फल्पराप्त्या? मूळ होकातच हा शब्द तृतीयेत आहे. तेथेही चतुर्थ्यनत पाठ अधिक योग्य झाला असता. -- “-अनुयायित्वम्‌? यातील “अनु? ह्या उपपदाचा विशिष्ट अर्थ अमिप्रेत आहे असे दिसत नाही. - “'आधिकारिके इ०! येथीळ पाठ संदायातीत नाही. मुद्रितात “'आधिकारिके! च्या पूर्वी 'यथा? अधिक आहे; पण १९.३-४ १५७ त्याची आवश्‍यकता नाही. हस्तलिखितात 'आधिकारिके? शब्द नाही. पण तो आवद्यक आहे. त्यानंतर 'इह्याप्तेन'च्या ऐवजी 'सहाप्तेन' असा मुद्रित पाढ आहे. असे दिसते कि कथानकाच्या आरम्भम- प्रयत्नादी पाच अवस्थांचा या ठिकाणी दुसऱ्या शब्दांत निदेश केला आहे. ईहा म्हणजे अमिलाषा ही आरम्मावस्थेची द्योतक मानता येईल. त्यापुढीळ “आप नाचिख्यासा? हे प्रयत्ना- वस्थेचे द्योतक आहेसे .दिसते. पण “इहा' पासून सुरू होणाऱ्या दीर्घ समासात मध्येच “आप्सेन? असा तृतीयान्त शब्द असंभाव्य आहे. मुद्रितातीळ “सह? ने तृतीयेचा प्रश्न सुटतो; तथापि, समासात अन्तभूत असलेल्या “आचिख्यासा' ह्या शब्दाशी संबद्ध असलेले 'सहाप्तेन? हे शब्द समासाच्या बाहेर असावेत हे सुद्धा अशास्त्रीयच. शिवाय, “आप्तेन सह आचिख्यासा' हा रब्दप्रयोगही योग्य वाटत नाही. 'आप्ताय? अशीं चतुर्थी अपेक्षित आहे. 'आप्तेिन' शब्द गाळून 'इहाचिख्यासाः असा पाठ स्वीकारल्यास ह्या अडचणी दूर होतील आणि अर्थाचीही काही हानी होणार नाही. - 'शक्तथन्तरे हि' ही 'शक्तथन्तरे$पि' ची दुरुस्ती आहे. “हि! आवश्यक आहे, कारण हे वाक्य हेतुनिदर्शाक आहे. आणि “अपि? चे काही प्रयोजन नाही. "7 'प्रतिश्ञा- इ०” रामकथेबर आधारलेल्या नारांना अनुलक्षून हे विधान केले आहे. एखादे विशिष्ट नाटक अभमिनबगुप्ताच्या दष्टिसमोर असण्याचा संभव आहे. प्रतिज्ञा म्हणजे चौदा वर्षे वनवासात काढण्याची. - 'सामादि- म्हणजे साम, दान, मेद आणि दण्ड. - “त दृद्विकत्रिकादिभेद- हे चार उपाय एका वेळेस एक एक, किंबा एकदम दोन दोन, तीन तीन किंबा चारही एकाच वेळेस याप्रमाणे एकंदर पंधरा प्रकारांनी वापरता येतात असे कोरिलीय अर्थशास्त्रात (९.७.७७- ७८) सांगितले आहे. - “एवम? सुद्रित पाठ “'एव' असून तो अगोदरच्या वाक्याच्या शेबटी योजिला आहे. पण नवीन वाक्याच्या प्रारंभी हस्तलिखितातीलळ “एवम्‌? अधिक योग्य बाटतो. - 'प्रसक्तिः” म्हणजे हढ तंबन्ध, प्रासंगिक घटना व मुख्य फलस्वरूप घटना यांमधील. - 'प्रस- ज्यते' हे क्रियापद लागू पडते, 'उपयोगी ठरते या अर्थाने वापरलेले दिसते. - 'अनेकविधत्वम? प्रत्यक्ष दोनच प्रकार निर्दिष्ट आहेत, जास्त नाहीत. अतत एवाह कारणात्फलयोगस्येति । अयमर्थः । आधिकारिकं. नामास्त्वि- तिवृत्त॑ यतः फळसंबन्थं करोति । स कविना वर्णनोपायारोहमानीतः तत्सम- थाचरणेन प्रयुज्यते । एवमन्यत्स्यादितिवृत्तमिति पूर्वपक्षमाशड्क्य तत्रोत्तर- मवान्तरेणाह तस्योपकरणाथं त्विति । हिरप्यर्थ भिन्नक्रमः । आनुषाड्रकमपि कीत्येत इति । म्हणूनच ' कारणात्फलयोगस्य' इत्यादी म्हणतात. त्याचा अर्थ असा. इतिवृत्त आधिकारिक ह्या नावाने ओळखले जावे, कारण ते फलाशी संबंध घडवून आणते. कवी वर्णनात्मक उपायांनी परिणतावस्थेस आणलेल्या त्या फळसंबंधाचा समर्थ अशा कृतीने योग जुळवून आणतो. अशा तऱ्हेचे इतरही इतिवृत्त असू शकेल अशी पूर्वपक्षात शंका घेऊन तिला उत्तर “तस्योपकरणा्थ तु' या दुसऱ्या वाक्यात दिले आहे. ' हि? शब्द अपि ह्या अर्थी वापरला असून त्याचा करम बदळळा आहे-'आनुषट्टिकमपि कीर्त्गते! असा क्रम आहे. १५८ | नाट्यशास्त्र "अत एव' म्हणजे आधिकारिकासाठी जी उपाययोजना तीच प्रासंगिकासाठी उपयोगी पडते म्हणून, - 'आधिकारिकं इ०? या वाक्यात हस्तलिखितातील पाठात 'यतः? शब्द अधिक घातला अहि. त्यानें अर्थबोध होण्यास मदत होते. मुळात तो असून लेखनदोषानें गहाळ झाला असण्याचा संमव आहि. ज्या अर्थी हे इतिंबृत्त फलाशी संबंध प्रस्थापित करते त्या अर्थी त्याला आधिकारिक हे नाव द्यावे असा अर्थ निष्पन्न होतो ब तो झछोकातील शाब्दांना अनुसरूनच आहे. पुढील “सः ने ह्या फल्संबन्थाचा निर्देश होतो. मुद्रित पाठात हे वाक्य स कविना इ०' वाक्‍्याशी जोडले असून प्रारंभी 'आधिकारिकं नाम (अधिकार!) यस्त्वितिवृत्तः असे दिले आहे. परंतु पुढील “सः? मधील पुलिंगाच्या अनुरोधाने सुचविळेली “अधिकारः' ही दुरुस्ती सवेथा असंभाव्य आहे. त्या पाठानें ळछोकाळा धरून असा कोणताही अर्थ निष्पन्न होत नाही. - तत्समर्थाचरणेन* असे तिसऱ्या 'छोकातीळ “सामर्थ्यात शब्दाच्या अनुषंगाने म्हटळे आहे. - 'मिन्नक्रम? म्हणजे हा शब्द “आतुषक्षिकम' शब्दानंतर आहे असे समजावे *होकातील क्रम वृत्ताच्या अनुरोधाने आहे. कवे! प्रयत्नाक्षेतृणां युक्तानां विध्यपाश्रयात । कल्प्यते हि' फलप्राप्रिः समुत्कर्षीत्फलस्य चे ॥५॥ कवीच्या प्रयत्नामुळे, योग्य अशा नायकांनी नियमांचा अवलंब केल्यामुळे आणि फळाच्या उत्कृष्टतेमुळे फळाच्या प्राप्तीची योजना केली जाते. ननु फलप्राभिळक्षणेन प्रयाजनेन सप्रयोजनत्वमाधिकारिकस्य लक्षणत्व- मुक्तम्‌, फलप्रापिश्व प्रासाहुके$प्यास्त । सा प्रासद्धिकीति चेत्‌, सिद्धे प्रास- ह्विकस्याधिकारिकाद्धेंदे भवेदेतत्‌ । तत एव तत्सिद्धी चक्रकान्योन्याश्रयदोष तस्मात्फलप्राभिरेव विशिष्य वक्तव्येत्यभिप्रायेणाह कवेः प्रयत्नान्नेतणां युक्ताना- मिति । समुत्कषे प्राधान्यमवलम्न्य फलप्राप्तिः कल्प्यते । प्रधानफलप्राप्ति प्रयोजनमाधिकारिकमिति । येथे आक्षेप असा - फलप्राप्तिस्वर्पाचे जे प्रयोजन ते आधिकारिक इतिवृत्ताचे प्रयोजन अशी व्याख्या केली आहे. पण प्रासंगिक वृत्तामध्ये सुद्धा फलप्राप्ती असते. ती फलप्राप्ती प्रासंगिक असे म्हटले तर प्रासंगिक वृत्त आधिकारिक वृत्ताहून भिन्न आहे असे सिद्ध झाले तरच हे म्हणणे स्वीकारता येईल. त्याच कारणामुळे ते सिद्ध होण्यास अन्योन्याश्रयरूप चक्रकाचा अवलंब हा दोष उत्पन्न होतो. म्हणून फलप्राप्तीचेच विशेष रूपात वर्णन करावे या उद्देश्याने 'कवे; प्रयत्नान्नेतृणां युक्तानाम्‌! इत्यादी म्हणतात. समुत्कर्षाचा म्हणजे प्राधान्याचा अवलंब करून फलप्राप्ती कल्पिळी जाते. प्रधान फलाची प्राप्ती हे प्रयोजन असलेले ते आधिकारिक असा अथ. १कायत्‌ २कातु. २९११ २ "९९. “चक्रक' म्हणजे वर्तुळाप्रमाणे गोलाकार युक्तिवाद करणे; अन्योन्याश्रय दोषाचाच हा प्रकार आहे. एक गोष्ट दुसरीवर अवलंबून व ती दुसरी पहिलीवर असे असता हा दोष उत्पन्न होतो. | ननु फलप्राप्तेः कथं प्राधान्यम्‌ । आधिकारिकानेवत्यत्वादिति चेत्‌ स एव दोष इत्यादाड्क्याह कवेः प्रयत्नादिति । कवियंत्फलमुत्क्षेण विवक्षते तत्‌. प्रधानफलम्‌ । ननु पुरुषेच्छा यद्यनियन्त्रिता तदा पुनर्रापे स एव प्रश्न इत्याह नेतणां युक्तानां विध्यपाश्नयादिति । धीरोदात्तादिभेदानां नायकानां मध्ये यो यत्र नायको यक्त उचितः तस्य यो विधेः संपाद्य वस्तु तदपाश्रयप्रयत्नाचधेतोः कविफलं प्रधानमिति । यस्मत्व विधी यो नायको युक्तः उचितस्तस्य मर्येत- त्कतंव्यमित्याभिसंघानाभावे$पि तत्संनिधी फलं नायकत्वं विना कततेव्यम्‌, यथा तापसवत्सराजे वत्सराजस्य राज्यप्रत्यापात्तेः कतन्यतायाममात्याभिसाहितायाम्‌ । अत एव ह्यस्यासी नेता फलस्य चाक्रष्टा अमात्यसंपा्दिताभिसधिप्रत्युपाय- परस्पराजितस्यापि । ___ यावर आक्षेप असा - फल्प्राप्तीला प्राधान्य कसे येते? आधिकारिक इतिवृत्तात ती साध्य होते म्हणून असे म्हणाळात तर तोच दोष उत्पन होईल अशी शंका घेऊन तिचे निरसन “कवे: प्रयत्नात्‌* या शब्दांत करतात. कवी जे फळ उत्कृष्ट म्हणून निर्दिष्ट करावया'चे इच्छितो ते प्रधान फळ, पण जर पुरुषाची अनियंत्रित अशी इच्छाच असेल तर पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होईल या आक्षेपाळा * नेतणां युक्तानां विध्यपाश्रयात्‌! या शब्दांत उत्तर देतात धीरोदात्त इत्यादी चार प्रकारच्या नायकांपैकी जो नायक जेथे युक्त म्हणजे योग्य असेळ त्याचा जो विधि म्हणजे संपादन करावयाची जी गोष्ट तिच्या आधाराने केलेल्या प्रयत्नामुळे कवीने योजिलेळे फळ प्रधान ठरते. आणि ज्या विधीमध्ये जो नायक युक्त म्हणजे योग्य असेल त्याची “मला हे केळे पाहिजे' अशी कल्पना नसतानाही त्याला नायकत्वाशिवाय फळ समीप उपलब्ध करून द्यावे; उदाहरणाथ तापसवत्सराज नाटकात अमात्यांनी उपाय- योजना करून कार्य केळे असता वत्सराजाळा राज्याची पुनःप्राप्ती हे फळ मिळते त्याप्रमाणे. म्हणूनच तो ह्याचा नेता आणि फल प्राप्त करणारा ठरतो, जरी ते फल अमात्यांनी साध्य केलेल्या व उदिष्टाळा धरून असलेल्या अनेक उपाययोजनांनी प्राप्त झाले असले तरी सुद्धा “आधिकारिकनिवेत्येत्वात' मुद्रितात “आधिकारिकं' असा स्वतंत्र शब्द असून त्याचा 'प्राघा- न्यम' शी संबंध जोडला आहे. पण ते बरोबर नाही. - 'स एव? म्हणजे अन्योन्याश्रया'चा. - 'उत्कर्षेण विवक्षतिः हे छोकातील 'ससत्कर्षात? चे विवरण आहे. - “स एव प्रश्न? म्हणजे फलप्राप्तीला प्राथान्य कशामुळे येते हा प्रश्न शिक राहातोच. कबीची स्वैर इच्छा १६० | नाट्यशास्त्र हे काही त्याचे उचित उत्तर नव्हे. प्रश? च्या जागी प्रयत्न” असा मुद्रित पाठ आहे. कोणताही प्रयत्न येथे निर्दिष्ट असण्याचा संभव नाही, - 'विध्यपाश्रयादिति' यातील 'इति? मुळात नाही. पण नेहमीच्या प्रथेला अनुसरून कछोकातीळ शब्द उद्धृत केल्यावर तो आव- व्यक आहे. या वचनाचा अर्थ असा की कबी केवळ आपल्या ल्हरीप्रमाणे अमुक फल प्रधान असे ठरबौत नाही तर कथानकासाठी ज्या अनुरूप नायकाची निवड केली असेल त्याचे प्रयत्नांनी साध्य होणारे जे फुल तेच प्रधान असे ठरवितो. हे प्रयत्न स्वतः नायका- कडून केळे जातात. - 'यस्मिश्न विधी इ०' या व पुढील वाक्यात नायकाने स्वतः प्रयत्न केले नसताही इतरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उत्पन्न होणाऱ्या फलाचा लाभ त्यालाच होतो आणि या प्रकारे सुद्धा उचित नायक व प्रधान फल यांचा संबंध प्रस्थापित होतो असे प्रतिपादन केळे आहे. - “नायकत्व विना” म्हणजे इतिवृत्ताचे नेतृत्व करण्यात प्रयत्नशील नसताही, -- “अस्य नेता? म्हणजे ह्या तापसवत्सराज नाटकाचा नायक. येथील नेतृत्व स्वतःच्या प्रयत्ना- शिवायही नायक असल्यामुळे प्राप्त होते. - 'अमिसंधि' म्हणजे उदेश, उद्दिष्ट. नन्वेवमपि रामस्य स्वदारप्रत्यानयनकण्टकोदधरणभीताभयवितरणादोौ सर्वत्र कर्तव्यतोचित्यमस्तीति तथापि न व्यवस्थित लक्षणमित्याह फलस्य चेति । चकारेण समुत्कर्षादित्यस्याव्रृत्तिद्यात्यते । तेनायमर्थः । यंदेव फलं तावत्यंदी अधिकमुत्कषंमवठम्बते तत्रैव तस्यौंचित्यं कविना कल्पनीयम्‌ । तथाहि रावणो- च्छेदाद्यवाधि सीताप्रत्यानयनमेव समुत्कृष्ट भवति, तस्येव संपादनायेतरप्रव्रत्तेः । सचिवायत्तासिद्विस्तु यतो वत्सराजस्ततो योगन्धरायणाद्यमात्यवगप्रयत्नस्तावा- नसाविति तदमात्याभिसंहितराज्यप्राप्तिफलस्येव तत्रोत्कषः । स ह्येवं मन्यते राज्यभारचिन्ता एतैर्या कृता सा मयेवेति । एवमधिकाथेकं हृदयविपरिवत- मानं समुचित च नायकस्य फलं यद्यदा कविप्रयत्नेन विवक्ष्यते संपाद्यतया तदा तस्य प्रधानफलत्व रामाभ्युदयादो सीताप्रत्यानयनादेरिव । न हि तच्रा- श्वमेधयागादेनांयकोषचितस्य कविविवक्षितत्वमस्ति । पण असे असले तरी स्वपत्नीला परत आणणे, कंटकांचे उद्गरण, भीतिग्रस्तांना अभय देणे इत्यादी सर्व गोष्टींच्या बाबतीत. रामाच्या कतव्याचे औचित्य आहे म्हणून एवढ्यानेही लक्षण निश्चित होत नाही या आक्षेपाळा “फलस्य च! या राब्दांत उत्तर देतात. :ऱच' शब्दाच्या उपयोगाने “समुत्कर्षात! ह्या शब्दाची पुनरावृत्ती दाखविली आहे. म्हणून अर्थ असा-केवळ जे फल तेवढ्या अंशामध्ये अधिक उत्कर्ष पावते त्या ठिकाणी कवीने त्या फळाचेच औचित्य कल्पिळे पाहिजे. उदाहरणाथ, रावणाच्या उच्छेदापर्यंतची सीतेला परत आणण्याची घटंनाच उत्कृष्ट ठरते, कारण ती संपादन करण्यासाठीच इतर गोष्टी प्रवृत्त होतात. परंतु ज्याअर्थी वत्सराज हा कार्यसिद्धीसाठी सचिवांवर अवलंबून आहे त्याअर्थी यौगन्धरायणप्रश़्रती अमात्यवर्गाचा तितका तो प्रयत्न आहे म्हणून अमात्यांनी १९.५ | १६१ निर्धारित केळेळे राज्यप्राप्तिरूप फळ्च त्या ठिकाणी उत्कृष्ट ठरते. कारण, राज्याचा भार वाहण्याची चिंता जी यांनी केळी आहे ती मीच केलीं आहे असे तो मानतो. याप्रमाणे हृदयात अधिकाधिक घोळणारे आणि नायकाला योग्य असे जे फल जेव्हा कवीच्या प्रयत्नाने संपादित करावयाचे म्हणून विवक्षित असते तेव्हा ते फळ प्रधान होते, उदाहरणाथ रामाभ्युदयप्रश्वती नाटकांत सीतेला परत आणण्याची घटना इत्यादी. कारण त्या ठिकाणी अश्वमेधादी घटना नायकाला उच्ति असल्या तरी कवीला त्या विवक्षित नसतात. “'अस्तीतिः यातील इति? मुद्रित पाठात नाही. पण यानंतर “तथापि” शब्द असला तरी “इति? ची आवद्यकता आहे. लक्षण निश्चित का होत नाही याचे कारण अगोदरच्या वाक्‍्या- त सांगितळे आहि हे “इति? नें निदर्गित होते. - न व्यवस्थितं लक्षणम्‌? म्हणजे कबीला विवक्षि- त आणि नायकाला योग्य एवढे म्हटल्याने प्रधान फल कोणते ते निश्च्ित होत नाही, म्हणून प्रधान फळाचे लक्षण स्पष्टपणे प्रस्थापित होत नाही. कंटकोडरण वगैरे गोष्टी सुद्ध! कविविवक्षित आणि नायकोचित आहित. - 'आवृत्तिः छोकातील 'समुत््कर्षात? शब्दाचा संबंध अगोदरच “कवेः प्रयत्नात शी जोडून कवी उत्कर्षाने जे सांगू पहातो ते प्रधान फळ असा अर्थ केला आहे. आता त्या शब्दाचा “"फल्स्य' शी संबेध जोडला आहे. याप्रमाणे ह्या शब्दाचा छोकात दोन निरनिराळ्या प्रकारांनी अन्वय लावला आहे. - 'यदेव' मुद्रित पाठ 'यदेततः आहे. पण 'एतत? संभाव्य नसून अर्थासाठी 'एव' आवश्यक आहे. - 'तावत्यंशे' म्हणजे कथेचा जो भाग नाटकात ग्रथित केला असेल त्यात. - 'इतरपवृत्तेः' मुद्रित पाठ 'इतरप्रवृत्तिः असा आहे. पण हे वचन मागील विधान करण्याचा हेतू दाखविणारे असल्यामुळे पंचमी बिभक्तीत असणे अधिक योग्य, -- -बर्गप्रयत्नस्तावानसो' यातील 'प्रयत्न' ही हस्तलिखितातील 'पर्यन्त' ची दुरुस्ती आहे. 'पर्यन्त' ला येथे काही अर्थ नाही. मुद्रितात हा शब्द नाही. पण प्रयत्न किंवा त्यासा- रखा शब्द आवश्‍यक आहे. 'तावान्‌' हे 'प्रयत्न' 'चे विशेषण. ताबान्‌ म्हणजे नाटकात दाख- वला आहि तितका. - 'तदमात्या- मुद्रितात “तदामात्या- आहे. “तदा? येथे संभाव्य नाही, तत्‌ ने वत्सराजाचा बोध होतो. - 'नायकोचितस्य' नंतर “अपि? अध्याहूत धरणे चांगले. नन्वेवसपि कविविवक्षैव पुनरपि प्रधानीभूता तत्र चोक्तो नियमंहेत्वभाव इति तत्राह विध्यपाश्रयादिति । विधीयत इति विधिः सव्युत्पत्तिः, तस्यापा- श्रयात्‌ । एतदुक्त॑ भवति । याहशी पुरुषार्थे व्युत्पत्तिः कतेव्या तदुच्ितनाय- कग्रहणेन कविः प्रवर्तमानो न स्वेच्छया प्रव्रत्तो भवतीति । हिशब्देन ससुः्चया- भिधायिनेतत्सूचितम्‌ - विध्यपाश्रयाद्युक्ता ये नेतारस्तेषां यत्फलं तस्योत्कषादयः _ कंवेः प्रयत्नस्ततः फलप्राप्तिः समुत्कर्षावलसम्बिनी कल्प्यत इति तात्पर्यम्‌ । पण असे असले तरीही पुन्हा कवीच्या विवक्षेलाच प्राधान्य येते आणि त्यात वर छांगितलेळा नियमन करणाऱ्या हेतूचा अभाव असतो या आक्षेपाळा उत्तर “विध्यपाश्रयात्‌! ह्या शब्दात देतात. ज्याचा आदेश दिला जातो तो विधी, ज्यात बोध अन्तभूत असतो तो; १६९ नाट्यशास्त्र त्याच्या आश्रयाने. याचा अर्थ असा. ज्या प्रकारचा पुरुषार्थासंबंधी बोध द्यावयाचा असेळ त्याला अनुरूप अशा नायकाची योजना करून कथानक रचणारा कवी केवळ सैर इच्छेनुसार वागत नाही. समुच्चयाथेक 'हि' शब्दाने पुढीलप्रमाणे अर्थ सूचित होतो -विधीचा आश्रय केल्यामुळे योग्य असे जे नायक त्यांचे जे फल त्याच्या उत्कृष्टतेमुळे कवीचा जो प्रयत्न त्यापासून समुत्कषयुक्त अशी फलप्राप्ती कल्पिळी जाते हे तात्पये. | “विषव्यपाश्रयातर मागे ह्या बचनाचचे दोन निरनिराळे अर्थ लाबले होते. येथे त्याचा आणखी एक अर्थ लावला आहे. - 'सव्युत्पत्ति:? म्हणजे विधि अथवा आदेश हा बोषयुक्त अथवा ठपदेशदायक असतो. - 'हिशब्देन' हि हे अव्यय समुच्वयार्थी क्वचितच असावे. पण त्या अर्थाच्या साहाय्याने झोकाचा संपूर्ण अर्थ एकत्रित देता आला आहे. त्यात 'समुत्तर्षात चा दोनदा अन्बय लावला आहे. या ोकानंतर बडोदे प्रतीत पुढील अधिक होक कंसात दिला आहे - लौकिकी सुखदुःखाख्या यथावसख्या रसोडूवा । ददाधा मन्मथावस्था व्यवस्था त्रिविधा मता ॥ हा कोक सर्वथा अस्थानी आहे. संसाध्ये फलयोगे तु व्यापारः कारणस्य यः । तस्यानुपूर्व्या विज्ञयाः पश्चावस्थाः प्रयोक्‍तृभिः ।॥। ६॥ प्रारस्भश्व प्रयत्नश्न तथा प्राप्तेश्न संभव! । नियता 'च फलप्राप्तिः फलयोगश्व पश्चमः ॥ ७॥ फलाशी योग सिद्ध होण्यासाठी त्याच्या कारणभूत गोष्टींचा जो व्यापार त्याच्या क्रमवार एकामागून एक अशा पाचच अवस्था होतात - प्रारम्भ, प्रयत्न, प्राप्तीचा संभव, फलप्राप्तीची निश्चिती आणि फळाशी योग ह्या - असे काव्य रचणारांनी जाणावे. अथ कविप्रंयत्नेन साध्ये व्यापारः परिस्पन्दो यो वाडमनसगतस्तस्य या अवस्था आनुपूर्व्येति उद्देशक्रमेणेव प्रयोक्तमिः कविभिर्निबन्धनीयतया ज्ञातव्याः ता उद्दिशति प्रारस्भश्वेति । चकारेस्तथारशान्देन चावश्यंभाविक्रमत्वमासामुच्यते । न हि प्रेक्षापूवेकारिणो$वस्थान्तरासंभावनायां प्रारम्भ उचितो भवति । तत्पा- रस्भश्वेदत्तरोत्तरावस्थाप्रसर एव । पश्चम इत्यनेन क्रमो विवक्षित इति दर्दायति । १ नि साभधकस्य. १९.८ १६२३ आता कवीच्या प्रयत्नाने साध्य करावयाच्या फळाच्या संबंधात जो व्यापार म्हणजे वाणी आणि मन यांचा परिस्पंद त्याच्या ज्या अवस्था योजना करणाऱ्यांनी म्हणजे कवींनी आनुपूर्व्या म्हणजे निर्दिष्ट केलेल्या क्रमानेच प्रथित करणे आवश्‍यक आहे असे जाणले पाहिजे त्या अवस्था 'प्रारम्मश्व' इत्यादी छोकात निर्दिष्ट करतात. अनेक चकार आणि 'तथा? शाब्द ह्यांच्या उपयोगाने ह्या अवस्थांचा क्रम अनिवार्यपणे घडून येणारा आहे असे दाखविळे आहे. कारण, विचारपूर्वक काये करणाऱ्या मनुष्याने इतर अवस्थांची संभाव्यता नसता एखाद्या गोष्टीचा प्रारंभ करणे उचित होत नाही. आणि जर त्याने प्रारंभ केला असेळ तर नंतरच्या अवस्थांना क्रमाने अवसर प्राप्त होतोच. “पञ्चमः' ह्या शब्दाने क्रम अभिप्रेत आहे हे दाखवितात. 'साथ्ये' ह्या शब्दानंतर छोकातील 'फल्योगे? किंबा त्याचा पर्याय टीकेतून गह्याळ झाला आहे असे दिसते. - 'व्यापारः परिस्पन्दः” मुळात 'व्यापारपरिस्पन्दः? असा सामासिक शाब्द आहे. पण नेहमीच्या प्रथेला अनुसरुन कहोकातील “व्यापारः शब्द उद्धृत करून "वाडूनतगतः परिस्पन्दः? अशी त्याची व्याख्या केळी असण्याचाच अधिक संभव आहे. - 'तत्पारम्म£ यातील “तत्‌? म्हणजे प्रेक्षापूवेकारी मनुष्य असे समजलळे पाहिजे. ओत्सुक्‍्यमात्रबन्धस्तु यद्वीजस्य निबध्यते । महतः फलयोगस्य सं फलारम्भ इष्यते ॥ ८॥ मोठ्या फळा'च्या प्राप्तीचे जे बीज त्याची जी केवळ औत्सुक्यरूपाने मांडणी केळी जाते ती फलाची प्रारम्मावस्था मानली जाते. एताः क्रमेण लक्षयितुमाह ओत्सुक्यमात्रबन्धस्त्विति । महतः प्रधानभूतस्य फलस्य युज्यमानस्य तत्तन्नायकोषचितस्य यद्दीजमुपायसंपत्‌ तस्य यदोत्सुक्यमात्रं तद्विषयस्मरणोत्कण्ठारूपम्‌, अनेनोपायेनैतत्सिध्यतीति, तस्य बन्थो हृदये विरूढिः प्रारस्भः । सा च नायकस्यामात्यस्य नायिकायाः प्रतिनायकस्य दैंवस्य वा। तस्या हि तथेवानुमानादू व्यवस्था । देवसाध्यमपि च समुद्रदत्ताभिमतप्राप्ल्या- दिकं पुण्योपाजनं प्रयत्नबहुमानसिद्धये, दैवसहायस्य पुरुषकारस्य फलवातिता तदूव्युत्पत्तिळाभाय च, प्रद्र्येत इत्येवे वण्यत इति । यांची क्रमाने लक्षणे सांगण्यासाठी 'औत्सुक्यमात्रबन्धस्तु' इत्यादी शहोक रचतात. मोठ्या म्हणजे प्रधानभूत असलेल्या, योजावयाचे असलेल्या म्हणजे त्या त्या नायकाला उचित अशा फलाचे जे बीज म्हणजे उपायांची समृद्धी, त्याचे जे केवळ औत्सुक्य, १ नि मात्रं बन्धस्य. २ नि सोडव प्रारम्भ, का स खल्वारम्भ. १६४ नाट्यशास्त्र “ह्या उपायाने हे साध्य होईल' अशा प्रकारे तत्संबंधी स्मरण व उत्कंठा ह्या स्वरूपाचे, त्याचा बन्ध म्हणजे हृदयात दुढारोपण ती प्रारम्मावस्था. आणि ती नायका'ची, अमात्याची, नायिकेची, प्रतिनायकाची किंवा दैवयोगाची असू शकते. कारण, अनुमानाने त्या अवस्थे- ची अशीच व्यवस्था होते. आणि दैवयोगाने साध्य होणाऱ्या समुद्रदत्ताळा अभिप्रेत वस्तूचा लाभ इत्यादी गोष्टी सुद्धा पुण्य मिळविळे असल्याचा परिणाम म्हणून प्रयत्नाचे महत्त्व सिद्ध करणाऱ्या ठरून दैवाचे साहाय्य असलेला प्रयत्न सफल होतो ह्या बोधाचा लाभ प्रेक्षकांना व्हावा यासाठी हे दाखविळे जाते, म्हणून अशा प्रकारे वर्णन केले आहे. “लक्षयितुम? मुद्रितातील 'दर्शयितुम्‌ः' नजरचुकीने आलेळे दिसते. - *होकातील “फल्योगस्य? ची व्याख्या 'युज्यमानस्य फलस्य' अशी केली असून 'युज्यमान' म्हणजे युक्त अथवा उचित अता अर्थ केला आहे तो वरील पाचव्या छोकाच्या अनुरोधाने. - 'तद्विषय- यातील “तत्‌? म्हणजे उपायस्वरूप बीज. - 'सा? म्हणजे अवस्था. - 'तशैव...न्यवस्था? म्हणजे ही प्रारम्भावस्या नायकाची आहे की अमात्याची वगैरे हे अनुमानाने जाणता येते. - “समुद्रदत्तामिमत- पुष्पदूषितक नावाच्या प्रकरणात नायक समुद्रदत्ताला नायिका नन्दयन्तीची प्राप्ती अखेरीस होते ती देवयोगाने, सद्या उपलब्ध नसलेल्या ह्या प्रकरणातील विषयाचा थोडा निर्देश बर १८.४५ व्या आर्येबरील टीकेत केला आहे. प्रस्तुत ठिकाणी असा युक्तिवाद केलेला दिसतो की दैवयोगाने झालेली इप्सितप्राप्ती वस्तुतः पुण्याईमुळे होते आणि ही पुण्याई म्हणजे सत्कृत्याचे फल; तेव्हा याने सत्कृत्य करण्यालाच प्रोत्साहन मिळते. म्हणजे जरी नाट- कात दैवाचे प्राबल्य दिसत असले तरी पुरूषांचे प्रयत्न सुद्धा आवश्यक असलेले दिसितात. या- वरून अश्या नाटकांचाही प्रेक्षकांच्या मनावर योग्य तो परिणाम होतो व देवाचे साहाय्य असलेल्या प्रयत्नांचे महत्त्व त्यांना पटते. - 'पुण्योपार्जनं' आणि 'फल्वर्तिताः ही 'प्रदर्श्यंते' ह्या क्रियापदाची स्वतंत्र कतुपदे. - “एवं वर्ण्यत इतिः हा अंश मुद्रितात नाही. “एवम म्हणजे देवसाध्य असे. | र 4 अपड्यतः फलप्राप्रि व्यापारो यः फलं प्रति । परं चोत्सुक्यगमनं से प्रयत्नः प्रकीर्तितः ॥। ९ ॥ फलाची प्राप्ती दिसत नसल्यामुळे फलासाठी जो व्यापार होतो, आणि परमा- बधीची उत्सुकता उत्पन्न होते, तो प्रयत्न होय असे म्हणतात. अपड्यत इति । तदुपायब्यातिरेकेण फलप्राप्तिमपश्‍यतः फलद्रांनमसंभा- व्यमानं विवेचयतः फलमुदिर्य यो व्यापारः उपायविषयपरमौोत्सुक्यगमनलक्षणः तेन विनेदं फळं न भवाते, तस्मात्स एवोपायो ५ न्वेष्य इत्युपायाविषयस्मरणे- च्छासंतानस्वभावः स प्रयत्नः । १ नि यो व्यापार:. २ नि प्रयत्न: परि-. १९.१० १६५" “अपश्यतः' इत्यादी. त्या उपायारिवाय फला'ची प्राप्ती पाहू न शकणार्‍्याचचा म्हणजे फळाचे दर्रीन असंभाव्य मानणाऱ्याचा फळाच्या उद्देशाने जो न्यापार, उपाया- विषयी पराकाष्टेचे ओत्सुक्य होणे हे ज्याचे लक्षण आहे असा आणि त्या उपायाशिवाय हे फळ मिळत नाही, म्हणून त्याच उपायाचा शोध केळा पाहिजे' अशा प्रकारे उपायाविषयी संतत स्मरण व इच्छा हे खभाव असलेळा (व्यापार) तो प्रयत्न होय. “अपश्यत इति? या शब्दांच्या पूर्वी मुद्रितात “एवम्‌? अधिक आहे. पण 'कोकावर टीका करण्यासाठी त्यातील पहिला शब्द येथे उद्धत केला आहे इतकेच. त्याचा पुढील व्याख्येत अन्तर्भाव नाही. म्हणून “एवम्‌? असंबद्ध राहाते. ईषत्माप्तिथेदा काचित्फलस्य परिकटप्यते । भावमात्रेण तं प्राहुरषिधिज्ञाः प्राप्तिसंभवम्‌ ॥ १०॥ जेव्हा केवळ उपाय उपलब्ध झाल्यामुळे फलाची काही थोडी प्राप्ती कल्पिळी जाते तेव्हा त्या अवस्थेला नियम जाणणारे प्राप्तिसंभव म्हणतात. इषत्प्राभिरित्यादि। भवत्यस्मादिति भावः उपायः। तस्य सहकार्यन्तरयोगः प्रतिबन्धकवारणं च मात्रपदेनापसारितम्‌। तदयमर्थः । उपायमात्रेण लब्धेन यदा कदाचित्‌ विदीष्टफलप्राप्तिरीषत्कल्प्यते संभावनासात्रेण स्थाप्यते न तु निश्ची- यते तदा प्राप्तेः संभवः संभावनायोग्यत्वमसंभावनावोधोष्टत्वं नाम तृतीया कठुरवस्था । | 'इषत्पाप्ति' इत्यादी. ज्यापासून निष्पत्ति होते तो भाव म्हणजेच उपाय. 'मात्र' शब्दाने इतर सहकाऱ्यांचा संबंध आणि अडथळ्यांचे निवारण या गोष्टींचे निराकरण केळे आहे. म्हणून अर्थ असा. उपायच केवळ प्राप्त झाठा असता जेव्हा कधी विशिष्ट फलाची प्राप्ती थोडक्यात कल्पिळी जाते म्हणजे केवळ संभाव्यतेच्या स्वरूपात प्रस्तुत केली जाते, पण निश्चित स्वरूपात नाही, तेव्हा प्राप्तीचा संभव ह्या नावाची संभावनेळा योग्य पण असंभावनेने लक्षित अशा स्वरूपाची तिसरी अवस्था कर्त्याची होते. “अपसारितम्‌? सुद्रित पाठ “अवघारितम' आहे. पण तो असंभाव्य आहे. दोन गोष्टींचे निराकरण अमिप्रेत आहे, त्यांचा समावेश नाही. - “संभावनायोग्यत्वस्‌ इ०' म्हणजे संभाव्यता असली तरी असंभाव्यताही असतेच, १ का -दथंस्य. १६६ | | नाट्यशास्त्र $ 0 ग्रे च ह नियतां तु फलप्राप्ति यदा भावेन पश्यति । नियतां तां फलप्राप्ि संगुणां परिचक्षते ॥ ११॥ परंतु जेव्हा (नायक) फलप्राप्ती उपायामुळे निश्चित झाळेळी पाहतो तेव्हा त्या शुणसंपन्न अवस्थेला नियत फलप्राप्ती असे म्हणतात. नियतां तु फलप्राप्ते यंदेति। फलस्य प्रकर्षेणाप्तिर्यतः सहकारिवर्ग: प्रति- बन्धकविध्वेसनसहिता च सामग्रीरूपा, तां सामग्री यदा तेन भावेन पूर्वोपात्त- तया मुख्योपायेन नियतां नियन्त्रितां फठाव्यभिचारिणीं पर्यति तदा नियत- फलप्राप्तिर्नामावस्था । ननु कर्तरीत्याशड्क्याह सयुणामिंति । गौणी उपचरिता तस्येयमवस्था । नियतफलकतृविषयत्वेन नियतफलप्राप्तिशब्दो विपयविषयिणोर- भेदोपचारादुक्त इति यावत्‌ । अत एव पडयतीत्यनेन दर्दनमेवावस्थेति दार्शितम्‌ । यादे वा सह युणेन दर्दनेन वर्तते नियतफलप्राप्तिदरशनं तन्नामावस्थे- त्यर्थ: । ये त्वकारप्ररछेषादभावेन नियतां सन्देहमयीमिति व्याचक्षते ते नियता फलप्राप्तिः संदिग्धा चेत्‌ कथमेतद्विरुद्ध॑ संगच्छतामिति प्रष्ठव्याः । 'नियतां तु फलप्रापि यदा इत्यादी. फला'ची प्रकर्षाने आप्ती म्हणजे सहकारी- वर्ग आणि अडथळ्यांच्या नाशासहित असलेल्या सामग्रीच्या स्वख्पा'ची, त्या सामम्रीळा जेव्हा त्या भावाने म्हणजे पूर्वीच अवलंबिळेळा असल्यामुळे प्रमुख झालेल्या उपायाने नियत म्हणजे निश्चित झालेळी, फळापासून विचलित न होणारी अशी पहातो तेव्हा नियतफलप्राप्ती नावाची अवस्था अस्तित्वात येते. ही अवस्था कर्त्याची का अशी शांका घेऊन तिचे निराकरण 'सगुणाम्‌! ह्या शब्दात करतात. ही त्याची अवस्था गौणी म्हणजे उप'चारयुक्त आहे. नियत फळाच्या कर्त्याविधयी असल्यामुळे नियत फलप्राप्ति हा शब्द विषय आणि विषयी यांमधीळ अमभेदाच्या उपचारामुळे योजिळा आहे असा याचा अर्थ. म्हणूनच 'पशयति' ह्या शब्दाने दररीन हीच अवस्था हे दाखवितात. अथवा गुणाने म्हणजे दशेनाने युक्त अशी असते, तेव्हा नियतफल्प्राप्तीचे दर्शन ह्या नावाची ही अवस्था असा अर्थ. परंतु जे अकाराची योजना करून 'अभावेन नियताम्‌? म्हणजे संदेहयुक्त अशी व्याख्या करतात त्यांना असे विचारले पाहिजे की नियत फलप्राप्ती संदिग्ध असेळ तर ह्या विरुद्ध वचनाची संगती कशी लावावयाची १ 'यत: सहकारिवर्गः इ०' येथील पाठ निश्चित नाही. हस्तलिखितात “-बर्गा:? बहुवच- नात असून 'सामग्रीरूपता? असा एक शब्द केला आहे. मुद्रितात “-सहितता च सामग्रीरूपतः, १ का च. २ का यत्र. २ नि सगुणा:, का सगुणस्तु विनिदिशेत. ९९१२ १६७ ताः असा पाठ आहे. 'प्रकर्धेण आसिः' म्हणजे काय ते येथे सांगितले आहे. सहकारिवर्ग आणि अडथळ्यांचा नाश यांची मिळून होणारीं सामग्री असा 'प्रकर्षेण आप्तिः चा अर्थ केला आहे हे स्पष्ट आहे. पण यातील 'यतः'चा कोठे अन्बय लागण्यासारखा नाही. 'था' चे ते अपभ्रष्ट रूप असण्याचा संभव आहे. नंतर 'सहकारिवर्गप्रतिबन्धकविध्वंसनरूपा सामग्री असा पाठ असता तर अर्थ स्पष्ट झाळा असता. हस्तलिखितातील आणि मुद्रितातील पाठ अन्बय लावण्यास कठीण आहेत. - “ननु कर्तारे' यात 'कथ' सारखा एखादा शब्द गहाळ झाला आहे असे वाटते. येथे शंका अशी घेतली आहे की ही चौथी अवस्था कर्त्यांची म्हणजे नायकाची आहे असे कसे काय म्हणता येईल? ही शेका उत्पन्न होण्याचे कारण असे दिसिते की फल्प्राप्ति नायकाच्या करतृत्वाशी साक्षात संबद्ध नाही, पहिल्या तीन अवस्था त्याच्या कर्तृत्वाशी संबद्ध आहेत, तशी ही नाही. मग ती त्याची अवस्था असे कसे म्हणता येईल? - 'गौणी? हा लक्षणेचां एक प्रकार आहि. झछोकातील 'सगुणाम? शब्दाचा लावलेला हा अर्थ पटणे कठीण आहे. - 'अमेदोपचारादुक्तः' अभेदरूप उपचारामुळे शब्द लाक्षणिक अर्थाने वापरतात. फल्प्राप्ती- चा कर्ता आणि फलप्राप्ती यांत मेद नसल्यामुळे नायकाविषधयी “फलप्राप्तिः ह्या शब्दाचा उपयोग असा लाक्षणिक अर्थाने केला आहे. 'उक्त? च्या ऐवजी 'युक्तः? असा मुद्रित पाठ आहे. पण 'उक्तः' अधिक योग्य वाटतो. - 'यदि बा इ० यात 'सगुणाम्‌ शाब्दाची दुसरी व्याख्या केली आहे. गुण म्हणजे दर्शन असा अर्थ केला आहे. - “अकारप्रश्लेषात? म्हणजे शोकातील 'यदा- भावेन' याचा 'यदा अभावेन' असा संधि सोडविला आहे. ही व्याख्या कोणत्या टीकाकारानें केली होती ते सांगितलेळे नाही. अभिप्रेत समग्रें च मतिरूपं क्रियाफलम्‌ । होतेटत्ते भवेद्रस्मिन्‌ फलयोग' प्रकीर्तितः ॥ १२॥ ज्या कथानकात इच्छिलेळे, पूणे आणि योग्य असे क्रियेचे फळ उपलब्ध होते त्याला फलयोग असे म्हृणतात. अभिप्रेतं समग्र चेति । यस्मित्नितित्रत्ते कत्रेवस्थात्माने नायकस्याभिप्रेतं, ताहडमपि च नानुचितम्‌ अपि तु प्रतिरूपमुचितं, संभवात्पूर्ण, क्रियाफलामेति समनन्तरफळलं, न च विधिफलमिव स्वगांदि कालान्तरापेक्षि, वण्यंते, सावस्था नायकस्य फळयोगः फळोत्पत्तिर्नाम । तत्र सचिवामात्यादेरपि यावस्था सा वस्तुतो नायकगामिन्येव भवतीति नाटकेषु नावड्यं सर्वा नायकस्य साक्षा- देवोपनिबन्धनीयाः, आपि तु सचिवादिंगतत्वेनापि, फळयोगस्तु साक्षादेव तडूत इत्याभिप्रेतामित्यनेन दार्शीतम्‌ । अवस्थान्तराणि सचिवादिगतान्यपि पयेवस्यन्ति नायकादेरेवेत्येतदेव खुकाविना रत्नावल्यां 'प्रारम्भे$स्मिन्‌ स्वामिनः सिड्िहिती' इति *छोकेन प्रतिपदमुत्तवा अस्मदभिप्रायः समुच्छितेन दारितः । १ का यद्दृव्यते निवृत्त तु फलयोग: स उच्यते. १६८ नाट्यशास्त्र “अभिप्रेत समग्रं च' इत्यादी. कर्त्याच्या अवस्थेच्या स्वरूपाच्या ज्या कथानकामध्ये नायकाला अभिप्रेत असलेले, तसे असूनही अनुचित नसलेले इतकेच नव्हे तर प्रतिरूप म्हणजे उचित असलेले, संभाव्यतेप्रमाणे पूर्ण असे क्रियाफळ म्हणजे लगेच मिळणारे फल, यज्ञविधीच्या स्वर्गादी फलाप्रमाणे कालान्तराची अपेक्षा असणारे नव्हे, वर्णिळे जाते ती नायकाची अवस्था फलयोग म्हणजे फलोत्पत्ती ह्या नावाची होय. त्यात सचिव, अमात्य आदाँची जी अवस्था ती वास्तविकपणे नायकालाच प्राप्त होणारी असते म्हणून नाटकां- मध्ये सर्वे अवस्था प्रत्यक्ष नायकाशी'च संबद्ध असलेल्या दाखविणे आवश्‍यक नाही, तर सचिवादीशी संबद्ध अशाही दाखविण्यास हरकत नाही; परंतु फलयोग मात्र त्याच्याशीच साक्षात संबद्ध असावा हे “अभिप्रेत” या शब्दाने दाखविले आहे. इतर अवस्था सचिव आदोंशी संबद्ध असल्या तरी त्यांचे पर्यवसान नायकाच्याच ठिकाणी होते हेच महाकवी श्रीहर्षाने रत्नावळी नाटिकेत “स्वामीच्या सिद्धीस कारणीभूत होणाऱ्या ह्या उद्योगात! इत्यादी 'छोकात स्पष्ट शब्दांत सांगून आमच्या मताळा जोरदार पुष्टी दिली आहे. 'रत्नावल्यास? संपूर्ण क्छोक पुढीलप्रमाणे आहे - प्रारम्भेःस्मिन्‌ स्वामिनो वृद्धिहेतो देवेनेत्थ दत्तहस्तावलम्ये । सिद्धे््रान्तिर्नांस्ति सत्यं तथापि स्वेच्छाचारी भीत एवास्तमि भ्तुः ॥ १.७. पथम चरणात अमिनवयुप्ताचा 'सिद्धिहेतो? अस्ता पाठ आहे. - 'प्रतिपदम? म्हणजे स्पष्ट शब्दांत, - “समुच्छितेन' हस्तलिखितात या ठिकाणी 'अस्मदभिप्रायसंमूच्छितेन दर्दितम' असा पाठ आहे. परंतु “अभिप्राय” असा कर्ता असलेले स्वतंत्र वाक्य अधिक चांगले. 'समुच्छितेन? हे क्रियाविशोषण समजावे लागते. ते विशोष समाधानकारक नाही आणि शब्दही विशेष समरषैक नाही. तथापि तो स्वीकारल्याशिवाय गत्यंतर दिसत नाही. | €" ६ 6. सवेस्येव हि कार्यस्य पारधस्य फलााथीभेः । एतास्त्वतुक्रमेणेव पश्वावस्था भवन्ति हि ॥ १३॥ फलाची इच्छा करणाऱ्यांनी सुरू केलेल्या कोणत्याही कार्याच्या ह्या पाच अवस्था कमराः होतातच. ___ ननु मानुषव्यापारे नायकस्य तत्सचिवादेवा भवन्त्वेता अवस्थाः । प्रतिनायके- 5प्येवं, तत्र परमसदुपायांपेक्षया । यत्र तु दैवायत्तं फलं वर्ण्यते तच कथम । न च वण्यंम पुरुषकारमात्राभिमानिनां दैवमवजानानानां चार्वाकादिमतमुपेयुषां दैवबह- १ नि एता अनु-, का यथानुक्रमशो ह्येताः. १९.१३ १६५९ मानव्युत्पत्तये हि पुरुषकारो5प्यफलस्तदभावो$पि सफलः प्रदर्हानीयः, अत एव दरिद्रचारुदत्तादिरूपकाणि तद्विषयाणि इति । तस्माद्दैवायत्ततवे कथमेतदवस्था- पश्वकम्‌ । तत्परिहतुमाह सर्वस्यैव हीति । दैवादागच्छतो5पीत्यर्थ: । तत्रापि हि यद्यपि नायको न प्रवर्तते तथापि यत्र फळं भवति तत्राव्यमवस्थाभिर्भाव्यम । स एव च परं फळेन तदानीमर्थी भवति । यमर्थमधिकूत्य प्रवर्तत इति हि प्रयोजनलक्षणं वदन्ति । तथाहि सेवाद्यशेषोपायप्रारस्भ॑ विनानन्दसंपादनहृदय एव । अपरथा परतः प्राप्तमपि फलं नाड़ीकुयात्‌ । अनड्लीकरणे$पि चास्य फलाथिंत्वमेव, आधिकफलान्तरसंतोषमनु प्रसिद्धयादिफलान्तराभिसंघानात्‌ , इति युक्तमुक्त मुनिना सर्वस्येव पश्चावस्था इति । या ठिकाणी आक्षेप असा - जेथे मनुष्यांचा उद्योग असतो तेथे नायकाच्या किंवा त्याच्या सचिव आदीच्या ह्या अवस्था असू द्या. प्रतिनायकाच्या बाबतीतही तेच, केवळ तेथे दुष्ट उपायांच्या दृष्टीने त्या अवस्था असतात. परंतु जेथे फल दैवावर अवलंबून असते तेथे ह्या अवस्था कशा समजावयाच्या ? आणि श्रयत्नवादाचा अभिमान बाळगणारे, दैवाची हेटाळणी करणारे असे जे चार्वाक आदोंच्या मताचे अनुयायी असतात त्यांना दैवाचे महत्त्व पटविण्यासाठी पुरुषप्रयत्न विफळ झालेळे आणि प्रयत्नांच्या अभावीही फल प्राप्त झालेले दाखवावयाचे असते आणि म्हणूनच दरिद्र- . चारुदत्त इत्यादी रूपके त्या विषयावर आहेत? अशा तऱ्हेचे विवरण करू नये. तेव्हा फळ दैवाधीन असता ह्या पाच अवस्था कशा समजावया'च्या ? या आक्षेपाचा परिहर 'सवेस्थेब हि? इत्यादी 'छोकात करतात. सर्व म्हणजे दैवाने होत असलेल्या कार्याच्या ही असा अथ. कारण तेथे सुद्धा जरी नायक प्रवृत्त होत नाही तरी जेथे फलनिष्पत्ती होते तेथे ह्या अवस्था अवश्य असतातच. आणि नंतर तोच त्या फलाचा अर्थी होतो कारण जी गोष्ट मनात योजून मनुष्य उद्युक्त होतो ते प्रयोजन अशी त्याची व्याख्या करतात. उदाहरणाथे, सेवाप्रभ्वती सर्व उपायांच्या योजनेशिवाय आनन्द प्राप्त करण्याची इच्छा त्याच्या मनात असते'च. नाही तर दुसऱ्याकडून मिळालेले फळ तो स्वीकारणार नाही. आणि जरी त्याने स्वीकार न केला तरी त्याचे फळाविषयीचचे अर्धित्व असते'च, कारण संतोषरूमी दुसरे अधिक फल प्राप्त झाल्यावर त्यापाठोपाठ प्रसिद्धी वगैरे इतर फळाचे अनुसंधान होते; म्हणून सर्वच कार्याच्या पाःच अवस्था असे भरतमुनीने म्हटले आहे ते योग्यच आहे. | 'भबन्त्वेता” मुद्रित पाठ “भवन्त्येता? आहे. परंतु आक्षेपाच्या वचनात “भवन्तु? अधिक समुचित. -- 'न च वर्ण्यम्‌' याचा संबंध “तद्रिधयाणि इति? येथपर्यंत आहे. ते स्पष्ट करण्यासाठी मुळात नसलेला 'इति” दाब्द घातला आहे, आक्षेपकाचे म्हणणे असे आहे की कार्य दैवयोगाने घडून १७० नास्यशास्त्र येते तेव्हा त्याच्या अवस्था कशा समजावयाच्या ह्या त्याच्या प्रश्नाचे उत्तर 'पुरुषकार .. . . तद्विषयाणि' ह्या शब्दांत समाधानकारकपणे मिळण्यासारखे नाही. आणि हे त्याचे म्हणणे बरो- बर आहे. कारण त्यात दैवाधीन कार्याच्या अवस्थांची उपपः्ती दिलेली नसून नाटकात दैवाभ्ीन कार्यसिद्धी कश्यासाठी दाखबावया'ची त्याचे स्पष्टीकरण आहे. -“ अवजानानानां ) ही मुळातीव्ळ ' अवजानानां ' चीं दुरुस्ती आहे. ज्ञा धातूचे धातुसाधित विशेषण “ जानान ? असे असल्यामुळे त्याचे षष्टीचे बहुवचन “ जानानानाम्‌' असेच होणार . - * मतमुपेयुषाम ! हस्तलिखितात “अपेयुषाम्‌? असा भ्रष्ट पाठ आहे. मुद्रितात “एयुषाम्‌' आहे. पण 'उपेयुषामः अधिक संभाव्य आहे. या शब्दानंतर मुळात 'सः' अधिक आहे. पण त्याचा वाक्यात कोणत्याही प्रकारे अन्वय लावणे शक्य नसल्यामुळे तो शब्द गाळला आहे. - '*न प्रवर्वते! हस्तलिखितात “न वरतते' आणि मुद्रितात 'न यतते' आहे. पण 'प्रवरततेर हेच क्रियापर मूळ असण्याचा . संभव आहे. - “स एव च इ०? 'होकातील फलाथिंमिः ह्या शब्दाची उपपत्ती सांगण्यासाठी हे वाक्‍य ब पुढील बाक्‍्ये योजिली आहेत. - 'यमर्थम्‌ इ०' 'फलार्थिन? मधील “अर्थः म्हणजे प्रयोजन हे सांगण्याच्या उद्देशाने प्रयोजनाचची ही व्याख्या येथे उद्धत केली आहे. - 'सेवाद्ररोषो- इ ०? ह्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट नाही. त्याचा असा आशय दिसतो की स्वतः काहीही उपाय- योजना न करता एखाद्या फुलाचा लाम झाला तर मनुष्याचे हृदय आनंदाने भरून येतेच व तो त्या फलाचा स्वीकार करतो. दैवाधीन फल असता नायकाच्या बाबतीत ही गोष्ट घडते. म्हणून तेथेही नायक फलार्थी असतो असे म्हणावयास हरकत नाही. - “चास्य' ही हस्तलि- खितातील “हास्य” ची दुरुस्ती आहे. मुद्रितातील “बास्य? पेक्षा “चास्य' अधिक समर्पक, -- 'अधिकफलान्तर- इ०? याचा अर्थ असा दिसितो की प्रत्यक्ष फलाचा स्वीकार न केला तरी संतोष आणि प्रसिद्धी इत्यादी इतर फळे अनायासे प्राप्त होतातच. समासात 'अधिकफलान्तर? हे संतो- षा"चेच वर्णन आहे. आसां स्वभावभिन्नानां परस्परसमागमात्‌ । विन्यास एकभावेन फंल्हेतुः प्रकीर्तितः ॥ १४॥ स्वभावतः भिन्न असलेल्या ह्या अवस्थांच्या परस्पर समागमाने एकरूप झालेत्ठी त्यांची योजना फलसिद्धीला कारणीभूत मानळी आहे. | नन्वासां तावत्स्वभावभेदः कालभेदश्व, कालभिन्नानां चैककालत्वाभावाल 'संसाध्ये फलयोगे तु व्यापारः कारणस्य' इति यदुक्त॑ तत्कथम्‌, किंच फलयोगा साध्ये पश्चावस्थाः कारणस्येति पश्चमीहावस्था फळयोग एव न तु सा काचिदन्य- त्याहड्क्याह आसां स्वभावभिन्नानामिति । स्वभावभेदेन कालभेदो5प्युपलक््यते स्वभावभेदे दिक्काले दण्डचक्रादिभिरेकफलसंपादना । तेन कालभिन्नानामपि आस्सां १ नि तासां. २ का फलाय परिकल्प्यते. १९.१४ १७१ परस्परमन्योन्यं संगत्या नान्तरीयकत्वेन यदागमनं तदवलमस्न्य यो विन्यासः यः फलंहेतुस्तत आद्यन्तापकषणम्‌ , निश्चितोत्तरोत्तरकार्याणां कारणकारणानामापे हेतुत्वानपायादातते भावः। यच्चोक्त फळयोगे कथं फलयोगान्तराभेति तत्राप्याह एकभविन फलंहेतुरिति । एकभावः संबन्धथः । तेनायं भावः । फलस्योत्पत्त्यवस्था एका नायंकेन सह संबद्धा, द्वितीया येयं संसाध्ये फळयोग इत्यत्र निदिष्टा । पूर्वा त्ववस्था मध्ये तेन युज्यमाना योग्यफलोत्पत्तिदारींता पश्चस्यवस्थेत्यर्थ : । येथे रांका अशी - ह्या अवस्थांच्या स्वरूपात भेद आहे तसेच त्यांच्या काळातही भेद आहे. आणि अ्यांच्या काळात भेद आहे त्यांचा काळ एकच नसल्यामुळे “फलयोग साध्य करावयाचा असता कारणाचा व्यापार' असे जे वर म्हटले आहे ते कसे ? शिवाय फळयोग साध्य करावयाचा असता कारणाच्या पाच अवस्था असतात त्यांतील पाचवी अवस्था म्हणजे फळयोगः'च, ती काही दुसरी कोणती अवस्था नाही. ह्या शंकेचे समाधान 'आसां स्वभावभिननानाम्‌' यात करतात. स्वभावमभेदाने कालभेद सुद्धा उपलक्षित होतो. स्वरूपात मिन्ता असूनही दण्ड, चक्र इत्यादींनी घधटाच्या रूपात एक फळ संपादित होते. म्हणून ह्या अवस्थांत कालभिन्नता असली तरी त्यांचे परस्पराशी म्हणजे एकमेकाशी संगतीने म्हणजे मध्ये काहीही वेळ जाऊ न देता जे आगमन त्याचा अवलंब करून जो विन्यास म्हणजे फळाचे जे कारण त्यापासून आदिपासून अंतापर्यंत विस्तार तो होतो; कारण उत्तरोत्तर होणारी कार्ये निश्वित असली तर कारणाचे जे कारण त्याचे नंतरच्या कार्याचेही कारणत्व नाहीसे होत नाही असा भावार्थ. आणि फलयोगामध्ये दुसरा फलयोग कसा असू शकेळ अशी जी शांका घेतळी आहे तिचे समाधान “एकभावेन फलहेतुः' या शब्दांत करतात. एकभाव म्हणजे संबंध. म्हणून अर्थ असा. फळाची उतत्तिरूप एक अवस्था नायकाशी संबद्ध असते, दुसरी 'संसाध्ये फळयोगे' यात निर्दिष्ट झाळी आहे ती. पण पहिली अवस्था म्हणजे मध्ये त्याच्याशी संबद्ध होऊन योग्य अश्या फलाच्या उयत्तीने निदर्डिीत अशी पाचवी अवस्था असा याचा अर्थ. 'कालमिन्नानां' मुळात “'कालामिन्नानां' आहे. ते अर्थात बरोबर नाही. - 'तत्कथम? वर सहाव्या छोकात फलयोग साधाबयासाठी व्यापार होतो असे म्हटळे आहे. तो व्यापार एकच असल्यामुळे त्याला लागणाऱ्या कालाचे खंड पडणार नाहीत, म्हणजे त्यात कालमिन्नता येणीर नाही. पण अवस्था मिन्न मिन्न कालात अस्तित्वात येतात. तेव्हा याचा सेळ कसा घालावयाचा असे या शंकेचे स्वरूप दिसते. - “किं च फल्योगे इ०' या वाक्यात थोडी दुरुस्ती सुच- विली आहे. मुळात “साध्ये? नंतर आणखी एक “च? आहे, 'किं च' असता त्याचा काहीच आवडइ्यक्ता 'नाही, म्हणून तो गाळला आहे. मुळातील. 'तत्राबस्था' च्या जागी 'पञ्चावस्था? असा पाठ स्वीकारला आहे. 'तत्रः प्रस्तुत ठिकाणी अर्थहीन आहे आणि 'पञ्चावस्था: हे शब्द वर सहाव्या श्लोकात आलेलेच आहेत. पुढे पळ्चेतीहावस्था' या मुळातील पाठाच्या १७२ नाट्यशास्त्र जागी 'पश्चमीहावस्था' अशी दुरुस्ती केली आहे. पञ्चमी असे अवस्थेचे विशेषण आवश्यक आहे आणि मुळातील 'इति” निर्थक आहे. शेवटीं “कदाचित? ची 'काचित? अशी दुरुस्ती केली आहे. 'काचितर अधिक समर्पक आहे हे उघड आहे. आक्षेपाने घेतठेली ही दुसरी शंका अश्शी को फलयोग साध्य करावयाचा असता पाच अवस्था होतात, म्हणजेच ह्या फल्योगाच्या पाच अवस्था होत. मग त्यापैकी एकीला - पाचवीला - फल्योग असे नाव दिळे आहे. तिच्यात आणि वरील फल्योगात फरक नाही. तेव्हा हे कसे १ - 'स्वभावमेदेन' ही मुळातील “स्वभाब- भेदे तु' ची दुरुस्ती आहे. 'तु' येथे अर्थहीन आहे. आणि उपलक्षित करणारा शब्द तृतीयेत असण्या'चाच संभव आहे. - 'स्वमावभेदे दिक्काळे' यातील 'दिक्काले' ची काही अर्थसंगती लाग- ण्यासारखी नाही. 'स्वभावभेदे' नंतर '5पिः आवद्यक वाटतो. - 'तेन' हा शब्द 'तथाः' ह्या अर्थी वापरठेळा असावा. कारण 'म्हणून' असा अर्थ योग्य वाटत नाही. मिन्न स्वरूपाच्या गोष्टींनी एकच कार्य सिद्ध होते म्हणून मिन्न कालातील गोष्टींनीही एक कार्य सिद्ध होऊ शकते असा युक्तिवाद कसा करता येईल £ वस्तुतः समूळ ोकात स्वभावमिन्नतेचाच निटेंश आहे, कालमिन्नतेचा मुळीच नाही. पण अमिनवगुप्ताची सर्व टीका कालमिन्नतेच्या अनुरोधाने केळेली आहे. - 'संगत्या”/ असा होकातील “समागम? मधील 'सम्‌? ठपसर्गाचा अर्थ केला असून *नान्तरीयकत्वेन” अशी त्याची व्याख्या केली आहे. - 'यः फल्हेतु:! ही हस्तळिखितातील 'यत्फल्हेतु” ची दुरुस्ती आहे. मुद्रितात 'यत्फलमेद!' असा पाठ आहे. पण 'भेद? संमाव्य नाही. -'ततः? म्हणजे त्या फलहेतुपासून, - “आद्यन्तापक्षणम्‌? मुद्रित पाठ “-बहषेणंर आहे. पण तो बरोबर वाटत नाहो. “ततः ह्या पंचम्यर्थ शब्दानंतर 'अपकर्षण? च अधिक समर्पक आहे. 'यः फलंहेतु: ततः आद्यन्तापकर्षणम? ही 'बिन्यासः? ची व्याख्या आहे पण यानंतर काही शब्द गहाळ झाले असावेत असे वाटते. 'यो विन्यासः' ने सुरुवात झालेले वाक्‍य पूर्ण केलेळे नाही. छळोकातील 'प्रकीर्तितः? चे विवरण करणारे शब्द मुळात होते ब ते पुढे लेखनदोषाने लुप्त झाळे असा संभव आहे. - “फल्योगे? म्हणजे पाचही अवस्थाभर पसरलेल्या फल्योगामध्ये, - “फल्योगान्तरम्‌? म्हणजे पाचव्या अवबस्थेतींल फल्योग. - 'पूर्वा? म्हणजे ह्या ज्या दोन अवस्था सांगितल्या आहेत त्यांपैकी पहिली. - “मध्ये तेन? मुद्रित पाठ 'मध्यत्रयेण' असा आहे. पण तो संभाव्य वाटत नाही, मधल्या तीन अवस्थांचा अश्या प्रकारचा निदेश सेंमवनीय नाही. “तेन? म्हणजे 'नायकेन' असे अभिप्रेत आहे. - 'योग्यफलोतत्तिदर्शिताः हस्तलिखितातील “-त्पत्तिदेशिता' ची ही दुरुस्ती आहे. ती आवश्यक आहे. मुद्रित पाठ * -तत्तिदर्शांना' आहे तो विशेष समर्पक नाही. » पि रर च ह"> इातिटतं समाख्यातं प्रत्यगेवाधिकारिकम । तदारम्भादि कर्तव्यं फलान्तं च यथा भवेत्‌ ॥ १५॥ पूर्वी जे मुख्य कथानक म्हणून सांगितले त्याची प्रारम्भावस्थेपासून सुरुवात करावी व फलप्राप्तीने शोवर होईल असे करावे. १ का यथाख्यातं पुरस्तादाधि-. १९.१६ | १७२३ एवमवस्थापश्चकं प्रद््य तदनुयायित्वेनेतिवृत्तस्याधिकारिकत्वे समर्थयितु- माह इतिव्रत्त॑ समाख्यातामिति । यद्यस्मात्‌ तत्कतंन्यं कार्य वस्तु आरम्भादि. फलान्तं च तदिति तस्मात्‌ तदवस्थानुयायित्वेनाधिकूतत्वादाथेकारिकमुच्यते । चस्तुराब्दस्यार्थे । यथा तु तदितिवृत्तशब्दवाच्यं भवेत्‌ तथा प्राक्सस्यगाख्यातम्‌ इतिराब्दाथनिरूपणेन 'पश्चाभि ! संधिभिस्तस्य विभागः? इत्यनेन। एतः्च तद्वूत- वक्तव्यान्तरोपक्षेपाय पुनरभिहितम्‌। याप्रमाणे पाच अवस्थांचे निरूपण केल्यावर त्यांचा अवलंब केल्यामुळे इतिवृत्त आधिकारिक होते असे समर्थन करण्यासाठी 'इतिवूत्त॑ समाख्यातम? इत्यादी सांगतात. यत्‌ म्हणजे ज्याअर्थी ते कतेब्य म्हणजे र्चाबयाचे असळेळे कथानक आरंभापासून सुरू होऊन फलात अंत पावते, तत्‌ म्हणजे त्याअर्थी त्या अवस्थांचा अवलंब केल्या- मुळे अधिकृत होते, म्हणून त्याला आधिकारिक असे म्हणतात. “च' शब्द तु म्हणजे परंतु ह्या अर्थी वापरला आहे. परंतु ते कथानक इतिवृत्त शब्दाने निर्दिष्ट कसे होऊ शकेळ ते पूर्वी सुस्पष्टपणे सांगितळे आहे - 'पाच संघींनी त्याचे भाग' इत्यादी शब्दांत केलेल्या 'इति' शब्दाच्या बिवरणात. आणि त्यासंबंधात दुसरे काही सांगावयाचे आहे त्याचा उपक्षेप करण्यासाठी हे येथे पुन्हा सांगितले आहे. “तदनुयायित्वेन' कथानक पाच अवस्थांना अनुसरून रचिळे जाते हे 'तदनुयायि' मध्ये अभिप्रत आहे. - 'यतू' वस्तुतः हा शब्द छोकात नाही आणि तो त्यात असण्याची तंभा- व्यताही नाही. झोकाची व्याख्या करताना अन्वय फार ओढाताण करून लावला आहे. - 'इतिराब्दार्थनिरूपणेन' ही दुरुस्ती आहे. 'इतिशब्दार्थमिति निरूपणेन? ह्या मुळातील पाठात अधिक असलेला 'इति? शब्द निरर्थक आहे. आणि सर्व मिळून एक समास असणे आवश्यक आहे. - 'प्चमिः इ०? हा वरील पहिल्या झोकाचा उत्तराध॑ आहे. त्या उत्तरार्धात इतिवृत्त शब्दातील इति शब्दाचा अर्थ विषद केला आहे असे अभिनवगरुप्ताने त्या ठिकाणी सांगितले आहे. - 'तद्वतः म्हणजे इतिवृत्तासंबंधी, - “बक्तव्यान्तर' संधि, अर्थप्रकृति इत्यादी. पूणेसंधि च कर्तव्यं हीनसंध्यापे वा पुनः | नियमात्पूर्णसांधे स्याद्धीनसंध्यय कारणात ॥ १६॥ आणि ते कथानक सर्वे संधीनी पूर्ण असे करावे अथवा काही संघीनी विरहित असेही करावे. नियमाप्रमाणे ते पूणेसंधि असावे व कारणपरत्वे हीनसंधि करावे १ नि त तत्कार्यं. २ नि पञ्वसंधि १७४ नाट्यशास्त्र ननु किं सर्वत्र पश्वैव संधय इत्याह पूणसंधि चेति । विकल्पः सवंत्रति काश्विदाराह्षते तं प्रत्याह नियमादिति । उत्सर्गणेति केचित्‌ । उपाध्यायास्त्वाहुः । सर्वच्रेतिवृत्तं प्चसंध्येव। न हि काश्चिदपि व्यापारः प्रारस्भाद्यवस्थापश्वकं विनास्ते ऊनीकूत्य वा। उक्त हि- सवस्येंव हि कार्यस्य प्रारूधस्य फठार्थिमिः । एतास्त्वनुक्रमेणेव पश्चावस्था भवन्ति हि ॥ इति। अवस्थापश्चकानुयायेना संधिपश्चकेनापि भाव्यमेव । तेन सर्व नियमात्पश्नसंधि । हीनसंधित्वं तु तत्र कारणादपूणांडत्वलक्षणादुच्यते । अत एव पूर्णसंध्यपि व्यपदिड्यते इत्यपिशब्देन चोक्तम्‌ । सर्वत्र पाचच संधी असतात का या प्रश्नाचे उत्तर 'पूर्णसंधि च? इत्यादी शब्दांत देतात. सर्वत्र विकल्प असतो काय अशी जो शांका घेईल त्याळा “नियमात! ह्या शब्दात उत्तर देतात. उत्सग॑ करून अशी काहींची व्याख्या आहे. परंत आमचे गुरुजी म्हणतात - सर्वेत्र इतिवृत्तामध्ये पाच संधी असतातच. कारण कोणताही व्यापार प्रांभ आदी पाच अकस्थांशिवाय अथवा त्यांपैकी काही कमी करून असत नाही. मागे म्हटलेळेचे आहे की “फलाची इच्छा करणाऱ्यांनी प्रारंभ केलेल्या कोणत्याही कार्याच्या ह्या पाच अवस्था अनुक्रमाने होतातच.' आणि पाच अवस्थांना अनुसरून असणारे पाच संधी असलेच पाहिजेत. म्हणून सर्वे कथानकात नियमाने पाच संधी असतात. परंतु त्यात हीनसंधित्व असल्याचे म्हणतात ते संधींची अंगे पूर्ण नसतात ह्या कारणामुळे. म्हणूनच “पूर्णसंधि ' असा सुद्धा त्याचा निर्देश होतो हे ' अपि! शब्दाने दाखविले आहे. | | _ “< टत्सरगेणेति केचितः नियम शब्दाचा काही टीकाकारांनी उत्सर्ग असा अर्थ केला होता, तो अमिनवगुप्ताला मान्य नाही. यावरून उत्सर्ग शब्द “त्याग, कमी करणे? अश्शा भिन्न अर्था- नें वापरला आहे असे उघड दिसते. - “विनास्ते ऊनीकृत्य वा? हस्तलिखितात येथे “इति विद्यास्ते औनीकृत्य बाः असा पाठ आहे. त्यातील “इति? अनावश्यक आहे, 'औन? असे ऊन पासून भाववाचक रूप बनविण्याचे काही प्रयोजन नाही आणि 'विद्यास्ते' हा उघडच भ्रष्ट पाठ आहे, मुद्रित पाठ “विना सिद्धथेत्‌, न शकक्‍यमौनीकृत्यं बा' आहे. त्यात शुद्धी करणाचा प्रयत्न केठेला दिसतो. तो मूळ पाठ . असण्याचा संभव कमी. -- 'सर्वस्येव इ०? हा बरीळ तेरावा स्कहोक, - पूर्णसंध्यपिः मुद्रित पाठ 'पूर्णसंधीतेः आहे. पण तो बरोबर नाही. “अपि आवद्यक आहे. १९.१७ . १७५ एकलोपे चतुर्थस्य द्रिलोपे त्रिचतुर्थयोः । द्रितीयत्रिचतुथांनां त्रिलोपे लोप इष्यते । १७॥ एका संधीचा ळोप करावयाचा असल्यास चौथ्या संधींचा ळोप करणे इष्ट होय, दोन संधींचा लोप करावया'चा असल्यास तिसऱ्या व चौथ्या संधींचा आणि तीन संधींचा लोप करावया'चा असल्यास दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या संधींचा होप करणे इष्ट होय. हीनसंध्यपि वा पुनरिति । “'डिमः समवकारश्व चतुःसंधी' इति वक्ष्यते, तत्रावमरशस्य लोपः । 'व्यायोगेहामृगी चापि सदा कार्यो त्रिसांधिकी' ततः गर्भावमर्शयोलोपः । 'द्विसंघि तु प्रहसन वीथ्यडुने भाण एव च' तत्र प्रति- मुखगभांवमर्शानां ठोपः । त्रिशब्देन तूर्तायो ळक्ष्यते । तत्रोपक्रमोपसंहारो तावत्सवेत्रावश्यंभाविनी । तत्र तु ये प्रेक्षापूर्वकारिणो विततं कतंव्यं बहुफल- मारभन्ते तेषां पश्थवैव संघयः । आ.तिसदिष्णुत्वेन शडक्यमानाविरुद्धप्रत्यय- स्यापाकरणे 'दवो प्रतिषेधी विधिं द्रढयतः इति न्यायात्सुरढो हि भवत्येषां फळयोगः । डिमादिनायकास्त्वत्युद्धतप्रायत्वात्‌ नातीव विनिपातमाहाडुन्ते । व्यायोगादिनायका आपि तारतम्येन फलयोगाडदभावं नाद्रियन्ते । प्रहसना- दिनायकास्त्वघर्मप्रायत्वात्‌ तार्दितिवृत्तस्य चविंतशरीरत्वादुपक्रमोपसंहारमात्रे विश्राम्यन्ति । इत्यपूणी अवमशांदयः । “हीनसंध्यपि बा पुनः' याचे पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण. “डिम ब समवकार यात 'चार संधी असतात' असे पुढे म्हटळे आहे. त्यात अवमशेसंधीचा लोप होतो. '*व्यायोग आणि इंहामृग नेहमी तीन संधीनी युक्त करावेत ' म्हणून त्यात गर्भ व अवमशे द्या संधींचा ळोप होतो. “पण प्रहसन, वीथी, अडुः आणि भाण दोंन संधींनीच युक्त असावेत' तेव्हा त्यांत प्रतिमुख, गभे आणि अवमशी ह्यांचा लोप होतो. 'त्रि' शब्द तिसरा ह्या अर्थी वापरला आहे. यांपैकी उपक्रम आणि उपसंहार ह्या दोन गोष्टी तर सर्वत्र असा- व्याच लागतात. परंतु त्यात जे नायक आधी विचार करून दीघे, पुष्कळ फलाने*युक्त अशा कार्याचा आरंभ करतात त्यांचे पाचही संधी होतात. दुःख सहन करण्या'ची शक्ती असल्यामुळे संभाव्य अशा विरोधी प्रत्ययांचे निराकरण करताना “दोन निषेधांनी विधि दढमूळ होतो! या न्यायाने ह्या नायकांचा फळ्योग सुदृढ होतो. पण डिम आदींचे नायक प्रायः अती उद्धत स्वभावाचे असल्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त हाणार नाही अशी शांका मुळीच येत. नाही. ब्यायोग आदींचे नायक सुद्धा कमी अधिक प्रमाणात फलयोगाचे १ नि चतुर्थेस्येकलोपे त. १७६ नार्यशास्त्र अंगी होण्याची पर्वा करीत नाहीत. प्रहसन आदींचे नायक तर प्रायः घर्मरहित असल्यामुळे त्यांच्या इतिवृत्ताचे शरीर चोथा झालेळे असते म्हणून ते केवळ उपक्रम व उपसंहार यांत विश्रांत होतात. याप्रमाणे अवमरा आदी संधी अपूण होत. “डिमः समवकारश्व इ०' येथे उद्धत केलेले कछोका्थ पुढे ४२-४४ ह्या 'ोकांत आढळतील. वस्तुतः सधीसंबंधीची या ब मागील १६ व्या कोकांतील विधाने संधींचे स्वरूप स्पष्ट केल्यानंतरच अधिक समुचित ठरली असती. संधींचा अवस्थांशी हढ संबंध असल्यामुळे अवस्थांच्या विवेचना- नंतर संचिविषयक ही बिधाने येथे केलेली असावीत. - 'त्रिशब्देन* झोकात 'त्रिचतुथयोः आणि “द्वितीयत्रिचतुर्थानांर यांमत्ये आळेळा त्रि शब्द वस्तुतः 'तृतीय' असा पाहिजे. - 'बिरुद्धप्रत्यय' यातील प्रत्यय शब्द अनुभव या अर्थी वापरलेला असून त्याने घटनांचा सुद्धा बोध होतो असे समजावयास हरकत नाही. - 'विनिपातम्‌ म्हणजे विनाश, सिद्धीचा अभाव. - “फल्योगाक्षिभावं नाद्रियन्ते? ही दुरुस्ती आहे. मुळात “भावान्नाद्रियन्ते' असे आहे, आणि मुद्रितात '-ड्री- दीध आहे. फलयोग हे अड्डः ब नायक हे अद्विन्‌ अशी कल्पना करून नायक अज्लिभावरूप संबंधाची पर्वा करीत नाहीत असे येथे म्हटले आहे. याचा अर्थ ते फल्योगाविषयी फारसे उत्सुक नसतात असा होतो. म्हणून ते विशेष प्रयत्नशील नसतात आणि त्यामुळे त्यांच्या इतिवृत्तात गर्भ ब अवमश॑ ह्या संधींना अवकाळ नसतो अस हा युक्तिवाद आहे. तेव्हा “अश्भिमावात असे पक्चम्यन्त रूप समुचित नाही हे उघड आहे. - 'चर्वित' म्हणजे चाऊन चोथा झालेले आणि म्हणून वैचित्र्यपूर्ण रचनेला ज्यात अवकाश नाही असे, त्यामुळे मधले तीन संधी नसतात. - 'अपूर्णाः' छोकात “लोप? आहे. पण उअअभिनवगुप्ताने हीन म्हणजे अपूर्ण अशीच ब्याख्या केली आहे. . प्रासक्षिके परार्थत्वान्न ह्येष नियमो भवेत्‌ । यद्रत्त॑ संभवेत्तत्र तद्योज्यमविरोधतः ।॥। १८ ॥ प्रासंगिक कथानक दुसऱ्याचे प्रयोजन साध्य करणारे असल्यामुळे त्याच्या वाबतीत . हा नियम लागू करू नये. त्यात जी घटना संभाव्य असेळ तिची योजना विरोध न होईल अशा रीतीने करावी. एवं पश्चभिरितीतिवृत्तरब्दे यस्य हीतिशब्दो व्याख्यातः सो5नेन निर्वाहि- तार्थः, प्रासाईन्के तु क इतिराब्दस्या्थ इति दर्शयति प्रासाट्विक इति। नियमो य उक्तो "नियमात्पूणसांधि स्यादूः इत्यादि स तत्र न भवेत । विभीषणप्रतिष्ठापन- विषये रामस्य चेदोत्सुक्यबन्धादि योज्येत तर्हि तदेव यत्नसंपारद्यं भवेत्‌ । पराम- शातिं यद्दत्तमिति। तत्राधिकारिके यदविरुद्धमत्र प्रासक्चिके संभवि वृत्त प्रारम्भस्य ...न सुंचत तदेव प्रासाद्रिके योजनाहमिति । १९,१९-२० १७७ याप्रमाणे 'पञ्चमिः' इत्यादी छोकार्धात 'इतिवृत्त' शब्दातीळ 'इति' शब्दाची ज्याच्या संबंधात व्याख्या केळी होती त्याचा अर्थ ह्या छोकांत पूर्ण केला आहे. परंतु प्रासड्रिंकात “हति' शब्दाचा कोणता अर्थ आहे ते श्रासद्विके' इत्यादी शहोकात सांगतात. नियमाने पूर्णसंधी असावे असा जो नियम सांगितला आहे तो त्यास लागू करू नये. कारण जर विभीषणाळा राज्यावर बसविण्याच्या संबंधी रामाचे ओसुक्यबन्ध इत्यादींची योजना केली तर तीच गोष्ट प्रयत्नाने साध्य करावयाची आहे असे ठरेल. यासंबंधी * यद्वत्तम्‌' इत्यादीत विचार मांडतात. त्या आधिकारिक कथानकाला विरुद्ध नसळेळे असे जे ह्या प्रासल्िक कथानकामध्ये संभवनीय वृत्त असेल...तेच प्रासड्लिकात योजण्याच्या. योग्यतेचे होय. 'पथ्चमिः इ०? हा पहिल्या छोका'चा ठत्तराधे, - 'यस्य' म्हणजे ज्या आधिकारिक कथानकाच्या संबंधात. इतिवृत्त ऱब्दातील “इति? चा पाच संघींनी विभागळेळे असा जो अर्थ केला आहे तो आघधिकारिक कथानकालाच लागू आहे. -- अनेन? म्हणजे मागीळ १६ व १७ ह्या छोकांत. - “नियमात्पूर्णसंधि स्यात? हा नियम १६ व्या झोकात आहे. - 'प्रारम्मस्य...न मुंचत' असा भ्रष्ट पाठ हस्तलिखितात आढळतो. त्यापासून काही अर्थबोध होण्यासारखा नाही. मुद्रित पाठ 'प्रारम्मेष्व- न्यतम॑ च' असा आहे. त्यातील 'प्रारम्मेघु' हा सप्तमी बहुवचनात असलेला शब्द अत्यंत संदायास्पद आहे. 'अन्यतमे? संभाव्य आहे, पग त्याचा 'प्रारम्म' शब्दाशी अन्वय कसा लावता येईळ यचा बोध होत नाही. इतिष्टत्ते यथावस्था! पश्चवारम्भादिकाः स्पृता! । अथप्रकतयः पश्व तथा बीजादिका अपि.॥ १९ ॥ बीजे बिन्दुः पताका च प्रकरी कार्यमेव च । अर्थपरकृतयः पश्च ज्ञात्वा योज्या यथाविर्धे ॥२०॥ कथानकात ज्याप्रमाणे प्रारम्म आढी पाच अवस्था सांगितल्या आहेत त्याचप्रमाणे बीज आदी पाच अथेप्रकृती सुद्धा सांगितल्या आहेत. बीज, बिन्दु, पताका, प्रकरी आणि कार्य ह्या पाच अथंप्रकृतींचे स्वरूप जाणून त्यांची नियमपूवक योजना करावी. ननूक्तम 'ओऑत्खुक्यमात्रन्चस्तु यडीजस्य' इत्यादि । तत्र चोपायतत्सह- कारिवगंप्रतिबन्धत्वे तदिध्वेसनं चोपक्षिप्तम्‌ । तत्र तत्स्वरूपं न ज्ञातमित्युपाय- सामग्रीस्वरूपं द्शयितुमाह इतिवूत्ते यथावस्था इति । इतिदृत्तविषये यथा येन प्रकारेणाधिकारिकस्य खण्डनलक्षणेन पश्चावस्था उक्ताः तेनेव प्रकारेणाथंप्रकृतयो5- १ का बीजबिन्दुपताकाश्च. १9७८ नाट्यशास्त्र पि पश्चधेव पठ्यन्ते । तदनभिधाने उपायादिस्वरूपापरिज्ञानात्‌ प्रारम्भाद्यवस्थानां परमार्थेतो5संवेदने आधिकारिकत्वमविदितं स्यात्‌ । तत्राथः फलं, तस्य प्रकृतय उपायाः, फलहेतव इत्यथेः । तच जडचेतनतया दिधाकरणम्‌ । जडश्व मुख्यकारण- भूतः गूढतरो वा । आद्यं बीजं, द्वितीयं काये करणीयं प्रयोक्तव्यमित्यर्थे । चेतनो5- पि द्विधा, मुख्य उपकरणभूतश्व । अन्त्यो5पि द्विधा, स्वार्थेसिद्धिसहिततया पराथंस्द्धया युक्तः, शुद्धयापि च । तत्नाद्यो बिन्दुः, द्वितीयः पताका, तृतीयः प्रकरी । तदेतेः पञ्चभिरुपायेः पूर्णफळं निष्पद्यते । अत एवाह ज्ञात्वा योज्या ७ या र €”-_ यथाविधीति । तासासौद्वेशिकोक्तिवदुपनिबन्धक्रमानियम इत्यर्थः । न्ये त्वाहुः । अर्थस्य समस्तरूपकवाच्यस्य प्रकृतयः प्रकरणाने अव- यवा अथंखण्डा इत्यथंप्रकूतयः । एतः्च व्याख्यानं नातीव प्रकृतं पोषयति । संध्यादीनामपि चार्थंप्रकृतित्वसत्र व्याख्याने स्यात्‌ । इतिवृत्तमेव च समुदाय- ह €*-__* €”.. रूपमर्थः, इतिवृत्ते प्रकतय इति वक्तव्ये थंग्रहणमतिरिक्ते स्यादिति अवस्थाभश्व तुल्यतावणनं वणनमात्रं स्या्दिति किमनेन । 'बीजाचा केवळ औओत्सुक्या'च्या स्वरूपा'चा बंध? इत्यादी वर म्हटले आहे. आणि तदनुषंगाने उपाय व त्यांचा सहकारिवर्ग यांना होणारा प्रतिबन्ध अणि त्या प्रतिबंधा'चा नाश ह्या गोष्टींचा उपक्षेप केळा आहे. तेथे त्यांचे स्वरूप ज्ञात नाही म्हणून समग्र उपा. यांनचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी ईइतिवृत्ते यथावस्था:! इत्यादी सांगतात. इतिवृत्ताच्या संबंधात यथा म्हणजे आधिकारिका'च्या विभागणी'च्या स्वख्पाच्या ज्या प्रकाराने पाच अवस्था सांगितल्या आहेत त्याच प्रकाराने अर्थप्रकृती सुद्धा पाचच निर्देशितात. त्यांचा जर निदेश केला नाही तर उपाय आदींच्या स्वख्पाचे ज्ञान न झाल्याकारणाने प्रारम्म आदी अवस्थां- चे खरे क्ञान न होऊन आधिकारिकाचे स्वरूप अज्ञातच राहील. त्यात अर्थ म्हणजे फल, त्या'च्या प्रकृती म्हणजे उपाय; भ्हणजे फलाचे हेतू असा अथ. त्यांचे जड आणि चेतन असे दोन प्रकार होतात. आणि जड फल्हेतू मुख्य कारण असळेळा आणि अधिक गूढ असा दोन प्रकारचा. त्यांपैकी पहिळा फलहेतू बीज आणि दुसरा कार्य म्हणजे जे करावया- चे असते, ज्याची योजना करावयाची असते ते या अथी. चेतन फलहेतू सुद्धा मुख्य आणि उपकरणरूप असा दोन प्रकारचा. त्यांपैकी दुसऱ्याचे आणखी दोन प्रकार - स्वतः- च्या प्रयोजनाच्या सिद्धीबरोबर इतराच्या प्रयोजनाच्या सिद्धीने युक्त आणि केवळ इतरा- च्या प्रयोजनाच्या सिद्धीने युक्त असे. त्यांपैकी पहिळा फलहेतू बिन्दु, दुसरा पताका आणि तिसरा प्रकरी. तेव्हा ह्या पाच उपायांच्या द्वारा पूणे फळ निष्पन्न होते. म्हणूनच “ज्ञात्रा योज्या यथाविवि' असे म्हणतात. त्या अर्थप्रकृतींचा उद्देशात निर्दिष्ट झाल्याप्रमाणेच योजना करताना क्रम ठेवावा असा नियम आहे असा याचा अर्थ. रट रर १७५९ परंतु इतर टीकाकार म्हणतात. अर्थाच्या म्हणजे संपूर्ण रूपकात व्यक्त झालेल्या गो- ष्टीच्या प्रकृती भ्हणजे प्रकरणे, अवयव, अर्थाचे भाग असा अथंप्रकृतींचा अर्थ. पण ही व्या- ख्या प्रस्तुताला सुळीच पोबक नाही. ह्या व्याख्येप्रमाणे संधी आदी सुद्धा अथेप्रकषती ठर- तील. आणि समुदायरूप इतिवृत्त म्हणजेच अथ, तेव्हा इतिवृत्तातीळ प्रकृती असे म्हणावया- चे असता अर्थ शब्दाचा उपयोग निर्थक ठरेळ आणि अवस्थांच्या वणनासारखेच असलेले हे अथेप्रकृतींचे केवळ वणणन होईल. तेव्हा याचा अधिक विचार कशाला ? “औओत्सुक्यमात्र- इ०' हा वरीळ आठवा झोक आहे. - “खण्डनलक्षणेनर खण्डन म्हणजे संघींमध्ये विभागणी. - 'गूढतरो? हा मसुद्रितातील पाठ आहे. हस्तलिखितात 'मूढतरो' आहे. कार्यरूप उपायाचे वणन करण्यास हे दोन्ही शब्द समर्पक नाहीत. त्यातल्या त्यात गूढतर अधिक संभाव्य बाटतो, - "निष्पद्यते' सुद्रित पाठ *निष्पाद्यते' आहे. पण प्रयोजकाचे रूप आवद्यक आहे असे दिसत नाही. - “औदेशिक? म्हणजे उद्देशच. “तमस्तरूपकवाच्यस्य* हस्तलिखितात “'समस्तरूपकाव्यस्य”' असा पाठ आहे. तोही असंभाव्य नाही. “'अबयवा अथेखण्डा? मुळात ह्या दोन शब्दांचा मिळून एक समास केला आहे. पण दोन स्वतंत्र शाब्द अधिक योग्य. स्वट्पमात्रं ससुत्सु्ट बहुधा यद्विसर्पति । फलावसानं यंेध बीजं तत्पारिक्ीर्तितम्‌ ॥२१॥ अश्प मात्रेत सोडळे असता जे अनेक प्रकारे विस्तार पावते आणि ज्याचा फलात शोवर होतो त्याला बीज असे म्हणतात. तदेतत्पः्धकसुद्देशाक्रमेण लक्षयति स्वल्पमात्रासिति । यडस्तु सागारकान्तः- पुरानेवासेन वसन्तोत्सवसमये गस्भीरप्रयोजनसंवेद्नाभावात्‌ स्वट्पसात्रमार्केचि- त्करप्रायं राइक्यते संवादेनोत्सृए्ं प्रक्षिप्त यथावश्यं फलान्तम्‌, यतो बहाभेः प्रकारेविसपत्येव सवेथा प्रसरांते यत्‌ तत्सिद्धिस्तत्फळसपि यदि निरूढफलत्वेन प्रवतेते, प्रथमप्रक्षेपेणेव देशकाळीचित्यापेक्षे तहीजवज्ञ्यस्यारघट्टपरिवर्तनन्यायेन बहुतरोपायपरस्परोरपारि कायमेव यस्यापेक्ष्यं तद्दीजम्‌ । यद्यस्मात्परितः समन्ता- त्तत्कोतेतं प्रासिद्ठम । तः्च कचिदुपायमात्रं क्रचित्फलमात्रं कचिद्‌ डयम्‌ । फळं च कृचिदुपादानं क्रचिद्धेयव्यसननिवर्तनं क्रचिदुभयमिति । तत्रापि कचिन्नायकेंडिशान क्रचित्मतिनायकाश्रयेणेत्यादिभिंदेबह्या भिद्यते । तत्र चक्र- १ का अल्प-. २ नि तच्चैव. ३ नि तदिह कीतितम्‌, का तदमिधीयत. १८० नाट्यशास्त्र वतिपुत्रळाभो मुनिजनाशीर्वचनद्वारेण फठस्वभाव एवामिज्ञानश्याकुन्तले, फळमपि च भविष्यदुपायाविनाभावादू बीजमित्युच्यते । एवमन्यत्रापि यथायथमुदाहायंम्‌ । आनन्त्यादू ग्रन्थगौरवभयाच्च न प्रतिपदं लिखितम्‌ । ह्या पाच अर्थप्रकृतींचे लक्षण उद्देशातील क्रमानुसार * स्वत्पमात्रम' इत्यादी छोका- पासून करतात. जी गोष्ट - उदाहरणाथ, सागरिकेच्या अंतःपुरातील निवासाने वसन्तोत्सवाच्या समयी घडणारी - गंभीर अशा प्रयोजनाची जाणीव नसल्याकारणाने स्वल्पमात्र म्हणजे अगदी क्षुछुक अशी वाटते ती संवादाच्या द्वारा उत्सुष्ट म्हणजे प्रस्तुत केळी जाऊन जशी निश्चितपणे शेवटी फलापर्यंत जाते, कारण ती पुष्कळ प्रकारांनी विसर्पण पावते म्हणजे सर्वे प्रकारे पसरते, तिची सिद्धी, तिचे फळ सुद्धा जर स्वाभाविकपणे वाढणाऱ्या फलाच्या स्वरूपाचे असेळ तर देश आणि काल यांचे औचित्य लक्षात घेऊन केलेल्या पहिल्या पेर- णीनेच ते बीजाप्रमाणे टाकळे जाऊन रहाटाच्या भ्रमणा'च्या न्यायाने पुष्कळ उपायांच्या परंपरेच्या अखेरीस कार्याचीच जिच्यापासून अपेक्षा असते ती गोष्ट म्हणजे बीज. 'यत्‌? म्हणजे ज्याअर्थी 'परितः' म्हणजे सवेत्र 'कीर्तित' म्हणजे प्रसिद्ध असते. आणि ते बीज कधी केवळ उपायाच्या स्वख्पाचे असते, कधी केवळ फळाच्या स्वरूपाचे असते तर कधी दो- होंच्या स्वरूपाचे असते. आणि फळ कधी स्वीकरणीय वस्तू असते, कधी त्याज्य अशा व्यसनापासून निवृत्तीच्या स्वरूपाचे असते, तर कधी दोन्ही प्रकारचे असते. त्यात सुद्धा नायकाच्या उद्देशाने, प्रतिनायकाच्या आश्रयाने इत्यादी अनेक प्रकारे फळाचे भेद होतात. उदाहरणार्थ, मुनिजनांच्या आशीवेचनाच्या द्वारा निर्देगिळेळी चक्रवती पुत्राची प्राप्ती अमि- ज्ञानशाकुन्तट नाटकात फलाच्या स्वरूपाचीच आहे आणि हे फल असले तरी ते पुढे होणाऱ्या उपायांशी अविच्छिन्नपणे निगडित असल्याकारणाने त्याला बीज असे म्हणतात. याप्रमाणेच इतरही नाटकातील उचित अशी उदाहरणे द्यावीत. उदाहरणे अनन्त असल्यामुळे आणि प्रंथ मोठा होईल ह्या भीतीने प्रत्येक उदाहरण दिले नाही. 'यद्वस्तु' ह्याचा अन्वय 'दाडक्यते' शी लागून पुढे त्याचा वाक्याच्या शेवटी आलिल्या “तट्ठीजम? शी संबंध प्रस्थापित होतो. - “सागरिका- इ०' रत्नावली नाटिकेतील हे उदाहरण "स्वल्पमात्रः च्या स्पष्टीकरणासाठी दिलेले दिसते. पण ते स्पष्ट ब पूण शब्दात मांडलेले नाही. “यथा? किंवा 'इव” यासारखा शब्द अपेक्षित आहे. हस्तलिखितातील या ठिकाणचा पाठ '-निवासेन सादि .» यंप्रवतमये! असा भ्रष्ट आहे. “वसन्तोत्सवसमये' ही संपादक श्री कबींनी सुचविलेली दुरुस्ती आहे. - 'संवादेन' ही ळोकातील 'ससुत्सुष्टम? मधील “सम्‌? उपपदाची व्याख्या आहे. - 'यथावश्यम्‌? म्हणजे आवश्यकतेनुसार असा अर्थ होऊ शकेल, पण “अवश्यम? याचा खात्रीने, निश्चितपणे असा अथ अमिंप्रेत दिसतो. कारण बीजाचे फलात पर्यवसान अवद्य होते असे येथे म्हणावयाचे आहे. - “यतो . . . प्रसरति' झोकातील शब्दांचे विवरण करणाऱ्या ह्या हेतुदरीक वाक्याचा सरळ अन्बय लागत नाही. - “यत्‌ तत्सिद्रिस्तत्फलं? येथे केलेली 'यत्‌ः ची पुनरावृत्ती आवश्‍यक २९९ ऱ्ट्र वाटत नाही. 'तत्फलम्‌' हे “तत्सिद्रि? चें स्पष्टीकरण आहे. किंवा उलटही समजता येण्यासारखे आहे. बीजाची सिद्धी म्हणजे बीजाचे फळ. - *निरूढफलत्वेन' ही “निरुध्य फलत्वेन? ची सुचविलेली दुरुस्ती आहे. निरुध्य' म्हणजे अडवणूक करून हा अथ येथे समर्पक वाटत नाही. 'निरूढ' म्हणजे स्वभावतःच निष्पन्न होणारे. 'प्रबतते? चा कर्ता 'तत्फल्म?. मागील वाक्‍य पूर्ण झालेले नसताही 'यदि' नें युक्त असे नवीन वाक्‍य सुरू केळे आहे. - “-त्यापेक्षे) मुद्रित पाठ '-त्यापेक्षेः' आहे. पण तृतीया बहुवचनाचा कुठे अन्बय लावण्यासारवा आहे असे दिसत नाही. “त्यापेक्षया' असा पाठ अधिक योग्य झाला असता. - 'तट्टीजवन््यस्य? तत्‌ म्हणजे वाक्याच्या . प्रारंभी निदेशिलेली “वस्तु. - हे प्रदीधे वाक्य क्लिष्ट स्वरूपाचे झाळे असून त्याचा अन्बय लावणे अत्यंत अवघड आहे. - 'परितः समन्तात्‌ इ०' ही शहोकातील “परिकीतितम्‌ः ची व्याख्या आहे. - 'क्‍्वचित्फलमात्र' म्हणजे बीज हे कधी कधी केवळ फलाच्या स्वरूपात सुद्धा असू शकते. यांचे उदाहरण पुढे झ्याकुन्तलातून दिठे आहे. - “फल्स्वसमाव एव' मुळात “फलस्वभावस्यैव? असे आहे. पण षरष्ठयन्त शब्दाचा कोठे अन्वय लागण्यासारखा नाही. शाकुन्तलाच्या पहिल्या अंकात तपस्व्यांनी दुष्यन्ताला 'पुत्रमेबंगुणोपेतं चक्रवर्तिनमाप्नुहि' अत्ता आशीर्वाद दिला आहे. त्यात निदेंशिळेला चक्रवर्तिपुत्रलाभ हे ह्या नाटकाचे बीज आणि फल अशा दोन्ही स्वस्पाचे आहे असा अमिनवयुत्ताच्या म्हणण्याचा आदाय आहे. - 'प्रतिप्द' मुद्रित पाठ “प्रतिदिशी' आहे. प्रयोजनानां विच्छेदे यदविच्छेदकारणम्‌ । यावत्समाप्तिबन्थस्य स ' बिन्दुः परिकातितः ॥२२॥ प्रयोजनांच्या सिद्धीत बाधा आळी असताना ज्याच्यामुळे काव्याच्या समाप्तीपर्यंत सांधा जोडला जातो त्याला बिन्दु असे म्हणतात. अथ बिन्दुं लक्षयति प्रयोजनानां विच्छेद इति । प्रयुज्यते फलं यैरुपायानु- षाने: तेषामितिव्रत्तवशादवऱयकर्तव्यतादिभिविच्छेदे$पि सति यदनुसंधानात्मकं प्रधाननायकगतं संधिद्रव्यज्ञानं स बिन्दुः ज्ञानविचारणं, फळळाभोपायत्वात्‌ । यावदविच्छेदः प्रत्यनुसंथानेन न कृतस्तावन्न किंचिदपि कार्य निवेहति । ननु बीजं तावत्फलान्तमास्ते बिन्दोस्तु कथं स्थितिरित्याह यावत्समाप्तिरिति । बध्यमानस्य फलस्य सस्यगाप्तिस्तावत्‌ । एतदुक्तं भवति । सकलोपायप्रति- ज्ञागरणनिमित्ते ह्यनुसंधानं यावद्धि मुख्यनायकेन प्रत्यनुसंधानेन न क्रियते तावज्जडाजडरूपः सर्वो5प्युपायधर्मा5नुपायकल्प एव । तथाहि तापसवत्सराजे वासवदत्ताप्रेमानुसंधानं राजमुखेन प्रत्यडूः दर्शितम्‌ - 'तद्वक्‍त्रेन्दाविळोकनेन दिवसो नीतः प्रदोषस्तथा' इति यावत्‌ षष्ठे$ईः - .१ का बिन्द्रिति संज्ितः. १८२ नाट्यशास्त्र त्वत्संप्राप्तविळोभितेन सचिवेः प्राणा मया धारिता तन्मत्वा त्यजतः शरीरकामेदं नेवास्ति निःस्नेहता । आसकन्नो$वसरस्तवानुगमने जाता रतिः किं त्वयं खेदो यच्छतधा गत न हृदयं तस्मिन्‌ क्षणे दारुणे ॥ इति । (६.३) तत्र प्रधानसिद्धिरायत्तसिद्धिर्भयसिद्धिरिते प्रधानसिद्धावयं बिन्दुः । आयत्त- सिद्धिस्तु राज्यप्राप्तिळक्षणा, तस्याममात्यवगंकृतमेवानुसंधानं बिन्दुः । उभय- सिद्धौ तूभयकृतम्‌ । येन यत्माधान्येनाभिसंहितं स एव तदनुसंधत्ते । इत्येवं प्रधानानुसंधानचेतनव्यापारः कारणानुग्राही स्वयं च परमकारणस्वभावस्तेठ बिन्दुवत्सवंन्यापकत्वादपि बिन्दुः । बीजं च मुखसंघेरेव प्रभृत्यात्मानमुन्मेषयति, बिन्दुस्तदनन्तरमिति विदोषो$नयोः, डे अपि तु समस्तेतिवृत्तन्यापके । आता 'प्रयोजनानां विच्छेदे' या झोकात बिन्दूचे लक्षण करतात, उपायांच्या ज्या अनुष्ठानांमुळे फलाची योजना होते ते प्रयोजन त्यात कथानकाच्या अनुरोधाने अवश्य करावयाच्या इतर गोष्टींमुळे खंड पडळा असतानाही अनुसंधानाच्या स्वख्पाचे मुख्य नायकाच्या ठिकाणी असलेले जे जोडणाऱ्या वस्तूचे ज्ञान तो बिन्दु म्हणजे ज्ञानपूबेक विचार; कारण तो फलप़ाप्तीला कारणीभूत होतो. जोपर्यंत प्रत्यनुसंधानाने विच्छेदाचा भंग केळा जात नाही तोपर्यंत कोणतेही कार्य तडीस जात नाही. बीज तर फल प्राप्त होईपर्यंत असते, पण बिन्दु कोठे असतो या प्रश्नाचे उत्तर 'यावत्समाप्तिः' या राब्दात देतात. म्हणजे ठरविले- ल्या फला'ची उत्तम प्रकारे प्राप्ती होईपर्यत, याचा अथे असा. सगळया उपायांच्या संबंधात जागरूकतेला हेतुभूत जे अनुसंधान ते मुख्य नायक जोपर्यंत प्रत्यनुसंधानाने करीत नाही तोपर्यत जड आणि चेतन स्वरूपाचे सर्वे काही उपाय असून नसल्यासारखेच होत. तदनुसार तापसवत्सराज नाटकात राजाच्या उक्तीद्वारा वासबदत्ताविषयक प्रेमाचे अनुसंधान प्रत्येक अंकात दाखविले आहे-पहिल्या अंकातील तिच्या मुखचंद्राच्या अवळोकनाने दिवस घाल- वीत असे आणि प्रदोषसमयही' इत्यादी क्‍चनापासून सहाव्या अंकातील 'सचिवांनी तुझ्या पुनः:प्राप्तीचे विळोभन दाखविल्यामुळे मी जीवित राहिलो. ते जाणून ह्या क्षुद्रदेहाचा त्याग करताना मला स्नेह वाटत नव्हता असे मुळीच नाही. तुझ्या पाठोपाठ जाण्यास अवसर जवळ आला म्हणून आनंद झाला. परंतु, ह्या गोष्टीचे मळा दुःख होते की त्या दारुण क्षणी हे माझे हृदय शतघा बिदीणे झाले नाही' ह्या उक्तीपर्यंत. सिद्धी तीन प्रकारची असते - मुख्य नायकावर अवलंबून, त्याच्या सेवकांवर अवलंबून आणि त्या दोघांवर अवलंबून. हा आता निदिष्ट केलेला बिन्दु मुख्य नायकावर अवलंबून असलेल्या सिद्धीसंबंधात आहे. सेवकांवर अवलंबून असलेली सिद्धी राज्यप्राप्तीच्या स्वरूपाची ; 54. माळ तिच्या संबंधात अमात्यवर्गाने केळेळे अनुसंधानच बिन्दु होय. दोघांवर अवलंबून १९.२३ | | १८३ असलेल्या सिद्धीत दोघांचे अनुसंधान. जो जे प्राधान्येकरून प्राप्त करण्याचे ठरवितो तोःच त्याचे अनुसंधान करतो. याप्रमाणे मुख्य नायकाच्या अनुसंधानाच्या स्वरूपाचा चेतनकृत व्यापार, जो इतर कारणांना उपकारक होऊन स्वतः सर्वश्रेष्ठ कारणरूप असतो तो तेळाच्या थेंबाप्रमाणे सवे व्यापणारा असल्यामुळेही बिन्दु म्हणून ओळखला जातो. आणि बीज मुखसंधीपासून'च स्वतःच विकास करीत जाते, तर बिन्दु त्यानंतर ह्या त्या दोघांमधील फरक, परंतु दोन्हीही समग्र कथानकाला व्यापतात 'संधिद्रव्यज्ञानं' असा मुद्रित पाठ आहे. हस्तलिखितात 'संघि --. व्यज्ञानंर असा त्रुटित पाठ आहि, द्रग्य शब्द विशेष समाधानकारक नाही, पण तो स्वीकारल्याशिबाय गत्यंतर दिसत नाही. संधि शब्द पारिभाषिक अर्थाने योजलेला नसून सांधा, जोड या अर्थी वापरलेला असावासे वाटते. या पुढील “सः” शब्द मुळात नाही. तो घातल्याने अर्थ स्पष्ट होण्यास मदत होते. कोकात तो आ -' शानविचारणं? हो बिन्दु शब्दाशी समानाथक अशी व्याख्या आहे. पण बिन्द म्हणजे ज्ञान किंवा विचार असा अर्थ प्रसिद्ध नाही. - “न कृतः यातील 'न? संपादकांनी सुचबिल्याप्रमागे घातला आहे. तो आवश्यक आहें. - “बघ्यमानस्य फलस्य' ही कछोकातील “बन्धस्य? शब्दाची व्युतत्तीच्या साहाय्यानें केलेली व्याख्या आहे. याच्या अगोदर मुद्रितात “यावत्स्बस्य हे अधिक राब्द आहेत पण * स्वस्य ? शब्द मूळ असण्याचा विशेष संभव नाही. - 'सम्यगाप्तिः हे ोकातील “समाप्ति! राब्दाचे स्पष्टीकरण. - “न फ्रिवते? ही संपादकांनी सुचविळेली दुरुस्ती आढे, - * तद्रक्‍्त्रेन्दु- ३० संपूर्ण 'छोक असा - तद्वक्‍तेन्दविळोकनेत दिवसो नीतः प्रदोषस्तथा तद्रोष्टयेव निशापि मन्मथकृतोत्साहेस्तदज्ञापणेः । तां संप्रत्यांपे मागंदः्ततयनां दरष्टं प्रवत्तस्य म बद्धोत्कण्ठमिदे मनः किमथवा प्रेमासमातप्तोत्सवम्‌ ॥ (१.१८) "ण प्रधानसिद्धिः इ० ) अर्थशास्त्रात सिद्धीविगयीचे ढे विवेचन आढळते. मुद्राराक्षसातही या सिद्धीच्या प्रकारांचा निर्देश आहे. - 'उभयसिद्धो' ह्याचे उदाहरण दिले नाही. - 'तेलबिन्दुवत्‌ बिन्दु शब्दाची ही उपपत्ती अधिक समपक.- “मुखसंघेरेव प्रभत्या” सुद्रितात 'प्रवर्त्या- असे आहे. पण 'प्रभतिः शब्दच येथे आवश्यक आहे. 'प्रवर्त्व/ हे अर्थवाही नाही. यट्रचं तु परा्थ स्यासधानस्योपकारकम्‌ । प्रधानवच कल्प्येत सा पताकोेति कोतता ॥२३॥ परतु, जी घटना मुख्य कथानकाळा उपकारक असून दुसऱ्यासाठी असते आणि मुख्य कथानकाम्रमाणे कल्पिली जाते तिळा पताका असे म्हणतात. १ नि हि. १८४ | नाट्यशास्त्र यट्धत्तं तु पराथे स्यारदिति । यस्य संबन्धि वृत्त संविदनुसंधानं परस्य प्रयोजनसंपत्तये भवदपि स्वप्रयोजनं संपादयति, अत एवाह प्रधानवः्च करप्ये- तोते । सचेतनानुसंघाना पताकासाद्वेः प्रधानस्योपकारोणी । एवं सुग्रीवविभी- षणप्रभ्तिरपि रामार्दना$्थेक्रियामारभसाणो रामादेरात्मनश्वोपकाराय प्रभव- मानो प्रसिद्धिप्रादास्त्ये संपादयतीति । एवमीचित्यज्ञानोपयोगिन्यानयात्र पताका- वदुपयोगित्वादियं पताकेति चिरन्तनाः । 'यदुः्तं परा्थ स्यात! इत्यादी. ज्या'च्या संबंधी'चे वृत्त म्हणजे चेतनाने केळेळे अनुसं- धान दुसऱ्याचे प्रयोजन साध्य करीत असताही स्वतःचे प्रयोजन साध्य करते ती पताका म्हणूनच 'प्रधानवच्च कल्पयेत' असे म्हटले आहे. सचेतनाने केलेल्या अनुसंधानाने निष्पन्न झाळेली पताकेची सिद्धी प्रधानाळा उपकारक होते. उदाहरणाथ, सुग्रीव, विभीषण प्रभृती सुद्धा राम आदीच्या मुळे प्रयोजनयुक्त कार्य करीत असता राम आदीला आणि स्वतःलाही उपयुक्त होण्यास समथ होऊन प्रसिद्धी आणि प्रशंसा संपादन करतात. याप्रमाणे औचित्या- चे ज्ञान देण्यास यासंबधात पताकेप्रमाणे उपयोगी असल्यामुळे हिळा पताका म्हणतात असे प्राचीन टीकाकारांनी म्हटले आहे. “संबिदनुसंधानं' यात 'संविद' शब्द चेतन अथवा सचेतन या अर्थी वापरला आहि. - “प्रधानबत्‌? स्वतःचे प्रयोजन साध्य करणे हे प्रधान वृत्त अणि पताकावृत्त यांतील साम्य, - “रामादिना्थक्रियामारममाणो? ही सुचविलेली दुरूस्ती आहे. हस्तलिखितात 'रामादिनो5र्थ” असे आहे. पण 'रामादिनः' असे रूप अशक्य आहि. 'रामादिना? ह्या तृतीयेनंतर 'उद्युक्त:', 'प्रेरितः _ असा शब्द अध्याह्त धरता येण्यासारखा आहे. मुद्रित पाठ 'रामादिनोपक्रियमाणे' असे आहे. त्यात 'उपक्रियमाणे' हे 'प्रसिद्धिमारास्त्ये, चे विशेषण होते. पण ही कल्पना संभवनीय वाटत नाही. आणि प्रधानाने उपकार करण्याचा प्रश्न उपस्थित होत नसल्यामुळे हा पाठ मूळ असण्याची शक्‍यता कमी. - 'प्रभबमानो? ही मुळातील 'प्रभवमाने' ची दुरुस्ती आहे. हे 'सुग्नीव बिभीषणप्रभति” चे बिशोषण आहे, 'प्रसिद्धिप्रादास्त्ये' चे नाही. -- “एवमौचित्य” हस्तलिखि- तात 'एवं नौचित्य?” आणि मुद्रितात “एवमौचित्यानौचित्य” असे आहे. पण केवळ औचित्यच सूळ असण्याचा अधिक संभव आहे. फलं प्रकल्प्यते यस्याः पराथांयेव केवलम्‌ । अनुबेन्धाविहीनत्वात्मकरीते विनिर्दिशेत्‌ ॥ २४॥ जिने फळ केवळ दुसऱ्याच्या साठीच कल्पिळे जाते ती अनुबंधाने विरहित असल्या- कारणाने प्रकरी अशी निर्दिष्ट केळी जावी. १ नि परार्थ केवलं बुघैः, का परार्थ यस्य केवलमू. २ नि -बन्थविहीनं स्यात्मकरी- मिति निर्दिशेत्‌, का -बन्धेन हीनस्य प्रकरीं तां. १९.२५ | १८५ फलं प्रकल्प्यते यस्या हते । यतश्व परार्थमेव केवलं सर्वमनुतिष्ठति ततः सा प्रकरी । यथा कृत्यारावणे कुलर्पातेः, वेणीसंहारे भगवान्वासुदेवः । प्रकर्षेण स्वार्थानपेक्षया करोतीति । इक्‌ सावेधातु*्यः संविदपेक्षया च स्त्रीलिडत्वे कदि- कारादिति डीष्‌ । फलामिति फलतीति कृत्योपायानुष्ठानसुच्यते । फलं प्रकर्प्यते यस्या:? इत्यादी. ज्याअर्थी दुसऱ्यासाठी'च सर्व काही करते म्हणून ती प्रकरी. उदाहरणाथ, कृत्यारावण नाटकात कुलपति, वेणीसंहारात भगवान वासुदेव, प्रकर्षाने म्हणजे स्वार्थाची अपेक्षा नसता करते ती प्रकरी. 'सावधातुकाथधातुकयो? ह्या सूत्राप्रमाणे 'कृ' धातूतीळ क चा गुण झाळा आहे आणि सचेतनविषयक म्हणून स्रीलिंगी असता कुतू- प्रत्यत्य असल्यामुळे “ई' प्रत्यय लागळा आहे. फल म्हणजे ज्यापासून फळ मिळते ते म्हणजे कार्यासंबंधी उपायाचे अनुष्ठान असे अभिग्रत आहे. 'ततः” शब्द “यतश्च” नंतर होता तो तेथून काढून सा? च्या पूर्वी टाकला आहे. त्यामुळे अन्वय नीट होतो. - 'इक्‌ सार्वघातुभ्यः अष्टाच्यायीतील 'सार्वधातुकाधेनातुकयो: (७. ३. ८४) ह्या सूत्ताप्रमाणे गुग होऊन प्रक चे प्रकर्‌ झाले. त्याला 'ई” हा. स्त्रीलिंगी कृतू-प्रत्यय लागून प्रकरी हे रूप सिद्ध होते. यदाधिकारिकं वस्तु सम्यक्माज्ञेः प्रयुज्यते । तदर्थाो यः समारम्भस्तत्कार्य पॉरक्गाततम्‌ ॥ २५ ॥ प्राश्ञ कवींनी जे प्रधान कथानक चांगल्या तऱ्हेने योजले जाते त्याच्या सिद्धीसाठी | ज्या क्रिया केल्या जातात त्यांना कार्य म्हणतात. | यदाधिकारिकामिति । प्राज्ञे: प्रधाननायकपताकानायकप्रकरीनायकेश्वेतन- रूपेः यद्धस्तु फटरूपं प्रयुज्यते संपाद्यते संपाद्यत्वेनानुसंधीयते तत्फलप्रयोजनो यः संपूर्णतादायी पूर्वपरिगृहीतस्य प्रधानस्य बीजाख्योपायस्य फलमारभत इत्या- ' रस्भशब्दवाच्यो द्रन्यक्रियागुणप्रश्नतिः स सर्वो$र्थः सहकारी कार्यमित्युच्यते, चेतनेः कार्यते फलमिति व्युत्पत्त्या । सम्यगिति प्रभुमन्त्रोत्साहशाक्तेत्रयसंपन्ने- रित्यर्थः । तेन जनपदकोशदुर्गादिकव्यापारवैचित्र्यं सामाद्युपायवर्ग इत्येतत्सर्व कार्ये$न्तर्भवति । तत्र परं प्रथमपरिग्रहीतः प्रधानभूतो5भ्युपायो बीजत्वेनोक्तः । १ नि वृत्त. २ का. समुदाह्मतम्‌. १८६ नाट्यशास्त्र “यदाधिकारिकम! इत्यादी. प्राज्ञ म्हणजे सचेतनस्वरूप अश्या मुख्य नायक, पताका- नायक आणि प्रकरीनायक यांनी जी फलरूप वस्तू योजिली जाते म्हणजे संपादित केली जाते म्हणजेच संगादन करावयाची म्हणून जिचे अनुसंधान केळे जाते, ते फळ ज्याचे उदिष्ट आहे असा, परिपूर्णता उत्पन करणारा, पूर्वी उपन्यास केलेल्या प्रधानभूत बीज नावाच्या उपायांच्या फलाचा प्रारम्भ करतो म्हणून आरम्भ ह्या राब्दाने निदिष्ट होणारा, द्रव्य, क्रिया गुण प्रभृती, तो सर्व सहकारी स्वख्पा'चा अर्थसमूह कार्य म्हणून ओळखळा जातो. सचेतनांनी फल निष्पन्न केळे जाते अशी ह्या कार्य शब्दाची व्युत्पत्ती. सम्यक्‌ म्हणजे प्रभु, मन्त्र आणि उत्साह या तिन्ही शक्तींनी संपन अशा नायकांनी असा अथ. त्यामुळे जनपद, कोश दुर्ग इत्यादींच्या व्यापारांचे वैचित्र्य, साम आदी उपायवर्ग इत्यादी सव कार्यामध्ये अन्तभूत होते. परंतु त्यात प्रथम उपन्यास केलेला प्रधानभूत जो उपाय त्याला बीज असे म्हणतात. “परघान- .... चेतनख्पै? ही “लोकातील 'प्राज्षिः' शब्दाची व्याख्या आहे. पण मुळात तो शब्द कवींना उद्देशून वापरलेला असण्याचा अधिक संभव आहे. - 'संपूर्णतादायी? श्लोकातील समारम्मः? दाब्दात असलेल्या 'सम? ह्या उपपदाचा हा अर्थ केला आहे. - 'फलमारभते इति! हो 'समारम्मः? मधील 'आरम्म? शब्दाची व्युत्पत्ती. - “स॒सर्वोड््थः' मुद्रितात 'सः नाही, पण तो असला म्हणजे संपादकांनी सुचविल्याप्रमाणे “सबोड्थः” नंतर यस्य आणि '“सहकारी' नंतर “तत्‌? हे शब्द घालण्याची गरज उरत नाही. शिवाय, 'यस्य? घालणे वरोबरही नाही. हा सगळा अर्थ म्हणजेच कार्य. तो कार्याचा सहकारी अशी. कल्पना नाही. - प्रभुमन्त्रो- त्साह-' राजाच्या ह्या तीन शाक्ती अर्थशास्त्रात प्रसिद्ध आहेत. - 'जनपदकोशादुर्ग” राज्याच्या सात प्रकृतींपैकी ह्या तीन जड स्वरूपाच्या प्रकृती. कार्य आणि बीज जड स्वरूपाचे असतात हे मागे सांगितलेले आहेच. एतेषां यस्य येनार्था यतश्नव गुण इष्यते । तत्धानं तु कतंव्यं गुणभूतान्यतः परम्‌ ॥ २६ ॥ ___ ह्यांपँकी ज्याच्या योगाने नायकाचे प्रयोजन साध्य होत असेळ व ज्यापासून गुणाची सिद्धी अपेक्षित असेळ ते मुख्य ठरवावे आणि त्याशिवाय इतरांना गौण स्थान द्यावे. | ननु प्रारस्भादिवदासामथंप्रकतीनां किं सर्वत्र सर्वासां संभवः, तथा अथंप्रकृतीनां संध्यवस्थाभिः सह किं यथासंख्यनियमः, तथा किं स्वात्मन्यासां कतुक्रमः इति शाड्ठात्रयमपाकतुंमाह एतेषामिति । पश्चकवगंत्रयं परामृश्यते एकेकस्य वरगगस्येकरोषेण । तद्यमर्थः । न सर्वत्र प्रारस्भादिवत्सर्वा अ्थप्रकृतयः, ५१ का प्रधानं तत्प्रकतंव्यं. १९.२६ १८७ अपि तु यस्य नायकस्य येनाथंप्रकाताविशोषेण प्रयोजनसंपत्तिराधिका तदेव प्रधानम्‌ , अन्यत्तु भवदपि गुणभूतमसत्कल्पम्‌ । यथा स्वपराक्रमबहुमानशाालनां पताकाप्रकर्यावविवश्षिते एव । बीजबिन्दुकार्याणि तु सर्वचानपायीनि । तत्रापि तु गुणप्रधानभावः । तथा संध्यवस्थाथंप्रकृतीनां यस्य येनोचितः संबन्धस्तत्मरधानं नाटकादि कार्यमिति द्वितीयापि निरस्ता । यतश्चव गुण उपकारो झटिति वाच्यते तदेवाथेप्रकृतिरूपं पश्वानामन्यतमसं प्रधानत्वेन बाहुल्येन निबन्धनीयम्‌ , अन्यदू गुणभावेन । प्रधानसिद्धावायत्तसिद्धी च निबध्यमानायां यो य॒त्रांशे$प्यधिकोप- कारकारी स तत्र प्रधानीकर्तव्यः, यथा वासवदत्तालाभे बिन्द्‌ः प्रधान कोशास्ब्री- राज्यठाभे तु प्रकरी । पताका च प्रधाना, अमात्यस्य राज्यसिद्धो स्वार्थसिद्धि- रिति पताकात्वं केचिदाहः । एवं सुसड्ठतासांकृत्यायनीबीजधमादिषु वाच्यम । अपरे तु प्रथमतरमेव नायकस्य तावट्रपत्वानैवे प्रमाणं प्ृथडः नायकत्वम्‌, सुग्री- वादयस्तु पुथग्भूना एव सांप्रतिके कार्ये केवलमाश्रेता इत्येवंप्रमाणमेव पताकादि- रूपत्वम्‌ । तेषां मते तापसवत्सराजे उभयत्रापि बिन्दुरेव प्रधानम्‌ । एवं तु पश्चानामप्यथेप्रकृतीनामन्यतमस्य डयास्तिसृणां चतसूणां सवांसां वा प्राधान्य यथास्वं विभजनीयम्‌ । प्रारम्भ आदी अवस्थांप्रमाणे ह्या अर्थप्रकृतींचा सुद्धा सर्वत्र संभव असतो काय? तसेच अथेप्रकृतींचा संधी आणि अवस्था ह्यांच्याबरोबर क्रमराः संबंध आहे काय? आणि ह्यांचा आपसातीळ कर्तृत्वाचा क्रम आहे काय? ह्या तीन शंकांचे निराकरण : एतेषाम्‌ इत्यादी छोकात करतात. पाच पाचाच्या ह्या तीन समूहांचा परामशी प्रत्येक समूहाच्या एकवचनी शब्दाने केळा आहे. तेव्हा अर्थ असा. प्रारम्म आदीप्रमाणे अर्थप्रकृती सर्वत्र असत नाहीत, तर ज्या नायकाची प्रयोजनसिद्धी ज्या अर्थप्रकृतीद्वारा अधिक होईल तीच प्रधान, इतर असल्या तरी गौण, नसल्यासारख्या. उदाहरणाथ, ज्यांना स्वतःच्या पराक्रमाविषयी फार अभिमान आहे त्यांच्या संबंधात पताका आणि प्रकरी अभिप्रेत नसतात, बीज, बिन्दु आणि कार्य ही मात्र सर्वत्र अपरिह्ाये आहेत. तथापि त्यांच्याहही गौण आणि प्रधान अश्शी विभागणी होतेच. त्याचप्रमाणे संधी, अवस्था आणि अर्थप्रकृती यांच्यावैकी ज्याचा ज्याच्याशी योग्य संबंध असेल त्याला प्राधान्य देऊन नाटकाची रचना करावी; याप्रमाणे दुसऱ्या शंकेचे सुद्धा निरसन केले आहे. आणि ज्याच्यापासून गुण म्हणजे उपकांर झटकन निर्दिष्ट होतो त्याच पाचापैकी एका अर्थप्रकतीची प्रधानत्वाने म्हणजे पुष्कळ प्रमाणात योजना करावी, इतरांची गौण स्वख्पात. प्रधानसिद्धीची आणि आयत्तसिद्दीची योजना करीत असता जो ज्या अंशामध्ये अधिक उपकार करणारा असेल त्याळा त्या बाबतीत प्राधान्य द्यावे; उदाहरणाथ, वासवदत्तेच्या १८८ नाट्यशास्त्र प्राप्तीच्या संबंधात बिन्दु प्रधान, पण कोशाम्बीराज्याच्या लाभाच्या संबंधात प्रकरी प्रधान. कोणी म्हणतात की या संबंधात पताका प्रधान आहे; राज्यलाभात अमात्याची सुद्दा स्वार्थसिद्धी होते म्हणून ही पताका. याचप्रमाणे सुसंगता आणि सांकृत्यायनी यांच्या संबंधातीळ अर्थप्रकतीविषयी समजावे. परंतु दुसरे असे म्हणतात. की अगदी अगोदरच नायकाचे नायकत्तर प्रस्थापित झाले असल्यामुळे दुसरा स्वतंत्र नायक असेळ ह्याला प्रमाण नाही. सुग्रीव आदी हे स्वतंत्रच असून प्रस्तुत कार्याचा केवळ आश्रय घेतात एवढेच पताकेच्या स्वख्पाने प्रमाणित होते. त्यांच्या मते तापसवत्सराज नाटकात दोन्ही प्राप्तींच्या संबंधात बिन्दूळाच प्राधान्य आहे. परंतु वरीलप्रमाणे पाचही अर्थ- प्रकृतींयेकी एक, दोन, तीन, चार किंवा सर्व प्रकृतींना औचित्यानुसार प्राधान्य वाटून द्यावे. “अर्थप्रकृतीनां संव्यवस्थामिः सह? ही दुरुस्ती आहे. मुळात “ -प्रकृतिसंध्य” असा एक समास आहे. पण 'सह' असल्यामुळे दुरुस्ती आवश्यक आहे. किंबा सर्व समास षष्ठ्यन्त असून 'सहू” नसेल तरी चालण्यासारखे आहे. - 'यथासंख्यनियम? म्हणजे पाच अवस्था आणि पाच संधी यांच्याशी पाच अर्थप्रकृतींचा क्रमवार संबध - प्रारम्मावस्था व मुखसंधि यांच्याशी बीजाचा इत्यादी प्रकारचा, - 'कर्तुक्रमः? म्हणजे कोणती गोष्ट अगोदर करावयाची, कोणती नंतर, म्हणजे कोणती अर्थ- प्रकृति अधिक महत्त्वाची, कोणती गोण, - “एकशेषेण? म्हणजे जरी “यस्य? “येन? इत्यादी एकवचनी गाब्द वापरलेले असले तरी त्यांनी पाचांचा बोध होतो असे समजावयाचे. -- “पताकाप्रकर्याबविवक्षिते' हस्तलिखितात हा शुद्ध पाठ आहे. मुद्रितात 'पताकाप्रकर्ये बिवक्षिते' असे आहे. पण ' प्रकये' असे ह्विबचनी रूप अशक्य आहे, आणि संदर्भ पहाता असंभाव्य आहे. 'संबन्धस्त- त्पधानं” ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'संबन्धप्रधानं आणि मुद्रितात 'संबन्धः प्रधान? असे आहे पण केलेली दुरुस्ती अर्थबोधासाठी आवद्यक आहे हे उघड आहे. -- :द्वितीयापि निरस्ता? दुसऱ्या शंकेचे या वाक्याने पूर्ण निरसन झाले आहे असे दिसत नाही. - ' प्रधानसिद्धावायत्तसिडी च? असा अशुद्ध पाठ हस्तलिखितात आहे. मुद्रितात 'प्रधानायत्तसिद्धी च' असे आहे. पण दोन निरनिराळ्या सिद्धींचा निदेश अभिप्रेत आहे हे 'च? च्या उपयोगावरून स्पष्ट आहे 7 पताकात्व केचिदाहुः' ह्या टीकाकारांचे म्हणणे असे की यौगन्धरायणादी अमात्यांच्या उपाय- योजनेने राज्यळाभ वत्सराजाला होतो हे खरे; पण त्याला असा लाभ झाल्यानें त्यांचाही स्वार्थ साधला जातो. तेव्हा ह्या अथंप्रकृतीळा प्रकरी असे न म्हणता पताका म्हटले पाहिजे. - “एवं सुततेंगता- इ०' 'एवं” म्हणजे प्रकरी म्हणून किंवा काहीजण म्हणतात त्याप्रमाणे पताका म्हणून. सुसगता !हे रत्नावलीतील नायिकेची सखी आणि सांकृत्याययी ही तापसवत्सराज नाटकातील वासवदचेची मैत्रीण, - 'ताबद्ूपत्वात्? म्हणजे 'नायकसूपत्वात, ह्या दुसऱ्या टीकाकारांच्या म्हणण्याचा आशय असा दिसतो की पताका आणि प्रकरी यांना त्यांचे त्यांचे स्वतंत्र नायक असतात असे म्हणणे योग्य नसून ह्या अर्थप्रकृतींना प्राभान्य येते असे समजणे बरोबर नाही. पताका नेंहभी प्रधान कार्याच्या आश्रयाने असते. - “एवं तु' “तु च्या उपयोगावरून हे स्पष्ट आहे कीह्या दुसऱ्या टीकाकारांचे मत अभिनवगुप्ताला मान्य नाही १९.२७ | | | _.& रटर एकोनेको अपे वा सांधेः पेताकायां तु यो भवेत । मधाना्थानुयायित्वादनुसाधेः पकीत्येते ॥ २७॥ पताकेमध्ये एक किंवा एकाहून अधिक जे संधी असतील ते मुख्य कार्याला अनुसरून असल्यामुळे त्यांना अनुसंधि म्हणतात. पताकादृत्तस्य प्रधानवदतिदेशात्पश्वसंधीत्यस्य पथग्गणना अस्त्विति । असी परार्थत्वादेव, अत एव च कृतः संधिः सूच्यते वाभ्यूह्ते वा निबध्यते वा । यथा मायापुष्पके - वाळी यथा विनिहतः प्रथितप्रभावो दग्धा यर्थककापिना प्रसभं च लड्डा । तीर्णा यथा जलनिधिर्गिरिसेतुना च मन्ये तथा विलासेतं चपलस्य घातुः ॥ इति । पताकार्‍यां हि पूर्णवणने पताकान्तरं स्यादित्यनवस्था । तद्युक्तमुक्तमनुसांधित्वान्न पृथग्गणनमस्येति । ळोलटाद्यास्तु मन्यन्ते पराथे साधयितव्ये पताकानायकस्येति- बृत्तमागा अनुसंधयः । यथा कृत्यारावणे - धन्यास्ते ते क्वातनः छाध्या तेषां च जन्मनो ब्रात्तेः । येरुज्झितात्मकायेस्तेषामर्थाः प्रसाध्यन्ते ॥ इति मुखानुसांधेः, 'वाळी यथा' इति प्रतिमुखस्यानुसोधेः, शक्तिहते लक्ष्मणे ओषध्यानयने गर्भस्य, अद्ठददोत्ये$वमर्शस्य, मन्दोदर्याक्षेपे 'असत्यनार्ये, तिष्ठ तिष्ठ' इत्यवसाने निर्वहणस्य इति । एतत्तु भवति । सर्वस्येव हि प्चावस्था भवन्तीत्युक्तम्‌ । किं त्वस्यानुसंधित्वाभिधाने प्रयोजनं न पड्यामः । पताकेचे कथानक मुख्य कथानकासारखे असा अतिदेश केला असल्यामुळे त्याचे पाच संधी होतात, तेव्हा याची स्वतंत्र गणना असू द्यात. ती दुसऱ्याच्या साठीच असते, म्हणून तिच्यात योजिळेळा संधी सूचित केला जातो किंवा अनुमानाने ज्ञात होतो किंवा ग्रथित केळा जातो. उदाहरणार्थ, मायापुष्पक नाटकात - 'पराक्रमाविषयी प्रसिद्द असलेळा वाली ज्याअर्थी मारळा गेळा आहे, एका वानराने ज्याअर्थी बलात्काराने १ का पताकायाश्व योजयेत. २ का -बन्धः स कोत्येते. १९० | नाट्यशास्त्र ल॑का जाळली आहे आणि ज्याअर्थी पर्वतातीळ दगडांच्या सेतूने समुद्र पार केळा आहे, त्या अर्थी हे चंचळ वि्रात्याचे विळसित आहे असे मळा वाटते.' कारण, पताकेमध्ये पूर्ण वर्णन असल्यास तिच्यात दुसरी पताका असेळ आणि याप्रमाणे अनवस्थाप्रसंग ओढवेळ. म्हणून अनुसंधी असल्यामुळे त्याची स्वतंत्र गणना नाही असे म्हटले आहे ते योग्य आहे. परंतु लोळुटप्रभृतींची मान्यता अशी आहे की दुसऱ्याचे प्रयोजन साध्य करावयाचे असता पताकानायकाच्या वृत्ताचे भाग ते अनुसंधी होत. उदाहरणार्थ, कृत्या- रावण नाटकात - 'ते धन्य होत, ते कृतकृत्य होत, त्यांचे जीवित प्रसरांनीय होय, जे आपल्या देहावर तिलांजली देऊन त्या इतरांचे प्रयोजन साध्य करतात! हा मुखाचा अलुसंधि, “वाली ज्यावरून' इत्यादि हा प्रतिसुखाचा अनुसंधि, शक्तीने लक्ष्मण निश्वेतन झाळा असता औषधी आणण्याच्या प्रसंगात गर्भाचा अनुसंधि, अंगदरिष्टाईच्या प्रसंगात अवमर्शाचा अनुसंधि आणि शोवटी मन्दोदरीच्या 'हे कुलटे, अनार्ये, थांब थांब ' ह्या निर्भेत्सनात निर्वहणाचा अनुसंधि. पण हे सवे आहे; कारण सर्वे वृत्ताच्या पाच अवस्था असतात असे म्हटलेच आहे. परंतु ह्यांना अनुसंधी म्हणण्याचे प्रयोजन आम्हाला दिसत नाही. ह्या छोकावरील टीकेचा प्रारंभीचा अंश गहाळ झाला आहे असे दिसते, व्याख्येच्या प्रारंभी पहिळे एक दोन शाब्द प्रतीक म्हणून उद्धुत व्हाबयास पाहिजे होते. तसेच कछोकाचा अर्थ लावणे- ही अपेक्षित आहे. टीकेच्या उपलब्ध अंश्शातील प्रारंभीच्या वाक्यात अमिनवगुप्तांचे स्वतःचे मत नसून एका आक्षेपकांचे मत निर्दि्ट आहे. कारण, ह्या वाक्यात पथग्गणना असावी असे म्हटळे आहे, तर पुढे टीकेत प्रथग्गणना नाही ढेच विधान योग्य असे म्हटले आहे. यावरून असे दिसते की ह्या प्रारंमीच्या बाकयाच्या पूर्वी अनुसंधींची पृथयाणना करण्याची आवद्यकता नाही असे म्हटलेले असावे. आणि कोकातील 'प्रधानार्थानुयायित्वात्‌ अनु- संधिः” या शब्दांची व्याख्या करताना असे म्हटलेले असणे स्वाभाविक आहे. - 'पताकावृत्तस्य” . ही मुळातील 'पताकाप्रवृत्तस्य' ची दुरुस्ती आहे. 'प्रदृत्त या ठिकाणी अर्थहीन आहे. आणि ज्या- २३ व्या छोकात 'प्रधानवत्‌ः असा अतिदेश आहे त्यात वृत्त शब्दच आहे. - 'पन्चतंधरीत्यस्य पुथगः हस्तलिखितात 'प्चसंधीत्यस्यात्‌ पुथग्‌॑ः असा किंचित भ्रष्ट पाठ आहे. मुद्रितात 'पन्चसंधीत्या- सां भवेत्‌ पुथग” असा आहे. “आसाम? ने कशाचा बोध संभाव्य आहे हे सांगता येण्यासारखे नाही. आणि 'अस्तु इते प्रस्तुत वाक्याच्या होबटी अन्तभूत करणे आवद्यक असल्यामुळे मुळात “भवेतू” असण्याची शक्‍यता नाही. - 'असो इ०' हे आक्षेपाला दिलेले उत्तर आहे. - 'कुृत? हा हस्तलिखितातीळ पाठ आहे. मुद्रितात 'कुतः?' आहे पण त्याने समुचित अर्थबोध होत नाही. कुत म्हणजे पताकावृत्तात जो केळेळा म्हणजे अन्तभूत असतो तो. तो क्वचित सूचित होतो, कचित अनुमित होतो तर क्वचित स्पष्टपणे ग्रथितही होतो. -“न पुथग्गणनमस्येति यातील ' अस्य? म्हणजे 'पताकावृत्तस्य”. या शाब्दांनंतर मुळात “तथा? हा शब्द अधिक आहे. पण प्रस्तुत वाक्याच्या शेवटी तो अनुपपन्न आहे मुद्रितात आहे त्याप्रमाणे पुढील वाक्याच्या प्रारंभी सुद्धा तो संभबनीय नाही. लोलळटादींचे मत मिनत्न आहे १९.२८ १९१ हे 'तु' वरून स्पष्ट आहे. त्याचा निदेश करताना 'तथा? शब्द योजणार नाहीत. म्हणून तो शब्द गाळला आहे. - मायापुष्पक आणि कुत्यारावण ही दोन्ही नाटके सध्या उपल्ब्ध नाहीत. ण उज्झितात्मकायेस्तेषाम? हा हस्तलिखितातील पाठ आहे. मुद्रितात “कार्यैयेंषाम' असे आहे. पण 'कार्य' पेक्षा 'काय' ने विधान अधिक अर्थवाही होते. आणि आत्मत्याग करणारे धन्य बगेरे होत असे म्हणावयाचे असल्यामुळे त्यांचाच निदेंश करणारा “ येषाम्‌? शब्द बापरला असण्याची शक्‍यता कमी. ' तेषाम्‌ म्हणजे ज्यांचे कार्य ताधले जाते ते दुसरे. - “बाली यथा? हा ठोक जर वर उद्धत केलेलाच असेल तर मायापुष्पक आणि कृत्यारायण ह्या दोन्ही नाटकांत एकच कोक आढळावा हे चमत्कारिकच होईल हा निराळा लोक असण्याचा संभव आहे. - “5वमर्शस्य? मुळात ह्या शब्दाच्या पूर्वी 'मन्दोदर्याक्षेपे, हा शब्द आहे. पण मन्दोदरीच्या आक्षेपाचे वचन नंतर उद्धत केलेले आहेसे दिसते, म्हणून हा शब्द नंतर घातळा आहे. शिवाय 'मन्दोदर्याक्षिपे' अवमर्शातच अन्तर्भूत असते, तर ह्या शब्दानंतर “च? अपेक्षित होता. - “असत्यनायें तिष्ठ तिष्ठ इत्यवसाने? ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'अस्क्तनार्ये तिष्ठ तिष्ठेतिरथ- स्त्वंसाने' असा भ्रष्ट पाठ आहे, मुद्रित पाठ 'आ! अशक्त ; अनार्ये तिप्ठ तिष्ठ, अतिरथस्त्वे सा न? असा आहे. तोही असंभाव्य वाटतो. त्यात लिंगभेद सुळीच मानलेला दिसत नाही. - “एतत्‌ म्हृणजे ह्या प्रकास्ची इतिव्ृत्ताची विभागणी. - “करें त्वस्या- ही “करिं तस्या- ची दुरुस्ती आहे. या वाक्यात लोलटादींच्या मतावर आक्षेप घेतलेला दिसतो ; म्हणून “किंतु? आवश्यक आहे. 7 अनुसंधित्वामिधाने, ही मुळातील 'अनुसंधिद्रित्वामिधाने ! ची दुरुस्ती आहे. 'द्वित्व' ला येथे काहीच अर्थ नाही. अभिनव गुप्ताचे म्हणणे असे दिसते की छत्यारावण नाटकातील हे प्रसंग प्रधान इतिवृत्ताच्या संघींत आहेत हे खरे आहे. पण ते सर्व अनुतंधि या संज्ञेला पात्र आहेत असे म्हणता येण्यासारखे नाही. -छोकात म्हटल्याप्रमाणे पताकेच्या इतिद्त्तात जो संधि असतो यालाच अनुसंधि म्हणतात. आगर्भादाविमशांद्रा पताका विनिवर्सते । कस्माद्यस्मान्िवन्धो5स्याः पेरार्थः परिकीर्त्वते ॥ २८ ॥ गर्भसंधीच्या आत किंवा विमशी संधीच्या आत पताकेची समाप्ती होते. याचे कारण असे की तिची योजना दुसऱ्यासाठीच करावयास सांगितले आहे. स्वफलसिद्धये यतमानस्य तत्र तत्रावश्यं पृथग्गणनशाक्षेते तत्प्रयोजनम्‌ । अस्मत्पक्षे कस्मिस्तर्हि प्रधानसंधौ तस्यानुयायित्वमिति दर्शयितुमाह आगर्भा- दाविमशद्विति । प्रातिमुखे गर्भ वा यमर्थ व्याप्य निवर्तते पताकेतिवृत्तं तावत्येव पताकानायकस्य स्वफलसिद्धिर्पनिबन्धनीया । सिद्धफलस्त्वसौ प्रधानफळ एव व्याप्रियमाण आसीनो5पि भूतपूर्वगत्या पताकाशब्दवाच्यो न मुख्यत्वेन । अत्नाह कस्मार्दिते । अस्याभिप्रायः, प्रधानवच कल्प्येतेत्युक्तत्वात्‌ निर्वाहादपि किं १ का तु बन्धो. २ का परार्थायोपकल्पते. रय नाट्यशास्त्र तड्धूवति । अत्रोत्तरं यस्मादिति । निवेहणपर्यन्ते तत्फळे क्रियमाणे तुल्यकालयो- रुपकार्योपकारकत्वाभावात्‌ तेन प्रधानोपकारो न भवेत्‌ । अभिविधावाडू । ये तु मर्यादायां तं व्याचक्षते ते न सम्यगमंसत । विनिपातप्रतीकारे प्रधानविम्शसंधो प्रत्युतोपयोगः पताकायाः । यत्र कृतघध्नता दृष्टा तन्नोच्यते, कृतज्ञस्तु प्राप्फलो (0.८. &"- विनिपातान्‌ प्रतिकुयादेवोते । स्वतःच्या फळाच्या सिद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्या'च्या वृत्ताची त्या त्या ठिकाणी अवश्य स्वतंत्र गणना होईळ अशी शंका संभवते हे त्यांचे प्रयोजन. तर मग आमच्या मताप्रमाणे कोणत्या प्रधान संधीमध्ये त्या संधीचे अनुयायित्व केळे जाते ते “आगर्भादा- विमार्शद्वा' या छोकात दाखवितात. पतताकेचे इतिवृत्त प्रतिमुखसंधीत किंवा गर्भसंधीत ज्या प्रयोजनास व्यापून निवृत्त होते तेवढ्याच अंशात पताकानायका'च्या स्वतःच्या फळाची योजना करावी. पण त्यांचे फळ सिद्ध झाल्यानंतर तो प्रधान नायकाच्या फलासाठी उद्योग करीत राहिळा तरी पूर्वी असलेल्या त्याच्या स्थितीमुळे पताका शब्दानेच ओळखला जातो, प्रधान म्हणून नाही. येथे “कस्मातः असे म्हटले आहे. त्याचा अर्थ असा. “प्रधान इतिब्ृत्ताप्रमाणे कल्पिळे जाते' असे म्हटले आहे, म्हणून ते काये तडीस जाण्या'च्या वेळेसही असते काय? याचे उत्तर 'यस्मात्‌' इत्यादी शब्दांत देतात. निवेहणापर्यन्त जर पताका-इतिवृत्ताचे फळ योजित केळे तर दोन्ही फळे एकाच वेळी सिद्ध होऊन त्यांच्यात उपकार्य आणि उपकारक अशा तऱ्हेचा संबंध उत्पन्न होणार नाही आणि त्यासुळे ते इतिवृत्त प्रधान इतिव्ृत्ताळा उपकारक ठरणार नाही. “आ” हे कर्मप्रवचनीय “अभिविधि' म्हणजे पासून या अर्थी वापरले आहे. जे त्याची “मर्यादा! म्हणजे पर्यन्त या अर्थी व्याख्या करतात त्यांनी नीट विचार केळा नाही. प्रधान इतिवृत्ताच्या विमरी संधीत उलट पताके'चा अडचणींवर मात करण्यासाठी उपयोग होतो. जेथे कृतघ्नता दिसूनं येते त्याचा निर्देश केळा जात नाही. पण कृतज्ञ असा जो पताकानायक असतो तो स्वफलप्राप्तीनंतर अडचणींचा प्रतिकार अवर्य करतोच. 'स्वफलसिद्धये इ०? हे वाक्‍य येथे का योजिळे आहे ते स्पष्ट नाही. टीकेच्या याच्या अगोदरच्या भागात लोळट आदींच्या अनुसंधिविषयक मताचा उललेख केला आहे, त्याला अनुलक्षून हे विधान केळे असण्याची शक्‍यता आहे. तसे असल्यास 'तत्पयोजनम्‌? मधील “तत्‌? ने लोल- टादींचा निर्देश अभिप्रेत असणे संभाव्य आहे. पाच अनुसधी मानण्यात त्यांचा हेतू असा असावा हे येथे सूचित केलेले दिसते. “तत्पयोजनम्‌? च्या जागी मुद्रित पाठ 'तत्पशमनप्रयोजनम? असा आहे. पण तो मूळ असेल्से वाटत नाही. प्रस्तुत क्छोकात ह्या वाक्यात निर्दिष्ट झालेल्या शंकेचे प्रशामन मुळीच केलेळे नाही. - 'गर्भे बा यमर्थ' ही हस्तलिखितातील 'गर्भो अन्यदिवायमर्थ' ची सुचविलेली दुरुस्ती आहे. मुद्रित पाठ गर्भे यदि वा । यमर्थ' असा आहे. “अन्यद्‌ इब अयस्‌ ह्याचा किंवा “यदि” चा वाक्यात कोठे अन्वय लागण्यासारखा नाही. येथे असे म्हटले आहे १९६९९ १९३ की पताकानायकांचा स्वार्थ प्रतिसुख किंवा गर्भसंबरीतच सिद्ध झालेला दाखवावयाचा असतो; पुढील संधीतीळ त्यांचे अस्तित्व पराथ म्हणजे प्रधाननायकाच्या फलसिद्धीला साहाय्यभूत असते. 7 कस्मादितिः यातील इति” हस्तलिखितात नाही, पण तो आवश्यक आहे. मुद्रित पाठ 'कस्मा- द्रस्मादिति | कस्मादः असा आहे. पण 'यस्मातः पुढे स्वतंत्रपणे अवतारित केळे आहे. आणि त्याचा अथे सांगण्यासाठी 'कस्मात? शब्दाची पुनरावर्ती करण्याची आवश्‍यकता नाही. - निर्वाहात( यातील पंचमी विशेष समर्पक नाही. सप्तमी अपेक्षित आहे. - 'तद्भवति? यातील “तत्‌? म्हणजे पताकानायकाचे स्वतःचे फल, - “अमिविधावाड् पाणिनीच्या “आडूमर्यादामिविव्योः (२.१.१३) ह्या सूत्राप्रमाण आ हे कमप्रवचनीय अभिविधि आणि मर्यादा या दोन अर्थी वापरता येते. अमभिविधि अर्थ घेतळा तर ज्याच्याबरोबर ते वापरले असते त्याचा अन्तर्भाव होतो. म्हणजे “आगर्भात्‌? याचा अर्थ 'गर्भापासून, गर्भ धरून” असा होतो. पण मर्यादा हा अर्थ घेतला तर 'गर्भापर्यंत म्हणजे गर्भ सोडून' असा अर्थ होईल. मग गर्भसंधीत (किंबा विमर्दासंधीत) पताकेचे अस्तित्व दाखविता येणार नाही. ती अगोदरच संपुष्टात आलेली दाखवाबी लागेल. -- 'विनिपातप्रतीकारे' हौ “-प्रतीकारः? ची दुरुस्ती आहे. 'उपयोगः' शी ह्याचा अन्वय लावावयाचा असल्यामुळे सप्तमीच संभाव्य आहे. - 'प्रत्युतोपयोगः' मुद्रित पाठ “ग्रस्तुतोपयोगः” आहे. पण 'प्रस्तुत'ला येथे काही विशोब अर्थ नाही. प्रत्युत” हे अधिक अर्थवाही आहे. पताका विमर्दात नसते असा जो अर्थ आ मर्यादार्थी मानल्यामुळे निष्पन्न होतो त्याच्या उलट स्थिती आहे. - 'दृष्टा तन्नोच्यते' हा सुचविलेला पाठ आहे. हस्तलिखितात दृष्टात्वेनीत्योच्यते' असा भ्रष्ट पाठ आहे. मुंद्रितात दृष्टा तन्न नीत्योच्यते' असे आहे. नीतीचा येथे काही संबंध अभिप्रेत असेल्से बाटत नाही. येथील म्हणण्याचा आदाय असा दिसतो की पताकानायक जर कृतध्न असेल तर आपली कार्यसिद्धी झाल्यावर तो प्रधाननायकाच्या मार्गात आलेल्या अडचणी दूर करण्यास साहाय्य करणार नाही; म्हणून अश्या तऱ्हेच्या पताकानायकाची योजना करीत नाहीत. - 'कतज्ञस्तु' सुग्रीवाचे उदाहरण ध्यानात आणून हे लिंहिळे आहे हे उघड आहे. यत्रार्थ चिन्तिते$न्यस्मिस्तलिज्ञो5न्यः प्रयुज्यते । आगन्तुकेन भावेन पताकास्थानकं तु तत्‌ ॥ २९ ॥ जेव्हा एका गोष्टींचा विचार चाळू असता तिच्यासारख्या दुसर्‍या गोष्टीची योजना आगंतुकपणे केली जाते तेव्हा ते पताकास्थानक होते. तत्र पताकानायको यथा स्वार्थे प्रवतते पराथे च, तथा भृत्यस्यान्यस्य वा जडस्य वा स्थितिः स्वार्थे$पि सति परार्थे संपद्यते तत्पताकास्थानकम, पताकासहराभ्‌ । तत्र जडस्य स्वार्थपराथंप्रवृत्तो तावदभिसंधानाभावात्‌ अभि- संघानवतः सुग्रीवादेः पताकानायकाड्वेदः । अजडस्यापि स्वार्थे यद्यप्यभिसंघा- १ नि यत्नात्यस्मिन्युज्यमाने, का यत्नार्थे चिन्त्यमाने$पि तल्लिद्वर्थ:. १९४ | नाट्यशास्त्र ४82) नमस्ति तथापि परार्थे नास्तीति विदोषः । प्रधानवच्च कलप्येतेति पताकाठक्षणे५- भिधानात्‌ बहुतरेतिवूत्ते व्यापकता नायकस्य, अस्य तु परिमितेतिवृत्तव्यापक- त्वमित्यपि विदोष' । पताकानायक अञ्याप्रमाणे स्वतःच्या प्रयोजनासाठी आणि इतराच्या प्रयोजनासाठी प्रवृत्त होतो त्याप्रमाणे सेवकाची अथवा इतर कोणाची अथवा अचेतन वस्तूची स्थिती स्वार्थ साधीत असतानाही पराथ साधते ती स्थिती म्हणजे पताकास्थानक, पताकेप्रमाणेच होय. त्यांत अचेतन वस्तू स्वार्थ आणि पराथे यांसाठी प्रवृत्त होते तेव्हा तेथे संकल्पाचा अभाव असल्यामुळे बुद्धिपूर्वक संकल्प करणाऱ्या सुग्रीव आदी पताकानायकाहून ती भिन्न आहे. आणि सचेतन भ्ृत्य वगैरे जरी आपल्या प्रयोजनासाठी संकल्प करतात तरी दुसऱ्याच्या प्रयोजनासाठी तो करीत नाहीत हा फरक. आणि पताकेच्या लक्षणात “आणि प्रधान इतिवृत्ताप्रमाणे ती कल्पिली जाते' असे म्हटले असल्यामुळे तिचा नायक इतिवृत्ताच्या मोठ्या अंशात विद्यमान असतो, तर हे पताकास्थानक अगदी अल्प इतिवृत्ताला व्यापते - असा सुद्धा द्या दोहोंत फरक आहे. या ठिकाणी नाट्यशास्त्रात पताकास्थानक ब त्याचे चार प्रकार ह्यांचे वर्णन आहे. पताका आणि पताकास्थानक यांच्यात साम्य असल्यामुळे पताकेच्या विवरणानेतर पताकास्थानकांचे वर्णन स्वाभाविक आहे असे सुचवून प्रस्तुत पस्च्छिदात अमिनवगुप्ताने त्या दोहोंमधील भेदही स्पष्ट केला आहे. - तथा? हा शब्द मुळात नाही. पण अर्थासाठी आवश्यक म्हणून तो घातळा आहे. 'स्थितिः' हा शब्द पताकास्थानकमधील 'स्थान? च्या पर्यायार्थी बापरळेला दिसतो. - 'पताकासदशमू? ही सुचबिलेली दुरुस्ती आहे. मुळात केवळ 'पताका' आहे. पण 'पताका? व “पताकास्थानकम? यांच्यात सामान्याधिकरण अभिप्रेत असण्याची शक्‍यता कमी, - 'अमिसंधान? म्हणजे मनात योजून काही करण्याचा संकल्प करणे. - 'यद्यप्यमिसंधानमस्ति? यातील 'अभिसंधानम? ही मुळातील 'अनुसंधानम्‌? ची दुरुस्ती आहे. येथेही अमिसधानच अमिप्रेत आहे यात शंका नाही. तस्य पताकास्थानकस्य वक्न्यमाणभेदैभेंदवत्त्वात्‌ सामान्यलक्षणं तावदाह यत्रार्थ चिन्तिते5न्यस्मिन्निति । अ्थः प्रयोजनम्‌ उपायश्व कमकरणजव्युत्पत्त्या । अन्यस्मिच्ुपाये प्रयोजने वा चिन्तिते5न्यः उपायान्तरप्रयोजनान्तरठक्षणः प्रकर्षेण युज्यते संबध्यते यत्राते तत्पताकार्थानकम्‌ । पताकाधारत्वादुपचारादितिवरत्तमपि पताकास्थानकम्‌ । उपाध्यायास्त्वाइ: । पताकायाः स्थानमितित्रत्तता, तत्र चार्थः क्रियमाणो पि पूर्वपदार्थमुपसंक्रामाते, राजवाहन इवायमुद्धरकन्धरस्तिष्ठतीति यथा । तेन पताकास्थानकमितिवृत्तमेवोच्यते । तत्र वर्ण्यमानं तु जडाजडरूपं पताकासहरमित्यथादुक्त॑ भवति । स चान्योर्थस्तलिद्ठः तं मुख्यमर्थ ठिड़र्‍यति विचित्रयतीति । ननु किं तत्र पताकासाहड्यमित्याह आगन्तुकेन भांवेनेति । १९.२९ १९५ भावनं भावः कारणत्वम्‌ । तः्च द्विविधं स्वरूपकूतं सहकारिकृतं च । सहकारि- कूतमागन्तुकमुच्यत । सहकारित्वसामान्यात्‌ तत्ससर्थाचरणलक्षणात्‌ पताका साहड्यामेति यावत्‌। अन्याभिसंधाने5न्यसिद्धिश्वेत्‌ भूषणभूतापि केंश्रिदू दूषणत्वेन ग्रूहीता । तैरथंशब्दः उपायवाच्येवाश्रितः, तलिड्ठः इति कारणत्वधर्माभावप्रत्नत्ि- निमित्त उपायः । उदाहरणं सामान्यलक्षणस्य विदोषलक्षणव्याख्याने दाक्ययोज- नामिति तत्रेव दशाथिष्यामः । पुढे सांगणार असलेल्या प्रकारांमुळे त्या पताकास्थानकाचे मेद आहेत, तेव्हा त्याचे सामान्य लक्षण 'यत्रार्थ चिन्तितेडन्यस्मिन! ह्या छोकात करतात. अर्थ म्हणजे प्रयोजन आणि उपाय, कर्म आणि करण या अर्थाच्या व्युत्पत्तीने. एक उपाय किंवा प्रयोजन चिंतिले असता जेथे दुसरा उपाय किंबा दुसरे प्रयोजन ह्या स्वरूपाचा निराळा अर्थ प्रकर्षाने योजिला जातो म्हणजे संबंधित केळा जातो ते पताकास्थानक. पताकेळा आधार असल्यामुळे उपचाराने इतिबृत्ताळा सुद्धा पताकास्थानक म्हणतात. पण आमचे गुरुजी म्हणतात- पताकेचे स्थान म्हणजे इतिवृत्ताचें अस्तित्व; आणि त्यात केळा जाणारा अथ सुद्धा पूर्वीच्या शब्दाच्या अर्थाला संक्रामित होतो; उदाहरणार्थ “राजार्‍च्या वाहनाप्रमाणे ह्या घोडयाची मान जूविरहित अशी ताठ आहे. म्हणून इतिवृत्ताळाच पताकास्थानक' म्हणतात. त्यात वणेत केलेळे सचेतन आणि अचेतंन स्वरूपाचे विषय पताकेसारखे आहेत हे अर्थातच अभिप्रेत आहे. आणि तो दुसरा अर्थ तछलिह्ट असतो म्हणजे त्या मुख्य अर्थात वैचित्र्य आणतो. त्यात पताकेशी सादऱ्य कोणते या प्रश्नाचे उत्तर “आगन्तुकेन भावेन' ह्या शब्दांत देतात. भाव म्हणजेच भावन म्हणजेच कारणभूत होणे. आणि ते दोन प्रकारचे, त्याच्या स्वरूपामुळे होणारे आणि संहकाऱ्यामुळे होणारे. सहकाऱ्यामुळे होणारे ते आगन्तुक असे म्हणतात. ते कार्य साधण्यास समर्थ आचरण असणारे अशा स्वख्पाच्या सहकारित्वाशी समानता असल्यामुळे पताकेशी सादृश्य आहे असा याचा अर्थ. एकाचा संकल्प केला असता दुसऱ्याची सिद्धी जर झाली तर ते भूषणावह असले तरी काहींनी ते दूषण ठरविले आहे. त्यांनी अर्थ शब्द उपाय ह्या अर्थानेच स्वीकारला आहे आणि तटह्छिड़ट उपाय म्हणजे कारणीभूत होण्याच्या धर्माच्या अभावामुळे प्रवृत्त होणारा असे मानळे आहे. पताका- स्थानकाच्या प्रकारांच्या लक्षणांच्या व्याख्या करताना ह्या सामान्य लक्षणा'च्या उदाहरणाची योजना करणे शक्‍य आहे हे आम्ही त्या ठिकाणीच दाखवून देऊ. "कृमकरणव्युत्पत्त्या क्र धातूपासून व्युत्पन्न झालेला 'अर्थ' हा शब्द त्या धातूचे कर्म म्हणून “ अर्यते असो ' अक्शा प्रकारे आणि त्या धातूचे करण म्हणून 'अर्यते येन ततः अक्या प्रकारे अतुक्रमे प्रयोजन आणि उपाय ह्या अर्थी बापरला आहे. --' उपचारातू ' म्हणजे इति- वृत्ताच्या काही भागाला पताकास्थानक म्हणतात ते गोण अर्थानें. पताकेचे स्थान म्हणजे तिला १९६ | नाट्यशास्त्र आधारथूत असल्यामुळे हा गौण अर्थ निष्पन्न होतो. - “उपाच्यायास्त्वाहु:' भट्ट तोताचे म्हणणे असे की इतिदृत्ताला पताकास्थानक म्हणतात ते मुख्य अर्थाने, गौण अर्थाने नाही, -- 'तत् चार्थः इ०' या वाक्याचा अर्थ विशेष स्पष्ट नाही. पताका जर इतिवृत्त आहे तर तोच अर्थ पताकास्थानकालाही लागू पडतो असा आशय संभवनीय आहे. पण यात 'पूबंपद? शब्दाने पता- कास्थानकाचा बोध होतो असे समजावे लागते. त्याची चीट उपपत्ती लागत नाही. - 'राज- वाहून इब इ०' ह्या उदाहरणाचा अर्थ असा असावा - उद्गुरकन्धर हे राजवाहनाचे वर्णन; ते दुसऱ्या वाहनालाही लागू केळे आहे. ते वर्णन दुसऱ्या वाहनाला सुद्धा मुख्य अर्थानेच लागू होते, गौण अर्थाने नाही. त्याचप्रमाणे पताकेचे इतिवृत्त असे वर्णन पताकास्थानकाला लागू होते ते मुख्य अर्थानेंच, गौण अर्थाने नाही. - 'लिड्यतिः ह्या क्रियापदाचा ।विचित्रयति? म्हणजे वैचित्र्य उत्पन्न करतो असा अर्थ केला आहे, - 'सहकारित्वत्तामान्यात्‌ इ०' पताका आणि पताकास्थानक यांत साम्य असे की दोन्हीही प्रधान कार्याला सहकारी म्हणून उपयोगी पडतात. आणि हा सहकारिभाव म्हणजे उपयोगी पडण्याची समथता. - 'उपायवाच्येबाश्रित;? मुद्रित पाठ 'उपायवाच्योपाश्रितः असा आहे. तो क्लिष्ट आहे.- 'कारणत्वधर्माभावप्रवृत्तिनिमित्तः ही ह्या टीकाकारांनी केळेली 'तक्लिद्वः? शब्दाची व्याख्या. कारणीभूत न होणारा असे ह्या व्याख्येचे तार आहे. दुसरा उपाय अश्या तऱ्हेचा असतो म्हणून ते दूषण मानळे आहे. सहसेवार्थसंपत्तिर्गुणवत्युपकारतः । पताकास्थानकमिदं प्रथमं परिकीर्तितम्‌ ॥ ३० ॥ ज्याच्यामध्ये उपकारक असलेली व गुणसंपन्न अशी प्रयोजना'ची संप्राप्ती एकाएकी सिद्ध होते ते पहिल्या प्रकारचे पताकास्थानक असे म्हणतात. तद्धेदान्‌ क्रमेण लक्षयति सहसेवार्थसंपत्तिरिते । यत्रोपकारमपेक्ष्य गुणवती उत्कृषा अथंस्य फलस्य सहसेवार्चिन्तितत्वेन भवति संपत्तिः तत्पथम- मिति साध्यफलयोगात्मधानं पताकास्थानम्‌ । यथा रत्नावल्यां सागरिकायां पाशावलस्बनप्रश्रत्ताया वासवदत्तेयमिति मन्यमानो राजा यदा पादां मु्धाति तदा तदुक्तया सागारिकां प्रत्यभिज्ञाय 'हा कथं प्रिया मे सागारेका । अल- मलमतिमात्रम? . इत्यादि । अत्रान्यत्परयोजनं चिन्तितं तदैचित्र्यकारि च प्रयोजनान्तरं संपन्नम्‌ । तत्र च दैवयोगात्तथाभूतदेशकाळयोगो नायकः स्वात्मनो5भिसंघिबळात्‌ कल्पितभेदः । सागरिकेव च मरणमेवोचितमित्यन्याभि- संधानन वदतीति पताकानायकसहशत्वं भजते । अन्यस्मिद्ञापाये चिन्तिते सहसोपायान्तरप्राप्तिः यथा नागानन्दे जीमूतवाहनस्य शडखचूडप्राप्यवध्यपटस्य कन्चुकिना वासोयुगळापंणम्‌ । १ का॒-त्युपचारतः. १९.३० १९७ त्याच्या प्रकारांचे 'सहसैवाथेसंपत्तिः' येथपासून कमाने लक्षण करतात. जेथे उपकाराच्या अपेक्षेने गुणवती म्हणजे उत्कृष्ट प्रकारची अर्थाची म्हणजे फळाची, सहसा एव म्हणजे तिची कल्पनाही नसता, संपन्नता होते ते प्रथम म्हणजे साध्य करावयाच्या फलाशी संबद्ध असल्यामुळे मुख्य प्रकारचे पताकास्थान. उदाहरणार्थ, रत्नावली नाटिकेत तिसऱ्या अंकात सागरिका गळफास लावून घेण्यास प्रवृत्त झाली असता ती वासवदत्ता आहे असे समजून राजा जेव्हा तिचे पाश सोडतो तेव्हा तिच्या उद्गारावरून ती सागरिका आहे असे ओळखून “काय? ही माझी प्रिया सागरिका ? पुरे पुरे' इत्यादी प्रसंग. त्या ठिकाणी दैवयोगाने त्या विशिष्ट देशकालाशी संबद्ध झालेला नायक आपल्या स्वतःच्या संकल्पाच्या जोरावर मिन्न कल्पना करतो. आणि सागरिका'च 'मरण हेच उचित? असे निराळाच संकल्प मनात योजून म्हणते म्हणून तिचे पताकानायकाशी सादऱ्य होते. एक उपाय चिन्तिळा असता अकस्मात दुसऱ्या उपायाच्या प्राप्तीचे उदाहरण नागानन्द नाटकात जीमूतवाहनाला शंखचूडापासून कीने 00. क वा प्राप्त व्हावयाचच्या वध्य मनुष्याच्या वस्राऐवजी कंचुकीने केलेले दोन वश्लांचे अपण. 'उपकारमपेक्ष्!'/ हा उपकार पतांकास्थानकाकडून प्रधान इतिवृत्तावर व्हावयाची अपेक्षा असते, मुद्रितात 'उपकारकमपेक्ष्य!' आहे. पण तो तितकासा समपैक नाही. - “तदुक्तया? सागरि- केची यावेळची उत्तती आहे - 'मुंचदु मुंचदु म॑ भट्टा । पराहीणो क्‍्खु अअं जणो | ण उण इरिसं अवसरं मरिदुं पावेदि। (सोडा सोडा मला. मी परस्वाधीन आहे. मरणाची अशी संधी मला पुन्हा मिळणार नाही.)' - 'अन्यत्पयोजनं चिन्तितम्‌? बासवदत्तेची मुक्तता करणे अता राजाचा उंद्देश होता, त्याऐबजी सागरिकेशी मीलन हे दुसरे प्रयोजन सिद्ध झाले. या वाक्यात पताकास्थानका'चे वरील सामान्य लक्षण प्रस्तुत प्रकाराला लागू असल्याचे दाखविले आहे. - 'तत्र च इ०? या वाक्यात 'दैवयोगः' च्या ऐवजी 'दैबयोगात? आणि 'स्वालैव? च्या ऐवजी 'स्वा- त्मनो अश्या दुरुस्त्या सुचविल्या आहेत. मुळात अनेक शाब्द प्रथमा विभक्तीत आहेत. त्यांच्या एकत्रित अन्वयाची राकयता फारशी नाही. सुचविलेल्या दुरुस्तींनतर “-कालयोगः? हे 'नायकः? चे विशोषण आणिं 'कल्पितमेद:? हे विधेय असे समजणे शक्‍य आहे. - 'अभिसंधिबलात नाय- काचा संकल्प असतो वासवदत्तेची पाशयापासून मुक्तता करण्याचा. त्यामुळे वस्तुतः सागरिका तेथे असता ती वासबदत्ता अशी त्याची मिन्न स्वरूपाची कल्पना होते, असा 'कल्पितभेदः याचा अर्थ दिसतो. -- 'सागरिकेव च इ०? वर उद्धृत केलेल्या सागरिकेच्या उक्तीत 'मरणच योग्य? असा तिचा संकल्प प्रकट झालेला दिसतो; पण खरोखर तिच्या मनात दुसराच अभिसंधि म्हणजे संकल्प असतो -- राजाशी मीलन व्हावे असा. म्हणजे येथेही एक प्रयोजन असता दुसरे प्रयो- जन सिद्ध होते. - “पताकानायकसहशत्वं भजते' सागरिकेचे पताकानायकाशी सादृश्य कसे ते स्पष्ट नाही. पताकानायक स्वार्थ अणिं परार्थ दोन्ही साधतो. सागरिकेच्या बाबतीत तसे म्हण- ता येण्यासारखे आहे असे दिसत नाही. तिचा स्वतःचा अर्थ आणि राजाचा अर्थ एकच होत. मनात दुसरा ठद्देदा असणे एवढेच यासाठी पुरेसे आहे असे वाटत नाही. शिबाय ती तर या नाटिकेची नायिका. - “अन्यस्मिन्नुपाये इ०' वर अर्थ शब्दाचे प्रयोजन आणि उपाय असे दोन अथ केले आहेत. प्रयोजना'चे उदाहरण रत्नावलीतून दिळे आहे. आता उपायांचे उदाह- १९८ | नाट्यशास्त्र रण नागानन्द नाटकातील दिळे आहे. -- 'शड्खचूडप्राप्यवध्यपटस्य' शंखऱचूड हया त्या दिवशी गरुडाचे भक्ष्य म्हणून ठरलेला सर्प, बध्य म्हणून त्याला रक्त वस्त्राने झाकावयाचे होते. शाइखचू - डाच्या जागी नायक जीमूतवाहन स्वतः बळी जाऊ इच्छितो. त्याच वेळेस कंचुकी येऊन विवा- हानंतर वापरावयाचे म्हणून त्याला रक्त वस्त्र अपण करून जातो. शंख'चूडाजवळील रक्त वस्त्र ह्या उपायांचे चिंतन केळे असता अकस्मात कंचुकीने दिलेळे बस्तर हा दुसरा उपाय प्राप्त होतो. ह्या समासात मुळातीळ 'प्राप्त' च्या ऐवजी “प्राप्य? शब्द वापरून दुरुस्ती केली आहे. अन्ये तु. चतुष्पताकापरमम्‌ इति भाविसंधिचतुष्ट्याभिप्रायेण मन्यमानाः प्रथमद्दितीयादिशब्दान्‌ मुखादिसंधिविषयप्रयोगाभिप्रायेण व्याचक्षते । अत्र च युक्तिन ळक्ष्यते न वां चमत्कार करोतीत्यसदेवैतत्‌ । तुल्यतया गणनं भूतेन्द्रियेः पताकापश्थकगणनमप्यापादयेदिति च वदक्धिश्चिरन्तनेरेवायमुपहासपात्रीकृतः पक्ष इत्यास्ताम्‌ । परंतु दुसरे टीकाकार “अधिकात अधिक चार पताकांनी युक्त' हे वचन पुढे सांगित- लेल्या चार संधींच्या संबंधात आहे असे मानून प्रथम, द्वितीय आदी शब्द मुख आदी संधींच्या विषयी योजळे आहेत अशी व्याख्या करतात. यात काही औचित्य नाही किंवा चमत्कृती नाही म्हणून हे बरोबर नाही. एकच संख्या असल्यामुळे संबंध जोंडावया'चा असे असेळ तर पाच पताकां'चा महाभूतांशी व इन्द्रियांशी संबंध जोडता येईल असे म्हणून प्राचीनांनीचच हे मत हास्यास्पद ठरविळे आहे. असो. | "चतुष्पताकापरमम? इत्यादी पुढे ३४ व्या कोकात म्हटले आहे. - युक्तिनेल्ध्यते न वा चमत्कार” हा पाठ मुद्रिताप्रमाणे आहे. हस्तलिर्ताचा पाठ 'युक्तिनं वक्ष्यं नैवानकाद्वर' असा भ्रष्ट आहे. पण यापुढील 'करोति' हे तेथीळ क्रियापद मुद्रितातील “भर्जाते) पेक्षा अधिक संभाव्य वाटते. - 'गणनं' असा स्वतंत्र दाब्द ही दुरुस्ती आहे. त्याचा 'भूतेन्द्रियेः' बरोबर समास करणे उचित नाही. 'गणनम्‌ हा “आपादेयत्‌ः चा कर्ता. पाच महाभूते आणि पाच इंद्रिये प्रसिद्ध आहेत. वचः सातिशयं शिष्ट काव्यबन्धसमाश्रयम्‌ । पताकास्थानकमिदं द्वितीय परिकीतितम्‌ ॥। ३१॥ अतिरायोक्ती व छेष यांनी युक्त आणि काव्यविषयाशी संबद्ध असलेले वचन म्हणजे दुसरे पताकास्थानक असे म्हणतात. वचः सातिशयं ट्लिष्टमिति। काव्यस्य प्रकृतस्य वर्णनीयस्य यो बन्धः अतिशयोक्त्यादिना योजनं तत्निमित्तवशाद्यहचनं सातिशयं ल्हिप्टं प्रकृतं प्रत्यु- १ का वचसातिदायक्ि. १९.२२ १९९ चितं जातं तदठचनं तदर्थो वा तदुः्चारयिता वा याहच्छिकेन प्रकृतोपयोगित्वेन सहकारित्वं गच्छन्‌ डितीयं पताकास्थानमनभिसंधानापेक्षया । यथा रामाभ्यु- दये तृतीये5ड्रे सीतां प्रति सुग्रीवस्य संदेशोक्तिः - बहुनात्र किसुक्तेन पारे$पि जलधेः स्थिताम्‌ । अचिरादेव देवि त्वामाहारिष्याते राघवः ॥ अत्रान्यप्रयोजनेनातिदाक्तयारायेन प्रयुक्तेश्‍पि वचसि पारे$पीत्यादि प्रकृतोपयो- गातिरयात्पताकास्थानकस । “वचः सातिरायं श्लिष्टम्‌' इत्यादी. काव्याचा म्हणजे वर्णन करावयाचा असलेल्या प्रस्तुत विषयाचा जो बंध म्हणजे अतिशयोक्ती आदींच्या बरोबर योजना त्या निमित्ताने होणारे जे सातिशय वचन क्लिष्ट म्हणजे प्रकृताळा उचित असे होते ते वचन अथवा त्या'चा अर्थ अथवा ते उच्चारणारा वक्ता यदृच्छेने प्रकृताळा उपयोगी असल्यामुळे सहकारी होतो ते दुसरे पताकास्थानक, यात संकल्प केळेळा नसतो म्हणून. उदाहरणार्थ, रामाभ्युदय नाटका- तीळ तिसऱ्या अंकात सुम्रीवाने सीतेला उद्देशून पाठविलेल्या संदेशाचे वचन-*या बाबतीत अधिक सांगण्याची काय आव्यकता आहे ? हे देवि, समुद्राच्या पळीकडे तू असलीस तरी राघव तुळा लवकरच घेऊन येईळ.! यात दुसऱ्या प्रयोजनाने अतिराय सामथ्ये दाखविण्या- साठी योजलेल्या वचनात “पारेडपि' इत्यादी प्रकृताळा उपयोगी असणाऱ्या अतिरायामुळे पताकास्थानक आहे. “सातिशयं किट ही दुस्स्ती आहे. मुळातल्याप्रमाणे दोहोंचा मिळून 'सातिरयश्िष्ट' असा समास बरोबर नाही. 'कोकातील 'सातिरायं? ची व्याख्या अगोदरच्या “अतिशयोक्तत्या- दिना' इत्यादि शब्दांत दिली आहि. - 'प्रकृतः ही सुद्धा मुळातील 'अप्रकृत' ची दुस्स्ती आहे. अप्रकृत म्हणजे अप्रस्तुत असंभाव्य आहे. - “याहच्छिकेन? ही 'याइच्छिकें वाः ची दुरुस्ती आहे. याहच्छिकमध्ये एखादा नवीन पर्याय नसून पूर्वीचिच तीन पर्याय यहच्छेने प्रकताळा उपयोगी पडतात असे म्हणावया'चे आहे. - 'गच्छन्‌? मुद्रित पाठ “गच्छदू? आहे. - “अनमिसंधानापेक्षया' ही सुद्धा 'अमिसंघानापेक्षया/ ची दुरुस्ती आहे. जे याहच्छिक आहे त्याचे अमिसंधान म्हणजे बुद्धिपूवक संकल्प केला असण्याचा संभव नाही. अथोपक्षेपण यंत्र लीने सविनयं भवेत्‌ । श्लिष्टप्रत्युत्तरोपेतं तृतीयमिढमिष्यते ॥ २२॥ ज्यामध्ये अर्थाचा उपक्षेप गूढपणे व नम्रपणे केला जातो व ज्यात ेषयुक्त प्रतिव्चन असते ते तिसऱ्या प्रकारचे पताकास्थानक असे मानतात. १ का य॒त्तु. ऱ्ह २०० नाट्यशास्त्र अर्थापक्षेपणं यत्नेति । लीनमस्फुटरूपमुपक्षिप्यमाणमथेजातं व्लिप्टेन संबन्ध- योग्येनाभिप्रायान्तरप्रयुक्तेनापि प्रत्युत्तरेणोपेतं सद्‌ यत्र सविनयं विशेषनयनेन विदशेषनिश्वयप्राप्त्या सहितं संपद्यते तत्तृतीयं पताकास्थानकम्‌ । यथा मुद्रा- राक्षसे चाणक्यः “आपि नाम दुरात्मा राक्षसो ग्ृह्मेत' एवमस्फुटेःर्थे उपक्षिप्त प्रविश्य सिद्धा्थकः “अअं गहीदो? इत्येतत्मत्युत्तर संदेशाशयेन प्रयुक्तमौचित्या- दविशेषनिश्वयं करोति । तथा च पुनश्वाणक्यः सहर्षमात्मगतम्‌ 'हन्त, ग्रहीतो दुरात्मा राक्षसः' इति । इदं च प्रकृतसाध्योपयोगाश्रयात्पताकास्थानीयमिति वीथ्यज्षादू गण्डादस्य भेदः । 'ऊर्युग्मं भम्मम? एतद्धि प्रत्युत दर्योधनेन नेर तदारशयश्चव दुष्टः, कस्त्तस्योपयोगः । पाण्डवानुसारेण तु भवत्विदं पताका- स्थानम्‌ । भिन्नविषयत्वं कृतं होतद्रपं न क्षतिमावहाति । ' अर्थोपक्षेपणं यत्र इत्यादी. लीन म्हणजे अस्फुट ख्पाने उपक्षिप् होणारा सर्व अर्थ श्र म्हणजे संबंधित होण्यास योग्य अशा, दुसऱ्याच उद्देशाने उच्चारलेल्याही प्रत्युत्तराने युक्त होऊन जेथे सविनय म्हणजे विशेष नयनाने सहित म्हणजेच विशेष निश्चयाच्या प्राप्तीने युक्त असा निष्पन्न होतो तेथे तिसरे पताकास्थानक असते. उदाहरणाथ, मुद्राराक्षस नाटकात 'चाणक्य म्हणतो “तो दुरात्मा राक्षस पकडला जाईल काय ? याप्रमाणे अस्फुट अर्थ उपक्षिप्त झाला असता सिद्धार्थेक प्रवेश करून म्हणतो 'हा घेतला.' हे प्रत्युत्तर संदेशाविषयी उच्चारलेले असता औओचित्यामुळे विशेष निश्चय उत्पन्न करते. त्या प्रमाणे चाणक्य आनंदून स्वतःशी म्हणतो 'उत्तम ! दुरात्मा राक्षस पकडला गेळा.' आणि प्रकृत साध्याळा उपयोगी असल्यामुळे हे पताकास्थानक आहे आणि म्हणून वीथीचे अंग जे गण्ड त्याहून भिन्न. गण्डाच्या उदाहरणातील ' दोन्ही मांड्या मोडल्या! हे उलट दुर्योधनाला दृष्ट नसते आणि त्याचा आशय दुष्ट आहे; प्रस्तुताला त्याचा काय उपयोग तथापि पांडवांच्या दृष्टीने हे पताका- स्थानक असे समजण्यास हरकत नाही. मिन्न विषयासंबंधी मानळे असता अशा प्रकारचे पताकास्थानक काही नुकसान करीत नाही उपक्षिप्यमाणं? ही मुळातील 'उद्तक्षिप्यमाणं? ची दुरुस्ती आहे. उपक्षिप्‌ धातूच अमिप्रेत असणे शक्‍य आहे हे छोकातील “अर्थोपक्षेपणः वरून स्पष्ट आहे. - बिदोषनिश्वयप्रापतिर श्होकातील विनय शब्दाचा व्युत्पत्तिपू्वेक केलेला हा अर्थ जरा बिलक्षणच बाटतो. - 'अस्फुटे5्थे उपक्षिप्ते यातील 'उपक्षिप्ते' हा शब्द हस्तलिखितात नाही. पण तो मुळात असण्याचा फार संभव आहे. - 'प्रकृतसाध्योपयोगाश्रयात मुद्रित पाठ 'योगाक्षित्वात? अस्ता आहे. पण उपयोगाची अज्ञिनः अशी कल्पना असण्याचा संभब फार कमी, -- 'गण्डाद्वेद!' गण्ड ह्या वीथ्यंगाचे लक्षण १८. ११९ मध्ये दिलेळे असून त्या आर्येवरील व्याख्येत अमिनवगुप्ताने वेणीतंहारातील हे उदाहरण दिले आहे. पताकास्थानकात शब्द अन्बित झाल्याने होणारा नवीन अर्थ प्रकृताला __ उपयोगी असतो, तर गण्डात तो नसतो. 'राक्षसः गृहीतः' हे चाणक्याच्या प्रस्तुताला उपयोगी १९.२२ २०१ आहे, पण 'ऊ्युग्मं मझम? हे. दुर्योधनाच्या प्रस्तुताला उपयोगी नाही हा त्या दोहोंमधीळ फरक असे अभिनवयुस्ताचे म्हणणे आहे. - 'दुर्योधनेंन नेष्टं तदादायश्र दुष्ट? ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'दुयोधनेन- --दाशाश्र दुष्ट' असा भ्रष्ट पाठ आहे. मुद्रित पाठ 'दुर्योधननाशादारयश्व दुष्ट” असा आहे. नाश? अमिप्रेत असेल्से बाटत नाही, आणि 'च? ने अगोदर दुसरे वाक्य आहे हे सचित होते. - “पाण्डवानुसारेण? म्हणजे पांडवांना अमिप्रेत असलेले जे प्रस्तुत - दुर्योधनाचा ऊरुमद्भ - त्याला हे उपयोगी आहे ह्या दृष्टीने वेणीसंह्यारातीळ ह्या प्रसंगातही पताकास्थानक आहे. असे म्हणता येईल. - 'मिन्नविषयत्व कृतं! म्हणजे प्रस्तुत निराळे आहे असे मानळे तर. - 'एतट्रपः म्हणजे ह्या स्वरूपाचे. हे 'पताका- स्थानकम्‌ ? चे विशोषण आहे असे समजता येईल. ब्यर्थो बचनबिन्यासः सुश्छिष्टः काव्ययोजितः । उपन्याससुयुक्तश्व तच्वतुर्थमुदाहतमू्‌ ॥३३॥ काव्यात योजिलेली, सुसंबद्ध रचनेची, दोन अर्थ असलेली आणि पुढील घटनांचा उपन्यास करणारी वचने म्हणजे चोथ्या प्रकारचे पताकास्थानक असे म्हणतात. द्यर्था वचनविन्यास इति । यो वचनविन्यासः कथारूप वा सालंकारत्व- संपत्त्याशयेन शोभनः प्रसादयुक्तः "छेषवशादू द्यथ इति अनेकार्थसंप्रयुक्तः ताहशः सन्नुपन्यासे वस्त्वन्तरोपक्षेपे सुष्ठु युक्तः संपद्यते तः्चतुर्थम्‌ । यथा - 'प्रीत्युत्कषंकूतो हशामुद्यनस्येन्दोरिवोद्दीक्षते' इति । अन्न हि काव्यरूपतादायेन 'हेषः प्रयुक्तः प्रधानवस्त्वन्तर सागरिकागतमुपक्षिपते “अअं सो राआ उद॒अणो जस्स अहे तांदेण दिण्णा' इति । 'उद्दामोत्कलिकाम? इति तु नोदा- हरणम्‌, द्य्थताप्रतिपत्तावपि हि नात्रार्थेन सहकारिता कुत्रचिदाचरिता । तस्मादेतद्वीथ्यड्ठुस्य व्याहारस्यैवोदाहरणं युक्तम्‌ । “द्वर्थो वचनविन्यासः' इत्यादी. उक्तींचा केलेला जो विन्यास अथवा कथेचे स्वरूप अलंकारांनी युक्त अशा सम्ृुद्धीमुळे शोभन म्हणजे प्रसादयुक्त, क्षेष असल्यामुळे द्यर्थ म्हणजे एकाहून अधिक अर्थात योजलेला अशा प्रकारचा असून उपन्यासाला म्हणजे दुसऱ्या गोष्टींचा उपक्षेप करण्यास चांगल्या रीतीने योग्य होतो ते चौथे पताकास्थानक. उदाहरणार्थ, रत्नावलीतीळ * चन्द्राच्या प्रमाणे उदयनाच्या, नेत्रांना अतिशय आनंद देणाऱ्या, पदांची सेवा करण्यासाठी राजेळोक वर मान करून पहात आहेत.' कारण, या ठिकाणी काव्यमय करण्याच्या उद्देशाने योजिलेळा &ेष सागरिकेसंबंधीच्या दुसऱ्या प्रधान वस्तूचा उपक्षेप नि उपन्यासः संयुतश्च. २०२ नाट्यशास्त्र करतो “हा तो राजा उदयन काय की ज्याळा मला द्यावयाचे तातांनी ठरविळे आहे ?' परंतु या नाटिकेतीळ 'उद्दामोत्कलिकाम!? इत्यादी वचन ह्या पताकास्थानका'चे उदाहरण नाही. कारण जरी त्यात दोन अर्थांचा बोध होत असला तरी ह्याने कोठेच अर्थाशी सहकारिता केलेली नाही. म्हणून हे वीथीचे अड्ठ जे व्याहार त्याचेच उदाहरण म्हणून योग्य होय. 'काव्यरूपं वा? ही शब्दयोजना समाधानकारक नाही. यातील “वा? चे काहीच प्रयोजन नाहो. न्होकातील 'काव्ययोजितः* च्या अनुरोधाने 'काव्यरूपेण' असा मूळ पाठ असण्याची राकयता आहे. - 'शोभनः? ही 'ळोकातीळ 'सुक्िष्टः? मधीळ 'सु' शब्दाची व्याख्या आणि 'प्रसादयुक्तः' हे तिचे स्पष्टीकरण. - 'सुष्टु युक्त: हे छोकातील 'सुयुक्तः? चे विर्छेषण, मुद्रि- तात युक्तः€ शब्द नाही. पण तो आवश्यक आहे हे उघड आहे. - 'प्रील्युत्कषे- इ०? संपूर्ण कोक असा - अस्तापास्तसमस्तभासि नभसः पारं प्रयाते रवा- वास्थानीं समये समं तृपजनः सायंतने संपतन । संप्रत्येष सरोरुहदयुतिसुषः पादांस्तवासेवित प्रीत्युत्कषेछतो डशामुदयनस्येन्दोरिवोद्ीक्षते ॥१.२३. 'ब्याहारस्य” बीथीच्या ह्या अंगाचे लक्षण वर ९.१ १८ मध्ये केळे आहे. त्यावरील टीपेत 'उद्दामोत्कळिकाम्‌ः इत्यादी कोक उद्धत केला आहे. त्या झोकात प्रकतताला उपयोगी काही नाही असे अमिनबगुत्ताचे म्हणणे आहे. यानंतर बडोदे प्रतीत पुढील कोक कंसात दिला आहे -- यत्र सातिशयं वाक्‍यमर्थापक्षेपणं भवेत्‌ । विनाशि दृष्टमन्ते च पताकार्ध तु तद्धवेत्‌ ॥ हा त्छोक उघडच प्रक्षित आहे. “पताकाथ' असा प्रकार अन्यत्र कोठे निर्दिशध नाही. चतुष्पताकापरमं नाटके कार्यमिष्यते । पश्वामिः संधिभियुक्त तांश्र वक्ष्याम्यतःपंरम॒ ।॥ ३४॥ नाटकामध्ये कार्य अधिकात अधिक चार पताकास्थानक असलेले ब पाच संधींनी युक्त असे असावे. आता यानंतर मी त्या पाच संधींविषयी सांगतो. एषामुत्कषे दशयितुमाह चतुष्पताकापरमामिति । पताकाडान्देन समनन्तरं पताकास्थानसुक्तम्‌ । तेश्चतुर्भिः कृतैः परममुत्कृषं नाटके नाट्यविषये .कार्य- १ नि काव्य-. २ नि पुन;. १९.१४ २०३ सिष्यंते । तस्मात्तथा कर्तव्यमित्य्थः । पताकास्थानकेन हि यलछलेरतः कततेव्यं तदेकेन क्रियते चतुष्ट्येन वा । केचित्त्वाहुः । चतुर्ष संधिषु चत्वारः पताका- नायंकाः, तेषां यथाक्रमं सूचकानि पताकास्थानाने, प्रथमं मुखसंधी यावचच- तुर्थमवमर्शासंघारविति । तत्चासत्‌ । पताकाया इव प्रकरीबिन्दुकार्यबीजानार्मापे सूचकान्तराणि तदानीं वक्तव्यानि स्युः । चत्वारश्व नियमेन पताकानायका भवेयुः । आगभांदिति च पक्षे चतुष्पताकापरममित्यसंगतं स्यात्‌ । मुख्यनायके वेतिवृत्तसूचरक न लक्षणं कथ्यंते, पताकानायके तु कथ्यते, इत्यघरोत्तरमाश्रितं स्यात्‌ । न च मुखसंधावाद्यं द्वितीयं प्रतिमुखसंधावित्यादिक्रमो न्यायं लक्ष्ये वा साश्ध्यमाक्षिपाते इत्यलमनेन । एवमितिवृत्त॑ व्याख्यातम्‌ , तस्य च भेदद्दयं निरूपितम्‌ । प्रसज्ठादाधि- कारिकत्वसिद्धये अनुवृत्तस्थानभूता अवस्थाः पश्च दरशिताः, अर्थप्रकृतयश्च, तत्प्रसड्ठादेव पताकास्थानानि । अधुना त्वितिशब्दाथे प्रयुक्त पश्वाभिः संघिभि- युक्तमिति तत्र प्रतिज्ञा करोति तांश्व वश््यामीति । ह्या पताकास्थानकांची परमावधी “चतुष्पताकापरमम्‌' यात दखवितात. पताका दाब्दाने त्यानंतरचे पताकास्थान अभिप्रेत आहे. नाटकात म्हणजे नाट्याच्या संबंधात ते चार योजल्याने परम म्हणजे उत्कृष्ट असे कार्य अपेक्षित आहे. म्हणून त्याप्रमाणे करावे असा अर्थ. कारण, पतकास्थानकाने जे थोडक्यात करावयाचे असते ते एकाने केळे जाते किंवा चारांनी. परंतु काही टीकाकार असे म्हणतात - चार संधींमध्ये चार पताकानायक, त्यांचे क्रमवार सूचक असे चार पताकास्थानक, मुखसंधीत पहिळे ते अवमशसंधीत चौथे याप्रमाणे. पण हे चूक आहे. तसे असेळ तर पताकेप्रमाणेच प्रकरी, बिन्दु, कार्य आणि बीज यांचे सुद्धा दुसरे सूचक सांगावे ळागतीलठ. आणि पताकानायक नियमाने चार होतील. शिवाय, “आ गर्भात हा पर्याय स्वीकारल्यास “चतुष्पताकापरमम्‌? याची संगती लागणार नाही. आणि मुख्य नायकाच्या संबंधात इतिवृत्ताचे सूचक चिह्ृ सागितळे नाही, पण पताकानायका'च्या संबंधात ते सांगितले आहे, असा उलटा प्रकार अवलंबिल्यासारखे होईल. आणि मुखसंधीत पहिले, प्रतिमुखसंधीत दुसरे इत्यादी क्रम युक्तियुक्तता किंवा पताकास्थान- काच्या बाबतीत साक्ष्य दाखवीत नाही. तेव्हा हे इतके पुरे. याप्रमाणे इतिवूत्ताची व्याख्या करून त्याच्या दोन प्रकारांचे निरूपण केले आहे. त्या प्रसंगाने आधिकारिकत्व सिद्ध करण्यासाठी अनुदृत्ताच्या स्वख्याच्या असलेल्या पाच अवस्था, तसेच अर्थप्रकृती आणि त्या निमित्ताने पताकास्थानक यांचे वणन केळे आहे. आता इति शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी “पाच संधीनी युक्त' असे म्हटले होते, त्यासंबंधी * तांश्व बक्ष्यामि' या शाब्दांत प्रतिक्षा करतात. २०४ | नाट्यशास्त्र 'पताकाशब्देन? मुळात “चतुष्पताकाशब्देन? आहे. त्यातील “चतुष्‌ चुकीने पुनरुक्त झाले आहे, 7 पताकास्थानकेन? ही मुळातील 'पताकानायकेन” ची दुरुस्ती आहे. एक ते चार हे पताका- स्थानकासंबंधी विधान आहे, पताकानायकासंबंधी नाही. - 'केवित्त्वाहुः? हा पाठ हस्तलिखितातीळ 'किनचित्त्वाहुः' बरून दुरुस्त केला आहे. मुद्रित पाठ 'केचिदित्याहुः? आहे. - 'तदानी' हा श्ब्द मुद्रितात नाही. तो सुद्रणदोषाने गहाळ झाला असण्याचा संभव आहे. - “आ गर्भात्‌ इ०? वरीळ २८ व्या रछोकातील पहिला पर्याय स्वीकारला तर अवमर्कात पताकाच असणार नाही. मग तिचे सूचक पताकास्थानक कोठून असणार? -'लक्षणंः हा शब्द येथे चिह्य या अर्थी बाप- . रहा आहे. म्हणून मुद्रितातील 'लक्षणतः' हा पाठ मूळ असण्याची शक्‍यता कमी, - 'करमो न्याये ही सुचविठेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'क्रमे न्यायो? आणि मुद्रितात 'क्रमो न्यायेर असे आहे. 'आक्षिपति' ला क्रमः? असा प्रथमान्त कर्ता आवश्यक आहे. आणि "न्याय असे त्याचे एक कर्म व 'साक्ष्यम? हे दुसरे अश्या प्रकारे अर्थ अधिक संगतवार लागतो. 'न्याय' म्हणजे युक्तियुक्तता. - 'लक्ष्ये' म्हणजे ज्याचे लक्षण करावयाचे ते, प्रस्तुत संदर्भात पताकास्थानक, - “साक्ष्यम्‌' म्हणजे प्रत्यक्ष नाटकांतील उदाहरणांची साक्ष. 'अनुवृत्त” ही 'अनुवृत्ति” ची सुचविलेली दुरुस्ती आहे. अनुवृत्ते शब्द अवस्थांच्या वणनपर असण्याचा संभव कमी. अनुदृत्त म्हणजे इतिवृत्ताचा अंश असा अर्थ संभाव्य आहे. - “इतिशब्दार्थ' यातील (इति? शब्द इतिवृत्त शब्दातील. - 'प्चमिः तंधिमिः हे ह्या अध्यायाच्या पहिल्या छोकात आहे. मुखं प्रतिमुखं * चेव गर्भा विमशे एध च | २ | तथा निवेहणं चेति नाटके पश्च संघयः ॥ ३५॥ मुखतंती, प्रतिमुखसंधी, गर्भसंधी, विमर्शसंधी आणि निर्वहणसंधी असे हे नाटकातील पाच संधी होत. अथ निर्णिनीपुरुद्देशं तावदाह मुखं प्रातिमुखं चेंवाति । समुच्चयपदैः पः्चानां सर्वत्रावश्यंभावित्व द्योतितम्‌ । नियमवाचिभिः करमनियमः । नाटक इत्यभिने- यरूपक इत्यर्थः । महावाकयार्थरूपस्य रूपकस्य पन्चांशा अवस्थाभेदेन कल्प्यन्ते, तत्र मुखस्य स्वतन्त्रस्येतिवृत्ते समाप्तप्रयोजनस्यात एव नायकराब्दवाच्यस्य स्वमुखेन परद्दारेण चोपक्षिप्तः, या प्रारस्भावस्था प्रथमा व्याख्याता तदुपयोगी, यावानथंराशिः स मुखसंधिः । तस्यार्थराशेरवान्तरभागा उपक्षेपाद्याने संध्य- हानि । एवमन्येषु संधिषु वाच्यम्‌ । तेनार्थावयवाः संधोयमाना: परस्परमड्ठेश्व संघय इति समाख्या निरुक्ता । तदेषां सामान्यलक्षणम्‌ । १ नि गर्भ विमर्शश्व तथैव हि. २ का चेव संघयो नाटके स्मृता:, १९.३५ | २०५ आता संघांच्या स्वरूपाचा निर्णय करण्या'च्या हेतूने प्रथम “मुखं प्रतिमुखं चैव! इत्यादीत नामनिर्देश करतात. सभुश्चयवाचक “च राब्दांनी पाचही संधी सर्वेत्र अवश्य असले पाहिजेत हे सुचविळे आहे. आणि नियमवाचक “ एव' राब्दांनी क्रमाचा नियम सूचित केला आहे. नाटकात म्हणजे अभिनय करण्यास योंग्य अशा रूपकात असा अर्थ आहे. मोठ्या वाक्याच्या अर्थाच्या स्वरूपाच्या रूपकात अवस्थांच्या भेदांमुळे पाच भाग कल्पिळे जातात; त्यांपैकी मुखाचा म्हणजे स्वतंत्र, कथानकात ज्याचे प्रयोजन सिद्ध होते त्याचा, म्हणून नायक म्हणून जो ओळखला जातो त्याचा, स्वतःच्या मुखाने तसेच इतरांच्या दारा उपक्षिप्त झालेला, प्रारम्भावस्था म्हणून जी पहिली अवस्था सांगितली आहे तिळा उपयोगी असा जो संपूर्ण अ्थेसमूह तो मुखसंधि. त्या अथसमूहाचे अवान्तर भाग म्हणजे उपक्षेप आदी संध्यंगे, असेच दुसऱ्या संधींच्या बाबतीत समजावे. म्हणून अर्थाचे परस्पर आणि अंगांशी सांधळे जाणारे अवयव ते संधी अशी ह्या नावाची व्युत्पत्ती. ते यांचे सामान्य लक्षण. “मुखस्य' यातील ब पुढील शाब्दांतील षष्ठीचा संबंध “अर्थरारिः' शी जोडावयाचा आहे. आणि मुख राब्दाचा अर्थ कथानकात ज्याचे कार्य सिद्ध होते तो नायक असा केला आहे. स्वतन्त्र हे नायकाचे विशेषण. - “समापतप्रयोजनस्य' ही सुचबिंठेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “सम- तिस्तंप्रयोजनस्य' असा भ्रष्ट पाठ आहे. मुद्रित पाठ 'समस्त- आहे, पण समस्त शब्द विरोष समपक नाही. - “नायकराब्दवाच्यस्य' ही हस्तलिखितातील “नायकराब्दस्य' ची दुरूस्ती आहे. मुद्रितात केवळ “नायकस्य' आहे. - 'चोपक्षिप्तः' हे शब्द मुळात नाहीत. पण 'अर्थराशिः च्या विशोषणपर 'उपक्षिप्तः किंवा तत्सहदा शब्द अर्थासाठी आव्यक आहे. अन्यथा 'स्वमुखेन' व 'परद्वारेण' यांतील तुतीयेचा अर्थ ळावणे कठीण आहे. मुद्रितात या ठिकाणी फक्त “वा? आहे. पण येथे विकल्म संभाव्य नाही. नायकाच्या स्वतःच्या उक्ती आणि इतरांच्या उक्ती मिळून अथराशि होतो. म्हणून “च' आवद्यक आहे, - “अवान्तरभागा 3प- ही दुरुस्ती आहे. सुद्रि- तात “-भागान्युप-' आहे. पण भाग शब्द पुलिंगी आहे. हस्तलिखितात “-भावानुप” असे आहे. पण भाव हा शब्द आणि त्याचे द्रितीयेचे रूप दोन्ही संमाव्य नाहीत. - “ततः म्हणजे “परस्परम्‌ अज्षेश्न संधीयमानाः अर्थावयवाः? हे संधीचे सामान्य लक्षण. या कछोकानंतर बडोदे प्रतीत पुढील छोक कंसात दिला आहे - पश्वमिः संचिभिर्यक्त प्रधानमनु कीत्येते । दोषाः प्रधानसंधीनामनुत्राह्मनुसंघयः ॥ हा झोक बऱ्याच हस्तलिखितांत आढळतो. पण तो मूळ असण्याचा संभव नाही. अमिनवरु- प्ताला तो अवगत नाही. २०६ नाट्यशास्त्र यत्र बीजसमुत्पत्तिनानाथेरससंभवा । काव्ये शर्परानुगता तन्मुखं पारिकीतिंतम्‌ ॥ ३६॥ ज्यात विविध प्रयोजनांच्या अनुरोधाने रसोत्पत्ती करीत करीत काव्याच्या कथानका- चे बीज निर्माण होते तो मुखसंधी असे म्हणतात. तत्रेषां क्रमेण विशेषळक्षणमाह यत्र बीजसमुत्पत्तिरिति । प्रागारम्भभा- वित्वान्मुखामिव मुखमिति यावत्‌ । यावत्यर्थभागराशी बीजस्य मुरखूयोपायस्य सम्ययुत्पात्तिः शरीरेण प्रारम्भात्मना अनुगता भवति । नानाभूतो 5 थेवशात्मसु- यातो रससंभवो यस्याम्‌ । एतदुक्तं भवति । प्रारम्भोपयोगी यावानर्थराशिः प्रसक्तानुप्रसक्तया विचित्रास्वाद आपतितः तावान्मुखसंधिः, तदभिघायी च रूप- केकदेशः । यथा रत्नावल्यां प्रथमो5डूः । तथा हि अमात्यस्य वीरः, वत्सराजस्य शुज्ञाराद्धुती, इति इयानयं सागरिकाया राजदरशने5मात्यप्रारम्भविषयीकृते5 थरा- शिरुपयोगीति मुखसंधिः । एवं प्रतिसंघि वक्तन्यम्‌ । “यत्र बीजसमुत्पत्तिः' इत्यादीपासून ह्या संधींची विदोष लक्षणे सांगतात, .प्रथम सुरुवातीला असल्यामुळे मुखासारखा म्हणून मुखसंधि असा अभिप्राय. जेवढ्या अर्थभागाच्या राशीमध्ये बीजाची म्हणजे मुख्य उपायाची योग्य प्रकारे उतत्ती प्रारंभस्वरूप शरीराने युक्त अशी होते. नाना प्रकारचा अर्थाच्या अनुरोधाने म्हणजे प्रसंगानुरूप झालेला रसांचा संभव जिच्यात आहे अशी उपपत्ती. याचा अर्थ असा. प्ररम्भावस्थेला उपयोगी पडणारा जेवढा अर्थराशि कमीअधिक संबंधामुळे विविध प्रकारच्या आस्वादास योग्य होतो तेवढा मुखसंधि, आणि तो कथन करणारा रूपका'चा भाग सुद्धा मुखसंधि. उदाहरणार्थ रत्नावळीतीळ पहिला अंक. तेथे अमात्य यौगन्थरायणाचा वीररस, वत्सराजाचे शूड्डारा आणि अद्भूत रस एवढा हा अमात्याच्या प्रारंभाचा विषय झालेल्या, सागरिकेळा होणाऱ्या राजाच्या दर्रानालळा उपयोगी होणारा अथ्राशि म्हणजे मुखसंधि. याचप्रमाणे प्रत्येक संधीच्या बावतीत समजावे. 'मुखमिति यावतू' यातील 'इति' शब्द मुळात नाही. पण अन्वय स्पष्ट होण्यासाठी तो आवड्यक वाटतो. -- 'यावत्यथभागराशो' हस्तलिखितात येथील पाठ भ्रष्ट आहि. सुद्रितात 'क्रियाबत्यथ- असे आहि. पण 'क्रियाबतिः असा मूळ शब्द असण्याचा संमब कमी. कोकातील 'ाव्ये? शब्दाचा अथ करताना क्रियेचा निदेश अप्रस्तुत आहे. - 'मुख्योपायस्य” हा हस्तलिखितातील पाठच बरोबर आहे, सुद्रितातील “मुखोपायस्य' हा नाही, बीजाला मुख्य उपाय असे म्हटलेळेच १ का नुगतं. १९.२७ | २०७ आहे. - 'सम्यरुत्पत्तिः' हे “समुत्पत्तिः चे वि-छेघण. - 'यस्याम? ही मुळातील 'यः स्यात? ची दुरुस्ती आहे. 'समुत्पत्ति? चे विशेषण असलेल्या बहुत्रीहि समासा'चा विग्रह करून दाखविला आहे हे उघड आहे. आणि 'यः स्यात? चा नीट अन्वय होण्यासारखाही नाही. - 'प्रसक्ता- नुप्रसक्त्याः याचा अथ काही काव्यांशा अथवा रस प्रधानत्वाने असतात, तर काही आनुषंगिक अथबा गोण रूपाचे असा दिसतो. त्यामुळे आस्वबादात विचित्रता येते. - “अमात्यस्य बीर; हा वीररस कर्तव्यपालनरूप धर्मवीर असावा. - 'शु्भाराद्धुतो' ह्या अंकात उदयनाच्या बासवदत्ताविषयक प्रेमाचा आविष्कार आहे. आणि त्याची मदनाच्या स्वरूपात पूजा केली जाते यात अद्भुतरस मानलेला दिसतो. यानंतर हस्तलिखितात 'शद्भारः” ब मुद्रितात “ततः शद्भारः? एवढे अधिक आहे. ते मळ असण्याची शक्‍यता कमी. सागरिकेचा शाद्भार येथे आविष्कृत झालेला नाही. आणि 'सागरिकाया!/ ह्या शब्दाचा संबंध 'राजदराने' शी आहे बीजस्योड्राटनं यत्र दृष्टनष्टामिव क्वाचित्‌ । मुंखन्यस्तस्य सवेत्र तद्रे मतिमुखं स्मृतम्‌ ।॥ ३७॥ मुखपंधीमध्ये उपक्षेपित झालेल्या बीजाचे कधी दृश्य तर कधी अदृश्य झाल्यासारखे असे अनुसंधान ज्यात सगळीकडे केले जाते त्याला प्रतिमुखसंधी म्हणतात. बीजस्याद्वाटनं यत्रेति । कार्यतया दृष्टठं कारणतया नष्टमिति केचित्‌ । उपादेये दृष्ट हेये नष्टमिति केचित्‌ । नायकवृत्ते दृष्टं प्रतिनायकेतिवृत्ते नष्ट- मित्यपरे । न चैतत्ससञअसम्‌, एकविषयतामन्तरेण संधानायोगात्‌ । नाशस्यापि च हेयादिविषयस्य प्रारस्भवदोन दष्टतयेव संग्रहसंपत्तः । तस्मादयम्थः । बीज- स्योद्ाटनं तावत्‌ फळानुगुणो दद्ााविशेषः । तदूदृष्टमपि विरोधिसंनिघेरनष्टमिव, पांसुना पिहितस्येव बीजस्याडूररूपमुद्धाटनम्‌ यथा वेणीसंहारे कज्चुकिवचनम्‌ - आरास्त्रत्रहणादकुण्ठपरशोस्तस्यापि जेता मुने- स्तापायास्य न पाण्डुसूनुभिरयं भीष्म: शारेः शायितः । प्रोढानेकधनुधरारिविजयश्रान्तस्य चेंकाकिनो तो (08 बालस्यायमरातिळूनधनुषः प्रीतो$मिमन्योवधान्‌ ॥ अत्र पाण्डवाभ्युद्यस्य मुखोपक्षिप्तस्योद्धाटनं भीष्मवधादूरएमभिमन्युवधान्नष्टमिति वेदिव्यतमिति केचित्‌ । तदा चार्थो न संगमितः स्यात्‌ । दृष्टतेव प्रतिमुख उपयोगिनी नष्टता त्ववमरा एवोाति केचिदत्तरोत्तरविकासतारतम्यं दृष्टनष्टत्वमाहः । पूर्वावस्था हि दृष्टाप्युत्तरदृष्टविकासापेक्षया नष्टा, एवं संमृष्टोपमविकासा उत्तरा- १ नि यत्तु. २ का मुखे न्यस्तस्य. ३.का भवेत. २०८ नाट्यशास्त्र पेक्षयेति मन्यन्ते । अत्रापे इवार्थो न संगच्छत एव, न कार्यजननं रक्‍यम्‌ । तस्मादयमत्राथेः । दृष्ट नष्टमिव कृत्वा तावन्मुखे न्यस्त॑ भूमाविव बीजममात्येन सागरिकाचेश्तिं वसन्तोत्सवकामदेवपूजादिना तिरोहितं नष्टमिव । सागरिका- चेष्टितस्य हि बोजस्येव तदाच्छादकमप्युत्सवार्दिरूपं भूमिरिव प्रत्युद्दोीधकम्‌ । तस्य दृष्टनष्टतुल्यं कृत्वा न्यस्तस्य अत एव कुडुमबीजस्य यदुद्धाटनं तत्कट्पं यत्रीद्धाटनं सवंत्रेव कथाभागसमूहे तत्प्रतिमुखम्‌ , प्रतिराभिमुख्येन यतो$त्र वात्तिः । पराड्मुखता हि दष्टनष्टकल्पनानिददानम्‌ । रत्नावल्यां “परप्पेसणदू- सिद वि मे सरीरं एतस्स दंसणेण अज्ञ मे बहुमदं संवुत्त' इत्यादिसागरिकोक्ते- रनड्ठु्ठात्सुसंगतारचितराजतत्समागमपर्यन्तं काव्यं द्वितीयाडूगतं प्रातिमुखसंधिः उद्धाय्तित्वाडवीजस्य । स्तोकमात्रं तु राडूरकादिभिरुदाह्ृतं यत्‌ तदेकदेशोपलक्षण- मिति द्रष्टन्यम्‌ । :बीजस्योद्घाटनं यत्र' इत्यादी. कार्यस्वरूपात दृष्ट, कारणस्वरूपात नष्ट असे काहींचे मत. प्रह्मण करण्यास योग्य गोष्टींच्या बाबतीत दृश्य, त्याज्य गोष्टीच्या बाबतीत नष्ट असे काहींचे मत. नायकाच्या वृत्तासंबंधात दृश्य, प्रतिनायकाच्या इतिवृत्तासंबंधात नष्ट असे इतरांचे मत. पण हे सर्वी बरोबर नाही; कारण, एक विषयासंबंधी असल्याशिवाय दृष्ट व नष्ट यांना एकत्र जोडणे अयोग्य ठरेळ. आणि त्याज्य वगैरे गोष्टींचा नाश सुद्धा प्रारंभीच असल्याकारणाने इश्य अवस्थेतच समाविष्ट करणे उत्तम होईल. म्हणून अर्थ पुढीलप्रमाणे आहे. बीजाचे उद्गाटन म्हणजे फलोत्पत्तीला अनुरूप अशी विशिष्ट दशा. ते दृष्ट असले तरी विरोध करणारी गोष्ट जवळ असल्यामुळे नष्ट झाल्यासारखे, मातीने झाकलेल्या बीजाच्या प्रमाणे अंकुराच्या स्वरूपात उद्‌घाटन. उदाहरणाथे, वेणीसंहार नाटकात कंचुकीचे पुढील वचन - 'शास्रधारण करण्यास प्रारम्भ केल्यापासून ज्याचा परशू अकुंठित राहिला त्या मुनीला सुद्धा जिकणारा हा भीष्म पाण्डवांनी शरांनी जमिनीवर आडवा केला त्याचे ह्या दुर्योधनाला दुःख झाले नाही आणि अनेक मोठ्या धनुर्धर शत्रंवर विजय मिळविल्यामुळे दमलेल्या व शत्रने धनुष्याची दोरी तोडली असताना एकाकी अशा बाळ अभिमन्यूच्या वधाने ह्याला आनंद झाला आहे.' या ठिकाणी मुखसंधीत उपक्षिप्त झालेळे पांडवांचा अभ्युदयरूपी बीज भीष्मबधामुळे दृश्‍य तर अमिमन्युवधामुळे नष्ट असे समजावे असे काहींचे मत. पण त्यात अर्थाची संगंती होणार नाही. प्रतिमुखसंधीत फक्त दश्यताच उपयोगी आणि नष्टता अवमशसंधीतच याप्रमाणे दृष्टनष्टत्व म्हणजे उत्तरोत्तर होणाऱ्या विकासातील कमीअधिकपणा असे काहींचे म्हणणे आहे. कारण पूर्वीची अवस्था द्य असली तरी नंतर दिसणाऱ्या विकासाशी तुलनेने नष्टच म्हणजे नंतरच्या अवस्थेच्या मानाने विकास दबल्यासारखा असलेली अशी असते असे ते १९.२७ २०९, मानतात. ह्या व्याख्येत सुद्धा “इव' शब्दाच्या अर्थाची संगती लागतच नाही, आणि कार्याची उत्पत्ती राक्‍य होणार नाही. तेव्हा ह्या छोकाचा अर्थ असा. भूमीत बीज टाकावे त्याप्रमाणे अमात्याने मुखसंधीत ळय असूनही नष्ट झाल्यासारखे असे उपक्षिप्त केलेले, सागरिकेच्या चेष्टिताच्या स्वरूपाचे बीज वसन्तोत्सव, कामदेवाची पूजा इत्यादींनी तिरोधान पावले असता नष्ट झाल्यासारखे आहे. कारण, सागरिकेच्या चेष्टिताला उत्सवादी स्वख्पा'च्या झाकून टाकणाऱ्या गोष्टी असल्या तरी त्या गोष्टींच भ्रूमी बीजाचे उद्ोधन करते त्याप्रमाणे त्या चेष्टिताचे उद्बोधन करतात. दृश्य असता नष्ट अद्यासारखे करून उपक्षिप्त केलेल्या बीजाचे, म्हणूनच कुड्कुमबीजाचे उद्‌घाटन होते त्यासारखे, उद्‌घाटन ज्या कथाभागाऱच्या समूहात सर्वत्र होते तो प्रतिमुखसंधि, कारण यात प्रति म्हणजे आभिमुख्याने अस्तित्व असते. पराड्मुख असणे हेच दृष्टनष्ट ह्या कल्पनेचे निदर्शन. रत्नावटीत “दुसऱ्याची सेवा करण्याने दूषित झालेले असले तरी हे माझे शरीर ह्याच्या दर्शनाने अतीव माननीय झाळे आहे?! इत्यादी पहिल्या अंकातीळ सागरिकेच्या उक्तीपासून सुसंगतेने घडवून आणलेल्या राजाच्या व तिच्या समागमापर्यंतचा दुसऱ्या अंकातील काव्यभाग हा प्रतिमुखसंधि, कारण त्यात बीजाचे उद्‌घाटन झाळे आहे. परंतु श॑ंकुक आदींनी जे याचे थोडकेच उदाहरण दिले आहे ते एका अंशाचे उपलक्षण आहे असे समजावे. ।एकविषयताम्‌? सुद्रित पाठ 'एकविब्रयमर आहि. पण भावबाचक नाम अधिक योग्य. “संबानायोगातर दृष्ट आणि नष्ट यांचा समास केल्यामुळे ते एकत्र जोडले गेळे आहेत. तेव्हा त्या दोहोंचा वितजरय एकच असणे आवश्यक आहि, कारण-कार्य, ठपादेय-हेय, नायक-प्रतिनायक असे मित्न भिन्न मानणे योग्य नाही, - “नाशस्यापि इ०' याचा अर्थ असा की हेय वगैरे नष्ट असे मानले आहे, पण त्यांची सुद्धा प्रारंभावस्था इश्य स्वरूपात असल्याशिवाय त्यांचा बोध सुद्धा होगार नाही. - 'तस्मादयमर्थः' हा पुढे दिलेला अर्थ अमिनवयुप्ताचा नसून दुसऱ्या प्राचीन टीकाकारांचा बिस्ताराने उद्धृत केला आहे. - 'नष्टमिति वेदिव्यमिति? ही मुळातील नष्टमत्रापि वेदि- तमिति? ची दुरुस्ती आहे. अथेबोधास ती आवश्यक आहे हे उघड आहे. - 'चाथेः म्हणजे “च॒ शब्दाचा अर्थ' असे समजता येण्यासारखे आहे आणि हा “च' दृष्टे च तत्‌ नष्टं च' ह्या समासविग्रहातील अभिप्रेत आहे असेही मानता येईल. तथापि झोकात साक्षात "च? नसल्यामुळे येथे “च? अन्ययरूपातच वापरले असावे. ह्या टीकाकारांच्या मतावर घेतलेला आक्षेप पूर्वीसारखाच आहे. - 'संमृष्टोपमविकासा? ही मुळातील “-बिकास (> विकास: ) ची दुरुस्ती आहे. 'पूर्वावस्था'चे हे विशेषण मानणे आवश्यक आहे. 'संमृष्ट' म्हणजे घासून घासून नष्ट केठेला. - 'मन्यन्ते' हीं 'मन्यते"ची दुरुस्ती आहे. 'केचित? संबंधी हे विधान असल्यामुळे बहुबचन आवड्यक आहि. - 'इवार्थ? म्हणजे झोकात वापरलेल्या इंब? शब्दाचा अर्थ. - “न कार्यजननं शाक्‍यम? मुळात “'दाक्‍्यम? ऐेवजी 'शकक्‍त्या? आहे. पण त्यानें काही अर्थबोध होत नाही. सुचविलेल्या दुरुस्तीनेही अर्थ विशेष स्पष्ट होत नाही. असा अर्थ संभवनीय दिसतो की अगोदरची अवस्था नष्टप्राय होते असे मानठे तर तिच्यापासून अपेक्षित असलेले कार्य निष्पन्नच होणार नाही. वाक्यात “न? नंतर “च' किंवा 'बा' अपेक्षित आहे. - “सागरि- २१० नाट्यशास्त्र काचेष्टितमु' हे बीज. यात सागरिकेच्या संबंधात घडलेल्या घटना मुख्यत्वेकरून अभिप्रेत आहेत. त्या बीजाचे 'अरत्युद्दोधन' होते ते तिच्या स्वतःच्या चेष्टिताच्या रूपात. - 'इेत्तिः' म्हणजे बीजाचे अस्तित्व. 'पराड्युखता? मुखसंधीत असते, कारण बीज तेथे दृष्टनष्ट असल्यासारखे असते. प्रतिमुख- तंधीत 'अमिमुखता? असते, कारण बीजाचे तेथे उद्धाटन होते. अमिनवयुप्ताने 'इष्टनष्टमिब' चा अन्वय 'मुखन्यस्तस्य' शी लावला आहे. - 'अनद्वाझ्मत? रत्नावलीतीळ पहिल्या अंकाला हे नाव दिलेळे आहे, कारण त्यात कामदेवाच्या पूजेचे वर्णन आहे. - 'स्तोकमात्रमः शह्कूकाने कोणते थोडकेच उदाहरण दिले होते ते तमजण्यास मार्ग नाही. - “-उपलक्षणम? मुद्रित पाठ “ल्क्षणम' आहे. तो विशेष समर्पक नाही. उद्गेदस्तस्य बीजस्य प्राप्तिरपाप्तिरेव वा । पुनश्वान्वेषणं यत्र स गर्भ इति संद्रितः ॥ ३८॥ ज्यात त्या बीजाची वाढ, त्याची प्राप्ती अथवा अप्राप्ती आणि त्याचा पुन्हा शोध या गोष्टी असतात त्याला गर्भेसंघधी अशी संज्ञा आहे. उद्भेद इति । तस्येति उत्पत्त्युद्धाटनदशाद्दयाविष्टस्य बीजस्य यत्रोद्धेदः फळजननाभिमुखत्वं स गर्भः । उद्धेदमेव विव्रणोति प्राभिरित्यादिना । प्रापति- नायकविषया, अप्राप्तेः प्रतिनायकचरिते, पुनश्चान्वेषणमित्युभयसाधारणम्‌ । न्ये तु वीररौद्रविषय ए्वैतस्यार्थस्य भावादव्याप्तित्वादेवमाहुः । प्राप्तिरप्रा- तिरन्वेषणमित्येवंभूताभिरवस्थाभिः पुनः पुनर्युक्तो गर्भसंधिः, प्राप्तिसंभवाख्य- यावस्थया युक्तत्वेन फलस्य गर्भीभावात्‌ । तथा हि रत्नावल्यां द्वितीये5 डर “'अदक्िखणा दाणिं तुमं. जा एव्वं भट्टिणा हत्थेणं गहीदा वि कोवं ण मुंचोसे' इत्यादौ प्राप्तिः । पुनर्वासवदत्ताप्रवेशे5प्राप्तिः । तृतीये5्ड 'तद्त्तान्तान्वेषणाय गतश्चविरयति वसन्तक? इत्यन्वेषणभ्‌ । विदूषकः 'ही ही भोः कोसंबीरज्ञलंभेण वि ण तारिसो पिअवअस्सस्स परितोसो जारिसो मम सआसादो पिअवअणं सुणिअ भविस्सदि? इत्यादौं भ्राप्तिः । पुनर्‌ 'इह तदप्यस्त्येव बिम्बाधरे' इति, “कें अवरं' इति अप्राप्तिवीसवदत्ताप्रत्यभिज्ञानात्‌ । पुनः सागारकायाः संकेत- स्थानागमने अन्वेषणम्‌ । पुनळतापादाकरणे प्राप्तिः, इत्येवं गर्भः । अप्राप्त्यं- दाश्वात्रावर्यंभावी । अन्यथा हि संभावनात्मा प्राप्तिसेभवः कथम्‌, निश्चय एव हि स्यात्‌ । अवमर्शे त्वप्नाप्तेरेव प्रधानता प्राप्त्यंशस्य च न्यूनताते विरोषः । 'उद्भेद! इत्यादी. त्याचा म्हणजे उत्पत्ती आणि उद्‌घाटन या दोन अवस्थांनी युक्त असलेल्या बीजाचा ज्यात उद्धेद म्हणजे फळोत्पत्तीकडे अभिमुखता असते तो गभसंधि. उद्धेदाचेच विवरण 'भ्राप्तिः' इत्यादीत करतात. प्राप्ति नायकाच्या संबंधात, अप्रात्ति प्रतिनाय- १९.२८ २११ काच्या चरितात आणि पुन्हा अन्वेषण दोघांच्या बाबतीत समान. परंतु हा अथ वीर आणि तैद्र रसांच्या विषयाळाच लागू पडणारा असल्यामुळे त्यात अव्याप्तिदोष आहे, म्हणून दुसरे टीकाकार पुढीलप्रमाणे व्याख्या करतात. प्राप्ति, अप्राप्ति आणि अन्वेषण अशा प्रकारच्या अवस्थांनी पुन्हा पुन्हा युक्त होतो तो गर्भसंधि; कारण प्रात्तिसंभव नावाच्या अवस्थेने फळ युक्त होत असल्यामुळे ते गर्मर्प होते. उदाहरणार्थ, रत्नावलीत दुसर्‍या अंकात सुसंगतेच्या “तुळा मुळीच सभ्यता नाही; राजाने हातात हात घेतला अपताही तू अद्याप राग सोडून देत नाहीस' इत्यादी वचनात प्राप्ति आहे. पुन्हा वासवदत्तेच्या प्रवेशाने अप्राप्त होते. तिसर्‍या अंकात 'तिची बातमी काढावयास गेलेल्या वसन्तकाळा खूप उशीर झाळा आहे' या राजाच्या उक्तीत अन्वेषण आहे. विदूषकाच्या “आहा ! कौशाम्बीच्या राज्याच्या प्राप्तीने सुद्धा प्रियव-. _ यस्याळा जितका आनंद झाला नसेळ तितका आनंद माझ्याकडून प्रिय वचन ऐकल्यावर होईल' _ ह्या वचनात प्राप्ति. पुन्हा 'ते सुद्धा येथे तुझ्या बिम्बाधरात आहेच' आणि 'दुसरे काय! या प्रसंगात अप्राप्रि, कारण येथे वासवदत्तेची ओळख पटते. पुन्हा सागरिका संकेतस्थानी येते तेव्हा अन्वेषण. पुन्हा ती लतापाश करते तेव्हा प्राप्ति. याप्रमाणे ग्भसंधि. अप्राप्ीचा अंश ह्यात अवश्य असतो. कारण; एरव्ही संभाव्यतेच्या स्वख्सा'चा प्राप्तिसंभव त्यात कसा असेळ? निश्चयच होइल. परंतु अवमर्शात अप्राप्तीच प्रधान असते, प्राप्तीचा अंश कमी असतो. ८ मिमुखत्व” मुद्रित पाठ “-मिमुख्यत्व' आहे. तो योग्य नाही. अमिमुखताच अपेक्षित आहे. - 'उद्‌मेदमेब' मुद्रितात “एवं? आहे. पण “एव' च अधिक समर्पक आहे. - “प्रतिनायक- चरिते' म्हणजे प्रतिनायकाच्या कृत्यांमळे नायकाला होणारी फलाची प्राप्ती त्या वेळेस होत नाही. - 'पुनः पुनर्युक्तो? मुद्रितात 'युक्तो' च्या पूर्वी 'भवन्तीमिः” शब्द अधिक आहे. पण तो आवद्यक आहि असे नाही. - “इह तदप्य- इ०' संपूर्ण दळोक पुढीलप्रमागे आहे. - किं पद्वस्य रूचं न' हन्ति नयनानन्दे विधत्ते न कि वराड वा झषकेतनस्य कुरुते नालोकमात्रेण किम्‌ । वक्‍्तेन्दौ तव सत्ययं यदपरः शीतांशुरुज्जुम्भते दर्षः स्यादम्हतेन चेद्िहि तदप्यस्त्येव बिम्बाचरे ॥ २१.९२. हा अहोक राजाने सागरिकेला उद्देशून उच्चारला आहे. परंतु त्यावेळेस तेथे सागरिका नसून वासबदत्ता उपस्थित झालेली असते. - 'किं अवर हस्तलिखितात येथे 'अस्ताम्‌ । नवरं' असा भ्रष्ट पाठ आहे. ही वासवदत्ता आहे असे कळल्यावर राजाने बिदूषकाला “हे काय!” असे विचारले, त्यावर बिदूषकाची ही उक्ती आहे. - “अवमकृै त्वप्नाप्तेरेव इ० संपादकांनी एका टीपेत असे सुचविळे आहे की ह्या वाक्यात 'अप्राप्ते च्या जागी 'प्राप्ते) आणि 'प्राप्त्यंशस्य च्या जागी 'अप्राप्त्यंशस्य' असे मूळ पाठ असावेत. कारण गर्मापेक्षा अवमर्शात प्राप्तीची शक्‍यता अधिक वाढलेली असते. पण ही सूचना अस्वीकाये आहे हे पुढील छोकावरील टीकेवरून स्पष्ट होईल. | २१२ नाट्यशास्त्र गभनिमिन्नबीजार्थो बिलोभनकृतो*5थ वा | क्रोधव्यसनजो वापि स बिमशे इति स्मृतः ॥ २९॥ विळोभनामुळे किंवा क्रोधामुळे किंवा न्यसनामुळेही बीजाचे काय गर्भातून बाहेर फुटून येते तेव्हा तो विमरीसंधि होय असे समजतात. गर्भनिमिन्नबीजार्थ इति । केचिद्टिमर्शा इति पठन्ति अन्ये$वमशे हाते । तत्र संदेहात्मको विमर्दीः । ननु पूवः संभावनाप्रत्यय ततः संशय इति नेद- मुचितम्‌ । संशयनिर्णयान्तरालवातेनं हि तके तार्किकाः प्राहुः । किं च विमशे- संधिनियतफलप्राप्त्यवस्थया व्याप्तः, तः्च नियतत्वं संदेहश्व किमेतत्‌ । अत्राहूः | तकोनन्तरमपि हेत्वन्तरवश्यादू व्याप्तिरूपतापराकरणे संशयो भवन किं न भवति । इहापि च निसित्तबलात्कुताश्वत्‌ संभावितमपि फळं यदा बलळवता प्रत्यूद्धते कारणाने च बलवन्ति भर्वन्त तदा जनकविघातकयोस्तुल्यबलत्वा- त्कथं न संदेहः । तुल्यबळविरोधकविधीयमानंवेधुयन्याधूननसेधीयमानस्फार- फलावळोकनायां च पुरुषकारः सुतरामुद्धरकन्धरभिवतीति तकांनन्तरमत्र संश- ३) ७ हली यस्ततो निणय इत्येतदेवोचिततरम्‌ । तथाहि पुरुषकारदशलिन एव झाध्यन्ते अडूतमडूतम्‌, प्राणसंदेहादपि अनेनात्मा समुत्तारित', यत्न संभावनापि नाभवत्‌ । यत एव चान्यप्रयत्नतो विथुरप्रयत्ततो वा उपनिपातः तत एव परुषकारोद्यतः पुमार्नापे जिगीषागभत्वेन प्रोद्यमं भजतीति तदादायेन नियता फलप्राप्तिरुच्यते । श्रेयांसि बहुविध्नानीति पश्‍्यन्‌ तदत्न मया विघ्नापसारणं कर्तव्यामॉते साभिमानं स्वमुद्योग सहस्त्रगुणीकुरुते । तथाहि सागारकाबन्ध- ने5पि महामात्यप्रयुक्तमेन्द्रजाठिकडत्ते सुनिपुणमु्पनिबद्धम । र्भनिर्भिन्नबीजार्थः' इत्यादी. कोणी 'विमरीः?' असा पाठ स्वीकारतात, तर इतर 'अवमरीः' असा. त्यात विमर्श संदेहाच्या स्वरूपाचा. यावर आक्षेप असा की प्रथम संभाव्यतेचा प्रत्यय आणि नंतर संशय हे उचित नाही. कारण, नैय्यायिकांनी तके हा संशय व निणेय यांच्या मध्यंतरी असतो असे म्हटले आहे. शिवाय, विमरीसंधि नियतफल- प्राप्तीच्या अवस्थेने ञ्यापळेळा असतो; ते नियतत्व आणि हा संदेह हे कसे काय? या आक्षेपालळा पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे. तक केल्यानंतर सुद्धा दुसर्‍या कारणामुळे व्याप्तीच्या स्वरूपाचे निराकरण केळे असता उत्पन्न होणारा संशय का असणार नाही? प्रस्तुत संबंधात सुद्धा कोणत्या तरी कारणामुळे संभाव्य झालेल्या फलाळा जेव्हा बळवान १ नि गर्भाविभित्त-. २ नि 5पि वा. १९.३९ २१२३ कारणामुळे विरोध होतो आणि ही कारणे बलवान असतात तेव्हा उत्पन्न करणारी आणि विरोध करणारी दोन्ही कारणे तुल्यबळ असता संदेह कसा उत्पन्न होणार नाही £ तुल्यबळ असलेल्या विरोधकाने निर्मिलेल्या संकटाला झुगारून दिल्यामुळे प्राप्त होणाच्या महान फला- च्या ददीनानेच पुरुषकार ताठ मान करून असतो म्हणून येथे तर्कानंतर संशय व त्यानंतर निर्णय हेच अधिक उचित. उदाहरणार्थ, पुरुषकार दाखविणाऱ्यांचीच प्रशंसा केली जाते “आश्चर्य, आश्चर्थ ! प्राण संदेहात आहेत अशा स्थितीतूनही ह्याने आपळे कार्य साध्य केळे आहे, की जेथे संभावना सुद्धा नव्हती.' आणि ज्याअर्थी इतरांच्या प्रयत्नामुळे किंवा स्वतःच्या निष्फळ प्रयत्नामुळे अडचण निर्माण होते त्याअर्थी पुरुषकारास तयार असलेला पुरुष सुद्दा मनात वरिजिगीषा. बाळगून असल्यामुळे जोराने उद्योगास प्रदत्त होतो हा आशय लक्षात घेऊन फलप्राप्ती नियत असते असे म्हटले आहे. श्रेयस्कर गोष्टींच्या मार्गात पुष्कळ विध्ने असतात हे जाणून असा मनुष्य 'तर मळा यातीळ विघ्ने दूर केलीच पाहिजेत' असा विचार करून अभिमानपूर्वक आपला उद्योग सद्दखपट करतो. उदाहरणार्थ, सागरिकेळा बंधनात टाकळे असताही अमात्याने योजिलेल्या ऐन्द्रजालिकाचा वृत्तान्त कौशल्याने ग्रथित केळा आहे. “व्याप्तिरूपतापराकरणे? ही दुरुस्ती सुचविली आहे, पण तीही समाधानकारक नाही. हस्त- लिसितात 'वाह-केलिर्पता” आणि मुद्रितात “बाघच्छल्रूपता- असे आहे. पराकरण म्हणजे निराकरण, दूरीकरण असा अर्थ आहे. निर्णयाच्या किंवा तर्काच्या आड येणाऱ्या बाध आणि छल ह्या गोष्टींचे निराकरण झाले तर संद्ाय उत्पन्न होण्याचा संभव नसून त्याची निदृत्ती होण्याचाच अधिक संभव आहे. म्हणून मुद्रित पाठ स्वीकार्य वाटत नाही. प्रस्तुत ठिकाणी असा अर्थ असण्याची शक्‍यता आहे. की तक करताना एका हेतूच्या साहाय्याने एक निर्णय संभाव्य असता दुसरा हेत्‌ उपस्थित झाल्यास संशयाला जागा निर्माण होते, त्यावेळेस 'व्यापित' च्या स्वख्पांचे निराकरण झालेले असते. पहिला हेतू ब साध्य़ यांच्यातीळ संबंध म्हणजे व्याप्ति. दुसरा हेतू असल्यामुळे व्याप्तीची निर्णायकता नाहीशी होऊन संशय उत्पन्न होतो. - “भवन? मुद्रित पाठ भवेत? आहे. वस्तुतः कोणत्याही रूपात ह्या शब्दाची आवश्यकता नाही. - “बुलबता' नंतर “निमित्तन? अध्याह्मत धरावे. - 'उडुरकः स्थिरीभवति' असा हस्तलिखितातील पाठ आहे. तो असंभाव्य नाही. पण मुद्रित पाठ 'उद्धुखन्धरीमवति' अधिक संभाव्य वाटतो. - 'अनेनात्मा' आणि 'संभावनापि नामवत्‌? ह्या केलेल्या दुरुस्त्या आहेत. सूळ पाठ अनुक्रमे 'अनेकात्मा' आणि संभाव (बि) ना विनाभवति” असे आहेत. त्यांनी काहीच अथरबोध होण्यासारखा नाही. हे वाक्‍य इतरांनी केलेल्या स्तुतिपर आहे. - “चान्यप्रयत्नतो' ही मुळातील 'चात्र प्रयत्नतो? ची दुरुस्ती आहे. नुसताच 'प्रयत्नतः? शब्द वापरला असण्याचा संभव नाही. आणि 'अत्रर शब्द अनावद्यक आहे. त्याचप्रमाणे पुढे 'य? च्या जागी बा? अशी दुरुस्ती केली आहे. कारण “वा? आवश्यक आहे. आणि ध्य? चा कोठे अन्वय लागण्यासारखा नाही. - 'पुमानपि' ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्त- लिखितात “पुन्नाथमपि? असा भ्रष्ट पाठ आहे. सुद्रितात 'पुनर्नाशर्माप' असे आहे. पण तो मूळ पाठ असण्याचा तंभव फार कमी. 'नाराम? चा अन्वय लावणे कठीण आहे. - 'पब्यनः ही २१४ नाट्यशास्त्र हस्तलिखितातील “पद्यन्त:ः' आणि मुद्रितातील “पश्यता? यांची दुरुस्ती आहे. 'भ्जति' ह्या क्रियापदाच्या अनुरोधाने प्रथमेच्या एकवचनाचे रूप आवश्यक आहे हे उघड आहे. - “सामिमान' मुद्रितात “'सामिमानः आहे. पण अव्ययीभावाचे रूप अधिक चांगले. “स्वमुद्योग मुद्रितात “स्वसुद्योगसूत्र? आहे. 'सूत्र' ची काही आवइ्यकता दिसत नाही. अन्ये त्ववमर्दा विघ्न इति विदान्ति । तत्र च व्याख्याने बीजराब्देन तट्ठोजफठमर्थराब्देन निवृत्तिरुच्यते । तेन गर्भनिभिन्नं प्रददितमुखं यद्डीजफळं तस्य यो5्था निवत्तिः पुनस्तत्रेव संपादनमनिष्पत्यूहप्राप्तप्रसूतेः । तच्छब्देन यंत्रेत्याक्षिप्तम्‌ । सा च निवृत्तिः क्रोधेन च निमित्तेन ठोभेन वा व्यसनेन शापादिना वा । आपिदाब्दादविध्ननिमित्तान्वराणां प्रतिपदमशकक्‍यनिर्देशानां संग्रहः । स च देव्या वासवदत्तया सागरिकायाः कारानिक्षेपात्मभ्रति या तुरी- ये5ड्ठे राज्ञ ठाक्तेः - कण्ठा-छेषं समासाद्य तस्याः प्रत्र्यानया । तुल्यावस्था सखीवेयं तनुराश्वास्यते मम ॥ (४.४) अत्र विघ्ने वासवदत्ताक्रोधो निमित्तम्‌ । ळोभस्तु निमित्त यथा तापसवत्सराजे त्वत्संप्राप्तिविळोभितेन सचिवेः प्राणा मया धारिताः इति । तदपरे न सहन्ते न ह्यत्नर वासवदत्ताप्राप्तिळीभः प्रकृते फळे विघ्नकारीति । इदं तदोदाहरणम्‌ । तत्रेव परिणीतायामपि पद्यावत्यां वासवदत्तामळभमानस्य राज्ञो मरणाध्यवसायः, मुमूषीस्तदलाभे मन्त्रिणां सुतरां राज्यप्राप्तिदीधेलाभो निसमित्तमिति । शाप- व्यसनं त्वमषेनिमित्तमित्यभिज्ञानशाकुन्तठे दार्रीतम्‌ । एवमन्यदुत्मेक्ष्यम्‌ । तथा हि सपत्न्यां विद्याप्रभावो निमित्तमवमर्ही । क्चिद्देवम्‌ । क्चित्समयो यथा विक्रमोवेश्यां पुत्रवदूनावळोकनादुर्वश्याः स्वर्गगमनाध्यवसाये । परंतु दुसरे टीकाकार अवमरश म्हणजे विध्न असे समजतात. आणि त्या व्याख्ये- मध्ये बीज म्हणजे त्या बीजाचे फळ आणि अर्थ म्हणजे निवृत्ति असे समजळे आहे. म्हणून गर्भातून बाहेर पडलेले म्हणजे ज्याचा आरंभ दाखविला गेला आहे असे जे बीजाचे फल त्याचा जो अर्थ म्हणजे निवृत्ति म्हणजेच पुन्हा त्याच ठिकाणी संपादन, विध्नसहित होणारी निष्पत्ती. 'तत्‌' शब्दाने 'यत्र' हा शब्द अध्याहृत धरावा लागतो. आणि ती निवृत्ति क्रोध ह्या निमित्ताने किंवा लोभामुळे किंवा शाप आदी संकटामुळे होते. 'अपि' शब्दाने व्यक्तिराः निर्देश करणे अशक्य असलेल्या विध्नाच्या इतर कारणांचा समावेरा होतो. आणि तो अमवशी रत्नावळीत राणी बासवदत्तेने सागरिकेला कारागृहात टाकल्या- पासून चौथ्या अंकात 'त्या सागरिकेच्या कंठाभोवती आलिंगन प्राप्त होऊन तिच्यापासून दूर १९,२३९ २१११ झालेली ही रतनमाळा समान अवस्था असलेल्या मैत्रिणीप्रमाणे माझ्या तनूळा आश्वासन देत आहे' ह्या राजाच्या उक्तीपर्यनंत. येथे विध्नाळा वासवदत्तेचा क्रोध कारण झाला आहे लोंभ निमित्त असल्याचे उदाहरण तापसवत्सराज नाटकात 'सचिवांनी तुझ्या प्राप्तीचे विळोभन दाखविल्यामुळे मी प्राणवारण करू शकलो' हें राजाचे वचन. पण इतरांना हे उदाहरण मान्य नाही: कारण यात वासवदत्तेच्या प्राप्तीचा लोभ प्रकृत फलाच्या मार्गात विघ्न उत्पन्न करतो असे नाही. तेव्हा हे त्याचे उदाहरण - त्याच नाटकात पद्मावतीशी विवाह केल्यानंतरही चासवदत्तेची प्राप्ती झाली नाही म्हणून राजाचा मरणाचा विचार आणि मरणाची इच्छा करूनही तिची प्राप्ती न होण्याचे कारण म्हणजे मंत्र्यांनी दाखविलेला राज्यप्राप्तीरूप मोठा लोभ. रागामुळे आलेळे शापरूप संकट अमिज्ञानशाकुन्तलात दाखविळे आहे. याप्रमाणे इतर ही समजावे. उदाहरणार्थ, सवतीवर दाखविलेला विद्येचा प्रभाव हे अवमर्शात विध्नाचे निमित्त. क्वचित दैव विघ्न उत्पन करते. क्वचित अट, उदाहरणार्थ, विक्रमोवेश्ी नाटकात पुरूरव्याने केळेळा पुत्रमुखाच्या अवळोकनामुळे उ्वशींचा स्वर्गळोकी जाण्याचा विचार. बिद्नितिः मूळ पाठ “वबदन्तिः असण्याचा संमव आहे. पण 'विदन्ति? नेही उचित अ्थे- बोध होतोच. - 'तत्र च' ही हस्तलिखितातीळ 'न च? आणि मुद्रितातील “स च? ची दुरस्ती आहे. 'न?* आणि 'सः? दोन्ही असंभाव्य आहेत. - 'गर्भनिमिन्न' मुद्रितात ह्यांचा पुढील 'प्रद- दितमुखंः शी जोडून एक समास केला आहे, पण 'प्रदर्टितमुखम? ही 'छोकातील 'गर्भनिमिन्न ची व्याख्या आहे. तेव्हा दोन्ही शब्द स्वतंत्र असणे आवर्यक आहे. - 'तत्रेव' म्हणजे गर्मा तच. - 'संपादनमनिष्प्रत्यूइप्र।प्तप्रसूतिः ही सुचबिलेली दुरुस्ती आहे. मुळात “संपादन निष्परत्यूहप्राण- प्रसतिः (“-प्राणतया फलप्रसतिः मुद्रित) ' असे आहे. पण निष्पत्यूहह म्हणजे विध्नरहित प्रसती असा निवृत्ति दाब्दाचा अर्थ दिलेला असण्याचीं शकयता नाही, विशेषतः अवमर्श म्हणजे विध्न हे विशद करीत असता. तसेच 'प्राण? शब्दाचे काही प्रयोजन दिसत नाही. सुद्रितातील “फल? असंभाव्य आहे. कारण, 'तस्य निवृत्ति: यात “तस्य? नें बीजफळलाचा निदेश झालेलाच आहे. तेव्हा “अनिष्प्रत्यूदप्राप्तप्रसूतिः' म्हणजेच विध्नयुक्त होणारी प्रसूति असाच अर्थ अभिप्रेत असणार हे उघड आहे. - 'तच्छब्देन? हा छोकातील 'सः? शब्दाचा निर्देश आहे. - “तनुरा- श्वास्यते मम? ह्या कछोकानंतर “इत्येताबत्पर्यन्तम? अश अर्थाचे वचन अपेक्षित आहे. - 'तवत्सं- प्राप्िति- इ०? हा संपूर्ण छछोक वर २२ व्या छोकाबरील व्याख्येत उद्धुत केला आहे. - तद- छामे? मुद्रितात 'तदलोमे' आहे. ते संभाव्य नाही. - “-दीभेलोमो? ही “-दीधलाभो? ची दुरूस्ती आहे. येथे असे म्हणावयाचे आहे की वासबदत्तेची प्राप्ती हे जे फल ते लांबणीवर पडण्याचे कारण मंत्र्यांनी उद्‌यन[ला दाखविलेला राज्यप्राष्तीचा लोम. पझ्मावतीशी विवाह केल्यावरसुद्धा राज्याची पुनःप्राप्ती झाली नाही. त्यामुळे राजा मरणास उद्यत झाला असता त्याला त्यापासून परावृत्त केठे ते राज्यप्राप्तीच्या लोभाने. - 'श्ापव्यसर्न' मुद्रित पाठ 'तः्च व्यसन अर्थहीन आहे वर 'शापादिना म्हटले आहे त्याचे येथे उदाहरण निर्दिष्ट केळे आहे. - 'सपल्य्यां विद्याप्रमाबो हा कोणत्या नाटकातील प्रसंग ते समजण्यास मार्ग नाही २१६ नाट्यशास्त्र विमर्शा आणि अबमर्गे ही ह्या संधीची दोन्ही नावे असल्याचे अमिनवगुप्ताला मान्य आहे. म्हणून त्याने यांपैकी एकच पाठाचा स्वीकार करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या प्राचीन टीकाकारांची मते विस्ताराने उद्धत केळी आहेत. विमर्श म्हणजे संदेह उत्पन्न होऊन फलप्राप्ती लांबणीवर पडते असा एका पाठाचा अर्थ, तर अवमश म्हणजे विध्न उत्पन्न झाल्याकारणाने फलप्राप्ती संदिग्ध होते असा दुसऱ्याचा अथ. विमर्शाच्या व्याख्येत अमिनवरुप्ताने क्रोध, विलोभन आदींचा निदेश केला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पण ते काहीही असले तरी या संधीत 'अप्राप्तीला प्राधान्य असते असे जे अमिनवरुप्ताने मागील -छोकावरील टीकेच्या शेबटी म्हटळे आहे तेच बरोबर आहे. संपादकांनी तेथे सुचविलेली दुरुस्ती करणे चूक होईल. अन्ये त्वाबृत्त्या विमराशब्दं कल्पयन्त इत्थं व्याचक्षते । गर्भान्निभिन्नो बीजार्थः फळं यस्मिन्‌ विमशादिकारणत्वात्‌ विमशारूपे कथावयवे स विमर्श नामेति । अत्र व्याख्याने मुख्यमस्य संघेयंदूपं विदूरीकरणसंपादकात्मकत्वं नाम तदस्पृष्टमेव स्यात्‌ । | परंतु दुसरे टीकाकार विमशी राब्द दोनदा कल्पून पुढीलप्रमाणे व्याख्या करतात. गर्भातून बाहेर आलेला बीजाथं म्हणजे फळ विमशे आदीळला कारणीभूत असल्यामुळे विमरी- स्वख्या'च्या ज्या कथाभागामध्ये असते तो विमशे नावाचा संधि. ह्या व्याख्येत ह्या संधीचे जे मुख्य रूप - फल लांबणीवर टाकण्याचे कार्य संपादन करण्याच्या स्वरूपाचे - त्याला स्पर्श सुद्धा होत नाही. “आवृत्त्या बिमशेशब्द' ही “आवृत्तिविमर्शशब्द' ची दुरुस्ती आहे. एकत्र समास संभाव्य नाही. झोकात 'विमशे इति? असे आहे. संधिनियमाप्रमाणे मूळ “विमर्श: किंबा “विमशे? आहे असे समजता येईल. ह्या टीकाकारांच्या म्हणण्याप्रमाणे दोन्हीही रूपे येथे अभिंप्रत आहेत. - 'बींजाथः फलं' ही “बीजारथफलं? ची दुरुस्ती आहे. 'फलं? ही “ीजार्थ? ची व्याख्या आहे. म्हणून तो शब्द स्वतंत्र असणे आवश्यक आहे. - 'विमशेरूपे कथावयवे? “विमर्श असे रूप कल्पून त्याचा हा अर्थ दिला आहे. - 'विदूरीकरणसंपादकात्मकत्व' यात थोडीशी दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “विदूरकारण-' आहे. च्वि-रूपाने अभिप्रेत अथ स्पष्ट होतो. मुद्रितात “बिदूरकार- णसंपातात्मकत्व' असे आहे. पण 'संपात? पेक्षा “संपादक अधिक उपपन्न जाहे. अन्ये तु लाभयोग्यत्व नाशावस्था अन्वेषणावस्था च यथारुचे गर्भ निबन्धनीया । तत्र यदा लाभात्मिका प्राप्त्यवस्था प्रतिमुखेनेव निबथ्यते तदा अन्ये दवे गर्भसंधौ, यदाप्यवमर्श नाशावस्था तदा गर्भेःन्वेषणमेव, गर्भे यदा नाशान्वेषणे तदा चावमर्शे विचारो निबन्धथनोयः - कथं मया प्राप्तप्रायमप्यप- हारितम्‌, किमत्र विगुणोपायानुष्ठानं मया कृतम्‌, उत प्राधतियोग्यमेवेतन्न भवतीति । यदाहोड्टूटः - नाशान्वेषणभूसिरवम्रशिरिवमर्श इति । तज्चेद॑ व्याख्यानं १९.३९ २१०७ लक्न्यविरुद्धं युक्त्या च पूर्वोदितप्रारम्भाद्यवस्थापश्चकगतक्रमानेयमसमर्थनप्रस्ता- वोक्तया विरुद्धमित्यास्ताम्‌ । परंतु दुसरे असे म्हणतात की लाभाचा संभव, नाशावस्था आणि अन्वेषणावस्था यांची आवडीनुसार गर्भसंधीत योजना करावी. त्यात जेव्हा लाभस्वख्पाची प्राप्त्यवस्था प्रतिमुखसंधीतच दाखविली जाते तेव्हा इतर दोन अवस्था गर्मसंधीत योजाव्यात, जेव्हा अवमशसंधीत नाशावस्था दाखवावयाची असेल तेव्हा गर्भसंधीत फक्त अन्वेषण'च योजावे आणि गर्भसंधीत जेव्हा नारा आणि अन्वेषण दोन्ही असतील तेव्हा अवमर्शात विचार होत असलेला दाखवावा -. 'जवळ जवळ हातात आलेले फल सुद्धा मी कसे घालविले 2 मी या बाबतीत निरुपयोगी उपाय योजिळे होते काय? का ही गोष्ट प्राप्त करण्याच्या योग्यतेची'च नाही £' उद्‌भटाने म्हटले आहे - नाशाच्या अन्वेषणाचे स्थान म्हणजे अवमृष्टि अथवा अमवशे. पण ही व्याख्या लक्ष्याच्या विरुद्ध आहे आणि पूर्वी सांगितलेल्या प्रार*भ आदी ज्या पाच अवस्था त्यांच्या क्रमाच्या नियमाचे समर्थन करण्यायाठी योजिलेल्या युक्ति- वादाच्या विरुद्ध आहे. असो. 'यथारुचि? मुद्रितात हा शब्द चुकून दोनदा छांपला गेला आहे. - 'निबध्यते' मुळात फक्त “बध्यते' आहे. नेहमीप्रमाणे “निबध्यते? च मूळ पाठ संभवनीय आहे. - 'नाशान्वेषणभूमिः मुद्रित पाठ 'यासावन्वेबणभूमिः' असा आहे. पण “या? असल्यास नंतर 'सा? अपेक्षित आहे. शिवाय ज्याच्या समर्थनासाठी उद्भटाचे हे मत उद्धुत केळे आहे त्या मागील वाक्यांत नाक्या'चे अन्वेषण म्हणजे त्याच्या कारणांचा शोध आहे, नेहमीचे अन्वेषण नाही. अवबमृष्टि अथवा अवमर्श॑ म्हणजे बिचार असाच अर्थ ह्या व्याख्येत अमिप्रित आहे हे उघड आहे. - 'लश्ष्य- विरुद्ध? म्हणजे ह्या संधींच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध. - युक्त्या! हा युक्तिवाद बर सहाव्या कछोकात व त्यावरील टीकेत सापडण्यासारखा आहे. अहमनेन विफलायां क्रियायां विलोभ्य प्रवातेत इति यत्र कर्ता विमृदाति स विलोभनक्ृत इति, क्रोधव्यसनादेस्तु व्यापद्यमाने फठलव्यापत्तिविषयो यः कतुर्विचारः स क्रोधव्यसनजो विमशे इत्येवें विमशनस्वभाव एव विमदाः, कार्यविनिपातस्तूत्तरनिर्वहणसंधिनिबध्यमानाडूतरसपरिपोषकत्वेन निबध्यते इति _ श्रीशडुकः । तन्मते विचारस्य सर्वसंध्यनुपायत्वात्‌ पृथग्विमरोराब्देनामिधानं स्यात्‌ । “ह्याने मळा प्रलोभन दाखवून निष्फळ क्रिया करण्यास प्रवृत केले' असा विचारज्या ठिकाणी कर्ता करतो तो विलोभनकृत विमरी; आणि क्रोध, व्यसन आदींनी फळ नष्ट होत असता त्याच्या नाशासंबंधीचा जो कर्त्यांचा विचार तो क्रोधन्यसनज विमश; याप्रमाणे विमशे ३-४ नाट्यशास्त्र हा विचाराच्याच स्वरूपाचा आहे. आणि कार्याचा नाश हा नंतर निवेहण संधीत योजाव- याचा असलेल्या अद्‌भुत रसाचा परिपोष करण्याचे साधन म्हणून योजिला जातो असे श्रीशाडःका'चे मत आहे. त्याच्या मते बिचाराचा सवे संघींत उपाय म्हणून उपयोग नसल्या- मुळे विमशे शब्दाने त्याचा स्वतंत्र निर्देश केला असे दिसते. "सर्वेसंश्यनुपायत्वात? मुद्रित पाठ 'सर्वसंव्यनुयायित्वात'ः आहे. पण दाडूकाच्या मते विचार सर्व संधींत केळेला असतो असे म्हटले असण्याचा संभव नाही. तो फक्त चौथ्या संधीत केला जातो म्हणून त्या संघीला विमशी असे नाव आहे. इतर संधींत विचाराचा उपाय म्हणून उप- योग होत नाही; पण या संधीत त्याचा तसा उपयोग होतो, म्हणून त्याचा विमशी ह्या निराळ्या शब्दाने निर्देश केला आहे. - 'विमर्शशब्देन' ही 'विमर्शसत्त्वे ची दुरुस्ती आहे. पुढे 'अमि- धानम? आहे, तेव्हा 'शब्देन' हेच मूळ असण्याचा संभव आहे. व्यापत्तिविषयो विचार इति केचित्‌ । पुनरप्यस्य सरणिरेव । सा च न व्याख्यानेन कमेण दार्गीता । विळोभनकृतोदाहरणं च न व्यापत्तिविमर्शः । इति सवे चासमअसं यथारुचि परिकल्पितमित्यलळमनेन । काहींचे म्हणजे असे की विमश म्हणजे नाशासंबंधी विचार. पुन्हा ही त्याचीच पद्धती. आणि क्रमाने व्याख्या करून ती स्पष्ट केळी नाही. आणि विळोभनकृता'चे उदाहरण म्हणजे व्यापत्तीसंबंधी विचार नाही. याप्रमाणे ही सर्व अयथा्थ मते ज्याने त्याने आपल्या आवडीप्रमाणे बनविली आहेत. तेव्हा हे आता पुरे. । “पुनरप्यस्य सरणिरेव? “अस्य? म्हणजे दीकुकाची असा अर्थ दिसतो. “अस्य? नंतर “एव? वापरलेला असता तर वरे झाले असते. हस्तलिखितात 'पुनरस्मत्सरणिरेव” असा पाठ आहे. पण तो असंभाव्य आहे. शुंकुकाच्या मतात आणि ह्या मतात फरक असा की विलोभनकृतात व्यापत्तीचा विचार नसतो असे दंेकुकाचे मत, तर तेथेही नुसता बिचार नसून व्यापत्तीचा विचार असतो असे ह्या टीकाकारांचे मत. हे ह्या टीकाकारांचे मत चूक असे अमिनवगुत्ताने म्हटले आहे. संमानयनमर्थानां मुखाद्यानां सबीजिनाम । नानाभावोत्तराणां यकूवेनिवहणं तु तत्‌ ॥ ४०॥ बीजा'च्या विविध अवस्थांनी युक्त अशा मुख व इतर संधींतीळ विविध भावांनी पूर्ण असलेल्या कार्यांना ज्यात एकत्र आणतात तो नि्वहृणसधी होय. १ नि समानं च समर्थाना मुख्यार्थानां. २ का फलोपसंगतानां च ज्ञेयं निवेहणं तु तत्‌. १९.४० २१९ समानयनामेति । सुखाद्यानां चतुणां संधीनां ये«्थाः प्रारस्भाद्याः तेषां ह जिभि €-_ रे > च डु ळय भाने सह बीजिभिर्बीजविकारेः क्रमेणावस्थाचतुष्टये भवद्धिः उत्पत्त्युद्धाटनोद्वेदगभाने- भदलक्षणेवतमानानां नानाविधेः सुखदुःखात्मकैः हासशोकक्रोधादिभिभाविरत्त- राणां चमत्कारास्पदत्वेन जातोत्कषाणां यत्समानयनं, यस्मित्नथेराशी समानी- यन्त फलनिष्पत्तो योज्यन्ते तत्चिवहणम्‌, फठयोगावस्थया व्याप्तम्‌ । “समानयनम? इत्यादी. मुख आदी चार संघींचे जे प्रारम्भ आदी चार अर्थ ते बीजी म्हणजे क्रमाने चार अवस्थांमध्ये होणारे उत्पत्ती, उद्घाटन, उद्धेद आणि गर्भनिर्भेद हे बीजाचे विकार त्यांनी युक्त आणि विविध प्रकारचा सुख आणि दुःख यांच्या स्वख्पाच्या हास, शोक, क्रोध इत्यादी भावांसुळे उत्तर म्हणजे चमत्कृतीचे निधान होऊन उत्कृष्ट झाले असता त्यांचे जे समानयन म्हणजे ज्या अर्थराशीमध्ये ते अर्थ एकत्र आणले जातात म्हणजे फलनिष्पत्तिसाठी योजळे जातात तो निवंहृण संधी, फलयोग ह्या पाचव्या अवस्थेने व्याप्त असलेला. “सह बीजिमिः इ०' येथील व्याख्येत छोकातील शब्दांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. त्यातील अन्वय असा - “बीजविकारेः सह बर्तमानानां नानाविवैः भावेः जातोत्कर्षाणां (च) तेषां अर्थानां यत्समानयनम्‌?. अत्र केचिदमून सवीन्‌ संधीनवस्थापश्वकनिवहणे पृथग्वूत््या योज्यमाना- निच्छन्ति । अन्ये तु संधी संध्यन्तरानुप्रवेशामिच्छन्तो५पि प्रागवस्थाया एको- त्तरावस्थापरिणामात्मकत्वे कारणं न पड्यन्ति, आपि तु कार्ये भवतीति सांख्यद्रोनच्छायाश्रयेण एकावस्थायाः फळसंगसनसंबन्धोपकरणभावप्राप्त्या तंदेकभावानामवस्थान्तराणां फलसंगमनमुचितमेवेति मन्यन्ते । येथे काही टीकाकार असे म्हणतात की हे सर्वे संधी पाच अवस्थांच्या निवहणात स्वतंत्र रीतीने योजावयाचे आहेत. परतु दुसरे टीकाकार एका संधीचा दुसऱ्या संधीत अन्तर्भाव होतो असे मानीत असले तरी अगोदरची अवस्था नंतरच्या एक सोडून दुसऱ्या अवस्थांत परिणत होऊ शाकेळ याला प्रमाण नाही असे मानतात, परंतु कार्य अस्तित्वात येते म्हणून सांख्यदशनाचा अवलंब करून एका अवस्थेच्या फलाशी संगमनरूप संबंधाचा उपाय म्हणून उत्पन्न झालेल्या स्वरूपामुळे त्या अवस्थेशी एक भाव असलेल्या इतर अवस्थांचे ही फलाशी संगमन उचितरूप होय असे मानतात. “अमून्‌ सर्वान्‌ इ०' ह्या बाक्याचा अर्थ विदोष स्पष्ट नाही. रब्दराः अर्थ असा होतो की पाचही अवस्था परिपूर्ण होत अस्तता (निवहण म्हणजे निर्वाह, तडीस नेणे या अर्थी) प्रत्येक २२९० नाट्यशास्त्र अवस्थेत हे पाच संधी होतात. म्हणजे नाटकात एकंदर पंचवीस संधींची योजना करावी असे ह्या टीकाकारांचे म्हणणे असण्याचा संभव आहे. - 'संधो संध्यन्तरानुप्रवेशाम? म्हणजे वरील टीका- कारांनी म्हटल्याप्रमाणे एका अवस्थेत पाचही संधी असा अर्थ अमिंप्रेत असावा. - 'एकोत्तर? म्हणजे मधली एक सोडून नंतरची. उदाहरणार्थ, प्रारम्मावस्थेच्या दृष्टीने प्रयत्नावस्था सोडून नंतरच्या तीन अवस्था, या टीकाकारांच्या म्हणण्याचा आराय असा दिसतो की एका अवस्थे- ची नंतरच्या एक अवस्थेत परिणती होते (उदाहरणार्थ प्रारंमाची प्रयत्नात) हे मान्य करता येईल, पण प्रारंभाची प्रात्याशा वगेरे त्यानंतरच्याही अवस्थांत परिणती होते असे मानण्याचे कास्ण नाही. - 'कार्य भवतीति' हस्तलिखितात “कार्य भवन्तीतिः' आणि मुद्रितात “(ताः) कार्यीभवन्तीतिः असे पाठ आहेत. हस्तलिखितातील “भवन्ति? संभाव्य दिसत नाही, कारण बहुवचनातील कर्ता अगोदरच्या शब्दांत सापडण्यासारखा नाही. मुद्रितात सुचबिलेल्या “ताः” ने स्व अवस्थांचा बोध होतो असे मानले तरी सर्व अवस्थांचे कार्यात रूपांतर होते असा अर्थ अभिप्रेत असेल्से वाटत नाही, 'कार्य भवति? याचा अर्थ फलाची प्राप्ती होते. तेव्हा तिचा सवे अवस्थांशी संबंध कसा येतो हे पुढील शब्दांत सांगितले आहे. - 'सांख्यदर्शनच्छायाश्रयेण? मुद्रितात '-दर्शनतच्छाया- असे आहे. पण मधील 'तत्‌? अनावद्यक आहे. ह्या बाकक्‍्याचा सुद्धा अर्थ विशेष स्पष्ट नाही. सांख्यांच्या परिणामवादाप्रमाणे मूळ प्रकृतीपासून महत, त्यापासून अहंकार इत्यादी प्रकारे विविध तत्त्वे परिणामाने अस्तित्वात येतात. त्यात पुढील तत्त्व फक्त त्याच्या मागच्या तत्त्वाचा परिणाम म्हणून अस्तित्वात येते, त्याच्याही अगोदरच्या तत्त्वांपासून नाही. त्याप्रमाणे फलयोगरूप कार्य अस्तित्वात येते ते त्यापूर्वीच्या नियत फल्प्रापिरूप चौथ्या अवस्थेचा परिणाम म्हणून, अगोदरच्या प्रारम्मादी अवस्थांचा परिणाम म्हणून नाही. तथापि, ही चौथी अवस्था पूर्वीच्या अवस्थांतून क्रमशः परिणत होत आलेली असल्यामुळे त्या अवस्था सुद्ठा फल्योगाशी दूरान्वयाने का होईना पण संबद्ध होतात. “छोकात 'मुखाद्यानां समानयनम असे जे म्ह॒टळे आहे त्याची ही थोडी निराळी उपपत्ती आहे. प्रारम्मादी चारही अवस्था फल्योगाशी साक्षात संबद्ध नसून फक्त चौथीच तशी संबद्ध आहे, तथापि अप्रत्यक्षपणे त्यांचा सुद्धा फल्योगाशी संबंध आहे असे म्हटले आहे, अशा प्रकारचे ह्या टीकाकारांचे म्हणणे असावेसे दिसते. 'एकावस्था' ही एक अवस्था म्हणजे चौथी अवस्था. 'फल्संगमन? म्हणजे फल्योग, हा शब्द ह्या बाक्यात पुढेही आलेला आहे. म्हणून मुद्रितात असलेला “फलसंबन्धसं- गमन?” हा पाठ बरोबर नाही. - “-मप्त्या' ही “प्राप्त? ची दुरुस्ती आहे, प्रथमा अथवा द्वितीया विभक्तीचा योग्य अन्वय लागण्यासारखा नाही. अन्ये तु मुखसंधी ये अवलस्न्यमानतया आद्याः प्रधानभूता अर्था उपायास्ते महोजसः फलसंपत्ती साधकास्तेषां फलसंगत्या समानयनामिति व्याचक्षते 'महोजसां फळोपसंगतानां च' इति पांठेन । यदा च सुखप्राम्ते' फलळवत्त्व तदा रतिहासादिबाइल्यं प्रारम्भादीनाम्‌, दुःखहानेस्तु फलत्वे कोधशोकादिदूःखात्मकभावबाहइल्यं स्वोचितव्यभिचारिसाहितं द्रष्टव्यम्‌ । उदाहरणं रत्नावल्यामेन्द्रजाळिकप्रवेशात्मभ्रत्यासमाप्तेः । एषामवस्था- १९.४१-४२३ नर्र संध्यादीनां नायकतद्मात्यतत्पारिवारनायिकादिमुखेनापि नियोजनम्‌ । न त्वेक- मुखेनेंवेते नियम इत्युक्तमेव । परंतु दुसरे टीकाकार 'महोजसां फळोपसंगतानां च' असा पाठ स्वीकारून मुख- संधीमध्ये आधारभूत असल्यामुळे जे आद्य म्हणजे प्रधानख्पाचे अर्थ म्हणजे उपाय, महौजस म्हणजे फलसमृद्धी साध्य करणारे असे, त्यांचे फलयोगाशी एकत्र आणणे अशी व्याख्या करतात. आणि जेव्हा सुखाची प्राप्ती हे फल असते तेव्हा प्रारम्भ आदी अयस्थांमध्ये रति, हास, आदी स्थायिभावांची वियुळता आणि जेव्हा दुःखाचे निवारण हे फळ असते तेव्हा क्रोध, शोक, आदी दुःखात्मक भावांची विसुळता त्यांना त्यांना उचित अशा ब्यमिचारि- भावांसहित असते असे समजावे. उदाहरणाथ, रत्नावळीत ऐन्द्रजालिकाच्या प्रवेशापासून शेवटपर्यंत. ह्या अवस्था आणि संधींची योजना नायक, त्याचे अमात्य, त्याचा नोकरवगे आणि नायिका ह्यांच्या द्वारेही करावी, एकाच्याच माफेत करू नये हे सागितलेलेच आहे. *होकातीळ “सबीजिनाम्‌ । नानाभावोत्तराणां' च्या ऐबजी “महोजसाम्‌। फलोपसंगतानां च? असा पाठ स्वीकारून काही टीकाकारांनी व्याख्या केली आहे. - “फल्संपत्तो ताधकाः? ही 'महो- जस: शब्दाची व्याख्या. -- 'पाठेन' मुद्रितात “पाठे' आहे. पण तृतीयायुक्त पाठ अधिक चांगळा. टीकाकारांचे म्हणणे येथपर्यतच आहे. | “-दुःखात्मकभावबाहुल्यं' ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “-भावत्वात्‌ बाहुल्य' आणि मुद्रितात 'भावाट्‌ बाहुल्य' आहे. परंतु ह्या भावांचे बाहुल्य असा अर्थ अभिप्रेत असल्यामुळे हे दोन्ही पाठ बरोबर नाहीत. -- 'उक्तसेव' वर सहाव्या छोकावरील व्याख्येत अशा प्रकारचा निर्देश आहे. - या परिच्छेदातील विधाने अमिनवगुप्ताची आहेत, इतर टीकाकारांच्या मतांशी त्यांचा संबंध नाही. एते तु संधयो ज्ञेया नाटकस्य प्रंयोक्‍्तूभिः । तथा प्रकरणस्यापि शेषाणां 'चे निबोघधत ॥ ४१॥ डिमः समवकारश्व चतुःसंधी प्रकीतितो । न तयोरबमशंस्तु कतेव्यः कबिमिः सदा ॥४२॥ व्यायोगेहामृगो 'चापि सदा कार्यो त्रिसंधिको । गर्भावमर्शो न स्यातां तयोवेत्तिश्र केशिकी ॥ ४३॥ १ का हि. २ नि विनिबोधत. ३ नि न च वृत्तिस्तु केरिकी. २२५- नाट्यशास्त्र द्रिसंधि तु प्रहसनं वीथ्यड्ञे भाण एव च | च सखानवहण तत्र कतव्य कांबाभः सदा ।! ४४॥ परंतु, हे पाच संधी नाटकामध्ये तसेच प्रकरणामध्येही असतात हे काव्याची रचना करणारांनी लक्षात ठेवावे. इतर रूपकप्रकारांत किती संधी असतात ते ऐका. डिम व समवकार यांत चार संधी असावेत असे म्हटले आहे. कवींनी त्यांत अवमर्शे संधीची योजना कधी करू नये. आणि व्यायोग व इंहामृग यांत नेहमी तीन संधींची योजना करावी, त्यांत गर्भ व अमवशे हे संधी आणि कैशिकी वृत्ती ह्या गोष्टी नसाव्यात. प्रहसन, वीथी, अड्ठः आणि भाण यांत दोनच संधी असावेत. त्यांच्या बाबतीत कवींनी मुख व निर्वहण ह्या दोन संधींची नेहमी योजना करावी. एषां विनियोग विभजाते एते त्वित्यादिना मखनिर्वहणे तत्र कर्तव्ये कवोभिः सदा इत्यन्तेन । एतः्च पूर्वमेव निणीतार्थम्‌ एकळोपे चतुर्थस्य इत्यादि व्याख्यानावसंरे । कस्मात्ती चतुःसंधी इत्याह न तयोरित्यादिना । तु्हेती. यतस्तयोरवमर्शा निबद्धमराक्‍्य इति । एवसुत्तरत्रापि । हेतुग्रन्थान्तरत्वेनेदं योज्यं न तु ठोपस्था- नित्वेन, तस्य एकळोपे इत्यादिना पूर्वमेवोक्तत्वात्‌ । यांच्या योजनेसंबधीची मिन्न भिन्न व्यवस्था “एते तु' पासून 'मुखनिर्वहणे तत्र केतव्ये कविमिः सदा' येथपर्यंतच्या इळोकांत सांगतात. ह्याचा निर्णय आम्ही पूर्वीच एकलोपे 'चतुर्थस्य' इत्यादी श्‍लोकाची व्याख्या करताना लावळा आहे त्या दोन प्रकारांत चार संधीच का याचे उत्तर 'न तयोः! इत्यादीत देतात. 'तु! शब्द हेत्व्थी वापरळा आहे. त्या दोहोंत अवमर्शाची योजना करणे अशक्‍य आहे म्हणून या'चप्रमाणे पुढीळ बाबतीतही समजावे. हेतू सागणारे हे निराळे विधान आहे, केवळ लोपाची स्थाने सांगणारे अशा प्रकारचे .नाही असा अर्थ समजावा. कारणे ते मागेच एकलोपे' इत्यादीत सांगितले आहे “एकलोपे चतुर्थस्य* हा वरील ततरावा झोक. १ नि स्यातां तेषां वत्तिश्नव भारती. १९.४५ | २२३ “अवमर्शा निबड्धुमशक्‍्यः! मुद्रित पाठ “अवमशृे निबद्धमशक्‍यम्‌? आहे. पण तसा पाठ आवश्यक आहे असे नाही. 'झोकातील प्रथमान्त शब्द व्याख्येत तसाच ठद्धत केला असणे अधिक संभाव्य आहे. - 'हेतुग्रन्था- इ०' प्रस्तुत छोक हेतू सांगण्याच्या उद्देशाने रचले अहित, कोणत्या संधींचा लोप होतो दे सांगण्यासाठी नाही असा याचा अर्थ, - 'पूर्वमेवोक्त- त्वात? त्या सतराब्या छोकावरील व्याख्येत लोपस्थानांचा निर्देश आहे, प्रत्यक्ष छोकात तो नाही हे लक्षात ठेवले . पाहिजे. ह्यानंतर बडोदे प्रतीत पुढील छोक कंसात दिला आहे - वीथी चैव हि भाणश्व- तथा प्रहसन पुनः । कैशिकीवत्तिहीनानि कार्याणि कविभिः सदा ॥ हा कोक येथे अस्थानी आहे. शिवाय त्यातील विधान बर अठराब्या अध्यायातील ८-९ ह्या 'होकांत याचप्रमाणे आढळते. . हा 'छाक येथे प्रक्षिप्त आहे हे उघड आहे. एवं हि संधयः कार्या दशख्पे प्रयोक्तामिः । पुनरेषां तु संथीनाम्ञकल्पं निबोधत ॥ ४५॥ याप्रमाणे नाट्य रचणाऱ्यांनी दहा रूपकांमध्ये संधींची योजना करावी. आता ह्या संधींच्या अंगांसंबंधीचे नियम ऐका. ननु संधिपश्चवकात्मक इलिव्रत्तरार्रीरारस्भे कथं दरारूपकादिभेद इत्याश- डक्‍्याह एवं होते । हि यस्मांदेवसुक्तेन विनियेगप्रकारण संघयो भवन्ति ततो दररूपकभेद इति केचिदादाज्षापूर्व व्याचक्षत । तर्‍्चासत्‌, लक्ष्यभेदादेव दररूपकभेदस्य दर्दितत्वात्‌ । अवड्यं चैतत्‌, अन्यथा डिमससवकारयोश्वतुः- संधित्वाविदोषात्कथे भेदः स्यात्‌, नाटकादीनां वा । तस्मादुपसंहारग्रन्थो$य- मिति हीति । अडडननां कल्प कल्पनाप्रकारो वा । तेनेवंप्रायमन्यदपीतिव्रत्तापयोगि भर्वाति । इतिवृत्तरूप नाट्य शरीराचा आरंभ पाच संधींच्या स्वरूपाचा असता दहा रूपकांचे मेद कसे होतात अशी शांका घेऊन तिचे निरसन “एवं हि' इत्यादी श्लोकात करतात. हि म्हणजे ज्याअर्थी याप्रमाणे म्हणजे सांगितलेल्या योजनेच्या प्रकाराने संधी होतात त्याअथी त्यामुळे दहा रूपकांचे भेद उत्पन्न होतात अशी आरांकापूव ब्याख्या काही टीकाकार करतात. पण ते बरोबर नाही; कारण, त्यांच्या लक्षणांतील भेदामुळेच दहा रूपकप्रकार मिन्न १ का पुनः संध्यन्तरं तेषाम्‌. २२४ नाट्यशास्त्र मित्न होतात हे दाखवून दिळे आहे. आणि हे आवश्यकच आहे; नाही तर चार संधी असणे ही गोष्ट समान असता डिम आणि समवकार यांत काय फरक होईल किंवा नाटक आदी- मध्ये काय मेद होईल? म्हणून हा उपसंहारात्मक लोक आहे हे दाखविण्यासाठी 'हि' शब्द वापरला आहे. अंगांचा कल्प म्हणजे विनियोगा'चे नियम किंवा कल्पिण्याचा प्रकार. त्यावरून अशा'च प्रकारच्या इतरही गोष्टी इतिवृत्ताळा उपयोगी होतात असे समजावे. “हि यस्मातः मुळात “हियस्मातः आहे. पण येथे इतर टीकाकारांची व्याख्या उद्धत केली आहि. तिच्यात कोकातीळ “हि? शब्द तश्याचा तसाच अवतारित करून त्याचा 'यस्मातः असा अर्थ केला आहे. त्याचे प्रथमेंचे रूप केलेळे असणे संभवनीय नाही. -“आशड्कापूर्व' शंका अशी की पाच संधी आहेत, तेव्हा पाचच रूपकप्रकार होतील, दहा नाही. - 'अन्यथा' ही मुळातीळ 'अन्यद्वाः ची दुरुस्ती आहे. 'अन्यद्? ह्या नपुंसकलिंगी रूपाचा वाक्यात कोठे अन्बय लागण्यासारखा नाही. शिवाय, अर्थासाठी “अन्यथा? आवश्‍यक आहे. - “नाटकादीनां' यातील “आदि ने फक्त प्रकरणाचाच बोध हाऊ शकता. नाटक आणि प्रकरण या दोहोंतःच पाचही संधी असतात. -'कल्प? शब्दाचा नेहमीचा अथ दिलेला नाही, फ॒क्त 'कव्पनाप्रकार? हा दुसरा अर्थ दिला आहे. - तेन? ह्मणजे कल्पनेचे प्रकार संभाव्य असल्यामुळे, संधीनां यानि व॒त्तानि प्रदेशेष्वनुपूवशः । स्थसंपट्ठणयुक्ताने तान्यज्ञान्युपथारयेत्‌ ॥ ४६॥ संधींच्या भागांमध्ये स्वकार्यसिद्रिकर गुणांनी युक्त असे जे क्रमवार वृत्तान्त असतात त्यांना संधींची अंगे असे समजावे. अल्लानां सामान्यस्वरूपं प्रयोजनद्वारेण दर्शयितुं प्रथमेन स्वरूपं दवाभ्यां प्रयोजनमेकेन इयं प्रकारायन्नाह "छोकषट्कं संधीनां यानि वृत्तानीत्यादि श्ोभा- मेतिं न संशय इत्यन्तम्‌ । अर्थभागरारिः संधिरित्युक्तम्‌, तत्र संधीनां संबन्धीनि यानि वृत्ताने संविधानखण्डाने, अनुपूवदा इति मुख्यप्रयोजनसंपादनबळोपनतेन क्रमेण न तु लक्षणनिरूपणप्रसडठःपरिकल्पितेन, प्रदेशेष्वादिमध्यान्तभागेषु वर्तनेन अड्रुगाने । कुत इत्याह स्वस्य अकह्चिनः संघेर्या संपत्तिनिष्पात्तेःभ तत्र गुणवत्वे शेषभावे यतो यु॒क्तान्युचितानि, संधिसंपादकत्वादडडनीत्यर्थः । अन्ये त्वाहः स्वसंपदो बीजोत्पत्त्युद्धाटनादिकाः गुणाश्व शब्दा्थवोचितर्याणि, स्वसंपदां वा गुणाः, तेरेव युक्तानीति प्रयोजनांच्या द्वारा अंगांचे सामान्य स्वरूप स्पष्ट करण्यासाठी पहिल्या लोकात स्वरूप, नंतरच्या दोन इळोकांत प्रयोजन, नंतर एका छोकात दोन्ही स्पष्ट करून 'संधीनां १९,.४०७-४८ २२५१५ यानि वृत्तानि' येथपासून “शोभामेति न संशयः? येथपर्यंत सहा शछहोकांत सांगतात. अर्थाच्या एका भागार्‍ा समूह तो संधि असे म्हटले आहे; त्यात संधींच्या संबंधीचे जे वृत्तान्त म्हणजे संविधानकाचे भाग, क्रमवार म्हणजे मुख्य प्रयोजन साध्य करण्यासाठी आवश्यक त्या क्रमाने, त्यांच्या लक्षणांचे निरूयण करण्याच्या निमित्ताने कल्पिलेल्या क्रमाने नाही, प्रदेशांमध्ये म्हणजे संधींच्या आरंभ, मध्य आणि अन्त या भागांमध्ये विद्यमान असलेले (वृत्तान्त) ते संधींची अंगे. हे कशावरून ते सांगतात - स्वत:ची म्हणजे अड्डौ जो संधि त्याची जी संपत्ति म्हणजे निष्पत्ती तिच्याशी गुणरूपात म्हणजे शेषख्यात युक्त म्हणजे उचित असतात म्हणून; ते संधी निष्पन करीत असल्यामुळे त्यांना अंगे म्हटले आहे असा याचा अथ. परंतु दुसऱ्या टीकाकारांचे म्हणगे असे की बीजाची उपपत्ती, उद्घाटन आदी संधींच्या स्वतःच्या संपत्ती आणि दाब्दार्थांचे वैचित्र्यरूय गुण, किंवा स्वतःच्या संपत्तीचे गुण, त्यांनीच युक्त असा अथे. | | "दास्या? म्हृगजे ४७ ब ४८ छोकांत. - “"एकेन' म्ह॒गजे ४९ व्या छोकात. - दय म्हणजे स्वरूप व प्रयोजन. यानंतर मुद्रितात दयेन' अधिक आहि. ते निर्थक आहे. - 'संब- न्धीनि? मुद्रित पाठ “संवन्धनीयानि आहे. तो निष्कारण क्लिष्ट आहे. - 'बर्तनेन? बृत्तानिः शब्दांची व्युलत्ती सूचित करण्यासाठी हा शब्द वापरला आहे. - 'संपत्तिनिष्पत्तिः' सुद्रितात . संपत्तेर्निष्पत्ति:? आहे. पण “संपत्ति? शब्दाचा 'निष्पत्ति? असा अर्थ दिला आहे. तेव्हा दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीतच असणे आवद्यक आहि. - 'गुणवत्त्वे' याचा अथ 'रोषभावे' असा दिला आहि. दोहोंचा गोग स्वख्याचे, प्रबानाचे शेअभूत म्हणजे त्याचे अवयवस्वरूप अशा तर्‍हेचा अथे अभिप्रेत अहि. - “यतो? मुळात 'यतो यतो? अहि. पण त्याने निराळीच अर्थ उत्पन्न होतो. “कुतः? ह्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिळे आहे त्यात “यत: म्हणजे ज्याअर्थी असा अर्थ अमिप्रेत आहे. “यतो यतो? म्हणजे जेथून जेथून, - इतर टीकाकारांनी 'स्वसंपद्‌- गुणाः? चे दोन वैकल्पिक अर्थ दिळे आहेत - 'स्वसंपदश्व गुणाशच' असा कर्मधारय आणि 'स्वसंपद गुगाः? असा षष्टी तत्युरुज, त्यांनी केठेडा 'युक्त' शब्दाचा अथ अधिक स्वीकार्य आहे. इष्टस्यार्थस्य रचना छत्तान्तस्यानुपक्षयः । रागप्राप्तिः प्रयोगस्य गुद्यानां चेव गूहूनम्‌ ॥ ४७॥ आश्चर्यवदंभिख्यानं प्रकाल्यानां प्रकाशनम्‌ । अंद्भानां षट्डिधं द्येतद्‌ इं शास्त्रे प्रयोजनम्‌ ॥ ४८॥ दृष्ट असळेश्या कार्याची रचना, वृत्तान्त अबावित ठेवगे, प्रयोगात रंजकता उत्पन्न करणे, गुद्य गोष्टी गुप्त राखगे, विस्मयकारक रीतीने कथन करणे आणि उघड करणे १ घो वचनं. २ नि -दमिख्यातं. ३ अयं श्लोका्ध: नि पुस्तके नास्ति. २२६ नाट्यशास्त्र आकर्यक असलेल्या गोष्टी उघड करणे - असे हे अंगांचे सहा प्रकारचे प्रयोजन शास््रात सांगितले आहे. इष्टस्येत्यादिना प्रयोजनमाह । अभौोष्टस्य प्रयोजनस्य रसास्वादकृतो रचना विस्तारणा .। वृत्तान्तस्यानुपक्षयः क्रमेण स्फुटत्वादयःशळाकाकमस्बलत्वा- भावः । एतत्प्रयोजनं सवसाधारणम्‌ । प्रयोगस्येतिवृत्तस्य स्वयं परस्परस्यापि रागप्राप्तिः रञनायोग्यत्वळाभः । व्युत्पत्त्यवस्थायोगाद्यादे वा पोनरुत्तयाद्या- भासादू ये गुह्याः संछादनीया अथास्तेषां संछादनम्‌ । पुनः पुनः श्रुतमपि यदभिख्यातमितिवृत्ते, तत एव नाश्चर्यकारि, तदप्यडुःयोजनायामपूवतामिवादध- दद्भूततामोति, तदाहाश्वयेवदिति । यच्च व्युत्पत्तो सातिशायोपयोगि, तत एव प्रकाऱ्यं, तस्य प्रकारानं विस्तारणम्‌ । आद्यं तु प्रयोजन चमत्कारकृतं स्मृति दृष्टमपि प्रत्यक्षविशोषसिद्धमेव, न तु संध्योपासनादिवददष्टं नापि पूवरद्लाइवदु- भयरूपमित्यथः । शास्त्र इति नाट्यात्मके वेद इत्यथः । एषां प्रयोजनानामडु- ठक्षणेषूदाहरणं वर्णयिष्यामः । 'दृष्टस्य' इत्यादी छोकांमध्ये प्रयोजन सांगतात.. दृष्ट असलेल्या रसास्वाद उत्पन्न करणाऱ्या प्रयोजनाची रचना म्हणजे विस्तार. वृत्तान्ताचा क्षय न होणे म्हणजे क्रमशः स्पष्ट होत असल्यामुळे लोखंडी काड्यांच्या घोंगड्याप्रमाणे नसणे. हे प्रयोजन सर्वे अंगांना समान आहे. प्रयोगाची म्हणजे इतिवृत्ताची स्वतः आणि एकमेकांना रागप्राप्ती म्हणजे रंजन करण्याच्या सामर्थ्याचा लाभ. बोध देण्याच्या उद्देशामुळे अथवा पुनरुक्ततेचा भास होत असल्यामुळे ज्या गोष्टी गुह्य म्हणजे गुप्त ठेवण्यासारख्या असतात त्या गुप्त ठेवणे. पुन्हा पुन्हा एकलेले, चांगले माहीत असलेले, म्हणूनच आश्चये वाटावयास न लावणारे असे कथानक सुद्धा त्याच्या अंगांच्या योजनेत अपूर्वैता निर्माण करून अद्‌भुत स्वरूपाचे होते, हे 'आश्चर्यवद! यात सांगतात. आणि जी गोष्ट बोध देण्यास अतिशय उपयोगी आणि म्हणूनच प्रकाशित करण्यासारखी असते तिचे प्रकाशन म्हणजे विस्तार. परंतु चमत्कृति उत्पन्न करणारे पहिले प्रयोजन स्मृतीत विहित असले तरी विशेष प्रकारच्या प्रत्यक्षाने सिद्ध होणारे असेच आहे, संध्योपासना इत्यादी- प्रमाणे अदृष्ट फलाच्या स्वरूपाचे नाही किंवा पूर्वरंगाच्या अंगांप्रमाणे दृष्ट व अदृष्ट अशा दोन्ही स्वरूपाचे नाही असा अर्थ आहे. शास्त्रात म्हणजे नाट्यरूप वेदात असा अर्थ. ह्या प्रयो- जनांची उदाहरणे आम्ही अंगांच्या लक्षणांच्या व्याख्यांत दाखवून देऊ. “"अयःदालाकाकम्बलत्वामावः” याचा अर्थ स्पष्ट नाही. अयःशलाका म्हणजे लोखंडी सळ्या, त्यांनी बनविलेल्या कांबळ्यात बीण घट्ट न झाल्यामुळे मध्ये मध्ये तुटकपणा भासतो तसा तुटक- पणा संबविधानकात असू नये अक्या प्रकारचा अर्थ असण्याची शक्‍यता आहे. मुद्रितात “-कव्प- १९.४९-५१ २२७ त्वामावः' असे पाठाच्या शोवटी आहे. पण त्यानेंही अर्थ स्पष्ट होण्यास मदत होत नाही. - “परस्परस्य* म्हणजे अंगांची परस्परात रंजकता उत्पन्न करण्याची क्षमता. - 'व्युत्पत्त्ववस्थायोगात्‌? व्युत्पत्ति म्हणजे सामाजिकांना बोथ अथवा उपदेश देणे. त्यासाठी काही गोष्टी उघड न करणे इष्ट असते. - “-द्याभासाद्‌ ये? मुद्रितात “-द्या मासे? असा पाठ असून पुढील 'ये' गाळला आहे. पण ते बरोबर नाही. हेतुदशाक पक्चमी, तसेच 'ये? दोन्ही आवदयक आहेत. -- 'अद्भुतताम हस्तलिखितात “अभूतताम? आहि. तोही पाठ असंभवनीय नाही. - 'स्मृतिहृष्टम्‌? स्मृति म्हणजे नाटय- शास्त्र असे अमिप्रेत असावे आणि दृष्ट म्हणजे विहित केलेले, सांगितलेले. नाय्यशास्त्राळा वेद म्हटलेळे असल्यामुळे कदाचित मूळ पाठ “श्रुतिदृष्टम? असावा. मीमांताशास्त्राप्रमाणे क्रियेचे फल दृष्ट म्हणजे याच लोकी उपभोगावया'चे किंवा अदृष्ट म्हणजे परलोकी मोगावयाचे असे असू शकते. चमत्कृति किंबा रसास्वाद हे दृष्ट फल, प्रत्यक्ष रंगमंदिरात अनुमविता येते. अड्ठडीनो नरो यंडकेवारम्भक्षमो भवेत्‌ । अकु्हीनं तथा काव्यं न प्रयोगक्षमं भवेत्‌ ॥ ४९ ॥| उदात्तमपि यत्काव्यं स्याद्धेः परिवर्जितम । हीनत्वाद्धि प्रयोगस्य न सतां रजयेन्मनः ॥ ५० ॥ काव्य यदपि हीनार्थ सम्यगड्ठेः समन्वितम्‌ । दीपेत्वात्तु प्रयोगस्य शोभामेति न संशयः ॥ ५१ ॥ ज्याप्रमाणे अंगहीन असलेला मनुष्य कार्ये करण्यास समथ होणार नाही त्याप्रमाणे अंगांनी विरहित असलेळे काव्य प्रयोगास योग्य होणार नाही. उदात्त असलेळे काव्य सुद्धा जर अंगविहीन असेळ तर प्रयोग हीन प्रतीचा होत असल्यामुळे सज्जनांच्या मनाचे रंजन करू शकणार नाही. आणि कनिष्ठ प्रतीचे काव्य सुद्धा जर अंगांनी समुचित रीतीने युक्त असेल तर प्रयोग उत्कृष्ट होत असल्यामुळे शोभा पावते यात रांका नाही. अत एव दृष्टान्तेन ग्रदयति अड्डःकतंव्यसंपादनम्‌ । न प्रयोगक्षममिति ततः प्रयोजनस्यासंपत्तेः, दृष्टस्य वा प्रत्युतासंभावनात्‌ । एतदू्‌ व्यतिरेकद्वारेण स्फुटयाति उदात्तमपीति । लक्षणगुणालंकृतियुक्तमि- त्यथः । प्रयोगस्येति अपादानर्मापे संबन्थि, वृक्षस्य पणं पततीति यथा । तस्य प्रयोगस्य तस्य काव्यस्य यतो हीनत्वं तदयोग्यत्वं तस्मात्‌ सतां परोपकार- प्रवृत्तानां कविनटानां साघुभूतानां वा सामाजिकानां मनो न रजअयतीति संभाव्यते । १ नि यढृद युद्धारम्भेषक्षमो २ नि -त्वात्तू. २३ का दीप्ताड्ञृत्वात- र्र्ट नाट्यशास्त्र अन्वयद्वारेणोपसंहराते यदपीति । हीनाथामेति स्वल्पभ्रयोजनं प्रहसनानिद- शितकथंचाधीत्यादि । प्रयोगः प्रयुक्तिः, तन्नाडुं प्रयोजक॑ रजनातिशयो व्युत्पत्त्यति- शायश्च, तदुभयं तत्र काव्ये दीप्तं स्फुटमित्यथः । म्हणूनच दृष्टांताच्या साहाय्याने योजावयाच्या अंगांचे संपादन दढ करतात. प्रयोग- क्षम होणार नांही म्हणजे त्यामुळे प्रयोजनाची निष्पत्ती होणार नाही किंवा उत्पन्न झालेळे प्रयोजन उलट असंभाव्य असेल. हेच 'उदात्तमरपि' इत्यादी नकारात्मक बिधानाने स्पष्ट करतात. उदात्त म्हणजे लक्षण, गुण आणि अलंकार यांनी युक्त असा अर्थ. 'प्रयोगस्य' यात अपादान अश्या अथी सुद्धा संबंधदराक षष्ठी, 'ृक्षस्य पण पर्ताते' यात आहे त्याप्रमाणे, त्या प्रयोगापासून त्या काव्याची ज्याअथी हीनता म्हणजे त्यासाठी अयोग्यता आहे त्याअथी ते काव्य सज्जनांच्या म्हणजे इतरांवर उपकार करण्यास प्रवृत्त झाळेल्या कवीच्या आणि नटांच्या किंवा साधुस्वरूप प्रेक्षकांच्या मनाचे रंजन करणार नाही असा संभव आहे. “य॒दपि' इत्यादी अस्तिपक्षी विधानाने उपसंहार करतात. हीनाथे म्हणजे अगदी अल्प प्रयोजन असलेले प्रहसन आदी काव्य. प्रयोग म्हणजे प्रयोजना, त्यात अंग म्हणजे प्रयोजक, उत्कृष्ट रंजकता आणि उत्कृष्ट बोधदायित्ब; ती दोन्ही त्या काव्यात दीप्त म्हणजे स्पष्ट असतात असा अर्थ. | 'दरूढ॒यति? य! शब्दानंतर टीकेतील काही शब्द गहाळ झाले असावेत असे वाटते. श्लोकातील प्रारंमीचा शब्द प्रतीक म्हणून उद्धृत केला असण्याचा संभव आहे. तसेच “आरम्मक्षमः' शब्दाचा अर्थ बिशद केला असण्याचीही शक्‍यता आहे. - 'अड्भकर्तव्यसंपादनम्‌? हा समास “अद्धेः स्वकर्त- व्यस्य संपादनम? असा सोडविल्यास 'द्रढयति? पेक्षा अधिक समर्पक क्रियापद अपेक्षित आहे. “कतव्यानि यानि अड्भानि तेषां संपादनम? असा अर्थ शक्‍य आहे. पण तसा समास विचित्र वाटतो. '-कर्तव्यतासंपादनम? असा पाठभेद सुचविता येईल. - 'न प्रयोगक्षममिति' मुळात “न? नाही. परंतु पुढे जो अर्थ दिला आहे तो 'न? चा अन्तर्भाव करून दिला आहे. तेव्हा छोका- तून शब्द उद्धत करताना तोही केळा असणारच. - (दृष्ट्स्य बा प्रत्युतातंभावनात्‌ ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात दृष्टस्य वा प्रत्युत संमावनात आणि मुद्रितात दृष्टस्य वा प्रच्युतसंभाव- नात? असे आहि. दृष्ट म्हणजे निष्पन्न होणारे प्रयोजन असा अर्थ अभिप्रेत दिसतो. त्याची असंमाव्यता निदर्दित करण्यासाठी 'असंभावनातः आवश्यक आहे. 'प्रच्युतसंभावनात्‌ दे संभाव्य नाहो. प्रच्युतीची कल्पना प्रयोगाच्या अक्षमतेशी जुळण्यासारखी नाही. “अपादानमपि संबन्धिः हस्तलिखितात “सन्धिबन्धि' असा भ्रष्ट पाठ आडे, मुद्रितात 'संब- न्थित्वेन' . असन त्यानंतर 'षष्टी' हा शब्द संपादकांनी सुचविला आहे. 'प्रयोगस्य' हे षष्टीचे रूप १९.५२--५४ ग्र «९ आहे. षष्टींचा सामान्यतः संबन्ध दाखविण्यासाठी उपयोग होतो. पण येथे तो अपादान हा पंच- मीचा अर्थ दाखबिण्यासाठी केला आहे, म्हणजेच 'प्रयोगस्य”' हे रूप 'प्रयोगातः या अर्थी वापरले आहे. अश्या तऱ्हेच्या षष्टीच्या उपयोगाचे उदाहरण 'वृक्षस्य पणे पतति? हे. दिळे आहे. - तस्य प्रयोगस्थ' वस्तुतः बरील बिवेचनानुसार तस्मात्‌ प्रयोगात? असा शब्दप्रयोग येथे अपे- क्षित आहे. 'प्रयोगात्‌ः याचा अन्वय 'हीतत्वात शी लावावयाचा; त्यातील हीन हे विशेषण काव्याचे; 'प्रयोगात? म्हणजे प्रयोगापासून, प्रयोगामुळे काव्य हीन होते म्हणजे प्रयोगाला अयोग्य होते म्हणून असा एर्कदर अथ अमिनवगुप्ताने केलेला दिसतो. ह्या खटाटोप करण्याचे प्रयोजन स्पष्ट नाही. -'तदयोग्यत्व॑ तस्मात? सुद्रितात 'यदयोग्यत्वं यस्मात? असे आहे. पण ते बरोबर नाही. “तत्‌? ने प्रयोगाचा बोध होतो. - 'परोपकार-' यातील “पर? म्हणजे सामाजिक किंबा प्रेक्षक. “स्वल्पप्रयोजनं' ही मुळातील 'स्वल्पमपि प्रयोजन? ची दुरुस्ती आहे. 'हीनार्थची ही व्याख्या असल्यामुळे समासघटित शब्द आवदयक आहे. 'काव्यं' चे हे. विशोषण आहे. - प्रह- . सनानिदर्शितकथंचाधीत्यादिः असा अत्यंत भ्रष्ट पाठ हस्तलिखितात आहे. हीनार्थ काव्याचे यात उदाहरण आहे. त्यातील प्रहसन एवढाच भाग स्पष्ट आहे. मुद्रितात 'प्रहसननिद्शनकथाख्यायि- कादि' असा पाठ दिला आहे. पण तो मुळीच संभाव्य नाही. प्रयोगाच्या संदर्भात कथा व आ- ख्यायिकरा यांचा निर्देश अशक्‍य आहे. प्रहसनाबरोबर उत्सृष्टिकाळू, भाण व बीथी यांचा निदेंदा केला असल्याची संभाव्यता आहे. कारण तेही स्वल्पप्रयोजन होत असे म्हणता येईल. तथापि, ह्या समासाचे मूळ रूप काय असावे हे सूचित करणे कठीण आहे. - 'अड्भ॑ प्रयोजकं' 'छोका- तील “'अक्के? नें संव्यद्षांचा बोध होत असता अद्भ म्हणजे प्रयोजक असा अर्थ केला आहे तो त्याचे वैशिष्ट्य - रंजकता आणि व्युत्पत्ति असे दोन प्रकारचे - दाखविण्याच्या उद्देशाने. संपादकांनी टीपेत असे म्हटले आहे की नाटयशास्त्राच्या सवे हस्तलिस्वितांत ५१ बा शोक ५० व्या छोकाच्या पूर्वी आढळतो. अमिनवगुप्ताच्या व्याख्येच्या अनुरोधाने त्यांनी क्रम वद- लला आहे हे उघड आहे. तस्पात्संधिमदेशेषु यथायोगं यथारसम्‌ । कविनाडुधाने कार्याणि सम्यक्‍तानि निबोधत ।॥ ५२॥ उपक्षेपः परिकरः पारिन्यासो विलोभनम्‌ । याक्तिः पामिः समाधानं विधानं परिभावना ॥ ५३॥ उद्गेदः करणं भेद एतान्यद्वानि वे मुखे । तथा प्रातिमुख चेव शुणुताज्ञानि नामतः ॥५४॥ १ नि प्रयोगेष. २ नि -देशं. ३ नि प्रदेशास्तु.. ४ नि भेदो द्रादशा- ५ ति वक्ष्याम्यद्षानि, का शुणताड्ठान्यतः परम्‌. २२३०८० विलासः परिसपेश्न विधूतं तापनं तथा । नर्म नर्मद्यातिश्वैव तथा प्ंगयणं पुनः ॥५५॥ निरोधश्वेव विज्ञयः पर्युपासनमेव च । पुष्पे वज़मुपन्यासो व्णसंहार एव च ॥५६॥ एतान वे प्रातिमुख गर्भडह्षणानि निबोधत । अभूताहरणं मार्गो रूपोदाहरणे क्रमः ॥ ५७॥ संग्रहश्मानुमानं च प्रार्थनाक्षिसिरेव च । तोटकाधिबले चेव शुट्रेंगो बिद्रवस्तथा ।॥ ५८॥ एतान्यड्धााने वे गर्भे होवमर्श निबोधत । अपवादश्व संफेटो विद्रवः शक्तिरेव च ॥५९॥ व्यवसायः प्रसद्धश युति खेदो निषेधनम्‌ । विरोधनमथादानं छादने च प्ररोचना ॥६०॥ 2 च ४2 &*_ 02 > एतान्यवमृशे5ह्वानि भूयो निवहणे श्णु । १३ संधिनेरोधो ग्रथनं निणेयः परिभाषणम्‌ ॥६१॥ दड द्यातेः पसाद आनन्दः समयो शुपगूहनसू । ५५५ भाषणं पूर्ववाक्‍्यं च काव्यसंहार एव च ॥६२॥ १५६ प्रशस्तारोते संहारे ज्ञयान्यद्भानि नामतः । चतुःषधिुधेज्ञयान्येतान्यज्ानि सोथेषु ॥६३॥ नाट्यशास्त्र म्हणून कवीने संधींच्या भागांमध्ये रसाळा अनुरूप व यथोचित अशी अंगे योग्य रीतीने योजावीत. त्या अंगांची नावे ऐका. उपक्षेप, परिकर, परिन्यास, विळोभन, युक्ति, प्राप्ति, समाधान, विधान, परिभावना, उद्गेद, करण आणि भेद ही मुखसंधीतील अंगे होत. ६ नि प्रशमनं, घो प्रगमनं. ७ ब -क्षिप्तमेव. ८ नि विमर्शे च. १० घो द्रृति. ११ घो सादनं. १२ ब व्यवहारश्च युक्तिश्च विमर्शाद्ञात्यममूनि च. १३ घो -विबोधो. १४ नि वृतिः, घो कृतिः, १५ नि कार्य- १६ का चाद्भानि कुर्याच्निवेहणे बुधः. | ९ घो -5 मिद्रवः., १९,.५२-६२ २२३२९ आता प्रतिमुखसंधीतीळ अंगांची नावे ऐका. विलास, परिसर्प, विधूत, तापन, नमे, नर्मद्युति, प्रगयण, निरोध, पर्युपासन, पुष्प, वत्न, उपन्यास आणि वर्णसंहार ही प्रतिमुखातीठळ अंगे होत. आता गर्भसंघीतीळ ऐका. अभूताहरण, मार्ग, ख्प, उदाहरण, क्रम, संग्रह, अनुमान, प्राथना, आक्षिप्ति, तोटक, अधिबल, उद्देग आणि विद्रव ही गर्मसैंघीतील अंगे. आता अवमर्शातीळ रेका. अपवाद, संफेट, विद्रव, शक्ति, व्यवसाय, प्रसद्ध, . द्युति, खेद, निषेधन, विरोधन, आदान, छादन, आणि प्ररोचना ही अवमृदसंधीतीळ अंगे होत. आता निर्वहणसंधीतीळ ऐका. संधि, निरोध, ग्रथन, निणय, परिभाषण, युति, प्रसाद, आनंद, समय, उपगहन, भाषण, पूवेवाक्य, काव्यसंहार आणि प्रशस्ति ही निर्वहणातीळ अंगांची नावे होत असे समजावे. बुद्धिमान कवींनी संधींतील ही चौसष्ट अंगे जाणून ध्यावीत. अथाड्ठानामदेरामाह उपक्षेपः परिकर इत्यादिना एतान्यडुनाने संधिष्वित्यं- न्तेन । मुखे दादरा, प्रतिसुखे गर्भ च त्रयोदरा, अवमर्शे द्वादश, निवेहणे चतुर्दरेत्येवं मिलित्वा चतुष्षष्टिः । आता 'उपक्षेपः परिकरः! इत्यादीपासून 'एतान्यद्ञानि संधिषु' येथपावेतो अंगांचा नामनिर्देश करतात. मुखसंधीत बारा, प्रतिसुख आणि गर्भ संधीत प्रत्येकी तेरा, अवमशी संधीत बारा आणि निवेहणात चौदा याप्रमाणे सर्व मिळून चौसष्ट. “अवमर्शे द्रादरा' वस्तुतः अवमर्शातही तेरा अंगांचा नामनिर्देश आहे. आणि पुढे ह्या तेराही अंगांच्या व्याख्या दिल्या आहित. त्यामुळे एकंदर अंगांची संख्या पासष्ट होते, चौसष्ट नाही. पुढेही व्याख्यांची संख्या पासष्टच होते आणि त्या सर्व व्याख्यांवर अमिनवरुप्ताची टीका आहे. मूळ अंगांची संख्या चौसष्ट असणार. नंतर त्यात एका अंगाची भर पडली असावी. पण हे नवीन अंग कोणते हे सांगता येण्यासारखे नाही. ददारूप आदी उत्तरकालीन ग्रंथांतून गर्मसंधीतीळ 'प्रार्थना' हे अद्च गाळलेले आढळते. | येथील ५२ बा कोक संपादकांनी कंसात दिला आहे. त्यावर अमिनवगुप्ताची टीका नाही. तथापि तो मूळ असण्याचा फार संभव आहे. मागील ळोकांवरून स्वाभाविकपणे निघणारा निष्कषे त्यात अहे. केचिन्मन्यन्ते । इह उपक्रम उपसंहारो मध्यमिति प्रत्यवस्थं स्थानभेदचर- यम्‌, तत्र प्रत्येकं सूक्ष्मेणारस्भाद्यवस्थापश्चकेन भाव्यमिति पश्चदश्यो दशाः क्रमभाविनः । तत्राद्यास्तावद्दशा नाडुत्वेन वण्यन्ते, आद्विबुद्धथनुदयात्तत्रेति । चतुर्दश निर्वहणे फळयोगबलात्सर्वा एवोपपाद्यन्ते । अन्यत्र तु मुखादी काश्वे" छीनीक्रियन्ते, न द्वादशादिभेदानि. तत्राहुनीति । तंदेतदसत्‌ । एवं हि वक्षमा- 2२२९ नाट्यशास्त्र णेषु तेनेव क्रमेण भाव्यम, न चासावस्ति । प्रयोजनशडुनषटुं ततश्चानुपपन्न स्यात्‌, अनुपक्षय इत्येकमेव हि प्रयोजन भवेत्‌ । भेदकरणे$पि च नियम निदानानुपपत्ती ददयोद्वांदश दयोस्त्रयोदशाते कुतस्त्योी विभाग इत्यास्तामदः । काही टीकाकारांचे असे मत आहे की प्रत्येक अवस्थेत प्रारम्म, अन्त आणि मधय अशी तीन स्थाने असतात. त्यात प्रत्येकी सूक्ष्म स्वरूपाच्या आरम्म आदी पाच अवस्था असतात म्हणून पंधरा दशा क्रमाने अस्तित्वात येतात. त्यांपैकी आरंभीच्या दशांचे अंग म्हणून वर्णन होत नाही, कारण त्यावेळी अंगीविषयीच्या कल्पनेचा उदय झालेला नसतो निवहणसंधीत फलयोग असल्याकारणाने स्व चौदाही दशा उपपन्न केल्या जातात. पर मुख आदी इतर संघौंमध्ये काहींचा ळोप केला जातो, त्यांत बारा इत्यादी प्रकारची भिन्न अंगे नसतात. पण हे मत बरोबर नाही. असे असते तर सांगितल्या जाणाऱ्या अंगांचा तोच क्रम ठरला असता; पण तसा तो क्रम अभिप्रेत नाही. आणि तसे समजल्यास सहा प्रयोजनांचा संभव उपपन्न होणार नाही, अनुपक्षय हेच एक सर्वे अंगांचे प्रयोजन ठरेळ, आणि भेद करण्यामध्ये सुद्धा नियमिततेचे कारण उपपनत्न नसल्यामुळे दोन संधींत बारा, दोन संधीत तेरा अशा प्रकारची विभागणी कोठून होणार ! तेव्हा हे राहू द्या. “तत्र प्रत्येकं इ० ह्या टीकाकारांचे म्हणणे असे की पाच अवस्थांमव्ये जी आदि-मध्य- अन्त अश्ली तीन स्थाने असतात त्या प्रत्येक स्थानात पाच पाच अवस्था असतात; ह्या स्म स्वरूपाच्या असतात. म्हणजे मुख्य पाच अवस्थांत प्रत्येकी सूकम पंधरा अवस्था असतात. ह्यांना दशा हे नाव दिले आहे. याप्रमाणे प्रत्येक संधीत पंधरा दशा असतात. आणि तंपूर्ण रूपकात पंचाहत्तर दशा असा हा हिशोब आहे. - 'पश्चदरयः' वस्तुतः “पज्चदश' असेच रूप अपेक्षित आहे. - “आद्या? म्हणजे फक्त प्रारंभावस्थेतील सुरुवातीच्या काही का प्रत्येक अवस्थेच्या सुरुवातीची पहिली याप्रमाणे फक्त पाच हे स्पष्ट नाही. पहिला पर्याय अधिक तंभाव्य वाटतो. - दशा नाडठत्वेन' ही 'दशानामडरत्वेन' ची दुरूस्ती आहे. तसेच “अडिबुद्धथनुदयात' ही “अहिबुद्धध- दयात ची दुरूस्ती आहे. अशी पाठ्युद्धी केली तरच वाक्याचा सुसंगत अर्थ लागतो. अ- द्विन्‌ अथवा अवयविन्‌ असल्याशिवाय अंगांचा अथवा अवयवांचा निर्देश संभवनीय नाही; म्हणून सुरुवातीच्या दशांना अड्ठः ही संज्ञा लागू होत नाही. तेव्हा दशा पंचाहत्तर असल्या तरी अनज्बे चौतष्टच आहेत असा ह्या टीकाकारांच्या म्हणण्याचा आशय आहे. - 'उपपादन्ते? म्हणजे उपपन्न आहेत असे दाखविता येते. - 'वक्ष्यमाणेषु तेनेव' मूळ पाठ 'वक्ष्यमाणेनेव? एव- ढाच असण्याचा संभव आहे. पण आहवे त्या पाठातूनहि अर्थनिष्पत्ती होऊ शकते. - 'प्रयोजन- दाहा? यात शाडू म्हणजे संभव असा अर्थ अभिप्रेत आहे. - 'भेदकरणे5पि' ही 'बीजकरणेडपि? ची सुचविलेली दुरुस्ती आहे. बीजकरण हे प्रस्तुत संदर्भात संभाव्य नाही यानंतर बडोदे प्रतीत पुढील अधिक कोक कंसात दिला आहे - संपादनार्थ बीजस्य सम्यक सिद्धिकराणि च। कार्याण्येतानि कविभिबिभज्याथानी नाटक ।! १९.६४ २२३३ हा झोक मूळ असण्याचा संभव नाही. त्यातील आहय पुढे ९७-९८ ककोकांत अधिक समुचित रीतीने मांडला आहे. पुनरेषां प्रवक्ष्यामि लक्षणानि यथाक्रमम्‌ । काव्याथेस्य समुत्पत्तिरुपक्षेप इति स्मृतः ।। ६४॥ आता यांची लक्षणे मी क्रमवार सांगतो. काव्याच्या विषया'चा संक्षेपाने निर्देश म्हणजे उपक्षेप असे म्हणतात. पुनरेषामिति । पुनःशब्दी विदोषद्योतकः । लक्षण एवायं क्रमो न निबन्धन इति यावत्‌ । तेन यदुडूटप्रभ्रतयो5ड्वानां संधी क्रमे च नियममाहुस्तद्युत्तमागम- विरुद्धमेव । तथा हि 'संप्रधारणमर्थानां युक्तिरित्यभिधीयते' इति यन्मुखसंधौ पश्धममडुं वश्ष्यति तत्सर्वेषु संधिषु तावान्निबन्धनयोग्यम्‌ । न च तथा निवेश्य बध्यमानमदष्टकतं विदध्यात्‌ । न च लक्ष्ये न हश्‍्यते । वेणीसंहारे हि तृतीये5ड्वे गर्भसंधी दुर्योधनकर्णयोमहाति संप्रधारणे द्रोणवधे वृत्ते - तेजस्वी रिपुहतबन्थुदुःखपारं बाहुभ्यां तराते श्वूतायुधप्रुवाभ्याम्‌ । आचार्यः सुतनिधनं निदाम्य संख्ये किं शास्त्रग्रहसमये विरास्त्र आसीत्‌ ॥ (३.२७) इत्यादि यावत्‌ - | दत्तवाभयं सो5तिरथो हन्यमानं किरीटिना । सिन्धुराजमुपेक्षेत नेवं चेत्कथमन्यथा ॥ (३.२८) इति । न चात्र प्रीतिव्युत्पत्त्योः क्षतिः काचित्‌ । £पुनरेषाम! इत्यादी. पुनः हा शब्द विशेष दाखविणारा आहे. हा क्रम फक्त लक्षणां- च्या संबंधातच आहे, रूपकात योजावयाच्या संबंधात नाही असे तात्पर्य. म्हणून उद्भट प्रभ्रतींनी अंगांची संधींच्या बाबतीत आणि क्रमाच्या बाबतीत नियतता असते असे जे म्हटले आहे ते युक्तियुक्ततेच्या आणि शास्त्राच्या विरुद्धच आहे. उदाहरणार्थ, 'प्रयोजनां- विषयीचा विचार म्हणजे युक्ति असे म्हणतात' असे जे मुखसंघीतीळ पाचवे अड्ठ म्हणून सांगतील ते सर्वेही संधींमध्ये योजावयास उचित असे आहे. आणि त्याची योजना केली १ नि एतेषां तु पुनवक्ष्ये. २२४ नाट्यशास्त्र असता अदृष्ट असे काही होणार नाही. आणि अशी योजना कोठे दिसून येत नाही असेही नाही. कारण वेणीसंहार नाटकात तिसऱ्या अंकात गर्भसंधीमध्ये द्रोणाचा बध झाल्यानंतर दुर्योधन आणि कर्ण यांच्यामधील दीधे कारणमीमांसेत 'तेजस्वी पुरुष शत्रने स्वजनाचा वध केल्यामुळे होणाऱ्या दुःखरूपी सागराच्या पार आयुधरूपी प्लव घेतलेल्या हातांनी संतरण करून जातो. मग रणांगणावर पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर शास्त्र हातात घेण्याच्या वेळेस आचार्यांनी शस्त्रत्याग केला हे कसे /' ह्या दुर्योधनाच्या उ पासून तो 'जर असे नसेळ तर एरव्ही त्या महान रथीने जयद्रथाळा अभय देऊन त्याचा अजुनाकडून वध होत असता उपेक्षा कशी केलीं असती?! ह्या त्याच्याच उक्तीपर्यंतचा अंश. आणि यात आनन्द आणि बोध यांच्यात कोणतीही कमतरता उत्पन्न होत नाही. “निवेश्य बघ्यमानम्‌ ? ही “निबध्यमानम्‌ः शब्दाची फोड केलेली आहे. तेव्हा मुद्रितातील निवे. व्यं) असा पाठ बरोबर नाही. -'अदृ्टकृतं' अदृष्ट शब्दाचा अर्थ जे शास्त्रात सांगितले नाही ते असा दिसतो. अदृष्ट फल असा अर्थ शक्‍य आहे, पण तो कमी संभाव्य वाटतो. - 'प्रीतिव्युत्पत्त्योः? प्रीति आणि व्युत्पत्ति ही काव्याची दोन प्रयोजने प्रसिद्ध आहेत. म्हणून 'प्रतीति-' अस्ता पाठ बरोबर नाही. शिवाय तो शब्दही अप्रस्तुत आहे. यत्तु संधिनेयत्येनाभिधानं तत्र संधाववश्यंभावित्वख्यापनार्थम्‌ , युक्तिर्मखे भवत्येव । संध्यन्तराळाने तु नेत्थमिति पथक वर्णयिष्यन्ते । कानिचित्त्वज्ञानि स्वरूपबलादेव नियमभाज़ि । यथोपक्षेपो मुखसंधावेव प्रथममेव च । न ह्यनु- पक्षिस्ते वस्ताने किंचिदपि शक्‍यक्रियम । यत्तूच्यते 'चतुःषष्ट्यड्ठसंयुतम्‌? इति तेन संभवमात्रमेषामुक्तं न तु नियमः । 'यथासंधि तु कर्तन्यानि' इति वचनं प्रत्युत संध्योचित्येनेषां निबन्धनमभिदधदस्मदभमिहितनीतियोग्यपथोपदेड्येव । योग्यताथेवृत्तिना हि यथाराब्देनायमव्ययीभावः । अमुक संधीत अमुक अड्डे असा जो त्यांचा नियत स्वरूपात निर्देश केला आहे तो त्या संधीत ती अवश्य असतात हे दाखविण्यासाठी; उदाहरणार्थ, युक्ति हे अंग मुखसंधीत अस- तेच. परंतु संध्यन्तरे अशा स्वरूपाची नसतात म्हणून त्यांचे स्वतंत्रपणे वर्णन करणार आहेत. परंतु काही अंगांचे स्वरूपच असे असते की त्यांचे स्थान निश्चित ठरलेलेच असते. उदा- हरणा्थ, उपक्षेप मुखतंधीतच आणि तोही प्रथमारभीच असतो. कारण कोणत्याही गोष्टीचा उपक्षेप झाळा नसेळ तर तिच्यासंबधी कोणतीही क्रिया शक्‍य होत नाही. “चौसष्ट अंगांनी युक्त' असे जे पुढे म्हटले आहे त्याने या अंगांचा फक्त संभव निर्दिष्ट केला आहे, नियतता दाखविली नाही. उलट 'संधींत योग्य असतील त्याप्रमाणे ही योजावीत' हे वचन संधींत योग्यतेनुसार यांची योजना करावी असे म्हणून आम्ही सांगितलेल्या अर्थयोजनेस अनुकूल १९.६४ २३५ अशा मार्गाचे उपदेश करणारे आहे. कारण योग्यता असा अथे असलेल्या 'यथा' शाब्दाने हा अब्ययीभाव समास बनला आहे "नेयत्य? हे नियत शब्दापासून बनलेले भावबाचक नाम. -'संध्यन्तरालानि? पुढे ९९-१०२ ह्या 'ळोकांत साभ, भेद इत्यादी एकबीस संत्यन्तरांचा निर्देश आहे. त्यांचा कोणत्याही संघीशी संबंध जोड- लेला नाही. रूपकात कोठेही त्यांची योजना करत। येईल. - 'प्रथममेव च । न' ही दुरुस्ती आहे. हस्त- लिखितात “प्रथममेव वचनं आणि मुद्रितात 'प्रथमे । एवं च न? असे आहे. अर्थासाठी दुरुस्ती आव- र्यक आहे हे उघड आहे. - 'चतुःषष्टयड्रसंयुतम? हे वचन पुढे ११७ व्या छोकात आहे. *यथासंधि तु कतेब्यानि' हे वचन पुढे ९७ व्या छोकात आहे. तदनुसार येथील “यथासंघिकृत (:)? ह्या पाठाची दुरुस्ती आवशयक आहे. - *योग्यतार्थैवृत्तिना' पण अव्ययीभावात 'यथा? चा अनतिक्रमण असाही अर्थ असू शकतो दे लक्षात ठेवले पाहिजे. यत्तक्त॑ शरीराड्ठनियमदरानात्कथमेतदिति, तत्रापि न दृष्टान्ताद्यवस्था अपि तु संभवतः । स चास्तीत्युक्तम । शाखाद्यश्च व्रक्षावयवा मध्ये$पि ब्रथ्नेःपि ऊर्श्वेःपि भवन्ति । न च शर्ररपादपादिवदू उपक्षेपादिभिरवयविकल्पः संधिरारभ्यते । यः्च प्रतिसंथ्यभिधानं तद्ाहुल्येन तथा दर्शनात । तथा हि उपक्षिप्ते$्थे विस्तारिते निश्चितगुणादभिलषिते संभावनीयमुपायादिविषयं संप्र- धारणमिति उपक्षेपपरिकरपरिन्यासविळोभनहेतुत्वादन्यान्याभिधाय यक्तिरुक्ता, न तु तत्रेव सद्धावात्‌ । आनन्त्यनियमश्चव मुनेरेवानमिमतो लक्ष्यते । अन्यथा संध्यन्तराळानि सामादीनि मदान्तान्येकविंदातिः लास्याडुननि गेयपदादीनि दरा यानि वक्ष्यन्ते तेषां कुत्र निवेशः स्यात्‌ । संघिपश्वकमयं हि रूपकं क्रमनियतम्‌, अड्डःसंभारभावितश्व संधिरिति । न च क्रमेणानेनैव तानि प्रयोज्यानीति वचन- मस्ति । सदपि च न्यायापेतमन्यथा योज्येत । न चोंदेराक्रममनूच्यते निबद्धम । ठक्षणाठंकारगुणवीथ्यह्ुसंव्यन्तराणे लास्याड्‌गव्रात्ततदडःगाने तु साधस्यंदष्टान्तः । तदेतत्मत्येकं लक्षणे स्फुटीभविष्यतीत्यास्तां तावत्‌ । शरीराच्या अवयवांच्या बाबतीत नियतता दिसून येते, मग हे अनियत कसे असे जे विचारले आहे त्याला उत्तर असे की इष्टान्तावरून व्यवस्था ठरत नाही, तर संभव असेल त्याप्रमाणे. आणि तो संभव आहे असे सांगितले आहे. आणि शाखा वगैरे वृक्षाचे अबयय काही मध्ये, काही बुंध्याशी, तर काही वरही असतात. शिवाय, शरीर आणि वृक्ष यांच्याप्रमाणे संधि उपक्षेप आदींच्या मुळे अवयवीतारखा होतो असे नाही. आणि प्रत्येक संधीत म्हणून जो अड्गांचा निर्देश केळा आहे तो ती त्या त्या संधीत पुष्कळ प्रमाणात दिसतात म्हणून. उदाहरणार्थ, अर्थाचा उपक्षेप झाळा, विस्तार झाळा;, निश्चित गुण असल्यामुळे त्याची अमि- ळाघा झाली, म्हणजे संभाव्य असा उपाय वगैरेविधयींचा विचार होतो म्हणून उपक्षप, परि- २२८ नाट्यशास्त्र कर, परिन्यास आणि विळोभन यांना कारणीभूत म्हणून पहिल्या चार अड्शांचे वणन करून युक्तीचा निर्देश केला आहे, पण ते अंग फक्त तेथेच असते म्हणून नाही. आणि क्रमाचा नियम भरतमुनीला संमत नाही असे दिसते. एरव्ही 'साम' पासून मद! पर्यंत असलेले एकवीस संध्यन्तराळ, गेयपद आदी दहा लास्याडगे जी पुढे सांगणार आहेत, त्यांना कोठे स्थान देता येईल ? पाच संधी असलेले रूपक क्रमाने बांधलेळे असते, परंतु संधी अड्गांच्या समूहाने भावित झालेला असत्तो. आणि ती याच क्रमाने योजावीत असे कोठेही वचन नाही. आणि जरी तसे वचन असते तरी न्यायाळा सोडून म्हणून त्याचा निराळा अन्वय लावता आला असता. आणि स्चलेले काव्य उद्देशक्रमाला अनुसरून केळे जात नाही. लक्षण, अलंकार, गुण, वीथीची अंगे, संध्यन्तर, लास्याची अंगे, वृत्ती, वृत्तींची अंगे, हे समान धम दाखविणारे दृष्टान्त आहेत. हे सर्व अड्गांच्या लक्षणात स्पष्ट होईल, तेव्हा हे असो. "न दृष्टान्तादू इ०? मुळात “न? 'अपि तु? नेतर आहे. तेथून काहून तो 'च्छान्ताद्‌' च्या पूर्वी घातला ओह. त्यामुळेच अभिप्रेत अर्थ संगतवार लावणे शक्‍य होते. -'शरीरपादपादिवद्‌' मुद्रितात “'रोरे असा स्वतंत्र शब्द आहे. पण ते बरोबर नाही. शरीर आणि पादप ह्या दोहोंहून संधीची मिन्नता येथे दाखवाबयाची आहे. अवयव मिळून शरीररूपी अथबा पादपरूपी अबयबी होतो, पण अंगे मिळून संचिरूप अवयवी होतो असे म्हणणे शक्‍य नाही. - 'अवयविकल्पः? ही हस्तलिखितातील "अवयविकरल्स' आणि मुद्रितातीळ 'अबयवविकल्पः:' ची आवदयक असलेली दुरुस्ती आहे. - तथा हि” ही मुळातील . “तथापि? ची दुरूस्ती आहे. “तथापि? येथे अप्रस्तुत आहे. - :उपक्षिप्ते$्थे इ०? यात पाहिल्या चार अंगांनी होणाऱ्या कार्यांचा निर्देश आहे. -'अड्भसंमारभावितश्च' मुद्रित पाठ 'तदड्ठसंहार- आहे. संहार पेक्षा संभार शब्द अधिक योग्य आहे. “भावित? म्हणजे त्यांनी ज्याला शोभा येते अद्या स्वरूपाचा हा अर्थ अभिप्रेत असावा. - 'सदपि च? मुद्रितात “च' ऐवजी “बा आहे. पण “च? अधिक समर्पक वाटतो. -- 'निबद्धम? मुद्रितात 'निबन्धम्‌? आहे आणि संपादकांनी मूळ “निबन्धः? असण्या'ची तंभाव्यता सूचित केली आहे. पण 'रचठेले' अद्या अर्थी काव्याचा वर्णनात्मक 'निबड्धमू शब्दच योग्य वाटतो. _- तु साधर्म्यदृष्टान्तर ही 'त्वसाधर्म्ये- ची दुरुस्ती आहे. अभिनवयुप्ताठा येथे असे म्हणाबया'चे आहे की लक्षण, गुण, अलंकार वगेरे अनेक गोष्टींचे वणन करताना ज्या एका क्रमाने त्या सांगितल्या आहेत त्याच क्रमाने त्यांचा काव्यात उपयोग केला पाहिजे असे कोणी म्हणत नाही; तोच न्याय संच्यद्भांना लावला पाहिजे. म्हणून येथे 'साधर्म्यदृष्टान्तः” असाच पाठ आवद्यक आहे. तत्र प्रस्तावना न तावट्रपकाई, नटवृत्तव्याप्ततयेतित्रूत्ताननुभ्रवेशादिति तद- नन्तर पूर्व कान्यार्थ इतिव्ृत्तशरीरलक्षणो$भिवेय: प्रधानरसलक्षणं च प्रयोजन संक्षेपेणोपक्षिप्येते । यथा वेणीसंहारे भीमः - ठाक्षागरहानळविषान्नसभाप्रवेदीः प्राणेषु वित्तनिचयेषु च नः प्रह्त्य । आकूष्य पाण्डववधूपॉरेधानकेशान्‌ स्वस्था भवन्तु कुरुराजसृताः सभरृत्याः ॥ (१. ८), १९.६५ २३७ त्यात प्रस्तावना हा काही ख्पकाचा भाग नाही; कारण, नटांच्या स्वतःच्या वृत्ता- न्ताने ती व्याप्त असल्यामुळे इतिवृत्ताचा तिच्यात समावेश होत नाही. म्हणून त्या प्रस्ताव- नेनंतर प्रथम इतिवृत्तळू्पी शरीर असळेळा, कथन करावयाचा असलेला काव्याचा अर्थ आणि प्रधान रसाचे स्वरूप दोन्ही संक्षिप्त प्रयोजना'च्या रूपात प्रस्तुत केळे जातात. उदा- हरणाथ, वेणीसंहारात भीभसेन 'लाक्षागृह्माळा आग, विषयुक्त अन्न आणि सभेत आमंत्रण यांनी आमच्या प्राणावर आणि संपत्तीवर प्रहार केल्यानंतर आणि पांडवांच्या पत्नीची वस्त्र आणि केस ओढल्यानंतर रव्यांसहित कौरव स्वस्थ राहोत काय£' “अभिघधेयः” हे बिधेय न समजता काव्यार्थः' चे विशेषण समनणे चांगळे. त्यामुळे 'का- व्यार्थ” आणि 'प्रधानरसलक्षणं? या दोन प्रथमान्त शब्दांचा 'उपक्षिप्येते' शी अन्बय लागतो. उपक्षेप ह्या दोहोंचा अमिप्रत आहे. म्हणून हे क्रियापद द्रिबचनातच हवे; मुद्रितातल्याप्रमाणे एकवचनात नको. - 'होकातीलळ चौथा चरण सूत्रधाराच्या वचनातील आहे. भीमसेनाच्या उद्गारात तो 'स्वस्था भवन्ति मयि जीवति धातराष्ट्रा? असा आहे. येथे वचन उद्धत करताना अनवधान झालेळे असावे. काव्यार्थाबरोबर वीररसाचाही ह्या झोकात उपक्षेप आहे. यदुत्पन्नार्थबाहुल्यं ज्ञयः परिकरस्तु सः । त्र न्नि ह*>"३ &*> तंन्िष्पात्तिः परिन्यासो विज्चयः कविभिः सदा ॥ ६५ ।। निर्दिष्ट झालेल्या विषयाचा जो विस्तार तो परिकर असे समजावे. त्या विषयाची निष्पत्ति म्हणजे परिन्यास असे कवींनी सदा जाणावे. तत इंषद्विस्तार्यते । यथा भीमः - प्रवर्ध यद्वेर मम खलु शिशोरेव कुरुभि- न॑ तत्रार्या हेतुर्न भवाति किरीटी न च युवाम । जरासन्धस्योरःस्थलमिव विरूढं पुनरपे क्ुधा भीमः संधिं विघटयति यूयं घटयत ॥ (१.१०). त्यानंतर काव्यार्थाचा थोडा विस्तार केळा जातो तो परिकर. उदाहरणार्थ, भीमाचे वचन मी लहान होतो तेव्हापासून माझे कौरवांशी वैर जे बाढत गेळे त्याला कारण आर्य युधिष्ठिर नाही, अजुंन नाही आणि तुम्ही दोघे नाही. जरासंघाच्या वक्षस्थळाप्रमाणे पुन्हा पुन्हा जुळवून आणलेला संधी हा भीम रागाने मोडणार, तुम्ही पाहिजे तर जोडा. १ नि समुत्पत्ना- २ नि तन्निवृत्तः, का तक्निष्पत्त्या त्‌ कथनं परित्यास: प्रकीतितः. क्र य २३८ . नाट्यशास्त्र ततो5पि निश्चयापत्तिरूपतया परितो हृदये सो$र्थो न्यस्यते । यथा चश्वदधूजभ्रमितचण्डगदाभिघातेत्यादि । त्यापेक्षाही अधिक, निश्चयाप्रत येण्या'च्या स्वरूपाचा असल्यामुळे तो काव्याचा अर्थ परितः म्हणजे हृदयामध्ये ठेवला जातो म्हणून परिन्यास, उदाहरणाथ, भीमाचे वचन “फुर- फुरणाऱ्या हाताने फिरविलळेल्या भीषण गदेच्या आघाताने' इत्यादी संपूर्ण क्होक पुढीलप्रमाणे आहे - चश्वद्धजभ्रमितचण्डगदाभिघात- संचूर्णितोख्युगळस्य सुयोधनस्य । स्त्यानावनद्धघनशोणितशोणपाणि- रूत्तसयिष्यति कचांस्तव देवि भीमः ॥ (१.२१). गुणनिवर्णनं चैव विलोभनामाते स्पृतम । संपरधारणमर्थानां युक्तिरित्यमिधीयते ॥ ६६ ॥ गुणांचे वर्णन म्हणजे बिलोभन असे म्हणतात. प्रयोजन समजून घेणे म्हणजे युक्ति असे म्हणतात. | ततस्तंदेव वस्तु गुणवदिति ाध्यते । "छा्धेव विळोभनहेतुत्वाद्विलोभनम्‌ । यथा द्रौपदी 'अणुगेहन्तु मह एदं वझणं देवदाओ ।' इति । यथा वा विक्रमोवंश्यां राजा “अस्याः सर्गविधी प्रजापतिरभूत? इत्यादि । नंतर तीच गोष्ट गुणयुक्त म्हणून तिची प्रशंसा केली जाते. प्रदासाच विलोभनाचे _ कारण असल्यामुळे विळोभन होय. उदाहरणार्थ, द्रौपदीचे वचन “माझ्या ह्या वचनाला देवतांचा अनुग्रह असो'. किंवा दुसरे उदाहरण विक्रमोवशीयातीळ राजाचे वचन “हिला निर्माण करताना चंद्र प्रजापति झाळा' इत्यादी. अणुगेहन्तुर इ०' हल्ली उपलब्ध असलेल्या वेणीसंह्ाराच्या अनेक प्रतींत हे वचन 'अणु- . गेहन्तु एदं ववसिदं दे भादरो (ह्या उद्यमाला आपले बंधू अनुग्रह करोत)? असे आहे. दुसरा पाठमेदह्दी अहिच. - विक्रमोबशीयातील संपूर्ण रछोक असा १ कार्‍यत्तू.__ १९.६६ २३९ अस्याः सगविधो प्रजापतिरभचचन्द्रो नु कान्तिप्रद! शाजषारेकरसः स्वयं नु मदनो मालो नु पुष्पाकरः । वेदाभ्यासजडः कथ नु विषयव्यावृत्तकोतूहलो निर्मालु प्रभवेन्मनोहरमिदं रूपं पुराणो मुनिः ॥ (१.८) तदेतदुपक्षेपा्यःचतुष्कं प्रायशी मुखसंधौ भवातिं । उक्तेनेव क्रमेण न पीर्वापर्येण भवति । आनन्तर्यनियमस्तु नास्ति संध्यन्तराणां सामादीनां मध्ये5नुभ्रवेशात्‌ । तदेतदाह मुनिः काव्याथंस्य समुत्पत्तिरित्यादिना विळोभन मिति स्सृतमित्यन्तेन । तत्र वृत्तान्ते नोपक्षयः सर्वेषां प्रयोजनमित्युक्तम्‌ । परि- करस्य प्रयोजनमिष्टाथेरचनापि । उपक्षेप आदी ही चार अगे प्रायः मुखसंधीत असतात. निर्देरिलेल्या क्रमानेच ती असतात, उलटसखुळट क्रमाने नाही. तथापि एकामागून ताबडतोब दुसरे असा नियम नाही, कारण साम आदी संध्यन्तरांचा मध्ये समावेश होतो. हे सर्वे भरतमुनी 'काव्याथेस्य समुत्पत्तिः' पासून “विळोभनमिति स्मृतम्‌? येथपावेतोच्या भागात सांगतात. त्यात वृत्तान्ताचा उपक्षय न होणे हे ह्या सर्व अंगांचे प्रयोजन सांगितले आहे. परिकराचे दृष्ट असलेल्या अर्थाची रचना हे सुद्धा आणखी प्रयोजन आहे. 'क्रमेण' हा शब्द मुळात नाही. पण नुसतेच 'ठक्तेन' हे विशेषण अर्थबाही नाही. - “आनन्तर्य' म्हणजे दोहोंत मुळीच अंतर किंधा दुसरे काही नसणे. - “नास्तिः नंतर मुळात 'न' अधिक आहे. पण तो चुकीने पडला आहे. - 'वृत्तान्ते इ०' वर जी सहा प्रयोजने सांगितली आहेत त्यांत 'वृत्तान्तस्यानुपक्षयः? हे एक आहे, आणि ६इष्टस्यार्थस्य रचना' हे दुसरे. युक्तियंथा सहदेवः - “आर्य, किं महाराजसंदेशो5यमार्येणाव्युत्पत्न एव गृहीत? इत्यतःप्रभ्नाति यावरद्धामवचनम्‌ - युष्मान्‌ हेपयते क्रोधाठीके राचुकुलक्षयः | न ठञ्तयाति दाराणां सभायां केशकषेणम्‌ ॥ (१.१७) इति । अस्याः प्रयोजनं प्रकाडयप्रकादानमपि । युक्तीचे उदाहरण वेणीसंहारात सह्देवाचे वचन “आये, महाराजांच्या संदेशाला काही विशेष अथ नाही असे आपण का समजता ?' येथपासून ते भीमाच्या पुढील बचना- पयंत 'क्रोधाने केलेल्या शत्रूच्या कुलाच्या नाशाची तुम्हाळा. लोकांत लाज वाटते. २७४० | | नाट्यशास्त्र परंतु समेत पत्नीचे केस ओढले असता तुम्हाला त्याची शरम वाटत नाही.' ह्या युक्तीचे प्रकाऱायोग्य गोष्ट प्रकागित करणे असेही अधिक प्रयोजन आहे. “कः हा वेणीसंहारातील पाठ आहे. प्रस्तुत ठिकाणी मुळात 'किंचन' आहे. पण तो पाठ संभवनीय नाही. - 'अव्युत्सन्न एव? सुद्रितात 'एवं' आहे ते बरोबर नाही. हड्ठीचा नाटकातील पाठ 'इव' आहे. - येथे निर्दिष्ट झालेल्या अंशात पाच गावे मिळाल्यास तह करण्यास आपण तयार आहोत असा संदेदा युधिष्टिराने कृष्णाबरोबर पाठविला त्याचे रहस्य सहदेव विशद करीत आहे. म्हणजे कारणमीमांसारूप संप्रधारण येथे आहे. - 'प्रकार्यप्रका- शनम? सहा प्रयोजनांपेकी एक. सुखाथेस्याभिगमनं प्रापतिर्त्यिभिसात्विता । बीजाथस्योपगमनं संमाधानमिते स्मृतम्‌ ॥ ६७॥. सुखकर गोष्टींचा लाभ म्हणजे प्राप्ति असे म्हणतात. बीजाच्या अर्थाची प्राप्ती म्हणजे समाधान असे म्हटले जाते. सुखार्थस्याभिगमनं प्राप्तिरिते । सुखयतीति सुखं ताहशस्य वस्तुनः । यथा “एष खलु भगवान्वासुदेवः पाण्डवपक्षपातामर्षितेन सुयोधनेन संयमितु मारब्ध? इत्यादि यावत्‌ 'कुमारमविलस्त्ितं द्रष्टामिच्छामि' इति । अयं ह्यर्था भीमं सुखर्याते, संघेविधटनात्‌ । बीजा र्थस्योपगमनमिति । यस्मिन्‌ बीजं तदिदानी प्रधाननायकानुगतत्वेन सस्यगाहितं भवतीति 'योधि४िरम? इत्यनेन समाधानं दरितम्‌ । सुखार्थस्यामिगमनं प्राप्ति? इत्यादी. जी वस्तू सुख देते ती सुख; तशा कस्तूची प्राप्ती. उदाहरणार्थ, वेणीसंह्यारात 'पांडबांविषयीच्या पक्षपातामुळे रागावळेळा सुयोधन भगवान वासुदेवाळा बांधू पहात होता' येथपासून 'कुमारास त्वरित भेटावयास बोलाविले आहे' येथपर्यंतचे कंचुकीचे वचन. ही गोष्ट भीमाला सुख देते, कारण तहाची बोळणी फिसकटली आहेत. “बीजाथस्योपगमनम! इत्यादी. ज्या ठीकाणी बीज इतका वेळ होते ते आता प्रधान नायकाच्या ठिकाणीही गेल्यामुळे उत्कृष्ट रीतीने ठेवळे जाते म्हणून 'यौधिष्ठिरम? इत्यादी *छोकात समाधान निदर्टित होते १ घो भुखाथंस्योप- २ का -स्योपगमनं. ३ नि -धीयते, का -संज्ितम्‌. ४ नि तत्समाधानमुच्यते. | १९.६८ २४७१ “सुखयतीति सुखम? झोकात 'सुख' विदोषण म्हणून वापरले आहे. त्यासाठी ही व्युत्पत्ती. | यस्मिन्‌ बीजमः आतापावेतो बीजाचे निधान भीमसेन होता. आता ते प्रधान नायक जो युचिट्ठिर त्याच्याशीही संबद्ध होते. आणि तेच त्याचे उचित स्थान. म्हणून समाधान म्हणजे बीजाचे सम्यक्‌ आधान. - 'योघिष्ठिरम? संपूर्ण ळछोक असा - यत्सत्यवतभडःगभीरुमनसा यत्नेन मन्दीकृतं यद्विस्मतुमपीहितं शमवता शान्ति कुलस्येच्छता । तद्‌ दयूतारणिसंभृते चृपसुताकेशाम्बराकषेणेः क्रोधज्योतिरिदं महत्कुरुवने योधिष्ठिरं जुम्मते ॥ (१.२४). सुखदुःखकृतो यो्थस्तद्विधानमिति स्म॒तम्‌ । कुंतूहलोत्तरावेगो >विज्ञेया परिमावना ।। ६८ ॥ सुख त दुःख दोन्डो उन करणारा प्रतंग तो विधान होय. कुतूहलाने मिश्रित अदा आवेगाला परिभावना असे जाणावे. सुखदुःखकूतो यो५्थस्तद्विभानामिति । व्यामिश्रतया सुखदुःखे अभिधीयेते यत्रेति । यथा भीमः ततत्पाश्चाठे गच्छामो वयमिदानीं कुरुकुलक्षयाय ।' द्रोपदी - 'णाह, जं असुरसमराहिमुहस्स हरिणी मडठलं तं तुम्हाणं होदु ।! इत्यादि, तथा 'मा अणवेक्खिदसरीरा संचरह, अप्पमत्तसंचरणिआईं रिउबलाईं ।! इति । अत्र द्रोपद्याः प्रहर्षा भयं च मिश्रतया विहितमिति विचित्रत्वाद्रसवत्ता भवति । तेनेष्टस्याथंस्य रचना तथा निगूहितव्यस्य नायिकाचित्तनिस्त्रिशभावस्य निग्रूहनं प्रयोजनम्‌ । एवमन्यत्रापि प्रयोजनमुत्मेक्ष्यम । युक्तिवश्चेदमन्यत्रापि संभवत्येव । एवमन्यत्राप्यूद्यम्‌ । कुतूहळेति । कोतुकेन जिज्ञासातिदायेन व्यामिश्रो य आवेगः सा परिभा- वना किमेतदिति । यथा संग्राम संधिविघटनादादांसमाना टद्रोपदी तूयशब्दं श्ुत्वाह - 'णाह किं दाणि एसो पलअंतजळहरत्थणिदमंसळीो खणे खणे समर- दुन्द्ही ताडी आदि ।! 'सुखदुःखकृतो यो$्थस्तद्विधानम? इत्यादी. सुख आणि दुःख जेथे मिश्रित रूपात योजिळे जातात ते. उदाहरणार्थ, भीम - 'तर पांचाळि, आम्ही आता कुरुकुलाचा नारा १ का -मिहोच्यते. २ नि कुतूहलोत्तरावेश्ो, का कौतूहलोत्तरविशो. ३ का भवेत्तु. २४«< नाट्यशास्त्र करण्यास जातो' असे म्हणतो तेव्हाचे द्रोपदीचे उद्गार - 'नाथ, असुरांशी युद्ध करण्यास उद्युक्त झालेल्या हरीचे जे मंगळ तेच तुमचे होवो? इत्यादी, तसेच 'शरीराविषयी बेफिकीर राहून रणात संचार करू नका. दात्रसैन्यात सावधानतेने संचार करावा लागतो. येथे द्रौपदीचा हर्ष आणि भीति ही मिश्रित रूपात दाखविठी आहेत म्हणून वैचित्र्यासुळे रसकत्ता उत्पन होते. तेव्हा इष्ट अर्थाची रचना आणि अप्रकट ठेवावया'च्या नायिकेच्या चित्तातील निर्धणतेच्या भावाचे गोपन ही प्रयोजने साध्य होतात. याप्रमाणे इतरही अंगांच्या बाबतीत प्रयोजनांची कल्पना करावी. युक्तीप्रमाणे हे अंग इतरत्रही संभवतेच. या प्रमाणे इतर बाबतीतही कल्पना करावी. 'कुतूहळ- इत्यादी. कौतुकाने म्हणजे अर्त्यंत जिज्ञासेने मिश्रित जो अवेग तो परिभावना, 'हे काय आहे? अशा स्वख्पाचा, उदाहरणार्थ, तह मोडल्यामुळे युद्धाची आडांसा करणारी द्रौपदी दुन्द्भीचा आवाज ऐकून उद्गारते, “नाथ, प्रलया'च्या अंताच्या जेघगर्जनेसारखा गंभीर असा हा रणदुन्दुभी आता क्षणाक्षणाला का वाजवीत आहेत £ * €":__14० “नायिकाचित्तनिस्त्रिशाभावस्य? हा मुद्रितातील पाठ आहे. इस्तलिखितात 'निस्तरिरा? च्या जागी तुटी आहे, निर्त्रिश' शब्दाचा निष्कुप, निर्घृण असा अर्थ आहे. हे खरे. पण तो फारसा प्रसिद्ध नाही. निष्कृप किंबा निर्घेण असाच मूळ पाठ असण्याची राक्‍यता आहे. “संग्राम सेंधिविधटनादारेसमाना? ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'संग्रासं संभधिधना- बादोसमाना? असे आहे. मूळ पाठ 'संग्रामतंधिविधटनावाशसमाना? असाही असण्याची वयक्‍्यता आहे. मुद्रित पाठ 'संग्रामं संघटनया संदायमाना' असा आहे. पण 'संघटनया? याचा अर्थ स्पष्ट नाही. आणि “ुदायमाना? पेक्षा 'आशसमाना? अधिक समपैक आहे. समरदुन्दुभी असा निदेश तिच्या वचनातच आहे. तेव्हा संग्रामाचा तिळा नुसता संशय आला होता असे समजणे बरोबर नाही- बरीजा्थस्य प्ररोहो यः स उ्ठेद इति स्मृतः । प्रकृतार्थसमारम्भः करणं नाम तड़वेत ॥ ६९॥ बीजरूप विषयाच्या अंकुरित होण्याळा उद्भेद असे म्हणतात. प्रस्तुत असलेल्या कार्याचा आरंभ म्हणजे करण होय. | बीजार्थस्य प्ररोह इति । यथा द्रोपदी - 'णाह पुणो वि तुए अहे समस्सासइद्व्वा । भीमः - | भूयः परिभवक्कान्तिळञ्ञाबन्थुरिताननभ्‌ । अनिःशषितकौरव्यं न पश्यासि वृकादरम ॥ (१.२६). १ का उद्धेदः स तृ कोतितः. १९.७० २४३ न चेदमुद्धाटनं येन प्रतिंमुंख॑ भवेत, आपि तु शचुक्षयारम्भबीजस्योद्वाटनेन विनापि प्ररोहमात्रमवस्थानमानुगुण्यात्‌ भूमिसं-छेष इव बीजस्य । प्रकृताथसमारस्भः करणमिति । यथा सहंदेवः - 'गच्छामो वंयंमिदानी गुरुजनानुज्ञाता विक्रमानुरूपमाचरितुम! इत्यादि । “बीजार्थस्य प्ररोहः' इत्यादी. उदाहरणाथ, द्रौपदी - “नाथ, पुन्हा तुम्ही माझे समाश्रा- सन केले पाहिजे.' मीम - 'कौरवांचा पूर्ण निःपात ज्याने केला नाही अश्या व अपमानाची कान्ति आणि लज्जा यांनी तोंड खाळी वळळेळे असलेल्या भीमसेनाला तू पुन्हा पहाणार नाहीस.” आणि हे बीजाचे उद्धाटन नाही की ज्यामुळे त्याला प्रतिसुख म्हणता येइल, तर शात्रच्या नाशाच्या उद्योगळ्यी बीजाची उद्‌धाटनाशित्रायही केवळ अंकुराच्या स्वख्पात अनुकूलतेमुळे स्थिती, बीज भूमीळा चिकट्टून असते तशी 'प्रकृतार्थसमारम्मः करणम! इत्यादी. उदाहरणाथे, सहदेव - 'आता आम्ही गुरु- जनाच्या अनुज्ञेने आमच्या पराक्रमाळा योग्य अशी कामगिरी बजावण्यास जातो.' शात्रुक्षपारम्मबीजस्य* मुद्रितात रात्तुक्षयारम्म' असा स्वतंत्र शब्द आह. पण बरोबर नाही. शात्रक्षयारम्म हेच बीज आहे. यानंतरच्या पाठात थोडी दुरुस्ती सुचविली आहे. हस्त- लिखितात “-बीजस्प्रारोडब(टनेंन विनापि प्ररोहमात्रमनुस्थानानुगुण्यात्‌ः असे आहे. दुरुस्तीने अथ स्पष्ट होण्यास मदत होते. मुद्रित पाठ 'बीजस्याकूर: कुरुकुलो बाटनेन विनापि प्ररोहमात्रमनुस्थाना- नुगुण्यातर असा आहे. यातील 'कुरुकुलोद्धाटनेन'” सर्वथा अशक्य आहे. आणि 'अड्लूरः हा प्ररोह? चा अस त्याच्या अगोदर दिला असल्याची संभाव्यता कमी. - “भूमिसं छेष' मुद्रितातील ंश्‍्होष? हा मद्णदोष आहे. अंकुराच्या स्वरूपात बीज अद्याप भूमीतच असते, त्याचे पूर्ण उद्‌घाटन झाठिळे नसते असा अथ गुरुजनाचुज्ञाताः मुद्रितात 'कुरुराजानुज्ञाताः' असा असंभाव्य पाठ कोठून आला त्याची कल्पना करता येत नाही. संघातभेदनार्था यः स भेद इति कौो्तितः । समीहा रतिभोगाथा विलास इति ' साज्ञितः ॥ ७० ॥ एकत्रित झालेल्यांचे विघटन करण्याचे उद्दिष्ट असलेला तो मेद असे म्हणतात. रतिभोगाच्या इच्छेला विळास अशी संज्ञा आहे. १ नि कीतितः. २४४ नाट्यशास्त्र संघातभेदनार्था यः स भेद इति । पात्रसंघातस्य यन्निजप्रयोजनोपक्षेपेण निष्कमणासिद्धये भेदन विकिरणामिव स भेदः । सवंत्रा्रे५न्तभावी वस्तूपायात्मा भेदः संध्यन्तरेकविंरातौ वक््यते । अस्योदाहरणम्‌ । अन्यान्यास्फालभिन्न-! इत्यादि यावत्‌ 'पाण्डुपुत्रा? इति । अथ प्रतिमुखोदिटानामडुभनामुद्देशक्रमेण लक्षणमाह । समीहा रतिभोगार्था विळास इति । रतिलक्षणस्य भावस्य हेतुभूतो यो भोगो विषयः प्रमदा पुरुषो वा तदर्था या समीहा स विळासः । कामफलेषु रूपकेषु प्रतिमुख एव ह्यास्थावत्त्वेन रतिरूपेण भाव्यम्‌ । यथाभिज्ञान्ाकुन्तठे तापसः - 'कस्येदमुक्षीरानुलेपनस' इत्यादि । तथा राजा - | कामं प्रिया न सुलभा मनस्तु तद्धावदर्शनाश्वासि । अकतार्थेश्‍पि मनसिजे रतिमुभयप्राथंना कुरुते ॥ (२.१) इत्यादि । यस्तु वेणीसंहारे भानुमत्या सह दुर्योधनस्य दशितो विळासः स नायकस्य ताइदो5वसरे5त्यनुचित इति चिरन्तनेरेवोक्तम । यथा सहूदयालोककारः - संधिसंध्यडुघटनं रसबन्धव्यपेक्षया । न तु केवलरास्त्रार्थस्थाितिसंपादनेच्छया ॥ इति । एतव्च विवरण एवास्माभिविंतत्य दरितम्‌ । इद्द च रतिग्रहणं पुमर्थोपयोगि- रसगतस्थायिभावोपलक्षणम्‌ । तेन वीरप्रधानेपु रूपकेषु उत्साहविषया सम्यगीहा चेश विळास इति मन्तव्यम । युक्त्वेतन्य एव हि रसो मुख उपक्षिप्तः, स एव स्वयं प्रतिमुखे स्वोचितारम्भसंभावितः कतव्यः । लस *छेषणे5पि हि पठ्यते । “संघातमेदनार्थो यः स मेद इत्यादी. पात्रांच्या समूहाचे त्यांच्या आपापल्या प्रयोजनांचा उपक्षेप झाल्यावर निष्क्मण साध्य करण्यासाठी जे भेदन विभक्त करण्यासारखे तो मेद. कार्यसिद्धीचा उपाय असे स्वरूप असलेला, सवेत्र अंकात अन्तर्भाव होण्यासारखा जो भेद त्याचा एकवीस संध्यन्तरांमध्ये निर्देश केळा जाईल. ह्या मेदाचे उदाहरण “एकमेकावर आदळून छिन्नभिन्न झालेल्या' येथपासून 'पाण्डुपुत्र' पर्यंतचे भीमाचे वचन. आता प्रतिमुखसंधीत निर्दिष्ट केळेल्या अंगांची लक्षणे उद्देशातील क्रमानुसार देतात. 'समीहा रतिभोगार्था विळासः' इत्यादी. रति लक्षण असलेल्या स्थायिभावाचा जो भोग म्हणजे विषय, प्रमदा अथवा पुरुष, त्याच्यासाठी जी इच्छा तो विलास. काम १९.७० २४५ हे अंतिम फळ असलेल्या रूपकांमध्ये प्रतिमुखसंधीतच रतिस्वरूपाची आस्थायुक्तता असावयास पाहिजे. उदाहरणार्थ, अभिकज्ञानशाकुन्तलात तापसाची उक्ती - 'कोणासाठी हे वाळ्याचे अनुलेपन आहे? तसेच राजाचे वचन - प्रिया सहज प्राप्त होण्यासारखी नाही हे खरे; तथापि तिच्या भावाचे दर्शन झाल्यामुळे मनाळा आश्वासन ळाभळे आहे. काम कृतार्थ न झाळा तरी परस्पराविषयीची उभयतांची अभिलाषा आनंद देते.' परंतु वेणीसंहार नाटकात दुर्योधनाचा भानुमतीबरोवर जो विळास दाखविळा आहे तो तसल्या प्रसंगी अत्यंत अनुचित हे प्राचीनांनीच सांगितळे आहे. उदाहरणार्थ, ध्वन्यालोककार म्हणतात - 'संधी आणि संध्यड्गांची योजना रसाच्या प्रस्थापनेच्या उद्देशाने करावी, केवळ शास्त्रात सांगितलेल्या नियमाच्या पालनाच्या बुद्धीने नाही.' आणि हे आम्ही विवरणात विस्तृतपणे दाखवून दिले आहे.. आणि प्रस्तुत ठिकाणी रति शब्द पुरुषार्थाठा उपयोगी असणाऱ्या रसांचे जे स्थायि- भाव त्यांचे उपलक्षण म्हणून वापरला आहे. म्हणून वीररस प्रधान असलेल्या रूपकांत उत्साहाविषयीची योग्य ईहा म्हणजे चेष्टा तो विळास असे समजले पाहिजे. मुखसंधीत योग्य चैतन्य असलेल्या रसाचाच उपक्षेप झाळा आहे, तेव्हा प्रतिमुखसंधीत त्याचाच उचित अश्या क्रियांनी परिपोष करणे आवश्यक आहे. लस्‌ धातू छेषण ह्या अर्थी सुद्धा दिळा आहे. “विकिरणेम? ही सुचबिलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'स्मृतकरणम्‌? असा अर्थहीन पाठ आहे. सुद्रित पाठ “प्रकरणम' आहे. पण प्रस्तुत संदर्भात कोणत्याही अर्थाने तो योग्य ठर- ण्यासारखा नाही. विकिरण म्हणजे पांगापांग होणे, एकमेकापासून विभक्त होणे. हा अर्थ येथे अभिप्रेत असणार हे उघड आहे. - “वस्तूपायात्मा भेदः साम, दान, भेद आणि दण्ड या चार उपायांपैकी एक जो भेद तो संध्यन्तरांत अन्तभूंत आहे. तो मेद ह्या भेदाहून निराळा. - “अन्योन्या- ई०' संपूर्ण रोक असा - अन्योन्यास्फालभिन्नद्विपर्चिरवसामांसमस्तिष्कपड्ध मग्नानां स्यन्दनानामुपरिळृतपद्न्यासविक्रान्तपत्तो । स्फीतासक्‍पानगोष्टीरसदरिवत्रावातूर्यनृत्यत्कबन्धे संग्रामैकाणेवाम्मःपयसि विचरितु पण्डिताः पाण्डुपुचाः ॥ (१.२७). ह्या कहोकानंतर सर्व पात्रांचे निष्कमण होते, म्हणून हा भेदाचे उदाहरण. अशा प्रकारे प्रत्येक अंकातील शेवटचे वचन भेदाचे उदाहरण म्हणून समजता येईल. “आस्थावत्त्वे रतिरूपेण? मुद्रित पाठ “आस्थाफलत्वेन' आहे. पण तो बरोबर नाही. एक- मेकाबद्दढ आस्था असणे हे रती'चे स्वरूप आहे. आस्था हे रतीचे फल किंवा रति हे आरस्थेचे फळ असा प्रकार नाही. - 'कस्येदं? इत्यादि तापसाच्या उद्गारात शकुन्तलेच्या रतीचा निर्देश आहे. - 'सह्ृदयालोक' यात आनंदवर्धनाच्या व्वन्यालोकाचा निर्देश आहे. उद्धृत केलेला 'छोक २४९६ नाट्यशास्त्र व्वन्यालोक, ३.१२ असा आहे. - “विवरणे' अभिनवगुप्तकृत ध्वन्यालोकाच्या विवरणाचे लोचन असे नाव आहे. - 'पुमर्थोपयोगिरस- इ०? असा एक समास करणे आवश्यक आहे. निरनिराळे रस निरनिराळ्या पुरुषारथोना कसे उपयोगो आहेत हे अमिनबगुप्ताने सहाव्या अध्यायावरील टीकेत दाखविले आहे. - “वीरप्रधानेषु रूपकेषु' यानंतर सुद्रितात “प्रतिमुख एव ह्यास्था रतिरूपेण? हे शब्द अधिक आहित. ते वरील एका ओळीतून चुकीने पुनरुक्त झाळे आहेत यात शंका नाही. प्रस्तुत ठिकाणी ते गैरलागू आहेत. हस्तलिखितात हे शब्द नाहीत. - 'उत्साहबिषया सम्यगीहा” ही दुरुस्ती आहे. मुळात 'उत्साह (:) तम्यग्विषया समीहा? असे आहे. उत्साह हा बीररसाचा स्थायिभाव. आणि वर भोग म्हणजे विषय असे म्हटले आहे. तेव्हा वीररसाच्या संबंधात छोकातील शाब्दांचा 'उत्साहविषया सम्यग्‌ ईहा? असाच अर्थ लावला असणार हे उघड आहे. 'सम्यग्बिषया? असे मुळातच असंभाव्य आहे. - 'युक्तवैतन्य इ०? हे विधान वेणीसंहा- राविषयी केलेले दिसते. - “लस? विलास शब्दातील हा धातू. त्याचा छेषण अथवा आलिंगन हा अथे रतीच्या संबेधातच समर्पक होय. | बडोदे प्रतीत ह्या 'छोकाच्या दोन अधोमथ्ये पुढील कछोकार्ध कंसात दिला आहे - एतानि तु मुखाज्ञानि वल्त्ये प्रतिमुखे पुनः । . तो मूळ असेल्से वाटत नाही. दृष्टन्टानुसरणं परिसपे इति स्मृतः । कुतस्यानुनयस्यादो विधूतं ह्यपरिग्रहः ॥७१॥ दृष्टीस पडून नष्ट झालेल्या कार्याचे अनुसरण म्हणजे परिसर्प असे म्हटले आहे. केलेल्या अनुनया'चा प्रथम अस्वीकार म्हणजे विधूत. दृष्टनष्टानुसरणं परिसर्प इति । यथा कज्युकी - “आ इस्त्रग्रहणादकुण्ट- परशोः इत्यादि । दृष्टनष्टप्रायो हि कार्यान्तरव्यासड़गात्‌ कुरुकुलक्षयो भीष्मवधेन अस्थानपरितोषसूचेतेन च दुर्योधनस्यायुक्तचे्टत्वेनानुसूत इति प्रकतस्यार्थस्य परिसपंणात्‌ प्रसरणात्‌ परिसर्पः । यथा अभिज्ञानशाकुन्तळे “भवितव्यमत्र तया । तथाहि - अभ्युन्नता पुरस्तादू ' इति । २... &”_ कृतस्यानुनयस्येते । आदी प्रथमतः कृतस्यानुनयस्य सामवचसो5नड्री- करणं विधूतम्‌ । पश्चात्पुनरड्टीकरणमिति आदिशब्दात्‌ । यथा तत्रैव शकुन्तळा - 'अइ किं अंतेउरविरहपय्युस्सुएण राएासेणा उवरुद्धेण । ! १ नि -धूतमपरि-. १९,७२९ २४७ 'दृष्टनष्टानुसरणं परिसरपेः' इत्यादी. उदाहरणार्थ कञ्चुकीचे वचन -- 'शसत्रधारण करण्यास प्रारंभ केल्यापासून ज्याचा परशू अकुंठित राहिळला' इत्यादी. कारण यात इतर कार्याच्या व्यासंगामुळे दृष्टनष्टप्राय झालेल्या कुरुकुलक्षयाचे भीष्मवधाने तसेच अस्थानी झालेल्या परितोषाने सूचित झालेल्या दुर्योधनाच्या अयोग्य चेष्टिताच्या प्रवृत्तीने अनु- संघान केळे आहे म्हणून प्रस्तुत विषया'च्या परिसर्पणामुळे म्हणजे प्रसरणामुळे परिसर्प. उदाहरणाथ, अभिक्ञानशाकुन्तलात राजाचे वचन - “ती या ठिकाणी असावी. कारण, युढे उन्नत झाळेळी' इत्यादी. 'कृतस्यानुनयस्य' इत्यादी. आदौ म्हणजे प्रथम, केलेल्या अनुनयाचा म्हणजे सामयुक्त वचनेऱ्चा अस्वीकार म्हणजे विधूत. परंतु मागाहून स्वीकार असा अर्थ आदि राब्दाने सूचित होतो. उदाहरणार्थ, त्याच नाटकात शकुन्तळेचे वचन - 'अग, अंतःपुरातींल राण्यांपासून झालेल्या विरहाने परयुत्सुक असलेल्या ह्या राज्षींला कशाला अडविता ?' _ अस्थानपरितोष- ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “वस्थान-' आणि मुद्रितात “स्थान- आहे. कंचुकीच्या वचनात अभिमन्यूच्या बघामुळे दुर्योधनाला झालेला संतोष अयोग्य आहे असे सूचित केळे आहे. तेव्हा 'अस्थान' असाच पाठ आवश्यक आहे हे उघड आहे. कंचुकीचे संपूण वचन वर ३७ व्या शछोकावरील व्याख्येत उद्धत केळे आहे. - 'परिसर्पणातू? परिसर्प शब्दाची व्युद्यत्ती सांगण्यासाठी हा शाब्द योजला असून पुढील शाब्दात त्याचा अर्थ दिल आहे. - “अभ्युन्नता इ०? संपूर्ण क्छोक असा - अभ्युत्तता पुरस्तादवगाढा जघनगोरवात्पश्रचात्‌ । द्वारे$स्य पाण्डुलिकते पदपडक्तिटेद्यतेःभिनवा ॥ “आदिशब्दात म्हणजे कोकात 'आदो? अन्त म्हटळे आहे म्हणून. संपादकांनी या ठिकाणी (उपरोध:) अश्शी अधिक शब्दाची दुरूस्ती सुचविली आहे. पण ती सर्वथा अस्वीकार्य आहे. उपरोधाचा येथे काही संबंध नाही. अपायदशेनं यत्तु तापन नाम तद्भवेत । क्रीडार्थ विहितं येत्तु हास्य नर्मेति तत्स्मृतम्‌ ।। ७२ ॥ अपायाचे जे दीन ते तापन नावाचे अंग होय. थट्रेसाठी म्हणून केलेल्या हास्य- कारक प्रसंगाळा नर्म असे म्हणतात. १ नि यत्ततू. २ नि यत्र. २३ का नमं तु संज्ञितम्‌. २४८ | | नाट्यशास्त्र अपायदरनं यक्षु तापनामिति । यथा रत्नावल्यां 'दुृहजणाणुरा झो? इत्यादि । क्रोडाथे विहितं यत्तु हास्यं नर्मेति । विदूषकः - भो मा पण्डिचगव्वं उव्बह । अहे एदं सव्वं वक्खाणइस्सं' इत्यादि । 'अपायदशेनं यत्तु तापनम? इत्यादी. उदाहरणार्थ, रत्नावलीत 'दुळेम अशा माणसावर प्रेम' इत्यादी. 'करोडार्थ विहितं यत्तु हास्य नर्म' इत्यादी. उदाहरणाथ विदूषकाचे वचन - “अहो, पांडित्याचा गर्वे वाहू नका. मी ह्या सगळ्याचा अर्थ सांगेन. ” सागरिकेचे निराशेचे उद्गार असलेली संपूर्ण गाथा अशी - दुलहजणाणुराओ लज्ञा गुरू परूवसो अप्पा । पिअसहि विसमं पेम्मं मरणं सरणं णवरमेकम्‌ ॥ (२.१). 'बिदूध्रक: इ०' रत्नावली नाटिकेत सुसंगता आणि सागरिका यांच्यातील संवाद सारिक्ेच्या तोंडून ऐकत असता त्यातील अभिप्राय मला कळला आहे असे राजाने म्हटल्यानंतरचे दे बिदूषकाचे वचन आहे. दोषप्रच्छादना्थ तु हास्यं नर्मद्युतिः स्मृता । उत्तरोत्तरवाक्‍्यं तु भवेतंगयणं पुनः ।॥ ७३ ॥ दोष झाकण्यासाठी म्हणून जे हास्य अवलंबिले जाते त्याळा नर्मबुति म्हणतात. उत्तरोत्तर उच्चारळेळे जे वाक्य ते प्रगपण होय. दोषप्रच्छादनाथं तु हास्यं नर्मद्युतिरिति । दोषो येनोक्तेन प्रच्छादायि- तुमिष्यते तस्यापि हास्यजननत्वेन नर्म सुतरां द्योतितं भवतीति नर्मद्युतिः । यथा 'चडव्वेई विअ बम्हणो रिआईं पढिदुं पउत्ता । इत्यमिहिते राजा - “नावधारितं मया । ततो विदूषकः - 'दुछहजणाणुराओ' इत्यादि । अत्र हि मौख्यदोषं छादयितुं यद्विदूषकेणोच्यते तद्राज्ञो हास्यजननामेति नर्मेव द्योतेतं भवति । लथा हि राजा - 'महात्राह्मण, को5न्य एवमृचामाभेज्ञ: ।! इति । १ नि -द्युति स्मृतम्‌. २ नि प्रशमनं बुधाः, घो प्रगमनं बुधा, १९.७३ २४७५९ उत्तरोत्तरवाक्‍्यं तु भवेत्मगयणमिति । विदूषकः -- 'किं खु दाणिं गाघेयं । राजा - 'कयापि "छाध्यनवयावनया प्रियतममनासादयन्त्या जीवितनिरपेक्षयेद- मुक्तम्‌ । ' विदूषकः - 'किं एदेहिं वक्कभणिदेहिं । णं फुडं म॑ अणासादअंदीए इत्यादि । प्रगयणमिति रूढिशब्दः । अन्ये तु प्रजारब्दात्‌ विचिकित्सायनदाब्देन शताक्विना व्युत्पत्ति कल्पयन्ति । प्रागयणमित्यन्ये पठन्ति । प्रागिति पूर्ववचनं ततो5यनं प्रामतियंस्योत्तरवचनस्येति । 'दोषप्रच्छादनार्थ तु हास्यं नर्मब्युतिः? इत्यादी. ज्या उक्तीमुळे दोष झाकण्याचा उद्देश असतो ती सुद्धा हास्य उत्पन्न करणारी असल्यामुळे नर्म चांगळे द्योतित होते म्हणून नमंद्युति. उदाहरणार्थ, विदूषकाचे वचन “चार वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणे ह्या सारिकेने त्रन्वा म्हणण्यास सुरुवात केली आहे.' त्याने असे म्हटल्यावर राजाचे उद्गार माझ्या लक्षात आले नाही' आणि त्यावर विदूषकाचे वचन 'दुळभ माणसावर प्रेम' इत्यादी. येथे आपल्या मूरखतेचा दोष झाकण्यासाठी विदूषक जे बोलतो त्याने राजाला हास्य उत्पन्न होते म्हणून नर्मच द्योतित होते. म्हणून राजा म्हणतो 'महा- ब्राह्मणा, तुझ्याऱिवाय दुसरा कोण असा क्रचांचा जाणकार आहे / 'उत्तरोत्तरवाक्यं तु भवेत्मगयणम! इत्यादी. विदूषक - “काय ही गाथा आहे ? राजा - 'प्रशंसनींय नवयोवनांत असलेल्या कोणीतरी युवतीने प्रियतमाची प्राप्ती न झाल्या- कारणाने जीविताची आशा सोडल्यामुळे हे उद्गार काढले आहेत.' विदूषक -- 'कशाला हे वाकडे बोलणे ? स्पष्टच माझी प्राप्ती न झाल्याकारणाने' इत्यादी. प्रगयण हा ख्ढ अर्थाने वापरलेला शब्द आहे. परंतु दुसरे प्रजाशब्दापासून विचिकित्सा आणि गत्यर्थक अयन राब्दाने व्युत्पत्ती कल्पितात. दुसरे काही 'प्रागयणम्‌? असा पाठ स्वीकारतात. प्राकू म्हणजे अगोदरचे वचन, त्यापासून अयन म्हणजे नंतरच्या क्‍्चनाची प्राप्ती ज्यात आहे ते प्रागयण. अभिनवयुत्ताने रत्नावलीतून उद्धृत केलेल्या प्राकूत वचनांत किंचित मिन्न असे पाठ आढळतात. उत्तरोत्तर ह्याचा अर्थ एका वचनामुळे दुसरे, दुसऱ्यामुळे तिसरे वचन अका प्रकारचा अर्थ अभिप्रेत दिसतो. - वक्कमणिदेहिं' ही हल्लीच्या पाठाला अनुसरून दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'बहुणीदेहिं' असे भ्रष्ट रूप आहे. - हस्तलिखितातील 'णं पुडे माणम अणासा- देदीए? याची वरप्रमाणे केलेली दुरुस्ती हल्लीच्या पाठावर आधारित आहे. - 'प्रजाशब्दात्‌ इ०? येथे दिलेल्या प्रगयण शब्दाच्या व्युत्पत्तीचा मुळीच बोध होत नाही. पाठ भ्रष्ट आहे. “-यत्न- च्या ऐवजी “-यन-' एवढीच दुरुस्ती सुचविता आली आहे. कारण “अयन? शब्दाचा निर्देश २१५० नाट्यशास्त्र संभाव्य आहे, 'प्रजादब्दात्‌ः हे संशयास्पद आहे* कारण प्रगयण मधील 'प्रग7 चा 'प्रजा' शी कांही संबंध असेलसे वाटत नाही. आणि 'विचिकित्सा? हा त्या शब्दापासून निष्पन्न झालेला अर्थ असे म्हणावयाचे असेल तरीही प्रजा शब्द अयोग्य ठरेळ. प्रग॒ किंबा प्रक रूपाची व्युत्पची सांगत येण्यासारखी नाही. मुद्रितात 'विचि क्लिष्ययत्नशब्देन' असे छापले आहे. त्याचा काहीच अर्थ करता येत नाही. पुढील 'शताक्विना? हा शब्दही 'शाता क्वरिनाः? असा छापला आहे. पण कसेही समजले तरी ह्या अक्षरांतून काही बोध होत नाही. 'गत्यर्थेनन, असा पाठ असण्याची शक्‍यता वाटल्याबरून बर दिलेला अर्थ केला आहे इतकेच. ' नाटयशास्त्राच्या काही हस्तलिखितात ह्या अज्षाचे नाव प्रगमन किंबा प्ररामन असे आढळते. प्रगयण शब्द अपरिचित असल्यामुळे हे शब्द त्याऐवजी बापरळे असावेत. या तु व्यसनसंप्राप्रिः स॒निरोधः प्रकीतितः क्रड्रस्याननयो यस्तु भवेत्तत्पयुपासनम्‌ ।। ७४॥ व्यसनाची जी प्राप्ती तिळा निरोध म्हणतात. रागावलेल्या मनुष्याचा केलेला अनुनय म्हणजे पर्युपासन होय. या तु व्यसनसंप्राभिः स निरोध इति । राजा - 'घिड मूर्ख, उच्वेहसता त्वयेयं त्रासिता । ' व्यसनमत्र खेदमात्रम्‌ । अभीष्टोपरोधान्निरोधः । क्रुद्धस्यानुनयो यस्त्विते । यथा विदूषकः - भो मा कुप्प, एसा खु कदलीघरं एव्व गदा! इत्यादि । राजा अनुनीतः सन्नाह - दुर्वारां कुसुमरार- व्यथाम्‌! इत्यादि । या तु व्यसनसंम्राप्ति स निरोध इत्यादी. उदाहरणार्थ, राजा - 'हात्‌ मूर्ख. मोठ्णने हसून तू ह्या सारिकेळा भिवविळेस.' या ठिकाणी व्यसन म्हणजे फक्त खेद असे समजावयाचे. इष्ट असलेल्या गोष्टीत व्यत्यय येतो म्हणून ह्याला निरोध म्हणतात. 'कुद्रस्यानुनयो यस्तु' इत्यादी. उदाहरणाथ, विदूषक - 'अरे, रागावू नकोस. ही सारिका कदलीघरातच गेळी आहे' इत्यादी. शांत होऊन राजा म्हणतो - 'निवारण्यास कठीण अशी मदनाची व्यथा' इत्यादी. 'दुर्बारां इ०' संपूर्ण कोक पुढीलप्रमाणे - १ नि निरोधः स तु. १९.७५ २११२१ दुर्वारां कुसुमरारव्यथां बहन्त्या कामिन्या यदभिहितं पुरः सखीनाम । तज्भूयः शिशुछयुकसारिकाभिरुक्त धन्यानां श्रवणपथातिथित्वमेति ॥ (२.७). विशेषवचनं यत्तु तत्पुष्पमिति संब्लितम्‌ । प्रत्यक्षरूक्षं यद्डाक्यं बेज़ तदाभिधीयते ।॥। ७५॥ वैशिष्टययुक्त जे वचन त्याळा पुष्प अशी सज्ञा आहे. साक्षात कठोर जे वचन त्याला वज्र असे म्हणतात. विदशेषवचनं यक्ष पुष्पमिति । “एसो वि सो चित्तफळओ? इत्यादिविदू- षकोक्तेः प्रभृति यावत्‌ 'परिच्युतस्तत्कुचकुस्भमध्यात्‌! इत्यादि । यथा हि कमविकासे पुष्पं भरवाते एवमत्रांपे राज्ञ उत्तरोत्तरानुरागविशेषसूचक॑ वचो विकासमस्य रागस्य दर्शयति । तथाहि सुसंगता - 'गुरुभाणुराआक्खित्तहिअओ असंबद्ध भट्टा मंतेदुं पडत्तो' इत्यादि । प्रत्यक्षरूक्षे यद्दाक्यं वज़मिति । यथा 'कथमिहस्थो5हं भवत्या ज्ञात' इति राजन्युक्तवाति सुसंगता - 'ण केवळं तुम, चित्तफळएणण । ता जाव गदुअ देवीए णिवेंदेमि । ' 'विदेषवचनं यत पुष्पम! इत्यादी. 'हाच तो चित्रफलक' इत्यादी विदूषकाच्या उक्तीपासून राजाच्या 'तिच्या कुचकुम्मामधून खाळी पडलेल्या? इत्यादी उत्तीपावेतो. कारण, ज्याप्रमाणे फूळ क्रमाक्रमाने विकसत जाते त्याप्रमाणे प्रस्तुत ठिकाणी राजाची उत्तरोत्तर वाढणाऱ्या विशेष प्रेमाची सूचक वचने त्याच्या प्रेमाचा विकास. दाखवितात. म्हणून सुसंगता म्हणते -- 'गाढ प्रेमाने अंतःकरण व्याक्षिप्त झाल्यामुळे महाराज असंबद्ध बोलावयास लागळे आहेत.' प्रत्यक्षरूक्षं यद्वाक्यं वज्रम? इत्यादी, उदाहरणार्थ, 'मी येथे आहे हे तुळा कसे कळले ” ह्या राजाच्या वचनानंतर सुसंगता म्हणते - 'केवळ आपणच नाही, तर चित्रफलकासह. तेव्हा आता मी जाऊन राणीसाहेबांना सांगते. 'परिच्युत ३०? संपूर्ण कोक अता - १ नि -ख्पं. २ नि तदवजमिति संशितम्‌. २५२ | नाट्यशास्त्र परिच्युतस्तत्कुचकुम्ममध्यात्‌ कि शोषमायासि मृणालहार न सूक्ष्मतन्तोरापिे तावकस्य तत्रावकाशो भवतः किमु स्यात्‌ ॥ (२.१४). हस्तलिखितात प्रथम चरणात “-कुचभारमध्यातः असा पाठ आहे. - 'क्रमविकासि' ही मुळातील “प्रेमविकासि? ची दुरुस्ती आहे. पुष्पाच्या प्रेमाचा निदेश असंभाव्य आहे. उपपत्तिकृतो यो5्थ उपन्यासश्व स स्मृतः । चातुवर्ण्योपगमनं व्णसंहार इष्यते | ७६॥ आणि उपपत्ती दाखविणारी जी गोष्ट तिळा उपन्यास म्हणतात. चार वर्णांच्या एकत्र येण्याला वर्णसंहार अशी संक्षा आहे. उपपत्तिकृतो यो5्थ उपन्यास इति । यथा विदूषकः ससाध्वसं - “आदि- मुहरा खु एसा गब्भदासी ।' अत्र मोखर्यात्मिकोपपत्तिरुपन्यस्ता । चातुवर्ण्योपगमनं वर्णसंहार इति । चातुवण्यंशाब्देन पात्नाण्युपलब्ल्यन्ते । तेन यत्न पात्राणि परथक्‌ स्थितान्यपि ढौक्यन्ते स वर्णसंहारः । उपाध्यायास्त्वाइः । इह॒वौरप्रधाने तावन्नायकप्रतिनायकौं तत्सचिवी च प्रधानत्वेन वण्यन्त इति वर्णाः । कामप्रघाने$पि नायको नायिका तत्सचिवी चेति । तथा हि रत्नावल्यां सुसंगताया वचनात 'अदो मे अअं गरुओो पसादो' इत्यारभ्य राजा -- 'क्कासो सुसंगता - 'हत्थे गेण्हिअ पसादेहि ण॑' इत्यादि । अत्र चतुणांमेकीभावे रागप्रापि प्रयोगस्य, इष्टस्य रचना, प्रकाऱ्यप्रकाशनमित्यपि प्रयोजनाने । यत्षु ज्राह्मणादि वणेचतुष्ट्यमेलनामिति तदफलत्वादनाहत्यमेव । 'उपपत्तिक्ृतो यो$थ उपन्यास? इत्यादी. उदाहरणार्थ, भीतीने विदूषक म्हणतो 'ही गभदासी अत्यंत बडबड करणारी आहे.' येथे बडबड करण्याच्या प्रवूत्तीच्या उपपत्तीचा उपन्यास केळा आहे “चातुवर्ण्यापगमनं वर्णतंहारः' इत्यादी. चातुवेर्ण्य शब्दाने पात्रांचे उपळलक्षण केले आहे. म्हणून जेथे पृथक असलेली पात्रे सुद्धा एकत्र आणली जातात तो चर्णसंहार. परंतु आमचे गुरुजी म्हणतात की वीररसप्रधान नाटकांमध्ये नायक व प्रतिनायक आणि १ नि -न्यासस्तु. २ नि -वेर्ण्यामि-. १९.9७ | २५३ त्यांचे प्रत्येकी एकेक सल्लागार यांचे मुख्य म्हणून वर्णन केलेले असते, यास्तव त्यांना वणे म्हणतात. शुद्रारपरधान नाटकांमध्ये सुद्धा नायक, नायिका आणि त्यांचे वयस्य व सखी मिळून चार वणे होत. उदाहरणार्थ, रत्नावलीत “म्हणून हा माझ्यावर मोठा अनुग्रह झाळा आहे' इत्यादी सुसंगतेच्या उक्तीपासून राजाचे बचन 'कोठे आहे ती ?! आणि सुसंगतेच्या “हिचा हात हातात घेऊन हिची समजूत घाळा' ह्या वचनापर्यंत, येथे चौघांचे एकत्र येणे - यात प्रयोगाची रागग्रात्ती, इृष्ट गोष्टींची रचना, प्रकाशित करावयाच्या गोष्टीचे प्रकारन ही तीन प्रयोजने साध्य होतात. त्राह्मणादी चार वर्णाचे एकत्र येणे असा जो अर्थ केला आहे तो व्यर्थ असल्यामुळे उपेक्षेपत पात्र आहे. चातुवेर्ण्यशाब्देन पात्राणि इ०? याचे कारण नाटकातील पात्रे चारही वर्णांची असतात. - “प्रधानत्वेन वर्ण्यन्ते इति बर्णा:? मट्टतोताने छाबलेला वर्ण शब्दाचा हा अर्श अमिनवगयुप्ताला पसंत नाही असे म्हणता येईल. - “एकीभावे रागप्राप्तिः? ही “एकीभावः' ची सुचविलेली दुरुस्ती आहे. 'प्रयो- जनानि” हे बहुवचनात असल्यामुळे तीन प्रयोजनांचा निर्देश अपेक्षित आहे. एक प्रयोजन 'प्रयो- गस्य रागप्राप््तिः' हे आहे. शिवाय, 'प्रयोगस्य एकभावः? हे विशेष अर्थबाही नाही. -'प्रकाश्य- प्रकारनमु' ही 'प्रकाव्ये प्रकाशनम्‌? ची दुरुस्ती आहे. षष्ठी अपेक्षित आहे, तप्तमी अत्तंभाव्य. कपटापाश्रय बाक्‍्यमभूताहरणं बिदुः । तत्त्वाथेबचनं चेव मागे इत्यमिधीयते ॥ ७७॥ ज्यात कपट आहे अशा वाक्याला अभूताहरण म्हणतात. आणि खरी गोष्ट निर्दिष्ट करणाऱ्या वचनाला माग असे म्हणतात अथ गर्भाडगान्युद्देशक्रमेण ठक्षयति । कपटापाश्रयं वाक्यमभूताहरणमिति । यथा वासवदत्तया चित्रफलके दृष्टे विदूषकवचनम्‌ “अप्पा किळ दुक्खेण आलिहीआदि त्ति मम वअणं सुणिअ पिअवअस्सेण विण्णाणं दंसिअं' इत्यादि । तत्त्वाथेवचनं मागं हते । भरट्टिणि, धुणक्खरं वि संभावीअदि' इति काश्वनमालयोक्ते वासवदत्तापवार्य परमार्थोचितं वचनमाह - “अइ उज्जुए, वस- न्तओ क्खु एसो' इत्यादि । मागंवच्च प्रसिद्धत्वात्‌ परमार्थे मार्ग इति व्यपदेश | .. आता गर्भसंधीतीळ अंगांचे उद्देशात असलेल्या क्रमाने लक्षण सांगतात; १ नि -य़ाश्रयं. २ का यत्तदभूता-. २५४ नाट्यशास्त्र “कपटापाश्रयं वाक्यमभूताहरणम्‌? इत्यादी. उदाहरणार्थ, वासवदत्तेने चित्रफळक पाहिला तेव्हाचे विदूषकाचे उद्‌गार “स्वतःचे चित्र काढणे कठीण आहे असे. माझे राब्द ऐकून प्रियवयस्याने आपले कौशल्य दाखविळे आहे! इत्यादी. 'तत्त्वार्थवचनं मार्ग; इत्यादी. 'बाईसाहेब, घुणाक्षरन्याय सुद्धा संभवतो' असे कांचन- माळा म्हणते तेव्हा वासवदत्ता तिळा एकीकडे खरी गोष्ट सांगण्यास योग्य असे सांगते “अग, तू अगदी सरळ स्वभावाची आहेस. म्हटले हा वसन्तक आहे' इत्यादी. मार्गाप्रमाणे खरा अर्थ प्रसिद्ध करणारे असल्यामुळे ह्या अंगाळा मार्ग अशी संज्ञा आहे, “वासवदत्तापवार्य' ही दुरुस्ती आहे. “'अपवार्य? च्या ऐवजीं हस्तलिखितात “अनुसारि' आणि मुद्रितात “समयानुसारि' आहे. दोन्ही मूळ असण्याचा संभव नाही. वबासवदत्तेचे हे वचन “अपवार्य' च आहे, चित्राथेसमवाये तु बितर्को रूपमिष्यते । यत्सातिशयवद्राक्य तदुदाहरणं स्मृतम्‌ ॥ ७८ ॥ विविध अर्थ एकत्र आले असता जो तर्क केला जातो त्याठा रूप अशी संज्ञा आहे. अतिशयोक्तिपू्ण जे वाक्य त्याला उदाहरण असे म्हणतात. चित्राथेसमवाये तु वितर्को रूपमिति । यथा राजा - 'प्रसीदेति त्रूयासमि- दमसति कोपे न घटते' इत्यादि विचित्रार्थांनां समवाये संभावने सवेविषय एव विरुद्धस्तर्कः इदं नोचितामिदं नोचितमित्येवं प्रातियुक्तिपयंन्तः । युक्तिस्तु नियतप्रतिपत्तिपर्यन्तेति विदोषः । रूपमिति चानियता आकूतिरुच्यते, तत्रावि- रोषप्रतिपत्तिः । इहापि तथोप'चारादू व्यपदेदाः । यत्सातिशयवद्दाक्यं तदुदाहरणामेति । ठोकप्रसिद्धवस्त्वपेक्षया यत्साति- शयमुच्यते उत्कषमसाहरतीत्युदाहरणम्‌ । यथा 'मनः प्रकृत्यैव चळम! इति, तथा बाणाः पश्च मनोभवस्य नियताः' इत्यादि । 'चित्राथेसमवाये तु वितर्को रूपम? इत्यादी. उदाहरणाथ, राजा “राग सोडून दे असे मी म्हटले तर तुळा राग आलेला नसल्यामुळे उचित होणार नाही' इत्यादी. वैचित्र्यपूर्ण गोष्टींचा समवाय म्हणजे संभव उत्पन्न झाळा असता सर्वही गोष्टींविषयी 'हे उचित नाही; हे उचित नाही' अशाप्रकारचा विरुद्ध तके विरुद्ध युक्तीपर्यंतचा तो रूप. युकत्तीत निश्चित १ नि -वायो यस्तद्रूपमिति कौतितम्‌. १२८,७९ २१२१५ निर्णयात शेवट होतो हा फरक. रूप म्हणजे अनियत स्वरूपाची आकृती, त्यात विशेषाची प्रतीती नसते. येथेही त्याचप्रमाणे असल्यामुळे गौण अर्थाने रूप ही संज्ञा. 'य॒त्सातिशयवद्राक्यं तदुदाहरणम? इत्यादी. लोकांत प्रसिद्द असलेल्या गोष्टीच्या मानाने जे अतिशयोक्तियुक्त वचन ते उत्कर्ष उतपन्न करते म्हणून उदाहरण. उदाहर- णाथ, “स्वभावतःच मन चंचळ असते? इत्यादी. तसेच 'मदनाचे पाच बाण नियमित आहेत' इत्यादी. “प्रसीदेति इ० तंपूर्ण झोक असा - प्रसीदेति ब्र्यामिदमसति कोपे न घरते करिष्याम्यवं नो पुनरपि भवेद्भ्युपगमः न मे दोबो$्स्तीति त्वमिदमपि च ज्ञास्यसि सषा किमेतस्मिन्‌ वक्त क्षममिति न वेश्षि प्रियतमे ॥ (२.१९). "7 प्रतियुक्ति' म्हणजे केळेल्या तर्काला खोडून काढणारी युक्ती. - 'युक्तिः' हे मुखतंधीतील पाचवे अंग. ते ह्या रूपाहून मित्न आहे. -'तत्राबिशेषप्रतिपत्तिः ही “तत्र विशेष ची दुरुस्ती आहे. विशेषप्रतिपत्तीचा अभिप्रेत अर्थाच्या विरुद्ध अर्थ होतो. - "उपचारात ह्या संव्यडभतही विशेष प्रतीती होत नाही, हे साम्य. 'उत्कर्षमाहरति ही उदाहरण शब्दाची व्युत्पत्ती. - 'मनः प्रकुत्येव इ०? संपूर्ण शोक असा - मनः प्रकृत्येव चलं दुलेक््यी च तथापि मे । कामेनेतत्कथं विद्ध॑ समं सर्वैः शिलीमुखैः ॥ (३.२). - 'बाणाः पश्च इ०' संपूर्ण क्होक असा - बाणाः पश्च मनोभवस्य नियतास्तेषामसंख्यो जनः प्रायोःस्मद्विध एव लक्ष्य इति यल्लोके प्रसिद्धि गतम्‌ । दृष्ठं तत्त्वयि विप्रतीपमधुना यस्मादसंख्येरयं विद्धः कामिजनः शारेरदारणो नीतस्त्बया पन्चवताम्‌ ॥ (३.३). भावतत्वोपलाब्धस्तु क्रम इत्यभिधीयते । च १ . $$ परिकी तिं सामदानादिसंपत्न: संग्रहः तः ॥ ७९ ॥ भावनांच्या खऱ्या प्रकटीकरणाळा क्रम असे म्हणतात. साम, दान इत्यादी उपा- यांनी युक्त तो संग्रह असे म्हणतात. १ नि -दानाथंसंयुक्तः, घो -दानार्थसंयोग:. २५९ | नाट्यशास्त्र भावतत्त्वोपलञ्विस्तु करम इति । भावस्य भाव्यमानस्य वस्तुनो भावना- तिशये सत्यूहं प्रते भावनादिबळात्‌ या परमार्थोपलब्धिः सा क्रमः । बुद्धि तत्र क्रमते न प्रतिहन्यते । यथा “हिया सवंस्यासो हरति विदितास्मीते वदनम! इत्यादि । सामदानादिसंपन्नः संग्रह इति । साम्ना संकेतादिवार्ताः श्रुत्वा कटकस्य दानम्‌ । एवमन्यदपि । “भावतत्त्वोपलब्धिस्तु क्रमः' इत्यादी. भावाची म्हणजे जिची कल्पना करावया'ची त्या वस्तूची, तके करण्याच्या कामी कल्पनाशक्ती प्रखर झाळी असता, भावना आदीच्या जोरदारपणामुळे - जी खऱ्या गोष्टींची जाणीव तिळा क्रम म्हणतात. कारण, त्या ठीकाणी बुद्धी चालते, कुंठित होत नाही. उदाहरणाथ, यांना माहीत झाळे आहे असे वाटून ती लज्जेने आपले तोंड सर्वांच्या कडून दुसरीकडे वळविते? इत्यादी. 'सामदानादिसंपनत्नः संग्रहः' इत्यादी. सामोपचाराने संकेत आदींची बातमी ऐकल्यानंतर राजाने विदूषकाळा केळेळे कड्याचे दान. याप्रमाणे इतरही. 'या? हस्तलिखितात 'या? च्या ऐवजी “स्यात? आहे. मुद्रितात 'स्यात्‌ या? असे दोन्ही शब्द आहेत. 'स्यात असंभाव्य आहे. मूळ 'या' चा तो अपभ्रंश आहे हे उघड आहे. - “हिया इ०? संपूर्ण छोक असा - हिया सवेस्यासो हरति बविदितास्मीति वदनं इयोदेष्ठाळापं कलयति कथामात्मविषयाम्‌। सखीषु स्मेरासु प्रकटयति वेलक्ष्यमधिकं प्रिया प्रायेणास्ते हृदयनिहितातडूविधरा ॥ (३.४). रूपानुरूपषगमनमनुमानमिति स्मृतम्‌ । तिहर्षोर च रतिहर्षोत्सवानां तु प्रार्थना प्राथना भवेत्‌ ॥ ८० ॥ एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूचे होणारे ज्ञान ते अनुमान असे म्हटले आहे. रती, हषे आणि उत्सव यांच्याविषयीची अभ्य्थना म्हणजे प्रार्थना होय. रूपानुरूपगमनार्माते । रूप्यमाणेन प्रत्यक्षाद्यपपळभ्यमानेन रूपस्य व्याप- कस्याविनाभाविनो गमनं ज्ञानम्‌ अनुमानं निश्चवयत्वादूहः उपायः, युक्तेरन्यत्वात्‌ । १ नि -त्सवार्थानां, धो -त्सवाद्यर्थ-. १९.८० २११७ यथा “पालीयं चम्पकानाम? इत्यादि । अत्र 'आप्रायाप्राय गन्यं विविधमधि- गतेः पादपेरवमस्मिन' इति गन्थानीति कुसुमानि तेभ्यः पादपाः तेभ्यो5पि ))___/3. 8) मागांभिव्यक्तिरिति राज्ञा विदूपकस्योक्तेः । रतिहर्षोत्सवानां तु प्रार्थना प्राथनेति । एतत्साध्यफळोचितभावलक्षणम्‌ । तत्र साध्यफले यः प्राधान्येन समुवितो भावस्तद्रिबया या प्रकर्षेणाथेना सा प्राथनारूपमड्‌गम्‌ । यथा संकेतस्थः प्रतिपालयन्‌ राजा - तीव्रः स्मरसंतापो न तथादो बाधते यथासक्षे । तपाति प्राव्रषि नितरामभ्यणंजळागमो दिवसः ॥ (३.१०). “*रूपानुरूपगमनम? इत्यादी. रूपित केल्या जाणाऱ्या म्हणजे प्रत्यक्ष आदींनी ज्ञात होणाऱ्या अशा वस्तूने दुसर्‍या ख्साचे म्हणजे त्याशिवाय नसणाऱ्या अशा व्याप्तिसंबद्ध वस्तूचे गमन म्हणजे ज्ञान ते अनुमान, निश्चित असल्यामुळे तर्काच्या स्वरूपाचा उपाय, युक्‍तीहून मिन्न असतो म्हणून. उदाहरणाथे, 'ही चंपकदृक्षांची रांग' इत्यादी. यात 'याप्रमाणे ह्या उद्यानात विविध प्रकारचा वास घेत घेत ओळखल्या जाणाऱ्या वृक्षांमुळे' वास म्हणजे कुसुम, त्यांच्यापासून ब्रक्ष आणि त्यांपासून मार्गाची अमिव्यक्ती होते असे राजाने विदूषकाला सांगितळे आहे. 'रतिहर्षोत्सवानां तु प्रार्थना प्रार्थना' इत्यादी. हे साध्य करावयाच्या फळाला उचित अशा भावा'चे लक्षण आहे. त्यात साध्यफलाविषयी मुख्यत्वेकरून उच्िति असा जो भाव त्यासंबंधीची प्रकषयुक्त अर्थना म्हणजे प्राथना नावाचे अंग. उदाहरणाथ, संकेतस्थानी वाट पहात असलेल्या राजांचे वचन 'तीव्र असा मदनाचा ताप प्रारंभी तितका त्रास देत नाही जितका समागम संनिध आला असता तो देतो. वर्षाक्रतून पाऊस जवळ आला असता दिवस अधिकच तापदायक होतो.' "ब्यापकस्य' यात नैयायिकांच्या व्याप्तीतील व्याप्यव्यापकरूप संबंधाचा निटेंश अभिंप्रत आहे. “अविनाभाव? हे ह्या संबंधाचे लक्षण आहे. - 'निश््वयत्वात? मुद्रित पाठ "निश््वयात्मकत्वात? आहे. मूळ पाठ *निस्तितत्वात? असाही असण्याचा संमव आह. -.'उपायः युक्ते ही 'उपायायुक्ते' ची दुरुस्ती आहे. असा समास असंभाव्य आहे. येथे असा आदाय दिसतो की अनुमान म्हणजे ऊह हा उपाय म्हणून योजला जातो, वर सांगितलेल्या युक्ति ह्या अंगाची तशी योजना होत नाही, हा त्या दोहोंतील फरक. - 'पालीयं? तंपूर्ण कोक याप्रमाणे - पालीयं चम्पकानां नियतमयमसो सुन्दरः सिन्दुवारः सान्द्रा वीथी तथेयं बकुलविटपिनां पाटलापझ्िरेषा | आघ्रायाघ्राय गन्थं विविधमधिगतेः पादपेरेवमस्मिन्‌ व्यक्ति पन्थाः प्रयाति द्विगुणतरतमोनिहुतो5प्येष चिहेः॥ (२.८). बजट नाट्यशास्त्र (ह “गन्धानीति, ही 'गन्धानि' ची दुरुस्ती आहे. संपादकांनी 'गन्धात्‌ (१) अशी प्रश्नयुक्त दुरुस्ती सुचविली आहे. त्याचा गन्थाबरून कुसुमांचे अनुमान केळे आहे असा अर्थ होतो. पण ह्या कोोकात एकच अनुमान - गन्धावरून पादपांचे - असमिप्रेत आहे असे अभिनय रुप्ताचेही मत दिसते. गन्थावरून कुसुमांचे अनुमान रछोकात नाही. तेव्हा गन्थ हे कुसुमाचे उपल्क्षण मानून 'गन्थाने इति कुसुमानि” असे त्याने म्हटळे असल्याचा अधिक तंभव आहे. - 'भार्गामिव्यक्तिः! ही हस्तठिखितातील 'मार्गमचुदिवेष्ट्म? या पाठाची सुचविलेली दुरुस्ती आहे. कोकातीळ 'व्यक्ति पन्था: प्रयाति? या शब्दांच्या अनुरोधाने ती सुचविली आहे. मुद्रित पाठ “मार्गमनुमापितम्‌' असा आहे. पण मार्गे शब्द पुढ्लिंगी आहे. शिवाय, मार्गाचे अनुमान केळे आहे असे म्हणणे शक्‍य नाही. पादप आणि मार्ग यात अविनाभाव अथवा व्याप्ति नाही. “भावस्तद्विषया? मुद्रितातील “भावस्थद्विबया* हा मुद्रणदोष आहे. - 'प्रकषेणार्थना' ही प्रार्थना शब्दाची फोड असल्यामुळे मुद्रितातील 'प्रकर्षेणान्यर्थना' अस्वीकार्थ आहे. -- 'यथादो? मुद्वेतातील 'यदादौ” सुद्रणदोष असावा. - 'नितराम? “हि तराम्‌? असा मुळातील पाठ बरोबर नाही. गभस्योड्वेद्न यत्साक्षिप्तिरित्यभिधीयते । संरम्भवचनं चेघ तोटकं त्विति संज्षितम्‌ ॥ ८१ ॥ गुप्त असलेल्या गोष्टींचा ज्ञो परिस्फोट त्याला आक्षिप्रि असे म्हणतात. आवेगयुक्त असे जे वचन त्याला तोटक अशी संज्ञा आहे. गर्भस्योद्वेदनमाक्षिभिरिति । हृदयान्तःस्थितस्य पुनः प्रतिष्ठापितस्यापि यत्कुर्ताश्वन्निमित्तादुद्धेदनम अनपद्ठवनीया स्फुटतापत्तिः सा आक्षिप्तिः, अभि- प्रायस्य हि तत्राक्षेपो बहिःकर्षणम्‌ । वासवदत्तायामेव सागरिकेति राज्ञा विदूषकेण च ग्ृह्ीतायां तदुक्तिषु “सागरिके, शीतांधुमुखमुत्पळे तव हश इत्यादिषु । संरम्भवचनं चेव तोटकमिति । आवेगगर्भ यद्दचनं तत्तोटकम्‌ । स चावेगो हषात्‌ क्रोधादन्यतो5पि वा भावी निर्गतो. हृद्यतो ततस्तोटकम्‌ । यथा विदूषक: - “अज्ञ वि दाव से देवीए णिव्वस्ट्टार वासवदत्तार वअणेहिं कडुइदा कण्णा सुहारवाअदू? इत्यादि । | 'गभस्योद्वेनस्‌ आक्षिप्तिः' इत्यादी. हृदयाच्या आत असलेल्या आणि पुन्हा तेथेच प्रतिष्ठापित केलेल्या गोष्टीचे जे कोणत्या तरी निमित्ताने उद्भेदन म्हणजे लपविता न १ नि यत्स्यात्‌ क्षिप्त- घो यत्तु तदाक्षिप्तमिति स्मृतमू- २ नि -वचनतप्रायं. १ ट्‌ ब ट्‌ 4 र "५९ येण्यासारखा गुह्यस्फोट तो आक्षिप्ति. उदाहरणार्थ, वासवदत्तेळाच सागरिका असे राजा आणि विदूषक समजतात तेव्हाचे 'सागरिके, तुझे मुख प्रत्यक्ष चन्द्रच आहे, तुझे नेत्र उत्पळ आहेत' इत्यादी राजाचे उद्गार. “सुरम्मवचनं चैव तोटकम! इत्यादी. आवेगयुक्त जे वचन ते तोटक. आणि तो आवेग हर्षामुळे, क्रोधासुळे अथवा . दुसऱ्याही कारणामुळे होणारा हृदयातून बाहेर येतो म्हणून हे तोटक. उदाहरणाथ, विदूषकाचे वचन 'नेहमी रागावणाऱ्या वासवदत्ता राणीच्या शब्दांनी कडू झालेल्या ह्याच्या कानांना तुझ्या मधुर वचनांनी सुख दे.' हृदयान्तःस्थितस्य* ही मुळातील “-स्थितंः ची संपादकांनी सुचबिलेळी दुरुस्ती आवश्यक आहे. :- 'पुनः शाब्दाचे प्रयोजन स्पष्ट नाही. त्याऐवजी 'तत्रः शब्द अधिक अर्थवाही झाला असता. - 'यतू” च्या जागी मुद्रित पाठ 'यतः' आहे. पण तो समर्पक नाही. 'यत्‌ उद्भेदनं सा आक्षिप्ति? असे छोकातच आहे, तसेच “अनपद्दवनीया” नंतर मुद्रितात असलेला 'या? शब्द आवश्‍यक नाही. - 'शीतांशर्मखम संपूर्ण छोक असा - शीतांद्युमुखमुत्पले तब दशो पद्मानुकारौ करो रम्भाग्भनिभे तवोर्युगळं बाहू सणालोपमो । इत्याहादकराखिलाझि रमसाजन्निःदाहइ्कमालिड्ग्य मा- मज्ञानि त्वमनदुतापबिधुराण्येह्येहि निर्वापय (३.११). “भावी निगतो ह्ृदयतो' ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “भाविनि यतो हृद- यतो हृद्य असा भ्रष्ट ब अंशतः द्विरुक्त पाठ आहे. मुद्रित पाठ “मिनत्ति यतो हृदय असा आहे. हे तोटकाचे वर्णन होईल. पण आवेंगाचे हृदयातून बाहेर पडणारा या तर्‍हेचे वर्णन करण्याचा उद्देश अधिक संभाव्य आहे. कपटेनातिसंधारन ब्रुवतेडधिबलं बुधा: । भयं नृपारिद्स्यूत्थमु्धेगः परिकीर्तितः || ८२ ॥ कपटाने केलेल्या फसवणुकीळा बुद्धिमान लोक अधिबळ म्हणतात, राजा, रत्रू, चोर इत्यादींपासून उत्पन्न होणाऱ्या भीतीला उद्वेग म्हणतात. | कपटेनातिसंघानमाधिबळमिति । परस्परं वश्चनप्रव्त्तयोर्यस्येवाधिकं सहायबुद्धयादीन्यवलम्बर्याते स एव तमतिसंघातु वश्वयितुं समथ इति तदिदं कर्माधिबळम्‌ । यथा सागरिकावेषं धारयन्ती वासवदत्ता विदूषकबुद्धिदोबेल्या- द्राजानमतिसंधत्ते । ' किं पद्मस्य रुचं न हन्ति! इत्यादि-छोकान्तमधिबलम्‌ । १ का ज्ञेयं त्वघिबलं बुंधे: २६० नाट्यशास्त्र भयं नृपारिदस्यूत्थमुद्वेग इति । अरिदाब्दान्नायिकादि । यथा राजा - 'कथं देवी वासवदत्ता । वयस्य, किमेतत्‌ । ' विदूषकः - 'ण॑ अम्हाणं जीविदसंसझो? इत्यादि । | 'कपटेनातिसंधानमधिबळम' इत्यादी. एकमेकास फसविण्यास प्रवृत्त झालेल्या दोघां- पेकी ज्याचे वागणे सहायक, बुद्धी आदींचा अवलंब करते तोच त्या दुसर्‍याचे अति- संधान करण्यास म्हणजे फसवणूक करण्यास समर्थ होतो; त्याचे हे वागणे म्हणजे अधिबळ उदाहरणाथ, सागरिकेच्या वेषात असलेळी वासवदत्ता विदूषका'च्या बुद्धीच्या दुबेलतेमुळे राजाला फसविते. 'पद्माची शोभा नष्ट करीत नाही काय? इत्यादी शहोकाच्या अंतापर्यंत अधिबल. | “भयं नृपारिदस्यूत्थमुद्वेगः' इत्यादी. अरिशब्दाने नायिका आदींचा बोध होतो. उदाहरणाथ, राजा "काय ? देवी वासबदः्ता? मित्रा, हे काय? विदूषक “आपल्या जीविता- विषयी संशय, दुसरे काय ८ | | 'वञ्ञनप्रदरत्तयोः' ही मुळातील “बचनप्रवृत्तयोः' ची दुरुस्ती आहे. प्रस्तुत संदर्भात 'बज्चषन? च योग्य यात शंका नाही. - 'अधिकं' याचे विशेष्य 'कमे? हे आहे. - 'किं पझस्य इ०! हा संपूर्ण कछोक बर ३८ व्या ळछोकावरील टीपेत दिला आहे. | “नायिकादि' मुद्रितातील “नाचिकादि' हा मुद्रणदोष आहे. शडून भयत्रासकृतो विद्रवः समुदाहतः । दोषप्रख्यापनं यत्त सोड्पबाद इति स्मतः ॥ ८३॥ भय व त्रास उत्पन्न करणाऱ्या वस्तूविषयी रांकेळा विद्रव म्हटले आहे. दोषाचे जे प्रख्यापन त्याला अपवाद असं म्हणतात. राहा भयत्रासकृतो विठ्रव इति । भयत्रासकारिणो वस्तुनो या शाडू यदाशक्षूनं स विद्रवः, विद्रवाति विठीयते हृदयं येनेनि । यथा - 'प्रिया मुश्चत्यद्य ध्रुवमलहना जीवितमसौो प्रकृष्टस्य प्रेमण: स्खलितमविषह्यं हि भवति ॥' (३.१५) इति । अन्ये तु शाड्डराभयत्रासेः कृतो यः स विद्रव इति । तत्र च विशेष्यपदमन्वेष्यम्‌ । समुदाय एव विशेष्य इति श्रीशछ्ठुकः, उदाहराति च कृत्यारावणे षष्ठे$डरे गर्भ- संधी नेपथ्ये - 'हा अय्यउत्त, परित्ताआहि । प्रतीहारी श्रुत्वा आत्मगतम्‌ - 'अंहो १ नि नृपाग्निभयसंयुक्तः संभवो विद्ववः स्मृतः. १९.८२ २६१ भट्टिणी विअ आक्कंददि । प्रकाशम्‌ “भवदो अन्तेउरे महन्दो कलकलो सुणीअदि ॥ राजा - “ज्ञायतां किमेतादेति । अत्र रावणस्यादाळू प्रतीहार्या- स्त्रासभये । अथावमशेसंधावडुननां लक्षणमाह । दोषप्रख्यापनं यत्तु सो5पवाद इति । यथा सागरिकोक्तेरनन्तरं राजा 'आयथे मिथ्यावादिनी खल्वसि । श्वासोत्कस्पानि कस्पितं स्तनयुगे मोने प्रियं भाषितं वक्‍्त्रे$स्याः कुटिळीकूतभश्राणे रुषा यातं मया पादयोः । इत्थं नः सहजाभिजात्यजनिता सेवैव देव्याः पुर प्रेमाबद्धविवार्थिताधिकरसा प्रीतिस्तु या सा त्वयि ॥ (३.१८) इति । अन्न देवीगुणानां सातिशायकोपनत्वेनापवादनं कृतम्‌ । शाडू भयत्रासक्षतो विद्ववः इत्यादी. भय आणि त्रास उत्पन्न करणाऱ्या गोष्टींची जी शंका म्हणजे मनात शांका उत्पन्न होणे तो विद्रव; त्याने हृदय द्रव पावते म्हणजे विलय पावते म्हणून. उदाहरणार्थ, “सहन करण्यास असमर्थ असलेली माझी ती प्रिया आज निश्चित जीव देईल. कारण, प्रक्षष्ट प्रेमाचा भंग असह्यच होतो. परंतु दुसरे टीकाकार शंका, भय आणि त्रास यांनी केलेला तो विद्रव अशी व्याख्या करतात. त्या व्याख्येप्रमाणे विशष्य काय ते अस्फुट आहे. श्रीशक्ककाच्या मते तिन्हींचा समुदाय हेच विशेष्य त्याने कत्यारावण नाटकातील सहाव्या अंकामधीळ गभसंधीतून पुढीळ उदाहरण दिले आहे नंपथ्यात 'आयेपुत्न, वाचवा वा'चवा !' एंकून प्रतीहारी स्वतःशी म्हणते 'हा ! देवी आक्रोरा करते आहे असे वाटते' आणि मग उघड म्हणते आपल्या अन्तःपुरात मोठी गडबड चाललेली ऐकावयास येते.' राजा पाहून ये काय चालले आहे ते.' या ठिकाणी रावणाची आशंका आणि प्रतीहारीचे भय आणि त्रास ही व्यक्त झाली आहेत. आता अक्‍वमर्शसंधीतीळ अंगांचे लक्षण सांगतात. 'दोषप्रख्यापनं यत्तु सोडपवादः:' इत्यादी. उदाहरणार्थ, सागरिकेच्या उद्गारानंतर राजाचे वचन - 'अग, तुझे हे बोलणे खरे नाही. तिचा उरोभाग श्वासाने वरखाली होऊ लागला म्हणजे मी कापू लागतो, तिने मौन धारण केले की मी प्रिय असे बोलतो, रागाने तिच्या मुखावरील भुवया वक्र झाल्या की मी तिच्या पाया पडतो, याप्रमाणे उपजत असलेल्या खानदानीमुळे आचरणात येणारी ही देवीच्या बाबतीत माझी केवळ सेवा होय. परंतु प्रेमामुळे दृढ होऊन वृद्धिंगत झालेल्या रसातिशयाने युक्त अशी जी प्रीती ती तुझ्यावरच आहे.' या ठिकाणी देवीच्या गुणांना अतिशय रागिटपणामुळे दोषरूम ठरविले आहे. २६२ नाट्यशास्त्र 'प्रिया इ०' ह्या छोकाचा पूर्वाधे पुढील्परमाणे आहे - समारूढा प्रीतिः प्रणयबहुमानादनुदिनं व्यळीक वीक्ष्येदं छतमकृतपूर्व खळु मया । - समुदाय:' म्हणजे शाळा, भय आणि त्रास यांचा समुदाय. 'सागरिकोक्तेः' सागरिकेचे वचन पुढीलप्रमाणे - कशाला उगीच खोटे दाक्षिण्य दाखविता ? आणि प्राणाहून प्रिय असलेल्या देवीच्या दृष्टीने स्वतःला अपराधी बनवून घेता ?? रोषग्रथितवाक्यं तु संफेटः परिकीर्तितः । | गुरुव्यतिक्रमो यस्तु स द्रवः परिकीर्तितः || ८४ ।॥ रोषयुक्त वचनाला संफेट असे म्हणतात. गुरुजनांची जी अवक्षा तिला द्रव असे म्हणतात. रोषग्रथितवाक्यं तु संफेट इति । केचित्तु स्फेट अनादर इति धातु मनसि- कृत्य संस्फेट इति पठान्ते । यथा वासवदत्ता सरोषं सहसोपसृत्य - 'अय्यउत्त, जुत्त॑ णेद्‌ं सरिसं णेदं' इत्यादि । गुरुव्यातिक्रमो यस्तु स द्रव इति । यथा भर्तसंनिधाने5पि विदूषकस्य सागरिकायाश्व वासवदत्तया बन्धनम॒। यथा वा तापसवत्सराजे षष्ठे$्ड वासवदत्ताया योंगन्धरायणवचनातिक्रमेण मरणाध्यवसायः । द्रवणं चलनं मार्गा- दिति द्रवः । | 'रोषग्रथितवाक्‍्यं तु संफेट:! इत्यादी, परंतु काही टीकाकार अनादर या अर्थी असलेला स्फेट धातू मनात धरून संस्फेट असा पाठ स्वीकारतात. उदाहरणाथ, वासवदत्ता रागाने एकदम पुढे होऊन म्हणते - 'आर्यपुत्र, हे योग्य आहे! हे उचित आहे !' इत्यादी. 'युरुव्यतिक्रमो यस्तु स द्रवः' इत्यादी. उदाहरणार्थ, पति संनिध असताही वासव- दत्तेने केळेळे विदूषक आणि सागरिका यांचे बंधन. किंवा तापसवत्सराज नाटकातील सहाव्या अंकात यौगन्धरायणा'च्या वचना'चा अव्हेर करून वासवदस्तेने केलेळा मरणाचा निर्धार. द्रवण म्हणजे उचित मार्गापासून 'चल्ति होणे, म्हणून ह्याला द्रव म्हणतात, १ नि घो विज्ञेयोडमिद्रवस्तु सः. १९.८५ २६३ 'स्फेट अनादरे” हस्तलिखितातील या ठिकाणचे पाठ बरेच भ्रष्ट आहित. धातूचे 'स्फेट? असे रूप तेथे आढळते, पण त्यापासून निष्पन्न झालेल्या शब्दाचे रूप “फेल असे दिले आहे. तसेच त्यापूर्वी “बातुमन्नसत्कृत्य” हा अक्षरसमुच्चय आहे. मुद्रितात “संस्फोट अनादर इति धातु मनस्कृत्य संस्फोट' असे आहे. संस्फोट असे ह्या अंगाचे नाव असंभाव्य नाही. विरोधिप्रशमो येश्व सा शक्तिः परिकीर्तिता । व्यवसायश्व विज्ञेयः प्रतिज्ञाह्तुसंभवः ।॥। ८५ ॥ विरोध करणाऱ्याला शांत केळे जाते त्याला शक्ति असे म्हणतात. आणि प्रतिक्ञात वस्तूच्या प्राप्तीचा संभव तो व्यवसाय असे जाणावे. विरोधिप्रशसः श£क्तिरिते । विरोधिनः कुपितस्य प्रहामः प्रसादनं दाक्तिः बुद्धिविभवादिशक्तिकायत्वात्‌ । यथा - सव्याजेः शपथेः प्रियेण वचसा चित्तानुद्ृत्त्या भरा वेंलक््येण परेण पादपतनेवाक्‍्येः खखीनां मुहुः । प्रत्त्यापत्तिमुपागता न हि तथा देवी रुद्त्या यथा प्रक्षाल्येव त्येव बाष्पसलिळेः कोपो5पनीतः स्वयम ॥ (४.१) इत्यादि । व्यवसायश्चव विज्ञेयः प्रतिज्ञाहेतुसंभव इति । प्रतिज्ञातस्याडरीकृतस्याथस्य हेतवो ये तेषां संभवः प्राभिव्येवसायः । यथा ऐन्द्रजालिकप्रवेशादितो यावत्‌ 'एक्को उण खेळओ अवस्सं पेक्खिदव्वोः इत्यादि । यौगन्धरायणेन यत्कतुम्ली- कृतं तस्येव हेतोः प्रासिः । 'विरोधिप्रशाम: शक्तिः' इत्यादी. विरोध करणाऱ्याचा म्हणजे रागावलेल्याचा प्रशाम म्हणजे प्रसादन करणे ती शक्ति; कारण, बुद्धो, विभव आदी शक्तीचे हे कार्य असते. उदाहरणार्थ, 'मी घेतलेल्या खोट्या शापथांसुळे, माझ्या गोंड बोलण्याने, तिच्या मनासारखे नेहमी वागण्याने, खूप खिन्नता दाखविण्याने, पाया पडण्याने, किंवा तिच्या सखींच्या सततच्या अनुनयवाक्‍्यांनी देवी वासवदत्तेचा राग तितका नाहीसा झाळा नाही जितका तो तिनेच स्वतः रडून आसवांच्या पाण्याने जणू काही धुवून घाळविळा आहे' इत्यादी. 'व्यवसायश्व विज्ञेयः प्रतिज्ञाहेतुसंभवः' इत्यादी. ज्याची प्रतिज्ञा केली आहे म्हणजे जे अंगीकृत केळे आहे त्या कार्याचे जे हेतू त्यांचा संभव म्हणजे प्राप्ती तो व्यवसाय. १ नि विरोधप्र- घो विरोधोप- २ नि यस्तु. ३ का -दोषसंभव:. २६४७ | नाट्यशास्त्र उदाहरणार्थ, ऐन्द्रजालिकाच्या प्रवेशापासून ते 'माझा एक खेळ अवश्य पाहिला पाहिजे' इत्यादीपर्यंत. यौगन्धरायणाने जे कार्य अंगीकृत केले होते त्याच्याच हेतूची ही प्राप्ती आहे. “प्राप्तिव्यवसायः' ही मुळातील 'प्राप्तिव्यबसाय:” ची दुरुस्ती आहे. 'प्राप्ति? हा “संमबः:' चा अर्थ आहे. आणि व्यवसायाची व्याख्या केलेली असल्यामुळे “व्यवसाय: असा स्वतंत्र शब्द ळोकानुसार वापरलेला असणार. - 'हेतो? ही 'हेतु” ची दुरुस्ती आहे. संपाद- कांनी 'हेतुः' च्या पुढे कंसात (तस्य) शब्द सुचविला आहे. प्रसज्ञत्ैब विज्ञेयो गुरूणां परिकीत॑नम्‌ । बाकयमाधर्षसंयुक्त दयेतिस्तज्जैरुदाहता ।। ८६ ॥ गुरुजनांचा गौरवयुक्त निदेश तो प्रसद्ठ असे समजावे. निभेत्सना करणाऱ्या वाक्याला तज्ज्ञ लोक द्युति असे म्हणतात. प्रसड्ठुश्वापि विज्ञेयो गुरूणां परिकीतंनमिति । यथा वासवदत्ता - 'उज्ञ- इणीरए आअदो त्ति अत्थि मे तस्सि इन्देआलिए पक्‍्खवादो? इत्यादि । अत्र हि बन्थुकुळादागमो5स्य बहुमानकारणस्‌ । वाक्‍्यमाधषसंयुक्त॑ द्युतिरिते । आधर्षो न्यक्कारः तेन संयुक्तम्‌ । यथा विदूषकः - “आ दासीए उत्त इन्दआलिअ' इत्यादि । 'प्रसड्ठश्वापि विज्ञेयो गुरूणां परिकीर्तनम? इत्यादी. उदाहरणार्थ, वासवदत्ता उज्जयिनीहून आला आहे म्हणून त्या इन्द्रजालिकाविषयी मळा आपुलकी वाटते. या ठिकाणी नातेवाइकांकडून आगमन हे त्याच्याबद्दद वाटणाऱ्या बहुमानाचे कारण आहे वाक्‍यमाधरषसंयुक्त थयुतिः इत्यादी, आधर्ष म्हणजे धिक्कार, त्याने युक्त. उदाहरणार्थ विदूषक “आः रांडलेका ऐन्द्रजालिका' इत्यादी अमिनवरुप्ताचा पाठ 'प्रसद्भूश्वापिर होता असे दिसते. - पुढे छोक ९२ मध्ये दयुति हेच नाव असलेल्या निर्वहणसंधीतीळ एका अंगाचे वर्णन आहे. दोहोंचे स्वरूप सर्वस्वी भिन्न आहे. अशी शक्‍यता आहे की या ठिकाणी धृति किंवा द्रति असे मूळ नाव होते. १ नि -माधर्षणकृतं. २ घो दरुति- १९.८७ २६५ मनश्रेष्टाबिनिष्पन्न: श्रमः खेद उदाहूतः । ईप्सिताथंप्रतीघातः प्रेतिषेधः प्रकीर्तितः ॥ ८७ ॥ मन आणि शारीर यांच्या क्रियांमुळे उत्पन्न झालेल्या श्रमाला खेद म्हणतात. इच्छि- लेल्या कार्यात आलेल्या विघ्नाला प्रतिषध म्हणतात. मनश्वेष्टाविनिष्पन्नः श्रमः खद इति । मानसः कायीयश्चेत्युभयो5पीति यावत्‌ । आद्यो यथा सिंहलेश्वरस्य कुरालप्रश्ने वसुभूतिः निःश्वस्य देव न जाने किं कथयामि' इत्यत आरगभ्य रत्नावल्याः समुद्रपतनाकणंनोदितवासवदत्ता- विट्ममपपर्यन्तस्‌ । शारीरस्तु खेदः पुरूरवाः “अहो श्रान्तो$स्मि, यावदस्या गिरिनद्यास्तीरे' इत्यादि । ७-७) ६02 र यद्यपि श्रमोद्वेगवितर्कळज्ञाप्रथूतयो व्यभिचारिवर्ग पूवमुक्तास्तथापि एते सत्यवसरे5वड्यप्रयोज्याः प्रागुक्तप्रयोजनार्थसिद्धये इति. परथक्‌प्रयोजनत्वात्‌ संध्यद्ठत्वेनोक्ता मन्तव्याः । इप्सिताथंप्रतीघातः प्रतिषेध इति । यथा रत्नावलीव्रत्तान्तवणने ईइंप्सितार्थे बाभ्रव्येण प्रस्तुते तस्य प्रतिघातो५न्तःपुरदाहेन । “मनश्वष्टाविनिष्पनः श्रमः खेदः' इत्यादी. मानसिक आणि शारीरिक दोन्हीही प्रकारचा असा अर्थ. पहिल्याचे उदाहरण सिंहळच्या राजाचे कुदळ विचारले असता वसुभूति निश्वास टाकून 'महाराज, समजत नाही काय सांगावे ते' असे म्हणतो तेथपासून . ५) १ ० रत्नावली समुद्रात पडली हे ऐकल्यामुळे वासवदत्तेने केलेल्या विलापापर्यंत. शारीरिक खेद विक्रमोवशीय नाटकात पुरूर्याचे वचन 'हा! मी दमलो आहे. आता थोडा वेळ ह्या पवेतावरील नदीच्या तीरावर' इत्यादी. श्रम, उद्देग, वितर्क, लज्जा वौरे जरी मागे व्यभिचारिभावांमध्ये निर्दिष्ट केळे असले तरी प्रसंग प्राप्त झाल्यास पूर्वी सांगितलेल्या प्रयोजनांच्या सिद्धीसाठी ह्यांची अवश्य योजना करावयाची असते म्हणून उद्देश निराळा असल्यामुळे संधींची अंगे म्हणून सांगतळी आहेत असे समजावे. . “इप्सिताथप्रतीघात: प्रतिषेंधः! इत्यादी. उदाहरणार्थ, रत्नावलीच्या वृत्तान्ताचे वणणन हे इच्छिलेले कार्य बाभ्नव्याने सुरू केळे असता अन्तःपुरातील अग्नीने त्यात आलेले विष्न. १ नि घो निषधः स तू. २६८६ नाट्यशास्त्र जाने? मुद्रितातील “जाते? हा सुद्रणदोष आहे. - 'पुरूरबा? ही मुळातील 'प्रूरवसार ची सुचविलेली दुरुस्ती आहे. तृतीया विदोष समर्पक नाहीं. आणि पात्रांची वचने उद्धत करताना त्यांचा निदेश प्रथमेत करण्याचा अभिनवगुप्ताचा प्रधात आहे यामिचारिवर्गे पूर्वम? म्हणजे नाट्यशास्त्रातील सातव्या अध्यायात. इंप्सितार्थ” ही मुळातील ।इंप्सितार्थप्रतीधातः (-प्रतीघाते - मुद्रित)? ची दुरुस्ती आहे. प्रतीधात शब्दाची चुकीने द्रिरुक्ती झाली आहे हे उघड आहे. कार्योत्ययोपगमनं विरोधनामिति स्मृतम । बीजकार्योपगमनमादानमिति संब्ञितम्‌ ॥ ८८ || कार्यामध्ये विनाशाची प्राप्ती म्हणजे विरोधन असे म्हटले आहे. बीजाच्या कार्याचे समीप येणे त्याला आदान अशी संज्ञा आहे कायांत्ययोपगमनं निरोधनमिति । यथा राजा - 'कथमन्तःपरे५म्रि: । हा हा धिक्कप्टं दग्धा देवी वासवदत्ता इत्यादि यावत्सागरकोत्सादनपर्यन्तम । अन्न हि कार्ये वासवदत्तायाः सागरिकां प्रति विसम्भस्यात्ययो विनादः उपगत प्राप्त: । बीजकार्योपगमनमादानमिते । बीजफलसमीपताभवनमित्यर्थः । यथा सागारका राजानं दृष्टा स्वगतस्‌ 'अय्यउत्त' इत्यादि । अन्न हि बन्थुकुलादागमो यावद्राज्ञ उक्तिः - व्यक्त लय़ो5पि भवतीं न घक्ष्यति हतादानः । यतः सन्तापमेवायं स्पशस्ते हराते प्रिये ॥ (४.१८) इत्यन्तम । कार्यात्ययोपगमनं निरोधनम! इत्यादी. उदाहरणार्थ, राजा 'काय ? अन्त पुराला आग लागली आहे? हाय ! हृर हर ! देवी वासवदत्ता अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली' येथपासून ते सागरिकेच्या प्रवेशापर्यत. कारण, या ठिकाणी कार्यामध्ये वासवदत्तेच्या सागरिकेविषयीच्या विश्वासाळा अत्यय म्हणजे विनाश उपगत म्हणजे प्राप्त झाळा आहे. 'बीजकार्योपगमनमादानम? इत्यादी. म्हणजे बीजाच्या फळाची प्राप्ती समीप येणे असा अथ. उदाहरणाथ, सागरिका राजाळा पाहून स्वतःशी म्हणते “आर्यपुत्र' इत्यादी १ नि विरोधनं तु संरम्भादुत्तरोत्तरभाषणम्‌. १९.८९ २८६७ या ठिकाणी 'नातेवाइकाकडून आगमन? येथपासून राजाची उक्ती अग्नीने तुला स्पर्श केला असताही तो तुळा जाळणार नाही हे स्पष्ट आहे. कारण, प्रिये, हा तुझा स्पर्शीच ताप दूर करतो' येथपर्यंत आदान आहे. “निरोधनम' असा अभिनवगुप्ताचा पाठ होता, “विरोधनम? नव्हता असे दिसते. - “सागरि- कोत्सादनपर्यन्तम? यातील 'उत्सादन? शब्द अपभ्रष्ट आहि. त्याचा अर्थ 'बिनाश” सुळीच लागू पडण्यासारखा नाही. 'सागरिकादर्शीन” असा मूळ पाठ असण्याची शक्‍यता आहे. अम्नीने वेष्टित अक्षया सागरिकेच्या प्रवेश्यापभतचा माग येथे अभिप्रेत अहि यात शंका नाही. - 'बासवदत्तायाः ही मुळातील “बासबदत्ता? ची दुरुस्ती आहे. षष्ठीचे रूप विरम्मशी अन्बयासाठी आवश्यक आहे. _ “ागरिकां प्रति विसम्मस्य' मुद्रित पाठ 'सागरिकाप्रेमविखम्मस्य' बरोबर नाही हे उघड आहे. सागस्किचे प्रेम अथबा तिच्याबरील प्रेम येथे अप्रस्तुत आहे. तिच्याविषयी वासबदत्तेला जो विश्वास वाटायला लागला होता त्यात व्यत्यय आला आहे असा येथील आराय अहि. - 'विनाशः मुद्रितातील 'विनादम? हा पाठ बरोबर नाही. 'अत्यय- चा अर्थ सांगण्यासाठी हा शब्द वाप- रला आहे. “अजउत्तः सागरिकेचे येथील बचन 'यांना पाहून मला पुन्हा जीविताची अभिलाषा वाढू लागली आहे? अक्या अर्थाचे आहे. - 'बन्धुकुळादागमो? म्हणजे सामान्यतः वासवदः्तेच्या प्रवेशा" पासून. कारण हे तिचे उद्गार आहेत. अपमानकृतं वाक्यं कार्याथं छाढनं भवेत्‌ । प्ररोचना च विज्ञेया 'संहाराथेप्रदर्षिनी ॥ ८९ ॥ कार्याच्या निमित्ताने अपमान करणारे वाक्य ते छादन होय. आणि संहारातील कार्याचे दरीन घडविणारी ती प्ररोचना असे जाणावे, अवमानकृतं वाक्यं छादनमिति । वाक्‍्यमिति तदर्थ लक्ष्यते । करोति- बहुमाने वर्तते । तेन दृष्टो5प्यर्थो$वमानेन बहुमतीकृतः । तदवमानकळज्ञापवा- रणाच्छादनामाति । यथा सागरिका - 'दिषटटिआा पज्ञलिदो भअवं हुदासणो करइस्सदि मे सअलदुक्खावसाणम्‌ । इति । क प्ररोचना च विज्ञेया संहारार्थप्रदर्शिनी इति । संहियमाणस्य निर्वाह्यममाण- स्यार्थस्य दर्रिका प्रकर्षेण रोचत इति प्ररोचना । यथा - १ नि अवमानात्कृतं. २ घो सादनं. ३ नि संभाराथंप्रकाशिनी. २६८ | नाट्यशास्त्र कासी ज्वळन्‌ इतवहस्तदवस्थमेत- दन्तःपुरं कथमवन्तिनृपात्मजेयम्‌ । बाभ्रव्य एष वसुभूतिरयं वयस्यः स्व्भो मतिभ्रमः' इति । “अवमानकृतं वाक्यं छादनम! इत्यादी. वाक्‍य म्हणजे त्याचा अथ निर्दिष्ट होतो. करोति धातूचा बहुमान असा अथे आहे. म्हणून मुळात वाईट असलेली गोष्ट सुद्धा अवमान झालेला असल्यामुळे बहुमानास्पद बनते. त्या अवमानाच्या कलंकाच्या निवारणा- मुळे छादन हे नाव. उदाहरणाथ, सागरिका “बरे झाले. आता हा प्रज्वलित झालेला अग्निदेव माझ्या सव दुःखांचा अंत करीळ.' | “प्रोचना च विक्षेया संहाराथप्रदर्शिनी' इत्यादी. संहार केल्या जाणाऱ्या म्हणजे अंतापर्यंत नेल्या जात असलेल्या गोष्टींचे दर्शन घडविणारी, प्रकर्षाने आवडते म्हणून प्रोचना. उदाहरणार्थ, 'कोठे आहे तो प्रज्वलित झालेला अभ्नि£ हे अंत:पुर पूर्वीच्याच स्थितीत कसे आहे? ही अबन्तीच्या राजाची कन्या वासवदत्ता, हा बाभ्रव्य, हा वसुभूति हा वयस्य. हे स्वप्न आहे, का बुद्धित्रम आहे? “अबमानकृतंः हस्तलिखितात “अवमान? युक्त पाठ आहे. आणि अमिनवगुप्ताचा तोच पाठ असण्याचा संभव आहे. अपमानापेक्षा अवमान दाब्द अधिक समपक बाटतो. उदाहरणातील साग- रिकेचा अपमान नसून अवमान झाला आहे. - 'करोतिबंहुमाने' कृधातूचा हा अप्रसिद्ध अथ आहे. - :दुष्टोडप्यर्थ” आगीसारखी मुळात बाईट असलेली गोष्ट. “स्वप्नो मतिभ्रमः इ०' चतुर्थ चरणाचा हट्टी उपलब्ध असलेला पाठ “स्वप्ने मतिरभ्रमति किं न्विदमिन्द्रजालम्‌ः (४,१९) असा आहे. अमिनवरुप्ताचा पाठ 'स्वप्नो मतिभ्रम इदं नु किमिन्द्र जालम्‌' असा असावा. तो अधिक योग्य वाटतो. युक्तिरित्यन्ये इद्मर्ईु व्यवहरन्ति । अन्रोद्देशक्रमत्यागेन यत्केषांचिदड्डानां लक्षणं तत्क्रमानियमसूचनार्थम्‌ । अनेन पाठविपर्यासेन यत्केश्रिदुद्देशास्यान्य- थापठनं तदूग्रन्थकाराशयापारज्ञानकृुतम्‌ । केचिदत्रान्यतममडुः नाधीयते, दवाद- शाडमेवेतं संघिमाहःः । अन्ये तु त्रयोदशाडठत्वे$प्यस्य निर्वहणसंधावापे प्रशस्तेरितित्रत्तानन्त भूतत्वेन गणनमन्याय्यामिति त्रयोदशाड्भुत्वात्‌ चतुःषट्टिसंख्यां समथेयन्ते । दुसरे टीकाकार ह्या अगांला युक्ति असे नाव देतात. या ठिकाणी उद्देशातीळ क्रमाचा त्याग करून जे काही अंगांचे लक्षण दिले आहे ते क्रमाबद्दद कांही नियम नाही १३.२० | २६९ हे सुचविण्यासाठी. यावरून हे उघड आहे की पाठात फेरबदळ करून उद्देशाविषयक *छोक काहींनी निराळ्या रूपात स्वीकारळे आहेत ते गप्रंथकाराचा आऱाय न समजल्यामुळे. काही टीकाकार कोणते तरी एक अंग वगळतात आणि ह्या अब्रमश॑ संधीत बाराच अंगे आहेत असे प्रतिपादन करतात. परंतु दुसरे काही यात तेरा अंगे आहेत तरी निर्वेहण संधीत सुद्धा शेवटच्या प्रशस्ति अंगाचा इतिवृत्तामध्ये अन्तर्भाव होत नसल्याकारणाने त्याची गणना करणे न्यायाळा सोडून असल्यामुळे तेराच अंगे आहेत असे म्हणून चौसष्ट ह्या संख्येचे समर्थन करतात इदमडु' म्हणजे प्ररोचना ह्या अंगाला काही जण युक्ति असे नाव देतात, - 'उद्देशक्रमत्यागेन प्रत्यक्षात असा क्रमाचा त्याग फक्त एके ठिकाणीच झालेला दिसून येतो. निर्वेहणसंधीतील प्रसाद अंग"उद्देशात आनन्द व समय यांच्या पूर्वी असता त्याचे लक्षण समयाच्या लक्षणानंतर दिले आहे. - “-सूचनार्थम? ही मुळातील “-सूचनार्थ? 'ची दुरुस्ती आहे. - 'प्रशस्तेरितिवृत्तानन्तर्थूतत्वेन' ही दुरुस्ती आहे. मुळात 'प्रसक्तेरितिवृत्तान्तथूतत्वेन' आहे. 'प्रसक्ति? येथे अर्थहीन आहे. आणि सं- दर्मद्ट्या 'अनन्तर्भूत? आवद्यक आहे. चोसष्ट संख्येची ही उपपत्ती पटण्यासारखी आहे. अमि नवगुप्ताने प्रारंमी अवमरशासंधीत बारा अंगे असतात असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात त्याने तेरा अंगांच्या व्याख्या दिल्या आहेत. प्रस्तुत ठिकाणी अवमर्शात बारा अंगे असतात हे मत इतरांचे म्हणून उद्धत केळे आहे. तेव्हा चौसष्ट ह्या संख्येची अमिनवरगुप्ताची स्वतःची काय उपपत्ती आहे ते स्पष्ट होत नाही ह्या छोकानंतर बडोदे प्रतीत पुढील अधिक मजकूर साध्या कंसात आढळतो - प्रत्यक्षवचनं यत्तु स ब्याहार इति स्मृतः ॥ सविच्छेद्‌ं वचो यत्र सा युक्तिरिति संक्षिता । ज्ञेया विचळलना तज्ज्षेरवमानाथंसंयुता ॥ एतान्यवमुशे5झ्ञानि संहारे तु निवोधत । यात निर्दिष्ट असळेली तीन अंगे जमेस धरली तर अमवर्दसंबीत एकूण सोळा अंगे होतील. ते असंमाव्य आहे हे उघड .आहे. यातील पहिल्या दोन अंगांचा निदेश 'व्यबहारश्व युक्तिश्व विमर्श ज्ञान्यमूनि च? ह्या उद्देशातील ६१ व्या छोकात स्वीकारलेल्या बडोदे प्रतीतील पाठातही आहे. तो पाठही उघडच अस्वीकार्य आहे मुखबीजोपगमनं संधिरित्यमिधीयते । कार्यस्यान्वेषणं युक्त्या * निरोध इति कीर्तितः ॥ ९० ।। मुखसंधीतीळ बीजाची प्राप्ती म्हणजे संधि असे म्हणतात. युक्तीने कार्याचा शोध त्याला निरोध असे म्हणतात १ ' का सुख-. २ का विरोध, घो विबोध. २७० . नाट्यशास्त्र अथ निर्वहणसंघावुद्देराक्रमणाईननि लक्षयितु प्रक्रमते | मुखबीजापगमनं संधिरिते । यथा वसुभूतिः - बाभ्रव्य, सुसहशीयं राजपुत्र्याः इत्यादि । मुखे यदुक्त॑ तदिह निकटीभूतं संधानं संघिः । कार्यस्यान्वेषणं युक्त्या निरोध इति । यथा वसुभूतिः - 'कुत इयं कन्यका' इत्यादि । | आता निवेहणसंधीतीळ अंगांची लक्षणे क्रमाने देण्यास प्रारंभ करतात. “मुखबीजोपगमनं संधिः' इत्यादी. उदाहरणार्थ, वसुभूतीचे वचन - “बाभ्रव्य, ही आपल्या राजकन्येसारखीच आहे? इत्यादी. मुखसंधीत जे निर्दिष्ट झालेले असते ते या ठिकाणी जवळ आलेले असते; संधान होते म्हणून संधी हे नाव. 'कार्यस्यान्वेषणं युक्त्या निरोधः' इत्यादी. उदाहरणाथ, वसुभूतीचे वचन - 'ही मुलगी कोठून आली आहे ?' इत्यादी. तुंधान' म्हणजे एकत्र जोडळे जाण्याची क्रिया. उपक्षेपस्तु कायाणां ग्रथनं परिकीर्तितम्‌ । अनुभूतार्थकथनं निर्णयः समुदाहतः ॥ ९१॥ कार्यांच्या उपन्यासाळा प्रथन असे म्हणतात. अनुभवलेल्या गोष्टीच्या कथनाला निणय म्हणतात. उपक्षेपस्तु कार्याणां ग्रथनमिति । अनुभूतार्थकथनं निर्णय इति । प्रमाणसिद्धस्य वस्तुनः कथनमित्यर्थः । उपक्षेपस्तु कार्याणां प्रथनम? इत्यादी. “अनुभूतार्थकथनं निर्णयः' इत्यादी. प्रमाणांनी सिध्द झालेल्या वस्तूचे कथन असा ए अथे. ह्या दोन्ही अंगांची उदाहरणे हस्तलिखितातून गहाळ झालेली दिसतात. अमिनवरयुप्ताने ती दिलीच नसतील असा संभव नाही. उदाहरणांची उणीब संपादकांनी पाठ सुचवून भरून काढली आहे. ग्रथनाचे उदाहरण म्हणून त्यांनी पुढील भाग सुचविला आहे. योगन्धरायणः 'देव, क्षम्यतां यन्मया5निवेद्य कृतम्‌? इत्यादि । आणि त्यावर “अत्र रत्नाबलीलाभरूपकार्यस्योपक्षेपाद्‌ ग्रथ- १ का अनुभूतस्य कथनं. १९.९२ २७१ नम्‌ | अशी टीप जोडली आहे. पण हे उदाहरण विशेष समर्पक वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी को आतापावेतो आणि पुढेही उद्धृत केलेली रत्नावलीतील उदाहरणे नाटकात ज्या क्रमा- नें आढळतात त्याच क्रमाने ती दिलेली दिसून येतात. पण ह्या सुचविलेल्या उदाहरणाचा स्वीकार केल्यात ह्या क्रमाचा भंग होतो. क्रमवार असलेळे उदाहरण पुढीलप्रमाणे सुचविता येण्यासारखे आहे. यथा, वासवदत्ता 'अमच्च, एस क्खु साअरदो पाविदेत्ति मणिझ अमब्चजोअन्धराअणेण मम हत्ये णिक्खित्ता इत्यादि । येथपासून कार्याच्या उपक्षेपात्मक ग्रथनाला प्रारंभ होतो असे म्हणता येईल. निर्णयाचे उदाहरण कंसात दिलेले नसले तरी ते संपादकांनी सुचविलेले आहे यात शंका नाही. ते उदाहरण असे -वसुभूतिः 'अपि रत्नावली, ननु त्वमीदशीमवस्थां प्राप्तासि।' सागरिका (सप्रत्यमिज्ञम्‌) “तुमं पि किं अमच्चबसुथूदी |” वसु० “स एवाहं मन्दभाग्य;' इति-प्रभृति याबद्‌ विदूधेकवाक्यं 'सविहवो होदु” इति। हे उदाहरण संभवनीय नाही यांचे कारण यात अभिनव- गुप्ताने म्हटल्याप्रमाणे प्रमाणांनी सिद्ध वस्तूचे कथन आहे असे म्हणता येण्यासारखे नाही. तसे कथन असलेले उदाहरण पुढीलप्रमाणे सुचविता येईल - वसुभूतिः “बाभ्रव्य, यथा सुसद्शी वसन्त- कस्य कण्ठे रत्नमाला, अस्या अपि सागरात्माप्र्ितिः तथा व्यक्त सिंहलेश्वरदुहिता रत्नावलळीयम ।! निर्णयाचे हे अधिक समर्पक उदाहरण मानता येईल. पारबादकृतं यत्स्यात्तदाहुः परिभाषणम्‌ । लब्धस्यार्थेस्य शमनं दुतिमाचक्षते पुनः । ९२ ॥ निन्दायुक्त जे वचन त्याळा परिभाषण म्हणतात. आणि प्राप्त झालेल्या गोष्टीचें जे स्थिरीकरण त्याला द्युति असे म्हणतात. परिवादकूतं यत्‌ तत्‌ पारिभाषणामेति । यथा सागरिका 'किदापराधा खु अहं देवीर । ता ण सक्‍्कुणोमि मुह दंसेदुं । वासवदत्ता अपवा्य 'अज्ञरत्त, लज्ञामे खु अहं इमिणा णिसंसत्तेण । ता अवणेहि से बैधणं । एतदभयोर- प्यन्योन्यापराधोद्वट्नं वचनम । योगन्थरायणो5पि प्रविश्येंवमेवापराधं स्वमु- दृट्र्‍याति यथा - देव्या मद्ठचनाद्यदाभ्युपगतः पत्युवियोगस्तदा सा चाप्यन्यकलत्रसंघटनया दुःखं मया स्थापिता । इत्यादि । लब्धस्यार्थस्य शमनं द्युतिरिते । सामथ्यांत्‌ प्रशमनीयस्य क्रोधादेरथंस्य प्राप्तस्यापि यत्प्रशमनं सा द्युतिः । “देव, श्रूयताम्‌ । इयं सिंहलेश्वरदहिता सिद्धैरा- १ घो गमनं. २ नि धृति- का थ्यतिरित्यमिधीयते (घो कृति-). २७२ नाट्यशास्त्र दिष्टा! इत्यादि यावद्देन्या उक्तिः 'अय्य, फुडं एव्व किं ण भणासि पडिवांदेहि से रअणावालिं त्ति । | 'परिवादकृतं यत्‌ तत्‌ परिभाषणमर इत्यादी. उदाहरणार्थ, सागरिका 'खरेच मी देवीचा अपराध केला आहे. म्हणून मी तिळा तोंड दाखवू शकत नाही.” वासवदत्ता ( राजास एकीकडे ) 'आयपुत्र, ह्या माझ्या निधणतेची मळा खरोखर लाज वाटते. म्हणून तुम्हीच तिचे बंधन सोडा. दोघींचे परस्परांच्या बाबतीत स्वतःचा अपराध उधड करणारे असे हे क्र्चन आहे. यौगन्वरायण सुद्धा प्रवेश करून याचप्रमाणे आपला अपराध उघड करतो - 'जेव्हा देवीने माझ्या सांगण्यावरून पतीपासून होणाऱ्या वियोगा'चा अंगीकार केळा तेव्हा त्याच्यासाठी दुसऱ्या पत्नीची योजना करून मी तिळा दुसदायक अवस्थेत ठेवले' इत्यादी. "लब्धस्यार्थस्य रामनं युति इत्यादी. शाब्दसामर्थ्यामुळे शमन ज्याचे करावया'चे असते त्या क्रोध आदी गोष्टीचे ती प्राप्त झाळी असताही जे प्रशामन ती द्युति. उदाहरणाथ, वौगन्धरायण 'महाराज, ऐकावे. सिंहलेश्वराच्या ह्या कन्येबद्दळ सिद्धांनी भविष्य केले होते' येथपासून ते देवीच्या “आर्य, स्पष्टच का सांगत नाही की रत्नावली ह्यांना अपण कर ह्या उक्तीपर्यंत. “परिवादकृत इ०' हस्तलितितातून ही अवतरणिका सुद्धा गहाळ झाली आहे. - अपराध स्वम? हस्तलिखितात “स्वमू'च्या जागी 'स्वयम? आहे. पण 'स्वम्‌ः अधिक योग्य आहे. सुद्रितात हा शब्दच नाही. - शोकाचा उत्तराधे पुढीलप्रमाणे आहे - €0-. तस्याः प्रीतिमयं करिष्यति जगत्स्वामित्वलाभः प्रभो: सत्यं दर्शयितुं तथापि वदनं शक्‍नोमि नो लज्जया ॥ (४.२०). “सामर्थ्यात्‌? म्हणजे 'शमन? शाब्द वापरला आहे म्हणून अर्थ 'प्ररामनीय* असाच समजणे उचित आहि. समागमस्तथाथीनामानन्दः परिकीर्तितः । दुःखस्यापगेमो यस्तु सेमयः स निगद्यते ॥ ९२ ॥ इच्छित कार्यांचा लाभ म्हणजे आनन्द असे म्हणतात. दुःख नाहीसे होते त्याला समय असे म्हणतात. १ नि -्स्तु यो्थाना- २ नि गमश्वैव समयो5थ. ३ का स शमः संनिगदते. १९.९४ २७३ समागसस्तथार्थानासानन्द इति । अर्थेतस्य तथेति प्रकारशातेः प्रार्थितस्य सस्यगपुनर्वियोगवद्यदागमनं तदानन्दहेतुत्वादानन्दः । यथा राजा - 'को देव्याः प्रसादं न बहू मन्यते' इत्यादि । दुःखस्यापगसो यस्तु समय इति । अपगमनसपगमः । यथा अय्यउत्त, दूरे खु एदाए णाढिडळं । ता तहा अणुचिठठ जहा बन्थुजणं ण सुसंरेदि । £समागमस्तथार्थानामानन्दः इत्यादी. इच्छित असलेल्या, तथा म्हणजे शेकडो प्रका- रांनी, अमिळबित असलेल्या वस्तूचे जे सम्यक्‌ म्हणजे पुन्हा वियोग होणार नाही अशा तऱ्हेचे आगमन ते आनन्दाचे कारण असल्यामुळे आनन्द नावाचे अंग. उदाहरणाथ, राजा :देवीच्या प्रसादोबद्दद कोणाला बहुमान वाटणार नाही £ इत्यादी. “दुःखस्यापगमो यस्तु समयः! इत्यादी. अपगम म्हणजे दूर होणे. उदाहरणाथ, वासवदत्ता “आर्यपुत्र, हिचे नातेवाईक फार दूर आहेत. तेव्हा असे वागा की तिळा आपल्या बन्धुजनाची आठवण होणार नाही' इत्यादी, “प्रकारशतेः? हा झोकातीळ “तथा' शब्दाचा अर्थ, आणि 'सम्यगू आगमन? ही 'समागम' शब्दाची फोड असून 'सम्यकूर चा अर्थ “अपुनर्वियोगवत? असा दिला आहे. शुश्रषाद्युपसंपत्नः प्रसाद! प्रीतिरुच्यते । अद्भतस्थ तु संप्राप्तिरुपगूहूनसिष्यते ।॥ ९४ ॥ शुश्रूषा आदींनी युक्त अशा प्रीतीला प्रसाद म्हणतात. आणि अद्भृताची प्राप्ती म्हणजे उपगूहन असे म्हणतात. | शुभ्रुषाद्युप स्ंपन्नः प्रसाद इति । यथा वासवदत्ता - 'एत्तिअं वि दाव मम बहिणिआगुरूवं होदु' इति स्वैराभरणैरळंकरोति । इति । केचिद्‌ दुतेरनन्तरमिद- मडुं पठन्ति । अड्भूतस्य तु संप्राप्तिरपगूहनमिति । यथा विदूषकः - 'ही ही भो कहं कहे संपुण्णमणोरहा संवुत्त म्ह' इत्युत्थाय नृत्यति । “झुश्रब्रायुपसंपन्नः प्रसादः' इत्यादी. उदाहरणाथ, वासवदत्ता 'हे इतके माझ्या बहिणीळा अनुरूप असे होऊ दे' असे म्हणून स्वतःचे अळंकार तिळा घालते. काही टीकाकार हे अंग 'द्युति' नंतर घालतात. १ का प्रसाद इत्ति भण्यते. २ निच. ३ नि -भवेत्तदुपगृहनम्‌. ०२७९४७ नाट्यशास्त्र “अद्भृतस्य तु संप्राततिरुपगूहनम? इत्यादी. उदाहरणार्थ, विदूषक “अहा! आता आमचे मनोरथ पूर्ण झाले आहेत' असे म्हणून उभा राहून नाचू लागतो, टर क केचित्‌ इ०? वर उद्देशळोोकात द्युतिनंतरच प्रसादाचा निर्देश आहे. त्या छोकातील अमि- नवगुत्ताचा स्वतःचा मिन्न पाठ कसा होता हे समजण्यास मार्ग नाही. सामदानादिसंपत्न भाषणं संमुदाहूतम्‌ । पूर्ववाक्यं तु बिज्ञेयं येथोक्तार्थप्रद्शेनम्‌ ॥ ९५ ॥ साम, दान आदींनी संपन्न वाक्याळा भाषण असे म्हणतात. जसे म्हटले होते तसे कार्याचे द्रीन म्हणजे पूर्ववाक्य असे जाणावे. ७ > सामदानादिसंपत्ने भाषणामेति । यद्यपि गर्भे$पि संग्रहाख्यमिदमुक्त॑ तथा- प्यत्र स्थाने$वश्यं प्रयोक्तव्यतां ख्यापयितुं पुनरुपादानं शब्दान्तरोण च । यथा वसुभूतिः - 'देवि, स्थाने देवीशब्दसुद्धहसिः इति साम । दानं तु यथा भगवती जीमूतवाहनाय वरं ददाति - त्वां विद्याधरचक्रवर्तिनमहं प्रीत्या करोमि क्षणात' इति । अन्ये मन्यन्ते आदिशाब्देन भेददण्डादेरुपायान्तरस्य संग्राह्यमत्वम्‌ । तस्य त्वेह स्थाने स्पष्टन पथानौचित्यम्‌। गर्भसंध्युक्तसामाद्युपायानुवदनमात्रमत्र यत्क्रियते इत्थमिदे प्राप्तमित्येवंप्रायं तदि्द भाषणाख्यसडुनमेति । पूर्ववाक्यं यथोक्तार्थप्रकाशनामाति । यथा बाभ्रव्य: - 'इदानीं सफल- परिश्रमो5स्मि संपन्न” इति । “सामदानादिंसंपत्न॑ भाषणम्‌' इत्यादी. जरी गभसंधीमध्ये संग्रह नावाने ह्याचाच निदेंदा केळा आहे तरीही ह्या ठिकाणी त्याचा अवश्य प्रयोग करावयाचा असतो हे सांग- ण्यासाठी पुन्हा एकदा आणि निराळ्या राब्दांत त्याचा निदेश केला आहे. उदाहरणाथे, वसुभूति 'देवि, तुळा देवी असे म्हणतात ते सार्थच आहे.' हे सामाचे उदाहरण. दाना'चे उदाहरण नागानन्द नाटकात गौरी जीमूतवाहनाला वर देते श्रसनन होऊन मी तुला या क्षणी विद्याधरांचा चक्रवर्ती करते.' दुसरे टीकाकार “आदि? शब्दाने भेद, दण्ड आदी अन्य उपायांचा सुद्धा समावेश होतो असे मानतात. परंतु द्या ठिकाणी ते उघडपणेच अनुचित आहेत. गर्मसंधीमध्ये सांगितलेल्या साम आदी उपायांचा जो येथे केवळ अनुवाद केळा आहे - हे अशा प्रकारे प्राप्त झाळे आहे अशाच स्वरूपाचा मुख्यतः - ते हे भाषण नावाचे अंग. १ का तूच्यते बुधेः २ नि यथार्थोक्तार्थदर्शनम्‌, का .यथोक्ताथेप्रदर्शकम्‌. १९.९६ २७११ 'पूर्ववाक्यं यथोक्तार्थप्रकारनम? इत्यादी. उदाहरणार्थ, बाभ्रव्य 'आता माझ्या परिश्रमाचे सार्थक झाले.' धर्भेडपि' ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'गर्मोप” असे याचे भ्रष्ट रूप आहे. मुद्रितातील “तदार्थे पि? ला काहीच अर्थ नाही. वर ७९ व्या छोकात गमसंध्रीतील संग्रह्माची व्याख्या अशाच प्रकारे केली आहे. - 'शाब्दान्तरेण? वस्तुतः दोन्ही ठिकाणी शब्द तेच अहित. - त्वां विद्याधर- इ०' संपूर्ण ळोक असा - हंसांसाहतदहेमपडूजरजःसंपकेपड्डोश्षिते- रत्पत्षेमेम मानसादुपनतेस्तोयेमहापावत्तेः । . स्वेच्छानिर्मितरत्लकुम्मनिदितेरेबरामिषिच्य स्वयं त्वां विद्याधर चक्रवर्तिनमहं प्रीत्या करोमि क्षणात्‌॥ (नागानन्द, ५.२६). - तत्वेह' ही हस्तलिखितातील 'वेग' ची दुरुस्ती आहे. संपादकांनी सुचविलेली “चेह” अशी दुरुस्ती समर्पक नाही. ह्या वाक्यात “अन्ये'च्या मताचे खंडन आहे. म्हणूनच मुद्रितातील “अनोचित्यात्‌ः हा पाठही वरोबर नाही. - 'इत्थमिद प्राप्तमित्येवंप्रायम? ढे अनुबदनाच्या वर्णनपर आहे. पण याचा अर्थ स्पष्ट नाही. | वरप्ंदानसंमाप्तिः काव्यसंहार इष्यते । नपदेशेपशास्तेत्र परशस्तिरमिधीयते ।। ९६ ॥ वराचे प्रदान व त्याची प्राप्ती म्हणजे काब्यसंहार होय. राजा व देश यांना शान्ति प्राप्त व्हावी अश्या प्राथेनेला प्रशास्ति म्हणतात. वरप्रदानसंप्राप्तिः काव्यसंहार इति । यथा योगन्थरायणः- 'देव, तदुच्यतां किं ते भूयः प्रियमुपहरामि' इत्यादि यावदू “यातो विक्रमबाहुरात्मसमताम्‌ इत्यादि । नृपदेशप्रशान्तिश्चव प्ररास्तिरिते । उवींमुद्दामसस्यां जनयतु विसूजन्‌ वासवो वृष्टिमिष्टा- मिट्ैख्रेविष्टपानां विदधतु विधिवत्प्रीणनं विप्रमुख्याः । आकल्पान्तं च कुयांत्‌ क्रमसमुपचितं संगमं सजनानां निर्वि-छेषावकारां पिज्ञुनजनवचोवर्जनाइज़ळेपः ॥ (४.२२) इति । १ का -प्रदानं. २ नि -देवप्रदास्तिश््व, का -देवप्रशञान्तिश्च. २७६ नाट्यशास्त्र “वरप्रदानसंप्राप्तिः काव्यसंहारः' इत्यादी. उदाहरणार्थ, 'महाराज, आणखी कोणती आपल्याला प्रिय असलेली गोष्ट मी करावी £ या यौगन्धरायणाच्या उक्तीपासून ते 'विक्रम- बाहु आमच्यासारखा झाला आहे' या राजाच्या टक्तीपर्यंत. “नृपदेशम्रशान्तिश्व प्रशास्तिः इत्यादी. उदाहरणाथ, इष्ट अशी वृष्टी पाडून इन्द्र पृथ्वीला उदंड धान्याने समृद्ध करो. श्रेष्ठ ब्राह्मण विधीप्रमाणे केलेल्या यागांनी देवांना संतु करोत. आणि क्रमाने वृद्धिंगत झाळेळी सज्जनांची मैत्री दुष्ट लोकांच्या शब्दांचा परिहार केल्यामुळे ताटातुटीला अवकाश नसलेली अशी वग्रळेप कल्पान्तापर्यंत टिकून ठेवो. “यातो इ०? संपूर्ण छोक पुढीलप्रमाणे - यातो विक्रमबाहुरात्मसमतां प्रास्तेयमुबींतले सार॑ं सागरिका ससागरमहीप्राप्त्येकहेतुः प्रिया । देवी प्रीतिमुपागता च भगिनीलाभाज्जिताः कोसलाः कि नास्ति त्वयि सत्यमात्यवृषभे यस्मे करोमि स्पृहाम ॥ (४.२१). “च॒ कुर्यातः ही मुळातील “क्रियायाः' च्या जागी सुचविठेली दुरुस्ती आहे. 'क्रियायाः? चा बाक्‍्यात अन्वय लागण्यासारखा नाही. आणि उत्तरार्धांत क्रियापदाची अपेक्षा आहे. उत्तरार्धाचा प्रचलित पाठ असा - आकल्पान्तं च भूयात्समुपचितसुखः संगमः सज्जनाना निःरोषं यान्तु शान्ति पिद्ठुनजनगिरो दुजया वज्रलेपाः ॥ अभिनवबगुप्त'चा पाठ बराच निराळा आहे. त्यात वज़ळेपः हे कर्तृपद्‌ ठरते. तो पाठ विशोष सयु- क्तिक बाटत नाही. संपादक श्री कबी यांनी प्रारंभापासून सर्व संव्यद्ञांना क्रमांक दिळे आदेत. शेवटी काव्य- संहाराला क्रमप्राप्त ६४ अंक दिल्यानंतर प्रशस्तिळा सुद्धा ६४ हाच क्रमांक दिला आहे ब अद्या रीतीने ६४ हो संख्या प्रस्थापित केली आहे. यथासंधि तु कर्तव्यान्येतान्यड्भाानि नाटके । कविभिः काव्यकुशळे रसभावमपेक्ष्य तु ॥ ९७॥ काव्य रचण्यात कुदळ असलेल्या कवींनी रस आणि भाव यांच्या अनुरोधाने नाटकात. ह्या अंगांची योजना ज्या त्या संधीत करावी. १ का इत्येतानि यथासंधि कार्याण्यज्ञानि रूपके. २ का कार्य-. ३ नि भावानवेक्ष्य. १९.९७ | २७७ यथासांधि त्विति । यो यस्मिन संधी योग्य इत्यथंः । योग्यतां च कवि- रेव जानाति । न च सुक्तककविः किन्तु प्रबन्धयोजनासमथंः । तदाह कविसि रित्यादि । ननु कवेः कीहशं तत्पबन्थानेमांणकोरळामेत्याह रसभावमपेक्ष्येते । तदपेक्षा च कौदलळमित्यथ॑ः । रस एव हि प्रीत्या व्युत्पत्तिप्रदं नाट्यात्मक शास्त्र- 'मित्युक्तम्‌ । ततश्चव यथा यद्यस्योपर्यागे तदरोचकं रुचितदाधिरकरापयःप्रभ्षांते रसान्तरमध्ययोजितं तदृद्वारेणान्तःप्रविशं सत्‌ पुष्टि न्याधिनिद्वात्ति च विधत्ते तथे- व पुमर्थापायो हृदयमनुप्रवेष्टमसम्थः सुन्दरतरोचितरससंक्रमणया प्राप्तान्तः प्रवेशाः विनेयजनस्य संपायचे वस्तुनि कट्पपादपकट्पनाये कल्पते । रस- संक्रान्तिश्व विभावादिरूपतर्यैव नान्यथेत्युक्त॑ षष्ठे । एतान्यड्षणाने लिखिताने विवाक्षितरसविभावादिसंपूरणभाजि भवन्ति तद्योगपद्येन । ते तु रसावहितमनसो यत्नान्तरनिरपेक्षतयेंवाहमहमिकया समुचितभावेन बन्धरय्यामनुवतंन्ते । इति- वृत्ताविच्छेदो5पि हि रसस्येव पोषकः । अन्यथा विच्छेंदे स्थाय्यांदेरेव चुटितत्वात क रसवार्ता । तेन रसस्येवा्य विभावादिपरिकरो यदडुन्चक्रमाति । तथाहि लाक्षाग्ृहानठेत्युपक्षेपो वीररौद्रयोविंभावांदापूरकः । प्रवृद्धं यद्वेरमिति क्रोधस्य वारे व्याभिचारिणो रॉंद्रे स्थायिनः स्वरूपप्रत्युक्तीवकः परिकरः । चश्चडूज इति च परिन्यासो अनुभावांशे पुष्णाति । अणगेहन्तु एदं वअणं देवदाओ इति विळोभनं मनोनेक्त्योत्सक्यहषंमतिस्मृतिप्रश्षतिव्यभिचारिभावसंधानघुयम । एवमन्यदापं याज्यमस्‌ । “यथासंधि तुः इत्यादी. जे ज्या संधीत योग्य असेल त्याप्रमाणे असा अथे. आणि कवीच योग्य काय ते जाणतो. फुटकळ *छोक रचणारा कवी नाही, तर प्रबन्थाची रचना करण्यास समर्थ असळेळा. हे 'कविमिः इत्यादी शब्दांत सांगतात. कवीचे प्रबन्ध निर्माण करण्याचे कौशल्य कशा प्रकारचे या प्रश्नाचे उत्तर 'रसभावमपेक्ष्य' ह्या शब्दांत देतात. रस आणि भाव यांची अपेक्षा म्हणजेच कौराल्य असा अर्थ. कारण, रस म्हणजेच आवड उत्पन करून बोध देणारे नाटबस्वरूपाचे शास्र असे मागे सांगितळे आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे जे ज्याला उपयोगी परंतु त्याला न आवडणारे औषध रुचकर अश्या दही, साखर, दध व*रे इतर रसांच्या मध्ये योजना करून तदद्वारा आत गेळे असता पुष्टी आणि व्याधीचा नाश उत्पन्न करते त्याप्रमाणेच पुरुषार्थाचा उपाय हृदयाच्या आत शिरण्यास असमथे असता अधिक सुदर अशा योग्य रसात संक्रमण करण्याने आत प्रवेश प्राप्त करून बोधास योग्य अशा मनुष्यांना संपादन करावयाच्या वस्तूच्या संबंधात कल्पब्रक्षाप्रमाणे उपयुक्त होतो. आणि रसामध्ये सैक्रान्ती विभाव आदींच्या ख्पाच्या द्वाराच होते, इतर प्रकारे नाही हे सहाव्या अध्यायात सांगितले आहे. ही अंगे लिहिली असता विवक्षित असलेल्या २9७८ नाट्यशास्त्र रसाच्या विभाव आदींची परिपूर्ति करणारी होतात ती त्यांच्या समवेतःच. परंतु ते कवीचे मन रसावर केंद्रित झाले म्हणजे इतर कोणत्याही प्रयत्नाऱिवाय अहमहमिकेने योग्य त्या रीतीने ती अंगे काव्यबंधाच्या चौकटीत अवतीर्ण होतात. कारण, कथानकाचा विच्छेद न होणे ही सुद्धा रसा'चाचच परिपोष करणारी गोष्ट आहे. नाही तर विच्छेद झाल्यास स्थायिभाव आदी खंडित झाल्यामुळे रसाची कोठून गोष्ट १ म्हणून हा जो अंगांचा समूह आहे तो रसाच्याच विभावादींचा परिवार आहे. उदाहरणार्थ, वेणीसंहारात 'लाक्षागृहानल' इत्यादी वचनातील उपक्षेप अंग वीर आणि रौद्र ह्या रसांच्या विभावांच्या अंशाचे पूरक आहे. श्रवृद्धं यद्देरम! इत्यादीतीळ परिकर अंग वीररसात व्यमिचारिभाव असलेल्या व रोंद्ररसात स्थायिभाव असलेल्या क्रोधाच्या स्वख्पाचे प्रत्युज्ञीवन करते. आणि “चन्चद्ठुज इत्यादीतील परिन्यास अनुभावांच्या अंशाचा परिपोष करतो. 'अणुगेहुन्तु एदं वअणं देवदाओ' यातील क्किभन अंग मनात सुख झाल्याकारणाने ओत्सुक्य, हषे, मति, स्मृति इत्यादी व्यभिचारिभावांना एकत्रित करण्यास अत्यंत समर्थ आहे. याचप्रमाणे इतर अंगांचीही योजना करावी. “यो- - नयोग्य:? अड्भाचा निदेश असल्यामुळे “यत्‌ योग्यम' अशी नपुंसकलिंगी रूपे अपेक्षित आहेत. -- 'यथा यद्यस्योपयोगि तदरोचकं ही सुचविलेली दुरुस्ती आहे. मुळात 'यथा? च्या अगो- दर आणखी एक 'यद्‌ः आहे. ते अनावश्यक आहे. तसेच मुळात “अनुपयोगि' आहे. ते अमिप्रेत अर्थाच्या उलट अर्थाचे आहे. आणि हस्तलिखितात 'तदरोचिततो? आणि मुद्रितात 'तदरोचकिनो? असे पाठ आहेत. 'तदरोचकं' हे अव्याहत 'ओऔषधम? चे विशेषण म्हणून संभाव्य आहे. यातील 'तत्‌? म्हणजे ज्याला औषध द्यावयाचे तो मनुष्य. - 'सुन्दरतरोचित- मुद्रित पाठ 'सुन्दरतदुचित- आहे. - 'घष्टे' रसाध्यायात 'विभाबानुभावव्यमिचारिसंयोगाद्रसनिष्पत्तिः हे प्रसिद्ध सू्न आहे. - “-बिभावादिसंपूरण-? मुद्रित पाठ '-मावादिसंपूर्ण” असा आहे. परंतु पुढे केलेल्या बिवरणावरून हे स्पष्ट आहे की अंगे ही विभाव, अनुभाव आणि व्यमिचारिभाव यांची पूर्ती करणारी आहेत. - “तद्यौगपद्येन? ही सुद्धा सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात तद्यौ. . - द्यानि' असा तुटित पाठ आहे. सुद्रितात केबळ “यानि' आहे. तो समर्पक नाही. यातील “ततर म्हणजे 'विभावादि*. - 'ते तु? मुद्रितात 'ते? नाही. 'ते? ने विभाव आदी भावांचा बोध होतो. - 'रसाबहितमनसः मुद्रित पाठ “एकरसा- आहे. पण नाटकात अनेक रस असू शकतात. हा शब्द “कवे: चे विशेषण मानणे योग्य वाटते. प्रथमा बहुवचनात त्याचा 'ते' शी अन्बय लावणे शक्‍य आहे. पण विभाव आदींच्या संबंधात “मनस शब्द वापरला असण्याची शक्‍यता कमी. - 'स्थाय्यादेरेव” मुद्रितात 'एब' नाही. -- 'स्वरूपप्रत्युज्जीवकः' मुद्रितात "स्वरूप? असा स्वतंत्र शब्द आहे. पण ते बरोबर नाही. - 'मनोनिवृंत्याः ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “मनोनिवृत्त्याा आणि मुद्रितात “अतो निदृत्त्या' आहे. निवृत्तीचा निर्देश असंभाव्य आहे. - :_व्यमिचारिभाबसंधानभधुर्यम? हीं सुचविलेली दुरुस्ती आहे. मुळात “-व्यमिचारि। स चायं संघान- धुर्यम? (ये: - मुद्रित) असा पाठ आहे. तो अर्थहीन आहे. 'स॒चायं? ने कोणाचा बोध होतो हे मुळीच सांगता येण्यासारखे नाही. १९.९८ २५७९ टं संमिश्राणि कदाचित्तु द्रित्रयोगेन वा पुनः । ज्ञात्वा कार्यमवस्थां च कायाण्यज्ञा[ने सोंधेषु ॥ ९८ ॥ परंतु, कार्य व अवस्था लक्षात घेऊन ही अंगे संधींमध्ये कधी कधी मिश्रख्पाने अथवा दोनदा, तीनदा अशीही योजावीत. | ननु संधिपरततन्त्रेरक्षैभवितव्यम्‌, तद्रसपारतन्त्र्यसेषां कुतस्त्यस्‌ । उच्यते । संधयो हि अवस्थापरतन्त्राः । प्रारस्भाभिभानदद्याविदोषीपयागे कथाखण्डलकं मुखसंधिरित्युक्तम्‌ , एवमन्यत्र। अवस्था अप्यन्यकृतिविशेषमनूच्यते | नन्वतः किम्‌ । इदमलो भवतीत्याह रसभावापेक्षया तु कायं स्थित तदपेक्षया च अवस्थानं ज्ञास्वेति । कार्यमपि रसप्रवाहजननपयंन्तत्वेन कृतार्थ संपद्यत इति यावत्‌ । संसि- श्राणीति संध्यन्तरोक्तं संध्यन्तरे$पीत्यर्थः । यथा युक्तिमुखे5प्युक्ता गर्भे5प्युप- निबद्धा वितकंव्यभिचार्यशापोषकभांवेन वेणीसंहांरे यथोदाहृतं प्राक्‌ तेजस्वी रिपुहतबन्युदुःखभारम इत्यादि । द्वित्रीति द्वित्वत्रित्वयोगेनेत्यर्थः । तेनेकर्मापे संध्यईः तजैव संधो द्िस्त्रर्वा कर्तव्यम्‌ । यथा रत्नावल्यां प्रतिमुखे विलास: सागरिकायां रानि वासकूदुपनिबद्धः प्रधानं शुक्षाररसमुद्दीपयति । वेणीसंहारे संफेटाविद्रवो पुनः प्रददितो वीररोद्रोददीपनौ भवतः । अतिरायेन तु पोनःपुन्ये वेरस्यं स्यादिति द्ित्रिग्रहणम्‌ । तथा हयोर्योगः डाभ्यासड्राभ्यां संपाद्यम, तदेकेनेव चेदटते तत्किमपरेण । एवं त्रियागः । द्वियोगो यथा प्रतिमानिरुद्ध भीमसूनोर्वसुनागर्य कृती उपक्षेपानन्तरसेव परिकरकार्ये तेनेव कृते परिन्यास- दर्हनम्‌ । त्रियोगो यथा भेज्ञळविराचेते राधाविप्रकस्भरासकाड्ठे उपक्षेपेणेव हि विआविस्सा इत्यादि परिकरपरिन्यासकार्ये गुरुभूते पाठिते एकोदेदोन विळोभ- ननिरूपणम्‌ । एवं चतुरड्ठो यावत्संधिभवतीति । अंगे संघौंवर अवलंबून असावयास पाहिजेत, मग त्यांचे हे रसांवर अवलंबून असणे कोठून आले ? सांगतो. कारण, संधी हे अवस्थांवर अवलंबून असतात. प्रारंभ नावाच्या विशिष्ट देला उपयोगी असा कथेचा खंड म्हणजे मुखसंधि असे म्हटले आहे. तसेच इतरत्रही. अवस्था सुद्धा दुसऱ्या विशिष्ट क्रियांच्या अनुरोधाने निश्चित होते. पण ह्यामुळे काय होते? ह्यामुळे पुढीळ गोष्ट होते हे रस आणि भाव यांच्या अनुरोधाने निश्चित झालेले कार्य आणि त्याच्या अनुरोधाने ठरळेली अवस्था ह्या गोष्टी विचारात घेऊन' या शब्दांत सांगतात. कार्यांचा सुद्धा र्सप्रवाह्ह उत्पन करण्यात शेवट होण्याने ते कृतकृत्य १ नि सर्वाद्वाणि. २ नि योज्यान्यद्वानि- २८० नाट्यशास्त्र होते असा भावार्थ. संमिश्र म्हणजे एका संधीत निर्दिष्ट केले असता दुसऱ्या संधीत सुद्धा असा अर्थ. उदाहरणार्थ, युक्ति मुखसंधीत सांगितली असली तरी गभसंघीत सुद्धा वितर्क ह्या व्यभिचारिभावाच्या अंशाचा परिपोष करणारी म्हणून वेणीसंहारात योजिली आहे, त्याचे उदाहरण 'तेजस्वी पुरुष शत्रूने ठार मारठेल्या नातलगामुळे होणारा दुःखभार' इत्यादी पूर्वी दिले आहे. द्वि आणि त्रि म्हणजे द्विव्व आणि त्रित्व यांच्या योगाने. म्हणून एकच संध्यड्ग त्याच संधीमध्ये दोनदा किंवा तीनदा योजावे. उदाहरणा थै, रत्नावलीमध्ये प्रतिमुखसंचीत विळास हे अंग सागरिकेच्या संबंधात किंवा राजा'च्या संबंधात अनेकवार योजिळे असून ते मुख्य जो शूड्गाररस त्याचे उद्दीपन करते, वेणीसंहारात संफेट आणि विद्रव ही दोन अंगे पुन्हा योजिळी असून ती वीर आणि रैद्र रसांचे उद्दीपन करतात. तथापि पुन्हा पुन्हा पुष्कळदा योजिळी तर विरसता उत्पन्न होईल म्हणून दोनदा तीनदा असे म्हटळे आहे. त्याचप्रमाणे दोघांचा योग म्हणजे दोन अंगांनी साध्य करावयाचे कार्य, ते जर एकाच अंगाने घडून येत असेल तर दुसर्‍याची काय आवश्यकता : याचप्रमाणे तिघांचा योग, अशा प्रकारच्या द्वियोगाचे उदाहरण भीमसूचु वसुनागाच्या प्रतिमा- निरुद्ध द्या कृतीत उपक्षेपाच्या नंतरच त्यानेच परिकराचे कार्य सिद्ध केळे असल्यामुळे परिन्यासाचे होणारे दर्शन. त्रियोगांचे उदाहरण मेळळाने रचिठेल्या राधाविप्रलभ्भ रासकाच्या अंकात 'विअविस्सा? इत्यादी उपक्षेपानेच परिकर आणि परिन्यास ह्यांची मोठी आठेळी कार्ये पाळडी गेळी आहेत म्हणून एकाच निर्देशानंतर विळोभनाची योजना केली आहे. याप्रमाणे संधि चार अंगे असलेला सुद्धा होऊ शकतो. “अन्यकृतिविरोषम? काही कृती अथवा क्रिया प्रारम्मावस्थेच्या द्योतक असतात, तर काही नंतरच्या मिन्न अवस्थांच्या द्योतक. म्हणून कोणती अवस्था आहे. हें क्रियांच्या स्वरूपावरून ठरते. - “तदपेक्षया च' ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'तथ्यापेक्षया? आणि सुद्रितात 'तस्या- पेक्षयाः आहे. छोकाला अनुसरून 'च? आव्यक आहे. यापुढीळ शब्द "अवस्थानं' असा आहे. ठोकातील “अवस्था? ची ही व्याख्या आहे असे समजता येते. तथापि टीकेतही “अवस्थांर असाच मूळ पाठ असण्याचा संमव आहे, - 'कृतार्थ' हस्तळिंखितात "कृतार्थ; आणि मुद्रितात कृतार्थता? आहे. दोन्हीही मूळ पाठ असण्याचा संभव कमी. - 'उदाह्ृतं प्राक्‌ वर ६४ व्या 'ह्योकाबरील टीकेत हे. उदाहरण दिले आहे. - 'तथा द्रयोयोंगः येथे 'द्रित्रियोगेन' चा दुसरा अर्थ दिला आहे. पहिला अर्थ एकाच अंगाची दोन किंवा तीन वेळा पुनरावृत्ती असा होता. हा दुसरा अथे दोन किंवा तीन अंगे मिळून एकच झालेल्या अश्या अंगाची योजना असा आहे. - “भीम- सूनोः इ०? हस्तलिखितात या ठिकाणी बराच गोंधळ झालेला आहे. काही अंशाची पुनसरूक्ती झाली असून अनेक पाठ भ्रष्ट आदेत. - 'कृती? ही 'कृते' ची दुरुस्ती, 'कृते' ठेवावयाचे असेल तर “मीमसूनुना वसुनागेन? अश्शी दुरुस्ती करावी लागेल. - “उपक्षेपानन्तरमेवः सुद्रितात 'एब? च्या जागी “एव? असा पाठ असून त्यापुढील शब्द “न परिकरः, आद्येनैब कृते अश्या स्वरूपात आहेत. पण मध्येच 'न परिरः? असे शब्द असण्याचा संभव नाही. येथील म्हणण्याचा आशय असा की १९.९९-१०१ | २८१ उपक्षेपबाक्यातच परिकर हे दुसरे अंग सुद्धा अंतर्भूत आहे, म्हणून हा द्वियोग. उपक्षेपानंतर एकदम तिसऱ्या परिन्यास अंगाची योजना केली आहे. - 'विअविस्सा? किंबा मुद्रितातींल 'लिअलीस्सा? ह्या प्राकत वचनाचा अर्थ करता येण्यासारखा नाही. रासकाचे नाव मुद्रितात राधाविप्रलम्म आहे तेच बरोबर आहे. हस्तलिखितात राधाप्रलम्ब असे रूप आहे. - “-कार्ये' हे नपुंसकलिंगी प्रथमेचे द्विवचन समजावे. 'गुरुभूते' हे त्याचे विरोषण आणि 'पालिते? हें विघेय. 'गुरुभूते' ह्या शब्द वापरण्याचे प्रयोजन स्पष्ट नाही. - 'एकोद्देशेन? म्हणजे उपक्षेप ह्या एकाच अंगाच्या योजनेने. - “चतुरक्षो यावत तीनतीन अंगांच्या जागी एकच अंग योजावयांचे असे ठरविल्यास बारांच्या जागी चारच पुरे होतील. म्हणजे एका संधीत फक्त चार अंगे असू शक- तात. चार हो सर्वात कमी अशी संभाव्य संख्या. 'यात? हा मुद्रणदोष आहे. एतेषामेव चाज्ञानां संबद्धान्यथयुक्तितः । संध्यन्तराणि संधीनां विशेषास्त्वेकविशातिः ॥ ९९ ।। साम भेदस्तथा दण्ड! प्रदाने वथ एव च । प्रत्युत्पक्ममतित्वं च गोत्रस्खलितमेव च ॥ १०० ।॥ साहसं च भयं चेब हीमीया क्रोध एव च । ओजः संवरणं भ्रान्तिस्तथा हेत्ववधारणम्‌ । दृतो लेखस्तथा स्वप्नाश्रित्र मद इति स्मृतम्‌ ॥ १०१ ॥ आणि ह्याच अंगांशी अर्थाला अनुरूप रीतीने संबद्ध अशी संघींची संघ्यंतरे होत; त्यांचे एकवीस प्रकार होत. साम, मेद, दंड, दान, वध, प्रत्युत्पन्नमतित्व, गोत्रस्खळन;, साहस, भय, ळज्ञा, माया, क्रोध, ओज, संवरण, भ्रान्ति, हेतूचे ज्ञान, दूत, लेख, स्वप्न, चित्र, आणि मद ही संध्यंतरे मानली आहेत. अथ संध्यन्तराणि दर्शयितुमाह एतेषामेव चाडुननामित्यादि । तत्र केचि- दाहः । अन्तर॑ ठिट्रम्‌, संधिरिति तदड्ठुमात्रम्‌, तात्स्थ्याच्च तत्स्थानीयम्‌ । तेन संध्यडुच्छिद्रवातेत्वात्संथ्यन्तराणि, अत एव च अड्डनां संबद्धाने । ननु किं 'ृेषमात्रेण । नेत्याह किंत्व्थस्य प्रयोजनस्य योगेन, अत एव संध्यज्ञानां विरो- षकाः । तदर्थावेशोषसंबद्धं हि तद भवति । अन्ये सन्यन्ते । य एवोपक्षेपाद्याः सामान्येनोक्तास्तेषामेवैते विशोषा अवान्तरभेदाः । उपक्षेपो हि सामादोर्वशेषभि- न्न: । तथाहि 'ठाक्षागृहानल' इति क्रोघात्मकोपक्षेपः, रामाभ्युद्ये भयात्मोपक्षेपः प्रतिमानिरुद्धे स्वप्नरूपः, उदात्तराधवे हेत्ववघारणात्मा । एवमन्यदनुसरणीयम्‌ । एते च विभावानुभावव्यभिचारिरूपा एव । न तु तदतिरिक्तं जगति किंचिदस्ति प्रयोगोज्ज्वळकम्‌॒ । तत्रोपयोगाय तूपलक्षणत्वेनेकविंशतिरित्युक्त॑ कॅवेमार्ग प्रदरशायितुम । र्र | नाट्यशास्त्र आता संध्यन्तरांचा निर्देश करण्यासाठी 'एतेषामेव चाडगानाम्‌! इत्यादी सांगतात, त्यासंबंधात काहींचे म्हणणे असे - अन्तर म्हणजे छिद्र; संधि म्हणजे त्यातीळ केवळ अंग, त्यात असल्याकारणाने त्याच्या जागी असलेले. तेव्हा संघ्यड्ठांच्या ठिंद्रात असतात म्हणून यांना संध्यन्तरे म्हणतात. आणि म्हणूनच ती संव्यद्ठांशी संबद्ध असतात. केवळ शछ्ि्ट होऊन संबद्ध का? याचे उत्तर नाही, ती अर्थाच्या म्हणजे प्रयोजनाच्या संबन्धाने संबद्ध असतात. म्हणूनच ती संध्यडगांची वैरिष्टये दरोविणारी असतात. कारण, ते अंग त्या विशिष्ट प्रयोजनाशी संबद्ध होते. दुसर्‍या टीकाकारांचे मत असे की उपक्षेप आदी जे सामान्य स्वख्पात सांगितले आहेत त्यांचेच हे विशेष म्हणजे अवांतर भेद आहेत. कारण, सामादी विशोषांमुळे उपक्षेप भिन्न मिन्न प्रकारचा होतो. उदाहरणाथ, 'लाक्षागृहा- नळल' इत्यादी वेणीसंहारातीळ उपक्षप क्रोधात्मक आहे; रामाभ्युदय नाटकात उपक्षेप भयात्मक आहे; प्रतिमानिरुद्धात तो स्वप्नरूप आहे; उदात्तराघवात तो हेतू जाणण्याच्या स्वरूपाचा आहे. याच प्रकारे इतर अंगांच्या बाबतीतही समजावे. आणि ही संध्यन्तरे विभाव, अनुभाव आणि व्यमिचारिभाव यांच्याच स्वरूपाची आहेत. कारण, त्यांच्या व्यतिरिक्त अशी जगात कोणतीही गोष्ट प्रयोग उञ्ज्वळ करणारी नाही. परंतु त्या ठिकाणी उपयोग व्हावा म्हणून कवीळा मार्गदर्शन करण्यासाठी उपलक्षणाने एकवीस असे म्हटले आहे. | “तत्स्थानीयम? ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'तात्स्थाव्य'' असा भ्रष्ट पाठ आहे. मुद्रित पाठ 'तत्थान्यं? आहे. पण “स्थान्य' असे रूप प्रचलित नाही. संधि शब्दाचा संध्यद्ठ असा अथे का केला आहे त्याचे कारण असे सांगितले आहे की संधीत ते असते (तत्स्थ) म्हणून त्याच्या जागी (तत्स्थानीय) ते समजता येते. - “किषमात्रेण' हा हस्तलिखितातील पाठ आहे. मुद्रितात “शोष- आहे. ते विरोषर समपॅक नाही. न्िपू “विकटणे, जोडले जाणे? यापासून &ळेष शाब्द निष्पन्न झाला आहे. - 'सामान्येनोक्ताः? ही दुरुस्ती आहे हस्तलिखितात “सामान्या न उक्ताः? असे आहि. व मुद्रितात “सामान्या उक्ताः? असे. सामान्य हे उपक्षेपादींचे वर्णनपर विशेषण म्हणून समर्पक नाही. - 'एते विदोषा? ही 'एतद्विशेषा? ची दुस्स्ती आवदयक आहे हे उघड आहे. - 'एते चः म्हणजे हे सामक्रोधादी विदोष. विदोषाला अनु- लक्षून पुक्लिंगीं सर्वनाम. - 'प्रयोगोज्ज्यलकम्‌ । तत्रोप- ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितातील चुटित पाठ 'प्रयोगोज्बळ*-- प-' असा आहे. सुद्रित पाठ 'प्रयोगे । प्रयोगोज्ज्वलत्वोप- असा आहे. तो मूळ असण्याची संभाव्यता फार कमी आहे. | तत्र सामादयो वारे उज्ज्वळत्वहेतवः, वधो रोंद्रे, प्रत्युत्पत्नमतित्वं मति- लक्षणं व्यभिचारिरूपं सवेत्र, गोचस्खलनमीष्यांविप्रलम्भे, साहसं वीरादो, चाप ळ॑ हास्यादी । एवमन्यत्र । ओज इति तेजः सामान्याभिनये लक्षयिष्यते 'आधि- क्षेपावसानादेः' इत्यादि । संवरणसवाहेत्थम्‌ । चित्रं विस्मयः शिल्पविदोषश्व । १९,९९-१०१ २८३ एते सर्वेषु नाटकादिरूपकेषु सुलभाः स्वयं च सुज्ञाना इति तदुदाहरणपरिवर्त- नेंन ग्रन्थो न विस्तारितः । त्यांपैकी साम आदी संध्यंतरे वीररसात उज्ज्वलतेस कारणीभूत होतात, वध रोद्र- रसात, बुद्धीचे लक्षण हजरजबाबीपणा व्यमिचारिभावरूप सर्वे रसांत; गोत्रस्खळन देष्येने झालेल्या विप्रलम्म शुंगारात, साहस वीर आदी रसांत, चपळता हास्य आदीमध्ये. या'च- प्रमाणे इतरत्र. ओज म्हणजे तेज, त्याचे लक्षण सामान्यामिनयामध्ये अधिक्षेप, अवमान इत्यादींच्या! या श्होकात क्रेळे जाईल. संवरण म्हणजे गोपन. चित्र म्हणजे विस्मय आणि विशिष्ट प्रकारची कळा. हे नाटक आदी सर्व रूपकप्रकारांत योजावयास सुळभ आणि समजण्यासही सोपे म्हणून त्यांची उदाहरणे प्रस्तुत करून ग्रेथ वाढविला नाही. “मतिल्क्षण' मति हा एक व्यमिचारिभाव आहे. - 'वीरादौ? ढे मुळात नाही. तंपादकांनी 'शञुद्धरवीरादी? सुचविले आहे. शुंगारात साहस निराळ्या प्रकारचे असंभवनीय नाही. - 'तेजः? सामा- न्यामिनय नावाच्या २२ व्या अध्यायात 'तेजस्‌? चे लक्षण पुढीलप्रमाणे दिळे आहे. - अधिक्षेपाबमानादेः प्रयुक्तस्य परेण यत्‌ । प्राणात्यये5प्यसहनं तत्तेजः ससुदाहतम्‌ ॥ २२.४१. _“अवहित्थ' म्हणजे मनातील भावाचे गोपन. हा एक व्यमिचारिभाव आहे. वर नाट्यद्यास्रातील “होकांना क्रमांक देतांना एक कोक सहा चरणांचा ठरविला आहे. संध्य- स्तरांचा निदेश करणारे पाचच 'छोकार्थ आहेत. त्या पूर्वीचा अथबा त्यानंतस्चा कोका यांच्याशी संल्य़ करता येण्यासारखा नाही. म्हणून ह्या मार्ग अवलंबावा लागला आहे. यानंतर बडोदे प्रतीत पुढील सात छोक कंसात दिळे आहेत - विष्कम्मश्वूलिका चैव तथा चेव प्रवेशकः । अद्भावतारो5डइमुखमर्थापक्षेपपन्चकम्‌ ॥ मध्यमपुरुषनियोज्यो नाटकमुखसंधिमात्रसंचारः । विष्कम्मकस्तु कार्यः पुरोहितामात्यकञ्युकिमिः ॥ शद्धः संकीणो वा द्विविधो विष्कम्मकस्तु विज्ञेयः । - मध्यमपात्रेः शुद्धः संकीणो नीचमध्यरुतः ॥ अन्तर्येवनिकासंस्थेः स्तादिभिरनेकधा । . अर्थोपक्षेपणं यत्तु क्रियते सा हि चूलिका ॥ अड्ठान्तरानुसारी संक्षेपार्थमधिकृत्य बिन्दूनाम्‌ । प्रकरणनाटकविषये प्रवेशको नाम विज्ञेयः ॥ 1] २८४ नाट्यशास्त्र अद्वान्त एव चाड्को निपतति यस्मिन्‌ प्रयोगमासाद्य । वीजार्थयुक्तियुक्तो ज्ञेयो ह्यक्ावतारो5सौ ॥ विस्छिष्मुखमडूस्य स्त्रिया वा पुरुषेण वा । का च 1 स्व मुच् मक यडुपक्चिप्यते पूर्वे तदडुमुखमुच्यते ॥ श्री कवि यांनी टीपेत म्हटल्याप्रमाणे हे छोक प्रक्षिप्त आहेत यात मुळीच शंका नाही. यांतील तिसरा व पाचबा हे झोक वर अठराव्या अध्यायात आठेळे आहित. त्यांत निर्देशिळेळे विष्कम्मक व प्रवेशक हे दोनच प्रकार भरताला अवगत आहित. पाच अर्थोपक्षेपकांची कल्पना नाटयशास्त्रात नाही. ती उत्तरकालीन, प्रायः कोहलकुत आहे. इ > &_ ह> < श्र अन्यान्यांपे लास्याविधावज्ञानि तु नाटकोपयोगी ने । * अस्माद्रिनिःसृतानि तु भाण इबेकप्रयोज्याने |। १०२॥ गेयपदं स्थितपाट्यमार्सानं पुष्पगण्डिका । प्रच्छेदकं त्रिमूढे च सेन्थवं च डिमूढकम्‌ ॥ १०३ ॥ उत्तमोत्तमकं चेवमुक्तमत्युक्तमेव च । लास्ये द्षाविधं द्येतदज्ुनिर्देशलक्षणम्‌ ॥ १०४ ॥ लास्याच्या प्रयोगातील दुसरीही अगे नाटकात उपयोगी पडतात. ह्या नाटकाच्या कथानकातून निष्पक्न झालळेळी ही अंगे भाणाप्रमाणे एका पात्राच्या हारा योजावीत. गेयपद, स्थितपाठ्य, आसीन, पुष्पगण्डिका, प्रःच्छेदक, त्रिमूढ, सैन्थव, द्विमूढक, उत्तमोत्तमक आणि उत्तप्रत्युक्त याप्रमाणे लास्यात दहा प्रकारच्य। अंगांचा निर्देश व लक्षण केलेले आहेत. एवामेतिवृत्तनिरूपणनान्तरीयकत्वेन संधयः संध्यडठानानि संध्यन्तराणि चात्मभूतरसोपयोगीन्यापे प्राधान्येनेतिव्ृत्तात्मक॑ शारीरांशमभिनिविदामानानि, तत एव वृत्तिचतुष्कसाधारणाने निददितानि । अधुना तु यस्याः प्रसादेन शास्त्रातेहासादिभ्यो भ्युद्धरकन्धरीभूतं सरवजनाहरणीयतास्पदं नाट्यं, यामुद्दि्य प्रथमे5ध्याये 'केशिकीर्मापे योजय, यऱ्च तस्याः क्षमं द्रन्यम? इत्यादि बहुतर- मुक्तम्‌, तदाविर्भावकाने, अत एवात्मभूतरसभावभागाभिनिवेदाशालीन्येव लास्याद्ठान्यापे कविप्रयोक्तमिरभिनेतव्यकाव्यविषये सर्वभैव योज्यानीति दर्शी- १ का घो १०२-११५ इत्येतावानंशः विश्याध्यायस्यान्ते पर्यते. २ घो नाटके प्रयुक्तानि. ३ घो विचित्रपदमेव च ।. ४ घो उतक्तप्रत्युक्त॑ भावं च लास्याड्ञानि विदुर्बुधाः. ९.१०२-१०४ नहजे यितुमाह अन्यान्यापे ठास्यविधावड्ठानीत्यादिे । नाटकमित्यभिनयमात्रस्‌ इतःपरमाध्यायान्तमक्तेभ्यो5द्वेभ्यो5मिन्नानि लास्यविधी यान्यज्ञानि वक््यन्ते तानि नाटकोपयोगीन्यपि भवन्ति । नन्वेवमजुनामभेदादड्रिनो ठास्यस्य नाटके को भेद इत्याशडठां शमयति अस्सादिति । अस्मान्नाटकादनुकाराभिनेयलक्षणा- दिनिःस॒तानि बहिभूतानि एकपात्रहायाणि भाण इंवेति । इवदाब्देन नाटकमसाह । भाणे नाट्यरूपता समसस्ति, न तु लास्ये कथंचिदपपि, तस्य नाट्यरूपवेलक्षण्यात्‌ । तःचोपपादितं वितत्य तुर्ये५ध्याये । याप्रमाणे इतिवृत्ताच्या निरूपणाशी निकट संबंध असलेले संधी, संध्यक्के आणि संध्यन्तरे आत्म्याच्या स्थानी असलेल्या रप्ताळा प्राधान्येकरून उपयोगी असले तरी इतिव्रृत्तामक शारीराचा अंश म्हणून योजिले जाणारे आणि म्हणूनच 'चार वृत्तींना समान असलेळे वर्णिळे आहेत. परंतु आता जिच्या प्रसादामुळे नाट्य शास्र, इतिहास इत्यादीहून श्रेष्ठ प्रकारचे होऊन सवव ळोकांचे मन आकर्षित करण्याचे साधन बनते आणि जिच्या- विषयी पहिल्या अध्यायात 'केशिकी वृत्तीची सुद्धा योजना कर, आणि तिच्यासाठी जी योग्य सामुग्री असेळ' इत्यादी पुष्कळ विवेचन केळे आहे, त्या केशिकी वृत्तीचा आविर्भाव करणारी आणि म्हणूनच आत्मभूत रस आणि भाव यांच्या भागातच योजावयाची असलेली लास्याची अंगे सुद्धा कवींनी आणि प्रयोग करणारांनी ज्याचा अभिनय करावयाचा अदा काव्याच्या संबंधात सर्वे प्रकारे योजाबीत हे दाखविण्यासाठी 'अन्यान्यपि लास्यविधा- वड्ञानि' इत्यादी लिहितात. नाटक म्हणजे केवळ अभिनय करण्यास योग्य ते. येथपासून दे अध्यायाच्या शेवटपर्यंत सांगितलेल्या अंगांहून मिन्न नसलेली लास्याच्या विधीत जी अंगे सांगितली जाणार आहेत ती नाटकात सुद्धा उपयोगी होतात. याप्रमाणे अंगांमध्ये मिन्नता नसेळ तर अंगी लास्य आणि नाटक यांच्यात काय मेद ह्या रंकेचे रामन 'अस्मात? इत्यादी राब्दांत करतात. अनुकरणात्मक अमिनयास योग्य असे लक्षण असलेल्या ह्या नाटकातून विनिःसत म्हणजे त्यात अन्तभूत नसलेली, भाणाप्रमाणे एक पात्राने योजावयाची अशी ही अंगे आहेत. इव राब्दाने नाटकाचा निर्देश केळा आहे. भाणात नाट्याचे खूप संपूर्णपणे असते, पण ते लास्यात कोणत्याही प्रकारे नसते, कारण ते नाट्याहून भिन्न स्वरूपाचे आहे. आणि ते आम्ही चौथ्या अध्यायात विस्ताराने प्रतिपादित केले आहे. “वृत्तिचतुष्क' म्हणजे भारती, तसात्त्वती, आरभटी आणि कैशिकी ह्या चार वृत्ती. - :_जनाहरणीयतास्पदं नाटय? ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “-जनाहरणीयास्पदत्वं तत्राद्य'' असा पाठ आहि. मुद्रित पाठ “-जनाहरणीयतास्पदत्वं तु नार्य' आहे. 'तु' अना- वशयक आहे; तसेच भाववाचक रूप संभाव्य नाही. - 'कैशिकीमापे इ०' पहिल्या अध्यायात पुढीलप्रमाणे विधान आहे - २८६ नाट्यशास्त्र अथाह' मां सुरगुरुः केशिकीमपि योजय ।॥ यच्च तस्याः क्षमं द्रव्यं तद्‌ ब्राहि द्विजसत्तम। (१.४२-४३), -- 'उक्तेभ्यो5ज्ञेश्यो5मिन्नानिः यातील “अमिन्नानि, शब्द मुळात नाही, पण तो आवश्यक आहे. येथे सांगितलेली अंगे आणि पुढे ३१ व्या अध्याय!त सांगितलेली लास्याची अंगे दोन्ही एकच आहित, ती मिन्न नाहीत असे म्हटले आहे. आणि 'अमिन्नाने' शब्दाने पूर्ती केल्यावाचून “अक्वेश्यः मधील पंचमीची उपपत्ती लागणार नाही. - “नाटके को भेद:” “नाटकात असे पंच- मींचे रूप अपेक्षित होते. पण सप्तमीचे रूप चालण्यासारखे आहे. “'अस्मादिति? हस्तलिखितात नसलेले हे शब्द संपादकांनी सुचविले आहेत व ते आवश्यक आहेत. - “भाण इवेति? ही मुळातीळ “भाण इति? ची दुरुस्ती आहे. ती छोकाला धरून आहे. लास्यांगे भाणासारखी (भाण इव) एका पात्राने करावयाची असतात असे येथे म्हणाबया'चे आहे. - 'इवशाब्देन नाटकमाह? हे कसे काय ते स्पष्ट नाही, भाणाप्रमाणे असे म्हटले आहे. पण भाण व लास्यांगे यात फरक असा की भाणात नाट्याची सर्व अंगे असतात, तशी ती लास्यांगांत नसतात. असा संभव आहे की सूळ पाठ इबगब्देन नाटकाद्वेदमाह' असा होता. - 'तुयेंडव्याये” चोथ्या अध्यायातील छोक २६१-२६८ वरील टीकेत नत्ताच्या उपयोगाच्या अनुषंगाने नुत्त व नाट्य यांतील भेदाची विस्तृत चर्चा अमिनवगुत्ताने केली आहे. ननु काने लास्याइुनाने नाट्ये वक्ष्यन्त इत्याह गेयपदमित्यांदे दशविधं ह्वतद्डनेदेशलक्षणमित्यन्तम्‌ । एतस्याकनिर्केदरास्योदेशास्य ददराविधे यद्विशोष- लक्षणं तत्तालाध्याये लठास्यनिरूपणावसरे वक्ष्यते । तथा चोपसंहरिष्यति एतेषां लास्यविधीं विज्ञेयं ठक्षणमित्यादि । तत्र हि संपूर्णमकानां रूपभ । इह ताहि कथसुपयोग इति नाट्योपयोगितां समर्थयितुम आसनेषूपविषेयंदित्यादिग्रन्थः । तेनेदं तात्पयंम्‌ । यानि लास्याड़ानि वक््यन्ते तेभ्यः कश्चिद्दी'चित्र्यांशो लोकापरि- दृष्टो$पि रञ्ञनावेचित्र्याय कविप्रयोक्तभिनाट्ये निबन्धनीयः । लास्याची कोणती अंगे नाट्यात सांगणार आहेत त्यांचा निर्देश 'गेयपदम? पासून “दशविधं हयेतदड्वनिर्देशलक्षणम! येथपावेतो. ह्या अंगांच्या निर्देशाचे म्हणजे अंगांच्या उद्दे- शाचे जे दहा प्रकारचे विशेष लक्षण ते ताळाध्यायामध्ये लास्याचे निरूपण करण्याच्या प्रसंगाने करण्यात येईल, आणि त्याळा अनुसरून 'एतेषां लास्यविधी विज्ञेयं लक्षणम्‌! असा येथे उपसंहार करतील. कारण तेथे ह्या अंगांचे संपूर्ण स्वरूप वर्णन केळे आहे. मग येथे त्यांचा कसा उपयोग होईल हे सांगण्यासाठी म्हणजे नाट्यात त्यांच्या उपयोगाचे तमर्थन करण्यासाठी 'आसनेबूपविष्टेयंद! इत्यादी ग्रंथ लिहिला आहे. म्हणून तात्पर्य असे. जी ठास्याची अंगे सांगितली जाणार आहेत त्यांच्यातील जो वैचित्र्यपूर्ण अंश तो लोकांमध्ये दिसून येत नसला तरी रंजकतेत वैचित्र्य उतपन्न करण्यासाठी कवींनी आणि प्रयोग करणा- रांनी नाट्यामध्ये प्रथित करावा. १९,१०२-१०४ २८७ “अज्लोहेशस्य” ही १०४ ह्या ळोकातीळ 'अड्भुनिर्देश' शब्दाची व्याख्या आहे. -'तत्ताला- थ्याये' यातील “ततू” मुळात नाही. पण अर्थासाठी तो शब्द आवश्यक आहे. तालाध्याय हे ३१ व्या अध्यायाचे नाव आहे. त्या अध्यायात लास्याचे निरूपण ३३१-२३६७ या छोकांत केळे असून तेथे ह्या दहा अंगांचे अधिक विस्तृत वर्णन केळे आहे. - 'एतेबां लास्यविधी इ०? हे पुढील ११७ व्या 'छोकातील वचन आहे. -समर्थयितुसूर मुद्रित पाठ 'गमयितुम” आहे. - “आसनेषु इ०? हा पुढील १०५ व्या कछोकाचा निदेश आहे. -'लोकापरिदृष्टोडपिे' हा मुद्रित पाठ आहे. पुढील विवेचनावरून असे स्पष्ट दिसते की लास्यांगाचा जो अलौकिक अंदा त्याचीच नाट्यात योजना करावयाची आहे. च. आ. अन्ये तु व्याचक्षते तथाविधलास्याडःयोजनेवाच क्रियते | तथाहि गेयपदे निद्शंनं दर्शयन्ति 'ततः प्रविशाति वीणां वादयन्ती मळयवती चेटी च । मळयवती - ' उत्फुळकमलकेसर” इत्यादि गायति ।! तचचेदमसत्‌ । अत्र हि अन्यव्यापारवदू देवतापारतोषः किंचिठ्वेयं जप्यसहस्त्रतुल्यं तन्मिश्रं जप्यं कोटिसहस्त्रामित्यादि- पुराणवाक्यप्रामाण्यबलात्‌ कतंव्यत्वेनाभिमतो मठयवत्याः । सा च गायतीति न ठास्यार्थो5त्र कश्चित्‌, न लास्याडता । यत्रापि 'ततः प्रविदातो गायन्त्यो चेटयो ''कुसुसाउहपिअदूअअ” इत्यादि” तत्रापि परिभ्रमणादिवदेव लोंकिकवत्तम । वस- न्तोत्सवप्रमोदाभ्युद्यावसरक्ूतं प्रयोजनं चेद्यावव. क्रियते तत्र यद्यप्यनुकायत्वं तथापि नाट्याड्रुत्वे पूथगुपदेश्यतापात्तिः । यथा द्यश्चमेघयागाद्यनुकारः कर्तव्य- स्तदोपंयुज्यते यज्ञाद्रज्ञानामाति यज्ञाज्ञान्युपदेश्‍्यानिे भवेयुः । न हि ताहग्वस्तु- मात्रमप्यास्ति यन्नाट्ये नोपयुज्यते च । तस्माहास्ये यान्यजुनाने तत उप- जीव्यो$लीकिक एवांशो रअनोपयागी लास्या्रत्वेन मुनेरिहृ विवाक्षितः । अन्यथा आसनेषूपविष्टेयदू इत्यादि किमिहोक्तवा । एतेषां लक्षणं व्याख्यास्ये एतदिह च नोक्तमित्यतद्विशडःखलं स्यात्‌ ततश्चव परिधानकमित्यादि । परंतु दुसरे टीकाकार अशी व्याख्या करतात की तसल्या पूर्ण स्वरूपाच्या लास्यां- गांचीचच योजना येथे केली जाते. त्याप्रमाणे गेयपदाचे उदाहरण पुढीलप्रमाणे दाखवितात. नागानन्द नाटकात “नंतर बीणावादन करीत असलेली मलयवती आणि चेटी प्रवेशा करतात. मळलयवत्ती “फुललेल्या कमळांचे केसर” इत्यादी गाते. पण हे बरोबर नाही. कारण ह्या ठिकाणी इतर उद्योगांसारखाच असलेला देवतापरितोष “थोडेसे गान हजार जपांच्या बरोबरचे, गानमिश्रित जप हजार कोटी होतो' इत्यादी पुराणांतील वाक्ये प्रमाण मानल्या- कारणाने कतेव्य म्हणून मल्यवतीला श्रेयस्कर वाटला. आणि ती गाते यात लास्याचे कोण- तेही प्रयोजन नाही, आणि हे लास्यांग नाही. रत्नावळी नाटिकेतीळ “नंतर गात गात दोन 'चेटी प्रवेश करतात “कुसुमायुधा'्या प्रियदूता” इत्यादी! ह्या उदाहरणात सुद्धा परिभ्रमण आ. ४ इत्यादी सारखेच असलेळे लोकिक वागणे आहे. वसन्तोत्सवाच्या आनंदमय अमभ्युद्याच्या रट्ट नाट्यशास्त्र प्रसंगी होणारी सर्वे कृत्ये जर करावया'ची असतीळ तर जरी त्यात अनुकरण असते तरी नाट्याचे अंग झाळे तर त्याचे स्वतंत्रपणे वर्णन करण्या'चा प्रसंग ओढवेळ. उदाहरणार्थ, अश्वमेध यज्ञाचे अनुकरण करावयाचे असेल तेव्हा यज्ञाच्या अंगांच्या ज्ञानाचा उपयोंग केला जातो म्हणून यज्ञाच्या अगांचे वर्णन करणे आवश्यक होईल. कारण अशी कोणतीही वस्तू नाही की जिचा नाट्यात उपयोग केळा जात नाही. म्हणून लास्यात जी अंगे आहेत त्यांमधील स्वायत्त असा अलौकिक अंशच लास्यांग म्हणून भरतमुनीळा या ठिकाणी अभि- प्रेत आहे. नाही तर “'आसनेबूपविष्टैयंद' इत्यादी सांगण्याचे प्रयोजन काय? आणि यांचे लक्षण मी आता सांगतो' अशा प्रकारची येथे प्रतिज्ञा केळी नाही म्हणून 'ततश्चव परि- धानकम! इत्यादी असंबद्ध होईल _ दर्शयन्तिः ही मुळातीळ 'दर्शयतिःची दुरुस्ती आहे. कर्तृपद 'अन्ये' हेच संभाव्य आहे.- “उत्फुलु- संपूर्ण गाणे असे आहे - उत्फुळुकमळकेसरपरागगोरदययुते मम हि गोरि । अभिवाज्छितं प्रसिध्यतु भगवति य॒प्मत्मसादेन ॥ (१.१३). - 'देवतापरितोषः? यासाठी विघेय 'कर्तव्यत्वेन अमिमत:' हे आहे. - 'कोटिसहखम? हे कोटि- सहस्तजप्यतुल्य या अर्थी बापरठेळे दिसते. मुद्रित पाठ 'कोटिफल्साधनम' असा आहे. तो मूळ असेल्से वाटत नाही. - “प्रामाण्य” शाब्द मुद्रितात नाही. - 'गायतीतिः? ही सुचबिलेली दुरुस्ती आहे. मुळात 'प्रयोज्येति? असा पाठ आहे. पण त्यापासून काही अर्थबोध होत नाही. - 'कुसुमाउह- ३०? रत्तावलीतीळ पहिल्या अंकात वसन्त क्रतूच्या स्तुतिपर १३-१५ ह्या तीन गाथा अहित. - 'वसन्तोत्सव- इ०? ह्या वाक्यात 'प्रयोजनेःच्या जागी 'प्रयोजनं?, “अनुकार्यस्य' च्या जागी 'अनुकार्यत्वं' आणि “अनुपदेव्यतापत्तिःच्या जागी 'उपदेव्यतापत्तिः अशी दुरुस्ती सुचवून अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नावलीतील चेटींचे गायन हे जर परिपर्ण लास्यां- गाचे उदाहरण. मानले तर त्या लास्यांगाच्या सर्व विधीचा नाटिकेत निर्देश आवश्यक होता असे समजावे लागेळ, उदाहरणार्थ, नाटकात अश्वमेध यज्ञाचे दर्शन घडवावबयाचे असेल तर त्या यशाच्या विधीचा निर्देश करणे आवश्यक ठरते. नाट्याचे अंग झाल्यामुळे असे करणे आवड्यक होते. रत्नाबळीत वसन्तोत्सवा'चे संपूर्णपणे वर्णन करणे हा नाटककाराचा उद्देश नाही. याप्रमाणे ते नाट्याचे अंग ठरतं नाही म्हणून त्याला लास्यांग म्हणता. येणार नाही अश्या तऱ्हेचा युक्तिवाद येथे केळा असावा असे वाटते. - “न हि ताइक्‌ इ०' याचा अर्थ असा दिसतो की नाटकात सर्व गोष्टींचे दर्शन होते, पण ती प्रत्येक गोष्ट नाट्यांग होत नाही. - 'उपजीव्यो? मुळात 'उपजीव्ये) आहे. पण त्या रूपाचा कोठे अन्बय लावता येण्यासारवा आहे असे दिसत नाही. उपजीन्य म्हणजे प्रस्तुत संदर्भात दुसऱ्या गोष्टींतून उद्धत करून घेतलेला असा अर्थ आहे. तालाध्यायात लास्यांगांचे जे विस्तृत वर्णन आहे त्यातील फक्त काही अंदच नाटकात योजाबयाचा असतो, त्यातील ताळ, चारी वगैरे प्रकार वर्ज्य आहेत. अलौकिक म्हणजे लोकात प्रचलित नसलेला. “आसनेघु इ०! हा पुढील गेयपदाचे वर्णन करणारा “कोक, १९.१०५ २८९ त्यात आसनावर बसणे, वाद्ये वाजविणे, गाणे ह्या अलॉकिक गोष्टींचा निर्देश आहे. - 'उक्तवा? मुद्रितात 'उत्तथाः असा पाठ आहे. - 'ततश्चव परिधानकम' तालाध्यायात गेयपद ह्या लास्यां- गाच्या वर्णनात पुढील कोक आहे - ञर्यश्चेण द्विकलेन स्यात्‌ ततश्चव परिधानकम । प्रयोक्तव्यं प्रयोगज्ञेः परिवर्ततमेव च ॥ (२१.१३३). त्यात त्र्यत्न हे तालाचे नाव असून परिधानक आणि परिवर्तन ही पूर्वरड्ञातील नृत्ताच्या भागांची नावे आहेत. येथे अमिनवगुप्ताला 3.से म्हणावयाचे आहेसे दिसते की नाट्यात संपूर्ण लार्स्यां- गांची योजना करावी असे जर भरतमुनींचे मत असते तर त्याने या ठिकाणीच “मी आता लास्यांगांचे लक्षण सांगतो? असे म्हटले असते. तसे त्याने म्हटलेले नाहीं. तसे त्याने म्हटले असते तर तालाच्यायातील वर्णन प्रस्तुत लक्षणांशी असंबद्ध ठरले असते. वरील १०२ वब १०३ ह्या दोन कोकांच्या मध्ये बडोदे प्रतीत पुढील अधिक ळोक कॅसात दिला आहे - भाणाकृतिवलञास्यं विक्षेयं त्वेकपात्रहाये बा । प्रकरणवदृह्य कार्यासंस्तवयुक्त विविधभावम्‌ ॥ हा मूळ नाही हे उघड आहे. पूर्वार्धात १०२ ची कल्पना पुनरुक्त झाली आहे. १ च € च) € » > आसनेषूपविष्ठ्यत्तन्त्रीभाण्डोप्रहितम्‌ । क 4 च गायनेगींयते शुष्क तदूयपदमुच्यते ॥ १०५ ।॥ आसनांवर स्थानापन्न झालेल्या गायकांनी वीणादी वाद्यांची साथ असलेले जे केवळ गान गायिले जाते त्याळा गोयपद म्हणतात. | ततो यावानंशी नाट्योपयोगी तं दर्शयितुमाह आसनेषूपविष्टेयेदिति । यच्छब्दो निपातो यस्मिन्नित्यर्थे । तेन यत्र काब्ये प्रयोगे वा शुष्कमित्यनुकरणी- यतया शून्यं गायनैरिति न तु पात्रेः आसनोपविष्टेरिते स्वस्थेः न तु नेपथ्ये गीयत इत्यादिवत्‌ कविभरयोगायातमावेशविदोषं जुस्भयद्धिगींतम, यत्तन्त्रीभा- ण्डान्वितामिति सर्वातोद्ययुतं न तु भान्यासीनपाठ्यवत्‌ तद्विहीनं तत्स्व गेयस्य पद स्थानमिति कृत्वा गेयपद॒म्‌ । तेन ध्रुवागानपश्चकमन्तराठापस्वरराहितं यत्र प्रयोगयाग्यं भवति स काव्यप्रयोगो गेयपदमित्युक्त भवति । यत्र हि योगो तत्राभिनिविष्टं रअकं भवतीति तावानंशो लास्याडुनादिहोपजीवितः । यत्तु गायनेः १ घो आसने चोपविष्टायां. २९० नाट्यशास्त्र पात्र: शुष्कमित्यर्थात्‌ ठेकाश्रितं गेय निर्गीतर्मापे वा एतत्‌ त्र्यश्नं चतुर वेत्येवंभूतं गीयमानं गेयानि पदानि यत्न गेयपदाभिति व्याचक्षते तत्सर्वमेवा- पास्तम्‌ । त्यापैकी जितका अदा नाट्याळा उपयोगी आहे तो दाखविण्यासाठी 'आसनेबुपविष्टे- येदू' इत्यादी सांगतात. “यत्‌ शब्द यस्मिन'! ह्या अर्थी अव्यय आहे. म्हणून ज्या काव्यात अथवा प्रयोगात शुष्क म्हणजे अनुकरणा'चा भाग मुळीच नसलेले असे, गायनांनी म्हणजे पात्रांनी नाही, आसनावर बसलेल्यांनी म्हणजे स्वस्थ असलेल्यांनी, नेपथ्यगृहात गातात यासारखे कवीच्या प्रयोगामुळे आलेला विशिष्ट आवेश प्रकट करणाऱ्यांनी नाहह, असे जे गायिळे जाते आणि जे बीणावाद्याने युक्त म्हणजे सर्व वाद्यांनी युक्त असते, पुढे वणेन करावयाचे असलेल्या आसनपाठ्याप्रमाणे वाद्यवविहीन नसते, ते सर्वे गाण्याचे पद म्हणजे स्थान म्हणून गेयपद. म्हणजे अन्तराळाप आणि स्वर यांनी विरहित असे पाच प्रकारचे ध्रुवा- गान ज्या ठिकाणी प्रयोगास योग्य होते तेव्हा त्या काव्यप्रयोगाळा गेयपद असे म्हणतात. कारण जेथे योग होतो तेथे योजना केली असता रंजक होते म्हणून तेवढा अंश लास्यांगातून येथे घेतला आहे. गायनांनी म्हणजे गाणाऱ्या पात्रांनी शुष्क म्हणजे विदग्ध स्वख्याचे गान किंबा निगीत असेही गान त्र्यश्न किंवा चतुरश्र तालात गायिले जाते म्हणून ज्यात गेय, गाण्यास योग्य, अशी पदे आहेत ते गेयपद अशी काहीजण व्याख्या करतात त्या सवाचे निराकरण केलेच आहे. ८अनुकरणीयतया शून्यम' ही 'शझुष्कम? ची व्याख्या आहे. नाटकातील प्रत्येक गोष्ट अनु- करणात्मक म्हणजे अमिनयाच्या स्वरूपाची असते. गेयपदातील गाण्यात अनुकरण नसते अथवा ते अमिनयहींन असते. याचाच अर्थ ते नाटकातील कथावस्तूशी साक्षात संबद्ध नसते. - 'गा- यनै:” पूर्वरड्ञाच्या वर्णनात गायक, वादक यांची रंगभूमीवरील उपस्थिती व त्यांनी करावयाच्या विविध क्रिया यांचा निदेश आहे. गायन म्हणजे पूवरड्ञातील हे गायक. किंबहुना तालाच्यायात वर्णिलेल्या लास्यांगांचा उपयोग पूर्वरंगातच मुख्यतः होतो. - 'कविप्रयोगा- नेपथ्यातून येणारे गान कोण करण्याचा संभव असतो त्याचे यात दिग्दर्शन आहे. कवीने योजिल्याप्रमाणे एखादी तीत्न भावना व्यक्त करण्यासाठी पात्र नेपथ्यातून गाते. पण ते गायनही अभिप्रेत नाही. गेयपद रंगभूमीवर बसलेल्या व पात्र नसलेल्या गायकांनी म्हणाबयाचे असते. - “ध्रुवबागानपश्वक्रम्‌' पात्राचा प्रवेशा, पात्राचे निष्क्रमण, रसाचा आक्षेप, सामाजिकांचे प्रसादन आणि पात्रांचे परिक्रमणादि अन्तर या पाच प्रसंगांत प्रावेशिकी, नैष्कामिकी, आक्षेपिकी, प्रासादिकी आणि आन्तरा अशा पाच प्रकारच्या ध्रुबा प्रयोगात योजिल्या जातात. नाट्यश्ास्त्राच्या बत्तिसाव्या हवा च्यायात घ्रवांची असंख्य उदाहरणे दिली आहेत. ती सर्व प्राकृत भाषेत आहेत. अभिनवगुप्ताच्या म्हणण्याप्रमाणे हे विविध प्रकारचे प्रुवागान म्हृणजच गेयपद्‌. घुबागानात अन्तरालापाचे स्वर नसतात. - 'य॒त्र हि योगो इ०' ह्या बाक्यात बरीचशी दुरुस्ती सुचविली आहे. हस्तलिख्ितातील पाठ फारच भ्रष्ट आहे. सुद्रित पाठ “यत्र हि प्रयोगे तत्तत्रामिनिविष्ट॑ सामाजिकरज्ञकं भवतीति याबानशो5सौ इ०? | १९. १० द्‌ २९१ असा आहे. सुचविलेल्या पाठानुसार पुढीलप्रमाणे अर्थ करता येण्यासारखा आहे - नाटकात ज्या ठिकाणी गेयपद ह्या लास्यांगातील जितक्या अंशाची योजना (योगः) उचित होईल तेथे ते बापरे असता रंजक होते म्हणून तेवढा अंश॒ नाटकात गेयपद म्हणून ओळखले जाते. - “छेकाश्रितं गेय? छेक म्हणजे विदग्ध, सुसंस्कृत मनुष्य. छेकाश्रित गान म्हणजे बिदग्ध स्वरूपाचे गान असा अर्थ असण्याचा संभव आहे. विदग्ध पुरुषांविधयी गान अश्या तऱ्हेचा अर्थ विरोष आकधेक वाटत नाही. - 'निर्गीतम? पूर्वरड्ञांच्या आश्रावणा नावाच्या अंगात जे गीत गाइले जाते त्याला निर्गीत अशी संज्ञा असल्याचे पाचव्या अध्यायात म्हटले आहे (५.३०-४१). त्याला बहिर्गीत असेही म्हटले आहे. - 'त्र्यश्रं चतुरश्रं'' ही दोन तालांची नावे आहेत. - 'सर्बेमेव मुद्रित पाठ 'पूर्वमेव' आहे. - 'अपास्तम' नाट्यातील गेयपदात ताळ, चारी वगैरे नसतात हे वर आग्रहाने प्रतिपादिले आहे. *या शोकानंतर बडोदे प्रतीत पुढील अधिक झोक कंसात दिला अहि - या इृत्यत्यासना नारी गेय प्रियगुणान्वितम्‌ । €*< आ. "3 साज्ञोपाडविधानेन तद्वेयपदमुच्यते ॥ ह्या लास्यांगांच्या संबंधात टीकाकारांत मतभेद होते, इतकेच नव्हे तर त्यांच्या निरनिराळ्या व्याख्या प्रचलित होत्या यात शंका नाही. | प्राकृतं यद्रियुक्ता तु पठेदात्तरसं स्थिता । मदनानलततप्ताड़्ी स्थितपाठ्ये तदुच्यते ॥ १०६ ॥ __ कामाग्नीने शरीराचा दाह होत असता विरहिणी स्री रसपूर्ण व प्राकृतात असलेले चचन उभी राहिली असता उच्चारते त्याला स्थितपाठ्य म्हणतात, | अथ स्थितप्रापि यहास्याडुं भविष्यति तदुपजीवितुमाह प्राकृत यद्दियुक्ता त्विति । ठास्ये$पि तावदू देवतानरपतिरअनप्रधाने पाठ्यमस्त । तचित्तग्रहणं हि तत्र गेयेनेव मध्ये वैचित्र्याय पाठ्येनापि क्रियते । तत्र स्थितेन पठ्यत आसी- नेनेवेति पाठ्यगतं यदळौकिकं रञनाई चित्रत्वं तस्मादड्मादुपजीव्यते । तथा हि यंद्वियुक्ता आतप्तापि सती प्राकृतभाषालक्षणयुक्त॑ तथात्तरसांमिति रसो- पयोगिस्थायिस्वरग्रहणपूर्वक॑ पठेत्‌ । एतदलौकिकं सहास्याझञादुप्जीन्यमानं स्थितपाठ्यम्‌ । एतच्चावेशोपळक्षणम्‌ । तेन क्रोधाविष्टो5पि संस्क्ृतेन पठतीत्या- द्यपि मन्तन्यम्‌ । अन्ये तु बहुचारीयुतेन चच्चत्पुटनात्तरेण च स्थितपाठ्याभोति ठक्षणं कुर्वन्ते, उदाहरन्ति रत्नावल्यां द्वितीये$ड राजा - उद्यामोत्कलिकाम्‌ १ नि या वियुक्ता. २ नि -दासतसंस्थिता. २९५ नाट्यशास्त्र इत्यादि इति तत्पूर्वमेव निरस्तम्‌। न च पाठ्ये$वसरो५त्र तालस्त्र्यश्नः चतु- रश्नो वा यथा तु ठास्याइुत्वे । तत्सवे ताठाध्याय एव वक्ष्यामः । आता. स्थितपाठ्यालळा जवळ असणारे जे लास्यांग आहे त्यातून अनुरूप अंश घेण्यासाठी 'प्राकृतं यद्वियुक्ता तु इत्यादी सांगतात. देवता अथवा नृपती यांचे रंजन करणाऱ्या लास्यामध्ये सुद्धा पा्य असते. त्यावेळेस त्यांचे चित आकर्षित केळे जाते गाण्यानेच, पण मधून मधून वैचित्र्यासाठी पाठ्याने सुद्धा. त्यात बसलेल्या मनुष्याप्रमाणे उभा राहिलेला पठन करतो म्हणून त्या पाठ्यात असलेळे जे अलौकिक रंजनात्मक वैचित्र्य त्या अंगा- पासून हे नाटकात उपयोगी होणारे अंग घेतळे जाते. त्याप्रमाणे, विरहिणी स्री कामविहूळ झाळी असताही प्राकृत भाषेच्या लक्षणांनी युक्त असे, तसेच आत्तरस म्हणजे रसाला अनुरूप अश्या स्थिर स्वरांचा उपयोग करून पठन करते. हे अलौकिक असलेले असे लास्यांगातून घेतळेळे स्थितपाठ्य, आणि हे आवेशाचे उपलक्षण आहे. त्यामुळे क्रोधाविष्ट मनुष्य संस्कृतात सुद्धा पठन करतो असे समजावे. परतु दुसरे टीकाकार पुष्कळ चारी असलेले, चः्चत्पुट व उत्तर यांनी युक्त असे स्थितपाठ्याचे लक्षण करतात आणि रत्नावलीच्या दुसऱ्या अंकातील 'उद्दामोत्कलिकाम! इत्यादी शहोकाचे उदाहरण देतात. त्या मताचे पूर्वीच निराकरण केळे आहे. आणि पाठ्यामध्ये त्र्यश्न किंवा चतुरश्र इत्यादी तालांना अवकाश नसतो जसा तो लास्याज्मत असतो. ते सव आम्ही तालाथ्यायातच सांगणार आहोत. “स्थितप्रापि? म्हणजे नाटकात उपयोगी जे स्थितपाठ्य त्याच्या जवळ येणारे म्हणजे त्याच्यासारखे असणारे. - “रञ्जनप्रधाने' मुद्रित पाठ :_रज्ञनप्रधानंर आहे. पण लास्यरूप नुत्त हे रज्षनप्रधान आहे असे म्हणणे अधिक योग्य. - "गेयेनेव' मुद्रितपाठ 'तेनेव' आहे. पण 'तंत्र'ने 'लास्ये' तमजणे आवश्‍यक असल्यामुळे 'तिन'ने लास्याचा निदेंदा अमिप्रेत तमजता येणार नाही. म्हणून 'गेयेन' असा पाठ अधिक समर्पक, - 'स्थितेन पठथत आसीनेनेवेति' ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “स्थिते च पाट्यतासीनोवेति? असता भ्रष्ट पाठ आहे. मुद्रित पाठ 'स्थिते च पठत्यासीनेवेति' अता आहे. यात “स्थितेःच्या जागी 'स्थिताः अधिक समर्पक झाले असते. - “-स्थायिस्वरग्रहण-? मुद्रितात 'स्वर'च्या जागी 'रस' आहे. पण पाठ्यात विविध रसांच्या अनुरोधाने स्वरांची योजना भिन्न मिन्न प्रकारे करावयाची असते हे सतराव्या अध्यायात १२८-१३१ या गद्यपद्यात्मक अंद्यात सांगितले आहे त्याचाच येथे अनुबाद केला आहे असे दिसते. - 'एतदलौकिक? मुद्रित पाठ एतलौकिक'ः आहे. पण तो बरोबर नाही. लास्यांगांतून घेतलेले अंश अलौकिक असतात असे सर्वत्र म्हटले आहे. मुद्रितात यानंतर “सतच्या ऐवजी 'यत्‌? आहे. ते सुद्धा बरोबर नाही. - 'आवेश्ोपलक्षणम' मदनानल्ताप हा एक आवेश आहे, त्याचा निर्देश उदाहरणादाखल केला आहे. - तेन क्रोधाविष्टोडपे इ०” याचा अर्थ असा की नाटकात जेथे जेथे एखादे पात्र कोणत्याही तीव्र भावनेचा आविष्कार करण्यासाठी उभ्याने पाठयाचा अवलंब करते तेथे तेथे स्थितपाठथ असते. - “चारी? पदविन्यास १९.१०७ | २९३ करण्याच्या विविध प्रकारांना चारी असे नाव आहे. “चच्चत्पु” हे चतुरश्र तालाचे दुसरे नाव आहे. 'उत्तर?' हा गोताचा एक प्रकार आहे *(३१.२००-१). - 'न च पाठये इ०' पाठ्यात तालाळा अवसर नाही हे उघडच आहे. ह्या छोकार्नंतर बडोदे प्रतीत पुढील झोक कंसात दिला आहे - बहुचारीसमायुक्तं पश्चपाणिकलानुगम_। चच्चत्पुटेन वा युक्तं स्थितपाठ्यं विघीयते ॥ आसीनमास्यते यत्र सर्वातोद्रविवार्जितम्‌ । अपसारितगात्रे च चिन्ताशोकसमन्वितम्‌ ॥ १०७ ॥ जेव्हा विरहिणी खरी गात्रांचा संकोच करून चिन्ता ब शोक यांनी युक्त आणि कोणत्याही वाद्याची साथ नसलेले असे गायन बसून गाते तेव्हा त्याला आसीन म्हणतात. अथासीनपाठ्यादुपजीवनीयमंशमाह आसीनमास्यते यत्रेति । अत्यन्त- शोकांवेशे$मिनयादिशून्यत्वेन यत्रास्यंते उपरअकचतुर्विधातोधवर्जितो5तिसुकु- मारकाकलीप्रायप्रमदार्गीतमात्रावरोषो यः, चित्रगानादापि च तत्र साध्यमानार्थस्य तस्याश्रूयमाणा या स्थितिः, तदासीनपाठ्यादुपजीवितेनासनांशेन योगतश्व सर्वच करुणादौ रञनांशोपयोगि । तदाह चिन्ताशोकसमन्वितामेति । ... निःशब्द इति । तदनु अप्रसारितगात्रमित्यमिनयशून्यमित्यर्थः । सुप्रसारितिगात्रमित्यपरे पठन्ति तत्रापि... आता “आसीनमास्यते यत्र' यात आसीनपाठ्यातून घ्यावयाचा अश सांगतात. शोकाचा आवेंग अनिवार झाला असता अमिनयरहित होऊन प्रमदा जेथे बसते, उपरंज्नन करणाऱ्या चार प्रकारच्या वाद्यांनी विरहित, अगदी सुकुमार असे प्रायः काकली स्वरूपाचे स्त्रीचे गायनच अवशिष्ट असलेला जो अंश, त्यात वैचित्र्ययुक्त गायन असले तरी साध्य करावयाचे प्रयोजन कानावर पडत नाही अशी जी स्थिती असते तो, आसीन- पान्यातून घेतलेल्या आसन ह्या अंशामुळे आणि योगामुळे करुण आदी रसांमध्ये सवेत्र रंजनाळा उपयोगी पडतो. म्हणून म्हणतात 'चिन्ताशोकसमन्वितम' इत्यादी .... शब्द- विरहित असा. त्याला अनुसरून 'अप्रसारितगात्रम! म्हणजे अमिनयाशिवाय असा अथे. दुसरे 'सुप्रसारितगात्रम! असा पाठ स्वीकारतात. त्या पाठात सुद्धा... १ नि चिन्ताश्लोकसमन्वितम. २ घो अप्रसाधित-- ३ नि जिह्मदष्टिनिरीक्षितम्‌. . २९४ नाट्यशास्त्र या आणि पुढील शोकांवरील टीका पुष्कळ ठिकाणी त्रुटित झालेली आढळते. तसेच उपलब्ध भागातील बरेच पाठ सुद्धा अ आहित. उ्रुटींच्या ठिकाणी संपादकांनी परिपूर्ति सुच- विली आहि. भ्रष्ट पाठ शुद करण्याचाही त्यांनी प्रयत्न केळेला दिसतो. - 'यत्नास्यते, ही हस्तलि- खितातील 'यत्र सोडस्ते ची सुचविलेली दुरुस्ती आहे. ती श्कोकातीलळ पाठाला अनुसरून आहे. मुद्रित पाठ यत्र आस्ते सोंड्शाः असा आहे. पण “सः? हे सर्वनाम प्रस्तुत ठिकाणी योग्य नसून पुढे “यः? नंतर अधिक अनुरूप होईल. आणि तेथेच 'अंशः? शब्द पठन करणे किंबा अध्याह्त धरणे उचित होईल, - “उपरक्षकचतु- ही 'उपरक्षकश्चतु- ची सुचबिलेली दुरुस्ती आहे. मुद्रित पाठ :उपरन्नकगुणश्वतु- असा आहि. उपरन्षक हे अंक्याचे विरोषण समजण्यापेक्षा आतो- याचे विशोषण समजणे अधिक चांगले असे बाटते. घेतलेल्या अंशाला 'रक्षनोपयोगि” असे पुढे म्हटले आहे. - 'काकली' है कोमळ स्वरात ब मधुर आवाजात म्हटल्या जाणाऱ्या गाण्याचे नाव अहि. पण विशिष्ट स्वरूपातील निषाद स्वरालाही काकडी अशी संशा आहे (२८.३४ गद्य). _ य? नंतर 'अंरा? अध्याह्यत घरावा लागतो. हस्तलिखितात 'ज? असे भ्रष्ट रूप आहे. - “चित्रगानादपि इ०' हस्तलिखितात “चित्रत्रिगानादपि च तत्र हि साध्यमात्राथस्य तस्याश्रूयमाणा च स्थिति? असा पाठ आहि. त्यात वरीलप्रमाणे दुरुस्ती सुचविली आहि. 'साध्यमान अर्थः म्हणजे कथानका'चे जे प्रयोजन साध्य करावयाचे असते ते. गायन वैचित्र्ययुक्त असले तरी त्यातील शब्द प्रेक्षकांच्या कानावर पडत नसल्यामुळे त्या गाण्याचे कथानकातील प्रयोजन त्यांना प्रतीत होत नाही, अश्या तर्‍हेचा अथे अभिप्रेत असण्याची शक्‍यता आहि. मुद्रितात येथील पाठ पुढीलप्रमाणे आहे. - 'चित्तप्राही (स लौकिकः) लौकिकादपि च तत्र हिं साम्यमात्रार्थस्य तस्याश्र- यमाणा च स्थितिः. हा पाठ मूळ असेल्से वाटत नाही. - 'तदासीनपाठ्याद? मुद्रितात "तद्‌ नंतर “आसीनन्नामाड” हे राब्द अधिक आहित. -- 'योगतश्व” योग शाब्द प्रयोग या अर्थी वाप- रठेळा दिसतो. - “-समन्वितम्‌' यानंतर हस्तलिखितात 'असंश' अशी अक्षरे असून त्यापुढे चुटी व शब्द इति? ही अक्षरे आहेत. मुद्रितात पुढीलप्रमाणे सचित पाठ आहे -- 'अधःरय (न- व्यानाधोमुखाद्यनुमावयुतम्‌ । सर्वेति ध्यानविलापादिचिन्ताशोकानुभावेषु ततादेरप्रयोज्यतया तद्राहित्य- मुक्तम्‌,) निःशब्दमिति भावः ! हे सर्व मुळात असेल हे मान्य करणे कठीण आहे. - 'तत्रापि' या शाब्दानंतर पुन्हा तुटी आहे. संपादकांनी पुटील्प्रमाणे पूर्ती सुचविली आहे- * (सोष्ठवाड्रप्रद- शनप्रथग्यत्नराहित्येन ) स्स्तगात्रतयामिनयशून्यतेव,. यातील आशय अमिंप्रित असण्याचा संभव आहे. - '-राहित्येन' नंतर कंस पूण झाल्याचे चिन्ह मुद्रणदोषामुळे पडले आहे. हा कत पुढील *छोकावरील टीकेच्या प्रारंमी 'गान इति? या शब्दानंतर पूर्ण होतो. वृत्ताने विविधानि स्पुर्गेयं गाने च संश्रितम्‌ । वेष्टाभिश्राश्रंयः पुंसां यत्र सा पुष्पगण्डिका | १०८ ॥ जेव्हा म्हटले जाणारे पद संगीताच्या आश्रयाने असते, त्यात विविध वृत्ते असतात आणि पुरुषांना उचित अशा चेष्टितांचा आधार घेतला जातो तेव्हा पुष्पगण्डिका होते. १ नि यत्न स्त्री नरवेषेण ललितं संस्कृतं पठेत्‌ । सखीनां तु विनोदाय सा ज्ञया पुष्पगन्धिका ।॥। १९,१०८ २९५ ततेन मध्ये सुषिरेण मध्ये$वनद्धेन मिश्रेण कृतो विचित्रभावः पात्नाणां सुकुमारप्रयोंगे. . .यद्वैचित्र्यम्‌ । मालासाहश्यात्पुष्पगाण्डिका गाननृत्तगीतगति- वेचित्र्ययोगात्‌ ।... स च चेष्टाश्रयराब्दान्यां पयायेण योज्यः । गाण्यात मध्ये ततवाद्याने मध्ये सुषिरवाद्याने मध्ये अवनद्भवाद्याने मिश्रित झाल्यामुळे आलेले वैचित्र्य, पात्रांच्या सुकुमारप्रयोगामध्ये.... जे वैचित्र्य ते. गान, नृत्य, गीत आणि गति यांच्या योगामुळे मालेशी सादऱ्य उत्पन्न होते म्हणून पुष्पगण्डिका हे नाव.... आणि त्या शब्दाचा चेष्टा आणि आश्रय ह्या दोन शब्दांशी पर्यायाने अन्वय ळाबावयाचा. ह्या छोकावरील टीकेचा पुष्कळच अंश गहाळ झाला आहे. प्रारंभीची अवतरणिका आणि रछोकातीळ काही शब्दांच्या व्याख्या लुप्त झाल्या आहेत, संपादकांनी पुढीलप्रमाणे प्रारंमी पाठ सुचविला आहे - 'पुष्पगण्डिकाख्यलास्याडमदुपजीव्यांशामाह वृत्तानीति । गान इति'. झोकात प्रारंभी असलेल्या 'वृत्तानि' ह्या शब्दाची अमिनवगुप्ताने व्याख्या केलीं असण्याचा संभव आहे. आणि नंतरच्या एका वाक्यावरून असे म्हणता येण्यासारखे आहे की गान, गीत, वृत्त आणि गतिया चार गोष्टी म्हणजे “विविधानि वृत्तानिः अश्शी व्याख्या त्याने केली असावी. तथापि तालाव्यायात पुष्पगण्डिकेत खलक्षन व नकुंट हे वृत्तप्रकार असतात असे म्हटले आहे (३१.३४७). येथील 'वृत्तानि' मध्ये त्याचा निर्देश असण्याची शक्‍यता आहे. पुढे गेय म्हणजे गायन गानाच्या म्हणजे वाद्मसंगीताच्या आश्रयाने असते ह्यावरील व्याख्येचा काही भाग उपल्ब्ध आहे. ठल॒प्त भागात 'मध्ये धनेन' हे शब्द असण्याची शक्‍यता आहे. - 'मिभ्रण कृतो' ही 'मिश्रेणाकृते? ची दुरुस्ती आहे. मुद्रित पाठ 'मिश्रणाकृतो? आहे. - “सुकुमारप्रयोगे? मुद्रितात पुढीलप्रमाणे पाठ आहे - 'सुकुमारप्रयोगो5मिनेये5पि रक्षक एव यद्मप्यहौकिकं यद्वेचिञ्यम्‌ |” यात संपादकांनी सुचविलेला अश असावा असे वाटते. “-परयोगे? ऐवजी “-प्रयोगो? हा मुद्रणदोष असण्याची शक्‍यता आहि. - 'वैक्तिययोगात्‌र नंतर संपादकांनी पुढील पूर्ती केली ओह - (स्त्रीलिक्ुविवक्षया च स्त्रीपात्राणां पुष्पगण्डिकोक्ता । पुंसामिति) '. हे फारसे संभाव्य वाटत नाही, - 'स च. . . योज्यः' हस्तलिखितात 'योज्याः आहे आणि मुद्रितात “सा च. - -योज्याः आहे. पण हे विधान 'पुष्पगण्डिका? शब्दाबद्दल केले असण्याची शक्‍यता नसून पुंसाम्‌ ह्या शब्दाबहल केळे असणार, त्या शब्दाचा एकदा 'चेष्टामिः? शब्दाशी अन्वय करून पुन्हा “आश्रयः” शब्दाशी अन्बय लावावयाचा असे येथे म्हटळे आहे. म्हणून “स; (शब्दः) योज्यः' अशी पुढ्िंगी ख्पेच संभाव्य, बडोदे प्रतीत यानंतर पुढील दोन अधिक कोक कंसात दिले आहेत. - यत्र स्त्री नरवेषेण ललित संस्कृत पठेत्‌ । सखीनां तु विनोदाय सा ज्ञेया पुष्पगण्डिका ॥ तुत्त॑ तु विविधं यत्र गीतं चातोधयसंयुतम्‌_ । स्त्रियः पुंवव्च चेष्टन्ते सा ज्ञेया पुष्पगण्डिका ॥ यांपैकी पहिली व्याख्या बरीच निराळ्या स्वरूपाची आहे. २९६ नाट्यशास्त्र प्रच्छेदकः स विज्ञेयो यत्र चन्द्रातपाहताः । ख्रियः प्रियेषु सजन्ते ह्यपि बिप्रियकारिषु ॥ १०९ ॥ जेव्हा प्रतिकूळ आचरण करणाऱ्याही प्रियकरांना चन्द्रातपाने विह्ळ झालेल्या श्लिया आठिंगन देतात तेव्हा तो प्रच्छेदक असे समजावे. अथ प्रच्छेदकाडुकृतं वेचित्र्यं योजयितुमाह प्रच्छेदेक इति । 'ज्योत्स्नायां मदिरायां वा साठेळे दर्पणे5थ वा । छायां कान्तस्य संहद्य प्रहष्याथ विभूषितम्‌ ॥' इत्यादि प्रच्छेदकस्य लक्षण . .. पान ईषत्प्रातिबिम्बिततदाकृतिदर्शाने सति कान्ताया: प्रहर्णे इति त्रिथा प्रच्छेदं प्रतिबिम्बामिति पर्य ... 'गोरीचळणग्गलग्गपडिबिंबं इत्यादि । तत्र त्रिविधे ज्योत्स्नेवोपयोगिनी . .. पानठीलापि स्वार्धानभर्तुकोचेत- संभोगविदोषोपळस्भेन । एतदुक्त॑ भवाते । ळोकवृत्ते तावन्न सर्वदा संपूर्णचन्द्रोदयो भवाते । प्रयोगे तु संभावनागर्भतया रसोपयोगी कालविशेषो गरह्ीतव्यः । तथा च रत्नावल्यां भरूयसा चन्द्रोदयो वार्णितः 'संप्रत्येष सरोरुहद्युतिमुषः' इति, 'उदय- तटान्तरितम्‌' इते, वक्‍त्रेन्दी तव सत्ययं यदपरः शोतांशुरभ्युद्धतः इति । एवं रसोपयोग्यळीकिककालविदोषग्रहणं प्रच्छेदकादुपजीवितम। यदाइरुपाध्यायपादाः - यद्यत्रास्ति न तत्रास्य कविवर्णनमर्हति । यत्रासंभवि तत्रास्य तद्ठण्ये सौमनस्यदम्‌ ॥ देशो५द्रिदन्तुरो द्योर्वा तडित्कृण्डलमण्डिता । नदी कृष्णा5थवा न स्यात्कि कदाचन कुत्रचित्‌ ॥ इत्यादि । आता प्रच्छेदक ह्या लास्यांगाने उत्पन्न झालेल्या वैचित्र्याची योजना करण्यासाठी 'प्रच्छेदकः' इत्यादी म्हणतात. “चन्द्रप्रकाशात मदिरेमध्ये, पाण्यामध्ये किंवा आरशामध्ये प्रियकराचे प्रतिबिंब पाहून आनंदित होऊन विभूषित केलेल्या' इत्यादी वचनातील प्रच्छेदेकाच्या लक्षणात .... पेयामध्ये किंचित प्रतिबिंबित झालेल्या प्रियकराच्या आकृतीचे दशन झाले असता कान्तेळा आनंद होतो म्हणून तीन प्रकारे प्रच्छेद म्हणजे प्रतिबिंब... “पावेतीच्या चरणांच्या नखांत ज्याचे प्रतिबिंब पडले आहे' इत्यादी. या तीनही प्रकारांत चन्द्रप्रकाशच उपयोगी असतो . . . पानलीला सुद्धा स्वाधीनपतिकेळा उचित अशा विशिष्ट संभोगाच्या प्राप्तीसुळे, याचा अर्थ असा. लळोकरहाटीत पूर्ण चन्द्राचा उदय सदासर्वदा होत नाही. परंतु प्रयोगामध्ये संभाव्यता असल्यामुळे रसाळा उपयोगी असा विशिष्ट काल समजावा लागतो. उदाहरणार्थ, रत्नावडीत पुष्कळदा चन्द्रोदयाचे वर्णन केळे आहे : आता हा नृपसमुह्य कमळांहूनही .अति सुंदर अशा' इत्यादी, 'उद्यपर्वताच्या तटाने १९,१०९ २९७ झाकलेल्या' इत्यादी, 'तुझा मुखचन्द्र असताही हा दुसरा चन्द्र उगवला आहे! इत्यादी. याप्रमाणे रसाला उपयोगी अशा अलौकिक काळविशेषाची योजना प्रच्छेदकातून घेतली आहे. आमच्या गुरुजींनी यासंबंधात म्हटले आहे - 'जी गोष्ट ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी तिचे कवीने वर्णन करणे श्रेयस्कर नसते. जेथे ती संभवनीय नसते तेथे तिःचे त्याने केलेले वर्णन आह्ाददायक होते. पर्वतांनी दंतुर झालेळा देश, विद्युट्रूपी कुंडळाने मंडित आकाश, अथवा कृष्णवण नदी - या गोष्टी कधीही कोठेही असणार नाहीत काय £ 'ज्योत्स्नायां इ०' हा ३१ व्या तालाच्यायातील प्रच्छेदकाच्या वर्णनपर *होकांपेकी एक (३४९वा) आहे. - 'प्रच्छेदकस्य? मुद्रित पाठ 'त्रिधाप्रच्छेदकस्य' आहे. परंतु या ठिकाणी 'त्रिधा आवेैश्यक नाही. - 'प्रतिबिम्षित- ही मुळातील 'प्रतिविमलित-!ची सुचविलेली दुरुस्ती आहे. त्याचप्रमाणे पुढे 'प्रतिविमळ' च्या जागी “प्रतिबिम्ब” शब्द सुचविला आहे. प्रच्छेद शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी पर्याय म्हणून प्रतिबिम्ब शब्द योजला आहे असे दिसते. मुद्रित पाठ 'प्रतिफलित- आणि 'प्रति विमळ (फलन?) ? असे आहेत. ते अर्शबोधास सुगम नाहीत. -- 'गोरीचळण-? शिवस्तुतिपर ही गाथा गुणाढ्याच्या बृहत्कथेत पेश्शाची प्राकृतात प्रारंभी मंगळकछोक म्हणून होती. तिचे महाराष्ट्री प्राकतातील रूप पुढीलप्रमाण आढळते - पणमह॒पणअप्पकुविअगोरीचळणग्गलग्गपडिविंबं । तंखु णहद्प्पणेसु अ एआअस' तणुअरं रुह ॥ 'पानळीलापि” ही मुळातील “घानलीलानिःची सुचविलेली दुरुस्ती आहे. “तंप्रत्येष इ०? हा शोक वर ३३ व्या छोकावरील टीपेत उद्धत केला आहे. - 'उद्यतटा- इ०' हा संपूण *होक पुढीलप्रमाण आहे - उद्यतरटान्तरितमियं प्राची सूचयति दिड निद्वानाथम । परिपाण्डुना मुखेन प्रियमिव हृदयख्थितं रमणी ॥ - वक्‍तरेन्दी तब इ०' हा कोक वर ३८ व्या कोकावरील टीपेत उद्धत केला आहे. - 'यद्यत्रास्ति इ०' भट्ट तोताच्या या दोन छोकांत काही दुरुस्ती सुचविळी आहे. दुसन्या ओळीत 'यन्नासंभविर च्या जागी 'यत्रासंभवि' आणि चोथ्या ओळीत हस्तलिखितातील 'कृष्णार च्या जागी “नदी कृष्णा? असे पाठ सुचविले आहेत. मुद्रितात चौथ्या ओळीत 'ईद्क्‌ स्यादथवा न स्यात? असा पाठ आहे. 'कविः अस्य वर्णनं न अर्हति? ही शब्दरचना विशेष समाधानकारक नाही. पहिल्या 'छोकात भट्ट तोताच्या म्हणण्याचा आशय असा दिसतो - जी गोष्ट वास्तवात जशी असेल तश्नीच ती चितारण यात कवीचे असे काही कौशल्य प्रतीत होत नाही. सामान्यतः संमाव्य नसणाऱ्या गोष्टी रसिकांना संभाव्य वाटावयास लावणे यात त्याचे खरे कोडल्य आहे. दुसऱ्या “छोकात याची तीन उदाहरणे दिली आहित. दन्तुर म्हणजे दात असलेला. देशाच्या संबंधात हे विशेषण असंभाव्य आहे. पण लक्षणेच्या साहाय्यानें कवीने ते संभाव्य केळे आहे. तसेच आकाशाला कुण्डनेंल हे बाच्यार्था २९८ | नाट्यशास्त्र असंभाव्य वचन कवीनें संभाव्य बनविले आहे. काळ्या रंगाची नदी प्रत्यक्षात तशी काळी नसते. पण कवी ती आहे असे वाटावयास लावतो. “छोकाच्या शेवटी जो प्रश्न विचारला आहे त्याचा आशय असा दिसतो की या गोष्टी प्रत्यक्षात कोठेही नसल्या तरी कविकल्पनेत त्यांचे अस्तित्व असते. प्रस्तुत संदर्भात भट्टतोताचे हे मत उद्धत करण्याचे प्रयोजन असे की कोणत्याही दिवशी पूर्ण चन्द्राचा उद्य प्रत्यक्षात संभवनीय नसला तरी कविकल्मनेने तो संमाव्य वाटावयास लावला आहे निष्ठ्रःहक्ष्णपदं समवृत्तेरलंकृतम्‌ । नाट्य पुरुषभावाळ्यं त्रिमूढकमिति स्मृतम्‌ ॥ ११० ॥ सोम्य व मरूदु शब्द असलेले, सम वृत्तांनी अलंकृत झालेले व पुरुषाच्या विविध भावांनी संपन्न असे जे नाट्य त्याला त्रिमूढक असे म्हणतात अथ त्रिमूढकादुपयोगिनं भागं निरूपयितुमाह अनि षएर-छक्ष्णपद मित्यादि । त्रिमूढके तावहास्याह्ठे नायकस्य व्यलीकवशांदेकस्या ईर्ष्यातो5भिन- वायाः प्रयमप्रणयबद्धळज्ञादिनाते मोहस्त्रयाणाम्‌ । तत्र नायकस्यावऱ्यमनिष्ठ- राण्येवोदयनविषयाणीव वचांसि भवन्ति । तत इह॒वचसि रसोपयोगी गुणा- छंकारांशः स्वीकतेव्यः । न हि लोके तहते माधुरयोजःप्रथ्ष्तिगुणगणो5स्ति । सर्वा ह्यवमाविष्टो यत्किचिद्ददति तत्काव्यमेव स्यात्‌, छायामात्रेण त्वंशतः । सर्वे हि पूरणत्वादनुपयोग्येव । तस्मादलीकिकमेवेतंद्वैचित्र्य रसोपयोगि । सर्व तटू- णग्नामकूतम्‌ । समवृत्तेरित्यनेन वृत्तकृतवेचित्र्यं, पुरुषभावाढ्यामेत्यनेन पात्रकृत- मपि हेळाहावादि, एवं विशेषकूृतं वैचित्र्य तत्र नाट्ये$स्त्यथ च सोन्दर्य- €”>_*-_ मस्तीति दर्शयन्‌ गुणानामेवान्वयव्यातिरेकाभ्यां तत्र प्रभावं दर्शयति । आता त्रिमूढकातून ध्यावयाच्या उपयोगी भागाचे निरूपण करण्यासाठी 'अनिष्ठर- छक्ष्णपदम! इत्यादी सांगतात. त्रिमूढक ह्या लास्यांगामध्ये नायकाच्या अपराधीपणामुळे एका नायिकेच्या इष्येमुळे, दुसऱ्या नूतन नायिकेच्या प्रथम प्रणयामुळे उत्पन होणाऱ्या लज्ञा वंगैरेमुळे, याप्रमाणे तिघांना मोह होतो. त्यांपैकी नायकाच्या उक्ती अवश्य उदयनाच्या उक्तोंप्रमाणे सौम्यच असतात. त्यातून या ठिकाणच्या वचनात रसाला उपयोगी असा गुण व अलंकार यांचा अंश स्वीकृत करावयाचा आहे. कारण, त्याशिवाय ह्या लोकात माधुर्य, ओज प्रश्रती गुणांचा समूह असत नाही. याप्रमाणे भावनेने भारलेला प्रत्येक जण जे काही बोलतो ते काव्यच असू शकते, परंतु अंरतः केवळ छायास्वखूपात. पूणे असल्यामुळे सर्वेच्या सर्व उपयोगी होत नाही. म्हणून अलौकिक असेच हे वैचित्र्य १ नि -स्वल्प-. २ नि -मुदाहतम. १९.११० | २९९ रसाला उपयोगी होते. ते सर्वे गुणसमूहामुळे होते. “सम वृत्तांनी' याने निर्दिष्ट दृत्तांच्या उपयोगाने आलेळे वैचित्र्य, “पुरुषांच्या भावांनी संपन्न' याने निर्दिष्ट पात्रांच्या हेला, हाव आदींचे बैचित्र्य - याप्रमाणे वैशिष्टययुक्त वैचित्रय त्या नाट्यात असते आणि त्यामुळे सौन्दर्य उत्पन होते हे दाखवून अस्तिपक्षी आणि नास्तिपक्षी दोन्ही प्रकारच्या विधानांनी . गुणांचाच तेथे प्रभाव असतो हे दाखवितात. “व्यलीक' म्हणजे खोटा अथवा अपराधी असे दोन्ही अर्थ संभवतात. - 'देर्ष्यातो? इेष्येचा निर्देश तालाध्यायातील त्रिमूढकाच्या ३१.३५८ छोकावरील व्याख्येत केला आहे. तोच शब्द येथेही अमिप्रेत असणार. मुळात 'द्वेष्यतो' आहे. - “उद्यनविषयाणि? म्हणजे कबीने उद्यनाच्या तोंडी घातली आहेत तशी वचनें. हस्तलिखितात यानंतर “इव? शब्द नाही. पण तो आवबद्र्‍यक आहे असे दिसते. लास्याह्ठ' त्रिमूढकात उद्यनाच्या वचनांतारखी सौम्य वचने असतात, तेथून नाट्यात तशीच म्हणजे गुणालंकारांनी युक्त वचने रसोपयोगी म्हणून घेतळी आहेत असे येथे म्हणावयाचे आहे, आणि याचे तात्पय म्हणून त्या लास्याद्वातून गुण आणि अलंकार घेतले आहेत असे म्हटले आहे. - 'तहते' ही मुळातील 'यह्ते' ची सुचविलेली दुरुस्ती आहे. “यत्‌ चा पुढे अन्बय लावता येण्यासारखा नाही. 'तत्‌ः ने गुणालंकारांगाःचा निर्देश अमिप्रेत आहे असे तमजता येईल. - 'एवमाविष्टः? म्हणजे व्यलीकभाव, इेर्ष्या, लञञा आदी भावांनी आविष्ट झालेला असा अर्थ अभिप्रेत दिसतो. - 'छायामात्रेण त्वंशतः? याचा अथ स्पष्ट नाही. भावावेश्याने मनुष्य बोलतो ते काव्यमय असू शकते, पण ते सर्वेच बोलणे काव्यमय नसते, तर गुणालंकारांनी युक्त असा अंशच तसा असतो असा अर्थ असण्याची शक्‍यता आहे. 'छाया? राब्दाचे प्रयोजन नीट लक्षात येत नाही. - 'सर्वो हि पूर्णत्वात्‌ः ही सुचविलेछी दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “सर्वो5- पूणत्वातर आणि मुद्रितात 'स एवबापूर्णत्वातः असे पाठ आहेत. वस्तुतः ह्या वाक्याचा अथेही स्पष्ट नाही. मागील बाक्‍याच्या अनुरोधाने सर्व म्हणजे मावाविष्ट मनुष्य जे बोलतो ते सर्वे अद्या तऱ्हेचा अर्थ दाक्य आहे. अपूर्ण असे त्यांचे विशोषण समर्पक होणार नाही. पुढील बाक्याच्या अनुरोधाने सर्व म्हणजे त्रिमूढक लास्याज्ञांचा त्वे भाग असाही अर्थ असण्याची शक्‍यता आहि. - 'समवृत्तेः ज्यांच्या चारही चरणांत तीच अक्षरसख्या असते अशी कुत्ते. - 'हेलाहावादि' ही मुळातील 'हे- लाभावादि? ची दुरुस्ती आहे. बाविसाव्या अध्यायात छोक १० मध्ये “हाव? चे वर्णन असन ११ व्या ोकात 'हेला? चे वणेन आहे - तचाक्षिभ्रूविकाराढ्यः शुज्ञाराकारसूचकः सश्रीवारेचको ज्ञेयो हावः स्थितसमुत्यितः | यो वै हावः स एवेषा शहररससंभवा । समाख्याता बुघैहेला ठलिताभिनयात्मिका ॥ (२२.१०-११) हाव आणि हेला यांच्या व्याख्या अभिनवगुप्ताने पुढे ११२ व्या छोकावरील टीकेत अंशतः उद्धत केल्या आहेंत. -. 'तत्र नाट्ये' मुळात 'यत्र आहि. पण त्याचा पुढे अन्वय लागत नाही “अन्बयव्यतिरेकाभ्याम? “अनिष्ठुर? यात व्यतिरेक आहे आणि “'लक्ष्णपद? यात अन्बय आहे ३०० ' नाटयदास्त्र पात्रं विभ्रष्टसंकेतं सुव्यक्तकरणान्वितम्‌ । प्राकृतेवंचनेयुक्त॑ विदुः सन्धवकं बुधाः ॥ १११ ॥ संकेतांपासून च्युत झालेले, सुस्पष्ट अश्या क्रियांनी अन्वित असलेळे आणि प्राकृत वचनांनी युक्त असलेले जे पात्र त्याला सुद्धा प्राज्ञ लोक सैन्धवक म्हणतात. अथ सैन्थवकादुपजीव्यमंदां स्वीक्तुंमाह पात्रं विभ्रष्टसंकेतमिति । 'सेन्थवी- माश्रितं भाषां ज्ञेय सैन्ववकं बुभैः । रूपवाद्यादिसंयुक्तम' इति लास्याई 'लक्ष्यते । तज यदा नान्यप्राकृतादिंभाषोपकरणत्वेन सैन्थवीप्राया आश्रीयते तद्रसोपयोगिरअनादिः तदा अलौंकिको5यमर्था रञअनोपयोगी लास्याडुःत्स्वी- कृतो भवति । तथाहि शद्ठाररसे सातिशयोपयोगिनी प्राकृतभाषेति सट्टकः कपूर- मअयांख्यो राजदशेखरेण तन्मय एव निबद्धः, भेज्लेन राधाविप्रलम्भाख्यो रासकाडुः सैन्थवभाषाबाहल्येन, चन्द्रकेण स्वानि रूपकाणि वीररोद्राधिकोप- योगिसंस्कृतभाषयेव । अत एव च तत्तद्रसापयोगतारतम्यांदेवेकतमस्यातो5न्य- स्यात्र प्राधान्य कल्प्यते । तदेतदाह पात्रमित्यादिना । जातावेकवचनम्‌ । तेन यत्र पात्राणि प्राकृतेवचनेयुक्तानि । अत एव विभ्रष्टः संकेतविशेषो रसोचितः काक्ध्याये. कथितपूर्व' स एष भ्रष्टात्मा भ्रंश नीतः यत्र, सृष्ठु व्यक्तियंतो रसस्य तेनेव करणेन वीणावाद्यादिक्रिययान्वितं पात्रं सेन्थवकमिति । विषयत- दुतोरभेदोपचारात्‌ । तेन दशरूपकस्य यद्भधाषाकृतं वैचित्र्य कोहलादिभिरुत्तं तदिह मुनिना सेन्धवाडुर्ननेरूपणे स्वीकूतमेव । करुणान्वितमिति त्वपपाठः । एवं पाठ्यविहीनं सैन्थवकमिति यथा रत्नावल्यां विदूषको नृत्यतीति प्रियातिथि- प्रति मुनिमतोपेक्षयेव ठक्षणमुदाहरणं च कृतं न चोक्तं युक्त्या किंचिदित्य- सदेव । आता सैन्धवक ह्या लास्यांगातून घ्यावयाच्या अंशाचा स्वीकार करण्यासाठी “पात्रं विभ्रष्टसंकेतम? इत्यादी सांगतात. ह्या लास्यांगाचे लक्षण पुढीलप्रमाणे करणार आहेत -- 'सैन्धवी भाषेचा उपयोगं करणारे, रूप, वाद्य आदींनी युक्त ते सैन्धवक असे प्राज्ञ लोकांनी जाणावे'. त्यात जेव्हा अन्य प्राकृत आदी भाषेचे उपकरण नसलेली अशा स्वरूपात, त्यातील रसाला उपयोगी/आणि रंजन. भादी करणारी म्हणून सैन्धवी भाषेचा उपयोग केला जातो तेव्हा हा अलौकिक असा रंजनाला उपयोगी प्रकार लास्यांगातून स्वीकत केला जातो. उदाहरणार्थ, शुड्गाररसामध्ये प्राकृत भाषा अतिशय उपयोगी १ नि पावविस्मत-. र (९९ ३०१ म्हणून राजशेखराने कर्पूरमञ्जरी नावाचे सड्टक त्याच भाषेत लिहिले आहे, मेज्जलाने राधाविप्रलभ्म नावाचे एक अंकी रासक सैन्धव भाषेचा पुष्कळ प्रमाणात उपयोग करून ठरिहिळे आहे आणि चन्द्रकाने आपली रूपके वीर आणि रौद्र रसांन 1 भघिक उपयोगी असलेल्या संस्कृत भाषेतच लिहिळी आहेत. आणि म्हणूनच त्या त्या रसात होणाऱ्या उपयोगाच्या कमीअधिक प्रमाणानुसार ह्या भाषांपैकी एकीचे प्राधान्य कल्पिळे जाते. तेच 'पात्रम! इत्यादी झोकात सांगतात. पात्रम्‌ शब्दातीळ एकवचन जातिनिदर्शक आहे. म्हणून ज्यात पात्रें प्राकूत भाषेत बोठतात ते असा अर्थ, म्हणूनच काक्कव्यायात पूर्वी सांगितलेले रसाळा अनुरूप असे जे विशिष्ट संकेत ते विभ्रष्ट झाले आहेत असे, ज्यापासून रसाची उत्तम प्रकारे अभिव्यक्ती होते असे आणि त्याच करणाने म्हणजे वीणावादनादी क्रियेने युक्त असे पात्र ते सैन्ववक. विषय आणि विषयी यांच्यात अभेद असल्याच्या उपचारामुळे पात्राळा सैन्धवक म्हटले आहे. म्हणून कोहल प्रभृतींनी भाषेच्या अनुरोधाने दहा रूपकांच्या प्रकारांचा जो निर्देदा केळा आहे त्याचा भरतमुनीने येथे सैन्धवक अंगाच्या निरूपणात स्वीकार केलाच आहे. 'करुणान्वितम! हा पाठ तर न्चुकीचाच आहे. त्याचश्रमाणे 'पाठ्यविरहित ते सैन्धवक', उदाहरणाथ रत्नावळीत 'विदूषक नाचतो' प्रिय गोष्टीने आनंद वगैरे अशी जी भरतमुनीच्या मता'ची उपेक्षा करूनच लक्षण व उदाहरणे उद्धृत केली आहेत आणि त्याबद्दद कोणताही युक्तिवाद केला नाही म्हणून तेही बरोबर नाहीच. 'सिन्बबीमाश्रित इ०? ह्या 'होकाचा चतुर्थ चरण 'युग्मतालक्त तथा |]? (३१.३५९) असा आहे. त्या रहोकातील रूप? म्हणजे वादनाचा एक प्रकार असा अर्थ असावा. २९,११३ वरील टीकेत अमिनव- गुप्ताने तो अथ दिला आहे. सैन्थवी म्हणजे सिन्थु नदीच्या तीरावर राहाणाऱ्या लोकांत प्रचलित असलेली प्राकृत भाषा. पंजाब ते तिंध यातील कोणता विशिष्ट प्रदेश अभिप्रेत आहे ते निश्चित नाही. सतराव्या अध्यायात अनेक प्राकृत भाषांचा निर्देश आहे, त्यात तेन्धवीचे नाव नाही. - 'नान्यप्राकृता- या समासाचा तातर्याथ “स्वतंत्रपणे असा आहे. - 'तट्रसोपयोगिरज्ञनादिः? असा हस्तलिखितात पाठ आहे. 'सेन्थंबीप्राया भाषा*चे ते बिशेषण आहे असे समजता येण्यासारखे आहे. 'तदू? ने सैन्धबी भाषेचा उपयोग असलेल्या रूपकाचा निर्देश अभिप्रेत आहे असे मानता येईल. सुद्रितातीळ पाठात 'रक्षनाधिक्यात्‌? असा स्वतंत्र शब्द आहे. यानंतरचा “तदा? राब्द मुद्रितात नाही. पण तो आवश्यक वाटतो. - 'तत्तद्रतोपयोग- इ०? याचा अर्थ असा की रूपकाची भाषा त्यातील रसाच्या अनुरोधाने संस्कृत, प्राकूत यापैकी कोणतीही असू शकेल. हा निष्कर्ष सैन्धवक लास्याड्ञाच्या व्याख्येतून काढला आहे. - 'काकध्याये? म्हणजे काकुविषयक सतराव्या अध्यायात, तेथे ११४-१३२१ ह्या भागात रसाच्या अनुरोधाने पाठ्यातील स्वरयोजनेतंबंधी काही संकेत निर्दिष्ट केळे आहेत. -- 'भ्रष्टात्मा' या शब्दापुढील हस्तलिखितातील पाठ अत्यंत भ्रष्ट आहे. वर स्वीकारलेला पाठ मुद्रितानुसारी आहे, फक्त मुद्रितात 'नीतः? नंतर 'संकेतो? शब्द अधिक आहे. - सुष्टु व्यक्तिर्यंतो रसस्य' असे दिसते की अमिनवयुस्ताचा द्वितीय चरणातील पाठ 'सुव्यक्तं करणान्वितम? असा होता. “यतः” म्हणजे 'यस्मात, पात्रात, - “विषयतद्वतोः' तैन्धभवक हा विषय आणि पात्र हा विषयिन्‌, यांच्यात अभेद ३०२ नाट्यशास्त्र कल्पल्यामुळे पात्राला सेन्धवक म्हटले आहे. - ' प्रियातिथिप्रमृतिः' असा हस्तलिखितातील पाठ आहे. त्यात 'अतिथिर शब्द तर्पमक नाहो. प्रिय म्हणजे मनासारखी गोष्ट घडल्यामुळे होणाऱ्या आनंदाचे प्रदशान असा अर्थ येथे अभिप्रेत असावा, मुद्रितात 'प्रियाप्रतिनिधिप्रश्नंश असा पाठ आहे. त्याने अर्थ कोणत्याही तऱ्हेने सुगम होत नाही. - उदाहरणम मुद्रित पाठ ठदाहतम? आहे. पुढे “कुतम असल्यामुळे हा पाठ मूळ असण्याची शक्‍यता कमी. वरील टीकेच्या शेबटी निर्दिष्ट केलेल्या मतान्तराला धरून असलेली सेन्धवकाची व्याख्या? देणारा शोक बडोदे प्रतीत प्रस्तुत ळोकानंतर कंसात दिळेला आढळतो - रूपवाद्यादिसंयुक्त॑ पाठ्येन च विवर्जितम्‌ । क आड विज्ञे 4 चोर क र र नाट्य हि त विज्ञेयं सेन्धवं नाट्यकोविदे:॥ मंखप्रतिसुखोपेतं चतुर्श्रपदक्रमम्‌ । श्हिष्टभावरसोपेत वेच्चित्र्याथे ड्रिमूढके ॥ ११२ ॥ मुख आणि प्रतिमुख यांनी युक्त, चारही दिशांना पदन्यास असळेळे आणि सुश्ि्ट भाव व रस यांनी समृद्ध असे नाटय ह्विमूढकामध्ये वैचित्र्य उतपन्न कर- ण्यासाठी योजतात. | क | द्विमूढकादैचित्र्यांशां स्वीकरोति मुखप्रतिमुखमित्यादिना । यत्र काव्ये लास्यगीताश्रये दृयोर्नायकस्य नायिकायाश्व नायिकयोरेव वा त्रिमूढक इव मोहो व्यावर्ण्यते तत्र तालळनिरूपणायामेकस्ताठश्वतुर्भिः पार्देयुक्तः सन्नावतत इति वक्ष्यते - | मुखप्रातिमुखोपेतं तथा चाचपुटाश्रयम्‌ । यथाक्षरेः संनिपातैस्तथा द्वादराभि्यांतम्‌ ॥ इति । तस्मादड्भाज्लुः'परिक्रमे यदेव ताळानुसरणं चतु्षु च मुखेषु गतिपरिसमापनं लोके गत्यादावपरिद्ृष्टमपि नटसामाजिकवगंसविधत्वापादनेन साम्यांशस्यानन्दस्वभोव- तया रसांशेतराड्रुत्वादातिशयेन रसोपयोगीति तत्स्वीकृतम्‌ । मुखं यदग्रे सामा- जिकाः प्रतिमुखं ततो5न्या दिशो, लास्याडं नेत मुखप्रतिमुखे गीतकाडु्वेन चतुरश्रं कृत्वा कान्तदिक्चतुष्टयेः पंदेः क्रमणं यत्रेति । किभेवं सति भवतीत्याह वैपित्र्याथंम्‌ , वैचित्र्यमत्र प्रयोजनमिति । तेनापि किमिति चेत्तत आह श्लिष्ट- १ नि शुभाथंगीतामितयं चतुरसपदक्रमम्‌ । स्पष्टभावरसोपेतं व्याजचेष्टं द्विमूढळकम्‌ ।॥। १९९ २०३ भावेन सर्वसास्यलक्षणेन चित्तव्रात्तेसंघट्टनेन रसानामुपेतमुपगतं स्फुटत्वं येनेति । गीतकाडुमभ्यां मुखप्रतिमुखाभ्यामडसोष्टवेन रसभावेनायिकादवयरचनया च युत- मिति श्रीशब्ुकाद्याः । तः्च प्रागेव परीक्षितम्‌ । मुखभ्रातिसुखो संधी इत्येतदायि न समीचीनम अनुपयोगादस्याथंस्य, इत्युपाव्यायमतमेवानवद्यमावेदितपूर्व ग्राह्यम्‌ । | । 'मुखप्रतिमुखम? इत्यादी शब्दांत द्विमूढक ह्या लास्याड्रातून वैचित्र्ययूण अंशाचा स्वीकार करतात. जेथे लास्यातीळ गीताळा आश्रयभूत असलेल्या काव्यामध्ये दोघांच्या म्हणजे नायक्क व नायिका यांच्या किंवा दोन नायिकांच्याच मोहा'चे त्रिमूढकातल्या- प्रमाणे वर्णन केले जाते तेथे तालाचे निरूपण करताना एक ताळ चार पदक्रम- णाने युक्त असून त्याची आवृत्ती होते असे सांगणार आहेत - 'मुख आणि प्रति- मुख यांनी युक्त, तसेच 'चाचपुट ताठाच्या आश्रयाने असलेले, तसेच अक्षरांच्या अनुरोधाने बारा संनिपातांनी युक्त (ते द्विमूढक ?. म्हणून प्रत्येक अंगाच्या परिक्र- मणामध्ये जे ताळाचे अनुसरण आणि चार दिशांना होणारी गतीची परिसमाष्ठी ह्या गोष्टींच लौकिक गती वगैरेमध्ये दिसून येत नसल्या तरी नट आणि प्रेक्षकवर्ग यांच्यात सांनिध्य उप्तन करून - साम्याचा अंश स्वभावतः आनन्ददायक असल्या- कारणाने - रस खेरीज करून इतर अंशाच्या अंगभूत होतात म्हणून रसाला अत्यंत उपयोगी होतात, यास्तव त्या स्वीकृत केल्या आहेत. मुख म्हणजे समोर प्रेक्षक असतात ती दिशा आणि प्रतिसुख म्हणजे तिच्याहून अन्य दिशा; लास्याड सिद्ध कर- ण्यासाठी मुख आणि प्रतिमुख दिशांत गीताचे अंग म्हणून चार वेळा चार दिशांना केलेळा पदांचा विन्यास ज्यात आहे ते द्विमूढक. असे केळे असता काय होते याचे उत्तर 'बैचित्र्याथेम! या शब्दात देतात. वैचित्र्य हे याचे प्रयोजन असा अर्थ. त्यामुळे तरी काय होते ते सांगतात -- छ्लिष्ट भावाने म्हणजे सर्वसाम्य स्वरूपाच्या चित्तवृत्तीच्या संघटनामुळे रसांना जेणेकरून स्फुटता येते ते. श्रीशा्षूकप्रभृतींचे असे मत आहे की हे नाट्यांग मुख आणि प्रतिमुख ह्या गीताच्या अंगांनी, अंगसौष्ठवाने, रस आणि भाव यांनी आणि दोन नायिकांच्या योजनेने युक्त असते. त्या मताःचा समाचार पूर्वीच घेतळा आहे. मुख आणि प्रतिसुख हे दोन संधी हा अर्थ सुद्धा योग्य नाही, कारण तो निरुपयोगी आहे. म्हणून वर मांडलेले आमच्या गुरुजींचे मतच निदोष असे समजावे. 'लास्यगीताश्रये' ही मुळातील 'लास्यमित्याश्रये? ची सुचविलेली दुरुस्ती आहे. *मिति! म्हणजे मान असा मधला शब्द आहे हे तंभाव्य असले तरी तो अर्थबोधात निरुपयोगी आहे. २१०४ नाट्यशास्त्र लास्यनृत्ताला गीताची साथ असतेच. - 'नायिकयोरेव वा? हस्तलिखितात “वा? चे “पा? असे भ्रष्ट रूप आहे. मुद्रितात 'एव' नाही. - 'त्रिमूढक? ही हस्तलिखितातील 'तिमूढक' ची दुरुस्ती आहे. मुद्रितात “प्रतिमूढक' असा पाठ आहे. त्याला अर्थ नाही. त्रिमूढकात तिघांना मोह होतो तर दविमूढकात दोघांनाच. - 'तालनिरूपणायाम्‌? म्हणजे ३१ व्या तालाध्यायात. -- “बक्ष्यते? येथे उद्धत केलेले वचन ३१.३६०-३६१ मध्ये आढळते. त्या ठिकाणी झख आणि प्रतिमुख ही नत्ताच्या दोन अंशांची नावे असा अर्थ अमिप्रेत आहे. नत्ताच्या एकूण चार भागांचा निदेश ३१.८८ मध्ये आहे. चाचपुट हे त्र्यश्न तालाचे दुसरे नाव. संनिपात म्हणजे दोन्ही हातांची मृदज्कावर वगेरे एकाच वेळी थाप (हस्तयोस्तु समः पातः संनिपात इति स्मृतः -२ १.३७) . यथाक्षर म्हणजे नत्ताच्या वेळी गात असलेल्या गीतातील अक्षरांना अनुसरून केले जाणारे तंनिपात. द्विमूढक लास्याडूगत बारा अततात. - “अड्भाडूपरिक्रमे' हे नाट्यात होणाऱ्या परिक्रमाला अनुलक्षून म्हटले आहे. नाटकांत परिक्रमणाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा अमिनय -होतो हे प्रसिद्ध आहे. 'अड्ल” शब्दाच्या द्विरूक्तीचे प्रयोजन स्पष्ट नाही. कदाचित “नाट्याडू” अत्ता मूळ पाठ असावा. - 'सविधत्वापादनेन' ही हस्तलिखितातील “सर्विधव्यापादनेन” ची दुरुस्ती आहे. मुद्रितात “सविधाध्यासनेंन' असा पाठ स्वीकारला आहे तो तंभाव्य वाटत नाही. परिक्रमणानें नट व प्रेक्षक यांत सांनिध्य उत्पन्न होते असे येथे म्हटले आहे. - “साम्यांशस्य* नाट्यातील परिक्रमणात असलेली गती एरत्यक्ष लोकांत दिसून येत नसली तरी तिचे लौकिक गतीश्ी काहीसे साम्य असल्याचा प्रेक्षकांना प्रत्यय येतो आणि हा प्रत्यय आनंदप्रद अततो असे येथे म्हणावयाचे आहे. - 'रसांशेतराड्ठुत्वात? गतीतील साम्याच्या प्रतीतीने होणारा आनंद हा रसोत्पत्तीस साक्षात कारणीभूत होणारा नसून त्याहून मिन्न असे नाट्याचे एक अंग आहे. तर्थापे, रसाच्या एकूण परिपोषाला तो ताहाय्यकच होतो. - 'प्रतिमुखं ततोडन्या? ही हस्तलिखितातील 'प्रतिमुख्यन्तरोडन्या? ची दुरुस्ती आहे. मुद्रित पाठ 'प्रतिसुख्यस्ततो5न्याः असा आहे. पण 'प्रतिसुखी? असा शाब्द अभिप्रेत असण्याचा संमब नाही. - 'लास्याद्र॑ नेतुम? याचा अर्थ स्पष्ट नाही. वस्तुतः 'लास्यार ड्रृत करतात त्याप्रमाणे! चार दिशांना पदन्यास करून अक्शा तऱ्हेचा अर्थ येथे अपेक्षित आहे. “गीतकाड़ूत्वेन' हे वर्णन लास्याद्वाच्या बाबतीतच समर्पक आहे, नाट्यातील परिक्रमणाच्या बाबतीत नाही. त्यामुळे असा संभव वाटतो की ह्या शब्दानंतर मुळात (इव' शब्द असावा. मुद्रितात त्यानंतर “हि? शब्द आहे. पण त्याचे काही प्रयोजन दिसत नाही. - 'त्रिचतुरश्न कृत्वा असा हस्तलिस्वितातील पाठ आहे. तो मूळ आहे असे मानले तर त्यात त्र्यश्न किंवा चाचपुट तालाचा निर्देश आहे असा संभव मानता येईल. तथापि मूळ कोकात 'चतुरश्र' एवढाच शब्द असल्यामुळे “त्रि- मूळ नाही असे वाटते. मुद्रितात 'त्रि' च्या ऐवजीच “हि? हा पाठ स्वीकारलेला दिसतो. - 'श्िष्टमाव? याचा अर्थ चित्तवृत्तीचे संघट्टन, दृढीकरण असा केला आहे आणि ह्या चित्तवृत्तीचे स्वरूप साम्याची प्रतीती होणे हे आहे असे म्हटले आहे. - 'उपेतम? हा शब्द मुद्रितात चुकीने गळलेला दिसतो. - 'गीतकाड्भभ्याम्‌ इ०' श्रीशडूकुकाच्या मते मुख आणि प्रतिमुख ही गीत्ताची अज्ठे होत. उद्लो- प्यक आणि उत्तर नावाच्या दोन गीतप्रकारांत मुख आणि प्रतिमुख ही अंगे असल्याचे नाट्य- शास्त्रात (२१.२२४) म्हटठे आहे. - 'अड्भसोष्टवेन* ही व्याख्या छोकातील “चतुरश्रपदक्तमम ला अनुलक्षून श्रीशाड्कुकाने केली आहे. - 'प्रागेव' म्हणजे नाट्यात संपूर्ण ठास्याज्ठ' घेतळे जात नाहौ, तर त्यातील फक्त रसोपयोगी असा अलौकिक अंश असे प्रतिपादन करताना. १९.११२३ ३०५ उत्तमोत्तमर्क विद्यादनेकरससंश्रयम्‌ । विचित्रेः रहोकबन्थेश्र देलाहावविभूषितम्‌ ॥ ११३ ॥ अनेक रसांना आधारभूत, निरनिराळ्या छोकांत रचलेले आणि हेळा व हाव यांनी सुशोभित अंग ते उत्तमोत्तमक असे समजावे. अथोत्तमोत्तमकमद्ठ॑ नाट्य उपयोजयितुमाह उत्तमोत्तमकं विद्यादनेकरस- संश्रयमित्यादि । उत्तमोत्तमके त्वादों नकुंटं संप्रयोजयेत? इत्यादिना 'हेळाहाववि- भूषितम इत्यन्तन लास्याईः ठक्षयिष्यते । तत्र च चित्तवृत्तिपरिपोषो हेळाहावा- दिचिष्टालंकारमुखेन यः स्थितः सो5त्राळीकिकः सन्नुपजीव्यते । न हि भगवदव- तारस्य रामस्य कुळकलत्रमुपेक्ष्यं पराभवखळीकारश्य न सोढन्यः क्षत्रियेण च ळोककण्टकाभ्युद्धरणं कर्तव्यमिति यच्छास्त्रार्थपरिपालनमुत्तवा रावणह्ृतसीता- समानयनादारभ्य तदुचितं निमित्त परमार्थ, न तु यथा प्रति तत्र मुहर्व्या- थूता ... खारशमित्यादि वण्येते तथास्य तृतीयत्रेतावतीर्णस्य संभाव्यते । रामा- यणे5पि मुनिना तथा वर्णितमिति चेत्‌ किमतः । वेंदे$पि हि तथा वर्ण्यताम, न वयमतो5पि बिभीमः । स हि भागः काव्यं यत्र यत्र रसनिष्यन्दो वर्ण्य इत्युक्तमसकूत्‌ । ततश्वान्यतररअनोपक्रमविनेयहृदयसंवारदिवैचित्र्यांशो$सी नाट्ये लास्याझप्रसादोपनत एव । उत्तमानि तावहास्याडमनि तेभ्यो5पीदमुत्तमम्‌ । सर्व हि रसपयोयीति दरश्शितं प्राक्‌ । ततः संज्ञायां कन । अनेकस्यासाधारणस्य रसस्य संश्रयो5स्मित्निति स्थायिनो5नेकरूपत्वमुक्तम्‌ । 'छोके च बध्यन्त इति 'छोकबन्धा विधास्तेर्विविधेः परमार्थतो5भूतेः क्रचित्कदाचित्‌ संभवमात्रतया वर्णितेः युक्तम्‌ । यथा “आ: दुरात्मन्‌ रक्षः:, क्क नु खलु भे भ्रियतमामादाय गच्छसि । (विभाव्य) नवजलधरः संनद्धो5यम! इत्यादि पुरूरवस डाक्तिश्वानुरा- गेणेव व्याख्यातेति किं पुनरुत्त्या । हेळाहावैविशेषेण दीप्तोपगमनरूपेण भूषि- तमिति सात्विकाद्यभिनयवर्गस्य दीप्ततोप्लक्षिता । तत्राक्षिज्रूविकाराठयः शुद्धाराकारसंयुतः । सग्रीवारेचको कज्ञेया हावः स्थितसमुत्थितः ॥ य॒ एव हावः सा हेला ठठिताभिनयात्मिका । इति हेलाहावयोळेक्षणम्‌ । १ घो हेलाभाव- ५ ब -विचित्रितम्‌. ३०६ नाट्यशास्त्र आता उत्तमोत्तमक ह्या लास्यांगाची नाठ्यात योजना करण्यासाठी 'उत्तमोत्तमक विद्यादनेकरससंश्रयम! इत्यादी सांगतात. 'उत्तमोत्तमकामध्ये प्रथम नकुंटाची योजना करावी' येथपासून ते हेला आणि हाव यांनी वि भूषित' येथपर्यंत ह्या लास्यांगा'चे लक्षण सांगितळे जाणार आहे. त्यात हेला, हाव इत्यादी चेष्टितरू्य अलंकारांच्या द्वारा जो चित्तवरत्तीचा परिपोष स्थिर होतो तो ह्या ठिकाणी अलौकिक अशा ख्यात स्वीकृत केला जातो. भगवन्ताचा अवतार असलेल्या रामचन्द्राला कुलकलत्राची उपेक्षा करणे योग्य नव्हते, आणि पराभवाचा अपमान सहन करता येण्यासारखा नव्हता, तसेच क्षत्रियाने दुष्टांचे निर्दालन केळे पाहिजे ह्या शाख्राच्या आज्ञेचे परिपाठन करावयाचे आहे असे म्हणून रावणाने अपहरण केलेल्या सीतेला परत आणणे ह्या त्याच्या कृत्याचे तेच खरोखरीचे निमित्त, परंतु.... इत्यादी वर्णन करतात त्याप्रमाणे तृतीय त्रेतायुगात अवतीण ह्या राभा'च्या बाबतीत संभवत नाही. वाल्मीकिमुनीने रामायणात सुद्धा तसे वणन केळे आहे असे म्हटळे तर आम्ही विचारतो की म्हणून काय झाले ! वेदांत सुद्धा तसे वणन केलेळे असू द्या, त्याळा सुद्धा आम्ही भीत नाही. तोच भाग काव्य की जेथे जेथे रसाची अभिव्यक्ती वष्ीनाचा विषय होते असे आम्ही अनेकदा सांगितळे आहे. आणि म्हणून एक प्रकार'च्या रंजनाच्या द्वारा उपदेशास योग्य अशा प्रेक्षकांच्या हृदयाशी संवादिता साधणारा असा जो वैचित्र्यरूप अंश तो नाट्यात ठास्यांगाच्या कृपेनेच आलेला असतो. लास्यांगे ही उत्तम असतात. त्यापेक्षाही हे अह अधिक उत्तम, म्हणून उत्तमोत्तम, कारण नाव्यात सर्व काही रसाभोवती फिरणारे असते हे आम्ही पूर्वी दाखवून दिले आहे. त्या राब्दाह संज्ञार्थी क प्रत्यय ठांगळा आहे. अनेक म्हणजे असाधारण अशा रसाचा ज्यात संश्रय असतो ते, यात स्थायिभावाची अनेकरूपता निर्दिष्ट केली आहे. आणि *होकामध्ये बंदिस्त केळे जातात ते छोकबन्ध म्हणजे प्रकार, त्या विविध, वास्तत्रात अस्तित्वात नसलेल्या परंतु करचित कदाचित केवळ संभाव्य म्हणून वर्णिलेल्या, प्रकारांनी युक्त असे उत्तमोत्तमक, उदाहरणार्थ, विक्रमोवश्ीयात चौथ्या अंकातील पुरूरव्याची उक्ती “हा ! दुष्ट राक्षसा! माझ्या प्रियेळा घेऊन तू कोठे चाळळास १ ( नीट पाहून ) हा कटिबद्द झालेला नूतन मेघ आहे' इत्यादीची उपपत्ती अनुरागानेच लागते. तेव्हा हे सर्वे पुन्हा कशाला सांगावे? हेला आणि हाव यांनी विशेषेकरून म्हणजे दीत स्वरूपात अभिव्यक्त होऊन भूषित असे _ याने सात्विकप्रभती अभिनयप्रकारांची दीप्तता निर्दिष्ट होते. हेला आणि हाव यांचे लक्षण असे केळे आहे - 'त्यांत नेत्र आणि भ्रुकुटी यांच्या विकारांनी पूण असलेळ, शुंगाराच्या आकाराने युक्त असा, मानेच्या हाळचालीसहृ असलेला आणि असलेल्या ठिकाणीच उत्पन होणारा तो हाव असे समजावे. जो हाव तीच हेळा ललित अभिनयाच्या स्वख्या'ची'. | 'उत्तमोत्तमके इ०' ह्या लास्याज्ञाचे हे वर्णन तालाध्यायात २१.३६२-३६४ ह्या देठोकात आढळते. त्या ठिकाणी बडोदे प्रतीत 'हेलावृत्तिबिभूषितम? असा पाठ आहे. - 'नर्कुट्म_ गीतांमध्ये १९.११३ का योजाबयाच्या वृत्तांच्या प्रकारांपैकी नकुंट हा एक असुन त्यांचे पुन्हा आठ भेद असल्याचे म्ह्ट्ले असून त्या सर्व भेदांची उदाहरणे ३२.२७३-२९२ यांत दिळी आहेत. -- “-चेष्टालळंकार- हेला आणि हाब (यांच्या व्याख्या परिच्छेदाच्या शेबटी उड्धत केल्या आहेत) यांचे निदर्शक जे वेष्टित होते ते चित्तदृत्तिरूष भावांचे अलंकार बनते. हेला, हाव, इत्यादी सर्वे विकार भाव आणि रस यांच्या आश्रयाने असणारे अलंकार होत असे २२ व्या अध्यायात ४-५ ह्या छोकांत म्हटले आहे. -- “अलौकिकः मुद्रित पाठ 'लौकिक:? आहे. पण तो बरोबर नाही. लास्याज्ञातून नाट्यात घेतला जाणारा अंश सर्वे अलौकिक असल्याचे म्हटळे आहे. - 'न हि भगवदवतारस्य ३०? या ठिकाणी अमिनव- गुत्ताला असे म्हणावयाचे आहेसे दिसते को रामचरितावरील काव्यात बीररसाचा परिपोष साधण्या- साठी सीतेच्या अपहरणाची उपेक्षा न करणे, दुष्टांचे दमन करण्याचे क्षत्रियाचे कर्तव्य पार पाडणे इत्यादी उत्साहनिद्शक गोष्टींचे चित्रण आव्यक आहे, एखाद्या सामान्य नायकाप्रमाणे रामाच्या संबंधात विप्रलम्म शाज्ञाराचे वर्णन उचित होणार नाही. अश्या तऱ्हेचा निष्कर्ष संभाव्य आहे इतकेच, काही पाठ अशुद्ध अथवा जुटित असल्यामुळे खात्री वाटत नाही. मुळातील “अनुपेक्ष्यम च्या जागी 'उपेक्ष्यम' अशी दुरुस्ती सुचविली आहे. तसेच “-पालनं मुत्तवा? च्या जागी “-पाल- नसुत्तवा' असा पाठ सुचविला आहे. - “समानयनादारभ्य... दुचित निमित, परमार्थ' असे हस्तलिखितात आढळते. मुद्रितात “-समानयनाद्युचितं निमित्ते, परमार्थतोः असा पाठ आहे. याच्या नंतरच्या शब्दांपासून काहीच अर्थबोध होत नाही. वर दिलेला पाठ हस्तलिलिताप्रमाणे आहे. मुद्रित पाठ "न तु यथा प्रतिरूपं “मुहुर्ब्याधूतास्ताहदर?” मित्यादिः असा आहे. या ठिकाणी रामविषयक एखाद्या नाटकातील एका 'होकाचा निर्देश केलेला असाबा असे वाटते. आणि तो कोक रामाच्या विरहावस्थेचे वर्णन करणारा असण्याची शक्‍यता आहे. रामाचे सीतेवरीळ प्रेम हेच तिला परत आणण्यास कारणीभूत झाले असाही त्या ोकाचा अर्थ असणे संभवनीय आहे. - 'तृतीयत्रेता” यातील 'तृतीय? शब्दाची उपपत्ती नीट लागत नाही. कल्युगापासन उलट मोजले तरच त्रेतायुगाळा 'तिसरे” म्हणता येईल. - “तथा? म्हणजे राम विरहावस्थेत असलेला व सीतेवरील प्रेमामुळे तिच्या सोडवणुकीस सिद्ध झालेला असा अर्थ अभिप्रेत असावा. - यत्र यत्र रसनिष्यन्दो? ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात “तः्च तज्च तास्वनिष्यं! असा भ्रष्ट पाठ आहि. सुद्रित पाठ “यश्चव यश्च रसामिनिष्यन्दीी असा आहे. तोही चालण्यातारखा आहे. रस असेल तरच ते काव्य हे बरोबर आहे. पण रामविषयक काव्यात विप्रलम्भ शुद्ठार का नसावा ते स्पष्ट नाही. म्हणूनच ह्या उदाहरणाचा वर सुचविलेला आशय बरोबर आहे अशी खात्री वाटत नाही. - “अन्यतररज्ञननोपक्रम-' म्हणजे प्रेक्षकांचे रंजन करणाऱ्या गोष्टींपैकी एक. यात रसाचा निदेश अभिप्रेत आहे. -- 'संज्ञायां कन? हे पाणिनींचे ५.३.८७ येथील सूत्र आहे. - 'रसपर्यायि? पर्यायिन्‌ शब्दात परिन-इ धातूचा शब्दराः अर्थ अभिप्रेत आहे. रस मध्य- वर्ती आणि इतर त्याच्या भोवताली अशी कल्पना आहे. “असाधारणस्य* शहोकातील “अनेक? शब्दाची “असाधारण”? अशी व्याख्या केली आहे. - 'स्थायिनो5नेकरूपत्वम' ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'स्थायि... प्तपम? असा तुटित पाठ आहे. मुद्रितात 'स्थायिनां बहुत्वनूतनत्वाद्‌ घटनाविचित्रत्वम्‌ः असा विस्तृत पाठ आहे. तो पाठ सूळ असेल्से वाटत नाही. 'रसस्य' एकवचनात आहे, तेव्हा स्थायिनां' असे बहुवचनी रूप असण्याचा संभव कमी. - “परमार्थतो5भूतैः” यातील अबग्रह्ह हस्तलिखितात नाही. मुद्रित पाठ 'परमार्थताथूतैः” असा आहे. यानंतर जे शब्द आहेत त्यावरून असे दिसते की “अभूतैः?? असे रूप आवइयक आहे, - ३०८ नाट्यशास्त्र “स॒भवमात्रतया? ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'संभवमात्रा तथा” आणि मुद्रितात “संमवमात्रं तथा? असे पाठ आहेत. ते दोन्हीही अर्थबोधात उपयुक्त नाहीत. - 'नवजल्धरः इ०” संपूर्ण शोक असा - लवजलधरः संनद्धो्यं न इत्तनिशाचरः सुरधनुरिदं दूराकषं न नाम शारासनम्‌ | अयमपि पट्टु्वारासारो न बाणपरंपरा कनकनिकषस्निग्धा विद्युत्‌ प्रिया न मसोवेशी ॥ (विक्रमो०,४.१). -'अनुरागेणैब* येथील म्हणणे असे की पुरुर्याला झालेला हा आभास त्याच्या उत्कट प्रेमामुळे होतो. पस्मार्थतः तेथे राक्षस नसतो (अभूत), परंतु या ठिकाणी कबीने त्याचा संमब कल्पिळा आहे. ते पुरूरेव्याच्या अनुरागामुळे संभाव्य वाटते. अनुरागा'चे हे स्वरूप म्हणजे रति हा जो स्थायिभाब त्याच्या विविध ख्पांपैकी एका रूपाचे उदाहरण म्हणून निर्दिष्ट केळे आहे. - मूळ ्छोकातील अभिनवगुप्ताचा पाठ ' देलाहावविभूषितम? होता हे स्पष्ट आहे. - “सात्विकाद्रमिनयबर्गस्य' ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'सात्तविकाद्यनुभावे वर्गस्य' आणि मुद्रितात “सात्त्विकादयनुभाववर्गस्य? असे पाठ आहेत. अमिनयाच्या चार प्रकारांपैकी सात्त्विक अभिनय एक आहे. अनुभावांचे बिरी- घण म्हणून सात्विक प्रसिद्ध नाही. - तत्राक्षि- इ०' हा बाविसाव्या अध्यायातीळ १० वा नोक आहे. त्या ठिकाणी 'शुज्ठाराकारसूचकः” असा पाठ आहे. तो अधिक समर्पक वाटतो. - 'य एव इ०? बाविसाव्या अध्यायातील हा संपूर्ण होक पुढीलप्रभाणे आहे - यो वै हावः स एवेषा शुज्ञाररससंभवा । समाख्याता बुघेहेला ललिताभमिनयात्मिका॥ (२२.११)- _ क्रोपप्रसादजनितं साधिक्षेपपदाश्रयम्‌ । उक्तप्रत्युक्तमेव स्याचित्रगीताथेयोजितम्‌ ॥ ११४ ॥ कोप व प्रसाद यांनी उत्पन्न झाळेळे, दोषपर वचनांनी युक्त आणि हृद्य अशा गीताच्या अर्थाची योजना असलेले ते उक्तप्रत्युक्त होय. अथान्त्यमडुं नाट्योपयोगि कर्तुमाह कोपप्रसादजनितमित्यादि । प्रथमा- घेन भाविलक्षणमेकदेशद्वारेणानूद्यते, द्वितीयेन तत आक्रृष्य वैचित्र्यभागो नाट्योपयोगी कथ्यते । तदयमर्थः । कोपप्रसादजानेतं साधिक्षेपपदाश्रयं चेत्यादिरूपं यदुक्त प्रत्युक्त॑ च लास्यगाने वक्त्यते नाट्ये एवामिति समनन्तरमेव वक्ष्यमाणेन पथा स्यात्‌ । तमाह चित्रेति । चित्रं यद्वीत ध्रुवागानकाव्यं तस्य १ नि -मेव स्यात्‌ कितू गीता-. १९.११४ | ३०९ यो५$थस्तेन संयोजनं यस्मिन्नाट्यांरो । उक्तप्रत्युक्ते हि ठास्याडुन . . . बाळे नाथ विमुश्च मानिनि रुषम्‌? इत्यादी भिन्नानां वाक्यखण्डलकानां समन्वयो रसाविरा- महिम्नेव । न तु श्रुतिलिह्ठादिप्रमाणषट मत्रावकाशं लभते । 'काकार्य शशलक्ष्मणः क्व च कुलम्‌ इत्यादावियमेव वार्ता । एवं '"णलिणीदळणीसहसुत्तदोहेआा । अइ- दुछृहपडिबद्धाणुराइझआ। इत्यादेद्विंपिदिकागीताथंस्याभिनेयकाव्याथंस्य च '"हिअअ समस्लससः हत्यादेः, रसावेशकूत एवाभिनयाथसमावेक्षो ळोकापरिद्ृष्टो$पि रअनाय सातिरायमुपयोगींते रसावेरावैवश्यप्रसादादित्युक्तप्रत्युक्ताह्लास्याडुग- दुपजीवितः । यद्यपे 'स्थाने ध्रुवास्वभिनयो यः क्रियंते! इति नाट्यानेरूपणायां वक्ष्यते तथापि कविना तारक्काव्यं कार्य प्रयोक्चा च ताहग्गीतं कतब्यामिति शिक्षणाय, कुतश्वेदमडठमुपजीवितामाति राक्काशमनाय, रूपकाडठत्वेनेहास्याभिधा- नम्‌; सामान्याभिनये त्वभिनेयत्वेनास्य निरूपण भविष्याते “षडात्मकस्तु शारीरः' इत्यत्र | कोपप्रसादजानेतत्वामित्यनेन चित्तवरृत्त्यावेशस्थानमस्याइस्य निवेदाविषय इत्युक्तम । उत्तप्रत्युक्तनेवेचनमहिस्ना चाकाराभाषितात्मकमप्य- ळौंकिकरूपं स्वीकुवंता तत्सहचरस्वगतजनान्तिकापवारिताद्यप्युपलक्षितम । न च सवेथा तन्नाटये, ठोके. क्षचित्संभवात्‌ | नाटये$पि गीयमानस्यान्यान्यश्रीतुः काक- ताठीयवशात्‌ स्वचित्तत्रत््याथसंवादो भवति, यथा हर्षचरिते भगवत्याः सरस्वत्याः 'तरळयासे हद ससुत्सुकाम ' इत्यपरवक्त्रं शृण्वन्त्याः । तत्सवे हि ठोके यथा €-). €). स्यात्त्हि प्रत्यक्षकर्पे कथसिव तत्र प्रतीतिरिति नाट्यरूपतेव भ्रंशेत । आता शेवटचे अंग नाटयाळा उपयोगी करण्यासाठी 'कोपप्रसादजनितम! इत्यादी सांगतात. छोकातीळ पूर्वार्धात पुढे करावयाच्या ठास्यांगाच्या लक्षणाचा एक भाग उद्धृत केला आहे आणि उत्तरार्धात त्यातून घेतलेला नाट्याळा उपयोगी असा चैचित्र्यपूणे भाग निर्दिष्ट केळा आहे. तेव्हा एकूण अर्थ असा. कोप आणि प्रसाद यांनी उत्पन झाळेळे आणि दोषपर शाब्दांनी युक्त इत्यादी स्वरूपाचे जे वचन आणि प्रतिवचन लास्यगाना मध्ये निदिष्ट केले जाणार आहे ते नाट्यात ह्या प्रकारे म्हणजे आत्ताच सांगणार असलेल्या पद्धतीने असू शकते. ती पद्धत 'चित्र- इत्यादी शब्दांत सांगतात. चित्र असे जे गीत म्हणजे घुबागानातील काव्य त्याचा जो अर्थ त्याच्याशी समन्वय ज्या नाट्यांशात होतो ते उक्तप्रत्युक्त. कारण उक्तप्रत्युक्तामध्ये लास्यांगातून .. . ' “बाळे,” “नाथ,” “हे मानिनि, राग सोंडून दे” इत्यादी निरनिराळ्या वाक्‍्यखंडांमध्ये जो समन्वय होतो तो रसावेशाच्या महिम्यामुळेच. श्रुति, ठिडू आदी मीमांसेतीळ सहा प्रमाणांना येथे काहीच अवकाशा प्राप्त होत नाही. 'अकार्य कोठे आणि सोमवंशातीळ कुल कोठे ?' इत्यादीमध्ये हीच गोष्ट आहे. याप्रमाणे 'नठिनीदलाप्रमाणे नाजूक व .शिथिलगात्र असलेली, अतिदुर्ठभ प्रियकरावर जिचे प्रेम जडळे आहे अशी' ह्या द्विपदीगीताच्या अर्थाचा आणि 'हृदया, आश्वस्त हो! इत्यादी अभिनयास योग्य अशा ४११० नाट्यशास्त्र काव्याच्या अर्थाचा रसावेशामुळेच होणारा अभिनयाच्या अर्थाशी समन्वय लोकांत दिसत नसला तरी रंजनाळा अतिशय उपयोगी म्हणून रपावेशाच्या विवशातारूप प्रसादामुळे उक्त- प्रत्युक्त ह्या लास्यांगामधून भरेतळा आहे. जरी नाठ्यायिताचे निरूपण करताना “उचित प्रसंगी धुबागानांमध्ये जो अभिनय केला जातो ' इत्यादी सांगणार आहेत तथापि कवीने ल्या तऱ्हेचे काव्य स्चावे आणि प्रयोग करणाराने त्या तऱ्हेचे गीत करावे हे शिक्षण देण्यासाठी आणि हे अंग कोठून आले या शंकेचे समाधान करण्यासाठी रूपकाचे अंग म्हणून ह्याचा येथे निर्देश केळा आहे, परंतु सामान्याभिनय अध्यायात ' षडामकस्तु शारीरः' या ठिकाणी अमिनेय म्हणून ह्याचे निरूपण होणार आहे. “कोप आणि प्रसाद यांनी उत्पन्न ' या शब्दांनी चित्तवृत्तीच्या आवेशा'चे स्थान तो ह्या अंगाच्या योजनेचा प्रसंग असा अभिप्रेत अर्थ निर्दि्ट होतो. आणि उत्तप्रत्युक्त या शब्दाच्या अर्थाच्या प्रभावामुळे आकाराभाषि- ताच्या स्वरूपाचे अलौकिक रूप सुद्धा स्वीकृत केल्याने त्याच्या बरोबर असलेले स्वगत, जनान्तिक, अपवारित इत्यादी सुद्धा उपलक्षित होतात. आणि ते सर्वस्वी नाट्यातच असते असे नाही, लोकातही ते क्चित संभवते. नाठ्यामध्ये सुद्धा गीत. ऐकणाऱ्या काही श्रोत्यांच्या चित्तवृत्तीचे गाइळे जाणाऱ्या अर्थाशी संवादित्व उत्पन होते, जसे ते हर्षचरिततात ' औत्सुक्य- पूण अशी दृष्टी तू का चंचळ करतेस ?' इत्यादी अपरवक्त्र ऐकत असलेल्या सरस्वती देवीच्या चित्तवृत्तींचे होते. ते सवे जर लोकात जसे असते तसेच असेळ तर ते प्रत्यक्षासारखे होईल. मग त्या ठिकाणी रसप्रतीती कशी होणार असा प्रश्‍न उपस्थित होऊन नाट्याचे स्वरूपच नष्ट होईल. 'माविलक्षणम्‌? हे लक्षण ३१.२६५-३२६७ येथे दिले आहे. परतु तेथील पाठ 'कोपप्रसादबहुलं सविक्षेपेरुपक्रमे: असा आहे. त्या ठिकाणी अमिनवगुप्तापुढे मिन्न पाठ असण्याची शक्‍यता आहे. “च॒ लास्यगाने' ही मुळातील 'तथास्यगाने' ची दुरुस्ती आहे. या मूळ पाठाचा काही अर्थ हो- ण्यासारवा नाही. 'च' आवश्यक आहे. आणि लास्यगान म्हणजे नृत्ताची साथ करणारे गीत हा अथ प्रस्तुत संदर्भात समर्पक आहि. “पथा? हो मुळातील “पथिना' ची सुचविलेली दुरुस्ती आहे. हे रूप शिष्टसंमत नाहीं. - 'लास्याडूभ- याच्यापुढील टीकेतील काही शब्द गहाळ झाले आहेत. मुद्रितात “ (वैचित्र्य) लास्याडत्स्वीकतमः अशी पूर्ती आढळते. पण वैच्तयाच्या स्वरूपाचा निदेश केल्याशिवाय अश्या तऱ्हेचे विधान केळे असण्याचा संभव कमी. उक्तप्रयुक्त लास्याड्वात कशा तऱ्हेचे गीत असते त्याचे उदाहरण पुढील वाक्यात दिळे आहे. त्याचा निदेश प्रस्तुत बाक्‍यात केला असण्याचा अधिक संभव आहे. - 'बाले नाथ इ०' अमरुशतकातील हा संपूर्ण 'छहोक पुढीलप्रमाणे आहे - बाळे नाथ विमुश्च मानिनि रुपं रोषान्मया कि कृतं खेदो5स्मास्‌ न मेञपराध्यति भवान सवे5पराधा मयि। तत्कि रोदिषि गद्देत बचसा कस्याय्रतो रुद्यते नन्वेतन्मम का तवास्मि द्यिता नास्मीत्यतो रुद्यते॥ १९,११४ १९१ यात उक्त आणि प्रत्युक्त स्पष्ट अहेत. त्या सबीत एकसूत्रता शुज्ञाररसाच्या अशिष्टानामुळे उत्पन्न होते. - 'न तु श्रृतिलिज्क इ०' वाक्यांचे अर्थ करण्यासाठी मीमांसकांनी सहा प्रमाणे ठरविली आहेत. अमिनवगुप्तांचे म्हणणे असे दिसते की बरीळ कोकातील वाक्यांच्या परस्पर संबंधाचा बोध त्यातील रसाची प्रतीती झाल्यावरच होतो, मीमांसकांच्या प्रमाणांचा त्या कामी काही उपयोग नाही. पण हे अक्या तऱ्हेचे विधान करण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही. - 'अत्रावकाशे' ही “अन्यत्रावकादं' ची दुरुस्ती आहे. मुद्रितात “तदन्यत्राबकाद' असा पाठ आहे. - क्वाकार्य इ०' कालिदासाच्या नावावर खपणारा, पण त्याच्या कोणत्याही ग्रंथात न आढळ- णारा हा छोक असा - काकाये शरालक्ष्मणः कक च कुलं भूयो5पि दच्येत सा दोषाणां प्रशामाय भे श्रुतमहो कोपेडपि कान्ते मुखम। किं वक्ष्यन्त्यपकल्मषाः छृतघियः स्वप्नेडपि सा दुलेभा चेतः स्वास्थ्यमुपेहि कः खळु युवा धन्योब्वरं पास्यति ॥ यात प्रथमदर्शनी प्रेमात पडलेल्या सोमवंद्यातील एका राजाच्या मनात उत्पन्न झालेल्या परस्परबिरोधी विचा- रांचे चित्रण आहे. परस्परविरोधी ठद्वार म्हणजे उक्त-प्रत्युक्त असे अभिप्रेत दिसते. या उक्त-प्रत्युक्तांचा परस्परसंबेध शुद्धाररसाच्या अभिनिवेश्यामुळेच प्रतीत होतो. - 'अमिनेयकाव्यार्थस्य” मुद्रित पाठ “'अमिनये 'काव्याथेस्य' असा आहे. पण तो बरोबर नाही. - “हिअअ समस्सस? हे अमिज्ञानशाकुन्तलातील सातव्या अंकात शकुन्तलेनें हा दुष्यन्तच ही खात्री पटल्यावर काढलेले उद्गार आहेत. द्विपदी हे गीत आहे, तर शकुन्तलेचे उद्गार साधे काव्य आहे. पण दोघांच्याही संबंधात अमिनय केला जातो, गीत आणि काव्य यांच्या अर्थाशी जो अमिनयाचा संबंध प्रस्थापित होतो तो रसावेशामुळे, म्हणून त्यांत उक्ती व प्रत्युक्ती नसल्या तरी रसामिव्यञ्जक अभिनय हा उक्तप्रत्युक्त लास्याड्वा- तील अश विद्यमान असतो. म्हणजे असा अमिनय हाच लास्याड्वातून नाय्यात उपयोगी पडणारा अंश॒ घेतला आहे. - 'उपयोगोति' मुळात “इति? नाही. - 'यद्यपि इ०? येथे शांका अशी उपस्थित केली आहे की अभिनय हेच जर उक्तपत्युक्ताचे वैशिष्ट्य असेल तर त्याचा लास्याद्ठ: म्हणून निर्देश करण्याची काय आवद्यकता आहे £ कारण पुढे २२ व्या अध्यायात ह्या अमिनयाचे विस्तृत वर्णन केलेच आहे. “स्थाने इ०' ही आर्या अशीं - स्थाने धुवास्वमिनयो यः क्रियते हषेशोकरोषायेः । भावरससंप्रयुक्तेशयं नाट्यायितं तदपि ॥ २२.४९. - 'ताहक्काव्यं कार्य' ही दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'ताद्क्वाव्यार्थ' आणि मुद्रितात “ताहक्कार्य असे पाठ आहेत. ते अपूर्ण आहेत. - 'रूपकाड्ठ- येथे निर्देशिळेली लास्याज्ञे रूपकाची अंगे होत. - अस्य? म्हणजे अभिनयस्वरूप प्रस्तुत अंगाचे. - “षडात्मकस्तु इ०' संपूर्ण कोक येणे- प्रमाणे - षडात्मकस्तु शारीरो वाक्यं सूचाडूुरस्तथा । शाखा नाट्यायितं चेव निवृत्त्वजूर एव च॥ २२.४३. २११२९ नाट्यशास्त्र हे शारीर अभिनयाचे सहा प्रकार आहेत. - 'उक्तप्रत्युक्तनिर्वचनमहिम्ना' मुद्रितात “निर्वचन? शब्द नाहीं. पण तो आवश्यक वाटतो. 'उक्त- च्या पूर्वी मुळात “यतः? शब्द अधिक आहि. त्याचा अन्वय लागण्यासारखा नाही. -' 'तत्सहचर-' मुद्रितात 'तत्सहचरं? असा स्वतंत्र शब्द केळा आहे. - 'तन्नाट्ये' ही मुळातील 'तन्नाशो' ची सुचविलेली दुरुस्ती आहे. 'तन्नाशः” चा काहीच अर्थ लागत नाही. 'ततू' म्हणजे आकाराभाषित, स्वगत वगैरे. हे प्रकार क्वचित लोकातही संमावतात असा अर्थ असावा. - '“नाट्येडपि? नंतर मुळात (इति? शब्द अधिक आहे. त्याचे काही प्रयोजन दिसत नाही. - 'गीयमानस्यान्यान्यश्रोतु? हस्तलिखितात 'अन्यो- न्यश्नोतुः असे आहे. मुद्रित पाठ 'गीयमान: स्यात्‌ अनेन श्रोतुः' असा आहे. त्यातील शब्दांचा अन्वय कसा लावाबयाचा हे समजण्यासारखे नाही. - “तरल्यसि इ०? अपरवक्‍्तळंदातील हा 'छोक पुढीलप्रमाणे आहे - तरलयसि हशां किमुत्सुकामकलुषमानसवासलालिते । अवतर कलहेसि बापिकां पुनरपि यास्यसि पडूजाळयम॥ हेसीला उद्देशून म्हटलेला हा कोक ऐकताना शापामुळे पृथ्वीवर जाणे आवश्यक असलेल्या सरस्वतीला त्यातील अर्थ स्वतःला उद्देशून असल्याचेहि प्रत्ययास येते. तसाच अनुभव नाट्यातही काही प्रेक्षकांना येतो. - 'तत्सर्वे हि इ०' ह्या वाक्याचा अर्थ असा दिसतो की लोकव्यवहारात कोणी काही ऐकले तर त्याला प्रत्यक्ष स्वरूपाचे ज्ञान होते. नाटयातींळ अनुभव तसाच आहे असे मानले तर हा अनुभव प्रत्यक्षस्वरूपाचाच ठरेल. पण मग तेथे रसास्वाद होत नाही असे मानावे लागेल, कारण रसास्वाद हा प्रत्यक्षादी सर्वे अनुभबप्रकारांहून मित्न आहे हे सहाव्या रसाथ्याया- वरील टीकेत विस्तृतपणे दाखवून दिळे आहे. आणि रसास्वाद नाही तर तेथे नाट्यच नाही असा निष्कष निघेल. अन्ये तु चित्रपदं भाविक चेत्यड्ठद्दयमाहुः पठन्ति च - यत्र प्रियाकृतिं दृष्टा विनोदयाते मानसम्‌ । मदनानलतप्ताड्ठी तच्चित्रपदमुच्यते || इष्ट्रा स्वप्ने प्रियं यत्र मदनानलतापिता । करोति विविधान्‌ भावांस्तद्वे भाविकमुच्यते ॥ इति । तच्चेद्मसत्‌, 'ठास्ये दशाविधम? इत्यत्रत्येन ग्रन्थेन ' दशाईः ठास्यम? इति च तालाध्याये पठिष्यमाणेन विरोधात्‌ । न चास्योपयोगः कश्चित्‌ । तथा ह्यलौंकिक- केशिक्युपयोगि रसांशे सर्वथोपकारि यदैैचित्र्यं तह्ास्याडुद्वारेणाह । स्वकायं तच्च दशभिरेव संगृहीतम्‌ । तथाहि प्रधाने चित्तद्ृत्त्यंशे वैचित्र्य विभावाद्यंशे वा उपर$जकभागे वा । तत्र चित्तवृत्त्यंशे वेचित्र्यमुत्तमोत्तमकात्‌ । विभावांशगतं तु वैचित्र्य सैन्धवकात्‌, काक्कायंशे स्थितपाठयात्‌, लक्षणगुणाद्यंशे त्रि मूढकात्‌, वृत्तांशे १९९९० -6- पुष्पगण्डिकात आहार्ये उपरऊजकगीतातोद्ययोजने च, सात्विके आसीनपाठ्यात्‌, उपरञजके$पि शाब्दादू शुवागानभागे सर्वातोद्ययोगे च गेयपदात्‌ , गीताथंस्य पात्रे: काव्यार्थाभिनये उक्तप्रत्युक्तात्‌, वाविकस्य स्वरताळानुसरणे द्विमूढकात, तत एवाक्चिकवैचित्र्यमपि । व्यभिचार्यशे तु वेचित्र्यमुत्तमोत्तमकांदेव । तदतो5- तिरिक्तो नास्त्येवांश इति ददोवाडनाने । वाग्भागस्तनुत्वेनोपरः्जकभागः । स्वर- सात्मांने हि तदेचित्र्य भूयसा मुनिना निरूपणं कृतम्‌ । अत एव चाठौकिको वेचित्र्यांशः प्रत्युत रसे सातिशयोपयोग इति शब्दतो मुनेरनुकारः । रसात्मा नाट्यामेति चाभिप्रेतमिति लक्ष्यते । अलौकिकवैचित्र्यसारो हि रसः । तथा चोक्तं भट्टतोतेन - लक्षणालंकूतिगुणा दोषाः शाब्दप्रत्रत्तयः । वृत्तिसंध्यज्ञ'संरस्भः संभारो यः कवेः किळ ॥ अन्योन्यस्यानुकूल्येन संभूयेव समुत्थितेः । झटित्येव रसा यत्र व्यज्यन्ते ह्ादिभि्गुणेः ॥ वृत्ते: सरलबन्येयत्स्निग्धैश्वूर्णपदैरपि । आक्षिष्हृदयघटनभाषया सुप्रसिद्धया ॥ यःचेरक्काव्यमात्रं तठसभावानुभावकम्‌ । सामान्याभिनये प्रोक्त॑ वाच्याभिनयसंज्ञया ॥ एवंप्रकारं यात्किचिद्दस्तुजातं कथंचन । अनूनाधिकसामग्रीपरिणामोन्मिषट्रसम्‌ ॥ रसपोषाय तज्जाते नाट्यस्वयंवरे । प्रातेभायाः प्रगल्भायाः सर्वमोडुप एष सः ॥ इति । संभावनाप्राणनाया हि यहोके संभाव्यते परमाथ तत्‌ । वस्तुतो ठोकोत्तरत्वेनेव संभारेण युक्ता कविवाणी हठादेव रसमयी भवति असाघारणताप्राणत्वादिति तत्र तात्पर्येम्‌ । परंतु दुसरे टीकाकार चित्रपद आणि भाविक अशी आणखी लास्या्रे मानतात आणि पुढील अर्थाचे छछोक पठन करतात - 'जेव्ह्या कामाय्नीने दाह होत असलेली युवती प्रियकराच्या चित्राकडे पाहून आपले मन रिझविते तेव्हा ते चित्रपद असे म्हणतात. जेव्हा मदनामनीने विव्हळ झाळेळी युवती स्वप्नात प्रियकराळा पाहून विविध भाव अभिव्यक्त करते तेव्हा त्याला भाविक म्हणतात.' पण हे बरोबर नाही. कारण :दहा प्रकारचे लास्य* ११४ नाट्यशास्त्र असे ह्या ठिकाणी म्हटले आहे त्याच्याशी आणि तालाध्यायात दहा अंगे असलेले लास्य! असे म्हणणार आहेत त्याच्याशी ते विरुद्ध आहे. शिवाय ह्याचा काही उपयोगही नाही. कारण असे की अलौकिक अश्या कौशिकी वृत्तीला उपयोगी होणारे आणि रसांशाला सवे प्रकारे उपकारक असे जे वैचित्र्य त्यांचा लास्यांगांच्या द्वारा निर्देश केला आहे. आणि ते त्यांचे कार्य दहांनीच स्वीकृत झाळे आहे. म्हणजे असे की वैचित्र्य मुख्य जो चित्तवृत्तिरूप भाव त्यात असू शकते किंवा विभावादी अंशामध्ये किंवा रंजन करणाऱ्या भागामध्ये. त्यांपैकी चित्तवृत्त्यामक अंशात वैचित्र्य उत्तमोत्तमकापासून'च येते पण विभावादी अंशात असलेले वैचित्र्य सेन्ववकापासून, काकु आदी अंशातील स्थित- पाठ्यापासून, लक्षण, गुण, आदी अंशातीळ वेचित्र्य त्रिमूढकापासून, वृत्तरूप अंशातील पुष्पगण्डिकापासून आणि आहार्य अमिनयांपैकी रंजन करणाऱ्या गीत व वाद्य यांन्या योजनेतीळ वैचित्र्य सुद्धा पुष्पगण्डिकापासून, सात्विक अभिनयातील वैचित्र्य आसीनपाठ्या- पासून, उपरंजक भागांपैकी शाब्दिक अंशातील धुवागानात तसेच सवे वाद्यांच्या योजनेत वैचित्र्य गेयपदापासून, गीताच्या अर्थाच्या आणि पात्रांनी केलेल्या काव्याच्या अर्थाच्या अभिनयातीळ वैचित्र्य उक्तप्रत्युक्तापासून, वाचिक अभिनयाच्या स्वर आणि ताल यांनी केलेल्या साथीतीळ वैचित्र्य हरिमूढकापासून आणि त्यापासूनच आह्विक अभिनयातील वैचित्र्य सुद्धा येते. परंतु व्यमिचारिभावरूप अंशातील वैचित्र्य उत्तमोत्तमका पासून येते. म्हणून ह्याहून अतिरिक्त असा अंश नाहीच, तेव्हा दहाच लास्यांगे होत. वाचिक भाग अल्प प्रमाणातच उपरंजक असतो. त्यातील रसात्मक वैचित्र्याविषयी भरतमुनीने खूपच विवेचन केळे आहे. आणि म्हणूनच अलौकिक असा वैचित्र्याचा अंद रसाला उळट अतिशय उपयोगी यास्तव मुनीने शब्दांतून त्याचे अनुकरण होत असल्याचे म्हटले आहे. आणि नाव्याचा आत्मा रस हे अभिप्रेत आहे भसे दिसून येते. कारण अलीकिक वैचित्र्य हे रसाचे सार होय. भड्टतोताने तसे म्हटळे आहे - 'लक्षण, अलंकार, गुण, दोष, रब्दप्रवरत्ती, वृत्ती व पंध्यंगे यांचे वैपुल्य ही जी कवीची सामुग्री असते, ज्यात आल्हाददायक गुण परस्परांना अनुकूळ असे एकत्रच उत्पन्न झाल्याकारणाने रस तात्काळ अमिव्यक्त होतात, जे सरळ रचना असलेल्या वृत्तांनी, कोमळ गद्याने आणि प्रसिद्ध आणि अक्लिष्ट व हृद्य घडण असलेल्या भाषेने युक्त असते, अशा प्रकारचे जे काही काब्य असते ते रस आणि भाव यांची प्रतीती देते, त्याचाच सामान्याभिनय अध्यायात बाच्याभिनय नावाने निर्देश केळा आहे. अशा प्रकारची जी काही कोणतीही वस्तू असेल, जिच्यात सामुग्री कमी किंवा अधिक नसल्यामुळे परिणामतः रसाचा उन्मेष होतो, ती रसपरिपोषास कारणीभूत होते. प्रगर्म अश्या कविप्रतिमेचा तो आविष्कार होय.' संभावना प्राणभूत मानून लोकात जे कल्पिळे जाते ते लौकिक होय. खरे पाहू जाता अलौकिक अशाच सामुम्रीने युक्त अशी कवीची वाणी अवश्यच रसमय होते, कारण असाधारणत्व तिचा प्राण असतो, असे त्या छोकांचे तात्पय. १९११४ ३१५ 'यत्र प्रियाकृतिं इ०? हे दोन्ही 'छोक बडोदे प्रतीत स्वीकारले आहेत. टीपेत ते प्रक्षिप्त असल्याचे म्हटके आहे, तथापि नेहमीच्या प्रथेप्रमाणे ते केसात छापले नाहीत. -- 'लास्ये दशविधं? हा वरील १०४ वा रोक. - 'दशाडू लास्यभ? तालाध्यायात हेच शब्द नाहीत. पण ३१.३३ ०-- ३६७ मध्ये लास्याडुंचे वणन आहे, त्यात दहांचाच निदेश आहे. - 'उपरज्ञकभागे? ही मुळातील “उप- रज्षकभावे' चो दुरुस्ती आहे. अंश ह्या अर्थाचा “भाग? शब्दच अपेक्षित आहे. - 'तत्र चित्तवृत्त्वशे वेचित्र्यमुत्तमोत्तमकात्‌' ही सुचविलेली दुरुस्ती आहे. हस्तलिखितात 'तत्रानुत्तमोत्तमकात? असा बुटित पाठ आहे. मुद्रितात “(चित्तदृत्त्यंशे प्रच्छेदकाद)? असा सुचित पाड आहे. पण प्रच्छेदका- पासून चित्रवृत्तिविषयक वैचित्र्य उत्पन्न होते असे मानणे बरोबर वाटत नाही, वर प्रच्छेदकाच्या संबधात “अलौकिककालविरोषम्रहणम? एवढेच त्यातील वेच्िय निर्दिष्ट केले आहे. याउलट उत्त- मोत्तमकाच्या संबंधात 'चित्तवत्तिपरिपोष? हाच त्यातील अलौकिक अंश मानला आहे. प्रच्छेदकाचा निर्देश उपलब्ध पाठात नाही हे खरे आहे. पण कतु म्हणजे काल याची विभाबात (उद्दीपनवि- भावात) गणना केली असल्यामुळे 'परच्छेदकात हा शब्द “विमावांशगतं तुं वैचित्र्य? नंतर पठन करणेच योग्य होईल. - 'सेन्धवकात्‌ इ० तैन्धवकाचे वैशिष्ट्य भाषाभिन्नता. त्याची बिभावात गणना होळ शकेल. त्यात काकुविषयीचे संकेत भ्रष्ट होतात असे स्पष्टपणे म्हटले असल्यामुळे 'काक्कांदशे' चा अन्बय “स्थिपाठ्यातः शी लावला आहे. लक्षण, गुण यांतील वैच्िय त्रिमूढकातून घेतळे आहे हे तर वर म्हटलेलेच आहे. - 'ृत्तांशे? मुळात “अनुदृत्तांशे' आहे. त्याला काही अथे नाही. पुष्प- गण्डिकेच्या व्याख्येतच वृत्तांचा निदेश आहे. -'उपरज्ञके5पि? असा हस्तलिखितात पाठ आहे. मुद्रि- तात 'उपरक्षकभावे5पि? आहे. त्यात “-भागे5पि? अश्शी दुरुस्ती आवश्‍यक आहे. -- 'पात्रः? ही 'पात्रे? ची सुचविठेली दुरुस्ती आहे. तृतीयेने अन्वय अधिक सुल्भ होतो. -- 'काव्यार्थामिनये? ही सुद्धा सुचविलेली दुरुस्ती आहे, हस्तलिखितात 'करणार्थामिनये आणि मुद्रितात 'करुणार्थामिनये) असे पाठ आहेत. उक्तप्रत्युक्तात गीतार्थांचा आणि काव्यार्थाचा अमिनय होतो असे वर स्पष्टच म्हटले आहे. शिवाय 'करण? म्हणजे हस्तामिनय असे मानले तरी त्यानंतरच्या 'अथ? शब्दाची उपपत्ती लागत नाही. आणि फक्त 'करुण' रसा'चाच अभिनय उत्तप्रत्युक्तात अमिग्रेत नाही. 7 “तालानुसरणे' ही “-तालानुसरणा? ची आवद्यक असलेली दुरुस्ती आहे, -- उत्तमोत्तमकादेव? सुद्रितात 'एवः असा पाठ स्वीकारला असून तो पुढील वाक्याच्या प्रारंभी घातला आहे आणि “अतः शब्द गाळला आहे. पण हस्तलिखितातील पाठच अधिक समर्पक आहे, -'बाग्भाग; इट? ज्या रूपकाचा प्रयोग करावयाचा त्यातील जो कबीने लिहिलेला भाग म्हणजे काव्य त्याचा येथे वाग्भमाग म्हणून निदेंश केला आहे. त्याचा ठास्याड़ंत साक्षात समावेश होत नाही म्हणून त्यासंबंधी हे निराळे विवेचन केळे आहे. त्यात वैचित्र्य असतेच. पण त्या वैचित्र्यात केबळ उपरंजनात्मक भाग अगदी अल्प असतो, रसात्मक माग अधिक 'हयून नाट्यशास्त्रात छंद, भाषा, अलंकार, लक्षण इत्यादी काव्यांगांचे विस्तृत वर्णन केळे आहे. - “सूयसा? म्हणजे १ ४, १५, १६ व १७ या अध्यायांत. - 'शाब्दतो मुनेरनुकारः? याचा अर्थ स्पष्ट नाही. काव्यातील शब्दांच्या ढारा रसाचा अनुकार म्हणजे आविष्कार होतो असे मुनींचे मत आहे अशा तऱ्हेचा अर्थ अभिप्रेत असण्याचा संभव आहे. - “चामिंप्रेतम? ही 'नामिप्रेतम? ची दुरुस्ती आहे. ती उघडच आवढ्यक आहे. - 'मिट्टतोतेन” हे सहा रहोक भट्ट तोताच्या काव्यकौतुक नावाच्या ग्रंथातून घेतले आहेत. हा ग्रंथ सध्या उपल्ब्ध नाही. यांपैकी पहिल्या तीन “छोकांत काव्याच्या स्वरूपाचे वर्णन ३१६ नाट्यशास्त्र असून नंतरच्या छोकांत त्याच्या परिणामाचा निर्देश आहे. - दोषा? दोष टाळावेत या उद्देशाने त्यांचा निर्देश केला आहे. लक्षण, अलंकार वगेरे गोष्टींचे निरूपण १६ व १७ या अध्यायांत केळे आहे, वृत्तींचे २० व्या अध्यायात आणि संध्यड्ञांचे प्रस्तुत १९ व्या. - अक्लिष्ट” ही “'अळ्िष्ट ची दुरुस्ती आहे. 'ेषयुक्त नसलेली भाषा किंवा सुसंबद्ध घडण नसळेली भाषा असा अर्थ अभिप्रेत असण्याचा संभव नाही. - तद्‌? ही 'सद्' ची दुरुस्ती आहे. त्यामुळे 'यतू” चा अन्बय लावणे सुगम होते. - “सामान्यामिनये' बाविसाव्या अध्यायात "कोक ५१-५९ यांत बाचिक अभिनयाच्या म्हणजे भाषणात दिसून येणाऱ्या आलाप, प्रलाप आदि बारा प्रकारांचे वणन आहे. - "कथंचन? ही हस्तलिखितातील 'अर्थाचन' ची सुचविलेली दुरुस्ती आहे. मुद्रितात “(कथार्पितम्‌ )? अशी दुरुस्ती सुचविली आहे. - शेबटचा छोक तरुटित व अशुद्ध स्वरूपात उपलब्ध झाला आहे. संपादकांनी त्याची पुढीलप्रमाणे दुरुस्ती सुचविली आहे - . रसपोषाय तज्ञातं ळोकाश्नायरयजगत्स्वयम्‌ । प्रतिभायाः प्रगल्भमायाः सर्वेस्वे कविवेधसः ॥ प्रथम चरणात “रसपोषाय? नंतर “नूनं शब्द असण्याची शक्‍यता आहे. तसेच शोबटी “एष तः? च्या ऐवजी “एव स:” असा मूळ पाठ असण्याचा संभव आहे. स्वयंवराची कल्मना अभिप्रेत असावी, पण ती कशी मांडली असेल ते स्पष्ट नाही. - 'परमार्थे ततू' ही संपादकांनी "परम्‌ अथ' च्या जागी सुचविलेली दुरुस्ती आहे. ह्या वाक्याचा अर्थ असा दिसतो की लौकिक गोष्टी संभाव्य अश्याच असल्यामुळे परमार्थ म्हणजे बास्तव स्वरूपाच्या असतात. याउलट काव्यातील गोष्टी असाधारण असल्यामुळे लोकोत्तर ठरतात आणि रस्त निष्पन्न करतात. - 'हठादेव' या शब्द- प्रयोगाची समपैकता स्पष्ट नाही. कदाचित “स्वयमेव? किंबा “स्वत एव' अधिक उचित ठरले असते. - “असाधारणता- ही “साधारणता” ची सुचविलेली दुरुस्ती आहे. रसमय होणाऱ्या कविवाणीला साधारणपणा प्राणभूत मानला असण्याची राक्यता फार कमी. - 'तत्रः म्हणजे भट्ट तोताच्या छोकांत. एतेषां लास्यविधो *विज्ञेयं लक्षणं प्रयोग । तढिहेव तु यन्नोक्त प्रसज्ठुबिनिष्टत्तिहेतोस्तु । ११५ ॥ प्रयोग करणारांनी ह्यांची लक्षणे लास्यप्रयोंगाविषयीच्या नियमांवरून जाणून घ्यावीत, ते मी येथेच सांगितले नाही, याचे कारण विस्तार वाढू नये म्हणून. ननु लास्यक्व'भ्यो यं भागमुपजीवाते स तावादहोक्तः, तेषां तु स्वरूप वक्त. व्यमित्याशडूक्याह एतेषां ठास्यविधाविति । १ नि एतट्वे. २ नि लक्षणमुक्तं मया तु विस्तरतः १९९१९६९९२८ ३१७ लास्यांगांमधून जो भाग घेतळा जातो त्याचा येथे निदेश केळा आहे, परंतु त्या ठास्यांगांचे स्वरूप सांगणे आवर्यक आहे अशी शांका घेऊन तिचे निवारण “ एतेषां लास्यविधा' या झोकात करतात. यं भागम' ही खुळातीळ यो भागान? ची दुरूस्ती आहे. 'यान्‌ भागान्‌ः अशीही दुरुस्ती चाळली असती, परंतु पुढे “सः? असे एकवचनी रूप आहे. 'उपजीबति? 'चा कर्ता 'नाट्यम्‌' हा आहे. लास्याक्ांचे विस्तृत वर्णन ३१ व्या तालाच्यायात केठे आहे. पंश्वसंधि चतु्टेत्ति चतु:पष्टयड्ठसंयुतम । षट्त्रिशछ्ठक्षणोपेतं गुणाठंकारभूषितम्‌ ॥ ११६ ॥ महारसं महाभोगमुदात्तवचनान्बितम । महापुरुषसंचारं साध्वाचारजनप्रियम्‌ ॥ ११७ ॥ सुस्लिष्टसंधिसंयोगं सुप्रयोगं सुखाश्रयम्‌ । सूदुशब्दाभिधानं च कविः कुर्यात्त नाटकम्‌ ॥ ११८ ॥ कवीने पाच संधींनी युक्त, चार वृत्ती असलेले, चौसष्ट अंगांनी युक्त, छत्तीस लक्षणांनी संपन्न, गुण व अलंकार यांनी सुशोभित, उत्कृष्ट रस असलेले, उत्तम रंजन करणारे, उदात्त वचनांनी युक्त, महान पुरुषांची चेष्टिते असलेले, सळज- नांना प्रिय होणारे, संधींची सुन्दर जोडणी असलेळे, उत्कृष्ट प्रयोगास योग्य, सुखाचा आश्रय असळेळे आणि कोमळ शाब्दांचा उपयोग केळेळे असे नाटक रचावे. एतद्दशरूपकलक्षणं कवीनां सुखग्रहणाय राशीकर्तुमाह पश्चसंधीत्यादि । नाटकमित्यभिनेयमात्रम्‌ । तत्र पश्चसंधीत्यादि संभवमात्रे मन्तव्यम्‌ । महान्तो रसाः पुरुषार्थापयोगिनो यत्र । महान्‌ भोगो रअनप्रधानो रसो यत्र । आभोग इत्यन्ये । उदात्तवचनान्वितमिति गुणान्‌ छेषप्रसादादीन्‌ स्वीकुरुते । सान्लछिप्टसांधि- संयोगमिति संध्यन्तराणि । सुप्रयोगामेति लास्याइशांने । सुखाश्रयामेति छन्दो- बृत्तवाचेत््यम्‌ । सूदुदाब्दैरमिधानं वर्णनाविवक्षितस्यार्थस्य येति माधुयंप्रसादा- थेव्याक्तिगुणानां प्रकर्षणं सूचयाति । एवं नाटकं कुर्यात्‌ । यश्च नाटकं कुर्यात्स एव कवि: । १ नि वृत्तिवृत्त्य्रसंपन्नपदार्थप्रकृतिक्षमम्‌ । पज्चावस्थामिनिष्पक्षे: पक्चमि: संधिमिर्यृतम्‌ ।। सन्ध्यन्तरेकविद्ठात्या चतु:षष्ट्यड्रसंयुतम । ३१८ नाट्यशास्त्र कवींना सुलभतेने ग्रहण करता यावे म्हणून ह्या दहा ख्पकप्रकारांचे लक्षण एकत्रित करण्यासाठी * प्चतंधि' इत्यादी 'छोक सांगतात. नाटक म्हणजे अभिनयास योग्य असे सर्व काही, त्यात पाच सन्धी वौरे जे संभवनीय असेल तेच समजावे. मोठे म्हणजे पुरुषार्थालळा उपकारक असे रस ज्यात आहे ते. महान भोग म्हणजे प्रधानतया रंजन करणारा रस ज्यात आहे असे. दुसरे टीकाकार “आभोग? हा शब्द आहे असे मानतात. उदात्त वचनांनी युक्त या वर्णनाने ेष, प्रसाद आदी सुणांचा स्वीकार होतो. सुल्लिष्ट असा संधींचा संयोग असळेळे म्हणजे संध्यन्तरांनी युक्त. सुप्रयोग म्हणजे लास्यांगे असळेळे. सुखाश्रय म्हणजे छंद आणि वृत्त यांच्या वैचित्र्याने युक्त, मूदु शब्दांनी अभिधान म्हणजे विवक्षित अर्थाचे वर्णन ज्यात आहे ते -- याने माधुर्य, प्रसाद, अर्थव्यक्ति ह्या गुणांचा प्रकर्षाने उपयोग सूचित करतात. याप्रमाणे नाटक रचावे. आणि जो असे नाटक रचीळ तोच कवी. 'आभोग इत्यन्ये, नहोकातील “महाभोग? शब्दात दुसरा अबयब “आमोग? आहे असे या लोकांचे मत, आभोग म्हणजे विस्तार. अवस्था या तु लोकस्य सुखदुःखसमुड्ठवा । न्‌ न नानापुरुषसंचारा नाटकञसो विधीयते ॥ ११९ ॥ छुख व दु:ख उत्पन्न करणारी अनेक मनुष्यांची चेष्टिते असळेली जी लोकांची अवस्था ती नाटकात प्रकट केली जाते. | किं तेनेत्याह अवस्था या त्विति । नानापुरुषेषु संचारः एको भावानुप्रवेशो रसात्मना यस्याः सा ताहशी यतो नाटके विधीयते संपाद्यते रसरूपतां नीयत इत्यर्थः । उक्त चैतद्वितत्य । त्या नाटकाने काय होते ते “अवस्था या तु' इत्यादी शोकात सांगतात. अनेक प्रकारच्या मनुष्यांमध्ये संचार म्हणजे रसाच्या स्वरूपात एकच भावावेश जिच्यात होतो ती अवस्था, तशी अवस्था नाटकात केली जाते म्हणजे साध्य केळी जाते, रसावस्थेप्रत नेळी जाते म्हणून असा याचा अर्थ. आणि हे आम्ही विस्तृतपणे सांगितळे आहे. 'उक्त॑ चेतत? सहाव्या रसाध्यायात. न तज्ज्ञानं न तच्छिल्पे न सा विद्या न सा कला । न तत्कर्म न घा योगो नाव्येडस्मिन्यक्न हच्यते ॥ १२० ॥ १ नि हि. २ निसंभवेदिह.. ३निन योगो5सौ नाटके यन्न. १९,१२२-१२२ ३१९ च योड्ये स्वभाषो ठोकस्य नानावस्थान्तरात्मकः । य क €* इ. सो्हाद्यमिनयैयुक्तो नाट्यमित्यभिधीयते ॥ १२१॥ असे ज्ञान नाही, असे शिल्प नाही, अशी विद्या नाही, अशी कला नाही, असे कृत्य नाही किंवा असा योग नाही की ज्याचे ह्या नाटकात दर्शन होत नाही. विविध अवस्थांतून दिसून येणारा जो ह्या लोकांचा स्वभाव तो आंगिक आदी अमिनयप्रकारांनी प्रकट झाला म्हणजे त्याला नाट्य असे म्हणतात. ननु सर्वा चात्र किमवस्थास्तीत्याराड्क्य प्रथमाध्यायोक्तमेव “छोकट्यं पठति न तज्ज्ञानमिति यो5यं स्वभावो ळोकस्येति । एतः्च तत्नेव न्याख्यातामिति [किं पुनरुक्तेन । यात सर्वच अवस्था असतात काय अशी शांका घेऊन तिच्या उत्तरासाठी पहिल्या अध्यायातीलच 'न तजञ्ज्ञानम! इत्यादी आणि 'योड्यं स्वभावो लोकस्य' इत्यादी दोन *छोक उडत करतात. त्यांची व्याख्या तेथेच केळी आहे, तेव्हा येथे पुनरुक्ती कशाला “सर्वा? ही हस्तलिख्ितातील 'सर्वे? ची दुरुस्ती आहे, मुद्रित पाट 'सर्वे चात्र किमबस्थाना इत्या- रड्क्य' असा आहे. तो मूळ असण्याची संभाव्यता फार कमी. “सर्वे? नें त्यात कोणाचा निर्देश अमिप्रेत आहे ते मुळीच स्पष्ट नाही. - हे दोन झोक अनुक्रमे १.११६ ब १.११९ येथे सापडतील. देवतानामूषीणां च राज्ञा चोत्कृश्मेधसाम्‌ । पूर्ववृत्तानुचरितं नाटकं नाम तडूवेत्‌ ॥ १२२॥ यस्मात्स्वभावं संत्यज्य साज्कोपाडुगतिक्रमेः । प्रयुज्यते ज्ञायते 'च तस्माहै नाटकं स्मृतम्‌ ॥ १२३ ॥ देवदेवता, कषी, राजे व प्रखर बुद्धीचे लोक यांच्या पूर्वकालीन वृत्तान्ताला अनुसरून होणारी जी क्रिया तिळा नाटक असे नाव आहे. ज्या अर्थी स्वाभाविक प्रक्रियेचा त्याग करून अद्भ, उपाड यानी युक्त अशा गतींचा उपयोग प्रयोगात केळा जातो व त्याचा व्रक्षकांना बोध होतो म्हणून त्याळा नाटक म्हणतात. १ का यो यः. २ का साद्वामिनयसंयुक्तो. ३ नि लोकस्य चेव हि. ४ नि स्वभाव: संहृत्य. ५ नि अमिनीयते गम्यते च. | की | नाट्यशास्त्र पूवद्वत्तानुचरितं कथं नाटकशब्दस्यार्थ इत्याह यस्मात्स्वभावं संत्यज्येति । नट नताविति नमनं प्रह्ीभावलक्षणम्‌ । ये त्वन्ये नट नताविति पठन्ति तन्मते- पीह्‌ नमनम्‌ । नटदाब्दो जनिदाच्युसूत्रेण व्युत्पादितो ग्रहीतव्य इति दर्शायति । साट्षेपाडुन ये पदक्रमा गतिवेचित्र्याणि । एतः्व समस्तनाट्याडेपलक्षणम्‌ । प्रयु- ज्यत इति नटेः, ज्ञायते चेति सामाजिकेः, तेनोभयोरपि नमनमुक्तमिति संभा- वनाकृतमोंचित्यम्‌ । पूर्वेकाळीन बृत्तान्ताठा अनुसरून केलेळे चेष्टित असा नाटक शब्दाचा अर्थ कसा होतो ते 'यस्मात्स्वभावं संत्यज्य' इत्यादी श्होकात सांगतात. नट नतौ ह्या धातूपासून नम्र होणे ह्या स्वरूपाचा नमन हा अर्थ निष्पन होतो. परंतु जे दुसरे नट चृतौ असा धातू स्वीकारतात त्यांच्या मते सुद्धा ह्या ठिकाणी नमन अर्थ अभिग्रेत आहे. नट शाब्द 'जनिदाच्यु' इत्यादी उणादिसूत्राप्रमाणे व्युत्पादित झाळेळा समजावा हे दाखवितात. अंगे आणि उपांगे यांनी युक्त जे पदक्रम म्हणजे गतीतीळ वैचित्र्य आणि हे नाठ्याच्या सर्व अंगांचे उपलक्षण आहे. प्रयोग केळा जातो तो नटांनी आणि प्रतीती होते ती सामाजि- कांना, याप्रमाणे दोघांचेही नमन म्हटले आहे ते संभाव्यतेळा अनुसरून असलेले औचित्य होय. 'नट नृतौ? मुद्रितातीळ 'बृत्तो' सुद्रणदोष असावा. वर १८.१२ ह्या आयेबरीळ टीकेत अभिनवगुप्ताने नट्‌ धातू “नतिः आणि 'बृति? या दोन अर्थी प्रसिद्ध असल्याचे म्हटले आहे (नट नतो नृतौ इत्युभयथा हि स्मरन्ति). - “जनिदाच्यु? हे उणादिसित्र ४.११५ आहे. ह्या दताठुसार नसू धातूला टकू प्रत्यय लागून 'नट' शब्द सिद्ध होतो. याचा अर्थ असा दिसतो की नट शब्दात मूळ धातू "नट असल्याचे जरी म्हटले आहे तरी उणादिसत्राप्रमाणे त्यात 'नम्‌' आहे. हे सुद्धा अमिनवगुप्ताला मान्य आहे. - 'समस्तनाट्याड्ो- ही 'समस्तं नाट्याडे-ची आवश्यक असलेली दुरुस्ती आहे. - 'संभावनाकुतमोचित्यम? याचा अर्थ असा दिसतो की नटांनी व प्रेक्षकांनी संमाव्यतेळा धरून केलेल्या औचित्यपूर्ण हालचाली म्हणजे त्यांच्यातील नम्रतेचा आविष्कार, | सवभावे सर्वरसेः सर्वकर्मप्रवृत्तिभिः । नानावस्थान्तरोपेतं नाटकं संबिधीयते ॥ १२४ ॥| लोकस्थभावं सप्रेक्ष्य नराणां च बलाबलमू । ______ संभोगं चेब युक्ति च ततः कार्य तु नाटकम्‌ ॥ १२५ ॥ १ नि कुर्यात्त. न | १९:९२ ररत ३२१ सर्वे भावांनी, स्व रसांनी आणि सर्व प्रकारच्या कमप्रवृत्तींनी युक्त, विविध अवस्थांचे दशेन घडविणारे असे नाटक रचावे. लोकांचा स्वभाव, मनुष्यांचे बळ .किंवा दुवेळता, उपभोग आणि युक्ती या गोष्टी लक्षात घेऊन मग नाटकाची स्वना करावी. १२४ आणि १२५ या दोन कांच्या मध्ये बडोदे प्रतीत पुढील अधिक “योक कंसात दिला आहे - अनेकदिल्पजातानि नेककरमैक्रियाणि च । तान्यशेषाणि रूपाणि कर्तव्यानि प्रयोक्तुमिः ॥ भविष्यति युगे प्रायो भविष्यन्त्यबुधा नरा! । ये चापि हि भविष्यन्ति ते' यत्नश्रतबुद्धयः ॥ १२६॥ केम शिल्पानि शास्त्राणि बिचक्षणबलानि च । सर्वाण्यितानि नश्यन्ति यदा लोकः प्रणश्यति ॥ १२७ ॥ पुढे येणाऱ्या युगामध्ये मनुष्य बहुतेक बुद्गिहीन होतील. आणि जे होतील त्यांची सुद्धा बुद्धी प्रयत्नाने कमावठेली अशी असेळ, जेव्हा लोकांचा ऱ्हास होतो तेव्हा कर्म, शिल्प, शास्र, विचक्षण लोकांचे बळ ही सर्व नादा पावतात. सृदुशब्देति यदुक्तं तस्य प्रयोजनमाह भविष्यतीति । त्रेतायुगापेक्षया, द्वापरे कली वेत्यथः । 'मृदु शब्द असलळेळे' असे जे म्हटळे आहे त्याचे प्रयोजन 'भविष्याति! इत्यादी झोकात सांगतात. त्रेतायुगा'्या दृष्टीने भविष्यकाली, म्हणजे द्वापर किंबा कळि युगात असा अर्थ. 'यदुक्तमः वर ११८ व्या छोकात 'मृदुरब्दामिधानम? असे म्हटले आहे. तदेव लोकभाषाणां प्रसमीक्ष्य बलाबलम्‌ । मृदुशब्दं सुखार्थ च कावेः कुयातु नाटकम्‌ ॥ १२८ ॥ चेक्रीडिताधयेः शब्देस्तु काव्यबन्था भवन्ति ये । वेश्या इव न ते" भान्ति कमण्डलुधरेद्रिजेः ॥ १२९ ॥ तर याप्रमाणे लोकांच्या भाषांचे बळाबळ विचारात घेऊन कवीने कोमल शब्दांनी युक्त व सुखकर आशय असलेले नाटक रचावे. ज्या काव्यांमध्ये चेक्रीडित वगैरे शब्द १ नि ते5प्यल्प-- २ नि बृद्धयः कर्मे शिल्पानि वेचक्षण्यं कलास्‌ च. ३ घो सर्वाणि पुंसां. ४ नि -भावानां. ५ नि शोभन्ते. २२९२ नाट्यशास्त्र असतात ती कमंडळू धारण करणारे ब्राह्मण समवेत असणाऱ्या वेऱ्यांभ्रमाणे शोभायमान होत नाहीत. सुखार्थमित्यथंव्याक्तिः स्वीकूता । सुखकर अर्थ असलेळे-याने अर्थव्यक्ति हा गुण अमिप्रेत होतो. “चेक्रीडित? दे 'क्रीड? धातूपासून बनलेले यडूगन्ताचे धातुसाधित विशेषण आहे. हा शब्द मुदु नाही. त्याची कमण्डट॒धारी ब्राह्मयाशी तुलना केळी आहे. देशख्पाविधानं च मया प्रोक्त द्रिजोत्तमाः । अतःपरं प्रवक्ष्यामि हत्तीनामिह लक्षणम्‌ ॥ १३० ।| इति भारतीये नाव्यशाखत्रे संधिनिरूपण नामाध्याय एकोनविंशः । « हे श्रेष्ठ ट्रिजांनो, मी दहा रूपकांची रचना समजावून सांगितली आहे. आता यानंतर मी वृत्तींचे लक्षण सांगणार आहे. येथे भरतमुनिकृत नाट्यशास्त्रातील संधिनिरूपण नावाचा एकोणविसावा अध्याय समाप्त होतो. एतदुपसंहरन्नन्यदासूत्रयन्नव्यायमध्यायान्तरेण संगमयति दशरूपविधानं चेति । शिवम्‌ । ःदुदारूपविधानं च' ह्या छोकात ह्याचा उपसंहार करून आणि दुसऱ्या विषयाचा उपन्यास करून ह्या अध्यायाची पुढीळ अध्यायाशी संगती लावतात. शिव असो. द्विजवरतोतनिरूपितसंध्यध्यायाथंतत्त्वबटनेयम । अभिनवगुप्तेन कृता रिवचरणास्भोजमधुपेन ॥ इति महामाहेश्वरश्रीमदभिनवगुप्तविरचितायां नाट्यवेदविवृता- वभिनवभारत्यामेकोनविंदाः संध्यथ्यायः समासः । द्विजश्रष्ट तोताने निरूपण केलेल्या संध्यध्यायाच्या अर्थाच्या तत्त्वांची ही मांडणी ठोवाच्या चरणकमळातीळ मघुकर अभिनवयुप्ताने केली. येथे परम महेश्वरमक्त श्रीमान अभिनवगयुप्ताने रचलेल्या नाटयवेदाच्या अमिनवभारती विवृतीतील एकोणविसावा संस्यथ्यात समाप्त होतो. १ नि इतिवत्तं ससंध्यड्र- २ नि संध्यक्षविकलत्पो. ३ का नार्मैकविशो5च्याय: : पुरवणी टीपा पृष्ठ २९, ओळ १७ : “असे वचन कोठे आढळत नाही! हे विधान दुरुस्त करणे आव- द९यक आहे. सहाव्या अध्यायात हास्यरसाच्या वर्णनात पुढील कहोक आहे - हास्यस्थानानि यानि स्युः कार्यात्पन्नानि नाटके । उत्तमाधममध्यानामेवं तानि प्रयोजयेत्‌ ॥ ९.९०. ह्या श्होकात येथे उद्धृत झालेले 'कार्योत्पन्नानि नाटके' हे वचन आहे. पृष्ठ ५४, ओळी १-४ : भतुहरीच्या वाक्‍्यपदीयातून ह्या दोन कारिका भ्रष्ट रूपात येथे उद्धृत झाल्या आहेत. त्या ग्रंथाच्या तृतीयकाण्डातीळ वृत्तिसमुद्देश नावाच्या प्रकरणात ह्या कारिकांचे शुद्ध रूप पुढीलप्रमाणे आढळते - शोपिके मासजाते च परिमाणं स्वमावतः | उपाधिभूतामाश्रित्य संख्यां भेदेत वत्तेते ॥ वयस्विनि परिच्छेदः करीते चापि न गम्यते। इष्ठो भेदादुते तच परिमाणमनर्थकम्‌ ॥ - वाक्‍क्यपदीय, ३, वृत्तिसमुद्देशा, १२५-१२६. तद्वित व समास ह्या वृत्तींतील सरूपांच्या विग्रह-स्वरूपी वाक्यात उपसजेनात्मक शब्दांचा एकवच- नात उपयोग केला जातो. त्यावरून त्या ऱाब्दाचा अर्थ एक ह्या संख्येशी निगडित असलेला प्रत्ययास येतो. राजपुरुषः समासाच्या 'राज्ञ: पुरुषः? या विग्रहात राजन्‌ हा उपसञेन-शब्द एक ह्या संख्येने अन्बित आहे. तथापि केबळ एकाच राजाच्या संबेधात हा तामासिक शब्द अभिप्रेत नसल्याकारणाने 'राज्ञोः पुरुषः” ब 'राज्ञां पुरुष? असे अर्थही ह्या समासाने अमिव्यक्त होऊ शकतात. अश्या ठिकाणी वृत्तीत इतर संख्यांचा त्याग होऊन एकत्व अभेदरूपाने असते, परंतु ज्या ठिकाणी उपसर्जन-शब्द परिमाण दाखविणारा असतो त्या ठिकाणी त्याच्याशी संलय़ असलेले एकत्व भेदरूपात समजणे आवद्यक आहे, म्हणजे त्या परिमाणाच्या संबंधात फक्त एक हीच संख्या समजावी लागते, इतर संख्या नाही. उदाहरणार्थ, 'शूर्पेण क्रीत? (एक शर्प देऊन विकत घेतलेला) या अर्था असलेल्या 'शौर्पिक? ह्या तद्वित वृत्तीत शूर्प ह्या परिमाणनिदर्शंक उपसर्जन- शब्दांचा फक्त एक ह्या संख्येशी अन्वय होऊ दकतो, दोन अथबा अधिक संख्यांशी नाही. म्हणून ह्या तद्धिताचा 'शर्पाश्यां क्रीत:' किंबा 'श्रूपै: क्रीतः' अद्या तऱ्हेचा अर्थ समजता येत नाही. त्याचप्रमाणे 'मासजातः ह्या समास वृत्तीत मास हा परिमाणनिद्शीक शब्द फक्त एक ह्या संख्येशी अन्वित होतो आणि तमासाचा अर्थ 'मास: जातस्य यस्य? (ज्याला जन्मून एक महिना झाला आहे असा) याप्रमाणेच करावा लागतो, “मासो जातस्य' किंवा 'मासाः जातस्य' याप्रमाणे ३२४ नाट्यशास्त्र-पुरवणी टीपा नाही. हेच या दोन कारिकांत स्पष्ट केळे आहे. त्या कारिकांचा अर्थ असा - 'शोपिक आणि मासजात ह्या वृत्तींत (शूर्प अथबा मास हे) परिमाण स्वाभाविकपणेच उपाधि-रूप झालेली जीं (एक ही) संख्या तिच्या आश्रयाने भिन्नपणे (दोन किंबा अधिक संख्यांचा अन्तर्भाव न करता) असते. जर बयोवस्था-युक्त बालक आणि विकत घेतलेली वस्तू यांच्या संबंधात अभिप्रेत असलेल्या मर्यादिततेचा मिन्नपणे बोध झाला नाही तर परिमाणाचा निदेश व्यर्थ ठरेल.” प्रस्तुत ठिकाणी अमिनवगुप्तांचे म्हणणे असे की मासकुत आणि वर्षेसंचित या समास वृत्तींत मास आणि वर्ष हे शब्द निश्चित परिमाण दाखविणारे असल्यामुळे ते एकवचनाशीच अन्बित समजले पाहिजेत. म्हणून 'मासेन कृतम्‌? , 'वर्षेण संचितम्‌' अशीच व्याख्या केळी पाहिजे, “मासाभ्यां कृतम्‌, मासे: कुतम्‌?, 'वर्षान्यां संचितम्‌ , वर्षे: संचितम? अश्शा प्रकारे नाही. पृष्ट ७५, ओळ २२: अमिनबगुप्ताचा ह्या आयेतील पाठ “न राजसमोग:? असा आहे. तो अन्वयाला अधिक सुगम आहे. 'राजसंमोगम्‌? ह्या पाठात हा शब्द 'प्रकरणम? शी समाना- घिकरण ठरून त्यात बहुत्रीहि समास आहे. (राज्ञः संभोगः पस्मिन्‌ तत) असे मानावे लागते. पण तसा समास करावयाचा असता “न? समासाबाहेर न ठेवता “अराजसंमोगम? व त्याचप्रमाणे “अदिव्यचरितम्‌' असे नजू-बहुत्रीहि समास करणेच अधिक योग्य झाले असते. परंतु समासाची ही रूपे वृत्तात बसण्यासारखी नाहीत. तेव्हा अभिनवगुप्ताचाच पाठ मूळ असण्याचा संभव आहे. 'यत्र? किंबा “यस्मिन? अध्याहृत धरले म्हणजे झाले. ध्नं (८ शी.” 260 ७ ० ./० «& 0 _/,9 >“ ७ &) .ही. १0. ७ ल ८ .>9७ श्‌ “०४.2 ७ ९७ लशी १» *<.. ,च्छ २४॥/४:. डइ७ १०९ १२ रोबट्न ७ श्र २२ २२ प्रथम संबंद्ध क्व्ये निषाद इतक 0 ब्‌त्त बृत्तींच्या "सुखार्थ प्रक्षक हुड्यात वतमान? व्युप्ता थामनु* र्‍योक्तणां कि आर्यातील ऱ्मत- प्राम्मा परिणाम "राक्षक प्रदशयत अगोदरच्चा “संभोगम्‌ सकीर्ण शंडूक कु अर्थात्‌ शुद्ध “ष्याम्यहं सट्ट्क अमिनव" एतेषां | उद्भत प्रथमं संबद्ध काव्ये निषादः इतका "वृऱ्त वृन्तींच्या सुखार्थ प्रेक्षक हृदयात वर्तमान" व्युत्पा (दोनदा) "गममनु" योक्तुणां आर्योतील "मता- प्रारम्भा परिमाण "राक्षस प्रदर्श्यते अगोदरच्या "संभोग: संकीर्ण" शुक पृष्ठ ११० ११३ ११४ ११९ १र्डं श्र ११२ १४२१ १४२ १४२ १४६ २१४७ रजम रार १६९ १६९ १७० १७३ १७६ १७७७ १८७ १९१ ३-३ १९७ २०२ २०६ २१२ २१९ २१९ २२२१ २२२ २२२ २२२९ २२१ २२२ २४र शेवटून ५ शट २१ डर अशुद्ध बिस्तार 'संबधनें उगभोग आर्यची गुद्धारस “समथ शत्र ब्युत्पत्ती पीर" म्हणःचे व्युत्पति "नबन्ध: शररिम्‌ वन्त परिह्र सर्वस्थेव छ्ड्य विषद सधी मात्नन्धस्तु द्या यालाच "सधानच असे युक्त प्ररम्मा "कन्थरमि 'बैतमानानां प्रकारचा अयस्थां बाहुल्य निवद्ध* पाहन वक्ष 'ज्यार्थानी निर्धण" ७) ७ श्ग्् विस्तार 'संबन्धो उपभोग आरयेची शुज्भररस *पुमर्थ शज व्युत्पत्ती परि म्हणजे व्युत्पत्ति "संबन्धः शरीरम्‌ व्ऱ्तं परिहार सर्वस्थेव छ्द्य विशद संधी "मात्नवन्धस्तु द्र्यो" त्यालाच "संधानच अत्ता युत्तः प्रारम्भा 'कन्धरीभ* *बर्तमानानां प्रकारच्या अवस्था बाहुल्यं निबध्दु "्गूहून व्क्ष्य” 'ज्यार्थानि निघृण" पुष्ठ. 6 २५४९ र्र श्वर २५२ २५८ २६५ २६५ २६८ २६९ २७२ २७७ कट. २टप५९ २८९६ २८६ २८९ २९७ २१०० ३०८०० ऱ्न्ट ३१०९ २११६ १३१९ २२९० १२२ १र २३० २९ ड्ट प्र दर ७9४ ष्ट १० श्र रोवटून ९ रोबटून २ १ रोबटून ७ रोवटून ५ शेवटून ७ अशुद्ध आरशस प्यावनया ब्ज्र स्‌ज्ञा पाश्रय "दवेनम्‌ ख्ट्‌ सांगतली किमिन्द्र निवोधत उत्ति "न्यड्जोनि तत्थान्यं "मात्रम्‌ "कनिकेंदशास्याो" *मकानां तद्र्य कुण्डनेंल हे वाच्यार्था सन्धबकं प्राधान्य पुरुख्याला 31 लास्यद्वेभ्यो उक्त हे सुद्धा सप्रेक्ष्य (उपोद्धात) पथ्वी* त्याच पुथ्धीवर १५ एएकाद्य संकृत सस्कृत हीऊ गुद्ध आडांस" *यौवनया वज स्ज्ञा शपाश्रयं ददनम्‌ खेट्‌ सांगितली किमिन्द्र- निंबोधत इति "न्यजुननि तत्स्थान्यं "मात्रम । "डनिर्देशास्याडी ्मडडननां तदवेय* कुण्डल हे वाच्यार्थाने सेन्धवकं प्राधान्यं पुरूरव्याला ट्श लास्याज्षेभ्यो उद्धृत हन संप्रेक्ष्य पृथ्वी त्याचा पृथ्वीवर प्र एखाद्या संस्कृत संस्कृत होऊ